Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

१९ हजार गुरुजी देणार 'टीईटी'

$
0
0

शहरात ३३ केंद्रांवर आज परीक्षा; यंत्रणा सज्ज

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटेट) आज (दि. २२) राज्यभरात पार पडणार असून, नाशिक शहरातील १९ हजार ५५५ शिक्षक उमेदवार ३३ केंद्रांवर ही परीक्षा देणार आहेत. सकाळी १०.३० ते १ या वेळेत पेपर क्रमांक १ तर २ ते ३.३० या वेळेत पेपर क्रमांक २ होणार आहे. १५ जूनपासून या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती.

इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक सेवक किंवा शिक्षक पदांवर नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असते. राज्यात गेल्या चार वर्षांपासून ही परीक्षा घेण्यात येत आहे.

या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्येचे प्रमाण मोठे असले तरी काठिण्य पातळीमुळे उत्तीर्ण होणाऱ्या शिक्षक उमेदवारांची संख्या तीन ते चार टक्केच असते.
इयत्ता पहिली ते पाचवीसाठी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी पेपर क्रमांक १ व सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी पेपर क्रमांक २ घेतला जातो. यामध्ये ११ हजार १६८ विद्यार्थी पेपर क्रमांक १ तर ८ हजार ३८७ विद्यार्थी पेपर क्रमांक २ देणार आहेत. १५ ते ३० जून या कालावधीमध्ये इच्छुकांसाठी अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली होती.

त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा

परिषदेच्या वेबसाइटवर परीक्षेची सविस्तर प्रक्रियाही जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार टीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आली आहे. या परीक्षेमुळे शिक्षक उमेदवारांना अभ्यास करून टीइटीची तयारी करावी लागते. तसेच यामधूनच राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे भरली जातात, त्यामुळे या परीक्षेला महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांची परीक्षेमुळे एक प्रकारची कसोटी लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहर स्वच्छतेला लागले डेब्रिसचे ग्रहण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सर्व प्रमुख रिंगरोडसह, बहुतांश नववसाहतींमधील व त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांना डेब्रिसचे ग्रहण लागले आहे. पावसाळ्यात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याने, प्रशासनाकडून नाशिककरांना परिसर स्वच्छतेचे धडे दिले जात असताना, डेब्रिसच्या समस्येकडे मात्र खुद्द प्रशासनाचीच डोळेझाक होत आहे. ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ला लागलेले डेब्रिसचे ग्रहण दूर करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होते आहे.

शहरातील चोपडा लॉन्स ते रामवाडी, पाइपलाइनरोड-कॅनलरोड ते मोतीवाला कॉलेज, त्र्यंबकरोड, कामटवाडे, रासबिहारी स्कूललगतचा औरंगाबादरोडला जोडणारा रिंगरोड, हॉटेल ग्रीन व्ह्यू पाठीमागील मोकळी जागा अशा विविध ठिकाणी बांधकाम साहित्य भरलेली वाहने सर्रास रिकामी केली जातात. महापालिकेने वारंवार यासंदर्भात नियमावली आणि कारवाई करुनही बांधकाम व्यावसायिकांचे हे उद्योग थांबलेले नसल्याचेच सद्यस्थितीवरुन दिसते. काही रस्त्यांवर दिवसा तर काही रस्त्यांवर रात्री ढिगारे ओतले जातात. रामवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यासह अनेक रस्त्यांवर या ढिगाऱ्यांची माती येत असल्याने वाहनधारक घसरून अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धिबळ स्पर्धेत सर्वान कृष्‍णनची आघाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेषा असोसिएटसतर्फे तर्फे स्वामीनारायण मंदिरातील बँक्वेट हॉलमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन स्पर्धेत शुक्रवारी सहाव्या फेरीअखेर तामिळनाडूच्या अग्रमानांकित खेळाडूंनी पटावर सावध चालीचा पवित्रा घेत स्पर्धेत संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर आपली आघाडी टिकवून ठेवली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दुसऱ्या स्थानावर आपली आघाडी कायम ठेवली आहे.

स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील चुरशीच्या डावात पहिल्या पटावर खेळताना स्पर्धेतील सर्वोच्च मानांक‌ित तमिळनाडूचा सर्वांना कृष्णन पी. याच्या विरुद्ध खेळताना अग्रमानांकित मुथैय अल याला पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या पटावर मात्र आंतरराष्ट्रीय मास्टर राजेश वाव याने तेलंगणाच्या आंतरराष्ट्रीय मास्टर चक्रवर्ती रेड्डी याला नमवत स्पर्धेत आपला दबदबा निर्माण करत संयुक्तरीत्या पहिल्या स्थानावर आघाडी घेतली. तिसऱ्या पटावर खेळताना महाराष्ट्राचा सम्मेद शेटे याला आंध्रप्रदेशच्या फिडे कार्तिक वेंकटरामान याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. महाराष्ट्राचा अग्रमानांकित खेळाडू फिडेमास्टर सौरव खर्डेकर, पवन दोडेजा, सुयोग वाघ, प्रणव शेट्टी यांच्या विजयी अभियानामुळे महाराष्ट्राचे खेळाडू संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत.

स्पर्धेमध्ये डिज‌िटल चेस बोर्ड व पालकांसाठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. स्पर्धेला आंतरराष्ट्रीय सुविधा पुरविल्यामुळे बाहेरील राज्यांतील खेळाडूंनी आयोजकाचे कौतुक केले. स्पर्धेसाठी संपूर्ण भारतभरातून आलेल्या खेळाडू आणि पालकांसाठी रेषा आसोसिएट्सने भारताचा ग्रॅँड मास्टर विदित गुजराथी याच्या पालकांच्या अनुभव कथनासाठी सहविचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे राज्य सचिव लक्ष्मण सावजी, भाजपचे शहराध्यक्ष अनिल भालेराव, रोटरी इस्टचे अध्यक्ष अतुल मालाणी, भगरे गुरुजी, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव मिलिंद कुलकर्णी, रेषा आसोसिएटच्या संचालक अर्चना कुलकर्णी आदी उपस्थित होते.

स्पर्धेच्या आयोजनासाठी रसिका रत्नपारखी, ओंकार जाधव, हेमंत चौरे, देवेंद्र लहाने, मंगेश सरोदे परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यूच्या डंखाचा धसका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढती संख्यामुळे नागरिकांसह प्रशासनानेही धसका घेतला आहे. आरोग्य व वैद्यकीय विभागाने डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी जनजागृती मोहीम सुरू केली असून, डेंग्यूच्या अळ्यांचीही तपासणी सुरू केली आहे. गेल्या महिन्यांत पालिकेने शहरातील ७९ हजार ४५२ घरांची तपासणी केली होती. त्यात ३३५ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. त्यापैकी २८३ घरे आणि कार्यालयांना नोट‌िसा देण्यात आल्या आहेत. नवीन बांधकामे, बेसमेंट आणि भंगार व टायर दुकांनाचा यात समावेश आहे.

गेल्या वर्षी महापालिका हद्दीत डेंग्यूने थैमान घातले होते. जुलै २०१६ मध्ये १४१ डेंग्यूचे रुग्णआढळून आले होते. परंतु या वर्षी डेंग्यूची तीव्रता कमी आहे. जून महिन्यात १९ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. तर जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात ७ रुग्ण आढळले आहेत. तरीही पालिकेने डेंग्यूच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना सुरू आखल्या आहेत. पालिकेच्या पेस्ट कंट्रोल व आरोग्य विभागाने डेंग्यूच्या आळ्यांच्या तपासणी मोहीम राबवली आहे.

