Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अधिकारी रस्त्यावर, ठेकेदार गायब

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नालेसफाईअभावी पहिल्याच पावसात शहराच्या उडालेली दैनेकडे प्रशासनाने व सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी पुन्हा नाशिककरांना त्याच परिस्थितीचा सामना करावा लागला. पहिल्या पावसात केवळ काही भागापुरते मर्यादीत असलेले संकट शुक्रवारी संपूर्ण शहरभर दिसले. पावसामुळे सर्व रस्ते जलमय होऊन जागोजागी तलाव तयार झाले होते. भुयारी गटार आणि नालेही तुंबल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. परंतु, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यासह सर्व अधिकारी शुक्रवारी रस्त्यावर होते, तर दुसरीकडे नालेसफाईचा ठेका दिलेले ठेकेदार गायब असल्याचे चित्र होते.

शहरात नालेसफाईचा घोळ सुरू असतानाच, शुक्रवारी पुन्हा पावसाने झोडपून काढले. रात्रीपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे गंगापूर धरणातून विसर्ग न होताही गोदावरी दुधडी भरून वाह‌िली. शहरातील पाणी भुयारी गटारीऐवजी थेट नदीतच मिसळल्याने नदीला पूर आला होता. दिवसभर चालणाऱ्या पावसामुळे पाणी गटार-नाल्यांऐवजी रस्त्यानेच नदीला मिळत असल्याचे चित्र होते. सर्व नाले व गटारीही तुंबल्याने रस्तेच प्रवाहीत झाले होते. या पावासमुळे रस्त्याची धूळधाण उडाली असून शहराचा तलाव झाला होता. या बिकट परिस्थितीत नालेसफाईचे काम दिलेले ३१ ठेकेदार मात्र गायब होते. आयुक्त अभिषेक कृष्णा आणि सहा विभागीय अधिकाऱ्यांनी दिवसभर शहरात फिरून पावसाचा आढावा घेतला. तसेच शक्य त्या ठिकाणी पालिकेची यंत्रणा लावून रस्ते, नाले मोकळे केलेत. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. परंतु, ज्या ठेकेदारांना नालेसफाईचे काम दिले होते, ते ठेकेदार मात्र रस्त्यावर काम करतांना कुठेही दिसले नाही.


महापौरांचे सोपस्कार

शहरातील पावसाचा अंदाज घेतल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी सकाळी पालिकेत तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सतर्कतेच्या व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. तसेच आपत्कालीन कक्ष सज्ज करण्याचे आदेश दिले. परंतु, एवढीच तत्परता ही नालेसफाईच्या चौकशीत दाखवली असती तर आज नागरिकांना काह‌िसा दिलासा मिळाला असता.


नालेसफाईच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने शहराची आज ही अवस्था झाली आहे. सत्ताधाऱ्यांनी आपसात भांडत बसण्यापेक्षा नागरिकांना त्रास होईल असा कारभार करू नये. या परिस्थितीवर लवकर तोडगा काढला नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल.

- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदा खळाळली...

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर व जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, गोदावरी नदी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच खळाळली आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून दारणा, नांदूरमध्यमेश्वर धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. घोटी- सिन्नर रस्त्यावरील देवळे पुलावरून पाणी वाहू लागल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, तर सुरगाणा तालुक्यात बुडळी येथील पाझर तलाव फुटल्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. रात्रीतून पावसाचा जोर वाढल्यास गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग करावा लागण्याची शक्यता असून, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात ४४८.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जुलैचा पहिला पंधरवडा कोरडा जातो की काय, अशी शक्यता असताना जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. त्यामुळे दुबार पेरणीच्या संकटापासून बळीराजाची मुक्तता होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशावर असलेला कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशकडे सरकला असून, पश्चिम राजस्थान ते पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे गुजरातसह महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस सक्रिय झाला असून, दोन दिवस मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांत पावसाचा चांगला जोर आहे. पाण्याअभावी संकटात सापडलेल्या खरीप व भाजीपाला पिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

धरणातून पाण्याचा विसर्ग

दारणा, नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज दुपारी एकपर्यंत दारणा धरणातून ५१०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. दुपारी चारनंतर १२ हजार ७५१ क्युसेकने विसर्ग करण्यात आला. नांदूरमध्यमेश्वर धरणातून सर्वाधिक ५० हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. दुपारी पावसाचा जोर ओसरताच विसर्ग कमी करण्यात आला. गंगापूर धरणात पाण्याची पातळी वाढत असून शनिवारी येथून विसर्ग करावा लागेल, अशी शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने तेथील पाण्याचा प्रवाह गोदावरीस येऊन मिळत आहे. त्यामुळे दिवसभरात सुमारे २० हजार क्युसेक इतके पाणी गोदावरीत येऊन मिळाले. त्यामुळे पुरसदृश स्थ‌िती निर्माण झाली.

पुलाला भगदाड; पाझरतलाव गेला वाहून

घोटी-सिन्नर मार्गावर देवळे गावाजवळील दारणा नदीवरील पुलाला भगदाड पडले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना तातडीने पुलाचे काम करण्याबाबत सूचना केल्या. सुरगाण्यात बुडळी येथील पाझर तलाव फुटल्याने पाणी परिसरातील शेतीत शिरून नुकसान झाले. सायखेड्यात पुलाला पाणवेलींचा विळखा पडल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडला. स्थानिक प्रशासनाने तातडीने या पाणवेली हटविण्याचे काम हाती घेतले.

तीन तालुके कोरडेच

जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात पावसाचा जोर असताना मालेगावसह तीन तालुके कोरडेच राहिले, तर कळवणसह तीन तालुक्यांत अत्यल्प पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील एकूण सहा तालुक्यांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. शुक्रवारी दिवसभरात बागलाण, मालेगाव, नांदगाव तालुके कोरडेच राहिले, तर देवळ्यात ३.२, चांदवडमध्ये १.२ आणि येवल्यात १ मिलिमीटर पाऊस झाला.

