Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

​ वर्षभरापासून वांगी खाताहेत भाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

भाजीपाल्यामध्ये जास्त मागणी असलेल्या वांगी या भाजीचे भाव गेली वर्षभरापासून टिकून आहे. विविध प्रकारच्या वाणांची उपलब्धता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत होत असते. वर्षभर पिकणाऱ्या या भाजीच्या उत्पादनात यंदा घट झालेली असल्याने त्याची मागणी आणि दर वाढलेले आहेत. वर्षभरापासून वांग्यांची अशी स्थिती असल्याने वांगी उत्पादकांना चांगला फायदा झालेला आहे.

साधारणतः सर्वच प्रकारच्या जमिनीमध्ये वाढणाऱ्या वांगी पिकाची लागवड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात घेतले जाते. यंदा या वांगीची लागवड मर्यादित झालेली होती. त्यात पावसामुळे आणि रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने वांगी पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. लग्नसराईत वांग्यांचा चांगली मागणी असते. तसेच परपेठेतही मागणी वाढत असल्याने त्या तुलनेत यंदा उपलब्धता होऊ शकलेली नाही. त्यामुळे सर्वच प्रकारच्या वांगी वाणांना यंदा चांगला दर मिळत आहे. परतीच्या जास्त प्रमाणात पडलेल्या पावसाने अनेक भागातील वांगी पिकाला फटका बसला असल्यामुळे वांगी पिकाला किमान महिनाभर चढा दर मिळण्याची शक्यता आहे.

अशी आहे वांग्यांची व्हरायटी

विकसित झालेले वाण आणि वाढलेली उत्पादन क्षमता यामुळे वांगी पिकालाही तार-अंगलची आवश्यकता भासू लागली आहे. द्राक्ष मंडपाप्रमाणे वांगी पिकासाठीही मंडप उभारण्यात येत आहेत. काळे बंगाळे, भरतासाठीचे गॅलन, पंचगंगा, छोटे लाल, मंजरी, मेघना, हिरवे अशा विविध वाणांची वांगी नाशिक बाजारात उपलब्ध होत आहेत. त्यात हिरवी वांगी ही प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातून येतात. सध्या तिची आवक अत्यल्प आहे. नाशिक जिल्ह्यातून पंचगंगा या वाणांची आवक चांगली आहे. या वाणांना बाजार समितीच्या लिलावात ४० ते ७० रुपये प्रति किलो असे दर मिळत आहेत. काळे गोल, काळे लांब अशा विविध आकारातील आणि प्रकारातील वांगी भाजीची चवही वेगवेगळी असते.

विविध प्रकारच्या वाणांची वांगी नाशिक जिल्ह्याच्या विविध भागातून होत असते. लाल छोटे वांगी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर परिसरातून नाशिकला विक्रीस येते. मागणी चांगली असल्याने यंदा वांगी पिकाचे भाव ४० ते ६० रुपये प्रति किलो असे टिकून आहेत.
- रंजन शिंदे, अडतदार

वांगी वाण.................दर प्रति किलो
बंगाळे .....................२५ ते ५०
गॅलन-भरीत................२५ ते ६०
पंचगंगा......................४० ते ७०
छोटे लाल....................४० ते ६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेतन आयोगाचे मृगजळ

$
0
0

मटा फोकस
--

वेतन आयोगाचे मृगजळ

--

दिवाळीच्या तोंडावरच केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशभरातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू केल्याची घोषणा केली. राज्यातील प्राध्यापकांनाही या घोषणेचा लाभ होण्यासाठी राज्य सरकारचा दुजोरा गरजेचा होता. मात्र, या घोषणेला महिना उलटत येऊनही सारेकाही आलबेल आहे. परिणामी राज्यातील प्राध्यापकांसाठी सातव्या वेतन आयोगाची घोषणा केवळ मृगजळ ठरत असल्याचे वास्तव आहे. या घोषणेचा लाभ केवळ केंद्रीय विद्यापीठांमधील प्राध्यापकांना होणार असल्याची तज्ज्ञांची प्रतिक्रिया आहे. या विषयावर टाकलेला हा फोकस...

---

‘सुखद’ घोषणेबाबत संभ्रम

दिवाळीभेट अशा मथळ्याखाली केंद्राने प्राध्यापकांसाठी सातव्या वेतन आयोगाची घोषणा करताच शैक्षणिक वर्तुळात आशेचे वातावरण होते. मात्र, प्राध्यापक संघटनेला विचारात न घेता करण्यात आलेल्या या ‘सुखद’ घोषणेने प्राध्यापकवर्गाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. त्यामुळे केंद्राची घोषणा अंतिम न मानता त्यावर राज्याचीही प्रतिक्रिया जाणून घेणे निर्णायक अर्थापर्यंत पोहोचण्यासाठी गरजेचे होते. मात्र, राज्य सरकारने या विषयावर कुठलीही प्रतिक्रिया किंवा निर्णय जाहीर करण्याचे सरळपणे टाळल्याने राज्यातील प्राध्यापकांसाठी ही घोषणा केवळ मृगजळ असल्याचा अन्वयार्थ प्राध्यापक संघटनांनी काढला आहे. अर्थात, ती वस्तुस्थितीही आहे.

--

अगोदर लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना

प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारीवर्गाच्या वेतनरुपी अनुदानाचा भार केंद्र सरकार ८० टक्के, तर राज्य सरकार २० टक्के याप्रमाणे उचलते. आजवर कधीही विविध उच्च शिक्षण संस्था किंवा विद्यापीठांमध्ये कार्यरत प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारीवर्गास केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबतच वेतन आयोग लागू झालेला नाही. तसा तो लागू होतही नाही. कारण, प्राध्यापकांना वेतन आयोग लागू करण्याची ‍प्रक्रिया केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत वेगळी आहे. कारण, वेतन आयोग लागू होतो अगोदर केंद्रीय कर्मचाऱ्यांना, नंतर प्राध्यापकांना.

--

असा लागू होतो वेतन आयोग

कुठलाही वेतन आयोग प्रथमत: लागू होतो तो केंद्रीय कर्मचाऱ्यांना. त्यानंतरच्या टप्प्यात या वेतन आयोगातील तरतुदी विविध विद्यापीठे आणि संस्थांतर्गत काम करणाऱ्या लागू व्हावेत का, या तपासणीसाठी केंद्राकडून तज्ज्ञांची समिती गठित होते. ही समिती आयोग लागू करण्याबाबत शिफारशी आणि आपला अहवाल सुमारे सहा महिन्यांत सादर करते. त्यानंतरच्या टप्प्यात केंद्रीय मंत्रिमंडळ त्यातील योग्य वाटणाऱ्या तरतुदींना मंजुरी देते. यानंतरही संबंधित राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची ठरती. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून दिलेल्या मंजुरीतील राज्य सरकारला अनुकूल असणाऱ्या तरतुदींवरच अंतिम शिक्कामोर्तब होते. त्यामुळे केंद्राकडून शिफारस असली, तरीही राज्याच्या अनुकूलतेशिवाय आयोग आणि त्यातील तरतुदी लागू होणे शक्य नसते. राज्याची आर्थिक स्थिती विचारात घेऊन यासंदर्भातील निर्णयावर शिक्कामोर्तब होत असल्याने मंत्रिमंडळ व अर्थखात्याची भूमिका अत्यंत मोलाची ठरते.

--

राज्याच्या समितीवर मदार

ज्याप्रमाणे वेतन आयोग लागू होण्यासाठी अगोदर केंद्रीय कर्मचारी आणि नंतर प्राध्यापक त्याचप्रमाणे राज्यात अगोदर सरकारी कर्मचारी आणि नंतर राज्यातील प्राध्यापक असा क्रम आहे. त्यामुळे राज्याने नियुक्त केलेल्या चव्हाण समितीने केंद्राला शिफारशींसह अहवाल सादर केला आहे. या अहवालावर अद्याप कार्यवाही नाही, की त्याबाबत चर्चेसाठी प्राध्यापकांच्या प्रतिनिधींनाही आमंत्रित करण्यात आलेले नाही. त्यामुळे या समितीच्या शिफारशी आणि अहवालावर काय कार्यवाही होणार यावरच भविष्यातील वेतन आयोग निश्चिती आणि प्रत्यक्षात लाभासंदर्भातील मदार अवलंबून असणार असल्याचे ‘एसपुक्टो’ संघटनेचे नाशिक जिल्हा सहचिटणीस प्रा. डॉ. धीरज झाल्टे यांनी सांगितले.

