Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आता शनिवारी दुपारही लिलाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी दुपारी बंद झालेले लिलाव आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शनिवार, २९ जुलैपासून लिलावासाठी फळभाज्या आणण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
नाशिक कृषी उत्पन्न बाजारात समितीत रोज दुपारी होणारे फळभाज्यांच्या लिलाव शनिवारी घेण्यात येऊ नये. शेतकऱ्यांनी या दिवशी फळभाज्या लिलावासाठी आणू नये असे आवाहन हमाल-मापारींनी केले होते. शनिवारी साप्ताहिक सुट्टी द्यावी यासाठी त्यांनी जिल्हा उपनिबंधकांना पत्रही दिले आहे. तेव्हापासून शनिवारचे लिलाव बंद झाले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शनिवारी दुपारचे लिलाव बंद असल्याने शुक्रवारी आणि रविवारी फळभाज्यांची आवक वाढत होती. या दोन दिवशी बाजारात फळभाज्यांचे लिलाव घसरण्याचा अनुभव शेतकऱ्यांना सातत्याने येत होता. ही बाब काही शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी बाजार समिती सभापती शिवाजी चुंभळे यांच्या निर्दशनास आणून दिली. या दिवशी बाजारात शेतमाल वाहनातून उतरविण्यात येणाऱ्या हमालांवर दबाव टाकण्यात येत असल्याच्या तक्रारीही मांडण्यात आल्या. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हे शनिवारीचे लिलाव पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न बाजार समितीने केला आहे. त्याला हमालांनीही प्रतिसाद दिल्याने हे लिलाव पुन्हा सुरू होणार आहे.

मुंबईतील वाशी मार्केट रविवारी बंद राहत असल्याने शनिवारीच्या फळभाज्यांना फारशी मागणी नसते. त्यामुळे शनिवारी बाजार सुरू झाला तरी फारसा फरक पडले असे वाटत नाही.
- जगदीश अपसुंदे, संचालक, बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कंत्राटाद्वारे वाचवले लाखो रुपये

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
साफसफाईचा खर्च कमी होणार असून वाहन प्रवेश फीमध्ये वाढ होणार असल्याने बाजार समितीचा वर्षभरात लाखो रुपयांचा फायदा होणार असल्याचा दावा सभापती शिवाजी चुंभळे यांनी केला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोड, दिंडोरीरोड आणि नाशिकरोड येथील मार्केटमध्ये वाहन प्रवेश फी तसेच साफ-सफाई कामाच्या सिलबंद निविदा बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात जाहीर करण्यात आल्या. यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत बाजार समितीचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाल्याचे समोर आले आहे.
पेठरोडच्या बाजारातील साफसफाईच्या कामाचे कंत्राट मागील वर्षी प्रतिमहा एक लाख ८८ हजार रुपये देण्यात आले होत‌े. पुढील वर्षासाठी याच कामाचे कंत्राट प्रतिमहा एक लाख ६ हजार रुपये देण्यात आले. यामध्ये बाजार समितीचा ८२ हजार रुपयांचा प्रत्येक महिन्याला फायदा होणार आहे. दिंडोरी रोडवरील मार्केटमध्ये मागील वर्षी साफसफाई कामाचे कंत्राट ४ लाख ९६ हजार असा देण्यात आले होते. ते यंदा ४ लाख २५ हजार रुपयांना देण्यात आले. यामध्ये समितीला प्रतिमहा ७१ हजार रुपयांचा फायदा होणार आहे. म्हणजे वर्षभरात १८ लाख ३६ हजार रुपये इतकी बचत होणार आहे.

दरमहा लाख रुपयांची वाढ
पेठरोड मार्केटमध्ये वाहन प्रवेश फी कामाचे कंत्राट मागील वर्षी प्रतिमहा एक लाख ६ हजार रुपये प्रमाणे देण्यात आले होता. ते पुढील वर्षासाठी प्रतिमहा एक लाख ४७ हजार ८८० रुपये प्रमाणे देण्यात आले आहे. दिंडोरी रोड मार्केटमध्ये मागील वर्षी प्रतिमहा दोन लाख ११ हजार १६७ रुपये होते. ते यावर्षी २ लाख ६० हजार रुपये करण्यात आले आहे. यावरून बाजार समितीचे महिन्याकाठी ९१ हजार ६३ रुपयांनी उत्पन्न वाढणार आहे, असे चुंभळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजारी कैद्याचा जेलमध्ये मृत्यू

$
0
0

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील आजारी असलेल्या ७० वर्षीय वृद्ध कैद्याचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. आण्णासाहेब विश्‍वनाथ चव्हाण असे या कैद्याचे नाव आहे. या कैद्याच्या पायाला जखम झाली होती. जखम गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट कामासाठी आयटी विभाग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
प्रशासकीय कामामध्ये स्मार्टपणा यावा, यासाठी जिल्हाधिकारी, तहसील आणि जिल्हा परिषदेमध्ये स्वतंत्र आयटी कक्ष सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात चार तर राज्यात १५ आयटी तंत्रज्ञानातील अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग शास्त्रशुध्द व्हावा, यासाठी सरकारने राज्यभर ३०४ तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती केली आहे. आतपर्यंत नव्या तंत्रज्ञानाचे काम हे महसूल व जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी करीत होते. पण या क्षेत्रातील ज्ञान असणारे तज्ज्ञ आता उपलब्ध होणार आहेत. राज्य सरकारच्या विविध योजना थेट जनेतेपर्यंत पोहविणे शक्य व्हावे, यासाठी या आयटी कक्षाचा उपयोग होणार आहे.

नव्याने सुरू करण्यात येणारे हा आयटी कक्ष इन्फास्ट्रक्चर प्रोजेक्ट, डाटा सेंटर, वाइड एरिया नेटवर्क, डिजिटल पेमेंट, आधारकार्ड, आपले सरकार तसेच सरकाराच्या विविध योजनांचे पैसे लाभार्थींना थेट खात्यात मिळावे यासाठी उपयोगी ठरणार आहे. राज्य सरकारने विविध माहिती तंत्रज्ञान विषयक प्रकल्प सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हा व तालुका स्तरावर हा आयटी कक्ष उपयोगी ठरणार आहे. या आयटी कक्षात प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट लीड, सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनीअर, सिनिअर नेटवर्क इंजिनीअर असणार आहेत. सरकारने गेल्या काही वर्षात सर्व काम डिजिटल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कार्यालयात अनेक बदल झाले पण त्यासाठी तज्ज्ञ इंजिनिअर नसल्यामुळे अनेकदा या कामात दिरंगाई व चुका होत असे. याचा सर्वाधिक त्रास सामान्यांना होत होता. पण आता असे चित्र बदलण्याची आशा निर्माण झाली आहे.

