Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

एसटी-पालिका सुप्त संघर्ष?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

पुणे-मुंबईच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळाची शहर बससेवा नाशिक मनपामार्फत चालविण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने, राज्य परिवहन महामंडळ व पालिका प्रशासनात सुप्त संघर्ष निर्माण झाला आहे. या संघर्षाचे शहरातील नागरिक, कामगार व विद्यार्थी नाहक बळी ठरले असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. पालिका आयुक्तांना धडा शिकविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे स्थानिक अधिकारी इरेला पेटले असून, त्यासाठी शहर बससेवेच्या फेऱ्या घटविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून शहर बससेवा तोट्यात सुरू आहे. मुंबई-पुणे शहराच्या धर्तीवर नाशिक शहर बससेवा राज्य परिवहन महामंडळाकडून नाशिक पालिकेकडे चालविण्यासाठी वर्ग करण्याचा विषय गेल्या काही वर्षांपासून रेंगाळला आहे. वसंत गिते, उत्तमराव ढिकले व बाळासाहेब सानप या महापौरांच्या काळातही या विषयला हिरवा कंदील मिळू शकला नव्हता. त्यानंतर मनसेचे राज ठाकरे यांनी या विषयात रस घेतला. त्यासाठी नेमलेल्या समितीनेही रेड सिग्नल दाखविला. मध्यंतरी पुन्हा मुख्यमंत्र्यांनीही या विषयावर एक समिती नेमली. या समितीनेही नकारघंटा कायम ठेवली. त्यामुळे शहर बससेवा पालिकेकडे वर्ग करण्याचा विषय अद्याप रेंगाळत आहे.

आयुक्त नकारात्मक म्हणून..

पालिकेचे आयुक्तच या विषयावर नकारात्मक असल्याने त्यांना धडा शिकविण्यासाठी शहर बससेवेच्या शेकडो फेऱ्या परिवहन महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी बंद केल्याची माहिती परिवहन महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. याचा अर्थ पालिका आयुक्त व राज्य परिवहन महामंडळाचे स्थानिक अधिकारी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून सुप्त संघर्ष सुरू असल्याचे उघड झाले आहे. अनुकूल वातावरण असतानाही शहर बससेवा पालिकेकडे वर्ग करण्यास पालिका आयुक्तांचीच नकारघंटा असल्याचे ठाम मत राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे आहे. कमी उत्पन्न व शालेय सुट्यांचे कारण पुढे करुन बंद करण्यात आलेल्या बसफेऱ्या सुट्या संपून तीन महिने उलटले तरी सुरू करण्यात आलेल्या नाहीत.

प्रवासी वेठीला

शहर बससेवा पालिकेकडे वर्ग करण्याच्या मुद्द्यावर पालिका आयुक्त आणि राज्य परिवहन महामंडळातील अधिकाऱ्यांतील सुप्त संघर्षामुळे लाखो प्रवासी वेठीस धरले गेले आहेत. शहर बससेवेच्या आजवर दररोज १९० ड्यूटी असत. त्यापैकी सध्या ७० ड्यूटी बंद झालेल्या आहेत. एका ड्युटीच्या ८ फेऱ्यांप्रमाणे एकूण ५६० बसफेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नागरिक, कामगार, विद्यार्थ्यांना बसथांब्यावर तासन तास बससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सुरू असलेल्या बसेसलाही तुफान गर्दी होत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. प्रवाशांवर खासगी प्रवाशी सेवेचा नाईलाजास्तव वापर करण्याही नामुष्की ओढवली आहे.

ब्रेक डाऊनचे प्रमाण वाढले

शहर बससेवेची धुरा सध्या २०६ बसेसच्या खांद्यावर आहे.त्यासाठी ४५० वाहक, ४५० चालक व ३०० इतर असे सुमारे १२०० कर्मचारी राबत आहेत. मात्र, ७० ड्युटी घटविण्यात आल्याने काही कर्मचारी केवळ हजेरी लावत आहेत. या २०६ बसेसपैकी १८ बसेस ब्रेक डाऊन झाल्या आहेत. या बसेसच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे स्पेअर पार्ट खरेदी करण्याची ऑर्डर देण्यासही महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी चालढकल करीत आहेत. परिणामी बसेसची संख्याही घटली आहे. या सर्व प्रकाराला महामंडळ अधिकारी व पालिका आयुक्त असा सुप्त संघर्षच कारणीभूत ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समाजधुरिणांच्या योगदानाचा जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शतकमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या मराठा विद्या प्रसारक समाज या शिक्षण संस्थेचा समाजदिन जिल्हाभरात संस्थेच्या शाळा आणि कॉलेजेसमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवर वक्त्यांची व्याख्याने, समाजधुरिणांच्या योगदानाचा जागर, प्रतिमापूजन आदी उपक्रमांचे आयोजन संस्थेत करण्यात आले होते.

