Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विंचुरला सशस्त्र दरोडा

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील विंचुर येथील माजी सरपंच शकुंतला दरेकर यांच्या घरासह आणखी तीन ठिकाणी शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास शस्रांचा धाक दाखवून दरोडा टाकल्याची घटना घडली. मरळगोई गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वस्तीत शनिवारी पहाटे आठ ते दहा जणांनी शस्त्रांसह दरोडा टाकला. आकाशनगर येथेही याच दरम्यान दोन घरात डोरोड्याचा अशस्वी प्रयत्न या दरोडेखोरांनी केला. या दरोड्यात सोने व रोख रक्कम असा सुमारे साडेचार लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला.

शकुंतला दरेकर यांच्या मरळगोई रोडवरील वस्तीवर सर्व कुटूंब झोपलेले होते. पहाटे दोन वाजेच्या सुमारास कंपणासह दाराचे कडीकोयंडा तोडून आठ दरोडेखोर गुप्ती, कोयता घेऊन घरात घुसले. दरोडेखोरांनी रत्नाकर दरेकर यांना मारहाण केली. सहा तोळे सोने लुटून नेले. गोविंद दरेकर यांच्या घरातून मोबाइल व पाच हजार रुपये, अरुण ढोमसे यांच्या घरातून दोन तोळे सोने असा ऐवज चोरला. दरोडेखोर जाताच सचिन दरेकर यांनी लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना याबाबत माहिती दिली. सोनवणे फौजफाट्यासह अवघ्या दहा मिनीटात घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्याशी संपर्क साधून जिल्ह्यात नाकेबंदी करण्यात आली.

संशयित पुण्याचे

पहाटेच विंचूर येथे एक तवेरा गाडी उभी असताना काही संशयित हालचाली पोलिसांना दिसल्या. पोलिसांनी विचारपूस केली असतात उघवाउघवीची उत्तर दिल्याने पोलिसांनी अंकुश लोळगे, खंडू टावरे (दोन्ही रा. पुणे)दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.


दोन महिन्यांनंतर दरोडेखोर अटकेत

पिंपळगाव बसवंत ः येथे दोन महिन्यांपूर्वी पडलेल्या दरोड्यातील संशयितांना अटक करण्यात आली आहे. आझाद नगर येथील रवींद्र मोरे यांच्या घरावर दरोडा टाकून मोरे मारहाणही करण्यात आली होती. पोल‌सि निरीक्षक वासुदेव देसले यांनी राज्यातील पोल‌सि ठाण्यात संपर्क साधून गुन्ह्यांबाबत माहिती दिली. त्यावरुन हे दरोडेखोर नेवासा या ठिकाणचे असल्याचे संशय व्यक्त केला होता. नगर पोल‌सिांच्या सहकार्य ने नेवासा येथील अमोल यशवंत पिंपळे, उमेश हरीसिंग भोसले, रमेश भोसले, अल्ताफ भोसले (रा. नेवासा) यांना अटक केली आहे. पिंपळगाव बसवंत न्यायालयात या आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली.

अ‌श्ल‌‌िल वर्तन; गुन्हा दाखल

मनमाड ः अमरावती-मुंबई रेल्वेतील आरक्षित बोगीत प्रवासी महिलेसमोर लघुशंका करणाऱ्या व महिलेकडेपाहून अश्ल‌लि वर्तन करणाऱ्या अकोल्याच्या नितीन जवळकर यांच्या विरोधात मनमाड रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संशयितास रेल्वे न्यायालयासमोर उभे केले असता जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. जवळकर हे अन्न निरीक्षक या अधिकारी असल्याचे बोलले जात आहे.

अमरावती येथून मुंबईकडे जाणारी एक्स्प्रेस मनमाड रेल्वे स्थानकानजीक असताना नितीन जवळकर यांनी दारूच्या नशेत बाथरूम मध्ये न जाता बोगीतील महिलेसमोरील सीटजवळ लघुशंका केली, अशी तक्रार संबंधित महिलेने शुक्रवारी रात्री मनमाड लोहमार्ग पोलिसांत केली.

वणीत चेन स्नॅचिंग

दिंडोरी : तालुक्यातील वणी येथे नातवांना क्लासमधे घेऊन जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या संशयीतांनी ओरबडून नेली. हरितालिकेच्या दिवशी भरदुपारी देशमुख गल्लीत हा प्रकार घडला. याप्रकरणी रमाबाई सुरेश गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात सशय‌तिांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


३७२ प्रशिक्षणार्थी देशसेवेत दाखल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

४४ आठवड्यांच्या अवघड प्रशिक्षणानंतर नाशिकरोड येथील तोफखाना विभागातील ३७२ प्रशिक्षणार्थींची तुकडी दिमाखात सशस्त्र संचलन करीत शनिवारी देशसेवेत दाखल झाली. यावेळी त्यांनी मै दृढ प्रतिज्ञा करता हूँ...मै संविधान के प्रति इमानदार रहूँगा अशी शपथ घेतली. तोफखाना विभागातील वरिष्ठ अधिकारी व आईवडिलांच्या उपस्थित थाटात झालेल्या या सोहळ्यातील परेडने सर्वांचे लक्ष वेधले. रिमझिम पाऊस व लष्करी बॅण्डपथकाने वाजवलेली शेर-ए-जवान या धूनने सोहळ्यात रंगत आणली.

या शपथ सोहळ्यासाठी पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशचे सबकमान्डर मेजर संजीव चौधरी व बिग्रेडीयर जे. एन. बिंद्रा उपस्थित होते. नाशिकरोडच्या तोफखाना प्रशिक्षण केंद्रात या नवसैनिकांना फिजिकल, ड्रिल, वेपन ट्रेनिंगसह असाल्ट व ट्रेडमधील अॅडव्हान्स प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर आता हे नवसैनिक सैन्य दलातील वेगवेगळ्या युनिटमध्ये दाखल होणार आहेत. वेगवेगळ्या राज्यातून निवड झालेल्या या प्रशिक्षणार्थीच्या या परेडला सकाळी ८.३० वाजता सुरुवात झाली. त्यानंतर तोफांचे प्रात्यक्षिक व हेलिकॉप्टरच्या घिरट्यांनंतर हा सोहळा पार पडला. या शपथ सोहळ्यात विविध धर्मांचे धर्मगुरूही उपस्थित होते.

पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू

नवसैनिकांच्या या शपथ सोहळ्यात त्यांच्या पालकांना खास आमंत्रित करण्यात आले होते. या सोहळ्यात आपला मुलगा आता सैन्य दलात दाखल होणार असल्यामुळे त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. शपथ सोहळ्यानंतर या प्रशिक्षणार्थींच्या वडिलांनाही मेडल देऊन गौरविण्यात आले.

‘विश्वकी सर्वश्रेष्ठ सेना’

शपथग्रहण सोहळ्यात पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशचे सबकमान्डर मेजर संजीव चौधरी यांनी या नवसैनिकांमध्ये जोश भरत त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अनुशासन व देशभक्तीचा धागा पकडत आपला देश म्हणजे अनेकता मे एकता असल्याचे सांगितले. भारतीय सेना विश्वकी सर्वश्रेष्ठ सेना असून, त्यात तुम्हाला संधी मिळाल्याचे सांगत आगे बढनेका अवसर आपको मिलेगा असे सांगितले.

उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार

प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान सबकमान्डर मेजर संजीव चौधरी यांनी केला. यात मुकेशकुमार शर्मा (बेस्ट इन ड्रिल), अतुल सिंग (बेस्ट इन पीटी), राहुल (बेस्ट इन डब्ल्युटी), मोहित (बेस्ट इन जीएनआर), कमलेश कुमार (बेस्ट इन टीए), कमलकुमार (बेस्ट इन ओपीआर), सरबजितसिंग (बेस्ट इन डीएमडी), गुलशन कुमार (बेस्ट इन टीडीएन), राहुल शर्मा (ओव्हरऑल बेस्ट).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘श्रावणक्वीन’ची आंतरराष्ट्रीय भरारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिल्ली येथील दी उमराव येथे झालेल्या ‘अब्राक्सस गॉडेस ऑफ ब्यूटी २०१७’ या राष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धेत नाशिकच्या श्रिया तोरणे व भैरवी बुरड या दोन कन्यांनी देदीप्यमान कामगिरी करीत विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे या दोघीही ‘महाराष्ट्र टाइम्स’ आयोजित ‘श्रावणक्वीन’च्या फायनालिस्ट राहिलेल्या आहेत.

या दोघीही आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. भैरवी ही २०१५ व श्रिया २०१६ मध्ये ‘श्रावणक्वीन’मध्ये सहभागी होत्या. सौंदर्य स्पर्धांमध्ये नाशिकचे नाव दिवसेंदिवस उंचावत आहेत. या दोघींच्या विजेतेपणामुळे पुन्हा एकदा ते सिद्धही झाले आहे. श्रिया हिने मिस टिन युनिव्हर्स इंडिया २०१७ या स्पर्धेचे विजेतेपद त्याचबरोबर मिस ब्यूटुफुल आइज हा किताब पटकावला. श्रिया फेब्रुवारीत होणाऱ्या मिस टिन युनिव्हर्स या सेंट्रल अमेरिकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. भैरवी बुरड हिने या स्पर्धेत मिस ग्लोबल इंटरनॅशनल हे विजेतेपद आणि बेस्ट रॅम्प, बेस्ट कंजुनिअॅलिटी हा किताब पटकावला. जमैका येथे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मिस ग्लोबल इंटरनॅशनल या स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करेल. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी श्रिया आणि भैरवी यांची निवड पश्चिम भारत विभागातून झाली होती. त्यासाठी दोघीही दिल्ली येथे गेल्या होत्या. देशभरातून या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. मिस टीजीपीसी या ऑनलाइन पेजंटमध्ये २०१६ मध्ये भैरवीने, तर २०१७ मध्ये श्रियाने विजेतेपद पटकावले होते. सर्व स्पर्धकांसमवेत त्यांना विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसाकडून लूट!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस दलास काळिमा फासणारी आणखी एक घटना सिन्नरमध्ये समोर आली आहे. शहर पोलिस दलातील वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने दोघांना बरोबर घेत चक्क कोल्हापूर येथील सराफ व्यावसायिकास लुटले. सुदैवाने सिन्नर पोलिसांनी लागलीच हालचाल करीत तिघांना जेरबंद केले. त्यामुळे शहर पोलिस दलात खळबळ उडाली असून, तोतया पोलिसांच्या नावाने होणारे गुन्हे खरोखर सराईत गुन्हेगारच करतात का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

महेश शांताराम उगले, (रा. कानडी मळा, सिन्नर), गणेश शांताराम उकाडे (रा. बारागाव प्रिंपी, सिन्नर) आणि समाधान दिनकर ढेरिंगे (रा. पळसे, फुलेनगर, ता. जि. नाशिक) अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. गणेश उकाडे हा शहर पोलिस दलात वाहतूक शाखेच्या युनिट चारमध्ये शिपाई या पदावर कार्यरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंनगले तालुक्यातील ईपरी येथील राजेंद्र बाळगोंडा पाटील व त्यांचा मुलगा मनीष राजेंद्र पाटील हे सराफ व्यावसायिक २५ ऑगस्ट रोजी सिन्नर येथील सराफ व्यावसायिककडे आले होते. काम आटोपल्यानंतर दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास ते पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने आपल्या कारमधून जाण्यासाठी निघाले. सिन्नर-पुणे हायवेवर रौनक लॉन्सजवळ वरील दोन संशयित दुचाकीवर आले. त्यांनी सदर कार थांबवून पाटील पितापुत्राकडील मोबाइल हिसकावले. आम्ही क्राइम ब्रँचचे पोलिस असून, तुमच्या कारचे सीट फाडून सोन्या-चांदीचे दागिने काढू शकतो, अशी दमबाजी केली. पाटील यांनीही ओळखपत्र दाखविण्याची मागणी करीत पोलिस स्टेशनला घेऊन चला, असे सांगितले. त्यावर तुम्हाला नाशिक येथील क्राइम ब्रँचमध्ये न्यावे लागेल, असे सांगत संशयित त्यांना नाशिकरोडवरील शाहू हॉटेलजवळ घेऊन गेले. तिथे डिक्कीत ठेवलेली एक लाख रुपयांची रोकड घेऊन संशयितांनी पळ काढला. यादरम्यान पाटील यांनी संशयिताच्या दुचाकीचा क्रमांक लिहून ठेवला.

