Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

चला, भंडारदऱ्याच्या पिकनिकला...!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
श्रावणाची मजा लुटायची असेल तर घराबाहेर पडायला हवे. पिकनिकला जायला हवे, पण पिकनिकला जायचे म्हणजे ग्रुप हवा. त्यात भंडारदरा व त्यासारखी आजूबाजूची काही ठिकाणे असतील तर ग्रुपशिवाय पर्याय नाही. हाच विचार करून ‘मटा कल्चर क्लब’तर्फे खास तुमच्यासाठी ३० जुलै रोजी एकदिवसीय पिकनिकचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होणाऱ्यांसाठी विशेष सवलतीही देण्यात येणार आहे. वय वर्षे ५० पेक्षा कमी असलेल्यांना या पिकनिकसाठी नोंदणी करता येईल.

पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य अनुभवायचे असेल तर भटकंतीशिवाय पर्याय नाही. अशा पिकनिक्सच्या आयोजनाचीही अनेकजण वाट बघत असतात. सध्या पावसामुळे निसर्गाने हिरवी शाल पांघरली असून त्याचा अनुभव या एकदिवसीय पिकनिकमधून घेता येणार आहे. या सहलीत चहा, नाश्ता आणि दुपारचे जेवण कल्चर क्लबकडून असणार आहे. या पिकनिकसाठी लिमिटेड सिट्स असल्याने नोंदणी करणे गरजेचे आहे. ‘मटा कल्चर क्लब मेंबर’साठी ८५० तर इतरांसाठी ९५० रुपये नोंदणी फी आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे चौधरी यात्रा कंपनीतर्फे देशांतर्गत यात्रेसाठी ५ टक्के डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. तुमचा जर पाच जणांचा ग्रुप असेल आणि तुम्हाला देशांतर्गत टूर करायची असेल तर प्रत्येक सीटमागे तुम्हाला ५ टक्के (कमाल ७५० रुपये प्रतिसीट) डिस्काउंट मिळेल. तुमचा १० जणांचा ग्रुप असेल तर प्रत्येक सीट मागे ७ टक्के (कमाल १००० रुपये प्रतिसीट) डिस्काउंट मिळेल. ही ऑफर सहलीत सहभागी होणाऱ्या मटा कल्चर क्लब मेंबरसाठीच आहे. विदेश यात्रांसाठी आकर्षक सवलती चौधरी यात्रा कंपनीने दिल्या आहेत.

नोंदणीसाठी संपर्क
महाराष्ट्र टाइम्सच्या अल्फा स्क्वेअर, दुसरा मजला, डिसुजा कॉलनी, कॉलेजरोड, नाशिक - ४२२००५ या पत्त्यावर किंवा ०२५३-२६६३७९८७ , ७०४०७६२२५४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी
फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub
टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गटसचिवांनी घेतली जयंत पाटील यांची भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
राज्य सहकारी गटसचिव व कर्मचारी संघटनेला राज्य सरकारकडून आश्वासनांखेरीज काही न मिळाल्याने गटसचिवांच्या शिष्ट मंडळाने पुणे येथे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात शेतकरी कामगार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि शेकाप आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली.
राज्यातील गट सचिवांचे सेवा व वेतनाच्या समस्यांबाबत संघटनेने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. पण सरकारकडून आश्वासनांखेरीज काहीच मिळाले नाही, अशी कैफियत संघटनेने मांडली. शेतकरी कामगार पक्ष युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष कृषिभूषण महेश कडूस-पाटील व युवक आघाडी नाशिक जिल्हाध्यक्ष विकास मोरे यांनी गट सचिवांचे प्रश्न जयंत पाटील यांना विस्तारित करून त्यांच्या समस्याबाबत सांगितले. हे प्रश्न शेतकरी कामगार पक्षातर्फे विधानभवनात मांडण्याची मागणी केली. या संदर्भात पक्षातर्फे बुधवारी (दि. २६) कारवाई सुरू करणार असल्याचा दिलासा जयंत पाटील यांनी गटसचिवांना दिलासा दिल्याची माहिती महेश कडूस-पाटील यांनी दिली. यावेळी ‘शेकाप’चे शांताराम कुंजीर, युवक आघाडी नाशिक जिल्हाध्यक्ष विकास मोरे, हेमंत भरवीरकर, योगेश मोरे, प्रशांत शेलार, चेतन बोराडे, प्रदीप साळुंके आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंगी गडासाठी मदतीस केंद्र तयार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

श्री सप्तशृंग देवीच्या सेवेसाठी व गडाच्या विकासासाठी केंद्राकडून जी मदत अपेक्षित आहे ती सर्व मदत आम्ही करू. राष्ट्रीय स्तरावरील इतर देवास्थानांप्रमाणे गडाचा विकास करण्यासाठी नियोजन करावे, असे प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री महेश शर्मा यांनी दिले.

सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी त्यांना निमंत्रण देण्यासाठी गेलेले नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, विश्वस्त उन्मेष गायधनी, आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार प्रसाद पवार व प्रसाद पेटकर यांच्याशी ते दिल्लीत बोलत होते. गडावरील विकासाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी श्री सप्तशृंग निवासीनी देवी ट्रस्ट व श्री सप्तशृंग गड ग्रामपंचायतीचे निमंत्रण खासदार गोडसे, विश्वस्त गायधनी यांच्या हस्ते देण्यात आले. मंत्री शर्मा म्हणाले, की शिवा सर्किटप्रमाणे शक्तीपीठ सर्किट सुरू करण्याची कल्पना चांगली आहे. त्यावर आवश्य विचार करू. त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंग मातेचे दर्शन एकाच वेळी करण्याचा माझा विचार आहे. नाशिकला धार्मिक पर्यटनवाढीसाठी केंद्राकडून पाहिजे ती मदत खासदारांनी मागावी, आम्ही लगेच ती उपलब्ध करून देऊ. भाविकांना अधिक सुविधा मिळाल्या पाहिजे. तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटक येथे आकर्षित झाले पाहिजे, अशा सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. यावेळी मंत्री शर्मा यांना ‘सृजनाचा सारथी’ हे पुस्तक देण्यात आले. श्री सप्तशृंग निवासीनी देवी ट्रस्टचे आमंत्रण त्यांनी स्वीकारून पुढील भेटीत श्री दर्शनासाठी जरूर येईन, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये निर्मलवारी अभियान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जानेवारी महिन्यात होणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवात निर्मलवारी अभियान राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पंढरपूर यात्रेत राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभत असून त्याच धर्तीवर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
दरवर्षी जानेवारीत त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ यात्रोत्सव होतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी बांधव त्र्यंबक नगरीत दाखल होतात. भाविकांच्या गर्दीमुळे व्यवस्थापन पहाणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेवरही ताण येतो. कुशावर्तात स्नान, त्र्यंबकराजासह निवृत्तीनाथांचे दर्शन व फडावर मुक्काम या पध्दतीने येथील कार्यक्रमाचे नियोजन होते. दरवर्षी यात्रेपूर्वी मेनरोड, कुशावर्त परिसरातील अतिक्रमण हटविणे, खड्डे डांबराने बुजविणे अशी कामे केली जातात. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ठिकठिकाणी जंतूनाशक फवारणीही करण्यात येते. परंतु, या काळात त्र्यंबकमध्ये अस्वच्छता तसेच रोगराईचे प्रमाण वाढते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’चा आधार घेत पंढरपूरप्रमाणेच त्र्यंबक यात्रोत्सवातही निर्मलग्राम संकल्पना राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. श्रावणी सोमवारच्या नियोजनाबाबत त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

