Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘नासाका’ला दुष्टचक्राचा फेरा!

$
0
0



नवनाथ वाघचौरे, सिन्नर फाटा

बंद असलेल्या नाशिक सहकारी साखर कारखान्याचा (नासाका) बॉयलर येत्या गळीत हंगामात सुरू होण्याची ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र, कारखान्याच्या आर्थिक मदतीच्या मुद्द्यावर नियोजनासाठी पालकमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने आणि दुसरीकडे स्थानिक शिवसेना आमदारांनी या प्रश्नावर मौन धारण केल्याने ‘आई खाऊ घालिना अन् बाप जेऊ देईना’ अशी काहिशी अवस्था प्राधिकृत संचालक मंडळाची झाली आहे.

चार वर्षांपासून बंद असलेला नासाका सुरू व्हावा, यासाठी भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी पाठपुरावा सुरू केले आहेत. राज्यसरकारच्या माध्यमातून या कारखान्यावर प्राधिकृत संचालक मंडळाची नेमणूक गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच करण्यात आमदार बाळासाहेब सानप यांना यश मिळाले. त्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या समवेत आजवर काही बैठकाही झाल्या असल्या तरी थेट मदतीवर ठोस निर्णय अद्यापही झालेला नाही. गेल्या आठवड्यात सहकार मंत्री व राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने कर्जाच्या परतफेडीच्या हमीवर राज्य सहकारी बँकेने नासाकास आर्थिक मदत करण्यास तयारी दर्शविली होती.

शिवसेनाही चार हात दूर

शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे व आमदार योगेश घोलप यांच्या मतदारसंघातील नासाका कारखाना आहे. मात्र, या कारखान्याला जीवदान मिळावे, यासाठी आमदार गोडसे व आमदार घोलप अद्याप एका बैठकीचा अपवाद वगळता दूरच राहिलेले आहेत. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीच्या या भूमिकेमुळे व भाजपच्या लोकप्रतिनिधींनाही हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नसल्याने नासाका सुरू होणे आता केवळ मृगजळ ठरू नये, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.

पालकमंत्री खूपच बिझी

नासाकाच्या आर्थिक मदतीप्रश्नी संचालक मंडळाच्या हमीबाबत निश्चित नियोजन होणे बाकी आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिश महाजन याच्या मार्गदर्शनाखाली याविषयावरचे नियोजनाला अंतिम स्वरुप प्राप्त होणार आहे. त्यामुळे आमदार सानप पालकमंत्र्यांना याविषयावर बैठक घेण्यास इच्छुक आहेत. यासाठी पालकमंत्री मुंबईत शनिवारी बैठक घेण्याची शक्यता होती. मात्र, राष्ट्रपती निवडणुकीची व्यूहरचना ठरविण्यात बिझी असलेल्या पालकमंत्र्यांची आमदार सानप यांना वेळ उपलब्ध होऊ शकला नाही.

संचालक मंडळ तोंडघशी?
नासाका सुरू होणार अशा जाहीर प्रचार प्राधिकृत संचालक मंडळाने यापूर्वीच गावोगावी ऊस उत्पादकांच्या बैठकांमधून सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनीही ऊस लागवड केली आहे. तर कित्येक शेतकऱ्यांनी आपल्याकडील ऊस इतर कारखान्यांना न देण्याचे ठरविले आहे. मात्र, या प्रश्नावर निर्णय घेण्यास सत्ताधारी भाजपच्या मंत्र्यांना वेळ नसल्याने व शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना ‘नासाका’चे काहीही सोयरसूतक नसल्याने संचालक मंडळ तोंडघशी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

‘नासाका’ची व्याप्ती
गेल्या चार वर्षांपासून नासाका बंद
चार वर्षांपूर्वी ८४ कोटींचे कर्ज
कर्जाचा बोजा सुमारे ११० कोटी झाल्याची शक्यता
इगतपुरी, त्र्यंबक, सिन्नर व नाशिक ही चार तालुके कार्यक्षेत्र
सुमारे २ लाख टन ऊस कार्यक्षेत्रात उपलब्ध
१२५० मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमता
१७ हजार सभासद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पैठणी ‘जीएसटी’च्या गुंत्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

भरजरी, जरतारीने काठपदरात इंच इंच विणकामात अप्रतिम कलाकुसरीने खऱ्या अर्थाने सजलेल्या पैठणीला ‘जीएसटी’चे ग्रहण लागले असून या व्यवसायात दिवसरात्र अपार कष्ट उपसणारे विणकर संकटात सापडले आहेत. पैठणी व्यवसाय टिकून रहावा यासाठी पैठणीला ‘जीएसटी’मधून सूट मिळावी, या मागणीसाठी येवल्यातील पैठणी विणकरांसह विक्रेते यांच्या पथकाने सरकार दरबारी धाव घेतली आहे.

राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील जीएसटी आयुक्त राजीव जलोटा यांची भेट घेणाऱ्या येथील शिष्टमंडळाने हातमागावरील पैठणी व्यवसाय वाचवण्यासाठी ‘जीएसटी’ कराची विशेष बाब म्हणून सूट देण्याचे साकडे घातले आहे. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, भाजप वस्रोद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज दिवटे हे शिष्टमंडळासोबत उपस्थित होते. सुमारे दोन हजार वर्षांची वस्त्र परंपरा असलेल्या महावस्त्र ‘पैठणी’ची जागतिक दर्जाच्या वस्त्र प्रावरणांमध्ये गणली केली जाते. संपूर्ण हस्तकला अन् रेशीम, जरी धाग्यांनी निमिर्ती होणाऱ्या या महावस्त्राला यादव साम्राज्य, पेशवे काळासह राज्यातील तत्कालीन शासनकर्त्यांचा आश्रय होता.त्यामुळेच हे महावस्त्र आजही टिकाव धरून आहे.अलीकडील काळात १९८० मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी आपल्या कार्यकाळात विणकर बांधवांच्या विनंतीवरून येवला व पैठण येथील हातमाग विणकरांना पैठणीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाला सर्व प्रकारच्या कर आकारणीतून सूट दिली होती, याकडे येवल्यातील शिष्टमंडळाने भेट घेतलेल्या मंत्र्यांचे लक्ष वेधले. याच धर्तीवर विशेष बाब म्हणून पैठणीला ‘जीएसटी’ करातून सूट मिळावी असे साकडे यावेळी मंत्र्यांना घालण्यात आले. आतापर्यंत राजाश्रय मिळल्याने पैठणी महावस्त्र युनेस्कोला देखील भुरळ पाडण्याचे काम करू शकले. युनेस्कोने या महावस्त्र पैठणीला ‘वर्ल्ड हेरिटेज आयकॉन’ दिला आहे. कच्च्या मालावरील संभाव्य ‘जीएसटी’मुळे हातमागावरील पैठणी निर्मिती क्षेत्र असलेल्या येवला शहर व परिसरातील पैठणी उत्पादक विणकर धास्तावले आहेत. या क्षेत्रात अगोदरच नवीन पिढी येण्यास उत्सुक नाही. पैठणी निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यात ‘जीएसटी’ लागू झाल्यास त्याचा विपरित परिणाम या पैठणी व्यवसायावर होताना हे क्षेत्रच लुप्त होईल की काय अशी चिंता शिष्टमंडळाने मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे. सुनील लक्कडकोट, बाळासाहेब कापसे, सचिन वडे, श्रीनिवास सोनी, प्रवीण पहिलवान, शिरीष पेटकर, राजेश भांडगे, पांडुरंग भांडगे, आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.