--

संपकालीन वेतनासाठीही झुंजविले

प्राध्यापकवर्गाला वेतन आयोगाच्या मागणीसाठी वारंवार आंदोलने करावी लागल्याचा इतिहास आहे. ‘एमफुक्टो’ने काही वर्षांपूर्वी दीर्घकाळ केलेल्या संपकाळाचे वेतन कापले गेले. या वेतनाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी सरकारच्या काळात प्राध्यापकांच्या संघटनांना कोर्टाची पायरी चढावी लागली. त्यादरम्यान विरोधी पक्षातील नेते विनोद तावडे यांनी आम्हाला सत्ता द्या, तुमचा फरक नक्की देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, सरकार आल्यावर स्वत:कडे शिक्षण खाते येऊनसुद्धा शिक्षणमंत्री तावडे यांनी प्राध्यापकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असे ‘एमफुक्टो’चे कार्यकारी सदस्य आणि ‘एसपुक्टो’चे उपाध्यक्ष प्रा. डॉ. नंदू पवार यांनी सांगितले.

--

प्राध्यापकांना वेतनश्रेणी जास्त का?

अध्यापनाचे कार्य करणाऱ्या प्राध्यापकवर्गासाठी वेतनश्रेणी जास्त ठेवली जाणे व्यवस्थेत का अपेक्षित आहे, असाही मुद्दा सातव्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहे. या संदर्भात प्राध्यापकवर्गाकडून ‘मटा’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता नव्या पिढीला आपापल्या क्षेत्रातील गुणवत्ता आणि दर्जेदारपणा बहाल करण्यासाठी उच्च शैक्षणिक पात्रता धारण करणे, ज्ञान सातत्याने अद्ययावत ठेवणे, बौद्धिक कसोटीवर स्वत:ला सिद्ध करणे यांसारख्या प्रमुख कारणांवर मेहनत घेण्यासाठी अनुकूल वातावरण प्राध्यापकांभोवती निर्माण व्हावे, असा चांगली वेतनश्रेणी देण्यामागील उद्देश असतो, असे अधोरेखित झाले.

--

इतर समस्यांचाही व्हावा विचार

प्राध्यापकांकडून समाजाच्या अपेक्षा मोठ्या आणि रास्तही आहेत. मात्र, केवळ वेतन आयोग इतका एकमेव मर्यादित प्रश्न या समूहाचा नाही. याशिवाय योग्य वेतन आयोगाच्या अंमलबजावणीस होणारा उशीर असो किंवा सेट-नेट निकषांविषयीचा प्रलंबित प्रश्न असो याशिवाय पेन्शन योजना, मेडिकल बिल, भरतीप्रक्रिया, बहिष्कार आंदोलन काळातील वेतनाची मागणी, करिअर अॅडव्हान्समेंट स्कीम यांसारख्या जाचक अटी, ऑनलाइन व ऑफलाइन वेतन प्रणालीच्या समस्या आदी प्रश्न प्रलंबित आहेत.

--

प्राध्यापकांचा लढा सातत्याने सुरूच

विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी प्राध्यापकांचा सातत्याने लढा सुरू आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून या महिन्यात २७ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत शिर्डी येथे अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाच्या वतीने अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून या अधिवेशनासाठी प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व प्रलंबित प्रश्नांवर मंथन होऊन संघटनेच्या पुढील धोरणांची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. नंदू पवार यांनी दिली.

--

केंद्रीय मंत्रिमंडळाने दिवाळीच्या तोंडावर प्राध्यापकांसाठी लागू केलेली सातव्या वेतन आयोगाची घोषणा राज्यातील प्राध्यापकांना लागू होणारी नाही. केवळ केंद्रीय विद्यापीठांसाठी तिचा उपयोग होईल. राज्यातील प्राध्यापकांसाठी नियुक्त चव्हाण समितीच्या शिफारशींवर अद्याप कुठलीही कार्यवाही किंवा चर्चाही नाही. एकंदरीत या प्रकरणाचा अभ्यास करता अजून दोन वर्षे तरी राज्यातील प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा करावी लागेल, असे सद्यःस्थितीवरून दिसते. अर्थात, ती ही केवळ शक्यतेची भाषा आहे.

-प्रा. डॉ. धीरज झाल्टे, जिल्हा सहचिटणीस, ‘एससपुक्टो’

--

केंद्रीय मंत्रिमंडळाने प्राध्यापकांसाठी केलेली घोषणा केवळ केंद्रीय विद्यापीठांसाठी मर्यादित आहे. केंद्राच्या घोषणेनंतर राज्याने या निर्णयावर कुठलाही निर्णय वा प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील प्राध्यापकांना या निर्णयाचा लाभ होणार नाही. सरकारने राज्यातील प्राध्यापकांच्या वेतन आयोगासह प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्राध्यापकांनाही मागण्यांसाठी संघटितपणे लढा सुरू ठेवावा लागेल.

-प्रा. डॉ. नंदू पवार, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ

--

संकलन : जितेंद्र तरटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांचा एकतेचा संदेश

$
0
0

सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड; शहरभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती अर्थात राष्ट्रीय एकता दिवस’ निमित्ताने शहरात एकता दौड घेण्यात आली. शेकडो नाशिककरांनी या दौडमध्ये सहभागी होऊन एकात्मतेचा संदेश दिला.

विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या या एकता दौडला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. ‘एकता दौड’चा शुभारंभ झाला. याप्रसंगी मान्यवरांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, महसूल उपायुक्त रघुनाथ गावडे, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आदी उपस्थित होते.

राष्ट्राची एकतेसाठी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताला एक, अखंड राष्ट्राचे रुप देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी असा संदेश झगडे यांनी रॅलीच्या समारोप प्रसंगी दिला. दौडची सुरुवात शिवाजी स्टेडिअम येथून करण्यात आली. सीबीएस, जुना आग्रा रोड, त्र्यंबक नाका, सिव्हील हॉस्पीटल समोरून जावून गोल्फ क्लब मैदानावर रॅलीचा समारोप झाला. सरकारी अधिकारी कर्मचारी, एनसीसी, होमगार्ड, पोलिस दल, स्पोर्टस क्लब आणि विविध संस्थाचे सदस्य व नागरिकांचा या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

एकात्मतेची शपथ

सिन्नर फाटा : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती मंगळवारी (दि. ३१) येथील विभागीय महसूल आयुक्तालयात साजरी करण्यात आली. या निमित्ताने राष्ट्रीय एकतेची शपथ विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी दिली. यावेळी अप्पर आयुक्त ज्योतीबा पाटील,उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, सुखदेव बनकर, पी. एन. मित्रगोत्री, ज्ञानेश्वर खिल्लारे यांच्यासह विभागीय कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नाशिक : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनअंतर्गत राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय एकता दौडचा शुभारंभ छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी झेंडा दाखवून केला. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त हरीभाऊ फडोळ यांच्यासह महापालिकेतील व विविध प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशासाठी कलेची साधना आवश्यक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर यश-अपयश वाट्याला येते. कलाकाराबरोबरच उत्तम माणूस असणे महत्त्वाचे आहे. दैनंदिन जीवनात वावरताना विद्यार्थ्यांनी आपल्या डोळयासमोर विशिष्ट व्यक्तींचा आदर्श ठेवणे तितकेच आवश्यक बनले आहे. अंगात ऊर्जा आणि उत्साह असला तरी कला क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर कलेची साधना आवश्यक आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री नेहा जोशी यांनी मंगळवारी बोलताना व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने आयोजित युवक केंद्रीय महोत्सवाचे उदघाटन अभिनेत्री जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, वित्त अधिकारी मगन पाटील, कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन, विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्राच्या प्रमुख डॉ. विजया पाटील होत्या.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नेहा जोशी म्हणाल्या, की नाटक किंवा अभिनय डोक्यात असतो. त्यामुळे आपापल्या कालागुणांवर विश्वास ठेवा. आपल्यातील गुणांचा वापर होणाऱ्या घटकांशी सामावून घेतल्यास यश निश्चित मिळते. क्षेत्र कोणतेही निवडा, त्यात यश मिळवायचे असेल तर कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही. अभिनय क्षेत्रही त्याला अपवाद नाही. अभिनयात तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुम्ही किती कसदार अभिनय करता, याची पारख आधी होत असते. तुम्ही तुमच्या कामातून प्रतिबिंबित व्हा आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. आज मला मिळालेले यश हे प्रेक्षकांनी दिलेल्या कौतुकाची पावती आहे. कला क्षेत्रात आज आपण स्थिरावलो असलो तरी मुक्त विद्यापीठानेच आपल्याला प्रथम संधी दिली असून, काही दिवसांपूर्वीच सावित्रीबाई फुले यांचे पात्र साकारल्याने शिक्षण घेण्याची आवड निर्माण झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

