Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

खताच्या दुकानाला देवळ्यात आग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा येथील बाजार समितीच्या गाळ्यांमधील आनंद अॅग्रो या बियाणे व खतांच्या दुकानाला सोमवारी पहाटे आग लागली. या आगीत २५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शॉर्टसर्किटमुळे हा अपघात झाला.

बाजार समितीचे संचालक जगदीश पवार यांचे हे दुकान आहे. ते रविवारी रात्री आठ वाजता दुकान बंद केले. सोमवारी पहाटे तीन वाजता कळवण रस्त्यावरील संजय आहेर यांच्या घराकडे चोर आल्याचा संशयामुळे परिसरातील नागरिक सतर्क झाले होते. त्यातच बाजार समितीच्या गाळ्यांमध्ये आग लागल्याचे प्रदीप आहेर यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ देवळा पोल‌िस ठाण्यासह पवार यांनाही कळविले. पोल‌िस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन सटाणा अग्निशमन दलाला फोन बोलावून घेतले. तोपर्यंत परिसरातील नागरिकांनी खासगी टँकरच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. पहाटे साडेचार वाजता सटाणा येथील अग्निशमन बंब पोहोचले. तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर सकाळी साडेसात वाजता आग आटोक्यात आली. आगीत दुकानातील खतांसह जवळपास २५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनधिकृत होर्डिंग्ज जमीनदोस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जविरोधात धडक कारवाई सुरू केली असून, त्याअंतर्गत सोमवारी उत्तमनगर व पाथर्डी फाटा येथील तीन अनधिकृत होर्डिंग्ज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून जमीनदोस्त करण्यात आली.

महापालिकेच्या वतीने होर्डिंग्ज उभारण्यापूर्वी आवश्यक ती परवानगी घेणे गरजेचे असते. मात्र, शहरात अनेक होर्डिंग्ज हे विनापरवाना असल्याचे लक्षात आल्याने महापालिकेने हे होर्डिंग्ज हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी उत्तमनगर येथील अनधिकृत लोखंडी स्ट्रक्चर असलेले होर्डिंग हटविण्यात आले, तर पाथर्डी फाटा येथील दोन अनधिकृत लोखंडी स्ट्रक्चर असलेले होर्डिंग्ज हटविण्यात आले. यावेळी या होर्डिंग्जसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले.

दोन अतिक्रमण निर्मूलन पथकांनी जेसीबी व गॅस कटरच्या सहाय्याने ही होर्डिंग्ज जमीनदोस्त केली. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई झाली. ही मोहीम आयुक्त अभिषेक कृष्णा व किशोर बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त आर. एम. बहिरम यांच्या सूचनेप्रमाणे विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी राबविली. महापालिकेने सुरू केलेल्या या मोहिमेचे स्वागत होत असले, तरी सिडकोसारख्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणांबाबत महापालिका केव्हा पुढाकार घेणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

--

...तर कोणत्याही क्षणी कारवाई

महापालिकेने यापूर्वीच अनधिकृत होर्डिंग्ज उभारणीबाबत दंडात्मक कारवाईच्या नोटिसा दिलेल्या आहेत. दंडात्मक रक्कम भरून होर्डिंग्जसाठी नियमानुसार परवानगी घ्यावी अन्यथा महापालिका संबंधितांचे अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याची कारवाई कोणत्याही क्षणी करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या, तसेच पार्किंगच्या व सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांना त्यांची बेकायदेशीर व अतिक्रमित असलेली बांधकामे काढून घेण्याबाबतही यावेळी आवाहन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगावातून दानपेटी चोरीस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

शहरात घरफोड्यानंतर चोरट्यांनी आता मंदिरांना लक्ष केले आहे. शनिवारी पहाटे शहरातील शिवाजीनगर भागातील शनीमंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आले असले, तरी सोमवारी निफाड रोडवरील रानमळ्यातील कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेटीच चोरट्यांनी लंपास केली आहे.

गेल्या दीड-दोन वर्षांपासून मंदिरातील दानपेटी उघडण्यात आलेली नव्हती. त्यामुळे दानपेटीत अंदाजे पंधरा ते वीस हजार रुपये असतील, असा अंदाज परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केला आहे. गेल्या महिनाभरापासून पिंपळगाव बसवंत शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच गेल्या दोन दिवसात दोन मंदिरांची दानपेटी फोडण्यात आल्याची घटना घडली आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदे, मोरुस्कर कार्यक्षम नगरसेवक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सिटीझन फोरमच्या वतीने सन २०१५ ते २०१७ या कालावधीसाठीचे कार्यक्षम नगरसेवक पुरस्कार भाजपचे संभाजी मोरुस्कर आणि शिवसेनेच्या विलास शिंदे यांना जाहीर करण्यात आले आहेत. तर राष्ट्रवादीचे विक्रांत मते आणि सुफ‌ी जीन यांची विशेष उल्लेखनीय (बेस्ट प्रॅक्टीसेस अॅवार्ड) पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या बुधवारी (दि. १९) नाईस संकुल येथे विभागीय आयुक्त महेश झगडे आणि आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती फोरमचे अध्यक्ष सुनील भायभंग आणि निवड समितीचे अध्यक्ष अॅड. नंदकिशोर भुतडा यांनी दिली आहे.

