Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कर्मचाऱ्यांनी द्यावे मालमत्ता विवरण

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिकेतील विविध विभागामार्फत होणारी काम, कामातील अडचणी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्वच विभागांच्या बैठकांचे सत्र सुरू आहेत. त्यात आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या उपस्थितीत आस्थापना विभागाची सोमवारी प्रथम बैठक घेण्यात आली. यावेळी आस्थापनाशी संबंधित प्रस्ताव मार्गी लावण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांच्या मालमत्ता संबंधित माहिती घेण्याचे निर्देश दिले.

दरवर्षी ही माहिती गोपनीयरित्या घेणे आवश्यक असून, विवरण पत्र प्रत्येक कर्मचाऱ्याने द्यायला हवे. याची जबाबदारी प्रत्येक विभाग प्रमुखाची आहे. परंतु, याबाबत कोणतीही कार्यवाही झाल्याचे समोर आले. त्यामुळे ही माहिती सादर न करणाऱ्या कर्मचाऱ्याची एक वेतनवाढ रोखण्यात यावी, असे निर्देश आयुक्त देशमुख यांनी बैठकीत दिले.

मनपातर्फे सन २०१६ मध्ये १२१० कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी सादर केली असून, त्यावर हरकती व सूचनाही मागविण्यात आल्या आहेत. मात्र दुरुस्ती नंतरची यादी अद्याप सादर झालेली नाही. ही यादी त्वरित प्रसिद्ध करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. बारा वर्षे पदोन्नतीचे प्रस्ताव मार्गी लावण्याचेही त्यांनी सांगितले. बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेताना या विभागातील रिक्त पदे आणि अपूर्ण कर्मचाऱ्यांमुळे येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली.

आयुक्त देशमुख यांनी मनपातील विविध विभागाचा आढावा घेताना तीन वर्षे व त्यापेक्षा अधिक काळापासून एकाच टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल माहिती घेतली. अधिक काळापासून त्याच विभागात राहिल्यामुळे काही कर्मचाऱ्यांची मक्तेदारी निर्माण झाली असल्याने ती मोडीस काढण्यासाठी त्यांच्या बदल्या करण्याचे संकेत देशमुखांनी या बैठकीतून दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रायसोनी ठेवीदारांचे मालेगावात उपोषण

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी. को. ऑप क्रेडीट सोसायटीचे ठेवीदार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी संबंधितांवर ठेवी व्याजासह परत न मिळाल्याने गुन्हा दाखल करूनही त्याचा तपास संथ गतीने सुरु आहे. अद्याप ठेवीदेखील परत मिळाल्या नाहीत. त्यामुळे हताश झालेल्या ठेवीदारांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

रायसोनी सोसासटीतचे संस्थापक चेअरमन व अन्य संचालकांवर ठेवीदारांनी १० एप्रिल २०१५ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपासा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे असून, दोन वर्षांपासून हा तपास संथ गतीने सुरू आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. या पतसंस्थेचे ८० टक्के ठेवीदार ज्येष्ठ नागरिक असून, ठेवी परत न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत लक्ष वेधून घेण्यासाठी ज्येष्ठ ठेवीदारांनी उपोषण सुरू केले आहे. आरोपींवर कारवाई करण्यात यावी, ठेवी परत मिळाव्यात अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे. या उपोषणात अनिल पाठक, श्रीकृष्ण शिरुडे, सुकदेव मोरे, इंदुबाई गोसावी, शरद देवरे, सुनील बाविस्कर आदींसह ठेवीदार सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकही होणार ‘स्मार्ट अॅण्ड सेफ्टी’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नागपूर शहराच्या धर्तीवर महापालिका आणि महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळाच्या वतीने नाशिकमध्येही ‘स्मार्ट अॅण्ड सेफ्टी सिटी’ प्रकल्प राबविला जाणार आहे. याअंतर्गत माहिती व तंत्रज्ञानाशी निगडीत सर्व विभागांचे कामकाज एकाच छताखाली केले जाणार असून, शहरात ऑप्ट‌िकल फायबरचे नेटवर्क उभे केले जाणार आहे. त्यासंदर्भात मंगळवारी पालिका आयुक्त आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांच्यात बैठक होऊन प्रकल्पाला ग्रीन सिग्नल देण्यात आला. यासाठी चार अभियंत्यांची पालिकेला मदत होणार असून, सीसीटीव्हीसह शहरातील सर्वच तंत्रज्ञानाशी निगडीत प्रकल्प एकाच छताखाली येणार आहे.

‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत स्थापन केलेल्या एसपीव्ही कंपनीने शहर विकासासाठी शंभर कोटींची तरतूद केली असून शहरात सीसीटीव्हीसाठी लागणारे नेटवर्कही यातूनच उभे केले जाणार आहे. सोबतच स्मार्ट पार्किंग, स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन, वॉटर मीटर, ई-सेवा केंद्रे, जीपीएस प्रणाली यासह माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत सर्व सुविधा एकाच नेटवर्कमधून वापरता येणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र केबल नेटवर्क उभे केले जाणार आहे. शासकीय कार्यालयांसह खासगी कंपन्यांनाही या नेटवर्कचा फायदा घेता येणार आहे. यातून पालिकेला आर्थिक फायदाही होणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. बैठकीला आयुक्त ‌अभिषेक कृष्‍णा, शहर अभियंता यू. बी. पवार उपस्थित होते.

चार इंजिनीअर्सची नियुक्ती

‘स्मार्ट अॅण्ड सेफ्टी’ नाशिकच्या प्रोजेक्टसाठी मंगळवारच्या बैठकीत गौतम यांनी पालिकेला चार इंजिनीअर मदतीला दिले आहेत. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेले हे इंजिनीअर सीसीटीव्हीसह फायबर नेटवर्कचा डीपीआर तयार करणार आहेत. संपूर्ण शहराचा अभ्यास तयार करून ते स्वतंत्र अहवाल तयार करून पालिकेला देणार आहेत. ऑप्ट‌िकल नेटवर्कसाठी यापुढे नेहमी रस्ते खोदण्याची गरज राहणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजेंद्र सरग यांचा नारद पुरस्काराने गौरव

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्‍ह्यातील नांदगाव येथील व्‍यंगचित्रकार राजेंद्र सरग यांना देवर्षी नारद व्‍यंगचित्रकारिता गौरव पुरस्‍कार खासदार डॉ. सुब्रह्मण्‍यम स्‍वामी यांच्‍या हस्‍ते पुण्‍यात प्रदान करण्‍यात आला. पुण्‍याच्‍या विश्‍वसंवाद केंद्र, पश्चिम महाराष्‍ट्र आणि डेक्‍कन एज्‍युकेशन सोसायटी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने हा पुरस्‍कार देण्‍यात येतो.