आपल्या कामावरची निष्ठा आणि श्रद्धा कायम जोपासणे गरजेचे असून, आजकालच्या परिस्थितीत माणसे वाचणे अधिक महत्त्वाचे बनले आहे. जीवनात यशाची शिखरे पादाक्रांत करायची असल्यास योग्य संधी आणि योग्य वेळ मिळून यावी लागते, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. कलाकार आणि खेळाडूंसाठी मुक्त विद्यापीठाच्या विविध संधी उपलब्ध असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना युवक महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या व मुक्त विद्यापीठ समाजातील विविध घटकांसाठी खुल्या केलेल्या शिक्षणाच्या संधींचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कलेबरोबरच आज शिक्षणही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुलगुरू प्रा. वायुनंदन यांनीही या वेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

पुढील वर्षी ‘इंद्रधनुष्य’चे यजमानपद

प्रास्ताविक करताना प्रा. विजया पाटील म्हणाल्या, की शिक्षणाबरोबरच क्रीडा-कला क्षेत्रालाही प्रोत्साहन देणारे हे एकमेव मुक्त विद्यापीठ आहे. दूरःस्थ शिक्षण पद्धतीने शिकणारे या विद्यापीठाचे विद्यार्थी कलेची साधना करीत इथपर्यंत येऊन पोहोचले आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ इथेच न थांबता आपल्या मुक्त विद्यापीठाचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत झळकवतील, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या इंद्रधनुष्यचे यजमानपद मुक्त विद्यापीठाकडे असल्याने नाशिकमध्येच तो पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सर्व विभागीय केंद्रांनी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यावर भर द्यावा, असे त्या म्हणाल्या.

कुलगुरू प्रा. वायुनंदन यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. प्रारंभी कुलसचिव डॉ. भोंडे यांनी स्वागत केले. विवेक अहिरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्याम पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विजया पाटील यांनी आभार मानले. केंद्रीय युवक महोत्सवात राज्यभरातून विविध विभागीय केंद्रातील १२५ स्पर्धकांनी १७ कला प्रकारांत सहभाग नोंदवला. या महोत्सवांतर्गत एकांकिका स्पर्धा, मूक अभिनय, विडंबन नाट्य, गायन, वादन, चित्रकला, रांगोळी, फोटोग्राफी, वादविवाद, नृत्य, वक्तृत्व, रांगोळी आणि प्रश्नमंजुषा अशा विविध १७ प्रकारच्या स्पर्धा या वेळी झाल्या.

बाळ नगरकर, मिलिंद देशमुख, श्याम पाडेकर, सुनील देशपांडे, मकरंद हिंगणे, शुभांजली पाडेकर, आनंद अत्रे, सुमुखी अथनी, हसन इनामदार, ऋषिकेश अयाचित, अवी जाधव, हर्षद वडजे, रवींद्र राजोरीकर, माणिक कानडे आदी परीक्षक होते. निवड झालेले विद्यार्थी परभणी येथे ५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या इंद्रधनुष्य या आंतरविद्यापीठीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

स्पर्धांचा निकाल ः

शास्रीय तालवाद्य ः श्याम तांबे, कोल्हापूर विभागीय केंद्र

भारतीय सुगम संगीत ः चेतन बनसोड, नागपूर विभाग

शास्रीय नृत्य ः श्रावणी शेलार, पुणे विभाग

मिमिक्री ः अनिकेत कोकाटे, औरंगाबाद विभाग

प्रश्नमंजुषा ः श्रुतिका लड्डे, दीपाली माणगावे, कोल्हापूर विभाग

वक्तृत्व ः अंकिता साळुंके, पुणे विभाग

रांगोळी ः पूजा अमझरे, अमरावती विभाग (प्रथम)

पोस्टर ः ज्योती चव्हाण, नाशिक विभाग (प्रथम)

कोलाज ः प्रतीक जाधव, कोल्हापूर विभाग (प्रथम)

स्पॉट पेंटिंग ः आकाश व्हटकर, कोल्हापूर विभाग (प्रथम)

स्पॉट फोटोग्राफी ः प्रसाद पवार, नाशिक विभाग (प्रथम)

मृदू मूर्तिकला ः आकाश कंकाळ, नाशिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रायथलॉन स्पर्धेत नाशिकचा झेंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोल्हापूर स्पोर्टस् क्लबतर्फे रविवार २९ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत नाशिकच्या तीन खेळाडूंनी बाजी मारली. विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण करण्याचा मान या खेळाडूंनी मिळवला आहे. दीपक भोसले, डॉ. दुष्यंत चोरडीया, महेंद्र छोरीया या खेळाडूंचा समावेश होता.

ही स्पर्धा कोल्हापूर येथील राजाराम तलाव येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्णं भारतातून ६३० स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील उपस्थित होते. स्पर्धेला सकाळी ६ वाजता सुरुवात झाली. ही स्पर्धा हाफ आर्यन मॅन, ऑलिम्पिक व स्प्रिंन्ट डिस्टन्स अशा तीन प्रकारात घेण्यात आली. तसेच डुअथलॉन स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. नाशिकच्या तीनही खेळाडूंनी ऑलिम्पिक या प्रकारात वर्चस्व सिद्ध केले. दीपक भोसले यांनी ही स्पर्धा ४ तास १५ म‌निीटांत, दुष्यंत चोरडीया यांनी ३ तास ३० म‌निीटांत, महेंद्र छोरीया यांनी ३ तास ३ म‌निीटांत पूर्ण केली. या प्रकारात पोहणे १.५ किलोमीटर, सायकलिंग ४० किलोमीटर, धावणे १० किलोमीटर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट या त‌घिांपुढे होते.

नाशिकमध्ये ट्रायथलॉन स्पर्धेसाठी अत्यंत चांगले वातावरण आहे. क्रीडा विभागाने अशा स्पर्धा नाशिक मध्ये आयोजित केल्यास नाशिकच्या क्रीडा विकासाला चांगला बुस्ट मिळेल व बाहेरील स्पर्धक नाशिक मध्ये येतील.

- महेंद्र छोरीया, समन्वयक, रिव्होलिशन ग्रुप नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड कारागृहाला सोसवेना ‘कैदीभार’

$
0
0

नगर, औरंगाबादचे कैदी आल्याने वाढला ताण

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

आधीच कैद्यांनी ओव्हर फ्लो झालेल्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आता नगर व औरंगाबादच्या कैद्यांची भर पडू लागली आहे. नगर व औरंगाबाद जेलचे बांधकाम सुरू झाल्यामुळे तेथील कोर्टाने काही कैदी नाशिकरोड कारागृहात वर्ग केले आहेत. त्यामुळे प्रशासनावरील ताण वाढला असून, सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

नगरच्या जेलमध्ये बराकीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे तेथील कोर्टाने साठ कैदी नाशिकला वर्ग केले आहेत. नेवासा, राहुरी, शिर्डी, श्रीरामपूर येथील कैदीही वर्ग होत आहेत. असे एकूण शंभरावर कैदी येथे आले आहेत. नगरच्या चार कैदी पार्टी रोज येथे येत असतात. औरंगाबाद जेलचेही काम सुरू आहे. त्यामुळे मराठवाड्यातील कैदी तेथे ठेवण्यात अडचणी येत असल्याने तेथील कैदीही नाशिकला वर्ग होत आहेत.

