Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सिव्हिलचा कारभार सुधारा, अन्यथा आंदोलन

$
0
0

म.टा. प‍्रतिनिधी, नाशिक

सिव्ह‌लि हॉस्प‌टिलमधील कारभारात सुधारणा न झाल्यास राष्ट्रवादी महिला काँग्रेस आंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी प्रशासनाला दिला.

हॉस्पिटलमध्ये पाच महिन्यांत १८७ नवजात बालकांचा मृत्यू झाला असून, याचा निषेध राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये शेकडो महिला सहभागी झाल्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही निदर्शने करण्यात आली. कुपोषित, नवजात व मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांना संसर्ग होऊ नये याची अधिक काळजी घ्यायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एवढी मोठी घटना घडूनही पालकमंत्री जिल्ह्यात फिरकले सुद्धा नसल्याबाबत बलकवडे यांनी निषेध नोंदविला. दरम्यान स्वाइन फ्लू, डेंग्यू व अन्य साथींनी जिल्ह्यात थैमान घातल्याने त्यावरील लसी व औषधसाठा उपलब्ध करून

देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. प्रदेश उपाध्यक्षा भारती पवार, युवती जिल्हाध्यक्ष प्रतिक्षा बिल्लाडे, सुष्मा पगारे, समिना मेमन, शोभा साबळे, अनिता भामरे, माधुरी गायधनी, योगिता आवारे आदी उपस्थ‌ति होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मारहाणीची वृद्धाला धमकी

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक
वृद्धाला शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी एका दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. अशोक यशवंत देशमुख (७०, रा. प्रभातनगर, म्हसरूळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मिलिंद देशमुख आणि माधुरी देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व फिर्यादी एकाच परिसरात राहतात. मिलिंद देशमुख यांची मुले कॉलनीतील रस्त्यावर सायकल खेळत होती. त्याचवेळी अशोक देशमुख औषधे घेण्यासाठी घराबाहेर पडले. मुले त्यांच्या वाहनासमोर आल्याने ते त्यांना ओरडले. येथे खेळत जाऊ नका असे म्हणाल्याचा आरोपींना राग आला. त्यांनी देशमुख यांना शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री घेणार नगरसेवकांची शाळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत बहुमतात असूनही भाजपला अनुभवी व अभ्यासू नगरसेवकांअभावी अनेक वेळा नामुष्की पत्करावी लागत असतांनाच, पदाधिकाऱ्यांमधील विसंवादही वाढला आहे. बहुमत असतांनाही गेल्या सहा महिन्यांत घेतलेले अनेक निर्णय पक्षाच्या अंगलट आले आहेत. त्यामुळे भाजपने आता आपल्या नवख्या नगरसेवकांचा अभ्यासवर्ग घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या सर्व नगरसेवकांसह महत्त्वाचे पदाधिकाऱ्यांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत १७ सप्टेंबरपासून तीन दिवस सुशासनाचे धडे दिले जाणार आहेत. तीन दिवस हा प्रशिक्षण वर्ग चालणार असून, शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री व पालकमंत्री नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत.

महापालिकेत भाजपला बहुमत मिळवून सहा महिन्यातील कारभार हा वादानेच जास्त गाजत आहे. त्यातच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्येही विसंवाद वाढला आहे. भाजपमध्ये निवडून आलेले ६६ पैकी ४८ नगरसेवक हे इतर पक्षातून आले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे शिस्तीचा अभाव असून, अनेक नगरसेवक नवखे आहेत. अनुभवी नगरसेवक कमी असल्याने वेळोवेळी भाजपची कोंडी होत आहे. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित काम होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणतानाच कामकाज सुधारावे यासाठी मुख्यमंत्र्यानीही सूचना केली आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवलेकरांना परतीच्या पावसाची आस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

यंदा नक्षत्रामागून अनेक नक्षत्रे मोठी दडी मारणाऱ्या वरुणराजाने येवला तालुक्यासमोर अस्मानी संकट उभे केले आहे. जिल्ह्यातील पालखेड धरण समूह क्षेत्रातील दमदार पर्जन्यवृष्टीमुळे धरणसाठा उंचावला आहे. पालखेड डाव्या कालव्यामार्फत मिळालेल्या पाण्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीसिंचनाचा प्रश्न मार्गी लागला खरा, मात्र केवळ आभाळमायेवरच अवलंबून असलेली तालुक्याच्या उत्तरपूर्व पट्ट्यातील असंख्य गावे अन् येथील खरीप हंगाम पावसाच्या दडीमुळे संकटात सापडला आहे.