राजेंद्र सरग आणि त्यांच्या पत्‍नी कल्‍पना यांनी हा पुरस्‍कार स्‍वीकारला. शाल, श्रीफळ, स्‍मृतिचिन्‍ह आणि रोख रक्‍कम असे या पुरस्‍काराचे स्‍वरूप आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, विश्वसंवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, उपाध्यक्ष विकास काकतकर, प्रा. आनंद भिडे, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, पराग पोतदार, देवीदास देशपांडे आदी उपस्थित होते. केंद्राचे अध्‍यक्ष मनोहर कुलकर्णी यांनी प्रास्‍ताविक केले. डॉ. शरद कुंटे यांनी प्रमुख पाहुण्‍यांचे स्‍वागत केले.

राजेंद्र सरग यांचे प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण नांदगाव येथेच झाले असून, महाविद्यालयात असतानाच १९८७ पासून ते व्‍यंगचित्रकारितेत कार्यरत आहेत. विविध दैनिके, दिवाळी अंकांतून त्‍यांची ११ हजारांहून अधिक व्‍यंगचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. ते सध्‍या पुणे येथे जिल्‍हा माहिती अधिकारी म्‍हणून सेवेत आहेत. त्‍यांनी यापूर्वी लातूर, बीड, परभणी आणि अहमदनगर येथे जिल्‍हा माहिती अधिकारी म्‍हणून सेवा बजावली आहे. शासकीय सेवा करीत असताना व्‍यंगचित्रकलेचा छंद जोपासल्याबद्दलही त्‍यांना विविध पुरस्‍कारांनी गौरविण्‍यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय वसतिगृहाला घरघर

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

पेठरोड येथील आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या शासकीय वसतिगृहाला असुविधांमुळे घरघर लागल्याची स्थिती असून, अस्वच्छता, दुर्गंधी आणि इतर समस्यांनी या वसतिगृहातील विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. येथील दुरवस्थेबाबत विद्यार्थ्यांनी अनेकदा तक्रारी करूनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही केला जात आहे. येथील अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्याच धोक्यात आले असून, यासंदर्भात त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

आदिवासी विकास विभागातर्फे पेठरोड येथे आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शहरात बाहेरगावांहून शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी या वसतिगृहात राहतात. मात्र, वसतिगृहाच्या दुरवस्थेमुळे त्यांना अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या येथील शारदा सदन, राजयोग व इतर इमारतींनाही समस्यांचा विळखा पडल्याचे दिसून येत आहे. या वसतिगृहात अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर असून, संबंधित वसतिगृहामागे असलेले ड्रेनेज फुटल्याने सांडपाण्याची दुर्गंधी विद्यार्थ्यांना सहन करावी लागत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे.

--

अस्वच्छता व दुर्गंधीत भर

वसतिगृहातील स्वच्छतागृहांचीही दुरवस्था झालेली असून, वॉश बेसिन तुटलेले, तर आजूबाजूला ओल आल्याने भिंतींना तडे गेल्याचेही दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणातील उर्वरित पदार्थ वसतिगृह आवारातच टाकले जात असल्याने अस्वच्छता व दुर्गंधीत भर पडत आहे. येथील समस्यांबाबत विद्यार्थ्यांनी अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र, सरकारी अधिकाऱ्यांकडून या समस्यांवर नेहमीप्रमाणे ‘पाहू, करू’ अशी उत्तरे दिली जात असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. येथील समस्यांमुळे होणारी हेळसांड थांबवून त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

--

सोलर सिस्टिम धूळ खात

प्रत्येक आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात विद्यार्थ्यांना गरम पाण्याची सोय उपलब्ध व्हावी म्हणून सोलर सिस्टिम लावण्यात आली आहे. मात्र, गेल्या कित्येक महिन्यांपासून येथील सोलर यंत्रणा बंद असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. आदिवासी विकास विभागाकडून सोलर वापरासाठी अनुदान मिळूनही वसतिगृहात मात्र सोलर यंत्रणा धूळ खात पडून असल्याचे धक्कादायक वास्तव दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅड. ठाकरे, सोनवणे रिंगणात

0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीसाठी बुधवारी विद्यमान सभापती अॅड. नितीन ठाकरे यांनी सरचिटणीस पदासाठी तर विद्यमान अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे यांनी सभापती व सरचिटणीसपदासाठी अर्ज दाखल केला. दरम्यान प्रगती पॅनलच्या वतीने विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार या गुरुवारी (दि. २७) अर्ज स्वीकृतीच्या अखेरच्या दिवशी अर्ज सादर करणार आहेत.

‘मविप्र’च्या अर्जस्वीकृतीसाठी गुरुवारी दिवस अखेरपर्यंत दिग्गज इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. मविप्रच्या निवडणूक आखाड्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सद्यस्थितीतील चित्र बघता ही लढत विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार आणि विद्यमान सभापती अॅड. नितीन ठाकरे, विद्यमान अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे यांच्या पॅनलमध्ये रंगणार आहे. अर्जभरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण ७०६ अर्जांची विक्री झाली. पवारांच्या प्रगती पॅनलचे विरोधक ठाकरे व सोनवणेंकडून अर्ज दाखल करून आव्हान प्रत्यक्षात आव्हान उभे केले गेले आहे.

