Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

चोरीस गेलेली कार शोधली पोलिसांनी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात कार अडवून लूट प्रकरणी मुंबई पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून, मुंबई नाका पोलिसांनी काही तासातच पळविलेली कार शोधून काढली.विवो मोबाइल कंपनीचे विदेशी व्यवस्थापक जिहान हे शुक्रवारी सकाळी शोरूमच्या उद‌्घाटनासाठी शहरात आले होते. बिड येथून रात्रीचा प्रवास करून ते चालकासमवेत सकाळी सहा वाजेच्या सुमारास पाथर्डी फाटा जवळ स्विफ्ट कारने (एमएच २५ आर ०४७२) प्रवास करीत असतांना इंदिरानगर जॉगिंग टॅक जवळील शनीमंदिर भागात टोळक्याने कार अडविली. चालक विशाल नवले व व्यवस्थापक जिहान (रा. दोघे बिड) यांना धारदार चाकूचा धाक दाखवित कार घेवून मुंबईच्या दिशेने पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लुटारूंचा माग काढला. हे संशयित मुसळगाव (ता. सिन्नर) औद्योगीक वसाहतीत वाहन सोडून पळून गेले. वाहनात पासपोर्ट असलेली बॅग मिळून आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. मुंबई नाका पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डीपीरोडमध्ये अडकला रस्ता

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेने आरक्षित केलेल्या जागेवर शहर परिसरात अनेक ठिकाणी रस्तेच झालेले नसल्याने तेथे अतिक्रमणांसह वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होताना दिसते. परिणामी नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. असाच प्रकार अंबड गावात घडला असून, येथील शेतकऱ्याचा रस्ताच महापालिकेच्या आरक्षित डीपीरोडवरील अतिक्रमणांमध्ये अडकल्याने त्याला स्वतःच्या क्षेत्रात जाणेही दुरापास्त झाले आहे. याबाबत महापालिकेचे अधिकारीही टोलवाटोलवी करीत असल्याने संबंधिताला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लोकशाही दिनात संबंधित रस्त्याबाबत शेतकरी हिरामण निमसे यांनी अर्ज केला होता. त्यावेळी हा रस्ता निमसे यांचाच असल्याचे उत्तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी देत हात झटकले होते. त्यानंतर निमसे यांनी महापालिकेच्या नावावर झालेला सातबाराही महापालिकेकडे सादर केला, तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी व सिडको विभागीय अधिकाऱ्यांना निवेदनही दिले. परंतु, आजतागायत निमसे यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनीच याप्रश्नी लक्ष घालून खोटी माहिती सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निमसे यांनी केली आहे.

महापालिकेची स्थापना झाल्यावर अनेक ठिकाणी डीपीरोडसाठी आरक्षणे टाकण्यात आली होती. शहरातील विविध ठिकाणचे भूखंड रस्त्यांसाठी आरक्षित असताना आजही रस्त्याविनाच पडून आहेत. काहींवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे. असाच प्रकार अंबड एमआयडीसीला लागून असलेल्या दत्तनगर भागात घडला आहे. येथे महापालिकेने १८ मीटर डीपीरोडचे आरक्षण टाकलेले आहे. मात्र, आरक्षण टाकल्यावरही रस्त्याचे काम होत नसल्याने निमसे यांच्याकडून शेतात जाण्यासाठी कच्च्या रस्त्याचा वापर होत होता. परंतु, कालांतराने त्या ठिकाणी अनधिकृत झोपडपट्टी वसली. नंतर शेतात जाण्यासाठी बाजूच्या पडिक जमिनीचा वापर निमसे यांनी केला. मात्र, तेथेही दोन वर्षांपूर्वी गाळे उभारले गेल्याने शेतात जाण्यासाठी निमसे यांना रस्ताच राहिलेला नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

--

‘तुम्हीच हटवा अतिक्रमण’

येथील १८ मीटर डीपीरोडवरील अतिक्रमण हटविण्याबाबत निमसे यांनी महापालिकेकडे मागणी केलेली आहे. मात्र, महापालिकेने जागामालक तुम्हीच असून, तुम्हीच अतिक्रमण हटवावे, असे लेखी उत्तर लोकशाही दिनाच्या दिले. त्यानंतर निमसे यांनी महापालिकेकडे रस्त्याचा सातबाराच सादर करीत १८ मीटर डीपीरोडचे आरक्षण असल्याचे लक्षात आणून दिले. मात्र, तरीही महापालिका अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होत नसल्याने शेतात जावे कसे, असा प्रश्न निमसे यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

--

गेल्या काही वर्षांपासून मला शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने गैरसोय होत आहे. याबाबत महापालिकेकडे मागणीही केली होती. डीपीरोडचे आरक्षण असलेल्या ठिकाणी अनधिकृत झोपड्या वसल्या आहेत. अतिक्रमण निर्मूलन विभागाने निदान शेतात जाण्याइतपत तरी वाट करून द्यावी.

-हिरामण निमसे, शेतकरी, अंबड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजीवनी जाधवचे भोसलामध्ये जोरदार स्वागत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भोसला मिलिटरी कॉलेजची विद्यार्थिनी संजीवनी जाधव हिने तैवानच्या ताईपे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे. तिने यावेळी १० हजार मीटर पळण्याच्या स्पर्धेत ३३ मिनिटे २२ सेकंद स्वतःची सर्वोत्तम वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवले. नुकतेच तिचे नाशिकमध्ये आगमन झाले यावेळी भोसला मिलिटरी स्कुलच्यावतीने तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.

भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये संजीवनी जाधवचा रविवारी (दि. ३) सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंत बेडेकर, नाशिक विभागाचे सहकार्यवाह आशुतोष रहाळकर, कोषाध्यक्ष अतुल पाटणकर, भोसला मिलिटरी कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा. नितीन अहिरराव, नॅक संयोजक डॉ. प्रसन्ना सेठी, कार्यालय अधीक्षक रवींद्र वैद्य, ग्रंथपाल के. बिनू हे यावेळी उपस्थित होते.

नाशिकची पताका जगभरात फडकविणाऱ्या संजीवनी जाधवने पाच हजार मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकले. महिनाभरापूर्वी भुवनेश्वर येथे झालेल्या बाविसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या संजीवनी जाधवने पुन्हा आंतरराष्ट्रीय विजयाची परंपरा राखली आहे. कविता राऊतनंतर आशियाई स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणारी ती नाशिकची दुसरी धावपटू ठरली आहे. आंतरविद्यापीठ स्पर्धेत सलग तीन वर्षे पाच व दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या संजीवनी जाधवने गुंटूर येथे ५७ व्या राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. गेले १० वर्ष सतत ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा जिंकण्याचा मान भोसला मिलिटरी कॉलेजचा राहिला आहे. कविता राऊत, मोनिका आथरे, संजीवनी जाधव, आरती पाटील, किसन तडवी, ताई बामणे या भोसलाच्या विद्यार्थ्यांनी ही परंपरा राखली आहे.

कुलगुरूंच्या हस्ते बुधवारी सत्कार

संजीवनी जाधव, किसन तडवी, कांतीलाल कुंभार, शरयू पाटील व मार्गदर्शक विजेंद्र सिंग यांचा जाहीर सत्कार सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, डॉ. दीपक माने संचालक क्रीडा मंडळ पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, दि. ६ सप्टेंबर २०१७ रोजी भोसला मिलिटरी कॉलजेच्या मैदानावर ४ वाजता पार पडणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अंतर्गत येणाऱ्या कॉलेजचे सर्व प्राचार्य, क्रीडा संचालक व खेळाडू विद्यार्थी यास हजर राहणार आहेत, अशी माहिती भोसला मिलिटरी कॉलजेच्या प्राचार्या डॉ. सुचेता कोचरगावकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खादी अन् गांधी टोपीचा गणपती

0
0

देवकिसन सारडा, उद्योगपती

नाशिकमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून गणेशोत्सवाची परपंरा आहे. स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही गणेशोत्सवावर स्वातंत्र्य चळवळीचे प्रतिबिंब दिसायचे. गणपती आणि गणेशोत्सवातील देखावेसुद्धा स्वांतत्र्य चळवळीशी निगडितच असायचे. त्या काळी नाशिकरोडचा रेल्वे गणेशोत्सव मंडळाचा गणपती हा सर्वांत प्रसिद्ध गणपती होता. १९६५ पर्यंत हा गणपती उत्सव सुरू असावा. माजी खासदार बाळासाहेब देशमुख या गणेश मंडळाचे अध्यक्ष होते.

