Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शेतकऱ्यांनी गट-तट सोडून एक व्हा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सध्याचे राज्यकर्ते शेती व शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहेत. शेतीमालास मातीमोल बाजारभाव मिळत आहे. उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. मुलांचे शिक्षण, घरखर्चही करणे शक्य होत नसल्याने तो स्वतःला संपवित आहे. हे दुष्टचक्र संपविण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रितपणे करायचे आहे, शेतकऱ्यांनी गट-तट सोडून एक व्हावे, असे आवाहन भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष मधुकर पाटील यांनी केले.
गिरणारे येथील ग्रामसंस्कार केंद्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकरी मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. मेळाव्यास प्रा. राजू देसले, वारकरी संप्रदायाचे पुंडलिक थेटे, नगर येथील कारभारी उगले, व्ही. डी. धनवटे, जिल्हाध्यक्ष भास्कर शिंदे, कामगार नेत्या ज्योती नटराजन, दत्तू तुपे, विजय दराडे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. देसले म्हणाले, की शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेतकरी देशाचा आर्थिक कणा असताना या सध्याच्या राज्यकर्त्यांना विजय मल्ल्याची काळजी आहे. काळा पैसा आणून १५ लाख प्रत्येकाच्या जनधन खात्यात टाकू, असे सांगत फसविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली. सामान्यांना महागाईत ढकलले. राज्य सरकारने कर्जमाफीत शेतकरी रांगेत उभे केले, हे लिंक करा, ते लिंक करा असा जाच येथील सामान्य माणसाला करणारे हे सत्ताधीश मात्र भांडवलदार लुटारूंना मोकळे रान देत आहे. सहकार संपला, जळगाव जिल्ह्यातील उपसा जलसिंचन योजनेला कर्जमुक्त करून त्यांना पुन्हा कोट्यवधी अनुदान देणारे सरकारने नाशिक जिल्ह्यातील उपसा जलसिंचन योजनेला कर्जात खितपत ठेवले. इथले आमदारही यावर गप्प बसतात, हे दुर्दैव. हा दुजाभाव फोडा, एक व्हा, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकरी वाचवा अभियानचे संस्थापक राम खुर्दळ यांनी प्रास्ताविक केले. पुंडलिकराव थेटे यांनी आभार मानले. मेळाव्यास निवृत्ती कसबे, रामभाऊ थेटे, निवृत्ती बंदावणे, लुखाभाऊ थेटे, संपत थेटे, वाळू पाटील कसबे, दत्तू कांडेकर, मदन पवार, ज्ञानेश्वर गायकर, सिद्धार्थ मोरे, विजय पोटींड, सुरेश उगले आदी शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ढोंगी साधु-बुवांपासून सावध रहा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जनतेने बोगस बाबा-बुवांपासून सावध राहावे, असे आवाहन संत परिषदेने केले आहे. नाशिक परिसरातील धा‌र्मिक व आध्या‌त्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींनी अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या कारवाईचे स्वागत केले आहे.

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरूंची कुकर्मे उघड होत असताना आखाडा परिषदेने देशातील ढोंगी बाबांची यादी जाहीर केली आहे. गुरमित रामरहीम, आसाराम बापू, नारायण साई, रामपाल, राधे माँ यांच्यासह १४ जणांचा या यादीमध्ये समावेश आहे. यांच्यापासून सावध राहण्याचे आवाहन भाविकांना करण्यात आले आहे.

आपल्याकडे भक्तीभावाने येणाऱ्यांची फसवणूक करणे हे धर्माला धरून नाही. त्यामुळे धर्माची बदनामी होते व अधःपतन होते. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. दोन दिवसात पंतप्रधानांची भेट घेणार आहोत.
- भक्तचरणदास महाराज, राष्ट्रीय प्रवक्ता, दिगंबर आखाडा

कुठल्याही आखाड्यांशी संबंधित नसलेल्यांवर कारवाई करण्याचा निर्णय आखाडा परिषदेने घेतला आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. या लोकांनी धर्माच्या नावाने दुकाने सुरु केली होती.
- महंत रामकृष्णदास शास्त्री, दिगंबर अनी आखाडा

संत परंपरा माहित नसलेल्यांना स्वामी किंवा गुरू म्हणायचे तरी कसे? त्यांची तपस्या, आराधना नाही. कुणीही येतो स्वत:ला जगदगुरू म्हणवून घेतो. ही जनतेची फसवणूक आहे.
- स्वामी सविदानंद सरस्वती, अध्यक्ष, कैलास मठ

स्वत:चे प्रस्थ निर्माण करणाऱ्या, अंधश्रद्धा पसरविणाऱ्यांना राजकरणी प्रोत्साहन देतात. समाजाने याकडे जागरूकतेने पाहिले पाहिजे. भोंदूगिरी करणाऱ्यांकडे शासन यंत्रणा डोळेझाक करते.
- स्वामी सागरानंद सरस्वती महाराज,
अध्यक्ष, षडदर्शन आखाडा परिषद, त्र्यंबकेश्वर

स्वत: देव असल्याचे भासवून समाजाची दिशाभूल करणाऱ्यांना सरकारने वेळीच आवर घातला पाहिजे. अशा भोंदू आणि समाजाला घातक असलेल्यांनी अवैधपणे जमा केलेली संपत्ती जप्त करावी, ती सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणावी.
- महंत डॉ. बिंदुजी महाराज,
प्रवक्ता, आखाडा परिषद