प्रगत‌ी पॅनलतर्फे इच्छुकांच्या मुलाखती

प्रगती पॅनलतर्फे चोपडा लॉन्सच्या बॅक्वेट हॉल येथे मेळावा होऊन गुरुवारपासून (दि. २७) पॅनलसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात होणार आहे. यासाठी त्यांचा तालुकानिहाय दौरा होणार असून प्रगती पॅनलच्या वतीने मुलाखती घेण्यासाठी पवार यांच्यासमवेत वनाधिपती विनायकदादा पाटील, रामचंद्रबापू पाटील, अॅड. शशिकांत पवार, श्रीराम शेटे यांचा सहभाग असणार आहे. कळवण, देवळा, सटाणा या पट्ट्यात शुक्रवारी (दि. २८), येवला, नांदगाव आणि चांदवड पट्ट्यात शनिवारी (दि. २९) तर दिंडोरी, निफाड या पट्ट्यात रविवारी (दि. ३०) तसेच नाशिक शहर आणि ग्रामीणसह सिन्नर, इगतपुरी पट्टयात सोमवारी (दि. ३१) या मुलाखती होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरचिटणीसपदासाठी १५ अर्ज

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत घटनेतील महत्त्वाच्या पाचही पदांसाठी प्रत्येकी किमान दहापेक्षा अधिक संख्येने असे ८१ अर्ज दाखल झाले आहेत. एकूण २३ पदांसाठी आतापर्यंत एकूण ७०६ अर्जाची विक्री झाली आहे.

उमेदवारी अर्ज स्वीकृतीचा गुरुवारी (दि. २७) अखेरचा दिवस असल्याने दिग्गज उमेदवारांचे अर्ज दुपारपर्यंत दाखल होणार आहेत. सरचिटणीसपदासाठी आतापर्यत १५, अध्यक्षपदासाठी ११, सभापतीपदासाठी १६, उपसभापतीपदासाठी २१, सरचिटणीसपदासाठी १५ तर चिटणीसपदासाठी १८ अर्ज दाखल झाले आहेत.

अर्जस्वीकृतीच्या पूर्वसंध्येपर्यंत एकूण ७०६ अर्ज विविध पदांसाठी जमा झाले. बुधवारी सायंकाळपर्यंत ६४ अर्जांची विक्री झाली. बुधवारी दिवसभर विविध अर्जांच्या दाखल होण्याचा ओघ इतर दिवसांच्या तुलनेत जास्त होता. सरचिटणीसपदासाठी बुधवारी आणखी नऊ अर्ज दाखल झाले. अध्यक्षपदासाठी ६, सभापतीसाठी ८, उपसभापतीसाठी ९ तर चिटणीससाठी १० अर्ज बुधवारच्या दिवशी दाखल झाले. आठवडाभराच्या तुलनेत बुधवारी अर्ज दाखल होण्याचा ओघ जास्त होता. तालुका सदस्यपदांसाठी १५ तालुक्यांमधून बुधवारी दिवसभरात १३५ अर्ज दाखल झाले. तालुका सदस्यपदांसाठी आतापर्यंत २७० अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये निफाडमधून सर्वाधिक ३१ अर्ज, सटाण्यातून २२ तर सिन्नरमधून २३ अर्ज दाखल आहेत. याशिवाय इगतपुरीतून ११, कळवण आणि सुरगाण्यातून १३, चांदवडमधून ७, दिंडोरी व पेठमधून ६, नाशिकमधून ४, नांदगांवमधून ११, मालेगांवमधून २, येवल्यातून १९, देवळ्यातून ८ तर नाशिक ग्रामीण मधून १५ अर्ज दाखल झाले. प्राथमिक व माध्यमिक सेवकपदासाठी १२ तर महाविद्यालयीन सेवक पदासाठी ५ असे तालुका सदस्य पदासाठी एकूण २७० अर्ज जमा झाले.


असे आहेत उमेदवार
- अध्यक्षपद : विजय पवार, यशवंत अहिरे, डॉ. विजयकुमार निकुंभ, दिलीप मोरे, अॅड. गंगाधर शिंदे, कोंडाजी चौधरी, नानाजी दळवी, रवींद्र पगार, नानासाहेब बोरस्ते.

- सरचिटणीसपद : विजय पवार, भाऊसाहेब गडाख, अॅड. नितीन ठाकरे, प्रतापदादा सोनवणे, अॅड. गंगाधर शिंदे, चंद्रभान बोरस्ते, सुनील देवरे, जयराम शिंदे, नानासाहेब जाधव, संदीप वाघ, भगवंतराव बोराडे, कुमुदिनी पवार, शरद पाटील.

- सभापतीपद : विजय पवार, यशवंत ‌अहिरे, माणिकराव बोरस्ते, दिलीपराव मोरे, प्रतापदादा सोनवणे, अॅड. गंगाधर शिंदे, नानासाहेब जाधव, नानाजी दळवी, रवींद्र पगार, भास्कर पाटील, नानासाहेब बोरस्ते, देवराम मोगल.

- उपसभापतीपद : विजय पवार, मनोहर देवरे, दिलीप दळवी, उद्धव निरगुडे, बाळासाहेब पाटील, अशोक सावंत, डॉ. भाऊसाहेब मोरे, पांडूरंग सोनवणे, कैलास अहिरे, अरुण वाघ, दिलीप मोरे, पंडितराव भदाणे, शैलेश सूर्यवंशी, नानाजी दळवी, रवींद्र पगार, संदीप वाघ, नानासहेब बोरस्ते, प्रतापराव मोरे, भास्कर भामरे, देवराम मोगल.

- चिटणीसपद : विजय पवार, मनोहर देवरे, दिलीप मोरे, डॉ. विलास बच्छाव, डॉ. भाऊसाहेब मोरे, दत्तात्रय ढिकले, उद्धव निरगुडे, शैलेश सूर्यवंशी, सुनील देवरे, नानाजी दळवी, रवींद्र पगार, देवराम मोगल, प्रतापराव मोरे, नानासाहेब बोरस्ते, नारायण शिंदे, डॉ. बाजीराव रकिबे, संदीप वाघ, संजय पाळेकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडचे नगराध्यक्ष शेलार यांचा राजीनामा

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. आवर्तन पद्धतीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. पुढील नगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे निफाडवासीयांचे लक्ष लागले आहे.