गणेशोत्सवाचे स्वरूप अत्यंत साधे असायचे, पण या काळात आयोजित केले जाणारे सांस्कृतिक कार्यक्रम जनतेसाठी पर्वणी असायची. या मंडळाच्या दहा दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये बहुधा गायनाचे व कधी कधी नाटकाचे कार्यक्रम होत. त्या काळात भावगीतगायन हा लोकप्रिय प्रकार होता. त्या वेळच्या नामांकित भावगीत गायक गजाननराव वाटवे, बबनराव नावडीकर, मालती पांडे, कालिंदी केसकर, माणिक दादरकर- वर्मा यांसारख्या नामवंत मंडळींचे कार्यक्रम या मंडळांकडून आयोजित केले जात. रेल्वे स्टेशनबाहेर साधा, पण मोठा मंडप उभारला जायचा. लोकवर्गणीतूनच सर्व कार्यक्रम पार पडत असत. देखावेही अत्यंत साधे अन् धार्मिक, सांस्कृतिक वा पौराणिक असत. आंदोलनाच्या काळात इतरत्र बऱ्याच ठिकाणी गणपती हा खादी कपडे घातलेला अन् गांधी टोपी परिधान केलेला असायचा. आम्ही सिन्नरहून दररोज रेल्वे गणेश मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी येत असू. पहाटे चार वाजेपर्यंत गायनाचे कार्यक्रम या ठिकाणी चालायचे. रेल्वेने त्या वेळी उतरणारे प्रवासीदेखील या मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेत असत. ‘गळ्याची शपथ तुला जीवलगा’ हे लोकप्रिय गावे ते माणिक बाईंनीच असे रसिक श्रोते म्हणत. आम्ही फार दर्दी नव्हतो. मात्र, हौस म्हणून दररोज या कार्यक्रमांना हजेरी लावत असू. बरेच सिन्नरकर खासगी वाहनांनी गणपती बघायला यायचे. नाशिकचे गणपती फारसे पाहिले नाहीत; पण मार्गात दिसणारे काही गणपती आम्ही जरूर बघायचो. कधी कधी आम्ही गणपती बघायला पुण्यालाही जात असू. त्या काळी गणपतीच्या मिरवणुकीला फारसे वाद्ये नसत. कुठेही बीभत्सपणा नसायचा.

गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होत असे. संपूर्ण कुटुंबे गणेशोत्सवात सहभागी व्हायची अन् कार्यक्रमांना उपस्थित राहायची. सांस्कृतिक कार्यक्रम भारतीय बैठकीवरच संपन्न होत. मात्र, आता गणेशोत्सवाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. गणेशोत्सव हा आचकट-विचकटपणाचासुद्धा कुठे कुठे झालेला. होणारे कार्यक्रम हे क्वचितच दर्जेदार असतात. गणेशोत्सवाच्या नावाखाली तथाकथित कार्यकर्त्यांच्या जेवणावळी, पत्त्यांचे डाव आणि दारूच्या पार्ट्यासुद्धा अनेक गणेश मांडवांत होत असतात, असेही ऐकतो. नागरिकांना त्रास देणारे असे गणेशोत्सवाचे स्वरूप हल्ली झाले आहे. डीजेचा ठणटणाट अन् सिनेमाच्या बीभत्स गाण्यांवर थिरकणारी तरुणाई बघून गणेशोत्सव आता नकोसा वाटतो. पूर्वी असा हिडीसपणा नसे. वर्गणी जबरदस्तीने न घेता लोक स्वतःहून देत असत. मात्र, आता गणेशोत्सवासाठी जबरदस्तीने पैसे गोळा केले जातात. त्यातूनच गणपतीसमोर धांगडधिंगा गाणी लावून तरुण दारू पिऊन स्वैर नाचत असतात. देखाव्यांना राजकीय स्वरूप आले आहे. त्यामुळे कुटुंबाने एकत्रपणे गणपती बघायला जावे असे आताच्या गणेशोत्सवाचे स्वरूप राहिलेले नाही. पूर्वी गणेशोत्सव हा समाजप्रबोधन आणि जनजागृती व एकोप्याचे माध्यम होते. दुर्दैवाने आताचा गणेशोत्सव हा धिंगाण्याच्या करमणुकीचे माध्यम बनले आहे. हे माझ्या पिढीतील मंडळींना नक्कीच नकोसे वाटते.

संकलन ः विनोद पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळाडूंसाठी लवकरच स्पोर्ट एक्सलन्स सेंटर

0
0

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरात खेळाडूंसाठी चांगले वातावरण असून, त्यासाठी सरकारनेदेखील पावले उचलली आहेत. शहरात असलेल्या विभागीय क्रीडा संकुलाचा वापर करून खेळाडूंसाठी लवकरच स्पोर्ट एक्सलन्स सेंटर सुरू करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. नाशिक डिस्ट्रीक्ट अॅथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने वर्षभर कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कारप्रसंगी ते बोलत होते. हा सत्कार समारंभ रविवारी (दि. ३) हॉटेल एसएसके येथे आयोजित करण्यात आला होता.

नाशिकमधील खेळाडूंचा सराव मी पाहत असून, त्यांनी अत्यंत मेहनतीने हे यश संपादित केले आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. ज्या प्रमाणात त्यांचा गौरव व्हायला हवा त्या प्रमाणात तो होत नाही, अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. नाशिकमधील खेळाडूंना नागरिकांनी प्रोत्साहन देणे गरजेचे असून, नाशिकमधील अनेक मोठ्या कंपन्यांनी या खेळाडूंच्या यशासाठी पुढे येणे गरजेचे आहे. शहरातील भौगोलिक वातावरण उत्तम आहे, त्याचा फायदा खेळाडूंना होत असतो. मात्र सरकारी पातळीवर फारसा प्रयत्न होताना दिसत नाही. याकरिता महाराष्ट्र सरकारने स्पोर्ट एक्सलन्स सेंटर सुरू करावे यासाठी मी वैयक्तिकरीत्या मदत करेन, असे जिल्हाधिकारी म्हणाले. त्याचप्रमाणे खेळाडूंना जी काही मदत लागेल ती मी अध्यक्ष या नात्याने करण्यास तत्पर आहे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात संजीवनी जाधव, रणजीत पटेल, दुर्गा देवरे, पुनम सोनवणे, ताई बामणे, किसन तडवी, कांतीलाल कुंभार, मोनिका अथरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

'खेळाडूंना सर्वतोपरी मदत देणार'

यावेळी आमदार सीमा हिरे यांनी या यशस्वी खेळाडूंचे मनापासून अभिनंदन करून नाशिकच्या वैभवात भर घालण्याचे काम या खेळाडूंनी केले आहे, असे सांगितले. कविता राऊतच्या प्रेरणेने जास्तीत जास्त खेळाडूंनी पुढे यावे त्याकरिता महाराष्ट्र सरकारतर्फे जी काही मदत लागेल ती मी देण्यास तयार असल्याचे त्या शेवटी म्हणाल्या. तर आमदार राहुल आहेर यांनी, या सर्व खेळाडूंनी अपार कष्ट करून नाशिकचे नाव देशात पोहचविण्याचे काम केल्याचे सांगत हे सरकार खेळाडूंच्या पाठीशी कायम असेल असे ते म्हणाले. आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या की, महाराष्ट्र सरकारने २०२० हे ऑलिम्पिकसाठी ध्येय ठेवले असून, त्यासाठी आतापासून आराखडा तयार केला आहे. हे खेळाडू म्हणजे नाशिक शहराला मिळालेली देणगी आहे. या सर्व खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी आतापासून शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

