Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कट्टा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या एका विद्यार्थ्यास क्राइम ब्रँचच्या युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले. संशयिताविरोधात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ८) सांयकाळी साडेचार वाजेच्या सुमारास गंगापूररोड परिसरातील आकाशवाणी टॉवरजवळ करण्यात आली.

भूषण कैलास नांद्रे (२३, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) असे अटक झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. युनिट दोनच्या पथकातील पोलिस नाईक मोतीलाल महाजन यांना अवैध गावठी कट्ट्याबाबत माहिती मिळाली होती. एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर एक व्यक्ती देशी बनावटीचे पिस्टल बाळगून ते विक्री करण्यासाठी गंगापूररोड परिसरातील आकाशवाणी टॉवरजवळ येणार असल्याच्या माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली. युनिटच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लागलीच आकाशवाणी टॉवरजवळ सापळा रचून नांद्रेला अटक केली. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले. त्याच्याविरोधात भारतीय हत्यार अधिनियम तसेच मुंबई पोलिस अॅक्टनुसार गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. संशयितास कोर्टात हजर करण्यात आले. नांद्रेला मंगळवार ११ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोळीबाराचे उलगडेना गूढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडच्या तरुणावर वडनेरगेट येथे चौघांनी आर्थिक देवाणघेवाणीतून केलेल्या गोळीबाराचे गूढ उलगडलेले नाही. या प्रकरणाचा सर्व अंगांनी सखोल तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उपनगर पोलिसांनी शनिवारी (दि. ८) चौघांना ताब्यात घेतले असून एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. शिवमिलन रामराज सिंह (४२, तुलसी निवास, आनंदनगर, कदम लॉन्सजवळ, नाशिकरोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. शहर पोलिस ठाण्यामध्ये शिवरामविरूध्द खंडणीसह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. आर्थिक व्यवहारातून गोळीबाराचा बनाव केल्याचा पोलिसांना संशय आहे. शिवरामने याआधी अनेक लोकांकडून उसने पैसे घेतले असून त्याच्याकडे पैसे मागणाऱ्यांचा तगादा असतो.

शिवराम जिम व्यावसायिक आहे. तो शुक्रवारी (दि. ७) आपल्या फोर्ड फिगो कारने (एमएच १५ डीसी २५३७) पाथर्डी फाटा येथून वडनेर गेटकडे जात होता. एल अॅण्ड टी कंपनीच्या जुन्या गेटसमोर साडेअकराच्या सुमारास दोन वाहनांनी त्यांची गाडी थांबवली. त्यातून अनिल अपसुंदे (दिंडोरी), तरुण सामनानी, योगेश सामनानी, शंकर सामनानी हे चार जण उतरले. त्यातील एकाने शिवरामच्या डोक्यावर पिस्तोल टेकवली. तू आमचे पैसे कधी देतो, जीम कधी खाली करतो, अशी विचारणा करून धमकी दिली. शिवरामने गोळी चुकवण्याच्या इराद्याने डोक्यावरून हात झटकल्याने गोळी सुटून ती त्याच्या डाव्या हाताच्या पंजाला लागली. हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर मला कोणीतरी बिटको हास्पिटलमध्ये दाखल केले, असे शिवरामने पोलिसांना सांगितले. या घटनेची पोलिसांनी अतिशय गांभीर्याने दखल घेत तपासाची सूत्रे फिरविली होती.

जबाबात आढळली विसंगती

पोलिस उपयुक्त श्रीकांत कोकाटे, पोलिस निरीक्षक बिजली, बाजीराव महाजन यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहेत. घटनास्थळावरून एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. शिवरामचे हाताचे ठसे आणि त्याने दिलेली माहिती यावरुन डॉक्टर आणि फोरेन्सिक तज्ञांनी तपास केला तेव्हा शिवरामचा जबाब आणि घटना यामध्ये विसंगती आढळली.

मृतदेह आढळला
नाशिकरोड : गोरेवाडी रेल्वे लाइन परिसरात अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या उपप्रबंधकांनी नाशिकरोड पोलिस ठाण्याला माहिती दिली. मंगला एक्स्प्रेसचे चालक एस. पी. पाटील यांना शनिवारी (दि. ८) सकाळी रेल्वेमार्गावर मृतदेह आढळून आला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीव्ही, मोबाइलची सातपूरला चोरी

$
0
0

नाशिक ः बंद घराचा कडीकोयडांतोडून चोरट्यांनी घरातील टीव्ही तसेच मोबाइलची चोरी करण्यात आली आहे. हा प्रकार सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथील महावीर भवनजवळ घडली.
या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाफीस उल्ला हाबीब अन्सारी (३२, गिरीराज रो हाऊस, फ्लॅट क्रमांक १७, महावीरभवन जवळ, मूळ रा. बिहार) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, २६ ते २७ जून दरम्यान अन्सारी यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील पॅनासॉनिक कंपनीचा टीव्ही तसेच एक मोबाइल असा १७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक वाळेकर करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुटणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

