Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गजानन शेलार यांना अटक

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आणि नगरसेवक गजानन शेलार यांना पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यांना कोर्टात गुरुवारी (दि. २१) हजर करण्यात येणार आहे.
दंडे हनुमान मित्र मंडळाचे संस्थापक असलेल्या शेलार यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीमचा वापर केला होता. कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी ७ सप्टेंबरला अटक केली. मात्र, मुख्य आरोपी शेलार यांनी नाशिक कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे त्यांनी हायकोर्टात अर्ज केला. परंतु, तेथेही तो फेटाळण्यात आला. त्यामुळे शेलार यांना पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यांना पोलिस कोठडी मिळावी यासाठी गुरूवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबक डीपीत ६२ फेरबदल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक शहाराचा डीपी नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे. यातील फेरबदलाने नाराजांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वाढली असून आता कोर्टकचेरीला चालना मिळण्याची शक्यता आहे. एकूण ६२ फेरबदल सूचना यात आहेत.

१४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रात त्र्यंबक शहराच्या प्रारूप विकास योजनेत झालेल्या फेरबदलांची सूचना प्रसिद्ध झाली आहे. सोमवारी त्याबाबतचा नकाशा आणि फेरबदल सूचना नगर परिषद कार्यालयात प्रसिद्ध झाले आहेत. शहराच्या मूळ हद्दीतील आणि वाढीव हद्दीतील असे दोन नकाशे आहेत. एकूण ६२ फेरबदल सूचना यात आहेत. नागरिक हा नकाशा पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. प्रसिद्धीपासून ३० दिवसांपर्यंत नागरिकांच्या अवलोकनासाठी हा नकाशा उपलब्ध आहे.

सुचवलेले फेरबदल अनेकांना धक्का देणारे आहेत. पूर्वीच्या नकाशात पिवळे झालेले गट नंबर आता पुन्हा हिरवे करण्यात येणार आहेत. त्यांची संख्याही बरीच मोठी आहे. अर्थात यामध्ये जमीन मालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पूर्वीच्या नकाशात मागणी

केलेली नसतांना पिवळ्या पट्ट्यात जम‌निी घेऊन पुन्हा शेतीकडे वर्ग करण्याचे फेर बदल निश्च‌तिच वादाचे कारण ठरणार आहे.

विशेष म्हणजे पूर्वी पिवळया जम‌निी झाल्या म्हणून पर्यावरणाची हानी झाली म्हणून वादळ निर्माण झाले. त्या जम‌निींच्या पिवळ्या क्षेत्रात विशेष फरक झालेला नाही. उलट शहर वाढीस वाव असलेल्या भागात मात्र शेती झोन सुचविण्यात आला आहे. शहराची पूर्वी हद्द १.८९ चौरस कि.मी. होती. हद्दवाढीनंतर ती ११ चौरस किमी
झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरूंनी घेतला स्वच्छतेचा वसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
स्वच्छता हीच सेवा मोहिमेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान मोहीम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातही राबविण्यात आली. कृषी शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांसह विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन तसेच शिक्षकांनीही झाडू हाती घेऊनही विद्यापीठ परिसर स्वच्छ केला.
यावेळी परिसरात पडलेला प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. झाडांचा पालापाचोळा गोळा करून त्याचा खतासाठी वापर करण्यात आला. विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील, प्रा. हेमराज राजपूत, डॉ. नितीन ठोके, डॉ. प्रकाश कदम, यामिनी भाकरे, प्रभारी जनसंपर्क प्रमुख संतोष साबळे यांच्यासह विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. प्रारंभी सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. विद्यापीठ परिसराबरोबरच आपले घर आणि परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा निर्धार यावेळी विद्यार्थ्यांनी दिला. विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत दोन ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सार्वजनिक ठिकाणे, पर्यटन स्थळे तसेच आदिवासी गावांत ज्या ठिकाणी शौचालये नाहीत अशा गावांत श्रमदान करण्यात येणार आहे. या गावांत शौचालये बांधणे व ते वापरण्यावर जनजागृती करण्यात येणार आहे.