सरकारने खेळाडूंकडे लक्ष द्यावे

सत्काराला उत्तर देताना धावपटू मोनिका अथरे म्हणाली की, इतर देशांच्या तुलनेत भारतातील खेळाडूंना सापत्न वागणूक मिळते त्याकरता पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा येत्या २०२० ऑलिम्पिक मध्ये नाशिकमध्ये एकतरी पदक निश्चित येईल अशा ग्वाही देते. खेळाडूंचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग म्हणाले की, हरियाणामध्ये खेळाडू तयार करण्यासाठी लहानपणापासून तयारी केली जाते. सरकार त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे रहाते. मात्र महाराष्ट्रात तशी परिस्थितीत नाही. शहरातील खेळाडूंनी इतकी चांगली कामगिरी केली आहे. सरकारने जर देशातील खेळाडूंकडे लक्ष दिले तर अनेक पदके खेळाडू आणतील यात शंका नाही, असे ते म्हणाले. यावेळी अॅथेलेटिक्स क्षेत्रातील खेळाडू, संघटक क्रीडा संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणासाठी सरसावल्या सामाजिक संघटना

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदेचे प्रदूषण टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा पुढाकार गरजेचा आहे. गणेश विसर्जन सोहळ्यात मूर्ती व निर्माल्य दानासाठी सामाजिक संघटनांचा आधार घेऊन पर्यावरण जपावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री गणेश विसर्जन सोहळा अधिकाधिक पर्यावरणपूरक पध्दतीने व्हावा, यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि शहरातील पर्यावरणपूरक संघटनांच्या वतीने बैठक घेण्यात आली होती. यानुसार या उपक्रमात सहभागी सर्व संघटनांशी संपर्क साधून त्यांना श्री गणेश विसर्जन सोहळ्यात सहकार्य करावे, असे आवाहन ‘मटा’ च्या वतीने करण्यात आले आहे.

येथे करा मूर्ती अन् निर्माल्य दान

मूर्ती व निर्माल्य संकलन करणारी केंद्र आणि त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे : सुभाष बिडवई : (लक्ष्मीछाया मित्र मंडळ : पाथरवट लेन परिसर : पंचवटी, ९२२६०९६५७५, अविनाश वानलोडकर ९५४५९४४४९७), रोहन देशपांडे (राजसारथी फाऊंडेशन, जेलरोड ८००७७६५७७७), महेश महंकाळे (सरदार चौक मित्रमंडळ ट्रस्ट : ९८२२३२१३१३), अभिलाष नाळेगांवकर (रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ : ८६०००९९४६६), गणेश बर्वे (श्री. राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळ, बी. डी. भालेकर मैदान : ९८२२४९११०४), शंकरराव बर्वे : (श्री संत गाडगे महाराज सहकारी पतसंस्था, भद्रकाली फ्रूट कॉर्नर ९८५०८४१२३३), शुभम घुले (गुरूदत्त शैक्षणिक व सामाजिक ट्रस्ट, पंचवटी कारंजा ८६२६००५६५३), राहुल सोनवणे (अथर्व गणेश मंदिर, मोटवाणी रोड, ना. रोड ८००७७७४९६५) येथे संपर्क साधता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनींना मिळाल्या सायकली

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’ असा अनुभव देवळा तालुक्यातील मुली घेत असतानाच राजकीय पदाधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे धूळखात पडलेल्या देवळा पंचायत समितीच्या समाजकल्याण विभागाच्या सायकली संबंधित लाभार्थ्यांना मिळाल्या आहेत. जि. प. सदस्या नुतन आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थिनींना देण्यात आल्या.

देवळा पंचायत समितीच्या ११९ सायकली लाभार्थ्यांकडे जातीचे दाखले उपलब्ध नसल्याची सबब सांगून त्यांच्यासाठी आलेल्या सायकल धूळखात पडून होत्या. याबाबत जिल्हा परिषद सदस्या नूतन आहेर, पंचायत समितीच्या सभापती केसरबाई अहिरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आहेर यांनी स्टिंग ऑपरेशन करून सदरची बाब उजेडात आणली होती. शालेय विद्यार्थ्यांना शाळेतूनच जातीचे दाखले मिळण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर समाजकल्याण विभागाच्या वतीने लाभार्थ्यांना सायकली वाटप करण्यात आल्या. यावेळी गटविकास अधिकारी महेश पाटील, सुनील आहेर, कृष्णा अहिरे, पप्पू हिरे, शरद भदाणे, रिंकू पाटील आदींसह विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंग गडावर दरड कोसळली

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

श्री सप्तशृंग गड ते नांदुरी दरम्यानच्या रस्त्यावर गणेश घाटात रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास दरड कोसळली. या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. केवळ एका वाहनाचे नुकसान झाले. या वाहनाची मागील व पुढील काच फुटली. वाहनात बसलेले दाम्पत्य सुखरुप बाहेर निघाल्याने जीवितहानी टळली. अतिवृष्टीमुळे सप्तशृंग गड घाटात कोसळणाऱ्या दरडींमुळे भविष्यातील दुर्घटनांची अशीच शृंखला सुरू राहिली तर काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सप्तशृंग गड घाटात व मंदिर (डोंगर) परिसरात अधूनमधून दरडी कोसळत असतात. शासनाने मंदिर परिसरात संरक्षक जाळ्या बसविलेल्या असल्याने दोन महिन्यांपूर्वी मोठा अनर्थ टळला होता. एक अडीच टनाचा व तर दुसरा आठशे किलो वजनाचा असे दोन दगड मंदिर परिसरात बसवलेल्या जाळ्यांमध्ये अडकले होते. त्यावेळीही कुठलीही जीव‌ितहानी झाली नव्हती. मात्र हा प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे उर्वरित ठिकाणी दरड प्रतिबंधात्मक संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्यात, अशी मागणी वेळोवेळी झाली आहे. मात्र शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे हे काम रखडले आहे.

शनिवारी सप्तशृंग गडावर मुक्कामी असलेले पुणे येथील भाविक वसंत घाटगे हे सपत्नीक दर्शन करून रविवारी सकाळी परतत होते. घाटात सकाळी वाजेच्या सुमारास त्यांच्या कारच्या (एमएच-१२,५९३४) दोन्ही बाजूला दरड कोसळली. त्यात वाहनाचे मोठे नुकसान झाले. मात्र हे दाम्पत्य बालंबाल बचावले. काही क्षणात ते कारच्या बाहेर आले.

स्थानिकांनी केली मदत

घटनेचे वृत्त समजताच गडाचे माजी सरपंच संदीप बेनके, नाना सदगीर, पोल‌िस हवालदार सुनील मोरे, अशोक ब्राह्मणे, देवस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे व कर्मचारी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे किशोर केदार व भाविकांनी तत्काळ रस्त्यांवर असलेले दगड बाजूला केले. तासाभरात मदतकार्य करणाऱ्यांकडून रस्ता सुरळीत करण्यात आला. मदतकार्य करण्यासाठी पुढे येणाऱ्यांमध्ये अनेक भाविक, स्थानिक ग्रामस्थांनी चांगली भूमिका बजावली. दरम्यान, या घटनेमुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी ८.३० नंतर वाहतूक सुरळीत झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने सातत्याने पडणाऱ्या दरडींबाबत कायमस्वरूपीची प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी माजी सरपंच संदीप बेनके यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देव द्या, देवपण घ्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रीं ना निरोप देतेवेळी पर्यावरण रक्षणाचाही मंत्र जपला जावा, या उद्देशाने शहरातील विविध पर्यावरणप्रेमी सामाजिक संस्थांनी यंदाही पुढाकार घेतला आहे. गणेश मूर्ती संकलन, पर्यावरणपूरक मूर्तींचे विसर्जन, निर्माल्य संकलन, प्लास्ट‌िक प्रदूषण रोखण्यासाठीचे प्रयत्न आणि भाविकांचे पर्यावरण विषयक प्रबोधन अशा विविध आयामांवर या संस्था गणेश विसर्जन सोहळ्यात काम करित आहेत.

नाशिक पोलिस :

प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्तींची विसर्जनानंतर विटंबना टाळण्यासाठी अमोनिअम बायकॉर्बोनेट या पावडरचा वापर केला जातो. ही पावडर शहरातील किमान सहा पोलिस स्टेशनमध्ये मोफत वितरित करण्यात येणार आहे. या सुविधेचा नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले आहे.



पालवी फाऊंडेशन :

पालवी फाऊंडेशनने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने यंदा विघ्नहर्ता प्रकल्प हाती घेतला आहे. त्या अंतर्गत पर्यावरणाबाबत सजगता निर्माण करण्यासाठी शाळा-महाविद्यालयात लघुपटाचे प्रदर्शन, निबंध स्पर्धा आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पालवी फाऊंडेशनच्या डॉ. सुवर्णा पवार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आर. यू. पाटील यांनी दिली.