पाथर्डी फाटा येथील बॉम्ब सेलच्या दुकानात गेलेल्या तिघा जणांनी कपड्यांच्या मालासह रोख रक्‍कम लंपास केली होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्या अन्य दोघा साथीदारांचा पोलिस तपास करीत आहेत. भारत किसन साळवे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डी फाटा येथील बॉम्बे सेल या दुकानात कपड्यांची विक्री सुरू असताना अचानकपणे गाडीवरून आलेल्या तिघा जणांनी या दुकानातील कपडे पाहण्यास सुरुवात केली. यावेळी इमसन रमजान अली याने यांना कपडे अंगावर घालण्यास विरोध केला मात्र याचा राग आल्याने या तिघापैकी एकाने इमसनला मारहाण करून तेथील कपडे गोळा केले. दुसऱ्या व्यक्तीने दुकानातील गल्ल्यातील रोख पाच हजार रुपये लंपास केली. तिघांनी दुचाकीवरून पळ काढला. यानंतर इमसनने इंदिरानगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक फुलदास भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम व गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पाथर्डी परिसरात गस्त घालत असतांना तीन संशयित मोटारसायकलवर आढळून आले. त्यांची चौकशी करण्यास पोलिसांनी सुरुवात करताच दोघे फरार झाले. पोलिसांनी भारत किसन साळवे यास ताब्यात घेतले. चौकशी केली असता भारतने गुन्ह्याची कबुली दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोलकरणीस जबर मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कामाला न आलेल्या मोलकरणीच्या घरी जाऊन एका महिलेसह तिच्या काही साथीदारांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली. संशयितांनी मोलकरणीच्या घरातील टीव्हीसह इतर किंमती साहित्याचेही नुकसान केले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिलोनी (पूर्ण नाव नाही), ऋषिकेश पानसरे, भूपती अशी संशयित आरोपींची नावे आहेत. मारहाण करणारे त्यांच्यासोबत अन्य व्यक्तींही होते. या प्रकरणी रामबहादूर धनबहादूर बीके (सिम्फनी अपार्ट. कर्मयोगीनगर, गोंविदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. बीके यांच्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी धुणे भांडे करण्यासाठी मिलोनी हिच्या घरी जाते. बीके यांची पत्नी शुक्रवारी, ७ जुलै रोजी मलोनी यांच्या घरी कामासाठी गेली नाही. त्यामुळे सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संशयित मद्य प्राशन करून बीके यांच्या घरी पोहचले. घराची चावी दे असे म्हणत त्यांनी घरात प्रवेश केला. मात्र, तुमच्या घराची चावी माझ्याकडे नसल्याचे बीके यांच्या पत्नीने सांगितले असता मिलोनीसह तिच्या मित्रांनी बीके यांच्या पत्नीचे केस धरून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी संशयितांनी टीव्ही, लाइट फोडून इतर सामानाची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. मारहाणीच्या या घटनेमुळे इमारतीतील इतर लोक बीके यांच्या मदतीला धावले. डॉ. काळे यांचा मुलगा वाद सोडवण्यासाठी पुढे आला असता संशयितांनी त्यालाही मारहाण केली. इतरांनी कोणी जर वाद सोडवण्याचा प्रयत्न केला तर मारहाण करण्याची धमकी संशयितांनी दिली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पीएसआय राकेश शेवाळे करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुलमोहर कॉलनीत तरुणाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूररोडवरील मोतीवाला कॉजेल पाठीमागील गुलमोहर कॉलनीत राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

नीलेश पोपट हुजबंध (रा. गुलमोहर कॉलनी, मोतीवाला कॉलेजमागे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. नीलेशने शनिवारी सकाळी ७ वाजेपूर्वी केव्हातरी दुसऱ्या मजल्यावरील रुममध्ये गळफास लावून घेतला होता. सकाळी ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात आली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद

करण्यात आली. अधिक तपास बी. एस. झनकर करीत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी निलेश नाशिकरोड येथे जावून येतो, असे सांगून घराबाहेर पडला असता तो बेपत्ता झाला होता. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये मिसींग दाखल करण्यात आली होती. मात्र, नातेवाइकांनी त्याचा शोध घेऊन आपल्या घरी आणले. मात्र, त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने आत्महत्येसारखे पाऊल का उचचले याबाबत अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौदा लाखांचे मोबाइल जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चोरलेल्या मोबाइलचा आयएमईआय हा युनिक क्रमांक बदलण्याचा उद्योगच सुरू झाल्याचे ग्रामीण पोलिसांनी शोधून काढले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत मालेगाव शहरातील सहा जणांना अटक झाली असून, त्यांच्याकडील ५९८ मोबाइल जप्त केले आहे. नाशिकमध्येच नाही तर राज्यात पहिल्यांदाच असा प्रकार उघड झाला असावा. यामुळे मोबाइल चोरीच्या गुन्ह्यावर खऱ्या अर्थाने प्रकाश पडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली जात आहे.

मालेगावसह जिल्ह्यात मोबाइल चोरीचे प्रकार वाढीस लागले आहे. शहर परिसरही अपवाद नाही. मात्र, चोरीस गेलेले मोबाइल सापडत नाही. आयएमईआय क्रमांकावरून शोध घेऊनही मोबाइलचा सुगावा लागत नसल्याने पोलिस हैराण झाले होते. पोलिस अधीक्षक संजय दराडे, मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी याबाबतचा आढावा घेऊन तपासकामी सूचना केल्या. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक गजानन शिवलिंग राजमाने यांना मालेगावात काही मोबाइल दुकानदार चोरीस गेलेल्या मोबाइल हॅण्डसेटचे आयएमईआय क्रमांक बदलून विक्री करीत असल्याची माहिती समजली. त्यानुसार, राजमाने यांनी पुढील तपासासाठी वेगवेगळी पथके तयारी केली. पोलिसांनी शनिवारी (दि. ८) एकाच वेळी वेगवेगळ्या छापे मारले. पोलिसांनी आयशानगर परिसरातील सुपर मार्केट येथील सेल झोन मोबाइल शॉप दुकानावर छापा मारून अबुलईस इक्बाल अहमद यास अटक केली. तसेच, सुफियान देशमुख अबुबकर देशमुख (देशमुख मोबाइल शॉपी), इजाज अहमद मोहम्मद (मोहमद मोबाइल शॉपी), सोहेल अहमद निसार अहमद (हिंदुस्थान मोबाइल शॉपी), तमसील बशर इकबाल अहमद (राजू मोबाइल) आणि लईक अहमद मोहम्मद मुर्तुजा (फाईन टच मोबाइल शॉपी) या संशयितांना पोलिसांनी अटक केली. संशयितांकडून क्रमांक बदलण्यासाठी लागणारे साहित्य, लॅपटॉप, कम्प्युटर, तसेच मोबाइल सॉफ्टवेअर मारण्यासाठी वापरले जाणारे टूल्स आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सर्व संशयितांकडून १४ लाख ५६ हजार ९२० रुपयांचे ५९८ मोबाइल जप्त करण्यात आले आहे. संशयिताविरोधात आयटी अॅक्ट ६६ मधील तरतुदीनुसार, इंडियन कॉपी राईट अॅक्ट ६३ तसेच कलम ४८३, ४८५ आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक ठिकाणांवरून चोरीस गेलेल्या मोबाइल फोनचे आयएमईआय क्रमांक बदलून विक्री केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. या संशयितांकडे चोरीचे मोबाइल विक्री करणाऱ्या चोरांचाही यामुळे उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. या कारवाईत पोलिस उपअधीक्षक राजमाने यांच्यासह पोलिस निरीक्षक व्ही. डी. ससे, सहायक पोलिस निरीक्षक टकले, करपे, दुनगहू, पीएसआय खैरनार, इंगळे, चव्हाण आदींनी सहभाग घेतला. दरम्यान, आयएमईआय क्रमांक बदलण्याचे काम मुंबईत देखील होते. नाशिकमधून चोरीला गेलेल्या अनेक मोबाइलचा वर्षांपासून पत्ताच लागलेला नाही. मुंबईत क्रमांक बदलल्यानंतर हे मोबाइल परराज्यात विक्रीसाठी पाठवले जातात.