तालुकानिहाय शुक्रवारी झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

पेठ ९६.२, इगतपुरी ८१, त्र्यंबकेश्वर ७८, सिन्नर ५४, सुरगाणा ४९, नाशिक ३३, निफाड २०, कळवण १०, देवळा ३.२, चांदवड १.२, येवला ०१, नांदगाव ००, मालेगाव ००, बागलाण ००.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर सिक्युरिटीविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त तरूण वर्गासाठी विस्डम एक्स्ट्रातर्फे सायबर सिक्युरिटी या विषयावर मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आजच्या इंटरनेटच्या युगात आपली माहिती गोपनीय व सुरक्षित करण्याची गरज बघता सर्व पदवीधरांसाठी व उच्च पदवीधरांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेत सायबर आयटी सिक्युरिटीचे अमर ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या सायबर सिक्युरिटीबाबत सर्व शंकांचे निरासन केले. विस्डम एक्स्ट्रातर्फे आयोजित कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा कौशल्य विकासचे सहाय्यक संचालक संपत चाटे उपस्थित होते. तसेच शंकर जाधव, महाराष्ट्र उद्योजकता विकासचे अलोक मिश्रा, नाशिक पोलिसच्या दीपाली नेटके आदी यावेळी उपस्थित होत्या. निवेदिता करकडे यांनी आभार मानले. तसेच कार्यक्रमाचे आयोजनात विस्डम एक्स्ट्रातर्फे योगेश बोरसे व यश कडवे यांचा सहभाग होता. विस्डम एक्स्ट्रा प्रा. लि.च्या संचालिका दीपाली चांडक यांनी या कार्यशाळेकरिता १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालिदासच्या विलयाने बांधली मोट

0
0

नाशिक ः मरणात खरोखर जग जगते, अशी जुनी उक्ती आहे, ती खरी ठरली आहे महाकवी कालिदास कलामंदिराच्या जीर्णोद्धारामुळे. कालिदास कलामंदिर आता वर्षभर बंद राहणार ही भावना अनावर होऊन वेगवेगळ्या रंगकर्मींच्यावतीने ‘का‌लिदास’ला मानवंदना दिली जात आहे. वैयक्तिक हेव्यादाव्यांनी आणि गटातटाच्या राजकारणाचा शिक्का बसून नेहमीच चर्चेत राहत असलेले ३५ दिग्गज रंगकर्मी एका नाटकाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. कालिदासला मानाचा मुजरा करण्यासाठी का होईना, या कलावंतांची एकत्र मोट बांधण्याला यश आले आहे.

महाकवी कालिदास कलामंदिर १६ जुलैपासून बंद राहणार असल्याने कलामंदिराला मानाचा मुजरा करण्यासाठी नाशिककर कलावंत विविध नाटकांचे प्रयोग करीत आहेत. याच श्रृंखलेचा एक भाग म्हणून सुरभी थिएटर्सतर्फे ‘तीन पैशांचा तमाशा’ या सुप्रसिध्द नाटकाचा प्रयोग होणार आहे. विनोदाचे बादशहा पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीतून ज‌िवंत झालेले हे नाटक आहे.

शनिवार, १५ जुलै रात्री ९ वाजता कालिदास कलामंदिर येथे हे दोन अंकी नाटक होणार आहे. या नाटकाचे विशेष म्हणजे ३५ ज्येष्ठ व प्रथितयश कलाकार प्रथमच यात एकत्र येत आहेत. आपआपसातील भेद, तंटे बाजूला ठेवून कालिदास कलामंदिराच्या पुनरूज्जीवनाआधी त्याला मानाची वंदना देण्यासाठी कलाकार एकत्र येत असल्याने नाट्यवर्तुळात या नाटकाबाबत प्रचंड कुतुहल आहे.

या नाटकातून पैसा कमविणे हा उद्देश नसून सर्व रसिकांसाठी हे नाटक विनामूल्य ठेवण्यात आले आहे. नाटकाला कोणतेही ति‌कीट नाही. सर्व खर्च निर्माता व दिग्दर्शक राजेश शर्मा हेच उचलत असून नटेश्वराला नाशिककरांची श्रध्दा अर्पण करण्यासाठी या नाटकाची योजना असल्याचे मत शर्मा यांनी व्यक्त केले. या नाटकात केवळ संवाद नाहीत तर वाद्यवृंद आहेत, गाणे आहे. भरपूर तालीम केल्यानंतर हे नाटक प्रेक्षकांसमोर येत आहे.

हे कलावंत येणार एकत्र

नाटकाची निर्मिती व दिग्दर्शन राजेश शर्मा यांचे आहे. संगीत संयोजन राजन अग्रवाल, अजय गायकवाड तर नेपथ्य सुनील परमार यांचे आहे. प्रकाशयोजना विनोद राठोड यांची तर रंगभूषा माणिक कानडे यांची आहे. वेशभूषा प्रिया तुळजापूरकर यांची आहे. या नाटकात प्रशांत हिरे, सचिन शिंदे, श्रीपाद कोतवाल, विजय शिंगणे, योगेश वाघ, राजेश आहेर, डी. डी. पवार, शिवा देशमुख, किरण कुलकर्णी, सतीश वराडे, आनंद गांगुर्डे, राहुल काकड, राहुल सूर्यवंशी, महेश बेलदार, शुभम लांडगे, जयप्रकाश पुरोहित, राजू क्षीरसागर, लक्ष्मी पिंपळे-गाडेकर, कविता आहेर, पूनम देशमुख, कीर्ती नागरे, स्वाती माळी, तेजस्विनी गायकवाड, स्वराली हरदास, तेजस्विनी देव, स्वाती शेळके यांच्या भूमिका आहेत. नाटकाचे व्यवस्थापन नाट्यसेवाचे राजेंद्र जाधव बघत आहेत.


सर्व कलावंतांना एकत्र करण्यामागे कालिदास ही वास्तू कारणीभूत आहे. या वास्तूने अनेकजणांना घडवले आहे. जुन्या वास्तूची जी सेवा केली त्यासाठी अभिवादन व नव्या वास्तूचे स्वागत करण्यासाठी ‘तीन पैशांचा तमाशा’ या नाटकाचा प्रयोग ठेवलेला आहे. त्या‌निमित्ताने सर्व एकत्र आले आहेत ही आनंदाची बाब आहे.