उदंड झाले कैदी

राज्यात नाशिकसह नऊ मध्यवर्ती कारागृहे, ३२ वर्ग एकचे कारागृहे तसेच प्रत्येक तहसीलला सबजेल आहे. पैठण, नाशिक, मुळशी, विसापूर आदी तेरा ठिकाणी खुली कारागृहे आहेत. नाशिकरोड कारागृहाची मूळ क्षमता पंधराशे असताना ३१७८ दाखवली आहे. मात्र, ३१ ऑक्टोबर १७ रोजी एकूण ३२९२ कैदी आहेत. त्यात महिलांचे प्रमाण दुप्पट (११४) झाले आहे. एकूण कैद्यांमध्ये शिक्षा झालेले २०८९ तर न्यायाधीन १०५१ कैदी आहेत. जन्मठेप झालेले १८९०, पळपुटे ६१, वार्डर ७१, स्थानबध्द २८, विदेशी ९ कैदी आहेत.

कारागृहाच्या समस्या

क्षमतेपेक्षा जास्त कैदी संख्या, कैदी सुरक्षेचा प्रश्न गंभीर, अपुरी कर्मचारी संख्या, जॅमरही कमी दर्जाचे, कैद्यांना कोर्टात नेण्यासाठी पोलिस पार्टी मिळणेही अवघड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकच्या मतदारयाद्या जाहीर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम मतदारयाद्या मंगळवारी प्रसिद्ध झाल्या असून, आता कोणत्याही क्षणाला आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. १७ डिसेंबर रोजी विद्यमान पंचवार्षिक मुदत संपुष्टात येत आहे. निवडणूकप्रक्रियेचा कालावधी लक्षात घेता, या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम अधिसूचना जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

प्रारूप मतदार याद्या १० ऑक्टोबर रोजी जाहीर झाल्या होत्या व त्यानंतर हरकती सूचना पूर्ण होऊन मंगळवारी अंतिम याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. नगरपालिका कार्यालयात त्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत व अवलोकनार्थ ठेवण्यात आल्या आहेत. त्र्यंबकेश्वरची एकूण मतदारसंख्या १०,६१४ आहे. यामध्ये मृत आणि दुबार नावे वगळता प्रत्यक्षात मतदारसंख्या दहा हजार असेल. त्यात पुन्हा बाहेरगावची नावे दीड ते दोन हजारांच्या दरम्यान आहेत. याबाबत काही नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील अशी नावे कमी करण्यात यश आलेले नाही.

मतदारसंख्या अशी (कंसात प्रारूप आकडेवारी)
प्रभाग क्रमांक १ ः १३९० (पूर्वी १३९७), प्रभाग २ ः १२०५ (पूर्वी ११५९), प्रभाग ३ ः ९९४ (पूर्वी १०२३), प्रभाग ४ ः १००० (पूर्वी १०३२), प्रभाग ५ ः १६७५ (पूर्वी १६९८), प्रभाग ६ ः १२५९ (पूर्वी १२२३), प्रभाग ७ ः १६१५ (पूर्वी १५६०), प्रभाग ८ ः १४७६ (पूर्वी १५२२)

शहराची एकूण मतदारसंख्या १०,६१४ इतकी आहे. यामध्ये ५४२३ महिला आणि ५१९१ पुरुष मतदार आहेत. प्रभागरचना लोकसंख्येच्या आधारावर झालेली आहे. तथापि प्रभाग पाचमध्ये सर्वाधिक मतदारसंख्या आली आहे, तसेच प्रभाग क्रमांक ८ मध्ये तीन सदस्य असताना मतदारसंख्या मात्र तीन क्रमांकाची आहे. हरकती व तक्रारींमध्ये केवळ या प्रभागातील नाव त्या प्रभागात आले म्हणून शहानिशा करून बदलण्यात आले आहे; अन्यथा कोणतेही नाव कमी करण्यात आलेले नाही. मृतांची नावे, दुबार नावे कायम आहेत. ते बदलण्याचा अधिकार येथे नसल्याचे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बियाणे विक्रेत्यांची संपातून माघार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संपूर्ण महाराष्ट्रात बी- बियाणे विक्रेत्यांनी पुकारलेल्या बंदमधून नाशिकमधील विक्रेत्यांनी माघार घेतली आहे. महाराष्ट्र सरकारने कृषी मालावर फवारणी केल्या जाणाऱ्या काही औषधांवर बंदी आणली होती. ती बंदी संपूर्ण राज्यात सरसकट लागू करण्यात आली.

महाराष्ट्रात सर्वच औषधे व सर्वच ठिकाणी वापरली जात नाहीत. सध्या पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे शेतीची कामे जोरात आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना बी- बियाणे व औषधे न मिळाल्यास त्याचा परिणाम उत्पादनावर होईल. परिणामी, शेतकऱ्यांना उत्पन्न कमी मिळेल म्हणून उत्तर महाराष्ट्रातील बी- बियाणे विक्रेत्यांनी मंगळवारी दुपारी संपातून माघार घेत असल्याची माहिती विक्रेता संघाचे विजय पाटील यांनी दिली आहे. विक्रेत्यांची दुपारी बैठक आयेजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाट्य परिषदेतर्फे पुरस्कार जाहीर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार मंगळवारी जाहीर करण्यात आले. जागतिक रंगभूमी दिनाच्या दिवशी, ५ नोव्हेंबरला सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर प्रमुख पाहुणे असतील. पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.

दत्ता भट स्मृती पुरस्कार अभिनय पुरुषसाठी ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, शांता जोग स्मृती पुरस्कार अभिनय स्त्रीसाठी ज्येष्ठ रंगकर्मी नीता कोठेकर, प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार दिग्दर्शनासाठी अतुल पेठेकर, गिरिधर मोरे स्मृती पुरस्कार प्रकाशयोजनासाठी ज्येष्ठ रंगकर्मी सतीश सामंत, जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार सांस्कृतिक पत्रकारितेसाठी नंदकुमार टेणी, रामदास बरकले स्मृती पुरस्कार लोककलेसाठी बबनराव घोलप, वा. श्री. पुरोहित स्मृती पुरस्कार बालरंगभूमीसाठी ज्येष्ठ रंगकर्मी शीला सामंत यांना, तर रावसाहेब अंधारे स्मृती पुरस्कार नेपथ्यासाठी आनंद ढाकीफळे यांना जाहीर करण्यात आला. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

नाट्य परिषदेतर्फे होत असलेल्या रंगभूमीदिनाच्या कार्यक्रमात कीर्ती कलामंदिरातर्फे नांदी सादर करण्यात येणार आहे. या वेळी नटराजपूजन होईल. पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर संगीत देवबाभळी या नाटकाचे सादरीकरण होईल. नाट्य परिषदेतर्फे काही विशेष योगदान पुरस्कारही देण्यात येणार आहेत. त्यात संजीवनी कुलकर्णी, रेखा नाडगौडा, विद्या देशपांडे व मीरा धानू यांचा समावेश आहे. दिवंगत रंगकर्मींच्या वारसांचा सन्मान या वेळी करण्यात येणार आहे. यात प्रसाद रहाणे, मयुरी सिन्नरकर, पूजा साळवे, वैष्णवी भडकमकर, अक्षय तिवारी, विकास दातार, शुमदा भडकमकर यांचा समावेश आहे. विशेष सत्कारात ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर यांना राज्य नाट्य स्पर्धेत ५० व्या नाटकाबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे, तर संगीत देवबाभळी या नाटकातील कलावंतांचा, विजय साळवे व महेश डोकफोडे यांचा सत्कारही या वेळी होणार आहे. पुरस्कार निवड समितीत प्रा. रवींद्र कदम, सुनील ढगे, रवींद्र ढवळे, विवेक गरूड, प्रदीप पाटील यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचा कहर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाने उसंत दिली तरी डेंग्यूचा प्रकोप कमी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. ऑक्टोबर महिन्यातील डेंग्यू रुग्णांची संख्या वर्षभरातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे ३७२ संशयित रुग्ण आढळले असून, त्यापैकी तब्बल १४३ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नाशिककरांच्या आरोग्याला धोका वाढला आहे.

