Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गांधीजींच्या पुतळ्याला अस्वच्छतेचा विळखा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

आज, सोमवारी (दि. २) साजऱ्या होत असलेल्या महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ही सेवा अभियान राबविले जात असतानाच देवळालीगावातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला मात्र कचऱ्याचा विळखा पडल्याचे दृश्य रविवारी दिसून आले. येथे फुले, आपट्याच्या पानांसह कचरा पडलेला असूनही साफसफाई केली न गेल्याने परिसरातून नाराजी व्यक्त करण्यात आली.

राष्ट्रपित्याचा नाशिकरोड परिसरातील हा एकमेव पुतळा आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज नाशिकरोडला विविध कार्यक्रम, उपक्रम होणार असून, देवळालीगावातील महात्मा गांधी पुतळ्याचे विविध पक्ष व संस्थांतर्फे पूजन केले जाणार आहे. मात्र, या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या टाइल्स तुटलेल्या असून, पुतळ्याची अनेक वर्षांपासून रंगरंगोटीही झालेली नाही. पुतळ्याभोवती काही व्यावसायिक अस्वच्छता करतात, अशी नागरिकांची तक्रार आहे. यासंदर्भात त्वरित कार्यवाही केली जावी, अशी मागणी नाशिकरोड काँग्रेसने केली आहे. देवळालीगावातील हा पुतळा तत्कालीन नाशिकरोड देवळाली नगरपालिकेने १४ जून १९६४ रोजी उभारला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्यानाला जंगलाचे स्वरूप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

आजूबाजूच्या परिसरासह आवारात फोफावलेले रानगवत, चिखल अन् दलदल, कचऱ्याचे ढीग, प्रवेशद्वाराची झालेली दुरवस्था अशी अवस्था आहे म्हसरूळ येथील सावरकरनगर कॉलनी परिसरातील छत्रपती शिवाजी उद्यानाची.

येथील मध्यवस्तीतील उद्यानाची अशी जंगलसदृश अवस्था होऊनदेखील परिसरातील लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या उद्यान विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने परिसरातील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रश्नी संबंधित घटकांनी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे.

प्रभाग क्रमांक १ मधील म्हसरूळ परिसरातील सावरकरनगर कॉलनीत छत्रपती शिवाजी उद्यानात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. या उद्यानाच्या प्रवेशद्वारावर चिखलाचे साम्राज्य पसलेले असून, गवत व दाट झाडी वाढल्यामुळे उद्यानाला जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील खेळण्यांची मोडतोड झालेली असून, तीदेखील गवतात हरवून गेल्याची स्थिती आहे. या उद्यानाची देखभाल करण्यासाठी पूर्ण वेळ कर्मचारीच नसल्यामुळे येथे साफसफाई, देखभाल होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

--

तक्रारी करूनदेखील दुर्लक्ष

या उद्यानाला जंगलासारखे स्वरूप प्राप्त झालेले असल्यामुळे या उद्यानात जाणेदेखील परिसरातील नागरिकांना दुरापास्त झाले आहे. त्यामुळे हे उद्यान पूर्ववत करण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. मात्र, या उद्यानाच्या दुरवस्थेसंदर्भात अनेक वेळा पाठपुरावा करूनदेखील कोणतीही दखल घेतली जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून, दिवाळीच्या सुटीच्या पार्श्वभूमीवर तरी हे उद्यान पूर्ववत करण्यात यावे, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.

--

येथील उद्यानाची देखभालच होत नसल्याने उद्यानात गवत फोफावले आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच कचरा आणि दलदल आहे. उद्यानाच्या दुरवस्थेमुळे लहान मुलांना खेळण्यासाठी जागाच राहिलेली नाही. त्यामुळे याबाबत त्वरित उपाययोजना करावी.

-योगेश पाटील, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भद्रकाली पोलिसांतर्फे ज्येष्ठांचा सन्मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ नागरिकांनी कुटुंबाप्रती, समाजाप्रती, देशाप्रती खूप खस्ता खाल्ल्या आहेत. त्यांच्या आजवरच्या अनुभवांची शिदोरी घेऊनच समाज मार्गक्रमण करीत आहे. त्यांच्या याच मोठेपणाचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करीत असल्याची भावना पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी व्यक्त केली.

जागतिक ज्येष्ठ नागरिकदिनाचे औचित्य साधून सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संस्था आणि भद्रकाली पोलिस स्टेशनतर्फे झालेल्या कार्यक्रमात पाटील बोलत होते. हा कार्यक्रम द्वारका परिसरातील संस्थेच्या कार्यालयात झाला. या वेळी काठे गल्लीसह इंदिरानगर, भद्रकाली परिसरातील तीनशेपेक्षा जास्त ज्येष्ठ महिला व पुरुष हजर होते. रोपट्यापासून वटवृक्षाचे रूपांतरण होत असताना ते झाड वेगवेगळ्या पद्धतीने सर्वांची मदत करते. त्यामुळे या वटवृक्षाच्या सावलीत जाताना एक आदरयुक्त भीती असते. ज्येष्ठ नागरिकांचा सहवास हीच भीती दर्शवत असल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांविषयी असलेल्या आदराप्रीत्यर्थ, तसेच त्यांनाही एक आधार असावा म्हणून नाशिक शहर पोलिस दलातर्फे काठी, टोपी व गुलाबाचे फूल ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आले. या वेळी पाटील यांनी पोलिस दलाची ज्येष्ठ नागरिकांबाबतची भूमिका, ज्येष्ठ नागरिकांनी घ्यायची काळजी यासह कायदे व सुरक्षिततेसंबंधी माहिती दिली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष मधुकर भालेराव, भद्रकाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांचा वाढदिवसदेखील कार्यक्रमावेळी साजरा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून धावणार शिवशाही बस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या चार शिवशाही बस रविवारी सकाळी दाखल झाल्यानंतर सोमवारी त्या नाशिक-पुणे महामार्गावर धावणार आहेत. सोमवारी पहिली बस सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी सुटणार असून, त्यानंतर तासाभराच्या अंतराने तीनही बस सोडण्यात येणार आहेत. या वातानुकूलित बसचे भाडे ३३८ रुपये असून, ते नॉन एसी सेमी लक्झरी बसपेक्षा २२ रुपयांनी जास्त आहे. त्यामुळे या बसला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर यापूर्वी शिवनेरी, हिरकणी व साध्या बसेस धावत होत्या. त्यातील ११ हिरकणींपैकी ४ बसेस आता कमी करून त्याऐवजी शिवशाही बसेसचा समावेश करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ११.१५ वाजता पहिली बस असेल. त्यानंतर दुसरी बस १२.१५, तिसरी बस १.१५ व चौथी बस २.१५ वाजता सुटणार आहे. शिवशाही बसच्या प्रतिटप्प्याचे भाडे इतर बसच्या तुलनेत कमी ठेवण्याचा निर्णय महामंडळाने यापूर्वीच घेतल्याने प्रवाशांमध्ये या बसचे आकर्षण आहे. शिवनेरी बसचे भाडे नाशिक-पुणेसाठी ६०५ रुपये आहे. तर सेमी लक्झरीचे भाडे ३१६ रुपये आहे. त्यामुळे ही बस सर्वांना परवडणारी ठरणार आहे.