नाशिकला दिलासा

शहरातून मोबाइल चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, त्यातील अनेक मोबाइल ट्रेसच झालेले नाहीत. ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणलेल्या या गुन्ह्यामुळे शहरातील मोबाइल चोरट्यांचा आणि मालेगावचा काही संबंध आहे काय? हे शोधून काढण्याची संधी निर्माण झाली आहे.

यामुळे येतात अडचणी

आयएमईआय हा क्रमांक प्रत्येक मोबाइलसाठी युनिक असतो. याच क्रमांकाच्या आधारे पोलिस चोरट्याचा माग काढू शकतात. मात्र, आयएमईआय क्रमांक बदलण्यात येत असल्याने चोरी गेलेल्या मोबाइलचा कोणताही मागमुस लागत नाही. यातून मोबाइल चोरीचा तसेच विक्रीचा मोठा बाजार सुरू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकराजाचे लवकरच ऑनलाइन दर्शन

$
0
0

देवस्थान ट्रस्टतर्फे वेबसाइटचे अपग्रेडेशन सुरू

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन लवकरच ऑनलाइन उपलब्‍ध होणार आहे. यामुळे देश-‌विदेशातील भाविक घरबसल्या त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊ शकतील. सध्या शिवप्रासाद निवासी खोल्यांचे ऑनलाइन बुकिंग व देणगी दर्शन पावतीचीही ऑनलाइन बुकिंग सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. यामुळे भाविकांची निवासाची व दर्शनाची गैरसोय टळणार आहे.

चार ते पाच तास प्रतीक्षा करूनही काही सेकंदात त्र्यंबकराजाचे दर्शन घेताना भाविक नाराज होतात. येथे शिवलिंग शाळुंकास्वरूप नाही. त्र्यंबकराजाचे वेगळेपण गाभाऱ्यात निटपणे पाहता येत नाही. यामुळे भाविक नाराज होतात. ऑनलाइन दर्शन सुरू झाल्यास देश-विदेशातील भाविकांना याचा लाभ होईल. त्र्यंबकेश्वरमधील शिवलिंग कसे आहे, याची माहिती मिळाल्यास भाविकांचेही समाधान होणार आहे. यासाठी देवस्‍थान ट्रस्टच्या वेबसाइटचे अपग्रेडेशन सुरू आहे.

निवासाची गैरसोय टळणार

त्र्यंबकेश्वर येथे निवासी येणाऱ्या भाविकांना रूम मिळेल की नाही याची धास्ती असते. रूम मिळेल पण त्याचे दाम किती मोजावे लागतील, अशा नानाविध शंका असतात. त्या शंका बुकिंग सुविधेने दूर होणार आहेत. शिवप्रासादातील निवासी रूमचे दर सुविधेनुसार २५० ते १८०० रुपयांपर्यंत आहेत. भाविकांना http://trimbakeshwartrust.com या संकेतस्‍थळावर निवासासाठी ऑनलाइन बुकिंग करण्याची सुविधा उपलब्‍ध आहे.

देणगी दर्शनाची ऑनलाइन बुकिंग

सध्या देणगी दर्शन पावतीचा २०० रुपये दर आहे. ही पावती देऊन उत्तर दरवाजाने थेट दर्शनास जात येते. ऑनलाइन सुविधा झाल्यास काही ठराविक संख्येपर्यंत भाविकांना ही सुविधा दिली जाणार आहे. बुकिंग केल्यानंतर २४ तासांत दर्शन घेण्याची मर्यादा असेल. दूर अंतरावरून नियोजन करून येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ही सुविधा देण्यात येणार आहे.

त्र्यंबकेश्वर देवस्थानचे ऑनलाइन दर्शनाकरिता काम सुरू आहे. पंढरपूर, शिर्डी आदी देवस्थानांप्रमाणे जगभरातील भाविकांना ऑनलाइन दर्शन देण्याचा आमचा मानस आहे. तत्पूर्वी शिवप्रासाद निवासी खोल्यांचे ऑनलाइन बुकिंग आणि देणगी दर्शन पावती ऑनलाइन सुविधा निर्माण करण्यात येत आहे.

- डॉ. सत्यप्रिय शुक्ल, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अन् जाहिरातबाजी थांबली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोड येथील बस स्टॉपच्या निवारा शेडवरील खानावळीचा जाहिरात फलक अखेर हटविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे करन्सी नोट प्रेससमोरील निवारा शेडमधील पोस्टाची पेटीदेखील काढण्यात स्थलांतरित करण्यात आली आहे. याबाबत ‘मटा’मध्ये नुकतेच छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन ही कार्यवाही करण्यात आल्याने फुकटची जाहिरातबाजी थांबल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, या परिसरातील निवारा शेडचे विद्रुपीकरण दूर करून त्यांची दुरुस्ती करण्याची मागणीदेखील परिसरातून करण्यात येत आहे.

जेलरोड येथील महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्राशेजारील बस स्टॉपवर प्रवाशांसाठी निवारा शेड उभारण्यात आले आहे. मात्र, परिसरातील एका खानावळ मालकाने मोठा बोर्ड करून तो या बस स्टॉपच्या निवारा शेडवर लावला. त्यात पत्ता व फोन नंबरही दिला होता. या फलकामुळे हा बस स्टॉप आहे, की हॉटेल असा प्रश्न प्रवाशांना पडत होता. हा फलक कोसळून प्रवासी जखमी होण्याचीही भीती होती. ‘मटा’मध्ये याबाबत छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हा फलक हटविण्यात आला आहे.

--

पोस्टानेही केली कार्यवाही

जेलरोडला करन्सी नोट प्रेससमोरील बस स्टॉपवर बस कधीच थांबत नसल्याच्या तक्रारी आहेत. या निवारा शेडमध्ये भाजीविक्रेते आपल्या वस्तू त्यात ठेवतात. या शेडमध्येच पोस्टाची पेटीदेखील लावण्यात आलेली होती. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. याबाबत ‘मटा’मध्ये छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध होताच ही पेटी संबंधित विभागाने काढून घेतली आहे. नाशिकरोडचे पोस्टमास्तर सुधाकर जाधव यांनी कर्मचारी पाठवून ही पेटी काढली आणि शेजारी असलेल्या प्रेसच्या जाळीवर बसविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाई घटली; दंडात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक विभागाच्या नुकत्याच सुरू झालेल्या चार कार्यालयांनी कामकाजास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम दिसून येत असून, रोजच्या कारवाईचा आकडा पावणेसहाशेच्या घरात पोहचला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कारवाईचा आकडा खूपच कमी असून, दंडाचा आकडा मात्र तुलनेने जास्त आहे.