समाजात स्वत:ला बाबा म्हणविणारे भोंदू सर्वत्र पसरलेले आहेत. यापुढे आणखी काही नावे प्रसिद्ध केली जातील. फसवणूक झालेल्यांनी निर्भिडपणे पुढे येऊन तक्रार केली पाहिजे. जनतेनेही अंधविश्वास ठेवू नये.
- महंत शंकरानंद महाराज,
माजी महामंत्री, आखिल भारतीय आखाडा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरच्या पीएसआयला धक्काबुक्की

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
हेल्मेट नसताना थांबवलेल्या वाहनचालकाने थेट पोलिस उपनिरीक्षकास धक्काबुक्की केल्याची घटना सातपूर परिसरात कार्बन नाका येथे घडली. या प्रकरणी संशयिताविरोधात सरकारी कामात अडथळ आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. दोनच दिवसांपूर्वी एका दुचाकीचालकाने थेट सहायक पोलिस निरीक्षकाच्या अंगावर दुचाकी घातल्याचा प्रकार सातपूर परिसरात घडला होता, हे विशेष!
निरंजन यशवंत मोहिते (५२ रा. मीनाताई ठाकरे उद्यान, शिवाजीनगर) असे संशयिताचे नाव आहे. तर सातपूर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक रवींद्र कऱ्हे यांनी तक्रार दिली आहे. सोमवारी (दि. ११) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कऱ्हे आपल्या सहकाऱ्यांसह कार्बननाका भागात हेल्मेट सक्ती आणि वाहन तपासणी करीत होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या मोहिते यांना उपनिरीक्षक कऱ्हे यांनी थांबण्याचा इशारा केला. परंतु, त्यांनी भररस्त्यात दुचाकी उभी करून आरडाओरड सुरू केली. पोलिसांनी जमिनीच्या वादात लाच घेतल्याचा आरोप करीत, ‘माझ्याशी दादागिरी करायची नाही’ अशी दमबाजी केली. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वऱ्हाडे करीत आहेत. दरम्यान, गत रविवारी आयटीआय सिग्नलजवळ सहाय्यक निरीक्षक सुरेश भाले यांच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रकार घडला होता.

बनावट पॅनकार्डद्वारे भूखंडाची विक्री
बनावट पॅनकार्डच्या माध्यमातून जळगाव येथील दोघा बहिणींच्या मालकीचा भूखंड परस्पर विक्री करण्यात आला. या प्रकरणी महिलेसह एकाविरूद्ध नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
स्मिता प्रमोद पाटील (५४ रा. गणेश कॉलनी, जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पाटील व माया संजय चिरमाडे (४० रा. लक्ष्मीनगर, जळगाव) या दोघा बहिणींच्या मालकीचा पिंपळगाव बहुला शिवारात गट क्रमांक १९४ अ यातील अभिन्यास आराखड्यातील क्रमांक १६ हा भूखंड आहे. अज्ञात महिलेने मूळ मालक असलेल्या दोघा बहिणींच्या नावावर असलेल्या भूखंडाचा दस्तऐवज मिळवित ओळख म्हणून वापरण्यात येणारे पॅनकार्ड बनावट तयार केले. तसेच त्यावर अनोळखी महिलेचे छायाचित्राचा वापर करून १९ सप्टेंबर २०१५ रोजी भुखंडाची परस्पर रुपेश प्रकाश धनगर आणि दिलीप लाडू याना १४ लाख रुपयांना विक्री केली. नाशिकरोड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी हा प्रकार घडला. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेलकर करीत आहेत.

हिरावाडीत घरफोडी
हिरावाडी भागात भरदिवसा घरफोडी करीत चोरट्यांनी सुमारे ७३ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी केले. अभय अरविंद शहाणे (३६ रा. शिवमुद्रा अपार्ट. शक्तीनगर) यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॅच तोडून घरात प्रवेश केला. तसेच कपाटात ठेवलेले सुमारे ७३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कुलकर्णी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीची हत्या; पतीस जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करणाऱ्या नराधम पतीस जिल्हा कोर्टाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हत्येची घटना सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथे २०१५ मध्ये घडली होती.
संजय रघुनाथ वाघ (६, रा. मीनाताई ठाकरे गार्डन मागे, शिवाजीनगर, सातपूर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी वाघ हा पत्नी वैशालीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे. यातूनच २१ जुलै २०१५ रोजी रात्री साडेबारा ते पाऊण वाजेच्या सुमारास वाघ दाम्पत्यात जोरदार भांडण झाले. रघुनाथने घरातीलच शिवणकामाच्या कात्रीने पत्नी वैशालीवर मुलगा जयेश (८) व मुलगी हर्षदा (६) या दोघांसमोर वार केले. यानंतर दोन्ही मुलांना सोबत घेऊन प्रथम सातपूर व त्यानंतर गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये तो हजर झाला. आरोपीने वैशालीच्या अंगावर कात्रीने तब्बल ३६ वार केले होते. या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या कोर्टात झाली. सरकारी वकील शिरीष कडवे यांनी या खटल्यात १३ साक्षीदार तपासले तर गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक महेश देवीकर यांनी तपास केला. साक्षिदारांमध्ये वाघ दाम्पत्याची दोन्ही लहान मुले, पत्नीचा शिवण क्लास घेणारी महिला, पोलिस कर्मचारी यांचा समावेश होता. सुनावणी दरम्यान रघुनाथच्या मुलाने आपला जबाब फिरविला होता. मात्र, खुनाच्या घटनेनंतर संशयिताने पोलिसांना दिलेला जबाब तसेच पत्नीच्या रक्ताचे आरोपीच्या कपड्यांवरील डाग, केमिकल अहवाल व परिस्थितीजन्य पुरावे गृहित धरून कोर्टाने त्यास दोषी ठरवले. न्यायाधीश शिंदे यांनी आरोपी वाघ यास जन्मठेप व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचा मृतदेह त्र्यंबकरोड आढळला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

