Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दीड कोटीचा कर थकित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
करमणूक शुल्क वसुलीची जबाबदारी विक्रीकर विभागाकडे सोपविण्यात आली असली तरी विविध करमणूक केंद्र चालकांनी जूनअखेरचा दीड कोटी रुपयांचा कर थकविला आहे. हा कर १० ऑगस्टपर्यंत भरावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून थकबाकीदारांमध्ये केबलचालकांचे प्रमाण अधिक आहे. मुदतीनंतर कर न भरणाऱ्या केबल चालकांचे प्रक्षेपण बंद करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
करमणूक केंद्राकडील शुल्क वसुलीसाठी काम करमणूक शुल्क शाखा करीत होती. मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर या विभागाद्वारे करमणूक शुल्क आकारण्यात येत होते. चित्रपटगृहे, केबल चालक, व्हिडिओ केंद्रे, मनोरंजन उद्याने, जलक्रिडा, व्हिडिओ गेम, पूलगेम अशा विविध सेवांवर शुल्कापोटी राज्य सरकारला कोट्यवधीचा महसूल मिळत होता. आतापर्यंत विविध प्रकारच्या मनोरंजन केंद्राचा करमणूक कर वसूल करण्याची जबाबदारी सरकारच्या करमणूक कर विभागाकडे होती. मात्र, करमणूक कर जीएसटीमध्ये रुपांतरीत झाल्याने आता करमणूक कराची धुरा विक्रिकर विभागावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे जून अखेरचा करमणूक कर कोणी वसूल करायचा याबाबत विभागातही संभ्रम निर्माण झाला. तर जीएसटी लागू झाल्याने करमणूक कर भरणाऱ्यांनीही जून अखेरचा कर भरण्यास टाळाटाळ केली. मात्र, आता सरकारने जून अखेरच्या करमणूक करशुल्काच्या थकित रकमेची वसुली ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करून सरकारी कोषागारात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने जून अखेरचा थकित कराचा भरणा करण्यासाठी १० ऑगस्टची मुदत दिली आहे. जिल्ह्यातील केबलचालकांकडे सुमारे दीड कोटींची थकीत करवसुली होणे बाकी असून हा कर न भरणाऱ्या केबल चालकांचे प्रक्षेपण बंद करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

करमणूक शुल्क रक्कम थकित असलेल्या जिल्ह्यातील करमणूक केंद्रचालकांनी महसूलाची रक्कम १० ऑगस्टपर्यंत भरावी. तसे न केल्यास करमणूक केंद्राचे प्रक्षेपण बंद करून जप्तीची कार्यवाही केली जाईल. हा कर ‘जीएसटी’मध्ये समाविष्ट असून करमणूक केंद्राकडील सर्व प्रकारच्या कर शुल्काच्या थकित रक्कमांची वसुली ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करून सरकारी कोषागारात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
- डॉ. शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पत्नीला मारणाऱ्या पतीला जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अधिक महिन्यात सासरच्या मंडळींनी सोन्याची अंगठी का दिली नाही, अशी कुरापत काढून मद्यप्राशन करीत पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या सर्जेराव उन्हाळे या पतीस जिल्हा कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हिरावाडीत २०१५ मध्ये झालेल्या हत्याकांडाचा अवघ्या दोन वर्षाच्या आत निकाल लागला.
पंचवटीतील मखमलाबाद रस्त्यावरील एका बंगल्यावर वॉचमन म्हणून उन्हाळे कुटुंबासमवेत रहात होता. तो आणि त्याची पत्नी सीमा उन्हाळे मोलमजुरीची कामे करून उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, उन्हाळे हा मद्यप्राशन करण्यासाठी पैसे द्यावेत, यासाठी पत्नीला मारहाण करीत असे. या कारणावरून दोघांचे भांडण झाल्याने त्याने घर सोडून पोबाराही केला. त्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा येऊन समजूत काढत तो पत्नीला घेऊन पुण्याला गेला. तिथे काही दिवस राहून तो पुन्हा नाशिकला आला. सासरच्या व्यक्तींनी त्याची समजूत काढली. तसेच सर्जेरावच्या सासऱ्याने त्याला मखमलाबाद रोडवर एका बंगल्याच्या वॉचमनची नोकरी मिळवून दिली. दरम्यान, काही दिवसांनंतर त्याने घरात पत्नीला मारहाण व भांडण करून मध्यरात्री पलंगाच्या सहाय्याने ओढणी बांधून गळा आवळले. त्यातच तिचा मृत्यू झाला. सकाळी सासरे घरी आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. पंचवटी पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

पाच सुनावण्यांमध्ये निकाल
गुन्ह्याचा खटला सुरू असताना जिल्हा व सत्र कोर्टाचे प्रधान न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी अवघ्या पाच सुनावण्यांमध्ये खटल्याचा निकाल दिला. कोर्टात सरकारी वकील अॅड. विद्या जाधव यांनी पाच साक्षीदार तपासले. उपलब्ध पुरावे व प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीच्या आधारे कोर्टाने आरोपी उन्हाळे यास कलम ४९८ तसेच ३०२ मध्ये दोषी ठरवले. पत्नीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा कोर्टाने सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरीतील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लोकसभेत शून्य काळात दिंडोरी येथील शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. द्राक्ष, गुलाब फुल, विविध भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना पॉलि-हाउस शेतीसाठी सरकारतर्फे आर्थिक सहाय्य मिळावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष, गुलाब फुल, विविध भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत. मात्र, सततच्या हवामान बदलाने आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे जीवन प्रभावित होत आहे. अशा अवघड परिस्थितीवर मात करून काही शेतकऱ्यांनी पॉलि-हाउसमध्ये द्राक्ष, गुलाब फुल, विविध भाजीपाला उत्पादनाचा यशस्वी प्रयोग केला आहे. या प्रयोगातून द्राक्षबागेचे वातावरणातील बदलांपासून संरक्षण करून चांगले पिक घेता येणे शक्य आहे. मात्र, पॉलि-हाउस उभारणीसाठी लागणारा खर्च प्रत्येक शेतकऱ्याला परवडण्याजोगा नसल्याने दिंडोरी तालुक्यातील गरीब शेतकऱ्यांना द्राक्ष, गुलाब फुल व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळाची गरज आहे. याबाबत पाठपुरावा करून चव्हाण यांनी सरकारतर्फे गरीब द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देण्यात यावे, अशी मागणी सभागृहात केली.
महाराष्ट्रत सर्वाधिक ६० हेक्टर पॉलि-हाउस शेती दिंडोरी तालुक्यातील जानोरी आणि आंबे या गावात आहे. तेथील शेतकरी अडचणीत असून त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. द्राक्ष, गुलाब फुल, विविध भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना पॉलि-हाउस शेतीसाठी सरकारतर्फे आर्थिक सहाय्य मिळावे, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅमिनिटीज एरियासाठी मऱ्हळमध्ये मोजणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृद्धी महामार्ग या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ येथे जमिनीची मोजणी सुरू झाली आहे. येथेच सार्वजनिक सुविधा (अॅमिनिटीज एरिया) राहणार असल्याने त्यासाठीचीही जागेची मोजणी करण्यात येते आहे. दोन दिवसांत येथील मोजणीचे काम पूर्ण होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास मऱ्हळ बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे येथे जमिनींची संयुक्त मोजणीही होऊ शकली नाही. परंतु, सरकारच्या संमतीने जिल्हा प्रशासनाने जमिनींसाठीचे दर जाहीर केले आहेत. जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ त्याचा मोबदलाही मिळू लागल्याने मऱ्हळ येथील बहुतांश ग्र‍ामस्थांचा विरोध मावळला आहे. काही शेतकऱ्यांनी‌ मोजणीला विरोध कायम ठेवला असला तरी मोजणीची निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