मेडिकल कॉलेज

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कै. रावसाहेब थोरात आणि समाजधुरिणांनी मविप्रची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या कार्याचा वटवृक्ष आज बहरला आहे, असे प्रतिपादन असे प्रतिपादन शेतकरी नेते रामचंद्रबापू पाटील यांनी केले. डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजतर्फे आयोजित समाजदिन सोहळ्यात ते बोलत होते. सरचिटणीस नीलिमा पवार अध्यक्षस्थानी होत्या. व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदन व संस्थापकांचा प्रतिमापूजनाने झाली. प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी केले. सरचिटणीस पवार यांनी अध्यक्षीय मनोगतात मविप्रच्या विकासाचा लेखाजोखा मांडला. मेडिकल कॉलेजच्या शरीररचना विभागास गतवर्षी मरणोत्तर देहदान केलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात संदीप भानोसे आणि त्र्यंबकेश्वर येथील उल्हास आराधी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

डॉ. सुनील औंधकर यांनी सूत्रसंचालन केले. फिजिओथेरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेश मित्रा यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. बी. के. जाधव, डॉ. एस. व्ही. शिंदे, डॉ. कुशल शुक्ल, शरद पवार, विक्रांत रायते, मंदार कुलकर्णी आणि शरीररचना विभाग प्रयत्नशील होता.
--

शिक्षणशास्त्र कॉलेज

जिल्ह्यात शिक्षणाचा प्रचार व प्रसाराचे कार्य हाती घेणारे संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन संस्थेचे शिक्षणाधिकारी प्रा. संजय शिंदे यांनी केले. मविप्रच्या अॅड. विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्र कॉलेजमध्ये समाजदिन सोहळ्यात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोरसे अध्यक्षस्थानी होते. मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर रावसाहेब थोरात, काकासाहेब वाघ, भाऊसाहेब हिरे, अण्णासाहेब मुरकुटे, गणपतदादा मोरे, डी. आर. भोसले, बाबुराव ठाकरे, विठ्ठलराव हांडे, व डॉ. वसंतराव पवार आदी समाजधुरिणांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी समाजगीतातून आदरांजलीही वाहण्यात आली. प्रास्ताविक डीटीएड विभागाच्या प्राचार्या ललिता वाघ यांनी केले. आभार डॉ. सुभाष भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. कैलास खोंडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रेन वॉक’द्वारे सामाजिक संदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलांमध्ये फिटनेसबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने महिलांसाठी ‘डी फिट रेन वॉक’ हा अनोखा सामाजिक उपक्रम चांगलाच रंगला. शहरातील सर्व स्तरांतील आणि वयोगटांतील दोनशेपेक्षा अधिक महिलांनी त्यात सहभाग नोंदवून रॅलीद्वारे सामाजिक संदेश दिला.

डान्सच्या माध्यमातून फिटनेस राखता येतो, याबद्दलचे प्रात्यक्षिक या उपक्रमाद्वारे दाखविण्यात आले. त्यानंतर सर्व सहभागी महिलांची तीन किलोमीटर अंतराची रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅली वृंदावन लॉन्स गंगापूररोड येथून सुरू होऊन सोमेश्वरपर्यंत जाऊन परत वृंदावन लॉन्स तिचा समारोप झाला.

या कार्यक्रमात डी फिट डान्स फिटनेसच्या संचालिका धनश्री धारणकर-घटे व त्यांच्या टीमने झुम्बा डान्सची प्रात्यक्षिक सादर केली. उपस्थित सर्व महिलांनीदेखील त्यांना उत्स्फूर्तपणे साथ दिली व डान्सचा आनंद लुटला. डी फिट डान्स फिटनेस या फिटनेस इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित या उपक्रमातील सहभाग पूर्वनोंदणीनुसार होता आणि नोंदणी मोफत होती.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी महिलांना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन देण्यात आले. त्याच सोबत, सर्वांत उत्साही महिला, सर्वांत उत्साही ग्रुप, उत्कृष्ट सामाजिक संदेश अशी पारितोषिके देण्यात आली. पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका नयना गांगुर्डे होत्या. या प्रकारचे उपक्रम यापुढेही आयोजित करण्याचा मानस संयोजकांनी व्यक्त केला.

--

खास थीम अन् विशेष संदेश

बहुतांश महिलांनी स्वतःच्या ग्रुपसोबत या उपक्रमात सहभाग नोंदविला. त्याचसोबत विविध ग्रुपने स्वतःची खास अशी थीम, पोशाख आणि विशेष संदेशदेखील दर्शविला होता. या विविध ग्रुप्सतर्फे हेल्मेटवापराबद्दल जागरूकता, झाडे वाचवा-जीव वाचवा, अहिंसा, पाणी वाचवा, पाऊस, पायी चालणे आदींबाबत सामाजिक संदेश देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संततधारेने उडविली धांदल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शहर परिसरात शनिवारी मध्यरात्रीपासून काेसळणारा पाऊस रविवारी सकाळीदेखील सुरूच राहिल्याने शहरवासीयांची चांगलीच धांदल उडाली. सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू असल्याने व्यावसायिकांसह नागरिकांना दिवसभर चांगलीच कसरत करावी लागली. गंगापूर धरणातून केलेल्या विसर्गामुळे सकाळी गोदावरीतील पाण्याची पातळी वाढून रामकुंड परिसरात काही चारचाकी वाहने पाण्यात अडकली. अग्निशामक दलाच्या जवानांनी ती बाहेर काढली.

मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने रात्रीपासून पुन्हा जोर धरल्याने रविवारी शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र शहरासह उपनगरांत दिसून आले. काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. मात्र, सुदैवाने मोठी हानी टळली. ठिकठिकाणच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघातही घडले.

पंचवटी सार्वजनिक वाचनालयाच्या रस्त्यावर असलेले विलायती चिंचेचे झाड कोसळून दोन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. रविवारी गंगापूर धरणातून ४ हजार ६८० क्युसेस पाणी सोडण्यात आल्याने गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली. त्यामुळे रामकुंड परिसरात विविध धार्मिक विधींसाठी आलेल्या भाविकांच्या गाड्या या वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात अडकल्या. ही वाहने काढण्यासाठी अग्निशामक दल धावून आले. त्यांनी येथे अडकलेली वाहने बाहेर काढली. गाडगे महाराज पुलाच्या खालच्या बाजूलाही एक जीप पाण्यात अडकली होती. तीदेखील अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढली.

इंद्रकुंडासमोरून रामकुंडाकडे येणाऱ्या पंचवटी सार्वजनिक वाचनालयाच्याजवळ असलेले विलायती चिंचेचे झाड चारचाकी वाहनांवर कोसळले. त्यामुळे या वाहनांचे नुकसान झाले, तसेच दोन नागरिक किरकोळ जखमी झाले. वर्दळीच्या रस्त्यावरच कोसळलेल्या या झाडामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात आला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी या झाडाचा अडसर दूर केला.


--


देवळाली कॅम्प येथील आठवडेबाजारात पाणी

देवळाली कॅम्प ः देवळाली कॅम्प परिसरात रात्रीपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसामुळे येथील रविवारच्या आठवडेबाजारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने भाजीविक्रेत्यांसह नागरिकांचे चांगलेच हाल झाल्याचे दिसून आले. गेल्या १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शनिवारी मध्यरात्रीच्या आधीच हजेरी लावली. येथील रविवारच्या आठवडेबाजारावरही या संततधारेचा परिणाम होऊन भाजीविक्रेते, व्यावसायिक व ग्राहक यांच्या संख्येवर परिणाम झाल्याचे दिसून आले. काही भाजीविक्रेते सोबत प्लास्टिकचे कागद व छत्र्या घेऊन आले होते. त्यामुळे त्यांच्या मालाचे नुकसान काही प्रमाणात वाचले. मात्र, अन्य असंख्य विक्रेत्यांचा भाजीपाला व अन्य माल भिजल्याने त्यांना नुकसान सहन कराव लागले. दिवसभर पाऊस सुरूच राहिल्याने स्थानिक नागरिकांसह लष्करी जवानांच्या कुटुंबीयांनीदेखील बाजारात जाण्याचे टाळले. त्यामुळे भरेकरी, व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या भाजीपाला विक्रीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यातच भाजीपाला दरात वाढ झाल्याचे दिसून आले.

--


सातपूर परिसरातील गल्ल्यांमध्ये साचले तळे


सातपूर ः सातपूर परिसरात शनिवारी रात्रीपासूनच कोसळणाऱ्या पावसामुळे परिसरातील रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. शहरातील सर्वच भागात पावसाळी पाण्याची पाइपलाइन असूनदेखील पाणी साचत असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करूनच वाहने चालवावी लागली.

सातपूर भागात नुकतेच काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या गल्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर पावसासाचे पाणी साचल्याने असा गल्ल्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. काही ठिकाणी पाणी वाहून जाण्याची व्यवस्थाच केली गेली नसल्याने साचलेल्या पाण्यातूनच प्रवास करण्याची वेळ रहिवाशांवर आली. महापालिकेने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी टाकलेल्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विद्यार्थ्यांना घडला उपवास!

$
0
0

संतप्त विद्यार्थ्यांचा आदिवासी भवनावर ठिय्या

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

जिल्हाभरातील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहांमध्ये जेवण पुरविणाऱ्या ठेकेदारांनी रविवारी सकाळी अचानक संप पुकारला. परिणामी या वसतिगृहांमध्ये एकच गोंधळ उडाला. प्रशासनाने तात्पुरता सेंट्रल किचन व्यवस्थेव्दारे तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी हे जेवण नाकारत तात्काळ आदिवासी भवनावर धडक देत ठिय्या दिला.

