Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘योगाकडे करिअरच्या दृष्टीने बघा’

$
0
0

आधुनिक काळातही आपल्या क्षेत्रात आणि जीवनात प्रभुत्वाने जगण्यासाठी प्राचीन परंपरा असलेले योगशास्त्र निश्चितच आधारभूत ठरू शकते. त्यासाठी या प्राचीन शास्त्राकडे आधुनिक ‘करिअर’च्या दृष्टिकोनातून नव्या पिढीने बघायला हवे, असा संदेश श्री शारदा मल्टिपर्पज संस्था संचालित श्री आदियोग आंतरराष्ट्रीय शिक्षण, अनुसंधान आणि साधनापीठाच्या संचालिका सुलभा गवळी यांनी ‘मटा’ शी बोलताना दिला.

--

-योगशास्त्र ही नाशिकसारख्या शहरांना करिअरची नवी शाखा वाटते का? याबाबत आपला अनुभव काय?

-योगशास्त्राचे दैनंदिन जीवनातील महत्त्व आजमितीस जागतिक स्तरावर स्वीकारले गेले आहे. देशात बेंगळूरू, बिहार यांसारख्या ठिकाणी जगातील नामांकित योग विद्यापीठे कार्यरत आहेत. त्यामुळे हा विषय करिअरच्या दृष्टीने अगदीच नवखा नाही. तरीही नाशिकसारख्या छोट्या शहरांमध्ये यादृष्टिकोनातून जनजागृतीस मोठा वाव आहे. अनेक निमित्तांनी जागतिक स्तरावर झळकणारे नाशिक योग शिक्षणास अनुकूल असल्याचा प्रत्यय येतो आहे.

--

-आपल्या संस्थेतील अभ्यासक्रमांविषयी...

-योग शिक्षणाच्या प्रसारासाठी आमच्याकडे योगशास्त्र आणि संस्कृत या विषयातील एक वर्ष कालावधीचा स्वतंत्र पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रतेचे निकषही अनुक्रमे बारावी आणि दहावी उत्तीर्ण ठेवण्यात आले आहेत. याशिवाय पदव्युत्तर स्तरावर एम. ए. योगशास्त्र हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पदवी उत्तीर्ण किंवा योग पदविका उत्तीर्णांसाठी आहेत. या सर्व अभ्यासक्रमांना कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालय, नागपूर यांची व यूजीसी (विद्यापीठ अनुदान आयोग) यांची मान्यता घेण्यात आली आहे.

--

-आपल्याकडील अभ्यासक्रमांचे वैशिष्ट्य काय सांगता येईल?

-योग शिक्षणात संस्थेची वाटचाल नवी असली, तरीही या क्षेत्रातील सूक्ष्म घडामोडींचा अभ्यास करूनच हे मान्यताप्राप्त शिक्षण दिले जात आहे. यात गृहिणींपासून विविध विद्याशाखांमध्ये शिक्षण घेणारे तरुण विद्यार्थी आणि प्रोफेशनल्सनाही आमच्याकडील अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होता येईल. त्यासाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस थिअरी शिकण्यासाठी कॉलेजची उपस्थिती बंधनकारक आहे. इतर वेळी स्वयंअध्ययन पद्धतीचा समावेश अभ्यासक्रमात आहे. याशिवाय योग अभ्यासक्रमातील संस्कृत या विषयाचीही विशेष तयारी आमच्याकडे करून घेतली जाते.

--

-आगामी शैक्षणिक वर्षात संस्थेचे नियोजित नवीन प्रकल्प काय आहेत?

-आमची संस्था योग शिक्षणाअगोदरपासून रक्तपेढीच्या क्षेत्रात सामाजिकदृष्ट्या कार्यरत आहे. आमच्या रक्तपेढीत काही थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त रुग्ण आहेत. या रुग्णांना सातत्याने रक्तबदलास सामोरे जावे लागते. या उपचारांदरम्यान त्यांची रोगप्रतिकारक क्षमता आणि आरोग्यस्तर उंचावण्यासाठी योगाच्या शास्त्रशुद्ध अंमलबजावणीचा उपयोग करण्याचा संशोधनाधारित प्रकल्प आम्ही घेऊ. याशिवाय ‘मधुमेहमुक्त भारत’ यासारख्या समाजोपयोगी संकल्पना आम्ही नाशिकमध्ये राबविणार आहोत.

--

-योग शिक्षणातील आव्हानांसंदर्भात काय वाटते?

-केवळ योगासने करणे म्हणजे योगशास्त्र असा चुकीचा समज समाजात रूढ होत आहे. व्यक्तीचे बाह्य व्यक्तिमत्त्व आणि मनोविकास यांचा समतोल साधणारी योगशास्त्र ही एक स्वतंत्र जीवनशैली आहे, हा शास्त्रसिद्ध संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान योग शिक्षणात महत्त्वाचे वाटते. व्हर्च्युअल बनलेल्या नव्या पिढीला योगाच्या माध्यमातून योगशक्तीच्या रिअॅलिटीची अनुभूती देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

--

-योग अभ्यासक्रमांनंतर प्लेसमेंट्ससंदर्भात काय चित्र आहे?

-ज्यांना मनापासून योग या विषयात करिअर करण्याची इच्छा आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी या विद्याशाखेत जागतिक स्तरापर्यंत संधी उपलब्ध आहेत. आधुनिक जीवनशैली ही प्रत्येकाच्या जगण्यातील समस्या झाली आहे. ही समस्या मन आणि शरीर या बाबींशी नाते सांगते, तर योगशास्त्र याच मुद्यांवर उपाययोजना देते. परिणामी, विविध गट, संस्था, समूह स्तरावर योगशिक्षकपदापासून या विषयात स्वत: कोच बनणे, वैयक्तिक जीवन सुदृढ ठेवण्यासोबतच संशोधनासही मोठा वाव आहे. भारतात मोठ्या शहरांपासून तर जगातील सर्वच उपखंडांमध्ये योगशिक्षकांना मागणी आहे.

_ _ _

-संस्थेचे नवीन व्हिजन?

-तीर्थक्षेत्र म्हणून नाशिक शहराकडे बघण्याचा जगभरातील अभ्यासू नागरिकांचा दृष्टिकोन आहे. भौगोलिकदृष्ट्याही येथे योगाभ्यासाला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरनजीक अंजनेरी डोंगरांच्या कुशीत देश व विदेशांतील योगाभ्यासू साधकांसाठी आश्रमाच्या धर्तीवर प्रकल्प उभा करण्याचा आमचा मानस आहे. त्यादृष्टीने जलदगतीने तयारी सुरू आहे. सद्यःस्थितीत तेथे आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.

