Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शेतजमिनीची विक्री; आठ जणांवर गुन्हा

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील निमगाव येथील शेत गट नं. १९५, २२७ ही शेतजमीन आठ जणांनी संगनमतकरून अशोक सखाराम अहिरे (बागुल) या नावाने बनावट सातबारा तयार करून भरत भामरे (रा. दरेगाव) यांना परस्पर विक्री करून फसवणूक केली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेबीबाई यशवंत साबळे (७५, रा. पुष्पाताईनगर, भायगाव) यांनी फिर्याद दिली. सब रजिस्टर कार्यालयात २५ मार्च २०१६ रोजी हा प्रकार घडला. एच. डी. गांगुर्डे (रा. निमगाव), अशोक सखाराम अहिरे (बागुल रा. द्याने-रमजानपुरा), भरत किसन भामरे (रा. पवारवाडी), अशोक हरी पिंपळे, अशोक मंगळू खरे, रतन शामराव अहिरे, दिनकर प्रकाश वाल्मिक अहिरे यांनी फिर्यादी व साक्षीदार (वारसदार) यांच्या कायदेशीर मालकीची शेत जमिन बनावट सातबारा तयार करून परस्पर विक्री करून खरेदी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बागडती हरणे अन् काळविटांनी खुलले ममदापूर

0
0

संजय लोणारी, येवला

येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागातील हजारो हेक्टर विस्तीर्ण असे वनक्षेत्र अन् या वनक्षेत्रातील हजारोंच्या संख्येने असलेला हरीण, काळवीट या वन्यजीवांचा संचार म्हणजे निसर्गाने दिलेला एक मोठा अनमोल ठेवाच. याच उत्तरपूर्व भागात राजापूर, ममदापूर, देवदरी, खरवंडी, सोमठाण जोश आदी भागातील वनक्षेत्रात पाउल ठेवले तर जागोजागी नजरेत पडतात ते इकडून तिकडे बागडणारे, मनुष्याला क्षणभर पाहून टूणकन लांब उडी घेत अगदी वायुवेगाने दूर दूर जाणारे हरणे, काळवीटे. निसर्गाच्या या ठेव्यातील हरणांचा एखादा कळप नजरेत पडतो तेव्हा, पाहणाऱ्याच्या डोळ्यांची पारणे न फिटली तर नवलच. गेल्या काही दिवसात परतीच्या पावसाने तालुक्यात मोठी विश्रांती घेतली असली तरी त्याअगोदर यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे या वनक्षेत्रात जागोजागी मोठी हिरवळ निर्माण झाली आहे. जागोजागी गवत उगवल्याने या हिरव्यागार कुरणात वन्यजीवांच्या अन्नाची चांगलीच सोय झाली आहे. त्यातूनच सध्या हे वन्यजीवन बहरल्याचे चित्र दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवस्थानच्या जागेत त्र्यंबकराजाचे सीमोल्लंघन

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबकराजाचे सीमोल्लंघन शनिवारी मोठ्या थाटामाटात पार पडले. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर नगराध्यक्षा तृप्ती धारणे यांच्या कुटुंबीयांनी देवस्थानला दिलेल्या जागेत शमीवृक्ष पूजन झाले.

गत पाच वर्षांपासून पूर्वीच्या श्री कामेश्वरानंद आश्रमात शमी पूजनासाठी पालखी नेण्यास यावर्षी देखील देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने विरोध दर्शविला.

शनिवारी पालखी कामेश्वरानंद महाराज आश्रमाच्या समोर आली तेव्हा बिंदू महाराज यांनी विनंती केली. मात्र देवस्थान प्रशासनाने पालखी थांबविली नाही. त्यामुळे काही वेळ वादाचा प्रसंग निर्माण झाला. उपविभागीय पोल‌िस अधिकारी शाम वळवी, पोलिस निरीक्षक सोनवणे आदींनी बिंदू महाराज यांच्याशी संवाद साधत वाद मिटवला. कामेश्वरानंद महाराज यांच्या आश्रमाचे शेजारच्या जागेत मंडप टाकून सजावट करण्यात आली होती. तेथे पालखी उतरविण्यात आली. याच ठिकाणी देवस्थान चेअरमन न्यायाधिश बोधनकर, ज्येष्ठ स्वातंत्र्यं सैनिक तथा विश्वस्त यादवराव तुंगार, कैलास घुले, अॅड. श्रीकांत गायधनी, सचिन पाचोरकर, डॉ. सत्यप्रिय शुक्ल आदींनी शमी वृक्षाचे पूजन केले. नगराध्यक्षा तृप्ती धारणे, पंकज धारणे आदी उपस्थित होते.

सजवलेल्या बैलगाड्या, पारंपरिक पेहराव असलेले सशस्त्र पहारेकरी, पालखी सोबत मनोज तुंगार, गिरीश जोशी, अजिंक्य जोशी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कामेश्वरानंद आश्रमाच्या भक्तमंडळाने पालखी परत फिरल्यानंतर प्रवेशद्वारी डॉ. बिंदू महाराज, ओमगिरी महाराज, नीलेश खैरे, रामसींग परदेशी, आदींनी पूजन केले.

कामेश्वरानंद महाराज आश्रमात अनेक वर्षांपासून पालखी उतरविण्यात येत होती. ती प्रथा अचानक बंद केली. देवस्थान ट्रस्टने पालखीची जागा स्वतःच्या मनाने बदलली आहे. आश्रमात शमीचा वृक्ष आहे. असे असतांना पालखीची जागा बदलण्याची आवश्यकता नव्हती.
-डॉ. बिंदू महाराज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’रूपी रावणाचे दहन

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला जिल्ह्यात अद्याप विरोध कायम आहे. तो दर्शविण्यासाठी दसऱ्याचे औचित्य साधून राज्य सरकाररूपी रावणाचे दहन करण्यात आले. इगतपुरीतील अवचितवाडी आणि सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे रावणरूपी सरकारचे दहन करण्यात आले.