त्र्यंबकरोडवरील विद्यामंदिर परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश सोनावणे सहकाऱ्यांसह दाखल झाले.
विद्यामंदिर येथील शेतकरी ढगे आपल्या शेतात काम करत असताना रस्त्यांच्या कडेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चारीत मृतदेह असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ढगे यांनी सातपूर पोलिसांना घटनेची तात्काळ माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबची व्हॅन बोलवित महिलेचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विच्छेदनासाठी पाठविला. मृत महिलेचा घातपात झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पाच ते सहा दिवसांपूवी महिलेचा मृतदेह टाकून दिल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. ३५ ते ४० वर्ष वयोगटातील महिलेला नेमके कुणी अत्याचार केला आहे का याचाही शोध पोलिस घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात रिंगरोडसाठी दोन ‌कोटींचा निधी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरातील चौगाव रोड ओलांडून मालेगाव रोडला जोडणाऱ्या पहिल्याच रिंग रोडच्या कामासाठी २ कोटी रूपयांची प्रशासकीय मंजुरी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी.यांनी दिली असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.

शहरातील भाक्षी रोडच्या मंजुळे पेट्रोल पंपापासून सुरू होणारा आणि नामपूर रोडला शासकीय आदीवासी वसतीगृहाच्या उत्तर बाजूलगत येणाऱ्या व पुढे चौगाव रोड ओलांडून मालेगाव रोडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ येणाऱ्या रिंगरोडसाठी निधी मिळाला आहे. सटाणा शहरातील हा पहिलाच रिंगरोड आहे. भाक्षी रोड ते नामपूर रोड या १.२५ किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाकरिता विशेष रस्ता अनुदान निधीतील १ कोटी रुपये इतक्या रकमेस मान्यता मिळाली आहे. तर याच रस्त्यास दोन्ही बाजूने २.५ किलोमीटर लांबीचा पेव्हर ब्लॉक बसवून जॉगींग ट्रॅकसाठी एक कोटी रक्कम रुपये निधीला मंजुरी मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९७ रिक्त पदे त्वरित भरा!

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
आदिवासी विकास आयुक्तालयाच्या आठ महामंडळांवर ९७ पदे रिक्त आहेत. ही पदे भरली जात नसल्याने कामे प्रलंबित राहात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. भरती प्रक्रियेला अडसर ठरणाऱ्या त्रूटी दूर कराव्यात तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा करून आदिवासी आयुक्तांनी हे पदे तातडीने भरावीत, असे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने मंगळवारी नाशिकमध्ये दिले.
आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी हा आयोग नाशिकमध्ये आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ ते दोन यावेळेत आयोगाची बैठक पार पडली. नंदकुमार साई अध्यक्ष असलेल्या या आयोगात उपाध्यक्षा अनुसया उईके यांच्यासह हरी कृष्णा दामोर, माया इवनाते, सिरीसकुमार राथो, के. डी. बनसोड, आर. के. दुबे या सदस्यांचा समावेश होता. बैठकीला खासदार हरिशचंद्र चव्हाण, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त आर. जी. कुलकर्णी, सहसचिव एस. वाय. पाटील, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, पोलिस अधीक्षक संजय दराडे, आदिवासी प्रकल्प अधिकारी अमोल येडगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थ‌ित होते.
आदिवासी आयुक्तालयांतर्गत आठ समित्या कार्यरत असून या समित्यांवर २८७ पदे मंजूर आहेत. अव्वल कारकूनापासून सह आयुक्तापर्यंतची ९७ पदे मोठ्या कालावधीपासून रिक्त असल्याची बाब या आढावा बैठकीत पुढे आली. त्यामुळे कामांचा निपटारा होत नसून ही पदे तात्काळ भरायला हवीत अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी आयोगाकडे व्यक्त केली. परंतु, ही पदे राज्यस्तरावर भरावयाची असून राज्य सरकारनेच प्रसंगी त्यासाठी कायदा करून ती भरावित, असे निर्देश आयोगाने दिले.
आदिवासी विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या शबरी महामंडळाच्या कामकाजाचा लेखाजोखा यावेळी घेण्यात आला. आदिवासी आश्रमशाळांचे कामकाज, सेंट्रल किचन योजना, वनहक्कचे दावे आदींबाबतही या बैठकीमध्ये माहिती घेण्यात आली. आदिवासींनी सेवा सुविधा पुरविण्यात महाराष्ट्र राज्य अव्वल असून अनेक योजनाही चांगल्या पद्धतीने राबविण्यात आल्याबद्दल आयोगाने समाधान व्यक्त केले. अन्य राज्यांनी आपला आदर्श घ्यावा, अशी कामगिरी नाशिक जिल्ह्याने करावी अशी अपेक्षा यावेळी आयोगातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