शहराच्या विकासासाठी सक्षम लोकप्रतिनिधी निवडले जावेत यासाठी नाशिक सिटीझन फोरमच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून मतदार जनजागृतीचे काम केले जात आहे. या अभियानाचा भाग म्हणून चांगले काम करणाऱ्या नगरसेवकांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. नगरसेवक म्हणून उत्तम कामगिरी करणाऱ्या नगरसेवकांच्या निविडीसाठी ज्येष्ठ विधीज्ज्ञ नंदकिशोर भुतडा यांच्या अध्यक्षतेखआली निवड समिती गठित करण्यात आली होती. ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर, संजय पाठक, मोहन रानडे यांच्या समितीने १२२ नगरसेवकांच्या कामांचे अवलोकन केल्यानंतर निवड केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यातील कुख्यात गुंड गुड्ड्याचा खून

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । धुळे

धुळ्यातील कुख्यात गुंड गुड्ड्याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. धुळे शहरातील कराचीवाला चौकात असलेल्या गोपाल टी समोर आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. टोळी युद्धातून हा खून झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेनं खळबळ माजली आहे. गुड्ड्यावर धुळे पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तीन दिवसांपूर्वीच तो पोलीस कोठडीत होता. तिथून सुटल्यानंतर लगेचच त्याच्यावर हल्ला झाला. घटनास्थळी काही काडतूस पोलिसांना मिळाले आहेत. तिथं असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीतून पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं लवकरच मारेकऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निराधारांना मिळणार अनुदानाचा आधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे एप्र‌िलपासूनचे थकीत अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनुदान वाटपासाठीचा निधी सरकारने मंजूर केला असून, बिल‌िंगची कार्यवाही पूर्ण होताच हे अनुदान लाभार्थींच्या बँक खात्यांवर जमा केले जाणार आहे. चारही महिन्यांचे अनुदान एकदम मिळणार असल्याने अपंग, अंध व तत्सम लाभार्थींना मोठा दिलासा मिळणार आहे.

संजय गांधी निराधार योजनेचे जिल्ह्यात या योजनेचे २३ हजार ८१४ लाभार्थी आहेत. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून या लाभार्थींना अनुदानच मिळालेले नाही. सरकारकडून अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे बिल‌िंगची प्रक्रिया पूर्ण झाली की लगेचच अनुदान तहसील लाभार्थींच्या खात्यात वर्ग केले जाईल.

आधारकार्ड गरजेचे

लाभार्थींची नाशिक जिल्हा सहकारी बँकेत खाती आहेत. परंतु, त्यांना देण्यात येणारे अनुदान राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यांमध्ये वर्ग करण्याचा धोरणात्मक निर्णय झाला आहे. त्यामुळे लाभार्थींचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असेल तर त्याची माहिती संबंधित तहसील कार्यालयाकडे द्यावी. खाते नसल्यास बँकेत खाते उघडावे, असे आवाहन तहसीलदार देवगुणे यांनी केले आहे.


अनुदान मिळण्यास विलंब झाला ही वस्तुस्थ‌िती आहे. परंतु, सरकारने अनुदान मंजूर केले असून, लवकरच हे अनुदान तहसीलदारांमार्फत लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होईल.

- अभिलाषा देवगुणे, तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात गुंडाची हत्या

$
0
0

गोळ्या घालून आणि तलवारीने वार; सीसीटीव्हीची मदत घेणार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील कुख्यात गुंड रफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्या याचा मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जुना आग्रा रोडवरील चहाच्या दुकानासमोर बंदुकीच्या गोळ्या घालून आणि तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी चहाच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजची मदत घेतली जात आहे.

रफियोद्दीन शेख जुना आग्रा रोडवरील गोपाल टी हाऊस येथे सकाळी चहा पिण्यासाठी आला होता. इंडिका कारमधून आलेल्या पाच ते सहा जणांनी रफियोद्दीनला चहाच्या दुकानातून बाहेर ओढून नेले. त्याच्यावर गावठी कट्ट्याने गोळ्या झाडल्या तसेच हल्लेखोरांपैकी काही जणांनी त्याच्यावर तलवारीने वार केले. क्षणात सफियोद्दीन जमिनीवर कोसळला. या घटनेचे वृत्त सोशल म‌ीडियावरून शहरात व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली. अनेकांनी संबंधित चहाच्या दुकानाजवळ गर्दी केली. पोलिस उप अधीक्षक हिंमत जाधव, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक रमेश परदेशी, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल वडनेरे कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांना हटविले. दरम्यान सफियोद्दीनची हत्या जुने धुळेमधील विक्की शाम गोयर, राजेंद्र रमेश देवरे, भिमा रमेश देवरे, दादू रमेश देवरे, शाम गोयर, विलास शाम गोयर, विजय शाम गोयर यांच्यासह अन्य त‌ीन ते चार जणांनी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणी त्यांच्याविरूद्ध शहर

पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

तपासासाठी पाच पथके

पोलिसांनी चहाच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज घेतले असून संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच तपास पथक रवाना झाली आहेत. आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इस्त्रायलची शैली तंत्रज्ञानाने सुकर

$
0
0

नरहरी कुलकर्णी यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्याला इस्त्रायलकडून खूप शिकण्यासारख्या बाबी असून, प्रतिकूल परिस्थितीत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जीवनशैली सुकर कशी बनवावी याचे मूर्तिमंत उदाहरण इस्त्रायल असल्याचे प्रतिपादन भारतातील इस्त्रायलचे मित्र व इस्त्रायलच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित नरहरी कुलकर्णी यांनी केले. ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल अर्थातच ‘बीबीएनजी’च्या ग्रेट भेट या कार्यक्रमात उद्योजकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कुलकर्णी पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर रशियाचा पगडा असलेल्या भारतीय अर्थव्यवस्था आपल्या पायावर उभे राहण्याकरिता प्रयत्न करीत होती. भारतीय उद्योजक जगातील विविध देशांकडून तंत्रज्ञान व कच्चा माल मिळवण्याकरिता प्रयत्न करत होते. इस्त्रायलला भारत, रशिया व आखाती देशांनी अधिकृत मान्यता दिली नव्हती; परंतु १९७२ च्या सुमारास इस्त्रायलमध्ये असलेल्या मृत समुद्रातून ब्रोमिन या रसायनाचे उत्पादन विकण्यासाठी इस्त्रायल जागतिक बाजारपेठ शोधात होता. त्यादरम्यान म‌ी केमिकल व्यवसायात होतो. मी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे अधिकृत मान्यता नसलेल्या इस्त्रायलला भारतीय बाजारपेठ उपलब्ध करून दिली तेव्हापासून ते अधिकृत मान्यता मिळेपर्यंत माझे कार्यालयच इस्त्रायलचे भारतातील कार्यालय होते, असेही कुलकर्णी म्हणाले.

संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी ब्राह्मणांच्या व्यावसायिक प्रगतीमध्ये भारतातील १६ शहरे व दुबईमध्ये कार्यरत बीबीएनजीबाबत माहिती दिली. मधुरा कुंभेजकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला मुकुंद कुलकर्णी, विराज लोमटे, प्रमोद पुराणिक, महेश देशपांडे यांच्या समवेत अनेक व्यावसायिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयटीआय पुलावर कसरत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या आयटीआय पुलावर रोजच वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. त्यातच सध्या येथे पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अत्यंत वर्दळीच्या आयटीआय पुलाला समांतर पुलाची उभारणी होणार तरी केव्हा, असा सवाल स्थानिकांसह कामगारांनी उपस्थित केला आहे.

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या खुटवडनगर येथील आयटीआय पुलावर रोजच वाहतूक कोंडी होत असते. त्यातच पुलावर पावसाचे पाणी साचत असल्याने रात्रपाळीवरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना वाहने चालविताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. महापालिका आणि औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात एकमत होत नसल्याने समांतर पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. विशेष म्हणजे दररोज हजारो वाहने या पुलावर जे-जा करीत असल्याने भविष्यात अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवालही कामगारांनी उपस्थित केला आहे. या पुलावर सततच्या कोंडीने नागरिक त्रस्त असतानाच पावसाच्या पाण्याने पुलाचा एका बाजूकडील भाग ढासळल्याने अपघातही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका व एमआयडीसीने तत्काळ आयटीआय पुलाला समांतर पुलाची उभारणी करावी, अशी मागणी कामगार, तसेच वाहनचालकांनी केली आहे.

दरम्यान, प्रभाग २६ च्या नगरसेविका अलका आहिरे यांनी सिडकोकडे जाणाऱ्या आयटीआय पुलाला समांतर पुलाची उभारणी करावी, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना त्यांनी पत्रदेखील दिले आहे. महापालिका आयुक्तांनी कामगारांची मागणी लक्षात घेऊन आयटीआय पुलाला समांतर पूल उभारावा, अशी अपेक्षा कामगारांसह नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

--

एकमताअभावी रखडला पूल

येथे समांतर पूल बांधण्यासंदर्भात महापालिका आणि औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात एकमत होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आयटीआय पूल या अत्यंत वर्दळीच्या भागात समांतर पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. परिमाणी सिडको, सातपूर परिसरातील रहिवाशांसह येतून दररोज वावर असणाऱ्या हजारो कामगारांना गैरसोय सहन करावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत. येथील पुलासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडीबाबत तक्रारींचा सूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील प्रत्येक प्रभागात घंटागाड्या अनियमितपणे येत असून, नव्या निकषाप्रमाणे एकाही घंटागाडीत ओला व सुका कचरा टाकण्यासाठीची स्वतंत्र व्यवस्था ठेकेदाराने केली नसल्याच्या कारणावरून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, असा ठराव सिडको प्रभाग सभेत मंगळवारी करण्यात आला. सर्व सदस्यांनी केलेल हा ठराव आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याचे प्रभाग सभापती सुदाम डेमसे यांनी सांगितले.

सभापती डेमसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित प्रभाग सभेत सुरुवातीलाच नगरसेवक श्याम साबळे यांनी गेल्या आठवड्यात रस्त्यात शॉक लागून गायीचा मृत्यू झाल्याप्रकरणी नक्की जबाबदार कोण, याची शहानिशा करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. नगरसेवक मुकेश शहाणे यांनी पवननगरचा रस्ता किती दिवस बंद राहणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला. या रस्त्याच्या कामावेळी अनेकदा पाण्याच्या पाइपलाइन फुटल्या होत्या. त्यामुळे येथे केलेल्या कामाची नुकसानभरपाई ठेकेदाराकडून वसूल करण्यात आली की नाही, हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पवननगर रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या बिलातून ती रक्कम वजा करावी, अशी सूचना करण्याबरोबरच प्रभागात छोटी घंटागाडी का दिली जात नाही, असा सवाल करून आरोग्य अधिकारी कायम उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोपही शहाणे यांनी केला. यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांनी ठेकेदारावर दंडात्मक कारवाई सुरू असल्याचे सांगितले.

नगरसेवक तिदमे यांनी हाच विषय पकडून केवळ भोंगे लावून नागरिकांना आव्हान केले जात असले, तरी घंटागाड्यांत मात्र कचरा वेगळा टाकण्याची सोयच नसल्याचे निदर्शनास आणून दिले. घंटागाडी ठेकेदार हा ओला व सुका कचरा वेगळा का करीत नाही, असा सवाल करून संबंधित ठेकेदाराचा ठेकाच रद्द करण्याची मागणी तिदमे यांनी केली. यावेळी ठेकेदार एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे तिदमे यांनी सांगताच नगरसेवक शहाणे यांनी कोणत्याही पक्षाचे नाव घेऊ नका, आपण कारवाईसाठी ठराव करू, असे सांगितले.

