Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

स्टोअर रूम झाले पुन्हा स्वच्छतागृह!

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये ‘वाट स्वच्छ आरोग्याची’ या वृत्त मालिकेअंतर्गत डोंगरे वसतिगृहालगत असलेल्या क्रांतीवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या कॉलेजमधील स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकण्यात आला. त्याची गंभीर दखल संस्थेने घेतली असून तातडीने सर्व स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, स्टोअर रूम बनलेल्या स्वच्छतागृहाची स्वच्छता करुन ते विद्यार्थिनींसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी ‘मटा’ने ‘वाट स्वच्छ आरोग्याची’ ही मोहीम हाती घेतली आहे. याच अंतर्गत शहर परिसरातील विविध कॉलेज कॅम्पसमध्ये महिला स्वच्छतागृहांची सद्यस्थिती काय आहे, यावर प्रकाश टाकणारी वृत्त मालिका सध्या प्रकाशित केली जात आहे. त्याचअंतर्गत गेल्या आठवड्यात के.व्ही.एन नाईक शिक्षण संस्थेच्या कॅम्पसमधील स्वच्छतागृहांच्या स्थितीचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्याची गंभीर दखल संस्थेचे पदाधिकारी कोंडाजी आव्हाड, तानाजी जायभावे आणि अन्य संचालकांनी घेतली. कॅम्पसमधील सर्व स्वच्छतागृहे ठेकेदाराकडून दररोज स्वच्छ करण्यात यावेत, असे निर्देश संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राचार्यांना दिले आहेत. तसेच, संबंधित ठेकेदारालाही समज देण्यात आली आहे. सर्व स्वच्छतागृहांची अचानक तपासणी करण्यात यावी, असेही या पदाधिकाऱ्यांनी कॉलेज प्रशासनाला सांगितले आहे. स्वच्छतागृहे नियम‌ित स्वच्छ असणे आवश्यक आहे. स्वच्छतागृह हे विद्यार्थिनींच्या आरोग्याशी निगडित आहे. त्यामुळे शिक्षणाबरोबरच त्यांचे आरोग्य जपण्यासाठी स्वच्छतागृहांची देखभाल योग्य केली जाईल. तसेच, त्यांच्या विविध तक्रारी तसेच अडचणी सोडविण्यासाठी प्राचार्यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थिनींनी तत्काळ प्राचार्यांकडे माहिती द्यावी, असे आवाहन संस्थेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिगरमोसमीचे ढग दाटले!

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

शहर व जिल्ह्यात ढगाळ वातावरण व काही ठिकाणी झालेल्या बिगरमोसमी पावसाने शेतकरी मेटाकुटीस आला असून, द्राक्षबागांसह कांदा, गहू, भात पिकांना धोका निर्माण झाला आहे. निफाड, सटाणासह अन्य भागांत ढगाळ वातावरण, तर नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये हलक्या सरी कोसळल्या. ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागांवर डावणीबरोबरच भुरी, मिलिबग्जचाही धोका वाढला आहे, तर भात पिकाची सोंगणी अंतिम टप्प्यात असतानाच पावसामुळे प्रतवारी खराब होण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळले आहे.

शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत बिगरमोसमी पावसाने सोमवारी हजेरी लावली. शहरात सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या तर दिवसभर ढगाळ वातावरणाने शहरासह जिल्ह्यावर मांडव धरला. कमाल तापमान २८, तर किमान तापमान १७ अंश सेल्स‌िअसपर्यंत गेल्याने थंडीचा जोर ओसरला आहे.

यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे धरणे भरली असून, बहुतांश शेतकऱ्यांची शेतीसाठीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा सामना करावा लागणार नसल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे भाव आहेत. एकीकडे अशी सुखावह परिस्थ‌िती असताना निसर्गाचा लहरीपणा बेमोसमी पावसाच्या माध्यमातून जिल्हावासियांना अस्वस्थ करू लागला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बेमोसमी पावसाने जिल्ह्यात धुडगूस घातला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. परिणामी समाधानकारक मोसमी पाऊस होऊनही दिवाळीत उत्साह मावळला. या बेमोसमी पावसामूळे झालेल्या नुकसानाची भरपाई अजून मिळाली नसताना आता पुन्हा बेमोसमी पावसाची चेतावनी देणारे ढग शहर आणि जिल्ह्यावर मांडव धरू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने अवकाळी पाऊस‌ हजेरी लावणार असे चिन्ह दिसत होते. सोमवारी सकाळी ढग दाटून आल्याने सूर्यदर्शनही झाले नाही. सकाळ‌ी सव्वा दहाच्या सुमारास पावसाचे थेंब पडू लागले. तर अकराच्या सुमारास हलक्या सरींनी शहरात हजेरी लावली. दिवसभरात कमाल तापमान २७.९ तर किमान तापमान १७.६ अंश सेल्स‌ियस नोंदविले गेले. आद्रता देखील ८६ टक्के नोंदविण्यात आली.

द्राक्षबागांना भुरी, मिलिबग्जचा धोका

निफाड ः गेल्या दोन- तीन दिवसांपासून झालेल्या गडद ढगाळ हवामानाने द्राक्षबागांना धोका निर्माण झाला आहे. सर्वच अवस्थेतील द्राक्षबागांना डाऊनीचा प्रादुर्भाव झाला आहे. द्राक्षमणी फुगवणीची प्रक्रिया सुरू झाली‌ असतानाच भुरी, तसेच मिलिबग्जचाही धोका निर्माण झाला आहे. ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोगांवर प्रतिकार म्हणून स्पर्शजन्य व आंतरप्रवाही बुरशीनाशके फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त आहेत.

भात पिकाची प्रतवारी खराब

त्र्यंबकेश्वर ः खरीप हंगामाचा कालावधी वाढला आणि गरीभाते सोंगणीस उशीर झाला आहे. भाताच्या सोंगणी अंतिम टप्प्यात असताना तो भिजण्याची शक्यता वाढली आहे. यंदा भात पीक रोगाला बळी पडले आहे, अशातच अवकाळी पावसाने त्याची प्रतवारी खराब होणार आहे. सततच्या ढगाळ वातावरणाने रोगराई वाढत असून, खरीप अथवा बागायती पिके आणि फळबागा यांना हे वातावरण घातक ठरत आहे.

या पिकांना बसणार फटका

द्राक्षबाग ः डावणीचा प्रादुर्भाव, भुरी, मिलीबग्जचाही धोका

कांदा ः ढगाळ वातावरणामुळे मावा रोगाचा धोका

गहू ः मावा किडीचा प्रादुर्भाव होण्याची धोका

भात ः पिकाची प्रतवारी खराब होण्याची चिन्हे

सध्या लाल कांदा काढणी सुरू आहे. ढगाळ हवामानामुळे लगेच काही परिणाम होणार नाही; पण हे वातावरण असेच चार- पाच दिवस राहिले तर कांद्यावर मावा रोग येऊ शकतो आणि पाऊस जर झाला तर शेतात असलेल्या कांद्याच्या पातीत पाणी जाऊन ते पाणी जमिनीतील कांद्यापर्यंत गेल्यावर कांदा खराब होण्याचा धोका आहे.

- संजय कुंदे, कांदा उत्पादक

रब्बी पिकांना या वातावरणामुळे धोका निर्माण झाला असून, पिकांना फटका बसणार आहे. शेतकरी वर्गाला अधिक काळजीपूर्वक रब्बी पिके सांभाळावी लागणार आहेत. द्राक्ष बागांना डावनीने घेरले आहे.

- नाना बच्छाव, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजावर घोंगावतेय संकट

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

गेल्या तीनचार दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी होऊन ढगाळ वातावरण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सकाळी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाल्याने द्राक्ष बागाईतदारांच्या पोटात भूरी व डाऊनीच्या भितीने गोळा उभा राहीला आहे. ढगाळ वातावरणामुळे वेळेवर गहू पिकाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव निर्माण होण्याची शक्यता कुंदेवाडी निफाड येथील गहू संशोधन केंद्राचे डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे या पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

कांद्यावरही परिणाम

सटाणा ः शहर व तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ हवामान असल्याने रब्बी पिकांना त्याचा मोठा परिणाम होणार आहे. मोसम खोऱ्यातील द्राक्ष बागांना डावणीच्या प्रादुर्भाव मुळे मोठा फटका बसला आहे. सटाणा बाजार समिती आवारात आज मोठ्या प्रमाणात कांदा विक्री साठी असतांना शेतकरी वर्गाने लिलावासाठी घाई गर्दी केली होती. तर अनेक शेतकरी आच्छादन घेण्यासाठी बाजारात दाखल झाले होते. कांदाही यामुळे संकटात सापडणार आहे.