निर्मलग्रामची संकल्पना मूर्त रुपात आणण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. प्राथमिक स्तरावर ही संकल्पना राबविण्यासाठी त्र्यंबकमधील १३ ठिकाणे निश्च‌ित केली आहेत. त्र्यंबकमधील विविध आखाड्यांशी याबाबत चर्चा केली जाणार आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती आणि उपाययोजना अशा दोन टप्प्यांमध्ये हे निर्मलवारी अभियान कार्यान्वित केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठाच्या दातृत्वाला मुख्यमंत्र्यांचा सॅल्यूट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

धकाधकीच्या जीवनात अनेक टक्केटोणपे खाल्यानंतर माणसाला खरे जीवन जगण्याचे सूत्र कळते. माणसाने माणसाला मदत केली पाहिजे, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे चालले पाहिजे याची जाणीव होते. आणि त्याबरहुकूम तो चालायला लागतो. मदतीसाठी हात पुढे करतो, धडपडणाऱ्याला उठवतो, चालणाऱ्याला पळायला शिकवतो अशाच माणसाचे कौतुक होते. त्याची ही धडपड सत्कारणी लागते, आणि सर्वोच्च पातळीवरून त्याच्या या सद्गुणांचा सन्मान होतो अशीच एक श्रृंखला आली आहे, एका ज्येष्ठ नाशिककराच्या वाट्याला. आयुष्याच्या सायंकाळी त्याने केलेल्या मदतीचे थेट मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून कौतुक केले आहे. या उतारवयातही पाठीवरती कौतुकाची ही पडलेली थाप पाहून या वृध्दाला कृतकृत्य झाल्याचा भास नसेल झाला तर नवल!

रामचंद्र बाळकृष्ण देशपांडे असे या ज्येष्ठ नाशिककराचे नाव आहे. वयाच्या ९० व्या वर्षी आपल्याला मिळणाऱ्या पेन्शनमधून मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीसाठी त्यांनी चक्क पन्नास हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. त्यांच्या या कृतीचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी कौतुक केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी तात्काळ ट्विट करून समाधान व्यक्त केले. रामचंद्र देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, की ‘मी माझ्या मुलाकडे रहात असून मला फारसा खर्च करावा लागत नाही. मला २३००० रुपये पेन्शन असून माझे वय ९० वर्षे आहे. आपल्या सरकारने शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाबाबत माफी देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याबाबत आपले अभिनंदन. कर्जमाफीची रक्कम मोठी आहे ती उभारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मी या देशाचा नागरिक म्हणून माझ्या ऐपतीनुसार ५०००० रुपये चेक देत आहे, त्याचा स्वीकार व्हावा.’ या पत्राचे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले असून एकप्रकारे मदतीसाठी त्यांनी आवाहनच केले आहे.

माणुसकीचा सर्वोच्च गहीवर म्हणजे रामचंद्र बाळकृष्ण देशपांडे यांनी पाठवलेली मदत व पत्र आहे. रामचंद्रजी ९० वर्षांचे असून निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. त्यांना २३ हजार रुपये पेन्शन मिळते. त्यांनी दोन महिन्याची पेन्शन शेतकऱ्यांसाठी पाठवून त्यांना एकप्रकारे सॅल्यूटच केला आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


मी कोणतीही प्रसिध्दी मिळण्याच्या हेतूने हे काम केलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले हेदेखील मला माहीत नाही. मी माझे काम केले आहे. माझी क्षमता ५० हजारांचीच आहे, म्हणून ते दिले; परंतु मला त्यांना आणखी पैसे देता आले असते तरी आनंदच झाला असता.
- रामचंद्र देशपांडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकेतरांसाठी बेमुदत उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य खासगी शाळा शिक्षकेतर संघटननेचे राज्य अध्यक्ष सतीश नाडगौडा १ ऑगस्टपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी महसूल आयुक्त व शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.

गेल्या सतरा वर्षांपासून प्रलंबित मागण्यांवर सरकार पातळीवर कोणतीही दखल घेतली जात नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. २००० पासून शिक्षकेतरांसाठी आकृतीबंध प्रस्तावित करण्याच्या नावाखाली शिक्षकेतरांची पदे मंजूर करण्यात येत नाही. तसेच पदोन्नतीची पदांनाही मान्यता मिळत नाही. मानसिक व शारिरीक त्रासासोबतच शिक्षकेतर निराशेने त्रासले आहे. राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक यांबरोबर अनुदानित खासगी शाळास्तरांवर कामे करणारी एकमेव नोंदणीकृत अधिकृत संघटना असताना शासनस्तरावर त्याची दखल न घेतल्याचे कारणही आंदोलन करण्यायामागे सांगितले जात आहे.

केंद्र, राज्य सरकारी व निम सरकारी कर्मचारी वर्गास मिळाण्यापूर्वी शिक्षकांना लागू करण्यात आलेली त्रिस्तरीय वेतनश्रेणी अर्थात कालबध्द पदोन्नती केवळ आणि केवळ शिक्षकेतरांनाच लागू करण्यात आलेली नाही. ती विनाविलंब लागू करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. नाडगौडा यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून बुलढाणा आणि धुळे येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर एक ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेतील प्रवेशावर आता येणार मर्यादा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत सोमवारी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी घातलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. यामुळे आता प्रवेशद्वारावर सुरक्षा वाढवून शिष्टमंडळात आता पाच सदस्यांनाच प्रवेश दिले जाणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट केले आहे.

सोमवारी प्रहार संघटनेने अपंगांच्या प्रश्नांसाठी आंदोलन केल्यानंतर कडूंसह सर्व आंदोलकांनी आयुक्तांच्या दालनाशेजारील सभागृहात प्रवेश केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने काही कार्यकर्ते आयुक्तांच्या शेजारी उभे राहिले. त्यावरूनच वाद निर्माण झाला. यामुळे पालिकेत असलेल्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पालिकेत प्रवेश करणाऱ्यांवर कोणताही निर्बंध नसतो. मुख्य प्रवेशद्वारासह इतर दोन प्रवेशद्वारातूनही नागरिक प्रवेश करतात. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील सुरक्षेसंदर्भात असलेल्या आदेशाचीच अंमलबजावणी केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यानुसार इतर प्रवेशद्वारावरील सुरक्षा कडक केली जाणार असून, पालिकेत येणाऱ्याची तपासणी केली जाणार आहे. तसेच, शिष्टमंडळांना प्रवेश देतांना केवळ पाच व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौचालयांसाठी ३१पर्यंत मुदत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्या महिन्याभरापासून येथील महापालिकेने शहर हागणदारीमुक्त करण्याचे अभियान सुरू केले आहे. या अभियानाची अंतिम मुदत (३१ जुलै) केवळ पाच दिवसांवर आली आहे. शहर हागणदारीमुक्त होण्यासाठी ११ हजार वैयक्तिक शौचालय उभारण्याचे लक्ष पालिका प्रशासनापुढे होते. आतापर्यंत केवळ ५ हजार ५४० वैयक्तिक शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे.

शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी मालेगाव पालिकेला राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. या अभियानासाठी आयुक्त संगीता धायगुडे आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचारी जोमाने कामाला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रबोधन, पथनाट्य, कार्यशाळा या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे प्रयत्न होत आहेत. तसेच उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

दरम्यान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत हागणदारीमुक्त शहराच्या पाहणीसाठी राज्यस्तरीय समिती येत्या आठवड्यात येणार आहे. याबाबत पालिका प्रशासनाने शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. शहरातील सर्व नगरसेवकांनी आपले वार्ड हागणदारीमुक्त झाल्याचे घोषणापत्र दिले असून, शाळा, महाविद्यालय, महिला बचत गट यांच्याकडून देखील असे घोषणापत्र घेतले जात आहे. शासनाने दिलेली मुदत पाच दिवसांवर आलेली असल्याने पालिका प्रशासन हागणदारी मुक्त शहरासाठी युद्धपातळीवर कामाला लागली आहे. मात्र राज्यस्तरीय समितीच्या पाहणी अहवालावरच पालिका प्रशासनाला हागणदारी मुक्त शहर अभियानात किती यश मिळाले हे स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कृषी केंद्रे तंत्रज्ञानात अग्रेसर’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केवळ राज्यातीलच नव्हे, तर देशातील शेतकऱ्यांपर्यंत अद्ययावत कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत. शेतकरीहित जोपासण्यासाठी सर्वच कृषी विज्ञान केंद्रे अग्रेसर असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी नफ्यात वाढ होणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनानेही पुढाकार घेतला असल्याचे प्रतिपादन कृषी तंत्रज्ञान अनुसंधान संस्थेचे संचालक डॉ. लखन सिंग यांनी केले.

नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्रात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा समारोप डॉ. सिंग यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. एन. सुधाकर, हैदराबाद येथील कृषी तंत्रज्ञान अनुसंधान संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, कृषी विस्तार शिक्षण संचालक डॉ. के. आनंद सिंग, श्रीनिवासुलू उपस्थित होते.

दूरस्थ शिक्षणपद्धतीत मुक्त विद्यापीठातून कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थी अन्य विद्यापीठांच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे राज्य आणि केंद्र शासनाच्या सेवेत सर्वाधिक विद्यार्थी मुक्त विद्यापीठात कृषी शिक्षण घेतलेलेच कार्यरत आहेत. याशिवाय शास्रीय पद्धतीने शेती आणि स्वयंरोजगार करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. मुक्त विद्यापीठाची पारंपरिक विद्यापीठांशी कोणतीही स्पर्धा नाही. दरम्यान, पुढील काळात समाजाला मोठ्या प्रमाणात शिक्षित करण्यासाठी दोन्ही विद्यापीठांनी एकमेकांना बरोबर घेऊन काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादनात भरीव वाढ होऊन त्यांना बळकटी मिळेल, असा विश्वास मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ यांनी व्यक्त केला.

---

तीन राज्यांकडून सादरीकरण

या कार्यशाळेत तीन राज्यांतील कृषी विज्ञान केंद्रांच्या प्रमुखांनी सादरीकरण केले. त्यात प्रामुख्याने कौशल्य विकास, गरजानुरूप कार्यक्रम राबविणे, मातीपरीक्षण आणि जमीन आरोग्यपत्रिका, मृदा व जलसंधारण, एकात्मिक शेती, शाश्वत शेती, दुष्काळसदृश स्थितीत उपाययोजना आदी बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट पोस्टरचा बहुमान मुक्तच्या कृषी विज्ञान केंद्राने पटकावला. मान्यवरांच्या हस्ते हा बहुमान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील यांनी स्वीकारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनबाबत न्याय मिळवून देऊ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

पेन्शनधारकांना न्याय मिळवून देऊ, तसेच जिल्ह्यातील आयटी कंपन्या एकाच छताखाली आणू, असे आश्वासन खासदार हेमंत गोडसे यांनी कामगारांना दिले.
सुप्रीम कोर्टाने पेन्शनधारकांना किमान साडेसहा हजार रुपये पेन्शन द्यावी, असे आदेश केंद्र शासनाला केले आहेत. परंतु, केंद्र व राज्य सरकारकडून न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जात नसल्याने कामगारांची नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर कामगार विकास मंचने कामगार संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक आयोज‌ति केली होती. याप्रसंगी पेन्शन धारकांना न्याय मिळवून देणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. यावेळी इंड‌यिा सिक्युरिटी प्रेसचे अध्यक्ष जगदीश गोडसे, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कामगार युनियनचे अध्यक्ष योगेश चव्हाण, कामगार विकास मंचचे अध्यक्ष कैलास मोरे, महिंद्रा सोनाचे अध्यक्ष उत्तम खांडबहाले आदींसह कामगार संघटनेचे पदाधिकारी
उपस्थित होते.
पेन्शनधारकांच्या अनेक समस्या आहेत. त्यातच कामगार कायद्यानुसार कामगारांना न्याय मिळत नसल्याने अडचणींचा सामना करण्याची वेळ येत आहे. यासाठी कामगार विकास मंच व कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला खासदार गोडसे यांना आमंत्रित करण्यात आले होते. गोडसे यांच्याकडे कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध समस्या मांडल्या. याप्रसंगी खासदार गोडसे यांनी पेन्शन धारकांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगत, किमान साडेसहा हजार रुपये पेन्शन मिळावी यासाठी संसदेत आवाज उठविणार असल्याचे आश्वासन दिले. कामगारांच्या विविध समस्यांबाबत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असून, बंद कारखाने सुरू करण्यासाठीही शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. या बैठकीत महिंद्रा अॅण्ड महिंद्रा युनियनचे सरचिटणीस सोपान शहाणे यांनी कामगारांच्या समस्या मांडल्या. नवीन कायद्यानुसार कामगारांना न्यायच दिला जात नसल्याचे शहाणे यांनी सांगितले. केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप व शिवसेना सरकारने कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष घालावे, अशीही मागणी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

…तर पालिकाच जबाबदार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

खड्ड्यांवरून दिल्लीपासून मुंबईपर्यंत गदारोळ सुरू असताना मालेगाव शहरातही काही वेगळी परिस्थिती नाही. शहरात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांना याच चिखलातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे भविष्यात या रस्त्यामुळे अपघात झाल्यास पालिकाच जबाबदार राहील, असा इशारा रहिवाशांसह, पालकांनी दिला आहे.

शहरातील कॉलनीभागासह, उपनगरांतील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. जुना आग्रा रोडवरील अलमा पूल-मोतीबाग नाका ते नवी वस्ती परिसरात जाणारा रस्ता असून अडचण नसून खोळंबा असा झाला आहे. मोतीबाग नाक्यावरूनच शहरातील संगमेश्वर भागात जाता येते. या रस्त्यावर रहदारी जास्त असते. शाह व काकाणी विद्यालयातील विद्यार्थ्यांना याच रस्त्याने ये जा करावे लागते. पालिकेने अमृत योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी गेल्यावर्षी या रस्त्याचे खोदकाम केले होते. मात्र जलवाहिनीचे काम पूर्ण होवूनही पालिकेने हा रस्ता दुरुस्त केला नाही. गेल्या वर्षांपासून या रस्त्यावर मोठे खड्डे व चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात तर हा रस्ता अधिकच धोकादायक ठरत आहे. या रस्त्यावर शाळा असल्याने सकाळपासूनच विद्यार्थी रिक्षा, व्हॅन, स्कूलबस, सायकल तर काही पायी मार्गाने येतात. मात्र या रस्त्यावर वाहने घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मुले जीव मुठीत धरून वाट काढत आहेत. त्यात शहराच्या पूर्व भागाला जोडणार अलमा पूल याच मार्गावर असल्याने अवजड व प्रवासी वाहतूक सातत्याने सुरू असते.

