Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दूध दरातील कपातीने शेतकरी अडचणीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

दुधाची वाढती आवक आणि मागणी कमी असल्याचे सांगत सहकारी दूध संघांनी दुधाच्या दरात प्रतिलिटर एक रुपया कपात केली आहे. यामुळे जोडधंदा म्हणून हा व्यवसाय करणारे शेतकरी संतापले आहेत.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मकरंद सोनवणे यांनी दुधास ठरवून दिलेला २७ रुपये हाच दर उत्पादकांना देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. सोनवणे यांनी दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना याबाबत निवेदन पाठवले आहे. राज्य शासनाने २१ जूनपासून दुधाची फॅट ३.५ व एसएनएफ ८.५ असलेल्या दुग्ध उत्पादकांच्या दुधास प्रतिलिटर २४ रुपयांवरून २७ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सध्यस्थितीत दुधाची वाढती आवक आणि मागणी कमी असल्याचे कारण देत सहकारी दूध संघांनी १६ सप्टेंबरपासून दरात एक रुपयांची कपात केल्याने दुग्ध उत्पादकांना प्रतिलिटर २६ रुपये मिळत आहेत. सहकारी दूध संघांनी एक रुपयाने दरात कपात केल्याने दुग्धउत्पादक अडचणीत आलेला असतानाच, खाजगी व प्रमुख ब्रँड असलेल्या दुध व्यावसायिकांनी तर दुधाचा दर प्रतिलिटर २३ देण्याचे ठरविले असल्याची देखील बोलले जात आहे.

बेरोजगारी वाढण्याची भीती

गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांची तरुण मुले या दुग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणात उतरली आहेत. शेतीला जोड धंदा म्हणून ग्रामीण भागात हा व्यवसाय पाय रोवत आहे. अशातच दुधाचे दर कमी होताना या व्यवसायात मंदी आली तर बेरोजगारी वाढणार आहे, असे मकरंद सोनवणे यांनी निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाथर्डी परिसरात बेवासरस स्फोटके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/सिडको

पाथर्डी परिसरातील मोंढे मळा येथील रस्त्यावर स्फोटकांचा मोठा साठा बेवारस पडलेला आढळून आला. लष्करी परिसरापासून हाकेच्या अंतरावर ६० जिलेटिन आणि १७ डिटोनेटर सापडल्याने सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आला.

गौळाणे रस्त्यावरील मोंढे मळा येथे एक संशयास्पद गोणी पडल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने येथे पोहोचून पाहणी केली. बॉम्बशोधक व नाशक पथकाने रात्रीच्या सुमारास तपासणी केली असता त्यात स्फोटकांचा साठा भरलेला आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, इंदिरानगर पोलिस स्टेशनचे निरीक्षक कुमार चौधरी यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी स्फोटकांचा साठा जप्त करीत हवालदार दत्तात्रेय पाळदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. एवढा मोठा स्फोटकांचा साठा या ठिकाणी कसा व कोणी आणला, यामागील गूढ उकलण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.

खाणकाम की घातपात?

पाथर्डी, गौळाणे, विल्होळी व आंबेबहुला यासह परिसरात खडी क्रशरचा मोठा उद्योग पसरला आहे. खाणकाम करताना अशी स्फोटके वापरण्यात येतात. त्यामुळे ही स्फोटके या खाणकामासाठी किंवा विहीर खोदण्याच्या कामासाठी जात असावी, अशी एक शक्यता व्यक्त होते आहे. दरम्यान, लष्करी परिसरापासून अवघ्या काही मीटरच्या अंतरावर हा साठा सापडला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चाही सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप लष्कर प्रशासनाशी संपर्क साधलेला नसून, आवश्यकता भासल्यास त्यांनाही माहिती देण्यात येईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

स्फोटासाठी वीजपुरवठा आवश्यक

जिलेटिन स्फोटकाचा वापर शक्यतो खाणकाम करण्यासाठी होतो, तर नक्षली भागात घातपात करण्यासाठी ही स्फोटके वापरली जातात. जिलेटिन कांडीला डिटोनेटर असल्याशिवाय तिचा स्फोट होत नाही, तसेच डिटोनेटरलाही वीजपुरवठ्याची गरज भासते. जिलेटिन कांडी, डिटोनेटर, तसेच वीजपुरवठा असे तीन घटक एकत्र आल्यास मोठा स्फोट होतो. दरम्यान, नाशिकमध्ये सापडलेला साठा बेवारस असून, यात घातपाताची शक्यता नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

कंपनीकडून मागितला अहवाल

सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले, की ही स्फोटके सापडली तेथे वळणाचा रस्ता आहे. कदाचित एखाद्या ट्रॅक्टरमधून स्फोटकांची गोणी पडली असावी. मात्र, स्फोटकांची अशी निष्काळजीपणे वाहतूक करणे धोक्याचे असल्याचे गोरे यांनी सांगितले. ही स्फोटके ‘पॉवर ९०’ या कंपनीने तयार केली आहेत. त्यामुळे या कंपनीलाही स्फोटकांबाबत विचारणा करण्यात आली असून, लवकरच स्फोटकाचे खरेदीदार समोर येतील, अशी अपेक्षा गोरे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात २५ नवे आधार सेंटर्स

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आधार कार्डावरून शहरातील नागरिकांची कोंडी झाली असून, आधार कार्ड सेंटरचा प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांनी थेट पंतप्रधानांकडे धाव घेतली आहे. शहरात आधार कार्ड सेंटरची वानवा असल्याने सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी महाऑनलाइन कंपनीने पालिकेला नव्याने २५ आधारकार्ड सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. महापालिकेला जागा उपलब्ध करून देण्याचे साकडे घातले असून, त्याबाबतची कार्यवाही पालिकेकडून सुरू आहे. त्यामुळे शहरात आधार कार्ड सेंटर्सची संख्या वाढणार असून, नागरिकांचा त्रास कमी होणार आहे.

केंद्र सरकारने सर्वच योजनांसाठी आधार कार्डची सक्ती केल्याने नागरिकांनी आधार कार्ड काढून घेण्यासाठी सध्या आधारकार्ड सेंटरवर गर्दी सुरू केली आहे. सध्या शहरात पालिकेच्या चार विभागीय कार्यालयांमध्ये सरकारी आधारकार्ड सेंटर सुरू आहेत, तर काही ठिकाणी खासगी मोबाइल कंपन्यांना काम देण्यात आले आहे. परंतु, या खासगी सेंटर्सवर नागरिकांना त्रास दिला जात असून, त्यामुळे हाल होत आहेत. त्यामुळे आधारकार्ड सेंटर्सची परवड थांबवण्यासाठी नागरिकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घातले होते. त्याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे.