प्रयास फाऊंडेशन :

प्रयास संस्थेच्या वतीने दशरथ घाटावर मूर्ती व निर्माल्याचे संकलन केले जाणार आहे. सुमारे १५० सदस्यांची टीम यासाठी कार्यरत असेल. मूर्ती संकलन करून येथे स्वच्छतेला प्राधान्य दिले जाईल.


राजसारथी फाऊंडेशन :

या संस्थेतर्फे जेलरोड परिसरात दसक घाटावर प्रबोधन करण्यात येईल. मूर्ती व निर्माल्य संकलनासोबतच अमोनिअम बायकॉर्बोनेट या पावडरचे वितरण नागरिक व मंडळांना केले जात आहे. या केमिकलच्या सहाय्याने पीओपीची मूर्ती विरघळून त्यापासून खत तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. या सुविधेचा नागरीकांनी उपयोग करावा, असे आवाहन फाऊंडेशनचे रोहन देशपांडे यांनी केले आहे.


डे केअर स्कूल :

या शाळेच्या वतीने इंदिरानगर परिसरात पाच ठिकाणी मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्रांची व्यवस्था केली आहे. शाळेच्या समोरील परिसरासह कलानगर, रथचक्र सोसायटी परिसर आदी ठिकाणी केंद्र आहेत. याशिवाय प्लास्ट‌िक पिशव्यांचेही संकलन केले जाणार आहे. गत पाच वर्षांपासून विसर्जन सोहळ्यातील हा उपक्रम सुरू आहे.


जय बजरंग युवक मंडळ :

मंडळ आणि नवीन नाशिक परिसरातील नागरीकांच्या वतीने नुकतीच गोदा संवर्धन मोहीम राबविण्यात आली. विसर्जन सोहळ्यातही आता आयटीआय पूल आणि म्हसोबा महाराज मंदिर, उंटवाडी येथे मूर्ती, निर्माल्य व प्लास्ट‌िक संकलन केंद्र कार्यरत राहणार आहेत. नवीन नाशिक परिसरातील नागरिकांना सहकार्यासाठी अमित कुलकर्णी यांनी मंडळातर्फे आवाहन केले आहे.


काँग्रेस सेवा दल

निर्माल्य टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होणारा प्लास्ट‌िकचा वापर निसर्गासाठी हानीकारक आहे. यासाठी निर्माल्य संकलनाकरिता खास बनविलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप विविध गणेश मंडळे , शासकीय व खाजगी कार्यालये आणि नागरीकांमध्ये करण्यात आले. या निर्माल्याच्या पिशव्या संकलित करून मनपा गाडीत जमा करणार असल्याची माहिती दलाचे वसंत ठाकूर यांनी दिली.

निर्मल ग्राम केंद्र :

या संस्थेच्या वतीने यंदा नाशिककरांच्या प्रबोधनावर भर देण्यात आला आहे. निर्माल्याच्या नावाखाली सरळपणे फळे, वस्त्र, प्लास्ट‌िकच्या वस्तूही पाण्यात समर्पित होतात. एकेकाच्या हस्ते ही भर पडत गेल्यास हजारोंची संख्या नदीला संकटात पकडते. शक्यतो मूर्ती दान करा, निर्माल्य मनपाच्या निर्माल्य संकलन व्यवस्थेत जमा करा, याबाबत भाविकांचे प्रबोधन विसर्जन सोहळ्यात संस्था करणार आहे.

रूद्र प्रतिष्ठान :

नाशिकरोड परिसरातील रूद्र प्रतिष्ठान या मंडळाच्या वतीनेही मूर्ती व निर्माल्याचे संकलन केले जाईल. अमोनिअम बायकार्बोनेट पावडर नागरिकांना मंडळाच्या वतीने दिली जाईल. नागरिकांनी घरीच विसर्जन करावे याबाबतही प्रबोधन केले जाईल, अशी माहिती मंडळाचे प्रतिक वाजे यांनी दिली.


भुजबळ नॉलेज सिटी :

संस्थेच्या वतीने आठ वर्षांपासून निर्माल्य व मूर्ती संकलनाचे काम केले जाते. यंदाही चोपडा लॉन्स, घारपुरे घाट या परिसरात हा उपक्रम राबविला जाईल अशी माहिती प्राध्यापक चौबे यांनी दिली.

संवेदना फाऊंडेशन, हिरावाडी :

हिरावाडी, पंचवटी परिसरातील संवेदना फाऊंडेशनच्या वतीने गंगा घाटावरील म्हसोबा महाराज पटांगण येथे मूर्ती संकलन सुरू राहणार आहे. सुमारे ५० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नागरिकांचे मूर्ती संकलनासाठी प्रबोधन केले जाईल. मनपाच्या निर्माल्य व्यवस्थेत निर्माल्य अर्पण करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जाईल, अशी माहिती फाऊंडेशनचे अॅड. अजय निकम यांनी दिली.


विद्यार्थी कृती समिती :

संघटनेच्या वतीने ‘देव द्या, देवपण घ्या’, हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गोदेचे प्रदूषण होऊ नये यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा विसर्जन सोहळ्यात मूर्ती दान म्हणून समितीच्या वतीने स्वीकारल्या जातील. मूर्ती दान करू इच्छीणाऱ्यांनी ९४२१५६३५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा , असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहमार्गाला ब्रेक?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रेल्वे मंत्रिपदाच्या खातेबदलामुळे नाशिक जिल्ह्यातील दोन नव्या रेल्वेमार्गांच्या कामाचा वेग कमी होण्याची चिन्हे आहेत. सुरेश प्रभू यांच्या कारकीर्दीत या कामाला वेग मिळाला होता. पण, आता या बदलाचा फटका या कामाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक-पुणे व मनमाड-इंदूर या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गांच्या कामाला प्रभू यांच्या कारकीर्दीत गती मिळाली होती.

मावळते रेल्वेमंत्री प्रभू यांना राज्यातील बहुतांश जिल्ह्यांची खडानखडा माहिती होती. त्यामुळे त्यांनी अनेक निर्णय घेऊन राज्याचा फायदा करवून दिला. नाशिक-पुणे व मनमाड-इंदूर या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी महिनाभरापूर्वीच धुळे व नाशिक येथे दौराही केला होता. त्यामुळे सर्वांच्या आशाही उंचावल्या होत्या. पण, आता प्रभू यांच्या खातेबदलामुळे या कामावर परिणाम होण्याची धास्ती व्यक्त होत आहे. नवे रेल्वेमंत्री पीयूष गोयल मुंबईचे असले, तरी त्यांना रेल्वेचा कारभार समजून घेण्यातच बराच काळ जाणार असल्याने जिल्ह्यातील कामे पुन्हा रखडण्याची शक्यता वाढली आहे.

महाराष्ट्राला दीर्घ काळाने रेल्वेमंत्री मिळाल्यानंतर प्रभू यांनी आपल्या पदाचा वापर करून राज्यात रेल्वेच्या विविध कामांना मंजुरी देऊन गती दिली होती. पंधरा दिवसांपूर्वीच नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट मध्य रेल्वेने प्रशासकीय मान्यतेसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविलेला आहे. त्यात नाशिक-पुणे रेल्वे लाइनचा अंदाजित खर्च २४२५ कोटींवरून रुपयांवरून ४८६४.३६ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. त्यामुळे प्रभू यांना हा विषय व महत्त्व माहिती होते आणि ते त्याला चांगली गती देऊ शकले असते, असे मत व्यक्त होत आहे.

---

...तर मिळाली असती गती

नाशिक-पुणे व मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. या लोहमार्गांसाठी यापूर्वी अनेक वेळा सर्वेक्षणदेखील करण्यात आलेले आहे. पण, आता नाशिक-पुणे मार्गाच्या नव्याने केलेल्या सर्वेक्षणानंतर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात आला, तर मनमाड-इंदूर मार्गाचे डीपीआर सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे हे काम सुरेश प्रभू रेल्वेमंत्री कायम राहिले असते, तर अधिक गतीने होऊ शकले असते, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशदर्शनाचा ‘सुपरसंडे’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सव अंत‌िम टप्प्यात येत असताना शहरातील रस्ते गर्दीने फुलले असून, शनिवारी व रविवारी सुट्टीचा दिवस साधत नाशिककरांनी गणपती पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. शहरातील मेनरोड, शालिमार परिसर, जुन्या नाशिकमध्ये तर अफाट जनसागर लोटला होता.