मऱ्हळ बुद्रुक येथून तीन ते साडेतीन किलोमीटरचा मार्ग जाणार आहे. त्यामध्ये येथील ८० ते ९० गट जाण्याची शक्यता असून जमिनींसह तेथील झाडे, विहिरी, घरे, पाइपलाइन व तत्सम घटकांची मोजणी केली जात आहे. महामार्गात प्रत्येक ४० किलोमीटरवर सार्वजनिक सुविधा (अॅमिनिटीज एरिया) दिला जाणार आहे. मऱ्हळ येथे हा अॅमेनिटीज एरिया असणार आहे. त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला २० हेक्टर जमीन संपादित करावयाची असून त्यासाठीच्या जागेची मोजणीही शुक्रवारी सुरू करण्यात आली.

या अॅमिनीटीज एरियामध्ये हॉटेल्स, स्वच्छतागृह, मिनी मॉल, ट्रक थांबविण्यासाठी जागा यासारख्या सुविधा असणार आहेत. कोनांबे येथील शेतकऱ्यांनी आमच्याकडे हा अॅमिनिटीज एरिया द्यावा, अशी मागणी केली असून त्यासाठी जमिनी देण्याची तयारीही दर्शविल्याचे अधिकाऱ्यांकडून सांग‌ितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणी विणकरांच्या समस्या मार्गी लावणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

जीएसटीमुळे हैराण झालेल्या पैठणी विणकरांच्या सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन अखिल भारतीय हातमाग-हस्तकला निर्यात महामंडळाच्या स्वतंत्र संचालिका माधवी नाईक यांनी दिले.

भारतीय जनता पार्टी जिल्हा विणकर विभागाच्या वतीने येवला मर्चंट बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात आयोजित उदयोजकांच्या सभेत नाईक बोलत होत्या. भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्यासह शहरातील पैठणी विणकर या कार्यक्रमाला उपस्थित होते. विणकरांच्या अनेक समस्या व प्रश्नांकडे यावेळी नाईक यांचे लक्ष वेधण्यात आले. पैठणी विणकरांना रेशीम खरेदीवर राज्य शासनाने ३० टक्के सबसिडी द्यावी, यंत्रमागाच्या धर्तीवर हातमाग धारकांना सबसिडीने सौरउर्जा योजनेचा लाभ मिळावा, पैठणी विणकरांसाठी आरोग्य विमा योजना सुरू करावी, नकली पैठणी साडीला कायमचा पायबंद घालण्यासाठी ‘भौगोलिक सिम्बॉल’ची प्रभावी अंमलबजावणी करावी, पैठणीचा स्वतंत्र लोगो करावा, राज्य व केंद्र शासनाच्या पर्यटनस्थळांसह कार्यालयात पैठणीची माहिती पुस्तिका ठेवण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. पेशकार व येवला पैठणी क्लष्टरचे विक्रम गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले.

चिचोंडी येथे एमआडीसी वसाहतीचे काम एका वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. येथील भूखंडाचा आराखडा तयार झाला असून, त्यानुसार वाटपही करण्यात येणार असल्याचे पेशकार यांनी सांगितले. पैठणी उत्पादकांनी मागणी केल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल, असेही पेशकार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांची दुर्गम भागातील सेवा कौतुकास्पद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

नाशिक शहराच्या पायाभरणीत डॉ. वसंतराव गुप्ते यांचे मोलाचे योगदान असून, त्यांच्या स्मृतिनिमित्त डॉक्टरांचा सन्मान करणे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आदिवासी व दुर्गम भागात सेवा करणाऱ्या डॉक्टरांचे कार्य कौतुकास्पद असून, त्यांच्या या कार्याची दखल घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापौर रंजना भानसी यांनी केले.

डॉ. वसंतराव गुप्ते यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानाहून त्या बोलत होत्या. संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे डॉ. वसंतराव गुप्ते यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहरातील अकरा डॉक्टरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यावेळी व्यासपीठावर डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे, शंकरराव बर्वे, ‘सकाळ’चे संपादक श्रीमंत माने, डॉ. कुणाल गुप्ते, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस डॉ. नीलिमा पवार, भक्तिचरणदास महाराज, स्वामी संविदानंद सरस्वती, डॉ. शरद महाले, पद्माकर पाटील आदी उपस्थित होते.

पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव बर्वे यांनी प्रास्ताविकात डॉ. वसंतराव गुप्ते यांच्या स्मृतींना उजाळा देत पुरस्कार वितरण सोहळ्याची पार्श्वभूमी आणि पुरस्कार प्रक्रियेची माहिती दिली. पुरस्कार निवड समितीतील डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे यांनी या पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या २९२ प्रस्तावांतून या ११ डॉक्टरांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे यावेळी सांगितले. मधुकर झेंडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. स्वप्निल तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश बर्वे यांनी आभार मानले.


...यांचा झाला गौरव

डॉ. रमाकांत पाटील, डॉ. श्रीनिवास गोकुलनाथ, डॉ. अरुणा वानखेडे, डॉ. भाऊसाहेब मोरे, डॉ. किशोर वाणी, डॉ. राहुल बाविस्कर, डॉ. मंगेश जाधव, डॉ. अनिता कुलकर्णी, डॉ. प्राची पवार, डॉ. अभिषेक पिंप्राळेकर, डॉ. साधना पवार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांसमोर समस्यांचा पाढा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

महापालिका आयुक्तांच्या येथील प्रभाग क्रमांक २३ मधील पाहणी दौऱ्यात प्रभागातील विविध समस्यांचा पाढा नगरसेवकांनीच त्यांच्यासमोर वाचला. उद्यान विभागाच्या दुर्लक्षाने जॉगिंग ट्रॅकच्या झालेल्‍या दुरवस्थेकडेही त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. या समस्या सोडविण्याच्या आश्वासनासह अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशा इशाराही आयुक्‍त अभिषेक कृष्णा यांनी दिला.

प्रभाग २३ मधील विविध समस्या व होणाऱ्या विकासकामांची आयुक्‍त कृष्णा यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी नगरसेवक चंद्रकांत खोडे, सतीश कुलकर्णी, रुपाली निकुळे, शाहीन मिर्झा, तसेच विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, बांधकाम उपअभियंता जितेंद्र पाटोळे, बांधकाम शाखा अभियंता अजय खोजे, रवींद्र धारणकर, हेमंत पाटील, बी. टी. कटारे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्‍तांना इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅक व सिटी गार्डनची दुरवस्था दाखविण्यात आली. या ठिकाणी वाढलेले गवत, बंद असलेला कारंजा, तुटलेल्या जाळ्या आढळून आल्या. या वास्तूंची देखभाल करणारे ठेकेदार काम करीत नसल्याचेही यावेळी निदर्शनास आल्यावर आयुक्‍तांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचा जाब विचारून हे काम त्वरित करण्यासह कारवाई करण्याचे संकेत दिले. परिसरातील वाहतुकीची समस्या, सुलभ शौचालय नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. वडाळागावातील अनेक गोठ्यांमधून मलमूत्र बाहेरच सोडले जात असून, यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली.