आधारकार्ड सेंटर्स उपलब्ध करून देणाऱ्या महाऑनलाइनने शहरात आधारकार्ड सेंटर्स वाढवून देण्याची तयारी दर्शवली आहे. शहरात नव्याने २५ आधारकार्ड सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेला देण्यात आला आहे. त्या सेंटर्ससाठी जागा मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. महाऑनलाइनच्या प्रस्तावावर महापालिकेनेही सकारात्मक प्रतिसाद देत, विभागीय कार्यालये व पालिका संकुलातील गाळ्यांची चाचपणी सुरू केली असून, लवकरच ही जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे आधारकार्ड सेंटरचा वनवास संपण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगालय’चा १३ पासून श्रीगणेशा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दि. १३ ऑक्टोबरपासून रंगालय सभासद योजना सुरू होत आहे. या योजनेंतर्गत ‘रंगालय’ सभासदांना पुढील वर्षभराच्या कालावधीत एकूण दहा नाटके कुसुमाग्रज स्मारकात दाखविली जातील. यंदाच्या सभासद योजनेचा प्रारंभ ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार लिखित व महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुणे निर्मित ‘पार्टी’ या नाटकाच्या प्रयोगाने १३ तारखेला सायंकाळी ६ वाजता कुसुमाग्रज स्मारकात होईल.

मराठी नाट्यकलेची सुदृढ परंपरा नाशिकमध्ये जोमाने रुजत असून, नाशिकच्या प्रयोगशील, समांतर नाट्य चळवळीची, कलावंतांची दखल सर्वत्र घेतली जात आहे. यासाठी अधिकाधिक पोषक वातावरण, अभिरुचीसंपन्न प्रेक्षकवर्ग तयार होण्याच्या उद्देशाने कुसुमाग्रज प्रतिष्ठान सातत्याने रंगभूमीविषयक उपक्रम राबवित असते. नवनव्या उन्मेषाची उत्कृष्ट नाटके नाशिककरांना वारंवार पाहायला मिळावीत म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. रंगालय सभासद योजनेत सहभागी होऊन वेगळ्या पठडीतील दुर्मिळ नाट्यप्रयोगांचा आस्वाद घेण्याचे आवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.

अनिरुद्ध खुटवड या मराठी व हिंदी रंगभूमीवर गाजलेल्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेल्या ‘पार्टी’ या नाटकात प्राजक्ता पांढरे, प्रसाद वनारसे, पल्लवी काळे, सचिन जोशी, अमृता पटवर्धन, दीप्ती जोशी, अमृत सामक, हर्षद राजपाठक, निखिल गाडगीळ, आदिती व्यंकटेश्वरन, भूषण पाटील यांनी अभिनय केला असून, प्रकाशयोजना अपूर्व साठे, संगीत समीर दुबळे यांची, नेपथ्य संतोष जधाल यांचे, रंगभूषा आशिष देशपांडे यांची व वेशभूषा कल्याणी गुगळे यांनी साकारली आहे.

एका आधुनिक महानगरातील उच्चभ्रू समाजातील प्रातिनिधिक व्यक्तिरेखांमधील ताण-तणाव, भंगलेपणाचे दर्शन या नाट्यकृतीत घडते. इथे प्रत्येक व्यक्तिरेखा एकाकी आहे व हे एकाकीपण विसरण्यासाठी काहीतरी निमित्त काढून ‘पार्टी’चे आयोजन केले जाते. अशाच एका पार्टीत या समाजातील तथाकथित कलासक्त व कलाकार व्यक्तिरेखा आपल्याला भेटतात. त्यांच्या परस्परांतील वाद-संवादांतून आपल्याला त्यांच्या आयुष्यातील चिंता, पोकळपणा आणि दंभ यांचे दर्शन घडते.

यापूर्वीच्या रंगालय सभासद योजनेत उणेपुरे शहर एक, बिनकामाचे संवाद, राजनीती और विवाह, पुरावाच काय अमेरिकेला, ही अनेकविध विषय-आशय व फॉर्म्सची नाटके सादर केली गेली होती. या सर्व नाटकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकृष्ट कामांचा युवकांकडून भांडाफोड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गावातील तरुणांनी विविध प्रश्न उपस्थित केल्याने तालुक्यातील खेडलेझुंगे येथील ग्रामसभा वादळी झाली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी अहवाल वाचन केल्यानंतर तरुणांनी गावातील रस्ते, गटारी, वीज खांब, सांडपाणी व्यवस्थापन आदींसह विविध कामांवर आक्षेप घेतला. सरपंच सुषमा गीते यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा घेण्यात आली.

गावात राबवलेल्या घरकुल योजनेचा सलग १५ वर्षांपासून पाठपुरावा करूनही या योजनेचा लाभ न मिळाल्याने एका ज्येष्ठ महिलेने सभेत गोंधळ घातला. गावात पिण्याच्या पाण्याची आणि गटारीच्या दूषित सांडपाण्याची नलिका शेजारी असून नुकतेच गटारीचे बांधकाम झाल्याने त्यात गटारीची नलिका फुटली. त्यामुळे दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळले गेले. एक महिन्यापूर्वी केलेल्या गटारीचे नवीन पाइप फुटल्यामुळे नागरिकांना महिनाभरापासून दूषित पाणी प्यावे लागत असल्याचा मुद्दा तरुणांनी ग्रामसेवक जाधव यांच्याकडे मांडला. ठेकेदाराच्या कामावरही शंका उपस्थित करण्यात आली. गावात घरकुल योजनेतही घोळ केल्याचा आरोपही तरुणांनी केला. भास्करराव हागोटे, कैलास हागोटे, अभिषेक घोटेकर, शंकर शिंदे, अभिजित घोटेकर, अभिप्राय घोटेकर, अच्युतम घोटेकर, आदींसह ग्रामस्थ सभेला उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्धन्यायिक आदेशांची पडताळणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
महसूल विभागातील अर्धन्यायिक प्रकरणातील कामकाज व आदेशांचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच न्यायिक प्रक्रिया पारदर्शक व सक्षम बनविण्याच्या उद्देशाने निवडक आदेशांची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘निर्णय परीक्षण समिती’ गठीत करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी दिली आहे.

उपविभाग, जिल्हा व विभाग अशा तीन स्तरांवर या समितीची निर्मिती होणार असल्याने आता तालुका ते विभागीय पातळीवरील सर्वच अधिकाऱ्यांनी दिलेल्या अर्धन्यायिक प्रकरणांतील आदेशांची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे नियमांकडे डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे मानले जात आहे.