पोलिस स्टेशनच्या धर्तीवर वाहतूक शाखेचा विस्तार करण्यात आला असून, शहरात चार वाहतूक कार्यालये सुरू झाली आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांची संख्या दुप्पट झाली असून, कारवाईचे प्रमाणदेखील वाढले आहे. गुरुवारी (दि. ६ जुलै) वाहतूक शाखेने ५७० बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली. यापूर्वी दिवसभरात फारतर ३०० केसेस होत होत्या. मात्र, गतवर्षीचा विचार करता यंदा कारवाईत मोठी घट झाल्याचे दिसते. गतवर्षी वाहतूक शाखेने एक लाख १२ हजार ३८ केसेस करून एक कोटी १८ लाख ८४ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. तेच यंदा मात्र ६१ हजार १०६ केसेस झाल्या आहेत. दंडाचा आकडा मात्र एक कोटी ४९ लाख ३६ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहचला. दंडाच्या रकमेत झालेल्या वाढीचा हा परिणाम असल्याचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. वाहतूक शाखेच्या एकूण कामगिरीबाबत बोलताना पाटील यांनी स्पष्ट केले की, पूर्वी केंद्रीय पध्दतीने काम होत होते. आता चार विभागीय कार्यालये सुरू झाली असून, वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे. ही विभागीय कार्यालये पोलिस स्टेशन धर्तीवर सुरू झाली असून, संबंध‌ित पोलिस निरीक्षकांना हद्द तसेच कारवाईची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कॉलेजरोड, गंगापूररोड, द्वारका, त्र्यंबकरोड किंवा फारतर रविवार कारंजा परिसरात कारवाई करणारे वाहतूक पोलिस या भागातून बाहेर पडले आहेत. ठराविक भागात वर्षानुवर्षे नियमबाह्य वाहतूक करणारे वाहनचालक यामुळे कारवाईच्या टप्प्यात पोहचल्याचा दावा पाटील यांनी केला. इंदिरानगर अंडरपासचा प्रश्न जवळपास मार्गी लागला आहे. द्वारकेचा प्रश्न सोडवण्यासाठी काम सुरू असून, जेहान सर्कल तसेच एबीबी सर्कल काढून तिथे सिग्नल्स बसवण्यात आले. वाहतूक विभागाच्या आणखी काही योजना प्रस्तावीत असून, यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर संक्रात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.


..तर करा तक्रार

वाहतूक विभागातच ठिय्या मांडून आर्थिक देवाण-घेवाण करण्याचा आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. आता सर्वच कर्मचारी नवीन असून, सर्वांना सूचना करण्यात आल्या आहेत. तरीही वाहतूक पोलिसांकडून अनधिकृत पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी असतील तर नागरिकांनी लागलीच त्याची तक्रार करावी. वरिष्ठ पोलिस अधिकारी त्याविषयी कारवाई करतील, असे पोलिस उपायुक्त पाटील यांनी स्पष्ट केले.


गतवर्षीच्या केसेस- १,१२,०३८

चालू वर्षीच्या केसेस- ६१,१०६


गतवर्षीचा वसूल दंड - १,१८,८४,७००

चालू वर्षीचा दंड- १,४९,३६,८००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा मोर्चासाठी दिंडोरीत बैठक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

येत्या ९ ऑगस्टला मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चा होणार असून, या मोर्चाच्या तयारीसाठी दिंडोरी तालुक्यातून रणशिंग फुंकण्यात आले आहे. या मोर्चात जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मुंबईतच ठिय्या देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गनिमी काव्याने या मूक मोर्चाद्वारे सरकारला अंतिम इशारा देण्याचा इरादाही सकल मराठा समाजाने घेतला आहे.

दिंडोरी येथील कै. पोपटराव जाधव संकुल येथे सकल मराठा क्रांती मोर्चाची मुंबई येथे होणाऱ्या मोर्चासंदर्भात बैठक रविवारी (दि. ९) पार पडली. यावेळी आमदार सीमा हिरे, छावाचे करण गायकर, गणेश कदम, चंद्रकांत बनकर, तुषार जगताप, योगेश नाटकर, डॉ.अमोल वाजे, योगेश निसाळ आदींनी मार्गदर्शन केले. मुंबई मोर्चात दिंडोरी तालुक्यातून सर्वाधिक समाजबांधव सहभागी होती, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

दिंडोरी तालुक्याच्या प्रत्येक गावात मोर्चाच्या नियोजनाच्या बैठका घेण्यात येणार असून, यात प्रामुख्याने मराठा आरक्षण, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, कोपर्डीतील घटनेतील आरोपींना कठोर शासन, शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी या प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहे. या आंदोलनात पक्षभेद विसरून सर्व समाजाने एकत्रित येत मोर्चा शिस्तबद्ध, शांततेत, आदर्शवत काढावा यासाठी सर्व समाजबांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीचे नियोजन सोमनाथ जाधव, रवी जाधव, गंगाधर निखाडे, संदीप जगताप, सुजित मुरकुटे, रावसाहेब बोरस्ते आदींनी केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोक अदालतीत २१४२ प्रकरणे निकाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा न्यायालयाच्या आवारात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित तसेच दावापूर्व प्रकरणांपैकी दोन हजार १४२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात न्यायालयीन प्रलंबित एक हजार ९८ आणि दावापूर्व एक हजार ४४ प्रकरणांचा समावेश आहे. लोक अदालतीमध्ये प्रलंब‌ित सहा हजार ७१० प्रकरणे आणि दावापूर्व दाखल अशी एकण १२ हजार ९१२ प्रकरणे ठेवण्यात आली होती.