यंदाच्या पावसाळ्यातील अनेक नक्षत्रे मोठी हुलकवणी देणाऱ्या वरुणराजाने येवला तालुकावासियांना ठेंगा दाखवणे सुरूच ठेवले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या सोंडेत न अडकलेला पाऊस तालुकावासियांची चिंता वाढवून जातानाच भाद्रपदातील सध्याच्या कमालीच्या उष्म्याने येवलेकरांना चांगलेच घामाघूम केले आहे. यंदा काही नक्षत्रांचा अपवाद वगळता इतर सर्वच नक्षत्रांनी येवला तालुक्याला मोठा दगा दिला. परिणामी दमदार पावसाअभावी तालुक्यासमोर चिंतेचे ढग घोंगावत आहेत. गेल्या महिन्यातील ३० तारखेला यंदा ‘गाढव’ वाहनावर स्वार होत प्रवेशकर्ते झालेले सूर्याचा ‘पूर्वा’ हे नक्षत्र मंगळवारी संपले. पूर्वाच्या पावसाने सोमवार व मंगळवारी रात्री येवला शहर व परिसरात हजेरी लावली. मात्र त‌िही जेमतेमच. तालुक्यातील महसूलची इतर मंडळे मात्र यात कोरडीच राहिली. एकंदरीत ‘पूर्वा’ जवळपास अगदी कोरडेठाक गेल्याने तालुक्यातील बळीराजा चिंतेत पडला आहे. विशेषतः पालखेडचा कमांड एरिया नसलेल्या अन् सर्वस्वी आभाळमायेवर अवलंबून असलेल्या तालुक्यातील उत्तरपूर्व भागातील बळीराजाची खरिपातील पिकांप्रतीची काळजी अधिकच वाढली आहे. तालुक्यातील यंदाच्या झालेल्या पावसावर नजर टाकली तर अद्यापपर्यंत तालुका वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या कित्येक मिलीमीटर पिछाडीवर आहे. परतीचा पाऊस देखील कुठलाही मागमूस दाखवत नसल्याने साहजिकच तालुक्यातील बळीराजाच्या चेहऱ्यावरील निराशेच्या छटा अधिकच गडद झाल्या आहेत.

पालखेडचे दान पदरात

पालखेडच दान पदरात पडताना गेल्या काही दिवसात तालुक्याच्या पश्चिम, दक्षिण व पूर्व भागातील पालखेड कमांड पट्ट्यात आवर्तनातून गावोगावचे बंधारे भरून मिळाले. या भागात पालखेडचे पाणी खळाळल्याने पाण्याचा झिरपा होताना साहजिकच कमांड एरियातील विहिरींचा जलस्रोत उंचावला गेला पालखेडच्या वितरिका क्रमांक ३३ ते ५२ पर्यंत सर्वांना पाणी मिळाले. कमांड एरियातील गावोगावचे पिण्याच्या पाण्याचे बंधारे तर भरून मिळालेच बरोबरच खरीपाचे आवर्तन देखील मिळाल्याने या भागातील खरिपाच्या पिकांना मोलाची मदत झाली आहे. मात्र, आभाळाची माया होत नसल्याने तालुक्यातील उत्तर-पूर्व पट्ट्यातील शेतकरी महाचिंतेत आहेत.

उत्तर-पूर्व पट्टा धोक्यात

खरीप पाण्याअभावी संकटात सापडला असून, पाणी नसल्याने खरिपाची पिके कोमेजली आहेत. पाण्याच्या कमतरतेमुळे या भागातील मका, सोयाबीन या पिकांच्या उत्पादकता अन् उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. हे संकट दूर होण्यासाठी या भागातील शेतकरी परतीच्या पावसासाठी आकाशाकडे आशाळभूतपणे नजरा लावून बसला आहे.

परतीच्या पावसाकडे डोळे

येत्या बुधवारी (दि.१३) ‘बेडूक’ या वाहनावर स्वार होत सूर्याचा ‘उत्तरा’ नक्षत्र प्रवेशकर्ते होत आहेत. वरुणराजाची कृपादृष्टी होताना ‘उत्तरा’ दमदार व जोरदार बरसाव्यात, बेडकाने त्या बरसत्या पर्जन्यधारात डराव डराव करावे, अन् खरिपाचे संकट दूर व्हावे, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकरी बाळगून आहेत. परतीचा दमदार पाऊस झाला तरच तालुक्यातील गावोगावच्या जलस्रोत उंचावून पुढील काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ‘लाभू दे आभाळाची माया, त्यातून भविष्यात दूर होईल टंचाईची काया’ अशीच आस बाळगत तालुक्यातील जनता परतीच्या पावसाकडे नजरा ठेवून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडला अपघातात सहा जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड येथून नाशिकला जाणाऱ्या येवला-नाशिक बसला रसलपूर फाटा येथे ट्रकची धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात बसच्या चालकासह सहा जण जखमी झाले आहेत.

निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास हा अपघात झाला. नाशिक-औरंगाबाद रोडने निफाडकडून कोठूरे फाटाकडे ट्रक (डब्लू बी ११, डी १२८६) भरधाव वेगाने जात होता. या ट्रकच्या मागील बाजूने येवला-नाशिक ही बस जात होती. मात्र ट्रक चालकाने अचानाक ट्रक वळविल्याने मागून येणारी बस ट्रकवर आदळली. त्यामुळे बसचा पुढील भाग चेपला गेला. या अपघातात बसचे चालक सुरेश विंचू, बसचे वाहक विजय वाघ (रा. राजापूर, ता. येवला), अमोल बोरगुडे, (रा. नैताळे), वैशाली नीलेश मोरे (निफाड), जीवन गायकवाड (अंदरसूल), कैलास तांदळे (निफाड) सहा जण जखमी झाले. त्यांना निफाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. निफाड पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या अपघातामुळे निफाड-नाशिक रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. बस आणि ट्रकच्या धडकेचा मोठा आवाज होताच परिसरातील शेतकरी मदतीसाठी धावले.त्यांनी बसमधील प्रवाशांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ विद्यार्थ्याचा मृतदेह आणला आश्रमशाळेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तालुक्यातील वीरगांवपाडा शासकीय आश्रमशाळतील इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा स्वाइन फ्लूसदृश्य आजाराने मृत्यू झाल्याने संतापलेल्या आदिवासी बांधवानी त्या विद्यार्थ्यांचा मृतदेह थेट वीरगावपाडा आश्रमशाळेच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी रात्री ९.३० वाजता आणून ठवेला. जोपर्यंत दोषी अधिकारी व शिक्षकांवर कारवाई करून त्यांना निलंबित केले जात नाही, तोपर्यंत मृतदेह शाळेतून न नेण्याचा इशारा दिल्याने मध्यरात्री तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मध्यरात्री १२.३० वाजेच्या दरम्यान मृतदेह घेतला. यावेळी तीनशे लोकांचा जमाव उपस्थित होता. दरम्यान आश्रमशाळा अधीक्षक डी. एस. सोनार यांना चौकशीसाठी सटाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वीरगाव पाडे येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थी सतीश बागुल याचा मंगळवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली.