प्रशासनाकडून चालढकल

पालिकेचे मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. स्थानिक नगरसेवकांना देखील याबाबत देणे घेणे नसल्याचे दिसत आहे. स्थानिकांनी अनेकवेळा तक्रार करूनही रस्ता दुरुस्ती होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अशीच अवस्था मोतीबागनाका ते नवी वस्तीला जोडणाऱ्या रस्त्याची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसफेऱ्या घटल्याने धावपळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शहर बससेवेतील तोट्याच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने शहर परिसरासह अंबड व पाथर्डी मार्गावरच्याही अनेक बसफेऱ्या रद्द केल्या अाहेत. या भागातील सुमारे ऐंशी टक्के बसफेऱ्या बंद झाल्यामुळे सिडको परिसरातील रहिवाशांसह अन्य उपनगरांतून येथे ये-जा करणारे नागरिक व कामगारांना धावाधाव करावी लागत असून, त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे अंबड व पाथर्डी परिसरातील बसफेऱ्या पूर्ववत कराव्यात, अशी मागणी येथील नागरिकांसह कामगारावर्गाकडून करण्यात येत आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीत शहरातील सिडकोसह विविध भागांतील कामगारांची दररोज ये-जा असते. दुचाकी किंवा कंपनीच्या वाहनांबरोबरच निम्म्याहून अधिक कर्मचारी सिटी बससेवेचा वापर करून येथे कामावर येतात. अनेक कंपन्यांच्या ड्यूटीच्या वेळेनुसार पूर्वी अंबड औद्योगिक वसाहतीत बससेवा सुरू होती. मात्र, काही दिवसांपासून परिवहन महामंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे या कामगारांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर परिसरातील डीजीपीनगर, मुरारीनगर, कामटवाडे या भागातील बसफेऱ्याही कमी झाल्याने येथील नागरिकांचे हाल होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. बस फेऱ्या कमी झाल्याने अनेक कामगारांना एका बाजूने रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे साहजिकच बसच्या तिकिटापेक्षा दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे अनेक कामगारांचे आर्थिक नियोजनच ढासळले आहे.

पाथर्डी भागातीलही बस फेऱ्या कमी करण्यात आल्याने येथे नव्याने विकसित होणाऱ्या कॉलनी आणि नगरांमधील नागरिकांना गैरसोय सहन करावी लागत आहे. जिल्हाभरातून विक्रीकर भवनमध्ये येणाऱ्यांचीही पंचाईत झाली आहे. परिवहन महामंडळाने कोणत्याही प्रकारचा ठोस विचार न करता हा निर्णय घेतला असल्याचा आरोप या भागातील नागरिकांसह कामगारांकडून केला जात आहे.

अंबड किंवा पाथर्डीकडे जाणाऱ्या बसेसद्वारे सिडको, इंदिरानगर, जुने सिडकोसह अनेक भागातील हजारो नागरिक प्रवास करीत होते. त्यामुळे या नागरिकांचेही नुकसान झाले आहे. असंख्य बस फेऱ्या बंद झाल्याने नागरिकांना आर्थिक झळ बसू लागली असून, यावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे. अनावश्यक ठिकाणच्या बस फेऱ्या बंद करण्याऐवजी गरज असलेल्या ठिकाणच्या बस बंद करून परिवहन महामंडळाने चुकीचा निर्णय घेतला असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

---

नाहक बसतोय भुर्दंड

शहरातील सीबीएसवरून या दोन्ही भागांत बसद्वारे जाताना किमान पंधरा ते वीस रुपये प्रतिव्यक्ती खर्च येतो. आता बस फेऱ्या कमी झाल्याने साहजिकच या भागातील नागरिकांन रिक्षा किंवा अन्य खासगी वाहनांचा वापर करावा लागतो. त्यासाठी दुपटीने पैसे मोजावे लागत आहेत. या भुर्दंडामुळे येथील नागरिक, विद्यार्थी, कामगार त्रस्त झाले आहेत. त्यामुळे येथील बससेवा लवकरात लवकर पूर्ववत करावी, अशी मागणी केली जात आहे.

--

पंचवटीतून अंबड औद्योगिक वसाहतीत रोजच यावे लागत. पूर्वी बऱ्याच बस असल्याने काहीही अडचण येत नव्हती. मात्र, आता बस फेऱ्या कमी झाल्याने रात्रपाळी किंवा उशिरापर्यंत काम करणे शक्य होत नाही. अंबडहून सीबीएस व सीबीएसहून पंचवटीत रिक्षाने जावे लागते. बसपेक्षा दुपटीहून अधिक खर्च होत आहे.

-संदेश कदम, कामगार

--

खरेतर अंबड औद्योगिक वसाहतीत खास महिलांसाठी बससेवा सुरू होण्याची अपेक्षा होती. परंतु, ते तर झाले नाहीच; परंतु, आता कमी बसेसमुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे. हा निर्णय अत्यंत चुकीचा असून, कामगारांवर अन्यायकारक आहे. महिलांना बस नसली, तर दोन-तीन टप्प्यांत रिक्षा करून घरी जावे लागते. यात वेळेचे व आर्थिक नियोजन ढासळले आहे.

-नयना जगताप, कामगार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन गंडा घालणारा पोलिसांच्या जाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात ऑनलाइन फसवणुकीची अनेक प्रकरणे दाखल होत असून, या प्रकरणी आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. मात्र, ओझर येथील पोलिसांनी अशाच एका प्रकरणात नायजेरियन संशयित आरोपीला सोमवारी दिल्लीतील ग्रेटर नोएडा भागात जाऊन अटक केली आहे. तपास पथक आज, मंगळवारी रात्री ओझरला परतणार असून, त्यानंतर फसवणुकीचे आणखी काही प्रकार समोर येण्याची शक्यता आहे. मॅट्रिमॉनियल वेबसाइटवर झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन ओझर येथील एका महिलेची पावणेदोन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