दूरध्वनी कंपन्या, वाहतूक पोलिस व बँक वसूली अशा दाखलपूर्व खटल्यात एकुण ७४ लाख २८ हजार ५११ रूपये तर मोटार अपघातातील नुकसान व दंडापोटी तीन कोटी २९ लाख ५४ हजार १०३ रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली. लोक अदालतीमध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांमध्ये एकूण चार कोटी तीन लाख ८२ हजार ६१४ रुपयांची वसुली झाली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शर्मा यांच्या हस्ते या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद््घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. एस. एम. बुके यांनी केले. जिल्हा न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी लोकअदालतीचे महत्त्व विशद केले. न्यायमूर्ती शर्मा यांनी मार्गदर्शन केले, तर मुख्य न्यायदंडाधिकारी एस. टी. डोके यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा कोर्टातील वकील, समाजसेवक, पक्षकार, अधिकारी उपस्थ‌ित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला पेट्रोलिंगचा ‘वॉच’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

गंगापूर व सरकारवाडा पोलिस स्टेशनमार्फत पेट्रोलिंगसाठी महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याअंतर्गत गंगापूररोड व कॉलेजरोड भागात महिला पेट्रोलिंग पथके तैनात करण्यात आल्याने टवाळखोरांवर कारवाईला आणखी वेग येणार आहे. नव्याने रुजू झालेल्या महिला पोलिसांनी धूम स्टाइलने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगाही उगारला आहे. दुचाकीस्वारांच्या धूम स्टाइलचा त्रास महिला पेट्रोलिंगमुळे थांबणार असल्याने विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केले आहे.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक नवीन प्रयोग अंमलात आणले आहेत. त्यात गंगापूररोड व कॉलेजरोड भागात धूम स्टाइल वाहने चालविणाऱ्या टवाळखोरांचा नेहमीच त्रास अनेकांना सहन करावा लागत होता. विशेष म्हणजे कॉलेजला जाणाऱ्या तरुणींना टवाळखोरांचा नाहक त्रास सहन करावा लागत असे. त्यातच पोलिसांकडून टवाळखोरांवर कारवाई केली जात असताना अनेकदा आरोप-प्रत्यारोप केले जात होते. त्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी महिला पेट्रोलिंग पथकच गंगापूररोड व कॉलेजरोडवर तैनात केले आहे. नव्याने रुजू झालेल्या महिला पोलिसांकडून टवाळखोरांची झाडून तपासणी केली जात असल्याने अनेकांची त्याचा धसका घेतला आहे.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी दामिनी पथक म्हणून पोलिस महासंचालकांनी सुरू केले होते. परंतु, कालांतराने ते बंद करण्यात आले होते. नाशिक शहराचे पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी विद्यार्थ्यांची वर्दळ असलेल्या गंगापूररोड व कॉलेजरोड भागात महिलांची समस्या पाहता महिला पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू केल्याने टवाळखोरांवर नक्कीच आळा बसेल, अशी अपेक्षा विद्यार्थिनींकडून व्यक्त केली जात आहे. गंगापूर व सरकारवाडा पोलिस स्टेशनलाच नव्हे तर सर्वच पोलिस स्टेशनला महिला पेट्रोलिंगची व्यवस्था पोलिस आयुक्तांनी द्यावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.

--

गंगापूररोड व कॉलेजरोड भागात महाविद्यालयांच्या वेळेत नेहमीच दुचाकी टवाळखोरांचा धूम स्टाइलचा त्रास सहन करावा लागतो. महिला पोलिसांचे पेट्रोलिंग पोलिस आयुक्तांनी सुरू केल्याने धूम स्टाइल वाहने चालविणाऱ्यांना नक्कीच ब्रेक लागणार आहे.

-सविता महाले, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंगगड समस्याग्रस्त

$
0
0

घाट रस्त्यांवर कठडे दुरुस्तीसह प्लास्टिकमुक्ती सुरू ठेवण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत असून, पर्यटनाच्या दृष्टीने ही सुखद बाब आहे. मात्र वाढत्या गर्दीप्रमाणे गडावर समस्याही वाढताना दिसत आहेत. कळवण तालुक्यातील श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत असून, पर्यटनाच्या दृष्टीने ही सुखद बाब आहे. मात्र वाढत्या गर्दीप्रमाणे गडावर समस्याही वाढताना दिसत आहेत. ऐन पावसाळ्यात रस्त्यांची पुरती वाट लागली असून, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामपंचायतमार्फत वसूल केला जाणारा कर महिनाकाठी २ लाखांपर्यंत येऊन पोहोचल्याने आगामी काळात अंतर्गत रस्ते विकासाला चालना मिळावी, ही अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

यात्रोत्सव काळापुरता गडावर प्लास्टिकमुक्ती न ठेवता त्याची प्रभावी अंमलबजावणी वर्षभर व्हायला हवी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. नांदुरी ते गड या घाटरस्त्यांवर सातत्याने कोसळणाऱ्या दरडींची कायमस्वरूपी काळजी व्हायला हवी. भाविक व पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा प्रभावी होणे गरजेचे असून, धोकादायक वळणांवर काढण्यात येणाऱ्या सेल्फीवर आळा घालण्यासाठी पर्यायी सुरक्षा यंत्रणा निर्माण करण्याची वेळ आली आहे. यासारख्या समस्यांनी सप्तशृंग गडाला ग्रासल्याचे चित्र आहे.

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंग गडावर दर्शनासाठी हजारो भाविकांनी श्री गुरुपौर्णिमा व रविवारची सुट्टीचा समन्वय साधत आपली हजेरी लावली. गड परिसरात पावसाच्या सरी कोसळत असल्याने ठिकठिकाणी विलोभनीय धबधबे असतात. पर्यटनाच्या माध्यमातून देवीदर्शन घेणाऱ्या अनेकांना अशा वातावरणात याठिकाणी 'सेल्फी'घेण्याचा मोह आवरता येत नाही. काही तरुण-तरुणींकडून तर घाटरस्त्यावरील वळणावर असलेल्या सुरक्षा कठड्यावर चढत सेल्फी घेण्याची हौस असते. मात्र अनेक ठिकाणी ढासळलेले दगड, पोखरले गेलेले संरक्षक कठडे हे अत्यंत धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे त्यासाठी सुरक्षा यंत्रणा कार्यरत होणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढणार

सातत्याने आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाला अत्यावश्यक सेवा देताना उत्पन्नाअभावी अडचणी येत होत्या. याकरिता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रतिमाणसी २ रुपये इतका नाममात्र कर वसुलीचा अधिकार मिळाला आहे. यामुळे गड ग्रामपंचायतीला महिनाकाठी २ लाखांचे उत्पन्न सुरू झाले आहे. हा पैसा आगामी काळात स्थानिक पातळीवर विकासकामांसाठी उपयोगात येऊ शकतो. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्वात अवघड काम गडावर होतांना दिसत असते. सातत्याने पडणाऱ्या दरडी व त्यामुळे कोंडली जाणारी वाहतूक व्यवस्था मोकळी करण्यासाठी हा विभाग सतत कार्यमग्न असतो.