त्र्यंबक, घोटीत भात भिजण्याची शक्यता

त्र्यंबकेश्वर ः खरीप हंगामाचा कालावधी वाढला आणि गरी भाते सोंगणीस उशीर झाला आहे. भातांच्या सोंगण्या अंत‌मि टप्प्यांत असून भरून आलेले आभाळ कोसळल्यास शेतात असलेले तयार भात भिजण्याची शक्यता वाढली आहे.

हे प्रयोग करा

माव्याच्या प्रादुर्भाव झाल्यास गव्हावर थायोमिथाक्झाम १ ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी अशी फवारणी करावी

जे शेतकरी जैविक कीडनियंत्रण पद्धतीचा वापर करतात त्यांनी मेटॅरायझीम एनिसोप्ली वा व्हर्टिसिलियम लेकॅनी ४० ग्राम प्रति १० लिटर पाणी घेऊन फवारणी करावी

द्राक्ष बागांवर भूरी व डाऊनी मिल्ड्यू रो असेल तर डायमिथोमार्फ २०० ग्रॅम २०० लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी

भूरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झॅकोनॅझोल किंवा ट्रेट्राकोनॅझोल २०० मिली २०० लिटर पाण्यात घेऊन त्याची फवारणी करावी


रब्बी पिकांना या वातावरणामुळे धोका निर्माण झाला आहे. पिकांना फटका बसणार आहे. शेतकरी वर्गाला अधिक काळजीपूर्वक रब्बी पिके सांभाळावी लागणार आहेत.

- नाना बच्छाव, कृषी तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांनी दिली एफआयआरची धमकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापलिकेच्या नूतन इमारतीच्या सभागृहात सोमवारी प्रथमच झालेली महासभा चांगलीच वादळी झाली. उपमहापौर सखाराम घोडके व आयुक्त संगीता धायगुडे यांच्यात खडाजंगी झाली. घोडके यांनी प्रलंबित कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आयुक्त धायगुडे यांनी ‘तुमच्यावर एफआयआर दाखल करील’ असे विधान केल्याने सर्वच सत्ताधारी नगरसवेक संतप्त झाले. त्यांनी आयुक्तांच्या पुढील हौदात धाव घेत विधान मागे घ्या, अशी मागणी लावून धरल्याने सत्ताधारी व आयुक्त यांच्यात वाद विकोपाला गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.

येथील महापालिकेच्या नव्या सभागृहात सोमवारी महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, आयुक्त संगीता धायगुडे, नगरसचिव राजेश धसे यांच्या उपस्थितीत महासभेचे आयोजन करण्यात आले होते. महासभेच्या अजेंड्यावर असलेल्या विषयांवर चर्चा सुरू होण्यापूर्वीच उपमहापौर सखाराम घोडके यांनी प्रशासनाकडून कोणतेही काम वेळेत होत नसल्याची तक्रार केली. निष्क्रिय प्रशासनामुळेच पालिकेवर ही वेळ आली आहे. एका पीठ गिरणीसाठीचा ना हरकत दाखला मिळण्यास सुद्धा तीन ते सहा महिन्याचा कालावधी लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच प्रशासनावर जादूटोणा झाला आहे का, असे विधान करीत आयुक्त धायगुडे यांना जाब विचारला. संतप्त आयुक्तांनी देखील प्रलंबित कामांची यादी द्यावी दोन दिवसात कामे मार्गी लावते, असे आश्वासन दिले. यावर संतप्त झालेले घोडके व सत्ताधारी नगरसेवक यांनी हौदात धाव घेतल्याने एकच गोंधळ उडाला. तसेच शब्द जपून वापरा,

एफआयआर दखल करण्याचे विधान आयुक्तांनी केल्याने उपमहापौर घोडके, डॉ. खालिद परवेज, नीलेश आहेर, ताहेर शेख, युनुस इसा यांच्यासह सत्ताधारी नगरसेवक आक्रमक झाले. विधान मागे घेवून आयुक्तांनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. अखेर आयुक्त धायगुडे यांनी माझ्या ऐकण्यात चुकी झाली. आय एम सॉरी फॉर डेट, अशा शब्दात माफी मागितल्याने वादावर पडदा पडला.

जलवाहिनीचा सर्वे चुकीचा?

अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी टाकण्यात येणारे जलवाहिनीचा सर्वे चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेला असल्याने पुन्हा सर्वे करण्यात येणार असल्याबाबत उपमहापौर घोडके यांनी प्रश्न उपस्थित केला. यामुळे पालिकेचे अर्थीक नुकसान होणार असल्याने त्याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. यावर महापालिकेचे शहर अभियंता कैलास बच्छाव यांनी जलवाहिनीसाठी करण्यात आलेला सर्वे चुकीचा नसून नवा सर्वे करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.

वॉटर ग्रेसचा ठेका होणार रद्द?

सभागृहात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या विशेष महासभेचे इतिवृत्तवर गटबंधन आघाडीचे बुलंद इक्बाल यांनी आक्षेप घेत उपसूचना आणली. मात्र महापौर शेख यांनी ती फेटाळून लावली. शहरातील कचरा संकलन ठेवा दिलेल्या वॉटरग्रेस कंपनीबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने ठेका रद्द करण्याचा विषय गाजला. यावरून सर्वच नगरसेवकांनी तक्रारी केल्या. धायगुडे यांनी संबधित कंपनीचा ठेका रद्द केला तरी त्यानंतर शहरातील कचरा संकलनाची पर्यायी व्यवस्था पालिकेला उभी करणे शक्य नसल्याचे सांगितले. यावर येत्या दोन महिन्यात चौकशी करून महासभेपुढे अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर शेख यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखेडची यंदा दोनच आवर्तने

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, येवला

पालखेड डाव्या कालव्याची अवघी दोनच आवर्तने यंदा शेती सिंचनासाठी देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात झाला आहे. या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील शेती क्षेत्राला बसणार आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांचे पिक नियोजन धोक्यात आले असून, धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असतांना तीन आवर्तने मिळण्याच्या आशेवर पाणी फेरले आहे.

शेतकरी शेती सिंचनासाठी उपाशी राहणार असल्याची स्थिती आहे. कालवा सल्लगार समितीची बैठक राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि राज्यमंत्री शिवतारे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील विधानपरिषद सभागृहात पार पडली.

या बैठकीत जिल्ह्यातून आमदार नरहरी झिरवाळ यांचेसह अधीक्षक अभियंता राजेश मोरे, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश भाट, येवला तालुक्यातील बळीराज्य पाणीवापर सहकारी संस्थांच्या संघाचे अध्यक्ष संतू पाटील झांबरे, उपाध्यक्ष सुरेश कदम उपस्थित होते.

बैठकीत संतू झांबरे व सुरेश कदम यांनी पालखेड डाव्या कालव्याची तीन आवर्तने देण्याची मागणी केली. अधिकारी वर्गांशी आपण चर्चा करून प्रासंगिक आरक्षणाचे पाणी बचत झाल्यास तिसरे आवर्तन देता येते का? यावर विचार करता येईल, असे जलसंपदा मंत्री महाजन यांनी सांगितले. अखेर पालखेड पाणी नियोजनात दोन आवर्तानावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यावेळी पाणी वापर संस्थेच्या वतीने भूमिका स्पष्ट करतांना, झांबरे आणि कदम यांनी सांगितले, सन २०१५ मध्ये पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पालखेड धरणातून डावा कालव्याला शेती सिंचनासाठी एकही पाणी आवर्तन मिळाले नाही. यामुळे २०१५ या वर्षी कुठलेही पिक हाती न आल्याने शेतकरी हतबल झाला होता. शेती संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती.