राज्य महसूल अधिनियम कलम २५७ च्या तरतुदीनुसार, ‘कोणत्याही दुय्यम अधिकाऱ्याने केलेल्या कार्यवाहीच्या नियमानुसारतेबद्दल तसेच स्वत:ची खात्री करून घेण्यासाठी अधिकाऱ्याने केलेल्या कोणत्याही चौकशी किंवा कार्यवाहीचे कागदपत्रे मागवून तपासता येण्याची या अंतर्गत तरतूद आहे. तसेच जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम पाचनुसार महसूल विभागातील जिल्हा, उपविभाग व तालुकास्तरावर महसूल अधिकाऱ्यांनी महसूल व इतर अर्ध्य न्यायिक प्रकरणात पारीत केलेल्या निवडक आदेशांचे न्यायिक व गुणवत्ता स्तरावर तपासणीसाठी ‘निवड परीक्षण समिती’ गठीत करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त झगडे यांनी जिल्हाधिकऱ्यांना दिले आहेत.

त्याअनुषंगाने तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी पारित केलेल्या निवडक आदेशांच्या परीक्षणासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समिती आणि उप जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशांच्या तपासणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती तसेच जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्या आदेशांच्या तपासणीसाठी महसूल उपायुक्त दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त सामान्य प्रशासन रघुनाथ गावडे व सहाय्यक आयुक्त उन्मेष महाजन यांची विभागस्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. या समित्यांमुळे अर्धन्यायिक कामकाजात सुधारणा होण्यास मदत होईल. तसेच आदेशांचा दर्जाही सुधारेल, असेही झगडे यांनी सांगितले.

अहवाल सादर करा
सदर समितीअंतर्गत कार्यवाही करताना उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या प्रकरणांची तपासणी करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित करावेत. तसेच संबंधित समित्यांनी तपासणीबाबतचा स्पष्ट अहवाल विभागीय समितीला सादर करण्यासंदर्भात सूचनाही झगडे यांनी दिल्या आहेत.

नागरिकांच्या अर्ध न्यायिक प्रकरणे बरेचदा तालुकास्तरावरील अधिकारी वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांकडे पाठवितात. बरेच निर्णय चुकीचेही आढळून आलेले आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी निर्णय परीक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे.
- महेश झगडे,
विभागीय आयुक्त, नाशिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृत्तपत्र विक्रेते ताजनपुरेंचा सत्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे सदस्य संजय ताजनपुरे एकलहरे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेते सेवाभावी संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ताजनपुरे यांनी परिवर्तन विकास पॅनलतर्फे मोठ्या मताधिक्क्याने निवडणूक जिंकली आहे. सत्कारावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर, उपाध्यक्ष अनिल कुलथे, खजिनदार वसंत घोडे, सरचिटणीस गौतम सोनवणे, कार्यकारिणी सदस्य सुनील जाधव, जितेंद्र भोसले, दत्ता निराणे, मनोहर खोले, सतीश आहेर, योगेश भट, इस्माईल पठाण, विजय सोनार, उत्तम गांगुर्डे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघा ५२० टन कचरा संकलित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या वतीने शहरात २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता महाअभियानात ५२० टन कचरा जमा केल्याचा दावा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. परंतु, या मोहिमेच्या प्रारंभ व व समारोपादिवशीच तब्बल ३९९ टन कचरा गोळा केल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून दिसून आल्याने मध्यल्या काळात ही मोहीम फसल्याची कबुलीच जणू महापालिकेने दिली आहे.

महापौरांनी मंगळवारी स्वच्छता मोहिमेवरून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर आरोग्य विभागाने दहा दिवस राबविलेल्या मोहिमेतील कचरा संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात दहा दिवसांत ५२० टन कचरा संकलन केल्याचा दावा करण्यात आला आहे. या आकडेवारीत स्वच्छता मोहीम ही फक्त प्रारंभ व समारोपाच्या दिवशीच यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अन्य आठ दिवसांत आठ ते दहा टन सरासरी कचरा जमा केल्याचा दावा केला गेला आहे. महापालिकेच्या घंटागाड्यांमार्फत शहरात दररोज सरासरी पाचशे टन कचरा संकलित केला जातो. त्यामुळे या मोहिमेतून महापालिकेच्या हाती फारसे काही हाती लागले नसल्याचे चित्र आहे. परिणामी महापालिकेची कोंडी झाली आहे.

दोन दिवसांत ३९९ टन

शहरात मोठ्या प्रमाणावर डेंग्यू, स्वाइन फ्ल्यू आणि रोगराईने डोके वर काढल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशाने २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेच्या प्रारंभाच्या दिवशी ३५२ टन कचरा शहरात गोळा करण्यात आला, तर समारोपाच्या दिवशी ४७ टन कचरा जमा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अस्वच्छतेवरून महापौरांकडून झाडाझडती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात गेले दहा दिवस राबविण्यात आलेल्या स्वच्छता महाअभियानाचा महापौरांनी मंगळवारी आढावा घेतला असून यात अस्वच्छतेवरून महापौरांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. अस्वच्छतेवरुन किती जणांना नोट‌िसा बजावल्या, याबाबत महापौर रंजना भानसी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना जाब विचारला. दहा दिवस स्वच्छता मोहीम चांगली राबवली असली तरी, शहरात कचरा कायम असल्याचे सांगत, आता प्रभागानुसार स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. तसेच साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी औषध फवारणी, घंटागाडीचे नियोजन करण्याचे सांगून, नगरसेवकांच्या तक्रारींचा पाढा अधिकाऱ्यांसमोर वाचला.

शहरात डेंग्यू व स्वाइन फ्लूसह साथीच्या रोगांनी पुन्हा डोके वर काढल्यानंतर पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार शहरात २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान महापालिकेच्या वतीने विशेष स्वच्छता महाअभियान राबविण्यात आले होते. दहा दिवस स्वच्छतेचा कृती आराखडा तयार करण्यात आला असला तरी, शुभारंभ आणि समारोपाच्या दिवशीच स्वच्छता मोहीम प्रभावी ठरली. अनेक ठिकाणी या मोह‌िमेचा कार्यभाग हा फोटोसेशनपुरताच मर्यादीत राह‌िला. त्यामुळे शहरातील कचऱ्याची समस्या कायम राहून साथीच्या आजारांसह डेंग्यू, स्वाइन फ्लूचा ग्राफ कायम आहे. त्यामुळे महापौर रंजना भानसी यांनी मंगळवारी सर्व विभागप्रमुख, विभागीय अधिकारी यांच्यासह आरोग्य व वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी सभागृहनेते दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, आरोग्य व वैद्यकीय सभापती सतीश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