नांदुरी ते गड या घाट व वळण रस्त्यावर अजूनही दरड कोसळणे सुरूच आहे. याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असून, केवळ प्रसंगानुरूप दगड बाजूला करून रस्ता वाहतूक सुरळीत करण्याचे काम बांधकाम विभागाकडून होत असते. पर्यटन विभागानेही याबाबत लक्ष घालणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंदन आमुचे गुरुजनांना...

$
0
0

टीम मटा

जीवनाच्या वाटेवर रस्ता दाखविणाऱ्या गुरूंबद्दल कृतार्थ भाव व्यक्त करण्यासाठी रविवारी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शहर परिसरात गुरूं, आई-वडिलांचे पूजन करण्यात आले. ठिकठिकाणी धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शाळांसह संगीताच्या क्लासमध्येही गुरुपूजन सोहळा रंगला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाबाची फुले दिली, तर संगीताच्या क्लासमध्ये संगीतरुपी गुरुदक्षिणा देण्यात आली. शहरातील मंदिरांमध्येही सकाळपासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या. शहर परिसरातील उपनगरांमध्येदेखील विविध कार्यक्रम झाले.

--


भाविकांनी फुलली मंदिरे

एकमुखी दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फुलांची सजावट अन् रोषणाईने मंदिर उजळून निघाले होते. पहाटे लघुरुद्राभिषेक झाल्यावर सकाळी ८.३० वाजता दत्तगुरूंची आरती आणि महावस्त्र अर्पण करण्यात आले. दुपारी १२ वाजता माध्यान्ह पूजेला तीर्थ-महाप्रसाद, तर सायंकाळी भक्तिसंगीताचा कार्यक्रम झाला. रात्री १० वाजता महाआरती आणि १०.३० वाजता पालखी सोहळा झाला. इतर वेळी असणाऱ्या गर्दीपेक्षा रविवारी दत्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. कपालेश्वर मंदिराजवळील दत्त मंदिरातदेखील गुरुपौर्णिमेचा सोहळा रंगला. अनेक भाविकांनी दत्तगुरूंना वाहण्यासाठी विविध प्रकारची फळे आणली होती. या ठिकाणी साखर-फुटाण्यांचा प्रसाद भाविकांना वाटण्यात आला. दत्त मंदिरांप्रमाणेच साईबाबा मंदिरातदेखील गुरुपौर्णिमेचा सोहळा रंगला. गंगेवरील साईबाबांच्या मंदिरात सकाळपासूनच गर्दी झाली होती. सकाळच्या आरतीच्या वेळी अनेक भाविकांनी दर्शन घेतले. शनिवारी रात्रीच या मंदिराला रोषणाई करण्यात आली होती.

गोदाघाटावरील ढगे महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भजनसेवेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी हरिपाठ, गुरुपौर्णिमेचे प्रवचन आणि बाबांची प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद व गोपाळकाल्याचे वाटप करण्यात आले.

यशवंतराव देवमामलेदार पटांगणावरील परमपूज्य सदगुरू श्री गजानन महाराज गुप्ते समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यात सकाळी ७ वाजता श्रींच्या समाधीस रुद्राभिषेक व महापूजा, सकाळी १० वाजता ध्यानधारणा व नामजप, ११ वाजता प्रवचन, १२.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सद्गुरू गजानन महाराज गुप्ते, सद्गुरू दादा महाराज चिटणीस आणि भाईनाथ महाराज कारखानीस यांच्या समाधीचे दर्शन घेऊन गुरुपौर्णिमा उत्सवात शेकडो भाविक सहभागी झाले होते.

समर्थ रामदास स्वामी स्थापित टाकळीच्या गोमय मारुती मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त सकाळी ११ वाजता महापूजा, उद्धव महाराज समाधी दर्शन, त्यानंतर १२ वाजता महाआरती, तर १२.३० वाजता प्रसादवाटपाचा कार्यक्रम झाला. या ठिकाणी सायंकाळपर्यंत भाविकांची रीघ लागली होती. अनेकांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून दासबोधाचे पारायण केले. इंदिरानगर येथील गजानन मंदिरात गण गण गणांत बोते असा गजर करण्यात आला.

रा. स्व. संघातर्फे उत्सव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहराच्या विविध भागांमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संघात व्यक्तीपेक्षा तत्त्व श्रेष्ठ हा विचार रुजविण्यासाठी गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी संघाचे स्वयंसेवक कुठल्याही शिक्षकाचे पूजन न करता भगव्या ध्वजाचे पूजन करतात. या दिवशी दिल्या जाणाऱ्या गुरुदक्षिणेतून वर्षभरातील संघाच्या कार्यक्रमांचा खर्च भागविला जातो. संघाचे मुख्य कार्यालय असलेल्या तीळभांडेश्वर मंदिर येथील सोमेश्वर मंदिरात हा सोहळा झाला.


सोमवार पेठेत पारायण

वेलकम सहकार्य मित्रमंडळातर्फे विपुल पर्जन्यवृष्टीसाठी अहीर सुवर्णकार समाज कार्यालय येथे गजानन विजय ग्रंथ पारायण पठण करण्यात आले. त्यात सुमारे ४०० भाविकांनी सहभाग घेतला. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. विद्याताई पडवळ यांच्या मधुर वाणीने सोहळ्यातील रंगत वाढविली. पारायणाची सांगता गजानन महाराजांच्या आरतीने झाली. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे आणि भाजप पश्चिम मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी आदींची उपस्थिती होती.


टाकळी, इंदिरानगरला रीघ

समर्थ रामदास स्वामी स्थापित टाकळीच्या गोमय मारुती मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त सकाळी ११ वाजता महापूजा, उद्धव महाराज समाधी दर्शन, त्यानंतर १२ वाजता महाआरती, तर १२.३० वाजता प्रसादवाटपाचा कार्यक्रम झाला. या ठिकाणी सायंकाळपर्यंत भाविकांची रीघ लागली होती. अनेकांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून दासबोधाचे पारायण केले. इंदिरानगर येथील गजानन मंदिरात गण गण गणांत बोते असा गजर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बळीराजास पावसाची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यात गेल्या महिनाभरापासून वरुणराजाने अवकृपा केल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. सर्वत्र नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. बी-बियाणे विक्रेत्यांसमोरही मोठे संकट उभे ठाकले असून, येत्या दोन ते तीन दिवसांत पाऊस न झाल्यास आहे ती पीके जळून जाण्याची भीती परिसरात व्यक्त होऊ लागल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी तालुक्यासह शहरात वरुणराजाने हजेरी लावली. यानंतर १० जूनपर्यंत दररोज अल्पशा प्रमाणात का होईना तालुक्यात ठिकठिकाणी वरुणराजाने हजेरी लावली होती. यामुळे शेतकरी वर्गात आशेचा किरण निर्माण झाला होता. परिणामी, खरीपांची कामे शेतकऱ्यांनी वेगाने करण्यास प्रारंभ केला होता.

