Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिकची भैरवी ‘मिस ग्लोबल’च्या टॉप टेनमध्ये

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जमैकामध्ये झालेल्या मिस ग्लोबल इंटरनॅशनल स्पर्धेत नाशिकची भैरवी प्रदीपलाल बुरड हिने अंतिम फेरीत धडक मारत पहिल्या १० क्रमांकांत स्थान मिळविले. याच स्पर्धेत ती ‘मिस ग्लोबल एशिया २०१७’ या कॉन्टिनेंटल टायटलची विजेती ठरली. १५ सप्टेंबर २०१७ रोजी या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. भैरवी बुरड ही नाशिकमधील बीवायके महाविद्यालयात कॉमर्स शाखेत टीवायबीकॉमचे शिक्षण घेत आहे. भैरवीच्या यशाने प्रथमच नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

नवी दिल्ली येथे ऑगस्ट २०१७ मध्ये झालेल्या स्पर्धेत भैरवीने मिस ग्लोबल इंटरनॅशनल इंडिया स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. याच स्पर्धेत तिने बेस्ट रॅम्प, बेस्ट कंजुनिअॅलिटी हा किताब पटकावला. या कामगिरीमुळेच तिची जमैकातील मिस ग्लोबल इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली होती. सप्टेंबर २०१७ मध्ये तिने सेंट्रल अमेरिकेत झालेल्या सौंदर्य स्पर्धेत पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले होते. मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या भैरवीची ही कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. मिस ग्लोबल इंटरनॅशनल स्पर्धेत ती ‘मिस ग्लोबल एशिया २०१७’च्या कॉन्टिनेन्टल टायटल्सची मानकरी ठरली.

नृत्याचीही आवड

भैरवीला बालपणापासून नृत्याची आवड आहे. तिने आतापर्यंत नृत्याच्या विविध स्थानिक स्पर्धांमध्ये बक्षिसे पटकावली आहेत. २०१६ मध्ये झालेल्या मिस टीजीपीसी (दि ग्रेट पॅजिअंट कम्युनिटी) या ऑनलाइन सौंदर्य स्पर्धेत भैरवी विजेती ठरलेली आहे. दिल्ली येथील दि उमराव येथे झालेल्या अब्राक्सस गॉडेस ऑफ ब्यूटी २०१७ या राष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धेत भैरवीने विजेतेपद पटकावले होते.

‘मटा श्रावणक्वीन’चा फायदा

२०१५ मध्ये झालेल्या मटा श्रावणक्वीन स्पर्धेत भैरवीने सहभाग घेतला होता. त्यात तिची टॉप फाइव्हमध्ये निवड झाली होती. यात भैरवीला बेस्ट रॅम्पचे पारितोषिक मिळाले होते. या स्पर्धेमुळे मुंबई येथे दहा दिवसांच्या ट्रेनिंगमध्ये भैरवीची निवड झाली होती. त्याचा मला खूपच फायदा झाला असल्याचे भैरवी सांगते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सम्यकसंबुद्ध’ने उलगडला गौतम बुद्धांचा प्रवास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिद्धार्थने बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी षडरिपुंवर कशा प्रकारे विजय मिळवला त्याचा प्रवास रविवारी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या ‘सम्यकसंबुद्ध’ या नाटकातून उलगडण्यात आला. हे नाटक संवर्धन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सादर करण्यात आले.

सिद्धार्थ जेव्हा बोधी झाला, त्याला बुद्धत्व प्राप्त झाले. त्या वेळी माराने त्याच्यावर आक्रमण केले. हे आक्रमण षडरिपुंच्या माध्यमातून होते. या आक्रमणावर भगवान गौतम बुद्धांनी आपल्या बुद्धत्वाने त्यावर विजय मिळवला व बुद्धत्व प्राप्त केले. जागतिक पाली भाषा दिन तथा अनागारिक धम्मपाल जयंती उत्सवानिमित्त पाली मराठी भाषेतील नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे लेखन माधव सोनवणे यांनी, तर दिग्दर्शन प्रशांत हिरे यांनी केले होते. रंगभूषा- माणिक कानडे, प्रकाशयोजना- रवी रहाणे, संगीत- रोहित सरोदे, नेपथ्य- विकास लोखंडे, तर वेशभूषा अंकिता पाटील यांची होती. या नाटकात दिलीप काळे, भूषण गायकवाड, मिलिंद साळवे, नितीन साळवे, मिलिंद अंभोरे, सतीश पवार, सुनील जगताप, शकुंतला दाणी, रेखा पवार, मृणाल निळे, अश्विनी आढाव, कोमल ढोले, किरण पाटील, रजत शिंदे, कुशल भालेराव, श्रीपाद ब्राह्मणकर आणि सचिन चव्हाण यांच्या भूमिका होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेयजल योजनेंतर्गत २१ कोटी निधी मंजूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर तालुक्यातील कालमर्यादा संपलेल्या प्रादेशिक योजनांचे पुनर्जीवन करण्यासाठी मनेगावसह सोळा गाव योजनेत अधिक सात गावे आणि ४४ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत सुमारे एकवीस कोटी रुपयांच्या योजनेस शासनाकडून मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली.

आमदार वाजे यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेची मुदत २००६ मध्ये संपलेली असताना या योजनेच्या पुनर्जीवनासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. या योजनेची मुदत संपल्याने वेळोवेळी नादुरुस्तीमुळे सर्व गावांना पाणी मिळत नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. या प्रकरणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी पत्रव्यवहार करून या योजनेस मंजुरी मिळवली. पुनर्जीवन योजनेमुळे तालुक्यातील २२ गावे व ४४ वाड्यांना फायदा होणार आहे. नवीन योजनेत भोजापूर धरणातून थेट सात पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा होणार आहे, असे आमदार राजाभाऊ वाजे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठीतील राठींचा सातारा मॅरेथॉनमध्ये झेंडा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातारा येथे रविवारी झालेल्या हिल मॅरेथॉनमध्ये नाशिक सायकल‌िस्ट्स फाउंडेशनचे सदस्य असलेल्या ६१ वर्षीय अॅड. दिलीप मदनलाल राठी यांनी सुपर वेटरन गटात दुसरा क्रमांक मिळवला आहे.