नाशिकला या बस दाखल झाल्यानंतर या बस कशा आहेत, हे पाहण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी डेपोत बस बघण्यासाठी गर्दी केली होती. गेल्या काही दिवसांपासून या बसची चर्चा असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येसुद्धा त्याबाबत उत्सुकता होती. नाशिकमध्ये टप्प्याटप्प्याने २० बसेस मिळणार असून, त्यात स्ल‌िपर कोचसुद्धा असणार आहे. त्या अहमदाबाद, इंदूर, बडोदा येथे सोडण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. या बसेसला कसा प्रतिसाद मिळतो, हे बघून त्यांची संख्याही वाढविली जाणार आहे. राज्यात येत्या काही दिवसांत ५०० बसेस धावणार आहेत. त्यासाठी आता प्रत्येक डेपोत या बस येत आहेत. खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी या बसेस एसटीकडे पुन्हा प्रवाशी वळवण्यात उपयोगी ठरणार आहेत. तोट्यात चाललेल्या एसटीला या बसेसमुळे नवीन संजीवनी मिळणार असून, त्यामुळे त्याकडे एसटी महामंडळाने विशेष लक्ष दिले आहे. या बसेसची ऑनलाइन बुकिंग सुरू झाली असून, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.


नाशिकसाठी चार शिवशाही बस रविवारी दाखल झाल्या आहेत. सोमवारी पहिली बस ११.१५ वाजता सोडण्यात येणार आहे. त्यानंतर तासाभराच्या अंतराने तीन बसेस सोडण्यात येतील. या बसेसचे भाडे कमी असून, ती वातानुकूलित असल्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

-आर. डी. जगताप, वाहतूक अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लघुपटासाठी वर्तमानातील साध्या भाषेचा वापर हवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लघुपटनिर्मिती करताना व त्यात गतिमानता येण्यासाठी रोजच्या जगण्यातील गोष्टींना प्राधान्य देण्याबरोबरच वर्तमानातील सहज साध्या भाषेचा वापर करावा. घडणाऱ्या घटनेकडे कृती म्हणून बघावे, तसेच कथेचे बीज हे दर्जेदार आणि आविष्कारासाठी पुरेपूर शक्यता असणारे हवे. दृश्य माध्यम असले तरी शब्दांचा नेमका वापर करण्याचे कौशल्य दिग्दर्शकाकडे असावे. त्यातून कलात्मक आणि उत्तम लघुपट समोर येतो, असे प्रतिपादन ख्यातनाम चित्रपट समीक्षक, लेखक अशोक राणे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र, नाशिक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, प्रयोग मालाड, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास लॉन्स यांच्या संयक्त विद्यमाने लघुपटनिर्मिती कार्यशाळा झाली. विश्वास क्लब हाऊस येथे ही कार्यशाळा झाली. त्या वेळी राणे बोलत होते. ते म्हणाले, की लघुपटनिर्मिती करताना दिग्दर्शकाने आपल्यातील दृश्य माध्यमाच्या शक्यता तपासाव्यात आणि त्यातून मला काही तरी आणि नेमके सांगायचे आहे, याची जाणीव अधोरेखित करावी. सिनेमाची भाषा, तिचा वापर करण्याची शैली विकसित करणे आवश्यक आहे. दृश्यातील व्यक्तिमत्त्वाच्या कंगोऱ्यातून खूप काही व्यक्त होत असते. त्याचा पुरेपूर वापर करावा, असेही त्यांनी या वेळी सांगितले. भारतीय व जागतिक सिनेमाचे वेगळेपण, पटकथा, कॅमेरा आणि कथा मांडण्याची तांत्रिक शैली यांवरदेखील भाष्य केले. भारतात जागतिक दर्जाचे लघुपट निर्माण व्हावेत आणि ते फिल्मिन्गो इंटरनॅशनल लघुपट महोत्सवात जगप्रसिद्ध कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या व्यासपीठावरून जगभर जावेत, हा या कार्यशाळेच्या आयोजनामागील प्रमुख हेतू होता.

दिग्दर्शक शिव कदम यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की दिग्दर्शकाने पात्राच्या भूमिकेनुसार कथेची मांडणी करावी. पात्राचा प्रवास, पात्राच्या भूमिकेनुसार लघुपटातील कथेत जिवंतपणा निर्माण करणे, सरळ-साधी गोष्टी सांगण्याची पद्धत यात वेगळेपण असायला हवे. उत्तम चित्रपटनिर्मितीसाठी सर्व कलांचा व्यासंग आणि जाण असणे महत्त्वाचे आहे. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, की नाशिकमधील अनेक कलावंत लघुपट, चित्रपट क्षेत्रात जगभर नाव कमवत आहेत. त्यांना अशा कार्यशाळांमधून मार्गदर्शन, व्यासपीठ मिळण्यास निश्चितच मदत होईल. सिनेमा, लघुपटातून अनेक विषय प्रभावीपणे तरुण दिग्दर्शक मांडत आहेत. हे चित्रपटसृष्टीला बळ देणारे आहे.

कार्यशाळेत लघुपट म्हणजे काय? पटकथा लेखन, छायाचित्रण आणि संकलन, लघुपट निर्मितीची इतर अंगे, लघुपट त्यांचे आणि आपले आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत शंभराहून अधिक व्यक्तींनी सहभाग नोंदविला. भूषण काळे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६० दिवस, ४३ हजार वाहने अन् सव्वा कोटीचा दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत शहर पोलिसांनी तब्बल ४३ हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत एक कोटी १५ लाख रुपयांचा दंड वसूल केला. वाहतूक शाखेच्या इतिहासात प्रथमच कमी कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली आहे.

शहर वाहतूक शाखेने जानेवारी ते ६ ऑगस्ट या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल दोन कोटी सात लाख ७२ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला होता. यासाठी ८४,४७६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कालावधीत शहर पोलिसांनी वेळोवेळी जनजागृती अभियान राबवले. मात्र, बेशिस्त वाहनचालकांच्या वर्तनात फरक पडला नाही. त्यामुळे ऑगस्ट, तसेच सप्टेंबरमध्ये शहर पोलिसांनी कारवाईला जोर दिला. आजमितीस कारवाई झालेल्या वाहनांची संख्या एक लाख २८ हजार ९१ इतकी झाली असून, दंडाची रक्कम तीन कोटी २२ लाख ८१ हजार ६०० रुपयांच्या घरात पोहोचली आहे. २०१६ मध्ये याच कालावधीत शहर वाहतूक शाखेने एक लाख ६३ हजार ७३७ वाहनांवर कारवाई करून एक कोटी ७२ लाख ९९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला होता.