२८३ जणांना नोट‌िसा

महापालिकेने डेंग्यूच्या अळ्याप्रकरणी आतापर्यत २८३ जणांना नोट‌िसा बजावल्या आहेत. त्यात भंगार बाजारासह टायर व्यावसाय‌िकांचा समावेश आहे. सोबतच ४७ नवीन बांधकामांना नोट‌िसा बजावल्या आहेत. १७ बेसमेंटमध्ये अळ्या आढळून आल्या होत्या. त्यांनाही नोट‌िसा बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे महापालिकेच्या शाळांमध्येही डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या असून या सर्वांना नोट‌िसा बजावण्यात आल्या आहेत.


नाशिकरोड, सातपूरला अलार्म

डेंग्यूच्या आळ्यांचे प्रमाण हे नाशिकरोड आणि सातपूर या विभागात जास्त आहे. त्यामुळे या दोन विभागांवर आरोग्य विभागाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.


तपासणीवर संशय

महापालिकेच्या पथकांनी शहरातील तब्बल ७९ हजार ४५२ घरांची तपासणी केली. सोबतच ६३ हजार ९८१ पाण्याचे साठे तपासण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबवली असली तरी त्याबाबत नागरीकांनाच संशय आहे. विशेष म्हणजे या तपासणी मोहीमेची माहिती प्रभागातील नगरसेवकांनाही नाही. त्यामुळे पालिकेने कागदावर तर या घरांची तपासणी तर केली नाही ना, असा संशय निर्माण झाला आहे.


येथे आढळल्या डेंग्यूच्या अळ्या
नाशिकरोड ८६
सातपूर ११३
सिडको ५६
नाशिक पूर्व ४५
नाशिक पश्चिम २१
पंचवटी १४


अशी केली कारवाई

७९ हजार ४५२ घरांची तपासणी
३३५ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या
२८३ घरे, कार्यालयांना नोट‌िसा
६३ हजार ९८१ पाण्याचे साठे तपासले
त्यापैकी ३७५ साठ्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या




७९ हजार ४५२ घरांची तपासणी

३३५ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या

२८३ घरे, कार्यालयांना नोट‌िसा

६३ हजार ९८१ पाण्याचे साठे तपासले

त्यापैकी ३७५ साठ्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रेयच्या ठेवीदारांचा चक्काजाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मैत्रेयमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांना गेल्या दीड वर्षापासून परतावा मिळालेला नाही. ठेवीदार तसेच एजंट्सला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. कंपनीच्या मालमत्तांचा शीघ्रगतीने लिलाव करून सर्वच गुंतवणूकदारांना पैसे परत मिळावेत, या मागण‌ीसाठी मोठ्या संख्येने ठेवीदार रस्त्यावर उतरले. भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्काजाम करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात नाशिक, जळगाव, धुळे जिल्ह्यांसह विदर्भ, मराठवाड्यातील गुंतवणूकदारही सहभागी झाले.

मैत्रेय उपभोक्ता आणि अभिकर्ता असोसिएशनच्यावतीने राज्यव्यापी आंदोलनाची साद घालण्यात आली होती. पावसाची तमा न बाळगता ठरल्यानुसार शुक्रवारी (दि. २१ जुलै) सकाळीच राज्यभरातील शेकडो गुंतवणूकदार नाशिक शहरात दाखल झाले. त्र्यंबकरोड येथील गोल्फ क्लब मैदानावर ठेवीदारांची गर्दी झाली. नियोजनानुसार तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ठेवीदारांनी पायी मोर्चा काढला. ‘पैसा कष्टाचा आहे, म्हणून संघर्ष आहे’, ‘आता आम्ही थांबणार नाही, जोपर्यंत कष्टाचा पैसा मिळणार नाही’ अशा घोषणा देत हा मोर्चा त्र्यंबक नाका, खडकाळी, एमजी रोड, सीबीएसमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. संततधार पाऊस सुरू असतानाही मोर्चेकरी हटले नाहीत. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, १८ महिन्यांपासून नाशिक शहरातील काही ठेवीदार वगळता अन्य कुणालाही परतावा मिळाला नाही. नाशिक कोर्टाने दिलेला निकाल आम्हाला काही अंशीच मान्य आहे. कारण त्यामध्ये नाशिकस्थ‌ित ग्राहकांची रक्कम दिल्यानंतर अन्य जिल्ह्यांमधील ठेवीदारांचा प्रश्न निकाली काढण्यात येईल, असा स्पष्ट आदेश दिला आहे. देशातील २७ लाखांहून अधिक ग्राहकांचे २८०० कोटी रुपये मैत्रेय कंपनीकडे अडकून पडले आहेत. त्यांना आपल्या हक्काचा परतावा मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्याबद्दल प्रशासनाकडून कोणती कार्यवाही होत आहे याची माहिती मिळावी असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

५ फेब्रुवारीपासून कंपनी बंद असून ग्राहकांचा परतावा मिळू शकलेला नाही. कंपनीचा सर्व डाटा, सर्व्हर सरकारवाडा पोलिस स्टेशनला जमा असून, ग्राहकांच्या पूर्ण झालेल्या मुदतीच्या तारखेनुसार परतावा लवकरात लवकर मिळावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. परतावा मिळण्यासाठी किती कालावधी लागेल, याचा आराखडा मिळावा. तसेच मैत्रेयच्या अजून अनेक मालमत्ता जप्त होणे बाकी आहे. या मालमत्ता जप्त करून त्या विकण्याबाबत त्वरीत कार्यवाही करावी, अशी आंदोलकांची आग्रही मागणी आहे. असोसिएशनतर्फे गोपाल बडगुजर, सचिन अमृतकर, रवींद्र सुतार, चतुर देसले आदींनी प्रशासनासमवेत चर्चा केली.

मह‌िलांची उपस्थिती लक्षणीय

गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवल्याने सर्वसामान्य कुटुंबातील मह‌िलांनी मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतविले आहेत. मैत्रेय सर्व्हिसेस प्रा. लि., मैत्रेय प्लॉटर्स अँड स्ट्रक्चर्स प्रा. लि., मैत्री रियल्टर अँड कन्स्ट्रक्शन प्रा. लि., मैत्री सुवर्णसिध्दी प्रा. लि. या कंपन्यांमध्ये ही गुंतवणूक करण्यात आली असून, मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. एजंट महिला तसेच गुंतवणूक करणाऱ्या महिलांनाही नको ते ऐकावे लागत असल्याची कैफियत यावेळी मांडण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयास छावणीचे रुप

मैत्रेय गुंतवणूकदारांचा मोठ्या प्रमाणावर मोर्चात सहभाग असल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता गृहीत धरून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयास छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. सकाळीच कार्यालयाची काही प्रवेशद्वारे बंद करण्यात आली. त्यामुळे दैनंदिन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीवरही विपरीत परिणाम झाला. त्यामुळे वाहतुक पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उज्जीवन बँकेची नाशिकरोड शाखा सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मायक्रो फायनान्स कंपनीची शाखा असलेल्या उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅँक नाशिकरोडला नुकतीच सुरू झाली. ‘देशदूत’चे संचालक संपादक विश्वास देवकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी नाबार्डचे ‌जिल्हा विकास व्यवस्थापक अतुल वेदपाठक, उज्जीवन बॅँकेचे क्षेत्रीय विकास व्यवसाय व्यवस्थापक विक्रम शिंगाडे, कौसल्या सिरग‌िरी, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, स्वयंरोजगार शिक्षण संस्थेचे संचालक सदाशिव पाटील, बँक ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा व्यवस्थापक ए. डी. चव्हाण, पोलिस निरीक्षक जगदीश शेलकर, राजेंद्र पवार, पंकज केसरवाणी, सोनल वैद्य, अशोक गोसावी, वरुण यादव आदी उपस्थित होते.