फाळके स्मारक बीओटीवर?

शहरातील फाळके स्मारकाचा विकास करून ते नागरिकांना अधिक चांगल्याप्रकारे वापरता येण्याजोगे करण्यासाठी हे स्मारक बीओटी तत्त्वावर देण्याचा विचार असल्याचे प्रतिपादन आयुक्त कृष्णा यांनी केले. प्रभाग क्रमांक ३१ मधील विविध विकासकामांची माहिती घेण्याबरोबरच तेथील समस्यांची पाहणी करण्याच्या उदेशाने आयोजित दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रभाग समिती सभापती सुदाम डेमसे, शहर सुधार समितीचे सभापती भगवान दोंदे, नगरसेविका संगीता जाधव, पुष्पा आव्हाड, सिडको विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत आदी उपस्थित होते. आयुक्तांसह नगरसेवकांनी प्रभाग ३१ मधील विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी प्रभागात होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याबाबत तक्रार करण्यात आली. वाडीचे रान रस्ता, महापालिका शाळा, दाढेगाव रस्ता, डॉ. आंबेडकरनगरमधील समस्यांची पाहणी करण्यात आली. आयुक्तांनी सांगितले, की नगरसेवकांनी विकासकामांचा प्राधान्यक्रम निश्चित केल्यास अग्रक्रमाने ही कामे मार्गी लावण्यात येतील. गौतम दोंदे, एकनाथ नवले, सुधीर दोंदे, भाऊसाहेब नवले, साहेबराव आव्हाड, दिलीप मोरे, विलास ढगे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन’चे महिन्यात सात बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘स्वाइन फ्लू’ने शहरासह ग्रामीण भागात पुन्हा डोके वर काढले आहे. १ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत स्वाइन फ्लूने सात जणांचा बळी घेतला आहे, तर ४५ जणांना लागण झाली आहे. त्यात शहरी भागातील २० तर ग्रामीण भागातील २५ रुग्णांचा समावेश आहे. यंदा स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्यांची संख्या ३५ च्या घरात पोहचली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यात मोठी वाढ झालेली दिसते. त्यामुळे स्वाइन फ्लूने पुन्हा शहर व जिल्ह्यात कमबॅक केल्याचे चित्र आहे.

शहर तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ४ ऑगस्टपर्यंत २२३ जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाली होती. तर, ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात, शहरातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना मृत्यूमुखी पडलेल्या २५ जणांचा समावेश होता. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गतवर्षाच्या तुलनेत स्वाइन फ्लूचा फैलाव यंदा जास्त झाल्याचे दिसते. बळी गेलेल्यांमध्ये नाशिक शहराचा क्रमांक प्रथम आहे. विशेष म्हणजे ४३ पैकी ३० पेशंटचा मृत्यू शहरातील खासगी हॉस्पिटल्समध्ये झाले. गेल्या सात महिन्यांच्या काळात सिव्हिल हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालये, महापालिकेचे दवाखाने आदी ठिकाणी मिळून ६० हजार ३५३ पेशंटची स्वाइन फ्लूमुळे तपासणी करण्यात आली. यापैकी एक हजार ७१४ पेशंटना टॅमी फ्लू गोळ्या देऊन उपचार करण्यात आले. जिल्ह्यामध्ये मागील महिन्यापर्यंत स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव कमीच होता. सिव्हिल हॉस्पिटलमधील स्वाइन फ्लू कक्षही काही महिने बंद राहिला. मात्र, पावसाळा सुरू होताच स्वाइन फ्लूने हातपाय पसरले. सर्दी, ताप समजून नागरिक दुर्लक्ष करतात. स्वाइन फ्लू पेशंटला वेळीच आणि योग्य उपचार मिळाले नाहीत, तर पेशंटचा मृत्यू होऊ शकतो. दरम्यान, मालेगावसह काही तालुक्यांमध्ये हा आजार अद्याप आटोक्यात असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते.


जूनपेक्षा जुलै त्रासदायक

या वर्षी स्वाइन फ्लूचा सर्वाधिक प्रादुर्भाव एप्रिल महिन्यात झाला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भर उन्हाळ्यात १३८ पेशंटवर उपचार झाले. मार्चमध्येदेखील हा आकडा ९२ इतका होता. मे महिन्यात मात्र स्वाइन फ्लूचा फैलाव काहीसा कमी झाला. या महिन्यात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ५५ जणांवर उपचार झाले. जूनमध्ये ही संख्या ३५ इतकी झाली. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये मात्र स्वाइन फ्लूचा फैलाव काही प्रमाणात वाढल्याचे दिसते. गत महिन्यात पॉझ‌िट‌िव्ह पेशंटचा आकडा ५५ इतका झाला.

स्वाईन फ्लू टाळण्यासाठी नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. फ्लूची लक्षणे आढळून आल्यानंतर वैद्यकीय सल्ला घ्यावा. आजार अंगावर काढण्याचा प्रयत्न करू नये. स्वाइन फ्लूसाठी लागणारा औषधसाठा पुरेसा आहे.

- डॉ. सुरेश जगदाळे, सिव्हिल सर्जन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाडगौडांचे उपोषण सुटले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक विभागीय आयुक्तालय येथे राज्य संघटनेचे अध्यक्ष सतीश नाडगौडा यांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशी स्थगित करण्यात आले. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण निरीक्षक शिवाजी शिंदे व प्रशासन अधिकारी गणेश फुलसुंदर यांच्या उपस्थितीत नाडगौडा यांनी उपोषण सोडले. राज्य विधीमंडळाचे कामकाज आटोपल्यावर दोनच दिवसांत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.

नाडगौडा यांनी एक ऑगस्टपासून बेमुदत उपोषणास प्रारंभ केला होता. त्यांच्या या उपोषणास राज्यभर जिल्हा संघटनांनी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसाचा लाक्षणिक संप करुन पाठिंबा दर्शविला होता. याशिवाय राज्यातील विविध जिल्ह्यांतून शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येऊन पाठिंबा दिला होता. भाजप आमदार सीमा हिरे, नरेंद्र पवार याशिवाय नागपूरचे शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांनी शिक्षकेत्तरांच्या प्रश्नावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे शिष्टाई केल्याने शिक्षणमंत्र्यांनी विधीमंडळ कामकाज पूर्ण होण्यापर्यंतची वेळ मागितली. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत शिक्षकेत्तरांच्या राज्य संघटनेच्या पदाधिका-यांशी सविस्तर चर्चा करुन त्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.


शिक्षकेतरांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी गेल्या १७ वर्षांपासून शासनाला वेळ मिळाला नाही. आता शिक्षणमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळावे.