‘स्वच्छता ही सेवा’चे आयोजन
केंद्र सरकारने दिनांक १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’चे आयोजन केले आहे. याअंतर्गत स्वच्छतेविषयी जनसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छ भारत ही आपल्या देशातील नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे, ही भावना रुजविण्यात येणार आहे. समाजाच्या सक्रिय सहभागामुळेच स्वच्छ भारत अभियानाचे रुपांतर एका राष्ट्रीय चळवळीत झाले असून या अभियानामुळे लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वणीसाठी २२५ बसेस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नवरात्रोत्सवासाठी वणी सप्तशृंगी गडावर दर्शनाला जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने २२५ बसेसचे नियोजन केले आहे. या बसेस दहा दिवस जिल्ह्यातील १३ आगारातून धावणार आहे.
पहिले तीन दिवस कळवण आगारातील ३० बसेसच नांदुरी पायथा व सप्तशृंगी गड येथे भाविकांना जाण्यासाठी सोडणार आहे. त्यानंतर सर्व आगाराकडून आलेल्या ५७ बसेस या नियमित धावणार आहे. तसेच सहा आगारातील बसेस थेट गडावर जाणार आहे. नाशिक येथून सीबीएसवरून १०६ तर नाशिकरोड येथून पाच बसेस सोडण्यात येणार आहे.
वणीला जाण्यासाठी भाविकांची राज्यभरातून गर्दी असते. त्यामुळे बसने त्यासाठी जिल्ह्याचे नियोजन केले. नवरात्रोत्सवात मालेगाव येथून २५, मनमाडहून १५, पिंपळगाव येथून ७ तर सटाणा आणि दिंडोरी येथून प्रत्येकी ५ बसेस आहेत. नाशिक येथून गडावर जाण्यासाठी ९ आगारातून बसेस मागवण्यात आल्या आहेत. तसेच इतर ठिकाणी सुद्धा दुसऱ्या आगारातील जादा बसेसचे नियोजन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य प्राप्तिकर आयुक्त शुक्ल आज नाशकात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यातील सात कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने २४ ठिकाणी छापे टाकल्यानंतर हवाला व दुबई कनेक्शनची चर्चा असताना या विभागाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त ए. सी. शुक्ल गुरुवारपासून (दि. २१) दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर येणार आहे.
आयुक्त शुक्ल यांच्या दौऱ्यामागे व्यापाऱ्यांवरील छापे हे कारण नसले तरी ते महाराष्ट्र चेबर कॉमर्स सह औद्योगिक संघटनेच्या प्रतिनिधीशी ते चर्चा करणार आहेत. यात व्यापाऱ्यांना लक्ष्य केल्याचा विषय सुद्धा पुढे येणार असल्याने प्राप्तिकर विभागाचे स्थानिक अधिकारी चिंतेत आहेत.

शुक्ल यांचा दौरा २१ आणि २२ सप्टेंबर रोजी असून या दोन दिवसात ते व्यापारी व उद्योजकांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत प्राप्तिकर विभागाच्या गडकरी चौकातील कॉन्फरन्स हॉल, नाशिक येथे विविध संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स इत्यादींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आर्थिक वर्षातील आयकर विभागाच्या धोरणांवर माहिती देऊन चर्चा केली जाणार आहे. तसेच नवी दिल्ली येथे झालेल्या राजस्व संगममध्ये झालेल्या चर्चेबद्दल सहभागी सदस्यांना माहिती दिली जाणार आहे.

प्रश्न विचारण्याची संधी
प्राप्तिकर विभागाच्या आयुक्तांचे कार्यक्षेत्र नागपूर व मुंबई कार्यालयाचा भाग वगळून उर्वरित महाराष्ट्र आहे. त्यामुळे त्यांची उपस्थिती अनेकांना मार्गदर्शक असणार आहे. तसेच सर्वांना आपले प्रश्नही या निमित्ताने मांडता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा अभ्यास कच्चाच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

भाजपच्या नगरसेवकांसह पदाधिकारी सतत पायावर धोंडा पाडून घेत असल्याचा प्रत्यय पदोपदी येत असल्यामुळे काही दिवसांपूर्वीच सर्वांसाठी ठाण्यात मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले होते. मात्र बुधवारी झालेल्या महासभेत भाजपचीच पुन्हा कोंडी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अभ्यास दौऱ्याचा काही उपयोग झाला नसल्याचे बुधवारच्या महासभेत दिसून आले.

शहरात रात्रपाळीची स्वच्छता पालिका कर्मचाऱ्यांकडून बंद करून ते आऊटसोर्सिंगने करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावापासून आरोग्य व वैद्यकीय सभापती सतीश कुलकर्णी यांनी अंतर राखले. या प्रस्तावावरून मनसे गटनेते सलिम शेख आणि सतीश कुलकर्णी हे आपसातच भिडले. रात्रपाळीच्या स्वच्छतेवरून शेख यांनी आरोप केल्यानंतर रात्रपाळीची स्वच्छता मनपा सफाई कर्मचाऱ्यामार्फत न करण्याच्या विषयाशी आपला काही संबध नसून तो महासभेचा निर्णय असल्याचे सांगत, महापौरासंह पक्षालाच तोंडघशी पाडले आहे. दरम्यान, तीन दिवसीस प्रशिक्षणात काय शिकलेत, असा सवाल विरोधकांनी केला आहे.

सत्तेत येऊन कारभाराचा सूर सापडत नसल्याने विरोधक अल्पसंख्याक असतांनाही, ते भाजपवर भारी पडत आहेत. भाजपच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी आपल्या सत्तेचे गुणगान गातांना विरोधकांकडून स्वतःची खिल्ली ओढावून घेतली. भाजपच्या नगरसेवकांनी किल्ला लढवण्यासाठी भाषणे केली असली, तरी त्याच्यामुळे पक्षाला बॅकफुटवरच येण्याची वेळ आली. सभागृहात भाजपच्या नगरसेवकांनी भाजपचे गुणगान गातांना त्याचा दोष नागरिकांवर टाकून नामनिराळे होण्याचा प्रयत्न केला. तर काही नगरसेवकांनी चुकीची विधाने करून महापौरांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापौरांना सभा तहकूब करण्याची वेळ ओढावली होती. अभ्यास दौऱ्याचा नगरसेवकांना भाजपला कोणता फायदा झाला असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.