महापौरांनी स्वच्छतेसदर्भात विभागीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या उपाययोजना व राबविलेल्या मोह‌िमेसंदर्भात माहिती जाणून घेतली. त्यानंतर सतीश कुलकर्णी यांनी पालिकेडे कर्मचारी कमी असल्याचे सांगत, स्वच्छता कर्मचारी वाढविण्याची मागणी केली. दिनकर पाटील सफाई कर्मचाऱ्यांना साहित्य उपलब्ध करून देण्यासह ३१ प्रभागांत अजूनही समान कर्मचारी वाटप केले नसल्याबद्दल जाब विचारला. तसेच उद्योग व व्यापारी संस्थांच्या मदतीने त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी केल्या. महापौर भानसी यांनी अस्वच्छतेवरून आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांना जाब विचारत, अस्वच्छता आणि रोगराईप्रकरणी किती जणांना नोट‌िसा बजावल्या याचा जाब विचारला. यावेळी बुकाने यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला असता, महापौरांनी मात्र तुम्ही काय केले, हे आधी सांगा असे म्हणून कानउघडणी केली. गोदावरी नदीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. निर्माल्यासाठी कलश ठेवले असतानाही, कलशाभोवतीच अस्वच्छता पसरली आहे. असे असताना आरोग्य विभाग काय काम करतो, असा जाब विचारला. शहरात पालापाचोळा उचलला जात नाही, घंटागाडीचे नियोजन नाही, नगरसेवकांच्या तक्रारी आहेत, असे सांगत त्यांनी आरोग्य विभागाचे वाभाडे काढले.

सणासुदीत काळजी घ्या!

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचे तसेच घंटागाडीचे नियोजन करण्याचे आदेश महापौरांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. घरातील साफ-सफाईमुळे जास्तीचा कचरा रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकचा कचरा उचलण्याचे नियोजन आरोग्य विभागाने करावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिलेत. विद्युत, पाणीपुरवठा व आरोग्यासंदर्भात तक्रारी वाढायला नको, याबाबत काळजी घेण्याच्या सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना यावेळी केल्या.

पदाधिकाऱ्यांच्या सूचना

-मोकाट जनावरे, कुत्रे, डुकरे यांचा बंदोबस्त करा.

-अनधिकृत गोठ्यांवर कारवाई व्हावी

- डुकरे पाळणाऱ्यांना नोट‌िसा द्या

- अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा

- उघड्यावरील मांसविक्री बंद करा

- गोदावरीच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करा

- घंटागाडीचे नियोजन करा

- गार्डनची स्वच्छता दररोज व्हावी

- रस्त्यावरील गवत, घाण तातडीने हटवा

- डासांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हाडे गोठविणारी मोहीम मितेशने केली फत्ते

$
0
0

नाशिक ः हाडे गोठविणारी थंडी, टप्प्याटप्प्यावर होणारा हिमवर्षाव आणि खोल दऱ्यांमधून जाणारा खडतर रस्ता अशी अत्यंत कठीण हिमालयीन राइड बुलेटवर पूर्ण करण्याचा मान नाशिकच्या मितेश वैश्य याने मिळवला आहे. ‘हिमालयन ओडिसी एक्सप्लोर ऑफ रोड राइड’ असे या खडतर मोहिमेचे नाव आहे. समुद्रसपाटीपासून ४,५८७ मीटर उंचीवर असलेली ही मोहीम भारतातल्या केवळ पाच रायडर्सने पूर्ण केली असून, त्यापैकी एक मितेश आहेत.

ओडीसी एक्सप्लोर ऑफ रोड राइड ही मोहीम दरवर्षी आयोजित करण्यात येते. जास्तीत जास्त रायडर्सना टू व्हीलर्सच्या साहसी मोहिमेची आवड निर्माण व्हावी व हिमालयातील प्रचलित नसलेले मार्ग माहीत व्हावेत हा या मोहिमेमागचा उद्देश आहे. या मोहिमेसाठी संपूर्ण भारतातून प्राथमिक फेरीसाठी २० रायडर्सची निवड करण्यात आली. त्यांना अत्यंत कठीण प्रशिक्षण देण्यात आले. हे खडतर प्रशिक्षण केवळ १२ लोकांनी पूर्ण केले. त्यात मितेश अग्रस्थानी होते. शिमला येथून मोहिमेला सुरुवात झाली.

पहिल्या टप्प्यात शिमला ते सांगला हे अंतर पार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या वेळी प्रचंड बर्फ व उणे तापमान अशा वातावरणात त्यांनी हे अंतर पार केले. दोन्ही बाजूंना खोल दरी असलेला रस्ता व अनेकदा होणारा हिमवर्षाव यामुळे मार्गही धूसर होता. तरीही दिलेल्या वेळेत अंतर कापणे महत्त्वाचे होते. दुसऱ्या टप्प्यात सांगला ते कागा हे अंतर देण्यात आले होते. दगड, चिखल, कधी बर्फ, तर कधी खोल दरी असा खडतर प्रवासाचा दुसरा टप्पा त्यांनी पार केला. या मार्गात हिंस्र प्राण्यांचा मुक्त वावरही पाहायला मिळाला. तिसऱ्या टप्प्यात कागा ते चंद्रताल अशी मोहीम होती. जगातील सर्वांत उंचीवरच्या खेड्यात त्यांचा मुक्काम होता. या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा अत्यंत कमी असल्याने अन्नपदार्थ शिजवून खाता येत नव्हते. बरोबर असलेल्या ड्रायफ्रूटवर त्यांना दोन दिवस काढावे लागले. केवळ ११४ लोकांची वस्ती असलेल्या खेड्यात उणे २० अंश सेल्सिअस वातावरणात त्यांनी गाडी चालवली. या वेळी गाडीतील ऑइल गोठू नये म्हणून रात्रीच्या वेळीही गाडी सुरूच ठेवावी लागत होती. चंद्रतालपासून किलॉँग, किलॉँग ते पांगी, पांगी ते सचपास, सचपास ते डलहौसी, डलहौसी ते पालमपूर असा ३,५११ किलोमीटरचा प्रवास त्यांनी ११ दिवसांत पूर्ण केला. मोहिमेला सुरुवात करताना १२ लोकांनी सुरुवात केली. मात्र, येणाऱ्या अडथळ्यांना खंबीरपणे तोंड न देऊ शकल्याने सात जणांनी या मोहिमेतून माघार घेतली. ही संपूर्ण मोहीम पाच रायडर्सने पूर्ण केली. त्यात साउथचे व नॉर्थचे प्रत्येकी १, पुण्यातील २ व नाशिकचा मितेश यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अव्वल कारकुनांचे बढतीप्रश्नी ‘लेखणीबंद’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुरवठा निरीक्षकाचे पद सरळ सेवेने भरले जात असल्याने अव्वल कारकुनांवर अन्याय होत आहे. हे पद सरळ सेवेने न भरता अव्वल कारकुनांना बढती द्यावी, या मागणीसाठी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लेखनीबंद आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास १० ऑक्टोबरपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महसूल कर्मचारी संघटनेने दिला आहे.