-सतीश नाडगौडा, राज्य अध्यक्ष, शिक्षकेतर संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रीन आर्मी नोंदणीला खोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीच्या उपक्रमासाठी जनता व शालेय विद्यार्थ्यांचा या उपक्रमात सक्रिय सहभाग वाढावा याकरिता शासनाने ग्रीन आर्मी संकल्पना राबविण्याचा उपक्रम घेतला होता. प्रत्येक जिल्ह्याला मार्च २०१७ पर्यंत ग्रीन आर्मी नोंदणीचे उद्दिष्ट दिलेले होते. मात्र, जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेने या महत्त्वाकांक्षी योजनेकडे साफ दुर्लक्ष केल्याने नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करण्यात नाशिक जिल्ह्याला अपयश आले आहे. नाशिक विभागातील सर्वच जिल्हे ग्रीन आर्मी नोंदणीचे उद्दिष्ट गाठण्यात अपयशी ठरले आहेत.

राज्यात वनांचे आच्छादन वाढविण्याच्या उद्देशाने राज्यात येत्या तीन वर्षांत राज्य शासनाने ५० कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतल आहे. या कामासाठी राज्यात उपलब्ध असणारे मनुष्यबळ पुरेसे नसल्याने ग्रीन आर्मी नोंदणीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. नाशिक विभागापुढे १२ लाख १२ हजार ३०० इतके ग्रीन आर्मी नोंदणीचे उद्दिष्ट होते. मात्र, जुलैअखेरपर्यंत त्यापैकी अवघे २ लाख ७९ हजार ८७ इतकीच नोंदणी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. नाशिक जिल्ह्यातही ग्रीन आर्मी नोंदणीचे उद्दिष्ट गाठण्याकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याचे झालेल्या नोंदणीवरून उघड झाले आहे. इगतपुरी, नांदगाव, निफाड, पेठ, चांदवड या तालुक्यांतील प्रशासनाने तर ग्रीन आर्मी नोंदणीकडे सपशेल पाठ फिरविल्याचे झालेल्या नोंदणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

--

जिल्ह्यात २८ टक्के नोंदणी

नाशिक जिल्ह्यासाठी शासनाने ग्रीन आर्मी नोंदणीचे ३ लाख ३२ हजार ६८० इतके उद्दिष्ट दिलेले होते. त्यापैकी जुलैअखेरपर्यंत ९४ हजार १६३ इतकीच नोंदणी करण्यात प्रशासनाला यश आले. त्यात ८७,४९२ वैयक्तिक व ६,६७१ संस्थांचा समावेश आहे. एकूण उद्दिष्टाच्या अवघी २८.३० टक्के इतकीच नोंदणी आजवर झाल्याने ग्रीन आर्मी नोंदणीच्या कामाला स्थानिक प्रशासनाकडूनच रेड सिग्नल मिळाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या योजनेच्या मूळ उद्देशालाच खोडा बसला असून, स्थानिक प्रशासनाची उदासीनता ग्रीन आर्मी नोंदणी व उपक्रमाच्या प्रचार-प्रसाराच्या मुळावर उठल्याची बाब उघड झाली आहे.

--

तालुकानिहाय झालेली नोंदणी

तालुका वैयक्तिक संस्था

नाशिक ३,४३६ ४०९

बागलाण २६,८७४ १,५४९

चांदवड १,२३६ ३६१

देवळा ३,०६० २२८

दिंडोरी २,३४५ ४३९

इगतपुरी ५०० ४३२

कळवण १,८९२२ ३७०

मालेगाव १६,३७३ ४६१

नांदगाव ३९६ ३३१

निफाड ८५२ ५०९

पेठ ९५ १३८

सिन्नर ४,६८९ ४८०

सुरगाणा १,४८९ ४५०

त्र्यंबकेश्वर ४,२३८ ३९२

येवला २,९८७ ३२२

एकूण ८७,४९२ ६,६७१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सावाना’त वादाची ठिणगी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयातील आर्थिक गैरव्यवहार बाहेर काढणारे ज्येष्ठ सभासद आणि माजी पदाधिकारी रमेश जुन्नरे यांचे सभासदत्व निलंबित करण्याच्या ठरावावरून सावाना पदाधिकाऱ्यांमध्ये गुरुवारी झालेल्या सभेत ठिणगी पडली. जुन्नरे यांच्या सभासदत्व निलंबनाचा ठराव गुरुवारी झालेल्या सभेमध्ये स्थगित करण्यात आला.

संस्थेची बदनामी करण्याचा ठपका ठेवून रमेश जुन्नरे यांचे सभासदत्त्व निलंबित करण्यात येणार होते. विषयपत्रिकेमध्ये तसा विषयदेखील ठरविण्यात आला होता. मात्र, उपस्थित १२ पदाधिकाऱ्यांपैकी आठ जणांनी या ठरावाला विरोध दर्शविल्याने ठराव तर रद्द झालाच, परंतु त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्येच वादाची ठिणगी पडली आहे. या सभेला तीन जण अनुपस्थित होते.

जुन्नरे यांनी वसंत व्याख्यानमालेच्या कारभारावर आक्षेप घेतला असून, सावानाचे प्रमुख कार्यवाह श्रीकांत बेणी हेच वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचे सभासदत्व रद्द करीत असल्याची प्रतिक्रिया काही पदाधिकाऱ्यांनी सभेमध्ये दिली. त्यामुळे हा विषय तेथेच स्थगित करण्यात आला. याउलट सावाना अध्यक्षांनी वाचनालयाला पत्र दिले असून, ते याबाबतीत समजू्त घालणार असल्याचे जुन्नरे यांनी सांगितले.


सभांचे इतिवृत्तच नाही

कार्यकारी मंडळाच्या सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे आणि त्यानंतरच पुढील सभा सुरू करणे असा नियम असतानाही मागील चार सभांचे इतिवृत्त मंजूरच करण्यात आलेले नाही, अशी माहिती जुन्नरे यांनी दिली. इतिवृत्त मंजूरच नाही, तर पुढील सभेत झालेले सर्व निर्णय बेकायदेशीर ठरतात, असेही जुन्नरे म्हणाले. २० जून, ३० जून, १३ जुलै व १८ जुलै अशा चार सभांचे इतिवृत्त पेंडिंग का ठेवण्यात आले, असा सवालही त्यांनी केला आहे.



एजन्सीद्वारे भरती का?

सावानात कर्मचारी भरती करावयाची आहे, त्यासाठी येथून मागे पारंपरिक मुलाखती घेण्याचा प्रघात होता. मात्र, आता एजन्सी नेमण्याची नवीनच प्रथा का काढण्यात आली, असा सवाल जुन्नरे यांनी केला आहे. पारंपरिक मुलाखती घेऊन कर्मचारी नेमण्याची पद्धत अस्तित्वात असताना आता मात्र एजन्सी नेमून तिला ३० हजार रुपये देण्यात आले, ही पैशाची उधळपट्टी कशासाठी सुरू आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.


गेल्या पन्नास वर्षांपासून संस्थेच्या कारभारात लक्ष घालत आहे. माझ्यावर कोणताही गुन्हा, दोषारोप नाहीत. मात्र, ज्यांच्यावर गुन्हे आहेत तेच माझ्यावर आरोप करीत आहेत. माझ्याविरोधात असे घटक अॅक्शन घेऊ पाहत आहेत. मी आजपर्यंत संस्थेची बदनामी केलेली नाही, यापुढेही करणार नाही. परंतु, जे गैरव्यवहार करणारे आहेत, त्यांना मात्र धारेवर धरणार आहे.