_ _ _

-योगशास्त्राकडे वळू इच्छिणाऱ्यांना काय संदेश द्याल?

-हजारो वर्षांची परंपरा असणाऱ्या योगशास्त्राचे महत्त्व आधुनिक चिकित्सेच्या कसोटीवरही जाणून घ्या. ‘रामकृष्ण मिशन’ला अपेक्षित असा शरीर व मनाने कणखर भारतीय नागरिक घडण्यासाठी तुमच्या जीवनशैलीला योगशिक्षणाची जोड द्या!

--

(शब्दांकन ः जितेंद्र तरटे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जमिनीचा दर अमान्य

$
0
0

इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास विरोध

म. टा. वृत्तसेवा, घोटी

महामार्गासाठी राज्य सरकारने भूसंपादनासाठी हालचाली गतिमान केल्याचे चित्र आहे. त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध व हरकती दाखल असूनही प्रशासनाने जमिनीचे दर निश्चित केले आहे. एका बाजूला शासन व प्रशासनाने महामार्गासाठी हालचाली गतिमान केल्या तर दुसऱ्या बाजूला या महामार्गाला विरोध म्हणून सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवला आहे. जमीन विकायची नाही त्यामुळे शासनाने कोणताही दर जाहीर केला तरी तो दर अमान्य आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. आज जमिनी दिल्या तर उद्या आमच्या भावीपिढीला उदरनिर्वाहाचे साधन काय, असा सवालही या शेतकऱ्यांनी सरकारला केला आहे.

इगतपुरी तालुक्यातील २२ गावे व वाड्या पाड्याच्या बाधित शेतकऱ्यांना प्रशासनाने जाहीर केलेल्या जमिनीचा दर अमान्य आहे. आमच्याच भागातून यापूर्वी लष्कर, पेट्रोल पाइपलाइन, धरणे, रस्ते विकास, वनविभाग आदी प्रकल्पांसाठी जमिनी शासनाने घेतल्या आहेत. त्यामुळे आताही पुन्हा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे हे भूत या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर आणून ठेवले आहे. या प्रकल्पाला जवळपास सर्वच शेतकऱ्यांचा जमीन देण्यास विरोध आहे. यासंदर्भात अनेकवेळा शासन-प्रशासन प्रतिनिधींशी चर्चा, निवेदने, आंदोलने, घेराव, रस्ता रोको याच्या माध्यमातून प्रशासनाला जाणीव करून दिली आहे. इगतपुरी तालुक्यातील सर्व गावे पेसा कायद्यात असल्याने या सर्व गावांनी समृद्धी महामार्गाला विरोध असल्याबद्दलचे व समृद्धी महामार्ग रद्द करण्याबाबत ग्रामसभांचे ठराव देण्यात आले आहे. पुढच्या पिढीला भूमिहीन करायचे नाही, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समर्थ केंद्रांत गुरुवंदना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या सेवामार्गाच्या गुरुपौर्णिमा उत्सवाची शनिवारी (दि. ८) गुरुपौर्णिमेला भाविकांच्या अमाप उत्साहात सांगता झाली. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे दिंडोरी येथील प्रधान केंद्रासह त्र्यंबकेश्वर समर्थ गुरुपीठासह देशभरातील हजारो समर्थ केंद्रांवर गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.

आषाढातील पौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमेच्या मंगल दिनी संपूर्ण भारतभर गुरूंचे, आई-वडिलांचे, आदरणीय व्यक्तींचे पूजन केले जात असल्याने सेवामार्गातील लाखो सेवेकऱ्यांच्या दृष्टीने या उत्सवाचे महत्त्व आहे. शनिवारी पहाटेपासूनच भाविकांची केंद्रांच्या परिसरात लगबग होती. दिंडोरीत गुरुमाऊली प. पू. अण्णासाहेब मोरे, तर त्र्यंबकेश्वरी चंद्रकांतदादा मोरे यांनी गुरुपादुकांचे पूजन आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे षोड्शोपचारे पूजन केले. यात सकाळी भूपाळी आरती साडेदहा वाजता नैवेद्य आरतीची सेवा सेवेकरी भाविकांनी रुजू केली. यानिमित्ताने सर्वच केंद्रांवर गर्दी असूनही कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धतेने सुरू होता. मुख्य उत्सवादरम्यान बालसंस्कार मार्गदर्शिका विवाहेच्छुक मुला-मुलींच्या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

दिंडोरीत येथील गुरुपौर्णिमा उत्सवात नाशिकसह राज्यभरातील हजारो भाविक सहभागी झाले होते. मुख्य सोहळ्यादरम्यान गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी दुष्काळसदृश परिस्थितीमुळे समाधानकारक पावसासाठी सेवेकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सेवा करण्याचे सूचित केले. महाराष्ट्रात आजही अनेक भागांत पावसाची प्रतीक्षा आहे. शेतकरी आत्महत्या कर्जमुक्तीतून देशाची मुक्तता व्हावी, यासाठी आपण सर्व सेवेकरी श्री स्वामी समर्थ
महाराजांना विनंती करू, असेही त्यांनी सांगितले.

अमेरिकेतही रंगला सोहळा

अमेरिकेतही हा उत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यात अनिवासी भारतीयांसह स्थानिकांनीसुद्धा सहभाग नोंदवला. शिकागो, डेट्रॉइट, न्यू यॉर्क अशा शहरांत हा उत्सव साजरा झाला. नितीन मोरे हे सेवामार्गाचे प्रतिनिधी म्हणून तेथे हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला गुरुजनांना नमन

$
0
0

गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरात रविवारी (दि. ९) गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आहे. वारकरी संप्रदायाचे आद्यसंस्थापक निवृत्तिनाथ महाराज यांची संजीवन समाधी असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे वारकरी भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती.