कामाला मिळणार गती
नव्या आयटी कक्षामुळे कामाचा वेग वाढून ऑनलाइन व सॉप्टवेअरच्या अडचणी आता सुटू शकणार आहेत. त्यासाठी हा कक्ष उपयोगी ठरणार आहे. या कक्ष स्थापन्यामागे सर्व डाटा एका क्लिकवर जलद गतीने उपलब्ध होण्याचा उद्देश राज्य सरकारचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळांच्या मुसक्या बांधा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

येथील एमआयडीसीला लागून असलेल्या कामगार वस्तीत टवाळखोरांकडून बुधवारी मध्यरात्री आठ चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आल्यानंतर या परिसरात दहशत पसरली आहे. येथील टवाळखोरांच्या उपद्रवाचा पाढाच नागरिकांनी पोलिसांसमोर वाचल्यानंतर चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले खरे. मात्र, या परिसरातील मोकाट टवाळखोरांना जरब बसावी, अशी कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे.

सातपूरच्या अनेक भागातही टवाळखोरांच्या जाचाला सर्वसामान्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यावरदेखील पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. टवाळखोर बसत असलेल्या चौकांत नियमित पेट्रोलिंग केल्यास त्यांना नक्कीच आळा बसू शकेल, अशी भावना अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनीच याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

कामगारनगर भागात वाहने तोडफोडीची घटना झाल्यानंतर पोलिस उपायुक्त कोकाटे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे दाखल झाले. त्यांनी कामगारनगरमधील महिलांशी संवाद साधत माहिती जाणून घेतली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी तपासाची चक्रे फिरवून चार टवाळखोरांना ताब्यात घेतले. चारही टवाळखोर कामगारनगर भागातच वास्तव्यास असल्याचे तपास अधिकारी रवींद्र कऱ्हे यांनी ‘मटा’ला सांगितले. पोलिसांनी संबंधितांना न्यायालयात उभे केले असता त्यांना जामीनदेखील मिळाला आहे. त्यामुळे आता पुढे काय, असा प्रश्नदेखील उपस्थित होत असून, अशा टवाळखोरांविरोधात पोलिसांनी अधिक कडक कारवाई करावी, अशी मागणी कामगारनगरवासीयांकडून करण्यात येत आहे.

---

‘भाईं’च्या साथीने गँग

स्लम भागातील अनेक टवाळखोर रहिवासी भागात दहशत पसरविण्याचे काम करतात. यात काही बड्या भाईंची साथही त्यांना मिळत असल्याने प्रसंगी गँग तयार केली जाते. त्यानंतर दोन गटांत जोरदार हाणामाऱ्या झाल्यावर वाहने तोडफोडीसारख्या घटना घडत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. कामगारनगर भागात वाहन तोडफोडीच्या झालेल्या घटनेतही टवाळखोरांमध्ये वाद झाला आणि मद्यच्या नशेत त्यांनी दिसेल त्या वाहनांची तोडफोड केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे सातपूर भागात अनेक ठिकाणी चौकात उभे राहणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासह गँग तयार करणाऱ्यांनाच ताब्यात घेतले पाहिजे, असे सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.

--

येथे आहे वाढता वावर

सातपूर भागात बारदान फाटा, मोतीवाला कॉलेज, धुव्रनगरच्या वळणावर, शिवाजीनगर, कार्बन नाका, जलनगरीरोड, श्रमिकनगर, हिंदी माध्यमिक विद्यालय, राधाकृष्णनगर, अशोकनगर बसथांबा, जाधव संकुल, आनंद छाया, स्वामी समर्थ केंद्रासमोर, सातपूर कॉलनी श्रीराम सर्कल, एमआयडीसीतील अनधिकृत हॉटेल्स आदी ठिकाणी रोजच मोकाट टवाळखोरांचा वावर असतो. त्यातील अनेक जण स्लम भागात राहणारे असतात. परंतु, भाईंच्या भाईगिरीसाठी रहिवासी भागात रोजच त्यांचा वावर असतो. विशेष म्हणजे कुठला उद्योग, व्यवसाय किंवा नोकरी न करता केवळ दहशत पसरविण्याचे काम या टवाळखोरांकडून केले जाते. आयुक्त डॉ. सिंगल यांनी टवाळखोरांच्या अशा अड्ड्यांवर कारवाई करून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेक इन नाशिक’दिल्लीदरबारी

$
0
0

केंद्रीय उद्योगमंत्री अनंत गितेंबरोबर होणार बैठक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये मोठ्या उद्योगांनी गुंतवणूक करावी, यासाठी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्याबरोबर दिल्लीत उद्योजकांची बैठक होणार आहे. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता दिल्लीच्या उद्योग भवनात होणाऱ्या या बैठकीस देशातील १० कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना आमंत्रित करण्यात आले आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंसह निमा व आयमा संघटनांचे पदाधिकारीही या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

मुंबई येथे झालेल्या ‘मेक इन नाशिक’ कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गिते यांनी ‘तुम्ही सांगाल तो उद्योग स्थापन करू’ असे आश्वासन दिले होते. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच देशातील मोठ्या उद्योगांना त्यांनी आमंत्रित करून नाशिकच्या उद्योजकांना दिलासा दिला आहे. या उद्योगांनी नाशिकमध्ये तयारी दाखवली तर त्यातून नाशिकला मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. खासदार गोडसे यांनी या बैठकीसाठी पाठपुरावा केला होता.

गेल्या काही वर्षांत नाशिकमध्ये मोठ्या उद्योगांनी पाठ फिरवल्यामुळे उद्योग क्षेत्र चिंतेत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठे उद्योग सुरू व्हावेत व १० हजार कोटींच्या आसपास गुंतवणूक व्हावी, असे टार्गेट ठरवत ‘मेक इन नाशिक’च्या कार्यक्रमाचे निमाने आयोजन केले होते. पुणे-मुंबईपासून नाशिक जवळ असून, या सुवर्ण त्रिकोणामध्ये नाशिक मागे राहिले आहे. त्यामुळे मुंबईच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा नाशिकचे ब्रँडिंग देशभर करू, असे सांगून दिलासा दिला होता. पण त्या ब्रँडिंगचे परिणाम अजून दिसलेले नाहीत. पण गिते यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आता मोठ्या उद्योजकांची बैठक होणार आहे.

या कंपन्या होणार सहभागी

या बैठकीत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारत अर्थ मुव्हर्स लि., भारत डायनामिक्स ल‌ि., भारत इलेक्ट्रॉनिक्स ल‌ि., गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स ल‌ि., गोवा शिपयार्ड ल‌ि., हिंदुस्तान एअरोनॉटिक्स ल‌ि., हिंदुस्तान शिपयार्ड ल‌ि., माझगाव डॉक शिपबिल्डर्स ल‌ि. आणि मिश्र धातू निगम ल‌ि. या १० कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक सहभागी होणार आहेत.