- रमेश जुन्नरे, ज्येष्ठ सभासद

---


शिक्षक गौरव समिती बळकावली

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नागरिक शिक्षक गौरव समितीचा नवीन अध्यक्ष निवडला जात नाही, तोपर्यंत मागील अध्यक्षच त्यांच्या पदावर कायम असतात. त्या नात्याने प्राचार्य रा. शां. गोऱ्हे हेच समितीचे अध्यक्ष असताना व त्यांनीच नवीन वर्षाची समितीची सर्वसाधारण सभा बोलावणे गरजेचे असताना समितीच्या अध्यक्षांच्या सहीने नाशकातील शाळा, महाविद्यालयांना पत्रे पाठविणे आवश्यक होते. मात्र, तसे न होता प्रमुख कार्यवाहांच्या सहीने शाळांना पत्रे गेली असून, आदर्श शिक्षकांचा बायोडाटा मागविण्याचे काम जोरात सुरू झाले आहे.

कविवर्य तात्यासाहेब शिरवाडकर यांनी शिक्षक गौरव समारंभाची संकल्पना मांडली होती. या समारंभात सुयोग्य अशा शिक्षकांचा गौरव करावा आणि तोही समाजमान्य मान्यवरांच्या हस्ते, असेही तात्यासाहेबांच्या मनात होते. त्यासाठी एक नागरिक शिक्षक गौरव समिती स्थापन करून त्या समितीने गौरवार्थी शिक्षकांची निवड करून त्यांचा सत्कार करावा असे ठरले होते. मात्र, आता नागरिक शिक्षक गौरव समितीच्या अध्यक्षांना म्हणजेच पर्यायाने समितीलाच संपूर्णपणे धाब्यावर बसवून एकट्या सावानाच्या कार्यवाहांच्या सहीने पत्रे पाठविण्यात आली. ही पत्रेसुद्धा शाळा, महाविद्यालयांना पाठविण्यात आली नसून, सरळ संस्थाचालकांनाच पाठविण्यात आली असल्याचे समजते. कार्यवाहच पत्रे पाठवू लागल्याने समिती सावानाची बटिक बनण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

---

प्रमुख कार्यवाहांना पदावरून हटवावे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह श्रीकांत बेणी यांच्यावर केसेस सुरू असून, त्यांना कोर्टाचे समन्सदेखील बजावण्यात आले आहे. अशावेळी त्यांनी पदावर राहू नये, अशा आशयाचे पत्र सावानाचे माजी नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी यांनी सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांना दिले आहे.

पत्रात गायधनी यांनी नमूद केले आहे, की सन २०१० च्या सुमारास आपणच सध्याचे प्रमुख कार्यवाह श्रीकांत बेणी यांच्याविरुद्ध न्यायालयात व धर्मादाय आयुक्त यांच्याकडे विविध प्रकारच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. कोर्टाच्या आदेशाने भद्रकाली पोलिसांनी सार्वजनिक वाचनालय नाशिकसंदर्भात श्रीकांत बेणी यांच्याविरुद्ध केस दाखल केलेली आहे. आपल्यासह अनेकांनी त्यावर आपापले जबाब नोंदविले आहेत. या सर्व जबाबांची शहानिशा करून व पुरावे तपासून भद्रकाली पोलिसांनी न्यायालयात अहवाल सादर केले आहेत. त्यानुसार श्रीकांत बेणी यांच्याविरुद्ध समन्स बजावण्यात आले असून, त्याची सुनावणी न्यायाधीशांसमोर होणार आहे. सावानाचे सात लाख रुपये यापूर्वी बेणी यांनी खर्च केले, त्यासंदर्भात ही फौजदारी केस असल्याने बेणी यांना नैतिकदृष्ट्या सावानाच्या प्रमुख कार्यवाहपदावर राहण्याचा अधिकार नाही, तरीही ते आजपर्यंत पदावर आहेत. केस असल्याने त्यांनी या पदावर राहणे म्हणजे सावानाचा अवमान आहे हे कोणाच्याच अद्याप लक्षात येऊ नये हे विशेष. ते या पदावर राहून सावानाच्या कागदपत्रांत किंवा आर्थिक व्यवहारांत फेरफार अथवा बदल करू शकतात. गंभीर स्वरूपाचे आरोप बेणींवर असूनही त्यांनी पद सोडलेले नाही. त्यामुळे आपणच त्यांच्या कारभारास स्थगिती द्यावी.

सुरेश गायधनी यांनी वरील आशयाचे पत्र लिहिलेले असून उपायुक्त, धर्मादाय आयुक्त व सावानाच्या कार्याध्यक्षांसह अर्थसचिवांना याची प्रत देण्यात आली आहे. गायधनी यांच्या या पत्रप्रपंचामुळे सावानाच्या वर्तुळात चर्चा रंगली असून, अनेकांचे याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरू-शिष्य पुन्हा आमनेसामने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वाधिक रंगतदार व चुरशीची लढत सभापतिपदासाठी होणार आहे. विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या प्रगती पॅनलकडून संस्थेचे माजी अध्यक्ष माणिकराव बोरस्ते, तर अॅड. ठाकरे-सोनवणे यांच्या समाजविकास पॅनलकडून विद्यमान संचालक दिलीपराव मोरे सभापतिपदासाठी उमेदवारी करीत आहेत. हे दोन्ही उमेदवार निफाड तालुक्यातील असल्याने आणि जिल्ह्यात सर्वाधिक मतदार निफाड तालुक्यातील असल्याने या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

माणिकराव बोरस्ते व दिलीपराव मोरे यांचे राजकीय नाते गुरू-शिष्याचे आणि नात्याने दोघे व्याही आहेत. त्यामुळे सभापतिपदाच्या लढतीला राजकारणाबरोबरच नाते आणि भावनेचीही किनार असेल. दिलीपराव मोरे यांचा राजकीय श्रीगणेशा १९९२ मध्ये निसाका निवडणुकीच्या निमित्ताने झाला. निसाका निवडणुकीत माणिकराव बोरस्ते यांनी आपल्या पॅनलमधून दिलीपराव मोरे यांना संधी दिली आणि ते निसाकाचे संचालक झाले. त्यानंतर दोनदा मविप्रचे संचालक, दोनदा निसाकाचे संचालक झाले. इतरही जिल्हास्तरीय संस्थांमध्ये त्यांनी काम केले. दरम्यानच्या काळात राजकीय परिपक्वता आल्यानंतर १९९७ मध्ये मोरे यांनी बोरस्ते साथ सोडली आणि मालोजीराव मोगल गटाचा आश्रय घेतला.