अॅट्रॉसिटी गुन्ह्यांचा तपास वेगाने व्हावा
अॅट्रॉसिटी कायद्यान्वये दाखल गुन्हे आणि प्रलंबित प्रकरणांचा आढावाही यावेळी घेण्यात आला. अॅट्रॉसिटीचा एक गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास‌ पूर्ण होऊन संबंधितांना शिक्षा जाहीर करण्यापर्यंत साधारत: किती कालावधी लागतो अशी विचारणा पोलिस अधिकाऱ्यांना करण्यात आली. खूप कालावधी लागत असल्याची बाब आयोगाच्या लक्षात आली. हा कालावधी कमी व्हावा, यासाठी प्राधान्याने प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा आयोगाने यावेळी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१० वर्षे सक्त मजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
चरित्र्यावर संशय घेऊन बेदम मारहाण करीत पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीस कोर्टाने १० वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. हत्येची घटना २०१४ मध्ये पंचवटीतील मोरे मळा येथे घडली होती.
रूपेश तुळशीराम गायकवाड (रा. कृष्णनगर, मोरेमळा, पंचवटी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. रूपेश पत्नी मंगल हिच्या चरित्र्याचावर सतत संशय घेत होता. यातूनच दोघांमध्ये वाद व्हायचे. रूपेशने ७ ते ८ ऑगस्ट २०१४ या रात्री दरम्यान पत्नी मंगल हिला घरात असताना मारहाण व शिवीगाळ सुरू केली. तिच्या चेहऱ्यावर तसेच डोक्यावर लाथबुक्यांनी मारहाण केली. तिचे डोके भिंतीवर आपटले. मारहाण सुरू असतानाच मंगलचा मृत्यू झाला. मंगल मृत्युमुखी पडल्याचे लक्षात आल्यानंतर रूपेशने पुरावा नष्ट करण्यासाठी मंगलचा मृतदेह गणराज बिल्डींग, शिवाजीनगर येथे टाकून पोबारा केला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला. घटनेचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक योगेश आत्माराम देवरे यांनी केला. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुराव्यासह साक्षिदार पुढे आणले. सरकारी वकील अॅड. पी. व्ही. नाईक यांनी सरकारी पक्षाच्यावतीने काम पाहिले. सरकारपक्षाने सादर केलेल्या साक्षिपुराव्यानुसार कलम ३०४ मध्ये रुपेशला दोषी ठरवत जिल्हा न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर यांनी १० वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली. दंड न भरल्यास आरोपीस दोन महिने साधा कारावास भोगावा लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गांधीनगरला रामलीलेची जय्यत तयारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
सर्व धर्मियांचा सहभाग असलेल्या गांधीनगरमधील रामलीलेच्या रंगीत तालमींना सुरुवात झाली आहे. नवरात्र काळात दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत रामलीला सादर करण्यात येते. गांधीनगरच्या रामलीला मैदानावर सादर होणाऱ्या रामलीला व रावणदहनासाठी येथील कलावंतांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
समितीचे यंदाचे ६२ वे वर्ष असून दसऱ्याच्या दिवशी होणारा रावणदहन हे येथील मुख्य आकर्षण आहे. गांधीनगर येथे सार्बोजनीक दुर्गापूजा समितीतर्फे बंगाली बांधवांचा साजरा होणारा दुर्गा पूजा महोत्सव हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. या महोत्सवाला ६४ वर्षांची परंपरा असून यंदाही महोत्सवाच्या तयारीला सरुवात झाली आहे. यासाठी मंडप उभारणीच्या काम सुरू झाले असून दुर्गामातेची मोठी व आकर्षक मूर्ती साकारण्यात मूर्तिकार मग्न आहेत.

दुर्गा मंदिराची रंगरंगोटी
नाशिकरोड परिसरातील सार्वजनिक मंडळांकडून नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. नाशिकरोडची ग्रामदेवता समजल्या जाणाऱ्या दुर्गा उद्यान येथील देवी मंदिराची साफसफाई, रंगरंगोटी, मंडप उभारणी आदी कामे सुरू झाली आहेत. बाजारात घट व पूजेचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. देवीची मूर्ती बनविणारे मूर्तिकार मूर्तीवर अखेरचा हात फिरवित आहेत. घटासाठी लागणारे दगडी दिवे तयार करण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कर्तव्य मेळाव्यास आज प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कौशल्याची चाचणी घेण्यासाठी व व्यावसायिक गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा १५ वा महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्याचा बुधवारी (दि. १३) महाराष्ट्र पोलिस अकादमी (एमपीए) येथे सांयकाळी चार वाजता प्रारंभ होणार आहे.
या कर्तव्य मेळाव्यामध्ये घातपात विरोधी तपासणी स्पर्धा, कम्प्युटर स्पर्धा, श्वान स्पर्धा, पोलिस फोटोग्राफी, पोलिस व्हिडिओग्राफी, विज्ञानाची तपासास दमत अशा सहा स्पर्धा प्रकारमध्ये स्पर्धा घेतल्या जाणार आहे. वरील स्पर्धांमध्ये पदक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांची आगामी आखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यासाठी निवड करण्यात येत. या उपक्रमाची १९५३ मध्ये सुरुवात झाली तेव्हापासून दरवर्षी अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळावा आयोजित करण्यात येतो. सदर स्पर्धेमध्ये देशातील सर्व राज्यातील पोलिस दले तसेच केंद्रीय पोलिस संघटना आपले संघ पाठवून आपल्या व्यावसायिक कौशल्याचे दर्शन घडवतात. महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्यामध्ये महाराष्ट्र पोलिस दलाची कामगिरी ही उत्रोत्तर उत्कृष्ट राहिलेली आहे. महाराष्ट्रातून नऊ पोलिस आयुक्तालये, नऊ पोलिस परिक्षेत्रे, राज्य राखीव पोलिस गट, बिनतारी संदेश विभाग, फोर्स वन मुंबई व गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी, असे एकूण २३ संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत. अंदाजे या स्पर्धेसाठी तब्बल ४५० स्पर्धक सहभागी होणार आहे.