सरकारच्या आदेशानुसार प्रशासनाने समृद्धी महामार्गासाठी जमिनी संपादनाचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत ८० हेक्टर जमिनींचे संपादन करण्यात आले आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांनी विरोधाचे निशाण फडकवत ठेवले आहे. दसऱ्याचे औचित्य साधून अवचितवाडी येथे सरकारच्या निषेधार्थ रावणदहन करण्यात आले. शिवडे येथेही अशाच प्रकारचे आंदोलन करून सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे समृद्धी महामार्गास इगतपुरी तालुक्यात विरोध मावळला असल्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. अवचितवाडी येथे समृद्धीविरोधी संघर्ष समितीचे सचिव भास्कर गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली ‘समृद्धी’नामक राक्षसाचे दहन करण्यात आले. या वेळी दौलत दुभाषे, अरुण गायकर, ज्ञानेश्वर तोकडे, विजय कडू, मच्छिंद्र भगत, ज्ञानेश्वर कडू, गोरख हाडके यांच्यासह शेकडो शेतकरी व महिला उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणारोडची कोंडी फुटणार!

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

द्वारका ते दत्त मंदिर चौकादरम्यान प्रस्तावित उड्डाणपुलासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या अभिनव आकार या तांत्रिक सल्लागार समितीने नुकतीच या मार्गाची पाहणी करून सर्वेक्षण केले. समिती आपला अहवाल केंद्राला तीन महिन्यात देणार आहे. त्यामुळे नाशिकरोडची कोंडी लवकरच फुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

द्वारका ते नाशिकरोडदरम्यानचा वाहतुकीचा मुद्दा कळीचा झाला आहे. या मार्गावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, अनेकांचा बळी गेला आहे. द्वारका ते दत्त मंदिर चौक यादरम्यान उड्डाणपूल करून ही कोंडी सोडविण्याची मागणी नागरिक व वाहनचालक अनेक वर्षांपासून करीत आहेत. नाशिकरोड व नाशिक या दोन शहरांना जोडणारा हा प्रस्तावित उड्डाणपूल वाहतूक कोंडीवर नामी उपाययोजना ठरणार आहे. हा ५.९ किलोमीटरचा रस्ता महापालिका हद्दीत येतो.

या पार्श्वभूमीवर नवीन उड्डाणपूल तयार करताना जागेवर काय अडचणी येऊ शकतात हे जाणून घेऊन जुन्या उड्डाणपुलावेळी उद्भवलेल्या त्रुटी राहू नयेत म्हणून हा पाहणी दौरा करण्यात आला. या मार्गावर बिटको चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल आहे. परंतु, त्याने वाहतुकीचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. या मार्गावर सिन्नर, शिर्डी, पुणे अशी वाहतूक सुरू असते. भविष्यात ही वाहतूक वाढणार आहे.

गडकरींचे सहकार्य

द्वारका ते दत्त मंदिरदरम्यान उड्डाणपुलाच्या निर्मितीचा प्रस्ताव खासदार गोडसे यांनी नाशिक दौऱ्यावर आलेले केंद्रीय रस्ते व अवजड उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांडला होता. हा मार्ग महापालिकेच्या हद्दीत आहे. महापालिकेकडे उड्डाणपुलासाठी निधी नाही. हा राष्ट्रीय महामार्ग घोषित केल्यास निधी मिळेल, असे त्यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणत निधीची मागणी केली. तिला गडकरींनी तत्त्वतः मान्यता दिली. त्यानुसार आता कार्यवाही सुरू झाली आहे.


समस्या उद््भवणारी ठिकाणे

नाशिक-पुणे महामार्गावर वाहतुकीची सर्वांत जास्त कोंडी होणाऱ्या ठिकाणांमध्ये द्वारका, आयनॉक्स, आंबडेकरनगर सिग्नल, उपनगर नाका चौक, सेंट झेवियर्सचा चौक, म्हसोबा, दत्त मंदिर बस स्टॉप यांचा समावेश आहे. या ठिकाणी बेशिस्त नागरिक, सिग्नल न पाळणारे वाहनचालक यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. द्वारका चौकात रिक्षाचालक बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करतात, तर तेथून पुढे जनरल वैद्यनगरपर्यंत टेम्पो, ट्रक उभे असतात. आयनॉक्स चौक ते आंबेडकर चौकापर्यंत वाहने बेकायदेशीरपणे पार्क केलेली असतात. उपनगर ते दत्त मंदिर चौक रस्ता अरुंद आहे. या मार्गावरील चौकांमध्ये व सिग्नलच्या ठिकाणी वाहतूक पोलिस नसतो. या सर्व कारणांमुळे नाशिक-पुणे महामार्ग वाहतुकीस अपुरा पडत आहे.


अहवाल तीन महिन्यांत

आकार अभिनव कंपनी सविस्तर अहवाल तयार करून केंद्र सरकारला तीन महिन्यांत सादर करेल. या मार्गाच्या सर्वेक्षणावेळी खासदार हेमंत गोडसे, केंद्राने नियुक्त केलेल्या आकार अभिनव संस्थेचे मुख्य सल्लागार व व्यवस्थापक अमोल खेर, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता एस. टी. कोलते, महापालिकेचे कार्यकारी अभियंता टी. बी. चव्हाण, महापालिका शाखा अभियंता रमेश पाटोळे, उपअभियंता एस. के. कोलते, एस. टी. बडगुजर, शाखा अभियंता व्ही. के. चौधरी, आर. जी. पालवे, सिटी फोरमचे अध्यक्ष सुनील भायभंग आदी उपस्थित होते. या उड्डाणपुलासंदर्भात संबंधित केंद्रीय समितीने केलेल्या पाहणीमुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आढळले ६३७१ दिव्यांग

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिव्यांगांच्या प्रश्नावरून आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या राड्यानंतर महापालिकेचे दिव्यांग धोरण चव्हाट्यावर आले होते. त्यामुळे महापालिकेने दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी २० कोटींचा आराखडा तयार करतानाच दिव्यांगांचे सर्वेक्षणही केले. या सर्वेक्षणात शहरात ६,३७१ दिव्यांग असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील पावणेपाच लाख घरांना भेटी दिल्यानंतर हा आकडा समोर आला आहे. यातील चार हजार अधू असून, महापालिकेला आता त्यांच्या पुनर्वसनासाठी मंजूर केलेल्या आराखड्याला अंतिम रूप देता येणार आहे. सिडको परिसरात सर्वाधिक अपंग आढळून आले आहेत.