भविष्याचा वेध घेऊन विकास

मेमध्ये मुंबईत झालेल्या मेक इन नाशिक कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गिते यांनी नाशिक शहर हे भविष्याचा वेध घेऊन विकास करणारे शहर आहे. त्यासाठी या शहराला दिशा देणे गरजेचे आहे. मोदी सरकारने देशातील तरुणांना रोजगार तसेच विकासाची फळे चाखण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमास प्रारंभ केला आहे. त्याअंतर्गत अनेक प्रकल्प देशपातळीवर उभारले जात आहेत. त्यामुळेच नाशकात मोठे प्रकल्प उभारण्याचीही जबाबदारी माझ्यावर आली आहे. नाशिकच्या उद्योजकांनी विकासाची निश्चित अशी भूमिका समोर ठेवून आपले उद्दिष्‍ट गाठणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेल्टर होम’अडकले लालफितीत

$
0
0

प्रस्ताव मंजुरीची अद्यापही प्रतीक्षा

नाशिक : बेघर, रस्त्यावर भटकणाऱ्या मुलांना सुरक्षित आधार मिळावा यादृष्टीने ओपन शेल्टर होमची प्रक्रिया सध्या मंजुरीच्या प्रतीक्षेत अडकली आहे. नाशिक जिल्ह्यातून चार प्रस्ताव दोन ते अडीच महिन्यांपूर्वी महिला बालविकास आयुक्तालयाकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र या प्रस्तावांना कधीपर्यंत मंजुरी मिळेल व प्रत्यक्षात शेल्टर होम या मुलांसाठी कधी सुरू होईल, याचा अंदाज व्यक्त करणे कठीण असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात येत आहे.

घर सोडून आलेली, हरवलेली अनेक मुले रेल्वेस्टेशन, बसस्टॅण्ड आदी ठिकाणी भटकताना दिसतात. ही मुले चुकीच्या व्यक्तींच्या हाती जाऊन त्यांचा गैरवापर होण्याची मोठी शक्यता असते. या घटनांमधील गांभीर्य तपासता महिला व बालविकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था, पुणे बालन्याय व संरक्षण अधिनियम २०१५ कलम ४३(१) अन्वये राज्यात प्रायोगिक तत्त्वावर अ व ब वर्ग महानगरपालिका क्षेत्रात ओपन शेल्टर होम स्थापन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.

या मुलांना आधार मिळून त्यांना सुखरूप आपल्या पालकांच्या स्वाधीन करणे, हा त्यातील मुख्य उद्देश आहे. मात्र, सरकारी कामांच्या कचाट्यातून हे प्रस्ताव मंजुरी होऊन प्रत्यक्षात हे ओपनशेल्टर होम केव्हा सुरू होतील, याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनाही नाही. त्यामुळे या योजनेचा प्रत्यक्ष फायदा या मुलांना कधी मिळणार? हा प्रश्न अनुत्तरीत राहत आहे.

नाशिकमधील चार संस्थांचे प्रस्ताव

या शेल्टर होमसाठी जाहिराती देऊन प्रस्ताव मागविण्यात आले होते. संस्थांचे प्रस्तावित सेंटर हे शहराच्या, गर्दीच्या ठिकाणी, रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड, धार्मिक स्थळ यापासून दोन किमी अंतरात असावे अशा अटी त्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या अटींमध्ये बसलेल्या चार संस्थांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

राज्यात तीनच ओपन शेल्टर होम

आतापर्यंत केवळ मुंबई व पुणे येथेच ओपन शेल्टर होम आहेत. मुंबईमध्ये दोन व पुण्यात एक शेल्टर आहे. या निर्णयानंतर नाशिकसह राज्यातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर, ठाणे, चिंचवड येथे शेल्टर होम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी गणेश कानवडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्ग नूतनीकरणास ‘ब्रेक’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्गावर शिंदे गावाजवळ नव्याने उभारण्यात येत असलेल्या मातीच्या भराव पुलास स्थानिक नागरिकांकडून जोरदार विरोध होत असून, महामार्ग नूतनीकरणाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. शिंदे ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे महामार्गाच्या कामाला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. येथील पूल रद्द व्हावा, या मागणीसाठी रविवारी (दि. ३०) सकाळी ९ वाजता महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

शिंदे गावात सध्या नाशिक-पुणे महामार्ग नूतनीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी सुमारे पाचशे मीटर लांबीचा मातीच्या भरावाचा पूल उभारण्याचे काम सध्या जलदगतीने सुरू आहे. मात्र, या भराव पुलामुळे शिंदे येथील ग्रामस्थांना महामार्ग ओलांडता येणार नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे शिंदे गावात होत असलेल्या या मातीच्या भराव पुलास स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शविला असून, हा पूल रद्द करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात सरपंच माधुरी तुंगार यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला नुकतेच निवेदन देण्यात आले.

--

हे आहे विरोधाचे कारण

शिंदे गावाच्या मधून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे. गावातील बहुसंख्य रहिवासी भाग हा महामार्गाच्या डाव्या बाजूस आहे. मात्र, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय, पशु वैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, व्यायामशाळा, स्मशानभूमी महामार्गाच्या उजव्या बाजूस आहेत. या ठिकाणी मातीचा भराव पूल झाल्यास नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडून पलीकडे जाण्याचा मार्गच बंद होणार आहे. त्यामुळे येथे सध्या सुरू असलेल्या मातीच्या पुलास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.

--

शिंदे गावात मातीचा भराव पूल झाल्यास गाव दोन भागांत विभागले जाणार आहे. सर्व शासकीय कार्यालयांसह शाळा व स्मशानभूमी महामार्गाच्या पलीकडे व गाव एकीकडे अशी स्थिती निर्माण होईल. त्यामुळे शिंदे गावात मातीच्या भराव पुलाऐवजी उड्डाणपूल उभारावा किंवा येथे कोणताही पूल उभारू नये. येथील कामास विरोध म्हणून ग्रामस्थ रास्ता रोको करणार आहेत.

-माधुरी तुंगार, सरपंच, शिंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार दिवस खंबाळ्यातच पार्किंग

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तिसऱ्या सोमवारकरिता जिल्हा प्रशासनाने वाहनांना केलेली प्रवेशबंदी भाविकांसह नागरिकांची कोंडी करणारी ठरत आहे. तिसऱ्या श्रावण सोमवारी गर्दीचे नियोजन करण्यासाठी रविवारपासून सोमवार सांयकाळपर्यंत वाहनांना शहराकडे प्रवेशबंदी करणे रास्त आहे. मात्र प्रशासनाने ५ ते ८ ऑगस्ट असे सलग चार प्रवेशबंदी केल्यामुळे त्र्यंबककरांसह परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरवर्षी तिसऱ्या श्रावण सोमवारी ब्रह्मगिरीला फेरी मारण्यासाठी भाविकांची गर्दी होते. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून वाहतूक नियोजन केले जाते. मात्र यंदा जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात खंबाळा, पहिणेबारी, अंबोली टी पॉईंट या ठिकाणाहून काळ्या पिवळया टॅक्सी, रिक्षा चारचाकी, दुचाकी वाहने व इतर खासगी वाहनांना ५ ते ८ ऑगस्ट पर्यंत प्रवेशबंदी करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर येथील रस्ते अरूंद असून, खासगी वहनांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

तिसऱ्या सोमवारला येणारे प्रदक्षिणार्थी हे संत निवृत्त‌िनाथ यात्रेदरम्यान येणाऱ्या वारकऱ्यांपेक्षा निम्मेदेखील नसतात. मात्र त्याचा त्रास शहरासह पंचक्रोशीतील नागरिकांना सहन करावा लागतो. यावर्षी तिसरा श्रावण सामवार ७ ऑगस्ट रोजी आहे. या सोमवारी प्रशासनाच्या अंदाजानूसार लाखो भाविक प्रदक्षिणेस येतील. मात्र गेल्या १५ वर्षांचा अनुभव पाहता येणारी भाविक हे रविवारी रात्री ८ वाजेनंतर येतात आणि सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत प्रदक्षिणा पूर्ण करून परतात. सोमवारच्या नियोजनासाठी शनिवारपासूनच नाकाबंदी का, खंबाळे येथे वाहने थांबवून बसने प्रवास का करायचा? असा प्रश्न भाविकांसह स्थानिकांना पडला आहे.