शहरात वाहनांची संख्या लक्षणीय वाढली असून, शॉर्टकट मारणाऱ्या अथवा वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांमुळे वाताहत होते आहे. वन वे अथवा नो एंट्री नियमांकडे दुर्लक्ष करणे, ओव्हर स्पीड, फ्रंटसीट प्रवासी, ड्रंक अँड ड्रायव्हिंग, पार्किंग नियमाकडे दुर्लक्ष, सिग्नल जम्पिंग, सीटबेल्ट अथवा हेल्मेट न लावणे अशा अनेक नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. झेब्रा क्रॉसिंग वा लेन कटिंगसारख्या नियमांची माहितीही वाहनचालकांना नसते. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून शहर वाहतूक शाखेने बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी कारवाईची मोहीम सुरू केली. मोठा आर्थिक भुर्दंड लावण्याची मात्रा पोलिसांनी शोधून काढली. मोठा भुर्दंड बसल्यानंतर तरी वाहनचालक पुन्हा असे प्रकार करणार नाही, अशी अपेक्षा पोलिसांना आहे. दुर्दैवाने दंडाचा आकडा तीन कोटींच्या घरात पोहोचूनही वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन होताना दिसत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इंडियन सायकल डे’साठी नाशिक ते मुंबई रॅली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनतर्फे २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती हा दिवस इंडियन सायकल डे सायकल रॅली काढून साजरा करण्यात आला. या वेळी पोलिस आयुक्तांसह ६० जणांनी नाशिक ते मुंबई सायकल रॅलीत सहभाग घेतला.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते रविवारी सकाळी ६ वाजता रॅलीला सुरुवात करण्यात आली. लायन्स क्लब नाशिक कॉर्पोरेटचे अध्यक्ष के. डी. पाटील, सिटीझन बँकेचे चेअरमन शेखर सोनवणे, नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया आदी उपस्थित होते. रॅलीत डॉ. सिंगल यांच्यासह शहर अभियंता यू. बी. पवार, किरण चव्हाण यांनीही सहभाग घेत इगतपुरीपर्यंत सायकल चालवली. पहिल्या दिवशी भिवंडी फाटा येथे शांग्रीला रिसॉर्ट येथे मुक्कामी राहून २ ऑक्टोबर रोजी सर्व सायकलिस्ट्स गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचतील.

रिमझिम ग्रुपतर्फे स्वागत

रॅलीच्या प्रथम टप्प्यात घोटी येथे रॅलीत सहभागी नाशिक सायकलिस्ट्सच्या सदस्यांचे रिमझिम ग्रुपतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी रिमझिम ग्रुपचे अध्यक्ष नीलेश काळे, पुरुषोत्तम राठोड, समाधान जाधव, घोटीचे सरपंच माणिक खांब, हरीश चव्हाण, ओम कंदकुरीवार, नीलेश पदमेरे, रमेश बोराडे, संतोष व्यवहारे यांनी प्रत्येकाचे स्वागत केले.

इंडियन सायकल डे

नाशिक सायकलिस्ट्स सहा वर्षांपासून गांधी जयंती हा दिवस इंडियन सायकल डे म्हणून साजरा करीत आहे. या दिवशी जनतेस पर्यावरण, स्वच्छता व नागरी कर्तव्यांचा संदेश दिला जातो. शहरात विविध रॅली होतात. मात्र, ही चळवळ देशभरात नेण्याच्या उद्देशाने २ ऑक्टोबर रोजी इंडियन सायकल डे साजरा व्हावा असा मानस ठेवून २०१६ पासून नाशिक ते मुंबई सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.

आज जनजागृती

सायकल चळवळीतील रॅलीच्या दुसऱ्या पर्वामध्ये नाशिक सायकलिस्ट्सना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची साथ मिळत आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे सोमवारी ११ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात एमटीडीसीचे सहव्यवस्थापक आशुतोष राठोड, तसेच अन्य अधिकारी यांच्या उपस्थितीत नाशिक सायकलिस्ट्सच्या सदस्यांकडून स्वच्छता, पर्यावरण आणि मानवी कर्तव्ये यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. दोन ऑक्टोबर हा इंडियन सायकल डे व्हावा, यासाठी संबंधित खात्याला निवेदन देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी संकुलांमध्ये पोल माऊंटिंग डस्टबिन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘झिरो गार्बेज सिटी’ म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये आता व्यापारी संकुलांत कचरा कुंड्या दिसणार आहेत. त्यासाठी महानगरपालिकेने रीतसर निविदा प्रसिद्ध केली असून, त्यात कचरा संकलनासाठी ‘पोल माऊंटिंग डस्टब‌िन’ पुरवण्याचे दरपत्रक मागवले आहे. ११० लिटरचे हे डस्टबिन असणार असून, ते पोल वर उभे केले जाणार आहे. पण, ते फुल्ल झाले तर पुन्हा कचऱ्याचा प्रश्न समोर येणार आहे.

मुंबई, पुण्यासह देशातील सर्वत्र कचराकुंड्या व त्यातून बाहेर पडणारी घाण नेहमीच टिकेचा विषय असतो. पण, नाशिक महानगरात घंटागाडी आल्यानंतर कचरा कुंड्याच गायब झाल्या. घरात साठवलेला कचरा थेट घंटागाडीत अशी व्यवस्था केल्यामुळे हे शहर ‘झिरो गार्बेज सिटी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. कचरा संकलाची पद्धत व त्याचे नियोजन सूक्ष्म पद्धतीने महापालिकेने केल्यामुळे शहरात स्वच्छतेचा चांगला पायंडाही पडला व त्याचे कौतुकही झाले. पण, व्यापारी संकुल व व्यावसायिक ठिकाणांतील कचऱ्याचा विषय मात्र गांभीर्याने पुढे आला. या संकुलातील कचरा व घंडागाड्यांचे वेळेचे नियोजन फिसकटल्यामुळे अनेक जण हा कचरा कोठेही फेकू लागल्यामुळे त्याचा फटकाही बसला. काही व्यापारी संकुलांत घंडागाडी जाणे अवघड झाल्यामुळे हा प्रश्न तीव्रतेने समोर आला. त्यामुळे महानगरपालिकेने आता या संकुलांतील कचरा एकत्र करण्यासाठी ‘पोल माऊंटिंग डस्टब‌िन’ लावण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत महापालिकेने ई-निविदा प्रसिद्ध केली असून, आयएसओ ९००१ः२००८ मानांकन असलेल्या उत्पादक कंपन्यांचेच डस्टबीन पुरवावेत, असे म्हटले आहे.


कचरामुक्ती होणार का?