- राजेश शर्मा, निर्माता-दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंक्चरच्या ठिकाणी दुभाजक

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिका हद्दीतील त्र्यंबकरोडवर गरज नसलेल्या ठिकाणी ठेवलेले पंक्चर पोलिसांच्या बॅरिकेडिंगचे दुभाजक लावून बंद करण्यात आले आहेत. यासंदर्भात ‘मटा’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर वाहतूक पोलिस प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ही कार्यवाही केली आहे. नागरिकांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले आहे. वाहतूक पोलिसांनी अचानक दुभाजक टाकल्याने काही वाहनचालकांनी आश्चर्य व्यक्त केले. परंतु, वाढलेल्या अपघातांची व्याप्ती बघता अतिरिक्त पंक्चरच्या ठिकाणी दुभाजक टाकण्यात आले असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी भाविकांची कायमच मोठी गर्दी होत असते. त्यामुळे साहजिकच त्र्यंबकरोडवरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. परंतु, महापालिकेच्या हद्दीत असलेल्या त्र्यंबकरोडवर गरज नसलेल्या ठिकाणी पंक्चर ठेवण्यात आले होते. संबंधित पंक्चरच्या ठिकाणी रोजच अपघातांची मालिका सुरू होती. सातपूर औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या त्र्यंबकरोडवर झालेल्या अपघातांत अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. रोजच किरकोळ अपघात होत असल्याने ‘मटा’ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत वाहतूक पोलिस प्रशासनाने अतिरिक्त ठेवण्यात आलेल्या पंक्चरच्या ठिकाणी लोखंडी दुभाजक टाकले आहेत. अपघात होत असलेल्या त्र्यंबकरोडचे ग्रहण या दुभाजकांमुळे तरी सुटावे, असा आशावाद वाहनचालकांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदापात्र काळवंडले

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

संततधारेने गोदापात्राच्या उताराच्या दिशेने शहरातील पाणी वाहून जात असल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. गटारींचे ओव्हर फ्लो झालेले चेंबर, तसेच नाल्यांचेही पाणी काही भागात थेट गोदापात्रात मिसळत असल्याने नदीचा प्रवाह काळाकुट्ट झाल्याचे दिसून आले.

पूरपरिस्थिती उद्भवल्यामुळे रामकुंड परिसर, तसेच गोदाघाटाच्या परिसरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या वर्षीच्या पुराचा धसका घेतलेल्या व्यावसायिकांनी दुकाने उघडण्याच्या अगोदरच गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढू लागल्याने दुकानदारांना आपापल्या दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी धावपळ उडाली होती. पावसाळी गटार, तसेच भुयारी गटारांचे घाण पाणी नदीपात्रात वाहून आल्याने या पाण्याला प्रचंड दुर्गंधी पसरली होती. मागील वर्षीही अशाच प्रकारे गटारीचे पाणी थेट नदीपात्रातून वाहत होते.

महिनाभरापूर्वी पडलेल्या जोरदार पावसाने रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप आले होते. प्लास्टिकच्या पिशव्या गटारीत अडकल्याने ड्रेनेज, नाले तुंबले होते, तशीच स्थिती शुक्रवारीही दिसून आली.

पावसाळी गटार योजना आणि भुयारी गटार योजना या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. तरीही पावसाळी गटारी या भुयारी गटारींना जोडल्यामुळे भुयारी गटारीचे चेंबरचे ढापे निघून ते पाणी थेट गोदापात्रात येते. त्यामुळे या पाण्याला प्रचंड दुर्गंधी सुटते. ही परिस्थिती गेल्या तीन-चार वर्षांपासून उद्भवत आहे.

--

गोदावरी नदीला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतरच पूर येतो. सध्या धरणातून पाणी सोडले नसले, तरी पूर येऊ लागला आहे. गटारींच्या कामासाठी ८४० कोटी रुपये महापालिकेने खर्च केले आहे. त्या कामाचा बोऱ्या वाजला आहे. त्यामुळे गोदावरी गटारगंगा झाली आहे.

-देवांग जानी, गोदाप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबडला कारखाने जलमय

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहर परिसरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी दुकाने, घरांत शिरल्याने शुक्रवारी रहिवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. अंबड औद्योगिक वसाहतीतदेखील काही कारखान्यांत पावसाचे पाणी शिरल्याने संबंधित कारखाने बंद ठेवण्याची स्थिती ओढावल्याचे दिसून आले. पावसाळी पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक स्रोत लुप्त झाल्याने पावसाचे पाणी कारखान्यांमध्ये जात असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. पावसाळ्याअगोदर असे पाणी वाहून जाण्याची व्यवस्थाच करण्यात आली नसल्याची बाबही यामुळे उघड झाली आहे.

दर वर्षी जोरदार पाऊस पडल्यावर अंबड औद्योगिक वसाहतीत कारखान्यांमध्ये पाणी शिरते. यावर ठोस उपाय करण्याची मागणी आयमाने महापालिकेकडे केली होती. परंतु, उपाययोजना न झाल्याने जोरदार पावसात वेगाने येणाऱ्या पाण्याला वाट मिळत नसल्याने ते थेट कारखान्यांमध्ये शिरत आहे. शुक्रवारी दिवसभर झालेल्या पावसाने अंबड एमआयडीसीतील इ व डी सेक्टरमधील कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने काही वेळ काम बंद ठेवावे लागले. आयमाचे संचालक सुदर्शन डोंगरे व दिलीप वाघ यांनी कारखान्यांचा पाहणी दौरा करीत जेसीबीच्या साहाय्याने पाणी वाहून जाण्याची व्यवस्था केली. पावसाळ्याअगोदर पाणी वाहून जाण्याची व्यवस्था केली जात नसल्याने दर वर्षी कारखान्यांमध्ये पाणी शिरून मालकांना त्रास सहन करावा लागतो. यावर महापालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

--

अंबड औद्योगिक वसाहतीत वाढत्या कारखान्यांच्या जाळ्यात नैसर्गिक नाल्यांची सफाईच केली गेलेली नाही. त्यामुळे कारखान्यांत पाणी शिरते. पावसाळ्यापूर्वीच महापालिकेने याबाबत उपाययोजना केली पाहिजे.

-सुदर्शन डोंगरे, संचालक, आयमा

--

स्लम भागात घरांत पाणी

सातपूर भागात असलेल्या स्वारबाबानगर व संत कबीरनगर येथील अनेक घरांत पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली. महापालिकेच्या ड्रेनेज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भरपावसात साचलेले पाणी वाहून जाण्याची व्यवस्था केली. संत कबीरनगर या स्लम भागात भोसला शाळेच्या भिंतीलगत असलेल्या घरांमध्ये सर्वाधिक पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांना हाल सहन करावे लागले.