पाच ऑगस्टला बैठक

‘जीएसटी’चा विषय हा केंद्राच्या अखत्यारीत असला तरी पैठणी विणकरांच्या भावना केंद्र सरकारकडे पोहचविण्यासाठी सकारात्मक भूमिका असेल, असे आश्वासन सर्वच मंत्र्यांनी या भेटीत येवल्यातील शिष्टमंडळाला दिले. येत्या ५ ऑगस्टला होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत आपल्या भावना मांडताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याची माहिती मनोज दिवटे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृत्यांजली पदन्यासातून गुरुवंदना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नृत्यांगण कथक नृत्यसंस्था, नाशिक यांच्यावतीने आयोजित गुरूपौर्णिमा उत्सव या कथकनृत्य महोत्सवात नृत्यांजली या नृत्यप्रस्तुतीमधून कथकनृत्य शैलीची विविध अंग अतिशय देखण्या आणि लयबध्द पदन्यासातून रसिकांसमोर प्रस्तुत करण्यात आली. सुप्रसिध्द कथक नृत्यांगना कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्यांनी आपल्या लयबध्द पदन्यासातून आणि अदाकारीतून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

प्रारंभी गुरू कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या ज्येष्ठ शिष्यांनी गुरू परमात्मा परेशू या एकनाथ महाराजांच्या रचनेवर गुरूवंदना प्रस्तुत करून गुरूचरणी आपली नृत्यसेवा अर्पण केली. यानंतर छोट्या शिष्यांनी त्रितालात तोडे, चक्रदार तोडे, परण, तिहाई, ततकार अशा कथकनृत्यातील विविध अंगांना अतिशय समर्थपणे सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. कथक नृत्याचे वैशिष्ट्य असणारे गतनिकास, कवित्त, पढंत याचे दमदार प्रदर्शन या शिष्यांनी घडवले. पंडित बिरजू महाराज यांची नृत्यरचना असलेला यमन रागातील तराणा कीर्ती भवाळकर यांच्या शिष्यांनी अत्यंत सुंदर प्रस्तुत केला. त्यानंतर ज्येष्ठ शिष्यांनी सात मांत्रांचा रुपक ताल आणि १२ मात्रांचा चौताल प्रस्तुत केला. यात उठान, थाट, आमद, तोडे, परण, तिहाया अशा विविध रचना अतिशय तयारीने सादर केल्या. यानंतर गुरू कीर्ती भवाळकर यांनी तीनतालमध्ये काही पारंपरिक बंदिशी प्रस्तुत केल्या. परणजुडी, आमद, थाट, त्रिपल्ली, गिनती, बनारस घराण्याच्या काही पारंपरिक रचना अतिशय आकर्षकपणे सादर करीत त्यांनी कथकनृत्याचे रुप रसिकांसमोर उलगडत नेले.

या संपूर्ण नृत्यप्रस्तुतीला पुष्कराज भागवत गायन व संवादिनी, गौरव तांबे व वैष्णवी भडकमकर यांनी तबल्यावर अतिशय समर्पक साथसंगत केली. कीर्ती भवाळकर, निहारिका देशपांडे, प्रचिती भावे, विशाखा अस्वले यांनी पढंत केली. पराग जोशी यांनी ध्वनीसंयोजन केले. अरविंद भवाळकर यांनी प्रकाशयोजना केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश गायधनी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. किशोरी किणीकर यांनी निवेदन केले. कार्यक्रमाला नाशिकच्या कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसावर हल्ला करणारा जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भद्रकाली पोलिस स्टेशनचे हवालदार बाळू खरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयितास शहर पोलिसांनी अखेर जेरबंद केले. मध्यवर्ती बस बसस्थानकात गस्त घालणाऱ्या दोघा बीट मार्शलने ही कारवाई केली. पोलिस तक्रारीची दखल घेतली नसल्याच्या रागातून हल्ला केल्याची कबुली संशयिताने दिली आहे. रमेश जनार्दन जाधव (२९, रा. रायगड) असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे.

भद्रकाली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जुने नाशिकमधील दूध बाजारातून पायी गस्त घालत असताना सोमवारी हल्ल्याची घटना घडली होती. खरे यांच्यावरील हल्ला येथील एका हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासून संशयित हल्लेखोराचे वर्णनाचा बिनतारी संदेश सर्वत्र दिला होता. या संदेशातील वर्णन लक्षात ठेवत भद्रकाली पोलिस स्टेशनचे बीट मार्शल पोलिस नाईक रमेश कोळी, हवालदार सुधीर चव्हाण गस्त घालत होते. नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या अनोळखी व्यक्तीस दोघांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता गुन्ह्याचा उलगडा झाला. हल्ल्यामधील वर्णनानुसार पोलिसांना या व्यक्तीवर संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हल्ल्याची कबुली दिली.

कारवाईचे कौतुक

घटनेच्या पाच दिवसानंतरदेखील केवळ वर्णन लक्षात ठेवून संशयित हल्लेखोराला अटक केल्यामुळे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॉट खरेदीतून ३२ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्लॉट खरेदीत तब्बल ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरेश भागुजी टर्ले (६०, रा. ड्रीम क्लासिक अपार्ट. आनंदनगर, नाशिकरोड) असे फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी मीरा सुकदेव कदम (६१, मौलाना आझादनगर, मारुती मंदिरामागे, देवळलीगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार डिसेंबर २००९ ते १० जुलै २०१७ या दरम्यान फसवणुकीचा प्रकार घडला. कदम यांची मौजे देवळालीगाव शिवारात सर्व्हे नंबर ६ सी/७ पैकी एकूण क्षेत्र ८ आर इतकी जमीन आहे. संशयित आरोपीने या जमीन खरेदीसाठी कदम यांच्याशी व्यवहार केला. कदम यांना विश्वासात घेऊन खरेदीखत केले. त्यावर कदम यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. खरेदी खतातील अटी शर्थीनुसार देणे असलेले ३२ लाख रुपये फिर्यादीला दिल्याची खोटी नोंद केली. तसेच नोटरीप्रमाणे देणे असलेला ९०० चौरस फूट प्लॉट न देता फसवणूक केली. पैसे मागण्यासाठी गेलल्या कदम यांना धमकावल्याचे फिर्यादीत नूमद केले आहे. या प्रकरणी उपनगर पोलिसहांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पीएसआय जाधव करीत आहे.

पर्सची चोरी

परदेशी चलन तसेच विविध कार्डस असलेली महिलेची पर्स चोरट्यांनी हातोहात लंपास केली. ही घटना ताबंट लेनमधील लालवाणी होजिअरीच्या दुकानासमोर शनिवारी (दि. १५) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आशना रवींद्र मनवाणी (३७, सुखसिंधू सोसायटी, कॉन्टेमेंट बोर्ड, देवळाली) यांच्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मनवाणी या कामानिमित्त ताबंट लेन येथे गेल्या होत्या. चोरट्यांनी नकळत त्यांच्याकडील पर्स चोरी केली. पर्समध्ये पाच हजार रुपयांची रोकड, दुबईतील दिराम या चलनातील तीन नोटा, दुबईतील सरकारी आयकार्ड, आयसीआयसीआय बँकेचे डेबिट कार्ड, एचएसबीसी बँकेचे क्रेडिट कार्ड, दुबईतीलच नजम बँकेचे क्रेडिट कार्ड असा एकूण १० हजार रुपयांचा मुद्देमाल होता. घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक काळोगे करीत आहे.