--

मित्राच्या दुचाकीचा वापर

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संजय दराडे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहायक पोलिस उपनिरीक्षक जी. डी. परदेशी, पोलिस नाईक भगाव शिंदे, सचिन गवळी, प्रवीण गुंजाळ, विनोद टिळे यांनी तपास सुरू केला. पाटील यांनी दिलेल्या दुचाकी क्रमाकांचा शोध घेऊन संबंधित मालकाकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यात त्याने आपली दुचाकी पोलिस असलेल्या उकाडेला दिली असल्याचे पुढे आले. या एका पुराव्यावरून पोलिसांनी उकाडेसह अन्य दोघांना जेरबंद केले.

तोतया की खरेच पोलिस?

तोतया पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांना लुटण्याच्या अनेक घटना शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घडत असतात. या घटना शक्यतो उघडकीस येत नाहीत. सिन्नर पोलिसांनी मात्र अवघ्या काही तासांत टोळीला जेरबंद केले. या टोळीतील एक सदस्य चक्क पोलिसच निघाल्याने तोतया पोलिसांच्या गुन्ह्यांचा नव्याने अभ्यास करण्याची गरज असल्याची भावना पोलिसच बोलून दाखवत आहे.

--

सिन्नर पोलिसांनी अवघ्या काही तासांत लूट करणाऱ्या टोळीस जेरबंद केले. संशयितांकडून ९६ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. तिघांपैकी एक संशयित शहर पोलिस दलात वाहतूक शाखेत कार्यरत असून, त्या विषयीचा अहवाल पाठविण्यात येणार आहे.

-संजय दराडे, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उत्सवमूर्ती सन्मान’मध्ये सहभागी होण्याची संधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन झालेले आहे. आबालवृद्धांच्या लाडक्या गणरायाचे स्वागत भक्तांनी अगदी वाजतगाजत केलेय. शहरातल्या सार्वजनिक मंडळांनीदेखील यंदा वैविध्यपूर्ण देखावे साकारले आहेत.

गणेशोत्सवात मुख्य आकर्षण असते ते सार्वजनिक गणेश मंडळांच्या देखाव्याचे. मंडळाचे कार्यकर्ते दिवस-रात्र एक करून हे देखावे उभे करतात. शहरातल्या गणेश मंडळांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र टाइम्सने यंदाही उत्सवमूर्ती सन्मान हा अनोखा उपक्रम आयोजित केला आहे.

सार्वजनिक मंडळे, देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडतात, तर काही मंडळे प्रबोधनही करतात. अनेक मंडळे पर्यावरणपूरक देखावे उभारतात. मंडळांच्या या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्सवमूर्ती सन्मानअंतर्गत मंडळांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोत्तम सजावट केलेले मंडप, सर्वांत सुंदर मूर्ती, पर्यावरणस्नेही मूर्ती अशा विविध गटांत ही स्पर्धा होत आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कार्यालयात येऊन प्रवेश अर्ज भरून आपल्या मंडळाची नावनोंदणी करायची आहे. अधिक माहितीसाठी ९५५२५६६८४२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅमल हाऊससमोर घरफोडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी भरदिवसा सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले. द्वारका भागातील कॅमल हॉऊससमोर ही घटना घडली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित भिकाजी जाधव (रा. आशियाना पार्क) यांनी तक्रार दिली आहे.

शुक्रवारी सकाळी जाधव कुटुंबिय कामानिमित्त घराबाहेर पडले असता चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे सात तोळे वजनाचे व दीड लाख रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक रमेश पवार करीत आहेत.

बदनामी प्रकरणी अटक

मैत्र‌णिी समवेत काढलेल्या सेल्फीचा अश्लिल फोटो तयार करून युवतीची बदनामी केल्याप्रकरणी मखमलाबाद राजवाड्या शेजारी राहणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये वियनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिषेक संजय कटारे (रा.मोरेश्वर बिल्डींग, रॉयल अपार्ट.) असे संशयित युवकाचे नाव आहे. माणेकशानगर भागातील १९ वर्षीय युवतीने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. युवतीच्या तक्रारीनसार युवक आणि पीडीत युवती एकाच संस्थेत शिक्षण घेत आहे. त्याच्यात मैत्री होती. याकाळात संशयिताने सेल्फी काढण्याच्या बहाण्याने फोटो काढले होते. या फोटोंची मिक्स‌िंग करीत त्याने अश्लिल फोटो तयार केले व मित्र मंडळी आणि मुलीच्या नातेवाईकांना सोशल मीडकयाच्या माध्यमातून पाठविले. तसेच त्याने मुलीशी मोबाईलवर अश्लील भाषा वापरून वांरवार पाठलाग करून मारहाण करीत विनयभंग केल्याचे युवतीच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल लांबविला

रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलेच्या पर्समधील मोबाइल भामट्यांनी हातोहात लांबविल्याची घटना मेहर सिग्नल ते सांगली बँक दरम्यान घडली. या प्रकरणी स्वाती संजय जोशी (रा.अंजनीनगर, पाइपलाइन रोड) यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये चोरीच्या गुन्ह्या नोंदविला.गुरुवारी दुपारी जोशी मेहर सिग्नलकडून पायी जात असतांना अज्ञात चोरट्यांनी त्याच्या पर्समधून मोबाइल पळविला.

जॉर्ज साळवे जेरबंद

हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणाऱ्या जॉर्ज संजय साळवे (रा. रचना विद्यालय मागे, हिल्स कॉलनी, शरणपूररोड) यास पोलिसांनी पुन्हा एकदा अटक केली. महिनाभरापूर्वीच पोलिसांनी त्यास याच कारणास्तव अटक केली होती. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठपोलिसांकडून गस्त सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास क्राईम ब्रँच युनिट एकचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक गिरमे आपल्या पथकासह गस्तीवर असताना त्यांना जार्जबाबत माहिती मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे जिल्ह्यातून ४४ हजारांवर अर्ज