महापालिकेला शहरातील अपंगांवर तीन टक्के रक्कम खर्च करणे आवश्यक असताना ते खर्च न केल्यामुळे गेल्या महिन्यात आयुक्त अभिषेक कृष्णा आणि प्रहार संघटनेचे आमदार कडू यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर महापालिकेने दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले होते. वैद्यकीय विभागाने पंधरा दिवस मोहीम राबवून हे सर्वेक्षण पूर्ण केले होते. पालिकेने शहरातील ४ लाख ८६ हजार ९९१ घरांना भेटी दिल्या. त्यात ६,३७१ दिव्यांग नागरिक आढळून आले. यात विकलांगांची संख्या ९०९, तर अंधांची संख्या ७५६ आहे. मूक-बधिरांची संख्या ८१४, तर हात व पाय अधू असलेल्या दिव्यांगांची संख्या ३,८९२ एवढी आहे.

४,४३२ दिव्यांग प्रमाणपत्राविना

महापालिका हद्दीतील सर्वेक्षणात आढळलेल्या दिव्यांगांमध्ये केवळ १९३९ नागरिकांकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आढळून आले आहे. त्यामुळे शहरात तब्बल ४,४३२ जणांना अपंगत्वाचे प्रमाणपत्रच नसल्याचे वास्तवही या निमित्ताने समोर आले आहे. त्यामुळे या दिव्यांगांना अपंग योजनेचा लाभ मिळत नसून, त्यांना प्रमाणपत्र मिळवून देण्याचे आव्हान आहे.

विभागनिहाय दिव्यांग

सिडको ः १२७३, कथडा ः १२५७, नाशिकरोड ः १२३५, पंचवटी ः १२२३, सातपूर ः १०८०, पूर्व विभाग ः ३०३.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला चार शिवशाही बस

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दसऱ्याच्या मुहूर्तावर नाशिककरांना शुभ वार्ता मिळाली असून, नाशिकसाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या चार शिवशाही बस दाखल होणार अाहेत. या बसेसद्वारे नाशिक-पुणे या मार्गावर सेवा दिली जाणार आहे. दिवाळीच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता या बसेस महत्त्वाच्या ठरणार आहेत.

राज्य परिवहन महामंडळाने नाशिकसाठी चार शिवशाही बस दिल्या असून, दि. ३ आॅक्टोबरपासून त्या नाशिक-पुणे या महामार्गावर धावणार आहेत. प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राज्यभर अशा बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. नाशिकला टप्प्याटप्प्याने २० बसेस देण्यात येणार असून, त्यातील चार बसेस आता देण्यात आल्या आहेत. वातानुकूलित व अत्याधुनिक सोयी-सुविधा या बसमध्ये आहेत.

नाशिक-पुणे महामार्गावर यापूर्वी शिवनेरी, हिरकणी व साध्या बसेस धावत होत्या. त्यातील ११ हिरकणींपैकी ४ बसेस आता कमी करून त्याएेवजी शिवशाही बसेसचा समावेश केला जाणार आहे. शिवशाही बस गाडीच्या प्रतिटप्प्याचे भाडे इतर बस गाड्यांच्या तुलनेत कमी ठेवण्याचा निर्णय महामंडळाने यापूर्वीच घेतल्याने प्रवाशांमध्ये या बसचे आकर्षण आहे. नाशिकमध्ये टप्प्याटप्प्याने मिळणाऱ्या या बसमध्ये स्लीपर कोचसुद्धा असणार आहे. त्या अहमदाबाद, इंदूर, बडोदा येथे सोडण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. या बसला कसा प्रतिसाद मिळतो हे बघून त्याची संख्याही वाढविली जाणार आहे.

--

प्रवाशी वाढण्याची अपेक्षा

खासगी वाहतूकदार आरामदायी बस गाड्यांच्या भाड्यात सवलत देत असल्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे. त्यामुळे एसटीने ५०० शिवशाही बस सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्यभरात टप्प्याटप्प्यानेच त्या सुरू केल्या जाणार आहेत. राज्यातील विविध शहरांसाठी शिवशाही बससेवा सुरू झाल्यानंतर खासगी बस गाड्यांचे प्रवासी एसटीच्या शिवशाही वळतील, अशी मंडळाला आशा आहे. शिवनेरीपेक्षा या बसेसचे दर कमी असणार असल्याचे मानले जात आहे.

--

नाशिकसाठी चार शिवशाही बस मिळाल्या असून, त्या नाशिक-पुणे महामार्गावर धावणार आहेत. टप्प्याटप्प्याने २० शिवशाही बस मिळणार आहेत. प्रवाशांना जास्तीत चांगल्या सुविधा देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.

-आर. डी. जगताप, वाहतूक अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’साठी ११ गावांनी दिल्या जमिनी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाच्या जमीन संपादनाचा गुंता सुटला नसला तरी आतापर्यंत इगतपुरी व सिन्नर येथील ११ गावांतून ४० खरेदी झाल्या असल्या असून, शेतकऱ्यांना ३२ कोटी ४५ लाख रुपये अदा केले आहेत. यापूर्वी फक्त १६ खरेदीवर गाडी अडकल्यानंतर आता त्यात २४ खरेदीची भर पडली आहे. या खरेदीतून ३०.२ हेक्टर संपादित करण्यात आली आहे.

भूसंपादनामध्ये सिन्नर तालुक्यातील नऊ गावांत २७ खरेदी झाली असून, येथे २३.६६ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी २२ कोटी ५० लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. यामध्ये ससाळे, वावी, फुलेनगर, धोंडवीरनगर, सोनांबे, बेनू, पांढुर्ली, दातर्ली, दुशिंगवाडी या गावांचा समावेश आहे. इगतुपरी तालुक्यातील तळोक व धामणगाव येथील ६.३६ हेक्टर जमीन खरेदी करण्यात आली आहे. त्यात १३ शेतकऱ्यांना १० कोटी ४० लाख रुपये देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातून १०१ किलोमीटरचा हा महामार्ग असणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन होणार असल्यामुळे गेले काही दिवस त्याला तीव्र विरोध करण्यात आला व राज्य पातळीवरही त्याचे पडसाद उमटले. जिल्ह्यातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी या जमिनी दिल्या तर त्यांच्या हाती १२०० ते १५०० कोटी रुपये पडणार असल्याचे बोलले जाते. या जमिनीची खरेदी व्हावी म्हणून सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे भविष्यात त्यातून किती शेतकरी जमीन देतात हे महत्त्वाचे आहे. नागपूर- मुंबई सुपरकम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे या ७०० किलोमीटरच्या या समृद्धी महामार्गामुळे राज्यातील १० जिल्हे, २४ तालुके आणि ३९१ गावे जोडली जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हा महामार्ग विकसित करणार असून, त्यामुळे नागपूर ते मुंबई प्रवासासाठीचा कालावधी १६ तासांवरून सात ते आठ तासांवर येऊ शकणार आहे. याशिवाय विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हे राज्यातील मोठे भाग थेट आंतरराष्ट्रीय आयात-निर्यातीचे केंद्र असणाऱ्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टशी (जेएनपीटी) जोडले जाणार आहेत. या महामार्गाच्या निर्मितीसाठी ४६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कामावरून काढल्याने मालकावर चाकू हल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून घरात शिरलेल्या मद्यपी चालकाने पैशांची मागणी करीत मालकावर चाकू हल्ला केला. ही घटना गंगापूररोड भागात घडली असून, संशयितास लागलीच अटक करण्यात आली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