येथील संत जनार्दनस्वामी आश्रम आणि स्वामी समर्थ गुरूपीठात अनुयायांनी आपली उपस्थिती दिली. त्र्यंबकेश्वर येथे गुरुपौर्णिमानिमित्त सदगुरूंचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी शिष्यांची मांदियाळी अनुभवयास आली. गणपतबारी येथे असलेल्या श्री स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांच्या आश्रमात सकाळपासूनच शिष्यांनी हजेरी लावल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. महंत शंकरानंद सरस्वती, भगवान बाबा आणि गणेशानंद महाराज यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पेगलवाडी तळवाडे फाटा येथील देवबाप्पा माऊली धाम आश्रम येथेदेखील हजारो भाविकांना अन्नदान करण्यात आले. महामंडलेश्वर डॉ. रघुनाथ महाराज यांच्या देशविदेशातील हजारांच्या संख्येने शिष्यांनी याप्रसंगी हजेरी लावली. काशिनाथ महाराज, संदीप महाराज जाधव आदींसह भाविकांनी येथे आलेल्या भक्तांचे स्वागत केले. देवबाप्पा माऊली फरशीवाले महाराज यांनी शिष्यमंडळास आशीर्वाद दिले. सोबतच जनार्दन स्वामी आश्रम, स्वामी समर्थ केंद्र, संत गजानन महाराज मंदिर, डॉ. बिंदूजी धाम आश्रम, बेझे येथील महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे रामशक्ती पीठ आश्रम, नीलपर्वत जुना आखाडा दत्त मंदिर आदी ठिकाणी उत्सव पार पडला.विद्यार्थ्यांना वह्या वाटप

स्वामी सागरानंद महाराज आश्रमात गुरूकुल संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, महामंडलेश्वर सोमेश्वरानंद महाराज रामशक्तीपीठ आश्रम यांची प्रमुख उपस्थिती होती. सोबत महंत शंकरानंद महाराज, श्रीनाथ महाराज उपस्थित होते. येथील गंगाद्वार पायथ्याशी असलेल्या अटल आखाड्यातील महंत उदयगीरी महाराज यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीएचआर’विरुध्द आरोपपत्र दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या (बीएचआर) संचालक आणि काही कर्मचाऱ्यांविरोधात सोमवारी जिल्हा कोर्टात दोषारोपत्र दाखल करण्यात आले.

शहरातील गुंतवणुकदारांचे सात कोटी तर राज्यात असंख्य ठेवीदारांचे शेकडो कोटी रुपये या बँकेत अडकून पडले आहेत. पुणे येथील सीआयडीमार्फत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. नाशिक शहर व राज्यातील शेकडो गुंतवणुकदारांचे हजारो कोटी रुपये या पतसंस्थेत अनेक वर्षांपासून अडकून पडल्यामुळे ठेवीदार हवालदील झाले होते. त्यामुळे ठेवीदार संघटनेचे राज्य संघटक श्रीकृष्ण शिरोडे यांनी याप्रकरणी पाठपुरावा सुरू ठेवला. दरम्यान, फिर्याद दाखल झाल्यापासून ९० दिवसाच्या आत सीआयडीने कायदेशीर तरतुदीप्रमाणे आरोपपत्र दाखल केल्याने ठेवीदारांनी ये समाधान व्यक्त केले आहे. पुण्याचे सीआयडी अधिकारी भोईर आणि सहकाऱ्यांनी हे आरोपपत्र दाखल केले. यावेळी ठेवीदार श्रीमती चंदावरकर, सुरेश कुलकर्णी, पंढरीनाथ शिंदे, साहेबराव म्हसे आदींसह असंख्य ठेवीदार उपस्थित होते, असे शिरोडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोमध्ये घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिडकोतील पाटीलनगरमध्ये चोरट्यांनी रोकड आणि दागिने असा सुमारे तीन लाख ८० रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेंद्र सिताराम पगारे (रा. नाईकनगर, पाटील नगर) यांनी फिर्याद दिली. पगारे कुटुंबीय १ ते ९ जुलै दरम्यान बाहेरगावी गेले होते. या काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या टेरेसवरील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममधील कपाट उघडून सोन्याचांदीचे दागिने व रोकड असा तीन लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरी केला.

ऑनलाइनद्वारे चोरी

काळेनगर येथील एका महिलेच्या बँक खात्यातील ३० हजार रुपयांची रोकड भामट्यांनी ऑनलाइन पध्दतीने चोरी केले. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. चोरट्यांनी फोनवरून बँक खात्याची सविस्तर माहिती मिळवून रोकड परस्पर काढून घेतली. अभिनंदन सोहनलाल पंडित (रा. काळेनगर) यांच्या तक्रारीनुसार, पंडित यांच्या पत्नी सुब्बावती यांचे अॅक्सिस बँकेत बचत खाते आहे. चोरट्यांनी बँकेतून बोलत असल्याचे सांगून सर्व माहिती मिळविली. ३० हजार रुपयांची रोकड ऑनलाइन काढून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल पळविला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
घरासमोरील रस्त्यावर मोबाइलवर बोलत व्यक्तीच्या हातातील मोबाइल दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना साईनाथनगर भागात घडली. या प्रकरणी विजय निफाडे (रा. अमृतवर्षा कॉलनी, साईनाथनगर) या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास विजय आपल्या घरासमोरील रस्त्यावर मोबाइलवर बोलत असताना चोरट्यांनी संधी साधली. काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एका आरोपीने विजयच्या हातातील सुमारे दहा हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

अपघातात तरुणाचा मृत्यू

नाशिक : भरधाव वेगातील कारने धडक दिल्याने जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. अपघाताची घटना राजीवनगर वसाहत परिसरात झाली होती. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. बाबासाहेब वामन भदरंगे (३०, रा. राजीवनगर वसाहत, इंदिरानगर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

गर्दुल्यांवर कारवाई

सातपूर : नं‌दिनी नदी परिसर व भाजीपाला मंडईच्या छतावर गोंधळ घालणाऱ्या गर्दुल्यांवर वरिष्ठ पोलिस निरिक्षक अविनाश सोनावणे यांनी सोमवारी धडक कारवाई केली. तसेच मद्य पिऊन वाहने चालविणाऱ्यांनाही पोलिसांनी कारवाईचा दणका दिल्याने टवाळखोरीला चाप बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनवरून युवती बेपत्ता

$
0
0

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर गाडीमध्ये चढताना आपली १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार ज्योती प्रकाश कुलकर्णी (५२, रा. रेल्वे ट्रॅक्शन कॉलनी, एकलहरे) यांनी नाशिकरोड रेल्वे पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांनी मधुकर करोशिया (२८, क्रांतीनगर, मनमाड) याच्यावर संशय व्यक्त केला आहे.