पुरवठा निरीक्षक पद हे सरळ सेवेने भरावे, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. परंतु, हा निर्णय अंमलात आल्यास बढतीकडे आस लावून बसलेल्या महसूल विभागातील अव्वल कारकुनांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मंगळवारी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मंगळवारी केवळ पुरवठा विभागाने कामकाज बंद ठेवले असले, तरी मागणी मान्य न झाल्यास १० ऑक्टोबरपासून महसूल विभाग कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील २५, तर जिल्हाभरातील १४३ कर्मचारी लेखणीबंद आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात विद्यार्थ्याचा डेंग्यूने मृत्यू

$
0
0

धुळे : शहरातील देवपुरात बोरसे नगरात राहणारा डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या हेमंत विजय पाटील (वय १७) याला शनिवारी (दि. ३०) अचानक ताप आला. त्यामुळे हेमंतला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीअंती त्याला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र हेमंतची प्रकृती खालावल्याने त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. हेमंत पाटील तालुक्यातील नगाव येथील मूळ रहिवाशी होता. त्याच्या पश्चात आई, वडील, एक बहीण असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वच्छता हा शिस्तीचाच भाग’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

प्रत्येक माणसाने जीवनात स्वतःच्या कर्तव्यासह सामाजिक निष्ठा व शिस्त जोपासणे गरजेचे अाहे. स्वच्छता हा शिस्तीचाच भाग असून, त्याप्रति प्रत्येकाने सजग राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडर लेफ्टनंट जनरल एस. आर. सलारिया यांनी स्वच्छता पंधरवडा अभियानाच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी केले.

कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनासह येथील नागरिक व विविध संस्थांनी केलेले कार्य निश्चितच उल्लेखनीय असून, याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून आपण प्रभावित झालो असल्याचे कमांडर सलारिया यांनी सांगितले. येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड संयुक्त प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर प्रदीप कौल, उपाध्यक्ष दिनकर आढाव, नगरसेवक बाबुराव मोजाड, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, प्रभावती धिवरे, आशा गोडसे, कावेरी कासार, मीना करंजकर, सीईओ विलास पवार, कर्नल विवेक शर्मा, कर्नल आर. एन. सिंग, कर्नल पी. सुब्रमण्यम, माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, भाऊसाहेब धिवरे, चंद्रकांत गोडसे आदी उपस्थित होते.

यावेळी शिक्षक पोपट खंडिझोड यांनी अभियानादरम्यान घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांसह स्वच्छतेबाबत करण्यात आलेल्या कार्याचा अहवाल सादर केला. कार्यक्रमास कार्यालय अधीक्षक उमेश गोरवाडकर, आरोग्य अधीक्षक सतीश भातखळे, राजिंदर ठाकूर, युवराज मगर, हंसानंद निहलानी, सुभाष बोराडे, चंद्रप्रीती मोरे, हेमंत मोजाड, गोवर्धनदास मनवानी, मुख्याध्यापिका नलिनी लोखंडे, माधुरी कुलकर्णी आदींसह सर्व शिक्षक व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कर्मचारी उपस्थित होते. सुवर्णा गिते, विजयालक्ष्मी पंडित यांनी सूत्रसंचालन केले.

--

यांनी स्वीकारला सन्मान

आदर्श कार्य करणारे कामगार व शाळा, विविध स्पर्धांमधून यश मिळविणारे विद्यार्थी यांच्यासह प्रथम क्रमांकाचा स्वच्छतेचा पुरस्कार नगरसेविका मीना करंजकर यांनी, द्वितीय पुरस्कार आशा गोडसे, चंद्रकांत गोडसे यांनी, तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नगरसेवक सचिन ठाकरे यांच्या वतीने स्वच्छतादूत सतीश कांडेकर यांनी स्वीकारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या प्रवेशद्वारावर सुखोई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई आग्रा महामार्गावरील विल्होळीजवळील महापालिकेच्या प्रवेशद्वाराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यासाठी येथील उपलब्ध जागेचा विकास करून देण्याची तयारी ओझरस्थित हिंदुस्तान एअरोनॉट‌िक्स लिम‌िटेडने (एचएएल) दर्शवली आहे. विल्होळी जंक्शनवर दोन लढाऊ सुखोई विमानाच्या प्रतिकृती बसविण्याची तयारी एचएएलने दर्शवली आहे. सुखोई लढाऊ विमानाच्या प्रतिकृतीसह या ठिकाणी उपलब्ध जागेच्या सुशोभिकरणासाठी लागणारा तीस लाखांचा खर्चही एचएएल करणार आहे. महापालिका आणि एचएएलमधील करार अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

मनसेच्या कार्यकाळात शहरातील चौक, रस्ते, प्रवेशद्वार सुशोभिकरणाची कामे सीएसआर फंडातून मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. परंतु, भाजपची सत्ता येताच या कामांत खंड पडला होता. यापूर्वीच महापालिकेने मुंबई आग्रा रोडवरील आडगाव ट्रक टर्मिनस आणि विल्होळी येथील प्रवेशद्वार सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासंदर्भातील कारवाई सुरू असतानाच विल्होळी प्रवेशद्वाराच्या सुशोभिकरणाचे काम करून देण्याची तयारी एचएएलने दर्शवली आहे. त्यासंदर्भात महापालिका आणि एचएएलमध्ये मह‌िनाभरापासून बोलणी सुरू होती. त्याला आता अंत‌िम स्वरुप आले आहे.

एचएएलकडून विल्होळी प्रवेशद्वाराच्या ठिकाणी असलेली पालिकेची अडीच एकर जागा सुशोभित करून दिली जाणार आहे. त्यासाठी लागणारा ३० लाखांचा खर्चही एचएएलकडून उचलला जाणार असून, सीएसआर फंडातून हे काम केले जाणार आहे. प्रवेशद्वार व जागेच्या सुशोभिकरणासोबतच या ठिकाणी एचएएलकडून दोन लढाऊ सुखोई विमानाच्या प्रतिकृती उभ्या केल्या जाणार आहेत. या प्रतिकृतींच्या उभारणीचा व दहा वर्षांच्या देखभालीचा खर्च एचएएल करणार आहे. त्यासंदर्भातील महापालिका व एचएएलमधील करार हा अंतिम टप्प्यात असून, त्याला स्थायी समितीने अगोदरच मान्यता दिली आहे. त्यामुळे विल्होळी प्रवेशद्वाराला आगळे वेगळे रुप येणार आहे.