0
0

शेतकऱ्यांना अर्ज भरताना अनेक अडचणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्यासाठी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत धुळे जिल्ह्यातून ५० हजार ३६० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यात ४४ हजार ५५९ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. सरकारने १५ सप्टेंबरपर्यंत पीककर्ज माफीचे अर्ज नोंदणी करण्याची मुदत जाहीर केल्याने अद्यापही जिल्ह्यातील शेतकरी महा ई-सेवा केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी धावपळ करीत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात ५० हजार ३६० शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ४४ हजार ५५९ शेतकऱ्यांनी अर्ज भरून त्याची प्रत बँकेकडे सादर केली आहे. दरम्यान, दुसरीकडे आधार कार्ड नोंदणीसाठी नियुक्त केलेल्या बेसिक्स कंपनीचा करार संपुष्टात आल्यामुळे मोजक्या ठिकाणी आधार कार्ड नोंदणी केंद्रे सुरू आहे. या केंद्रांवरदेखील गर्दी होत आहे. ही प्रक्रिया महाऑनलाइन, आपले सरकार केंद्र, संग्राम कक्षात सुरू आहे. शासनाने दहा हजार रुपये देण्याचे आदेश बँकांना दिल्यानंतर एकूण १२७ शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मिळाले आहेत. यात धुळे जिल्ह्यातील २० तर नंदुरबार जिल्ह्यातील १५ शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मिळाले आहेत.

गावात अर्ज भरून घ्यावे

सुरुवातीला अर्ज भरताना शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामध्ये सर्व्हर डाऊन झाल्याने त्यांना अर्ज भरता आले नाही. आधार कार्डची नोंदणी करताना त्रुटी राहिल्या. त्यामुळे हाताचे ठसे अर्ज भरताना जुळले नाही. या सर्व अडचणींनी शेतकऱ्यांना आधार कार्ड नोंदणी केंद्रात नव्याने हाताचे ठसे देण्यासाठी जावे लागत आहे. राज्य सरकारने पीककर्ज माफीचे अर्ज शेतकऱ्यांना दाखल करण्यास सांगितले. मात्र शेतकऱ्यांना अर्ज दाखल करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. तरी जिल्ह्यातील गावागावात शेतकऱ्यांच्या पीककर्ज माफीचे अर्ज भरून घ्यावे, अशी मागणीही काही शेतकऱ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्लब हाऊसची दैना संपेना

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेची स्थापना होण्याअगोदर दिवंगत नगराध्यक्ष रामचंद्र निगळ यांनी क्लब हाऊसची संकल्पना मांडली होती. महापालिकेची स्थापना झाल्यावर माजी नगरसेवक तथा सभापती दिलीप निगळ यांनी सातपूर क्लब हाऊसची उभारणी केली. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले क्लब हाऊस धूळखात पडून आहे. यामुळे क्लब हाऊसची दैना कधी संपणार, असा सवाल खेळाडूंकडून उपस्थित केला जात आहे. महापालिकेने पडून असलेली क्लब हाऊसची इमारत योग्य कामासाठी द्यावी अशी मागणी खेळाडूंनी केली आहे.

सातपूर भागात व्‍यायामासाठी महापालिकेने भव्य असे क्लब हाऊस उभारले आहे. गेल्या काही वर्षांपासून धूळखात पडून असलेल्या सातपूर क्लब हाऊसच्या मैदानावर जॉगिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु, इमारतीचा मात्र वापर होत नसल्याने तिचा योग्य कामासाठी वापर करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

क्लब हाऊसची उभारणी करताना महापालिकेने दोन जिम बांधल्या होत्या. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जा राखून महिला व पुरुषांसाठी जिमची उभारणी करण्यात आली होती. तसेच टेबल टेनिस व बॅडमिंटन हॉलही तयार करण्यात आले होते.

शूटिंग रेंजसाठी हॉल

सध्या केवळ नाममात्र दराने शूट‌िंगसाठी एक्सएल क्लबला हॉल देण्यात आला आहे. माजी महापौर तथा आमदार बाळासाहेब सानप यांनीदेखील लाखो रुपयांचा निधी शूटिंग क्लबला दिला होता. महापालिकेने ५० मीटर

शूटिंगसाठी रेंज तयार केली होती. शूटिंग क्लबसाठी लागणारा हॉल नाममात्र दराने दिला गेला असताना उर्वरित जागा इतर खेळांसाठी महापालिकेने द्यावी, अशी मागणी खेळांडूनी केली आहे. सातपूर क्लबमध्ये उभारण्यात आलेल्या

वास्तूंपैकी केवळ जलतरण तलावाकडूनच महापालिकेला आर्थिक उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे टेनिससाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च करून कोर्ट उभारले होते. त्याचा योग्य वापर होत नसल्याने टेनिस कोर्टही धूळखात पडून असल्याचे चित्र आहे.


महापालिकेने सातपूरकरांसाठी अतिशय सुंदर अशी क्लब हाऊसची वास्तू उभारली आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून क्लब हाऊसची इमारत धूळखात पडून असल्याने ती खेळांडूसाठी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. स्थानिक

नगरसेवक व महापालिकेकडे यासाठी पाठपुरावा करणार आहे.

- ज्ञानेश्वर निगळ, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदावरी संवर्धन कक्षालच कुलूप

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदावरीच्या प्रदूषणात वाढ झाल्यामुळे नागरिकांना थेट उच्च न्यायालयात जाऊन हा प्रश्न मांडण्याची वेळ आली. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी गोदावरी प्रदूषणाच्या बाबतीत महापालिकेला आदेश काढल्यानंतर महापालिकेने गोदावरी संवर्धन कक्षाची मोठ्या थाटात स्थापना केली. या कक्षाचे कार्यालय रामकुंड येथील वस्त्रांतर गृहात सुरू केले. मात्र, थोड्याच दिवसांत या कार्यालयाला कुलूपबंद अवस्थेत ठेवण्यात आले आहे.

केवळ देशातच नव्हे तर जगभरात प्रसिध्द असलेल्या नाशिकच्या गोदावरीच्या धार्मिक तीर्थक्षेत्राच्या भागातील गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिकेने या प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे याविषयी दाद मागण्यासाठी गोदाप्रेमी देवांग जानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महापालिकेला आदेश काढल्यानंतर गोदावरी संवर्धन कक्षाची महापालिकेने स्थापना केली. गोदावरी नदीच्या पात्रात प्रदूषण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली.