नीलेश दिलीप मोरे (वय ३१, रा. राणेनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. स्वाती शशिकांत साखला (रा. लोकमान्यनगर, गंगापूररोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लॅण्ड डेव्हलपिंग आणि लॉटरी व्यवसाय असलेल्या साखला कुटुंबीयांकडे काही वर्षांपूर्वी संशयित चालक म्हणून कामास होता. मात्र, दारूचे व्यसन जडल्याने मोरेला कामावरून कमी करण्यात आले. तरीही तो सतत साखला यांच्या घरी येत असते. मद्याच्या नशेत तो नेहमीच पैशांची मागणी करीत असे. गुरुवारी रात्री तो साखला यांच्या घरी आला. यावेळी त्याने कुटुंबीयांना चाकूचा धाक दाखवत दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यास विरोध केला असता त्याने साखला यांचा मुलगा अंकित यास पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने अंकितच्या हाताच्या पंज्यावर चाकूने वार केले. या घटनेत अंकितच्या हातास दुखापत झाली असून, अधिक तपास उपनिरीक्षक बैरागी करीत आहेत.

घर दुरुस्तीत फसवणूक

घर दुरुस्तीच्या नावाखाली चौघा बांधकाम व्यावसायिकांनी वृध्द व्यक्तीची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, संशयितांमध्ये दोघा महिलांचा समावेश आहे.

आशा जगदीश चौधरी (रा. सूर्यशंकर सोसा. विनयनगर), ज्युली योगेश जैस्वाल (रा. श्रमपुंजी सोसा. विनयनगर), दीपक कचरू हांडगे (रा. मुरकुटे कॉलनी, गंगापूररोड) व साईदास दाजी पाटील (रा. प्रमोद गार्डन, मंगलनगर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. विनयनगर येथील विनायक पांडुरंग कोठावदे (वय ६०, रा. विराज पार्क, दीपालीनगर) यांच्या तक्रारीनुसार, संशयित बांधकाम व्यावसायिकांनी कोठावदे यांच्या ताब्यात असलेल्या श्रमपुंजी सोसायटीतील सदनिकांचे विकसन करण्याचा करार केला होता. ७ ऑगस्ट २०१२ रोजी करारनाम्यानुसार १ लाख १५ हजार रुपये इसार म्हणून घेतले होते. मात्र आजपर्यंत ठरलेल्या व्यवहारानुसार सदनिकांचे विकसन केले नाही. तसेच आर्थिक फसवणूक केल्याचे कोठावदे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.

कामगाराचा मृत्यू

पाचव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उंटवाडीतील दोंदे पूल परिसरात घडली. संकल्प सुनील शिंपी (रा. पाटीलनगर) असे या कामगाराचे नाव आहे. दोंदे पूल परिसरातील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर संकल्प शुक्रवारी कामासाठी गेला होता. पाचव्या मजल्यावर काम करीत असताना अचानक चक्कर आल्याने तो पाचव्या मजल्यावरून खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला. अन्य कामगारांनी त्यास तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

वसतिगृहातून मोबाइलची चोरी

मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातून डॉक्टरचे दोन मोबाइल चोरी झाले. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. डॉ. श्रीहर्ष श्रीरंग गोडबोले (रा. पुणे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.आडगाव मेडिकल कॉलेज मध्ये डॉ. गोरे शिक्षण घेत आहेत. कॉलेजजवळील वसतिगृहात ते वास्तव्यास असून, गुरुवारी सायंकाळी ते कामानिमित्त आपल्या रूमच्या बाहेर पडले असता चोरीचा प्रकार घडला. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या रूममध्ये घुसून सुमारे १५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल चोरून नेले. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक खालकर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामस्थांकडून बोकडबळी

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बोकडबळीच्या प्रथेवरून यावर्षी सुरू असलेले वाद-विवाद शनिवारी मिटले. देवस्थानला प्रशासनाने बोकडबळी देण्यास विराध केला असल्याने गडावर विजयादशमी अर्थात दसऱ्याला ग्रामपंचायतचे आजी-माजी पदाधिकारी, गड ग्रामस्थ व भाविक वर्गाने हद्दीबाहेर परंपरागत चालत आलेला बोकडबळी दिला.

श्री सप्तशृंग देवस्थानमार्फत दिला जाणारा बोकडबळी महसूल प्रशासनाने यंदापासून बंद केला असला तरी देवस्थान हद्दीबाहेरील सुरक्षित जागेवर सालाबादाप्रमाणे होणारे सर्व विधी व बोकडबळी परंपरेनुसार करण्याची तयारी गड ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी केली होती. यात्रा व या विधिनिमित्त पोल‌िस व महसूल यंत्रणेकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र कुठल्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याचे कार्य हा विधी करणाऱ्यांकडून झाले नसल्याने प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला.

सप्तशृंग देवस्थान ट्र्ष्ट स्थापन होण्याच्याही आधीपासून नवरात्र उत्सवाची सांगता होमहवन पूर्णाहुती सोहळ्यासह बोकडबळीने करण्याची परंपरा गडावर होती.