सीएसआर फंडातून दुभाजक

मनसेच्या काळात सीएसआर फंडातून शहरातील रस्ते, दुभाजक व चौकांचे सुशोभिकरण करण्यात आले होते. परंतु, भाजपच्या काळात सीएसआर फंडातून चौक, रस्ते व दुभाजकांच्या सुशोभिकरणाचे थंड झालेले काम नव्याने सुरू होणार आहे. सुला, सोमा वायनरिजने गंगापूर रोडवरील काही रस्त्यांचे सुशोभिकरण करून देण्याचे प्रस्ताव पालिकेसमोर ठेवले असून, त्याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुर्वेद, युनानी डॉक्टरही रस्त्यावर

$
0
0

नवीन विधेयकाविरोधात शुक्रवारी मूक मोर्चा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयुर्वेदासह युनानी डॉक्टर्स प्रचलित कायद्यानुसार त्यांच्या मूळ पॅथीसह अॅलोपॅथीचा पूरक वापर करत देशभरात रुग्णसेवा देत आहेत. मात्र, या दोन्हीही पॅथीच्या डॉक्टरांना अॅलोपॅथीच्या वापरास निर्बंध घालण्याची तरतूद असलेले नवीन विधेयक नीती आयोगाने केंद्र सरकारकडे सादर केले आहे. या विधेयकाच्या विरोधात देशभरासह शहर-जिल्ह्यातील बीएएमएस आणि युनानी डॉक्टर्स शुक्रवारी (दि. ६) जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढणार आहेत.

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) संघटनेच्या वतीने या आंदोलनासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल पगार यांनी ही माहिती दिली. शुक्रवारी सकाळी १० वाजता गोल्फ क्लब मैदानापासून मोर्चाला प्रारंभ होईल. शालिमार, एम. जी. रोड मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. संघटनेचे एक शिष्टमंडळ आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे.

सद्यस्थितीत महाराष्ट्रातील बीएएमएस (आयुर्वेद) व युनानी पदवीधर डॉक्टर्स हे त्यांच्या औषधांसोबतच अॅलोपॅथीची औषधे कायद्याने वापरू शकतात. केंद्रीय भारतीय चिकित्सा परिषद कायदा १९७० व महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम १९६१ मधील तरतुदींनुसार अॅलोपॅथीची औषधे वापरण्यास कायद्याने परवानगी असली तरीही, विधेयकाच्या माध्यमातून त्यावर बंदी आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. केंद्राच्या या भूमिकेकडे लक्ष वेधून घेतानाच शांततेच्या मार्गाने या विधेयकाला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय संघर्ष समिती संयोजक डॉ. शैलेश निकम यांनी दिली.

या मोर्चात जिल्ह्यातील सर्व संबंधित अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक, विद्यार्थी, १०८ अॅम्ब्युलन्सवर कार्यरत वैद्यकीय पथक, राष्ट्रीय बालशिशू सुरक्षा कार्यक्रम, शासकीय व अशासकीय वैद्यकीय अधिकारी, जनरल प्रॅक्टिशनर्स यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन निमाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. तुषार सूर्यवंशी यांनी केले आहे. हे विधेयक आहे तसेच लागू झाल्यास शहरासह ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थाच कोलमडून पडणार असल्याची भीती राज्य शाखेचे प्रचार व प्रसिद्धीप्रमुख डॉ. अनिल निकम यांनी व्यक्त केली.

या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे राज्य विभागीय सचिव डॉ. आशिष सूर्यवंशी, सेक्रेटरी ललित जाधव, डॉ. देवेंद्र बच्छाव, कोषाध्यक्ष तुषार निकम, संघटक डॉ. व्यंकटेश पाटील, माजी अध्यक्ष डॉ. भूषण वाणी, सहसंघटक राजेंद्र खरात, वूमेन्स फोरमच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा वाघ, डॉ. मनिष हिरे यांनी केले आहे.

आरोग्यव्यवस्था कोलमडण्याची शक्यता

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दर ७०० रुग्णांसाठी एक डॉक्टर असावा असे अभिप्रेत आहे. मात्र भारतात केवळ अॅलोपॅथी डॉक्टरांचे प्रमाण बघता १४०० पेक्षा जास्त रुग्णांसाठी एक डॉक्टर आहे. भारतीय चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांना अॅलोपॅथी वापरण्याची परवानगी देऊनही १००० लोकसंख्येला एक असे डॉक्टरांचे प्रमाण आहे. ही संख्या बघता सदर विधेयक लागू झालेच तर ग्रामीण किवा शहरी भागात सेवा देत असलेली संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच कोलमडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्वानंद’ अधिक नावारुपाला यावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिकरोड येथील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्था वैद्यकीय, अध्यात्मिक, धार्मिक व वैचारिक कार्यक्रम नियमित राबविणारी नामांकित संस्था आहे. ज्येष्ठांसाठी झटणारी ही संस्था अधिक नावारुपाला यावी, असे सदिच्छा नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी व्यक्त केली.
संस्थेची नववी सर्वसाधारण सभा स्वयंसिद्धा महिला विकास संस्थेच्या सभागृहात नुकतीच झाली. यावेळी ते बोलत होते. संस्थेच्या वतीने सदस्यांचे वाढदिवस, नामवंत, अभ्यासू व्यक्तींची व्याख्याने होतात, हे अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहेत. या संस्थेस सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन मोरुस्कर यांनी दिले. सभेत सचिव अविनाश गोसावी यांनी गेल्या वर्षीच्या इतिवृत्त व वार्षिक अहवालाचे वाचन केले. कोषाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी २०१६ ते २०१७ जमाखर्च व ऑडिट अहवाल, अंदाजपत्रकाचे वाचन केले. अध्यक्ष जे. डी. कुलकर्णी यांच्या हस्ते कामताप्रसाद, जी. के. नेभनांनी, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, मृदुलकुमार सोनकर व जी. डी. शिरसाट यांचा सत्कार केला. तसेच ७५ ते ८० वर्षे पूर्ण केलेल्या सदस्यांना गौरविण्यात आले.
आरती पुरी, ज्योस्त्ना पालकर, विमल एदलाबादकर, मंगला मोहरली, दीपाली भिंगारकर, वैदेही कुलकर्णी, कुंदा पंडित, अनघा जोशी यांनी पसायदानाचे गायन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पी. एम. भुरे, एस. जी. गाडे, पी. ए. बेंडाळे, दिलीप भिंगारकर, एस. व्ही. देशपांडे, अरुण देशपांडे, अनिल कुलकर्णी, एस. जी. पंडित आदींनी परिश्रम घेतले.