गोदावरी संवर्धन कक्षाचे कामकाज सुरुवातीला पंचवटी विभागीय कार्यालयातून करण्यात आले. त्यानंतर रामकुंडावरील वस्त्रातंर गृहात हे कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयात फर्निचर बनविण्याच्या निविदाही काढण्यात आल्या. काही दिवस येथून स्वच्छतेच्या बाबतीतील कामकाजाची नोंदही केली गेली. गोदावरीच्या स्वच्छतेसाठी दोन शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त करण्याचे महापालिकेने ठरविले होते. गेल्या महिनाभरापासून या कार्यालयास कुलूप लावण्यात आलेले आहे. गोदावरी नागरी सेवा समितीचे पदाधिकाऱ्यांच्या ही बाब गुरुवारी लक्षात आली. त्यामुळे त्यांना निवेदन देण्यासाठी थेट राजीव गांधी भवनात जाण्याची वेळ आली.


रामकुंड येथील गोदावरी संवर्धन कक्षाचे नाशिक महापालिका प्रशासनाने मोठ्या थाटात उद््घाटन केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. गोदावरी संवर्धन कक्षातून गोदावरी नदी व उपनद्यांचे होणारे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न होणार होता. पण याच कक्षाच्या कार्यालयास कुलूप लावण्यात आलेले आहे.

- देवांग जानी, अध्यक्ष, गोदाप्रेमी नागरी सेवा समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किनो सोसायटीतर्फे शिक्षा पुरस्कार जाहीर

0
0

प्रदीप भोसले यांना राज्यस्तरीय पुरस्कार

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील किनो एज्युकेशन सोसायटीतर्फे दरवर्षी नाविन्यपूर्ण व उपक्रमशील कार्य करणाऱ्या शिक्षक व शाळांना किनो शिक्षा गौरव जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येतो. यंदा प्रदीप भोसले यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला असून, उत्कृष्ट शाळा म्हणून फांगदर प्राथमिक शाळेस पुरस्कार जाहीर केला आहे.

किनो एज्युकेशन सोसायटीतर्फे एकूण पंधरा शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येत असून, राज्यस्तरीय पुरस्कार प्रदीप भोसले यांना तर उर्दूसाठी मोह. फारूक यांची निवड करण्यात आली आहे. तर जिल्हास्तरीय उत्कृष्ट शाळा म्हणून फांगदर प्राथमिक शाळा (देवळा) तर तालुकास्तरीय उत्कृष्ट शाळा म्हणून खडकी प्राथमिक शाळा (ता. मालेगाव) यांची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव रईस शेख यांनी दिली.

शिक्षण क्षेत्रातील उपक्रमशील असलेल्या शिक्षकांचा किनो दोन वर्षांपासून गौरव करते. यावर्षी जिल्ह्यातील पंधरा शिक्षकांत तीन शिक्षक मालेगाव तालुक्यातील आहेत. तसेच राज्यातील एक शिक्षक तसेच दोन शाळांना सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून दि ८ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता संस्थेच्या अल कबीर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचे शेख यांनी सांगितले.


जिल्हास्तरीय पुरस्कारार्थी शिक्षक

देवीदास कदम (सटाणा), विलास गवळे (नाशिक), प्रकाश चव्हाण (निफाड), ज्ञानदेव नवसरे(पेठ), वर्षा चौधरी (इगतपुरी), नीलेश भामरे (कळवण), प्रदीप देवरे (चांदवड), नामदेव बेलदार (त्र्यंबकेश्वर), विलास जमदाडे (दिंडोरी), देविदास शेवाळे (देवळा), हनुमंत काळे (येवला), गोरक्ष सोनवणे, (सिन्नर), वैशाली भामरे , दीपक हिरे, नीलेश नाहिरे (मालेगाव).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वीकृतची नियुक्ती पुन्हा लांबणीवर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापौर-उपमहापौरपदाच्या निवडीनंतर महिनाभरात स्वीकृत सदस्यांचीही निवड होणे अपेक्षित असतांना तब्बल सहा मह‌िने उलटूनही स्वीकृतच्या निवडीला मुहूर्त लागत नाही. प्रशासनाने सुरू केलेल्या स्वीकृतच्या नियुक्ती प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने ही निवड पुन्हा लांबणीवर पडली आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज मागविण्यात आले असून, त्यासाठी आता मह‌िनाभराचा अवधी देण्यात आला आहे. निवडीसाठी आता सप्टेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. भाजपच्या कोट्यात तीन जागा असताना इच्छुकांची संख्या मात्र दीडशेच्या वर आहे. त्यामुळे भाजपकडूनच या निवडीसाठी चालढकल केली जात आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक ६६ सदस्य निवडून आले आहेत. त्याखालोखाल शिवसेना- ३५, कॉँग्रेस- ६, राष्ट्रवादी- ६, मनसे- ५, अपक्ष- ३ आणि रिपाइं- १ असे पक्षीय बलाबल आहे. पालिकेत पाच स्वीकृत सदस्य नियुक्त करायचे आहेत. सद्यःस्थितीतील तौलनिक संख्याबळानुसार २४ः४० चा कोटा असून, त्यानुसार भाजपचे ३ आणि शिवसेनेचे २ सदस्य स्वीकृत सदस्यांची निवड होऊ शकते. कमी संख्याबळामुळे कॉँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेला स्वीकृत पदासाठी संधी नाही. परंतु, भाजप व शिवसेनेत स्वीकृत नगरसेवकपदासाठी मोठी स्पर्धा आहे. विशेषतः सत्तेत असलेल्या भाजपला तर स्वीकृतची मोठी डोकेदुखीच झाली आहे. पक्षाकडे तीन जागांसाठी जवळपास दीडशे जण इच्छुक असल्याने भाजपकडून ही निवड लांबणीवर टाकली जात आहे.

गेल्या मह‌िन्यात प्रशासनानेच या निवडीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. स्वीकृत नगरसेवक पदासाठी आता सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, विधी क्षेत्रातील अनुभव ग्राह्य धरण्यात आला आहे. त्यासाठी अटी-शर्तींचीही निश्चिती करण्यात आली आहे. २१ ऑगस्टपर्यंत इच्छुकांकडून अर्जही मागविण्यात आले होते. परंतु, दिलेल्या मुदतीत पालिकेकडे अर्ज आले नाहीत. परिणमी, प्रशासनाला पुन्हा अर्जांसाठी मुदतवाढ द्यावी लागणार असून, आता निवडीसाठी सप्टेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. स्वीकृतचे राजकारण मह‌िनाभर तरी थंड बस्त्यात जाऊन भाजपची डोकेदुखी कमी होणार आहे.