यावेळी वेदपाठक म्हणाले की, लहान व्यावसायिकांना पतपुरवठा करणाऱ्या संस्थेला बँक सुरू करण्याचा परवाना मिळणे ही गौरवाची बाब आहे. पारदर्शक आणि उत्तम सेवेमुळेच उज्जीवन संस्थेला हे यश मिळाले, अशी शाबासकीची थाप देऊन भारतातील ८५ टक्के लोकांना आजही बँकांच्या सेवा मिळत नसल्याचे ते म्हणाले. महिला गटांचा ‘लोन कलेक्शन रेशो’ हा अन्य कोणत्याही घटकांपेक्षा जास्त आहे. हे सुचिन्ह आहे. त्यामुळे महिला ग्राहकांकडे बँकांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. विश्वास देवकर म्हणाले की, गरीबांना अडचणीत मदत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली मायक्रो फायनान्स कंपनी आर्थिक दुर्बलांसाठी वरदान आहे. अशोक गोसावी यांनी सूत्रसंचलन केले. वरुण यादव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर डीपी आला; नकाशेही उपलब्ध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचा शहर विकास आराखडा (डीपी) ९ जानेवारी रोजी मंजूर झाल्यानंतरही या आराखड्याचा अंतिम मसुदा उपलब्ध झाला नव्हता. अखेर सात महिन्यांनंतर आराखड्याची अंतिम प्रत सरकारने उपलब्ध करून दिली आहे. हा आराखडा आणि त्याच्याशी संबंधित विविध नकाशे नाशिक महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. http://nashikcorporation.in//article/index/id/83 या लिंकवर विस्तृत माहिती उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मदत घ्या, पण बांधिलकीही जपा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘बाहेर काळवंडून आलेले असताना ‘मटा हेल्पलाइन’च्या माध्यमातून एक प्रकाशाचा किरण डोकावू पाहत आहे. या प्रकाशाच्या तिरिपीमुळेच ताई, तू शिक्षण घेऊ शकणार असून, समाजाची ही बांध‌िलकी नेहमी जप. त्याची परतफेड करता आली तर नक्की कर.’ मालेगावहून सतीश कलंत्री नावाच्या गृहस्थाने हे पत्र पाठवले आहे. ते पुढे म्हणतात, की ‘या मुलांच्या शिक्षणासाठी माझा खारीचा वाटा मी पाठवत आहे.’ कलंत्रींनी पाठवलेले हे पत्र म्हणजे त्यांनी जपलेल्या सामाजिक बांध‌िलकीचा प्रत्ययच आहे.

यंदाच्या हेल्पलाइनमध्ये गौरी जाधव, आदित्य नाईक, सोनिका चिंचोले, पूजा सांगळे, सचिन गांगुर्डे, धनश्री राजोळे, प्रतीक्षा गायकवाड, दीपाली वरघडे, सोनाली कुंवर, आदित्य जाधव या दहा जणांचा समावेश आहे. या मुलांची आबाळ होऊ नये म्हणून वाचकांच्या थेंब थेंब दानाने मुलांसाठी मदतीचे तळे साचतेय. ‘हेल्पलाइनच्या माध्यमातून ‘मटा’ उत्तम सामाजिक उपक्रम करीत आहे. सामाजिकता जपणे हा वृत्तपत्राचा धर्म आहे व ‘हेल्पलाइन’सारख्या उपक्रमातून तो निभावताना खरा ‘मित्र’ असल्याची जाणीव होते. गौरी जाधव हिची कहाणी जरा जास्तच काळजाला भिडली. त्यामुळे तिच्यासाठी ही मदत पाठवत आहे.’ हे शब्द आहेत डी. व्ही. जाधव यांचे. आर्थिकदृष्ट्या कमजोर मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचे ‘मटा’चे आवाहन वाचून सटाणासारख्या दुर्गम भागातून हा धनादेश आलाय. त्याच्यासोबत आहेत आशीर्वादाचे चार शब्द. या मुलांना मदत करताना ज्येष्ठांना त्यांचे बालपण आठवते आणि ते मदत करण्यासाठी प्रवृत्त होतात.

या मुलांची कहाणी ‘मटा’त प्रसिद्ध झाली आहेच, त्यांच्या नावाने क्रॉस्ड चेक काढून ड्रॉपबॉक्समध्ये जमा करावेत. चेकच्या मागे पाठवणाऱ्याचे नाव आणि फोन नंबर लिहावा. कृपया ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नावाने चेक देऊ नयेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


असुविधांच्या गर्तेत एमआयडीसी

$
0
0

मेक इन नाशिकचा नारा देत शहरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी यासाठी एकीकडे प्रयत्न केले जात असतानाच सातपूर व अंबड येथे असलेले उद्योग असुविधांमुळे त्रस्त आहेत. आपल्याकडे उद्योगांना पूरक पायभूत सुविधाही मिळू नयेत ही बाब विकासाला मारक ठरणारी आहे. एकमेकांकडे बोट दाखवून उद्योगांना असुविधांच्या गर्तेत लोटण्याच्या प्रकाराकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक झाले आहे. नाशिक एमआयडीसीत सातपूर व अंबड येथे ३५८२ उद्योग आहेत. त्यात मोठ्या कंपन्याही असून, नाशिक सिटी स्मार्ट करायची असेल, तर उद्योगांचे प्रश्न बाजूला ठेवून चालणार नाही, असा सूर औद्योगिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.


--

अशी आहे एमआयडीसींची सद्यस्थिती

-

-३५८२ सातपूर व अंबडमधील उद्योगांची संख्या

-११५० हेक्टर दोन्ही एमआयडीसींचे क्षेत्र

-६२५.७३ हेक्टर सातपूर एमआयडीसीचे क्षेत्र

-१२२२ सातपूर एमआयडीसीतील भूखंड

-५१५.५० हेक्टर अंबड एमआयडीसीचे क्षेत्र

-१६१६ अंबड एमआयडीसीतील भूखंड

-३१ किलोमीटरचे सातपूर एमआयडीसीतील रस्ते

-४० किलोमीटरचे अंबड येथील रस्ते

-२२०० दोन्ही एमआयडीसींतील पथदीपांची संख्या

--

बहुतांश रस्त्यांची चाळण

एमआयडीसी भागात सर्वांत मोठी समस्या आहे ती रस्त्यांची. पावसाळ्यात तर येथील बहुतांश रस्त्यांची चाळणच होताना दिसते. त्यामुळे आैद्योगिक वसाहतींत येणाऱ्या वाहनचालक व कामगारांना दररोज खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्यामुळे तेथे डबकी तयार झाली आहेत. सातपूर एमआयडीसीत ३१ किलोमीटरचे रस्ते आहेत, तर अंबड येथे ४० किलोमीटरचे रस्ते आहेत. महापालिकेने हे रस्ते दुरुस्त करावे व उद्योगांना चांगली सुविधा पुरवावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिकेला येथून सर्वाधिक कर मिळतो. पण, उद्योगांना पायाभूत सुविधांसाठी महापालिकेकडे वारंवार तक्रारी कराव्या लागतात.

--

ड्रेनेजचा प्रश्न सोडवणार कोण?

रस्त्यांबरोबर आैद्योगिक वसाहतींत ड्रेनेजचा प्रश्न गंभीर बनला आहे. एमआयडीसीनेे अगोदर ही व्यवस्था करणे गरजेचे आहे. पण, ती न केल्यामुळे आता ती कोणी करावी यावर वाद आहे. महापालिकेने अगोदरच हात झटकले आहेत, तर एमआयडीसी महापालिका कर घेते म्हणून त्यांनी ही सुविधा देण्याचे कारण पुढे करते. या दोघांच्या वादामुळे उद्योजकांचा मूळ प्रश्न मात्र कायम राहतो. ड्रेनेज नसल्यामुळे पावसाळ्यात तर अनेक कारखान्यांत मोठ्या प्रमाणात पाणी शिरते.