नगरसेविका कल्पना पांडे यांनी कालिका पार्क येथील रो-हाउसमध्‍ये पावसाचे पाणी शिरून नागरिकांचे नुकसान होत असून, येथील पाणी काढण्याबरोबरच येथील रस्त्याचे काम करावे, अशी सूचना केली. शिवाजी चौकातील भाजीमार्केटचा प्रश्न उपस्थित करून येथील अर्धवट असलेल्या इमारतीच्या बिल्डर्सवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी विभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित बिल्डर भेटत नसून, नगररचना विभागाच्या वीतने काही कारवाई करता येते का याबाबत विचार सुरू असल्याचे सांगून एक महिन्यात कारवाई होईल, असे सांगितले.

नगरसेवक सुधाकर बडगुजर म्हणाले, की पवननगर येथे गायीचा मृत्यू झाला असून, ही घटना महापालिकेमुळे झाल्याचा आरोप वीज वितरण कंपनीने करणे चुकीचे आहे. घंटागाडी ठेक्याबाबतही विचार झाला पाहिजे, तसेच घंटागाडीच्या प्रश्नाबाबत सिडकोतील नगरसेवकांनी स्थायी समितीत आवाज उठविला पाहिजे.

सभेच्या अखेरीस सभापती डेमसे यांनी घंटागाडी ठेकेदारावर कारवाई करण्याबाबतचा ठराव तयार करण्यात आला असून, तो आयुक्तांकडे पाठवून कारवाई करण्याची मागणी करण्‍यात येणार आहे. सिडकोत चोवीस सदस्य असून, किमान चोवीस गाड्या या भागासाठी दिल्याच पाहिजेत, असे सांगून सदस्यांची कामे तातडीने करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.


यांनीही मांडल्या समस्या

यावेळी नगरसेविका प्रतिभा पवार, पुष्पा आव्हाड, किरण गामणे, संगीता जाधव, भाग्यश्री ढोमसे व कावेरी घुगे यांच्यासह नगरसेवक नीलेश ठाकरे, राकेश दोंदे, चंद्रकांत खाडे, भगवान दाेंदे, डी. जी. सूर्यवंशी यांनी आपापल्या प्रभागातील घंटागाड्यांचा प्रश्न, पथदीपांची दुरवस्था, उंटवाडी येथील स्मशानभूमीत सुरू असलेले डंपिंग व पाथर्डी फाटा येथील पाडण्यात आलेल्या सुलभ शैाचालयाबाबत, तसेच नाल्यालगत संरक्षक भिंत उभारण्याबाबतचे प्रश्न उपस्‍थित करून विविध सूचना केल्या.

आयुक्त दौऱ्यावरून नाराजी

महापालिका आयुक्तांनी सिडकोत दौरा करून पाहणी केली होती. त्यावेळी काही नगरसेवकांना याबाबत माहिती न मिळाल्याने सुरुवातीलाच नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. विभागीय अधिकाऱ्यांनी याबाबत यापुढे लक्ष दिले पाहिजे, तसेच नव्याने येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची ओळख नगरसेवकांना करून दिली पाहिजे, अशी सूचना करण्यात आली.

नगरसेवक मात्र त्रस्त!

अनेक वर्षे शासकीय सेवेत राहिलेले नगरसेवक चंद्रकांत खाडे यांनी ‘अधिकारी मस्त, नगरसेवक त्रस्त’ अशी सिडकोतील नगरसेवकांची अवस्था असल्याचे सांगितले. नगरसेवक मुकेश शहाणे यांनी सभागृहात अधिकारी तेल लावलेले पहिलवान आहेत तर आम्ही सर्व नगरसेवक बाहुबली आहोत अशी कोटी केल्याने तणावाच्या वातावरणातही सभागृहात हशा पिकला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अडचणी आल्या तरी शिक्षणाची जिद्द सोडू नका’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘सर्वप्रथम मला ‘मटा’ला धन्यवाद द्यावेसे वाटतात, की त्यांनी हे मदतकार्य उभारले. ज्यांना शिक्षणाची तळमळ आहे, त्यांना पैशांची कोणतीही अडचण येत नाही. ते देणारे असतातच. मात्र, या विद्यार्थ्यांनी शिक्षणाची जिद्द सोडू नये. शिक्षणाशिवाय विद्यार्थी जणू अंधच. त्यामुळे जे शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यासाठी परमेश्वर मार्ग मोकळे करतो हे नेहमी लक्षात ठेवावे’, हे शब्द आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रदीप राठी यांचे.

अत्यंत भरघोस अशी मदत त्यांनी या दहा विद्यार्थ्यांसाठी केली आहे. ते म्हणतात, ‘या प्रत्येक मुलात गट्स आहेत, कष्ट करण्याची प्रवृत्ती आहे; परंतु पैसा नाही. तो आपल्याकडे आहे ना! आपल्याला या मुलांसाठी वेळ काढता येत नसेल तर अशी मदत करणे योग्य असल्याचे वाटले व मदत केली.’

पुण्यातील एक सद््गृहस्थ नाशिकला त्यांच्या भगिनीकडे थांबले असता त्यांच्या वाचनात ‘मटा हेल्पलाइन’ची बातमी येते काय अन् ते कापऱ्या पावलांनी ‘मटा’च्या कार्यालयात येत मदतीचा धनादेश देतात. त्याच्यासोबत एक छोटेखानी पत्र असते. त्यात लिहिलेले आहे, की ‘दीपाली, मलाही एक नात आहे. तिलाही ९० टक्के मिळालेय. मी तिचे अॅडमिशन पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात करून दिलेय. तुलाही ९० टक्के आहे; पण शिकण्यासारखी तुझी परिस्थिती नाही हे वाचून मनाला लागलं. तुझ्यासाठी मदत पाठवत आहे ती स्वीकार.’ फ्लाइंग ऑफिसर म्हणून नुकतेच रिटायर्ड झालेले हे गृहस्थ तसे पुण्याचे आहेत, परंतु हेल्पलाइनच्या स्टोरीचा अंक वाचण्यात आला व त्यांनी त्वरित ‘मटा’चे कार्यालय जवळ केले. ते लिहितात, ‘दीपाली वरघडे हिच्याविषयीचा वृत्तान्त वाचून मनाला यातना झाल्या. जी मुलगी इतके गुण मिळवू शकते तिला मदत करण्यात मला आनंदच होत आहे. मला निवृत्तिवेतन मिळते. त्यातूनच मी हे पैसे देत आहे. मी लवकरच माझ्या मुलाकडे शिलाँगला जाणार आहे. आम्ही जग पाहिले आहे व तेच सुंदर जग या मुलांनी पाहावे, अशी माझी अपेक्षा आहे. मी स्वत: प्रचंड गरिबीतून वर आलो आहे. त्यामुळे गरिबीचे दु:ख मी जाणतो.’