महापालिकेच्या वतीने डेंग्यू आणि स्वाइन फ्लूसंदर्भातील उपाययोजना कागदावरच असल्याचे वाढलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. यंदा स्वाइन फ्लूपाठोपाठ डेंग्यू आजाराची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. यंदा जोरदार पाऊस कोसळला. ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचली. त्यात डेंग्यू डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे डेंग्यू डासांची उत्पत्तिस्थाने वाढतच गेली. परिणामी, डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत गेली. ऑगस्ट महिन्यात डेंग्यू आजाराची साथ शहरात मोठ्या प्रमाणावर फैलावली. महिन्यात या आजाराची लागण झालेल्यांची संख्या ९७ वर गेली. सप्टेंबर महिन्यात ती आणखी वाढून १०५ वर पोहोचली, तर ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक १४३ जणांना डेंग्यूची लागण झाली. ऑक्टोबरमध्ये संशयितांचा आकडा पावणेचारशेपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे डेंग्यूची तीव्रता लक्षात येते. एक जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल १०४४ जणांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे समोर आले होते. या सर्व रुग्णांच्या रक्त नमुन्यांची शासकीय प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्यात आल्यानंतर त्यापैकी ३९९ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सिडको विभागात डेंग्यू रुग्णांची संख्या सर्वाधिक १२९ असल्याचे आढळून आले आहे. त्या खालोखाल सातपूर विभागात ६९ रुग्ण आढळले असून, नाशिकरोड ६३, पूर्व ६०, पंचवटी ५७, तर नाशिक पश्चिम विभागात २१ रुग्ण आढळले आहेत.

महिनानिहाय रुग्णसंख्या

जानेवारीत ४, फेब्रुवारीत ५, मार्च ४, एप्रिल २, मे ६, जून १९, जुलै १४, ऑगस्ट ९७, सप्टेंबर १०५, ऑक्टोबर १४३.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्यस्थीनंतरही गितेंचे बंड कायम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाच्या जागेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशापाठोपाठ पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेली मध्यस्थीही अयशस्वी ठरली आहे. रुग्णालयाच्या जागेबाबत उपमहापौर प्रथमेश गिते यांनी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या बाजूने दिलेला कौल अमान्य केल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांचा आदेशही आता ठोकरला आहे. भाभानगरच्या जागेत कुठल्याही परिस्थितीत रुग्णालय उभारू देणार नाही, अशी ठाम भूमिका प्रथमेश गिते यांनी घेतली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते व उपमहापौरांच्या या बंडाच्या झेंड्यानंतर पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारतात की आमदार फरांदे- गिते यांच्यात समेट घडवून आणला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

शंभर खाटांच्या महिला रुग्णालयावरून आमदार फरांदे व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष गिते यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. भाभानगरमधील जागेवर रुग्णालय उभारण्यास गिते पिता-पुत्रांचा विरोध आहे, तर त्याच जागेवर हे रुग्णालय उभारले जावे, असा आमदार फरांदे यांचा आग्रह आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार फरांदे यांच्या बाजूने कौल दिल्यानंतर गिते पिता-पुत्र चांगलेच संतापले असून, त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा आदेश मान्य करण्यास नकार दिला होता. मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या आदेशानंतरही वसंत गिते व प्रथमेश गिते ऐकत नसल्याने स्थानिक नेत्यांची कोंडी झाली आहे, तर भाजपची शहरातील प्रतिमा मलिन होत आहे. या पार्श्वभूमीवर जनता दरबाराच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेले पालकमंत्री महाजन यांच्यासमोरही या वादाचा अंक रंगला. पालकमंत्र्यांनी आमदार फरांदे यांच्याच बाजूने कौल देत भाभानगरमधील जागेतच रुग्णालय उभारले जाईल, असे स्पष्ट केले होते. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ पालकमंत्र्यांचा कौलही फरांदेंच्या बाजूने गेल्याने उपमहापौर गिते यांचे चांगलेच जिव्हारी लागले आहे. या जागेवर कोणत्याही परिस्थितीत रुग्णालय उभारू दिले जाणार नाही, अशी भूमिका उपमहापौर गिते यांनी व्यक्त केल्याने आता गिते पिता-पुत्र थेट बंडाच्या पवित्र्यात आल्याने पक्षाची अडचण झाली आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी हा वाद कसा मिटवतात याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत नामदेवांना वंदन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्या अभंगवाणीतून मानवी जीवन सुकर करणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांना जयंतीनिमित्त मंगळवारी शहर परिसरात विविध उपक्रमांद्वारे वंदन करण्यात आले. समाजबांधवांसह विविध संस्था, संघटनांतर्फे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

जुने नाशिक भागातील १२५ वर्षे जुन्या नामदेव मंदिरात पहाटे ५ वाजता काकड आरती करण्यात आली. त्यानंतर दिवसभर विविध कार्यक्रम झाले. शहरातील समाजबांधवांतर्फे सकाळी ११ वाजता वतीने मुंबई नाका येथे सामुदायिक पूजन करण्यात आले. यावेळी शहरातील मान्यवर उपस्थित होते. काठे गल्ली येथील प्रशांत निरगुडे यांच्या हॉलमध्ये हरिपाठाचे पठण करण्यात आले. ७४७ व्या जयंतीनिमित्त रामकुंड परिसरात ७४७ दिवे लावण्यात आले होते. यावेळी मीना परुळकर यांची गायनाची मैफल आयोजित करण्यात आली होती. शहरात विविध ठिकाणी अरुण नेवासकर आणि कार्यकर्त्यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

नाशिक प्रांतिक नामदेव समाज उन्नती संस्थेतर्फे त्र्यंबकेश्वर येथील नामदेव भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित समाजबांधवांकडून मूर्तीला अभिषेक करण्यात आला. प्रतिमापूजन करण्यात येऊन फराळाचे वाटप करण्यात आले.

---

भाव-भक्तिगीतांची मैफल

पंचवटी : नाशिक शहर नामदेव शिंपी पंच मंडळातर्फे काजीपुरा भागातील संत नामदेव पथावरील नामदेव विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रम झाले. त्यात महाभिषेक, संकीर्तन, भजन, महाआरती आणि मोहन उपासनी यांची सुश्राव्य भाव-भक्तिगीतांची मैफल आदींचा समावेश होता. नामदेव शिंपी पंच मंडळाचे विश्वस्त नंदलाल काळे, अतुल मानकर, अरुण नेवासकर, संजीव तुपसाखरे, के. आर. शिंदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अभाविप’तर्फे निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केरळ राज्यात अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या होत असलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शहरात जोरदार निदर्शने करीत निषेध नोंदविला.

अशोकस्तंभ परिसरात मंगळवारी दुपारी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत निदर्शने केल्यानंतर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. केरळमधील कम्युनिस्ट सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘सेव्ह केरला– सेव्ह डेमोक्रसी’, ‘केरल की गलीयाँ सुनी है– वामपंथी खुनी है’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. आतापर्यंत केलेल्या हत्या आणि हिंसेचे पोस्टरही दाखवण्यात आले. या हिंसेमध्ये महिलाही मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. केरळमधील या हत्या म्हणजे तेथील सरकारचा खरा चेहरा उघडा पडत आहे. या सर्व हत्येला केरळ सरकार पाठीशी घालत आणि मूक संमती दर्शवत आहे. या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर आलं पाहिजे. हा रक्तपात आणि खुनी कारस्थान मानवतेला काळिमा फासणारे आहे. कम्युनिस्ट सरकार सत्तेत आल्यानंतर दोन वर्षांत १४ हत्या केल्या गेल्या. लोकशाहीचा लढा वामपंथी अशा क्रूरतेने लढताना दिसत आहेत, असे मत महानगरमंत्री सागर शेलार यांनी या वेळी व्यक्त केले. केरळच्या क्रूर शासनाच्या राजवटीत महिला आणि तरुणांचे आयुष्य उद््ध्वस्त होत आहे. या सर्व प्रशासनाच्या विरोधात समस्त महिलांनी आवाज उठवायला हवा, असे महानगर सहमंत्री शर्वरी अष्टपुत्रे यांनी निषेध व्यक्त करताना सांगितले.