सुवर्णा मटाले संतापल्या

शहरात एकीकडे स्वाइन फ्लू व डेंग्यूने नागरिकांचा बळी जात असतांना भाजप नगरसेवक प्रशासनाची पाठराखण करीत असल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेविका सुवर्णा मटाले संतापल्या. भाजपचे नगरसेवक उपाययोजना सूचवण्याऐवजी नगरसेवकांचेच प्रबोधन का करत आहेत, असा सवाल त्यांनी विचारला. अजून बळी जाण्याची वाट बघणार का असा सवाल करत, सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवला.

डॉ. पाटलांचे चिमटे

डॉ. हेमलता पाटील यांनी शहरात नागरिकांचे बळी जात असतांना, सभागृहात मात्र माझे-तुझे असे केले जात असल्याबद्दल खेद व्यक्त केला. पक्षांतर केल्यावर माणसे कशी झूल पांघरतात असा टोला पाटील यांनी लगावल्याने भाजपचे नगरसेवक संतप्त झाले. अस्वच्छतेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने पदावरून हटवा, अशी मागणी अपक्ष नगरसेवक गुरूमीत बग्गा यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोमॅटोची निर्यात पाकमध्ये सुरू करावी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत
सीमा बंद करण्यात आल्याने पाकिस्तानला दररोज तब्बल दोनशे ट्रक होणारी टोमॅटो निर्यात ठप्प झाली आहे. परिणामी टोमॅटोच्या दरात घसरण सुरूच आहे. त्यामुळे टोमॅटो निर्यातीसाठी प्रयत्न करावेत, असे साकडे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना घातले आहे.

महिनाभरापासून टोमॅटोचा हंगाम सुरू झाला आहे. सुरुवातीस ६०० ते ८०० रुपये प्रती वीस किलो क्रेटसाठी मिळणार टोमॅटो आता ७० ते ८० रुपये दरापर्यंत घसरला आहे. गेल्या आठवडाभरापासून या परिस्थितीत बदल झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. पिंपळगाव बाजार समितीमधून दुबर्इ, बांगलादेश येथे टोमॅटोची निर्यात होते. मात्र, त्याचे प्रमाण अल्प आहे. पाकमधून भारतीय टोमॅटोला प्रंचड मागणी आहे. देशातून दररोज किमान दोनशे ट्रक टोमॅटो पाकमध्ये जातो. त्याचा शेतकरयांना ५०० ते ६०० रुपये प्रती क्रेट भाव मिळत होता. मात्र, आता निर्यात बंद असल्याने टोमॅटोला मातीमोल भाव मिळत आहे. तरी पाकमध्ये टोमॅटो निर्यात पुन्हा सुरू करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव मोरे, रवींद्र मोरे, अशोक मोरे, शामराव मोरे, दिंगबर मोरे, कोंडाजी मोरे आदींनी खासदार चव्हाण यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोमॅटोची लाली गायब!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला
यंदाच्या हंगामातील सुरुवातीला महिनाभरात चांगले दाम हाती टेकवत उत्पादक शेतकऱ्यांच्या गालावर लाली आणणाऱ्या ‘टोमॅटो’ने गेल्या चारपाच दिवसात शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. टोमॅटोच्या बाजारभावात कमालीची घसरण झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. येवला बाजार समितीत मंगळवारीही टोमॅटो बाजारभावात मोठी घसरण होताना प्रतिक्रेट किमान ५० ते कमाल १०१ (सरासरी ८०) रुपये असा बाजारभाव मिळाला.
गेल्या काही दिवसात बाजारभावात घसरण होताना उन्हाळ कांद्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकले असताना हक्काचे दोन अधिक पैसे हाती टेकवणाऱ्या ‘टोमॅटो’नेही तीच वाट धरली आहे. यंदाच्या हंगामातील टोमॅटो शेतशिवारातून बाहेर पडताना महिन्यातील १५ तारखेपासून येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत येण्यास सुरुवात झाली. येवल्यातील सुरुवातीच्या मुहर्तालाच टोमॅटोला प्रतिक्रेट किमान ७५१ ते कमाल ८५१ (सरासरी ७५१ रुपये) असा भाव मिळाला. पुढे गेल्या महिनाभरात येथील बाजार समितीत शेतकऱ्यांनी आणलेल्या टोमॅटोने प्रतिक्रेट किमान ४०० ते कमाल ७५१ रुपये (सरासरी ६५० रुपये) असे दाम उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती टेकवले. यंदाच्या हंगामात सुरुवातीलाच चांगला बाजारभाव देणारा ‘टोमॅटो’ पुढील काळातही हंगाम संपेपावेतो बाजारभावाबाबत टिकून राहिल्यास या ना त्या कारणामुळे उभं ठाकलेलं ‘अर्थसंकट’ काही अंशी तरी दूर होण्यास मदत होईल, अशी तालुक्यातील शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, दिवसागणिक टोमॅटो बाजार खाली येत गेल्याने महिनाभरातील शेतकऱ्यांच्या गालावर आलेली लाली गुल झाली आहे. उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक खर्चाचाही मेळ बसवत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. येवला बाजार समितीच्या शहरातील मुख्य आवार भाजीपाला शेडमध्ये दररोज दुपारी टोमॅटोचे लिलाव होतो. जवळपास ५ ते १० हजार क्रेटसची आवक होते. मंगळवारी साडेपाच हजारच्या आसपास टोमॅटो क्रेटची आवक झाली.