सु. गो. काटे, मालेगाव यांची कहाणी जरा निराळी आहे. ते म्हणतात, ‘विद्यार्थ्यांशी माझी नेहमीच जवळीक होती; परंतु मला त्यांना मदत करता यावी इतकी ती नव्हती. आता रिटायर्डमेंटनंतरही आपण विद्यार्थ्यांसाठी काही करू शकतो का, या भावनेतून आम्ही ही मदत करीत आहोत. त्यासाठी ‘मटा’ माध्यम झाल्याचा आनंदही असल्याचं सांगत आपण केलेली मदत निश्चितपणाने त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘प्रचंड पाऊस सुरू होता, परंतु ‘आदित्य’चे वाचले अन् असे वाटले, की लगेचच जाऊन या मुलांना मदत करावी. या मुलांना किती समज आहे!’

हेल्पलाइनच्या मुलांना मदत करणाऱ्या प्रत्येकाची एक कहाणी आहे. या मुलांना मदत करीत असताना त्यांचे बालपण त्यांना दिसते. ‘मटा’त आवाहन केल्यावर दहाही मुलांसाठी मदत सुरू आहे. या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी प्रचंड पैसा उभा करावा लागणार आहे. त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च करू इच्छिणारेही आहेत. मात्र, ‘मटा हेल्पलाइन’ हा जगन्नाथाचा रथ आहे. तो वाचकांच्या हातूनच ओढला जावा, अशी अपेक्षा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडून दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पुढील शैक्षणिक प्रवास सुकर व्हावा म्हणून वाचकांच्या सत्प्रवृत्तीला साद घालत हा ‘मटा हेल्पलाइन’चा उपक्रम हाती घेतला. या मुलांची कहाणी ‘मटा’त प्रसिद्ध झाली आहेच, त्यांच्या नावाने क्रॉस्ड चेक काढून ड्रॉपबॉक्समध्ये जमा करावेत. चेकच्या मागे पाठवणाऱ्याचे नाव आणि फोन नंबर लिहावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एटीएस’च्या रडारवर मोबाइलविक्रेते

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मोबाइलचे आयएमईआय क्रमांक बदलवून देणाऱ्यांवर कारवाई करीत दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पाच जणांना अटक केली. देशविघातक कृत्यांत या मोबाइलचा वापर करण्यासाठी असा प्रकार केला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चोरीच्या मोबाइलचे आयएमईआय क्रमांक बेकायदेशीररित्या बदलून दिले जात असल्याचा प्रकार धुळे शहरात सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस दलातील दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तपास करीत कारवाईचा बडगा उभारला. शहरातील गरुड कॉम्प्लेक्समधील एस. कुमार मोबाइल या दुकानातून रवी सुरेश मोटवाणी, सहारा मोबाइल शॉपचे जितेंद्र गुलाबराव पाटील, शारदा स्पिकर दुकानातील पुनीत मनवरलाल मेघाणी, सेल्युलर मोबाइल शॉपमधील मोईन अक्तर महेमुद मुजंमिल अन्सारी आणि मोहम्मद सादिक अख्तर हुसेन (सर्व रा. धुळे) यांना ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फायद्यासाठी मोबाइलचे आयएमईआय क्रमांक बदलण्याचा उद्योग ते करीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांच्याकडून सुमारे चार लाख ९२ हजार २०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे नारायण माळी, प्रेमसिंग सिसोदे, अब्दुल्ला शेख, शाम चंद्रात्रे, किरण बागूल, सायबर सेलचे उपपोलिस निरीक्षक नीलेश शेंबडे, संजय पाटील, राजेश सैंदाणे यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुक्त’च्या पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सेवक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. एकूण ११ जागांसाठी ही निवडणूक होती. महिला राखीव दोन पदे सोडता उर्वरित ९ जागांसाठी संचालकांची निवड बिनविरोध करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी अनुरथ वाघमारे, उपाध्यक्ष किशोर शिंदे, मानद सचिव विलास बधान तर सहसचिवपदी रवींद्र सोनवणे यांची निवड झाली आहे.

बिनविरोध म्हणून निवडून आलेले अन्य संचालक पुढीलप्रमाणे, अमोल पाटील, दीपक जाधव, दिलीप साळुंके, दत्तु वरंदळ, लक्ष्मण शेंडे. मुक्त विद्यापीठ सेवक सहकारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांच्या बैठकीत अध्यक्ष म्हणून अनुरथ वाघमारे, उपाध्यक्ष किशोर शिंदे, मानद सचिव विलास बधान तर सहसचिव म्हणून रवींद्र सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष वाघमारे व सचिव बधान यांनी पतसंस्थेने आजवर केलेल्या कामगिरीबद्दल तसेच मागील संचालक मंडळाने केलेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून आभार मानले. तसेच संस्थेच्या प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावण्यासाठी तसेच सभासदांच्या हिताच्या दृष्टीने अत्याधुनिक प्रणालींचा वापर करून नवनवीन उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन आणि कुलसचिव डॉ. प्रकाश भोंडे यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एल. एम. गमे यांच्या वतीने कृष्णा पाटेकर यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकीत वेतनासाठी गटसचिवांचे धरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण भागातील विकासाच्या योजना ज्या यंत्रणेमार्फत राबवल्या जातात त्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या गटसचिवांनी थकीत वेतनाच्या मुद्द्यावर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. गटसचिवांच्या मागण्यांवर सहकारमंत्र्यांच्या दालनात चर्चा निष्फळ ठरल्यामुळे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा नाशिक जिल्हा सहकारी संस्था सेक्रेटरी व कर्मचारी संघटनेने दिला आहे.