निफाड नगरपंचायतीत भाजप-शिवसेना युतीची सत्ता आहे. पाहिले नगराध्यक्ष होण्याचा मान भाजपचे राजाभाऊ शेलार यांना मिळाला. २० महिन्यापूर्वी त्यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. युतीमध्ये झालेल्या समझोत्यानुसार आवर्तन पद्धतीने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपद वाटून घेण्यात आलेले आहे. अशाच समझोत्यानुसार उपनगराध्यक्षपदी भाजप चारुशीला कर्डिले यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे नगराध्यक्षपद शिवसेनेला द्यावे लागेल, अशी चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनधिकृत होर्डिंगवर महापालिकेची कारवाई

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने नाशिक-पुणे महामार्गालगत एकलहरे टी पॉईंटवरील दोन अनधिकृत लोखंडी होर्डिंग काढून पाच ट्रक भरून लोखंडी अँगलसह गर्डर व इतर साहित्य जप्त केले.

संबधित दोन्ही होर्डिंग मालकाकडे आठ लाख रुपये महापालिकेची थकबाकी असल्याने अशी कारवाई केल्याची माहिती महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय अधिकाऱ्यांनी दिली. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा व अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि उपायुक्त आर. एम. बहिरम यांच्या सूचनेप्रमाणे नाशिकरोड विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, विविध कर विभागाचे उदय धोंगडे यांच्या पथकाने सिन्नर फाटा येथील खर्जुल मळा येथे कारवाई केली. या कारवाईप्रसंगी अतिक्रमण विभागाकडील चार अतिक्रमण पथक, पोलिस पथक उपस्थित होते. गॅसकटरद्वारे लोखंडी अँगल तोडून हायड्रो क्रेनद्वारे ट्रकमध्ये भरून परत नेले.

आतापर्यंत मेहरबान का?
गेल्या काही वर्षांपासून खर्जुल मळा येथे दोन लोखंडी होर्डिग उभे होते. स्थानिक नगरसेवकांसह, आमदार, खासदारांच्या छबी त्यावर झळकत असत. काही बड्या शिक्षण संस्थांच्या जाहिरातीही तेथे नियमितपणे लागत होत्या. आताआतापर्यंत या होर्डिंगचा खुलेआम वापर केला जात होता. महापालिका प्रशासनाकडून आतापर्यंत या होर्डिंगकडे दुर्लक्ष केले गेल्याबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी सभापतिपदी काँग्रेसचे सलीम अन्वर

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या स्थायी समिती व महिला बालकल्याण समितीच्या सभापत‌िपदाची निवड बुधवारी पार पडली. स्थायी सभापती म्हणून काँग्रेसचे सलीम अन्वर तर महिला बालकल्याण सभापती म्हणून शिवसेनेच्या आशाबाई आहिरे यांची निवड करण्यात आली. महापौर निवडीप्रमाणे या निवडीत काँग्रेस आणि शिवसेना अशी युती दिसून आली.

पालिकेच्या सभागृहात पिठासीन अधिकारी ज्योतिबा पाटील, आयुक्त संगीता धायगुडे, नगरसचिव राजेश धसे यांच्या उपस्थितीतीत निवड प्रक्रिया सुरू झाली. प्रारंभी स्थायी समिती सभापती निवड झाली. स्थायीसाठी काँग्रेसचे सलीम अन्वर व महागठबंधन आघाडीचे नाबी अहमद यांच्यात सरळ लढत झाली. १६ सदस्यी सदस्य असलेल्या या समितीत काँग्रेस व आघाडीचे प्रत्येकी ५ तर सेना ३, भाजप २, एमआयएम १ असे संख्याबळ आहे. अर्ज माघारीनंतर दोघांचे अर्ज कायम राहिल्याने मतदान झाले. यात सलीम अन्वर यांना काँग्रेस, सेना, एमआयएम मिळून ९ मते मिळाली. तर नाबी अहमद यांना केवळ आघाडीची ५ मते मिळाली. भाजपचे संजय काळे, सुवर्णा शेलार हे दोन सदस्य गैरहजर होते. दरम्यान निवडीआधी आघाडीच्या सदस्य शान ए हिंद यांनी अन्वर यांच्या अर्जावर हरकत घेतली होती. मात्र पिठासीन अधिकाऱ्यांनी ती फेटाळली.

पुन्हा एकदा काँग्रेस-शिवसेना

महिला बालकल्याण समितीच्या सभापती निवड पार पडली. या पदासाठी सेनेच्या आशाबाई आहिरे व आघाडीच्या अन्सारी साजेदा बानो मोह. याकूब यांचा अर्ज होता. ९ सदस्य असलेल्या या समितीच्या सभापती निवडणुकीत दोन सदस्य गैरहजर होते. सेनेच्या आहिरे याना ४ तर अन्सारी साजेदा यांना २ मते मिळाली. एमआयएमचे एक सदस्य तटस्थ राहिले. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सेना-काँग्रेसने एकेमकांना हात दिला असून, पालिकेवर वर्चस्व कायम राखले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्विपिंग मशिन खरेदीचे वेध

0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छतेत नाशिकचा क्रमांक घसरल्यानंतर पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांची उणीव भरून काढण्यासाठी सत्ताधाऱ्यांना आता स्विप‌िंग मश‌नि खरेदीचे वेध लागले आहेत. ठेकेदाराच्या आग्रहामुळे नाशिकच्या सत्ताधाऱ्यांनी हे मश‌नि पाहण्यासाठी औरंगाबाद पालिकेला भेट दिली. त्यानंतर नाशिकमध्ये प्रत्येक विभागात एक या प्रमाणे सहा मश‌निची खरेदी करण्याचा मानस महापौर रंजना भानसी यांनी व्यक्त केला आहे.