विशेष म्हणजे त्यांनी अनवाणी पायांनी केवळ २ तास ६ मिनिटांत २१ किलोमीटरची अर्धमॅरेथॉन पूर्ण केली आहे. याद्वारे त्यांनी फिटनेसच्या बाबतीत आजच्या तरुणाईसाठी वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. सातारा हिल मॅरेथॉनचे संचालक डॉ. संदीप काटे यांच्या हस्ते अॅड. दिलीप राठी यांना गौरविण्यात आले. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांची उपस्थिती होती.

अॅड. राठींनी आजपर्यंत देश विदेशांतील ५० हून अधिक मॅरेथॉनमध्ये भाग घेतला असून, त्यांनी सायकलिंगमध्येही नाशिक ते गोवा, दिल्ली ते मुंबई अशा मोहीम फत्ते केल्या आहेत. त्याचप्रमाणे राठी हे उत्कृष्ट गिर्यारोहकही आहेत. त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प, रुपकुंड ट्रेक, कांचनजुंगा ट्रेक, अन्नपूर्णा ट्रेक, कैलास मानसरोवर ट्रेक, ओमपर्वत ट्रेक असे नानाविध अवघड असे ट्रेक पूर्ण केले आहेत. गिर्यारोहण, सायकलिंग, धावणे यातून फिटनेस राखला तर त्याचा फायदा नक्कीच होतो, असे ते तरुणांना नेहमीच सांगत असतात.

सातारा मॅरेथॉनचे हे पाचवे वर्ष असून, नाशिक सायकल‌िस्ट्सच्या सदस्यांनी सलग तिसऱ्या वर्षी विविध गटांत सहभागी होत यशस्वीपणे अर्धमॅरेथॉन पूर्ण केली आहे. यात अॅड. वैभव शेटे, डॉ. मनीषा रौंदळ, साकेत भावसार, डॉ. नीलेश निकम, मनोज शिंदे, नारायण वाघ, अतुल संगमनेरकर, डॉ. सुदर्शन मलसाने आदींसह नाशिक सायकल‌िस्टच्या २० हून अधिक सदस्यांनी सातारा हिल मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला. नाशिक जिल्ह्यातील विविध मॅरेथॉन स्पर्धा गाजवितानाच महाराष्ट्रासह भारतातील इतर राज्यांतीलही स्पर्धा नाशिक सायकलिस्ट्स गाजवत आहेत.

नाशिकचा डंका

सातारा हिल मॅरेथॉनमध्ये शेकडो नाशिककरांनी सहभाग घेऊन आपले वर्चस्व सिद्ध केले. या मॅरेथॉनमध्ये शहरातून शेकडो धावपटू सहभागी झाले होते. गिन‌िज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात जास्त धावपटू धावण्याची नोंद असलेल्या सातारा हिल मॅरेथॉनमध्ये तब्बल ५ हजार धावपटू धावले. २१ किमी अल्ट्रा हिल मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील धावपटूंनी सहभाग घेतला असून, पहिले तीन विजेते हे केनियाचे होते. नाशिकमधून अनेक उद्योजक, डॉक्टर्स, वकील, महिला यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हिल मॅरेथॉनमध्ये सहभागासाठी चामरलेणे, पांडवलेणे, कसारा अशा ठिकाणी साधारण एक महिन्यापूर्वीच धावपटूंनी गर्दी केली होती. हिल मॅरेथॉन धावताना तुमची मानसिक तथा शारीरिक परीक्षा होते व सरावाने ती अधिक मजबूत होते. रिव्हॅल्युएशन ग्रुप, नाशिक रनर्स, नाशिक सायकलिस्ट अशा अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वाहतूक’नंतर आता आरटीओचा दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या निर्देशांप्रमाणे ऑगस्ट महिन्यापर्यंत काम झालेले नसल्याचा ठपका ठेवत परिवहन विभागाने वाहन तपासणीस वेग देण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकसह राज्यभरात प्रादेशिक परिवहन विभागामार्फत (आरटीओ) १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत कारवाई केली जाणार आहे.
सुरक्षा समितीच्या निर्देशांप्रमाणे राज्यभरात रस्ता सुरक्षा विषयक काही मुद्यांना अनुसरूण खासगी वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, विमा प्रमाणपत्र, हेल्मेट तसेच सिटबेल्टचा वापर आणि वाहन चालवताना मोबाइलचा वापर, नियमानुसार नंबर प्लेट नसणे, चुकीच्या हेडलाइट्सचा वापर, मल्टीटोन हॉर्न बसवणे, ट्रिपलसिट यांसह इतर नियमांचे पालन होते की नाही, याची तपासणी सदर मोहिमेदरम्यान करण्यात येणार आहे. राज्यभरात सर्व परिवहन कार्यालयांमार्फत राष्ट्रीय व राज्य महामार्गावर ही मोह‌ीम राबवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवासी पळवापळवी जोमात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शहराचे प्रवेशद्वार असलेले नाशिकरोड रेल्वे स्थानक व नाशिकरोड बस स्थानक काही महिन्यांपासून बेकायदेशीररीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्यांच्या विळख्यात सापडले आहे. वाहतूक पोलिस व स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून येथे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांकडून प्रवाशांची पळवापळवी जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्याचा फटका शहर व परगावच्या बससेवेला बसत असूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर स्वतंत्र रिक्षा व टॅक्सी स्टँड आहे. मात्र, असे असूनही बसस्थानकाच्या आजूबाजूस मोठ्या संख्येने अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी असतात. त्यामुळे रेल्वे व बस स्थानक परिसरात नागरिकांना आपली वाहने आणणे कसरतीचे ठरत आहे. या वाहनांच्या चालकांकडे प्रवासी वाहतुकीचा परवाना नसतानाही ते सर्रासपणे प्रवासी वाहतूक करताना आढळतात. त्याचा फटका बससेवेसह परवानाधारक रिक्षाचालकांनाही बसत आहे. विशेष म्हणजे हा प्रकार पोलिसांच्या डोळ्यांसमोरच सुरू आहे. मात्र, तरीही पोलिसांचा या अवैध प्रवासी वाहतुकीकडे कानाडोळा होत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