कुलकर्णी या १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचोऱ्याला जाण्यासाठी कन्या वैष्णवी व मुलगा अभिषेक यांच्यासह नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर आल्या. कामयानी एक्स्प्रेसमध्ये चढताना गर्दीमुळे वैष्णवी त्यांना दिसली नाही. परिसरात व नातेवाइकांकडे शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी नाशिकरोड रेल्वे पोलिसांत बेपत्ताची तक्रार दाखल. या प्रकरणी त्यांनी मधुकरवर संशय व्यक्त केला आहे. सहाय्यक निरीक्षक नितीन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. एस. सोनवणे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पार्किंगच्या वादातून हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुचाकी पार्किंगच्या वादातून दोन कुटुंबामध्ये हाणामारी झाली. ही घटना मोठा मातंगवाडा भागात घडली असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित सुभाष लव्हेरा (२३ रा. मोठा मातंगवाडा भद्रकाली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. ८) दुपारी मातंगवाडा व्यायामशाळेजवळ मोपेड दुचाकी पार्क करीत असतांना जोगेंद्र डांगळे, योगेश थावरी, संगिता डांगळे आणि पूजा थावरी (सर्व रा. मातंगवाडा) आदींनी दुचाकी पार्क केल्यावरून शिवीगाळ केली. यावेळी संशयित आरोपींना रोहित समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना योगेशने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे रोहितच्या तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, संगिता आणि पूजा थावरी या महिला सकाळी भावाच्या पार्क केलेल्या चारचाकी वाहनात पर्स शोधत असतांना रोहितने विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यावेळी महिलेचा पती घटनास्थळी पोहचला असता संशयित आरोपी रोहितने त्यांना लाकडी दांडा व फायटरने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. घटनेचा अधिक तपास हवालदार भगरे करीत आहेत.

घरात घुसून महिलेचा विनयभंग

शरणपूररोड परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून संशयित आरोपीने तिचा विनयभंग केला. पीडित महिलेने विरोध केला असता संशयिताने तिला बेदम मारहाण करून पोबारा केला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू वाघमारे (रा. जुने पोलिस आयुक्तालयासमोर, शरणपूर रोड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. वैराज हॉलमागे राहणारी ३० वर्षीय महिला आपल्या घरात एकटी असताना हा प्रकार घडला. महिल एकटीची असल्याची संधी साधत संशयिताने घरात प्रवेश केला. यावेळी त्याने महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न करीत विनयभंग केला. दरम्यान महिलेने विरोध केला असता संशयिताने तिला बेदम मारहाण करीत पोबारा केला. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.

युवतीस बेदम मारहाण

भेटण्यास बोलावून घेत जळगाव जिल्ह्यातील युवतीला बेदम मारहाण करण्याची धक्कादायक घटना सिडकोतील दत्तमंदिर परिसरात घडली. लोखंडी रॉडने मारहाण झाल्याने पीडित युवती जखमी झाली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मेघराज धनराज मोरे (२३, रा. भोरटेक ता. भडगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तरुण आणि युवती एकमेकाच्या परिचयाचे आहे. १७ वर्षीय पीडित युवती सिडकोतील हेडगेवारनगर भागात राहते. संशयित आरोपीने युवतीला रविवारी (दि. ९) सकाळी आठ वाजेच्या सुमारास परिसरातील दत्त मंदिराशेजारी भेटण्यासाठी बोलावले. यावेळी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. शाब्दिक चकमकीचे रुपांतर हाणामारीत झाले. संशयिताने युवतीस शिवीगीळ करीत लोखंडी रॉडने मारहाण केली. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवतीस बेदम मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भेटण्यास बोलावून घेत जळगाव जिल्ह्यातील युवतीला बेदम मारहाण करण्याची धक्कादायक घटना सिडकोतील दत्तमंदिर परिसरात घडली.
लोखंडी रॉडने मारहाण झाल्याने पीडित युवती जखमी झाली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मेघराज धनराज मोरे (२३, रा. भोरटेक ता. भडगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तरुण आणि युवती एकमेकाच्या परिचयाचे आहे. १७ वर्षीय पीडित युवती सिडकोतील हेडगेवारनगर भागात राहते. संशयित आरोपीने युवतीला रविवारी (दि. ९) सकाळी आठ वाजेच्या सुमारास परिसरातील दत्त मंदिराशेजारी भेटण्यासाठी बोलावले. यावेळी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. शाब्दिक चकमकीचे रुपांतर हाणामारीत झाले. संशयिताने युवतीस शिवीगीळ करीत लोखंडी रॉडने मारहाण केली. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशासाठी स्वत:वरील विश्वास महत्त्वाचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्पर्धा परीक्षांना सामोरे जातांना स्वत:वरील विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करतांना त्याचा अभ्यासक्रम तोंडपाठ हवा, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राम खैरनार यांनी केले.

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात यूनिव्हर्सल फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षांना सामोरे कसे जावे याबाबत मार्गदर्शन शिबिर नुकतेच झाले. यावेळी फाउंडेशनचे संचालक प्रा. खैरनार बोलत होते. यावेळी गिरीश कराड, दीपक वडजे, राहुल शिंदे आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा यात मुख्यत: यूपीएससी आणि एमपीएससीची तयारी कशी तयारी करावी याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. स्पर्धा परीक्षा कठीण वाटत असल्या तरी त्याबाबत बाऊ बाळगणे चुकीचे आहे. परीक्षेच्या अभ्यासासाठी लागणाऱ्या पुस्तकांवरही पूर्ण विश्वास टाकायला हवा. संदर्भग्रंथांचा वापर केल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये यश लवकर मिळू शकते, असेही प्रा. खैरनार यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मनामधील न्यूनगंडाची भावना, यश-अपयशाची कारणे, अभ्यासक्रम याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षा देतांना विद्यार्थ्यांनी स्वत: प्रशासकासारखे वागायला हवे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. प्रशासकीय सेवेतील प्रवेश, कामाचा ठसा कसा उमटायचा? प्रशासकाची भूमिका नेमकी काय असते? याबाबत राहुल शिंदे यांनी मार्गदर्शन केले. दीपक वडजे यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशामध्ये गरज नव्या कृषिक्रांतीची

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष व आक्रोश आहे. देशात नव्या कृषीक्रांतीची गरज असून, त्यासाठी देशी गावरान बियाणे, सेंद्रिय खते, अल्प प्रमाणात यंत्र व मानवी पशू श्रमावर आधारित अहिंसक शेती हेच अंतिम उत्तर असल्याचे अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शेतीसोबतच पशूपालन, जोडधंदे व बारा बलुतेदारांचे पुनर्जीवन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या किसान मुक्ती यात्रेनिमित्त देसरडा नाशिकला आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दिल्लीत पोहोचल्यानंतर १८ जुलै रोजी जंतरमंतरवर देशभरातील शेतकरी एकत्र आल्यानंतर नव्या कृषीक्रांतीची सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांवर केवळ बँकेचेच नव्हे, तर त्यांच्यावर खासगी सावकार व खते, कीटकनाशके व इतर दुकानदारांचे कर्ज असते. त्यातून त्यांची पिळवणूक होत, असेही त्यांनी सांगितले.

सरकार बदलले तरी धोरणे सारखीच!