--

पथदीपांची दुरुस्ती रखडलेलीच

एकीकडे रस्त्यांची चाळण व दुसरीकडे ड्रेनेज आणि मोकळ्या भूखंडांमुळे पसरलेले घाणीचे साम्राज्य यामुळे त्रस्त असेल्या कामगार व उद्योजकांना असंख्य पथदीप बंद असल्यामुळे काळोखाचाही सामाना करावा लागतो. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींतील तब्बल २२०० च्या असपास पथदीप असून, त्यातील निम्याहून अधिक बंद अाहे. कधी कधी तर संपूर्ण रस्ताच अंधारात असतो. त्यामुळे महापालिकेने याकडे गांभीर्याने बघणे आवश्यक आहे. बंद पथदीपांमुळे औद्योगिक वसाहतींतून रात्री घरी जाणाऱ्या कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. महिला कामगारांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वसाहतीतील अनेक रस्त्यांवर अपघातांचे प्रमाणही काळोखामुळे वाढले आहे.

--

मोकळ्या भूखंडांची समस्या

एमआयडीसीमध्ये सातपूर आैद्योगिक क्षेत्र ६२५.७३ हेक्टर मध्ये वसले असून, त्यात १२२२ भूखंड आहे. त्यातील ११८१ भूखंडांचे वाटप करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे अंबड येथील आैद्योगिक वसाहत ५१५.५० हेक्टरमध्ये वसली असून, त्यात १६१६ भूखंड आहे. त्यातील १६०१ भूखंडांचे वाटप करण्यात आलेले आहे. या दोन्ही वसाहतींत अनेक भूखंड मोकळे आहेत. त्यात काही भूखंडांवरील उद्योग बंद आहेत. त्यामुळे या भूखंडांवर होणारी अस्वच्छता व त्यामुळे होणारा डासांचा प्रादुर्भाव ही मोठी समस्या बनली आहे. त्याकडे एमआयडीसी व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

--

अतिक्रमणांचा वाढता पसारा

सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत मोकळ्या भूखंडांवर, तसेच रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यात टपऱ्यांचा प्रश्न मोठा आहे. या टपऱ्यांमुळे परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळात झाला असून, उद्योजक बेजार झाले आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. उद्योजक वारंवार तक्रार करीत असले, तरी त्याबाबत एमआयडीसी आणि महापालिका प्रशासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे अतिक्रमणांचा पसारा दिवसेंदिवस वाढतच आहे.

--

अनियमित घंटागाड्यांमुळे अस्वच्छता

दोन्ही एमआयडीसींत कचरा संकलनासाठी घंटागाड्या नियमितपणे येत नसल्याने कचरा विल्हेवाटीचा प्रश्न उद्योजकांना सतावत आहे. विशेष म्हणजे या कचऱ्याची विल्हेवाट काही कारखाने स्वखर्चाने करीत अाहे. छोट्या उद्योजकांचा प्रश्न मात्र कायम आहे. मोजक्याच घंटागाड्या एमआयडीसीमध्ये येतात. पण, त्यांचे वेळेचे नियोजन व सातत्य नाही. या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. घंटागाड्या दररोज येत नसल्याने औद्योगिक वसाहतींतील मोकळ्या भूखंडांवर कचरा टाकल्याचे दिसून येते. हा कचरा नंतर उचलला जात नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग साचले आहेत. पावसाळ्यात तर हा प्रश्न अधिक गंभीर बनतो.

--

विजेचाही लंपडाव नित्याचा

वीज वितरण कंपनीतर्फे दोन्ही एमआयडीसींत होणाऱ्या वीजपुरवठ्याचा लंपडाव ही येथील नित्याची बाब बनली आहे. त्यामुळे अनेक उद्याेगांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, वीजपुरवठा बंद झाल्यामुळे कामगारांनाही काम नसते अाणि उत्पादननिर्मितीसह विलंब होत असल्याची स्थिती आहे. रात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने चोऱ्यांचे प्रकारही वाढले आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही वीज वितरण कंपनी फारसे लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे.

--

अनधिकृत बांधकामांत वाढ

दोन्हीही एमआयडीसी परिसरात अनेक बांधकामे अनधिकृत असल्याची स्थिती आहे. त्याबाबतही यंत्रणेला पुरेसे गांभीर्य दिसत नाही. अशा कामांकडे सुरुवातीपासूनच दुर्लक्ष झाल्याने त्यात वाढ झाल्याचे दिसून येते. सातपूर आणि अंबड या औद्योगिक वसाहतींत असंख्य अनधिकृत बांधकामे असल्याची बाब समोर आली आहे. मात्र, त्यावर कडक कारवाई झालेलीच नाही. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीच या कामांना खतपाणी दिल्याने गेल्या काही वर्षांत औद्योगिक वसाहतींत बंगले, झोपडपट्टी, निवासी बांधकाम, पार्किंग, दुकाने यांसह अनेक बाबी अनधिकृतपणे असल्याच्या तक्रारी वाढल्या.

--

रस्तोरस्ती होतेय पार्किंग

औद्योगिक वसाहतींत कंटेनर व अवजड वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था एमआयडीसीने केली आहे. मात्र, त्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे ही समस्यासुद्धा कायम आहे. अनधिकृत पार्किंग फोफावल्याने एमआयडीसीत ठिकठिकाणी पार्किंगची दैना उडाल्याचे दिसून येत आहे. अनधिकृत पार्किंग फुल्ल, तर अधिकृत पार्किंग मात्र रिकामे अशी स्थिती एमआयडीसीत पाहायला मिळत आहे. सातपूर व अंबड एमआयडीसींत मुख्य रस्त्यांवर तर नेहमीच कंटेनर व अवजड वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. इतर भागातही तीच स्थिती आहे.

--

दिशादर्शकांअभावी भूलभुलय्या

सातपूर व अंबड आैद्योगिक वसाहत ११५० हेक्टरवर वसलेली आहे. येथे जाण्यासाठी रस्ते असले, तरी पुरेशा दिशादर्शक फलकांचा अभाव आहे. त्यामुळे या वसाहती भूलभुलय्या ठरत आहेत. बाहेरगावांहून येणाऱ्या वाहनचालकांना तर त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. एखादी कंपनी शोधणे म्हणजे येथे दिव्यच ठरत आहे. रात्री तर एखादा कारखाने शोधणे अशक्यप्राय ठरत आहे. काही ठिकाणी हे फलक असले, तरी त्यांचे प्रमाण अगदी कमी आहे. त्यासाठी महापालिकेबरोबरच कंपन्यांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. शहर परिसराच्या वाढत्या विस्तारामुळे सातपूर आणि अंबडमधील औद्योगिक उत्पादनातही वाढ होत आहे. त्यामुळे येथे दिशादर्शक फलक असणे आवश्यक बाब आहे.

--

अपुरी बससेवा

सातपूर आणि अंबड एमआयडीसीत शहर बससेवेचा प्रश्नही कायम आहे. कंपनीत जाणारे अनेक कर्मचारी, तसेच कामगार स्वतःच्या वाहनाचा वापर करतात. मात्र, असंख्य कामगार सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करतात. एमआयडीसीतून बसच्या कमी फेऱ्यांबरोबरच थेट बस नसल्यामुळे अनेक कामगार सीबीएसला जाऊन नंतर दुसरी बस पकडतात. त्यामुळे कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या दोन्ही एमआयडीसींत बसच्या फेऱ्या वाढविण्याची वारंवार मागणी होत असली, तरी एसटी प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्षच होत आहे.