किंग्सले चिबुकेम असे या संशयित आरोपीचे नाव आहे. तो नायजेरियाचा नागरिक असून, काही वर्षांपासून विद्यार्थी व्हिसाच्या आधारे दिल्लीच्या ग्रेटर नोएडा भागातील डेल्टा २ या ठिकाणी तो राहत होता. किंग्सलेने काही दिवसांपूर्वी मिचेल ससोन क्रग या बनावट नावाने ओझर येथील महिलेशी मॅट्रिमॉनियल साइटद्वारे संपर्क केला. आपण लंडनमधील एका अन्नपदार्थ उत्पादक कंपनीत सेवेत असल्याचे त्याने भासवले. ओझर येथील पीडित महिला पतीशी मतभेद असल्याने आईवडिलांकडे राहते. ब्युटीपार्लर चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलेने एका मॅट्रिमॉनियल वेबसाइटवर आपली माहिती व फोटो अपलोड केले होते. वेबसाइटवरून ओळख झाल्यानंतर या दोघांमध्ये व्हॉट्सअॅपवरही संवाद सुरू झाला. मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाल्यानंतर संशयिताने पीडित महिलेला भेटण्यासाठी येत असल्याची बतावणी केली, तसेच तुझ्या पत्त्यावर काही भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले. साधारणतः दोन दिवसांनी दिल्लीतून डेल्टा कुरिअर सर्व्हिसमधून श्वेता नावाच्या मुलीचा फोन आला. तिने पार्सल सोडवण्यासाठी ४२,५०० रुपये बँक खात्यात भरण्यास सांगितले. त्यानुसार पीडित महिलेने पैसे जमा केले. यानंतर भेटवस्तू महाग आणि मोठी असल्याने विमानतळावर कस्टम ड्युटी म्हणून एक लाख २५ हजार रुपये भरण्यास संशयिताने महिलेला उद्युक्त केले. यानंतर पुन्हा ७० हजार ५०० रुपयांची मागणी झाल्यानंतर महिलेचा संशय बळावला. तिने ओझर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनीही घटनेची गंभीर दखल घेत एक पथक दिल्लीला रवाना केले. मोबाइल फोन कॉल्सचे लोकेशन व इतर काही माहितीवरून संशयितास जेरबंद करण्यात आले.

आफ्रिकन नागरिकांचा विरोध

ओझर पोलिसांच्या पथकाने दिल्लातील गौतम बुद्धनगर पोलिसांची मदत घेतली. दोन्ही पथकांतील पोलिस संशयिताच्या अपार्टमेंटपर्यंत पोहोचले. मात्र, तिथे वास्तव्यास असलेल्या आफ्रिकन नागरिकांनी पोलिसांना कोणतीही कारवाई करण्यास मज्जाव केला. तब्बल तासभर तेथील वातावरण बिघडले होते. पोलिसांनी इतर आफ्रिकन नागरिकांकडून होणारा विरोध मोडून काढत अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला आणि किंग्सलेच्या मुसक्या आवळल्या. सोमवारी (दि. २४) संशयितास सूरजपूर कोर्टात ट्रान्झिट रिमांडसाठी हजर करण्यात आले. पीएसआय भालेराव यांचे पथक संशयितास घेऊन मंगळवारी रात्री उशिरा ओझर पोलिस स्टेशनला पोहोचण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिल्म फेस्टमध्ये चमकले ‘धरती के तारे’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव चित्रपट शौकिनांचे शहर म्हणून ओळखले जाते. अनेकांनी चित्रपट निर्मिती देखील केली आहे. आता तरुणाईने शॉर्ट फिल्ममध्ये आपले नाव झळकावले असून, येथील शॉर्ट फिल्म निर्माते नदीम अर्षद मीना नगरी यांनी तयार केलेल्या ‘धरती के तारे’ या फिल्मला मुंबई येथे दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा पुरस्कार मिळाला आहे.

पोल‌सि उपअधीक्षक गजानन राजमाने यांच्या संकल्पनेतून जानेवारी महिन्यात शहरातील लघुचित्रपट निर्मिती क्षेत्रातील कलावंताना प्रोत्साहित करण्यासाठी मालेगाव शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध सामाजिक समस्यांवर जाणीव जागृती करणाऱ्या एकूण १५ शॉर्ट फिल्म यात दाखविण्यात आल्या होत्या. त्यात ‘धरती के तारे’ या लघुपटाने उपस्थितांची मने जिंकली होती. त्यामुळे या फिल्मची निवड मुंबई येथे होणाऱ्या फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाली होती. त्यावेळी विक्रम गोखले, मकरंद अनासपुरे, विनोद तावडे आदींसह अनेकांनी त्याचे कौतुक केले. ४५० पैकी ३५ लघुचित्रपटांना पुरस्कार प्राप्त झाले असून, त्यात सर्वोत्कृष्ट सामाजिक समस्येवरील लघुपट हा पुरस्कार ‘धरती के तारे’ला मिळाला आहे. मुंबई येथे हा सोहळा पार पडला. केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते फिल्म निर्माते नदीम अर्षद मीना नगरी यांना हा पुरस्कार देण्यात आला.

सत्य घटनेवर आधारित

राजमाने यांच्या सूचनेवरून नदीम यांनी सत्य घटनेवर आधारित बालकामगार या समस्येवर प्रकाश टाकणारी ‘धरती के तारे’ ही शॉर्टफिल्म तयार केली. यात शहरा तील बालकामगार असलेल्या शाहीद पठाण याने अभिनय केला होता. त्याची ही सत्यकथा पाहून त्यास बालकामगारी पासून परावृत्त करण्यासाठी राजमाने, नदीम व या. ना. जाधव संस्थेचे चेअरमन सुनील वडगे यांनी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आह. शाहीद सध्या सहावीत शिक्षण घेत आहे. ही फिल्म https://www.youtube.com/watch?v=ffVYuyYgqBU या लिंकवर उपलब्ध आहे.म. टा. वृत्तसेवा, सटाणा

राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्यसाठी येत्या १ ऑगस्टपासून धान्य व रॉकेलचा कोटा न उचलण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर बागलाणच्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने तहसीलदार सुनील सौंदाणे यांना निवदेन दिले.

बागलाण तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी प्रवीण सावंत, राजेंद्र खानकरी, रमेश मुळे यांच्या नेतृत्त्वाखाली मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. द्वारपोच योजनेअंतर्गत ठिकठिकाणी शासकीय गोदामात परवानाधारकांकडून भराई, उतराई रक्कम सक्तीने वसूल केली जाते. ती मुक्त असावी, शालेय पोषण योजनेतंर्गत तांदूळाची पोच केलेला वाहतूक खर्च व नप्यासह अनेक वर्षांपासून शासनाकडे थकीत आहे. धान्य कोट्यासाठी रक्कम भरणा केल्या आहेत. मात्र शासनाकडून कोटा उपलब्ध न झाल्यामुळे ही रक्कम तत्काळ परत मिळावी, रॉकेलच्या कोट्यात दिवसेंदिवस कपात होत आहे. हा कोटा वाढविण्यात यावा, यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरबसल्या व्हा कल्चर क्लबचे सदस्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘मटा कल्चर क्लब’चे सदस्य होण्याची संधी तुम्हाला महाराष्ट्र टाइम्सने घरबसल्या उपलब्ध करुन दिली आहे. खास तुमच्यासाठी तुमच्या आग्रहास्तव मटा कल्चर क्लबचे फॉर्म तुम्हाला घरबसल्या मिळणार आहेत.