टोमॅटोच्या भावातील उतरंडी
दिवस...किमान...कमाल...सरासरी (प्रतिक्रेट)
रविवार...७० रुपये...१३१ रुपये...११५ रुपये
सोमवार...८० रुपये...१३६ रुपये...१२० रुपये
मंगळवार...५० रुपये... १०१ रुपये... ८० रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्फोट प्रकरणी गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर
सातपूर एमआयडीसीत असलेल्या प्रिसिजन कंपनीत सोमवारी (दि. १८) सिलिंडरचा स्फोट झाला होता. या प्रकरणी बुधवारी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला.
शान शोरूमच्या बाजूलाच असलेल्या कंपनीत मुद्दाहून स्फोट घडविण्यात आल्याचा आरोप मालकाने पोलिसांकडे केला होता. यानंतर पोलिस हवलदार आर. पी. दराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविला आला आहे. स्फोट झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले होते. मात्र, आग कशामुळे लागली याचा खुलासा होऊ शकला नव्हता. दरम्यान घटना घडली त्या दिवशी प्रिसीजन कंपनीतील कामगार कुठे गेले? तसेच शोरूमलगत कंपनीत जाण्याचा मार्ग ठेवण्यात आला होता. स्फोट झाल्यानंतर कामावर असलेल्या कामगारांना चारचाकी वाहनांमधून तात्काळ गायब करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. याबाबत पोलिसांना सखोल तपास करावा अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निमसे यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी दाखल करा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव
पंचवटी प्रभाग क्रमांक दोनचे भाजप नगरसेवक यांच्या सांगण्यावरून किरण निमसे यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याने दोघांवर अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी नांदूर नाका परिसरातील रहिवासी अमोल गांगुर्डे यांनी पोलिस आयुक्तांकडे केले आहे.

अमोल गांगुर्डे हे ११ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांच्या पान दुकानावर बसलेले होते. तेथे मद्यप्राशन केलेल्या किरण निमसे यांनी नगरसेवक निमसे यांच्या सांगण्यावरून आमच्याविरुद्ध कितीही तक्रारी केल्या तरी फरक पडणार नाही. तुम्ही गावात आहे तरी किती? असे बोलून जातीवाचक शिवीगाळ केल्याची गांगुर्डे यांची तक्रार आहे.
या सर्व प्रकारानंतर गांगुर्डे यांनी आडगाव पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी जातीवाचक शब्द मागे घेण्यास सांगितले. त्यास नकार दिल्याने तक्रारीची प्रत दिली नाही. त्यानंतर आडगाव पोलिस स्टेशनचे निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी परस्पर गुन्हा नोंदणी रजिस्टरवर खाडाखोड करून जातीवाचक शब्द खोडले. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने पत्रकाद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात ‘मिशन ऑल आउट’

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक
नवरात्रोत्सवासह सणासुदीच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ग्रामिण पोलिसांनी मंगळवारी जिल्ह्यात मिशन ऑल आउट मोहिम राबविली. पोलिसांचा मोठा ताफा रस्त्यावर उतरल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले. कारवाईत सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला. १६३ सराईतांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.
पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी ही मोहीम राबविण्यात आली. अपर अधीक्षक हर्ष पोतदार, विशाल गायकवाड, स्थानिक गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक करपे यांच्यासह जिल्ह्यातील आठ उपविभागीय पोलिस अधिकारी आणि ४० पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी यांच्यासह ३५० कर्मचाऱ्यांनी ऑल आउट नाकाबंदी कारवाईत सहभाग नोंदवला.
महामार्ग व मुख्य रस्त्यांवरील हॉटेल, ढाबे, लॉजेस चेक करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले हॉटेल व ढाबे मालकांवर मुंबई पोलिस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. पोलिस ठाणे हद्दीतील मुख्य रस्ते, बाजार पेठ, सराफ बाजार, बँक व एटीएम, धार्मिक स्थळे, रेल्वे व बसस्थानक, टोल नाके अशा अनेक ठिकाणांवर सशस्त्र पेट्रोलिंग करून संशय‌ित व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यात पोलिसांनी अवैध धंद्यानाही लक्ष केले. नऊ सराईतांच्या हद्दपारीची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. तालुकास्तरासह खेड्या पाड्यावरील अवैध धंदे उद्‍ध्वस्त करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

यांच्यावर झाली कारवाई
मालाविरुद्धचे गुन्हे-दरोडा, जबरीचोरी, घरफाडी, चोरी यामधील रेकॉर्डवरील गुन्हेगार, पाहिजे व फरार असलेले आरोपी, हिस्ट्रीशिटर यांना चेक करण्यात येऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच नाकाबंदी दरम्यान संशयित व विनानंबरची मोटर वाहने, भरधाव वेगाने व दारू पिऊन वाहन चालविणारे तसेच सार्वजनिक ठिकाणी, मुख्य चौकात विनाकारण हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडसे यांची एसीबीकडून चौकशी; कारण गुलदस्त्यात

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची बुधवारी (दि.२०) नाशिकमध्ये लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चौकशी केली. सुमारे एक तास चाललेल्या या चौकशीबाबत एसीबीने कमालीची गुप्तता पाळली आहे. खडसे व कुटुंबीयांनी मंत्रिपदाच्या कार्यकाळात जमविलेल्या मालमत्तांबाबत चौकशी करण्यात येत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र, खडसे यांनीही या चौकशीबाबत मौन पाळले आहे.