गेल्या वर्षी डिसेंबर २०१६ च्या पहिल्या आठवड्यात कालवा सल्लागार समितीच्या नाशिक येथील बैठकीत शेती सिंचनासाठी देखील दोन पाणी आवर्तने जाहीर झाली. परंतु पूर्ण क्षमतेने आवर्तन मिळाले नाही. यंदा देखील शेती जिवंत ठेवण्यासाठी पाणीसाठा धरण क्षेत्रात शंभर टक्के उपलब्ध आहे. तीन आवर्तने देऊन पूर्ण क्षमतेने पाणी द्या, अशी जोरदार मागणी येवल्याच्या शिष्ठमंडळाने केली असतानाही केवळ दोन आवर्तने मंजूर झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपुऱ्या स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था

$
0
0

वाट स्वच्छ आरोग्याची

मटा मालिका भाग ८

ठिकाण ः बिटको कॉलेज

--

अपुऱ्या स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था


टीम मटा

नाशिकरोड परिसरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बिटको कॉलेज कॅम्पसमध्ये स्वच्छतागृहे व प्रसाधनगृहांची अवस्था बिकट आहे. स्वच्छतागृहे विद्यार्थिनींच्या संख्येच्या तुलनेत पुरेशी नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याशिवाय नियमित स्वच्छता आणि सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिनचीही येथे वानवा आहे.

--

नाशिकरोड येथे चांडक-बिटको कॉलेज हे नाशिकरोडचे सर्वांत मोठे कॉलेज आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीचे हे कॉलेज असून, ज्युनिअर कॉलेजमध्ये तीन हजार, तर सीनिअर कॉलेजमध्ये साडेचार हजार असे सुमारे साडेसात हजार विद्यार्थी येथे आहेत. यात विद्यार्थिनींची संख्या निम्म्याहून अधिक आहे. याच संस्थेचे शेजारी कोठारी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट व एम. एस. गोसावी पॉलिटेक्निक कॉलेज आहे.

--

पुरेशा स्वच्छतेचा अभाव

बिटको कॉलेजात नाशिकरोड, विहितगाव उपनगर, जेलरोड, दसक, सामनगाव, एकलहरे, देवळाली कॅम्प परिसराबरोबरच शिंदे, पळसे, भगूर, लहवित, सिन्नर असे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहे असली, तरी त्यांची संख्या विद्यार्थ्यांच्या मानाने अपुरी असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थिनींशी संवाद साधला असता स्वच्छतागृहांची दुरवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले. मुलींसाठी एक टायलेट रूम आहे. स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता केली जात नाही. काही वेळा येथे पाणी असते, तर काही वेळा नसते. अस्वच्छ स्वच्छतागृहांमुळे विद्यार्थिनींचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोठारी मॅनेजमेंट, गोसावी पॉलिटेक्निक, बीबीए इमारतीत स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत. मात्र, त्यांची अवस्था फारशी समाधानकारक नसल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. ‘नॅक’च्या पार्श्वमूमीवर बिटकोमध्ये नवीन स्वच्छतागृह बांधावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

--

महिला कॉलेजात कमोडच नाही

नाशिकरोडला फक्त महिलांसाठी असलेले एकमेव कॉलेज म्हणजे बिंदू रामराव देशमुख महिला कॉलेज होय. येथे कनिष्ठ आरंभ कॉलेज, तर वरिष्ठ महिला कॉलेज अशी स्वतंत्र कॉलेजेस आहेत. अकरावी-बारावीसाठी आरंभ कॉलेज असून, त्यामध्ये मुलींबरोबरच मुलांनाही प्रवेश आहे. महिला कॉलेजमध्ये एफवाय ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण दिले जाते. येथे फक्त मुली आहेत. आरंभ कॉलेजमध्ये दोन हजार विद्यार्थी असून, महिला कॉलेजात साडेनऊशे विद्यार्थिनी आहेत. शिंदे, पळसे, लहवित, वडनेर, नायगाव, मनमाड, विंचूर, एकलहरे, देवळाली कॅम्प, चेहेडी, जेलरोड, उपनगर येथून विद्यार्थिनी महिला कॉलेजात शिक्षणासाठी येतात. येथे अपंग विद्यार्थिनींसाठी कमोडची सुविधा नाही

--

जागेची अडचण

महिला कॉलेजात एकच स्वच्छतागृह असून, त्यात पाच भांडी आहेत. त्यांची नियमित स्वच्छता केली जाते, असा व्यवस्थापनाचा दावा आहे. मात्र, विद्यार्थिनींच्या तक्रारी आहेत. स्वच्छतागृहांची निगा नियमित राखावी, पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी, स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी, अशी विद्यार्थिनींची मागणी आहे. ठेकेदार स्वच्छतेचे काम व्यवस्थित करत नाही. कॉलेज प्रशासनाचे म्हणणे असे, की मुलींसाठी स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्याची इच्छा आहे. परंतु, जागेची टंचाई आहे. जागा उपलब्ध झाल्यास स्वच्छतागृहांची संख्या वाढविता येईल.

--

बिटको कॉलेजात चार हजारांवर विद्यार्थी आहेत. त्यामध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यांच्या तुलनेत स्वच्छतागृहे अपुरी पडत आहेत. ही संख्या तातडीने वाढविण्याची गरज आहे. स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करावी.

-ऋतुजा आचार्य, विद्यार्थिनी

--

बिटको कॉलेजमध्ये ग्रामीण भागातून विद्यार्थिनी शिकण्यासाठी येतात. विद्यार्थिनींसाठी नाशिकरोडला सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे मुलींची भिस्त कॉलेजातील स्वच्छतागृहांवर आहे. येथे संख्या कमी असल्यामुळे गर्दी होते. तरी स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी.

-गायत्री शिंदे, विद्यार्थिनी

--

आरंभ कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसाठी नवीन स्वच्छतागृहांची अत्यंत गरज आहे. सध्याची स्वच्छतागृहे स्वच्छ नाहीत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संस्थेने त्वरित नवीन स्वच्छतागृह बांधावे, जेणेकरून हा प्रश्न निकाली निघेल.

-पूजा शिंदे, विद्यार्थिनी

--

संस्थेचे पदाधिकारी म्हणतात...

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की बिटको कॉलेजमधील विद्यार्थिनींसाठी पुरेशी स्वच्छतागृहे आहेत. त्यांची नियमितपणे स्वच्छता केली जाते. विद्यार्थिनींच्या आरोग्याला बाधा होणार नाही याची काळजी घेतली जाते. काही समस्या असतील तर त्या दूर केल्या जातील. विद्यार्थिनींनी यासंदर्भात प्राचार्यांशी संपर्क साधावा. विद्यार्थिनींच्या आरोग्याला आमचे पहिले प्राधान्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भातशेती परवडणार तरी कशी?

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, घोटी

भाताचे आगार असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात भात सोंगणी अंतिम टप्प्यांत आली आहे. परतीचा पावसाने वाचलेले भात पीक किडरोगाच्या प्रादुर्भावात आले होते. ते कसेबसे वाचवून शेतकरी सध्या भात सोंगणी करीत आहे. मात्र दरवर्षी वाढता खर्च आणि हाती येणारे उत्पन्न याचा ताळमेळ घालताना शेतकरी मेटाकुटीस येत आहे.

तालुक्यात सर्वत्र भातपिकास मोठ्या प्रमाणात रोगराईने ग्रासले असल्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. शेतकरी अगोदर परतीच्या पावसाने हैराण होता. आता डोळ्यासमोर पिकाचा झालेला पाचोळा पाहून हवालदिल झाला आहे. वाढलेल्या मजुरीचा खर्च पाहता सोंगणी करणे देखील तोट्याचे होतेय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गतवर्षी जुलै २०१६ मध्ये झालेल्या नुकसानीची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पंचायत समिती कृषी विभाग तालुक्यात सुरक्षित फवारणी कशी करावी याचा चित्ररथ काढून मिरवत आहे. मात्र अतिपावसाने आलेल्या संकटाला कसे तोंड देणार? याचे उत्तर त्यांच्याकडे मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. भातशेती पेरणीपासून ते सोंगणीपर्यंतचा खर्च दिवसोंदिवस वाढत आहे. त्यामध्ये यावेळेस औषधांच्या खर्चाचा भुर्दंड बसल्यामुळे तोटा वाढला आहे. एकरी खर्च यांत्रिक शेतीने वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाकिया पैसा लाया

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची शाखा आता देशभरात सुरू झाल्या असून, त्यात पोस्टमनमार्फत घरपोच पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. या बँकेमार्फत आधार रिलेबल पेमेंट सुविधा सुरू करण्यात येणार असून, त्यात सरकारच्या विविध योजनांचे पैसेही मिळणार आहेत. ग्रामीण भागात याचा मोठा फायदा होणार आहे. यात नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती मुख्य पोस्टमास्तर जनरल एच. सी. अग्रवाल यांनी दिली. ३१ मार्चपर्यंत राज्यात ४२ बँका सुरू होणार असून, त्यात ही सुविधा आहे.