आदिवासी विकास भवनअंतर्गत जिल्हाभरात सुमारे २० वसतिगृह आहेत. यापैकी नाशिकमध्ये ९ वसतिगृह आहेत. येथे इयत्ता आठवी ते पदव्युत्तर वर्गांमध्ये शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी आश्रयाला आहेत. या विद्यार्थ्यांना अगोदरच अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतानाच रविवारी यात जेवणाच्या समस्येची भर पडली. जेवण सुविधा पुरविण्याच्या बदल्यात आदिवासी विभागाकडून अपेक्षित लाभ पदरात पडत नाही. यामुळे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ठेकेदारांनी रविवारी सकाळी अचानक संप पुकारत जेवण देणार नसल्याची भूमिका घेतली. हे वृत्त काही मिनिटांमध्ये आदिवासी विद्यार्थी व संघटनांमध्ये पसरताच गोंधळ उडाला. काही वेळाने यावर तोडगा निघेपर्यंत विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनव्दारे जेवण पुरविण्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. मात्र, या सुविधेवर विद्यार्थी नाराज होते. या विद्यार्थ्यांनी सेंट्रल किचनचे जेवण नाकारत थेट आदिवासी भवनावर मोर्चा काढला. जिल्ह्याच्या विविध भागातील विद्यार्थी रविवारी दुपारी भवनावर एकवटल्याने अधिकऱ्यांनाही सुटीच्या दिवशी हजर व्हावे लागले.

ठेकेदारांच्या तक्रारी

सरकारी आदेशांनुसार या वसतिगृहांमध्ये प्रतिविद्यार्थी दरमहा जेवणासाठी दिल्या जाणाऱ्या सरकारी खर्चानुसार निधी उपलब्ध करून दिला जातो. या खर्चातून पुरविण्यात येणाऱ्या आहारामध्ये दूध, फळे, अंडी, मांसाहार आणि किमान सकस आहार देण्याचे निकष आहेत. नियमानुसार प्रतिविद्यार्थी २५० ग्रॅम चिकन देणे अपेक्षित आहे. मात्र, विद्यार्थ्यांची संख्या व मांसाहाराची पुरवठा यात कधीही ताळमेळ बसत नसल्याचा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. या सुविधा मर्यादित रकमेत देणे शक्य होत नसल्याच्या ठेकेदारांच्या तक्रारी आहेत.

चर्चेनंतर विद्यार्थी माघारी

विद्यार्थ्यांच्या वतीने रविवारी दुपारी आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांच्या आश्वासनानंतर हे विद्यार्थी माघारी परतले. मात्र, या प्रकाराची पुनरावृत्ती झाल्यास आदिवासी विकास भवनच्या उंबरठ्यावर पुन्हा ठिय्या दिला जाईल असा इशाराही आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव यांनी यावेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुकीच्या उपचाराचे आरोग्यावर दुष्परिणाम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
आजारावर चुकीचे उपचार केले जात असल्याने व्यक्तीला दुष्परिणाम भोगावे लागतात, असे प्रतिपादन मर्क्युरी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. हेमंत चौधरी यांनी केले. दुर्गा बहुउद्देशीय विकास संस्था यांच्यातर्फे झालेल्या ‘जल्लोष स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. चौधरी म्हणाले, की सध्याच्या या धकाधकीच्या युगात कोणताही माणूस ताण तणावाशिवाय जगू शकत नाही. ताण तणावामुळे अनेक आजारांना त्यांना सामोरे जावे लागते, त्यात माणसांचा स्वभावही अनेक आजारांना आमंत्रण देतो. कंबरदुखी, मणक्याचे दुखणे, गुडघेदुखी अशा प्रकारच्या दुखण्याला स्त्रियांना समोर जावे लागते. त्यामुळे आहार आणि व्यायाम यांना जीवनात महत्त्व दिले पाहिजे. तणावामुळे ऍसिडिटीत ९० टक्के वाद होत असते. आहाराद्वारे केवळ १० टक्के अॅसेडिटी वाढू शकते. दुधयुक्त चहा पिणे हेदेखील अॅ‌सेडिटी वाढविण्यास कारणीभूत ठरते. निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टीतून आहार संतुलित करून आरोग्य चांगले ठेवता येते.
डॉ. मनोज मोरे यांनी चांगले आरोग्य राहण्यासाठी सर्व प्रकारच्या आहाराचा नियमितपणे समावेश करण्याचा सल्ला दिला. गायिका गीता माळी आणि मोहित माळी यांनी गायलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गीता माळी प्रस्तुत श्रावणसरींनी भरलेल्या गीतांचा कार्यक्रम झाला त्यात त्यांनी विविध गीतांचे सादरीकरण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेरगिलच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हल्ला