--

खासगी ठेकेदार गायब

सातपूर विभागात गेल्या काही महिन्यांपासून ड्रेनेज विभागात खासगी ठेकेदारांची मोठी चलती आहे. नेहमीच तत्परता दाखवीत ड्रेनेजचे चोकअप काढण्याची कामे मोठ्या झपाट्याने केली जातात. विशेष म्हणजे ड्रेनेज तुंबल्यावर खासगी ठेकेदार पैसे मिळत असल्याने तत्काळ कामे करीत असतात. परंतु, पावसाचे पाणी काढण्यासाठी त्यांना वेळच मिळाला नसल्याचा आरोप ड्रेनेज विभागाच्या कामगारांनी केला आहे. नेहमीच ड्रेनेज चोकअप काढल्याची खोटी बिले सादर करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही परिसरातून केली जात आहे. जेट मशिनने दिवसभरात चार किंवा पाच चोकअपच्या समस्या मिटत असताना दहा समस्या नक्की कशा सुटतात, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५० टक्केच प्रवेश निश्चित

0
0

अकरावी प्रवेश; २२९३ कोटा प्रवेश निश्चित

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकरावी केंद्रियकृत प्रवेशप्रक्रियेची पहिली यादी १० तारखेला जाहीर झाल्यानंतर १४ तारखेपर्यंत ५० टक्केच विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. १४ हजार ९६५ विद्यार्थ्यांची नावे पहिल्या गुणवत्ता यादीत जाहीर झाली होती, त्यापैकी ७ हजार ७७४ विद्यार्थ्यांचे म्हणजेच ५० टक्क्यांच्या आसपास प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत.

यंदा अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. काही विद्यार्थ्यांनी प्रवेशअर्जात विनाअनुदानित कॉलेजांची नावे दिली. परंतु, प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी या कॉलेजांची फी जास्त असल्याने विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम बदलून घेण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे असे विद्यार्थ्यांचे पुढील यादीकडे लक्ष असणार आहे. १५ ते १८ जुलै (रविवार वगळून) सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरणे आणि ज्यांनी अर्ज भरला नसेल त्यांना भाग १, २ भरण्याची मुदत देण्यात आली आहे. २० जुलैला दुसरी गुणवत्ता यादी सायंकाळी ५ वाजता वेबसाइटवर जाहीर होणार आहे. तसेच संबंधित ज्युनिअर कॉलेजांमध्ये प्रवेशही घेता येणार आहे.

एकूण प्रवेश १० हजार

पहिल्या गुणवत्ता यादीतील ७ हजार ७७४ व कोट्यातील ७ हजार ५९० जागांपैकी २२९३ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. असे एकूण १० हजार ४७ विद्यार्थ्यांची अकरावीसाठी प्रवेशनिश्चिती झाली आहे.

अद्याप अर्ज केला नसल्यास

ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रियेचे अर्ज भरलेले नाही अशा विद्यार्थ्यांनी १५ आणि १७ तारखेला बिटको, बीवायके व पंचवटी या कॉलेजांमध्ये प्रवेश अर्ज भरावे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी प्रथम अनुदानित कॉलेजांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन केंद्रिय प्रवेश नियंत्रण समितीकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गंगापूर धरण @ ६२ टक्के

0
0

पाणलोट क्षेत्रात पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

म. टा. प्रतिन‌िधी, नाशिक

इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरसह बहुतांश तालुक्यांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे धरणांमधील पाणीपातळी झपाट्याने वाढण्यास मदत झाली आहे. गंगापूर धरण निम्म्याहून अधिक भरले असून, पाणीसाठा ६२ टक्क्यांवर पोहोचला आहे. शुक्रवारी दिवसभरात धरणामधील पाणीसाठा १० टक्क्यांनी वाढला. २४ तासांत २० टक्के पाणीसाठा वाढला असून, जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठाही ३० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

तब्बल १५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावली आहे. गंगापूर आणि दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस झाला. सायंकाळपर्यंत बहुतांश ठिकाणी पाऊस सुरूच होता. या पावसामुळे धरणांमधील पाणीपातळी वाढण्यास मोठी मदत झाली आहे. गंगापूर धरणातील उपयुक्त पाणीसाठा २५५१ दशलक्ष घनफुटांवरून ३४०० दशलक्ष घनफुटांवर पोहोचला आहे. म्हणजेच एका दिवसात ८४९ दशलक्ष घनफुटांनी पाणीसाठा वाढला आहे. गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा शुक्रवारी सकाळी आठपर्यंत ३६ वरून ४१ टक्क्यांवर पोहोचला. शुक्रवारी सकाळपर्यंत काश्यपीतील पाणीसाठा तीन टक्क्यांनी, गौतमी गोदावरीतील पाणीसाठा चार टक्क्यांनी, तर आळंदी धरणातील पाणीसाठा पाच टक्क्यांनी वाढला.

२४ पैकी १९ धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संततधारेने गोदावरीला पहिला पूर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून हजेरी लावणाऱ्या दमदार पावसामुळे बळीराजासह नाशिककरदेखील सुखावले आहेत. शहरात निर्माण झालेली पुरसदृश परिस्थ‌िती पाहण्यासाठी नागरिकांनी गोदाघाटासह सोमेश्वर परिसरात गर्दी केली. या पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीपातळीत तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली असून, शहरासह आसपासच्या परिसराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

शुक्रवारी मध्यरात्री एक वाजेपासून शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शहरवास‌ियांच्या दिवसाची सुरुवातच पावसाच्या दर्शनाने झाली. गुरुवारी सकाळी आठ ते शुक्रवारी सकाळी आठ या २४ तासांत शहरात ७१.६ मिल‌िमीटर पाऊस झाला. शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत ३८.८ मिमी पावसाची नोंद झाली. नाल्यांमधील सांडपाणी नदीपात्रात मिसळल्यामुळे महापालिकेच्या पावसाळीपूर्व कामांचा पुन्हा एकदा फज्जा उडाला. पंचवटीत महापालिका कार्यालयासमोर झाड उन्मळून पडले, तर हनुमानवाडीतील नाल्यात शाळकरी मुलगा वाहून गेल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. परंतु, या घटनेस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. गाडगे महाराज पुलाजवळून वाहून चाललेली दोन वाहने वाचविण्यात नागरिकांना यश आले. तर जुन्या नाशिकमध्ये एक वाडा कोसळला. दुपारनंतर मात्र पावसाने ब ऱ्यापैकी उघडीप दिल्याने जनजीवन पुर्वपदावर येण्यास मदत झाली.