प्रशासनाचे दुर्लक्ष

गत दोन ते तीन दिवसांपासून या विद्यार्थ्यांना ताप, खोकला, उलट्यांचा त्रास होत होतो. असे असताना या विद्यार्थ्यांना तत्काळ औषोधोपचार करणे आवश्यक होते. मात्र आश्रमशाळा प्रशासनाने दोन दिवस या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा पालकांचा आरोप आहे. दोन दिवस उलटल्यावर सतीश बागुलसह अंकुश सोनवणे व सोपान भोये यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. उपाचारा दरम्यान सतीशचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टाइम्स हाऊसिंग फेस्ट’ शनिवारपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना आपल्या बजेटमधील घरे, रो-हाउसेस, फ्लॅट्स, प्लॉट्स यासारख्या प्रॉपर्टीजची माहिती एकाच ठिकाणी मिळविण्याची संधी चालून आली आहे. टाइम्स ग्रुपतर्फे आयोजित येत्या १६ व १७ सप्टेंबरला ग्रीन व्ह्यू हॉल, हॉटेल एमरल्ड पार्क, त्र्यंबक रोड येथे ‘टाइम्स हाऊसिंग फेस्ट नाशिक’ होणार आहे.

‘टाइम्स हाऊसिंग फेस्ट नाशिक’ या प्रॉपर्टी प्रदर्शनातून ही संधी उपलब्ध झाली आहे. शहर व परिसरातील नामांकित बांधकाम विकसकांचे प्रकल्प एकाच ठिकाणी या प्रदर्शनातून पाहता येणार आहे. नवरात्रोत्सव, दिवाळी असे सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. सण उत्सवाच्या या काळात ग्राहकांचा गृहखरेदीकडे मोठा ओढा असतो. तसेच बांधकाम विकसकांकडूनदेखील वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्सची बरसात सुरू करण्यात आली आहे. जीएसटी नाही, पाच ते दहा लाख रुपयांची सूट, कार फ्री अशा अनेक आकर्षक ऑफर्सचा यात समावेश आहे. नोटबंदी व रेराच्या अवलंबानंतर रिअल इस्टेट मार्केट डळमळीत झाले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून रिअर इस्टेट मार्केटमध्ये चांगले दिवस पुन्हा आणण्यासाठी एक पाऊल उचलण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामध्ये सुमारे १७ बिल्डर्स शंभरपेक्षा जास्त प्रोजेक्ट घेऊन सहभागी होणार आहेत.

येथे साधा संपर्क
बारा लाखांपासून दोन कोटी रुपयांची घरे, रो हाऊसेस शिवाय प्लॉट्स, व्यावसायिक जागा या प्रदर्शनात बघण्यास मिळणार आहे. या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी व आपला स्टॉल बुक करण्यासाठी हेमंत पाचपुते (९४२२९४४४८४) यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळेला १८पर्यंत पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नोकरीचे आमिष दाखवून राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेकडो तरुणांची आर्थिक फसवणूक करणारा लासलगाव येथील ढोकेश्वर मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीचा संस्थापक सतीश काळे याला पोलिसांनी सापळा रचून अटक केले. निफाड न्यायालयाने त्याला १८ सप्टेंबरपर्यंत पोल‌सि कोठडी सुनावली आहे.

फसवणूक केलेल्या मनमाड येथील एका तरुणाने रविवारी (दि. १०) लासलगाव पोल‌सि स्टेशनला काळे विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी लासलगाव येथील संस्थेच्या मूळ शाखेसह जिल्ह्यातील ९ शाखांवर छापा टाकून कारवाई केली. तेव्हापासून काळे फरारी झाले होते. अखेर सोमवारी सायंकाळच्या सुमारास विंचुर बसस्थानक परिसरात त्याच्या मोबाइल लोकेशनवरून त्याला पोलिसांनी अटक केली होती.

लासलगाव पोलिसांनी सतीश काळे याला निफाडच्या न्यायालयात हजर केल्यानंतर सरकारी पक्षाचे वकील अॅड. व्ही. एन. हाडपे यांनी अधिक तपासासाठी काळे याला दहा दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायमूर्ती यांनी सहा दिवसांची कोठडी सुनावली. काळे सध्या लासलगाव पोलिसांच्या ताब्यात आहे.

दरम्यान काळे सापडल्यानंतर पोल‌सि गुंतवणूकदार आणि नोकरीच्या आमिषाने फसलेले तरुण यांच्या आर्थिक फसवणुकीचा कसा आणि किती गांभीर्याने तपास करतात हे येत्या काही दिवसात होणाऱ्या कारवाईतून समोर येईल. ढोकळेश्वर पतसंस्थेच्या माध्यमातून काळे याने राज्यभरातील हजारो तरुणांनी नोकरीचे आमिष देवून फसविले आहे.