भाजप व काँग्रेस सरकारची धोरणे सारखीच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. देशात आता कधी भाजपप्रणित तर काँग्रेस प्रणित सरकार असणार असल्याने या धोरणांत बदल होणार नाही. भांडवली शेतीपेक्षा सहकारातून शेतीचा मार्ग सर्वांसाठी उपयोगी होता पण तसे होत नाही, असेही देसरडा यांनी सांगितले.

सांगा आमचा काय दोष?

शरद शेजवळ यांनी सभास्थळी शेतकऱ्यांची विव‌िध गिते सादर केली. कवी संदीप जगताप यांच्या कवितेने एल्गार सभेला सुरुवात झाली. समृध्दी हटाव, ही समृध्दी नव्हे बरबादी, सरकारला किती शेतकऱ्यांचे बळी हवे अशा घोषणा असणाऱ्या टोप्या शेतकऱ्यांनी परिधान केल्या होत्या. देशभर प्रवास करणारी किसान यात्रा सभास्थळी पोहचली. एका हातात अस्थिकलश आणि दुसऱ्या हातात राष्ट्रध्वज घेतलेला शेतकरी सर्वांचेच लक्ष वेधत होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांनी या एल्गार सभेला उपस्थ‌िती लावली. आमच्या बापाने आत्महत्या केली आमचा काय दोष, शेतकऱ्यांनो मुलाबाळांना आमच्यासारखे उघड्यावर टाकू नका, असे संदेश मनाला चटका लावित होते.

देसरडांचे बोल..
- शेतकरी आंदोलनाला दिशा हवी.
- आंदोलनातून काहीतरी निष्पन्न होणे गरजेचे आहे.
- आंदोलनाला दिशा नसेल तर त्याची दशा होईल.
- देशाने अण्णा हजारेंचे आंदोलन बघितले. पण त्यानंतर त्याचे काय झाले?
- स्वामीनाथन आयोग लागू करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरनाम्यात घोषणा केली.
- लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातही हा आयोग लागू करण्याचे सूतोवाच केले.
- सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देताना सरकारने मात्र उलट भूमिका घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेसाठी सरसावले पोस्टाचे कर्मचारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

रोजची दहा तासांची सायकलवरची कठीण ड्युटी सांभाळून नाशिकरोड परिसरातील १८ पोस्टमन, तसेच पोस्टाचे अन्य ५२ अधिकारी, कर्मचारी स्वतःचा एक तास देत स्वच्छता पंधरवड्यात सहभागी झाले असून, श्रमदानाद्वारे ते परिसराची स्वच्छता करीत आहेत.

राज्यात १ ते १५ जुलैदरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्यात नाशिकरोडचे पोस्टमास्तर सुधाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली १८ पोस्टमनसह ७० कमर्चारी एक तास लवकर येऊन परिसरात स्वच्छता करीत आहेत. त्यात ४० महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महापालिकेचीही मदत त्यांना होत आहे. उपपोस्टमास्तर के. एम. सरडे, सुपरवायझर एस. जी. सामंत, एस. एस. मुळे, एस. व्ही. चव्हाण, एम. पी. आंबेकर, जे. एस. मोरे, जी. एन. कोतेकर, अरुण नाठे, एस. जी. सपकाळे, एन. एम. कदम, उज्ज्वला सुडके, ए. एस. वानखेडे, ए. टी. चव्हाण, शिवाजी शिंदे, एन. एस. शिरोळे आदी कर्मचारी, तसेच पोस्टमन पी. बी. क्षीरसागर, पी. पी. मोरे, आर. एन. परदेशी, वाजे, बी. के. शिंदे, आर. एम. चौधरी, बी. एस. घनकर, ई. डी. राऊतमाळे, वाय. डी. गांगुर्डे आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.

मनुष्यबळ अजूनही तोकडे

पोस्ट खात्यात ३० वर्षांपूर्वी जे मनुष्यबळ होते तेवढचे आताही आहे. देशभरात हेच चित्र आहे. लोकसंख्या मात्र अनेक पटींनी वाढली आहे. पूर्वी टपाल शिल्लक ठेवले जात नव्हते. अधिकारी रोज टपालाची तपासणी करायचे. आता कमी मनुष्यबळामुळे ढीग साचलेला पाहूनही जाब विचारता येत नाही. नाशिकरोडला २० पोस्टमन आहेत. त्यातील बदली व निवृत्तीमुळे आठ कमी झाले असून, १२ राहिले आहेत. सहा जण रोजंदारीवर घेण्यात आले आहेत. त्यांना दिवसाला २८९ रुपये रोज मिळतो. टपालाचे प्रमाण जास्त असल्याने हे लोक दोन-तीन दिवसही टिकत नाहीत. महत्त्वाचे टपाल शक्यतो पोस्टमनकडेच दिले जाते.


ताण सांभाळून स्वच्छता

पोस्टमनना सरासरी दररोज वीस किलो टपाल वाटपास दिले जाते. एकावेळी ते नेणे शक्य होत नाही म्हणून दोन ट्रीप कराव्या लागतात. सध्या पाक्षिके, वृत्तपत्रे, अहवाल यांची संख्या वाढली आहे. एका अंकाला साधारण २५ पैसे चार्जेस पोस्ट आकारते. एका कंपनीचा अहवाल सातशे ग्रॅमचा आहे. आनलाइन पर्चेसिंगमुळे अवजड पार्सल वाढले आहेत. वृत्तपत्रे, पाक्षिके, पुस्तके, हे सेकंड मेल, तर पत्रे, पोस्टकार्ड हे फर्स्ट क्लास मेल आहेत. फर्स्ट क्लास मेलची संख्या कमी झाली आहे. पोस्टमनना रोज दहा तास काम करावे लागते. सकाळी नऊला आल्यानंतर सायंकाळी सातला सुटका होते. मात्र, कामाच्या ताणातूनही त्यांनी स्वच्छतेसाठी वेळ दिल्याने परिसरात तो कौतुकाचा विषय ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीसाठी शिवसेनेचा जिल्हा बँकेसमोर ढोलनाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमुक्ती फसवी असल्याचा आरोप करीत शिवसेनेतर्फे सोमवारी संपूर्ण कर्जमुक्तीसाठी ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जमुक्त शेतकऱ्यांचा तसेच कर्जमुक्तीपासून वंचित राहणारे शेतकरी यांची आकडेवारी बँकेकडे मागितली. परंतु, कार्यकारी संचालकांनी सध्या ही आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगून वेळ मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्याच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्या.सरसकट कर्जमाफीवर शिवसेना ठाम असून, या कर्जमाफीसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. सरकारने कर्जमाफीसंदर्भात जाहीर केलेली आकडेवारी फसवी आहे. त्यामुळे शिवसेनेने सर्व जिल्हा बँकांसमोर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ढोल वाजवून आंदोलन केले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेसमोर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हे आंदोलन केले. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे, आमदार योगेश घोलप, आमदार राजाभाऊ वाजे, राजू आण्णा लवटे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते आदी यावेळी सहभागी झाले होते.