खरीपपूर्व मशागतीनंतर शेतकऱ्यांनी तालुक्यात मका, मुग, उडीद, तूर यासह कडधान्याची पेरणी करून सज्जता दर्शविली होती. मात्र १४ जूननंतर पावसाने दडी मारली असून, ती अद्याप कायम आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले असून पेरणी केलेली पीके वाचविण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.

तालुक्यात जून व जुलै महिन्यात अवघ्या १११ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून, गतवर्षीच्या तुलनेने हा पाऊस अधिक असल्याचे शासकीय आकडेवारी दाखवित असल्याने जनतेत सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे खरिपाची पीके वाचविण्यासाठी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग आहे. आधीच कर्जमाफीचे भिजत घोंगडे, त्यात महागडे बियाणे खरेदी करून केलेली पेरणी यामुळे शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावरील हास्य हरवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अँटिक येझदी-जावा बाइक्सची क्रेझ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक येझदी-जावा क्लबच्या वतीने पाचव्यांदा आयोजित अँटिक येझदी अन् जावा बाइक्सने नाशिककरांना रविवारी भुरळ घातली. राज्यभरातील विविध शहरांमधून या प्रदर्शनात अँट‌िक बाइक मॉडेल्ससह १०२ बाइकप्रेमी सहभागी झाले होते. पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद््घाटन करण्यात आले.

कॉलेजरोड परिसरातील श्रद्धा मॉल येथे या येझदी बाइकच्या प्रदर्शनाचे उद््घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सध्या उत्पादनामध्ये नसणाऱ्या मात्र, एका कालखंडात रुबाबाचे दुसरे नाव असणाऱ्या येझदी-जावा गाड्यांची महती नव्या पिढ्यांच्याही नजरेसमोर यावी, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष अंबरीश मोरे यांनी दिली.

या प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यासह मुंबई, पुणे, शिर्डी, राहाता, शहापूर आदी परिसरातून बाइकप्रेमींनी बाइक्सचे मॉडेल सादर केले. महिंद्राने आता जावा ब्रँड विकत घेतला असून, २०१८ मध्ये जावा ३०० सीसी व ६०० च्या गाड्याही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या निमित्ताने महिंद्राच्या वतीने नाशिक येझदी जावा क्लब आणि बेंगळुरू येथील येझदी जावा क्लबला नामांकन देण्यात आले.


‘झाडे लावा’ची थ‌िम...

‘वर्ल्ड जावा डे’ साजरा करताना सामाजिक थ‌िम घेण्याचीही परंपरा या क्लबने जपली आहे. यंदाही ‘झाडे लावा, झाडे वाचवा, झाडे जगवा’ या थ‌िमवर क्लबचे सदस्य मेहनत घेणार आहेत. यंदा यानिमित्त १०० झाडे लावण्यात येणार असून, ती जगविण्याचाही निर्धार क्लबच्या वतीने करण्यात आला आहे. रविवारच्या उपक्रमात नाशिककरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन क्लबच्या वतीने अंबरीश मोरे, विशाल फाळके आणि संकेत शेलार यांनी केले आहे.


ब्रिटिशकाळापासून प्रसिद्ध

येझदी अन् जावाच्या गाड्यांची चलती मुख्यत: ब्रिटिशकाळात होती. या कालावधीत या गाड्या आयात होत असत. यामध्ये जावा १५०, २५०, ३५० आणि ५०० सीसी, ओएचसी, ओगर, पेराक, सी-झेड ही मॉडेल्स भारतामध्ये उपलब्ध होती. इराणी बंधूंनी १९६०च्या दशकामध्ये या गाड्या मोठ्या प्रमाणावर आयात करण्यास सुरुवात केली होती. म्हैसूरच्या दिवाणांच्या प्रयत्नाने येथे नव्याने या गाड्यांचा सुरू झालेला प्रकल्प, कालांतराने जावाचे येझदीमध्ये झालेले रुपांतर अन् भारतामध्ये या गाड्यांची वाढलेली शान यामुळे एका कालखंडातील या गाड्या असंख्य बाइकप्रेमींमध्ये स्थान मिळवून आहेत. या रुबाबदार गाड्यांच्या चाहत्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंतवणूकदारांची एकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

देशातील ५० लाख गुंतवणूकदारांचे सात हजार कोटी रुपये मुदत संपल्यानंतरही परत न करणाऱ्या पॅनकार्ड क्लब कंपनीविरुध्द गुंतवणूकदारांनी लढा सुरू केला आहे. गुंतवणूकदारांच्या इन्व्हेस्टर्स अॅक्शन फोरम चॅरिटेबल ट्रस्टने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या ट्रस्टतर्फे उपनगर येथे कंपनीचे गुंतवणूकदार व मार्केटिंग एजन्टांचा राज्यातील पहिला मेळावा झाला. यावेळी ट्रस्टचे निमंत्रक विश्वास उटगी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ट्रस्टचे अध्यक्ष ए. एस. पेडणेकर, विशाल बेर्डे, व्ही. पी. गोसावी, टी. सी. कलगुटकर, अरुण मोरे, विजय गावकर, एन. एम. लवंगरे आदी उपस्थित होते. उटगी म्हणाले की, हॉटेलिंग व रिसॉर्टसचा व्यवसाय करणाऱ्या पॅनकार्ड क्लब कंपनीने शेअर बाजारात नोंदणी न करताच गुंतवणूकदारांकडून एक हजारापासून लाखो रुपयांपर्यंतच्या ठेवी घेतल्या. तीन वर्षे तीन महिन्यांत दुप्पट, सहा वर्षे तीन महिन्यांत दुप्पट आणि नऊ वर्षांत तिप्पट पैशांचे आमिष दाखवले. बॅँकेपेक्षा जास्त व लवकर पैसे मिळत असल्याने देशातील ५० लाख, तर महाराष्ट्रातील २७ लाख गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले. १९९७ ते २०१३ पर्यंत मल्ट‌िलेव्हल मार्केटिंग तत्वावर कंपनीची योजना व्यवस्थित सुरू होती. नंतर कंपनीने पैसे देण्याचे टाळले. त्याविरुध्द तक्रार केल्यानंतर सेबीने कंपनीची सामूहिक गुंतवणूक योजना बंद केली. मात्र, गुंतवणूकीचे ७०३५ कोटी रुपये परत न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी वरील ट्रस्ट स्थापन केली. गुंतवणूकदारांचे दावे भरुन मेळावे घेण्यास नाशिकमधून सुरुवात करण्यात आली आहे.