३८ तक्रारी दाखल

ढोकेश्वेर मध्ये गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार व नोकरीच्या आमिषाने पैसे भरलेल्या तरुण यांना सतीश काळेला अटक झाल्याचे समजल्यानंतर लासलगाव पोल‌सि स्टेशनमध्ये आपली तक्रार दाखल करण्याससाठी धाव घेतली आहे. मंगळवार व बुधवारी अनेक ठिकाणचे गुणवणूकदार व पैसे भरलेले तरुण लासलगाव पोलिस स्टेशनला आले होते. मंगळवारपर्यंत ३८ तक्रारी दाखल झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१७ शिक्षकांना ‘आई सन्मान पुरस्कार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या आई प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणारे ‘आई सन्मान पुरस्कार’ प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दिघे व सचिव गिरीष सूर्यवंशी यांनी जाहीर केले. जिल्ह्यातून एकूण १७ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील उपक्रमशील व शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक योगदान देणाऱ्या संस्कारशील प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांचा यंदापासून आई प्रतिष्ठान गौरव करणार आहे. यात मालेगावातील दोन शिक्षकांचा समावेश असून, अन्य तालुक्यातील एक उपक्रमशील शिक्षकाची यासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारार्थिंना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, श्यामची आई पुस्तक या स्वरुपात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत गौरवारार्थिंना गौरविण्यात येईल, असे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष निवृत्ती सावंत, कोषाध्यक्ष प्रवीण शिंदे, छाया पाटील, वैशाली भामरे, सीमा कासार यांनी सांगितले.

यांच्या होणार सन्मान

निवड करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये शेखर ठाकुर (मालेगाव), सुरेश सलादे (दिंडोरी), रामदास शिंदे (पेठ), जगन्नाथ बिरारी (इगतपुरी), वैशाली भामरे (येवला), पंकज जाधव (देवळा), शिवाजी शिंदे (चांदवड), चारुलता धोंडगे (नांदगाव), गजानन उदार (निफाड), विवेक

घोलप (नाशिक), भास्कर भामरे (कळवण), प्रशांत बैरागी (सटाणा), प्रा. लता पवार (नाशिक), सोनाली पाटील (सुरगाणा), सुनील आहेर, सुहास शेवाळे व कुमुद पाटील (मालेगाव) यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायतीत विद्युत व्यवस्थापक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सन २०३० पर्यंत नाशिकला विजेची कमतरता पडू नये यासाठी आराखडा करा. जिल्ह्यातील ७७६ ग्रामपंचातीमध्ये विद्युत व्यवस्थापकाची महिनभरात नेमणूक करा, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इच्छामणी लॉन्स येथे घेतलेल्या जनता दरबारात दिले. तसेच ग्राहकांचा मेळावा ३० तारखेला झालाच पाहिजे व जिल्ह्यातील नळ पाणीपुरवठा योजना, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी सौरउर्जेवर करा अशा सूचनाही केली.

इच्छामणी मंगल कार्यालयात आयोजित १० वीज उपकेंद्राचे लोकार्पण व सात वीज उपकेंद्राच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शितल सांगळे, आमदार बाळासाहेब सानप, जयंतराव जाधव, अपूर्व हिरे, सीमा हिरे, उपमहापौर एस. जी. गीते, सभापती शिवाजी गांगुर्डे, महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे संचालकसतीश करपे, मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता सुनील पावडे उपस्थित होते.

ग्राहक संवाद वाढविण्याच्या सूचना

शासनाने दिलेल्या निधीतून सुरू असलेली कामे तपासणे व जनतेशी संवाद साधण्यासाठी आपण येथे आलो आहोत. प्रत्येक महिन्याच्या ठरलेल्या व जाहीर केलेल्या तारखेला शाखा अभियंत्यांनी ग्राहक मेळावा घेऊन ग्राहकांच्या तक्रारी सोडवाव्यात. ग्राहकांचे मोबाइल क्रमांक शंभर टक्के नोंदवून त्यांच्याशी संवाद वाढवा, अशा सूचना ऊर्जामंत्र्यांनी दिल्या.

वीज अपघातातून मुक्तता

नाशिक शहरातील अपघाताचा धोका ओळखून हे टाळण्यासाठी सरकारने योजना आखली आहे. त्यामुळे शहर वीज अपघातातून मुक्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना शाश्वत व दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून राज्यातील ४० लाख शेतकरी सौर ऊर्जेशी जोडण्यात येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील ४०० ते ५०० शेतकऱ्यांचा त्यात समावेश असणार आहे.

यंत्रणा सक्षमीकरणावर भर

ग्रामविद्युत व्यवस्थापकामुळे ग्रामीण भागातील लाइनमनची अडचण दूर होणार आहे. विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्तीतून शाखा अभियंत्यांचे काम सोपे होणार असून, शाखा अभियंत्यांनी त्यांच्या नियुक्तीसाठी जबाबदारीने काम करावे. नाशिक जिल्ह्यातील विजेची ५५० कोटींची कामे मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होणार आहेत. आगामी काळात २०३० पर्यंत नाशिकची विजेची गरज लक्षात घेऊन ती पूर्ण करण्यासाठी शासन आराखडा बनवत आहे. भविष्यात जवळपास ४० हजार मेगाव्हॅट विजेचे पारेषण राज्यात करावे लागणार आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणा सक्षम व अद्ययावत करण्यात येत आहे.