गेल्यावर्षी या विधीदरम्यान दिल्या जाणाऱ्या मानवंदनेप्रसंगी केलेल्या फायरिंगमुळे बंदुकीच्या बुलेटचे छर्रे उडून १२ भाविक जखमी झाले होते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने महत्वाचे पाऊल उचलत बोकडबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. मात्र गड ग्रामस्थ व काही भाविकांनी वर्षानुवर्षांची परंपरा बंद करू नये, असा आग्रह प्रशासनाकडे धरला. मात्र देवस्थानच्या हद्दीत जो कोणी हा विधी करण्याचा प्रयत्न करेल त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचेही फर्मान प्रशासनाने काढले होते.

प्रशासनाच्या या निर्णयाचा आदर करत देवस्थान हद्दीबाहेर असलेल्या व्यायामशाळा व जिल्हा परिषद शाळेजवळ हा विधी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. त्यानुसार शनिवारी हा सोहळा पार पडला.

मानवंदनेला फाटा

दसऱ्याच्या निमित्ताने सकाळी ७ ते१० वाजेपर्यंत बोकडाची शिवालय तलाव ते मारुती मंदिर व पहिली पायरी अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कळवण तालुक्यातील देवळी बिलवाडी येथील आदिवासी बांधवांचे पारंपरिक नृत्य, ढोल ताशे व भोवाडा पथकाने दिलेली करमणुकीची मेजवाणीने उपस्थित खुश झाले. यावेळी पुरोहितांनी सर्व प्रकारचे पारंपरिक विधी केले. होमहवन पूर्णाहुती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. कुठल्याही प्रकारची मानवंदना यंदा दिली गेली नाही. शिवाय बळी दिल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या चलनी नोटांना रक्त लावण्यात आले नाही.

मिरवणूक शांततेत

पोल‌िस व महसूल यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाशी स्थानिक पदाधिकारी वर्गाने चर्चा केली. प्रशासनाच्या आदेशानुसार आम्ही हा विधी देवस्थान ट्रस्टच्या हद्दीबाहेर करणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर मिरवणूक शांततेत पार पडली. गडावरील वातावरण तणावपूर्ण वाटत होते. मात्र प्रशासन व ग्रामस्थ यांच्यातील समन्वयामुळे कुठेही गालबोट लागला नाही. मिरवणुकीत उपसरपंच गिरीश गवळी, ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी, संदीप बेनके, अजय दुबे, मधूकर गवळी, दीपक जोरवर, तूषार बर्डे, गणेश बर्डे, बाळासाहेब व्हरगळ,नीलेश कदम, विजय दूबे, शांताराम गवळी, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हृदयविकारानंतर पहिले तीन तास महत्त्वाचे

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

मधुमेह व ब्लडप्रेशर असणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक आहे. हृदयविकाराचा झटका आल्यास पहिल्या तीन तासांत योग्य उपचार मिळाले तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, असा सूर जागतिक हृदयदिनानिमित्त आयोजित ‘निरोगी हृदय’ या विषयावरील परिसंवादात उमटला.

नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने हा परिसंवाद झाला. त्यामध्ये हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अभयसिंग वालिया, तसेच डॉ. सुधीर शेतकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. शेतकर म्हणाले, की पोटात जळजळ होणे, हृदयाच्या डाव्या बाजूला दुखणे, एका हाताला मुंग्या येणे, चालताना दम लागणे ही हृदयविकाराची प्राथमिक लक्षणे आहेत. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित हृदयविकार तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. हृदयविकार होऊ नये यासाठी तंबाखू, धूम्रपान, तसेच तेलकट पदार्थांचे सेवन टाळायला हवे. रोज अर्धा तास जोरात चालणे, दोन ते तीन जिने चढ-उतार करणे, प्रकृतीला झेपेल इतका व्यायाम करणे आवश्यक आहे. डॉ. वालिया यांनीही निरोगी जीवनासाठी उपयुक्त अशा टिप्स दिल्या. प्रवाशाचे दीड लाख रुपये प्रामाणिकपणे परत करणारे रिक्षाचालक छोटू पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सिव्हिल हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. गाजरे, डॉ. ठाकूर यांनाही उल्लेखनीय कामगिरीसाठी गौरविण्यात आले. नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष देवराम सैंदाणे, डॉ. मंगेश जाधव, लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचाचे जितेंद्र येवले आदी उपस्थ‌ित होते. सावळीराम तिदमे यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार दुसानीस यांनी आभार मानले. जयराम गवळी, रमेश सोनवणे, दिनकर शेळके, सुखदेव भामरे आदींनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेत बहिष्कारास्र

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेच्या अध्यक्षांवर राजीनामा देण्यासाठी भाजपच्या संचालकांनी दबाव वाढवला असून, गुरुवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे गणपूर्तीअभावी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना सभाच तहकूब करावी लागली आहे. जिल्हा बँकेची स्थिती सुधारण्यासाठी अध्यक्षबदल आवश्यक असल्याचा दावा भाजपच्या संचालकांकडून केली जात असल्याने दराडेंची अडचण वाढली आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची गुरुवारी बैठक झाली. मात्र, या बैठकीकडे भाजपच्या चार संचालकांसह बहुसंख्य संचालकांनी पाठ फिरवली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अगोदरच झाली आहे. मात्र, अध्यक्ष राजीनामा देत नसल्याने सदस्यांनी आता बहिष्काराचे अस्र वापरण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारच्या बैठकीत गणपूर्तीसाठी आवश्यक सदस्य नसल्याने अध्यक्षांनी ही बैठक तहकूब केली आहे. पुढील महिन्यात बँकेची सर्वसाधारण सभा आहे. त्यापूर्वीच बँकेच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी भाजपच्या संचालकांची अपेक्षा आहे. जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी भाजपचाच अध्यक्ष आवश्यक असल्याचे सांगत, तोपर्यंत मदत मिळू नये अशीही व्यूहरचना करण्यात आली आहे. त्यामुळे अध्यक्षांच्या अडचणीत भर पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुंगटाच्या इमारत बांधकामास प्रारंभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज, शरद जोशी, बापू नाडकर्णी, नीला सत्यनारायण, सी. रामचंद्र यांच्यासारखी दिग्गज व्यक्तिमत्त्वे घडविणाऱ्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतकमहोत्सवी वर्षात विजयादशमीच्या मुहूर्तावर रुंगटा हायस्कूलच्या इमारतीच्या बांधकामास प्रारंभ करण्यात आला. कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. वर्षभरात मराठी माध्यमाच्या शाळेची नवीन हायटेक इमारत उभारण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमांच्या साह्याने शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत, अशी माहिती कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक यांनी दिली.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ शतकमहोत्सवी वर्ष साजरा करीत आहे. अशोकस्तंभावरील कर्डिलेवाड्यात १ मे १९१८ मध्ये रुंगटा हायस्कूलला सुरुवात झाली. शंभर वर्षांच्या इतिहासात रुंगटा हायस्कूलने अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वे व असंख्य विद्यार्थ्यांना घडविले आहे. काळानुसार विद्यार्थ्यांना अद्ययावत सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी हायटेक इमारत संस्था बांधत आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या या इमारतीत तळमजला, पहिला मजला, दुसरा मजला, तीस वर्गखोल्या, याशिवाय ई-लर्निंग, संगणक कक्ष, अत्याधुनिक सायन्स लॅब, डिजिटल लायब्ररी, भव्य खेळाचे मैदान या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही नूतन इमारत वर्षभरात पूर्ण होणार आहे, अशी माहिती कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष दाबक व सेक्रेटरी ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी दिली. यावेळी संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे, सेक्रेटरी ज्ञानेश्वर कुलकर्णी, सहसचिव प्रसाद कुलकर्णी, जु. स. रुंगटा हायस्कूलचे शाळा समिती अध्यक्ष मिलिंद कचोळे, पुष्पावती रुंगटा विद्यालयाचे शाळा समितीचे अध्यक्ष संजय परांजपे, जु. स. रुंगटा हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सूर्यवंशी, मोहिनीदेवी रुंगटाचे मुख्याध्यापक शांताराम उफाडे, आर्किटेक्ट धनंजय शिंदे, राजेश दीक्षित आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिग्दर्शकाला जामीन मंजूर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चित्रपटासाठी ऑडिशन सुरू असताना विनयभंग केल्याप्रकरणी दिग्दर्शकाविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, संबंधित दिग्दर्शकाला जामीन मंजूर झाला आहे.