‘मटा कल्चर क्लब’तर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नेहमीच आयोजन केले जाते. मग ते हॅप्पी स्ट्रीट, श्रावण क्विन असो किंवा नाटक. त्याचबरोबर झुंबा डान्स, खाऊचा डब्बा, कल्चर क्लब सदस्यांचे गेट टुगेदर, लाइव्ह म्युझिकल कॉन्सर्ट, टेन्शन खल्लास कार्यक्रम, किट्टी पार्टी, गानतंत्र, सिनेतारकांची भेट, किड्स कार्निवल, सहल, मँगो फेस्टिवल, नवरंग नवरात्रीचे, मंगळागौर, एज्युकेशनल सेमिनार, क्विझ कॉन्टेस्ट, संगीत मैफिली, ख्रिसमस कार्निव्हल, कलासंगम अशा विविध कार्यक्रमांचा आस्वाद तुम्हाला वर्षभर घेता येतो. तसेच तुमच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ‘मटा कल्चर क्लब’ व्यासपीठही उपलब्ध करून देते. नाटकांसारख्या कार्यक्रमांमध्ये ‘मटा कल्चर क्लब’ सदस्यांसाठी विशेष सवलतही देण्यात येते. अशा विविध कार्यक्रमांत सहभागी व्हायचे असेल, तर आजच ‘मटा कल्चर क्लब’चे सदस्य व्हा. हे सदस्यत्व तुम्हाला घरबसल्या घेता येईल.

फक्त इतकेच करायचे...

तुम्हाला घरी मिळालेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती व्यवस्थित लिहा. हा फॉर्म आणि २९९ रुपयांचा BCCL च्या नावाचा चेक तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे द्या. चेकमागे तुमचं नाव आणि फोन नंबर लिहायला विसरू नका. तुमचा चेक क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला कल्चर क्लब सदस्यत्वाचे कार्ड थेट तुमच्या घरी मिळेल. तेव्हा आजच तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याशी संपर्क साधा आणि ‘मटा कल्चर क्लब’चे सदस्य व्हा. अधिक माहितीसाठी ७०४०७६२२५४, ६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सायन्स एक्स्प्रेससाठी गर्दी ओव्हफ्लो, विद्यार्थ्यांचा हिरमोड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर आज सायन एक्सप्रेस पाहण्यास मोठ्या हौशीने उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या हजारो विद्यार्थी, पालकांचा रेल्वे प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे मंगळवारी हिरमोड झाला. स्टेशनवर कुंभमेळ्यापेक्षाही जास्त गर्दी झाल्याने रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा दल, विशेष दल, नाशिकरोड पोलिस अशा सर्वांनाच हतबल व्हावे लागले. रेल्वेने प्रदर्शनाचा एक दिवस कमी केल्याने हा सर्व घोळ झाला.

नाशिकरोड स्टेशनच्या प्लॅटफॉर्म चारवर तेरा डब्यांची सायन्स एक्सप्रेस ही एसी गाडी २४ ते २६ जुलैदरम्यान थांबण्याचे नियोजन होते. मुंबईत हे प्रदर्शन २ लाख ३२ हजार जणांनी पाहिले. रेल्वेने नाशिक जिल्ह्यातील शाळांना पत्रे पाठवली होती. सोमवारी (दि. २४) पहिल्या दिवशी साडेदहा हजार जणांनी भेट दिली. मंगळवारी सायंकाळी साडेसहापर्यंत हा आकडा ३६ हजार जणांनी भेट दिली. त्यात ११२ शाळा होत्या. सकाळपासून अनेक शाळांच्या बसच्या झुंडीच्या झुंडी रेल्वेस्टेशन आवारात येत होत्या. खासगी वाहनांनी तर वाहनतळ व्यापला होता. ओस असलेला सिन्नरफाटाही शाळांच्या बस, एसटीबसने गजबजून गेला होता.

या झाल्या चुका

संयोजकांनी वृत्तपत्रात बातम्या, जाहिराती दिल्या. सर्व शाळांना पत्रे पाठवली. अशावेळी प्रचंड गर्दी होणार हे उघड होते. विद्यार्थ्यांसाठी वेगळा ‘टाइम स्लॉट’ हवा होता. विद्यार्थी व पालकांसाठी स्वतंत्र लाइन ठेवली असती तर चेंगराचेंगरी, असंतोष कमी झाला असता. प्रदर्शन सकाळी आठऐवजी दहाला सुरू केले. प्रदर्शनाचा एक दिवस अचानक कमी केला.

प्लॅटफॉर्म चार ओव्हरफ्लो

प्रदर्शनाचा आज दिवसाच शेवटचा असल्याचे फोन गेल्याने जिल्हा व शहरातील शाळांच्या झुंडी रेल्वेस्थानकाकडे सकाळपासूनच येऊ लागल्या. प्लॅटफॉर्म चार हा सर्वात मोठा असूनही उभे राहण्यास जागा नव्हती. रेल्वेगाडीत प्रदर्शन पाहण्यास वेळ लागत असल्याने फ्लॅटफार्मवर गर्दी वाढतच गेली. सिन्नरफाटा, देवी चौकाचा पादचारी पूल, आरपीएफ कार्यालयाशेजारील नव्या पादचारी पुलावरुन विद्यार्थी व नागरिकांच्या लाटा येतच होत्या. कुंभमेळ्यापेक्षाही जास्त गर्दी झाल्याने सर्व नियोजन कोलमडून पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

गर्दीपुढे पोलिस, जवान हतबल

विज्ञान प्रदर्शनाची माहिती देणारे पन्नास तज्ञ अफाट गर्दीमुळे हतबल झाले होते. रेल्वे सुरक्षा दल, आरपीएफ, नाशिकरोड पोलिस असे सर्वांनाच या गर्दीला रोखता रोखता नाकी नऊ आले.

गर्दी वाढल्याने रेल्वे सुरक्षा दलाचे उपअधीक्षक सुरेश चंद्र मनमाडहून डेरेदाखल झाले. या दलाचे वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण, संजय गांगुर्डे, महेश महाले, संजय पाटील आदींनी सर्व जवान बंदोबस्ताला लावले होते. रात्रपाळी केलेल्यांनाही बोलावण्यात आले. या पन्नास जवानांना गर्दी आवरत नसल्याने आरपीएफ ट्रेनिंग सेंटरचे वीस जवान आले. या सर्वांच्या मदतीला रेल्वे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नितीन पवार, अश्विनी पाटील, राजेंद्र पाटील, एस. एस. सोनवणे आदी वीस पोलिस धावून गेले. अखेर नाशिकरोडचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे साडेचारला सहकाऱ्यांसह दाखल झाले.

सायंकाळी पाचला प्रदर्शन संपण्याची वेळ असतानाही नागरिकांच्या झुंडी कमी होत नव्हत्या. प्रदर्शनाच्या लाइनमध्ये संधी मिळेल तेथून नागरिक घुसत होते. अखेर पोलिसांनी हात जोडून पालकांना व शाळांना परत पाठविण्यास सुरुवात केली. तरी गर्दी आवरत नव्हती. संतप्त शिक्षक, पालक यांचे पोलिस व जवानांशी वादविवाद झडत होते. यावेळी सौम्य लाठीमारही करण्यात आला.

शिक्षक, पालक संतप्त

उंटवाडी शाळेचे रवींद्र नाकील आणि सीडीओ मेरी शाळेचे अमोल जोशी म्हणाले की, अनेक शाळा खासगी वाहने, महामंडळाच्या बस बुक करुन प्रदर्शन पाहण्यास आल्या. अनेक विद्यार्थ्यांनी डबेही आणले नव्हते. प्रदर्शन बघता न आल्याने सर्वजण संतप्त झाले. विद्यार्थ्यांकडून बस खर्चासाठी पैसे घेतल्याने आता पालकांना काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न पडला आहे. धुळ्याहून आलेल्या बस परत पाठविण्यात आल्या. हजारो नागरिक रिक्षा, खासही वाहने करुन आले होते.