सहकार्याचे आवाहन

ग्राहकांनी वीज कंपनीच्या अडचणी समजून घेऊन सहकार्य करावे. जादूच्या कांडीप्रमाणे कामे होत नाही. तर काही चांगल्या कामांसाठी दीर्घ काळही लागतो. प्रत्येक अभियंत्यांच्या कामाचे मूल्यमापन होणार असून, ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही याची आमची भूमिका आहे. ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

लोकार्पण व भूमिपूजन

जिल्ह्यातील वडझिरे, इगतपुरी, करंजाळी, उंबरठाण, कोऱ्हाटे, जानोरी, जळगाव निघोज, कुपखेडा, मालदे आणि साकोरा याठिकाणच्या ३३/११ केव्ही वीज उपकेंद्राचे लोकार्पण तर डहाळेवाडी, वडनेर वीराने, सावरगाव यासह विजयनगर, शरदवाडी रोड (ता. सिन्नर), सायने टेक्सटाईल पार्क आणि सायने म्हाडा (ता. मालेगाव) येथील ३३/११ उपकेंद्राचे भूमिपूजन ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

५५० कोटींची कामे

नाशिक शहर व जिल्ह्यातील वीज समस्या सोडविणे व नवीन यंत्रणा बसविणे आदी कामांसाठी शासनाने ५५० कोटी रुपये दिले आहेत. जनतेसह उद्योगांनाही वीज कमी पडणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महावितरण देशातील सर्वाधिक वीज वितरण करणारी कंपनी ठरली आहे. गेल्या ३० मार्चला २४ हजार ४०० मेगावॅट विजेचे यशस्वी पारेषण व वितरण करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले असून नवीन वीज वितरणातील नवीन विक्रम घडला असल्याचे बावनकुळे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीकडूनच पत्नीची हत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर
त्र्यंबकरोडवरील विद्यामंदिर परिसरात संशयास्पद अवस्थेत आढळलेला महिलेचा मृतदेह ही खूनाचीच घटना असल्याच्या निष्कर्षापर्यंत सातपूर पोलिस पोहोचले आहे. या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच तिचा खून केल्याची माहिती अटक आरोपीने दिली असून कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चारीत एका महिलेचा मृतदेह मिळून आला होता.
सरस्वती शहेंद्रकुमार गुप्ता (२७) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. ती पतीसह मुंबईत वास्तव्यास होती. काही महिन्यांपूर्वी पती शहेंद्रकुमार गोविंद गुप्ता (३२) याचा भाऊ शेखर हादेखील मुंबईला राहण्यासाठी आला होता. शेखर व सरस्वती यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. त्यावरून शहेंद्रकुमारचे सरस्वतीशी वाद होत. त्याने शेखरला नाशिकमधील अंबड लिंकरोडवरील केवल पार्क येथे वास्तव्यास असलेल्या मावस भावाकडे कामाला पाठविले. परंतु, शेखर सरस्वतीला भेटण्यासाठी मुंबईला वारंवार येत असे. यावरून सरस्वती व शहेंद्रकुमार यांच्यात जोरदार भांडण झाले. शेखरची समजूत काढण्यासाठी शहेंद्रकुमार पाच सप्टेंबरला नाशिकला आला होता. यावेळी त्यांचा आपापसात वाद झाला. शेखरने सरस्वतीला शहेंद्रकुमार भांडण करत असल्याचे सांगत नाशिकला बोलावून घेतले. पुन्हा जोरदार वाद झाला. यानंतर ७ सप्टेंबर रोजी शेखर आणि मावस भाऊ दुसरीकडे निघून गेले. रात्री झोपेत असताना शहेंद्रकुमारने सरस्वतीचा गळा आवळून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर तिला हातगाडीवर टाकून तो भर पावसात मध्यरात्री विद्यामंदिर परिसरात आला. बांधकाम विभागाच्या चारीत सरस्वतीचा मृतदेह फेकून त्याने पोबारा केला. गुप्ता दाम्पत्याला चार अपत्य आहेत. एक मुलगी व तीन मुले असून ती उघड्यावर पडली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडमध्ये अंधाराचे राज्य!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड
मुसळधार पाऊस झाल्यावर वीजपुरवठा खंडित होणे फारसे विशेष मानले जात नाही. मात्र, पाऊस नसताना दररोज सायंकाळी पाच ते आठ दरम्यान वीज महावितरण कंपनीकडून केल्या जाणाऱ्या अतिरिक्त भारनियमनाने निफाड शहर अंधारात आहे. याचा परिणाम नागरिकांवर होत असून व्याव‌सायिकांना मोठा फटका बसत आहे.
येत्या काही दिवसांत नवरात्रोत्सव आणि त्यानंतर दसरा, दिवाळी असे सण येऊ घातले आहेत. त्या पार्श्वभूमीवर निफाड शहरात पाच दिवसांपासून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. सकाळी सहा ते नऊ आणि सायंकाळी पाच ते आठ असे तब्बल सहा तास व दिवसभरात चार ते पाच वेळा सरासरी १५ मिनिटे ते अर्धा तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे शहरातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांचे शाळा, क्लास सायंकाळी सुटतात. त्यामुळे मुले अंधारात घरी कसे येणार याची पालकांना चिंता लागते. नियमित भाजीबाजारातील खरेदी, दुकानांमध्ये खरेदीसाठी बाहेर पडायला शहरातील नागरिकांनी सध्या बंद केले आहे. याचा परिणाम निफडमधील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर होत आहे. पीठ गिरणी, इलेक्ट्रॉनिक दुकाने आदी ठिकाणी वीज नसल्याने सायंकाळी ग्राहक येत नाहीत. शिवाय इतर व्यवसायांवरही परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे या प्रश्नी बोलण्यास किंवा निवेदन वा आंदोलनाचा इशारा देण्याचे धाडस अद्याप कोणत्याही राजकीय पक्ष, संघटना, यांनी का दाखविले नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

