एसटी महामंडळाने ऑनलाइन बुकींगच्या माध्यमातून कात टाकली असली तरी अर्ध्या तिकीटात प्रवासाची सोय उपलब्ध करून दिलेल्या सिनिअर सिटीझन मंडळींना मात्र ही सेवा देण्यास असमर्थता दर्शवली आहे.
ज्येष्ठांनो तिकीट घ्या रांगेतच !
↧
↧
अत्याचार रोखण्यास महापालिका असक्षम
महापालिकेत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेप्रती प्रशासन उदासीन असल्याचा आरोप माकपशी संलग्न असणाऱ्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्ष मरियम ढवळे यांनी केला आहे.
↧
नाशिकचा भूषण 'आर जे ऑफ द इयर'
'गुडमॉर्निंग नाशिक' म्हणत रोज सकाळी नाशिककरांशी संवाद साधणारा... कविता व शेरोशायरीद्वारे वातावरण हलकं करणारा... हसता हसवता अंतर्मुख करणारा तसेच शहरातील चुकीच्या कामांवर शाब्दिक रट्टे देणारा 'रेडिओ मिरची'चा भूषण 'इंडियन एक्सलन्स इन रेडिओ अवार्ड्स'मध्ये मराठीतला सर्वोत्तम 'आरजे' ठरलाय.
↧
चिखलीकरला जामीन मिळणार?
कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा एग्झिक्युटिव्ह इंजिनीअर सतीश चिखलीकर आणि इंजिनीअर जगदीश वाघ यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी झाली.
↧
साधू, महंतांची आज बैठक
शहरात धार्मिक कार्यक्रमानिमित्त अनेक महामंडलेश्वरांसह साधू, महंत नाशकात गुरुवारी हजेरी लावणार आहेत. जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी कुंभमेळ्यासंदर्भात साधू, महंतांबाबत काही अयोग्य शब्द वापरल्यामुळे याप्रश्नी या सर्वांची बैठक होणार आहे.
↧
↧
घंटागाडीचे दर वर्षात दुप्पट
गेल्या वर्षासाठी दिलेल्या घंटागाडीच्या ठेक्याची मुदत संपल्यानंतर महापालिकेने नवीन टेंडर मागवले असून ठेकेदारांनी मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट खर्च होणार असल्याचे दाखवले आहे.
↧
खड्ड्यात शोधावा लागतोय रस्ता
पाथर्डी हायवेपासून अवघ्या ३०० फूट अंतरावर असणाऱ्या कृष्णाई नगरात नागरिकांचा रस्ताच हरवलायं. सलग दोन वर्षांपासून या रस्त्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या रहिवाशांच्या हातावर लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासनांची खिरापत मिळते आहे.
↧
'ज्ञानेश्वरी' बनली संशोधनाची प्रेरणा
ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 'पिंडी तेच ब्रह्मांडी' या ओवीच्या अर्थाच्या शोधात निघालेल्या 'एमबीए'त शिकणाऱ्या मुकेश बोरसेला वीज निर्मितीच्या नव्या स्त्रोताचा शोध लागला अन् सुरू झाला या शोधाच्या कल्पनेला पेटंट मिळवून देण्याचा लढा.
↧
बारावीत यंदाही मुलींची बाजी
बारावीच्या परीक्षेमध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली असून विभागात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८३.८४ टक्के आहे, तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७५.४५ टक्के आहेत.
↧
↧
अंबड लिंक रोडला वाहतुकीचा प्रश्न उग्र
आयटीआय सिग्नलपासून अंबडकडे जाणारा रस्ता सकाळ-संध्याकाळ गर्दीने दुथडा भरून वहात असल्याने या रोडला वाहतुकीचा प्रश्न उग्र रूप धारण करीत आहे. सकाळी कामगार वर्गाची कामाला जाण्याची तर संध्याकाळी घरी येणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी वाढत असल्याने अंबड लिंक रोडवरील अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
↧
'पाणी...द स्टोरी ऑफ वॉटर' शनिवारपासून प्रदर्शन
महाराष्ट्रातील काही भागात असलेल्या दुष्काळची दाहकता समजावी आणि पाणी वाचविण्यासाठी कटिबध्द व्हावे यासाठी अर्थ फाऊंडेशन आणि ठाणे फोटो सर्कल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने १ व २ जून रोजी 'पाणी...द स्टोरी ऑफ वॉटर' या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे
↧
झेरॉक्स प्रतींच्या पाठोपाठ पुर्नमुल्यांकनचीही सुविधा
गेल्या वर्षी दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या निर्णयापाठोपाठ यंदापासून पुर्नमुल्यांकनाचा पर्याय बोर्डाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे.
↧
जैन-देवकरांसह ५० जणांना आरोप नाकबूल
जळगाव नगरपालिकेच्या घरकुल घोटाळा प्रकरणी संशयित ५२ आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल झाल्यावर आज ५० जणांनी आपल्यावर ठेवण्यात आलेले आरोप नाकबूल केले.
↧
↧
पुढील परीक्षेचे वेळापत्रक १ जुलैला
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुरुवारी बारावीचा निकाल जाहीर केला. परीक्षेत पास झालेल्यांचे प्रमाण किती येथपासून ते आता या पुढचा टप्पा असलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांपर्यंत आणि गुणपडताळणीपासून नव्या शैक्षणिक वर्षातील योजनांपर्यंतची इत्थंभूत माहिती या 'प्लॅनेट'वर देत आहोत.
↧
'मेडिकल प्रवेशासाठी पाहा वेबसाइट'
मेडिकल कॉलेजकडून होणारी विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आरोग्य विद्यापीठामार्फत मान्यता नसलेल्या कॉलेजेसची यादी विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
↧
अंत:करण शुध्दीशिवाय ज्ञान मिळत नाही
मोक्ष ज्ञानाने मिळतो, अंत:करण शुध्दी शिवाय ज्ञान मिळत नाही, ज्ञानाच्या प्राप्तीसाठी कष्ट घेण्याची आवश्यकता नाही. मात्र अज्ञानाच्या निवृत्तीसाठी अपार मेहनत, कष्टाची गरज असते, असे मत ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी व्यक्त केले.
↧
ग्रामपंचायती लावणार ४६ हजार रोपे
देवळा तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर ४६ हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीच्या गटविकास अधिकारी वैशाली रसाळ व कृषी अधिकारी प्रशांत पवार यांनी दिली.
↧
↧
स्थायी समितीत 'घंटागाडी'
शहरातील कचरा व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या घंटागाडीचा विषय स्थायी समितीच्या बैठकी दरम्यान अपेक्षेप्रमाणे वादळी ठरला. समिती सदस्यांनी आरोपांच्या अनेक फैरी झाडल्यानंतर हा विषय शेवटी तहकूब करण्यात आला.
↧
वीजतारा हटवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च
महापालिका हद्दीतील वीजतारा हटवण्यासाठी महापालिकेने खर्च का करावा, असा प्रश्न उपस्थित करून संबंधित विषयाला स्थायी समितीच्या सदस्यांनी जोरदार हरकत घेतली. मात्र, सदस्यांच्या विरोधानंतरही हा विषय मंजूर करण्यात आला.
↧
जळगावात मुलींची बाजी
बारावी परीक्षेत जळगाव जिल्ह्याचा निकाल ७३.३० टक्के लागला आहे. नाशिक विभागात सर्वात कमी निकाल लागला असला तरी यंदाही निकालात मुलींनी बाजी मारलेली दिसून येते.
↧
More Pages to Explore .....