वाहनाची परस्पर विक्री

वाहन घेताना घेतलेले कर्ज न फेडता वाहनाची परस्पर दुसऱ्यास विक्री करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुकेशकुमार उद्यप्रसाद सिंह (३६, दत्तनगर, अंबड सातपूर लिंकरोड) यांनी फिर्याद दिली. सिंह यांची संशयित आरोपी परशुराम दराडे याच्याशी ओळख आहे. दराडे याने अन्य एका संशयित आरोपीसह सिंह यांचा विश्वास संपादन करीत महिंद्रा एक्सयूव्ही (एमएम १५ डीएम ७९९०९) ही कार विकत घेण्यासाठी प्रोत्साहित केले. मात्र, दराडेने ही कार घेताना महिंद्रा फायनान्स कंपनीचे कर्ज घेतले होते. याबाबत संशयितांनी माहिती दडवून ठेवली. एकाही हप्ताची फेड केलेली नसताना संशयितांनी हे वाहन सिंह यांना विक्री केले. कर्जाचा तगादा सुरू झाल्यानंतर फसवणूक झाल्याची कल्पना येताच सिंह यांनी पोलिसांकडे धाव घेतली. घटनेचा अधिक तपास पीएसआय पवार करीत आहे.

जेलरोड परिसरात युवतीची आत्महत्या

जेलरोड परिसरातील नारायण बापूनगर येथील दशरथ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या १८ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. १५) साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. प्राजक्ता दशरथ गांगुर्डे असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. प्राजक्ताने घरात गळफास लावून घेतला. ही घटना उघडकीस येताच तिला बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहे.

चौघांची तरुणास मारहाण
मागील भांडणाची कुरापत काढून चौघांनी मिळून एकास बेदम मारहाण केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी पूजा दत्ता मोंढे (रा. अब्दुल किरणा दुकानाजवळ, पंचशीलनगर, भद्रकाली) यांच्या फिर्यादीनुसार, १४ जुलै रात्री ८ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घराजवळ हा प्रकार घडला. संशयित आरोपी नवाज शेख, कामरान खान, कामरान खान याचा लहाना भाऊ, तसेच अरबाज उर्फ छोट्या (सर्व रा. पंचशीलनगर) यांनी फिर्यादीचा मुलगा यश मोंढे यांच्याशी जुन्या भांडणाची कुरापत काढून लाठीकाठीसह लाथाबुक्यांनी मारहाण केली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर फिर्यादीने भद्रकाली पोलिस स्टेशन गाठून संबंधितांविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार सोनार करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतप्त तरुणांकडून कॉम्प्युटर लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

पैसे भरूनही नोकरी दिली जात नसल्याने गंडवल्या गेल्याची भावन निर्माण झालेल्या तरुणांनी लासलगाव येथे श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटीत हल्लाबोल केला. यावेळी काही तरुणांनी बँकेतील कॉम्प्युटरच उचलून नेले.

श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी काढणाऱ्या सतीश काळे यांचे व सोसायटीचे मुख्य कार्यालय लासलगाव (ता. निफाड) येथे आहे. काळे हे हरी ओम ग्रुपचे संस्थापक आहेत. त्यांनी राज्यात या संस्थेच्या सुमारे १७५ शाखा उघडल्या आहे. या शाखांमध्ये नोकरी लावुन देण्यासाठी हजारो तरुणांकडून करारनामा करून घेत कोट्यवधी रुपयांच्या मुदत ठेवी केल्याची माहिती येथे जमलेल्या संतप्त तरुणांनी व पालकांनी दिली.

श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या अनेक शाखा बंद पडल्याने नोकरीसाठी पैसे भरलेल्या शेकडो तरुण आता लासलगाव येथे दररोज चकरा मारत आहेत. संस्थेकडून कोरे धनादेश देऊन खोटे आश्वासन दिले जात असल्याची तक्रार येथे आलेल्या तरुणांनी केली. यामध्ये अनेक तरुण आणि महिलांचाही सहभाग आहे. अनेकांनी एक लाखात नोकरी मिळत असल्याने ते भरून नोकरीची अपेक्षा ठेवलेली होती; मात्र नोकरीही मिळाली नाही आणि पैसेही परत मिळत नसल्याची भावना इथे आलेल्या संतप्त तरुण व महिलांकडून व्यक्त केली जात होती.

औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ, जालना, बीड, नागपूर, उस्मानाबाद अशा जिल्ह्यातून अनेक तरुण पैसे मिळण्यासाठी लासलगाव येथील मुख्य कार्यालयात खेटे घालीत आहेत. ढोकेश्वेरच्या कार्यालयात शिरून संतप्त झालेल्या काही तरुणांनी तोडफोड केली. तर यावेळी काही तरुणांनी कॉम्पुटर आपल्या गाडीत टाकून नेल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून समजते.

फसवणुकीच‌ी तक्रार नाही

लासलगावमध्ये घडलेल्या प्रकाराविषयी पोलिसांशी संपर्क साधला असता निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी आमच्याकडे अद्यापपर्यंत या फसवणुकीबाबत कोणीही तक्रार दाखल केलेली नसल्याचे सांगितले. तसेच ‍काही फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी संबंधितांना केले आहे.

नोकरी मिळेल या आशेने एक-एक रुपया गोळा करून पैसे भरले होते. प्रवासासाठी आमचे हजारो रुपये खर्च झाले आहेत. आता कोरा धनादेश दिला जात आहे. पैसे मिळतात की नाही याची कोणतीही शाश्वती नाही. पैसे मिळाले नाही तर आत्महत्या करावी लागेल.
- विठ्ठल राजपूत, (पिंपरखेड, ता. कन्नड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसाऱ्यात दरड कोसळली

$
0
0

अडीच तासांनंतर वाहतूक सुरळीत; जीवितहानी टळली

म. टा. वृत्तसेवा, घोटी

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका व घाटमाथ्यावर गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे रविवारी (दि. १६) मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास दगडमाती ढासळल्याची घटना घडली. ही घटना येथील जव्हार फाट्यापासून सुमारे ३०० मीटर अंतरावरच्या महामार्गावर घडली. या घटनेमुळे या महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन ते अडीच तास ठप्प झाली होती. एक्स्प्रेस वेचे कर्मचारी आणि महामार्ग सुरक्षा पोलिसांनी रस्ता मोकळा केला.

राज्यासह नाशिक जिल्ह्यातही पावसाने जोर कायम ठेवला आहे. इगतपुरी तालुक्यातही पाऊस सुरू असल्याने येथील मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील डोंगराच्या कडा ढासळत आहे. परिणामी, रविवारी घडलेल्या या घटनेमुळे मुंबई व राज्यातील पर्यटकांचे तसेच महामार्गावर प्रवास करणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी वा दुर्घटना झाली नाही. मात्र वाहनांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

पर्यटकांचे हाल

या घटनेनंतर मात्र याठिकाणी पावसाने खुललेल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना याचा फटका बसला. दरड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा झाल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. प्रसंगी एकेरी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आल्याने वाहतुकीचा वेग काहीसा मंदावला होता. घटनेची माहिती मिळताच महामार्गावर पिकइंफ्रा एक्स्प्रेस वेचे पेट्रोलिंग करणारे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी महामार्गावरील दगड, माती, झाडे बाजूला सारून रस्ता मोकळा केला. या वेळी महामार्ग सुरक्षा पोलिस व एक्सप्रेस वेचे सर्व कर्मचाऱ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने ठप्प झालेल्या वाहतुकीला नियंत्रणात आणण्यात

यश आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोलपंपावरील दरोड्यात एक ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नागपूर-सुरत महामार्गावरील अजंगगाव शिवारात असलेल्या कोयल पेट्रोलपंपावर रविवारी (दि. १६) पहाटे तीन वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करीत दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पेट्रोलपंपावर झोपलेल्या जेसीबी चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीन कर्मचारी जखमी झाले. या दरोड्यात एकूण चौदा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही चड्डी बनियान दरोडेखोरांची टोळी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