--

चालकांची पोलिसांशी गप्पाष्टके

नाशिकरोड बस स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणारी असंख्य वाहने रोजच राजरोसपणे उभी केलेली दिसतात. त्यातील काही वाहने तर थेट बस स्थानकावरील पोलिस चौकीला लागूनच उभी असतात. प्रवासी मिळेपर्यंत अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक पोलिस चौकीत ठाण मांडून ड्युटीवरील पोलिस कर्मचाऱ्यांशी गप्पाही झोडत असतात. पोलिसच या अवैध प्रवासी वाहनचालकांवर मेहेरबानी करीत असल्याचे या प्रकारातून स्पष्ट होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

--

या मार्गांवर पळवापळवी

नाशिकरोड येथून शहर परिसरासह पुणे, संगमनेर, त्र्यंबकेश्वर, वणी, ओझर, सिन्नर व शिर्डी या मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक जोरात सुरू आहे. ही सर्व वाहने नाशिकरोड बस स्थानकावरील पोलिस चौकी व परिसरातील सुभाषरोड, डॉ. आंबेडकररोड, जवाहर मार्केटरोड, पेट्रोलपंप या ठिकाणी उभी असतात. प्रवासी वाहतुकीचा परवाना नसतानाही या वाहनचालकांकडून प्रवासी वाहतूक केली जात असल्याने शासनाचीही फसवणूक होत आहे. संबंधित वाहनचालक रेल्वे स्थानक प्रवेशद्वार, तिकीट बुकिंग कार्यालय, बस स्थानक अशा ठिकाणी प्रवासी शोधत फिरत असतात. शहर बससेवेच्या प्रवासी वाहतुकीवर व रिक्षाचालकांच्या व्यवसायावरही या अवैध प्रवासी वाहतुकीने मोठा परिणाम झाला आहे.

--

नाशिकरोड रेल्वे स्थानक व बस स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे परवानाधारक शहर रिक्षाचालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील अवैध प्रवासी वाहतुकीमुळे शासनाचीही फसवणूक होत आहे.

-किशोर खडताळे, अध्यक्ष, रिक्षा-टॅक्सीचालक-मालक युनियन, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधाभासी धोरणाने मास्तरकीला ‘खोडा’

$
0
0

एकीकडे मागेल त्या संस्थेला शिक्षणशास्त्र कॉलेजची खिरापत देऊन दुसरीकडे पटपताळणी आणि शिक्षक भरती स्थगितीसारख्या विरोधाभासी धोरणांमुळे तरुणांचे मास्तरकीचे ध्येय कोंडीत सापडले आहे. नव्या भरतीवरची बंदी उठण्याच्या प्रतीक्षेत लाखो उमेदवार असतानाच दुसरीकडे शिक्षणशास्त्र कॉलेज नावाच्या कारखान्यांचे उत्पादन मात्र या समस्येत भरच टाकत आहे. या समस्येवर सरकारला लवकरच तोडगा काढावा लागेल अन्यथा शिक्षणव्यवस्था स्वच्छ करण्यास सरसावलेल्या सरकारच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. सामान्य वर्गातील तरुण आशेने या क्षेत्राकडे येत असले, तरी सरकारी धोरणांचा फटका त्यांना बसू पाहतो आहे. दुसरीकडे शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदव्या देणारी कॉलेजेसही अस्तित्व वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड करीत आहेत. याबाबतच्या वस्तुस्थितीवर टाकलेला हा प्रकाशझोत...

--

--

वस्तुस्थिती काय सांगते?

सद्यःस्थितीत राज्यभरात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर कार्यरत शिक्षकांची संख्या सुमारे पाच लाखांच्या घरात आहे. हे सर्व शिक्षक खासगी अनुदानित शाळांसह महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कार्यरत आहेत. राज्यात सन २०१२ नंतर नवी भरतीच झालेली नाही. रिक्त जागांची संख्या सुमारे ३५ हजारांच्या घरात आहे. अतिरिक्त शिक्षकांची संख्या सुमारे ३५ हजारांच्या घरात आहे. राज्यात बी. एड. अभ्यासक्रमाची सुमारे ५५० कॉलेजेस आणि डी. एलएड. अभ्यासक्रमाची सुमारे १२०० ते १४०० कॉलेजस आहेत. अशा शिक्षणशास्त्र विषयाच्या एकूण २ हजारांवर कॉलेजेसमध्ये लाखभर नवे मास्तर दर वर्षी घडविण्याची क्षमता आहे. यात बी. एड.मधून सुमारे ३५ हजार, तर डी. एलएड.द्वारे ७० हजार अशी विभागणी आहे. ज्युनिअर कॉलेजमध्येही राज्यभरात ७२ हजार प्राध्यापक सेवा देतात. त्यापैकी तब्बल २० हजारांवर प्राध्यापक विनावेतन वर्षानुवर्षे काम करीत आहेत. नाशिक विभागातील १८०० प्राध्यापकांचा त्यात समावेश आहे.

--

पटपडताळणीपासून बंधने कडक

राज्यात शाळांमध्ये पटावर बोगस विद्यार्थ्यांची संख्या दाखवून शिक्षकांच्या नेमणुका केला जात असल्याच्या एका तक्रारीनंतर सन २०११ मध्ये नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांची पटपडताळणी केली. तेथे सुमारे दीड लाखांवर बोगस विद्यार्थ्यांचा तपशील हाताशी लागल्यानंतर राज्यभरात ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतून २० लाख बोगस विद्यार्थ्यांचा आकडा बघून अनेकांचे डोळे विस्फारले गेले. बोगस विद्यार्थ्यांच्या नावावर अनुदान लाटणाऱ्या शाळांमुळे नंतरच्या काळात बंधने कडक होत गेली. परिणामी या मोहिमेत अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन झाल्याखेरीज नव्या शिक्षक भरतीस परवानगी न देण्याचे आदेशच सरकारने २ मे २०१२ रोजी दिले.