देशपातळीवर स्वच्छतेसंदर्भात करण्यात आलेल्या सर्व्हेत नाशिकचा क्रंमाक घसरला आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनीही स्वच्छतेत सुधारणा करण्याच्या सूचना केल्या आहेत. पालिकेत सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीवर प्रतिंबध असल्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी रस्त्यांच्या सफाईकरिता स्विप‌िंग मश‌नि खरेदी करण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेता दिनकर पाटील, अजय बोरस्ते, संभाजी मोरुस्कर, सलिम शेख, गजानन शेलार, डॉ. हेमलता पाटील यांनी औरंगाबादचा दौरा केला. औरंगाबाद महापालिकेने ६५ लाख रुपये खर्च करून हे मश‌नि खरेदी केले आहे.

महासभेत प्रस्ताव ठेवणार

मश‌निसाठी महासभेवर प्रस्ताव ठेवला जाणार आहे. निधीची अडचण आल्यास स्मार्ट सिटीतून खरेदी केली जाईल, अशी घोषणा महापौरांनी केली आहे.

असाही आदर्श

नाशिक महापालिका ही स्वच्छतेच्या बाबतीत औरंगाबाद पेक्षा पुढारलेली आहे. औंरगाबाद पालिका क, तर नाशिक ब वर्ग श्रेणीत आहे. त्यामुळे पालिकेने निदान अ वर्ग पालिकांचा अभ्यास करणे अपेक्षित असतांना औरंगाबादचा आदर्श घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

असे आहे मश‌नि

एका मश‌निची किंमत ७० लाख

रस्ता सफाईसाठी मश‌निचा वापर

सहा मश‌निसाठी चार कोंटींचा खर्च अपेक्षित

मश‌नि दररोज माती, दगड, कचराही उचलणार

एक मशिन करणार दहा कर्मचाऱ्यांचे काम

मश‌निला चालव‌ण्यिासाठी दररोज सुमारे एक लाखाचा खर्च

सहा मश‌निसाठी दररोज सहा लाखांचा खर्च होणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सायन्स एक्स्प्रेस'ची धुळेकरांना भुरळ

0
0

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंकडून लिंकद्वारे सुरुवात

म. टा. वृत्तसेवा, धुळे

गेल्या काही वर्षांत पर्यावरणात मोठे बदल घडून आले आहे. या बदलांचा परिणाम सर्वसामान्यांवर होतांना दिसत आहे. त्यामुळे मानवासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून, अशा परिस्थितीत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र येऊन सामूहिकपणे जबाबदारी स्वीकारावी, असा संदेश केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिला.

सायन्स एक्स्प्रेस जल वायू विशेष परिवर्तन धुळे रेल्वे स्थानकावर बुधवारी (दि. २६) सकाळी १० वाजता पोहचली. सायन्स एक्स्प्रेसचे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद््घाटन करून उपस्थितांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा विशेष प्रकल्प असलेली सायन्स एक्स्प्रेस बुधवारी दिवसभर शहरातील विज्ञानप्रेमी व विद्यार्थ्यासाठी खुली होती. यावेळी महापौर कल्पना महाले यांनी फित कापून उद््घाटन केले. प्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप पाढंरपट्टे, रेल्वेचे अधिकारी आर. के. यादव, व्ही. पी. जाट आदी यावेळी उपस्थित होते. या प्रदर्शनाचा शहरातील विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. स्थानकात मालगाडी उभी राहण्याच्या ठिकाणी सायन्स

रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी रेल्वे स्थानक परिसरात

चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

केंद्रीय रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले की, सायन्स एक्सप्रेस धुळ्याकडे नेण्याचे ठरविले नसतांनाही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या आग्रहाने ती धुळ्यात आणण्यात आली. एक चांगला खासदार धुळेकरांनी लोकसभेत पाठविला असल्याने धुळेकरांचे यावेळी त्यांनी अभिनंदन केले. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे विभागात आमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे धुळेकरांचे गेल्या चाळीस वर्षांपासूनचे असलेले स्वप्न मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्ग पूर्णत्वास येणार आहे, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरेंनी सांगितले. शनिवारी (दि. २९) केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे धुळ्यात येणार आहेत. याशिवाय धुळे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासह प्रमुख कामे मार्गी लागणार आहेत, असेही डॉ. भामरे यांनी संवाद साधताना सांगितले.

सायन्स एक्स्प्रेसची वैशिष्ट्ये

सायन्स एक्स्प्रेसमध्ये 16 वातानुकूलित डबे

विद्यार्थी, शिक्षकांसह प्रदर्शन सर्वांसाठी नि:शुल्क

आतापर्यंत एक लाख ५६ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण

आतापर्यंत आठ वेळेस देशाचा प्रवास पूर्ण केला

५१० रेल्वे स्थानकांवर प्रदर्शन

आतापर्यंत १७५० प्रदर्शन दिवसांमध्ये १.७० कोटी दर्शकांचा प्रतिसाद

सर्वात मोठे आणि सर्वाधिक दर्शक लाभलेले प्रदर्शन म्हणून बारा वेळेस लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ असुरक्षितच

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर येथील विमानतळाच्या सुरक्षेला पडलेले भगदाड बुजविण्यासाठी हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडलला (एचएएल) वर्षभरात मुहूर्त सापडला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शेळ्यांच्या निर्यातीसाठीचे कार्गो विमान धावपट्टीवर बुधवारी उभे असतानाच स्थानिक रहिवासी विमानतळाचे सुरक्षा कुंपण खुलेआम ओलांडत असल्याचे दिसून आले.

मिग, सुखोई यासारख्या लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱ्या एचएएलचा कारखाना ओझर येथे आहे. याचठिकाणी विमानतळही साकारण्यात आले आहे. प्रवासी विमान वाहतूक सध्या येथून होत नसली, तरी कार्गो सेवा मात्र कार्यरत आहे. गेल्या वर्षी २७ जुलै रोजी शेळी निर्यातीसाठीचे कार्गो विमान धावपट्टीवर उभे असताना या विमानतळाच्या सुरक्षा कुंपणाला पडलेल्या भगदाडाचे सचित्र वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताने खडबडून जागे झालेल्या एचएएल प्रशासनाने तातडीने या भागाचा पाहणी दौरा केला. त्यानंतर सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेला नोटिसही बजावण्यात आली. यानंतर दगडी सुरक्षा कुंपणाला पडलेले भगदाड बुजविण्यात आले. मात्र, या कुंपणावरील तारेचे संरक्षक कुंपण ‘जैसे थे’ ठेवण्यात आले. या साऱ्या प्रकाराचा ‘मटा’ने वर्षभरानंतर मागोवा घेतल्याने एचएएलच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे समोर आले आहेत.