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पंचवटीतील सराईत अल्पवयीन गुन्हेगार हृतिक शेरगिल उर्फ पाप्या शेरगिलच्या खुनाचा बदला घेण्यासाठी चेतन पवारवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची बाब पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे. पोलिसांनी सहा संशयितावर गुन्हा दाखल केला असून, यात शेरगिलच्या भावाचासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
शेरगिलच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या चेतनवर शनिवारी (दि. १९) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गजबजलेल्या तिबेटियन मार्केट परिसरात जीवघेणा हल्ला झाला होता. संजय रामलाल पवार (३८, रा. शनिमंदिराशेजारी, रामनगर, पेठरोड) यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी विक्की बाळू जाधव उर्फ काळ्या तोतऱ्या, पाप्याचा भाऊ हरीश उर्फ हऱ्या शेरगिल, रोहन अहिरे, राकेश पवार, गौतम ताठे, ललीत उर्फ लल्या सुरेश राऊत आणि अजय भईटा यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवला.

पंचवटीतील उन्नती शाळेजवळ ७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाप्या शेरगिलची तीन ते चार शाळकरी विद्यार्थ्यांनी हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पवारला ताब्यात घेतले. याच संदर्भांत चेतन आपल्या आई-वडिलांसमवेत शनिवारी बाल न्यायालयात गेला. तेथील काम आटोपल्यानंतर कपडे खरेदीसाठी तो तिबेटियन मार्केटमध्ये गेला. तिथे त्याच्यावर तिघा चौघांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. त्याच्यावर सध्या पंचवटी पोलिस स्टेशन जवळील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

हत्येनेच न्याय
पंचवटी परिसरात सध्या गँगवॉर रंगले आहे. यातून एकमेकांना संपविण्यासाठी टवाळखोरांचे प्रयत्न सुरू आहे. दिवे, मोरे, कोष्टी अशा अनेक सराईतच्या सोबतीला शेरगिल व त्याच्या विरोधातील शाळकरी मुलेही एक दुसऱ्या टोळ्यातील सदस्यांचा जीव घेऊन जणू न्याय मिळाल्याचा आनंद साजरा करू लागले आहेत. या गंभीर बाबीकडे शहर पोलिस लक्ष कधी देणार असा प्रश्न पंचवटीतील नागरिकांना सतावू लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाइनमनला धक्काबुक्की