स्मरणिकेचे प्रकाशन
संस्थेतर्फे यंदा प्रथमच ‘स्मरणिका २०१७’चे प्रकाशन करण्यात आले. स्मरणिका निर्मितीसाठी दत्ता कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, श्रीकांत मोहरील, दीपाली भिंगारकर यांचे योगदान लाभले. भगवंत मोहरील, मृदुलकुमार सोनकर, जी. के. नेभनांनी यांनी संस्थेस देणग्या दिल्या. वय वर्षे ९५ असलेल्या मोहरील यांचा जे. डी. कुलकर्णी यांनी सत्कार केला. एस. आर. दैठणकर यांनी बहारदार बासरीवादन केले. डी. व्ही. मुळे यांनी सूत्रसंचालन केले. उपसचिव आर. पी. कुलकर्णी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाच्या माथी ४० लाखांचा खर्च

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक
द्वारका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) आणि वाहतूक पोलिसांनी नवा वाहतूक आराखडा तयार केला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी ४० लाखांचा खर्च येणार आहे. मात्र, हा खर्च आता महापालिकेच्या माथी मारण्याची तयारी या दोन्ही विभागांनी केली असून तसा प्रस्तावच महापालिकेला दिला आहे.

विशेष म्हणजे द्वारका चौकातील वाहतुकीचे विभाजन केले जाणार असून वाहनधारकांना इच्छित स्थळी पोहचण्यासाठी गोल गोल पिंगा घालावा लागणार आहे. उड्डानपुलाच्या त्रुटी दुरुस्तीसाठी कोट्यवधीचा खर्च करणाऱ्या ‘न्हाई’ला मात्र ४० लाखांचा खर्च डोईजड झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावर उड्डाणपूल बांधण्यात आला. मात्र, हा पूलच आता डोकेदुखी ठरला आहे. यातील तांत्रिक त्रुटींमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. द्वारका चौकातील आराखडा तर वाहतुकीसाठी शाप ठरला आहे. त्यामुळे या उड्डाणपुलातील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ६५ कोटीपेक्षा अधिकचा निधी मंजूर केला आहे. त्यात द्वारकातील कोंडी फोडण्याचाही समावेश आहे. परंतु, द्वारका चौकातील कोंडी फोडण्याचा खर्च न्हाई आणि शहर वाहतूक शाखेने महापालिकेच्या माथी मारण्याची तयारी सुरू केली आहे.

महापालिका आयुक्त, आमदार देवयांनी फरांदे आणि ‘न्हाई’च्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चर्चेनुसार द्वारका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक अन्य मार्गाने वळवली जाणार आहे. यासाठी न्हाई व पोलिसांनी संयुक्त कृती आराखडा तयार केला आहे. यात रस्ते वाहतुकीतील बदलासाठीचा खर्च महापालिकेने करावा, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा रस्ता ‘न्हाई’च्या अंतर्गत येत असतांनाही त्याचा खर्च महापालिकेच्या माथी मारण्याची तयारी केली आहे. त्यामुळे महापालिका या खर्चाबाबत काय भूमिका घेते? याकडे लक्ष लागून आहे.

द्वारका चौकात वाहतुकीचा गोल गोल पिंगा!
न्हाई व पोलिसांनी तयार केलेला आराखडा हा वाहतुकीला गोल-गोल पिंगा घालणारा आहे. नाशिकरोडकडून येणारी वाहने आता द्वारका येथून सरळ सीबीएस आणि धुळ्याकडे जातात. परंतु, नव्या प्रस्तावानुसार ही वाहने वडाळा चौकापर्यंत येऊन तेथून यू-टर्न घेणार आहेत. तर मुंबईकडून नाशिकरोडकडे जाणारी वाहने ही ट्रॅक्टर हाउसकडून यू-टर्न घेत नाशिकरोडकडे जाणार आहेत. सीबीएसकडून नाशिकरोडकडे जाणाऱ्या वाहनांनाही टाकळी रोडने वळवण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे वाहनांना बाहेर पडण्यासाठी गोल गोल फिरावे लागणार आहे. यातून वाहतूक कोंडी फुटणार की अधिक वाढणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीच्या साडेचार हजार जागा रिक्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
मुंबई-पुणेच्या धर्तीवर नाशिकमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. तब्बल नऊ प्रवेश फेऱ्या राबवूनही अकरावीच्या सर्व शाखा मिळून ४ हजार ५९८ जागा शिल्लक राहिल्या. एकूण २६ हजार ६०० पैकी २२ हजार २ जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. ऑनलाइन केंद्रीय प्रवेश पद्धत राबविण्याचा काय उद्देश व तो साध्य झाला का असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेसह देवळाली कॅन्टोन्मेंट हद्दीतील ५७ कॉलेजेसमध्ये यंदा प्रथमच केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने अकरावीचे प्रवेश देण्यात आले. यात विद्यार्थ्यांसह पालकांची फजिती झाली. प्रवेश मिळतो की नाही याची सर्वांनाच धाकधूक होती. मात्र, चार फेऱ्या आटोपल्यानंतरही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. त्यामुळे दोन विशेष फेऱ्या व त्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरही काही प्रवेश फेऱ्या राबविण्यात आल्या. तरीही संपूर्ण प्रवेश पूर्ण होऊ शकले नाही.

प्रक्रिया लांबल्याचा फटका
दहावीचा निकाल जाहीर होताच ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली. मात्र, ही प्रवेश प्रक्रिया २५ सप्टेंबरपर्यंत लांबली. कित्येक विद्यार्थ्यांचे प्रवेश पहिल्या चार फेऱ्यांमध्ये झाले नाही. त्यामुळे पुढे प्रवेश फेऱ्या होण्याची शाश्वती नसल्याने कित्येक विद्यार्थ्यांनी इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांस नाइलाजाने प्रवेश घेतले. परिणामी हजारो जागा रिक्त राहिल्या. ‘कट ऑफ’ही खूपच वर गेल्यानेही विद्यार्थी व पालक धास्तावून गेले होते.

रिक्त जागांमध्ये विज्ञान टॉपवर
रिक्त जागांमध्ये सायन्स शाखेच्या सर्वाधिक २ हजार १७५ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्याखालोखाल कॉमर्सच्या १ हजार ५०२ एमसीव्हीसी शाखेच्या ५८६ जागात रिक्त राहिलेल्या आहेत. सर्वांत कमी आर्ट्स शाखेच्या ३२५ इतक्या जागा रिक्त राहिल्या. गेल्या शैक्षणिक वर्षी शहरात अकरावीसाठी ४९ कॉलेजमध्ये २१ हजार ३२० इतक्या जागा होत्या. यंदा कॉलेजेस संख्या व जागांमध्ये वाढ झाली होती.