मोगल गटाकडूनच १९९७ च्या निवडणुकीत ते प्रथम मविप्रचे संचालक झाले. त्यामुळे मोरेंचा राजकीय प्रवेश व वाटचाल माणिकराव बोरस्तेंमुळे झाला असला तरीही १९९७ पासून त्यांनी बोरस्ते गट सोडला तो आजपर्यंत आणि आज मविप्र निवडणुकीत थेट गुरूलाच आव्हान देत मोरे यांनी बोरस्ते यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. मविप्रच्या मागील निवडणुकीत माणिकराव बोरस्ते सोनवणे गटाकडून नीलिमा पवार यांच्या विरोधात सरचिटणीसपदाचे उमेदवार होते, तर दिलीप मोरे ठाकरे-सोनवणे गटाकडून संचालकपदाचे उमेदवार होते. या निवडणुकीत बोरस्तेंचा पराभव, तर मोरेंचा विजय झाला होता. यंदाच्या निवडणुकीत बोरस्तेंनी पवार गटाशी जुळवून घेतले व सभापतिपदाची उमेदवारी मिळवली, तर दिलीप मोरे यांना ठाकरे-सोनवणे गटाशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल बढती मिळाली आणि ते थेट सभापतिपदाचे उमेदवार झाले. मोरे-बोरस्ते यांचे नाते व्याह्याचे. त्यामुळे नाजूक संबंध. दोघांचे नातेपरिवार बराचसा सारखाच, त्यामुळे सरचिटणीसपदापेक्षाही चुरशीची आणि लक्षवेधी लढत सभापतिपदाची ठरणार आहे. मतदार कुणाला पसंती देतात हे लवकरच स्पष्ट होर्इल, तरीही ही निवडणूक बोरस्ते यांच्यासाठी अस्तित्वाची, तर मोरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. दरम्यान, सभापतिपदाच्या उमेदवारीमुळे मोरे-बोरस्ते यांचे नातेवार्इक व हितचिंतकाची मोठी अडचण झाली हे नक्की.

बनकरांच्या निष्ठेची सत्त्वपरीक्षा

येवला ः ‘मविप्र’ निवडणुकीत येवला गटातील संचालकपदासाठी प्रगती पॅनलचे रायभान काळे, समाजविकासचे माधवराव पवार यांच्यासह पाटोद्याचे माजी सरपंच सूर्यभान नाईकवाडी हे तिघे उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत काळे-पवार यांच्यातच होणार आहे. संस्थेचे १०,१३७ सभासद मतदार असून, त्यात येवला तालुक्याचे २०१४ मतदार आहेत. अल्प मतदारसंख्या पाहता पवार-काळेंना इतर तालुक्यांतील अधिकाधिक मते खेचण्यासाठी जोर लावावा लागणार आहे. माजी आमदार मारोतराव पवार, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांच्यासह ‘मविप्र’चे विद्यमान संचालक अंबादास बनकर यांच्यामुळे काळे यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. मात्र, समाजविकास पॅनलचे माधवराव पवार यांचा जिल्हाभरात मोठा गोतावळा आहे. अंबादास बनकर (अण्णा) आणि माधवराव पवार यांचे साले-मेहुण्याचे नाते. डॉ. वसंतराव पवार ते पुढे नीलिमा पवार यांच्याप्रती असलेली बनकरांची निष्ठा पाहता, ते ‘प्रगती’चे उमेदवार काळे यांच्याबरोबर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, काळेंच्या पाठीशी राहणार की नात्यागोत्याचे राजकारण जपत माधवराव पवार यांना ताकद देणार, या दोन्हींत बनकर यांची सत्त्वपरीक्षा लागणार आहे हे नक्की.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणपती मेकिंग कार्यशाळा उद्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने इको फ्रेंडली गणपती मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि. ६) माहेरघर मंगल कार्यालय, खुटवडनगर, शासकीय आयटीआयमागे येथे दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.

बच्चेमंडळींसह अबालवृध्द या विघ्नहर्त्याचे स्वागत करायला सज्ज झाले आहेत. हे स्वागत धामधूमीत व्हावे, घरी येणारी बाप्पाची मूर्ती शास्त्रशुध्द असावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब व लायन्स क्लब, पंचवटी यांच्या संयुक्त विद्यमाने इको फ्रेंडली गणपती मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वतःच्या हातांनी बाप्पाची इकोफ्रेंडली मूर्ती साकारण्याचे शास्त्रशुद्ध तंत्र या कार्यशाळेत शिकवले जाणार आहे.

गणेशोत्सव म्हटला, की बालगोपाळांच्या उत्साहाला उधाण येते. बाप्पांची मूर्ती कोठून आणायची, कुठली आणायची, याची फर्माईशही बालगोपाळ करीत असतात. त्याचप्रमाणे आपल्या घरातील मूर्ती ही पर्यावरणपूरक असावी, असाही त्यांचा आग्रह असतो. चिमुकल्यांच्या अशाच आग्रहाखातर गेल्या सहा वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे इको फ्रेंडली गणपती मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. कार्यशाळेसाठी येताना लाकडी पाट, ब्रश, रुमाल, पाण्यासाठी भांडे बरोबर आणायचे आहे.

नोंदणी आवश्यक

या कार्यशाळेसाठी ५० रुपये फी आकारण्यात येणार आहे. रजिस्ट्रेशन करणे मात्र अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी ७०४०७६२२५४ आणि ६६३७९८७ या क्रमांकांवर संपर्क साधावा. गेल्या सहा वर्षापासून या कार्यशाळेला उदंड प्रतिसाद लाभत आहे. या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात नोंदणी होत असून बच्चे मंडळीसह सर्वच कार्यशाळेत सहभागी होण्यास उत्सुक आहेत. चला तर मग फोन उचला आणि आणि आपली नोंदणी आजच करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिकांचे पेन्शनसाठी धरणे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शेतकरी, शेतमजूर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पाच हजार रुपये दरमहा पेन्शन मिळावी या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील सौंदाणे येथील महादेव ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने शुक्रवारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सुकदेव देवरे यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात दिले. नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिक संस्थाना शासकीय अनुदान मिळावे, विविध योजनेतील रक्कम वाढवून दोन हजार करावी, ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६० वर्ष करावी, केंद्राप्रमाणे प्रवास व इतर सवलती मिळाव्यात, ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय भत्ता मिळावा आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात संस्थेचे उपाध्यक्ष पोपट पावर, झुंबरलाल पवार, देवाजी पवार, राजाराम पवार, बी. के. नागपुरे आदींसह ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मविप्र’च्या प्रचाराला सुरुवात

$
0
0

टीम मटा

बहुजनांच्या शिक्षणात योगदान देण्यासाठी १०४ वर्षांची परंपरा असलेल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज, शुक्रवारी प्रचाराचा धुरळा उठला. नीलिमा पवार यांच्या प्रगती पॅनलच्या प्रचाराचा प्रारंभ सिद्धप्रिंप्री येथून, तर अॅड. नितीन ठाकरे यांच्या समाजविकास पॅनलच्या प्रचाराचा प्रारंभ वडनेरभैरव येथून करण्यात आला.

नीलिमा पवार आणि अॅड. नितीन ठाकरे यांच्यात सरचिटणीसपदासाठी सरळ लढत होणार आहे. अध्यक्षपदासाठी प्रतापदादा सोनवणे विरुद्ध डॉ. तुषार शेवाळे, तर सभापतिपदासाठी माणिकराव बोरस्ते विरुद्ध दिलीप मोरे अशी लढत होणार आहे. उपसभापती पदासाठी राघो आहिरे विरुद्ध अॅड. रवींद्र पगार, तर चिटणीसपदासाठी डॉ. सुनील ढिकले विरुद्ध नानासाहेब बोरस्ते अशी लढत होत आहे. प्रगती पॅनलतर्फे १२ नवे चेहरे समोर येत असून, तालुकानिहाय लढतींनी आता जोर पकडला आहे.

