महिनाभरापासून चर्चेत असलेल्या भाजप शहराध्यक्ष निवडणुकीला बुधवारचा मुहूर्त सापडला असून शहरातील मध्यवर्ती कार्यालयात संध्याकाळी सहा वाजता ही निवडणूक होणार आहे.
भाजप शहराध्यक्ष आज ठरणार
↧
↧
जीवाची मुंबई
दोन मित्र जीवाची मुंबई करण्यासाठी नाशिकहून निघाले. मुंबईची माहिती नसल्याने विचारत का होईना मुंबईला जायचेच, असा त्यांनी निर्धार केला आणि स्वारी निघाली मुंबईच्या दिशेने.
↧
चारा उत्पादनाचे शेतक-यांना आवाहन
खरीप हंगामात पर्जन्यमान सरासरी तुलनेत कमी झाल्याने ब-याच जिल्ह्यांत चारा टंचाई व पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.
↧
जिल्हा कोर्टातील अधिका-यांना लॅपटॉप
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स योजनेअंतर्गत सर्व राज्यांतील जिल्हा- दुय्यम कोर्ट आणि त्यांच्या ऑफिसेसचे कम्युटराझेशन केले जाणार आहे.
↧
भुजबळांचे दुखणे हे ओबीसींचे नव्हे
सत्यशोधकतेच्या विचारांचा अनुयायी बनताना सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या विचारांमध्ये विरोधाभास दिसून येतो, अशी टीका महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण ढवळे यांनी केली.
↧
↧
गणवेश खरेदीत भ्रष्टाचार
महापालिकेत मोठ्या कामांच्या निविदांसाठी ई-टेंडरिंग सक्तीचे असताना, प्रशासनाने मात्र गणवेश खरेदीच्या निविदा न काढताच २ कोटी ६९ लाख ५८ हजार ५३६ रुपये खर्चाचे काम विशिष्ट संस्थेला दिले आहे.
↧
वातावरणातील बदलाने आजाराला आमंत्रण
फेब्रुवारी महिना सुरू होतो न होतो तोच थंडीचा जोर ओसरून तापमानात वाढ झाली आहे. वातावरणात हा अचानक झालेला बदल अनेक आजारांना आमंत्रण देणारा ठरला. ताप, डोकेदुखी यांसारखे आजार वाढले आहेत.
↧
सुट्या नाण्यांचा ठणठणाट
नाशिक शहर व परिसरात सध्या नाण्यांचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरात आठ ते दहा रुपये शेकड्याने नाणी मिळत असून सुट्या पैशांचा प्रश्न नको म्हणून दुकानदार ग्राहकांच्या माथी चॉकलेट मारत आहेत. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
↧
साध्वी प्रज्ञाच्या जामिनास NIA चा विरोध
मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला वैद्यकीय उपचारांसाठी जामीन देण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विरोध केला आहे. या जामीन अर्जावर १३ फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे.
↧
↧
मुंडे प्रदेशाध्यक्षपदाच्या स्पर्धेत नाहीत
सुधीर मुनगंटीवार यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची मुदत संपत असून त्या पदासाठी नवीन नाव निश्चित करण्यासाठी मंगळवारी भाजप नेत्यांच्या कोअर समितीची बैठक झाली. या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदाबाबत प्राथमिक चर्चा झाली असून भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी आपण स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
↧
वीज जोडणीचे दरपत्रक प्रसिद्ध
नवीन वीजजोडणी घेताना द्यावा लागणारा स्थिर आकार दुप्पट करण्याची मागणी महावितरणने वीज नियामक आयोगाकडे केली होती. ही दरवाढ काही अंशी मंजूर झाली असून नवी वीज जोडणी घेताना वीजग्राहकाला वाढीव रक्कम मोजावी लागणार आहे.
↧
'रासबिहारी'च्या फीवर अखेर तोडगा
वर्षभरापासून फीच्या रकमेवरून सुरू असलेल्या रासबिहारी शाळा प्रशासन आणि पालकांच्या वादावर शिक्षण विभागामार्फत अखेर तोडगा काढण्यात आला आहे.
↧
अंतर अवघ्या क्लिकचे
शिक्षणसंस्थेने ई-लर्निंग तंत्रज्ञानाचा उपयोग करून विकसित केलेल्या गुरुकुल प्रणालीमुळे स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांना केंद्रीय स्तरावरील सीईटीच्या अभ्यासासाठी सीबीएसईची पुस्तके अवघ्या एका क्लिकवर बघता येणार आहेत.
↧
↧
'फी'वाढी विरोधात पालकांची बैठक
फी वाढ करून पालकांची पिळवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे. पाल्यांच्या भवितव्याचा विचार करून शाळा मागेल ती फी पालक देत असले तरी यामुळे शिक्षण संस्था शिक्षणाचे बाजारीकरण करीत आहेत.
↧
फेब्रुवारीनंतर पाणी कपातीची शक्यता
पाणी कपातीबाबत महापौर 'बॅक फूट'वर आले असून फेब्रुवारी अखेरपर्यंतची स्थिती लक्षात घेऊन त्यानंतर अंतीम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
↧
३ संचालकांवर अपात्रतेची तलवार
थकबाकीदार संस्थांचे प्रतिनिधित्व करत असल्याकारणावरून सहकार विभागाने मंगळवारी देविदास पिंगळे यांच्यासह प्रशांत हिरे व यशवंत भोये यांना जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून कमी का करू नये, अशा आशयाची नोटीस बजावली.
↧
मित्रानेच लांबविले ७.५ लाख
घरात शिरकाव करत मित्रानेच साडेसात लाख रुपये लांबविल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. विश्वासातल्या लोकांकडूनच फसवणूक होण्याची ही आठवडाभरातील तिसरी घटना आहे.
↧
↧
जिल्ह्यात २८ टक्के पाणी नमुने दूषित
जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतर्फे जिल्ह्यातील १४ तालुक्यांतून पाण्याच्या साडेसात हजार नमुन्यांपैकी २ हजार १०० नमुने दूषित आढळले. हे प्रमाण २८ टक्के आहे.
↧
महामार्गावर हवीत स्थानिक झाडे
महामार्गावरील झाड तोडल्यानंतर नव्याने झाडे लावताना नियमांनुसार स्थानिक झाडे लावणे गरजेचे आहे. वड, पिपळ, उंबर, कडुलिंब, बेल ही झाडे लावण्यास प्राधान्य द्यायला हवे, असे मत नाशिक नागरिक कृती समितीच्या प्रमुख अश्विनी भट यांनी व्यक्त केले.
↧
भय 'तिथले' संपत नाही
पिंपळगाव-गोंदे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३वरील सहापदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून काम सुरू असल्याने ओझर नजीकचा एअरफोर्स कॉर्नर ते सायखेडा चौफुली हा मार्ग अत्यंत धोकादायक आहे.
↧