दुर्घटना टळली

सिन्नरफाटा वाहनतळ विद्यार्थ्यांनी ओसंडून गेले होते. अचानक तेथे आग्या माहोळाच्या माशा आल्या. विद्यार्थी गोंधळून गेले. काहींनी पलायन केले. काही माशांनी फलाटावर येऊन चावा घेतला. शिक्षक व पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याने दुर्घटना टळली. दरम्यान, प्रवेशाच्या तीन टप्प्यांवर दिवसभर रेटारेटी सुरू असल्याने अनेकदा चेंगराचेंगरीचे प्रसंग उद्भवले.


प्रदर्शन पाहण्यासाठी लहान मुले आणि मोठ्या माणसांसाठी स्वतंत्र सोय केली असती तर एवढे हाल झाले नसते.

-विनोद जाधव

शाळांसाठी वेगळा वेळ दिला असता तर एवढी गर्दी झाली नसती. रेल्वेचे नियोजन यंदा चुकले हे प्रशासनाने कबूल केले पाहिजे.

- वैभव घुगे

दरवर्षी सायन्स एक्सप्रेस येते. त्यामुळे प्रदर्शनाची प्रसिद्धी करण्यापूर्वीच गर्दीचा अंदाज यायला हवा होता.

- अमोल खैरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉडेल बनायचंय? श्रावणक्वीनसाठी नोंदणी करा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तुम्हाला चांगली अॅक्टिंग येतेय, मिमिक्री येतेय, तुम्ही चांगला डान्सही करू शकता? मग वाट कसली बघताय? श्रावणक्वीनसाठी आत्ताच नोंदणी करा आणि व्हा मटा सेलेब. यंदाचं श्रावणक्वीनचं सातवं वर्ष असून, ही केवळ ब्यूटी काँटेस्ट नाही, तर पर्सनालिटी काँटेस्ट आहे.

व्यक्तिमत्त्व, प्रतिभा, कलागुण, हजरजबाबीपणा आणि बुद्धिमत्ता या जोरावर प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी स्पर्धक निवडले जाणार आहेत. या निकषांमुळे केवळ मॉडेलिंग क्षेत्रातच नाही, तर गायन, अभिनय, नृत्य या क्षेत्रातही मुलींसाठी श्रावणक्वीनच्या व्यासपीठामुळे करिअर दालन खुलं होतं. दिग्गज परीक्षक आणि ग्रुमिंग एक्सपर्टमुळे स्पर्धकांना कलाकार म्हणून स्वतःला नव्यानं शोधण्याची संधी मिळते.

प्रत्येक मुलीमध्ये काहीना काही खासियत असते, ती एखादा कलागुण असो, आकर्षक व्यक्तिमत्त्व असो किंवा छाप पाडणारी संवादशैली असो. या कलागुणांच्या जोरावर सिनेमा, मालिका, नाटक किंवा मॉडेलिंगमध्ये नाव कमवण्यासाठी त्या पात्र ठरतात. अशाच गुणांना व्यासपीठ देण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीनं दरवर्षी ‘श्रावणक्वीन’ ही पर्सनालिटी काँटेस्ट आयोजित केली जाते. या व्यासपीठानं आतापर्यंत अनेक प्रतिभावान चेहरे दिले असून, यावर्षी तुमचंही नाव या यादीत येऊ शकतं. त्यासाठी, ‘श्रावणक्वीन’च्या प्राथमिक फेरीसाठी आजच नावनोंदणी करा आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयारीला लागा.

सध्या सिनेमा, नाटक आणि मालिकांमध्ये नाशिकच्या कलाकारांना प्राधान्य दिलं जातं. मॉडेलिंगमध्ये नाशिकनं आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलं आहे. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या मुलींना स्वतःला सिद्ध करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. इथं फक्त गायन, नृत्य किंवा अभिनय याच कलांना व्यासपीठ मिळतं असं नाही, तर नकलाकार, रांगोळीकार, चित्रकार, अँकर, शिल्पकार अशा कोणत्याही कला दोन मिनिटांच्या टॅलेंट राउंडमध्ये सादर करण्याची परवानगी आहे. ओळख, टॅलेंट राउंड आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून अंतिम फेरीसाठी स्पर्धक निवडले जातील. या प्राथमिक फेरीची विस्तृत माहिती आणि इतर नियम जाणून घेण्यासाठी वाचत राहा, रोजचा महाराष्ट्र टाइम्स...

नावनोंदणी अशी करा

नावनोंदणीसाठी अटी फक्त दोनच, १८ ते २५ वयोगट आणि अविवाहित असणं. आता प्राथमिक फेरीसाठी नावनोंदणी कशी करायची? तर, www.mtshravanqueen.com या वेबसाइटवर जाऊन ‘पार्टिसिपेट नाऊ’ वर क्लिक करा. इथला फॉर्म भरल्यानंतर सोबत फोटो आणि दोन मिनिटांच्या व्हिडिओचीही लिंक अपलोड करायची आहे. यामध्ये तुमची ओळख आणि स्पर्धेमध्ये भाग का घेत आहात, हे सांगणं अपेक्षित आहे. स्पर्धेचे नियम साइटवर दिलेले आहेत. त्याशिवाय फोटो आणि व्हिडिओ अपलोड कसे करायचे, याचीही माहिती तिथे आहे. जास्तीत जास्त लाइक्स मिळण्यासाठी तुमचं प्रोफाइल शेअर करायचं आहे. हे लाइक्स आणि आमच्या परीक्षकांचा कौल यावर स्पर्धकांची प्राथमिक फेरीसाठी निवड करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंगांबाबत पालिका ‘दुर्बल’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील अपंगांच्या निधीवरून झालेल्या उद्रेकाला पालिकेचे लकवा धोरणच कारणीभूत असल्याचे आता समोर आले आहे. गेल्या दोन वर्षांत पालिकेने शहरातील अपंगांच्या प्रश्नांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले असून, तीन टक्के निधीही खर्च केलेला नाही. त्यामुळेच संतप्त झालेल्या अपंगांनी व बच्चू कडू यांनी आपला राग आयुक्तांवर काढल्याने वाद निर्माण झाला आहे. तीन वर्षांत पालिकेने अपंगांसाठी नाममात्र काम केले असून, त्यांच्यासाठीचा राखीव निधीही खर्च केलेला नाही. मात्र, कडू इफेक्टनंतर पालिकेला जाग आली असून, चालू वर्षी तब्बल १४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अपंगांचे प्रश्न सोडविण्यासाठी कृती आराखडा तयार करत दहा अधिकाऱ्यांची तडकाफडकी नियुक्ती करण्यात आली आहे.

अपंगांसाठी राखीव असलेला तीन टक्के निधी खर्च न करणे आणि अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी न केल्यानेच सोमवारी आमदार कडू आणि आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यात वाद होऊन प्रकरण हातघाईवर गेले होते. २०१३ मध्ये शहरातील अपंगांचे सर्वेक्षण करण्यात येऊन ५०८ अपंगांची नोंद झाली. मात्र, हे सर्वेक्षण नंतर फाइलमध्येच राहिले. त्यांच्यासाठीचा तीन टक्के राखीव निधी दरवर्षी खर्चच झालेला नाही. केवळ ४९ अपंगांना गाळेवाटप करण्यात आले आहे, तर घरकुलांसाठी ७६ जणांची निवड केल्याची नोंद आहे. शिक्षा अभियानात आढळलेल्या २३६६ अपंग विद्यार्थ्यांवर उपचार केल्याचा दावा करण्यात आला आहे.