दृष्टिक्षेपात लढती

- मालेगाव तालुक्यात ‘प्रगती’चे डॉ. जयंत पवार विरुद्ध समाजविकास पॅनलचे काशिनाथ पवार या दोन माजी संचालकांमध्ये सरळ लढत

- कळवण- सुरगाणा तालुका संचालकपदासाठी एकाच गावातील दोन्ही नवे चेहरे

- बागलाणमधून नवोदितांना संधी

- नांदगावात आजी-माजी संचालकांत लढत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खरीप पीक विम्यापासून शेतकरी वंचित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्यामध्ये उद््भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे या योजनेत सहभागी होण्यासाठीची मुदत राज्य सरकारने ५ ऑगस्टपर्यंत वाढवून दिल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पीक विमा योजनेतील सहभागास पाच दिवसांची मुदतवाढ मिळाली असली तरी ही मुदतवाढ केवळ बिगरकर्जदार शेतकऱ्यांसाठीच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे तीन लाख अन्य शेतकरी यंदा या योजनेपासून वंचित राहणार आहेत.

चालू खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागासाठी यापूर्वी ३१ जुलैपर्यंतची मुदत होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पीक कर्ज मिळालेले नाही. बिगरकर्जदार शेतकऱ्यांची संख्या अल्प आहे. गेल्या वर्षी ३ लाख २० हजार ७८७ शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले होते. त्यापैकी २ लाख ९५ हजार २९० शेतकरी थकबाकीदार आहेत. या सर्व शेतकऱ्यांना यंदा पीक कर्ज मिळालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तीन लाखांपेक्षा जास्त शेतकरी पीक विमा कवचापासून वंचित राहणार आहेत. विभागातील उर्वरित जिल्ह्यांत जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप केले असल्याने त्या जिल्ह्यांत कर्जदार शेतकऱ्यांना या वाढीव मुदतीचा फायदा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका बिल्डरवर मेहेरबान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यात जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी पैसा नसल्याचा दावा करणाऱ्या आणि शाळा, दवाखाने, गार्डनचे आरक्षण ताब्यात घेण्याची तसदी न घेणारा मिळकत विभाग मात्र शहरातील नामांकित बिल्डरवर मेहेरबान झाला आहे. जिल्हा प्रशासनाने एकीकडे त्र्यंबक रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे आरक्षण ताब्यात घेण्याची घाई सुरू केली असतानाच महापालिकेने याच आरक्षणाला लागून असलेले लायब्ररी आणि कम्युनिटी सेंटरचे आरक्षण ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी चक्क बिल्डरला ३६ कोटी देण्याची घाई सुरू केली आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवण्यात आला असून, स्थायीच्या निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे.

त्र्यंबक रोडवरील पीटीसीसमोरील जागेवर सर्व्हे नंबर ७५० च्या जागेवर महापालिकेचे विविध प्रकारची सहा आरक्षणे आहेत. त्यात मध्यवर्ती प्रशासकीय संकुल, पार्किंग, महापालिका मार्केट, लायब्ररी अँड कम्युनिटी सेंटर, १२ मीटर रस्त्याचा समावेश आहे. या जागेवरून दहा वर्षांपासून या जागेचा वाद शासन पातळीवर सुरू आहे. अखेरीस सरकारच्या वतीने आता मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे आरक्षण संपादित करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यापाठोपाठ आता ३६२ आरक्षण क्रमांक असलेल्या लायब्ररी अँड कम्युनिटी सेंटरची चार हजार स्क्वेअर मीटर जागा असलेले आरक्षणही ताब्यात घेण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी संबंधित जागामालकाला ३५ कोटी ६६ लाखांचा मोबदला दिला जाणार असून, पहिल्या टप्प्यात ५० टक्के रक्कम म्हणून साडेसतरा कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करायचे आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव मिळकत विभागाने स्थायी समितीवर ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चौदा वर्षांपूर्वी सिंहस्थासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. याच महापालिकेच्या मिळकत विभागाने मात्र विकास आराखड्याला सहा महिने होत नाहीत, तोच संपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे या संपादन प्रस्तावाभोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे. शाळा, दवाखाने, गार्डन या संदर्भातील अनेक प्रस्ताव वर्षानुवर्षे मिळकत विभागाकडे भूसंपादनासाठी पडून आहेत. यात अनेक गरीब शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचाही समावेश आहे. त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याऐवजी लायब्ररी व कम्युनिटी सेंटरसारख्या दुय्यम आरक्षणासाठी मिळकत विभागाने सुरू केलेली घाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विशेष म्हणजे हे आरक्षण ताब्यात घेण्यासाठी अजून सुमारे साडेनऊ वर्षांचा अवधी महापालिकेकडे आहे. त्यामुळे महापालिकेची घाई नजरेत भरणारी असून, बड्या बिल्डरच्या दबावाखाली येऊन ही कार्यवाही सुरू केल्याची चर्चा आहे.

तिजोरीत खडखडाट

सध्या महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. नगरसेवक निधीसाठी चक्क दीडशे कोटींच्या जुन्या विकासकामांवर शाई फिरवण्यात आली आहे, तर दुसरीकडे पदाधिकाऱ्यांचा १७ कोटींचा निधीही गोठवण्यात आला आहे. विकासकामांसाठी निधी शिल्लक नसल्याने अनेक कामे ठप्प आहेत, तर निधीसाठी नाशिककरांवर करवाढ करण्याची तयारी सुरू आहे. असे असताना केवळ बिल्डरच्या भल्यासाठी ३६ कोटी देण्याची घाई चकित करणारी आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या निर्णयाकडे आता सर्वांच्या नजरा लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सालदाराने कालवले पाण्याच्या माठात विष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

मालकाकडून घेतलेली उचल बुडविण्यासाठी त्यांच्या घरातील माठात विषारी औषध टाकून संपूर्ण कुटुंबाला संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सालदाराला पोलिसांनी अटक केली आहे. तालुक्यातील वीरगाव येथे हा प्रकार घडला. मालकाच्या मुलाने हे पाणी पिल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

वीरगाव येथील शेतकरी त्र्यंबक देवरे (वय ६४) यांच्या शेतात देवीदास मोरे (रा. वीरगाव) हा सालदार आहे. त्याने देवरे यांच्याकडून ५० हजार रुपये घेतले. मुदतीनंतरही मोरे यांने रक्कम परत केली नाही. देवरे यांनी त्याच्याकडे पैशांसाठी पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे तगाद्याला वैतागून सालगडी मोरे याने देवरे कुटुबियांना संपविण्याचा कट रचला. देवरे यांच्या घरातील मागच्या बाजूच्या भ‌िंतीवरून उडी मारून मोरे याने घरात प्रवेश केला. त्यानंतर पाण्याच्या माठात विषारी औषध मिसळले आहे. देवरे यांचा मुलगा योगेशने हे पाणी पिल्याने त्याला उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सावाना’च्या प्रमुख कार्यवाहांना समन्स?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयाचे विद्यमान कार्यवाह श्रीकांत बेणी यांनी २०११-१२ या काळात अल्पमतातील कार्यकारिणीच्या मदतीने केलेल्या कथित ७ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी फौजदारी कोर्टात दाखल असलेल्या दाव्यात सुनावणी होऊन बेणी यांना समन्स जारी करण्यात आले आहेत. हा सरकारी दावा असून त्याचा क्रमांक १०१३/१७ असा आहे. मात्र, असे कोणतेही समन्स मिळाले नसल्याची प्रतिक्रिया श्रीकांत बेणी यांनी दिली.