--

तरीही धुडकावले गेले आदेश

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय नव्या शिक्षक भरतीस परवानगी नसली, तरीही शिक्षण विभागातील अधिकारीवर्गाच्या सहाय्याने राज्यभरात २ मे २०१२ च्या नंतर सुमारे ७ हजारांवर शिक्षकांची भरती केली गेली. ही भरती कायदेशीर की बेकायदेशीर, याबाबत अद्यापचे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे.

--

अतिरिक्तांच्या समायोजनाचा प्रश्न

पटपडताळणी मोहिमेचे फलित म्हणून आढळलेल्या राज्यातील ३० हजारांवर अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकीकडे रिक्त जागांवर अगोदर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून घेण्याचे प्राधान्याचे धोरण असल्याने नव्या मनुष्यबळ व्यवस्थापनाचा विचार अद्याप शिक्षण विभागाच्या मनाला शिवलेला नाही. यातच नवीन भरती आणि नव्या शाळा, तुकड्यांना परवानगी न देण्याचे परिपत्रक असल्याने पुढील चित्र स्पष्ट नाही.

--

टीईटी झाली, पुढे काय?

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) भूत नाचविले गेले. यंदाच्या शैक्षणिक वर्षापर्यंत या परीक्षेत यश मिळविणाऱ्या उमेदवारांची संख्या सुमारे लाखाच्या घरात आहे. अतिरिक्त शिक्षकांची संख्या ३५ हजारांच्या घरात आहेत, तर तितक्याच प्रमाणात रिक्त जागांची संख्या आहे. सरकारने रिक्त जागांवर भरतीदरम्यान अगोदर अतिरिक्त शिक्षकांचा विचार केल्यास ‘टीईटी’पात्र लाखभर उमेदवारांच्या भवितव्याबाबत धोरण काय, याबाबत शिक्षण विभाग बोलायला तयार नाही.

--

कॉलेजेसचा अस्तित्वासाठी लढा

बदलत्या नियमावलीनुसार अनेक शिक्षणशास्त्र कॉलेजेसचे अनुदान बंद करण्यात आले. अनेक कॉलेजेसना पुरेशी विद्यार्थीसंख्या आणि पुरेसे अनुदान असा समतोल साधण्यासाठी दर वर्षी संघर्ष करावा लागत आहे. बी. एड. अभ्यासक्रमाचा वाढलेला कालावधी, इतर व्यावसायिक आणि कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांचे खुले झालेले पर्याय, रखडणारी प्रवेशप्रक्रिया आणि सरकारची नवीन भरतीविषयक धोरणे यांसारख्या प्रमुख कारणांमुळे या कॉलेजेसचा अस्तित्वासाठी लढा सुरू आहे. अनेक कॉलेजेस घटत्या विद्यार्थीसंख्येमुळे या स्थितीत अखेरच्या घटका मोजत असल्याचे दिसून येत आहे.

--

परीक्षा परिषदेचे सूचक आवाहन

कुठल्याही अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यानंतर नोकरीची खात्री कुठलीही संस्था किंवा सरकार देत नाही. असे असले तरीही अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेचा कोटा पूर्ण करण्यासाठी शिक्षण संस्था कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे प्लेसमेंटचे आमिष विविध विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना दाखवितात. मात्र, डी. एलएड. अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने वस्तुस्थितीकडे लक्ष वेधत उमेदवारांना सूचित करण्याचा प्रयत्न यापूर्वीच्या आवेदनातून केला. या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध माहितीपत्रकावर नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांच्या आकडेवारीचे दाखले देत डी. एलएड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना नोकरी मिळेलच याची खात्री नाही, असे छापण्याचे धारिष्ट्य परिषदेला दाखवावे लागले.

--

संस्थाचालकांपुढे यक्षप्रश्न

बी. एड. व एम. एड. हे अभ्यासक्रमही दोन वर्षांचे करण्यात आल्याने एनसीटीईच्या २०१४ च्या निकषानुसार ५० प्रवेशक्षमता असलेल्या युनिटसाठी आठ अर्हताधारक प्राध्यापक असणे गरजेचे आहे. शंभर प्रवेश क्षमता असलेल्या युनिटसाठी १६ अर्हताधारक प्राध्यापकांची आवश्यकता आहे. या कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन देणे अपेक्षित आहे. सरकारच्या शिक्षणशुल्क समितीने (एफआरए) सद्यःस्थितीत जे शिक्षण शुल्क ठरविले आहे, त्यानुसार प्राध्यापकांचा पगार व मिळणारे शुल्क यात ताळमेळ बसत नसल्याचा संस्थाचालकांचा दावा आहे. त्यामुळे नियम पाळावेत तरी कसे, असा यक्षप्रश्न संस्थाचालकांना सतावत आहे.

--
बैठकीतही एकमत

डी. एलएड. आणि बी. एड. कॉलेजेस चालविणाऱ्या संस्थाचालकांची बैठक नुकतीच नाशिकमध्ये पार पडली. बैठकीत या कॉलेजेससमोरील आव्हाने आणि संभाव्य उपाययोजनांच्या अनुषंगाने मंथन झाले. उफराट्या सरकारी धोरणांमुळे या कॉलेजेससमोरील समस्यांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत असल्याच्या मुद्यावर संस्थाचालकांचे एकमत झाल्याने या अभ्यासक्रमाच्या उत्पादकतेची चिंता अधोरेखित झाली आहे.

--

शिक्षण विभागाचे प्रगतिपुस्तक

--

-बी. एड. प्रवेश क्षमता ः सुमारे ४० हजार

-डी. एड. प्रवेश क्षमता : सुमारे ६५ ते ७० हजार

-बी. एड. कॉलेजेसची संख्या : सुमारे ५५०

-डी. एड. कॉलेजेसची संख्या : सुमारे १२०० ते १४००

-ज्युनिअरचे प्राध्यापक : ७२ हजार

-विनावेतन ज्युनिअरचे प्राध्यापक : २० हजार

-कार्यरत शिक्षक : सुमारे ५ लाख

-रिक्त जागा : सुमारे ३५ हजार

-अतिरिक्त शिक्षक : सुमारे ३५ हजार

-टीईटीपात्र उमेदवार : सुमारे १ लाखांच्या आसपास

-भरती केव्हापासून बंद : २ मे २०१२ पासून

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता मोहीमेसाठी सज्ज व्हा!