राज्यातील बहुतांश गटसचिवांना अनेक मह‌िन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना संघटनेने मागण्यांचे निवेदन दिले.

निवेदनात म्हटल्यानुसार राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थेवर काम करणाऱ्या गटसचिवांचा गेल्या अनेक वर्षांपासून सेवा आणि वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी संघटनेने अनेकदा आंदोलने केली आहेत. मार्च २०१२ मध्ये मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर विविध कार्यकारी संस्थेने संबंधित आर्थिक वर्षात वाटप केलेल्या पीक कर्जाच्या एक टक्का अनुदान एका महिन्यात देण्याचे आश्वासन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिले होते. परंतु, अजूनही सहकार विभागाने या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवलेला नाही. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील ७० टक्के गटसचिवांना दिवाळीतही वेतन मिळाले नाही. गटसचिवांनी उपाशीपोटी संस्थेचे कर्जमाफीचे कामकाज कसे करायचे असा सवाल संघटनेने उपस्थ‌ित केला आहे. सद्यःस्थ‌िती‌त अनेक गटसचिवांकडे दोनहूनही अधिक संस्थांचा कार्यभार आहे. तरीही गटसचिव अत्यल्प वेतनात काम करतात. त्यांचे वेतन वेळेवर होत नाही. गेल्या महिन्याचे वेतनही त्यांना अद्याप मिळालेले नाही. संस्था तोट्यात जाण्यास जिल्हा सहकारी बँका कारणीभूत असतानाही जिल्ह्यातील २५८ संस्थांवर कारवाई करण्याचा इशारा सहकार खात्याने दिला आहे.

‘सहकार सहाय्यक’ म्हणून सेवेत घ्या

सरकारने कृषी सहाय्यकाच्या धर्तीवर, सहकार क्षेत्रातील गटसचिवांना ‘सहकार सहाय्यक‘ म्हणून सरकारी सेवेत घ्यावे अशी मागणी संघटनेने केली आहे. गटसचिवांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे, तसेच सहकार खात्यात भरती करताना शामराव कदम कम‌िटीच्या शिफारशींनुसार गटसचिवांचा विचार व्हावा. गडाख समितीच्या शिफारशींप्रमाणे ग्रामसेवकासमान वेतन श्रेणी व हक्क सेवा लागू कराव्यात आदी मागण्याही संघटनेने निवेदनाद्वारे केल्या आहेत. आंदोलनात राजेंद्र काळे, हेमंत भरवीरकर, अर्जुन पाटील, के. डी. गव्हाणे, विश्वनाथ निकम, माधव जाधव, बाळासाहेब पवार, दीपक पवार, सुनील गोसावी, विश्वनाथ निकम आदींसह शेकडो गट सचिवांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतींची नावे जाहीर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत नव्याने तयार करण्यात आलेल्या तीन समित्यांच्या सभापती व उपसभापती पदासाठी उमेदवारांची घोषणा शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी केली. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांना वैद्यकीय व विधी समितीच्या सभापतीपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. तर शहर सुधार समितीची धुरा भगवान दोंदे यांच्यावर सोपव‌िण्यात येणार आहे. विधी समिती सभापती पदाची उमेदवारी ही शीतल माळोदे यांना देण्यात आली आहे. शिवसेनेकडून उमेदवार दिला जाणार नसल्याने ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

सत्ताधारी भाजपने शहर सुधार, विधी व वैद्यकीय आणि आरोग्य या तीन समित्यांची नव्याने निर्मिती केली आहे. या समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाची निवड २४ जुलैला होणार आहे. त्यासाठी अर्जवाटप सुरू झाले आहे. तीनही समित्यांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने सभापती व उपसभापती त्यांचेच होणार आहेत. याबाबत मंगळवारी बैठक झाली. त्यानंतर उमेदवारांची घोषणा करण्यात आली. ‘शहर सुधार’च्या उपसभापती पदासाठी स्वाती भामरे, ‘वैद्यकीय व आरोग्य’च्या उपसभापतीसाठी शांता हिरे, तर विधी समितीच्या उपसभापती पदासाठी राकेश दोंदे यांच्या नावाची घोषणा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फुकट्या प्रवाशांना रेल्वेचा दणका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

रेल्वेने फुकट प्रवास करणाऱ्या फुकट्यांनो सावधान, आता तुमची काही खैर नाही जणू असा इशारा देत रेल्वे विभागाने ७ ते १५ जुलै दरम्यान धडक मोहीम राबव‌िली. या आठ दिवसात ८९३ विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली असून, तीन लाखांपेक्षा जास्त दंडवसुली केली आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडलामध्ये येणाऱ्या मनमाड रेल्वे जंक्शन विभागात गेल्या अनेक दिवसांपासून विनातिकीट प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मनमाड-इगतपुरी शटल तसेच गोदावरी एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेसमधून येणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. मनमाड जंक्शनमधून दररोज सुमारे १३० पेक्षा जास्त रेल्वे प्रवाशी गाड्यांची वाहतूक होत. दररोज २० हजारांपेक्षा जास्त प्रवाशी ये-जा करतात.