एक वर्षाचा प्रस्ताव?

नियमानुसार, स्वीकृत नगरसेवकाचा कालावधी पाच वर्षांसाठी असतो. परंतु, भाजप तसेच सेनेच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी एकेक वर्ष करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत भाजप व सेनेकडून चाचपणी सुरू आहे. त्यामुळे मुद्दाम ही निवड लांबणीवर टाकली जात असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ

0
0

गेल्या वर्षापेक्षा यंदा आत्महत्यांत वाढ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हृदय पिळवटून टाकणाऱ्या शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये यंदा गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. चालू वर्षात जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ७६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, गतवर्षी याच कालावधीत ६५ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली होती. विशेष म्हणजे गतवर्षी निफाडसारख्या सधन तालुक्यात आत्महत्यांचे प्रमाण अधिक होते. यंदा आत्महत्येचे लोन मालेगाव आणि नांदगावकडे सरकले आहे.

नैसर्गिक अरिष्टांचे दृष्टचक्र, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे मानसिक दडपण यासारख्या अनेक कारणांमुळे बळीराजा मनाने खचू लागला आहे. समस्यांवर मात करण्याचा आत्मविश्वासच गमावून बसल्याने आणि संकटातून बाहेर येण्याचा मार्ग दिसत नसल्याने तो मृत्यूला कवटाळत असल्याचे अशा आत्महत्यांच्या घटनांमधून स्पष्ट होते. विशेष म्हणजे यंदा प्रथमच सुरगाणासारख्या आदिवासी तालुक्यातही पहिल्यांदाच शेतकरी आत्महत्येच्या घटनेची नोंद झाली आहे. निफाड तालुक्यातही एका महिलेने आत्महत्या करून आपल्या जीवनाला पूर्णविराम दिला.

जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यापैकी सर्वाधिक १९ आत्महत्या जुलै महिन्यात म्हणजेच ऐन पावसाळ्यात झाल्या आहेत. त्याखालोखाल मे मध्ये १६, एप्र‌लिमध्ये ११ आणि ऑगस्टमध्ये नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखी टोकाची भूमिका स्वीकारली. विशष म्हणजे एकही महिना आत्महत्येच्या घटनेशिवाय रिता गेलेला नाही. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या ६५ घटना घडल्या होत्या. तर २०१५ मध्ये ४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. तुलनेने यंदा प्रमाण अधिक वाढले आहे.

मालेगावात आघाडीवर

गतवर्षी निफाड या बागायतदारांच्या तालुक्यामध्ये शेतकरी आत्महत्येच्या घटना अधिक घडल्या होत्या. यंदा मात्र मालेगाव तालुक्यामध्ये शेतकरी आत्महत्येच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. तालुक्यात आतापर्यंत १३ शेतकऱ्यांनी गळफास किंवा विष प्राशन करून मृत्यूला कवटाळले आहे. त्याखालोखाल नांदगाव तालुक्यात ११ आत्महत्या झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाले तुंबले, चेंबर फुटले...

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

‘नाले तुंबले, चेंबर फुटले, गंगाजल नासले, आरोग्य बिघडले...एवढे सारे अनर्थ पालिकेच्या एका बेपर्वाइने केले’, असे दुर्दैवाने म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. शहरातील विविध भागांतील नाल्यांतून वाहणारे गटारीचे पाणी गोदावरी व दारणा या दोन्ही प्रमुख नद्यांच्या पात्रात सर्रासपणे मिसळत आहे. भुयारी गटार योजनेचेही कित्येक चेंबर्स फुटून त्यातील खराब पाणीही या दोन्ही नद्यांच्या पात्रात मिसळत असल्याचे चित्र सध्या शहर परिसरात दिसून येत आहे.

गोदावरी आणि दारणा या दोन्ही प्रमुख नद्या गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांची तृष्णा भागविण्याचे काम करीत आहेत. मात्र, या दोन्ही नद्यांच्या पात्रातील प्रदूषणाकडे पालिका प्रशासन अजूनही दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. शहरातील विविध भागांतून वाहणारे नैसर्गिक नाले सध्या गटारगंगाच बनलेले आहेत. या नाल्यांतून वाहणारे गटारीचे पाणी सध्या सर्रास गोदा व दारणेच्या पात्रात सोडले जात आहे. परिणामी, या दोन्ही नद्यांच्या पात्रातील पाणी दूषित होऊन त्याची दुर्गंधी वाढली आहे.

सध्या पाऊस सुरू असल्याने शहरातून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यांतून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी वाहत आहे. यातील बहुतांश नाल्यांतील घाण पाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. गोदावरीसह दारणा, नंदिनी व वालदेवी या नद्यांतही अशीच स्थिती बघायला मिळत आहे. या नाल्यांतील पाणी नदीपात्रात जाण्यापासून रोखण्यासाठी पालिकेकडून कोणत्याही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही.

..येथे मिसळते घाण पाणी

गोदावरी नदीपात्रात पंचवटी, तपोवन, नांदूर नाका, दसक, नासर्डीला सिटी सेंटर मॉल, भाभानगर, म्हाडा वसाहत, वडाळा, द्वारका, वालदेवी नदीला पिंपळगाव खांब, वडनेर गेट, पाथर्डी, रोकडोबा वाडी, आर्टिलरी सेंटर, देवळालीगाव, विहीतगाव, बागूलनगर, देवळालीगाव राजवाडा, तर दारणा नदीपात्रात भगूर, देवळाली कॅम्प, चेहेडी, चाडेगाव या भागांत नैसर्गिक नाल्यांतून वाहणारे दूषित पाणी थेट नदीपात्रात मिसळताना दिसून येत आहे.

शेकडो चेंबर्स फुटले

पालिकेच्या भुयारी गटार योजनेअंतर्गत नदी काठावर उभारण्यात आलेले शेकडो चेंबर्स ठिकठिकाणी फुटले आहेत. या फुटलेल्या चेंबर्समधूनही गटारींचे पाणी थेट नदीपात्रात मिसळत असल्यानेही नद्यांचे आरोग्य बिघडले आहे. फुटलेल्या चेंबर्सची दुरुस्ती करण्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

मलनिस्सारण केंद्रांचे पाणीही नदीत

गोदावरी काठावरील टाकळी व दारणा काठावरील चेहेडी येथील पालिकेच्या मलनिस्सारण केंद्रातूनही मोठ्या प्रमाणात खराब पाणी नदीपात्रात सोडणे सुरूच आहे. या पाण्यानेही गोदा व दारणाचे आरोग्य बिघडण्यास हातभार लागत आहे. वालदेवी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाहणारे गटारीचे पाणी वर्षभर चेहेडी पंपिंग येथील पाण्याच्या साठवण बंधाऱ्यात मिसळत असूनही पालिका प्रशासनाला अद्याप या प्रश्नावर कायमस्वरुपी उपाययोजना काढण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही.