२०११-१२ या काळात तत्कालीन कार्यकारिणीतील विलास औरंगाबादकर यांच्यासह नऊ सदस्यांनी सामूहिक आणि अपरिवर्तनीय राजीनामे दिले होते. सार्वजनिक वाचनालयाच्या घटनेत ८ किंवा त्यापेक्षा जास्त सदस्यांनी एकत्रित राजीनामे दिल्यास ताबडतोब निवडणुका घ्याव्यात असे नमूद केलेले आहे. मात्र, तत्कालीन अध्यक्ष मधुकर झेंडे यांनी घटनेची पायमल्ली करून सातच सदस्यांचे राजीनामे स्वीकारले आणि त्याजागी सात नव्या सदस्यांची नेमणूक केली. या प्रकरणात दिवाणी न्यायालयाने तत्काळ लक्ष घालून त्या नियुक्त्या रद्द ठरविल्या. तरीही झेंडे, बेणी यांनी वाचनालयाचा आर्थिक व्यवहार सुरूच ठेवला. याच कालखंडात ७ लाख रुपये संविद इन्फोटेक या व्यापारी संस्थेला देण्यात आले. धर्मादाय आयुक्तांनी ते बेकायदेशीर ठरवून नव्याने मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा आदेश दिला. निवडणुका झाल्यावर नव्या सदस्यांनी या ७ लाखांच्या प्रकरणाचा छडा लावला व कायदेशीर कारवाई केली. त्यात वसंत खैरनार, प्रा. वेदश्री थिगळे आदींचे सावाना सभासदत्व रद्द करण्यात आले.

या सर्व घडामोडींनंतर बेणी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय तत्कालीन कार्यकारिणीने घेतला. या प्रकरणासाठी अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांच्या पुढाकाराने बैठक होऊन बेणी यांच्यावर ७ लाख रुपयांच्या अपहाराबद्दल भद्रकाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून या प्रकारांची चौकशी करण्यात येऊन न्यायालयाला अहवाल सादर करण्यात आला. त्याप्रकरणी फौजदारी न्यायालयाने बेणी यांना समन्स बजावला आहे.

न्यायालयाचे अशा प्रकारचे कोणतेही समन्स मला मिळालेले नाहीत. शेकडो समन्स कोर्टातून निघत असतात. समन्स मिळाल्यावर कोर्टात जाऊ, विषय काय आहे ते बघू.

- श्रीकांत बेणी, प्रमुख कार्यवाह, सावाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘श्रावणक्वीन’चा पहिला राऊंड आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वतःतील कलाकाराला व्यासपीठ देऊन आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंना दाद देणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन’ स्पर्धेची प्राथमिक फेरी आज, ५ ऑगस्टला रंगणार आहे. यातून निवड झालेल्या मुली अंतिम फेरीत स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करणार असून, तेव्हाच ‘श्रावणक्वीन’चा मुकुट कोणाच्या डोक्यावर विराजमान होणार, ते ठरेल. या व्यासपीठानं आत्तापर्यंत अनेक प्रतिभाशाली चेहरे अभिनय, मॉडेलिंग, गायन आणि निवेदन या क्षेत्रांसाठी दिले असून, यंदा यात आणखी भर पडणार, हे नक्की!

प्राथमिक फेरीच्या नावनोंदणीसाठी स्पर्धक मुलींचा भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यांच्या प्रोफाइलला मिळालेली मतं आणि परीक्षकांच्या निकषांवर मुलींची पहिल्या फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. प्राथमिक फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने ई-मेल वरून कळवण्यात आलं आहे.

नाशिक शहरात अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये येण्याचं प्रमाण वाढतं आहे. ‘श्रावणक्वीन’ ही पर्सनालिटी कॉन्टेस्ट नवोदित कलाकारांना हक्काचं व्यासपीठ देऊ करते. या स्पर्धेद्वारे इंडस्ट्रीत प्रवेश करण्यासाठी त्यांना आत्मविश्वास आणि संधी मिळते. प्रत्येक मुलीत काही ना काही खासियत असते. ती एखादा कलागुण असो, आकर्षक व्यक्तिमत्त्व असो किंवा छाप पाडणारी संवादशैली असो. या कलागुणांच्या जोरावर सिनेमा, मालिका, नाटक किंवा मॉडेलिंगमध्ये नाव कमवण्यासाठी त्या पात्र ठरतात. असेच गुण ‘श्रावणक्वीन’ ही स्पर्धा हेरते. या व्यासपीठानं आत्तापर्यंत अनेक प्रतिभावान चेहरे दिले आहेत.

प्राथमिक फेरीमध्ये सगळ्यांत महत्त्वाचा आहे, टॅलेंट राउंड. यामध्ये स्पर्धकांनी त्यांची कला सादर करणं अपेक्षित आहे. तुम्ही डान्समध्ये फ्युजन म्युझिकचा पर्याय निवडला असेल, तर दोन गाण्यांमधले बिट्स व्यवस्थित जुळले पाहिजेत. त्यानुसार फ्युजन पेहराव करा. मात्र, फ्युजन कॉश्च्युमच्या नावाखाली पारंपरिक आणि पाश्चिमात्य पेहरावामध्ये ओढूनताणून मिक्स अँड मॅच करू नका. ‘फ्युजन’ हे ‘कन्फ्युजन’ न वाटता, सुंदर दिसावं. नुसतं गाणं म्हणणार असाल, तर बँकग्राउंड म्युझिक स्कोअर सीडी किंवा पेनड्राइव्हमध्ये सेव्ह करून आणा. ते नसेल, तरीही चिंता नको. तुमचा स्वतःच्या आवाजावर आणि गायकीवर विश्वास असेल, तर संगीताशिवायही तुम्ही परीक्षकांचं मन जिंकू शकता.

तिन्ही राउंडसाठी तुमचा पेहराव सारखा असेल. त्यामुळे रॅम्पवॉक हा फक्त वेस्टर्न आउटफिटवरच केला जातो असा समज करू नका. कपड्यांपेक्षा तुमची चालण्यातली ऊर्जा, देहबोली आणि लकब महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या. स्वतःची ओळख करून देताना आत्मविश्वास दाखवा. तुम्ही कितीही चांगला पेहराव आणि मेकअप केला; पण बोलण्यात अडखळला, तर तिथंच छाप पडणार नाही. त्यामुळे कविता, शेर किंवा एखाद्या गाण्यातून स्वतःविषयी माहिती सांगा. ‘फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन’ हे लक्षात घ्या आणि इंट्रोडंक्शन राउंडमधूनच हे इम्प्रेशन पडणार आहे. ऑल द बेस्ट!


प्राथमिक फेरी

हॉटेल एक्सप्रेस इन, मुंबई आग्रा महामार्ग

सकाळी ९ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images