पाऊस थांबल्याने नागरिकांनी शहरात गणपती पाहण्यासाठी तोबा गर्दी केली. एरवी, पावसाच्या काळात सामसूम असलेले रस्ते रविवारी ओसंडून वाहत होते. शहराचा मध्यवस्ती भाग समजला जाणाऱ्या शालिमार परिसरात ग्रामीण भागातूनदेखील भाविक देखावे पाहण्यासाठी आले होते. आपल्या बच्चे मंडळींना खांद्यावर घेऊन देखाव्यांचा आनंद घेत होते. शालिमार परिसरात गणेश मंडळांची संख्या जास्त असल्याने येथे नागरिकांचा ओघ जास्त होता. त्यामुळे शालिमार ते सीबीएस येथील वाहतूक धिम्यागतीने पुढे सरकत होती. गर्दी जास्त असल्याने पोलिसांनी खडकाळी सिग्नल ते शालिमार व बी. डी. भालेकर शाळेच्या ग्राऊंडपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्याने टू व्हीलरवरुन देखावे बघणाऱ्यांची निराशा झाली. अनेकांना गाडी पार्क करण्यासाठी जागेचा शोध घ्यावा लागत होता. त्याचप्रमाणे शालिमार ते महात्मा गांधीरोड सिग्नल परिसरातही गर्दीने उच्चांक मोडला होता. चांदवडकर गल्लीकडून येणारी वाहने व रेडक्रॉसकडून येणारी वाहने नेहमीपेक्षा जास्त असल्याने पोलिसांना कंट्रोल करणे अवघड झाले होते. महाबळ चौक ते शालिमार हा रस्ताही संध्याकाळनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्याचप्रमाणे यशवंत व्यायाम शाळा ते मेहेर सिग्नल या परिसरात अस्ताव्यस्त लावलेली वाहने वाहतुकीला अडथळा ठरत होती. मेहेर ते अशोकस्तंभ या मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची संख्या अपुरी असल्याने मुंगीच्या गतीने वाहने पुढे सरकत होती. नवीन तांबट गल्लीत अरुंद रस्त्याने गर्दीत भर पडत होती. शनीगल्ली, गाडगीळ गल्ली या ठिकाणीही मोठी गर्दी होती. रविवार कारंजावरील चांदीच्या गणपतीजवळही गर्दीचा महापूर होता. नागरिक लांबून देखावे पाहण्यासाठी येत होते. रविवार कारंजा ते महाबळ चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्याचप्रमाणे मेनरोड, जुने नाशिक, पंचवटी परिसरातही नागरिक देखावे पाहण्यासाठी फिरत होते.


ज‌िवंत देखावे पाहण्यासाठी गर्दी

गणेशोत्सवात ज‌िवंत देखावे सादर करण्यावरही भर दिला जातो. यंदाही शहराच्या विविध भागात देखावे सादर करण्यात कलाकार तल्लीन झालेले दिसत आहेत. सोमवार पेठेतील वेलकम सहकार्य मित्र मंडळाने मदनलाल धिंग्रा यांनी इंग्रजांशी कशा प्रकारे लढा दिला, याचा देखावा सादर केला आहे. यात मंडळाचेच कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या देखाव्यामुळे स्वातंत्र्य चळवळ कशी बहरत गेली व स्वातंत्र्य संग्रामातील लढवय्यांनी इंग्रजांशी कशी टक्कर दिली हे दाखवण्यात आले आहे.

गणेशोत्सवात लोककला

राजेबहाद्दर मित्र मंडळाने महाराष्ट्रातील लोककलांचे सादरीकरण केले आहे. यात गोंधळ, लावणी इत्यादी प्रकार सादर केले जात आहेत. बीडी भालेकर येथे एचएएल कामगार मित्र मंडळाने स्त्री पुरुष समानता या विषयावर देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी दूरवरुन भाविक येत आहेत. जुनी तांबट लेन येथील मित्र मंडळाने विविध सामाजिक विषय हाताळले आहेत. नागरिकांनी स्वच्छता कशी राखावी, आरोग्य कसे सांभाळावे, गुन्हेगारी थांबविण्यासाठी काय करावे आदी विषयांवर होर्डिंगच्या माध्यमातून जागृती करण्यात आली आहे. भद्रकाली येथील धनगर मित्र मंडळाच्या वतीने ‘व्यथा शेतकऱ्यांच्या’ हा देखावा सादर केला आहे. यात परिस्थितीशी सामना करीत शेतकऱ्यांनी कशा प्रकारे जीवन जगावे हे त्यात दाखवण्यात आले आहे.

खाद्य पदार्थांचे स्टॉल

नागरिकांची गर्दी लक्षात घेता रस्त्यावर अनेक ठिकाणी खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यात आईस्क्रिम, मक्याची कणसे, कुल्फी या स्टॉल्सवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच लहान मुलांसाठी फुगे, खेळणी याच्याही स्टॉल्सवर गर्दी पहायला मिळत आहे.

हॉटेल्स फुल्ल

गणेशोत्सवाच्या काळात शहरात असलेली सर्वच हॉटेल्स फुल्ल असलेली पहायला मिळत आहेत. गणपती पाहण्याच्या उद्देशाने बाहेर पडलेली मंडळी हॉटेलमध्येच जेवण करणे पसंत करतात. त्यामुळे पंचवटी रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, सीबीएस परिसरातील सर्व हॉटेल्समध्ये वेट‌िंग पहायला मिळाली.

विक्रेत्यांकडून गर्दी ‘कॅश’

उत्सवातील उच्चांकी गर्दी कॅश करण्यासाठी विक्रेत्यांनीही त्या पुरेपूर लाभ करून घेतला. मोठ्या शॉपिंग सेंटर्सपासून ते रस्त्यावरील विक्रेत्यांनीही जोरदार सेल लावत गल्ला वाढवला. कपड्यांपासून ते घरगुती वस्तूंपर्यंत विविध वस्तूंचे सेल लागले होते.

सिडकोतील रस्ते फुलले

सिडको ः सिडको व इंदिरानगर भागातील रस्ते या भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. सिडको व इंदिरानगर भागात दरवर्षी यंदाही शेकडो गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला आहे. आकर्षक देखाव्यांबरोबरच विविध प्रकारची खेळणी किंवा यात्रेचे स्वरुप देऊन नागरिकांना आकर्षित करण्याचे विविध प्रयत्न या मंडळांनी केल्याचे दिसत आहे. सिडकोतील शुभम पार्क येथे असलेला कुंभकर्णाचा देखावा तर सावतानगर येथे श्री साई समर्थ ज्येष्ठ नागरिक व युवक मंडळाने उभारलेला देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. राणेनगर येथे उभारण्यात आलेला महालाचा देखावा हा सर्वांचे आकर्षण ठरल्याचे दिसत आहे. रविवारचे औचित्य साधून अनेक मंडळांनी सत्यनारायण पूजेचे आयोजन केल्याचे दिसत होते. राजीवनगर येथे युनिक ग्रुपच्यावतीने महिलांनी सामूहिक अर्थवशीर्ष पठण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अथर्वशीर्ष पठणाने अवतरले चैतन्य

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नऊवारी साडी, नाकात नथ अन् विविध प्रकारचे दागिने परिधान केलेल्या महिलांनी एकसुरात केलेल्या अथर्वशीर्ष पठणाने भद्रकाली परिसरात चैतन्य पसरले होत. ठेवा संस्कृतीचा आणि भद्रकाली कारंजा मित्रमंडळ ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात गणरायाची आराधना करण्यासाठी शहरातील विविध भागातून महिलांना एकत्रित करून हा अनोखा उपक्रम घेण्यात आला.