पालिका हद्दीतून वाहणारे नैसर्गिक नाले सध्या गटारगंगाच बनलेले आहेत. यातील बहुतांश नाल्यांतील खराब पाणी थेट शहरातून वाहणाऱ्या नद्यांना मिळत आहे. परिणामी नद्यांचे आरोग्य बिघडले आहे. नागरिकांनाही पिण्यासाठी प्रदूषित पाण्याचाच वापर करावा लागत आहे. पालिकेकडून चेंबर्सची दुरुस्ती केली जात नसल्याने फुटलेल्या चेंबर्समधूनही नदीपात्रात दूषित पाणी मिसळत आहे.

- पांडुरंग गुरव, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रखडलेल्या प्रकल्पांना गती

0
0

पहिल्या टप्प्यात ५८ कोटी निधी वर्ग; संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरेंची माहिती

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील रखडलेल्या असलेल्या हरणबारी डावा कालवा, तळवाडे भामेर एक्सप्रेस कालव्याच्या कामाला लवकरच गती मिळण्याचे संकेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिले आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात जवळपास ५८ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहितीही संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरेंनी दिली. याबाबत नुकतीच बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी डॉ. भामरेंची धुळ्यात भेट घेतली. त्यावेळी याबाबत माहिती दिली. या निधीमुळे बागलाण तालुक्यातील चौदा गावांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

धुळ्यात जाऊन बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेत याविषयावर चर्चा केली. त्यावेळी बागलाण तालुक्यातील प्रलंबित असलेल्या हरणबारी डावा कालवा, तळवाडे भामेर एक्सप्रेस कालव्यासाठी जवळपास ५८ कोटी निधी पहिल्या टप्प्यात वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा निर्णय मुंबईत झालेल्या वित्त विभागाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती खासदार डॉ. भामरेंनी दिली. यासाठी एकूण १०० कोटींची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यापैकी हा ५८ कोटींचा निधी सुरुवातीला वर्ग करण्यात आला आहे.

बागलाण तालुक्यातील विविध प्रलंबित सिंचनाच्या कामांना गती मिळावी म्हणून नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनंगटीवार, वित्त विभागाचे सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आपण बागलाणमधील कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त गावांची पाणी समस्या दूर करण्यासाठी प्रलंबित सिंचन प्रकल्पांना निधी वाटपात प्राधान्य देण्याची मागणी केली होती. त्यास प्रतिसाद देत पहिल्या टप्प्यात ५८ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.

याप्रसंगी टेभे सरपंच भाऊसाहेब अहिरे, संजय सोनवणे, पंचायत समिती सदस्य सोमनाथ सूर्यवंशी, डॉ. सुधीर सोनवणे, रवींद्र सोनवणे, नितीन वाघ, अनिल पाटील, विजय काकडे, केवळ देवरे, राकेश देवरे, पंडित देवरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये आज पाणी परिषद

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
भारतीय जलसंस्कृती मंडळातर्फे सोमवारी (दि. २८) त्र्यंबक रोडवरील ब्राह्मण समाज मंगल कार्यालयात पाणी परिषदचे आयोजन करण्यात आले आहे. यात नाशिक, नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगांव जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर काम करणारे व अभ्यासक व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान होणाऱ्या परिषदेत जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे, मेरीचे माजी महासंचालक डॉ. दि. मा. मोरे, जलसंवाद मासिकाचे संपादक दत्ता देशकर, भारतीय जलसंस्कृती मंडळाचे गजानन देशपांडे हे मार्गदर्शन करणार आहे‌त. भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी या परिषदेचे आयोजन केले आहे. यात सर्वांनी सहभाग घेऊन उपस्थित योग्य सूचना व बहुमोल मार्गदर्शन करावे, यामुळे भविष्यात नक्कीच आपणास पाणीटंचाई भासणार नाही आणि ठोस उपाययोजना करणे सहज शक्य होणार असल्याचे भारतीय जलसंस्कृती मंडळाचे सचिव दिलीप आहिरे यांनी सांगितले आहे.

चितळे समिती अहवालावर चर्चा
राज्य सरकारने जलसिंचन आयोगाचा अहवाल ३० सप्टेंबर १९९९ रोजी स्वीकारला. जल व सिंचन आयोगाचे अध्यक्ष म्हणून नामवंत जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांनी काम पाहिले. पाणी, शेती, अर्थ ,कृषी व जलसंपदा क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी आयोगाचे सदस्यपद भूषविले आहे. त्यांनी मांडलेल्या अहवालात गोदावरी खोऱ्यात ६६ टीएमसी व गिरणा खोऱ्यात १० टीएमसी पाणी वळविण्याचे सिंचन आयोगाने सूचविले. तसेच मुंबईसाठी ४२ टीएमसी पाणी उपलब्ध करू शकतो, असेही दाखविले आहे. वास्तविक गिरणा व गोदावरी या तुटीच्या खोऱ्यांना पाणी उपलब्ध करणे आवश्यक असल्याने संपूर्ण ४२ टीएमसी पाणी गिरणा व गोदावरी खोऱ्यात वळविणे शक्य आहे. नर्मदा प्रकल्पाकडे ३८ टीएमसी पाणी वळविता येईल, असेही आयोगाने सुचविले आहे. राज्यातील गिरणा व गोदावरी तुटीचे खोरे असताना इतर राज्यांकडे पाणी वळविण्याचे प्रयोजन योग्य नाही. डॉ. चितळे समितीने १९९९ मध्ये अहवाल सरकारकडे सादर केला. पण १८ वर्षांत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा या विभागातील गोदावरी खोऱ्यातील तुटाची भाग आहे. सदर भागास पाण्याची गरज असताना महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे हक्काचे पाणी शेजारील राज्यांकडे मोठ्या प्रमाणात वळविण्याचे प्रयत्न सूरू आहेत. या कळीच्या मुद्यावर परिषदेत चर्चा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकरोड जेलचे दोन कर्मचारी निलंबित