--

‘झूम’ही कागदावरच

औद्योगिक समस्या सोडविण्यासाठी, तसेच उद्योग विकासासाठी राज्य सरकारने जिल्हा उद्योगमित्रची बैठक (झूम) समिती स्थापन केली. पण, या समितीच्या नियमित बैठकाच होत नाहीत. एप्रिलमध्ये जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी याची बैठक घेतली. पण, त्यानंतरही अनेक प्रश्न कायम आहेत. अनेक उद्योजक, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी यांचे प्रश्न प्रत्येक बैठकीत सारखेच असतात. त्यांची सोडवणूकच होताना दिसत नाही. याबाबत कार्यवाही झाल्यावरच ‘झूम’ कागदावरून वास्तवात येईल. अन्यथा ही समिती फार्सच ठरत आहे.

--

‘नाइस’मध्येही समस्यांचा डोंगर

एमआयडीसीबरोबर नाशिक इंडस्ट्रिअल को-आॅपरेटिव्ह इस्टेट (नाइस) या संस्थेतही हेच प्रश्न आहे. येथे तब्बल ८०० उद्योग आहेत. पण, रस्ते ,ड्रेनेजसह सर्व प्रश्न येथेही आहेत. त्यामुळे येथील उद्योजकांनादेखील गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

--

एमआयडीसीतील रस्ते, ड्रेनेजची समस्या कायमच आहे. पथदीप बंद असणे, वीजपुरवठा वारंवार खंडित होणे नित्याचेच झाले आहे. खरेतर उद्योगवाढीस पायाभूत सेवा सक्षम असणे गरजेचे आहे. पण, त्याकडे गांभीर्याने बघितले जात नाही. त्यामुळे उद्योजक, कामगारांना गैरसोय सहन करावी लागते. येथील समस्या तातडीने सोडविण्याची गरज आहे.

-राजेंद्र आहिरे ,अध्यक्ष आयमा

-----

तीनदा ड्रेनेज फुटले

अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची चाळण झाली आहे. नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टरसमोर रस्त्यावरील ड्रेनेजचे झाकण आतापर्यंत तीन वेळेस फुटले आहे. त्यामुळे हे ड्रेनेज धोकादायक बनले आहे. या ड्रेनेजमध्ये दुचाकी पडून एखादी दुर्घटनादेखील घडू शकते. याबाबत दखल का घेतली जात नाही?

-अशोक अारोटे, मटा सिटिझन रिपोर्टर

---

एमआयडीसीतील समस्या पाठवा

--

शहरातील सातपूर आणि अंबड या दोन एमआयडीसींमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सोयी-सुविधांची वानवा आहे. हजारो कामगार येथे काम करीत असले, तरी या ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसची सेवाही योग्य पद्धतीने मिळत नाही. उद्योजक, कामगार, वाहतूकदार यांच्यासह अनेकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. एमआयडीसी आणि महापालिका यांच्या भांडणात मात्र एमआयडीसीतील अडचणींचा डोंगर वाढतच आहे. याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. औद्योगिक संघटना असल्या, तरीही पायाभूत सोयी-सुविधांचे रडगाणे अद्याप संपलेले नाही. म्हणूनच एमआयडीसीतील सार्वजनिक तक्रारी, अडचणी, तसेच समस्या ‘मटा सिटिझन रिपोर्टर’ या अॅपद्वारे आपण पाठवू शकता. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध आहे. या समस्यांना ‘मटा’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात ५७ गाळे सील

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा / पंचवटी

थकबाकी असलेल्या मिळकतधारकांविरोधात महापालिका प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली असून, नाशिकरोड विभागात आतापर्यंत ३८, तर पंचवटी विभागात १९ असे ५७ गाळे सील करण्यात आले आहेत. या गाळेधारकांकडे महापालिकेची लाखो रुपयांची थकबाकी आहे.

भूतपूर्व नाशिकरोड देवळाली नगरपालिकेच्या काळात उभारण्यात आलेले गाळे नाशिकरोड परिसरातील व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर देण्यात आलेले होते. त्यापैकी जवाहर मार्केट, मटण मार्केट, गोसावीवाडी व देवळालीगावातील यशवंत मंडई येथील ३८ गाळेधारकांकडे महापालिकेची थकबाकी वाढली होती. या गाळेधारकांकडून महापालिका प्रशासनाने यापूर्वीच १२ लाख रुपयांची वसुली केली होती. मात्र, उर्वरित थकबाकी न भरल्याने या गाळ्यांना उपायुक्त रोहिदास बहिरम यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या पथकाने सील ठोकले. त्यामुळे थकबाकीधारकांत खळबळ उडाली आहे. उर्वरित थकबाकीदारांच्या मिळकतींवर पुढील आठवड्यात कारवाई केली जाणार असून, अशी कारवाई टाळण्यासाठी थकबाकीधारकांनी वेळेत थकबाकी भरून महापालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

--

पंचवटीत बंद दुकानेही सील

थकबाकी न भरणाऱ्या पंचवटीतील मालेगाव स्टॅण्डवरील महापालिकेच्या जुन्या कार्यालयाशेजारील १९ गाळे शुक्रवारी दुपारी सील करण्यात आले. महापालिकेकडून गाळ्यांना सील लावण्यात येणार असल्याने येथील गाळेधारकांनी अगोदरच आपापली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना या बंद दुकानांच्या कुलपांनाच सील ठोकले. पेठरोड परिसरातील गाळेधारकांकडून सुमारे अडीच लाख रुपयांची वसुली करण्यात आली.

महापालिकेचे पेठरोड आणि मालेगाव स्टॅण्डजवळील जुन्या पंचवटी विभागीय कार्यालय येथे गाळे आहेत. त्यातील मालेगाव स्टॅण्डजवळील गाळेधारकांनी २०१४ पासून भाड्यांमध्ये झालेल्या वाढीचा फरक भरलेला नसल्याने त्यांना महापालिकेकडून नोटासा पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतरही त्यांनी भाड्याची रक्कम महापालिकेत जमा केली नसल्याने त्यांचे गाळे शुक्रवारी सील करण्याची मोहीम विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आली. या दुकानांच्या शटरवर नोटिसा चिकटविण्यात आल्या असून, त्यावर थकबाकी भरण्यात यावी, असा उल्लेख करण्यात आलेला आहे. पेठरोड परिसरात ही मोहीम राबविण्याअाधीच थकबाकी भरण्यास तेथील दुकानदारांनी पुढाकार घेतल्याने या भागातून सुमारे अडीच लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अशोका’ची अशीही रस्ता सुरक्षा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभर महामार्ग विकसित करण्यात आघाडीवर असलेल्या अशोका बिल्डकॅान कंपनीने आपला २३ व्या वर्धापन दिन रस्ता सुरक्षा मोहीम घेऊन साजरा केला. याचा औपचारिक शुभारंभ नाशिकमध्ये करुन देशभरातील टोलनाक्यावर या मोहिमेला सुरुवात केली. या शुभारंभाच्या कार्यक्रमात कंपनीने पाच हजार हेल्मेटचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची सुरुवात पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अशोका ग्रुपचे चेअरमन अशोक कटारिया, मॅनेजिंग डायरेक्टर सतीश पारख यासह मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमात कर्मचारी ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून रस्ता सुरक्षेचे काम करणार असून त्यांना एक हेल्मेट देण्यात येणार आहे. त्यानंतर हे कर्मचारी ते गरजु वाहनचालकांना देऊन त्याचा प्रचार करणार आहे. ही सुरक्षा मोहीम महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, ओरिसा, कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथेही घेण्यात आली. तेवीसाव्या वर्धापनदिन अशोका बिल्डकॉनने रस्ता सुरक्षितता या विषयाला समर्पित करून त्या अंतर्गत आपले प्रकल्प व टोलनाक्यांच्या ठिकाणी जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यात मोटारसायकल चालवताना हेल्मेट आणि कार चालवतांना सीटबेल्टचा वापर करावा, या जनजागृतीला प्राधान्य देण्यात आला. नाशिकमध्ये कंपनीने पाच हजारांपैकी १,१५० हेल्मेट वाटप केले.