गेल्या वर्षी शेळ्यांची दुबईतील निर्यात यशस्वी ठरल्यानंतर यंदाही ओझर विमानतळावरुन शेळ्यांची निर्यात केली जात आहे. बुधवारी (२६ जुलै) दुपारी युक्रेनचे आयएल ७६ हे कार्गो विमान ओझरच्या धावपट्टीवर दाखल झाले. याचवेळी एचएएलच्या तकलादू सुरक्षा कुंपणावरून स्थानिक महिला एचएएलच्या आवारात बिनधिक्कत जात असल्याचे दिसून आले.

चिंताजनक बाब

दहशतवाद्यांनी नाशकात रेकी केल्याचा प्रकार घडला असतानाही एचएएलने सुरक्षा व्यवस्थाच कमजोर ठेवणे चिंताजनक असल्याचे मत संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


…म्हणे प्रवेश निष‌‌िद्ध

विशेष म्हणजे, तारेचे कुंपण तुटलेल्या या दगडी कुंपणावरच एचएएलने एक बोर्ड लावला आहे. ‘भारतीय सरकारी गोपनियता अधिनियम १९२३ कलम २(८), (अ) (ब) (क) (ड) नुसार प्रतिबंधित क्षेत्र. प्रवेश निषिद्ध. कुत्र्यांपासून सावधान’ अशा स्वरुपाचा इशारा देणारा हा बोर्डही फुकाचाच असल्याचे निष्पन्न झाले. धावपट्टीवरून अगदी हाकेच्या अंतरावर असा प्रकार घडत असल्याने विमानतळ, कार्गो विमान आणि एचएएलचा प्रकल्प या सगळ्याच्याच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे स्पष्ट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठूरायाची भेट घेऊन गावी परतले ‘निवृत्तिनाथ’

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

आषाढवारीस पंढरपुरास गेलेली श्री संत निवृत्त‌िनाथ महाराजांची पालखी बुधवारी त्र्यंबकनगरीत परतली. त्र्यंबक ये‌थून ९ जूनला पालखीचे प्रस्थान झाले होते. २६ दिवसांचा प्रवास करून पंढरपूर येथे आषाढी वारी केली. त्यानंतर १८ दिवसांचा प‌रतीचा प्रवास करून ही पालखी शहरात पोहचली आणि निवृत्त‌िनाथ महाराज अन् त्र्यंबकराजांची पुन्हा एकदा भेट झाली. दोन दिवसांपासून उसंत घेतलेल्या वरूण राजानेही या भेटीप्रसंगी हजेरी लावल्यामुळे परतीच्या प्रवासाने शिणलेले वारकरीही तृप्त झाले.

बुधवारी त्र्यंबकेश्वरच्या प्रवेशद्वारी ढोलताशांचा गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पालखीचे स्वागत करण्यात आले. नगराध्यक्षा तृप्ती धारणे, भाजप शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र, आरपीआय तालुका अध्यक्ष शांताराम बागुल, मुख्याधिकारी डॉ. चेतना केरुरे, देवस्थान मुख्यकार्यकारी अधिकारी राधाकृष्ण जोशी विश्वस्त जयंत गोसावी यांचा सत्कार करण्यात आला. तेव्हा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय धोंगडे, पुंडलीक थेटे, दिंडी सोहळा अध्यक्ष पंड‌ित कोल्हे, त्र्यंबकराव गायकवाड, जिजाबाई लांडे, रामभाऊ मुळाणे आदी विश्वस्तांसह वसंतराव घुले, रवींद्र सोनवणे, सुरेश गंगापुत्र, विजय शिखरे उपस्थित होते. पालखीच्या स्वागतासाठी पावसानेही जोरदार हजेरी लावली. पंढरीस विठुरायाच्या भेटीस गेलेले संत निवृत्त‌िनाथ पुन्हा त्र्यंबकराजास भेटले. कुशावर्तावर स्नान आटोपल्यानंतर निवृत्त‌िनाथ मंदिरात आरती करण्यात आली. पालखी सोहळ्यात सहभागी ९ विणेकरी आणि ५ तुळशीधारी महिला वारकरींचा सन्मान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोजच्याच रडगाण्याला वैतागले मनमाडकर

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

तब्बल एक लाखाची लोकसंख्या असलेले मनमाड शहरात रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते, असा प्रश्न हल्ली प्रत्येक नागरिकाला पडला नाही तर नवल. शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे रस्त्या रस्त्यांवर पाणी साचले, चिखल झाला. त्यात खड्ड्यांची भर पडल्यामुळे हे रस्ते अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना व पादचाऱ्यांना अनंत अडचणींना सामना करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजव‌िण्याचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

प्रशासनाकडून कोरडे आश्वासन

शहरात एवढी रस्त्यांची चाळण झालेली असताना पालिका प्रशासन, नागरिकांचे प्रतिनिधीत्व करणारे लोकप्रतिनिधी यांना हे खड्डे दिस नाही का, असा सवाल आता मनमाडकर विचारत आहेत. नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, उपनगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे, शिवसेना गटनेते गणेश धात्रक यांनी रस्त्यांचे काम सुरू करणार असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्ष कामांना कधी सुरुवात होणार याबाबत कोणीही बोलायला तयार नाही.

येथे आहेत खड्डे

रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्या

डॉ. आंबेडकर चौकाकडून इंडियन हायस्कूलकडे जाणारा रस्ता

रेल्वे उड्डाणपुलाजवळील चौकात

पालिकेच्या परिसरातही खड्डे

मनमाड नगरपालिकेकडे जाणारा रस्ता

स्टेशन कडून महात्मा फुले चौकाकडे जाणारा रस्ता

शिवाजी चौकातील पालिका प्राथमिक शाळे समोर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळे शहर झाले हागणदारीमुक्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

केंद्र सरकारच्या समितीतर्फे धुळे शहरात पाहणी करण्यात आली होती. यात तपासणीनंतर धुळे शहरास समितीने हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले आहे. याबाबतचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यातील केवळ चार महापालिका हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या असून, त्यात धुळे महापालिकेचा समावेश करण्यात आला आहे. धुळे शहर व महापालिका हागणदारीमुक्त घोषित झाल्याने अमृत अभियानातील विविध योजनांचा लाभ महापालिकेला मिळणार आहे.