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
कारागृहातील अंडासेलमधील उमेश नागरे या कैद्याकडे मोबाइल सापडल्याप्रकरणी कारागृहाच्या दोन सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. रवींद्र महादू मोरे आणि बबन उत्तम राठोड अशी त्यांची नावे आहेत. जेल उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी ही कारवाई केल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक राजकुमार साळी यांनी दिली.
गेल्या वर्षी पाचशे पेक्षा अधिक मोबाइल कारागृहात सापडले होते. त्यावेळी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती. नंतर तत्कालीन अधीक्षक रमेश कांबळे यांचीही बदली करण्यात आली होती. साळी यांनी जेलची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोबाइल सापडण्याच्या घटना नियंत्रणात आल्या. राज्याचे कारागृह महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांनी जेलला भेट देण्यापूर्वी २० जुलैला रात्री अंडासेलमधील गुंड उमेश नागरे याच्याकडे मोबाइल असल्याची माहिती कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांना मिळाली. कारागृहातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मदतीने नागरेकडील मोबाइल जप्त केला. उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांच्या आदेशानुसार या प्रकरणाची चौकशी झाली. त्यात मोरे आणि राठोड दोषी आढळले. त्यामुळे धामणे यांच्या आदेशानुसार या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना २४ जुलैला निलंबनाचे पत्र देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलरोडला चिमुकलीची आत्महत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
मोठी बहिण अभ्यासाच्या कारणावरून रागावल्याने जेलरोडला अवघ्या दहा वर्षाच्या मुलीने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. धृपदा अशोक खंडारे (रा. प्रकाश आंबेडकरनगर, पाण्याच्या टाकीजवळ, जेलरोड, नाशिकरोड) असे या आत्महत्याग्रस्त मुलीचे नाव आहे.
धृपदा रविवारी (दि. २७) सकाळी साडे नऊच्या सुमारास घरात जेवण करीत असताना तिला अभ्यास करत नाही म्हणून क्लासला जाण्यापूर्वी मोठी बहिण रागावली. मोठी बहिण खेळायला जाण्यास मनाई करते आणि अभ्यासाच्या कारणावरून रागावल्याच्या कारणावरून धृपदाला राग आला. घरातील कॉटवर डबा ठेवून त्यावर उभे राहून तिने घराच्या आढ्याला ओढणीचा गळफास घेतला. घराबाहेर चुलीवर स्वयंपाक करणारी तिची आई लिलाबाई या काही वेळाने घरात आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी धृपदाला महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल केले. मात्र तत्पूर्वीच धृपदाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन या घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबावर आघात
धृपदाचे आईवडील मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात अवघ्या दहा वर्षाच्या आपल्या मुलीने आत्महत्या केल्याने या गरीब कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. धृपदाच्या आकस्मिक मृत्यूबाबत परिसरातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दुचाकींची चोरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहर परिसरातून शनिवारी (दि. २६) तीन दुचाकींची चोरी झाली. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अक्षय मोहन वाघमारे (रा. माणिकनगर) याची घरापासून बजाज पल्सर दुचाकी ही चोरीस गेली. यासंबंधी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली. वाहनचोरीची दुसरी घटना नाशिकरोड परिसरात घडली. रतन पंडित खर्जूल (रा. खर्जूल मळा, नाशिकरोड) यांची हिरो होंडा दुचाकी शिवाजी पुतळा, नाशिकरोड येथे पार्क केलेली चोरट्यांनी लांबवली. तिसरी घटना सातपूर येथे घडली असून, जितेंद्र काशीनाथ सूर्यवंशी याने जिंजर हॉटेलजवळ उभी केलेली हिरो होंडा दुचाकी असता चोरीस गेली.

चोरीचे वाहन जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नितीन साहेबराव झोमन (२८, रा. कुर्णोली ता. दिंडोरी) यास ताब्यात घेत त्याच्याकडील चोरीची दुचाकी जप्त केली. नितीनकडे असलेल्या दुचाकीबाबत पोलिसांनी चौकशी केली असता त्याने उडावाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी दुचाकीचे इंजिन नंबर व चेसिजवरून खात्री केली असता सदर दुचाकीचा मूळ क्रमांक एमएच ४१ आर ५०९८ असल्याचे निष्पन्न झाले. ही दुचाकी जुन महिन्यात मनमाड चौफुली, मालेगाव येथून चोरीस गेली होती. तसा गुन्हा देखील दाखल असल्याने संशयितास चोरीच्या दुचकीसह मालेगाव किल्ला पोलिस स्टेशनला हजर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेरा जुगारी जेरबंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहर पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापा टाकून १३ जणांना जेरबंद केले. भद्रकाली, पंचवटी आणि इंदिरानगर पोलिसांनी ही कारवाई केली. इंदिरानगर पोलिसांनी भगतसिंग झोपडपट्टीच्या सार्वजनिक शौचालयशेजारी पत्ते खेळणाऱ्या श्रावण अशोक पवार (रा. शहीद भगतसिंग नगर, इंदिरानगर) याच्यासह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली. यानंतर, संजयनगर, वाघाडी येथे नाना शांताराम अहिरे (रा. फुलेनगर, पंचवटी) याच्यासह चार साथीदार जुगार खेळताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. दरम्यान, तलावाडी नर्सिंग होम, जुने नाशिक येथे जुगार खेळणाऱ्या कादीर नजीर शेख (रा. वडाळागाव, खोडेनगर) यास त्याच्या तीन साथीदारांसह जुगार खेळताना पोलिसांनी पकडले. या संशयिताविरोधात भद्रकाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीचा उत्तमनगरला विनयभंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी युवकाविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पीडित १३ वर्षीय मुलीने तक्रार दिली आहे.
या तक्रारीनुसार, पीडित मुलगी शनिवारी (दि. २६) सायंकाळी वासुदेव पार्क, उत्तमनगर येथून पायी जात असताना, कुंदन नावाच्या युवकाने तिला जबरदस्तीने रिक्षात बसविण्याचा प्रयत्न केला. तसेच तिचा विनयभंग करत अत्याचार करण्याची धमकी दिली. याप्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक खांडवी करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images