कोळश्याची उपलब्धता कमी
वीजनिर्मिती कंपन्यांसोबत झालेल्या काररानुसार महावितरण महानिर्मिती कंपनीकडून सुमारे सात हजार मेगावॅट आणि अदानी पॉवर कंपनीकडून तीन हजार ८५ मेगावॅट वीज मिळणे अपेक्षित आहे. कोळशाची उपलब्धता आणि पुरवठ्यात येणाऱ्या अडचणीमुळे महानिर्मितीकडून सुमारे साडेचार हजार तर अदानीकडून सतराशे ते दोन हजार मेगावॅट इतकीच वीज मिळत असल्याची माहिती महावितरणचे निफाड येथील उपअभियंता बी. ए. सुरवसे यांनी दिली आहे. त्यामुळे वीजतुटवडा निर्माण झाला आहे. लघु निविदेतून खुल्या बाजारातून ३९५ मेगावॅट वीजखरेदी केली आहे. शिवाय पॉवर एक्स्चेंजची वीज खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. ती वीज दोन-तीन दिवसात उपलब्ध झाल्यानंतर पुरवठा सुरळीत होईल. तोपर्यंत ईएफजी या गटातील वाहिन्यांवर आपात्कालीन व तात्पुरते भारनियमन केले जात आहे. ग्राहकांनी काही दिवस सहकार्य करावे, असे आवाहनही सुरवसे यांनी केले आहे.

निफाडमध्ये लोक सायंकाळी खरेदीसाठी बाहेर पडतात; मात्र सध्या वीज नसल्याने लोकांना घरातच बसावे लागत आहे. त्यामुळे शहरातील उद्योग, व्यवसायावर परिणाम झाला आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी असे सण तोंडावर असताना असे अतिरिक्त भारनियमन करू नये.
- नंदलाल चोरडिया, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांचा’ आवाज वाढलाच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वाढलेला आवाज २८ गणेश मंडळांना महाग पडला आहे. मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी कक्षेत ८० डेसिबलपेक्षा अधिक डीजे आवाज करणाऱ्या गणेश मंडळांसह डीजे मालकांना नोटिसा पाठवण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहुल खाडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

प्रक्रियेनुसार मंडळ अध्यक्ष व डीजे मालकांचे म्हणणे ६० दिवसाच्या आत ऐकून घेतल्यानंतर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिस अधीक्षक डॉ. संजय दराडे यांच्या आदेशान्वये डीजेचा आवाज मोजण्यासाठी आवाज मोजमाप यंत्रे पोलिस ठाण्याला देण्यात आली होती. पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीत डीजेचे आवाज मोजण्यात आले. त्यात मनमाड विभागात २८ मंडळांच्या डीजेचा आवाज १०० डेसिबलपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाले. यात येवला शहरातील १०, येवला तालुक्यातील पाच, मनमाड परिसरातील पाच, चांदवडमधील चार आणि वडनेर भैरव येथील चार अशा एकूण १८ गणेशमंडळांचा समावेश आहे

जिल्ह्यातील मोठी कारवाई
सदर मंडळाचे अध्यक्ष व संबंधित डीजे मालक अशा ५६ जणांना पोलिसांनी नोटिसा पाठवल्या असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. राहुल खाडे यांनी सांगितले. ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. डीजेचा आवाज जास्त असलेल्या मंडळांना पुरस्कार योजनेतून वगळण्यात आले आहे. तसेच डीजेसंदर्भात ही जिल्ह्यातील मोठी कारवाई मनमाड विभागात झाल्याचेही डॉ. खाडे यांनी यावेळी सांगितले.

अशी आहेत मंडळे
पोलिस स्टेशन.......गणेश मंडळे
येवला शहर.......१०
येवला तालुका........५
मनमाड........५
चांदवड........ ४
वडनेर भैरव........ ४
एकूण ........ १८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हसरूळ, उपनगरला तरुणांची आत्महत्या

$
0
0

नाशिक : शहरातील म्हसरूळ आणि उपनगर परिसरात दोन वेगवेगळ्या घटनेत तरुणीसह दोन जणांनी आत्महत्या केली. आत्महत्या का करण्यात आली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
म्हसरूळमधील किशोर सूर्यवंशी मार्ग परिसरात एका तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नागेश केदारनाथ पगारे (२४, रा. शिवतीर्थ सोसायटी) असे त्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.
उपनगरजवळील गंधर्व नगरी परिसरातील एका तरुणीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. शिवानी सोमनाथ चव्हाण (१८) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी मृत्युची नोंद केली आहे. मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास तिने विषारी औषध सेवन केले. उपचारापूर्वी तिचे मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाखाची चोरी

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक
तरुणाला बोलण्यात गुंतवित तिघांनी दुचाकीच्या डिक्कीतून सुमारे दीड लाखाची रोकड लांबविली. पुणे महामार्गावरील तरण तलाव परिसराजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
जिजामातानगर परिसरातील उदय मनसुख भगत (१७, रा. महाभक्ती अपा.) याने फिर्याद दिली आहे. उदय मंगळवारी (दि. १२) सकाळी पैसे काढण्यासाठी बँकेत गेला होता. दीड लाखाची रोकड काढून तो घराकडे परतत असताना हा प्रकार घडला. तरण तलावासमोरील साई पूजा स्विट दुकानासमोर अ‍ॅक्टिव्हा (एमएच १५ सिजी ११७८) उभी करून तो समोसे घेण्यासाठी गेला. त्यावेळी तिघा तरुणांनी त्याला गाठले. त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यांच्या सहकाऱ्यांनी दुचाकीच्या डिक्कीतील रोकड हातोहात लांबविली.