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यामागील शुक्लकाष्ठ संपण्याचे अजूनही नाव घेत नाही. जमीनप्रकरण व बेहिशेबी मालमत्ता प्रकरण त्यांचा पिच्छा पुरवत आहे. दरम्यान, नाशिक येथील एसीबीच्या कार्यालयात खडसे बुधवारी दुपारनंतर दाखल झाले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची सुमारे तासभर चौकशी केली. मंत्रिपदाच्या काळात खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी काही मालमत्ता खरेदी केल्या आहेत का?, कोठे आणि कोणत्या मालमत्तांची खरेदी केली याबाबतची विचारणा त्यांना करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एसीबीच्या नंदुरबारमधील युनिटकडे या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली असली तरी या युनिटचे अधिकारी चौकशीवेळी उपस्थ‌ित नसल्याचे समजते. ही चौकशी नेमकी कशाबद्दल करण्यात आली त्यातून काय हाती लागले याबाबत माहिती देण्यास एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तेजश्री’ने दिल‌े पाच जणांना जीवदान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी , नाशिक

आपल्या वाट्याचे दुःख विसरून इतरांचे आयुष्य फुलविण्याकरिता स्त्री शक्तीचा महिमा नवरात्रोत्सवाच्या प्रारंभीच पुन्हा एकदा अनुभवास आला आहे. ब्रेनडेड असलेली सिन्नर तालुक्यातील शिवडे गावातील शेतकऱ्याच्या ११ वर्षीय कन्येने पाच रुग्णांना अवयवदान करून जीवदान दिले आहे. मेंदुत रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीला पुरवठा कमी झाल्यामुळे तिचे ब्रेनडेड झाल्यानंतर पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.

तेजश्री रमेश शेळके असे त्या मुलीचे नाव असून, शिवडेपासून जवळ असलेल्या पांढूर्ली येथील जनता विद्यालयात सहावीत शिकत होती. १५ सप्टेंबर रोजी शाळेच्या मैदानावर फुटबॉलचा सामना पाहत असताना त‌लिा भोवळ आली. उपचारासाठी तिला नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सर्व तपासण्यांनंतर त‌लिा ब्रेनडेड सांगण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने तिच्या नातेवाईकांचे सांत्वन करत त्यांना अवयवदानाची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानंतर तिला ऋषीकेश हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. येथे सर्व चाचण्यांनंतर झेडटीसीसीच्या नियमाप्रमाणे वैद्यकीय पथकान तिला ब्रेनडेड घोषित करण्यात आले.

अशी होती डॉक्टरांची टीम
डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांबरोबरच ऋषीकेश हॉस्पिटलचे डॉ. भाऊसाहेब मोरे, समन्वयक डॉ. संजय रकीबे व डॉ. प्रीतम अहिरराव, आयसीयू युनिट तज्ज्ञ डॉ. किशोर बाफना, ओटी तंत्रज्ज्ञ चंद्रकांत हुशार, भूलतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध चिमोटे यांनी वैद्यकीय कौशल्य वापरले.

समृद्धीमुळे शिवडे चर्चेत
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमीन अधिग्रहीत प्रश्नावरून शिवडे गाव चर्चेत होते. त्याच गावाच्या शेतऱ्याच्या मुलीने पाच रुग्णांला अवयवदान देऊन ‘समृद्ध’ केले.

स्त्री शक्तीची प्रचिती
नवरात्रोत्सवाच्या प्रारंभीच शेतकरी कन्येने पाच जणांना जीवदान दिल्याने ही बाब सर्वत्र कौतुकाची ठरली आहे. शेतकरी कुटुंबातील कन्येचे मौल्यवान अवयव गरजूंना लाभल्याने त्यांना नवे जीवन लाभले आहे. स्त्री शक्तीचा हा आविष्कारच असल्याची भावना जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून व्यक्त होत
आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक ऑक्टोबरपासून शिर्डीत समाधी शताब्दी

$
0
0

राष्ट्रपतींच्या हस्ते प्रारंभ; मुख्यमंत्रीही येणार

म. टा. प्रतिनिधी, शिर्डी
सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या समाधीच्या शताब्दी महोत्सवाला प्रारंभ येत्या १ ऑक्टोबरला शिर्डीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजवंदन करून केला जाणार आहे. या वेळी राज्यपाल, मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. वर्षभर चालणारा हा शताब्दी सोहळा शिर्डीसह संपूर्ण देश-विदेशात सुरू ठेवण्याचे नियोजन साई संस्थानने केले आहे.