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
घराची सर्व्हिस वायर बदलण्यासाठी गेलेल्या लाइनमनला धक्काबुक्की केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. शुक्रवारी (दि. १८) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
भगवान एकनाथ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी इस्माईल शहा (रा. सुंदरनगर डीपीजवळ, देवळाली गाव) याच्या घरी सर्व्हिस वायर दुरुस्त करण्यासाठी पवार, अमोल जाधव, सुभाष रिंजड तसेच लाइनमन सुरेश उगले आदी गेले होते. सर्व्हिस वायर दुरुस्ती सुरू असताना शहा याच्या शेजारी राहणाऱ्या तिघांनी वाद सुरू केला. यास शहा यानेही साथ देत लाइनमन उगले यांना मारहाण करीत धक्काबुक्की केली. तसेच तुम्ही देवळाली गावात नोकरी कशी करता, हेच पाहतो अशी धमकी दिली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक भडीकर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणावर तलवारीने वार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
दुचाकीवर जाणाऱ्या तरूणावर तलवारीने वार करून दगडाने मारहाण केल्याची घटना एक्स्लो पॉइंट कॉर्नरवर घडली. अनिल राजेंद्र काळे (२८, फडोळ अर्पाट. मारूती चौक, दत्तनगर, अंबड) यांनी फिर्याद दिली.
काळे हे शुक्रवारी (दि. १८) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास क्लासला गेलेल्या भाचीला आणण्यासाठी गेले होते. तेथून हे दोघे घराकडे परतत असताना एक्स्लो पॉइंट येथे संशयित आरोपी विकी दोंदे, दिलीप ठाकूर आणि आदर्श (पूर्ण नाव नाही) अशा तिघांनी थेट तलवारीने हल्ला केला. यामुळे काळेसह त्याची भाची दुचाकीवरून खाली पडले. यानंतर तिघांनी काळेला लाथबुक्यासह दगडाने मारहाण केली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार के. एन. आडके करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्रानेच चोरले मंगळसूत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
घरात आलेल्या मित्रानेच कपाटातील ३५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरी करून नेल्याप्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांतीलाल दगुजी अढांगळे (५८, रा. गुरूप्रसाद बिल्डींग, डोंबवली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची पत्नी व मुलगा प्रगती रो हाऊस, लोटस हॉटेलसमोर, लॅमरोड येथे राहतात. शनिवारी (दि. १९) सकाळी ७ वाजता अढांगळे यांचा मुलगा मयूर याचा १७ वर्षीय अल्पवयीन मित्र घरात आला. त्याने कपाटाच्या आतील कप्प्यात ठेवलेले ३५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरी केले. तसेच हे मंगळसूत्र आपल्या आईवडिलांकडे पोहच केले. घटनेचा अधिक तपास पीएसआय जी. आर. जाधव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेची चेन तोडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
दुचाकीवर जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरील दोघा चोरट्यांनी तोडण्याची घटना शुक्रवारी (दि. १८) रात्री साडेनऊ ते पाऊणे दहा वाजेच्या सुमारास बॉईज टाऊन स्कूलसमोरील सिध्दार्थनगर येथील वळणावर घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
मंगला रमेश वनसे (३४, रा. पांडवनगरी, रघुत्तम सोसा. इंदिरानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी रात्री दुचाकीने घराकडे परतत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोन चोरटे त्यांच्या पाठीमागून आले. यावेळी वनसे यांच्या गळ्यातील साडेसतरा ग्रॅमची आणि ३० हजार रुपयांची सोन्याची पोत तोडून चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला धक्का दिला. यानंतर चोरटे भरधाव वेगात त्र्यंबकरोडच्या दिशेने फरार झाले. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सारिका आहिरराव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवड यादी फाडणाऱ्यांविरूध्द गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आदिवासी विकास भवन येथे नोटीस बोर्डावर लावलेली विद्यार्थ्यांची यादी फाडणाऱ्या लकी जाधव आणि त्याच्या तिघा साथिदारांविरोधात मुंबई नाका पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी काशिनाथ रावजी चव्हाण (५०, रा. वणी, ता. दिंडोरी) यांनी फिर्याद दिली आहे. आदिवासी विकास कार्यालयात २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या प्रवेशासाठी २०५ विद्यार्थ्यांची विनड यादी तयार करण्यात आली. ही यादी नोटीस बोर्डावर लावण्यात आली. मात्र, संशयितांनी हरकत असल्याचे सांगत दहशत निर्माण करण्यासाठी नोटीस बोर्डावरील यादी फाडून टाकत विद्रुपीकरण केले. तसेच सरकारी कामात अडथळा आणला. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक आर. एस. आवारे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कथडा मार्केटमधील दुकान फोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
बंद दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील तब्बल ६३ हजार ५०० रुपये चोरट्यांनी चोरी केले. ही घटना द्वारका परिसरातील डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलच्या जवळील कथडा मार्केट येथे शुक्रवारी (दि. १८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
या प्रकरणी शेख शकिल रेहमान (४७, रा. साईदर्शन अपार्ट, पखालरोड) यांनी फिर्याद दिली. रेहमान यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे कथडा मार्केटमध्ये शॉप क्रमांक १२ आणि १३ मध्ये गोदावरी अॅटो एजन्सीज नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री दुकान बंद करून रेहमान घरी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. तसेच, दुकानाच्या गल्लात असलेली ६३ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास पीएसआय काळे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन मोबाइलची घरामधून चोरी

$
0
0

नाशिकरोड : उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच्या घरातून तीन मोबाइलची चोरी झाली. नाशिक-पुणे महामार्गावरील आयनॉक्स सिनेमाजवळील विद्युत कॉलनीतील रहिवासी अरबाज अलाउद्दीन शेख यांच्या घरातून चोरट्यांनी तीन मोबाइल लांबवले. शेख बाहेरगावी गेले होते. परतल्यावर त्यांना घराच्या खिडकीजवळ असलेले मोबाइल चोरी झाल्याचे निदर्शनास आले. यात मायक्रोमॅक्स, ऍसूस व रेडमी कंपनीचे १४ हजार रुपयांचे तीन मोबाइल होते. त्यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ निरीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सोनवणे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारुविक्रीला चाप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री, निर्मिती आणि वाहतुकीविरोधात १५ दिवसात तब्बल ७५ गुन्हे दाखल करून ५४ जणांना गजाआड केले. या कारवाईत दोन दुचाकींसह चार चारचाकी वाहने जप्त केली. तसेच सुमारे ३२ लाख ७९ हजार ३८९ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यात देशी विदेशीसह गावठी दारुसह ताडी आणि रसायनांचा समावेश आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत व उपअधीक्षक जी. व्ही. बारगजे यांनी बेकायदा दारू व्यवसाय रोखण्यासाठी जिल्ह्यात धडक कारवाई सुरू केली. गेल्या पंधरा दिवसात भरारी पथकांनी शहर व जिल्ह्यात छापासत्र सुरू केले. गेल्या पाच दिवसात या पथकाने सुमारे तीस लाखाच्या आसपास मुद्देमाल जप्त केला. भरारी पथक १ च्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. ११) शहरानजिकच्या पेठरोडवरील हॉटेल ढोलकी छापा टाकून व्यवस्थापकासह मद्यप्राशन करणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या. शासकीय परवाना नसताना तेथे मद्यविक्री सुरू होती. तर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस केलेल्या कारवाईत चार मोठ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. भरारी पथकाच्या क्रमांक १ च्या कर्मचाऱ्यांनी नाकाबंदीत मद्यवाहतूक करणारी दोन चारचाकी वाहने पकडले. या कारवाईत वाहनांसह तब्बल २० लाख ३८ हजार ९६० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.