रोहित आर्या असे या दिग्दर्शकाचे नाव आहे. आर्या यांची अमेन एनएलपी ही मुंबई स्थित कंपनी असून, मिस अप्सरा या टॅलेंट शोसाठी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी ऑडिशन घेण्याचे काम सुरू आहे. नाशिकमध्ये गुरुवारी (दि. २१) ऑडिशन सुरू असताना हा प्रकार घडल्याचे सिडको परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय पीडित तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे. या दिवशी जवळपास २५ मुलींनी ऑडिशन दिल्या. शुक्रवारी सेमीफायनलसाठी राउंड होते.

दरम्यान, गुरुवारी ऑडिशन सुरू असताना दिग्दर्शकाने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करीत पीडित मुलीने शुक्रवारी संध्याकाळी सरकारवाडा पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करीत आर्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. शनिवारी कोर्टाने आर्या यांना जामीन मंजूर केला. दरम्यान, दिग्दर्शक आर्या यांच्या पत्नी अंजली आर्या यांनी मटाशी बोलताना सांगितले की, गुरुवारी आणि शुक्रवारी मिळून ४० पेक्षा अधिक जास्त मुली पालकांसह हजर होत्या. पैकी फक्त एकाच मुलीने आरोप केला. मुलीचे वागणे चुकीचे होते. त्यामुळे तिला समज देण्यात आली. यामुळेचे तिने आरोप केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात २० नवीन मतदान केंद्रांची भर

0
0

म. टा. प्रतिन‌धिी नाशिक

वाढती मतदार संख्या विचारात घेऊन जिल्ह्यात नवीन २० मतदान केंद्रांना निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये जिल्ह्यात २० मतदान केंद्रे वाढतील, अशी माहिती निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बडे-मिसाळ यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या चार हजार २२८ पर्यंत पोहोचली आहे.

विद्यमान सरकारचा दोनच वर्षांचा कार्यकाळ शिल्लक राहिला असून, आगामी लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये होणार आहे. निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी अचूक आणि अद्ययावत मतदार यादीची आवश्यकता असल्याने निवडणूक आयोग तयारीला लागले आहे. लोकसंख्यावाढीचा विचार करून आयोगाने दोन वर्ष आधीच वाढीव मतदान केंद्रांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिेले होते. जिल्हा निवडणूक विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानंतर जिल्ह्यात २० मतदान केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. पूर्वी जिल्ह्यात चार हजार २०८ मतदान केंद्रे होती. आता ती चार हजार २२८ पर्यंत पोहोचली आहेत.

जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्परिक्षण कार्यक्रम मंगळवारपासून सूरू होत आहे. ५ जानेवारी २०१८ पर्यंत ह‌ा कार्यक्रम सुरू राहणार आहे. मतदार याद्यांमधील त्रुटी व उण‌विा शोधण्याचे काम या काळात निवडणूक विभागाकडून होणार आहे.

तसेच मृत मतदार आणि दुबार मतदारांची नावे वगळण्याचे कामही प्राधान्याने केले जाणार आहे.

प्रारुप मतदार याद्या मंगळवारी, ३ ऑक्टोबरला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. ३ नोव्हेंबर २०१७ पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. मतदार यादीमधील संबंध‌ति भाग, सेक्शनच्या ग्रामसभा, स्थानिक संस्था येथे वाचन व नावांची खातरजमा ७ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत केली जाईल.

हरकतींसाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदत

रविवार ८ आणि २२ ऑक्टोबरला विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्यासाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदत असणार आहे. ५ जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१७ ची मूळ मतदार यादी तसेच पुरवणी याद्यांचे विलीनीकरण व एकत्र‌किरण करून प्रारुप मतदार यादी ३ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान केंद्रावर तसेच मध्यवर्ती मतदान केंद्रात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती मिसाळ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हॅकिंग प्रकरणातील संख्या वाढणार!

0
0

आरटीओतील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरूच

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) ऑटोमेटिक व्हेईकल इन्स्पेक्शन सर्टिफिकेशन सेंटरमधील (एव्हीइएस) सिस्टिम हॅक प्रक्रियेत आरटीओतील आणखी काही अधिकारी वा कर्मचाऱ्यांचा सहभाग असू शकतो, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरटीओतील परितोष रणभोर या क्लर्कला अटक केली होती.