नाशिक स्मार्ट सिटीकडे जाण्याअगोदरच ‘झिरो गार्बेज सिटी’ व शहरातील रस्ते अनेकांच्या कौतुकाचे विषय ठरले आहेत. त्यामुळे या डस्टब‌िनमुळे शहराच्या स्वच्छतेच्या प्रतिमेला धक्का बसू नये याची काळजीही महानगपालिकेला घ्यावी लागणार आहे. कचरा कुंड्यांचे निर्मूलन करणे ही गोष्ट सोपी नाही. त्यासाठी घंटागाडीची संख्याही वाढवली गेली व त्याचे चांगले रिझल्ट मिळाले. शहराचा वाढता विस्तार व त्याच्या समस्या नेहमीच असतात. पण एखाद्या शहराची ओळख कचरा मुक्त शहर होणे अवघड असते. नाशिकला ती मिळाली असून, ती कायम रहावी यासाठी महानगरपालिकेला या डस्टब‌िनची काळजी घ्यावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रंथ तुमच्या दारी आता फिनलंडमध्ये

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अटकेपार मराठी पुस्तक पोहोचवण्यासाठी काही वर्षांपासून ‘ग्रंथ तुमच्या दारी’ चळवळ उभी करणारे विनायक रानडे यांनी आता या वाचकप्रिय योजनेतून फिनलंडमधील वाचकांसाठी दर्जेदार मराठी पुस्तकांच्या ग्रंथपेट्या रवाना केल्या आहेत. देशात मूळचे भारतीय असलेल्या शिरीन कुलकर्णी चळवळीत समन्वयक म्हणून काम करणार आहेत. स्वित्झर्लंडमधील झुरीच येथे सुरू असलेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेतील ग्रंथ परिवारात फिनलंडमधील वाचक समाविष्ट आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानने ही चळवळ उभी केली असून, तीन वर्षांपूर्वीच त्यांनी देशाच्या सीमाही ओलांडल्या आहेत.

आतापर्यंत दोन कोटींची पुस्तके महाराष्ट्रातील विविध भागांसह गोवा, गुजरात, दिल्ली, सिल्व्हास, तमिळनाडू, कर्नाटकमध्ये पाठवण्यात आली आहेत. त्याबरोबरच देशाबाहेर दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलियामध्येही ग्रंथ पोहोचवले आहेत. देशातील कानाकोपऱ्यात हे ग्रंथ पोहोचावे यासाठी रानडे यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी त्यांनी फिनलंडची निवड केली आहे.

याअगोदरच वाचनसंस्कृतीच्या समृद्धीसाठी प्रत्येकाने त्याच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक खरेदीसाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानला देणगी द्यावी या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील सहभागी सर्व वाचक, समन्वयक, संस्था, देणगीदार, हितचिंतक यांच्या सक्रिय सहभागानेच हा विस्तार होत असल्याचे रानडे यांनी सांगितले. वाढदिवस, एकसष्ठी, पंचाहत्तरी, सहस्रचंद्र दर्शन, तसेच दिवंगत आप्तेष्टांच्या स्मरणार्थ अशा अनेक प्रसंगानुरूप हे पुस्तक भेट देता येतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीपोत्सवासाठी पेंट्सची बाजारपेठ सज्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

दिवाळी हा जसा दीपोत्सव आहे, तसा तो रंगोत्सवदेखील आहे. दिवाळीनिमित्त घर, ऑफीस रंगविण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे आता दसरा झाल्यानंतर दिवाळीसाठी पेंट्सची बाजारपेठ सज्ज झाली आहे.

घर जुने असो की नवीन असो, ते उठून दिसते ते रंगामुळे. घर रंगवल्याशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखे वाटत नाही. पूर्वी कुटुंबातील सदस्य दिवाळीत घराचे रंगकाम करायचे. आता फ्लॅट सिस्टिम आली, बंगले झाले. त्यामुळे मजुरीवर रंगकाम दिले जाते. आधुनिकतेकडे झुकणाऱ्या रंगांचा वापर वाढला आहे.

रंगांचे नानाविध प्रकार

अनेकांकडून घराला आतून आणि बाहेरून रंग दिला जातो. त्यासाठी वेगवेगळे रंग असतात. रॉयल, डिस्टेम्पर, ट्रॅक्टर ईमर्शन आणि प्लास्टिक हे रंग घराच्या आतील भिंतींसाठी वापरतात, तर एस, अॅपेक्स, अल्टिमा आदी रंग बाहेरून वापरतात. ऑफिससाठी आतून रॉयल, तर बाहेरून अॅपेक्स रंग दिला जातो. बंगला व घरासाठी आतून इमर्शन व बाहेरून एस किंवा अॅपेक्स वापरतात. रॉयल पेंट्स ४७० रुपये लिटर, डिस्टेम्पर ९० रुपये, प्लास्टिक 280 रुपये, तर ट्रॅक्टर इमर्शन १४० रुपये लिटर आहे. बाहेरून द्यावयाच्या पेंट्सचे दर एस १७० रुपये, अॅपेक्स २८० रुपये आणि सर्वांत महाग अल्टिमा हा ३७० रुपये लिटर आहे. नाशिकरोड येथील पेंट व्यावसायिक विद्युत पडवळ यांनी ही माहिती दिली.

--

अन्य साहित्य अन् पेंटर्स

रंगकाम करण्याआधी भिंतीला पुट्टी (लांबी) केली जाते. त्यामुळे खाचखळगे जाऊन रंगवलेली भिंत आकर्षक दिसते. जे. के. व बिर्ला या दोन स्टॅण्डर्ड पुट्टी आहेत. त्यांचा दर चाळीस रुपये आहे. शालिमार, ब्रिटिश व एशियनचीही पुट्टी मार्केटमध्ये आहे. रंगकामासाठी ब्रश वापरला जातो. त्याचा दर वीस रुपयांपासून चाळीस रुपये इंचापर्यंत आहे. तीस रुपये इंचाचा ब्रश जास्त चालतो. ब्रशमध्ये लोकल कंपन्या आहेत. रंगकामासाठी रोलरही वापरतात. त्याचे दर ५० ते १०० रुपये आहेत. त्या तयार करणाऱ्या कंपन्याही लोकल आहेत. दिवाळीत पेंटर्सला मोठी मागणी असते. पेंटिंगचा दर सध्या ५०० रुपये मजुरीनुसार असून, रॉयल पेंट मारण्याचा दर प्रतिचौरस फूट २७ ते ३० रुपये आहे. पूर्वी रंग हाताने (स्टेन) केला जायचा. आता कार्टर वर्ल्डसारख्या कम्प्युटराइज्ड मशिन्स आल्या असून, त्याद्वारे तब्बल १५०० शेड्स अर्थात, रंगछटा उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकांच्या सुरक्षेसाठी हवा जनतेचा दबाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
बालकांवरील अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. बाल अत्याचार रोखण्यासाठी कायदे आहेत. परंतु, या कायद्यांचा कुणाला धाकच राहिलेला नाही. बालक आणि पर्यायाने देश सुरक्षित राहावा असे वाटत असेल, तर त्यासाठी कायद्याचा धाक निर्माण व्हायला हवा. जनताच सरकारवर दबाव आणून हा धाक निर्माण करू शकते, असे प्रतिपादन नोबेल पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी यांचे पुत्र भूवन सत्यार्थी यांनी रविवारी नाशिकमध्ये केले.
‘सुरक्षित बालपण-सुरक्षित भारत’ या विषयावर जनजागृतीसाठी कन्याकुमारी येथून निघालेली भारत यात्रा रविवारी (दि. १) नाशिकमध्ये दाखल झाली. नाशिककरांच्या वतीने एनजीओ फोरमने या यात्रेचे स्वागत केले. यात्रेसमवेत आलेल्या भूवन यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, हेमलता पाटील, शिवाजी गांगुर्डे, दिनकर पाटील आदी उपस्थ‌ित होते.