बनावट ताडी जप्त
कळवण कार्यालयाने मालवाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी केली. यात वाहनासह ७ लाख ९७ हजार ६६० किमतीचा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी वाहनचालकास अटक झाली. तर निरीक्षक ब विभागाने इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथे ४२ लिटर तर निरीक्षक अ विभागाने नांदूरनाका येथे छापा टाकून २६ लिटर बनावट ताडी जप्त केली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोबाइलचोरांचा धुमाकूळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
घरासमोर रस्त्याने पायी फिरत असताना दुचाकीवर आलेल्या तिघांनी हातातील मोबाइल हिसकावला. मोबाइलमधील सीमकार्ड तरी द्या, अशी विनवणी करणाऱ्याच्या हात व पायावर थेट कोयत्याने हल्ला केला. दहशत निर्माण करणारी ही घटना पंचवटीत घडली. चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याचे मानले जात आहे.
या प्रकरणी गणेश रामचंद्र राऊत (२७, रा. लेणी दर्शन सोसा. साईनगर, अमृतधाम) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. राऊत हे शुक्रवारी (दि. १८) रात्री साडेनऊ ते पाऊणे दहा वाजेच्या दरम्यान आपल्या घराबाहेर रस्त्यावर चक्कर मारत होते. यावेळी तिथे पल्सर दुचाकीवर तिघे चोरटे आले. त्यांनी राऊतकडे मोबाइल मागितला. तसेच आराडाओरड केला तर जीव ठार मारण्याची धमकी दिली. साडेसात हजार रुपयांचा मोबाइल चोरट्यांनी हिसकवला. मात्र, मोबाइलमधील सीमकार्ड आणि मेमरी कार्ड द्या असे म्हणताच चोरट्यांनी आपल्याकडील कोयता काढून राऊत यांच्या हातावर तसेच पायावर वार केला. घटनेचा अधिक तपास एस. के. म्हात्रे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचितांसाठी झटणारा देवदूत हरपला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव
बेरड, रामोशी आणि देवदासी या समाजातील वंचित घटकांसाठी अहोरात्र कार्य करणारा देवदूत हरपला, असे मत समता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेश पतंगे यांनी डॉ. भीमराव गस्ती यांच्या शोकसभेप्रसंगी व्यक्त केले.
समरसता साहित्य परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाशिक शाखा यांच्या वतीने डॉ. गस्ती यांची शोकसभा शंकराचार्य न्यास येथील नानाराव ढोबळे सभागृहात झाली. यावेळी भावना व्यक्त करतांना पतंगे यांनी डॉ. गस्ती यांना त्यांच्या स्मृतीनिमित्त समरसता साहित्य पुरस्कार देण्यात यावा, असे आवाहन केले.
सार्वजनिक काम करणारी संस्था ही व्यक्ती केंद्रित नसते. ती नेहमी सार्वजनिक काम करत असते, याची प्रत्येकाने जाणीव ठेवणे गरजेचे आहे. समाजातील प्रश्न हे समाजातील क्षमता असलेल्या व्यक्तीने कोणावरही अवलंबून न राहता सोडविले पाहिजे, हे डॉ. गस्ती यांच्या निमित्ताने जाणवते, असे मत पतंगे यांनी व्यक्त केले.
देवदासी महिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी ‘उत्थान’ ही सामाजिक संस्था डॉ. गस्ती यांनी बेळगावमधील यमुनापूर येथे सुरू केली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये त्यांनी मोठं काम केलं. १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात १८ महिने तुरुंगात होते. त्यांना कुसुमाग्रज स्मारक यांच्यावतीने २००६ मध्ये गोदावरी गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते, असे मुक्तेश्वर मुनशेट्टीवर यांनी सांगितले.
रवी सहस्रबुद्धे, वसंत खैरनार, एस. एच. मोरे, राजाभाऊ मोगल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शोकसभेस साहित्य परिषद महाराष्ट्र पश्चिम प्रांताचे उपाध्यक्ष डॉ. भास्कर म्हरसाळे, संघाच्या नाशिक शाखेचे विजय कदम आदी मंचावर उपस्थित होते. नाना बच्छाव यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजात मुलगा मुलगी भेद व्हावा नष्ट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आपला देश आज अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करतो आहे. या प्रगतीशील भारताचे आधारस्तंभ असणारे आजचे मुले मुलीही अभ्यासाबरोबर विविध क्षेत्रात यश मिळवत आहे. अशी प्रगती होत असताना मुलामुलींमधील भेद नष्ट झाले पाहिजे, असे प्रतिपादन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केले.
महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्हा समितीतर्फे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी झाला. यावेळी मृणाल कुलकर्णी बोलत होत्या. मुलगा मुलगी यांच्याकडे समानतेने पाहिल्यास त्याचा फायदा समाजाला, देशाला होणार आहे. ही समानता आपल्या देशाचा विकास करण्यास लाभदायक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार बाळासाहेब सानप म्हणाले, की शहराच्या जडणघडणीत वीरशैव समाजाचे मोठे योगदान आहे. या समाजाला जाणवत असलेल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करू. आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या, की आजच्या स्पर्धेच्या युगातही या समाजाने आपले कर्तृत्व सिद्ध करून समाजाचेही नाव मोठे केले आहे. येत्या पिढीनेही असे कार्य करावे तसेच पालकांनी मुलांवर निर्णय न लादता मार्गदर्शन करावे असे आवाहनही केले. प्रमोद वेरुळे यांनी प्रास्ताविक केले. गिरीश निकम यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धेश्वर दंदणे यांनी आभार मानले.