जिल्हाभरात नाद!
मालेगावमध्ये शहर व तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेच्या मार्केट यार्ड शाखेसमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. येवल्यात मनमाड रोडवरील बँकेच्या मार्केट यार्ड विभागीय कार्यालयासमोर अर्धा तास जोरदार ढोल वाजवत सर्वांचेच लक्ष वेधले. कळवणमध्येही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर ढोल वाजवून सरकारचा निषेध करण्यात आला. शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आपलेच दात अन् आपलेच ओठ!

जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे आणि उपाध्यक्ष सुहास कांदे हे शिवसेनेचेच आहेत. त्यामुळे शिवसेनेला आपल्याच पक्षाची सत्ता असलेल्या बँकेसमोर आंदोलन करावे लागले. कांदे आंदोलनात सहभागी झाले असले तरी दराडेंनी मात्र आंदोलनापासून अंतर राखले. जिल्हा बँकेला आर्थिक डबघाईत जाण्यात अध्यक्ष जबाबदार असल्याचे बोलले जाते. नोकरभरती, तिजोरी व इतर सामुग्रीची खरेदी यामुळे त्यांच्यासह संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अगोदरच शिवसेनेची अडचण झाली असतानाही शिवसेने वरिष्ठांचा आदेश पाळला. स्वपक्षाचे अध्यक्ष असलेल्या बँकेसमोर ढोल वाजवून शेतकऱ्यांचे कर्तव्य पार पाडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोर्चा काढून संपाची नोटीस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या मानधनवाढीचा निर्णय व्हावा या व इतर मागण्यांसाठी येत्या ११ सप्टेंबर रोजी राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी संपावर जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी तीन महिन्यांपासून थकीत मानधनाची मागणी करण्यात आली. हे मानधन तीन दिवसांत देण्याचे आश्वासन बालकल्याण विभागातर्फे देण्यात आले.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेत राज्यात सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी काम करीत आहेत. राज्यात अंगणवाडी सेविकांना महिन्याला पाच हजार, मदतनिसाला २५०० रुपये मानधन दिले जाते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरवर्षी काय मानधनवाढ देता येईल, याचा विचार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रधान सचिव, महिला व बालविकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच संबंध‌ित विभागाचे अधिकारी व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली मानधनवाढ समिती स्थापन केली होती. सेवाज्येष्ठता व शिक्षणाधारित मानधनवाढीसंबंधी शिफारस समितीचा अहवाल शासनास सादर करण्यात आला. हा अहवाल त्वरीत मंजूर करावा या मागणीसाठी हा संप करण्यात येणार आहे. त्याची नोटीस सोमवारी हुतात्मा स्मारक ते जिल्हा परिषदेपर्यंत मोर्चा काढून त्यानंतर देण्यात आली. यावेळी केंद्राच्या ३ ते ६ वयोगटातील लाभार्थ्यांच्या आहाराच्या रकमेत वाढ करावी व एप्रिल ते जून असे सलग तीन महिन्यांचे मानधन त्वरित द्यावे अशी मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाप्पा यंदा इको फ्रेंडली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरातील आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक तथा इको फ्रेंडली साजरा करण्याचा निर्धार केला आहे. शहरात गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा होण्यासाठी विविध मंडळांना आवाहन करण्यात आले असून, सर्व मंडळांनी त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रंजना भानसी यांनी केले. विविध मंडळांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी महापालिका प्रत्येक विभागात पाच ते सहा अमोनियम बायोकार्बोनेटची कुंडे तयार करणार आहे. सोबतच गणेश मंडळांना लवकर परवानग्या मिळाव्यात यासाठी प्रत्येक विभागात एक खिडकी सुरू केली जाणार आहे.

महापालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव २०१७ पर्यावरणपूरक साजरा होण्याकामी नाशिक शहरातील गणेश मंडळे, सामाजिक संस्था, कंपनी, कॉलेजेस आदींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महापौर रंजना भानसी, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेता दिनकर पाटील, गटनेता संभाजी मोरुस्कर, प्रभाग समिती सभापती डॉ. हेमलता पाटील, माधुरी बोलकर, प्रियांका माने, वैद्यकीय अधिकारी, डॉ. सुनील बुकाणे यांच्यासह मोठ्या संख्येने गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बुकाणे यांनी शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत, विर्सजनप्रसंगी अमोनियम बायोकार्बोनेट पावडरचा वापर करण्याबाबत व एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्याबाबतची माहिती विशद केली. यावेळी अनेक मंडळांकडूनही महापालिकेला सूचना करण्यात आल्या. त्यात गणेश मंडळ परवानगीबाबत एक खिडकी विभाग सुरू करून प्रत्येक मंडळालाना दोन डस्ट बीन पुरविणे व कृत्रिम तलाव तयार करणे याबाबत सूचना करण्यात आल्या. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकामी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन विविध मंडळांच्या प्रतिनिधींनी यावेळी दिले.

--

महापालिकेच्या प्रमुख सूचना

-शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा करावा वापर.

-ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी वापरावीत पारंपरिक वाद्ये.

-डेकोरेशन साहित्य असावे पर्यावरणपूरक.

-जास्त मंडळांनी मिळून एक गणपती करावा स्थापन.

-मंडळांनी टाळावा प्लास्टिकचा वापर.

-मूर्ती व निर्माल्य करावे दान.

-मंडळाचा परिसर ठेवावा स्वच्छ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रॉ पद्धतीने प्रवेशास पालकांचा विरोध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीतील प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या आदिवासी विभागाने सोमवारी अचानक ड्रॉ पद्धतीने प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. परंतु, या निर्णयामुळे संतप्त झालेल्या पालकांनी निवडीवर बहिष्कार घालत प्रचंड गोंधळ घातला. आदिवासी आयुक्तांना जाब विचारण्यासाठी पालकांनी थेट आदिवासी आयुक्तालयातच ठिय्या आंदोलन करीत सर्वांना प्रवेश देण्याची मागणी केली. प्रशासनाने यासंदर्भात विचार करू, असे आश्वासन देत वेळ मारून नेली.