रेणुकानगरला घरफोडी
नानेगाव रोडवरील रेणुकानगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ६१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुह्याची नोंद केली आहे.
निवृत्ती केदू बत्ताशे (५४, रा. सैनिक विहार सोसायटी, रेणुकानगर) यांनी फिर्याद दिली आहे. बत्ताशे कुटुंबीय ७ ते १० सप्टेंबर या कालावधीत धार्मिक कार्यक्रमानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे गेले होते. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याच्या बांगड्या, नथ, गोफ असा सुमारे ६१ हजाराचा ऐवज चोरून नेला.

सव्वादोन लाख लंपास
नाशिक : शरणपूररोडवरील टिळकवाडीत भरदिवसा घरफोडी करून चोरट्यानी रोकडसह सुमारे २ लाख ३५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. बिपीन रमेश बुझरूक (रा. जयंत सोसायटी, प्राईड हॉटेल शेजारी टिळकवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. बुझरूक कुटुंबीय मंगळवारी दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडले होते. चोरट्यांनी बंद घराचे सेफ्टी गेटचे कुलूप तोडून कपाटातील रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे दोन लाख ३५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिडकोत पोलिसाला धक्काबुक्की

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक
हेल्मेट विरोधी कारवाई करून दंड आकारल्याने तीन तरुणांनी एका पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून धक्काबुक्की केली. सिडकोतील महापालिका हॉस्पिटलसमोर ही घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी या युवकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे.
सचिन शिवाजी चंद्रमोरे आणि सुनील पोपट भरीत अशी अटक केलेल्या संशय‌ितांची नावे आहेत. त्यांच्यासोबत अन्य एक आरोपी आहे. अंबड पोलिस स्टेशनचे कर्मचारी अनिरुध्द येवले यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास अंबड पोलिस नाकाबंदी करीत होते. त्यावेळी सिडकोतील महापालिका हॉस्पिटलसमोर दुचाकी (एमएच ४१ के ८१६६) पोलिसांनी अडविली. त्यावरील दुचाकीचालक विनाहेल्मेट प्रवास करीत होता. पोलिसांनी वाहन अडविताच संशय‌ित दंडाची रक्कम भरून निघून गेले. मात्र, काही वेळाने येऊन ते महिला पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालू लागले. येवले यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. वर्दी उतरविण्याची धमकी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकल वारीचे नवरात्रात आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. या वारीत २२ ते २६ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यातील विविध शक्तीपीठांना भेट देण्यात येणार आहे.

येत्या २१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी सर्वच स्तरावर जोरदार सुरू आहे. नाशिक सायकलिस्टत असोसिएशनर्फेही भगूर, कोटमगाव, वणी, चांदवड या ठिकाणी सायकलवारी करत आदिशक्तींचे दर्शन घेतले जाणार आहे. नवरात्र सायकलवारीत नाशिक शहरासह चांदवड, मालेगाव, सिन्नर, सायखेडा, येवला, पिंपळगाव येथील सायकलिस्टसही सहभाग नोंदविणार आहेत. अधिकाधिक नाशिककरांनी या वारीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक सायकलिस्टसचे अध्यक्ष प्रवीण खाबियांनी केले आहे. वारींची जबाबदारी डॉ. मनीषा रौदळ, मोहन देसाई, डॉ. आबा पाटील, नाना फड यांच्याकडे देण्यात आली आहे.

अशी होणार वारी
नवरात्र सायकल वारी दरम्यान २२ सप्टेंबर रोजी पहिली वारी भगूर येथील रेणुका देवी मंदिरापर्यंत केली जाणार आहे. २३ सप्टेंबर रोजी वणी येथील श्री सप्तशृंगी देवी संस्थान, २४ सप्टेंबर रोजी कोटमगाव येथील श्रीक्षेत्र जगदंबा संस्थान तर २६ सप्टेंबर रोजी ऐतिहासिक श्रीक्षेत्र चांदवड रेणुका देवी संस्थान येथे भेट देण्यात येईल. अधिक माहिती व सहभागासाठी ०२५३-२५०२६१४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचार रोखल्याने विरोधक दुखावले!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील बाजार समितीत मी सतत भ्रष्टाचारमुक्त कारभारावर भर दिला. माझ्या या पारदर्शक कार्यशैलीमुळे विरोधक दुखावले आहेत. विरोधकांनी अविश्वास ठरावा आणावा. त्याने उलट माझी प्रतिमा अधिक उजळेल, असे परखड मत सभापती प्रसाद हिरे यांनी ‘मटा’कडे मांडले.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ संचालकांनी सभापती प्रसाद हिरे यांचे अधिकार काढून घेण्याबाबतचे पत्र बुधवारी दिले होते. याबाबत सभापती प्रसाद हिरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सभा संपल्यानंतर अद्वय हिरे यांनी काही संचालकांना हाताशी धरून सचिवांना पत्र देऊन सचिवांनी ते वाचण्यापूर्वीच त्याची घाईघाईने पोच घेतली आणि माध्यमांना पाठवून सभेत जे घडलेच नाही, त्या विषयी खोटी महितो दिली. मी शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्याने उपसभापतींना अधिकार देण्याबाबतचे पत्र सभापती म्हणून माझ्या नावाने असताना ते मला न देता सभा संपल्यानंतर सचिवांना कसे काय दिले गेले? असा प्रश्न हिरे यांनी उपस्थित केला आहे.