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यात साथीच्या रोगांना अटकाव करण्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून शहरात शुक्रवारी २२ सप्टेंबरला ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेसाठी यंत्रणेने सज्ज व्हावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
या विशेष मोहीमेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली. बैठकीला आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, महापालिका आयुक्त डॉ. अभिषेक कृष्णा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) दीपककुमार मीना, उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, शशिकांत मंगरुळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, की २२ सप्टेंबर रोजी शहराच्या प्रत्येक भागात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे. त्यासाठी विभागवार नियोजन करण्यात आले असून डेंगूसारख्या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी स्वच्छता उपक्रमाला चालना देणे आणि त्यात जनतेचा सहभाग वाढविण्याची गरज आहे. आयुक्त डॉ. कृष्णा यांनी महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. ते म्हणाले, की शहरात अधिक कचरा असणारे ४४८ ठिकाणे असून मोहिमेत तेथील स्वच्छतेवर भर असेल. मोहीम यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन सुरू असून नागरिकांचा सहभाग वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ७० पेक्षा अधिक संस्था या उपक्रमात सहभागी होतील. साडेतीन हजार महापालिका कर्मचारी आणि २०० घंटागाड्यांची मोहिमेत मदत होणार आहे.

त्र्यंबकमधून आज प्रारंभ
जिल्ह्यात सोमवार (दि. १८) जिल्ह्यात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे उद्‍घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता ‌त्र्यंबकेश्वर येथे करण्यात येणार आहे. अस्वच्छता असलेल्या त्र्यंबक शहरातील सात ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये नगरपालिका, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, गजानन महाराज ट्रस्ट, आनंद मठ, सपकाळ कॉलेज, ब्रम्हा व्हॅली या महाविद्यालयाचे स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. दुपारी एकपर्यंत ही स्वच्छता मोहीम सुरू राहणार आहे. जिल्ह्याच्या अन्य भागांतही मोहीम राबविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाव कोसळल्याने टोमॅटो फेकला रस्त्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण
भाव अचानक कोसळल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकत आपला असंतोष व्यक्त केला. कांद्याचे वांधे आणि टोमॅटोची बिकट अवस्था अशी शेतकऱ्यांची कठीण स्थिती दिसून येत आहे. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

सफरचंदापेक्षा महाग झालेला टोमॅटो एक महिन्याच्या आत अत्यल्प दराने विक्री होत असल्याने शेतकरीवर्गात नाराजी आहे. सध्या टोमॅटोचे बाजारभाव मोठ्या बाजार समितीत सरासरी प्रती क्रेट ९० ते १४० रुपये असे आहेत. तर काही बाजार समित्यांमध्ये निव्वळ २० रुपयांपासून ४० ते ५० रुपये क्रेटचे भाव मिळत आहेत. यामुळे औषधांचा खर्च, मजुरी व वाहतूकखर्च वजा करता पदरात काहीच पडत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून आपला संताप व्यक्त केला आहे. यंदा चांगला भाव मिळाल्याने टोमॅटोने आशा पल्लवित केल्याने शेतकऱ्यांनी टमाटयावर लक्ष केंद्रीत केले होते. महागडे औषधे, पावडरी, स्प्रे, मजुरी, वाहतूक यामुळे हा भाव परवडत नसल्याचे भावड्याचे युवा शेतकरी अशोक मोरे यांनी सांगितले. परंतु, आवक वाढल्याने व पावसाळी वातावरणामुळे ओला माल निर्यात करण्यास मर्यादा पडत आहे. परिणामी टोमॅटोचे भाव पडले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. एकंदरीत यावर्षी टोमॅटोचा पुन्हा लाल चिखल होणार तर नाही ना अशी धास्ती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांवर भारनियमनाचा भार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व पुरवठ्यामध्ये अडचणी येत असल्याने राज्यात तात्पुरते भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे विजेची उपलब्धता व मागणी यांचे नियोजनकरण्यासाठी कृषिग्राहकांच्या वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. ऐन खरिप हंगामातच कृषिपंपांवर दोन तासांच्या आतिरिक्त वीज भारनियमनाचा भार टाकण्यात आल्याने शेतकरी वर्गाला महावितरणने पुन्हा शॉक दिला आहे.

राज्यात कृषिपंपासाठी ज्या ठिकाणी स्वतंत्र वाहिन्या उभारल्या आहेत व ज्या ठिकाणी सिंगल फेजिंग योजना आहे अशा वाहिन्यांवर सद्यपरिस्थितीत दिवसा आठ तास व रात्री आठ तास अशा दोन टप्प्यांमध्ये चक्राकार पद्धतीने रात्री दहापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अखंडित वीजपुवठा करण्यात येत आहे. विजेच्या उपलब्धतेत सुधारणा होताच कृषिपंपांना दिवसा आठ तास व रात्री सहा तास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. विजेची उपलब्धता वाढविण्यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करीत असून लघु निविदेद्वारे खुल्या बाजारातून वीजखरेदी करण्यात येत आहे. याशिवाय पॉवर एक्सचेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न सुरू आहेत. कोळसा उपलब्ध करण्यासाठी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रयत्न करीत आहेत.