भद्रकाली येथील साक्षी गणपती मंदिराच्या आवारात शहर परिसरातून पाचशेपेक्षा जास्त महिलांनी अथर्वशीर्ष पठणात सहभाग नोंदविला. त्यांच्यासह पडसाद कर्णबधिर विद्यालयातील २० विद्यार्थिनीही यात सहभागी झाल्या. राणी भवन येथील महिला पुरोहितांनीही अथर्वशीर्ष पठण केले. प्रारंभी शिवनाद ढोलपथकाचे ढोलवादन आणि ध्वज मिरविण्याचा कार्यक्रम झाला. अथर्वशीर्ष पठणास महिलांनी प्रारंभ करताच रिमझिम पावसाच्या सरींनी हजेरी लावली. या सरी झेलत अथर्वशीर्ष पठण सुरू होते. अभिनेत्री विद्या करंजीकर, नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

ठेवा संस्कृतीचा संस्थेच्या संस्थापिका पल्लवी पटवर्धन, वैशाली साठे, गायत्री बेळगे, सोहा लाळे, गीतांजली आव्हाड, मनाली गार्गी, वैशाली शुक्ल, सुचिता सौंदाणकर, सायली सप्रे, त्रिवेणी सानप, हेमा जोशी, अनघा धोडपकर आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी सज्ज सारे

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले आहेत. मिरवणुकीनंतर आता गणेश विसर्जनसाठीची सज्जता महापालिकेने केली असून, शहरात सहा विभागांत २८ कृत्रिम तलाव तयार केले जाणार आहेत. तसेच, गोदावरी व तिच्या उपनद्यांमध्ये गणेश विसर्जनासाठी सहा विभागांत २६ नैसर्गिक ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

शहरातून दरवर्षी दोन लाखांच्या आसपास लहान मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. अकरा दिवस पूजाअर्चा झाल्यानंतर या मूर्ती गोदावरी, वाघाडी, वालदेवी, दारणा, तसेच नासर्डी या प्रमुख नद्यांमध्ये विसर्जित केल्या जातात. प्रतिष्ठापना केलेल्या अनेक मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) बनवलेल्या असल्याने त्या पाण्यात लागलीच विरघळत नाही. विर्सजनानंतर मूर्तींची विटंबना होते. सोबत नदी व पर्यावरणाचे प्रदूषण होते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने दरवर्षी मूर्तीदान कार्यक्रमासह गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले जातात. महापालिकेच्या सकारात्मक प्रतिसादामुळे दरवर्षी हजारो मूर्तींचे संकलन करण्यात येते. तसेच, नद्यांमधील प्रदूषण रोखण्यात महापालिकेला यश मिळते. गेल्या वर्षी कृत्रिम तलावांना मोठा प्रतिसाद लाभल्याने यंदा महापालिकेने २८ कृत्रिम तलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पारंपरिक गणेश विसर्जनासाठी नदीकाठावर २६ ठिकाणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. पालिकेच्या वतीने यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जाणार असून, गणेशभक्तांनी मूर्तिदान करून प्रदूषणमुक्तीच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कृत्रिम तलावांची ठिकाणे

नाशिक पूर्व : रामदास स्वामी मठाजवळ, रामदास स्वामीनगर बसस्टॉप, शिवाजीवाडी पूल (नंदिनी नदीलगत), कलानगर चौक, राजीवनगर शारदा शाळेजवळ, साईनाथनगर चौफुली.

नाशिक पश्चिम : चोपडा लॉन्स, लायन्स क्लब पंडित कॉलनी, चव्हाण कॉलनी, फॉरेस्ट नर्सरी, महात्मानगर जलकुंभ, येवलेकर मळा, दोंदे पूल म्हसोबा मंदिराजवळ, पालिका बाजार.

सातपूर : सोमेश्वर मंदिर गंगापूर रोड, पाइपलाइनरोड, अशोकनगर, शिवाजीनगर.

सिडको : डे केअर स्कूल, राजे संभाजी स्टेडियम, जिजाऊ वाचनालय, पवननगर स्टेडियम.

पंचवटी : पेठ रोड आरटीओ कॉर्नर, दत्त चौक गोरक्षानगर, कोणार्कनगर.

नाशिकरोड : महापालिका शाळा क्रमांक १२३, जेतवननगर, जय भवानीरोड, नारायणबापू चौक, चेहेडी ट्रक टर्मनिन्स.

नैसर्गिक ठिकाणे

नाशिक पूर्व : शीतळादेवी मंदिर, टाळकुटेश्वर घाट, लक्ष्मीनारायण पूल, टाकळी संगम पूल.

नाशिक पश्चिम : यशवंत महाराज पंटागण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटागंण, घारपुरे घाट, हनुमान घाट.

पंचवटी : रामवाडी चिंचबन गोदापार्क, म्हसरूळ सीता सरोवर, राजमाता मंगल कार्याल, नांदूर मानूर गोदावरील पूल, तपोवन, कपीला संगम, रामकुंड परिसर.

नाशिकरोड : चेहडी दारणा घाट, वालदेवी नदी विहीतगाव, देवळाली गाव, वडनेर गाव पंपिंग स्टेशन, दसक घाट, दसक जेलरोड.

सातपूर : मते लॉन्स गंगापूररोड, आनंदवल्ली गावाजवळ, सोमेश्वर धबधबा, नासर्डी नदी (पपया नर्सरीजवळ), गणेश घाट औंदुबरचौक.

नवीन नाशिक : वालदेवी नदीघाट.

मनपातर्फे सहा टन मोफत बेकिंग सोडा

महापालिकेकडून यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर देण्यात आला आहे. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यासोबतच पीओपीच्या गणेश मूर्तीपासून होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेट (बेकिंग सोडा) चे मोफत वितरण केले जाणार आहे. महापालिकेने आरसीएफकडून सहा टन अमोनियम बायकार्बोनेट मागविले असून, नागरिकांना मोफत दिले जाणार आहे. पालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांमधून हे अमोनियम बायकार्बोनेट घेऊन जावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

सीसीटीव्हीची नजर

दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक गणेश मंडळांच्या पारंपरिक विसर्जन मिरवणूक मार्गावर तात्पुरत्या स्वरुपात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. विसर्जन मिरवणुकीवर १४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. वाकडी बारव, दूधबाजार, गाडगे महाराज पुतळा, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड येथे व विसर्जनस्थळी चारही बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यांचे नियंत्रण भद्रकाली व पंचवटी पोलिस ठाण्यात ठेवण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही लावले जातात. मिरवणुकीचे पोलिसांकडूनही चित्रीकरणही केले जाणार आहे. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नजर राहणार नाही, अशा शहरातील अन्य भागांमध्ये पोलिसांकडूनच व्हिडीओ शूटिंग केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदायचे नाही? खावटीही नाही!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पत्नीने पतीचा स्वतःहून त्याग केला, तसेच नांदण्यासाठी येण्यास वेळोवेळी नकार दिला, या दोन प्रमुख कारणांवरून शहादा कोर्टाने पत्नीचा खावटीचा अर्ज रद्द केला आहे. कोर्टाचा हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात असून, पुरुष हक्क संरक्षण समितीने कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, की नाशिकमध्ये राहणाऱ्या आणि एका विद्यापीठात काम करणाऱ्या विनय (नाव बदललेले आहे.) यांचा विवाह २०१२ मध्ये शहादा येथील मीना (नाव बदललेले आहे.) हिच्याशी झाला होता. विवाहानंतर मीना सासरी म्हणजे नाशिकला आली. मीनाचे उच्चशिक्षण पूर्ण व्हावे म्हणून विनयने तिचे एका कॉलेजमध्ये अॅडमिशन करून दिले. मात्र, शहरात राहण्याची सवय नसल्याने मीनाचे मन रमलेच नाही. कोणतेही ठोस कारण नसताना ती माहेरी निघून गेली. अनेकदा मध्यस्थी करूनही ती परतलीच नाही.