सतर्कतेचा इशारा

मध्य महाराष्ट्रात येत्या २४ तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे नाले, ओढे, ओहोळ, छोटी-मोठी गटारे, नदीपात्रात पुराचे पाणी येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी. लहान मुले, विद्यार्थी, नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी जाऊ नये. तसेच नदीकाठावर आणि पुलांवर गर्दी करू नये. सर्व प्रकारच्या विद्युत तारा व विद्युत खांबांपासून दूर रहावे. पाण्यातील विद्युत खांब, तारा व विद्युत उपकरणांना हात लावू नये तसेच सेल्फीच्या मोहापासून स्वत:ला सावरावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

येथे साधा संपर्क

नागरिकांनी गरज भासल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्ष (टोल फ्री-१०७७, दूरध्वनी -२३१५०८०/ २३१७१५१), नाशिक शहर पोल‌िस नियंत्रण कक्ष-(टोल फ्री क्र.-१००, दूरध्वनी-२३०५२३३/२३०५२०१/२३०५२००), पोल‌िस नाशिक ग्रामीण नियंत्रण कक्ष (दूरध्वनी : २३०९७१५/२३०९७१८/२३०९७००/२३०३०८८ या क्रमांकावर संपर्क साधावा. शहरात पाणी साचणे, तुबंणे, वृक्ष किंवा इमारत कोसळणे, सर्व प्रकारचा शोध व बचावासाठी नाशिक महापालिका नियंत्रण कक्ष (दूरध्वनी क्र. २२२२४१३/२५७१८७२) अग्निशमन विभाग (दुरध्वनी क्र. २५९०८७१/२५९२१०१/२५९२१०२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

पंचवटीत झाड पडले

पंचवटी ः महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयासमोरील मखमलाबाद रस्त्यावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कडुनिंबाचे झाड उन्मळून पडले. झाडाखाली उभ्या असलेल्या दोन चारचाकी आणि एका दुचाकी वाहनावर ते पडल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. झाडामुळे विजेच्या तारा तुटल्या. त्या तारा रस्त्यावर पडल्या होत्या. विद्युतपुरवठा सुरू असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. विद्युत पुरवठा खंड‌ित करेपर्यंत येथील नागरिकांना घराबाहेर पडू दिले नाही. त्यामुळे अनर्थ टळला. पहाटेच्या सुमारास कडूनिंबाचे झाड पडल्याची माहिती उद्यान निरीक्षक राहुल खांदवे यांना कळविण्यात आली. माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. झाड वाहनांवर पडले त्यापेक्षाही येथील विद्युत पोलवर पडून झाडामुळे तारा तुटल्या होत्या. या तारा रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहात पडल्या होत्या. येथील विद्युत पुरवठा खंडित केल्याशिवाय पर्याय नसल्याने महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन उचलण्याचे टाळले. त्यामुळे येथील नागरिकांचा संताप अनावर झाला होता. मुर्तडक यांनीही संपर्क साधून या कर्मचाऱ्यांना खडसावले. विद्युत पुरवठा खंडित केल्यानंतर येथील झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या. झाडाखाली अडकलेल्या स्व‌िफ्ट कारचे मोठे नुकसान झाले आहे.

कंपन्यांमध्ये शिरले पाणी

सातपूरः अंबड औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांत पावसाचे पाणी शिरल्याने काम बंद करण्याची वेळ आली. पावसाळ्याअगोदर पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात न आल्याने कारखान्यांमध्ये पाणी शिरत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. पावसाचे पाणी कारखान्यात शिरल्याने आयमाचे संचालक सुदर्शन डोंगरे व दिलीप वाघ यांनी जेसीबीच्या सहाय्याने पाणी वाहून जाण्याची व्यवस्था केली.

विभागीय कार्यालय तळ्यात

जोरदार झालेल्या पावसाने सातपूर विभागीय कार्यालय परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. बैठकीला आलेल्या नगरसेवकांनादेखील पाण्यातून कार्यालयात जाण्याची वेळ आली. पाणी वाहून जाण्यासाठी जागाच नसल्याने तळे साचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बेळगाव ढगा परिसरात झालेल्या पावसाने नंदिनी नदीला पूर आला होता.


नंदिनीलगतच्या रहिवाशांना हलविले

सिडको/इंदिरानगर ः मुसळधार पावसामुळे सिडको व इंदिरानगर भागातील रस्त्यांवर पाणी साचून ड्रेनेजच्या ढाप्यांमधून पाणी रस्त्यावर येत होते. नंदिनीला पूर आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने त्रिमूर्ती चौक परिसरातील नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले. सिडकोत ड्रेनेज चोकअप झाल्याने ते दुरुस्तीचे काम प्रशासनाकडून सुरू होते. तळघरांत दुकाने असलेल्यांचे मोठे नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेनकोट नमुने तपासणी संशयास्पद?

0
0

औषधे तपासण्याच्या कंपनीत रेनकोटची गुणवत्ता तपासली,

नाशिक : आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांना अव्वाच्या सव्वा दरात पुरवठा करण्यात आलेल्या रेनकोट लॅबमधील नमुने तपासणीही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ज्या लॅबमधून रेनकोटचे नमुने तपासण्यात आले, ती लॅब ही फार्मास्युटीकल प्रॉडक्ट तपासणीसाठी आहे. त्यामुळे या रेनकोटची गुणवत्ताही संशयास्पद असून, त्यांचीही पुन्हा नव्याने तपासणी करण्याची आवश्यकता आहे. रेनकोट तपासणी फॉर्मास्युटीकल लॅबमधून कशी होऊ शकते, असा प्रश्न तक्रारदारांनी उपस्थित केला आहे.

आदिवासी विभागात कोणत्याही वस्तू अथवा साहित्याचा पुरवठा करायचा असेल, तर प्रथम निविदा प्रक्रियेतून जावे लागते. निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या कंपन्यांना आपल्या वस्तू व साहित्य हे सरकारी वा निमसरकारी लॅबमधून तपासणी करून घ्यावे लागते. सरकारने सूचविलेल्या लॅबमधून या वस्तूंची निविदेत दिलेल्या अटींप्रमाणे तपासणी करून घेतली जाते. परंतु, या तपासण्या लॅबही आता संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. ठेकेदार आपले नमुने पास व्हावेत, यासाठी लॅबही मॅनेज करीत असल्याचे रेनकोट प्रकरणावरून स्पष्ट होत आहे. नाशिक विभागात पुरवठा करण्यात आलेल्या रेनकोटची तपासणी ही गोरेगाव येथील पॅरालॅब प्रा. लिमिटेड येथून करण्यात आली आहे. परंतु, सदर लॅबमध्ये फार्मास्युटीकल, फुड्स, पेस्टीसाईड, कॉस्मेटीक, केमिकल्स या उत्पादनांची तपासणी केली जाते.