नोकरदार, व्यावसायिकांचे हाल

त्र्यंबक-जव्हार, त्र्यंबक-घोटी आणि त्र्यंबक-नाशिक अशा तीनही मार्गावर केलेली नाकाबंदी गुजरात आणि मुंबईकडील प्रवाशांना अडवणूक करणारी आहे. यामार्गे प्रवास करणारे नोकरदार, व्यवसायीक व रहिवाशी विनाकारण वेठीस धरले जातील. त्यामुळे हे नियोजन बदलावे, अशी मागणी होत आहे.

खंबाळे अडचणीचेच

नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर पेगलवाडी येथे कुंभमेळ्यात साधुग्राम केले असून, ती जागा वाहनतळ म्हणून वापरता येणे शक्य आहे. खंबाळे पार्किंग हे आत आहे. तेथे बेभरवशावर वाहने उभी करण्यास भाविक, पर्यटक नाखूष असतात. तेथून वेळेत बस मिळत नाही. त्यामुळे अनेकदा भाविक पायीच त्र्यंबकला येतात. बस महामंडळाकडून १२ कि.मी.साठी काही वेळेस पूर्ण नाशिकपर्यंतचे भाडे आकरण्याचे प्रकार घडले आहेत. एक दोन दिवसांसाठी येणाऱ्या भाविकांना याचे काही वाटत नाही. मात्र नित्य प्रवास करणारे, व्यावसायीक, नोकरदार यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच यंदा गर्दीच्या नियोजनासाठी शनिवार ते मंगळवारपर्यंत खासगी वाहनांना केलेली प्रवेशबंदी जरा जास्तच तापदायक ठरणार आहे.

वर्षभर प्रवेशबंदीचा जाच

त्र्यंबकेश्वर शहरात खासगी वाहनांना १२ महिने प्रवेशबंदी आहे. नगरपालिका टोल नाक्यापासून ते शहरात जागोजागी बॅरेकेडिंग केलेले आहे. खासगी वाहने वाहनतळ आणि नवीन बस स्थानक येथे थांबविले जातात. यामध्ये काही भाविक शहरात बळजबरी अथवा वश‌िल्यावर वाहने आणतात. काही जण वाहने रस्त्यावर उभी करतात. काही थेट मंदिराच्या पाठीमागे वाहने उभी करतात. या बॅरेकेडिंगमुळे कधीकधी मोठी पंचाईत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशातील पहिल्या कांदा कोल्ड स्टोरेजचे उद्या भूमीपूजन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा निफाड

लासलगाव येथे रेल्वे आणि खरेदी-विक्री संघाच्या संयुक्त प्रयत्नातून कांद्यासाठी कोल्ड स्टोअरेज उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या, रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. महाराष्ट्रात अशा स्वरूपाचे हे पहिलेच कोल्ड स्टोरेज उभे राहत आहे.

कांद्याची भारतातील मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथे आता कांद्यासह इतर भाजीपाला अधिक काळ टिकून राहावा, यासाठी उभारण्यात येणाऱ्या शितगृह उभारण्यात येत आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेत कंटेनर कॉरपोरेशन ऑफ इंडियातर्फे लासलगाव विभाग सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून २५०० मेट्रीक टन क्षमतेचे बहुउद्देशीय शीतगृहाची उभारणी होणार असल्याची माहीती लासलगाव खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील व संचालक मंडळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लासलगाव खरेदी विक्री संघाचे रेल्वेस्टेशन लगतच्या गट न. २९० ब या ठिकाणी हे शीतगृह भूमीपूजन होणार आहे. रविवारी दुपारी १२ वाजता कोनशीला अनावरण व भूमीपूजन होईल. या कार्यक्रमाला सहकारमंत्री ना सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरिष महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल व ग्रामीण विकास मंत्री दादा भुसे याचेसह रेल्वे विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत.

कसे असेल शीतगृह

२५०० मेट्रीक टन क्षमतेच्या या शीतगृहाची उभारणी १४००० वर्ग मीटर क्षेत्रफळावर होईल. या शीतगृहात १५०० मेट्रीक टन कांदा साठवणुकीसाठी जागा ठेवण्यात येईल. कांद्याशिवाय भाजीपाला, फळे यासाठी या शीतगृहात १००० मेट्रीक टनाची जागा ठेवण्यात येणार आहे. देशातील हे पहिले कोल्ड स्टोरेज ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटी वसुली थांबेना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जीएसटी लागू झाल्यानंतर एलबीटी कर रद्द झालेला असतानाही चक्क एलबीटी वसूल केला जात असल्याची बाब पुढे येत आहे. मुद्रांक शुल्क विभागाने राज्य सरकारकडून अधिकृत सूचना प्राप्त होत नाही, तोपर्यंत एलबीटी आकारला जाणार असल्याची भूमिका घेतली आहे. या विभागामार्फत नाशिक जिल्ह्यातील दोन महापालिका क्षेत्रांतून तब्बल पाच कोटींच्या आसपास एलबीटी वसूल करण्यात आला आहे. या करामुळे घरांचे व्यवहार करणाऱ्या अनेकांना भुर्दंड बसत आहे.

‘वन नेशन वन टॅक्स’ची घोषणा केल्यानंतर अनेक कर रद्द करून केंद्र व राज्य सरकारने वस्तू व सेवा कर प्रणाली (जीएसटी) लागू केल्यावर लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी)देखील रद्द केला. पण, खरेदीखत, गहाणखत, बक्षीसपत्र आदींसह विविध प्रकारच्या करारांवर मुद्रांक शुल्कासह एक टक्का एलबीटी आकारला जात आहे. नाशिक जिल्ह्यात या कराच्या माध्यमातून गेल्या २५ दिवसांत नाशिक व मालेगाव महापालिका क्षेत्रातून किती रक्कम जमा झाली याचा आकडा अद्याप आला नसला, तरी तो किमान पाच कोेटी रुपयांच्या आसपास असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

राज्य सरकारने अगोदरच एलबीटी रद्द केला. त्यानंतर महापालिकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी महापालिकांना अनुदान देणे सुरू केले. पण, महापालिकांच्या हद्दीत होणाऱ्या खरेदी-विक्री व्यवहारांवर एक टक्का एलबीटी तसाच ठेवला. जीएसटी लागू झाल्यानंतर एलबीटी व इतर कर रद्द झाले असताना मुद्रांक शुल्क विभाग मात्र एक टक्का एलबीटी घेत आहे. नोटाबंदीनंतर आता कुठे खरेदी व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतर या कराचा विनाकारण फटका बसत असल्यामुळे बांधकाम व्यावसायिक संतप्त आहेत.