कृषिला दुय्यम स्थान

राज्यात तांत्रिक अडचणीमुळे विजेच्या उपलब्धतेत कमतरता निर्माण होते त्या वेळी कृषी वीज ग्राहकांवर भारनियमनाचा भार टाकण्यास प्राधान्य दिले जाते. या प्रकारामुळे सरकार व महावितरण कंपनी कृषीला दुय्यम स्थान देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता पुन्हा एकदा तांत्रिक अडचणीमुळे उत्पादनात घट आल्याने वीज उपलब्धतेवरही परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून महावितरणने तात्पुरते भारनियमन सुरू केले आहे. या भारनियमनाचा भार शेतकऱ्यांवरच टाकण्यात आला आहे. पूर्वी १८ तास दोन टप्प्यात चक्राकार पद्धतीने अखंडित वीजपुरवठा कृषी ग्राहकांना केला जात असे. आता पुरेशी उपलब्धता होईपर्यंत दोन टप्प्यात आठ-आठ तास वीज पुरवठा केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महोत्सवात १०० हून अधिक रानभाज्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र व कृतज्ञता सहयोग नाशिक यांच्या सौजन्याने आयोजित रानभाजी महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला. तब्बल १०० हून अधिक भाज्यांच्या या प्रदर्शनात होत्या.
जयंतराव कुलकर्णी यांनी रानभाज्या महोत्सवाचे उद्‍घाटन केले. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत नाशिकरांनी भाज्या खरेदीसह त्या बघण्यासाठी गर्दी केली. महोत्सवाचे संयोजन डॉ. विक्रांत मुंगी, रोहित वाघ, चैतन्य गायधनी यांनी केले. यावेळी रवींद्र बेडेकर, राजेंद्र वाघ, जयंत गायधनी यांची उपस्थिती होती.
प्रदर्शनात मांडलेल्या भाज्या, त्यांची चव, त्या कशा बनवाव्या यांची माहिती घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. यावेळी उपस्थित सर्वांनी रानभाज्यांचे महत्त्व जाणून घेतले. संयोजकांनीही पारंपरिक भाज्यांव्यतिरिक्त सकस पौष्टिक व औषधी रानभाज्यांची ओळख करून दिली. रुचीपालट तसेच सुदृढ आरोग्यासाठी या भाज्यांचा उपयोग केला जातो. भाज्या तयार करण्याच्या पद्धतीही येथे सांगण्यात आल्या.

नाशिककरांसाठी अनोखी पर्वणी
प्रदूषणमुक्त अस्सल नैसर्गिक वातावरणात तयार झालेल्या आणि शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या या रानभाज्या आहेत. डोंगर कपाऱ्यातून, जंगलातून शोधून आणलेल्या रानभाज्यांचा महोत्सव नाशिककरांसाठी अनोखा ठरला. रानभाजी महोत्सवात रानातील शरीरास उपयुक्त असणाऱ्या खरशेंगा, करडू, नाळभाजी, कोहरेल पाला, बाफलीचा पाला, आघाडा, आकर घोडा यासारख्या विविध औषधोपचारी असणाऱ्या भाज्यांबद्दलही अनेकांनी माहिती करून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्धाच्या बँक खात्यावर डल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वृद्ध व्यक्तीच्या बँक खात्यातील तब्बल ७२ हजार रुपये सायबर गुन्हेगारांनी विदेशात खरेदी करून लांबवले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिरालाल रामदास जाधव (६०, रा. कल्पतरूनगर, अशोका मार्ग) यांच्या फिर्यादीनुसार, अॅक्सिस बँकेत जाधव यांचे खाते आहे. अज्ञात संशयिताने १३ व १४ सप्टेंबर दरम्यान जाधव यांच्या बँक खात्यासह डेबिट कार्डची माहिती मिळवली. त्या आधारे जाधव यांच्या बँक खात्यातील ७२ हजार रुपयांचा विदेशी व्यवहार केला. खात्यातील पैस लंपास झाल्याची बाब लक्षात येताच जाधव यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.

भरदिवसा घरफोडी
आडगाव शिवारातील धात्रक फाटा परिसरात भरदिवसा घरफोडी करीत चोरट्याने ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी संदीप सखाराम भामरे (३९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. गुरुवारी (दि. १४) दुपारी १२ वाजेच्या सुमारास चोरट्याने भामरे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर घरातील सुमारे अडीच तोळे वजनाचे आणि ४५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेलेत. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सदाफुले करीत आहेत.

आयपॅड, लॅपटॉप लंपास
महात्मानगर परिसरातील पार्क ऍव्हेन्यू इमारतीतील घर फोडून चोरट्याने आयपॅड, मोबाइल, लॅपटॉप असा २८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. किशोर तुकाराम नंदेश्‍वर (२९, रा. महात्मानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २९ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत नंदेश्वर यांच्या घरी कोणी नव्हते. याचा फायदा घेत चोरट्याने घरफोडी करून घरातील दोन मोबाइल, डेल कंपनीचा लॅपटॉप, आयपॅड असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार उगले करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडगावात फसला चेन स्नॅचिंगचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव
आडगाव शिवारात दुकानाममध्ये बिस्कीटचा पुडा खरेदी करण्याचा बहाणा करून चोरट्याने दुकानातील महिलेचेच मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न केला. पण, महिलेने प्रसंगावधान साधत विरोध केला तसेच आजूबाजूच्या लोकांना आवाज दिल्याने चोरट्याने पळ काढला.
रंजना लोहकरे असे चोरट्याला विरोध करणाऱ्या महिलेचे नाव आहे. त्यांचे बळीराज जलकुंभसमोरील स्वप्निल शॉपी नावाचे दुकान आहे. तेथे आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज चोरट्याने सुमारे १५ मिनिटे टाइमपास केला होता. त्यानंतर त्याने लोहकरे यांचे मंगळसूत्र पळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. लोहकरे यांनी आडगाव पोलिसांना तात्काळ संपर्क साधला. सहाय्यक पोलिस निरीक्षक काकाराव पाटील, हवालदार भगवान आडके यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वायरलेस वरून मेसेज देऊन चोराचे वर्णन दिले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीचा सर्व प्रकार कैद झाला आहे. काहीही चोरीस न गेल्याने पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही. दरम्यान, चेनस्नॅचिंगचे स‌त्र सुरूच असून नागरिकांनी विशेषत: महिलांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अखेर गुन्हा दाखल
शहरात एकाच दिवशी झालेल्या सहा चेन स्नॅचिंगच्या घटनेपैकी एका घटनेची पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये अखेर नोंद करण्यात आली. पंचवटी परिसरातील टकलेनगर परिसरात हा प्रकार गुरूवारी (दि. १४) सकाळी घडला होता. शोभा अरुण चंद्रात्रे (६०, रा. टकलेनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घराजवळ मॉर्निंग वॉक करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी शोभा यांच्या गळ्यातील ७२ हजार रुपये किंमतीचे आणि चार तोळे वजनाची पोत ओरबाडून चोरून नेली होती. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक एम. एम. शेख करीत आहेत. दरम्यान, एकाच दिवशी शहरात सहा चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करीत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधणार अखेरचा ‘मुहूर्त’?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला
येत्या सात ऑक्टोबर रोजी होणाऱ्या येवला तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या‍ सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारपर्यंत (दि. २२) मुदत आहे. मात्र, सध्या पितृपक्ष सुरू असल्याने इच्छूक उमेदवारांकडून अद्याप एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर शुक्रवार, १५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. सरपंच व सदस्यपदासाठी इच्छुक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे तसेच प्रतिज्ञापत्रासह निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर प्रथमतः ऑनलाइन अर्ज दाखल करायचा आहे. त्यानंतर ऑनलाइन अर्जाची प्रत काढून संबंधित ग्रामपंचायतीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करायची आहे. ही प्रत सादर केल्याशिवाय अर्ज दाखल झाल्याचे ग्राह्य धरले जाणार नाही. येवला तहसील कार्यालयाच्या वरच्या मजल्यावरील सभागृहात आठ ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्ररित्या आठ टेबलांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवार व शनिवार या पहिल्या दोन दिवसात एकाचाही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती तहसील कार्यालय सूत्रांनी दिली. येत्या २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. घटस्थापनेनिमित्त गुरुवारी (दि. २१) सुटी आहे. त्यामुळे मधल्या दरम्यानच्या उर्वरित चार दिवसात कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच अन् सदस्यपदांसाठी नेमके कुणाचे अर्ज दाखल होतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तसेच या चार दिवसात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होणार आहे.