धुळे तालुक्यातील फागणे ते अजंग गावादरम्यान असलेल्या रस्त्यावर कोयल पेट्रोलपंप आहे. हा पंप २४ तास सुरू असतो, रविवारी, पहाटे तीन वाजेच्या सुमारास पंपावर कामाला असलेले मॅनेजर प्रकाश बुधा पाटील (वय ३३, रा. फागणे), जगदीश सूर्यवंशी (वय २०, रा. फागणे) आणि दीपक पाटील (वय ३५, रा. देवभाने) हे तिघे टी. व्ही. पाहत बसले होते. त्यांना तीनजण चड्डी बनियानावर तोंडाला फडके बांधून पेट्रोलपंपामध्ये येताना दिसले. त्यामुळे ते सावध झाले. मात्र तिघा कर्मचाऱ्यांच्या कॅबिनकडे येत असताना शेजारच्या खोलीच्या बाहेर झोपलेले जेसीबीचालक इस्माईल बाबूभाई उर्फ सैय्यद (वय ७४, रा. शिवाजी चौक, निफाड जि. नाशिक) यांनाही जाग आल्याने ते नेमके काय झाले हे पाहण्यासाठी उठून येत असताना दरोडेखोरांना ते विरोध करण्यासाठी येत असल्याचे वाटल्याने त्यांनी प्रथम त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला जोरदार असल्याने इस्माईल बाबूभाई हे मृत्यूमुखी पडले. हे पाहून इतर तिघे घाबरले. दरोडेखोरांनी प्रवेश करीत कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत 'पैसे किधर है' अशी विचारणा केली. यावेळी घाबरलेले प्रकाश पाटील यांनी पैसे काढून दिल्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्या हातातील चांदीचे एक हजार रुपये किमतीचे ब्रेसलेट आणि त्यांचा तीन हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून घेतला. दरोडेखोर जाताच जगदीश सूर्यवंशी या कर्मचाऱ्याने मोटारसायकलने पेट्रोलपंपाचे मालक विखील रमेश शामसुखा यांना याची माहिती दिली. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून पेट्रोलपंप गाठला.

याप्रकरणी प्रकाश बुधा पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलिस स्टेशनला भादंवी कलम ३०२, ३९४, ३९७, ३४ नुसार खून, दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमत जाधव यांनी

भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दारू दुकानाविरोधात महिलांचे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दिंडोरीरोडवरील आरटीओ कॉर्नर येथील अमित वाइन्स हे दुकान तातडीने बंद करावे, या मागणीसाठी येथील महिलांनी शनिवारी सायंकाळपासून आंदोलनास सुरुवात केली असून, रविवारीही हे आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. महिलांनी सकाळी दुकानाचे शटर उघडण्यास दुकानदाराला विरोध केला. म्हसरूळ पोलिस ठाण्यातील पोलिसांनी तेथे जाऊन महिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. म्हसरूळ पोलिस ठाण्यात जाऊन निवेदनही देण्यात आले.

महामार्गावरील दारू दुकाने बंदीनंतर दिंडोरीरोड हा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्यानंतर या मार्गावरील दारू दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. येथील अमित वाइन शॉप हे दुकान आठ वर्षांपासून सुरू आहे. मात्र, या दुकानावर येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांच्या पार्किंगची गर्दी, मद्यपींची शिवीगाळ, भांडणे याचा येथील सोसायट्यांतील रहिवाशांना त्रास होत असल्याने हे वाइनचे दुकान बंद करण्यात यावे, यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. १५ दिवसांपूर्वी म्हसरूळ पोलिस ठाण्यात या दुकानाविरोधात निवेदनही देण्यात आले होते.

--

आज होणार बैठक

या दारू दुकानाच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आज, सोमवारी (दि. १७) रोजी सकाळी ११ वाजता म्हसरूळ पोलिस ठाण्यात बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमका कोणता निर्णय होतो, याकडे परिसरातील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गाची चाळण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाशिक-पुणे महामार्गाची सिन्नर फाटा परिसरात अक्षरशः चाळण झाली आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालविताना वाहनचालक प्रचंड त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे या परिसरात काही काळापूर्वीच रस्तादुरुस्ती करण्यात आली होती.

सिन्नर फाटा येथील हनुमान मंदिरालगत नाशिक-पुणे महामार्गाची मोठी वाताहत झाली आहे. महामार्गावरील डांबराचा थर उखडल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने खड्डे निर्माण झाले आहेत. या ठिकाणच्या खड्ड्यांची काही दिवसांपूर्वी तात्पुरती डागडुजीही करण्यात आली होती. मात्र, खड्डे दुरुस्तीचे काम अत्यंत सुमार दर्जाचे झाल्याने त्यानंतर झालेल्या पहिल्याच पावसात या ठिकाणचे खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. या खड्ड्यांतील बारीक खडी महामार्गावर विखुरली गेल्याने या ठिकाणाहून वाहने चालविणे धोकादायक झाले आहे.


येथे वाढलाय धोका

महामार्गावरील सिन्नर फाट्याशिवाय चेहेडी शिव, निसर्ग लॉन्स व एकलहरे टी पॉइंट येथेही महामार्ग उखडला आहे. या ठिकाणी महामार्गावर मोठ्या संख्येने खड्डे पडले आहेत. साइडपट्ट्याही उखडल्या आहेत. या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातून येणारे रस्ते महामार्गाला जोडलेले असल्याने स्थानिक नागरिकांची येथून मोठ्या संख्येने ये-जा सुरू असते. मात्र, येथेच मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.


दुरुस्तीचे साहित्य वाऱ्यावर

सिन्नर फाटा येथे महामार्ग दुरुस्तीचे साहित्य गेल्या काही दिवसांपासून पडून आहे. परंतु, या साहित्याचा अद्यापही वापर झालेला नाही. महामार्ग रुंदीकरणाचे काम करणाऱ्या चेतक कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी महामार्गाच्या या दुरवस्थेप्रश्नी तत्काळ लक्ष घालावे व महामार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांसह वाहचालकांकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतीक्षा, तू शिकून खूप मोठी हो!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘शिक्षण क्षेत्रातील कार्य खूप जवळून बघितले असल्याने विद्यार्थ्यांना काय अडचणी येतात हे मला माहीत आहे. त्यातही प्रतीक्षासारख्या एखादीने डॉक्टर व्हायचेय, इंजिनीअर व्हायचेय अशा पारंपरिक वाटेने न जाता देशाची सेवा करण्याची वाट निवडलीय. या वाटेवर तिला कोणतीही अडचण येऊ नये अशी माझी इच्छा असल्याने मी तिला सखोल मार्गदर्शन करायला तयार आहे.’ हे शब्द आहेत इंदिरानगर येथील देविदास परांजपे यांचे.

‘मटा’ हेल्पलाइनच्या मुलांना रोजच आशीर्वाद देणारे हात वाढत आहेत. पैकी काही जण या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी मार्गदर्शन करण्याची इच्छा दाखवतात. देविदास परांजपे त्यापैकीच एक. अत्यंत प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीशी झगडत दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या या विद्यार्थ्यांचा प्रवास आर्थिकदृष्ट्या सुकर व्हावा, यासाठी त्यांनी मदत केली आहेच, परंतु देशसेवेसारखी हटके वाट चोखाळताना प्रतीक्षा गायकवाड या मुलीला व तिच्यासोबतच इतरांना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्याची तयारी परांजपे यांनी दाखवली आहे. वाचकांच्या सत्प्रवृत्तीला साद घालत ‘मटा’ने हाती घेतलेल्या हेल्पलाइनच्या उपक्रमात प्रत्येक वर्षी सहभागी होत असलेले परांजपे यापूर्वी मुंबई ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या हेल्पलाइनमध्ये सहभागी होत असायचे. तेथे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली आहे. मात्र, नाशिकला स्थायिक झाल्यानंतर चौकशी करून या उपक्रमात सहभाग घेतला.