पसंतीनुसार विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश मिळाले आहेत. परंतु, यंदा आयटीआय व डिप्लोमा अभ्यासक्रमाकडे जास्त विद्यार्थ्यांनी ऐनवेळी प्रवेश घेतल्याने इयत्ता अकरावीच्या जागा रिक्त राहिल्या.
- दिलिप गोविंद, सहाय्यक शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पालक, विद्यार्थी व प्राचार्यांना आगाऊ माहिती असायला पाहिजे. नाशिकमध्ये तसे झाले नाही. शिक्षण खात्यातील अधिकारी शिक्षण संस्था, प्राचार्य यांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात कमी पडले. पालक व विद्यार्थ्यांना तर ही प्रवेश प्रक्रिया समजलीच नव्हती. सोयीचे कॉलेज न मिळाल्यानेही काही विद्यार्थ्यांनी प्रवेश टाळले.
- प्रवीण जोशी,
सचिव, साने गुरुजी शिक्षण मंडळ

शाखानिहाय प्रवेश
- आर्टस्.......४,६६५
- कॉमर्स.......७,४९८,
- सायन्स.......८,८२५
- एमसीव्हीसी.......१,०१४ असे
एकूण २२,००२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जन्मठेपेच्या कैद्याची वकिलांकडून फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानाची कारागृहातच कायद्याचे शिक्षण घेतलेल्या वकिलाने अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बंदीवानानेच ‘मटा’ला पत्र पाठवून आपली कैफियत मांडली आहे.
श्रीहरी राजलिंगम गुंटुका असे या बंदीवानाचे नाव आहे. खुनाच्या आरोपात मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवत श्रीहरीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, मागील सात वर्षांपासून तो नाशिक सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. श्रीहरीवर १९९२ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी त्याचे वय १७ वर्षे दोन महिने होते. श्रीहरीला ३ मार्च १९९३ रोजी जामीन मिळाला. त्यानंतर १२ वर्षे जामीनावर असलेल्या श्रीहरीला २००४ मध्ये कोर्टाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यानंतर त्याची रवानागी नाशिक सेंट्रल जेलमध्ये झाली. येथे श्रीहरीची ओळख हितेश पी. शहा नावाच्या कैद्याशी झाली. शहालाही खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झाली होती. दोघांची मैत्री झाली. या दरम्यान शहाने एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. शहा याने २०११ मध्ये सुटका झाल्यानंतर वकिली सुरू केली. शहा याने जून २०१६ मध्ये सेंट्रल जेलमध्ये पोहचून श्रीहरीची भेट घेतली. अल्पवयीन असताना गुन्हा झाल्याने सदर खटला पुन्हा सुरू करण्यासाठी शहा यांनी श्रीहरीकडून जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला तसेच ५० हजार रुपये मागितले. सुटका झाली नाही तर सर्व पैसे परत देण्याचे आश्वासन त्याने दिले. इतक्या वर्षांची ओळख असल्याने श्रीहरीने पत्नीला फोन करून त्वरित ५० हजार रुपये देण्यास सांगितले. त्यानुसार पत्नीने शहा यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले. यानंतर साधारणतः एक महिन्यानंतर शहा याने श्रीहरीची पुन्हा भेट घेतली. हायकोर्टातून तुझा खटला सत्र न्यायालयात आला असून, त्याची बाल न्यायालयासमोर सुनावणी होणार असल्याचे शहाने सांगितले. तसेच, सर्व बाबी मॅनेज करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. सुटका होण्याच्या अपेक्षेने श्रीहरीसह त्याच्या पत्नीने दोन लाख रुपयांची जुळवाजुळवा करीत पैसे शहाच्या स्वाधीन केले. मात्र, शहा याने मुंबईत कोणत्यातरी एका वकिलाला दहा हजार रुपये देऊन केस सुपूर्द केली. यानंतर परत शहा याने संपर्क ठेवला नाही. शहा आपल्या पत्नीचे फोन स्वीकारत नाही. पाठविलेल्या कोणत्याही पत्राला उत्तर दिले नाही, असे आरोप श्रीहरीने केले आहेत. अल्पवयीन असताना झालेल्या चुकीची शिक्षा कुटुंब भोगत असून, पत्नीने कष्टाने कमावलेल्या पैशांवर डल्ला मारण्यात आल्याची खंत श्रीहरीने पत्राद्वारे व्यक्त केली आहे. पैसे परत मिळण्यासाठी शहा याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी श्रीहरीने केली आहे. दरम्यान, या आरोपांबाबत हितेश शहा यांच्याशी संपर्क केला असता त्याने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

सदर प्रकरण मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे. त्यावर वेळेनुसार सुनावणी सुरू होईल. तसेच, काही तांत्रिक कारणांमुळे मागील काही महिन्यांपासून श्रीहरीशी भेट झालेली नसली तरी त्याचे काही नातेवाईक माझ्या संपर्कात असतात.
- हितेश शहा, वकील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेच्या मोर्चाला नाशिकमधून बळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
मुंबईत एल्फिस्टन-परळ स्टेशनावर दुर्दैवी घटनेच्या निषेधार्त व बुलेट ट्रेनच्या वतीने येत्या ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात येणार आहे. महामोर्चात नाशिकचेही मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असून त्याची रणनिती मंगळवारी मनसेच्या कार्यालयात ठरवण्यात आली आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने नाशिकचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राहुल ढिकले यांनी दिली आहे.
मनसेने येत्या ५ ऑक्टोबर रोजी चर्चगेट येथील रेल्वेच्या ऑफिसवर धडक महामोर्चा ची हाक दिली आहे. नाशिकमधून हजारो मनसैनिक या मोर्चात सामील होणार आहेत. त्यासाठी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर पदाधिकारी सहकारी, कार्यकर्ते यांची बैठक मनसे मध्यवर्ती कार्यालय येथे मनसे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राहुल ढिकले, माजी महापौर अशोक मुर्तडक, मनसे गटनेते सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अॅड.रतनकुमार इचम, नगरसेवक योगेश शेवरे, माजी गटनेते अनिल मटाले यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी शहरातून मोर्चासाठी हजारो मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते जाणार आहेत. त्या संबंधात शहर व जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठकीत चर्चा झाली. विभाग अध्यक्ष अनंता सूर्यवंशी, अंकुश पवार, प्रकाश कोरडे, खंडेराव मेढे, रामदास दातीर, सचिन भोसले, नितीन साळवे, भैय्या मणियार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images