दरम्यान, यासंदर्भात विनयने पुरुष हक्क संरक्षण समितीचे सचिव धर्मेंद्र चव्हाण यांच्याकडे कैफियत मांडली. अॅड. चव्हाण यांनी दोन वेळेस शहादा येथे राहणाऱ्या मीनाला नांदण्यास येण्याबाबत नोटिसा पाठविल्या. मात्र, तरीही मीना आली नाही. या प्रकरणी कौटुंबिक न्यायालयातदेखील विनयने दाद मागितली. दरम्यान, या कालावधीत मीनाने शहादा येथील एम. बी. सोनटक्के यांच्या कोर्टात खावटीसाठी अर्ज सादर केला. सुनावणीवेळी अॅड. चव्हाण यांनी विनयची कोणतीही चूक नसल्याची बाजू मांडली. विनय मीनाला नांदवायला तयार असून, ती येण्यास तयार नसल्याचा मुद्दा अॅड. चव्हाण यांनी कोर्टासमोर मांडला. तसे पुरावे समोर आल्याने कोर्टाने मीनाचा खावटीचा अर्ज रद्द केला. याबाबत बोलताना चव्हाण यांनी सांगितले, की कौटुंबिक वादात बहुतांश वेळी अवलंबित असलेल्या महिलेला आर्थिक मदत म्हणून खावटी मिळते. एखाद्या प्रकरणातच महिलेचा अर्ज रद्द होतो. त्यामुळे या निकालास महत्त्व अाहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीनंतर ४० सिटीबस बंद होणार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तोट्यात चालेल्या सिटीबसच्या अनेक फेऱ्या रद्द केल्यानंतर आता दिवाळीनंतर पुन्हा ४० बसेस कमी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असून, तसे संकेत दिले आहेत. याअगोदरच एसटीच्या २२५ बसेस शहरातून धावत होत्या. त्यानंतर त्यात टप्प्याटप्प्याने कपात केल्यामुळे त्यांची संख्या आता १४५ झाली आहे. त्यातून या ४० बसेस आता कमी केल्या जाणार आहेत.

सिटीबस शहरातील रस्त्यांवर तीन शिफ्टमध्ये धावत असतात. सकाळच्या शिफ्टमध्ये १४५ बसेस असतात तर दुपारच्या शिफ्टमध्ये १२० व रात्री अवघ्या ३५ बसेस असतात. त्यातील काही बस बंद असल्यामुळे दररोज या बसेसचा आकडाही बदलत असतो. एसटीच्या या निर्णयामुळे पुन्हा अनेक मार्गांवरील बस बंद होणार आहेत. सिटीबसमुळे एसटीला गेल्या पाच वर्षांत १०८ कोटी रुपयांचा तोटा झाला. या आर्थिक वर्षातही १७ कोटी ७९ लाख ६२ हजारांचा फटका बसला. त्यामुळे हा आकडा आता १२५ कोटींपर्यंत गेला आहे. यावर्षी सिटी बसच्या माध्यमातून एसटीला ६५ कोटी ११ लाख ५५ हजार रुपये उत्पन्न मिळाले, तर खर्च ८२ कोटी ३१ लाख ४४ हजार झालेला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने या बस महानगरपालिकेने ताब्यात घ्याव्यात, असे पत्र पाठवले. पण, त्यातून प्रतिसाद न मिळाल्यामुळे एसटीने टप्प्याटप्प्याने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकबरोबरच राज्यातील सहा शहरांत अशाच पद्धतीने ही सेवा बंद केली जाणार आहे.

सिटीबस सेवेचा वर्षभरात ५ कोटींहून अधिक प्रवासी लाभ घेतात. २४ तास सेवा देणारी ही सिटी बस शहरातील ५०८ मार्गांवरून धावत होती. पण आता अनेक मार्ग बंद करण्यात आले आहे. ट्राम ते सिटीबस असा प्रवास करीत एसटीने १९७५ साली आपली सेवा सुदृढ केली. त्यानंतर गेल्या काही वर्षांत एसटीचा तोटा वाढू लागल्यामुळे ही सेवा बंद करणे हेच एसटीच्या हाती असल्यामुळे त्यांनी टप्प्याटप्प्याने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अमंलबजावणी सुरू केली आहे.

लोकप्रतिनिधींची उदास‌िनता

सिटीबस सेवा बंद होत असताना लोकप्रतिनिधी मात्र याबाबत उदास‌ीन आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालक यांचा संताप वाढला आहे. अनेक मार्ग बंद केल्यामुळे चाकरमान्यांचे हाल सुरू आहेत. या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असताना याबद्दल कोणी ब्र काढत नसल्यामुळे या विषयावरुन नाराजी वाढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात मिरवणुकीवर सीसीटीव्हीचे लक्ष

0
0

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस दलाची काय सज्जता आहे?

गणेशोत्सव, तसेच ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आपली सज्जता ठेवली असून, त्यात वाढ करण्यात आली आहे. तालुकानिहाय बंदोबस्त तैनात असून, मिरवणूक मार्गांवर जवळपास २०० सीसीटीव्ही बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शनिवारपर्यंत १६२ सीसीटीव्ही बसवण्यात आले असून, उर्वरित काम दोन दिवसांत पूर्ण होईल. मालेगावमध्ये महापालिका, तसेच पोलिसांनी मिळून सीसीटीव्ही यंत्रणा उभी केली आहे. याव्यतिरिक्त सिन्नर, येवला, चांदवड, निफाड, कळवण, इगतपुरी, सटाणा अशा वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये व्यापारी संघ, स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच स्थानिक पोलिस स्टेशन यांच्यामार्फत काम सुरू आहे.

बंदोबस्त कसा असेल?

ग्रामीण पोलिसांनी गणेशोत्सव आणि २ सप्टेंबर रोजी झालेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ४० पोलिस स्टेशन हद्दीत, तसेच आठ विभागीय स्तर आणि मालेगाव शहरासाठी विशेष बंदोबस्ताचे नियोजन केले. अधीक्षक, दोन अप्पर अधीक्षक, नऊ उपअधीक्षक, ५० पोलिस निरीक्षक, १२० उपनिरीक्षक, तसेच २,६०० पोलिस कर्मचारी असा फौजफाटा बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आला. या बंदोबस्तासाठी बाहेरच्या जिह्यातील दोन उपअधीक्षक, पाच निरीक्षक, दोन एसआरपीएफच्या तुकड्या व १,४०० होमगार्डसना पाचारण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे व राष्ट्रपुरुषांचे पुतळे या ठिकाणी फिक्स पॉइंट नेमण्यात आले आहेत. या काळातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सहा दंगानियंत्रण पथके, दोन शीघ्र कृती दल, एक वज्र व वरुण वाहन सतर्क ठेवण्यात आले आहे. पोलिस स्टेशननिहाय गुड मॉर्निंग स्कॉड व गोपनीय यंत्रणेचे काम सुरू आहे. गणेशोत्सव आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी ४,०२३ नागरिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गेल्या वर्षी, तसेच त्यापूर्वी ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल आहेत आणि समाजविघातक कृत्य करणारे समाजकंटक, सराईत व अभिलेखावरील गुन्हेगारांचा यात समावेश आहे, त्यांच्यावर फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १०७, १०९, ११०, १४९ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

‘एक गाव एक गणपती’ योजनेस प्रतिसाद कसा लाभला?

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंदा एक गाव एक गणपती या योजनेस नागरिकांनी चांगला प्रतिसाद नोंदवला. ज्या गावांमध्ये ही योजना राबवली तिथे किरकोळ वाददेखील झालेले नाहीत. अशा गणेश मंडळांचा सत्कार करण्यात येईल. ही योजना जिल्ह्यातील छोट्या, तसेच मोठ्या शहरांत यशस्वी करण्यासाठी मोठा प्रयत्न झाला.

ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना राबवल्या जात आहेत?