बालके ही देशाचे भविष्य आहे. ही बालकं बेपत्ता होतात. त्यांची विक्री केली जाते. तसेच त्यांचे मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषणही होते. ही बालकेच सुरक्षित राहू शकत नसतील, तर देश कसा सुरक्षित राहणार? असा सवाल भूवन यांनी उपस्थ‌ित केला. बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
गोल्फ क्लब मैदान येथून प्रबोधन रॅली काढण्यात आली. त्र्यंबकनाका, खडकाळी सिग्नल, शालिमार, एम.जी. रोड, मेहेर चौक, सीबीएस मार्गे गोल्फ क्लब मैदानावर या रॅलीचा समारोप झाला. त्यामध्ये तब्बल दोन हजारांहून अधिक जण सहभागी झाले. रमाबाई आंबेडकर हायस्कूल, मानवधर्म प्रतिष्ठान, नर्सिंग कॉलेज, बीवायके कॉलेज यांसह शहरातील विविध शाळा आणि कॉलेजेसचे विद्यार्थी, एन. जी. ओ फोरमशी जोडल्या गेलेल्या ५६ स्वयंसेवी संस्थांचे प्रत‌िन‌िधी रॅलीत सहभागी झाले. रॅली यशस्वी करण्यासाठी फोरमचे अध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, राजू शिरसाठ, डॉ. प्रकाश आहेर, निशिकांत पगारे यांन‌ी परिश्रम घेतले. त्यानंतर ही रॅली मालेगावकडे मार्गस्थ झाली.

देहविक्रय करणाऱ्या महिलांना शपथ
भूवन सत्यार्थी यांनी देहविक्रय करणाऱ्या महिलांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. देहविक्रयसाठी लहान मुले, मुलींचा स्वीकार करू नका, असे आवाहन त्यांना करण्यात आले. बालकांना अनैतिक व्यवसायापासून दूर ठेवण्याची तसेच, त्यांचे बालपण वाचविण्याची शपथ यावेळी या महिलांना देण्यात आली. सातपूर येथील नॅब संस्थेलाही सत्यार्थी यांनी भेट दिली. अंध मुलींशी संवाद साधून त्यांच्या समस्या त्यांनी समजावून घेतल्या.

बाल अत्याचाराबाबत देशातील परिस्थ‌िती
- देशात दररोज ४० बालकांवर बलात्काराला
- दररोज ४८ बालकांचे लैंगिक शोषण
- प्रत्येक सहा मिनिटांना एक बालक बेपत्ता
- साडेचार लाखांहून अधिक बालके तस्कांच्या जाळ्यात
- व्यावसायिक आणि लैंगिक शोषणासाठी बालकांची खरेदी-विक्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारपेठेला दिवाळीचे वेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवरात्रोत्सव, दसरा उत्साहात साजरा केल्यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठांना आता दिवाळीचे वेध लागले आहेत. दसरा दिवाळीत केवळ सतरा दिवसांचे अंतर असल्याने दसऱ्यादरम्यानच विविध ऑफर्स जाहीर करुन त्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. कपडे, रिअल इस्टेट, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील व्यापारी वर्षभरातील या मोठ्या सणासाठी सज्ज झाले आहेत.

प्रकाशांचा उत्सव म्हणून दिवाळी भारतीय संस्कृतीत देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगीबेरंगी पणत्या, आकाशकंदील, फराळाचे पदार्थ, नवीन कपडे अशा सर्व वस्तूंनी हा सण साजरा केला जातो. त्यामुळे दिवाळीच्या आदल्या महिन्यापासूनच विक्रेते नवनवीन वस्तू बाजारपेठांमध्ये आणत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. यंदाही हे चित्र बाजारात आहे. कापड बाजारापासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे विक्रेते वेगवेगळ्या ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कपड्यांच्या मार्केटमध्ये ग्राहकांकडून मुख्यतः रेडिमेड कपड्यांना मोठी पसंती दिली जाते. ग्राहकांचा हा कल लक्षात घेता विक्रेतेही त्याच प्रकारचे फॅशनेबल कपडे बाजारात विक्रीस आणतात. विक्रेत्यांमध्येही चांगल्यात चांगले माल उपलब्ध करण्याची चढाओढ असल्याने अनेक विक्रेत्यांनी मुंबई, अहमदाबाद, सुरत येथील व्यावसायिकांकडे काही दिवसांपूर्वीच बुकींग केल्याचे सांगितले जात आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्र, वाहन खरेदी यातही लाखो, कोट्यवधींची उलाढाल या कालावधीत होत असल्याने या वस्तूंवर विशेष सवलत देण्याच्या योजना विक्रेत्यांनी दसऱ्यापासूनच सुरू केल्या आहेत. दिवाळी संपेपर्यंत या योजना सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

रेडिमेड फराळी पदार्थांची चलती

गेल्या काही वर्षांपासून रेडिमेड फराळी पदार्थांची चलती आहे. चिवडा, शेव, चकली, लाडू, शंकरपाळे असे फराळाचे पदार्थ घरी बनवण्यापेक्षा रेडिमेड आणण्याकडे अनेक महिलांचा कल असतो. हा कल जाणत घरगुती फराळांची मोठी उपलब्धता बाजारात निर्माण करुन दिली जात आहे.

मिठायांची दुकाने सज्ज

दरवर्षी दिवाळीसाठी मिठायांची दुकानेही सज्ज झालेली असतात. यंदाही ड्रायफ्रुट्स, चॉकलेट्स, वेगवेगळ्या मिठाया यांनी ही दुकाने सजली आहेत. दुकानांबाहेर आकर्षक सजावट करुन ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न विक्रेते करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज जोडण्यांसाठी वेटिंगच!

$
0
0

बळीराजाची उपेक्षा; १९ हजार जण वंचित

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

कृषी मालाला मातीमोल भाव मिळत असल्याने दिवसेंदिवस मानसिकदृष्ट्या खचत चाललेल्या शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठीही वर्षानुवर्षे महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. नाशिक विभागात गत आठ वर्षांत महावितरणकडे कृषी पंप वीज जोडणीसाठी डिपॉझिट भरलेल्या तब्बल २० हजार २९२ शेतकऱ्यांपैकी महावितरणने ऑगस्ट २०१७ पर्यंत अवघ्या १३१२ शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी अधिकृत वीज जोडणी दिली आहे.

