Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

असे असेल प्रवेशाचे आरक्षण

0
0
प्रवेश प्रक्रियेतील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरक्षित जागा. अॅडमिशनदरम्यान मेरिट लिस्ट जाहीर करताना विविध संवर्गाच्या आरक्षित जागांच्या टक्केवारीनुसारच प्रत्येक कॉलेजला मेरिट लिस्ट जाहीर करावी लागते. परंतु अनेकदा या आरक्षित जागांबाबत गैरप्रकार होण्याची शक्यता असते.

NCP पदी अनपेक्षित नवा चेहरा येणार

0
0
राष्ट्रवादी काँग्रेसला नव्या प्रदेशाध्यक्षांच्या रूपाने नवा चेहरा मिळणार आहे. पक्षातील बदल हे चांगल्यासाठीच आहेत. प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा मीडियात सुरू आहे.

अकरा गावांची पायपीट थांबली

0
0
औरंगाबाद शहर परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या अकरा गावात रामकृष्ण मिशन आश्रमाने पाणीपुरवठा करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. या उपक्रमामुळे १२ हजार नागरिकांची पाण्यासाठी सुरू असलेली पायपीट थांबली आहे.

'गौरव'च सर्वोत्कृष्ट !

0
0
पहिल्या सहा फेऱ्यांमध्ये घाटातील खडतर रस्त्यांवरही आपल्या ड्रायव्हिंगची कमाल दाखवणारा गौरव गिल अपेक्षेप्रमाणे यंदाच्या 'रॅली ऑफ महाराष्ट्र'चा विजेता ठरला. या विजेतेपदामुळे गतवेळेप्रमाणे यंदाही 'स्टार ऑफ नाशिक'चा किताब गौरवने पटकावला.

त्या शाळांना मिळणार नोटीस

0
0
शिक्षण विभागाचा निर्णय डावलून दहा जूनपासून ‌कामकाज सुरू केलेल्या शाळांना कारणे दाखवा नोटीस देणार असल्याची माहिती महापालिका शिक्षण मंडळाचे अधिक्षक एन. यु. पठाण यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

सिंहस्थ निधीसाठी ८ दिवसांत प्रस्ताव

0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळावा यासाठी येत्या आठ दिवसात विस्तृत प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव नियोजन आयोगाला सादर केला जाणार आहे.

एक कोटीसाठी युवकाचे अपहरण

0
0
क्लासला जातो, असे सांगून शनिवारी सायंकाळी घराबाहेर गेलेला ओझर येथील एका धान्य व्यापाऱ्याचा मुलगा अद्याप घरी परतलेला नाही. याप्रकरणी​ पोलिसांनी सुरूवातीस मिसींग गुन्हा दाखल केला होता.

औषध विक्रेते परवाने परत करणार

0
0
सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाकडून औषध विक्रेत्यांवर होणा-या अन्यायाच्या निषेधार्थ राज्यातील सर्व केमिस्ट आपले परवाने लवकरच राज्य सरकारला परत करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी पत्रकारांना दिली.

साडेसहा कोटींचा एलबीटी जमा

0
0
महापालिका हद्दीत २२ मे रोजी लागू करण्यात आलेल्या एलबीटी कराच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेला साडेसहा कोटी रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. एलबीटी लागू झाल्यापासून ३१ मे पर्यंत आयात झालेल्या मालावरील हा महसूल आहे.

११७ खडी क्रशरबाबत आज निर्णय

0
0
नाशिक जिल्ह्यातील ११७ खडी क्रशरला परवानगी देण्याबाबत मंगळवारी निर्णय होणार आहे. या क्रशरला परवानगी मिळाल्यास जिल्ह्यातील अनेक विकास कामांना दिलासा लाभणार आहे. मात्र, मंजुरी न मिळाल्यास खडी, क्रशरचा प्रश्न अत्यंत गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

शाळेच्या सुरक्षिततेचे तीन तेरा

0
0
जूनचा पहिला पंधरवडा म्हणजे शाळा सुरू होण्याची लगबग. जवळपास दोन महिने बंद असलेल्या शाळा १५ जूनच्या आसपास सुरू होतात. ऐन पावसाळ्यात सुरू होणा-या या शाळांच्या इमारती विद्यार्थ्यांना धोकादायक ठरण्याची शक्यता दरवर्षीच असते. महापालिकेच्या शाळांबाबतीत ही समस्या प्रामुख्याने भेडसावते.

आमच्या पाल्यांचाही विचार करा

0
0
रासबिहारी शाळेने सरकारी सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचे दाखले दिल्याने शिक्षण विभागाने शाळेला मान्यता रद्द करण्याचा इशारा दिला आहे.

मान्सुनकाळात विभागांमध्ये समन्वय हवा

0
0
मान्सुन काळात संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन नाशिक विभागातील सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवावा अशा सुचना विभागीय आयुक्त रविंद्र जाधव यांनी दिल्या. आयुक्तालयात आयोजित केलेल्या मान्सुन-२०१३ पूर्व तयारी आढावा बैठकीत विविध खात्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

मॅनेजमेंट शिका मुळापासूनच

0
0
ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मॅनेजमेंटच्या शिक्षणाच्या वाटा शोधण्यास सुरुवात करण्याऐवजी त्या विषयातील पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या एकत्रित कोर्सला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता दिली आहे.

'महावितरण'तर्फे तक्रार निवारण केंद्र सुरु

0
0
पावसाळ्यात विजेच्या अपघाताच्या घटना टाळण्यासाठी ग्राहकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले असून महावितरणने ग्राहकांसाठी तक्रार निवारण केंद्र कार्यान्वित केले आहे.

ब्रेडची कथा

0
0
शहरात सगळीकडेच पावसाने हाल झाले असून मान्सुनमुळे झालेली परिस्थिती पूर्ववत आणताना महापालिका आणि महावितरण यादोन्ही विभागांना नाकीनऊ आले. सगळ्या विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या गेल्या. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा सज्जड दमही देण्यात आला.

नाशिकमध्ये टर्मिनल मार्केट

0
0
कृषी मालाला चांगली बाजारपेठ मिळावी, यासाठी राज्यात नाशिकसह मुंबई आणि नागपूर येथे अद्यावत टमिर्नल मार्केट उभारण्यात येणार आहे. मुंबईसाठी बाबगाव येथील ९२ एकर जागा पणन मंडळाने ताब्यात घेतली असून नाशिकमध्ये देखील पुढील कार्यवाहीची सुरूवात लवकरच केली जाणार आहे.

'अशोका'ने नाकारला प्रवेश

0
0
पालकांनी बेकायदेशीर वर्तणूक केल्याचे कारण देऊन विद्यार्थ्यांचे दाखले पाठवून दिलेल्या अशोका युनिव्हर्सल स्कूलने संबंधित विद्यार्थ्यांना शाळेत घेण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.

बाजार समित्यांनी विश्वास गमावला

0
0
शेतक-यांना व्यापारासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितींची सुरूवात करण्यात आली होती. मात्र, भ्रष्ट संचालक मंडळ आणि त्यांची पाठराखण करणा-या सरकारी अधिका-यांमुळे कृउबा समितीचा गाभा असलेला शेतकरीच बाजूला पडला आहे.

'यशस्विनी'तून व्हा स्वामिनी - खा.सुळे

0
0
'महिला कधीही हतबल किंवा बिचारी नसते. जेव्हा वेळ येते त्यावेळी ती पदर खोचून परिस्थितीशी दोन हात करते' असे सांगत 'यशस्विनी सामाजिक अभियाना'द्वारे आयुष्यातील यशाला गवसणी घाला' असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images