उपनगर येथे महाराष्ट्र व गोव्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ट्रेनिंग सेंटरच्या उद््घाटन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, इंडियन पोस्ट पेमेंट बँक सुरू झाल्यानंतर अनेक पेमेंट देण्याच्या सुविधाही ऑनलाइन होतील. त्यासाठी काही आताच सुरू केल्या आहेत. पोस्टाने अत्याधुनिक सुविधा सुरू केल्यामुळे पोस्टाचे काम वाढले आहे. अनेकांना आमचे काम कमी झाले असे वाटत असले तरी त्यात वाढ झाली आहे. स्पीड पोस्ट व विविध सुविधांमुळे पोस्टाने आता अत्याधुनिक तंत्राचा वापर सुरू केला आहे. मुंबईमध्ये आम्ही पोस्टमनला जीप दिल्या आहेत, तर काही ठिकाणी मोटारसायकल दिल्या आहेत.

महाराष्ट्र सर्कलचा वाटा २० टक्के

देशाच्या पोस्टाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्र सर्कलचा वाटा २० टक्के असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र सर्कलमध्ये महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांचा समावेश आहे. या सर्कलमध्ये ४८ डिव्ह‌िजन ऑफ‌िस असल्याचेही त्यांनी सांगितले.


नाशिकमध्ये पोस्ट बँक

नाशिकमध्येसुद्धा इंडियन पोस्ट पेमेंट बँक होणार असून, त्यासाठी तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. देशभर या बँका सुरू होणार असून, त्यामुळे सर्वत्र त्याचा फायदा होणार आहे.

पोस्टात मिळणार ‘आधार’

राज्यातील १३०० पोस्ट कार्यालयांत आधार कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी बायोमेट्रिक उपकरण तसेच संगणक कनेक्‍टिव्हिटी यांसारख्या सुविधा टपाल कार्यालयात असणार आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत याबाबतच्या पूर्तता करण्याच्या सूचना आहेत. त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिले जात आहे. नाशिकच्या या ट्रेनिंग सेंटरमध्ये आधार संबंधित ट्रेनिंगनेच सुरुवात करण्यात आली आहे. पोस्टाच्या कार्यालयांत नवीन कार्ड तर मिळतीलच, पण जुन्या आधार कार्डांतील माहितीत बदलही करता येणार असल्याची माहिती मुख्य पोस्टमास्तर जनरल एच. सी. अग्रवाल यांनी दिली.

उपनगर येथे महाराष्ट्र व गोव्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ट्रेनिंग सेंटरच्या उद््घाटन सोहळ्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले की, पोस्टाच्या या सुविधेमध्ये आधार कार्डावरील नाव, पत्ता, मोबाइल क्रमांकात बदल करण्याची सुविधा सर्वांना उपलब्ध होणार आहे. ट्रेनिंग सेंटरची माहिती देताना ते म्हणाले की, महाराष्ट्र सर्कलमध्ये असणारे महाराष्ट्र व गोवा राज्यातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना गुजरातमधील बडोदा येथे ट्रेनिंग दिले जात होते. आता ही सुविधा महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यात नाशिकची निवड झाली आहे. पोस्ट खात्याने विविध योजना सुरू केल्या असून, त्यात नवनवे सॉफ्टवेअर तयार केले आहेत. त्याचे ट्रेनिंग येथे दिले जाणार आहे.

असे आहे ट्रेनिंग सेंटर

या ट्रेनिंग सेंटरमध्ये एक कॉन्फरन्स हॉल, तीन कॉम्प्युटर लॅब, मेस व स्टाफ रूमसह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी दोन इमारतींत निवासाची व्यवस्थाही केली आहे. एका वेळेस ७२ जणांना ट्रेनिंग घेता येणार आहे. यावेळी औरंगाबद विभागाचे पोस्टमास्तर जनरल प्रणव कुमार, एपीएमजी एस. बी. व्यवहारे, मुंबईचे अधिकारी रुपेश सोनवणे, संतोष कुलकर्णी, नाशिक विभागाचे एसएसपीओ पी. जे. काखंडकी, एस. बी. लिंगायत, एस. आर. फडेक, एच. ई. खडकीकर यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नाशिक निवड ठरली महत्वाची

पोस्टाच्या १० एकर जागेत याअगोदर स्टॅम्प डेपो, स्टोअर डेपोसह निवासी इमारती आहेत. त्यात काही काम कमी झाल्यामुळे जागा उपलब्ध होती. त्यामुळे या जागेची निवड केली व हे कामही युद्धपातळीवर पूर्ण करण्यात केले. पोस्टात बचत बँक, आरडी, मुदत ठेव, ज्येष्ठ नागरिक योजना, पीपीएफ, मंथली इन्कम स्किम, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सुकन्या, पीएफ या योजना आहेत. त्यातून ग्राहकांना चांगली सेवा देता यावी, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना येथे प्रशिक्षित केले जाणार आहे.

मराठमोळे स्वागत

ट्रेनिंग सेंटरच्या उद््घाटन सोहळ्यात मराठमोळे स्वागत करण्यात आले. यावेळी गुलालवाडी ढोल पथकाने आपल्या कलेचा अविष्कार दाखवला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांना फेटा बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघातात कळवणचा कॉलेज तरुण ठार

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कळवण

मोटरसायकल व ट्रक अपघातात कळवण महाविद्यालयातील विद्यार्थी जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. याबाबत कळवण पोल‌िस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदव‌िण्यात आला आहे.

कळवणच्या गांधी चौकात राहणारा व कळवण महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकणारा किशोर नानाभाऊ पगार (वय २२) व गौरव जगदीश वाघ (वय १९) हे दोन्ही सकाळी ११ वाजेच्या सुमारास मानूर येथील कळवण महाविद्यालयात जात होते. बीएसएनएल केंद्रापुढील वळणावर समोरुन येणारा ट्रक आणि मोटारसायकल यांच्यात अपघात झाला. यात किशोर मोटारसायकलवरून फेकला गेला. रक्तश्राव अधिक झाल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला. गौरवच्या पाठीच्या मणक्याला मार लागला असून त्याला उपचारासाठी नाशिकला हलव‌िण्यात आले आहे.

मयत किशोर हा कळवण महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकत होता. सुंदर हस्ताक्षर व हुशार विद्यार्थी म्हणून तो सर्वांना परिचित होता. त्याच्या निधनाचे वृत्त कळताच शेकडो विद्यार्थ्यांनी कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तेथे मित्र परिवार व कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. सायंकाळी ४ वाजता शोकाकुल वातावरणात किशोरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, कळवण पोल‌िस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल असून अधिक तपास निरीक्षक सुजय घाडगे, उपनिरीक्षक रमेश सोनजे व टीम करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेट्टींसाठी महासभाच तहकूब

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पारदर्शक कारभाराच्या टिमक्या वाजवणाऱ्या भाजपने सोमवारी महासभा नियमावलीची एैसीतैसी करत, नवा पायंडा पाडला आहे. खुनाच्या आरोपाखाली अटक असलेला भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी याचे नगरसेवक पद वाचवण्यासाठी स्वीकृत नगरसेवकांच्या आनंदोत्सवाचे कारण देत महासभा मंगळवारपर्यंत तहकूब केली आहे. विशेष म्हणजे किरकोळ कारणावरून नेहमी विरोध करणाऱ्या विरोधकांनीही सभागृहात ब्र शब्दही न काढता भाजपच्या अपारदर्शक कारभाराला मूक साथ दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महाराष्ट्र महापालिका अधिनियम ११ अन्वये शेट्टी सोमवारी अनुपस्थित राहीला असता तर, त्याचे सदस्यत्व रद्द झाले असते. त्यामुळे शेट्टीला मंगळवारी हजर करून त्याचे पद वाचविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

पंचवटीतील प्रभाग क्रमांक ४ मधील भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी याला पोलिसांनी २६ मे रोजी ज्वालिंदर उर्फ ज्वाल्या उगमुगले याच्या खुनाखाली अटक केली होती. त्यामुळे शेट्टी सहा महिन्यांपासून महासभेला गैरहजर राहिला आहे. नगरसेवक सलग सहा महिने महासभेला गैरहजर राहिल्यास त्याचे सदस्यत्व आपोआप रद्द होते. शेट्टी हा १८ मे रोजीच्या महासभेला उपस्थित होते. परंतु २९ मे रोजी विशेष महासभेपासून तो अनुपस्थित आहे. नोव्हेंबर महिन्यातील महासभा सहावी असून, यात तो गैरहजर राह‌ल्यिास त्याचे नगरसेवक पद रद्द होवू शकते. परंतु कायदेशीर मार्ग काढण्यासाठी नगरसेवक शेट्टी याने अर्ज दिल्याचा दावा त्याच्या वकिलांकडून केला जात आहे. येत्या तीस तारखेला सहा महिने पूर्ण होत आहे.सोमवारची महासभा पूर्ण झाली असती, तर नियमित महासभा डिसेंबर महिन्यात बोलवावी लागली असती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मधला मार्ग काढत, महासभा धार्मिक स्थळांच्या विषयाचा दाखला देत, एक दिवसासाठी तहकूब करण्याची खेळी खेळली. स्वीकृतचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महासभा तहकूबची घोषणा महापौरांनी केली. त्यामुळे शेट्टीला एक दिवसाचे अभय मिळाले आहे.