ध्वनिप्रदूषणासह जलप्रदूषण रोखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. ध्वनिप्रदूषणाबाबत कोर्टाने मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली असून, त्याची अंमलबजावणी कोणत्याही परिस्थितीत केली जाईल. ध्वनिप्रदूषणाचे तोटे दाखवणारा एक व्हिडीओदेखील आम्ही तयार केला असून, तो दाखवला जात आहे. या संबंधी जिल्ह्यातील सर्वच गणेश मंडळांपर्यंत पोलिस पोहोचले आहेत. स्थानिक पोलिस स्टेशनला कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांच्या प्रबोधनानंतर अनेक मंडळांनी कर्णकर्कश डॉल्बी साउंडला तिलांजली देण्याचा निर्णय घेतला आहे. जी मंडळे कायद्याचा मान राखणार नाही, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन’वर मिळणार मोफत लस

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वाइन फ्लू आजारावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करावी. स्वाइन फ्लू नियंत्रणात आणण्यासाठी सीएसआर निधीतून सर्व शासकीय रुग्णालयांत प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

शासकीय विश्रामगृहात शनिवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते. या वेळी महाजन म्हणाले, की जिल्ह्यात यंदा स्वाइन फ्लूमुळे ४६ मृत्यू झाले आहेत आणि ३११ रुग्णांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. आजार नियंत्रणात आणण्यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा महापालिका स्तरावर घेण्यात यावी, स्वाइन फ्लूची सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनीदेखील जवळच्या शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा महापालिका रुग्णालयात तपासणी करून घ्यावी आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील गर्भवतींना स्वाइन फ्लूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्याने त्यांना स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस जिल्हा नियोजनच्या माध्यमातून देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

१० सप्टेंबरपर्यंत लस होणार उपलब्ध

स्वच्छतेमुळे आजारासाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करावे. नाशिक शहरात युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले. कुंभमेळ्यात करण्यात आलेल्या स्वच्छता व्यवस्थेच्या धर्तीवर स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. सीएसआरमधून प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री प्रयत्न करणार असून, १० सप्टेंबरपर्यंत कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बैठकीस आरोग्य विभाग आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. महाजन यांनी पोलिस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात १० पासून सीटूचे साहित्य संमेलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू)तर्फे पहिले राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलन १०, ११ सप्टेंबर रोजी जालना येथे होणार आहे. संमेलनाचे उद््घाटन ज्येष्ठ साहित्यिक तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते होणार आहे. प्रसिद्ध विचारवंत इतिहासतज्ज्ञ डॉ. आ. ह. साळुंखे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. संमेलाच्या समारोप कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार लेखक पी. साईनाथ, विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे प्रमुख पाहुणे असतील.

श्रमिक साहित्य संमेलनात दोन दिवस विविध विषयांवर तीन परिसंवाद, कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथ सन्मान मिरवणूक, विशेष गौरव यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत डहाके, ज्येष्ठ कांदबरीकार दीनानाथ मनोहर, ज्येष्ठ पत्रकार लेखक महावीर जोंधळे उपस्थित राहतील. सोमवार, ११ सप्टेंबर रोजी संमेलन समारोपात ‘श्रमिक संस्कृतीपुढील आव्हाने’ या विषयावर सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष परिसंवाद होईल. यात ज्येष्ठ पत्रकार लेखक पी. साईनाथ, लेखक विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, शेतमजूर युनियन महाराष्ट्राचे संस्थापक कुमार शिराळकर यांचा सहभाग राहणार आहे. राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, माकप नेते श्रीधर देशपांडे यांनी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट सरपंच निवडणुकीसाठी भाजपने बनविले पॅनल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या १७३ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचाच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. या निवडणुकीत थेट पॅनल उभे करून ग्रामीण भागात पाया भक्कम करण्यासाठी निवडणुका लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

या निवडणुकीसाठी पक्षाचे चिन्ह नसले तरी पक्षाला फारशी अडचण येणार नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. थेट सरपंचासाठी सर्वमान्य उमेदवार देण्याची व्यूहरचना आखली असून, त्याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजपने आपले उमेदवार उभे केले. पण त्यांना महापालिका वगळता इतर ठिकाणी फारसे यश मिळालेले नसले तरी या निवडणुकानिमित्ताने भाजपला यश मिळाले आहे. त्यामुळे भाजपने आपले बस्तान आता ग्रामीणमध्ये वाढवण्यासाठी थेट सरपंच निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली आहे. ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी कार्यकर्त्यांसह ग्रामीण भागातील आपले दौरे सुरू केले आहेत.

एकीकडे भाजपनेे या निवडणुका गांभीर्याने घेतल्या आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेने आपली ताकद पणाला लावत या निवडणुकीत आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसनेही या निवडणुकीत ज्या ठिकाणी आपले वर्चस्व आहे. तेथे लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.

ग्रामपंचायतीच्या जिल्ह्यातील सर्वच निवडणुका भाजप पॅनल तयार करुन लढवणार आहे. त्यासाठी दौरे व चाचपणीही सुरू केली आहे. थेट सरपंचासाठी सर्व समावेश उमेदवार आम्ही देणार आहोत. जास्तीत जास्त थेट सरपंच निवडून आणणे हे आमचे लक्ष्य असून, भाजप सदस्यांची संख्या वाढविणे हे देखील लक्ष आहे.

-दादा जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतूक मार्गांत बदल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंगळवारी (दि.५) सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत शहरातील काही ठिकाणावरील मिरवणूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. विशेषतः जुने नाशिक, पंचवटी, नाशिकरोड आणि गंगापूर या ठिकाणी हा परिणाम दिसून येईल.

असा असेल मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग

वाकडी बारव (चौक मंडई) येथून जहांगिर मशिद - दादासाहेब फाळके रोड - फुले मार्केट - बादशाही लॉज कॉर्नर - विजयानंद थिएटर - गाडगेमहाराज पुतळा - गो. ह. देशपांडे पथ - धुमाळ पॉइंट - सांगली बँक सिग्नल - महात्मा गांधी रोड - मेहेर सिग्नल - स्वामी विवेकानंद रोड - अशोकस्तंभ - नवीन तांबट आळी - रविवार कारंजा - होळकर पूल - मालेगाव स्टॅण्ड - पंचवटी कारंजा - मालवीय चौक - परशुराम पुरिया रोड - कपालेश्वर मंदिर - भाजीबाजार - म्हसोबा पटांगणावरून विसर्जन ठिकाण.

शहरातील पर्यायी वाहतूक व्यवस्था

या कालावधीत निमाणी बसस्थानकातून पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या सर्व बसेस पंचवटी डेपोतून सुटतील. ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या बसेस व इतर सर्व प्रकारची वाहने ही आडगाव नाका, कन्नमवार पूल व पुढे द्वारका सर्कलकडून नाशिकरोड, नाशिक शहर व इतर ठिकाणी जातील. दरम्यान, पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने द्वारका सर्कल कन्नमवार पुलावरून जातील. रविवार कारंजा व अशोकस्तंभ येथून सुटणाऱ्या बसेस शालिमार येथून सुटतील व त्याच मार्गाने ये-जा करतील.

नाशिकरोड गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग

नाशिकरोडला बिटको चौकातून मिरवणुकीस सुरुवात होईल. बिटको चौकातून सुरू झालेली मिरवणूक शिवाजी महाराज पुतळा - देवी चौक - रेल्वेस्टेशन पोलिस चौकी - सुभाषरोड - सत्कार पॉईंट - देवळालीगाव गांधी पुतळा - खोडदे किराणा दुकान ते वालदेवी नदी देवळालीगावपर्यंत जाणार आहे.

वाहतुकीतील बदल

पंचवटी डेपो, निमाणी बस स्टॅण्ड, महामार्ग, सिडको इत्यादी विभागांतून नाशिकरोड रेल्वेस्टेशन येथे जाणाऱ्या राज्य परिवहन विभागाच्या बसेस दत्तमंदिर सिग्नलपर्यंत जातील व तेथूनच परत येतील. सिन्नरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसेस व इतर वाहने उड्डाणपुलावरून ये-जा करतील.

गंगापूर पोलिस ठाणे (आनंदवली नदीपात्र)

आनंदवली नदीपात्रात विसर्जनासाठी गर्दी होते. यासाठी चांदशीगाव ते आनंदवली नदीपात्र आणि आनंदवली नदीपात्र ते चांदशी गावापर्यंतचा मार्ग दोन्ही बाजूने (मिरवणुकीतील वाहने वगळून) दुपारी चार वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिककडे येणाऱ्या व नाशिकहून चांदशीकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी आनंदवली पुलाकडे न जाता चांदशीगावरोडने नाशिक तट कालवा येथून उजव्या बाजूने वळून कालव्यामार्गे मखमलाबाद रोडने लागून रामवाडीमार्गे अशोकस्तंभ ते गंगापूररोड अशी ये-जा करावी.

जेलरोड विभाग

नांदूर नाका ते सैलानीबाबा चौक हा मार्ग दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी (मिरवणुकीतील वाहने वगळून) दुपारी चार वाजेपासून ते मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात नाशिकरोड विभागातील नांदूर नाका ते सैलानीबाबा चौक या मार्गाने जाणारी वाहने ही नांदूर नाका औरंगाबाद रोडने तपोवनातील स्वामी जनार्दन पूलमार्गे जातील व त्याच मार्गाने येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images