हेल्मेट घालणाऱ्यांना चॉकलेट

अशोकातर्फे देशातील चौदा टोल नाक्यांच्या ठिकाणी कामकाज चालते. त्याठिकाणी दररोज हजारो वाहनचालक ये-जा करतात. हेच लक्षात घेऊन तेथे टोलचे कर्मचाऱ्यांनी हेल्मेट घातलेल्या चालकांना गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन नियम पाळल्याबद्दल आभार व्यक्त केले. ते नियमित हेल्मेट वापरण्याचे तसेच गाडीवर पाठीमागे बसणाऱ्याने हेल्मेट घालण्याची विनंती केली. अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख प्रास्ताविक करताना म्हणाले, अपघातात कुठल्याही एका व्यक्तीचे प्राण गमावणे हे देशासाठी हानिकारक असेच आहे. रस्ता विकसित करण्याच्या क्षेत्रात आम्ही आघाडीवर असून, रस्त्यावर जाणाऱ्यांच्या सुरक्षेला नेहमीच प्राधान्य देत आहे. किंबहुना या विषयांकडे आम्ही गांभीर्याने पाहत आहोत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कार्यालयांच्या छत्रछायेखाली डेंग्यू!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात डेंग्यूने डोके वर काढल्याने नागरिकांना खबरदारीच्या उपायांबाबत जागरूक करणारी सरकारी यंत्रणा स्वतः मात्र बेफिकीर असल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयासह राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, एसटी महामंडळ कार्यालय, इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. सरकारी कार्यालयांच्या छत्रछायेखाली आढळलेल्या डेंग्यूमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून, महापालिकेने या सर्वांना नोटिसा काढल्या आहेत. ज्यांच्यावर ५० लाख लोकसंख्येच्या आरोग्याचा भार आहे, त्या जिल्हा रुग्णालयातही या गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिले जात नसल्याने ही गंभीर बाब मानली जात आहे.

शहरातील संभाव्य डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील घरे, शासकीय कार्यालयांची नुकतीच तपासणी मोहीम राबवली होती. या मोहिमेत या धक्कादायक बाबी समोर आल्या असून, नागरिकांच्या घरांसह सरकारी कार्यालयांमध्येही डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाकडूनच डेंग्यूबाबत जनजागृती मोहीम राबवली जात असून, नागरिकांना डेंग्यूबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, रुग्णालयाच्या आवारातील स्वच्छतेबाबत प्रशासन उदासीन असल्याचे तपासणी मोहिमेतून उघडकीस आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जिल्हा रुग्णालयासोबतच इंडिया सिक्युरिटी प्रेस, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, एसटी महामंडळाचे पंचवटी आणि एनडी पटेल रोडवरील कार्यशाळा कार्यालयातही डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. महापालिकेने या कार्यालयांनाही नोटिसा बजावल्या असून, नागरिकांना आवाहन करतानाच स्वतःही स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले आहे.

स्वच्छता अभियान नावालाच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य दिले असून, सरकारी कार्यालयांसह नागरिकांनाही स्वच्छतेचे आवाहन केले आहे. मात्र, पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानालाच या सरकारी कार्यालयांनी हरताळ फासला आहे. या कार्यालयांमध्ये स्वच्छतेचे तीनतेरा झाल्याने ही कार्यालये नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे चित्र आहे.

दंडाची नाही तरतूद!

नागरिकांच्या घरात आणि सरकारी कार्यालयांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या तर मुंबई महापालिकेत दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. मात्र, नाशिक महापालिकेत अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय झाला नसल्याने आरोग्य विभाग हतबल आहे. त्यामुळे नागरिकांना व सरकारी कार्यालयांना केवळ नोटिसा देण्यापलीकडे काहीच करता येत नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा पोल‌‌िस ठाणी होणार ‘आयएसओ’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील पोल‌सि ठाण्याची दुरवस्था लक्षात घेता नागरिकांना योग्य सेवा-सुविधा पोल‌सि ठाण्यातून मिळायला हव्यात यासाठी ‘स्मार्ट पोलिसिंग’ उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात मालेगाव विभागातील सहा पोल‌सि ठाण्यांना आयएसओ प्रमाणित करण्या साठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. आजादनगर, आयशानगर, तालुका, मालेगाव कॅम्प, शहर आणि छावणी पोलिस स्टेशन यांचा त्यात समावेश आहे.

येथील अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. शहरातील पोल‌सि ठाण्यांची भौतिक अवस्था बदल्यासाठी तसेच नागरिकांना पोल‌सि स्टेशनमधून योग्य सोई सुविधा मिळाव्यात यासाठी हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आल्याचे पोद्दार यांनी सांगितले. आयएसओ प्रमाणित पोल‌सि स्टेशनचा प्रयोग या आधी देखील वैजापूर, कोल्हापूर येथे राबविण्यात आला आहे. मालेगाव विभागातील सहा पोल‌सि ठाणी यासाठी निवडण्यात आली आहेत. यासाठी आयएसओ संस्थेचे लेखापरीक्षक देखील बोलावण्यात आले असून, दोन दिवसांपासून त्याची कार्यवाही सुरू आहे.

पथककडून ४० छापे

पोद्दार यांनी विशेष पोल‌सि पथकाने आजवर केलेल्या कार्यवाईची माहिती दिली. या पथकाने एकूण ४० छापे टाकले. एक कोटी ३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच ६९ आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको कार्यालय स्थलांतराचा प्रयत्न फसला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा सिडको

सिडकोच्या सहाही योजना महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्याने आता सिडकोचे कार्यालयही औरंगाबाद येथे स्थलांतरित करण्याचा प्रयत्न सिडकोकडून सुरू आहे. या स्थलांतराला विरोध झाल्यानंतर आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्रयांची भेट घेऊन स्थलांतर थांबविण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, असे असतानाही शुक्रवारी सिडको कार्यालयातील कागदपत्रे घेण्यासाठी आलेला ट्रक आमदारांच्या हस्तक्षेपामुळे रिकामाचा माघारी धाडण्यात आला. आता कार्यालय स्थलांतराबाबत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सिडकोचे कार्यालय स्थलांतर करण्याची प्रकिया सुरू झाली असून, याबाबत आमदार सीमा हिरे यांनी मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांना भेटून हे कार्यालय स्थलांतरित करू नये, असे सांगितले होते. त्यानुसार कार्यालय स्थलांतराला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, सिडकोला कोणतेही लेखी आदेश प्राप्त न झाल्याने सिडकोतील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कार्यालय स्थलांतराची प्रक्रिया सुरूच होती. शुक्रवारी सायंकाळी औरंगाबद येथून सिडकोतील कागदपत्रे घेण्यासाठी एक ट्रक सिडको कार्यालयात दाखल झाला. याची माहिती काही स्थानिक नागरिकांनी आमदार हिरे यांना कळविल्यावर त्यांनी तातडीने सिडको प्रशासक कांचन बोधले यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार थांबविण्यास सांगितले. त्यानंतर सिडकोच्या औरंगाबाद येथील कार्यालयातून आदेश आल्याने हे काम थांबविण्यात आले.