केरळ सरकारच्या या रक्तपाताचा निषेध करण्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी लाखो नागरिक केरळच्या रस्त्यावर शांती मोर्चा आयोजित करणार आहेत. कम्युनिस्टविरोधी विचाराच्या लोकांना जगण्याचाही अधिकार केरळ सरकार देत नाही, असा आरोप महानगर सहमंत्री रूपेश पाटील यांनी या वेळी बोलताना केला. या वेळी महानगर सेवा आयामप्रमुख वेभव गुंजाळ, दुर्गेश केंगे, पवन प्रजापती, सनील शिंदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरमतमोजणीचा रंगला फड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयात निवडणुकीप्रमाणेच पुन्हा नाट्यमय घडामोडी घडून मंगळवारी होणारी बहुचर्चित फेरमतमोजणी न्यायालयाने रोखली. परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिवाणी न्यायालयाने दिला असून, या दाव्यावर दि. २ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत फेरमतमोजणीवरून निर्माण झालेला पेचप्रसंग धर्मादाय आयुक्तांच्या निकालामुळे पुन्हा प्रकाशात आला असून, मंगळवारी सावानात धनंजय बेळे व बी. जी. वाघ यांच्या मतांची फेरमोजणी केली जाणार होती. त्याप्रमाणे सकाळी ११ वाजता मतपेट्या मु. शं. औरगंबादकर सभागृहात आणण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांच्या उपस्थितीत या पेट्या फोडण्यात आल्या. मतपेट्यांमधून मतपत्रिका काढून त्या एकसमान लावण्याचे काम सुरू असतानाच माधवराव भणगे यांना न्यायालयातून सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांचा फोन आला. सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. एस. सस्ते यांनी ही मतमोजणी थांबविण्यास सांगितले, असा निरोप त्यांना देण्यात आला. त्यानुसार भणगे यांनी १२.१५ वाजता मतमोजणी थांबवली. मतमोजणी सुरू होण्याआधीच थांबलेली पाहिल्याने बी. जी. वाघ यांच्या प्रतिनिधी रूपल वाघ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी भणगे यांना त्यासंदर्भात विचारणा केली. त्यावर भणगे यांनी फोनवरून आलेला निरोप सांगितला. मात्र, न्यायालयाने तोंडी आदेश दिले आहेत, तसे लेखी आदेश आहेत का, अशी विचारणा वाघ यांचे प्रतिनिधी अमित पाटील व राहुल हारक यांनी केली. लेखी आदेश नसल्यास मतमोजणी प्रक्रिया थांबविली असल्याचे आपण लेखी लिहून द्यावे, असा आग्रह वाघ यांच्या प्रतिनिधींनी केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण झाले होते. भणगे यांनी तसे लिहून दिल्याने वातावरण शांत झाले. त्यानंतर भणगे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या हस्ते पुन्हा पेट्या सीलबंद केल्या. मतपेट्या सील करीत असताना श्याम दशपुत्रे यांनी पेट्यांना हात लावला या कारणावरून दीपक कुलकर्णी आणि त्यांच्यात बरीच बाचाबाची झाली. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि वाद मिटला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मतमोजणी करण्याची घाई करायलाच नको होती, अशी प्रतिक्रिया तेथे उपस्थित सावाना सभासदांनी दिली. आता कोर्टाने २ नोव्हेंबरपर्यंत प्रकरण जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले असून, पुढील सुनावणी गुरुवारी (दि. २) होणार आहे. सावानाच्या वतीने अॅड. अतुल गर्गे यांनी, तर धनंजय बेळे यांच्या वतीने अॅड. विनयराज तळेकर यांनी काम पाहिले.

--

बेळेंची कोर्टात उपस्थिती

सावानाच्या वतीने होणारी ही फेरमतमोजणी बेकायदेशीर असून, ती थांबवावी यासाठी धनंजय बेळे यांनी दिवाणी न्यायालयात अर्ज केला होता. त्याची सुनावणी मंगळवारी म्हणजे फेरमतमोजणीच्या दिवशीच असल्याने ते न्यायालयात होते. फेरमतमोजणीच्या ठिकाणी ते स्वत: आले नाहीत आणि त्यांनी त्यांचा प्रतिनिधीही पाठवला नाही. कारण, तसे झाल्यास ही मतमोजणी त्यांना मान्य आहे, अशी त्यांची भूमिका झाली असती, असे ते म्हणाले.

--

अनुपस्थितीने रंगला खेळ

कोर्टात हजर राहण्यासाठी बी. जी. वाघ, प्रा. विलास औरंगाबादकर व निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांना कोर्टाने समन्स बजावले होते. परंतु, फेरमतमोजणी घ्यायची म्हणून माधवराव भणगे कोर्टात हजर राहिलेच नाही, तसेच बी. जी. वाघ हेदेखील कोर्टात अनुपस्थित राहिले. मात्र, धनंजय बेळे यांनी पूर्ण वेळ कोर्टात उपस्थिती दाखवली. कोर्टाने सुनावणीच्या सुरुवातीलाच या अनुपस्थितीबाबत सावानाच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा केली आणि हा कोर्टाचा अवमान असल्याचे सांगितले.

--

‘सावाना’च्या पैशांचा चुराडा

फेर मतमोजणीची प्रक्रिया ही सहा महिन्यांपासून लांबलेली बाब असून, त्यावर पैसा खर्च होत आहे. हा पैसा सावानाच्या गंगाजळीतून जात आहे. म्हणजे हा देणगीदार, वाचकांचा पैसा आहे. मात्र, त्याचे कोणालाच सोयरसुतक नसून, फेरमतमोजणीसाठी जे सरकारी कर्मचारी आणण्यात आले होते त्यांना मानधन देणे सावानाला चुकणार आहे का, अशा प्रतिक्रिया सभासदांमधून उमटत होत्या. सावानाच्या पैशांचा चुराडा चालला असून, याला बांध घालायला हवा, असेही बोलले जात होते.

--

बेळेंची भद्रकाली पोलिसांत तक्रार

धनंजय बेळे यांनी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे आणि बी. जी. वाघ यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. कार्यकाळ संपल्यावरही भणगे यांनी वाघ यांच्याशी संगनमत करून न्यायालयाचे समन्स डावलून मतपेट्या फोडल्या त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशा स्वरूपाची ही तक्रार आहे.

--

जनस्थान पॅनल जाणार न्यायालयात


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मतपेट्या फोडू नये, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करू, अशा आशयाचे पत्र जनस्थान पॅनलच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. परंतु, त्याची कोणतीही दखल न घेता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेरमतमोजणीसाठी मतपेट्या फोडल्याने जनस्थान पॅनल न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. अरुण नेवासकर पार्टी होणार असल्याचे मंगळवारी त्यांनी सावानाबाबत घडलेल्या घडमोडींच्या वेळी सांगितले.

फेरमतमोजणीविरुद्ध जनस्थान व परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अर्ज दिलेला असून, त्यात नमूद केलेले आहे, की सावानाची निवडणूक प्रक्रिया सदोष असल्याने त्यास आमची हरकत अाहे. निवडणूक प्रक्रियेबाबत तक्रार असल्यास ३० दिवसांच्या आत न्यायालयात दाद मागण्याची तरतूद आहे. त्यामुळे आम्ही योग्य त्या न्यायालयात दाद मागणार आहोत. मतदानाची फेरमोजणी करणेदेखील २४ तासांनंतर बेकायदेशीर असल्याने ती प्रक्रिया राबवू नये. सील केलेल्या मतपेट्या फोडू नयेत, कारण त्यामुळे आम्ही न्यायालयात जी दाद मागणार आहोत त्या प्रक्रियेला अडथळा येणार आहे. आमच्या नैसर्गिक हक्कांवर गदा येणार आहे. आपण किंवा आपणातर्फे कुणीही असे केल्यास आपणाविरुद्ध, तसेच आपल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी व दिवाणी कारवाई करण्यात येईल. या अर्जावर राजेश जुन्नरे, विनोद राठोड, मोहन उपासनी, मकरंद सुखात्मे, नंदन रहाणे, सतीश महाजन, श्यामला चव्हाण आणि प्रभाकर कुलकर्णी यांच्या सह्या आहेत.

फेरमतमोजणी घेण्याचे निश्चित केल्यानंतर माधवराव भणगे यांनी मतपेट्यांचे सील फोडले असून, हा गुन्हा असल्याचे जनस्थान पॅनलचे म्हणणे आहे. त्यानुसार आता कारवाईला सामोरे जा, असेही जनस्थानच्या उमेदवारांच्या वतीने सांगण्यात आले.