१८ हजार ९८० शेतकरी अद्यापही लाखो रुपयांचे भांडवल गुंतवून महावितरणच्या मिनतवाऱ्या करीत आहेत. डीपीडीसीतून या कामी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने कृषी पंपांसाठीच्या प्रलंबित वीज जोडण्यांचे प्रमाण दरवर्षी वाढते आहे. हजारो शेतकरी वीज जोडणीसाठी महावितरणच्या कार्यालयांत चकरा मारीत आहेत. विशेष म्हणजे कृषी पंप वीज जोडणीसाठी आवश्यक असणारे डिपॉझिटही या शेतकऱ्यांनी महावितरणकडे भरलेले आहे. कृषी पंपांसाठी वीज जोडणी मिळत नसल्याने शेतकरीवर्ग त्रस्त झालेला आहे. महावितरणकडून मात्र प्रलंबित कृषी पंप वीजजोडण्या देण्यासाठी डोळेझाक केली जात आहे.

नाशिक शहर मंडळात ६ हजार ३३ कृषी पंप वीज जोडण्या प्रलंबित आहेत, तर ग्रामीण भागातील मालेगाव मंडळात तब्बल १२ हजार ९४७ कृषी पंप वीज जोडण्या प्रलंबित आहेत. कृषी पंपांना अधिकृत वीज जोडणी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. विहिरीसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करूनही पाणी उपसण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

५३ कोटींची आवश्यकता

कृषी पंप वीज जोडणीसाठी पैसे भरलेल्या प्रलंबित अर्जांपैकी चालू वर्षी मालेगाव मंडळातील ५ हजार ९२९ तर नाशिक शहर मंडळातील १ हजार ६६९ अशा एकूण ७ हजार ५९८ कृषी पंपांना वीज जोडण्या दिल्या जाणार आहेत. तरीही जिल्ह्यातील ११ हजार ७९७ प्रलंबित कृषी पंप वीज जोडण्यांचा प्रश्न बाकी राहणार आहे. डीपीडीसी व इन्फ्रा दोन मधून या प्रलंबित कृषी पंपांना वीज जोडण्या देण्यासाठी निधी खर्च केला जाणार आहे, तर प्रलंबित कृषी पंपांच्या वीज जोडण्यांसाठी ५३.१५ कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विद्यापीठालाच मराठीचे वावडे!

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

‘माझ्या मराठीचा बोलु कवतिके। परि अमृतातेही पैजा जिंके...’ अशी मराठीची थोरवी गाणाऱ्या महाराष्ट्रातच मराठीला डावलण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यूथ फेस्टमधील विविध स्पर्धांमध्ये हिंदी व इंग्रजीलाच प्राधान्य दिले असून, यात मराठीला चक्क नाकारले आहे. माय मराठीची गळचेपी करणारा आणि युवकांच्या उत्साहावर विरजण घालणारा हा तुघलकी निर्णय असल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे. मराठीचा प्रचार- प्रसार करणाऱ्या विद्यापीठानेच मराठी भाषेला का वगळले, असा संतप्त सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

यूथ फेस्टमधून संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रीयत्व जपण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी विद्यापीठाच्या सर्व विभागीय स्तरावरून यासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. निवड झालेले विद्यार्थी राष्ट्रीय संघात सहभागी होतात. यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या राष्ट्राच्या परंपरेचे प्रतिनिधित्व हा संघ कर असतो. मात्र, या यूथ फेस्टमध्ये वक्तृत्व, नाट्य आणि वादविवाद स्पर्धेत मराठी भाषेला वगळण्यात आले आहे. महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असूनही विद्यापीठाने मराठी भाषेतून व्यक्त होण्यावर निर्बंध घातले आहेत. ‘जर तुम्हाला स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल तर फक्त हिंदी किंवा इंग्रजीमधूनच व्यक्त व्हा’ असा हुकूमवजा अटच विद्यापीठाने घातली आहे. विद्यापीठाच्या या अटीमुळे विद्यार्थ्यांचे विचार मांडण्यावर गदा आली आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी लढाई सुरू आहे. असे असतानाच विद्यापीठानेच मराठी भाषेला वगळल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. असेच निर्णय विद्यापीठ घेत राहिल्यास मराठी कायमची दूर होईल, अशी संतप्त टीका विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

परिपत्रकही इंग्रजीत!

यूथ फेस्टमध्ये वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेसाठी इंग्रजी आणि हिंदीतच सादरीकरण करण्याची अट घातली आहे. विशेष म्हणजे यूथ फेस्टच्या स्पर्धांचे जे परिपत्रक काढण्यात आले आहे, तेही इंग्रजीत आहे. त्यामुळे विद्यापीठाला मराठीचे किती वावडे आहे हे स्पष्ट होते. या निर्णयावर विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हा निर्णय अयोग्य असल्याचे विद्यार्थ्यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केला आहे.

यूथ फेस्टकडे विद्यार्थ्यांची पाठ

यूथ फेस्टमध्ये सहभागी होताना हिंदी आणि इंग्रजीमधूनच व्यक्त व्हा, असा फतवाच विद्यापीठाने काढल्याने अनेक विद्यार्थी यूथ फेस्टकडे पाठ फिरवणार असल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठाच्या विचित्र अटीमुळे अनेक कॉलेजांच्या विद्यार्थी संघाने फेस्टमध्ये सहभागी होणे टाळले आहे. अनेक मराठी तरुण वक्त्यांनी फेस्टमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्राय डेसाठी आलेला मद्यसाठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महात्मा गांधी जयंती निमित्त असलेल्या ड्राय डेच्या पार्श्वभूमीवर शहरात येणारा मोठा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला. दमन निर्मित मद्यसाठा शहरात येणार असल्याच्या माहिती मिळाल्यानंतर पथकाने आडगाव येथे सापळा रचून कारसह सुमारे ३ लाख ८५ हजाराचा मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली.

रवींद्र दिलीपराव पगार, असे मद्यवाहतूक करतांना पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. ड्राय डे लाच बेकायदा पद्धतीने अवैध मद्य विक्री केली जाते. याचसाठी विक्रीस बंदी असलेला आणि दमन निर्मित आणि दादरा हवेली येथे विक्रीस असलेला दारूसाठा शहरात येणार असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त प्रसाद सुर्वे व निरीक्षक एम. बी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. महामार्गावरील आडगाव शिवारातील नटखट हॉटेल परिसरात सापळा रचून पथकाने ही कारवाई केली. तीन लाख ८५ हजार ७७० मद्यसाठा जप्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नासाका’रस्त्याची खड्ड्यांनी लावली वाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक साखर कारखाना रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, प्रवास करणे नागरिकांना तसेच वाहनांना अवघड झाले आहे. या रस्त्याची पुरती वाट लागली असून, रस्त्यावर असंख्य खड्डे झालेले आहेत. तरी या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे.

बंगाली बाबा ते साखर कारखाना दरम्यान हा चार किलोमीटरचा रस्ता आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे हा रस्ता उखडला आहे. या रस्त्यावरून रोज शेकडो वाहने जात असतात. तसेच पळसे आणि शिंदे या गावातील शेतकऱ्यांनी साखर कारखाना उभा राहावा म्हणून आपल्या जमिनी या कारखान्यासाठी दिलेल्या आहेत.