साईबाबा कोणत्या जातीचे, गावातले आणि त्यांचा जन्म कधीचा याचा थांगपत्ता शेवटपर्यंत कोणालाच लागला नसला तरी दीर्घकाळ शिर्डीत वास्तव्य केल्यावर १५ ऑक्टोबर १९१८ रोजी ‘विजया दशमी’च्या दिवशी साईबाबांनी समाधी घेतली. त्याला पुढील वर्षी ऑक्टोबर २०१८ मध्ये १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. हा शताब्दी सोहळा वर्षभर सुरू राहणार आहे. याविषयी मटाशी बोलताना साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे म्हणाले, शिर्डीसह देश–विदेशात साई शताब्दी महोत्सव भरविला जाणार आहे. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, प्रबोधन आणि साई पादुकांचे दर्शन या पाच प्रकारच्या कार्यक्रमाने हा महोत्सव साजरा होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते येत्या १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता शिर्डीच्या साई मंदिर प्रांगणात ध्वजवंदन करून प्रारंभ करण्यात येणार आहे. या सोहळ्याला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. वर्षभर हा सोहळा कसा, कोणत्या शहरात, कोणत्या देशात किती तारखेला सुरू असेल याचे वेळापत्रक असलेले कॅलेंडर तयार करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्रेशर पार्टीत विद्यार्थ्यांना पुस्तक भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुस्तकाची आवड असणाऱ्यांना पुस्तक भेट म्हणून मिळाल्यावर होणारा आनंद अतुलनीय असतो. पुस्तकांची सोबत ही प्रत्येकालाच हवीहवीशी असते. त्याचमुळे ‘विद्यार्थ्यांना फ्रेशर्स डे’च्या दिवशी पुस्तकाचे वाटप करण्यात आले. श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या संघवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये सिव्हील इंजिनिअरींग आणि मेकॅनिकल इंजिनीअर विभागाकडून आयोजित केलेल्या फ्रेशर्स पार्टीत हा अनोखी भेट देण्यात आली.

इंजिनीअरिंग शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे कॉलेजमध्ये स्वागत करण्यासाठी व त्यांचे आपल्या विभागातील विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी ओळख करून देण्यासाठी फ्रेशर्स

पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तक वाचनाने विद्यार्थी दशेत चांगले संस्कार घडून येतात. त्यातच स्वामी विवेकानंदांची पुस्तके म्हणजे युवा वर्गासाठी पर्वणी असते. जीवनातील अपयश पचवून अनेक युवा जीवनात यशाच्या दिशेने वाटचाल आज करत आहेत, अशी प्रेरणास्थान आणि प्रेरणादायी पुस्तके विद्यार्थीदशेत महत्त्वाची असतात, असे मत यावेळी प्राचार्य डॉ. जयंत पट्टीवार यांनी व्यक्त केले.

सृजनशील, नाविन्यपूर्ण आणि सांस्कृतिक असा तिहेरी संगम या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांतून दिसून आला. व्याख्याने, पुस्तक परीक्षणे, स्मार्ट सिटी, मेक इन इंडियावरील पोस्टर स्पर्धा, वन मिनिट शो, संगीत खुर्ची आदी कार्यक्रम विद्यार्थी करमणुकीसाठी आयोजित करण्यात आले होते. कॉलेजमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना फ्रेशर पार्टीत प्राचार्य डॉ. जयंत पट्टीवार यांच्या हस्ते पुस्तके भेट स्वरुपात देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर विभागप्रमुख संदीप बडगुजर, सचिन मांजरवाल, विभागप्रमुख पुष्पेंदू बिश्वास आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या पुस्तक देण्याच्या प्रथेचे कॉलेज प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वसुलीने पालिकेचं चांगभलं!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने घरपट्टी वसुलीसाठी बड्या थकबाकीदारांना नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू केली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम यंदा दिसून येत असून, वसुलीत गेल्या वर्षाच्या तुलनेत चौदा कोटी ५४ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे बड्या थकबाकीदारांकडून १५ कोटींची वसुली झाली आहे, तर पाणीपट्टीतही चार कोटींची वाढ झाली आहे. बड्या थकबाकीदारांविरोधात पालिकेने सुरू केलेले नोटीससत्र पालिकेला चांगलेच पावले आहे.

एलबीटी हे पालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन बंद झाल्याने पालिकेने आता आपल्या उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांवर लक्ष केंद्रीत केले आहे. जीएसटीमध्ये तर शासनाने अनुदान पद्धत सुरू केली आहे. त्यामुळे घरपट्टी व पाणीपट्टीच्या वसुलीवर अधिक लक्ष देत थेट वसुलीची धडक मोहीम यंदा राबवली जात आहे. घरपट्टीचे उत्पन्न सक्षम करण्यासाठी महापालिकेने ऑनलाइन कर भरणा व देयके हाती पडण्यापूर्वीच कर अदा करणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष सवलत योजना सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीत चांगली वाढ झाली आहे. वसुलीसाठी बड्या थकबाकीदारांना नोट‌िसा बजावण्याचे काम सुरू केले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम पालिकेच्या उत्पन्नावर झाला आहे. गेल्या वर्षी एक एप्रिल ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत पालिकेची ३९ कोटी २७ लाखांची वसुली झाली होती. त्या तुलनेत यंदा वाढ झाली आहे. यंदा एप्रिल ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत ५३ कोटी ८१ लाखांची वसुली झाली आहे. त्यात १५ कोटी ७२ लाख रुपये हे गेल्या वर्षीच्या थकबाकीचे वसूल झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत चौदा कोटी ५४ लाख रुपयांचा महसूल महापालिकेला अधिक मिळाला आहे.