यांचा झाला सन्मान
अनिल चौघुले (राजकीय व सामाजिक), डॉ. राज नगरकर (वैद्यकीय), प्रदीप पाचपाटील (उद्योजक), सुनील लोहारकर (उद्योजक व सामाजिक), सुनील भायभंग (सामाजिक व्यावसायिक) यांना वीरशैव लिंगायत रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच दहावी, बारावी, डिप्लोमा, डिग्री, विविध परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छायाचित्रांमध्ये उमटले नाशिकचे प्रतिबिंब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जागतिक छायाचित्र दिन व नाशिक प्रेस फोटोग्राफर असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त भरविण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनास नाशिकचे प्र्रतिबिंब उमटले आहे. प्राचीन आणि आधुनिकता यांचा समन्वय साधणाऱ्या या शहराची प्रतिमा जतन करण्यात छायाचित्रकारांचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन महापौर रंजना भानसी यांनी केले.

शालिमार येथक्षल बी. डी. भालेकर मैदानावर प्रदर्शन भरविण्यात आले आहे. महापौर भानसी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे रविवारी उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक शाहू खैरे, नगरसेविका वत्सला खैरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, पोपटराव भानसी, अध्यक्ष नीलेश तांबे आदी उपस्थित होते
यावेळी भानसी म्हणाल्या, नाशिकचे छायाचित्र प्रदर्शनाच्या आयोजनासाठी महापालिकेच्या वतीने सहकार्य केले जाईल. छायाचित्रकार हा जीव धोक्यात टाकून क्षण टिपण्याचा प्रयत्न करतो. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. हजारो शब्दांतून जे व्यक्त करता येत नाही ते एका छायाचित्रतून मांडण्याचे काम छायाचित्रकार करतो, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
नगरेसवक शाहू खैरे म्हणाले, की पुरातन वास्तूचा ठेवा जतन करून त्याची आठवण करून देण्याचे काम छायाचित्र करते, शहराच्या जडणघडणीत छायाचित्रकारांचा मोठा वाटा आहे. शरद आहेर म्हणाले, की छायाचित्रातील अचूक कला भाव टिपण्याचे काम छायाचित्रकार करतो.
संस्थापक सोमनाथ कोकरे यांनी सूत्रसंचलन केले. सल्लागार प्रशातं खरोटे यांनी आभार मानले. संयोजन उपाध्यक्ष विवेक बोकील, सरचिटणीस हेमंत घोरपडे, खजिनदार पंकज चांडोले, कार्यकारणी सदस्य अंबादास शिंदे, सतीश काळे, भूषण पाटील , मयूर बरगजे, आदित्य वायकुळ, केशव मते, अशोक गवळी, राजू ठाकरे, सतीश देवगिरे, गणेश खिरकाडे, विजय चव्हाण, अमन शेख, यातिन भानू, प्रदीप मोरे, कृपेश पवार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बैलपोळ्याचा आज उत्साह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रावण अमावस्या तिथीला साजरा करण्यात येणारा बैलपोळा सोमवारी (दि. २१) जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मुख्य बाजारपेठांमध्ये पोळ्याचे साहित्य खरेदीसाठी सुरू असलेली लगबगीवरुन हे चित्र स्पष्ट झाले.

कृषिक्षेत्रात नाशिक आघाडीवर असल्याने शेतकरी कुटुंबांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पोळ्याचे महत्त्वही शहरात अबाधित आहे. वर्षभर शेतकऱ्यांबरोबर घाम गाळणाऱ्या बैलांप्रती आदर या सणानिमित्त व्यक्त करण्यात येतो. त्यामुळे बळीराजा बैलाची पूजा करतो, बैलांना अंघोळ घातली जाते, शाल झालर, त्याच्या शिगांना रंगांची सजावट केली जाते. गळ्यात हार घातले जातात, त्यांची पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. सायंकाळी सजवलेल्या बैलांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाणार असून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. पोळ्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारीच बैलांची सजावट करण्यासाठी शहराबाहेरील काही शेतकरी कुटुंबात लगबग दिसून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images