__

ही पूर्ण निवडणूक प्रक्रियाच चुकीची आहे, पूर्ण प्रक्रियेलाच आमचा विरोध होता. त्याबाबत आम्ही धर्मादाय आयुक्तांकडे पत्रही दिले होते. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही सावानाचे सभासद करून घेण्यात येत होते. आता तर मतपेट्याही फोडल्या, आधीच या मतपेट्या त्यांच्या ताब्यात होत्या. आता तर फोडल्या व आम्हाला साधी माहितीही दिली नाही. त्यात मतपत्रिका कमी-जास्त झाल्या, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? या सर्वांविरुद्ध आम्ही न्यायालयात जाणार आहोत.

-अरुण नेवासकर, उपाध्यक्षपदाचे तत्कालीन उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदंड जाहले चोरटे, अन् पोलिस सुस्तावले!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

वाढत्या चोऱ्या, दरोडे यामुळे शहरासह तालुक्यात आता पोलिसांचा आणि कायद्याचा धाक उरला आहे की नाही? असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत. दसाणेत घडलेल्या दरोड्याच्या घटनेमुळे तर शेतात राहणाऱ्यांमध्ये घबराहट पसरली आहे. पोलिसांनी वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

जनता पोलिसांकडे आशेने पाहत असताना पोलिस मात्र सुस्त आहेत. एकमेकांना पाण्यात बघण्याचे प्रकार सटाणा पोलिस ठाण्यात सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिक मर्चंटस् बँक, प्रभाकर प्लाझा येथूनही रोकड लांबविल्याच्या घटना घडल्या. या सर्व घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये टिपल्या गेल्या असतानाही पोलिसांकडून अद्याप तपास नाही.

नववसाहतीत झालेल्या घरफोड्या, चोऱ्या व दरोडा यांचा तपास अद्याप लागलेला नाही. तीन महिन्यांपासून तर मोटार सायकल चोरीचा सुकाळ सुरू आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही उपयोग होत नाही. यामुळे पोलिसांविषयी नाराजीचा सूर उमटू लागला आहे. पोलिस आणि नागरिकांमध्ये संवाद नसल्याने निर्माण होत आहेत. मध्यंतरी श्रीकृष्ण कॉलनीत जनतेने रात्रभर पहारा सुरू केला. पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील, बशीर शेख यांनी पोलिस-जनता सुसंवाद होता. मात्र गत तीन महिन्यांपासून पोलिस सुस्त असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साईभक्तांनी फुलला निफाड-शिर्डी रस्ता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

दीपावलीनंतर गुजरातच्या साइभक्तांना साईबाबांच्या दर्शनाची ओढ लागते. हे भक्त सुरत, बडोदा आदी भागातून ३०० ते ३२५ कि.मी. चा पायी प्रवास करत शिर्डीला साईचरणी लिन होतात. विशेष म्हणजे या पायी यात्रेत आबालवृद्ध, स्रिया मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या दिसतात. मात्र यावर्षी ही संख्या ४० टक्के कमी झाल्याची माहिती या पदयात्रेकरुंना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या साई सेना ग्रुपचे जितुभाई बोराडे (सुरत) यांनी दिली.

गुजरातच्या साई भक्तांना शिर्डीकडे पायी जाण्यासाठी सापुतारा, पिंपळगाव, निफाड, रुई, धारणगाव, चास सावळी विहीर हा मार्ग सोईचा आहे. त्यामुळे दिवाळी झाली की या साईभक्तांनी निफाड परिसर गजबजून जातो. निफाड जवळच हे साई भक्त रात्रीच्या मुक्कामाला थांबतात. अल‌किडच्या काळात शिवरे फाटा येथील भाग्यश्री लॉन्स, मंदिरे, सामाजिक सभागृह, शाळा, मंगल कार्यालये अशा अनेक ठिकाणी हे भक्त मुक्कामाला थांबतात. या ठिकाणी विनामूल्य निवासाची व्यवस्था करून दिली जाते. सलग ९ ते १० दिवस ३०० कि.मी. चा प्रवास केलेले हे भक्त शिर्डीला दर्शनासाठी जातात. या भक्तांना जितू बुराडे यांच्यासह लालू यादव, जितेंद्र बिजवाला, किशोर कुकावाला, धर्मेंद्र बूराडे, जिगर पटेल, डॉ. मयूर शुक्ला, अॅड. सगुन पारेख, सुभाष पाटील, शांताराम पाटील, दीपक वषी, राजू शहा, पार्थ शहा सेवा देत आहेत.

गेल्या सात वर्षांपासून साईभक्तांना आमच्या ट्रस्टतर्फे चहा, नाश्ता, जेवण पुरविले जाते. या वर्षी मात्र जेवणाएवजी आरोग्यासाठी मोबाइल व्हॅनची सुविधा दिली आहे.

- जितूभाई बुराडे, अध्यक्ष, साई सेना ट्रस्ट, सुरत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतन कपातीच्या परिपत्रकाची तमा नाही

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

कर्नाटक हायकोर्टाच्या सिंगल बेंचने दिलेला निकाल त्याच वर्षी डबल बेंचने रद्द ठरविला होता. महामंडळाने त्याच निकालाचा आधार घेऊन वेतन कपातीचे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकाला इंडस्ट्रीयल कोर्टात आव्हान दिले जाणार असून, त्यासाठी मंगळवारी वकिलांची भेट घेण्यात आल्याची माहिती राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी ऐन दिवाळीत (१७ ते २० ऑक्टोबर) कामगारांनी संप केला. हा संप १०० टक्के यशस्वी झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. त्यामुळे संपकरी कामगार संघटनांविरोधात महामंडळाने कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे. संपकरी एसटी कामगारांचे ३६ दिवसांचे वेतन कापले जाणार असल्याने नाशिकमधील कामगारांमध्येही खळबळ उडाली आहे. या संपामुळे महामंडळाचे सुमारे १२५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘काम नाही तर दाम नाही’ या तत्त्वानुसार चार दिवसांची वेतन कपात, त्याव्यतिरिक्त नुकसानीबद्दल प्रत्येक दिवसासाठी आठ दिवसांचे वेतन असे एकूण ३६ दिवसांचे वेतन कापण्याचे महामंडळाने जाहीर केले असून, हा निर्णय अन्यायकारक असल्याची प्रतिक्र‌िया नाशिकमधील एसटी कामगारांनी व्यक्त केली. महामंडळाला काय करायचे ते करू द्या. आम्ही इंडस्ट्रीयल कोर्टातून न्याय मिळवू, असा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे.

इंटकने २०१५ मध्ये दोन दिवसांचा संप पुकारला होता. त्या वेळीही कर्नाटक हायकोर्टाच्या रद्द झालेल्या निकालाच्या आधारानेच वेतन कपातीचे फर्मान महामंडळाने सोडले होते. मात्र, एसटी कामगारांना न्याय मिळाला. आताही याच पद्धतीने कारवाईचा बडगा महामंडळाने उगारला असला तरी आम्हाला त्याची फिकीर नाही. इंडस्ट्रीयल कोर्टातून आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुल्या बाजारातील केरोसिन परवडेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केरोसिन वापरावरील नियंत्रण आणि कमाल किंमतनिश्च‌िती धोरणात केंद्र सरकारने सुधारणा केल्यामुळे सार्वजनिक केरोसिनचा साठा, वाहतूक आणि विक्री नियंत्रणमुक्त झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खुल्या बाजारातही केरोसिन सहजगत्या उपलब्ध होऊ लागले आहे. ७० रुपये लिटरने हे केरोसिन खरेदी करावे लागत असल्याने सामान्य ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरविली आहे.