८० जणांना हजार नोटिसा

घरपट्टीप्रमाणेच पाणीपट्टीतही घसघशीत वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी पालिकेने १५ हजार बड्या थकबाकीदारांना नोट‌िसा बजावल्या होत्या. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. आठ दिवसांपूर्वी आणखी ६५ हजार थकबाकीदारांना पालिकेने रडारवर घेत नोट‌िसा बजावल्या. गेल्या वर्षी एक एप्रिल ते सप्टेंबर यादरम्यान पाणीपट्टी वसुली ८ कोटी ६४ लाख रुपये इतकी झाली होती. यंदा मात्र त्यात चांगली वाढ झाली आहे. एप्र‌िल ते सप्टेंबरदरम्यान १३ कोटी ५६ लाखांची वसुली झाली आहे. यात पाच कोटींची वाढ नोंदवली गेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्यांना त्रास देऊ नका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिक दौऱ्यावर आलेल्या प्राप्तिकर विभागाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त ए. सी. शुक्ल गुरुवारपासून दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आलेले असताना व्यापारी आपले प्रश्न प्रकर्षाने मांडतील असे वाटत होते. मात्र ही चर्चा एकतर्फी झाली.
शुक्ल यांनी सरकारचे धोरण व करयोग्य उत्पन्न असूनही कर भरला जात नसल्यावरच जास्त भर देऊन करभराचा संदेश दिला. यावेळी व्यापाऱ्यांना फारसे बोलताही आले नाही. गडकरी चौक येथे प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, सीए टॅक्स प्रॅक्टिशर्नबरोबर त्यांनी बैठक घेऊन चर्चा केली. यात व्यापाऱ्यांना लक्ष्य केल्याचा विषयसुद्धा प्रकर्षाने मांडला गेला नाही.पण, अनावश्यक त्रास देऊ नका अशी भूमिका मात्र चेंबर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी मांडली. तसेच ऑनलाईन पद्धतीबाबतही त्यांनी याअगोदर पेपरलेस काम काही कार्यालयात सुरु झाले आहे. तेथे मात्र प्रत्यक्ष भेटल्यानंतर काम केले जाते. असे प्राप्तिकरच्या बाबतीत घडू नये, असेही सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबीटी इंज‌िनीअरिंगला नॅकची ‘अ’ श्रेणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल असेसमेंट अॅण्ड अॅक्रिडेशन कौन्सिल यांच्या वतीने मविप्रच्या अॅड. बाबुराव ठाकरे इंज‌िनीअरिंग कॉलेजला ‘अ’ श्रेणी देण्यात आली आहे. या यशाबद्दल कॉलेजमध्ये समारंभ आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ नेते शशिकांत पवार यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, उपसभापती राघो अहिरे , चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक भाऊसाहेब खातळे, प्रल्हाद गडाख, रायभान काळे, डॉ. प्रशांत देवरे, दत्तात्रय पाटील, उत्तमबाबा भालेराव, अशोक पवार, सचिन पिंगळे, सेवक सदस्य नानासाहेब दाते, गुलाब भामरे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. कैलास होळकर यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. ढिकले यांनी संस्थेतील गुणवत्ताधारक शिक्षकांमुळे संस्थेची दिवसेंदिवस प्रगती होत असून, भविष्यकाळात संस्था यशाच्या शिखरापर्यंत पोहचेल, असा विश्वास व्यक्त केला.

संचालक डॉ. प्रशांत देवरे यांनी तंत्रज्ञान क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळाची गरज विषद करतांना महाविद्यालय त्यासाठी सक्षम असल्याचे सांगितले. सचिन पिंगळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कॉलेजला नॅशनल अॅक्रीडीटेशन अॅण्ड अॅसेसमेंट कौन्सिल (बंगळूरू) यांच्याकडून मिळालेले मानपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयास सुपूर्द करण्यात आले. यावेळी नॅक समन्वयक व्ही. सी. शेवाळे, सहसमन्वयक बी. ए. न. शिंदे व नॅक कमिटीतील सदस्यांचा सन्मान

करण्यात आला. कॉलेजसोबत करार केलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींना देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आम्ही अधिकारी होणारच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील २३ जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे ११०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर या उपक्रमामुळे हसू फुलले होते. ‘आम्ही शिकणार, मोठ्ठे अधिकारी होणार’, असा निश्चय करत या विद्यार्थ्यांनी रोटरीच्या उपक्रमाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी रोटरी क्लबने ‘टीच’ उपक्रमांतर्गत शिक्षक प्रशिक्षण, ई-लर्निंग, प्रौढ शिक्षण, मुलांचा शैक्षणिक विकास आणि आनंदी शाळा असा पाच कलमी कार्यक्रम आखला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून रोटरीने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून मदतीचा हात पुढे केला आहे. इगतपुरी तालुक्यातील टाके घोटी, पत्राचीवाडी, बलायदुरी, पारदेवी, त्रिंगलवाडी, उभाडेवाडी, उंबरकोन, उघडेवाडी, खैरगाव, पाटीलवाडी, पिंपळगाव मोर, आघानवाडी, आडवाण यांसह २३ जिल्हा परिषद शाळांत इयत्ता चौथी आणि पाचवीच्या ११०० गरजू विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेश, शूज, सॉक्स, पेन्सिल बॉक्स, कंपास पेटी, पाण्याची बाटली, पाच वह्या अशा वस्तूंचा समावेश असलेल्या दर्जेदार किटचे वाटप रोटरी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