विरोधकांचीही साथ

महासभेत एरव्ही छोट्या विषयांवरून सभागृह डोक्‍यावर घेणाऱ्या विरोधकांची या विषयावरची बोटचेपी भूमिका संशयास्पद होती. महासभा तहकूबीची नियमावली असतांनाही, महापौरांनी सभा तहकूब करून लगेच मंगळवारी घेण्याचे जाहीर केले. या निर्णयाला प्रखर विरोधऐवजी विरोधकांनी केवळ औपचारीकता पूर्ण केली. विशेष म्हणजे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेच्या गटनेत्यांनी एकत्र येत लग्नतिथीचे कारण दिले व शुक्रवारी (ता. २४) सभा घेण्याची मागणी केली. त्यामुळे शेट्टींला वाचवण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आल्याची चर्चा रंगली होती.


सोमवारच्या महासभेवर रिकाम्या भूखंडावरील धार्मिक स्थळे नियमीत करण्याचा प्रस्ताव होता. प्रभारी आयुक्त महासभेला येवू शकले नसल्याने मंगळवारी महासभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

रंजना भानसी, महापौर

पारदर्शक कारभाराचा जप करणाऱ्यांचा भोंगळ कारभार समोर येत आहे. कोणालाच विश्वासात न घेता महासभा तहकूब केली आहे. शेट्टीला वाचवण्याचा दुबळा प्रयत्न केला जात आहे.

अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावातील व्यक्तीनेच दिली खबर

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील दसाणे येथे गत पंधरवाड्यात टाकलेल्या दरोड्याचा उलगडा करण्यात सटाणा पोलिसांना यश आले आहे. या दरोडाप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या चार जणांमध्ये एक आरोपी दसाणेतीलच असल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

दसाणे येथील केवळ खैरनार व त्यांच्या पत्नी सुशीला खैरनार हे झोपते असतांना अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांनी घरात त्यांना मारहाण करून १२ लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. घटेनेचे गांर्भीय लक्षात घेवून जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय दराडे, अप्पर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पाहणी केली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक कर्पे व सटाणा पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी गुन्ह्याचा कसोशीने तपास सुरू केला. सोमनाथ गुलाब पवार (वय ३७ रा. जाखोड) यास ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील गारखेडा येथील सुनील काळे (२०) आकाश चव्हाण (२३) व दसाणे येथील दयाराम पवार (४५) यांचेसह इतर साथीदारांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

दीड वर्षापासून पाळत

आरोपी दयाराम पवार दसाणे येथे वास्तव्यास असून त्याने संबंध‌ित शेतकऱ्याची माहिती गारखेडा येथील आपले साथीदार सुनील काळे व आकाश चव्हाण यांना दिली. तब्बल एक ते दीड वर्षापासून सदर शेतकऱ्याची माहिती घेवून दरोड्याचे नियोजन करीत होते. आरोपी सोमनाथ पवार याने दरोडा टाकून नेलेल्या पैशांतून खरेदी केलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.

अन्सार कॉलनीत घरफोडी

मालेगाव : शहरातील अन्सार कॉलनीतील घरातून अज्ञात चोरट्यांनी आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार आएशानगर पोल‌िस ठाण्यात नोंदवली आहे. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी २ ते ४ च्या दरम्यान अन्सार चोरट्यांनी घरातून चार हजार रुपये रोख आणि चार हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. घर मालक फैजी मोहंमद आयुब (वय ६३) यांनी पोल‌िस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक एव्हरशाइनला सुवर्णपदक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात सुरू असलेल्या तीन दिवसीय क्रिकेट महाकुंभात पिंप्री पँथर्स संघाने सर्वच आघाड्यांवर जोरदार कामगिरी करीत पहिल्या क्रमांकाचे प्लॅटिनम पदक मिळवले तर यजमान नाशिक एव्हरशाइनने सुवर्णपदक मिळवत स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. नागपूर ऑरेंज सिटीने सिल्वर तर थ्री के तमील्सने इलाईट पदकावर मोहर उमटवली.

इंटरनॅशनल फेलोशिप क्रिकेट लव्हिंग रोटरीयन व मंत्रा ग्रीन रिर्सोस यांच्या विद्यमाने या क्रिकेट महाकुंभाचे पारितोषिक वितरण मिसेस महाराष्ट्र आयकॉन पूनम बेडसे, आयएफसीआर वर्ल्डचे सेक्रेटरी केआरपी सारथी, आयएफसीआर इंडियाचे चेअरमन चित्तरंजन चौधरी, व्हाईस चेअरमन आर. नीलकंठ, आयएफसीआर वर्ल्डचे माजी चेअरमन रवीरमण, डीजीई इलेक्ट १९२० चे राजेंद्र भामरे यांच्या हस्ते गोल्फ क्लब मैदानावर झाले.

पिंप्री पँथर्स, नाशिक एव्हरशाइन, रायगड वॉरिअर्स, कुंभकोणम, पुणे ३१३१ या संघांनी साखळी फेरीपासूनच गुणतालिकेत वरच्या स्थानावर राहत स्पर्धेवर वर्चस्व राखले होते. मैत्रीपूर्ण वातावरणात होत असलेल्या या स्पर्धेत साखळी सामन्यानंतर गुणतालिकेत प्रथम आठ संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. सर्वाधिक सरासरी असलेल्या पिंप्री पँथर्स आणि रायगड वॉरिअर्स संघांत प्लॅटिमन पदकासाठी लढत रंगली. त्यात पिंप्री पँथर्सने २० षटकांत १८३ धावांचा डोंगर उभारला. त्यास प्रतिउत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या रायगड वॉरिअर्स संघाचा डाव केवळ १३० धावांत आटोपला. यात पिंप्री पँथर्सचे शेखर दालमिया यांनी अष्टपैलू खेळ करत संघाला विजय मिळवून दिला. त्याबद्दल त्यांना सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

नाशिक एव्हरशाइन संघाने दुसऱ्या अंतिम सामन्यात कुंभकोणम संघासमोर तब्बल १९३ धावांचे लक्ष्य ठेवले. कुंभकोणम संघाला मोठे आव्हान असताना सुरुवातीपासूनच गळती लागल्याने त्यांचा दावा १३० धावांतच आटोपला. नाशिक एव्हरशाइनचे संतोष दिंडे यांनी ३० धावा आणि २ गडी बाद करताना अष्टपैलू कामगिरी करीत सामनावीर ठरले.