परांजपे यांच्यासारखे सुजाण पालक ‘मटा’च्या कार्यालयात येतात व या मुलांना मदत करतात. ‘मटा हेल्पलाइन’चा हा उपक्रम म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. तो ओढण्यासाठी आणखी दानशूर हातांची गरज आहे. हेल्पलाइनसाठी निवडलेल्या गौरी जाधव, आदित्य नाईक, सोनिका चिंचोले, पूजा सांगळे, सचिन गांगुर्डे, धनश्री राजोळे, प्रतीक्षा गायकवाड, दीपाली वरघडे, सोनाली कुंवर, आदित्य जाधव या दहा जणांविषयी ‘मटा’त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांचे पालकत्व स्वीकारण्यासाठी अनेक जण तयार असले तरीही हेल्पलाइनच्याच माध्यमातूनच त्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याला ‘मोकळी’ वाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, गंगापूररोड

महापालिकेने जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेंतर्गत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी शहरात मुख्य रस्त्यांसह गरजेच्या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून स्वतंत्र पाइपलाइन टाकलेल्या आहेत. परंतु, या पाइपलाइनमध्ये पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी व्यवस्थाच नसल्याने रस्त्यांवरून वाहणारे पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अशी व्यवस्था करणार तरी कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक स्रोतही नाहिसे झालेले आहेत. यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

जवाहलाल नेहरू पुनरुत्थान योजनेंतर्गत तत्कालीन बहुतांश नगरसेवकांनी आपल्या प्रभागात पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी पाइपलाइन टाकण्याची मागणी केली होती. महापालिकेनेदेखील मुख्य रस्त्यांवर, तसेच गरजेच्या ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पाइपलाइन टाकल्या होत्या. परंतु, या पाइपलाइनमध्ये पावसाचे पाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्थातच केली गेली नसल्याने पाणी रहिवासी भागात अनेकांच्या घरात पाणी शिरत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे त्यासाठीचा कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेल्याचा आरोप होत आहे.

--

तातडीने करावी उपाययोजना

नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून विविध ठिकाणी रस्त्यांवरून वाहणारे पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी महापालिकेने टाकलेल्या पाइपलाइनमध्ये पाणी जाण्याची व्यवस्थाच नसल्याने रस्ते जलमय होत आहेत. त्यामुळे अशा पावसाळी पाइपलाइनमध्ये पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था महापालिकेने तातडीने करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

--

महापालिकेने टाकलेल्या पावसाळी पाइपलाइनमध्ये पावसाचे पाणी जाण्यासाठी व्यवस्थाच केली नसल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी या पाइपलाइनमध्ये वाहून जाण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे.

-नितीन बोरसे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडगाव पोस्ट ऑफिस वाऱ्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

आडगाव परिसरात गेल्या काही वर्षांत शाळा, कॉलेजेस, प्रशासकीय कार्यालये, नववसाहतींमुळे आडगाव शिवाराची लोकसंख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. पण, येथे छोट्या गावाचा विचार करून उभारण्यात आलेले पोस्ट ऑफिस मात्र वर्षानुवर्षे तसेच असून, मूलभूत सोयी-सुविधांची तेथे वानवा असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात ‘मटा’ने गतवर्षी वृत्त प्रसिद्ध केल्यावर आडगाव पोस्ट ऑफिससाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली. मात्र, वाढत्या लोकसंख्येला अनुसरून सर्व सुविधांयुक्त पोस्ट ऑफिस कधी सुरू होणार, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.

आडगाव परिसराचा जसा विकास होत गेला, तसा पोस्ट ऑफिसचा झालेला दिसत नाही. अजूनही येथील पोस्ट ऑफिसला हक्काची जागा नाही. त्यामुळे खासगी जागेतून कारभार चालविला जात आहे. ही जागा अपुरी पडत असल्याने कर्मचाऱ्यांनादेखील बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे जमा झालेले टपाल वेगळे करणे, कार्यालयात आलेल्या लोकांचे टपाल घेणे यांसारख्या कामांसंदर्भात अडचणी निर्माण होत आहेत.

मुंबई-आग्रा महामार्ग विस्तारीकरणामुळे नवीन वसाहतींचे आणि कार्यालायचे अंतर खूप वाढले आहे. त्यामुळे स्मार्ट होणाऱ्या नाशिक शहराबरोबर आडगावचे पोस्ट ऑफिस स्मार्ट कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

--

लोकसंख्या वाढूनही दुर्लक्ष

पूर्वी आडगाव शिवाराच्या तीन हजार लोकसंख्येचा विचार करून आडगावात ऑफिस सुरू केले होते. पण, आज आडगाव शिवाराची लोकसंख्या ६०-७० हजारांपेक्षा जास्त आहे. शिवाय या परिसरात शैक्षणिक संस्थादेखील मोठ्याप्रमाणात विकसित झालेल्या असून, ग्रामीण पोलिस मुख्यालय, समाजकल्याणचे एक हजार मुलांचे वसतिगृह, तसेच अनेक प्रशासकीय कार्यालये या परिसरात आहेत. त्याचप्रमाणे कोणार्कनगर १, २, ३, श्रीरामनगर, शरयू पार्क, सागर व्हिलेज, समर्थनगर, कर्मयोगीनगर, जत्रा हॉटेल परिसर अशा नवीन वसाहतीही आहेत. सोबतच आडगाव गावठाण व मळे परिसर, ट्रक टर्मिनस एवढ्या मोठ्या परिसरासाठी येथे पोस्टाचे एकमेव ब्रँच ऑफिस आहे.

--

कर्मचारी संख्या अपुरी

आडगाव शिवारात रहिवासी भाग वाढत असतानाही पोस्ट कार्यालय व कर्मचारी पूर्वीएवढेच आहेत. पोस्टात कर्मचारी, अधिकारी व पोस्टमनची संख्या कमी असल्याने अनेकदा महत्त्वाचे दस्तावेज वेळेवर पोहोचत नाहीत, त्यामुळे गैरसोय सहन करावी लागत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात आडगाव पोस्ट ऑफिसमध्ये विचारणा केली असता एक वाजेपर्यंत सर्व नोंदणी हाताने केली जाते. आमच्याकडे कम्प्युटरदेखील नाही. आज कार्यालयात चार-चार कर्मचारी आहेत, त्यांची नेमणूकदेखील फक्त चार तासांची आहे, तरी बऱ्याचदा ते जास्त वेळ काम करतात. एवढ्या मोठ्या परिसराचा विचार करता सर्व्हिस ऑफिस होणे गरजेचे आहे किंवा आडगाव शिवाराचा काही भाग पंचवटीला जोडणे गरजेचे आहे, तेव्हाच कामात गतिमानता येईल, असे संबंधितांनी सांगितले.

---

आडगाव परिसराचा वाढता विस्तार पाहता आडगाव पोस्ट ऑफिस कार्यालय छोटे पडत आहे. त्यामुळे परिसराच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय होणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव पाठविलेला असून, त्यासाठी पाठपुरावा करू.

-सुरेश खेताडे, नगरसेवक

--

आडगाव परिसराची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. पोस्ट ऑफिसमध्ये सर्व सुविधा नसल्याने बऱ्याचदा पंचवटी, सीबीएस येथे जावे लागते. त्यामुळे आडगाव परिसराच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध करून नवीन प्रशस्त कार्यलय होणे गरजेचे आहे.