...ही तर अद्वय हिरे यांची खेळी

बुधवारी घडलेल्या प्रकरणात भाजप नेते अद्वय हिरे यांचा हात असल्याचे प्रसाद हिरे यांनी म्हंटले आहे. बाजार समितीत जे काही घडले त्यामागे अद्वय हिरे यांची राजकीय खेळी आहे, दुर्दैवाने त्याला काही संचालक बळी पडले आहेत. मी शेतकऱ्यांच्या या संस्थेत एक रुपयाही कुणाला खाऊ देणार नाही. ही सारी पोटदुखी अर्थजनासाठी आहे. त्यामुळे अशा प्रस्तावाला मी घाबरत नाही. दोनचार दिवसांपूर्वी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे आज एक कसे झाले, हे सामान्य माणसालाही ठाऊक आहे. शिवसेनेच्या संचालकांनी अद्वय हिरे यांच्या राजकीय खेळीला बळी पडू नये. कारण यात माझे नव्हे, तर त्यांचेच भविष्यात मोठे नुकसान होणार आहे. हिंमत असेल तर माझ्याविरुद्ध अविश्वास ठराव आणावा. कारण तालुक्यातील जनतेलाही खरे काय आहे ते कळेल. त्यामुळे सत्य समजल्याने माझी प्रतिमा अधिक उजळून निघेल असे सभापती प्रसाद हिरे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमापन अधिकाऱ्यास लाच घेताना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
येथील नगर भूमापन कार्यालयातील अधिकाऱ्यास मिळकत नावे करण्यासाठी व सिटी सर्व्हेला नोंद घेऊन उतारा देणेसाठी सहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचप विभागाने (एसीबी) बुधवारी रंगे हात पकडले. अरुणदास नथूदास वैरागी असे लाच स्वीकारणाऱ्या नगर भूमापन अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या आजोबांचे नावे मालेगाव कॅम्प सिटी सर्व्हे नंबर ८११ अ आणि ८१२ अ ही मिळकत होण्याबाबत येथील दिवाणी न्यायाधीशांनी आदेश दिले होते. या आदेशानुसार सदरची मिळकत तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावे करण्यासाठी व सिटी सर्वेला नोंद होऊन उतारा देणेसाठी कार्यालयातील नगर भूमापन अधिकारी अरुणदास नथूदास वैरागी यांनी तक्रादाराकडून १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी ‘एसीबी’च्या नाशिक कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानुसार ‘एसीबी’च्या पथकाने पडताळणी करून बुधवारी सापळा रचला आणि बैरागी याला सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना कॅम्प भागातील नगर भूमापन कार्यालयात रंगेहात पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भागवत कथा म्हणजे दु:ख नष्ट करणारे अमृत

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
संत साह‌ित्य मानवासाठी प्रेरक असून विविध धर्मग्रंथांनी मानवाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविला आहे. या मार्गावर चालून सर्वांनी आपले जीवन सत्कर्मी लावावे. भागवत कथा म्हणजे दु:ख समूळ नष्ट करणारे अमृत आहे, असे प्रतिपादन साध्वी हरिषाजी यांनी भागवत कथा महायज्ञाच्या समारोप प्रसंगी केले.
सदगुरूदेव श्री सतपालजी महाराजप्रणीत मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने श्रीमद भागवत पुराण कथा महायज्ञ पार पडला. नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथे श्री हंस कल्याण धाम आश्रमात या सोहळ्याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. समारोप समारंभाला उपमहापौर प्रथमेश गिते, साध्वी मैत्रेयीजी, साध्वी पुजीताजी, साध्वी कमलाजी, महात्मा अमरबेलानंदजी, महात्मा चतुरवेदानंदजी आदी मान्यवर उपस्थ‌ित होते.
समारोप प्रसंगी साध्वी हरिषाजी यांनी भागवत कथेचे महत्त्व आणि मानवी जीवनात त्याचे असलेले महत्त्व विषद केले. त्या म्हणाल्या, की ‘भगवतः इदं भागवतम्’ असे म्हटले जाते. भगवंतांचे स्वरूप दर्शविण्याचे आणि भगवत तत्त्वाचा निर्देश करण्याचे काम भागवत करते. जी व्यक्ती भगवंताची होते तिलाही भागवत म्हणतात. श्रीमदभागवत हे संसारातील भय दुःखाचा समूळ नाश करणारे अमृत आहे. मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले साधन नाही. भगवंत प्राप्तीसाठी परमात्मा संबंधातील श्रवण, मनन, चिंतन हेच प्रत्येक जीवासाठी कल्याणकारी असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

सुमधुर भक्तगीतांनी चैतन्य
या भागवत कथेप्रसंगी भजन गायक कलाकारांनी सुमधुर भक्तगीते गाऊन भाविकांना मंत्रमुग्ध केले. नवीन कुमार यांनी बासरीवर तर प्रकाश कुमार यांनी तबल्यावर साथसंगत केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय भंदुरे, भास्कर भालेराव, प्रशांत काश्म‌िरे, भाऊसाहेब बोराडे, चांगदेव अरिंगळे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images