मात्र, सिडकोतील कार्यालयाचे स्थलांतर होणार नाही, असे सांगितले जात असतानाही सिडको कार्यालयाला याबाबत का आदेशित करण्यात आले नाही, हा मोठा प्रश्न असून, सिडकोकडून नागरिकांची अशाप्रकारे फसवणूक तर होत नाही ना, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. आता खऱ्या अर्थाने सिडको कार्यालय स्थगितीबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

--

औरंगाबाद येथील प्रशासकाकांशी चर्चा केलेली आहे. कार्यालय स्थलांतरित न होण्यासंदर्भातील आदेश नाशिक कार्यालयाला पाठविणार असल्याचे त्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेले असूनही अद्यापही आदेश आलेले नाहीत. तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या असतील, तर त्या जाणून घेऊन लवकरात लवकर हे आदेश नाशिक कार्यालयात येतील यासाठी प्रयत्नशील आहे.

-सीमा हिरे, आमदार

--

एमडी व मुख्य प्रशासक यांचे आदेश असल्याने जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत कार्यालय स्थलांतरित होणार आहे. आमच्यापर्यंत अजूनही लेखी स्वरूपात कोणतेही आदेश स्थलांतर न कारण्यासंदर्भात आलेले नाहीत. मात्र, सायंकाळी उशिरा औरंगाबाद येथून आलेल्या संदेशाने हे स्थलांतर तूर्तास थांबविण्यात आलेले असून, पुढील आदेशाची वाट बघितली जात आहे.

-कांचन बोधले, प्रशासकीय अधिकारी, सिडको

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणमंत्र्यांना देणार खर्चाचा हिशेब

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी पालिकेची झाडाझडती घेत पालिका घनकचरा व मलनिस्सारणावर बजेटच्या पंचवीस टक्के रक्कम खर्च करीत नसल्याचा ठपका ठेवला होता. आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी मात्र पालिका घनकचरा व मलनिस्सारणावर बजेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम खर्च करत असल्याचा दावा केला आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती कदम यांना दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गोदावरी प्रदूषणासंदर्भात पर्यावरण प्रेमी यांनी पालिकेच्या कामकाजावर आक्षेप घेतला होता. कदम यांनी २५ टक्के बजेटचा खर्च मलनिस्सारण व घनकचऱ्यावर खर्च करतात का, असा जाब विचारला होता. त्यावर अधिकाऱ्यांना योग्य उत्तरे देता न आल्याने कदमांनी पालिकेची झाडाझडती घेतली होती. मात्र यावर आयुक्तांनी शुक्रवारी स्पष्टीकरण दिले.


एमपीसीबीची जबाबदारी

गोदावरी प्रदूषणाला हातभार लावणाऱ्या शहारातील उद्योजक व उत्पादकांनावर कारवाईची चालढकल प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पालिकेवर केली आहे. पंरतु या उत्पादकांसह उद्योजकांवर कारवाईची जबाबदारी प्रदूषण महामंडळाचीच असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मातोश्री’ची विद्यार्थिनी प्रतीक्षा जिल्ह्यात प्रथम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

एकलहरे येथील मातोश्री अभियांत्रिकी कॉलेजची सिव्हिल इंजिनीअरिंग विद्याशाखेतील प्रतीक्षा देवकर या विद्यार्थिनीने ८५.७० टक्के गुण मिळवून नाशिक जिल्ह्यात विभागातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. याशिवाय या कॉलेजमधील २९४ विद्यार्थी विशेष तर २२१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने या कॉलेजने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.

या कॉलेजमधील संगणक विभागाचा अंतिम वर्षाचा निकाल ९६ टक्के लागला असून, ऋतुजा मगर या विद्यार्थिनीने ७६.८६ तर पुजा डेर्ले हिने ७६.५६ टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या विभागातील ७० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी विशेष तर १८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. अणू विद्युत व दूरसंचार विभागाचा अंतिम विभागाचा निकाल ८९ टक्के इतका लागला असून, त्यापैकी ५० टक्क्याहून अधिक विद्यार्थी विशेष तर ३८ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या विभागात अभिजित लोखंडे या विद्यार्थ्याने ८०.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.

विद्युत विभागाचा निकाल ८५ टक्के लागला. या विभागातील ४१ विद्यार्थी विशेष तर ४३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ८५.५३ टक्के गुण मिळविणारी शितल कहांडळ प्रथम तर ७५.२६ टक्के गुण मिळवून रोहित परदेशी या विद्यार्थ्याने दुसरा क्रमांक पटकावला. मेकॅनिकल विभागाचा निकाल ८३ टक्के लागला. या विभागातील ७६ विद्यार्थी विशेष तर ८० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. विभागात ७७.४६ टक्के गुण मिळवणारा अक्षय भोळे प्रथम आला आहे. तर माहिती तंत्रज्ञान विभागाचा निकाल ८१.३९ टक्के लागला असून, विशेष श्रेणीत १९ टक्के तर ४५ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या विभागात ७५.१४ टक्के गुण मिळवणारा शेहजाद शेख हा विद्यार्थी प्रथम आला. स्थापत्य विद्याशाखेचा निकाल ८० टक्के लागला. या यशस्वी विद्यार्थ्यांचा कॉलेजचे प्राचार्य डॉ. गजानन खराटे यांच्यासह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन समित्यांसाठी सात अर्ज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत नव्याने तयार करण्यात आलेल्या तीन समित्यांच्या सभापती व उपसभापती पदासाठीची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरुवारी तीन समित्यांसाठी सात अर्ज दाखल झाले आहेत. शहर सुधार समितीच्या सभापतीपदासाठी भगवान दोंदे, विधी समितीसाठी शीतल माळोदे, तर आरोग्य समिती सभापती पदासाठी सतीश कुलकर्णी यांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, आरोग्य समितीच्या उपसभापती पदासाठी भाजपच्या शांता हिरे आणि मनसेच्या योगेश शेवरे यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचे उपसभापत‌ी पद मनसेला मिळण्याची शक्यता आहे. सातपूर प्रभाग समितीच्या सभापत‌िपदाचा मोबदला मनसेला मिळण्याची शक्यता आहे.

महापालिकेत सत्ताधारी भाजपने शहर सुधार, विधी व वैद्यकीय आणि आरोग्य या तीन समित्यांची नव्याने निर्मिती केली आहे. या समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाची निवड २४ जुलैला होणार आहे. त्यासाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात ‘शहर सुधार’ च्या सभापत‌ी पदासाठी भगवान दोंदे, तर उपसभापत‌ी पदासाठी स्वाती भामरे यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहे. ‘वैद्यकीय व आरोग्य’च्या सभापत‌ी पदासाठी सतीश कुलकर्णी यांनी तर उपसभापत‌ी पदासाठी शांता हिरे यांनी अर्ज दाखल केले. विधी समितीच्या सभापत‌ी पदासाठी शीतल माळोदे यांनी तर उपसभापत‌ी पदासाठी राकेश दोंदे यांनी अर्ज दाखल केले आहेत. या तीनही समित्यांमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. विरोधात असलेल्या शिवसेनेने अल्पमतामुळे उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीनही समित्यांच्या निवडणुका बिनविरोध होण्यची शक्यता आहे.