महाराष्ट्र अव्वल स्थानी
स्पर्धेचा प्रारंभ १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार असून, समारोप १८ सप्टेंबर रोजी सांयकाळी ४ वाजता होईल, असे महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या आयोजन समितीने कळवले आहे. डिसेंबर २०१६ मध्ये म्हैसूर, कर्नाटक येथे झालेल्या ६० व्या आखिल भारतीय कर्तव्य स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उत्तम कामगिरी केली. पदक तालिकेमध्ये महाराष्ट्र संघाने देशामध्ये दुसरा क्रमांक प्राप्त केला. यात तीन सुवर्ण, दोन रजत आणि तीन कांस्य पदाकांचा समावेश आहे. तसेच सांघिक कामगिरीमध्ये फिरता चषक पटकावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियोजन समितीच्या उमेदवारांची आज बैठक

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत ३३ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित सात जागांसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या सात जागा लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेची माह‌िती देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी त्यांच्या दालनात बुधवारी (दि. १३) सकाळी साडेदहा वाजता बैठक घेणार आहेत.
अवघ्या पाच दिवसांनी म्हणजेच १७ सप्टेंबरला जिल्हा नियोजन समितीची निवडणूक होणार आहे. मतदानाची तसेच मतमोजणीची ठिकाणेही जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मतदान आणि मतमोजणीच्या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी उमेदवारांची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रामदास खेडकर यांनी दिली. सात जागांसाठी १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा
तालुक्यातील वीरगावपाडे (ता. बागलाण) येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थ्यांचा मंगळवारी दुपारी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सतीश रंजन बागूल (९, रा. मळगाव, ता. बागलाण) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. याच आश्रमशाळेतील दोन मुले जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. दोन-तीन दिवसांपासून दोन्ही विद्यार्थ्यांना ताप, खोकला, उलट्यांचा त्रास होत होता. वास्तविक या विद्यार्थ्यांना तत्काळ औषोधोपचार करणे आवश्यक होते. मात्र, आश्रमशाळा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा पालकांचा आरोप आहे. अखेर सतीश बागूलसह अंकुश सोनवणे व सोपान भोये यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी आणण्यात आले.
या विद्यार्थ्यांना अधीक्षक डी. एस. सोनार यांनी सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अधिकच खालावल्याने विद्यार्थ्यांना नाशिक येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सतीशचा मृत्यू झाला.

पालकांचा संताप
वीरगावपाडे येथील आश्रमशाळेत अन्य १५ ते २० विद्यार्थांनाही असाच त्रास होत आहे. या आश्रमशाळेत एकूण ३५७ विद्यार्थी आहेत. मुख्याध्यापक एस. एस. कापडणीस, शिक्षण विस्तार अधिकारी कळवण प्रकल्प मुसळे आदींसह पालक शाळेत उपस्थ‌ित होते. संतप्त पालकांनी संपूर्ण विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रक्त तपासून देण्यात अक्षम्य हलगर्जीपणा

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक
रुग्णाला रक्त देण्यापूर्वी त्या रक्ताच्या पिशवीची तपासणी आवश्यक असते. परंतु, सिव्हील हॉस्पिटलमध्ये रक्त तपासण्यात अक्षम्य हलगर्जीपणा केला जात असल्याचा प्रकार मंगळवारी पहावयास मिळाला. रक्ताच्या पिशव्या तपासण्यासाठी हॉस्प‌िटलमधील चतुर्थश्रेणी महिला कर्मचाऱ्याला अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवावे लागत असल्याचे पहावयास मिळाले.
प्रसूतीनंतर महिलेला प्रसूती पश्चात विभागात ठेवण्यात येते. गरज भासल्यास या महिलांना रक्ताच्या पिशवीद्वारे रक्त पुरवठा करावा लागतो. त्यासाठी या रक्ताची तपासणी करणे आवश्यक असते. रक्तगट व तत्सम बाबी तपासून पहाव्या लागतात. त्यासाठी एक महिला कर्मचारी टोकरीमध्ये रक्ताच्या पिशव्या घेऊन आरएमओंच्या दालनात गेली. परंतु, तेथील अधिकारी कर्मचारी हरविलेली वस्तु शोधण्यात व्यस्त होते. तेथील नर्सनेही ही जबाबदारी झटकली. या महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांनी तिला अन्य एका अधिकाऱ्यांकडे पाठविले. परंतु, या अधिकाऱ्यानेही रक्त तपासून देण्यास नकार दिला. त्यानंतर तिने प्रशिक्षणार्थी नर्सेसकडून रक्त तपासून घेतले. परंतु, तोपर्यंत एक तास खर्ची पडला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाचे २३ नवे इन्क्युबेटर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाच महिन्यात इन्क्युबेटर अभावी १८७ अर्भक मृत्यू प्रकरणाची महापालिकेनेही गंभीर दखल घेतली असून महापालिका हॉस्पिटलमध्येही इन्क्युबेटर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महापालिकेच्या सहा रुग्णालयांमध्ये १७ इन्क्युबेटर असून त्यांची संख्या आता ४० वर नेण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली आहे.