-रामभाऊ जाधव, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचा जोर ओसरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेले काही दिवस धुव्वांधार बरसणाऱ्या पावसाचा जोर रविवारी ओसरला. जिल्ह्यात दिवसभरात केवळ ९२.३ मिलीमीटर पाऊस झाला असून, निम्म्या तालुक्यांमध्ये काल पावसाने दांडी मारली.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील न‌िम्म्या तालुक्यांवर वरुणराजाने कृपादृष्टी कायम ठेवली आहे. शक्यतो रात्रीच पावसाचे जोरदार आगमन होत असल्याने जनजीवनावरही यंदा फारसा परिणाम झालेला नाही. या पावसामुळे धरणांमधील पाणीपातळी वाढण्यासही मोठी मदत झाली आहे. जिल्ह्यात चालू हंगामात आतापर्यंत सात हजार ४९५.३ मिल‌िमीटर एवढा पाऊस‌ झाला आहे. शनिवारी सकाळी आठ ते रविवारी सकाळी आठ या २४ तासांमध्ये जिल्ह्यात ५३२.२ मिल‌िमीटर पावसाची नोंद झाली. पेठमध्ये १६२ मिमी, तर इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये अनुक्रमे ७८ आणि ६६ मिमी पाऊस झाला.

सकाळनंतर पावसाचा जोर अधिकच ओसरला. पावसाच्या हलक्या सरींनी जिल्ह्यात हजेरी लावली. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या नऊ तासांमध्ये जिल्ह्यात ९२.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये अवघा १० आणि आठ मिमी पाऊस पडला आहे. दिवसभरातील सर्वाधिक २५.४ मिमी पाऊस‌ सुरगाणा तालुक्यात झाला असून पेठ तालुक्यात १९.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पाच तालुके पूर्णत: कोरडे

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा यांसारख्या तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस असताना जिल्ह्यातील काही तालुके अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. रविवारी दिवसभरात चांदवड, मालेगाव, बागलाण, देवळा आणि नांदगाव या तालुक्यांमध्ये पावसाचा थेंबही पडला नाही. येवला आणि सिन्नर तालुक्यांमध्ये अवघा एक मिल‌िमीटर पाऊस पडला आहे. निफाड, नाशिक आणि कळवण या तालुक्यांमध्येही पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली.

रविवारी सायंकाळी पाच पर्यंतचा पाऊस

तालुका पाऊस (मिमी)

सुरगाणा २५.४

पेठ १९.२

इगतपुरी १०

दिंडोरी ९

त्र्यंबकेश्वर ८

कळवण ८

नाशिक ५.५

निफाड ५.२

येवला १

सिन्नर १

देवळा ०

नांदगाव ०

चांदवड ०

मालेगाव ०

बागलाण ०

एकूण ९२.३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावली, कडवा धरणे भरणार

$
0
0

इगतपुरी तालुक्यात सरासरीच्या ५० टक्के पाऊस

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. तर भावली व कडवा ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, सततच्या पावसामुळे या तालुक्यात रविवारअखेर एकूण सरासरीच्या ५० टक्के पाऊस झाल्याची माहिती आकडेवारी वरुण स्पष्ट होते.

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस या तालुक्यात होत असल्याने या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग मराठवाडा या परिसराकडे अर्थात जायकवाडीकडे करण्यात येत आहे. गेल्या पाच दिवसांपासून हजारो क्युसेस पाणी दारणा धरणातून विसर्ग होत आहे. दारणा धरणात भाम, वाकी, भावली या नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात संचित होत असल्याने आजमितीस ७६ टक्के साठवण करून उर्वरित पाणी प्रशासनाच्या आदेशानुसार विसर्ग करण्यात येत आहे.

या तालुक्यातील दारणा धरणाबरोबरच भावली, कडवा, वैतरणा ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. तर मुकणे धरणातही समाधानकारक साठा निर्माण झाला आहे. येत्या एक-दोन दिवसांत भावली धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. इगतपुरी तालुक्यात पाऊस गेल्या चार दिवसांपासून शंभर मिलीमीटरांवर आकडे गाठत असून, रविवारीही चोवीस तासात ९८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात एकूण १७१७ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

शेतीकामाला सुरुवात

दिंडोरी : दिंडोरी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरूच असून धरणसाठ्यात वाढ झाली आहे. पश्चिम भागात भाताची अावणी तर पूर्व भागात टोमॅटोसह इतर भाजीपाल्याच्या लागवड सुरू आहे. भात, नागली, वरई या पिकांना जीवदान मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेतन करारानंतरच निवडणूक!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिकची मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतील वेतनवाढ कराराची बोलणी सुरू असल्याने महिंद्रा एम्प्लॉइज युनियनच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनाच एकमताने मुदतवाढ देण्यात आली आहे. वेतनवाढीचा करार होईपर्यंत आहे तीच कमिटी कायम ठेवण्याचा ठराव कामगारांनी दादासाहेब गायकवाड सभागृहातील वार्षिक सभेत मंजूर केला. विरोधकांनी मात्र नियमानुसार एम्प्लॉइज युनियनची त्रैवार्षिक निवडणूक घेणे गरजेचे होते, असे सांगितले. सत्ताधाऱ्यांनी वेळेत वेतनवाढीचा करार केला नसून, कामगारांना वेठीस धरल्याचाही आरोप केला. सभेत काही वेळा गोंधळही झाला. परंतु, तो लगेचच निवळला.

युनियनचे अध्यक्ष योगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी ही वार्षिक सभा झाली. महिंद्राच्या कामगारांनी, वेतनवाढीचा करार करा नंतरच त्रैवार्षिक निवडणूक घ्या, असा पवित्रा घेतल्याचे अनेकांनी स्वागत केले. विरोधकांनी मात्र त्यावर टीका केली.

दरम्यान, वेतनवाढ करार ४ एप्रिल २०१७ रोजी संपुष्टात आला होता. त्यानंतर महिंद्रा व्यवस्थापन व युनियन यांच्यात १० ते १२ बैठकाही या करारासाठी झाल्या. परंतु, त्यात सकारात्मक मार्ग निघू शकला नाही. त्यातच येत्या १७ जुलै रोजी युनियनचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यानंतर १८ जुलै रोजी निवडणूक घ्यावी लागणार होती. त्यासाठी युनियनच्या वार्षिक सभेत अध्यक्ष चव्हाण यांनी वेतनवाढीचा करार करायचा, की निवडणूक घ्यायची असा विषय कामगारांसमोर मांडला. बहुतांश कामगारांनी अगोदर वेतनवाढीचा करार करा, त्यानंतर निवडणूक घ्या, अशी मागणी केली. त्यामुळे वेतनवाढीचा करार होईपर्यंत युनियनच्या पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा ठराव संमत करण्यात आला. मुदतवाढ दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी वेळेत वेतनवाढीचा करार न केल्यास वाद होण्याची शक्यता असल्याचे विरोधकांनी सांगितले. सभेला युनियनचे सरचिटणीस सोपान शहाणे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव परशुराम कानकेकर, सहसचिव लॉरेन्स भंडारी, खजिनदार ज्ञानेश्वर पाटील, सदस्य सुनील अवसरकर, डी. के. भोई यांच्यासह हजारो कामगार उपस्थित होते.

--

हजारो कामगारांनी एकमताने वेतनवाढीच्या करारासाठी युनियनच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना एकमताने मुदतवाढ दिली आहे. पुढील काही महिन्यात निश्चितच चांगली वेतनवाढ देण्याचा प्रयत्न राहील.