विविध शालेय वस्तू मिळालेल्या पाहून विद्यार्थ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. असंख्य शाळांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केल्याने वातावरणात रंगत आली. साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दलही ओढ निर्माण झाली. हे विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचतात हे पाहून रोटरी पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

मदतीचे आवाहन

सामाजिक उपक्रमांतून समाजाचा विकास साधण्याच्या टीच या उपक्रमाला शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तींची आवश्यकता आहे. या कार्यात गरजूंना मदतीचा हात देवू इच्छिणाऱ्या दानशुरांनी रोटरी क्लब ऑफ नाशिक, दूरध्वनी २३१११२३ यांचेशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर, कोचिंग क्लासेसवर लक्ष

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आता डॉक्टर व कोचिंग क्लाससह बिल्डर व सराफ असणार असल्याचे संकेत पुणे विभागाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त ए. सी. शुक्ल यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत दिले.

करयोग्य उत्पन्न असूनही अनेक जण आयकर भरत नसल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. अशा करदात्यांनी रिटर्न फाईल करुन कर भरावा. आमच्याकडे १० प्रकारची माहिती असून त्यामुळे करयोग्य उत्पन्न असूनही कर न भरल्यास दंडात्मक कारवाई आम्ही करू, असाही इशारा शुक्ल यांनी दिला.

गडकरी चौकातील प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात शुक्ल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमची डॉक्टरांवर करडी नजर असून ते रोखीने पैसे घेतात आणि खरे उत्पन्न दाखवत नाही. त्यांनी वास्तव उत्पन्नावर कर भरावा. गेल्या काही दिवसात अनेक सर्व्हेमध्ये आम्हाला हे आढळून आले आहे. त्याचबरोबर कोचिंग क्लास, ज्वेलर्स व बिल्डरही यांनीही आपले उत्पन्न योग्य दाखवून आयकर भरावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी पुणे विभागात मुंबई व विदर्भ वगळून राज्यातील सर्व जिल्हे असल्याचे सांगून कामगिरीचा आढावा घेतला. गेल्या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर वसुलीचे ४२ हजार २०० कोटींचे लक्ष्य होते; पण अधिकाऱ्यांनी चांगली कामगिरी करून ही वसुली ४२ हजार २८० कोटी केली. कर वसूलीमध्ये देशात पुणे विभाग ग्रास ग्रोथमध्ये दुसरा तर नेट ग्रोथमध्ये दुसरा आहे. सर्वांनी वेळेवर कर भरल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार नाही. करपद्धती पारदर्शक व सोपी केली आहे. आता सर्व ऑनलाइनही झाले आहे येत्या काही दिवसात स्कुटणी सुद्धा ऑनलाइन होईल.

४५ सर्व्हेत १०५ कोटी
पुणे विभागाने केलेल्या ४५ सर्व्हेत १०५ कोटी रुपयाचे उत्पन्न घोषित झाले असून त्यात ५० कोटी नाशिकचे असल्याची माहिती मुख्य आयकर आयुक्त शुक्ल यांनी दिली. आयकर अधिकाऱ्यांनी चांगली कमागिरी केल्यानेच हे शक्य झाले असे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना शाबासकी दिली.

कांदा व्यापाऱ्यांकडून धागेदोरे
जिल्ह्यातील सात कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने २४ ठिकाणी छापे टाकल्यानंतर हवाला व दुबई कनेक्शनची चर्चा आहे . या मुद्यावर ‌पत्रकारांनी विचारले असता शुक्ल यांना अनेक धागेदोरे मिळाले असल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले.

रिटर्न भरण्यासाठी टीम
करयोग्य उत्पन्न असणाऱ्या आयकर भरावा यासाठी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचा एक सदस्य, सीए व टॅक्स प्रॅक्टिशनर्सचा एक सदस्य व प्राप्तिकर विभागाचे अधिकारी यांची एक टीम तयार करण्यात येईल. त्यानंतर ते प्रत्यक्ष कर भरावे यासाठी भेटी घेऊन प्रचार करतील व कार्यशाळाही घेतील, अशी माहितीही शुक्ला यांनी दिली. तसेच कर भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी व काही तक्रारी असल्यास प्राप्तिकर विभागाचे अधिकारी दुपारी ३ ते ४ या वेळेस भेटतील. यात ते सर्व अडचणी समजून घेतील, असेही ते म्हणाले.

सज्जन को सहारा!
‘सज्जन को सहारा.. दुर्जन को डर!’ असे सांगत आयुक्त ए. सी. शुक्ल यांनी करयोग्य उत्पन्न असणाऱ्या व खरे उत्पन्न लपवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. कर भरणाऱ्यांना मुक्त वाटावे व न भरणाऱ्याला भीती वाटावी असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images