नाशिक-सिन्नर महामार्ग क्रमांक ५० लगत असणारा पळसे साखरे कारखाना हा एकेकाळी भरात होता. त्यावेळी या रस्त्याचा मोठा वापर होत असे, त्यावरून अवजड वाहनांचा प्रवास दररोज व्हायचा. आताही चिंचोली, घोटी, इगतपुरी, भगूर या रस्त्यांना जोडणाऱ्या या रस्त्याचा वापर रोज असंख्य शेतकरी करीत आहेत. पूर्वीपासून या रस्त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूत कताईसाठी फिरला चरखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चरख्यावर सूत विणले जात असल्याचे चित्र आता खूपच दुर्मीळ झाले आहे. परंतु, नाशिक शहरातील हुतात्मा स्मारकात आज चरखा फिरला अन् सूतही कातण्यात आले. निमित्त होते महात्मा गांधी जयंतीचे.

सालाबादाप्रमाणे यंदाही सर्वोदय परिवाराच्या वतीने हुतात्मा स्मारकामध्ये सूत कताईचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. वासंती सोर यांनी पेटी चरख्यावर सूत कताईला सुरुवात केली. त्याचवेळी सर्वोदय परिवाराशी जोडल्या गेलेल्या गौतम भटेवरा, मुकुंद दीक्षित यांसह २५ जणांनी अंबर चरख्यावर सूत कातण्यास सुरुवात केली. सूत कताई केली जात असतानाच बासरी वादनाची अनोखी परंपरा यंदाही जोपासण्यात आली. समृध्द कुटे याच्या बासरीच्या सुमधूर स्वरांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. अर्धा तास ही सूतकताई सुरू होती. त्यानंतर आस्था मांदळे या युवतीने वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीर पराई जाणे रे हे भजन सादर केले. त्यानंतर नीलूताई नावरेकर यांचे कर्मयोगी महात्मा गांधी या विषयावर व्याख्यान झाले. वीणकाम, शेतीकामात महात्मा गांधी तरबेज होते. शिक्षण घेणाऱ्यांना काम करण्याची लाज वाटत असेल, तर मुलांनी निरक्षर राहिलेले बरे असे गांधींचे परखड विचार होते. उद्योगातूनच माणूस घडतो म्हणून प्रत्येकाने प्रत्येक काम करण्याची सवय ठेवायला हवी, असे नावरेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोड्या थांबता थांबेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात जानेवारी ते ऑगस्ट या दरम्यान गत वर्षाच्या तुलनेत चेन स्नॅचिंगला अटकाव करण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश मिळाले आहे. मात्र, दिवसाच्या घरफोडींमध्ये काहीशी वाढ झाली असून, गुन्हा उघडकीस येण्याचे प्रमाणही घटले आहे.

जानेवारी ते ऑगस्ट २०१७ या कालावधीत चेन स्नॅचिंगचे ७३ गुन्हे घडलेत. गत वर्षी हेच प्रमाण ७७ इतके होते. यापैकी २० गुन्हे उघडकीस आले होते. यंदा मात्र, ४७ टक्क्यांच्या सरासरीने ३४ गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी संशयित आरोपींना जेरबंद केले. सप्टेंबर महिन्यात तर स्नॅचर्सची मोठी टोळी जेरबंद झाली असून, मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. चेन स्नॅचर्सच्या मागावर काही पथके सतत असून, त्याचाही परिणाम समोर येत आहे. चेन स्नॅचर्सचा बंदोबस्त करण्यात शहर पोलिस गुंतलेले असताना दिवसाच्या घरफोडी शोधून काढण्यात मात्र तितकेस यश मिळालेले दिसत नाही. २०१६ मध्ये दिवसाच्या ३१ घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी आठ गुन्हे उघडकीस आले होते. यंदा मात्र यात ११ ने वाढ होऊन ऑगस्ट महिन्यापर्यंत गुन्ह्याची संख्या ४२ इतकी झाली. तर, गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण आठच राहिले. रात्रीच्या घरफोड्यांबाबत गत वर्षीची सरासरी राखण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. गत वर्षी १६३ घरफोड्यांपैकी २५ टक्क्यांच्या सरासरीने ४० गुन्हे उघडकीस आले होते. तेच यंदा १७७ घरफोड्यांपैकी २४ टक्क्यांच्या सरासरीने ४२ गुन्हे उघड झाले आहेत. गत वर्षीच्या तुलनेत घरफोडीच्या घटनांमध्ये १४ ने वाढ झालेली दिसते. दरम्यान इतर चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण मात्र तब्बल आठ टक्क्यांनी घसरले आहे. गत वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत २९५ चोऱ्यांच्या घटनांपैकी ८८ गुन्हे उघडकीस आले होते. यंदा हेच प्रमाण ३०४ पैकी ६७ इतके राहिले. वाहनचोरीच्या ४०७ घटनांपैकी ८१ गुन्हे यंदा उघडकीस आले होते. गत वर्षी हेच प्रमाण ३७२ पैकी ७८ इतके होते.



मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात विशेष पथके कार्यरत आहेत. नुकतेच परिमंडळ दोनमध्ये २० चोरीची वाहने रिकव्हर झाली आहेत. चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात मोठे यश मिळाले असून, हेच चित्र लवकरच घरफोडीसह चोऱ्यांच्या घटनांमध्ये दिसून येईल.

- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता मोह‌िमेचा ‘कचरा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील डेंग्यू, स्वाइन फ्लूचा प्रकोप रोखण्यासाठी व साथीच्या आजारांचे उच्चाटन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेले स्वच्छता अभियान हे फोटोसेशनपुरतेच मर्यादीत राह‌िले आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या या मोह‌िमेपासून सर्वसामान्य नाशिककरांनी अंतर राखल्याने दहा दिवसांत मोह‌िमेचा फज्जा उडाला आहे.

महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाने दहा दिवस काही संस्थांना हाताशी धरत प्रसिद्धी मिळवली असली तरी, शहरातील अस्वच्छता व कचऱ्याची समस्या मात्र ‘जैसे थे’च असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या मोह‌िमेचा समारोप पालिकेने डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा आधार घेत केला आणि त्याचेही श्रेयही लाटण्‍याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ हा कार्यक्रम राबविण्यात आला. त्याच धर्तीवर राज्यात ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियान राबविण्यात आले. शहरातील अस्वच्छता, डेंग्यूसह विविध साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. गेल्या २२ सप्टेंबरला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात याचा प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी या मोह‌िमेत साडेतीनशे टन कचरा गोळा करण्यात आला. परंतु, उद््घाटनाचे सोपस्कार पार पाडल्यानंतर मात्र ही संपूर्ण मोह‌िमच ढेपाळली. २२ ते २ ऑक्टोबरदरम्यानचा स्वच्छतेचा कृती आराखडाही ठरला होता. परंतु, हा कृती कार्यक्रम कागदावरच राह‌िला असून, शहरातील कचऱ्याचे ‘ब्लॅक स्पॉट’ही जैसे थेच राह‌िले आहेत.