आरटीओ कार्यालयातील हॅकिंग प्रकरणात एकट्या रणभोरचा सहभाग असण्याची शक्यता फारच कमी आहे. हे काम काही व्यक्तींनी मिळून केले असून, ते पडताळण्यासाठी सायबर पोलिसांनी आरटीओतील मागील दोन वर्षाचा डेटा संकलित करण्यास सुरुवात केली आहे. एका विशिष्ट फॉरमॅटमध्ये ही माहिती मागवण्यात आली असून, तिच्या विश्लेषणानंतर अनेक बाबी समोर येतील, असे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले. यासंबंधी अनेक चर्चा सुरू असल्या तरी तसे पुरावे समोर येणे गरजेचे असल्याचे मत अधिकाऱ्याने व्यक्त केले. हा गुन्हा दाखल झाला त्यावेळी फक्त दोन फिटनेस सर्टिफिकेट दिले गेल्याचे समोर आले होते. नंतर हा आकडा १३ इतका झाला. तर, आजमितीस तो १८च्या घरात पोहचला आहे. क्लर्क म्हणून कार्यरत असलेल्या रणभोरने आपल्याच घरातील लॅपटॉपसह मोबाइलचा वापर करीत आरटीओ कार्यालयातील एव्हीइएस सिस्टिम हॅक केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. पोलिस कोठडी दरम्यान चौकशी सुरू असताना रणभोरने काही बाबी स्पष्ट केल्या असून, त्या दृष्टिकोनातून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. एव्हीईएस सिस्टिम हॅक झाल्याप्रकरणी १९ ऑगस्ट रोजी सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हॅकिंगची घटना ५ ऑगस्ट रोजी घडली होती. १६ ऑगस्ट रोजी वाहन निरीक्षक हेंमत गोविंद हेमाडे सिस्टिम तपासत असताना हॅकिंगचा प्रकार उघड झाला होता. यानंतर हेमाडे यांनी सायबर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन फिर्याद दिली होती. हॅकिंग प्रकरणी सायबर पोलिसांनी दीपक गिरधरलाल पटेल या वाहनमालकास देखील अटक केली असून, आजमितीस संशयित आरोपींची संख्या दोनच आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यात खासगी व्यक्तींसह आरटीओतील कोणाचा सहभाग आढळून आल्यास त्यास अटक करण्यात येईल.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हालोका ताजिया’द्वारे हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

इस्लाम धर्माच्या कालगणनेप्रमाणे मुस्लिम नूतन वर्ष, हिजरी सन १४३९ चा नुकताच प्रारंभ झाला असून, आज, रविवारी (दि. १ ऑक्टोबर) मोहरम साजरा होत आहे. त्याची तयारी पूर्णत्वास आली असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या नवीन वर्षाला सुरुवात झाल्यानंतर हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक व सुमारे चारशे वर्षांची परंपरा असलेल्या मानाचा ताबुत हालोका ताजिया भाविकांच्या दर्शनासाठी खुला करण्यात आला आहे. येथे होणाऱ्या सर्वधर्मीयांच्या गर्दीमुळे जुने नाशिक परिसरातील इमामशाही परिसरात हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडत आहे. देवळालीसह नाशिक शहर परिसरात ताबूत व सवारींची स्थापना पूर्ण झाली आहे. मुस्लिम बांधव या ताजिया अन् सवारींचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत असल्याचे दिसून येते आहे.

मुस्लिम बांधवांच्या या नवीन वर्षातील पहिले दहा दिवस हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या नातवाच्या स्मृतींना उजाळा देण्यात येतो. त्यासाठी शहीद-ए-करबला या विषयावर शहरातील मशिदींमध्ये प्रवचनमाला होत अाहे. देवळालीत यावर्षी हैदरखान उस्मानखान, रईसखान उस्मानखान यांच्या दोन चांदीच्या ताजिया, तर शहरातील इतर १४ सवारी स्थापन करण्यात आल्या असून, मुस्लिम बांधवांकडून रोट (नानकटाई), खिचडा, चोंगे, भाजी आदींचा नैवेद्य ताजियास अर्पण करण्यात येत आहे.


करबलाविषयी...

इराकची राजधानी बगदादपासून १०० किलोमीटर अंतरावर उत्तर-पूर्व दिशेला करबला हे एक छोटसे गाव आहे. येथे तारीख-ए-इस्लामचे एक ऐतिहासिक युद्ध झाले. या गावामुळेच जगभरात ठिकठिकाणी करबला नावाचे स्थान उभारून तेथे मोहरम साजरा होतो. इस्लामिक कालगणेनुसार असलेल्या पहिल्या मुहर्रम महिन्याच्या १० तारखेला (१० मुहर्रम, ६१ हिजरी अर्थात, १० ऑक्टोबर, इस ६८०) हजरत मोहम्मद साहेब यांचे नातू हजरत हुसैन यांना करबला येथे ज्या दिवशी वीरमरण आले, तो दिवस म्हणजे यौम-ए-आशुरा होय. याच दिवशी दु:खाचा दिवस म्हणून मुस्लिम बांधव मोहरम साजरा करतात. या लढाईत ते शहीद झाल्याने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दहा दिवस मशिदींमधून करबलाच्या लढाईचे वर्णन असलेल्या ग्रंथाचे वाचन करण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील पोलिस ठाणी पेपरलेसच्या दिशेने...

0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये संगणक बसविण्यात आल्याने गेल्या तीन दिवसांपासून स्टेशन डायरीच बंद झाली असून, आता तक्रारींची नोंदणीदेखील थेट संगणकांद्वारेच केली जात आहे. त्यामुळे शहरातील पोलिस ठाण्यांचा प्रवास पेपरलेसच्या दिशेने सुरू झाला आहे.

शहराचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी गेल्या काही महिन्यांपासून पोलिस ठाण्यामध्ये ऑनलाइन प्रक्रियेसाठी संगणक बसविण्याचे सांगितले होते. त्यानुसार तक्रारदार आल्यावर त्याची तक्रार संगणकावरच टाइप केली जाणार असल्याचे पोलिस ठाण्याच्या ठाणे अंमलदारांकडून सांगण्यात आले. याबाबत आयुक्तांशी संवाद साधला असता ते म्हणाले, की डिजिडल इंडिया म्हणून चालणार नाही, तर प्रत्यक्षात ते अंमलात आले पाहिजे, याकरिता संगणकावरच तक्रार घेतली जाणार अाहे. काही दिवस पोलिसांनादेखील संगणकावर तक्रार घेताना थोडाफार त्रास होईल. परंतु, भविष्यात डिजिटल इंडियाच्या धर्तीवर पोलिस ठाणीही अपडेट होण्याची गरज असल्याचे डॉ. सिंगल म्हणाले. संगणकावरून टाइप केलेल्याच तक्रारीची माहिती तात्काळ पोलिस आयुक्तालयाकडे प्राप्त होणार असून, राज्यात असा उपक्रम राबविणारे नाशिक हे पहिलेच शहर असेल, असा दावाही आयुक्तांनी केला.