राज्य सरकारतर्फे यापूर्वीच शहराची पाहणी करण्यात आली होती. त्यासोबतच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांच्या स्वच्छतेविषयी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या आधारावर समितीने शहराला हागणदारीमुक्त घोषित केले आहे. केंद्रीय समितीतर्फे शहरातील स्वच्छतेचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात शहराचा १२४ वा क्रमांक मिळाला होता. यानंतर केंद्र सरकारच्या समितीचे तज्ज्ञ मार्गदर्शक मयूर उदारे यांची समिती गेल्या आठवड्यात शहरात आली होती. या समितीने महापालिकेच्या कामांची पाहणी करून तपासणी केली.

या तपासणीत गलिच्छ वस्ती, व्यापारी क्षेत्र, रहिवाशी विभाग, वैयक्तिक शौचालय, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पाहणी करण्यात आली. तसेच विविध पातळीवर महापालिकेची कामेही तपासून पाहण्यात आली. आजपर्यंतच्या महापालिकेने अवलंबिलेल्या व केलेल्या कार्यवाहीचाही आढावा घेण्यात आला. या सर्व तपासणीअंती केंद्र सरकारतर्फे धुळे शहरासह महापालिका हागणदारीमुक्त घोषित करण्यात आली. याविषयीचा तपासणी अहवाल महापालिकेला नुकताच प्राप्त झाला आहे.

धुळे 'स्मार्ट' होण्यास हातभार

धुळे शहर हागणदारीमुक्त घोषित केल्यानंतर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होण्यास हातभार लागणार आहे. शहरांत विविध योजना येण्यास सुरुवात होऊन धुळेकरांना सोयीसुविधा उपलब्ध होतील. यासाठी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त रवींद्र जाधव, अभिजित कदम, अनुर डूरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, बांधकाम अभियंता कैलास शिंदे, पाणीपुरवठा अभियंता चंद्रकांत ओगले, आरोग्याधिकारी महेश मोरे, रत्नाकर माळी व स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी यांचे योगदान आहे. घोषणा झाल्यावर महापौर कल्पना महाले यांच्या दालनात त्यांनी आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

0
0

नांदूर मनपा शाळेत स्वच्छतागृहाची समस्या कायम

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

नांदूर गावात महापालिकेच्या शाळेमध्ये एक हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र तरीही या शाळेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह या समस्या आहेत. या मुलभूत समस्यांनी ग्रासलेल्या शाळेला संरक्षक भिंत नसल्याने मुलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या समस्यांसंदर्भात गेल्यावर्षी 'मटा'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर संरक्षक भिंत आणि पाण्याची व्यवस्था केली गेली होती. मात्र शाळेच्या स्वच्छतागृहांची समस्या वर्षभरानंतरही जैसे थे आहे.

नांदूर गावात मुलींची मनपा शाळा क्रमांक ३४, मुलांची शाळा क्रमांक ८० आणि गुरु माऊली अण्णासाहेब मोरे माध्यमिक विद्यालय अशा एकूण महापालिकेच्या तीन शाळा आहेत. या शाळांमध्ये सकाळ आणि दुपार या दोन सत्रात यामध्ये एक हजार विद्यार्थी शिकतात. मात्र या विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा त्यांना दिल्या जात नसल्याचे चित्र आहे. वर्षभरानंतरही पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, परिसर स्वच्छता याबाबतच्या समस्या कायम आहे.

शाळेला संरक्षक भिंत नसल्याने मुलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. शाळेला लागून मुख्य महामार्गांना जोडणारा रस्ता असल्याने कायम वर्दळ असते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. यासोबत पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने मुलांना पाणी पिण्यासाठी शेजारी असलेल्या घरात जावे लागते. याबाबत 'मटा'ने बातमी प्रसिद्ध करताच त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने शाळेला सुरक्षा भिंत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पण तरीही याठिकाणी स्वच्छता राखली जात नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसातही सिडकोच्या घशाला कोरड

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको
मागील आठवड्यापासून शहरात मुसळधार पाऊस पडून धरण भरल्याने पाणी सोडण्याची वेळ आली आहे. मात्र, शहरातील प्रभाग ३१ मधील नागरिक भरपावसातही चेतनानगर व परिसरातील म्हणजेच प्रभाग ३१ मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यातच सत्ताधारी असलेल्या भाजपच्याच नगरसेविकेला महिलांसह थेट मोर्चा काढण्याची वेळ येत असल्याचे विदारक चित्र आहे. पावसाळा अर्धा होऊनही पाणीपुरवठा सुरळीत का होत नाही, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
प्रभाग क्रमांक ३१ मधील चेतनानगर व परिसरात पाणीपुरवठाच होत नसल्याच्या तक्रारी होत्या. मागील तीन ते चार महिन्यांपासून येथील नागरिक पाण्याच्या समस्येला तोंड देत असून, आता पाऊस चांगला झालेला असतानाही पाणी का येत नाही, असा प्रश्न उपस्थित करीत येथील महिलांनी नगरसेविका पुष्पा आव्हाड यांच्याशी संपर्क साधला. अनेक दिवसांपासूनची ही समस्या सुटत नसल्याने नगरसेविकेने प्रभागातील महिलांसह थेट विभागीय कार्यालयात धाव घेतली. यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा न होण्याविषयी जाब विचारला.
यावेळी प्रशासनाच्या नियोजनाअभावी पाणीपुरवठ्याचा गोंधळ अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला. शिवाय पाण्याची वेळ निश्चित नाही. अनेक वेळा गढूळ पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या भागातील पाणी समस्या एक गंभीर प्रश्न बनला आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली तरी अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप केला जात आहे. यावेळी साहेबराव आव्हाड, मेघल भार्गव, दीपिका सोनवणे, निशा रायकर, कलावती दुसाने, अरुणा बोरसे, प्रतिभा पाटील, अरुणा अवतारे, सुनीता पवार, सुगंधा भोये, वंदना काळे उपस्थित होत्या.