दोस्ताना सलामत

मनसेच्या वतीने वैद्यकीय व आरोग्य समितीच्या उपसभापती पदासाठी योगेश शेवरे यांनी अर्ज दाखल केला आहे. सातपूर प्रभाग समितीच्या सभापती पदासाठी मनसेने आपले मत भाजपच्या पारड्यात टाकले होते. त्यामुळे या ठिकाणी भाजपचा सभापती झाला होता. त्यामुळे त्याचा मोबदला म्हणून मनसेला वैद्यकीय व आरोग्य समितीचे उपसभापती पद दिले जाण्याची शक्यता आहे. या पदासाठी शांता हिरे यांनीही अर्ज दाखल केला आहे. पंरतु, त्या माघार घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मनसे आणि भाजपचा सातपूरमधील दोस्ताना पालिका मुख्यालयातही सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारणा, भाम, वाकीला पूर

$
0
0

म. टा. वृतसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दारणा, भाम व वाकी या नद्यांना या महिन्यात दुसऱ्यांदा पूर आला आहे. अवघ्या चोवीस तासांत १४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान या पुरस्थितीमुळे घोटी-सिन्नर महामार्गावरील पुलाच्या कामामुळे पर्यायी मार्ग असलेल्या घोटी-खैरगाव या रस्त्यावरही पुराचे पाणी आल्याने हा मार्गही ठप्प झाला आहे. त्यामुळे घोटी-सिन्नर महामार्गावरिल वाहनांना आता साकुर फाटामार्गे वळविण्यात आले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून, दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे दारणा, वाकी, भाम व भावली या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.

दारणा ८२ टक्के भरले

इगतपुरी तालुक्यात यावर्षी जुलैमध्येच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ दिवस आधीच भावली धरण ओसंडून वाहू लागले. दारणा धरणही जवळपास ८२ तर कडवा धरणातही ८० टक्के पाणीसाठा आहे. मुकणे व वाकी या धरणातही अनुक्रमे ३२ व २९ टक्के पाणीसाठी आहे.

दारणा धरणातून गेल्या आठ दिवसांपासून विसर्ग सुरू आहे. शुक्रवारीही दारणा धरणातून १४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर कडवा धरणातून १४०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले. तालुक्यात चोवीस तासांत १४३ मिमी तर शुक्रवारपर्यंत २०३० मिमी पावसाची नोंद आहे. एकूण पावसाच्या तुलनेत ६० टक्के पाऊस झाला आहे.

पर्यायी मार्गही पाण्यात

घोटी-सिन्नर महामार्गावरील पुलाला भगदाड पडल्यामुळे अवजड वाहतूक साकुर फाटा ते व्हिटीसी कंपनी व साकुर फाटा ते मुंढेगावमार्गे वळविण्यात आली आहे. हलक्या वाहनांसाठी देवळे खैरगाव, शेणवडघोटी मार्ग सुरू आहे. मात्र पावसामुळे शेणवड मार्गावरील मोरीवरही शुक्रवारी पुराचे पाणी आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्ली-कर्नाटकचा संघ आघाडीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा फेन्सिंग असोसिएशन, महाराष्ट्र फेन्सिग असोसिएशन आणि के. एन. डी. मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय तलववारबाजी स्पर्धेत दिल्ली आणि कर्नाटकच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला.

उद्घाटन कार्यक्रमांनंतर मिनी गटाच्या स्पर्धांना प्रारंभ झाला. यामध्ये मुलांच्या फॉईल या सांघिक प्रकारात दिल्लीने महाराष्ट्राचा १५ विरुद्ध ११ असा चार गुणांनी पराभव करून विजय संपादन केला. याच गटात केरळ संघाने मध्यप्रदेशचा १५ विरुद्ध ४ गुणाने पराभव करून विजयी सलामी दिली. मिनी मुलींच्या सांघ‌िक सॅबर या प्रकारात कर्नाटक विरुद्ध मणिपूर या अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात कर्नाटक संघाने शेवटच्या काही मिनिटांत चांगला खेळ करून हा सामना १५ विरुद्ध १४ अशा अवघ्या एक गुणाने जिंकून विजय मिळविला. मात्र, त्यानंतर दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात मणिपूर संघाने जोमाने खेळ करून हा सामना १५ विरुद्ध १ अशा मोठ्या फरकाने जिंकून विजय साजरा करीत आपले आव्हान कायम राखले. मध्य प्रदेशच्या मुलींच्या संघानेही कर्नाटक संघाबरोबर खेळ करताना चांगला समन्वय राखत हा सामना १५ विरुद्ध ११ अशा गुणांनी जिंकून संघाला पुढे जण्यासाठी महत्वाचे पाऊल टाकले. दिवसभर साखळी सामने होणार असून, त्यानंतर आज बाद पद्धतीचे सामने होणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार दिलीप बनकर त्यांच्या हस्ते झाले. खेळाडूंना संबोध‌ित करता‌ना बनकर म्हणाले की, तलवारबाजी हा खेळ फार पूर्वीपासून ऑल‌िम्पिकमध्ये आहे. त्यामुळे या खेळावर लक्ष केंद्रीत केल्यास भारताला पदके मिळू शकतील. यासाठी नाशिकचा प्रयत्न चांगला असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक अशोक दुधारे यांनी तर सूत्रसंचालन आनंद खरे यांनी केले.


स्पर्धेचा निकाल

फॉईल मुले

१) दिल्ली विजयी विरुद्ध महाराष्ट्र (१५-११ )

२) केरळ व‌िजयी विरुद्ध मध्यप्रदेश (१५-०४)

३) गुजराथ विजयी विरुद्ध महाराष्ट्र (१५-०९)

सॅबर मुली

१) कर्नाटक विजयी विरुद्ध मणिपूर (१५-१४)

२) दिल्ली विजयी आंध्रप्रदेश (१५-१०)

३) मणिपूर विजयी विरुद्ध दिल्ली (१५-०४)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकालानंतरच ‘द्वारका’चा निर्णय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

द्वारका चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पालिकेच्या जागेवरील अतिक्रमण काढून तेथे यू-टर्नद्वारे वाहतूक वळवण्याच्या विषयावर शुक्रवारी पालिका आयुक्त, आमदार देवयानी फरांदे व अतिक्रमण धारकांची बैठक झाली. या बैठकीत गाळेधारकांनी अतिक्रमण काढून घेतल्यास त्यांच्या पुनर्वसनाचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले. स्वतःहून अतिक्रमण न काढल्यास कोर्टाच्या निकालानंतर कारवाई केली जाईल, असे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ‘द्वारका’ची कोंडी फुटण्यासाठी कोर्टाच्या निकालाची वाट पहावी लागणार आहे.

या बैठकीत ‘द्वारका’ची कोंडी फोडण्यासाठी महापालिकेची जागा रिक्त करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. येथील हनुमान मंदिराचे स्थलांतर करणे, भुयारी मार्ग वाढवणे आणि पुण्याकडून येणारी वाहने यू-टर्नने मुंबईकडे वळवण्याचा प्रस्ताव आमदारांनी ठेवला. त्यावर येथील व्यावसायिकांनी अतिक्रमण काढल्यास हे काम तातडीने सुरू करता येईल, असे आयुक्तांनी सांग‌ितले. परंतु, गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला आहे. तो मागे घ्यावा, असे सांगण्यात आले. परंतु, गाळेधारक तयार नसल्याने आयुक्तांनीही न्यायालयाच्या निकालानंतर बघू, असे सांगितले.


‘न्हाई’ची ना-हरकत हवी

द्वारकाची कोंडी फोडण्यासाठी पुणे व धुळ्याकडून येणारी वाहतूक यू-टर्नने वळविण्याचा विचार सुरू आहे. त्याबाबत महापालिका आयुक्तांनी या कामाची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (न्हाई) ना-हरकत दाखला मागितला आहे. मुंबईकडून येणारी वाहतूक टाकळीरोडने वळवायची आणि पुण्याकडील वाहतूक मुंबई नाक्याकडे वळवण्याचा विचार सुरू आहे. परंतु, त्यासाठी बॅरिकेट्स तोडावे लागणार आहेत. त्यासाठी परवानगी मिळाल्यास पालिका द्वारकाची कोंडी फोडण्यासाठी चाचपणी करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images