आदिवासी विभागाच्या निवासी इंग्रजी शाळांमध्ये पहिलीसाठी प्रवेश देण्यासाठी आदिवासी विभागाने अर्ज मागवले होते. या प्रवेशासाठी जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर, पेठ, हरसूल, दिंडोरी, नाशिक आणि इगतपुरी तालुक्‍यातील अर्ज केलेल्या सर्व पालकांना पेठ रोडवरील शासकीय आदिवासी वसतिगृहाच्या परिसरातील शाळेत प्रवेशासाठी बोलविण्यात आले होते. मात्र, जागा दोनशे आणि अर्ज पाचशे आल्याने विभागाने ऐनवेळी पालकांची ‘ड्रॉ’ पद्धतीने निवड केली जाणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे संतप्त पालकांनी निवडीवर बहिष्कार घालत गोंधळ घातला. सर्वांना प्रवेश देण्याची मागणी केली. मात्र, प्रकल्प अधिकारी ड्रॉ पद्धतीने प्रवेश देण्यावर ठाम असल्याने पालक आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. प्रकल्प अधिकारी अनिल एडके यांनी थेट पोलिस कारवाईची मागणी केल्याने संतप्त पालकांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना न जुमानता आदिवासी आयुक्तांना जाब विचारण्यासाठी आदिवासी आयुक्तालयात ठिय्या आंदोलन करीत घोषणाबाजी केली. त्यामुळे आयुक्तालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पालक सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर ठाम असून प्रशासनाने विचार कऱण्याचे आश्वासन दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव सिव्हिलचे ‘ऑपरेशन’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून रुग्णांना योग्य त्या आरोग्य सुविध पुरविल्या जात नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत असतात. रुग्णालय प्रशासनाने याबाबत वेळीच उपाययोजना कराव्यात अन्यथा सामान्य जनतेचा उद्रेकाला येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागेल अशा शब्दात ग्रामविकास राज्य मंत्री दादा भुसे यांनी येथील सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना खडेबोल सुनावले.

रुग्णकल्याण समिती अंतर्गत नियामक समिती व कार्यकारी समितीची बैठक भुसे यांच्या उपस्थितीत सामान्य रुग्णालयात पार पडली. त्यावेळी रुग्णालयातील भोंगळ कारभाराचा समाचार घेत भुसे यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रांताधिकारी अजय मोरे, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे, पोलिस उपधीक्षक गजानन राजमाने उपस्थित होते.

बैठकीस भुसे यांनी अनेकांना सुनावले. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे दोन महिलांना आपले प्राण गावामावे लागले आहेत. त्यामुळे नियुक्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी रुग्णसेवा प्रामाणिकपणे करावी, अशा सूचना केल्या. रुग्णालयात ३०० मंजूर पदांपैकी केवळ १५६ पदे भरली असून, तब्बल १४४ पदे आजही रिक्त आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी त्वरित पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टरांना तात्पुरत्या स्वरूपात बोलावून घ्यावे, असे डॉक्टर न आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी प्रवेशाचा कट ऑफ अधांतरीच!

$
0
0

. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकरावी प्रवेशाबाबत दरवर्षी उडणारा गोंधळ मिटविण्यासाठी यंदापासून नाशिकमध्ये सुरू करण्यात आलेली ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया तांत्रिक अडसरामुळे चांगलीच गोंधळात सापडली. रात्री उशिरापर्यंत ही यादी जाहीर करण्यात शिक्षण विभाग सपशेल अपयशी ठरला.

सोमवारी सायंकाळी पाच वाजता अकरावी प्रवेशासाठी नाशिक हद्दीतील कॉलेजांची पहिली मेरिट लिस्ट जाहीर होणार होती. मात्र, अकरावी प्रवेशाच्या वेबसाईटकडे डोळे लावून बसलेल्या नाशिककरांची निराशा झाली. रात्री उशिरापर्यंत ही यादी प्रसिध्दच न झाल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी या प्रकारामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली. अकरावी प्रवेश प्रक्रिया आता मध्यावर आली आहे. यापूर्वीच्या टप्प्यांमध्ये इन हाऊस कोट्यातील प्रवेशाच्या मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आल्या होत्या.

नियोजित वेळापत्रकानुसार सोमवारी सायंकाळी पाच वाजता अकरावी प्रवेशाची मेरीट लिस्ट जाहीर होणे अपेक्षित होते. यानुसार विद्यार्थ्यांनी पाच वाजेपासून nashik.11thadmission.net या वेबसाईटवर सातत्याने लॉग इन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या पदरी रात्री नऊ वाजेपर्यंत निराशाच पडली. याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे ‘मटा’ने विचारणा केली असता तांत्रिक अडसरांमुळे यादी अपलोड झालेली नसून, रात्री ९ वाजेनंतर यादी प्रसिध्द होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली.

एसएमएसव्दारे मा‌हिती

यादी प्रसिध्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर मेरिट लिस्टचा आवश्यक तो तपशील पाठविण्यात येणार असून, कॉलेजेसमध्ये नोटीस बोर्डवर यादी प्रसिध्द होणार नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरातत्त्व विभाग होणार समाजाभिमुख

$
0
0

राज्य पुरातत्त्व विभागाला आतापर्यंत पुरातत्त्व शाखेतील संचालक न मिळाल्याने पुरातत्त्व विभागाची अवस्था बिकट झाली होती. पुरातत्त्व विभाग सक्षम व समाजाभिमुख झाला तरच अधिकाधिक वारसास्थळांना पुनरुज्जीवन व गावागावात संवर्धनाबाबत जनजागृती करता येईल, असा विश्वास राज्य पुरातत्त्व विभागाचे नवनिर्वाचित संचालक तेजस गर्गे यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केला.

- पुरातत्त्व विभागाची नेमकी भूमिका काय?

-राज्य पुरातत्‍व विभागाचे प्रमुख कार्य म्हणजे पुरातत्‍वीय स्‍थळांचे आणि अवशेषांचे संवर्धन करणे हे आहे. मात्र अनेकदा हा विभाग अनेक बाबतीत दुर्लक्षित राहिला. या विभागाला आपल्या क्षमतेने काम करता आले नाही. अपुरे कर्मचारीबळ, अपुरा निधी तसेच या विभागाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक नसल्याने एकीकडे अपेक्षांचे ओझे तर दुसरीकडे समस्यांचा डोंगर अशी विभागाची अवस्था आतापर्यंत झालेली दिसते. सध्या विभागाकडे राज्यातील ४०० वारसास्थळे आहेत. यातील १०२ वारसास्थळेच संरक्षित आहेत. इतर २९८ वारसास्थळांच्या फायनल नोटिफिकेशन्सच आतापर्यंत काढलेल्या नाहीत. त्या तातडीने काढून २९८ वारसास्थळे संरक्षित करण्याच्यादृष्टीने वेग दिला जाणार आहे.