महापालिका हॉस्पिटलमध्ये नव्याने २३ इन्क्युबेटर बसवले जाणार असून हॉस्पिटलमधील अर्भकांचा दर आठवड्याला आढावा घेतला जाणार आहे. महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये इन्क्युबेटर असतांनाही सिव्हिलमध्ये अर्भक पाठविण्याच्या सूचना देणाऱ्या महापालिकेच्या डॉक्टरांवर निलंबनासह कठोर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

सिव्हिलमधील नवजात अर्भकांची इन्क्युबेटर अभावी १८७ बालकांचे मृत्यू प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात सिव्हिलसह महापालिकेवरही दोषारोप केले जात आहे. सिव्हिलने इमारत बांधकामासाठी वृक्षप्राधिकरणाची परवानगी मिळाली नसल्याचा दावा करत, महापालिका हॉस्पिटलमधील अर्भकेही आमच्याकडे पाठविले जात असल्याचा आरोप केला होता. परंतु, आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सिव्हिलने केलेले आरोप हे पुराव्यानिशी फेटाळले. ऑगस्ट महिन्यात सिव्हिलमध्ये १२९ अर्भक दाखल करण्यात आले. त्यापैकी केवळ २२ अर्भक शहराच्या हद्दीतील होते. परंतु याच वेळी ग्रामीण भागातील काही अर्भके हे बिटको हॉस्पिटलमध्येही दाखल केले जातात असे सांगत, महापालिका मात्र भेदभाव करत नसल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. सोबतच आता महापालिका हॉस्पिटलमध्ये सध्या १७ इन्क्युबेटर आहेत. त्यापैकी १० इन्क्युबेटर एकट्या बिटको हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सर्व सहा रुग्णालयांमध्ये नव्याने २३ इन्क्युबेटर बसवण्याचा निर्णय घेतल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे सिव्हिलमध्ये शहरातील जाणारे अर्भक कमी होणार आहेत.

तर कठोर कारवाई

महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये इन्क्युबेटर असतांनाही, सिव्हिलमध्ये अर्भके रेफर करणाऱ्या महापालिकेच्या डॉक्टरांवर यापुढे कठोर कारवाई केली जाणार आहे. आपल्यावरील जबाबदारी टाळण्यासाठी असे प्रकारचे अर्भक सिव्हिलकडे रेफर केल्याचे आढळल्यास संबंधित डॉक्टर, निवासी वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधीक्षकांवर निलबंनाच्या कारवाईसह कठोर कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

सिव्हिलचा दावा खोटा

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या नवजात बालकांच्या कक्षासाठी झाडे तोडण्याची परवानगी वृक्षप्राधिकरण देऊ शकत नाही, याची माहिती महापालिकेने ७ जून रोजीच कळवली होती, असा दावा आयुक्तांनी केला आहे. हायकोर्टाच्या आदेशान्वये एखाद्या इमारतीसाठी वृक्ष तोडायचे असतील तर त्यासाठी हायकोर्टाची परवानगी आवश्यक असल्याचे आदेश दिले आहेत. तशी तोंडी माहिती सहा महिन्यांपूर्वी तर अधिकृत पत्र सिव्हिल सर्जन यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सिव्हिलचा दावा खोटा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रसाद हिरेंविरुद्ध बंड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसाद हिरे हे बाजार समितीच्या हिताचे निर्णय घेत नाहीत. तसेच संचालक मंडळाला विश्वासात न घेता कामकाज करीत असल्याचा आरोप करीत बाजार समितीच्या सदस्यांनी त्यांचे अधिकार काढून घेण्याबाबत पत्र दिले आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंगळवारी झालेल्या मासिक सभेत सभापती प्रसाद हिरे यांच्या विरोधात सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही बाजूच्या सदस्यांनी एकत्र येत बंड पुकारले. त्यामुळे बाजार समितीच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. मंगळवारी संचालक मंडळाची

मासिक सभा होती. या सभेच्या अजेंड्यावर नियमित कामकाजासंबंधीचे विषय होते. सभेला सभापती प्रसाद हिरे यांच्यासह संचालक अद्वय हिरे, गोरख पवार, गोविंद खैरनार, संग्राम बच्छाव, संजय घोडके आदींसह १८ सदस्य उपस्थित होते.

सभेतून हिरेंचा काढता पाय

सभेदरम्यान मात्र उपस्थित संचालकांनी सभापती संचालकांना विश्वासात न घेता कामकाज करीत आहेत. शेतकरी हिताचे कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत, असा आरोप करीत सत्ताधारी शिवसेना व विरोधी भाजपचे सदस्य एकवटले. यामुळे सभापती हिरे यांनी सभेतून काढता पाय घेतला. प्रसाद हिरे सभेतून गेल्यानंतर उपस्थित संचालकांनी हिरे यांचे अधिकार काढून घेत उपसभापती सुनील देवरे यांच्याकडे ते देण्यात यावे, असे पत्र बाजार समिती प्रशासनास दिले.

प्रसाद हिरे एकाकी

कृउबामध्ये सेना व भाजपचे सामान ८-८ सदस्य असून, सभापती प्रसाद हिरेंना गळाला लावून शिवसेनेने सत्ता मिळवली होती. मात्र आता काँग्रेसचे प्रसाद हिरे एकटे पडले आहे. त्यांना पाठिंबा देणारे भुसे समर्थक संचालक व विरोधात असलेले अद्वय हिरे समर्थक संचालक यांच्यात झालेल्या दिलजमाईबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याबाबत दूरध्वनीवरून प्रसाद हिरे व अद्वय हिरे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.

‘त्या’ भूखंडावरून वाद?

याबाबत बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे यांनी ‘मटा’ला सांगितले की, सभापती हे संचालक मंडळाला विश्वासात घेत नाहीत. नियमित मासिक सभा होत नाहीत. त्यामुळेच आज मासिक सभेत प्रसाद हिरे यांच्या विरोधात सर्व १७ संचालक विरुद्ध सभापती असे चित्र निर्माण झाले. तसेच बाजार समितीच्या मालकीचा एक भूखंड सभापती यांनी व्यापारी असो. देवू केल्याचा देखील आरोप देवरे यांनी केला. हा भूखंड देण्याच्या हिरे यांच्या निर्णयच त्यांच्या विरोधात झालेल्या बंडामागील कारण असल्याच बोलले जात आहे.