रेनकोट नमुने तपासणीचा या लॅबशी कोणताही संबंध नाही. परंतु, विभागातील ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून या लॅबमधून आपले नमुने पास करून आणले आहेत. त्यामुळे एकूणच या रेनकोटची गुणवत्ताही संशयास्पद असल्याने सर्वच मामला गोलमाल असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे नमुने तपासणी ही विभागामार्फतच केली जाते. सर्व प्रकल्प कार्यालयांनी नमुने तपासणीसाठी एकच लॅब निवडल्यानेही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे रेनकोटची खरेदी ही ठेकेदारांना समोर ठेवूनच केल्याचे या सगळ्या प्रकारावरून दिसून येत आहे. रेनकोटची खरेदी आणि नमुने तपासणी प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली जात आहे.

लॅबचे गोलमाल उत्तर

संबंधित लॅबच्या संचालकांशी संपर्क साधला असता, त्यांनी गोलमाल उत्तरे दिली. कंपनीचे संचालक सेहूल मेहता यांनी सध्या आमच्याकडे तांत्रिक व्यक्ती उपलब्ध नसल्याने तपासणी बंद असल्याचे सांगितले. ती तपासणी कधीपासून बंद आहे, यावर स्पष्ट उत्तर देणे त्यांनी टाळले. संबंधित लॅबचा संगणक बघून तारीख सांगतो, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. रेनकोटची तपासणी केली जाते काय अशी विचारणा केल्यावर नंतर फोन करतो असे सांगून त्यांनी बोलणे टाळले. त्यामुळे एकूणच या तपासणीवर संशय बळावला आहे.

रेनेकोटची खरेदी आणि नमुने तपासणी ही एकूण सर्व प्रक्रियाच संशयास्पद आहे. ठेकेदार आणि अधिकारी हे मिळून विभागाची लूट करीत असून, या सर्व प्रकाराची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. दोषींवर आदिवासी विकास मंत्र्यांनी कठोर कारवाई केली पाहिजे.

- रवींद्र तळपे, माहिती अधिकार कार्यकर्ता, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी, नंदिनीत आता बांधकाम मंजुरी आवश्यक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नासर्डी नदीपात्रात महापालिकेने सुरू केलेल्या बांधकामावर हायकोर्टाने आक्षेप घेतला असून, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीची परवानगी का घेतली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, यापुढे गोदावरी आणि नंदिनी नदीत कोणतेही बांधकाम करायचे असल्यास उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीकडून परवानगी घ्यावी, असे आदेश न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाने दिल्याचा दावा याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी केला आहे.

नंदिनी नदीपात्रात चालू असलेल्या भिंती आणि टाकल्या जाणाऱ्या भरावाबाबत राजेश पंडित यांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यावर हायकोर्टाने निरीचा अहवाल मागवला होता. निरीने सादर केलेल्या अहवालाकडे मनपाने दुर्लक्ष केले होते. त्यावर निरीने पुन्हा आक्षेप घेतला होता. याबाबत हायकोर्टाने पालिकेची कानउघाडणी केली आहे. नदीच्या भिंतीबाबत कुठलेही पुढील काम करण्याअगोदर मनपाने हायकोर्टाने विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समिती (ज्यात निरी पण आहे) कडे अर्ज करून ना हरकत घेणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. तसेच, भविष्यात गोदावरी व तिच्या कुठल्याही उपनदीवर काहीही बांधकाम करायचे असल्यास हायकोर्टाने गठीत समितीकडून परवानगी घ्यावी, असे निर्देश ओक यांच्या खंडपीठाने दिल्याचा दावा पंडित यांनी केला आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या या आदेशाने गोदावरी आणि तिच्या उपनद्यांमध्ये बांधकाम करण्यास आता अडचणी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड शहर ठरले हागणदारीमुक्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

केंद्र सरकारने मनमाडला हागणदारीमुक्त गाव घोषित केले आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महाराष्ट्र राज्य स्वच्छता अभियान ही योजना शहरात प्रभावीपणे राबवल्यामुळे थेट केंद्राने मनमाड नगरपालिकेकेचा गौरव केला आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, उपनगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर व पालिकेतील सहकाऱ्यांनी हागणदारी मुक्त गाव योजना प्रभावीपणे राबवली.

या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी केंद्र-राज्य यांच्याकडून प्रत्येक कुटुंबाला १२ हजार व पालिकेतर्फे ५ हजार असे एकूण १७ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले. मनमाड शहरात १४३० वैयक्तिक शौचालये बांधली गेली आहेत. तसेच ६२० कामे प्रगती पथावर आहेत. या गौरवाने नागरिकांमध्ये समाधान पसरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटी-सिन्नर वाहतूक विस्कळीत

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

घोटी-सिन्नर महामार्गावरील पुलाला भागदाड पडल्याने संपूर्ण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान या पुलाच्या डागडुजीसंदर्भात शनिवारी घोटी पोलिस ठाण्यात बांधकाम विभाग, सामाजिक कार्यकर्ते, पोलिस अधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत किमान मोटरसायकल व लहान वाहने धावण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

दारणा नदीवरील पुलाला शुक्रवारी भगदाड पडल्यामुळे छोटी वाहने देवळे-खैरगावमार्गे वळविण्यात आली आहेत. मात्र हा पर्यायी मार्गही खडतर व चिखलाचा तसेच लांब पल्ल्याचा असल्यामुळे वाहनधारक वैतागले आहेत. या पर्यायी मार्गाची दुरुस्ती करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले. तर मोठी व अवजड वाहने मुंढेगाव-साकूरमार्गे वळविण्यात आली आहे. या बैठकीला पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, कनिष्ठ अभियंता संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिवा काळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष रमेश परदेशी, भाजप तालुकाध्यक्ष अण्णासाहेब डोंगरे, टाकेदचे सरपंच बाळासाहेब घोरपडे उपस्थित होते.

यंत्रणेची कानउघडणी

कमकुवत झालेल्या व भगदाड पडलेल्या पुलाचे काम यूद्धपातळीवर सुरू करणार असल्याचे बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी सांगितले. मात्र चोवीस तास उलटूनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने पोलिस अधिकाऱ्यांनी ठेकेदार व यंत्रणेला झापले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संपामुळे आंबा निर्यात घटली

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

जून महिन्यात झालेल्या शेतकरी संपाचा यंदाच्या आंबा निर्यातीला मोठा फटका बसला आहे. मागील वर्षापेक्षा यंदा ३० मेट्रिक टन आंब्याची निर्यात कमी झाली आहे. ऐन निर्यातीच्या कालावधीत उसळलेल्या शेतकरी संपात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे ही घट झाली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

लासलगाव येथील भाभा ऑटोमेटिक रिसर्च सेंटरमध्ये विकिरण प्रक्रिया करून आंब्याची निर्यात केली जाते. यंदा ५४० मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली असून, मागील वर्षापेक्षा तुलनेने ३० मेट्रिक टनने घट झाली आहे. यावर्षी १ हजार ५० मेट्रिक टन आंबा देशातील बंगळुरू, मुंबई, लासलगाव येथून विकिरण प्रक्रिया करून निर्यात झाला आहे.

मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने हंगामात शेतकऱ्यांनी फळभाज्यांची लागवड केली. फळभाज्यांचे पीक हमखास पैसे देते. मुबलक पाणी, औषधे आणि खते यांचा वापर केल्याने पिकेही चांगली आली होती. पण सरकारने नोटबंदीचा निर्णय जाहीर केला आणि सगळे गणित बिघडले. त्यातच शेतमालाची आवकही वाढल्याने कमी दर मिळाला. म्हणून शेतकऱ्यांनी कर्जमाफी, हमीभावासाठी १ जूनपासून संप पुकारला. या संपादरम्यान नुकसान होण्याच्या भीतीने निर्यातदारांनी निर्यात थांबविली. हापूस आंबा परदेशातही प्रसिद्ध आहे. हा आंबा परदेशात पोहोचावा यासाठी दरवर्षी लासलगाव येथे आंब्यावरविकिरण प्रक्रिया केली जाते.

शेवटच्या टप्प्यात परिणाम

शेतकरी संपात सुरू असलेली शेतमालाची नासाडी, लुटालूटमुळे व्यापाऱ्यांनी कोकणात आंबा खरेदीच केला नाही. खरेदी थांबल्यामुळे साहजिकच लासलगाव येथील केंद्रावर विकिरणासाठी आंबा कमी आला. त्यामुळे यंदा शेवटच्या टप्प्यात आंबा निर्यातीवर परिणाम झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संशय‌ितांवर कोर्टातही ‘वॉच’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोर्टात हजर करण्यात येणाऱ्या संशयित गुन्हेगारांना त्यांचे परिचीत, नातेवाईक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करतात. याचा फायदा संशयित आरोपी घेतात. हे रॅकेट मोडून काढण्यासाठी शहर पोलिसांनी कोर्टात हजर करताना येणाऱ्या संशयितांचे व्हिड‌ीओ शूट‌िंग करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.

शहर परिसरात कार्यरत असलेल्या गुन्हेगारांना विविध राजकीय पक्ष, संघटना पाठ‌िशी घालतात. पंचवटीसह नाशिकरोड, सातपूर, सिडको अशा अनेक भागात राजाश्रय घेऊन गुन्हेगारांनी बस्तान मांडल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना मिळणारी आर्थिक रसद मोडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून कोर्टात हजर करण्यात येणाऱ्या संशयित आरोपींचे व्हिड‌ीओ शूट‌िंग करण्यात येणार आहे.

विविध गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या गुन्हेगारांना, न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयितांना न्यायालयीन कामकाजासाठी वेळोवेळी कोर्टात हजर करण्यात येते. संशयितांना एकाच वेळी सेंट्रलजेलमधून एका मोठ्या किंवा आवश्यकतेनुसार जास्त वाहनांमध्ये कोर्टात आणण्यात येते. प्रत्येक संशयितांची वेगवेगळ्या कोर्टात आणि वेळेत सुनावणी होते.

त्यामुळे सुनावणी पूर्ण झालेले संशयित पोलिसांसह कोर्टाच्या आवारात किंवा पोलिसांच्या वाहनांमध्ये बसलेले असतात. तेव्हा संशयितांचे नातेवाईक, मित्र, संशयितास मदत करणारे हितचिंतक तेथे हजर असतात. संशयितांना पैसे, केसची माहिती यासह इतर रसद पुरवली जाते. यामुळे संशयितांवर कायदेशीर कारवाईचा तितकासा फरक पडत नाही. या पार्श्वभूमीवर कोर्टाच्या आवारात संशयितांवर कॅमेऱ्यांची नजर ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

लवकरच हे काम सुरू होईल. यामुळे संशयितांना कोण भेटते, त्यांचा हेतू काय? त्यांचा संबंध काय हे समजण्यास मदत होईल. गुन्हे करण्यास प्रवृत्त करणाऱ्या, गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या व्हॉईट कॉलर व्यक्ती यामुळे प्रकाशात येऊ शकतील.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीचे संचालक अज्ञातस्थळी

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींच्या निवडीची तारीख निश्चित झाल्यानंतर लगेच संचालकांना अज्ञातस्थळी घेऊन जाण्याची ‘खबरदारी’ इच्छुकांकडून घेतली जात आहे. काही संचालक शुक्रवारीच (दि. १४), तर काही शनिवारी (दि. १५) अज्ञातस्थळी गेले आहेत. निवडीला अजून पाच दिवसांचा कालावधी असला, तरी आधीपासूनच अशी खबरदारी घेण्यावर भर दिला जात आहे.

गेली दोन दशके बाजार समितीच्या सत्तेत असलेल्या देवीदास पिंगळे यांना प्रथमच सभापतिपदावरून पायउतार होण्याची वेळ आली. त्यांच्या पॅनलमधून निवडून आलेले संचालकच त्यांच्या विरोधात गेल्याने त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव मंजूर झाला. हा अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी शिवाजीराव चुंभळे यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्यानंतर सभापती निवडणुकीच्या आदेशाची त्यांना प्रतीक्षा लागून राहिली होती. गुरुवारी (दि. १३) संचालकांना उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पत्र मिळताच या संचालकांची अज्ञातस्थळी सहल काढण्यात आली. आतापर्यंत एकहाती सत्ता मिळविणारे पिंगळे हे ऐनवेळी खेळी करण्याची शक्यता लक्षात घेऊन या संचालकांना त्यांच्या संपर्कात येऊ द्यायचे नाही, याची काळजी चुंभळे घेत आहेत.

---

गुरुवारी होणार निवड

येत्या गुरुवारी (दि. २०) सभापती आणि उपसभापतींच्या निवडीसाठी बाजार समितीच्या कार्यालयात सभा होणार आहे. या सभेत पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली बाजार समितीची सत्ता शिवसेनेकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ताप्रश्नी अधिकारी फैलावर

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

भगूर-नानेगाव ते पळसेदरम्यानच्या रस्त्याच्या रखडलेल्या कामाची देवळालीचे आमदार योगेश घोलप यांनी शुक्रवारी भरपावसात भेट देऊन पाहणी केली. या रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे आढळून आल्याने या कामाची चौकशी करण्याचे व पुन्हा दर्जेदार काम होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराला देयक अदा न करण्याच्या सक्त सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. ठेकेदाराशी संगनमत करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. या रस्त्याचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडल्याचे वृत्त ‘मटा’तून काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाले होते.