प्रतीक्षा पितृपक्ष संपण्याची
सरपंचपदाची निवडणूक पहिल्यांदाच जनतेमधून थेट प्रत्यक्ष मतदानाद्वारे होत असल्याने या निवडणुकांना विशेष महत्त्व आले आहे. अनेक इच्छुक आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दिसत आहेत. तर, काहींनी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. बऱ्याच इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुहूर्तावर नजरा खिळल्याची चर्चा रंगली आहे. सध्याचा ‘पितृपक्ष’ लक्षात घेता अनेकांना भाद्रपद महिना संपण्याची प्रतीक्षा आहे. येत्या बुधवारी (दि. २०) भाद्रपद महिना संपताना २१ तारखेच्या घटस्थापनेने नवरात्र सुरू होत आहे. मात्र, त्याच दिवशी सुटी असल्याने शुक्रवारी २२ तारखेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच अनेक जण मुहूर्त साधणार असल्याचे मानले जात आहे.

सरपंचपदाचे आरक्षण असे
ग्रामपंचायत............आरक्षण
नांदेसर............ओबीसी
कोटमगाव बुद्रुक......ओबीसी स्त्री
सुरेगाव रस्ता......ओबीसी स्त्री
एरंडगाव खुर्द......ओबीसी स्त्री
कुसूर............सर्वसाधारण
आडगाव चोथवा......सर्वसाधारण स्त्री
नायगव्हाण......सर्वसाधारण स्त्री
चांदगाव............अनु. जमाती स्त्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहिवडमध्ये ३० जण रिंगणात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण
देवळा तालुक्यातील अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या दहिवड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी माघारीनंतर चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित सरपंचपदासह ११ जागांसाठी ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पहिल्या टप्प्यात मंगळवारी (दि. २६) दहिवडची निवडणूक होत आहे. येथील आपल पॅनलच्या चंद्रभागा पिंपळसे, वंदना ठाकरे, गुंताबाई सोनवणे आणि गुंताबाई ठाकरे या अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला बिनविरोध निवडून आल्या. तर अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या थेट सरपंचपदासाठी आदिनाथ सूर्यवंशी, गंगाधर बर्डे आणि समाधान सोनवणे हे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग एकमध्ये सहा, तर प्रभाग दोनमध्ये दोन सर्वसाधारण महिला जागेसाठी तीन, प्रभाग तीनमध्ये (अनुसूचित जमाती) दोन, सवसाधारण महिला जागेसाठी दोन, प्रभाग चारसाठी (अनुसूचित जाती) तीन अनुसूचित जमाती जागेसाठी दोन, प्रभाग पाचमध्ये सर्वसाधारण जागेसाठी तीन तर सर्वसाधारण महिला जागेसाठी दोन, नामा प्रवर्ग महिला जागेसाठी दोन असे एकूण ३० उमेदवार रिंगणात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घोटीत भाऊ-बहिणीचा तलावात बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी
आईसोबत धुणे धुण्यास गेलेल्या भाऊ-बहिणीचा वनविभागाच्या तलावात बुडून मृत्यू झाला. दोन्ही मुले बुडत असल्याचे पाहून आईने आरडाओरड करीत मुलांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली असता तीसुध्दा बुडू लागली होती. मात्र, जवळच असलेल्या भावाने धाव घेत एका तरुणाच्‍या मदतीने तिचे प्राण वाचविले.
घोटी शहरातील श्रीपादबाबानगर विभागात राहणारी ज्योती जगदीश लहामगे (३५) ही महिला रविवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास वनविभागाच्या तलावात कपडे धुण्यासाठी गेली होती. नेहा (१४) आणि साहिल (१०) ही तिची दोन्ही मुले कपडे धुण्यासाठी मदत करीत होती. साहिलचा पाय घसरल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात नेहाही खोल पाण्यात पडली. दोन्ही मुले बुडत असल्याचे पाहून ज्योती लहामगे यांनी आरडाओरडा करीत मुलांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. त्यात तीसुद्धा पाण्यात बुडत असताना तिचा भाऊ शिवाजी चोथे यांनी धाव घेऊन स्थानिक तरुणाच्या मदतीने तिला बाहेर काढले. दोन्ही मुलांनाही पाण्याबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. आई ज्योती लहामगे हिच्यावर घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेहा लहामगे ही घोटी येथील आदर्श कन्या विद्यालयात नववीच्या वर्गात तर साहिल लहामगे हा सरस्वती विद्यालयात चौथीच्या वर्गात शिकत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या पिढीची शेतीविषयी अनास्था चिंताजनक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
शेतीतून येणार पैसा हा बरकतीचा असतो. त्यामुळे शेतीवरील निष्ठा अढळ राहिली पाहिजे. नवीन पिढी शेतीकडे वळत नाही हा चिंतेचा विषय आहे. शेतीत चांगली प्रगती करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या मुला-मुलींना शेतीसाठी उभे करता आले पाहिजे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी केले.
द्राक्ष विज्ञान मंडळातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय महिला द्राक्ष उत्पादक गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. आमदार सीमा हिरे अध्यक्षस्थानी होत्या. नांदूरनाका येथील शेवंता लान्स येथे झालेल्या कार्यक्रमास कृषिथॉनच्या संचालिका अश्विनी न्याहारकर, मविप्र संस्थेच्या सुप्रिया सोनवणे, आरगॅनिक मल्टीस्टेटचे डॉ. कांजीभाई कलावडीया, द्राक्षतज्ज्ञ एन. डी. पाटील, प्रगतशील द्राक्ष शेतकरी मारोतराव चव्हाण आदी उपस्थित होते.
सूर्यकांता पाटील म्हणाल्या, की देशभरात शेतीचा खरा भार महिलाच वाहत आहेत. त्यांच्या राबण्याला पर्याय नाही. शेतीत कष्ट उपसताना या महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष व्हायला नको. हरितक्रांतीच्या दिशेने वाटचाल करीत असताना रासायनिक खतांची आणि औषधांची वारेमाप उधळण होत आहे. त्यामुळे कॅन्सरसारख्या रोगांचा भयानक विळखा पडू लागला आहे.
सीमा हिरे म्हणाल्या, की नाशिक जिल्हा द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. प्रतिकुल वातावरण, पाणीटंचाई, मजुरांचा अभाव अशा अनेक समस्यांना सामोरे जात द्राक्षाचे उत्पादन घेतले आहे. त्यात महिलांचा सहभाग उल्लेखनीय ठरत आहे. हरीत क्रांतीच्या जनक महिला आहेत, तसेच प्रगतशेतीत महिलांचे योगदान मोठे हे नाकारून चालणार नाही. द्राक्ष विज्ञान मंडळाचे समन्वयक डॉ. वसंत ढिकले यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. मारोतराव चव्हाण आणि एन. डी. पाटील यांनी द्राक्ष उत्पादकांना मार्गदर्शन केले.