प्रशासनासमोर पेच

बाजार समितीतील या अंतर्गत राजकारणात प्रशासनाची गोची झाली आहे. सभापतींचे अधिकार काढून घेण्याचा विषय मासिक सभेच्या अजेंड्यावर येणे अपेक्षित असते. तसेच तो ठराव बहुमताने मंजूर व्हावा लागतो. तसा विषय मंगळवारी झालेल्या मासिक सभेच्या अजेंड्यावर नव्हता. मात्र मासिक सभेत सभापतींच्या विरोधात सर्व संचालक गेल्यामुळे याबाबत काय निर्णय घायचा? असा प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नसती उठाठेव तर्फे ‘पितरांचा महोत्सव’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
श्राद्ध कर्म करून लोकांऐवजी उपाशी गरजवंतांना एक घास द्या, या संकल्पनेतून नसती उठाठेव मित्र परिवाराच्या वतीने शनिवारी (दि. १६) पितरांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गंगापूर रोड येथील नरसिंह नगरमधील हनुमान मंदिरात सकाळी ९ ते दुपारी २ या काळात हा कार्यक्रम होणार आहे.
नसती उठाठेव मित्र परिवारातर्फे २००९ पासून पितरांचा महोत्सव हा उपक्रम आगळ्यावेगळ्या स्वरुपात राबविला जातो. आपल्या पूर्वजांविषयी प्रत्येकाच्या मनातच आदरयुक्त भावना असते. ही भावना प्रकट करण्यासाठी पितृपक्षात पूर्वजांचे स्मरणार्थ श्राद्ध कर्म करून लोकांना बोलवून जेवण देतात आणि पिंडदान करतात. तसेच पितरांच्या स्मरणार्थ काही दान करायला उद्युक्त होतात. हीच भावना लक्षात घेऊन मंडळाने श्राद्ध कर्म करून लोकांना जेवण देण्याबरोबरच उपाशी व गरजू लोकांसाठी एक घास या उफक्रमास द्या असे आवाहन लोकांना केले आहे. परिसरातील व्यक्तींकडून धान्य किंवा रोख रक्कम दान म्हणून स्वीकारली जाते.

दान देणाऱ्या व्यक्तीकडून सामूहिकपणे दान संकल्प विधी पुरोहितांमार्फत संपन्न केला जातो. आलेल्या रोख रकमेतून धान्य विकत घेऊन वेगवेगळ्या अनाथ व वृद्धाश्रम, मूकबधीर व अंध संस्थांना वाटप केले जाते. मागील वर्षी एकूण ५२ क्विंटल धान्य तेल व गुळाचे वाटप सिडको येथील दिलासा संस्था, नॅब संचलित अंधशाळा, गजानन आधाराश्रम खंबाळे, वैदिक ज्ञान विज्ञान संस्था केवडीबन, रामकृष्ण परमहंस आरोग्य संस्था त्र्यंबकेश्वर या संस्थांना देण्यात आले. मंडळाच्या कामास अधिकाधिक नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष बापू कोतवाल यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारचे नाव खराब करता काय?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

तुमची बदली करू का… प्रॉपर्टी चेक करू का…माझ्या मागे लागू नका…मी फार वाईट मंत्री आहे…सरकारचे नाव खराब करता काय…तुम्हाला शहर दिले आहे, ना मग काम का करत नाही…तुम्हाला ग्रामीण भागात पाठवू का…अशा शब्दात दस्तुरखुद्द उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे कान टोचले.

येथील विभागीय आयुक्तालयाच्या नियोजन सभागृहात लोकप्रतिनिधींसमवेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शहर व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी उर्जामंत्र्यांपुढे महावितरणच्या मुजोर व मनमानी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे धिंडवडे काढल्याने उर्जामंत्री संतापले.

शहरातील नागरिकांच्या वीज पुरवठ्याविषयक तक्रारींना महावितरणचे अधिकारी केराची टोपली दाखवितात, असाे आरोप महापौर रंजना भानसी यांनी केला. त्यांनी थेट महावितरणच्या शहरातील दहा अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना सभागृहात पुढे बोलावत प्रश्नांची सरबत्ती केली.

३०डिसेंबरला पुन्हा येणार

नाशिक शहरातील सर्व समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला. ३० डिसेंबरला आपण पुन्हा नाशिकला येणार तेव्हा या समस्या सुटल्या की नाही याची खात्री करू असा इशारा त्यांनी दिला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकाची ५१ कोटींची फसवणूक

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
कंपनीत २५ टक्के भागिदारी देण्याचे आमिष दाखवून एका संशयिताने कागदपत्रांद्वारे गहान खत करीत दुसऱ्याच्या नावाने तब्बल ५१ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानुसार गंगापूर पोलिसांनी संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

संजय नारायणप्रकाश अरोरा (रा. गणेश बाबानगर, द्वारका) यांनी फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर २०११ ते मार्च २०१६ या काळात संशयित अभिषेक बद्री जयस्वाल याने दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील श्री सप्तश्रृंगी इस्पात प्रा. लि. कंपनीच्या नावाखाली फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे. जयस्वाल याने अरोरा यांना लखमापूर येथील कंपनीत २५ टक्के भागिदारी देण्याचे आमिष दाखव‌िले. त्यासाठी अरोरा यांच्याकडून त्यांची कागदपत्रे घेतली. त्याआधारे कर्जप्रकरणासाठी अर्ज केला. त्या कागदपत्रांवर अरोरा यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन गहाणखत तयार केले. त्याआधारे बँकेकडून सुमारे ५१ कोटींचे कर्ज मंजूर करून घेतले. परंतु, त्यानंतर संशयितांनी कोणतीही कंपनी सुरू केली नाही. कर्ज थकवून आपली फसवणूक केल्याचा आरोप अरोरा यांनी केला आहे. त्यामुळे अरोरा यांनी गुन्हा दाखल व्हावा यासाठी कोर्टात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशानुसार गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. एस. वाघ हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्भक मृत्यू सकस आहाराअभावी!