प्रभाग ३१ मधील पाणी प्रश्न हा केवळ अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे होत आहे. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नाही. त्यामुळे सर्व कारभार रामभरोसे आहे. प्रभागातील पाणीसमस्या सुटली नाही तर आंदोलन करू
- पुष्पा आव्हाड, नगरसेविका, प्रभाग ३१

चेतनानगर सह परिसरात काय अडचण आहे, याची पाहणी करणार आहोत. दोन दिवसांत प्रश्न मार्गी लावून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल.- संजीव बच्छाव, पाणीपुरवठा अधिकारी

प्रभाग २५ मध्ये दूषित पाणी
एकीकडे पाणी येत नाही म्हणून आंदोलनाची भूमिका घेतली जात असतानाच दुसरीकडे प्रभाग २५मध्ये दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी महिलांनी केल्या आहेत.
प्रभाग क्रमांक २५मधील त्रिमूर्ती चौक भागात दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत होता. त्यानुसार नागरिकांनी बुधवारी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्याकडे तक्रार केली. नगरसेवक बडगुजर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता महिलांनी त्यांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी दाखविले. यावेळी बडगुजर यांनी तातडीने अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत चौकशी केली असता, दोन दिवसांपासून काही कारणास्तव दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे मान्य केले. दोनच दिवसांत हा पाणी पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. यावेळी पवन मटाले, गोपीनाथ सोनवणे, चित्रकला नांद्रे, सुजाता औटी, गिरीजा शिंदे, सोनाली गुजराथी, भाग्यश्री गायकवाड, वैशाली महाले, मंदाकिनी भापकर यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या.

गढूळ पाणीपुरवठा हा संपूर्ण शहराची समस्या आहे. या दूषित पाण्याचे नमुने विभागवार घेऊन त्यात क्लोरीनचा डोस किती आहे व ते पिण्यास योग्य आहे का ते पाहण्याची गरज आहे. प्रभाग २५ मध्ये दुषित पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने याबाबत वेळावेळी माहिती ही आयुक्तांना दिली जाते.
- सुधाकर बडगुजर,
नगरसेवक, प्रभाग २५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात चारशे इमारती धोकादायक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेतील घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पुन्हा एकदा शहरातील धोकेदायक वाडे व इमारतींना नोटीसा देण्याचा सोपस्कार पार पाडले आहेत. शहरात जवळपास ४१० इमारती व वाडे हे धोकादायक असून, त्यांना पुन्हा नव्याने नोट‌िसा बजावण्यात आल्या आहेत. काही इमारतींना स्ट्रक्चरल ऑड‌िट करून देण्याचेही फर्मान काढले आहे.

शहरात सहा विभागांत जवळपास साडेआठशेच्या आसपास जुन्या इमारती व वाडे आहेत. गेल्या काही वर्षांत ठाणे, मुंब्रा व मुंबई भागात इमारती कोसळून जीवितहानी झाल्याचे प्रकार घडल्यानंतर नाशिक महापालिकेनेही सर्वेक्षण करून शहरात धोकादायक इमारती व वाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना नोट‌िसा देऊन स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी घाटकोपरमध्ये इमारत दुर्घटनेत १७ जणांचा बळी गेल्यानंतर पालिकेने पुन्हा घाई-गडबडीत शहरातील ४१० इमारती व वाड्यांना नोट‌िसा बजावल्या आहे. त्यात पूर्व विभागात २०९, पश्‍चिम विभाग ११, पंचवटी विभाग ७७, नाशिक रोड ६३, सिडको २७, तर सातपूर विभागात २३ धोकादायक इमारती व वाड्यांचा समावेश आहे. सोबतच ३० वर्षांपेक्षा जास्त जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑड‌िट करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे.

भाडेकरू-मालक वाद

शहरातील जुन्या वाड्यांमध्ये बहुतांश ठिकाणी घरमालक आणि भाडेकरू यांच्यात वाद आहेत. वाड्यांचे भाडे अजूनही जुन्या पद्धतीने लागू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने वाडे खाली करण्यास भाडेकरू तयार होत नाहीत. भाडेकरूंनी या वाड्यांवर मालकीचा दावा केला असून, अनेक वाड्यांचा वाद कोर्टात गेला आहे. या वादामुळे घरमालकही हतबल झाले असून, पालिकेलाही केवळ नोट‌िसा देण्याचे सोपस्कार पार पाडावे लागत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

…अन्यथा खड्ड्यांंतच झाडे लावणार!

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

येथील शांतीनगर त्रिफुली ते गणपतदादा मोरे महाविद्यालय दरम्यानच्या रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. हे खड्डे येत्या एक ऑगस्टपर्यंत बुजले नाही तर या खड्ड्यांमध्ये झाडे लावू, असा इशारा नगरसेवक जावेद शेख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

काही वर्षांपूर्वी निफाड शहरातून जाणाऱ्या निफाड-पिंपळगांव रस्त्यावरील शांतीनगर त्रिफुली ते वैनतेय विद्यालय या दरम्यानच्या रस्त्याचे चौपदीकरण करण्यात आले आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. शिवाय या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या, रस्त्याच्या मधोमध मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे वाहने चालवितांना कसरत करावी लागते, कधीकधी अपघातही झाले आहेत. या सिमेंटच्या रस्त्याचे लोखंडी गज उघडे पडले असून, या गजांमुळे किरकोळ अपघात झाले आहेत.

वैनतेय विद्यालय ते मोरे महाविद्यालय दरम्यानच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून प्रचंड वाहतूक होत असते. पिंपळगांव बसवंत, वणी, येवला, औरंगाबादकडे जाणारी वाहतूक या रस्त्यावरून जाते. हा रस्ता निफाड शहराचा मुख्य रस्ता आहे. या खड्ड्यांमुळे वाहने चालवणे वाहनधारकांना मुश्किल झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images