यांचा झाला गौरव
सुरेखा पाटील, विद्या पगार, जयश्री पिंगळे, सुरेखा ढुमणे, कल्पना नाठे, विद्या रकीबे, रुपाली गायकवाड, मंगला राजोळे, कमल रिकामे (सर्व नाशिक), शीतल झगडे, सुजाता गायकवाड, रेश्मा वाईकर (सर्व पुणे), सुजाता देशमुख, छाया बावके (अहमदनगर), चंद्रकला चव्हाण (जालना), मनीषा काळे (सोलापूर) यांचा गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात वृद्धाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास शरणपूर पोलिस चौकीजवळ घडली.
सुधाकर जोशी (६२, एकदंतनगर, उत्तमनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. श्री श्री ज्ञान विकास केंद्र, आर्ट ऑफ हापाईस्ट लिव्हिंग संचालित सात दिवसीय योगा क्लासचा रविवारी सांगता दिवस होता. जोशी हे या ग्रुपचे कायम सदस्य होते. पंचवटीतील पेठरोडवरील पवार लॉन्स येथे होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जोशी पहाटे घरातून बाहेर पडले. शरणपूर पोलिस चौकी येथे भरधाव वेगात आलेल्या एका भरधाव वाहनाने जोशी यांच्या दुचाकीस जोरधार धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. गंभीर जखमी असलेल्या जोशींचा मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यास दौऱ्याचा खर्च अधिकाऱ्यांच्याच माथी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक
सुशासनाचे धडे गिरवण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडे कूच करणाऱ्या भाजप पदाधिकारी व नगरसेवकांची आर्थिक तंगी दूर करण्याची जबाबदारी काही अधिकाऱ्यांवर येऊन पडली आहे. परंतु, अगोदरच महापालिका तिजोरीतील खडखडाटीमुळे हैराण असलेल्या काही अधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्याचा खर्च सोसण्यास नकार दिला, तर काहींनी तोकडे दान पदाधिकाऱ्यांच्या पदरात टाकून आपली सुटका करून घेतल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. विशेष म्हणजे या अभ्यास दौऱ्याचा खर्च काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पालिकेतच तळ ठोकल्याची चर्चा आहे.
महापालिकेतील वाद-विवाद दूर करणे तसेच नगरसेवकांना सुशासनाचे धडे देण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीत नेऊन तिथे अभ्यासवर्ग घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. पदाधिकारी व नगरसेवक उत्तनमधील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडे कूच करणार आहेत. परंतु, या तीन दिवसीय अभ्यासवर्गासाठी खर्चही मोठा येणार आहे. त्यामुळे हा खर्च पेलण्याची जबाबदारी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. मात्र, या पदाधिकाऱ्यांनीही खर्चाचा हा चेंडू महापालिकेतील काही अधिकाऱ्यांकडे टोलावला आहे. अभ्यास दौऱ्याचा खर्च ऐनवेळी या अधिकाऱ्यांच्या माथी आल्याने काहींनी आढेवेढे घेतले तर काहींनी काहीतरी दान पदरात टाकून सुटका करून घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार महापालिका कारभाराची वेळ संपल्यावर सुरू झाल्याने अधिकारीही आश्चर्यचकीत झाले असून या अनोख्या वसुलीमोहिमेची महापालिका वर्तुळात चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लासलगावला पावसामुळे कांदा भिजला

$
0
0

निफाड : लासलगाव परिसरात चार दिवसांपासून झालेल्या पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील कांदा व्यापाऱ्यांचे एकूण अंदाजे ५० टनाहून अधिक कांद्याचे चार लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
आंनदा गिते, एस. ताराचंद, युवा ग्लोबल एक्सपोर्ट येथील कांदा व्यापाऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. दरम्यान,
जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत लिलाव सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांच्या खळ्यांमध्ये पाणी साचल्याने खरेदी केलेला कांदा साठवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लासलगाव येथे सोमवारी (दि. १८) कांदा लिलाव बंद राहील; मात्र विंचूर उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images