-योगेश चव्हाण, अध्यक्ष, महिंद्रा एम्प्लॉइज युनियन

--

कायद्यानुसार दिलेल्या मुदतीत निवडणूक होणे गरजेचे आहे. कमिटीला मुदतवाढ मिळाल्याने त्यांनी तत्काळ वेतनवाढ करार करणे महत्त्वाचे ठरेल. अन्यथा त्यांना कामगारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

-शिरीष भावसार, माजी अध्यक्ष, महिंद्रा एम्प्लॉइज युनियन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मविप्र’तील घराणेशाही संपवा

$
0
0

विरोधक आक्रमक; निवडणुकीचा बिगूल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सध्या सत्ताधाऱ्यांच्या चाललेल्या स्वैर कारभारामुळे एकाच कुटुंबाच्या दावणीला मराठा विद्या प्रसारक समाज ही शतकापासून मोठे शैक्षणिक योगदान देणारी संस्था बांधली गेली आहे. सद्यःस्थितीत १९७५सारखे आणीबाणीचे वातावरण संस्थेत आहे. येथे सुरू असलेली दडपशाही, भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपविण्यासाठी सभासदांनी साथ द्यावी, असे आवाहन मविप्र सभासदांच्या सहविचार सभेत संस्थेचे विद्यमान सभापती अॅड. नितीन ठाकरे आणि विद्यमान अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे यांनी केले.

मविप्रचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसाद मंगल कार्यालयात विरोधी गटाच्या वतीने सभासदांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाकरे व सोनवणे यांनी उपस्थित सभासदांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद नामदेव ठाकरे होते. समवेत अॅड. नितीन ठाकरे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, दिलीप मोरे, बी. बी. मोगल, बाळासाहेब कोल्हे, डॉ. विलास बच्छाव, मोहन पिंगळे, अशोक चव्हाण, अशोक बच्छाव, विश्राम निकम, नारायण कोर आदी उपस्थित होते.

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी शिक्षणसंस्था असलेल्या मराठा विद्याप्रसारक संस्‍थेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपणार आहे. १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणूक प्रक्र‌ियेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेतील नाराज सभासदांच्या गटाने निवडणुकीदरम्यान दिशा ठरविण्यासाठी सहविचार सभेचे रविवारी आयोजन केले होते. यावेळी नाराज सभासदांमधून सत्ताधाऱ्यांवर घणाणाती आरोप करण्यात आले.

यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे म्हणाले, ‘संस्थेचे खरे हित जोपासणाऱ्या सभासदांना सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने हेतूपुरस्सर डावलले जाते. एकाच कुटुंबाच्या दावणीला ही संस्था बांधली जात असून, परिणामी १९७५ सारखी आणीबाणी संस्थेत लादली गेली आहे. येथे केवळ भ्रष्टाचाराला थारा दिला जात असून, खुनशी पद्धतीचे राजकारण केले जाते. मुख्य धोरणांपासून संस्था भरकटत आहे. हा धोका लक्षात घेऊन सभासदांनी निवडणुकीत अत्यंत सावध राहून संस्थेच्या हिताचा विचार करावा, असे आवाहन सोनवणे यांनी केले.

मविप्रचे विद्यमान सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे म्हणाले, ‘संस्थेचा कारभार पारदर्शी राह‌िलेला नाही. संस्थेत चालणाऱ्या चुकीच्या मुद्द्यांवर बोलू पाहणाऱ्या लोकांना हुकुमशाहीने येथे दडपले जाते. संस्थेचे यश आणि कारभार हा व्यक्तिकेंद्रीत करण्याचा प्रयत्न येथे सुरू असून गेल्या काही महिन्यांत सत्ताधाऱ्यांना मिळालेले पुरस्कार हे विकत घेतले गेले आहेत. हे केवळ व्यक्त‌िगत स्वार्थातून सुरू आहे’, असा घणाणाती आरोप अ‍ॅड. ठाकरे यांनी केला.


वेळेअगोदर निवडणूक?

संचालक मंडळाचा कार्यकाळ संपण्यास अद्याप दोन महिन्यांचा अवधी शिल्लक असताना इतक्या लवकर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची घाई सत्ताधाऱ्यांनी प्रतिस्पर्धी बेसावध रहावेत, याचसाठी केली असल्याची टीका यावेळी डॉ. विलास बच्छाव यांनी केली. डॉ. बच्छाव यांनी संस्थांतर्गत कारभारावर बोट ठेवत सभासदांना मिळणारी अयोग्य वागणूक, सत्ताधाऱ्यांची एकाधिकारशाही आदी मुद्द्यांकडे अंगुलीनिर्देश केला.

१३ ऑगस्टला मतदान

मविप्रच्या सन २०१७ ते २०२२ या कालावधीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी संस्थेच्या घटनेनुसार निवडणूक मंडळाची निर्मिती करण्यात आली असून, १३ ऑगस्ट रोजी मतदान आणि १४ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रचार प्रणालीव्दारे व्यूहरचनेस सुरुवात झाली आहे. या निवडणूकीसाठी करण्यात आलेल्या रचनेत निवडणूक मंडळाच्या अध्यक्षस्थानी अॅड. भास्करराव चौरे, सचिवपदी डॉ. डी. डी. काजळे, सदस्य अॅड. बाकेराव बस्ते आणि सदस्य अॅड. रामदास खांदवे यांचा समावेश आहे. संस्थेचे १० हजार १७६ सभासद आहेत. निवडणूक मंडळाच्या झालेल्या बैठकीत मतदार याद्या अंतीम करण्यासंदर्भात चर्चा झाली.

निवडणूक कार्यक्रम :

_ उमेदवारी अर्ज वाटप : २१ ते २७ जुलै

_ अर्ज स्वीकृती : २३ ते २७ जुलै

_ अर्जांची छाननी : २८ जुलै

_ लवादाकडे अपिलाची मुदत : २८ जुलै ते २९ जुलै

_ लवादाच्या निर्णयाची मुदत : ३१ जुलै (दुपारी ३ वाजेपर्यंत )

_ उमेदवारी माघारी अंत‌िम तारीख : ३ ऑगस्ट

_ अंतिम उमेदवार यादी प्रसिध्दी : ३ ऑगस्ट

_ निवडणूक चिन्ह वाटप : ३ ऑगस्ट

_ मतदान : १३ ऑगस्ट

_ मतमोजणी : १४ ऑगस्ट

_ निकाल : १४ ऑगस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रामाणिक रिक्षाचालकांची दखल!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतुकीचे नियम पाळून पोलिसांसह सर्वसामान्य नागरिकांना मदत करणाऱ्या रिक्षाचालकांना पोलिसांकडून बक्षीस दिले जाणार आहे. एवढेच नाही तर अशा रिक्षाचालकांची यादी बनवून त्यांचे मोबाइल क्रमांक पोलिस आपल्या वेबसाइटवर टाकणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.

शहरात १५ ते २० हजार रिक्षा असून, अनेकदा रिक्षाचालकांच्या अरेरावीची ओरड होत असते. मात्र, यात काही चांगले रिक्षाचालकदेखील आहेत. अगदी प्रवाशांचे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने रिक्षाचालकांनी परत केले आहेत. काही बेशिस्त तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सहव्यावसायिकांमुळे प्रामाणिक रिक्षाचालकांना त्रास होतो. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी अभिनव योजना पुढे आणली असून, प्रामाणिक रिक्षाचालकांचा यापुढे सत्कार करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त सिंगल यांनी स्पष्ट केले. याबाबत सिंगल म्हणाले की, शहरातील प्रामाणिक, ग्राहकाभिमुख सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांची यादी बनवली जाणार आहे. या यादीत रिक्षाचालकाचा क्रमांक आणि राहण्याच्या ठिकाणाचा देखील उल्लेख असणार आहे. ही यादी पोलिस आपल्या वेबसाइटवर प्रसिध्द करणार आहेत. रात्री-अपरात्री रिक्षाची आवश्यकता असल्यास नागरिक थेट रिक्षाचालकाशी संपर्क साधू शकतील. यामुळे प्रामाणिक रिक्षाचालकांच्या रोजगारात वाढ होऊ शकते. तसेच नागरिकांच्या मनातदेखील सुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकेल. ही अभिनव संकल्पना लवकरच पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा सिंगल यांनी व्यक्त केली.