‍गोरगरिबांची चूल पेटविणारे इंधन म्हणून केरोसिनकडे पाहिले जाते. पूर्वी केरोसिन मिळविण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील नागरिकांच्या केरासिन विक्री परवानाधारकांकडे रांगा लागायच्या. सरकारने ठरवून दिलेल्या निकषानुसार लाभार्थींना अल्पदरात केरोसिनचे वाटप केले जात असे. मात्र, आता कुठल्याही दुकानात केरोसिन सहजरीत्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. बाजारात केरोसिनची समांतर व्यवस्था असावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. केरोसिन नियंत्रणमुक्त केल्यामुळे आता परवानाधारक, रास्त भाव दुकानदारांसह खासगी व्यक्ती आणि दुकानांमध्येही केरोसिन पुरवठा, वितरण, खरेदी- विक्री होऊ लागली आहे. विक्रेत्यांना ६२ ते ६३ रुपये प्रतिलिटरने केरोसिन मिळते. ग्राहकांना ७० रुपये लिटरने त्याची विक्री केली जाते. मात्र, एवढे महागडे केरोसिन खरेदी करण्यास ग्राहक फिरकत नसल्यामुळे विक्रेत्यांचे भांडवल अडकून पडू लागले आहे. त्यामुळे काही व्यावसायिकांनी केरोसिन विक्रीकडे पाठ फिरविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यापूर्वी २० रुपये लिटरने केरोसिन खरेदी करणारे ग्राहक ७० रुपये लिटरचे केरोसिन कसे खरेदी करणार, असा सवालही उपस्थ‌ित होऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पंचवटी’ला हवे आत्मसन्मानाचे गिफ्ट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मध्य रेल्वेची प्रेस्टिजियस, तर नाशिककरांच्या जिव्हाळ्याची असलेली पंचवटी एक्स्प्रेस आज, बुधवारी (दि. १ नोव्हेंबर) ४३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ही गाडी वेळेवर धावावी, अन्य समस्या दूर करून गाडीला आत्मसन्मान मिळवून देणे हेच तिला वाढदिवसाचे स्पेशल गिफ्ट ठरेल, अशी भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी मुंबईत दि. १ नोव्हेंबर १९७५ रोजी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर पंचवटी दिमाखात धावू लागली. २६१ किलोमीटरचे अंतर ती वेगात पार करते. प्रारंभी १८ डब्यांची असलेली ही गाडी वाढता प्रतिसाद पाहून २१ डब्यांची करण्यात आली. त्यातील एक बोगी नाशिकच्या पासधारकांसाठी उघडण्यात येते. मुंबईला जाणारे नाशिकचे नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, रुग्ण, पर्यटक यांच्यासाठी यासारखी ही गाडी अतिशय सोयीचे आहे. त्यामुळे ही गाडी रेल्वेला भरघोस महसूल देते. रेल परिषदेने आदर्श कोचच्या माध्यमातून पंचवटीला लिम्का बुकमध्ये स्थान दिले आहे. नाशिकरोड स्टेशनवर बुधवारी या गाडीचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला जाणार असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे यांनी दिली.

--

‘लेट’चे सुटावे ग्रहण

दुरांतोसारख्या परराज्यांतील गाड्या पुढे काढण्यासाठी पंचवटी मागे टाकले जाते. उन्हाळ्यात पाणी भरण्यासाठी गाडी लेट होते. अन्य वेळी घोटी-कल्याणदरम्यान अन्य गाड्यांचे इंजिन फेल होत असल्याने पंचवटी लेट धावते. या मार्गावर छोटा-मोठा अपघात झाला, तरी पंचवटीला फटका बसतो. त्यामुळे या प्रवाशांनी अनेकदा घेराव, रेल रोको आंदोलने केली. प्रशासनाला निवेदने दिली. परंतु, फरक पडलेला नाही. वर्षभरापूर्वी केलेल्या आंदोलनाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने ही गाडी दहा मिनिटे अगोदर नाशिकरोडला पोहोचविणे सुरू केले आहे. पंचवटीची नियमित स्वच्छता होत नाही. कोच व खिडक्यांची दुरुस्ती होत नाही. गाडी पावसाळ्यात गळते. पास व तिकीट काढूनही गर्दीमुळे प्रवाशांना उभा राहून प्रवास करावा लागतो आदी समस्या सोडविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

---

एक्स्प्रेस बनली मालगाडी

भुसावळ आणि मुंबई मंडळाच्या वादात पंचवटीचा फुटबॉल झाला आहे. मुंबईच्या वेगवान लोकलप्रमाणे इंटरसिटीचा दर्जा असलेल्या पंचवटीची मालगाडी झाली आहे. या गाडीला रोज उशीर होतो. इंटरसिटी गाडी असल्याने रेल्वेने पंचवटी वेळेत सोडणे सक्तीचे आहे. वर्षापूर्वी आंदोलने केल्यानंतर गाडी वेळेत धावत होती. मात्र, काही महिन्यांपासून पंचवटी लेट होत आहे. गेल्या जूनमध्ये नाशिकला येताना इगतपुरीजवळ इंजिन फेल झाल्याने गाडी ४० मिनिटे लेट झाली होती. दुसऱ्याच दिवशी मुंबईला जाताना कसारा घाटात पंचवटी थांबवून मंगला एक्स्प्रेस पुढे काढल्यामुळे संतप्त प्रवाशांनी कसारा स्टेशनवर स्टेशनमास्तरांना घेराव घातला. पासधारक, मुंबईला अप-डाऊन करणारे नोकरदार, विद्यार्थी, रुग्ण, पर्यटक या गाडीच्या माध्यमातून रेल्वेला चांगला महसूल देतात, तरीही प्रवाशांची उपेक्षा होत आहे.

--

मुंबई विभागाकडून अन्याय

पंचवटी ही नाशिकरोड स्टेशनपर्यंत वेळेत येते. इगतपुरीपर्यंत तिचा प्रवास व्यवस्थित होतो. भुसावळ ते इगतपुरीपर्यंत भुसावळ विभागाची हद्द आहे. तेथून मुंबईची हद्द सुरू होते. तेथूनच उशीर होतो. मुंबई विभागाला आपल्या लोकल व महत्त्वाच्या गाड्यांची काळजी असते. त्यामुळे पंचवटीवर अन्याय केला जातो. कसाऱ्यापासून पंचवटीच्या मागून धावणाऱ्या दुरांतो आणि मंगला एक्स्प्रेस पुढे काढल्या जातात. डबे वाढविण्याची मागणीही प्रलंबित आहे.

--

‘मटा’मुळे यंत्रणेला जाग

पंचवटीचा प्रश्न ‘मटा’ने सातत्याने मांडला आहे. गाडी लेट होत असल्याचे सविस्तर वृत्त ‘मटा’मध्ये आल्यानंतर जागरूक प्रवाशांनी त्याचे कात्रण तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ट्विट केले होते. आंदोलनाचे ‘मटा’मधील वृत्तही रेल्वेमंत्र्यांना पाठविण्यात आले. त्यानंतर रेल्वे शासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी पाणी भरण्यासाठी पंचवटी गाडी दहा मिनिटे अगोदर नाशिकरोडला आणण्याचा निर्णय घेतला.

--

पंचवटी ही केवळ रेल्वे नसून, नोकरदारांसाठी जीवनदायिनी आहे. शेकडो लोकांचे एक मोठे कुटुंबच पंचवटीमुळे तयार झाले आहे. गेली ४० वर्षे आम्हाला सुरक्षित घरी पोहोचविणारे पंचवटी एक्स्प्रेसचे चालक व रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांचे आम्ही ऋणी आहोत.

-राजेंद्र तुपे, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवर्तन संगीत सोहळ्याचा समारोप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आवर्तन संगीत समारोहाच्या दुसऱ्या दिवशी प्रथम सत्रात प्रसिद्ध नृत्यांगना कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्यांनी नादब्रह्म ही नृत्यसंरचना सादर केली.

नादब्रह्माचा प्रारंभ पंचतुंड नररुंड मालधर या शंकराच्या नांदीने झाला. नांदीनंतर ‘सूर निरागस हो’ या प्रस्तुतीतून कलेची देवता गणपतीला आवाहन करण्यात आले. त्यानंतर मनमंदिरा ही रचना सादर झाली. नटराज नमो नम: या नृत्यातून नटराजाला वंदन करण्यात आले. कृष्णाची विविध रूपे वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून मुरली मनोहर रे या सादरीकरणातून उलगडण्यात आली. या सादरीकरणाला रसिकांची विशेष दाद मिळाली. कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात पंडित मंजिरी देव यांच्या शिष्या निधी प्रभू यांनी कथकनृत्य प्रस्तूत केले. प्रकाशयोजना अरविंद भवाळकर यांनी, तर ध्वनीसंयोजन पराग जोशी यांनी केले. रंगभूषा माणिक कानडे यांनी केली. धनेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images