मोदी सरकारने ज्या रेल्वे प्रवाशी गाड्यांचे उत्पन्न ५० टक्क्यापेक्षा कमी असेल अशा गाड्या बंद करण्यात याव्यात, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वेच्या ब्लॅक लिस्टमध्ये या गाड्यांचा समावेश होऊ नये म्हणून भुसावळ मंडळाने कारवाई सुरू केली आहे. गोदावरी, पंचवटी एक्स्प्रेस, इगतपुरी शटल यांच्यासह भुसावळ-मुंबई पॅसेंजर, हुतात्मा एक्स्प्रेस, काशी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, आझादहिंद एक्स्प्रेस यांच्यासह अनेक रेल्वे प्रवाशी गाड्यांमध्ये भुसावळ रेल्वे

मंडळाचे विभागीय वाणीज्य महाव्यवस्थापक सुनीलकुमार तसेच सहायक वाणीज्य व्यवस्थापक (टिकीट निरीक्षक विभाग) अजयकुमार यांच्या आदेशानुसार मनमाड विभागाचे मुख्य विभागीय वाणीज्य निरीक्षक अनिल बागले यांनी कारवाईचे सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये मुली वाचल्या हो...!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात मुला-मुलींच्या जन्मदरात समानता आणण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांमुळे आणि स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी सोनोग्राफी केंद्रांची तपासणी, गर्भपात रोखण्यासाठी वैद्यकीय विभागाने सुरू केलेल्या डेली मॉनिटरिंगमुळे शहराच्या हद्दीत मुलींच्या दरहजारी जन्मदरात चांगलीच सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये दरहजारी मुलींचा जन्मदर ८८० एवढा कमी होता. मात्र, जनजागृती आणि वैद्यकीय विभागाने केलेल्या प्रयत्नामुळे तो मे महिन्यात अकराशेपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे प्रथमच मुलींचा जन्मदर हजाराच्या पार गेला आहे.

शहरातील स्त्री-भ्रूणहत्येला जबाबदार असणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांसह स्त्रीरोग तज्ज्ञांना वैद्यकीय विभागाने वर्षभरापासून रडारवर घेतले आहे. त्यांची नियमित तपासणी केली जात आहे, तसेच संशयास्पद ठिकाणी धाडी टाकून कारवाई केली जात आहे. स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी येथील जनतेमध्ये जनजागृती, स्त्रीजन्माचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध पथनाट्ये, चित्रफीत, मेळावे यांसारख्या माध्यमांतून वैद्यकीय विभागामार्फत जनजागृती केली जात आहे. त्यामुळे मुलगाच पाहिजे ही मानसिकता आता हळूहळू लोप पावत चालली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून जानेवारीपासून मुलींच्या जन्मदरात रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. वैद्यकीय विभागाने मुलींचा जन्मदर हा हजारी ९५० ते एक हजार अपेक्षित केला होता. मात्र, हा जन्मदर सरासरी अकराशेपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पालकांच्या मानसिकतेतही बदल घडत असल्याचे सकारात्मक चित्र शहरात आहे.

शिंदे, लहाडे घटनांमुळे चाप

पालिकेच्या वैद्यकीय विभागाने टाकलेल्या धाडींमध्ये द्वारका येथील डॉ. बी. एन. शिंदे हॉस्पिटल, तसेच डॉ. लहाडे गर्भपात प्रकरण उघडकीस आले होते. या दोन घटनांमुळे सोनोग्राफी केंद्रांसह डॉक्टरांमध्येही जरब बसली असून, स्री भ्रूण तपासणी जवळपास बंद झाली आहे. त्यामुळे या दोन घटनांमुळे अवैध गर्भपाताला आळा बसल्याचेही सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

मुलींचा जन्मदर

डिसेंबर २०१६ ः ८८०, जानेवारी २०१७ ः ९४०, फेब्रुवारी ः ८९४, मार्च ः १११०, एप्रिल ः १२००, मे ः ११००.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरेन, अजिंक्य उपांत्य फेरीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित दुसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विरेन पटेल व अजिंक्य शिंत्रे यांनी प्रवेश केला.

या स्पर्धेस नासिक जिमखाना येथे उत्साहात सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी नाईक म्हणाले की, नाशिकच्या क्रीडा क्षेत्रासाठी जे करणे आवश्यक आहे, त्यासाठी मी आणि माझे खाते सर्वातोपरी तत्पर राहू. खेळाडू हा केंद्रबिंदू मानून त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास कायम प्राथमिकता देण्यात येईल. नाशिकमध्ये विविध खेळांसाठी व विषेशतः टेबल टेनिससाठी चांगले व पोषक वातावरण असल्याचे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रीय व राज्य स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तनिशा कोटेचा, सायली वाणी, पीयूष जाधव, कुशल चोपडा, पुनीत देसाई व अजिंक्य शिंत्रे या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर शिवछत्रपती पुरस्कार विजेते असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, संघटनेचे सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर आदि उपस्थित होते.

पुरुष एकेरी, यूथ मुले-मुली, ज्युनिअर मुले-मुली, सबज्युनिअर मुले-मुली, कॅडेट मुले-मुली, प्रौढ (वेटरन) पुरुष अशा विविध दहा गटांत ही स्पर्धा होत आहे. यावेळी संघटनेचे मिलिंद कचोळे, संजय वसंत, सतीश पटेल, अलीअसगर आदमजी, ए. बी. कोपीकर, एम. एस. जवळगेकर आदी उपस्थित होते.