तिसऱ्या अंतिम सामन्यात नागपूर ऑरेंज सिटी संघाने आयएफसीआर पुणे ३१३१ चे १५२ धावांचे आव्हान केवळ १५.४ षटकांत पूर्ण करत सिल्वर मेडल पटकावले. तर अखेरच्या सामन्यात थ्री के तमिळ संघाने मद्रास सुपर किंग्सवर मोठा विजय मिळवत इलाइट पदक मिळवले. स्पर्धेत मॅन ऑफ द सिरिजचा पुरस्कार नाशिक एव्हरशाइनचे संतोष दिंडे यांना मिळाला. त्यांनी ५ सामन्यांत सर्व सामन्यात नाबाद राहत ९० धावा आणि ५ बळी मिळवले. पुणे ३१३१ चे ज्ञानेश्वर झेंडे यांनी ११८ धावा करीत सर्वोत्कृष्ट फलंदाज तर विनोद कर्डिले यांनी चार सामन्यात सात बळी मिळवत स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरले. महाकुंभ यशस्वीतेसाठी आयएफसीआर डिस्ट्रीक्ट ३०३० चे चेअरमन तुषार चव्हाण, डॉ. यू. के. शर्मा, बाळा राठी, आशा वेणूगोपाल, संतोष दिंडे (सचिव), विनोद कर्डिले, संजय कलंत्री, महेश उपाध्ये, डॉ. अनिरुद्ध भांडारकर, डॉ. भूषण नेमाडे, विनोद जाधव, सचिन पाटील आदी परिश्रम घेत आहेत.
श्रीलंकेत रंगणार रोटरी क्रिकेट मिनी फेस्टिवल

पुढील वर्षी जानेवारी महिन्यात श्रीलंकेत रोटरी क्रिकेट मिनी फेस्टिवल घेण्याची घोषणा आयएफसीआर इंडियाचे चेअरमन चित्तरंजन चौधरी यांनी केली. १९९७ मध्ये उदयास आलेल्या इंटरनॅशनल फेलोशिप क्रिकेट लव्हिंग रोटरी अंतर्गत १० देशांत वर्ल्ड रोटरी क्रिकेट फेस्टिवल घेतला जातो. सर्वच रोटरी क्लब्सना या फेस्टिवलमध्ये सहभागी करून घेण्याचा मानस यावेळी रिचर्ड यांनी व्यक्त केला. मैत्रीपूर्ण वातावरणात घेतल्या जाणाऱ्या या सामन्यांत रोटरी सदस्यांची जागतिक स्तरावर नोंद ठेवली जात असून, २००९ पासून बीसीसीआयच्या धर्तीवर नियोजन केले जात आहे. या क्लबचे भारतात ८०० तर जगभरात एकूण २००० सदस्य आहेत. ऑगस्ट २०१८ मध्ये श्रीलंकेत मिनी क्रिकेट फेस्टिवल तर २०१९ मध्ये जागतिक स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवक वाढली, दरांत घसरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला लवकर पिकू लागला आहे. त्यामुळे बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढली आहे. मागणी स्थिर असल्यामुळे दरात घसरण होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आवक ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. त्याच प्रमाणात दरांमध्ये घसरण झाली आहे.

थंडी सुरू झाल्यापासून भाजीपाल्याची आवक मर्यादित होती. थंडीच्या मोसमात रोग-किडींचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे भाजीपाल्याचा दर्जाही चांगला होता. मात्र, ढगाळ हवामान येताच भाजीपाला पिकण्याचे प्रमाण वाढले. भाजीपाल्याची मागणी आणि त्याचा पुरवठा यांच्यात तफावत होऊ लागल्यामुळे त्याच्या दरात घसरण सुरू झाली. वांगी पिकाचे दोन दिवसांपूर्वीचे दर ४० ते ७५ रुपये प्रतिकिलो होते, ते सोमवारी २० ते ४० रुपये असे कमी झाले. दुधी भोपळ्याचीही परिस्थिती अशीच झाली असून, दर ३ ते ७ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

--

उत्पादन खर्च वाढणार

भाजीपाला पिकाचे परतीच्या पावसाने नुकसान झाले होते. त्यानंतर पिकांची वाढ चांगली होऊ लागली असतानाच ढगाळ वातावरणाने उत्पादनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. रोग-किडींची वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बुरशीनाशक व कीडनाशकांच्या फवारण्यांचा खर्च वाढणार आहे. या वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर मिळत नसल्यामुळे पुन्हा शेतकरी अडचणीत सापडणार असल्याचे चिन्ह दिसू लागली आहेत.

---

सोमवारची आवक आणि दर

--

भाजीपाला...........आवक (क्विंटलमध्ये)............मिळालेला दर (प्रतिकिलो)

टोमॅटो.................१६९२...............................१२ ते ४१

वांगी..................११७..................................२० ते ४०

फ्लॉवर...............२९७...................................७ ते १२

कोबी..................४५०...................................८ ते १६

शिमला मिरची.....२५८...................................३१ ते ५६

दुधी भोपळा.........७६८....................................३ ते ७

कारले ................३७८...................................१६ ते २८

दोडका.................१९३ ..................................१६ ते २९

गिलके................२२ .....................................१२ ते २०

भेंडी...................१५.......................................१६ ते ३३

गवार.................४० .....................................३० ते ६०

काकडी...............७३४.....................................७ ते १५

-------------------

पालेभाज्या ...............आवक (जुडी).............दर (प्रतिजुडी)

कोथिंबीर...................५५,६००......................११ ते ३०

मेथी.........................८२,३००.......................६ ते १४

शेपू...........................१०,२००.......................१४ ते २०

कांदापात.....................२५,८००......................१० ते २५

---

वातावरणाने धास्तावले शेतकरी

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

खरिपाच्या हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर सावरत असलेले शेतकरी आता ढगाळ वातावरणामुळे धास्तावले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश द्राक्षपीक फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. पाऊस झाल्यास द्राक्षबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

द्राक्षबागेच्या ऑक्टोबर छाटणीच्या वेळी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. खरिपाच्या सोयबीन, भुईमूग, मका आदी पिकांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीला तोंड देत त्यातून सावरत रब्बीच्या हंगामाच्या पेरण्यांची कामे उरकण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. रब्बीच्या ज्या काही पेरण्या झालेल्या आहेत, ती पिके डोकावत असताना पाऊस आल्यास त्यांचे नुकसान होईल, या विचाराने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. प्रतीक्षेत असलेली कर्जमाफी, जिल्हा सहकारी बँकेत अडकलेले पैसे, कृषिपंपांची वीजबिले भरण्यासाठी लागलेला तगादा यामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत सापडलेला असताना आता बदलत्या वातावरणामुळे त्याची अवस्था बिकट झाली आहे.

द्राक्षबागांवर संकट

जिल्ह्यातील नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्राक्षासारख्या नाजूक पिकावर बदलत्या वातावरणाचा लवकर परिणाम होत असतो. थंडीनंतर अचानक ढगाळ वातावरण झाल्यामुळे द्राक्षांच्या वाढीवर विपरित परिणाम आणि रोग-किडींचा प्रादुर्भाव अशा समस्या निर्माण होत आहेत. त्यापासून वाचविण्यासाठी रोगप्रतिबंधात्मक औषधांच्या फवारण्या कराव्या लागत आहेत. परतीच्या पावसाच्या वेळीही अतिरिक्त फवारण्यांच्या खर्चाचा भार शेतकऱ्यांवर पडला होता. आता आणखी फवारण्या कराव्या लागत असल्यामुळे उत्पादन खर्च वाढणार आहे.

ग्रामीण भागातही फटका

घोटी ः इगतपुरी व घोटी परिसरातही ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावले आहेत. सोमवारी दुपारी दोनपर्यंत तालुक्यात सूर्यदर्शन झाले नाही. पहाटेपासूनच ढगाळ वातावरण असल्याने थंडीची तीव्रता वाढली होती. साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक पावसाचा शिडकावा झाल्याने जोराचा पाऊस येतो की काय, अशी चिंता शेतकरीवर्गात पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगराध्यक्षपदासाठी अद्याप एकच अर्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वरचा नगरपालिका निवडणुकीसाठी दहा डिसेंबर रोजी मतदान आणि ११ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. अवघ्या २१ दिवस बाकी आहेत. सोमवारी नगराध्यक्षपदासाठी बाळकृष्ण कमळाकर झोले यांनी आपला अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. तर प्रभागातील १७ जागांसाठी अवघे तीन अर्ज आले आहेत.

सन २००२च्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाळकृष्‍ण झोले यांनी अपक्ष उमेदवारी करत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला होता. मात्र लढण्याची उमेद कायम ठेवत त्यांनी आपला अर्ज दाखल केला.

पक्षश्रेष्ठींचा तळ

जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, निरीक्षक, पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर येथे तळ ठोकला आहे. उमेदवारी निश्च‌ित करण्यासाठी बैठका आणि गुप्त खलबते सुरू आहेत. परस्परांना शह देत असतांना युद्धाच्या आधीच तहाची बोलणी अशी परिस्थ‌िती निर्माण झाली आहे.