---

केंद्राच्या भूमिकेलाच छेद

राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला नसल्यामुळे एकूणच केंद्र सरकाराच्या भूमिकेला या करामुळे छेद दिला जात आहे. आता ही एलबीटीपोटी जमा होणारी रक्कम महापालिकेला न मिळता राज्य सरकारकडे जमा केली जाणार असल्याचे मुद्रांक शुल्क विभागाचे अधिकारी सांगत आहेत. या करामुळे सदनिका, घर, जमीन खरेदी करू इच्छिणाऱ्यांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिकांनीसुद्धा प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

--

जिल्ह्यात जीएसटीपूर्वी झालेली एलबीटी वसुली

-

महिना - दस्त नोंद - एलबीटी

--

जानेवारी - १७१४ - ३ कोटी २५ लाख २६ हजार ८०४

फेब्रुवारी - १७६१ - ३ कोटी ६४ लाख ५४ हजार ४७९

मार्च - ३३५५ - ७ कोटी ३७ हजार ९८८

एप्रिल - २०८२ - ४ कोटी १३ लाख ७६ हजार ६७९

मे - १९१७ - ४ कोटी १० लाख ५३ हजार ३८०

जून - ३२८६ - ९ कोटी ७ लाख १८ हजार ६१७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदामाई पुरे‘पूर’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सोमवारपासून उघडीप दिलेल्या पावसाने गुरुवापासून पुन्हा बरसण्यास सुरुवात केल्याने गोदावरीला पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागली आहे. शुक्रवारी (दि. २८) रोजी सकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे नाल्यांमधून पाणी वाहू लागले तसेच धरणातूनही पाणी सोडण्यात आल्याने गोदावरीच्या पाण्याची पातळी पुन्हा वाढली. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी वाढले होते. त्यात आणखी वाढ होत असल्याने गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाचा जोर वाढल्याने गोदाकाठच्या व्यावसायिकांना पुन्हा त्यांच्या विक्री साहित्याची आवराआवर करावी लागली. पावसाची संततधार कायम राहिल्याने धरणातून पाणी सोडण्याची शक्यता लक्षात घेऊन या भागातील रहिवाशी आणि व्यावसायिक यांनी अगोदरच सावधगिरी बाळगल्याचे दिसले.


पाण्यात बस अडकली

गोदाघाटाच्या म्हसोबा पटांगणावर उत्तर प्रदेश येथून आलेल्या चार ट्रॅव्हल बस थांबल्या होत्या. या बसमधून नाशिक दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी म्हसोबा पटांगणावर वाघाडी नाल्याच्या बाजूला शेड उभारून तेथे स्वयंपाक करण्यास सुरुवात केली होती. त्याच वेळी नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली. तीन बसचालकांनी तेथून त्या गाड्या त्वरीत गाडगे महाराज पुलाच्या खालून तपोवन रस्त्याकडे काढल्या. स्वयंपाक करीत असलेले भाविक सुरक्षित स्थळी गेले. चौथी ट्रॅव्हल बस चालकाने रथोत्सवासाठी केलेल्या गाडगे महाराज पुलाच्या खालच्या भागातून काढण्याचा प्रयत्न केला. तेथे खोलगट भागात गाळ साचलेला असल्याने त्यात ती बस अडकली. पाणी वाढल्याने ही बस काढणे मुश्किल झाले. साडेअकरा वाजता क्रेनच्या साह्याने ही बस बाहेर काढण्यात आली. बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे तसेच पाणी फारसे वाढलेले नसल्यामुळे काही नुकसान झाले नाही.

धरणांमधून पुन्हा विसर्ग

गंगापूर दारणासह सात धरणांमधून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत जिल्ह्यात ५५५ मिमी पावसाची नोंद झाली. पेठ १३५, सुरगाणा ११७, इगतपुरीत ७६ तर त्र्यंबकेश्वरमध्ये ४५ मिली पाऊस झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास दारणातून ६६१०, गंगापूर ५१०९, कडवा ४१७६, वालदेवी ५९८, आळंदीतून २७१६ तर पालखेडमधून १२ हजार ३१८ क्यूसेकने पाणी सोडण्यात येत होते. हे सर्व पाणी नांदूर मध्यमेश्वरपर्यंत पोहोचत असल्याने तेथून जायकवाडीकडे ४९ हजार ४७८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग केला जात होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएसएनएलवर व्हायरस अॅटॅक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मालवेअरचा अॅटॅक करुन हॅकर्सनी नाशिकमध्ये तब्बल एक हजाराहून अधिक बीएसएनएलचे ब्रॉड बॅण्ड कनेक्शन्स हॅक केली आहेत. दोन दिवसांत बीएसएनएलकडे याबाबत पाचशेहून अधिक तक्रारी आल्या आहेत. त्यांचा पासवर्ड बदलून ते पूर्ववत केल्यामुळे या अॅटॅक परतवून लावण्यात बीएसएनएला यश आले आहे. दोन दिवसांत नाशिकसह देशभर अशा घटना घडल्यामुळे बंगळुरू येथील बीएसएनएलचे अधिकारी हा अॅटॅक कशामुळे झाला याचा शोध घेत आहेत.

जगभर सायबर गुन्हेगार हे कम्प्युटर, मेल हॅक करण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून मालवेअरचा अॅटॅक करतात. मालवेअरचे पारंपरिक अॅटॅक शोधणे हे सोपे काम आहे. पण सायबर गुन्हेगारांकडून नव्या आणि अनपेक्षित पद्धतींचा वापर केला गेल्यास संबंधित मालवेअर अॅटॅक शोधणे हे एक आव्हान असते. पण ब्रॉड बॅण्ड कनेक्शनमध्ये यूजर नेम व पासवर्ड बदलल्यानंतर हा अॅटॅक निरुपयोगी ठरला आहे. विशेष म्हणजे ब्रॉड बॅण्ड कनेक्शन देताना बीएसएनएल मोडेम देत नाही. ती विविध कंपन्यांची असतात. त्यावर हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. यात आय - बॉल व सुपरनेटच्या मोडेमचे प्रमाण जास्त आहे. इतर मोडेममध्ये मात्र फारशा तक्रारी आलेल्या नसल्याचेही समोर आले आहे.

यूजरनेम, पासवर्ड बदला

मोडेम घेतल्यानंतर बऱ्याच वेळा ग्राहक यूजर नेममध्ये अॅडमिन व पासवर्डही अॅडम‌िन ठेवतो. त्यामुळे हा अॅटॅक करणे सोपे झाल्याचे बोलले जात आहे. या अॅटॅकमुळे मोडेमचे पेज १९२.१६८.१.१ हे उघडणेही अवघड होते. पण या तक्रारीनंतर बीएसएलने नाशिक कार्यालयात गुरुवारी २५० मोडेम रिसेट करुन त्याचा पासवर्ड व यूजर नेम बदलण्याचे काम केले. शुक्रवारीही २५० हून अधिक याच तक्रारी होत्या, बीएसएनएलने त्या सोडवल्या. यामागे मालवेअरचा अॅटॅक आहे की दुसरे काही कारण आहे, याबाबत संभ्रम कायम आहे.