सामन्याचा निकाल

पुरुष एकेरी- उपांत्यपूर्व फेरी - विरेन पटेल विजयी विरुद्ध ओेमकार जोंग (३-१), अजिंक्य शिंत्रे वि. वि. पंकज रहाणे (३-१)

कॅडेट मुले प्राथमिक फेरी - कुशल चोपडा वि. वि. रोहन पाटील (३-०), आर्यन पोळ वि. वि. अर्णव चावला (३-१)

सब ज्युनिअर मुली- प्राथमिक फेरी - अनन्या फडके वि. वि. सई शिरूरकर (३-०), संस्कृता ठाकूर वि.वि. ऐश्‍वर्या अफजलपूरकर (३-०)

प्रौढ एकेरी उपांत्य फेरी - सतीश पटेल वि. वि. उमेश कुंभोजकर (३-१), मयुरेश कुलकर्णी वि. वि. राजेश भरवीरकर (३-१)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चॉकलेट मेकिंग’ची पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पॅरेंट्स डेनिमित्त मटा कल्चर क्लबतर्फे चॉकलेट मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २३ जुलै रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत निर्माण उपवन, काळाराम मंदिराजवळ, पंचवटी येथे हे वर्कशॉप होणार आहे. विशेष म्हणजे या वर्कशॉपमध्ये हेल्थ चेक अप व्हाउचर्स आणि बंपर प्राइझ जिंकण्याचीही संधी सहभागी झालेल्यांना मिळणार आहे.

चॉकलेट हा जसा लहान मुलांचा आवडीचा विषय आहे तसा तो मोठ्यांचाही वीक पॉइंट आहे. तुम्हाला आवडणारी चॉकलेट्स तुम्हाला घरी बनवता आली तर? तुमची हीच आवड ओळखून मटा कल्चर क्लबतर्फे चॉकलेट मेकिंग वर्कशॉपचे आयोजन आहे. दि. २३ जुलै रोजी होणाऱ्या या वर्कशॉपमध्ये सीमा गवारे पाटील या चॉकलेट कसे बनवायचे, चॉकलेटचे फिलिंग कसे करायचे तसेच, चॉकलेट रॅपिंग, टेम्परिंग, चॉकलेटचे विविध प्रकार, चॉकलेट ब्राउनिज आदी बनवून दाखविणार आहेत. हे वर्कशॉप सर्वांसाठी मोफत असून, या वर्कशॉपसाठी नावनाेंदणी आवश्यक असून, त्यासाठी ७०४०७६२२५४ किंवा ०२५३-६६३७९८७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

--
पॅरेंट्स डेनिमित्त सेल्फी विथ पॅरेंट
नाशिक : पॅरेंट्स डेनिमित्त मटा कल्चर क्लबतर्फे सेल्फी विथ पॅरेंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ जुलै ते २२ जुलै यादरम्यान वाचकांनी पालकांसोबतचा सेल्फी events.mata@gmail.com या ई-मेल वर पाठवायचा आहे.

भाग्यवान ५० विजेत्यांना हेल्थ चेक-अप व्हाऊचर्स चॉकलेट मेकिंग वर्कशॉपमध्ये दिले जातील. या वर्कशॉपमध्ये रेफ्रिजरेटर, म्युझिक सिस्टिम यांसारखे बंपर प्राइझ जिकंण्याचीही संधी मिळणार आहे.

तेव्हा पालकांसोबतचा सेल्फी आम्हाला मेल करा आणि चॉकलेट कसे बनवायचे हे शिकण्यासाठी आजच चॉकलेट मेकिंग वर्कशॉपसाठी नावनेंदणी करा. सोबत व्हाऊचर्स आणि बंपर प्राइझेसही जिंकता येतील. अधिक माहितीसाठी ०२५३-२६६३७९८७ किंवा ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

--

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub

टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub

टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फार्मसीसाठी सीईटी की जेईई?

$
0
0

अभ्यासासाठी विद्यार्थ्यांचे केंद्राच्या भूमिकेकडे लक्ष

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंजिनीअरिंग आणि फार्मसी या अभ्यासक्रमांसाठी ‘नीट’ परीक्षेच्या धर्तीवर एकच प्रवेश परीक्षा राबविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली होती. आता २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांचा सीईटी आणि जेईई परीक्षेसाठी अभ्यास सुरू झाला आहे. त्यामुळे या संदर्भातील घोषणा केंद्राने लवकर केल्यास वर्षभराचे नियोजन करणे विद्यार्थ्यांना सोपे जाईल. अन्यथा, वर्ष अखेरीपर्यंत संभ्रम कायम राहिल्यास पुढील वर्षी मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे.

इंजिनीअरिंग आणि फार्मसी कॉलेजांमध्ये २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी ‘सीईटी’ की ‘जेईई’ परीक्षा याबाबत राज्य आणि केंद्र सरकारने अद्याप भूमिका मांडलेली नाही. परिणामी इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये या विषयाच्या अनुषंगाने संभ्रम आहे. सरकारने या विषया संदर्भात त्वरित भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाच्या वतीने सरकारला करण्यात आली आहे.

आता सर्वच कॉलेजांमध्ये बारावीच्या वर्गांना सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वर्षासाठी विविध प्रवेश परीक्षांची तयारीदेखील सुरू केली आहे. पण सरकारची परीक्षांबाबतची भूमिका स्पष्ट नसल्याने विद्यार्थ्यांना जेईई व सीईटी परीक्षेच्या अभ्यासास सुरुवात करतानाचा संभ्रम कायम आहे. या अभ्यासक्रमांसाठी देशस्तरावर नीटच्या धर्तीवर एकच परीक्षा राहील की देश व राज्यस्तरावर दोन वेगळ्या परीक्षा राहतील, परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग राहणार का, खासगी कॉलेजांमधील १५ टक्क्यांचे प्रवेश कोणत्या परीक्षेनुसार होतील, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना उपस्थित होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images