दहा अधिकाऱ्यांची नियुक्ती

अपंगांसाठी २८ ऑक्टोबर २०१५ रोजी तीन टक्के निधी हा १८ प्रयोजनांसाठी खर्च करण्याचा आदेश सरकारने काढला. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी दोन वर्षांपासून झालेली नाही. कडू इफेक्टनंतर पालिका खडबडून जागी झाली असून, त्यांनी १८ बाबींवर हा तीन टक्के राखीव निधी खर्च करण्यासाठी मंगळवारी तडकाफडकी १० अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी आता या दहा अधिकाऱ्यांवर असेल.

१४ कोटींची तरतूद

यंदाच्या बजेटमध्ये अपंगांसाठी १४ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत अशी तरतूद झाली नसल्यानेच हा वाद निर्माण झाला होता. शहरातील अपंगांचे नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, पालिकेला उशिरा का होईना अपंगांबाबत जिव्हाळा निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कडू यांच्या कृतीचा निषेध

$
0
0

महापालिकेत आयुक्तांसाठी सर्वपक्षीय एकजूट; काळ्या फिती लावून आंदोलन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महानगरपालिका आयुक्तांशी असभ्य वर्तन करणाऱ्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या निषेधार्थ मंगळवारी सर्वपक्षीय नेते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवली. सकाळी महापालिकेचे कामकाज सुरू होताच अधिकारी, कर्मचारी यांनी कडू यांच्या वागणुकीच्या निषेधार्थ काम बंद करीत प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू केले. महापौरांसह सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी, शिवसेना व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होत कडू यांच्या कृत्याचा निषेध करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवसभर काळ्या फिती लावून काम केले.

सोमवारी अपंगांच्या प्रश्नावर आयुक्तांच्या दालनात सुरू असलेल्या बैठकीत आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक होत थेट आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण होऊन या प्रकरणी बच्चू कडूंवर अटकेची कारवाई ओढावली. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी अधिकारी व कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले. अधिकारी संघटनांसह शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी संलग्नित कर्मचारी संघटनांनीही एकत्रित येऊन घटनेचा निषेध केला. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेता विलास शिंदे, प्रवीण तिदमे यांनीही या आंदोलनात सहभागी होत आयुक्तांना समर्थन देत कडू यांच्या कृतीचा निषेध केला. नाशिक म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेने मंगळवारी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. सुरुवातीला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले होते. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महापौर रंजना भानसी आणि मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्याने कर्मचारी कामबंद आंदोलन घेत घटनेचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल पालिकेत यांनी महापौर आणि आयुक्त यांच्यात कडू यांच्यावरील कारवाईबाबत चर्चा केली. कडूंवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करीत पालिकेच्या सुरक्षेसंदर्भातही चर्चा झाली.

बैठकींवर बहिष्कार

या घटनेच्या निषेधार्थ नाशिक महापालिका अधिकारी संघटनेने यापुढे आमदार कडू यांच्या कोणत्याही बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्रच या संघटनेच्या वतीने आयुक्तांना देण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे कडू पालिकेत आल्यास नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

विविध संघटनांचा पाठिंबा

क्रेडाईनेही आयुक्तांना निवेदन देत घटनेचा निषेध केला. यावेळी सुनील कोतवाल यांच्यासह क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन कडू यांच्यावर कारवाईची मागणी केली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे संलग्नित संघटनांनी घटनेचा निषेध करत आयुक्तांना पाठिंबा दर्शवला.

आमदारकी रद्द करण्याची मागणी

बच्चू कडू यांच्या निषेधार्थ प्रवेशद्वारावर घेण्यात आलेल्या जाहीरसभेत महापौरांसह सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कडू यांच्या कृतीचा निषेध करीत त्यांची आमदारकीच रद्द करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे कडू यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे महापौर भानसी यांनी सांगितले.

आमदार कडू यांनी लोकशाहीचा अपमान केला आहे. दहशत करून प्रश्न सुटत नाही. सोमवारच्या घटनेचा निषेध करीत असून, कडू यांच्यावर कडक कारवाईची मागणी करणार आहोत.

- रंजना भानसी, महापौर

आमदार कडू यांच्यावर कायदेशीर मार्गाने कारवाई होणार आहे. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडवावेत.

- अभिषेक कृष्णा, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीईटी’तील चुकांची छाननी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षकांचा दर्जा राखण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवारी पार पडलेल्या शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)च्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या विक्रमी चुकांप्रश्नी राज्य परिषदेला सर्वांनीच झोडपून काढल्यानंतर जाग आली आहे. या चुकांच्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी परिषदेने येत्या सोमवारी (दि. ३१) विशेष बैठकही आयोजित केल्याची माहिती आहे. विषयतज्ज्ञांकडून या चुकांची छाननी करण्यात येऊन याबाबत अहवाल सादर झाल्यानंतरच या प्रकरणी कारवाई होणार असल्याची माहिती आहे.

रविवारी शहरासह राज्यात ही परीक्षा पार पडली होती. शहरात ६० केंद्रांवर दोन्ही सत्रांत सुमारे १८ हजार परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली होती. राज्यभरातून या परीक्षेस २ लाख ९७ हजार ६७४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. राज्यात १ हजार १८ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती.

या परीक्षेसाठी ‘ए’ , ‘बी’ , ‘सी’ आणि ‘डी’ असे चार संच वापरण्यात आले होते. पहिल्या संचात १५० प्रश्नांमध्ये तब्बल ११९ चुका असल्याची धक्कादायक बाब ‘मटा’ने ‘टीईटी परीक्षेत राज्य परीक्षा परिषदच नापास’ या शीर्षकाखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून उघडकीस आणली होती. या प्रश्नपत्रिकेसोबत दिवसभरात दोन सत्रांत पार पडलेल्या परीक्षेतील चारही प्रश्नसंचांमध्ये मोठ्या चुका आढळून आल्या होत्या. दरम्यान, राज्यभरात टीकेचा विषय ठरलेल्या या प्रकरणावर परिषद भविष्यात नेमकी काय कारवाई करणार, याबाबत परीक्षार्थींमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.

--

अहवाल होणार सादर

परिषदेच्या सूचनांनुसार विषयतज्ज्ञ या प्रश्नपत्रिकांची पुनर्तपासणी करणार आहेत. त्यानंतर त्यांच्याकडून परिषदेला सादर होणारा अहवाल, परिषदेने उत्तरसूची प्रसिद्ध केल्यानंतर परीक्षार्थींच्या प्राप्त होणाऱ्या सूचना आणि तक्रारीदेखील या प्रकरणी विचारात घेतल्या जाणार आहेत. परीक्षेनंतर माध्यमांद्वारे या चुकांवर प्रकाशझोत पडला असला, तरीही परीक्षार्थींनी मात्र याप्रश्नी परिषदेकडे अद्याप तक्रारी दाखल केल्या नसल्याचीही माहिती आहे. उत्तरसूची प्रसिद्ध झाल्यानंतर परीक्षार्थींकडून याप्रश्नी तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images