आयुक्त डॉ. सिंगल म्हणाले, की डिजिटल इंडिया प्रत्यक्षात अंमलात आणण्याची गरज आहे. याकरिता गेल्या काही महिन्यांपासून शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये संगणक बसविण्याचे व ऑनलाइन केबल टाकण्याचे काम जोमाने सुरू होते. त्यानंतर प्रत्यक्ष काम करणाऱ्या तपासी अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनादेखील संगणकाची योग्य माहिती देण्यात आली आहे. तक्रारदार पोलिस स्टेशनला गेल्यावर त्याची तक्रार घेतल्यावर ती तात्काळ पोलिस आयुक्तालयात प्राप्त होणार आहे. यामुळे कामातदेखील सुटसुटीतपणा येणार अाहे. यामुळे तक्रार देणे व टाइप करून तात्काळ दाखल करणेही सोपे होणार असल्याने वेळदेखील वाचणार आहे. पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदारांना थोडा फार त्रास काही दिवस सहन करावा लागेल. परंतु, त्यानंतर त्यांनाच तक्रार संगणकावर दाखल करणे सोयीचे होणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

--

अन् संभ्रम झाला दूर

सर्वसामान्य नागरिकांना सर्वच सुविधा उपलब्ध लवकरात लवकर कशा उपलब्ध करून देता येतील यावर शासनाचे काम सुरू आहे. पोलिस आयुक्तालयानेदेखील डिजिटल इंडियाच्या धर्तीवर पावले उचलली आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये संगणक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. याबाबत अनेकांना नेमके संगणक कश्यासाठी बसविण्यात येत आहेत याची साधी कल्पनादेखील नसल्याने संभ्रम होता. परंतु, आता गेल्या तीन दिवसांपासून पोलिस स्टेशनला ठाणे अंमलदारकडे असणारी स्टेशन डायरीच बंद झाली असून, तक्रारींच नोंद थेट संगणकांद्वारेच केली जात आहे.

--

दैनंदिन जीवनात रोजच आपण डिजिटल इंडिया हा शब्द वापरत असतो. परंतु, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे या हेतूने शहरातील सर्वच पोलिस ठाणी संगणकाद्वारे ऑनलाइन करण्यात येत आहेत. याचाच पहिला भाग म्हणून स्टेशन डायरी बंद करून संगणकावरच तक्रारी घेण्याची सुरुवात करण्यात आली आहे.

-डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात संघाचे शिस्तबद्ध पथसंचलन

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

विजयादशमी निमित्ताने येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सघोष सदंड पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. शहरातील भुईकोट किल्ला येथून पथसंचालनास सुरुवात झाली. भगवा ध्वज मुख्यस्थानी होता. ध्वज घेऊन एक स्वयंसेवक अश्वारुढ झालेला होता. पथ संचलनाच्या स्वागतासाठी नागरिकांनी जागोजागी रांगोळीसह पुष्पवर्षाव करून भारत माता की जय वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या. भुईकोट किल्ला, रामसेतू पूल, संगमेशवर दत्तमंदिर, आंबेडकर पूल, किदवाई रोड, मामलेदार गल्ली, पाचकंदील, टिळक रोड, तांबा काटा, गुळ बाजार, या मार्गाने येऊन किल्ला येथे संचलन पूर्ण झाले. यावेळी शहर संघचालक अशोक कांकरिया, जिल्हा कार्यवाह सुनील चौहान, शहर कार्यवाह दीपक थोरात, अतुल शिरोडे आदींसह शहरातील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सटाण्यात संचलन

सटाणा ः येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी उत्सवानिमित्त शहरातून सघोष पथ संचलन करण्यात आले. संचलनात भगवा ध्वज अश्वावरून मिरविण्यात आला. संपूर्ण शहरातुन सघोष पथ संचलन करण्यात येवून सांगता देवमामलेदार यशवंतराव महाराज सभागृहात शस्त्रपुजनाचा उत्सव पार पडला. या प्रसंगी देवमामलेदार देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, प्रदीप बच्छाव, जिल्हा कार्यवाह सुनील चव्हाण, तालुका संघ चालक सुभाष सोनवणे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरशी पुलाचे काम रखडले

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील महादेव घाट ते संगमेश्वर याना जोडणाऱ्या मोसम नदीवरील फरशी पुलाचे काम गेल्या आठ वर्षांपासून रखडलेले आहे. या पुलावरून विद्यार्थ्यांना रोजच ये-जा करावे लागते. त्यामुळे हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

रामसेतूवर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुलापासून काही अंतरावर महादेव घाट ते संगमेश्वर असा नवा फरशी पूल बांधण्यास पालिकेकडून सुरुवात करण्यात आली. राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते भूमिपूजनही झाले. मात्र गेले कित्तेक वर्ष या पुलाचे काम रखडलेले असून, पालिकेकडून मात्र याबाबत चालढकल केली जात आहे.

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात?

भुईकोट किल्या परिसरात काकाणी शाळा असून शाळेत येणयासाठी विद्यार्थ्यांना रामसेतूवरूनच जावे लागते. त्यामुळे पुलावर गर्दी होते. त्यात मालवाहतूक करणारे, रिक्षाचालक, दुचाकीस्वार यांची सायंकाळी गर्दी होत असल्याने विद्यार्थ्यांना येथून बाहेर पडण्यासाठी कसरत करावी लागते.

पालिकेबाहेर आंदोलन

पुलाचे काम सुरू करावे, या मागणीसाठी सार्वजनिक नागरी सुविधा समितीने सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेजवळ धरणे आंदोलन केले. पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. हे काम ठेकेदार सुरू करत नसल्यास त्याबाबत फेरनिविदा काढावी अशी मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images