गेल्या दहा दिवसांत केवळ फोटोसेशनपुरतीच मोहीम ही संपूर्ण शहरात सुरू राहिली. कधी शाळेतील, कधी कार्यालयातील, कधी मोकळ्या जागेवरील स्वच्छतेचे फोटो माध्यमांमध्ये कसे प्रसिद्ध होतील, याची काळजी आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आली. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत दिखावा करणाऱ्या भाजपच्या लोकप्रतिनिधींनीही दहा दिवस या मोह‌िमेत सहभाग घेतला नाही. केवळ फोटोपुरताच कचरा साफ करून प्रसिद्धीसाठीचा खटाटोप मात्र पूर्ण केला. अधिकाऱ्यांनी केवळ सोपस्कार म्हणून मोह‌िमेची अंमलबजावणी करत, आपले कर्तव्य पूर्ण केले. त्यामुळे शहरातील रोगराई कमी होण्याऐवजी ती वाढतच गेल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. पर्यायाने डेंग्यू व स्वाइन फ्लूचा फैलाव जोमाने सुरू आहे.


भाजपचा अतिउत्साह नडला

या स्वच्छता मोह‌िमेवर सुरुवातीपासूनच भाजपची छाप होती. महापालिकेची मोहीम असली, तरी त्यात भाजपचेच ब्रँडिंग झाल्याने विरोधकांसह सर्वसामान्य नाशिककरांनी या मोह‌िमेपासून अंतर राखले. या मोह‌िमेतील भाजपेयींनी नागरिकांसह विरोधकांना विश्वासात न घेताच दाखवलेल्या अतिउत्साहामुळे स्वच्छता मोह‌िमेचा पुरता पचका झाला असून, शहरातील कचऱ्याचे ढीग ‘जैसे थे’च आहेत.


संस्थांच्या कामावर डल्ला

महापालिकेने या स्वच्छता मोह‌िमेत सहभागासाठी विविध संस्थांना आवाहन केले होते. त्यात काही संस्थाही सहभागी झाल्या होत्या. परंतु, पालिकेने स्वच्छतेचे श्रेय या संस्थांना देण्याऐवजी स्वतःच घेण्याची घाई केल्याने काही संस्थांनी अंतर राखले. शेवटच्या दिवशी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वच्छता मोह‌िमेत पालिकेने सहभाग घेऊन मोह‌िमेचा समारोप केल्याचा दावा केला. परंतु, यासाठी प्रतिष्ठानला विश्वासात न घेताच, परस्पर प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न अंगलट आला. त्यामुळे प्रतिष्ठानने पालिकेच्या अधिकाऱ्यांना खडसावत तुमचा काय संबंध, असा जाब विचारल्याने अधिकारी निरुत्तर झाले.


७८ टन कचरा संकलित

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नाशिकसह नगर जिल्ह्यातील काही भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोह‌िमेत तीन हजार ५१९ सदस्य उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ९३ किलोमीटर रस्त्यांवर ७८ टन कचरा संकलित करण्यात आला आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमात लोकप्रतिनिधींसह नागरिकांनीही सहभाग नोंदवला.क तीव्र करण्यासाठी आजपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसण्याचा निर्धार केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महात्मा गांधी, शास्‍त्रींना शहरभर अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती शहर परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य यावेळी शहरातील शाळांमध्ये, सामाजिक संस्था, विद्यापीठे येथे केले गेले.

आरोग्य विज्ञान विद्यापीठ

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे प्रतिकुलगुरू डॉ. मोहन खामगावकर यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संदीप कुलकर्णी, प्रकाश पाटील, डॉ. पायल बन्सल, रत्नाकर काळे, रंजिता देशमुख आदी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले.


स्मॉल बर्डस शाळा

मखमलाबाद-म्हसरूळ लिंक रोडवरील स्मॉल बर्डस शाळेत गांधी जयंती साजरी करण्यात आली. शाळेच्या संचालिका अश्विनी ओसवाल यांनी गांधीजींच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. गांधी जयंतीनिमित्त फेरीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. यावेळी शाळेतील शिक्षिका चारुशिला साळवे, पूजा म्हैसकर, मनीषा गावित, सोनाली येसनकार आदी उपस्थित होते.


मराठा हायस्कूल
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पिंगळे होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सोपान येवले, पर्यवेक्षक अरुण पवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सुनिल बस्ते यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याचा परिचय करून दिला. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक पिंगळे यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय म्हस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक अरुण पवार यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंचवटी सार्वजनिक वाचनालय

अॅड. उत्तमराव नथुजी ढिकले, पंचवटी सार्वजनिक वाचनालयात महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रदान लालबहादूर शास्त्री जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाचनालयाचे कोषाध्यक्ष डॉ. शांताराम रायते यांच्या अध्यक्षतेखाली व माधवराव भणगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. शास्त्री व गांधी यांच्या जीवनातील ठळक प्रसंगांना उजाळा देऊन दोघांच्याही स्मृतींना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरालाल परदेशी यांनी केले. तर आभार नगरसेवक उल्हास धनवटे यांनी मानले. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह ग्रंथमित्र नथुजी देवरे, सुभाष पाटील, ग्रंथपाल योगिता भामरे, सोमनाथ बोबडे आदी उपस्थित होते.

जैन जॉगर्स ग्रुप

गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘स्वच्छता हीच सेवा’ हा संकल्प पूर्ण करण्यासाठी जैन जॉगर्स ग्रुपकडून गोल्फ क्लब ग्राऊंडवर दोन कचरापेट्या बसविण्यात आल्या. तसेच जैन जॉगर्स ग्रुपचे अध्यक्ष अरुण कोठारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मैदानावर साफसफाई केली. यावेळी नाशिक मनपा स्थायी समिती अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, नगरसेवक जायभावे यांची यावेळी उपस्थिती होती.

चित्रकलेतून सत्य-अहिंसेचा संदेश

मानवधन सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था पाथर्डी फाटा येथे चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ‘व्हिजन २०२०’ कार्यपूर्तीसाठी संस्थेतर्फे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गांधीजींच्या मूल्यांची जोपासना करणे आदर्श नागरिक व आदर्श भारत निर्मितीसाठी या मूल्याचे बीजारोपण जनमानसात रुजवण्यासाठी कलेच्या माध्यम असावे, या हेतूने ही स्पर्धा संस्थेत आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांचे चित्र यावेळी रेखाटले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मनीष देवघरे, योगेश आघाडे यांनी केले. यावेळी संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, सचिव ज्योती कोल्हे, सॅमसोनाईट कंपनीचे डायरेक्टर मिलिंद वैद्य, भारतीय शिक्षण परिषद सचिव अश्विनीकुमार भारतद्वाज, लीड इंडिया सेक्रेटरी मनीष मंजुळ आदी उपस्थित होते. या स्पर्धेत जिल्हाभरातील विविध शाळांमधील सुमारे दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये चिराग पवार, अनुष्का निकाळजे, लक्ष्मी रमेश प्रसाद, विक्रांत बागूल, दुर्वा गोकुळ राव, हर्षाली शेवाळे, भूषण गायकवाड, पूनम गुंजाळ व मानसी भांडारकर, शिवानी श्रीवास्तव या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images