मनधरणी सुरू

त्र्यंबक येथे निवडणुकीत मोठी आर्थिक उलाढाल होत असते. पदरी अपयश येते याचा धसका घेऊन काही जागांवर उमेदवार उभे करतांना पक्षनेत्यांना त्यांची मनधरणी करण्याची देखील वेळ आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा महोत्सवाच्या तयारीस सुरुवात

$
0
0

सिन्नरला दि. २६ डिसेंबरपासून रंगणार थरार

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

येथील आडवा फाटा परिसरातील मैदानावर नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन व जिल्हा तालिम संघ यांच्या मान्यतेने क्रीडा महोत्सवांतर्गत दि. २६ डिसेंबरपासून जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धा व आमदार चषक कुस्ती स्पर्धा या जिल्हास्तरीय स्पर्धांचा थरार रंगणार आहे. या स्पर्धांसाठी खेळाचे मैदान तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी (दि. २०) आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, यांच्या हस्ते करण्यात आले.

नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जिल्हा समन्वयक उदय सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, गटनेते हेमंत वाजे पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे, उपसभापती वेणूबाई डावरे, गटनेते संग्राम कातकाडे, पंचायत समिती सदस्य जगन पाटील भाबड, चिंचोलीचे माजी सरपंच संजय सानप आदी उपस्थित होते. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे नाशिक जिल्ह्याचे पुरूष व महिलांचे संघ निवडणार असून, हे संघ १ ते ४ डिसेंबरदरम्यान कराड, सांगली येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेची निवड चाचणी

नाशिक जिल्हा तालिम संघाच्या वतीने ४० वी कुमार व ६१ वी पुरूष आमदार राजाभाऊ वाजे चषक जिल्हा अजिंक्य व निवड चाचणी कुस्ती स्पर्धा दि. २८ व २९ नोव्हेंबर रोजी होणार असून, पुरूष गट वजन (गादी) १० गट व १० गट (माती) प्रत्येक तालुक्यातून ३० खेळाडु ५० प्रशिक्षक व्यवस्थापक व पंच असतील. तर २८ नोव्हेंबरला दु. ४.०० वाजता वजने होतील तसेच २९ नोव्हेंबरला सकाळी ८.०० वाजता कुस्त्या सुरू होतील. स्पर्धा यशस्वीतेसाठी नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार जयंत जाधव, कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे, सहसचिव महाराष्ट्र राज्य प्रकाश बोराडे, जिल्हा समन्वयक उदय सांगळे, प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड, सहकार्यवाह प्रकाश भाबड राज्य संघटनेचे सहकार्यवाह प्रकाश बोर्‍हाडे, विलास पाटील आदी परिश्रम घेत आहेत.


स्पर्धेचे स्वरूप

दिवसा व सायंकाळी प्रकाशझोतात सामने होणार

पुरूषांचे चार तर महिलांचे दोन मैदानात सामने

प्रेक्षकांसाठी ६००० आसनक्षमतेची गॅलरी

तालुक्यातून पुरुषांचे ४८, महिलांचे १८ कबड्डी संघ

कबड्डीचे ७९२ खेळाडूंसह १२० प्रशिक्षक व व्यवस्थापक, ५० पंच, ५० पदाधिकारी सहभागी

स्पर्धेत पुरुषांचे साखळीचे ७२ व बाद पद्धतीचे ११ असे ८९ सामने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इनोव्हातच उघडले सोनोग्राफी सेंटर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्त्री भ्रूणहत्येविरोधात सरकारने कठोर कायदा केल्यानंतरही काही सोनोग्राफी चालकांकडून बेकायदेशीररीत्या गर्भलिंगनिदान केले जात असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे चोरी लक्षात येऊ नये, यासाठी नानाविध क्लृप्त्या लढवल्या जात असून, सातपूरला एका डॉक्टरने चक्क इनोव्हा कारमध्ये सोनोग्राफी केंद्र सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने तब्बल दोन महिने पाळत ठेवून या संबंधित डॉक्टरचे पितळ उघडकीस आणले आहे. आदिवासी भागातील महिलांची कारमध्येच तपासणी करून गर्भलिंग निदान करण्याचा उद्योग असल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले आहे. संबंधित डॉ. तुषार पाटीलच्या सातपूरमधील सोनोग्राफी केंद्राची नोंदणी निलंबित केली आहे. त्याचबरोबर त्याच्या विरोधात न्यायालयीन दावा दाखल करण्याची तयारी महापालिकेने केली आहे.

पीसीपीएनडीटी अॅक्ट १९९४ व सुधारित २००३ नुसार गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, डॉक्टर आणि सोनोग्राफी चालकांकडून त्यांचे सर्रास उल्लंघन केले जात असून, असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते. या संदर्भातील कायदा कडक झाल्याने काही डॉक्टरांकडून यासाठी वेगवेगळी शक्कल लढवली जात आहे. सातपूरमधील एमएचबी कॉलनीत शाकुंतल डायग्नोस्टिक सेंटर म्हणून डॉ. पाटील याचे सोनोग्राफी केंद्र आहे. डॉ. पाटील आपल्या इनोव्हा कार (एचएच १५/बीडब्लू ५९४९) या वाहनात सोनोग्राफीद्वारे गर्भलिंग निदान करीत असल्याची तक्रार पीसीपीएनडीटी अॅक्ट १९९४ व सुधारित २००३ नुसार महापालिका कार्यक्षेत्रात कार्यरत ‘आमची मुलगी’ या वेबसाइटवर फेब्रुवारीत प्राप्त झाली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत महापालिकेच्या डॉ. आरती चिरमाडे, डॉ. विजय देवकर व डॉ. जितेंद्र धनेश्वर यांच्या पथकाने डॉ. पाटील याचे सोनोग्राफी केंद्र, तसेच इनोव्हा कारवर पाळत ठेवली. तीन महिन्यांपूर्वी त्याच्या इनोव्हा कारची तपासणी केली असता कारच्या डिक्कीत रुग्णांची सोनोग्राफी करण्यासाठी लागणारे, गादी, दोन प्रोब, सोनी व्हिडीओग्राफिक प्रिंटर, लॅपटॉप, गादी, दोन उशा, वेगवेगळे वायर कनेक्टेड, यूपीएस, की बोर्ड, सोनोग्राफी जेल, टिश्यू पेपर आदी साहित्य आढळून आले. हे साहित्य त्याने त्रंबकेश्वर येथील नोंदणीक़त केंद्रावरून आणल्याचे आढळून आले.

या कृत्याद्वारे डॉ. पाटील यांनी पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याने महापालिकेने डॉ. पाटील याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यांनी नोटिशीला सादर केलेला खुलासा व त्याचे म्हणणे सल्लागार समितीवर सादर केले असता खुलासा असमाधानकारक असल्याने त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. अतिरिक्त संचालक, पुणे तथा राज्य समुचित अधिकारी यांनीही कारवाई करण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले. त्यानुसार डॉ. तुषार पाटील याच्या शाकुंतल डायग्नोस्टिक सेंटरमधील सोनोग्राफी मशीन डॉ. आरती चिरमाडे, डॉ. जितेंद्र धनेश्वर, अॅड. सुवर्णा शेफाळ यांनी पंचांच्या समक्ष आज सील केले. या केंद्राची नोंदणी निलंबित करण्यात आली असून, लवकरच त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारे यांनी दिली. त्यामुळे डॉ. पाटील याच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

‘आमची मुलगी’वर तक्रार

पीसीपीएनडीटी अॅक्ट १९९४ व सुधारित २००३ नुसार नागरिकांच्या तक्रारीसाठी व गुप्त माहितीसाठी महापालिकेकडून आमची मुलगी ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. या वेबसाइटवरच अज्ञात व्यक्तीकडून संबंधित डॉक्टरच्या कृत्यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारीच्या आधारे डॉ. पाटील याच्यावर तीन महिने पाळत ठेवण्यात आली. डॉ. चिरमाडे यांच्या पथकाने नियोजबद्ध पाठपुरावा करून सापळा रचत डॉक्टरचे पितळ उघडे केले आहे.