-निधीबाबत हा विभाग दुर्लक्षित का?

-पुरातत्त्व विभाग अडथळ्यांची शर्यत पार करीत आपले काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. विभागाला सरकारकडून निधीचे पाठबळ मिळाले तर विभागाकडून अपेक्षित काम वेगाने होऊ शकेल. सध्या विभागाला वर्षाला फक्त २५ कोटींचा निधी मिळतो. ४०० वारसास्थळांसाठी हा निधी अपुरा आहे. त्यामुळे निधी विभागला जातो अन् विभागाकडून सुरू असलेले प्रयत्न पूर्ण क्षमतेने होत नसल्याचे दिसते. अधिकाधिक निधी मिळावा व वारसास्थळांबाबत समाजात जनजागृती करून त्यांचा वारसास्थळांच्या संवर्धनात हातभार कसा लागेल यावर उपाययोजना व नियोजन सुरू आहे. लवकरच यावर ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणी होताना दिसेल.

-अनेक वारसास्थळांची कामे अर्धवट का?

-निधीची कमतरता व कर्मचारी पुरेशे नसणे यामुळे अनेक वारसास्थळांची कामे अर्धवट असल्याचे बोलले जाते. मात्र, एखाद्या वारसास्थळाच्या संवर्धनाचे काम सुरू झाल्यावर ते अनेक वर्षे सुरू असते. त्यात निधी विखुरला जात असल्याने निधी मिळेल त्याप्रमाणे काम केले जाते. ४०० वारसास्थळांबरोबर राज्य पुरातत्त्व विभागाने पहिल्या टप्प्यात १४ किल्ले घेतले. आता किल्ल्यांची संख्या ४० झाली आहे. त्यामुळे आता याच वारशांवर लक्ष केंद्रित करून काही वर्षात येथील काम पूर्ण करण्याचा निर्धार आहे. राजगडावर लक्ष केंद्रीत करण्यासाठीही प्रस्ताव देण्यात आला आहे. त्याला निधीचे बळ मिळाले तर यावरही लवकरच ठोस काम होताना दिसेल. वस्तूसंग्रहालये व वारसास्थळांचा नियमित मेंटनन्‍स कायम होत रहावा, याबाबतही चर्चा व नियोजन सुरू आहे. यासाठी पाच कोटींच्या निधीची गरज आहे. तसेच इतर सर्व विभागांशी समन्वय कसा वाढेल, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. इतर विभागांनीही वारसास्थळांवर काम करताना पुरातत्त्व विभागाला घेऊनही काम हाती घ्यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

-सर्वच वारसास्थळांना आधार मिळेल का?

-हा गंभीर प्रश्न आहे. पण सध्या पुरातत्त्व विभागाला सक्षम करणे, येथे काम करणाऱ्यांना उमेद देऊन त्यांच्याकडून हा प्रश्न कसा सोडवायचा यावर भर दिला जात आहे. सध्या हातात असलेली वारसास्थळांचे संवर्धन करून त्यांच्या नियमित मेंटनन्‍ससाठी व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे. मात्र, असे करताना इतरही अनेक वारसास्थळे गावोगावात पहायला मिळतात. यांनाही पुरातत्त्व विभागाच्या कक्षेत आणण्यासाठी पुरातत्त्व विभागाने समाजभिमुख होण्यासाठी काही ठोस उपाययोजन करण्याचे ठरविले आहे. याबाबतही वरिष्ठांची चर्चा सुरू आहे. महापालिकेंतर्गत हेरिटेज कमिटी जसे शहरातील वारसास्थळांना हेरिटेजचा दर्जा देऊन त्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेते तसेच ग्रामपंचायत पातळीवरही हेरिटेज कमिटीच्या माध्यमातून वारसास्थळे संरक्षित करता येतील का, यावर विचार सुरू आहे. तसेच झाल्यास विभागाच्या अडचणींचा अडथळा वारसास्थळांना सोसावा लागणार नाही आणि ही वारसास्थळे संरक्षितही करता येतील.

-पुरातत्त्व विभाग कधीपासून कार्यरत दिसेल?

-अशी अपेक्षा लगेच करणे बरोबर नाही. मात्र, पुरातत्त्व विभागाने त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. राज्यातील वारसास्थळांचा डेटा, संग्रहालयांचा डेटा संकल‌ित करण्याचे काम पूर्ण झाले आहे. संचालनालयाची वेगळी वेबसाइट नाही. तिचे काम लवकरच सुरू होईल. तसेच ई-गर्व्हनन्सच्या दिशेने वाटचाल सुरू करायची आहे. पुरातत्त्व विभाग राज्याच्या विकासासाठी किती महत्त्वाचे आहे हे दाखवून देण्याचे काम सर्वात आधी हाती घेतले असून, झाले तर निधी विभागासाठी आणता येईल. विभाग अनेकदा समाजापासून लांब असलेला दिसतो. विभाग नेमक काय करतो याचा वृत्तांत दरवर्षी नागरिकांच्या हाती जावा यासाठी ‘पुरावृत्त’ हा वार्षिक अंक प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. हे पुढील वर्षांपासून सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यातून विभागाचे काम दाखविणे शक्य होईल.

-राज्य पुरातत्त्वचा वेगळा ठसा कसा उमटेल?

-खरे तर हाती असलेले वारसास्थळांची कामे पूर्ण करून नवीन वारसास्थळांच्या दिशेने विभागाने काम सुरू करणे हाच विभागाच्या कामाचे मुख्य उद्दिष्ट आहे. मात्र याचबरोबर पुरातत्त्व विभागाने उत्खननाच्या माध्यमातून इतिहासाच्या खोलीत जाणे अपेक्षित आहे. यासाठी वेगळ काही करण्याचा विचारही आहे. विदर्भात नगरधनच्या उत्खननाचा रिपोर्ट प्रसिद्ध करणार आहोत. औरंगाबादमधील शिवडा नदीकाठी चालुक्य साईट सापडल्याने दोन हजार वर्षांपूर्वी या परिसरात एक संस्कृती होती हे निश्चित होण्याची शक्यता आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील पाटण येथे प्रागैतिहासिक साईट समोर आली आहे. यासाठी उत्खनन करण्याचे नियोजन असून, पुरातत्त्व शाखेशी संबंधित विद्यापीठांना यात सहभागी करून घेतले जाणार आहे. याचा फायदा या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल. हा अनुभव राज्य पुरातत्त्व विभागासाठी वेगळेपण ठरेल.

(शब्दांकन : रमेश पडवळ)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images