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

सरकारच्या सकस आहार योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याचे अर्भक मृत्यूच्या प्रकरणावरून स्पष्ट होते. या अर्भकांची योग्य काळजी घेतली गेली असती तर ती मृत्यूच्या दारी पोहोचलीच नसती, असा ठपका ग्रामविकास राज्य मंत्री दादासाहेब भुसे यांनी ठेवला.

‘गुदमरतोय श्वास’ ही वृत्तमालिका अलीकडेच ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प‍्रसिद्ध केली. अर्भक मृत्यूच्या प्रकरणावर या मालिकेद्वारे प्रकाश टाकण्यात आला. बुधवारी नाशिकमध्ये या पार्श्वभूमीवर भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सुशील वाघचौरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. मुंढे आदी उपस्थ‌ति होते.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून पोषण आहाराच्या योजना गर्भवती महिला आणि स्तनदा मातांपर्यंत किती प्रमाणात पोहोचतात हा संशोधनाचा विषय असून प्राधान्याने त्यासाठी मोहीम राबवा, असे आदेश भुसे यांनी दिले. पेठ, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व कळवण या दुर्गम तालुक्यांत माता व बालमृत्यू तसेच कुपोषणाचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले. गरोदरपणापासूनच गर्भवती महिला व तिच्या बाळाच्या निकोप वाढीसाठी सकस आहार मिळण्याची दक्षता सरकारने घेतली आहे. त्यासाठी भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविली जाते. अन्य एका योजनेद्वारे ६ महिने ते ६ वर्षेपर्यंतच्या बालकांना वर्षातून ३०० दिवस सकस आहाराचे पॅकेट पुरविली जातात. अंगणवाडीत न येणाऱ्या तीन वर्षांपर्यंतच्या बालकांना सकस आहार घरपोच पोहोचविला जातो. प्रत्यक्षात तेवढ्या गरजूंपर्यंत हा आहार पोहोचतच नाही. बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण आढळून येत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. महिला व बालकल्याणमार्फत सकस आहार योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी होत नसल्याचा ठपकाही या बैठकीत ठेवण्यात आला. गर्भवती महिलेची किमान चार वेळेस सोनोग्राफी होणे आवश्यक असतांना त्याप्रमाणे तपासणी होत नसल्याचा ठपकाही यंत्रणेवर ठेवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटाळ्यांची आयोगाकडे तक्रार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
आदिवासी विकास विभागात विविध लेखन व शालेय साहित्य व रेनकोट खरेदीत मोठा घोटाळा झाला असून त्याच्या चौकशीसाठी समिती गठीत करावी अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे केली आहे.
आश्रमशाळा या भ्रष्टाचाराचा अड्डा बनल्या असून ठेकेदारांकडून मुलांचे शोषण केले जात असल्याची तक्रार लकी जाधव यांनी आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साई याची भेट घेऊन केली. त्यासंदर्भातील निवेदन परिषदेतर्फे आयोगाला देण्यात आले. साई यांनी त्याची दखल घेऊन राज्य सरकारला त्यासंदर्भात आदेश देऊ, असे आश्वासन दिले.
आदिवासी विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे पथक तीन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर आले आहे. यावेळी आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव व दौलत मेमाने यांनी अध्यक्ष नंदकुमार साई व उपाध्यक्ष उईके यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आदिवासी विभागात झालेल्या भ्रष्टाचारांची तक्रार केली आहे. आश्रमशाळांची अवस्था खराब झाली असून आदिवासी मुलांवर अन्याय केला जात आहे. तर आश्रमशाळांच्या मुलांसाठी खरेदी केलेल्या योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला असून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी साई यांच्याकडे केली आहे. आदिवासी मुलांना लेखन व शालेय साहित्याचा पुरवठा करण्यात आला. परंतु, लेखन साहित्य हे निकृष्ठ दर्जाचे पुरवण्यात आले तर शालेय पुस्तकांच्या झेरॉक्स कॉपी देण्यात आल्या आहेत. जवळपास आठ कोटींच्या ठेक्यात घोटाळा करण्यात आला आहे. सोबतच आश्रमशाळांमध्ये पुरवठा करण्यात येणारे रेनकोट हे निकृष्ठ दर्जाचे असून याच्या किमती अव्वाच्या सव्वा लावण्यात आल्या आहेत. आदिवासी मंत्री, सचिव, आयुक्त यांच्यावरही कारवाई करावी तसेच धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेशाला विरोध करावा अशी मागणी केली आहे. साई यांनी विभागातील घोटाळ्यांच्या चौकशी संदर्भात आपण राज्य सरकारला पत्र लिहणार असल्याचे आश्वासन दिल्याचे जाधव यांनी सांगितले.

चौकशी गुलदस्त्यात
आदिवासी विकास विभागाने या अगोदरच रेनकोटची चौकशी सुरू केली आहे. परंतु, या चौकशीचे अहवाल अद्यापही आलेले नाहीत. तर लेखन साहित्याची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. लेखन साहित्य तपासूनच घेण्याचे निर्देश असतानाही, विभागातील अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले तर रेनकोट बाबतही असाच हलगर्जीपणा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्यमंत्र्यासह राज्यपालांकडे तक्रार झाली आहे. आता थेट आयोगाकडेच याबाबत तक्रारी झाल्याने अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images