देशपातळीवर आंदोलन

हे आंदोलन देशपातळीवर नेले जाणार आहे. ऑगस्टअखेरीस एक लाख पॅनकार्ड क्लब गुंतवणूकदारांचा मोर्चा सेबीवर नेण्यात येणार आहे. कंपनीची देश-विदेशातील मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची मागणी लवादाकडे केली असता लवादाने गुंतवणूकदारांच्या बाजूने निकाल दिला. सेबीने १९७ कंपन्यांवर बंदी घातली आहे. त्यात पॅनकार्ड क्लबचा समावेश आहे. सेबीने आदेश देऊनही कंपनी गुंतवणूकदारांचे पैसे परत करत नाही.


नाशिककरांना फटका

पॅनकार्ड क्लबचे नाशिकमध्ये पाच हजार मार्केटिंग प्रतिनिधी असून, २५ कोटींची गुंतवणूक झाली आहे. महाराष्ट्रात २७ लाख गुंतवणूकदार असल्याने मेळावे घेऊन जागृती केली जाणार आहे. नाशिकमधून रविवारी त्याचा प्रारंभ झाला. गुंतवणूकदारांचे दावे भरुन घेऊन ते सेबीला देण्यात येणार आहेत. कायदेशीर व लोकशाही मार्गाने गुंतवणूकदारांनी लढा सुरू केला आहे. कंपनीची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची मागणी आजच्या मेळाव्यात करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळ्यात बाइक ठेवा तंदुरुस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसात गाडी अचानक बंद पडली तर संताप होतो. आपली गाडी तंदुरुस्त असावी यासाठी काय करता येईल, पावसाळ्यात बाइकची काळजी कशी घ्यावी, या विषयावर महाराष्ट्र टाइम्सतर्फे शनिवारी १५ जुलै रोजी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकरोडवरील मोहरीर यामाहा शोरूममध्ये सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत वर्कशॉप होईल. हा कार्यक्रम कल्चर क्लब सदस्यांसाठी मोफत आहे.

पावसाळा आला की तरुणांना सर्वात जास्त चिंता सतावते ती आपल्या बाइकची. बाइक म्हणजे तरुणांचा जीव की प्राण. बाइक पावसात भिजल्यावर सर्वात जास्त अडचण निर्माण होते ती बाइक स्टार्ट करताना. कधी गाडी स्लपि होते तर कधी इंजिनमध्ये पाणी जाते, त्यामुळे गाडी बंद पडते. अशी एक ना अनेक कारणे गाडी बंद पडण्यासाठी कारणीभूत ठरतात. अशा वेळी काय करावे सुचत नाही. गाडी गॅरेजला नेण्याशिवाय पर्याय नसतो. हीच अडचण ओळखून महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी बाइक मेन्टेनन्सचे वर्कशॉप. यात तुम्हाला जाणून घेता येईल की पावसाळ्यात आपल्या बाइकची देखभाल कशी करायची? हे वर्कशॉप कल्चर क्लब सदस्यांसाठी मोफत आहे तर इतरांसाठी २०० रुपये आकारण्यात येणार आहेत. मात्र, या वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन अनिवार्य आहे. रजिस्ट्रेशनसाठी ७०४०७६२२५४, ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यामाहा बाइकसाठी ऑफर

तुमची जर यामाहा कंपनीची बाइक असेल आणि तुम्ही कल्चर क्लब सदस्य असाल, तर तुम्हाला रेग्युलर बाइक सर्व्हिसिंगवर २० टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. ही सूट ३० जुलैपर्यंत राहील. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub

टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांनी रचले सरण

$
0
0

जमिनी संपादित केल्यास सामूहिक आत्महत्येचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृद्धी महामार्गाला कडाडून विरोध करणाऱ्या शिवडे गावातील शेतकऱ्यांनी आता मरेंगे या मारेंगे अशी टोकाची भूमिका स्वीकारली आहे. जमिनींसाठीचे दरपत्रक जाहीर करून समृद्धी महामार्गाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणाऱ्या जिल्हा प्रशासनाला इशारा देण्यासाठी शेतकऱ्यांनी गावातील झाडांना गळफास लटकवून घेण्याचा इशारा देत सरण रचण्यास देखील सुरुवात केली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचा विचार सोडावा, असा इशाराही देण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गाचा तिढा सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचा होऊ लागला आहे. शेतकऱ्यांचा विरोध कायम असला तरी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी या महामार्गासाठी संपादित करावयाच्या जमिनींचे गावनिहाय दर जाहीर केले. थेट खरेदीचा पर्याय शेतकऱ्यांपुढे ठेवण्यात आला आहे. मात्र शेतक-यांनी जमीन संपादनाला तीव्र विरोध दशर्वत जिल्हाधिकारी कार्यालयासमारे दरपत्रकारची होळी केली. यामुळे समृध्दी महामार्गाचा तिढा सुटू शकलेला नाही.

आम्हाला जमिनी द्यायच्याच नाहीत तर दरांचा विषय येतोच कोठे अशी भूमिकाही शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे हा तिढा सहजासहजी सुटण्याची चिन्हे नसताना आता शिवडेतील शेतकरी अधिकच आक्रमक झाले आहेत. गावातील झाडांवर गळफास लटकवून त्यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर गावात सरण रचण्यासही सुरुवात केली असून, सरकारने आमच्या जमिनी संपादित करण्याऐवजी पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. प्रशासनाने जमिनी संपादित करण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू केली तर रचलेल्या चितेवर आत्महत्या करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

समृद्धी महामार्ग आणि विकासाला आमचा विरोध नाही. परंतु, त्यासाठी आमच्या जमिनी घेऊ नयेत. पर्यायी मार्गाने सरकारने समृद्धी महामार्ग न्यावा. आमच्या जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला तर आम्ही सामूहिक आत्महत्या करू.

- सोमनाथ वाघ, शेतकरी शिवडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>