ब्रॉड बॅण्ड कनेक्शन बंद होण्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यात काही मोडेमध्ये हा प्रॉब्लेम असल्याचे पुढे आले आहे. यात ग्राहकांना यूजर नेम व पासवर्ड बदलून सेवा पूर्ववत केली आहे. हे मोडेम सेट करुन यूजर्स स्वतःही ते करू शकतात.. हा अॅटॅक मालवेअरचा आहे की आणखी काही, हे अद्याप स्पष्ट नाही.

- नितीन महाजन, महाव्यस्थापक, बीएसएनएल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी खर्चाबाबत उदासीनता

$
0
0

१२२ पैकी ७८ नगरसेवकांकडून अद्याप विकासकामांचे प्रस्तावच नाहीत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत ७५ लाखांचा नगरसेवक निधी मिळावा हा प्रतिष्ठेचा मुद्दा करून हा निधी नगरसेवकांनी मंजूरही करून घेतला. परंतु, या मंजूर केलेल्या ७५ लाखांच्या निधी खर्चात नगरसेवकांची उदासीनता दिसून येत आहे. नव्याने निवडून आलेल्या १२२ नगरसेवकांपैकी केवळ ४४ नगरसेवकांनीच निधीची कामे सूचवून ती मंजूर करून घेतली आहेत. अद्यापही ७८ नगरसेवकांनी निधीचे प्रस्ताव दाखल केलेले नाहीत. नगरसेवक निधी खर्च करण्यात भाजपच्या शशिकांत जाधव व सुदाम नागरे यांनी आघाडी घेतली असून, दोघांनी मंजूर ७५ लाखांपैकी ७४ लाखांची कामे मार्गी लावली आहेत. पालिकेतील पदाधिकारीही निधी खर्चात पिछाडीवर आहेत.

पालिकेतील विद्यमान सत्ताधाऱ्यांनी ७५ लाखांचा नगरसेवक निधी हा प्रतिष्ठेचा केला होता. स्थायी समितीने ४० लाखांचा निधी मंजूर केला होता. महापौर रंजना भानसी यांनी त्यात ३५ लाखांची भर घालत तो ७५ लाखांपर्यत वाढवला होता. परंतु, प्रशासनाने तिजोरी खाली असल्याचे सांगत एवढा निधी देण्यास नकार दिला होता. ७५ लाखांचा निधी हवा असेल, तर मनसेच्या काळातील दीडशे कोटींचे कामे कमी करून देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दिला होता. त्याला महापौरांनी हिरवा कंदील दाखवल्याने मनसेच्या काळातील दीडशे कोटींची कामे कमी करून दिली आहेत. त्यामुळे स्पीलओव्हर हा सहाशे कोटींवरून साडेचारशे कोटींवर आला आहे. त्यामुळे आयुक्तांनी सर्व नगरसेवकांना ७५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे अभ्यासू व पालिकेच्या कामाचा अनुभव असलेल्या नगरसेवकांनी आपला निधी खर्च करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

पालिकेतील १२२ नगरसेवकांपैकी आतापर्यंत ४४ नगरसेवकांनी निधीतील कामांसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. यात आपल्या प्रभाातील रस्ते, वीज, मलनिस्सारण, पाणीपुरवठा संदर्भातील कामांचा समावेश आहे. पालिकेत आतापर्यंत ४४ नगरसेवकांनी विकासकामांचे प्रस्ताव दाखल करून घेत ते लेखा विभागाकडून मंजूर करून घेतले आहेत. प्रशासनाने त्यासाठी ९५ कोटींचा निधी आरक्षित केला असून, त्यातून आतापर्यंत ९ कोटी ३३ लाखांची कामे मार्गी लागली आहेत. तर अद्यापही ७८ नगरसेवकांनी कवडीचाही प्रस्ताव दाखल केलेला नाही. त्यामुळे या नगरसेवकांमध्ये निधी खर्चाबाबत उदासीनता दिसून येत आहे.

पदाधिकारीही पिछाडीवर

महापालिकेत काही नगरसेवकांनी निधी खर्चात आघाडी घेतली असली, तरी पालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्येही नगरसेवक निधी खर्चाबाबत फारसा उत्साह दिसत नाही. महापौर रंजना भानसी यांनी ७५ लाखांपैकी ३० लाख १४ हजार रुपयांपर्यंतची कामे सुचवली आहेत. उपमहापौर प्रथमेश गिते यांनी २६ लाखांची कामे सुचवली आहेत. पदाधिकाऱ्यांमध्ये सभागृह नेते दिनकर पाटील हे अव्वल असून, त्यांनी आतापर्यंत ५३ लाखांचा निधी खर्च केला आहे. स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी केवळ ३ लाख ७७ हजार रुपये खर्च केले आहेत. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांचाही खर्च झालेला नाही.


शशिकांत जाधव, सुदाम नागरेंची आघाडी

नगरसेवक निधी खर्चाबाबतचे प्रस्ताव दाखल करण्यात भाजपचे नगरसेवक शशिकांत जाधव व सुदाम नागरे आघाडीवर आहेत. जाधव व नागरे यांनी आपल्या प्रभाग क्र. १० मधील कामांसाठी जवळपास प्रत्येकी ७४ लाखांची कामे मंजुरीला पाठवली आहेत. आरपीआयच्या दीक्षा लोंढे आणि अपक्ष सैय्यद मुशीर यांचा खर्च कमी झाला आहे. बहुतांश नगरसेवकांनी दहा ते २० लाखांपर्यंतची कामेच मंजुरीला पाठवली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इंदू सरकार’विरोधात निदर्शने

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
देशातील आणीबाणी पर्वावर प्रकाश टाकणाऱ्या ‘इंदू सरकार’ या चित्रपटाचा नाशिकमधील पहिला शो काँग्रेस कार्यकर्त्यांनी उधळून लावण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी यावेळी दिग्दर्शक मधुर भंडारकर आणि मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी सुमारे शंभर काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक करुन नंतर त्यांची जामीनावर मुक्तता केली.

पुणे रोडवरील ‘फेम’ चित्रपटगृहात शुक्रवारी सकाळी इंदू सरकारचा पहिला शो आयोजित करण्यात आला होता. परंतु, शोपूर्वीच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फेम चित्रपटगृहाबाहेर गर्दी करत, चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध सुरू केला. माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक राहुल दिवे, महिला काँग्रेस शहराध्यक्ष वत्सला खैरे, उद्धव पवार, डॉ. हेमलता पाटील, आशा तडवी, बबलू खैरे यांच्यासह शंभरावर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. इंदू सरकारच्या पोस्टरला कार्यकर्त्यांनी लाथा मारून या चित्रपटाचा तीव्र निषेध केला. आंदोलकांनी यावेळी दिग्दर्शक मधुर भंडारकर आणि मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. चित्रपटात गांधी कुटुंबाबाबत चुकीची माहिती दाखवून त्यांची बदनामी केल्याचा आरोप यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले. आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे पहीला शो काही काळासाठी बंद करण्यात आला. पोलिसांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शंभर कार्यकर्त्यांना यावेळी अटक केली. त्यानंतर त्यांची जाम‌िनावर मुक्तता करण्यात आली. शहरात ‘इंदू सरकार’ प्रदर्शित केल्यात विरोध कायम राहील, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. दीड तास सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून सहायक आयुक्त मोहन ठाकूर यांच्यासह उपनगर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यात्रोत्सवाने खुलला तवली डोंगर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मखमलाबाद ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या व नवसाला पावणाऱ्या नागोबाराजाच्या यात्राेत्सवामुळे गुरुवारी गावाजवळच्या तवली डोंगराचा परिसर खुलून गेला होता. दर वर्षीप्रमाणे या यात्रेनिमित्त दर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांची गर्दी झाली होती.