‘नाबार्ड’मार्फत जुना नासाका रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु, संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत सोडले होते. या समस्येची दखल ‘मटा’ने घेतल्यानंतर संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे उर्वरित काम केले होते. या रस्त्याच्या कामाची शुक्रवारी दुपारी आमदार घोलप यांनी पाहणी केली असता या रस्त्याच्या झालेल्या कामाचा दर्जा तांत्रिक व गुणात्मकदृष्ट्या अत्यंत निकृष्ट असल्याचे आढळून आल्याने संबंधित ठेकेदाराला कामाची देयके अदा न करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

दर्जाबाबत तडजोड नको

आपल्या अधिकारक्षेत्रात होणाऱ्या विकासकामांचा दर्जा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासला पाहिजे. कामाच्या दर्जाबाबत कोणत्याही स्वरूपाची तडजोड स्वीकारू नये. कामाच्या दर्जाकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्यास संबंधित ठेकेदारांकडून आर्थिक दंड वसूल करावा, असे आदेशही आमदार घोलप यांनी दिले. या रस्त्याचे काम पुन्हा दर्जेदार करण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगन्नाथ आगळे, तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, लीलाबाई गायधनी, सरपंच देवीदास गायधनी, नवनाथ गायधनी आदींनी आमदारांकडे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...हा तर काळू-बाळूचा तमाशा

0
0

अजित पवारांचा शिवसेना-भाजपवर हल्लाबोल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सेना-भाजपचे सरकार म्हणजे काळू-बाळूचा तमाशा आहे. यात एक मारल्यासारखे, तर दुसरा रडल्यासारखे करतो. दोघांनी मिळून नौटंकी चालवली असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. या दोघांनाही राज्यातील जनता, शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नाही. अपेक्षित काही मिळाले नाही की लगेच मुदतपूर्व निवडणुकांचा विषय पुढे करून जनतेचं लक्ष विचलित करायचा असा सगळा तमाशा चाललायं असा जोरदार हल्ला चढवला.

नाशिक येथील तुपसाखरे लॉन्स येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला अध्यक्षा चित्रा वाघ, युवक अध्यक्ष संग्राम कोते-पाटील, युवती अध्यक्षा स्मिता पाटील, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार द‌ीपिका चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून अजित पवारांनी भाजप-सेनेवर जोरदार हल्ला चढवला. हे सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३४ हजार कोटींची कर्जमाफी केली. दहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली. मात्र अद्याप काहीच मिळाले नाही. एकदा निर्णय घेतल्यानंतरही तीनवेळा जीआर बदलण्याचा विक्रम या सरकारने केला. आता परत चौथ्यांदा जीआर बदलणार असल्याचे समजते. अरे, जीआर काढायलाही अक्कल लागते, असा टोला पवार यांनी लगावला.

युतीत भाजपच मोठा

अजित पवार यांनी युतीत भाजपला मोठ्या भावाचे प्रशस्तीपत्र दिले. भाजपचे सर्वाधिक आमदार असून, सध्या शिवसेनेच्या नेत्यांना सातत्याने भाजप नेत्यांकडे जावे लागते. त्यामुळे भाजपच मोठा भाऊ असल्याचे सांगून पवार यांनी शिवसेनेला चिमटा काढला. समृद्धी महामार्गावरून शिवसेनेची भूमिका डबलढोलकीची असून, एकीकडे सरकारजमा नाही म्हणायचे अन् दुसरीकडे सत्तेचे लाभ घ्यायचे, अशी टीका केली.

वर्षावर ढोल वाजवावेत

मंत्रिमंडळात शिवसेनेचे १२ मंत्री आहेत. हे मंत्री कॅबिनेटमध्ये सरकारच्या निर्णयाशी सहमत असतात. मात्र, शिवसेनेचे नेते बाहेर रस्त्यावर उतरतात. त्यांना विरोधच करायचा तर सभागृहात विरोध का केला जात नाही. शिवसेनेने बँकांपुढे ढोल वाजवण्याचे नाटक करण्यापेक्षा मंत्रालयात, वर्षा बंगल्यावर ढोल वाजवावेत. शिवसेना सत्तेत आहे, हेच अजून त्यांना कळले नाही, असे पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरवणूक मार्गास देवळालीत बॅरिकेड्सचा ब्रेक

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून येथील जुन्या बस स्थानक परिसरात लावण्यात आलेल्या लोखंडी बॅरिकेड्समुळे विविध उत्सवाच्या पारंपरिक मिरवणूक मार्गात अडथळा निर्माण झाला आहे.

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आपला मनमानी कारभार करू पाहत असून, लष्कराप्रमाणे सर्व कारभार कॅन्टोन्मेंट बोर्डात सुरू आहे. याबाबत लोकप्रतिनिधीदेखील गप्प असल्याने विविध मंडळांमधील कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. देवळालीत गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव, शिवजयंती, नवरात्रोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यांसह विविध सण-उत्सवांच्या मिरवणुका या जुन्या बस स्थानक ओलांडून जात असतात. हा मार्ग पारंपरिक मिरवणूक मार्ग बनला असल्याने याठिकाणी लावण्यात आलेले लोखंडी बॅरिकेड्स गणेशोत्सवापर्यंत काढण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

वाहतुकीच्या सोयीसाठी बॅरिकेडिंग

देवळालीतील वाढत्या वाहतुकीला आळा बसविण्यासाठी हौसन रोडवरील वाहतूक सायंकाळच्या वेळी वन वे करण्यात आल्याने या ठिकाणाहून कुठलेही वाहन रस्ता ओलांडू नये, याकरिता ही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे या बॅरिकेड्सचा येथे भरणाऱ्या रविवार बाजारच्या दिवशी रिक्षा उभ्या राहण्यास अडथळा निर्माण होत आहे. शिवाय प्रशासनाने याच जागी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था केल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.

जुन्या बस स्थानक परिसरात लावण्यात आलेले २ फुटी लोखंडी संरक्षक बॅरिकेडिंग प्रशासनाने काढून घ्यावे. अन्यथा ते शिवसेना व विविध गणेश मंडळाच्या वतीने काढण्यात येतील.

- नितीन गायकवाड, अध्यक्ष, तरुण मित्र मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images