कारवाई सुरूच राहणार

बेशिस्त वाहनचालकांविरोधात सुरू झालेली कारवाई यापुढे कायम राहणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. संततधार पावसात कारवाई सुरू राहिल्यास वाहतुकीलाच अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पाऊस असल्यास कारवाई काहीशी थंडावते. शनिवारी शहर वाहतूक पोलिसांनी आरकेसह कॉलेजरोड परिसरात दुचाकीचालकांसह रिक्षा व्यावसायिकांची कसून तपासणी केली. ए, बी आणि सी पॉइंट ठरवून कारवाई केली जात असल्याचे सिंगल यांनी स्पष्ट केले.

टोईंगसाठी लवकरच नवीन यंत्रणा

यापूर्वी दिलेल्या वाहन टोईंगच्या ठेक्याची मुदत संपत आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी नवीन अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण होणार आहे. याबाबत पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले की, ही आधुनिक यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर रस्त्यावर पार्क होणाऱ्या चारचाकी वाहनांवर जलदगतीने कारवाई होणे शक्य आहे. दुचाकी उचलण्याची प्रक्रिया देखील जलद आणि सुकर होणार असून, यामुळे शहरातील रस्त्यांवर पार्क होणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना चाप बसणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाव आवारात सांडपाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गटारींतील सांडपाणी चक्क महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाच्या बाथरूममध्ये शिरले आहे. परिणामी नागरिकांना शॉवर न घेताच टँकमध्ये उतरावे लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अशी परिस्थिती असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरात शुक्रवारी व शनिवारी झालेल्या पावसाचा फटका सखल भागात असलेल्या सोसायट्यांना बसला. शिंगाडा तलाव, सिडको, सातपूर आदी ठिकाणी असलेल्या तळमजल्यांवरील घरांमध्ये गटारीचे पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले. अशीच परिस्थिती महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव परिसरातही झाली. या भागातून वाहणाऱ्या गटारींचे पाणी टॅँकच्या बाथरूममध्ये पसरल्याने स्वीमिंगसाठी येणाऱ्या नागरिकांना शॉवर न घेताच टॅँकमध्ये उतरावे लागत आहे. दोन दिवस जलतरण तलावाच्या गेटपासूनच तळे साचले होते. प्रवेश करताना वाट कशी काढायची, असा संभ्रम नागरिकांमध्ये होता. तिकीट काउंटरवर तिकीट घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत होती. जलतरण तलावाच्या आत प्रवेश करताच तेथेही मोठ्या प्रमाणात तळे साचले होते. बाथरूममध्ये घोट्याच्या वर पाणी असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली होती. आणखी जास्त पाऊस झाला असता, तर हे पाणी टॅँकमध्ये शिरण्याची शक्यता होती. सुदैवाने तसे झाले नाही. या ठिकाणी पोहोण्यासाठी वर्षाला साडेचार हजार रुपये फी आकारली जाते, त्या तुलनेत पुरेशा सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत. अनेक ठिकाणी शॉवर तुटलेले आहेत, तर काही ठिकाणी नळ नाही, अशा अवस्थेत नागरिकांना स्वीमिंगला जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत.

--

दुरुस्तीवेळी दुर्लक्ष का?

मध्यंतरी तरणतलाव दुरुस्तीसाठी काही काळ बंद ठेवण्यात आला होता. त्यावेळी गटारीची दुरुस्ती का केली नाही, असा सवाल पोहोण्यासाठी येणारे नागरिक विचारत होते. त्यावेळी टँकची दुरुस्ती केली गेली. मात्र, अशा प्रकारची कामे ठेवण्यात आली. महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या तरणतलावाचेच असे हाल होत असतील, तर नागरिकांच्या समस्यांची चर्चाच करायला नको, अशी भावनाही अनेकांनी व्यक्त केली.

--

दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने तरणतलाव परिसराला गटारगंगेचे स्वरूप आले होते. या ठिकाणची दुरुस्ती न केल्याने व पावसाळापूर्व कामे न केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. येथे तातडीने दुरुस्ती करावी.

-डॉ. अजिंक्य वाघ, नागरिक

--

दोन दिवसांपसून गोल्फ क्लबचे पाणी तरणतलाव परिसरात येत होते. परंतु, तातडीने ते थांबविण्यासाठी काम हाती घेण्यात आले आहे. आवारात असलेले सर्व ड्रेनेज साफ करण्यात येत आहेत.

-हरी सोनकांबळे, मुख्य व्यवस्थापक, तरणतलाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाईच्या पुढाकाराने अवनखेड झाले स्मार्ट

$
0
0

विभागीय स्तरावरील द्वितीय पुरस्कार जाहीर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डिजिटल अंगणवाडी, सीसीटीव्ही, ऑनलाइन दाखले वितरण, वायफाय, भव्य सभागृह, बांधलेला नदीघाट, ग्रामपंचायत इमारतीतील अभ्यागत कक्ष, सोलर पथदीप, वैकुंठ रथ यासारख्या सुविधा असणारे दिंडेारी तालुक्यातील अवनखेड खऱ्या अर्थाने स्मार्ट गाव ठरले आहे. कादवा नदीच्या काठावर वसलेल्या साधारण अठ्ठावीसशे लोकसंख्येच्या या गावात ४१४ कुटुंब असून, प्रत्येकाकडे वैयक्तिक शौचालय बांधलेले आहे. ग्रामपंचायतीच्या सुंदर इमारतीसमोर तेवढेच उत्तम प्रकारचे स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. सीएसआरमधूनदेखील लाभार्थींना वैयक्तिक शौचालये बांधून देण्यात आली आहेत. लोकसहभागामुळे गावात शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची सुंदर इमारत उभी राहत आहे.

या गावातील तरुण सरपंच नरेंद्र जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या पुढाकाराने गावाचा कायापालट झाला आहे. नागरिकांच्या मानसिकतेत झालेले परिवर्तन आणि गावाच्या विकासात वाढत्या लोकसहभागामुळे हे गाव संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात राज्यस्तरावर पोहोचले आहे. या अभियानांतर्गत विभागीय स्तरावरील द्वितीय पुरस्कार अवनखेडला जाहीर झाला आहे. गाव अस्वच्छता, गावातील अतिक्रमण आणि व्यसनाधिनतेने त्रस्त असताना स्वामी पद्मानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने गावात आमुलाग्र बदल झाला. त्यांनी गावाच्या विकासात प्रसंगी श्रमदान करून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले, गावाला पावित्र्याचा आणि मांगल्याचा मार्ग दाखविला.

नैसर्गिक उतारानुसार गावाच्या चारही बाजूस शोषखड्डे बनविण्यात येऊन त्यात गटारीचे पाणी जिरवण्यात आले आहे. स्थिरीकरण तळे बनविण्याचे कामदेखील हाती घेण्यात आले आहे. कचरा व्यवस्थापनासाठी सुला वाईनतर्फे सीएसआर निधीअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला कचराकुंडीचे वाटप करण्यात आले आहे. घंटागाडीद्वारे बुधवार आणि रविवारी कचरा संकलन करण्यात येते. कचरा साठवणुकीसाठी कंपोस्ट टाकी बनविण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी कचराकुंड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गाव स्वच्छतेसाठी शाळेतील विद्यार्थी आणि महिलांचा सहभागही विशेष असाच आहे. प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्यासाठी नळ कनेक्शन देण्यात आले असून, जलशुद्धीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील वस्तीवर दुहेरी सोलर पंप वापरून पाणीपुरवठ्याची सुविधा करण्यात आली आहे. या सर्व सुविधा असल्याने अवनखेड स्मार्ट गाव ठरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images