नागपंचमीला होणाऱ्या यात्रेनिमित्त मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली होती. या नागोबा मंदिरातील चिऱ्याला एक इतिहास असल्याने मखमलाबाद परिसरातील ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविकांनीही आवर्जून हजेरी लावली. मंदिरात नवस करून काही जण नवसपूर्ती करीत असल्याने यंदाही गर्दी झाली होती. यात्रेच्या दिवशी सकाळी ग्रामविकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंदिरात जाऊन पूजा करीत मंदिराबाहेर नवीन ध्वजाची उभारणी केली.

येथील मंदिराजवळच नागनागेश्वरी माता मंदिराचीही उभारणी केली गेली आहे. या टेकडीचा म्हणावा तसा विकास झाला नसला, तरी तरुणाईने यावर्षी झाडे लावून परिसर हरित करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. यात्रेमुळे येथे विविध दुकाने थाटण्यात आली होती. पूर्वी २५ हजार लोकसंख्या असलेल्या मखमलाबाद गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे यात्रेच्या दिवशी लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल झाली.

यात्रोत्सव उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी अध्यक्ष कारभारी काकड, कारभारी शिंदे, निवृत्ती मानकर, पंढरीनाथ पिंगळे, त्र्यंबक तांदळे, आबा मुरकुटे, मोतीराम पिंगळे, पंडित पिंगळे, सुभाष तिडके, बाबुराव रायकर, नगरसेविका सिंधू खोडे, नगरसेवक दामोदर मानकर, माजी नगरसेवक पुंडलिक खोडे, डॉ. जगन्नाथ तांदळे, नारायण काकड, मदन पिंगळे, रमेश पिंगळे, तानाजी पिंगळे, गोकुळ काकड, संजय फडोळ, देवीदास घाडगे आदींसह ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

--

यात्रेचा खर्च गाववर्गणीद्वारे

यंदादेखील यात्रेचा खर्च ग्रामविकास मंडळामार्फत गावातील मूळ ग्रामस्थांकडून सालाबादप्रमाणे वर्गणी जमा करून भागविण्यात आला. यात्रेआधी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष कारभारी काकड यांच्या अध्यक्षतेखाली श्रीराम मंदिराच्या सभागृहात बैठक होऊन त्यात यात्रेचे नियोजन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुफटॉप सोलरला खोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

रुफटॉप सोलर कनेक्शनसाठी आवश्यक असणारे नेट मीटर महावितरण कंपनीकडून उपलब्ध होत नसल्याने गैरसोय होत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात गुरुवारी ग्रीन एनर्जी फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे नाशिक परिमंडळ मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्याकडे तक्रार केली. या उपयुक्त योजनेत सध्या अडथळा निर्माण झाल्याची स्थिती असून, यासंदर्भात उपाययोजनांची मागणी फोरमतर्फे करण्यात आली.

नाशिक जिल्ह्यात औद्योगिक व वाणिज्य ग्राहकांसह असंख्य घरगुती वीजग्राहकही रुफटॉप सोलर कनेक्शनला पसंती देत आहेत. दिवसेंदिवस अशा ग्राहकांची संख्या वाढू लागली आहे. परंतु, मागणीच्या प्रमाणात व वेळेत रुफटॉप सोलर कनेक्शनसाठी आवश्यक असणारे नेट मीटर महावितरणकडून मिळत नसल्याने अशा ग्राहकांची गैरसोय होत आहे. संबंधित नेट मीटर महावितरण कंपनीने देणे बंधनकारक असतानाही वीजग्राहकांना ते विकत घ्यावे लागत असल्याची बाबही यावेळी ग्रीन एनर्जी फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी परिमंडळ मुख्य अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिली. रुफटॉप सोलर कनेक्शनसाठी आवश्यक पूर्तता ठराविक वेळेत पूर्ण करून त्वरित कनेक्शन दिले जातील, असे आश्वासन यावेळी मुख्य अभियंता कुमठेकर यांनी ग्रीन एनर्जी फोरमच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

रुफटॉप सोलर संच बसविणे महावितरणच्या अभियंत्यांसाठीही नवीन आहे. त्यामुळेही अशाप्रकारचे संच बसविण्याच्या कामात दिरंगाई होत आहे. यावेळी ग्रीन एनर्जी फोरमचे अध्यक्ष रमेश पवार, ‘मेडा’चे विभागीय अधिकारी व्ही. बी. उगले, उद्योजक उदय रकिबे, उदय येवले, सुनील थोरात यांच्यासह महावितरणचे नाशिक शहर मंडळ अधीक्षक अभियंता सुनील पावडे आदी उपस्थित होते.

--

वीज बचतीतून उत्पन्नाचा स्रोत...

रुफटॉप सोलर कनेक्शन घेणाऱ्या वीजग्राहकांच्या छतावरच वीजनिर्मिती केली जाते. त्याद्वारे तयार होणारी वीज संबंधित वीजग्राहकाला वापरता येते. महावितरणकडून मिळणाऱ्या नेट मीटरवर उत्पादित वीज व वापरलेली वीज अशी नोंद होते. त्यामुळे वापरलेल्या विजेपेक्षा जास्त युनिट वीज उत्पादित झाल्यास उर्वरित वीज महावितरण खरेदी करते किंवा उत्पादित विजेपेक्षा वीजग्राहकाकडून जास्त युनिट वीज वापरली गेल्यास वापरलेल्या वीज युनिटमधून उत्पादित विजेचे युनिट वजा जाता शिल्लक वीज युनिटचेच वीजबिल संबंधित वीजग्राहकाला मिळते. त्यामुळे रुफटॉप सोलर आगामी काळात वीजग्राहकांसाठी एकप्रकारे वीज बचतीतून उत्पन्नाचा स्रोत ठरू शकणार आहे.

--

रुफटॉप सोलर कनेक्शनसाठी नेट मीटर हे विशिष्ट मीटर लागते. त्यांची पुरेशी उपलब्धता होताच ती ग्राहकांना दिली जातील. या कनेक्शनसाठीच्या तांत्रिक बाबी वेगळ्या असतात. त्यांची पूर्तता झाल्याबरोबर कनेक्शन दिले जाईल.

-दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण, नाशिक परिमंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री उद्या नाशकात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. ३० जुलै) लासलगाव येथील कांद्याचे प्रस्तावित कोल्ड स्टोरेज व नाशिक शहरातील मध्यवर्ती मेळा बसस्थानकाच्या हायटेक टर्मिनल्सचे भूमिपूजन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून दत्तक नाशिकच्या पूर्ततेसाठी काही निधीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे नाशिककरांच्या नजरा लागून आहेत.

महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या दत्तक नाशिकच्या हाकेला नाशिककरांनी प्रतिसाद देऊन भाजपच्या पारड्यात मते टाकली. त्यामुळे महापालिकेत भाजपची सत्ता आली, तर जिल्हा परिषदेत भाजपची ताकद वाढली. नाशिकचे विविध प्रकल्प मार्गी लावून विकास करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी नाशिक महापालिकेला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला होता. परंतु, शहराला निधी देण्यासंदर्भात घोषणा केलेली नव्हती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत सकाळी लासलगाव येथे कांदा कोल्ट स्टोरेजचे उद्घाटन केले जाणार आहे. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत.

शहरात दुपारी मेळा बसस्थानकाच्या हायटेक टर्मिनल्सचे भूमिपूजन मुख्यमंत्री व रेल्वेमंत्री यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या १२ कोटी रुपयांच्या रकमेतून सीबीएस बसस्थानकाचा कायापालट केला जाणार आहे. यावेळी डॉ. भामरे यांच्यासह दादा भुसे, गिरीश महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित राहणार आहेत.

दोनशे कोटींची घोषणा?

महापालिकेत भाजपची सत्ता येऊन साडेचार महिने होऊन अद्यापही विकासकामांना सुरुवात झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्याने भाजपकडून अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी नाशिकचा दौरा करीत पालिकेला भेट दिली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांकडे महापौरांनी तब्बल हजार कोटींची मागणी केली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांनी सत्ताधाऱ्यांना खडसावत हात आखडता घेतला होता. रविवारच्या भेटीत मुख्यमंत्र्यांकडून नाशिकसाठी ठोस विकासकामे व पॅकेजची घोषणा अपेक्षित आहे. मंत्रिमंडळात नुकतेच राज्यातील महापालिकांमधील प्रलंबित भुयारी गटार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. त्याची अधिकृत घोषणा नाशिकला केली जाणार असून, दोनशे कोटी रुपयांचे दान पालिकेच्या पदरात पडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदूरमध्यमेश्वरमधून पुन्हा विसर्ग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या संततधार पावसामुळे पालखेड धरण ओव्हर फ्लो झाले आहे. पालखेडचे पाणी कादवा नदीत सोडण्यात आले असून, असाच पाऊस सुरू राहिला तर कादवा नदीलाही पूर येण्याची शक्यता आहे. नांदूरमध्यमेश्वरमधून ४९ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

कुंदेवाडी रौळस गावापासून वाहणाऱ्या कादवा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. रौळस ते निफाड कारखाना यांना जोडणाऱ्या कादवा नदीवरील पातळी पूल आता पुराच्या पाण्याखाली आहे. निफाड येथील कादवा नदी किनारी असणाऱ्या श्री संगमेश्वेर मंदिराला पाण्याने वेढा घातला असून, मंदिराकडे जाण्याचा मार्ग पाण्याखाली आला आहे. या ठिकाणी पाण्याची पातळी वाढल्यास कादवा नदीकाठावरील वस्तीत पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे.

नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्याच्या आठ गेटमधून शुक्रवारी ४९ हजार ४१७ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग गोदावरी पात्रात सोडण्यात येत असल्याने पूर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सायखेडा पोलिसांनी नांदूरमध्यमेशवर बंधारा परिसरात बंदोबस्त ठेवला आहे. पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने कादवाला पूर आला आहे. निफाडचे प्रांत महेश पाटील, तहसीलदार विनोद भामरे यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅडमिशनच्या नावाखाली फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नामांकित शिक्षण संस्थेत अॅडमिशन मिळवून देण्याचे भासवत पराराज्यातील भामट्यांनी दोन घटनांमध्ये तब्बल साडेसतरा लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी इंदिरानगरसह उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सध्या सर्वत्र अॅडमिशनची धावपळ सुरू आहे. आपल्या पाल्यास इच्छित ठिकाणी प्रवेश मिळावा यासाठी पालकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. पाल्यासह पालकांच्या या उत्साहाचा फायदा भामटे उचलत आहे. अशीच घटना शहरात घडली आहे. चेन्नई येथील एसआरएम यूनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने भामट्यांनी महिलेस दीड लाखाचा गंडा घातल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीता बाळासाहेब आचारी (रा. पार्क साईट रेसि. वडाळा-पाथर्डीरोड, इंदिरानगर) यांनी तक्रार दिली. आचारी यांच्या मुलाने चेन्नई येथील एसआयएम यूनव्हर्सिटी येथे प्रवेश घेतला आहे. त्याच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी आचारी यांनी इंटरनेटवर विद्यापीठाची माहिती घेतली. यावेळी विद्यापीठाच्या नावाने सुरू असलेल्या एका फेक वेबसाइटवर ९१७६४९६०६५ हा क्रमांक मिळाला. या क्रमांकावर आचारी यांनी संपर्क साधला असता सुमितकुमार नामक व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधला. वसतिगृहात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे कुमारने स्पष्ट केले. तसेच, यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार, आचारी यांनी सर्व रक्कम संशयितांच्या खात्यात भरली. मात्र, काही दिवसातच मुलाचे मॅनेजमेंट कोट्यातून कोणतेही अॅडमिशन झाले नसल्याची बाब उघडकीस आली. त्यानुसार, आचारी यांनी इंदिरानगर पोलिसांकडे धाव घेतली. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जगताप करीत आहेत.

दोघा विद्यार्थ्यांना गंडविले
फसवणुकीचा प्रकार एमबीबीएससाठी प्रवेश घेणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांनी अनुभवला. अॅडमिशन घेऊन देण्याच्या बहाण्याने मध्य प्रदेशातील इंदूर येथील दोघा भामट्यांनी त्यांना तब्बल १६ लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रनिश भानूदास कुशारे (रा. मनोहर गार्डन, जयभवानी रोड) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. इंदूर येथील नीरजकुमारसिंह व सौरभकुमारसिंह या दोघी भामट्यांनी कुशारे व त्यांचे मित्र देशमुख यांच्याशी संपर्क साधून मुलीचे आणि मुलाचे एमबीबीएस प्रवेश मिळून देतो, असे सांगून ही फसवणूक केली. आरोग्य विद्यापीठात आपल्या ओळखी असल्याचे दोघा भामट्यांनी चित्र निर्माण केले. विद्यार्थ्यांचा प्रवेश मिळवून देण्यासाठी १९ जून २०१५ रोजी पालकांना भामट्यांनी शहरातील उपनगर नाका येथे बोलावून घेतले. तसेच तिथेच सर्व रक्कम स्वीकारली. तब्बल दोन वर्षे उलटूनही वैद्यकीय प्रवेश न मिळाल्याने अखेर पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक लांडे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images