ग्रामीण भागावर लक्ष

गर्भलिंगसंदर्भातील नियम आता कडक झाल्याने व शहरी भागात यंत्रणांचा वॉच अधिक राहत असल्याने ग्रामीण भागात गर्भलिंग करणे सोपे जाते. त्यामुळे ग्रामीण भागात थेट वाहनामध्येच गर्भाची तपासणी करण्याचा क्‍लृप्ती डॉ. पाटील याने लढवली होती. डॉ. पाटील याचे नाशिकसह त्र्यंबकेश्वर व चांदवड येथे अधिकृत सेंटर्स आहेत. त्याद्वारे नाशिकसह त्र्यंबकेश्‍वर, जव्हार, मोखाडा, चांदवड आदी तालुक्‍यांतील अतिग्रामीण व आदिवासी भागातील महिलांची तपासणी केली जात असल्याचा संशय पथकाला आहे. त्यामुळे सखोल चौकशी केल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदूकधारी सुरक्षारक्षक दाखल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने पालिका मुख्यालयाची सुरक्षा खासगी सुरक्षारक्षकांच्या हाती देण्याच्या ठरावाची अंमलबजावणी सुरू केली आहे. महाराष्ट्र सुरक्षा बल संस्थेचे ४५ खासगी सुरक्षारक्षक पालिकेत दाखल झाले असून, त्यांनी सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली आहे. विशेष म्हणजे गनधारी सुरक्षारक्षक पालिकेच्या द्वारावरच तैनात करण्यात आले आहेत. खासगी सुरक्षारक्षकांकडे सुरक्षा सोपवण्यात आल्यानंतर पहिल्याच दिवशी नगरसेवकांसह नागरिकांची या सुरक्षारक्षकांसोबत खडाजंगी उडाली.

महापालिकेने पालिकेच्या मुख्यालय,विभागीय कार्यालय तसेच आयुक्तांच्या निवासस्थानाची सुरक्षा खासगी सुरक्षारक्षकांकडे देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी वर्षाला दीड कोटींची तरतूद करण्यात आली असून, मुंबईतल्या शासनमान्य संस्थेकडे काम सोपवण्यात आले आहे. संस्थेकडून ४५ सुरक्षारक्षक पुरवले जाणार असून, त्यात आठ गनधारी सुरक्षारक्षक आहेत. या सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीवरून वादही निर्माण झाला होता. परंतु, आमदार बच्चू कडूंच्या वादामुळे सत्ताधाऱ्यांनी त्याला हिरवा कंद‌िल दर्शवला. आता हे खासगी सुरक्षारक्षक पालिकेत दाखल झाले आहेत. त्यांना पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासह अन्य तीन द्वारांवरही तैनात करण्यात आले आहे. आतमध्ये मुख्य प्रवेशद्वारावर एक गनधारी सुरक्षारक्षक तैनात आहे. स्थायी समिती सभापतींनी केवळ आयुक्त कार्यालयातच गनधारी सुरक्षारक्षक ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु, या आदेशाची पायमल्ली करत, थेट गेटवरच गनधारी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आल्याने वादावादी होण्याची शक्यता आहे.

नागरिकांसह नगरसेवकांना फटका

पालिकेच्या सुरक्षेसाठी हे सुरक्षारक्षक नियुक्त केले असले तरी, त्याचा फटका नगरसेवकांनाही बसला. पहिल्या दिवशी दोन पक्षांच्या गटनेत्यांना तपासणीच्या जाचातून जावे लागले. त्यावेळी या सुरक्षारक्षकांसोबत वादही झाला. परंतु, नियम असल्याने त्यांनीही समंजसपणे हा विषय घेतला. काही नागरिकांसोबतही सुरक्षारक्षकांचे खटके उडाले. काही सुरक्षारक्षकांनी उद्धटपणे नागरिकांशी संवाद साधला. त्यावरूनही वाद झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव, येवल्यात ‘पद्मावती’ला विरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगा

पद्मावती सिनेमाच्या प्रदर्शनाला संपूर्ण देशभरातील विविध संघटनाकडून विरोध होत असताना शहरात देखील सर्वपक्षीय नेते व राजपूत महासंघाच्या वतीने सोमवारी सिमेनाचे पोस्टर जाळून प्रदर्शनास विरोध दर्शव‌िण्यात आला. भाजप तालुकाध्यक्ष दीपक पवार यांच्यासह डॉ. अद्वय हिरे, बाजार समिती सभापती प्रसाद हिरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र ठाकरे, शांताराम लाठर, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, सदस्य अरुण पाटील आदींसह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शहरातील अपर जिल्हाधिकारी कार्यालायाबाहेर या सिनेमाला विरोध करण्यासाठी निदर्शन करण्यात येवून नायब तहसीलदार राजेंद्र सायंकर यांना निवेदन देण्यात आले. शहरात पद्मावती चित्रपट प्रदर्शित करण्यात येवू नये, अशी मागणी करण्यात आली. तसेच हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास, कायद सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोल‌िस व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलद बुद्धिबळ स्पर्धेत खंडेलवाल अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बॉटविनिक चेस स्कूल व चेस विकी डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत स्पर्श खंडेलवाल, सिद्धांत पटवर्धन, हर्ष डोडल, सार्थक रहातळ, समीक्षा जाधव हे अव्वल ठरले. या स्पर्धा देशस्थ ऋग्वेदी संस्थेच्या ऋग्वेद सभागृहात आयोजित करण्यात आल्या होत्या.

बॉटविनिक चेस स्कूलचे सुनील शर्मा व सनदी लेखापाल विनय बेळे यांच्या अभिनव कल्पनेतून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत विविध वयोगटात १७५ स्पर्धकांनी विक्रमी सहभाग नोंदवला होता. यात २३ आंतरराष्ट्रीय मानांकन खेळाडूंचा समावेश होता. पंच म्हणून मंगेश गंभीरे व प्रवीण मांदळे यांनी काम पाहिले. यावेळी मंगेश गंभीरे, विनायक वाडिले, सचिन निरंतर, विकी ठाकूर, सचिन व्यवहारे, विक्रम माळवणकर, डॉ. रेखा जाधव, संजय वाघ, गौरव देशपांडे, अनिल राठी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

९ वर्षाखालील गट : समीक्षा जाधव (विजयी), ओम चौधरी (द्वितीय), सार्थक भापकर (तृतीय)

११ वर्षाखालील गट : सार्थक रहातळ (विजयी), शुभम चांडक (द्वितीय), क्रिश चोपडा (तृतीय)

१३ वर्षाखालील गट : हर्ष डोडल (विजयी), श्रेयस आव्हाड (उपविजयी), स्वप्नील गोरे (तृतीय)

१५ वर्षाखालील गट : सिद्धार्थ पटवर्धन (विजयी), आयुष राजहंस (उपविजयी), प्रितेश जाधव (तृतीय)

खुला गट : स्पर्श खंडेलवाल (विजयी), धनश्री राठी (उपविजयी), अतुल पवार (तृतीय), वरुण वाघ (चतुर्थ), तन्मय महाले (पाचवा), सुश्रुत कागदे (सहावा).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ डिसेंबरपासून उडणार विमान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बहुप्रतिक्षीत विमानसेवा अखेर येत्या १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तशी लेखी माहिती हवाई वाहतूक मंत्रालयाने खासदार गोडसे यांना दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून वादात सापडलेली नाशिक-मुंबई आणि नाशिक-पुणे ही सेवा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रादेशिक विमानसेवा योजना (उडान) अंतर्गत देशातील विविध विमानतळांवरुन सेवा सुरू करण्याचे केंद्र सरकारने घोषित केले आहे. त्याअंतर्गत नाशिक (ओझर) येथून मुंबई आणि पुणे या शहरांसाठी सेवा प्रस्तावित आहे. केंद्राच्या या योजनेत एअर डेक्कन कंपनीने बोली लावली होती. त्यात त्यांची निवड करण्यात आली. पण, ही सेवा सुरू होत नसल्याने खासदार हेमंत गोडसे यांनी वारंवार पाठपुरावा केला. मुंबई विमानतळावर एअर स्लॉट उपलब्ध होत नसल्याचे कारण देण्यात येत होते. अखेर गोडसे यांनी दिल्लीत हवाई वाहतूक मंत्रालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. येत्या १५ डिसेंबरपर्यंत सेवा सुरू केली जाईल, असे लेखी आश्वासन मंत्रालयाने दिले होते. त्यानंतर गेल्या महिन्यात मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अथॉरिटी लि., एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, हवाई वाहतूक मंत्रालय, एअर डेक्कन आणि संबंधितांची बैठक घेण्यात आली. त्यानुसार मुंबई विमानतळावर नाशिक विमावसेवेसाठी वेळ उपलब्ध करुन देण्याचे निश्चित झाले. म्हणूनच येत्या १५ डिसेंबरपासून नाशिक-मुंबई-नाशिक आणि नाशिक-पुणे-नाशिक ही सेवा सुरू केली जाईल, असे लेखी पत्र मंत्रालयाच्या सहसचिव उषा पढी यांनी खासदार गोडसे यांना दिले आहे. त्यामुळे आता १५ डिसेंबरपासून नाशिकला सेवा सुरू होईल, अशी चिन्हे आहेत.

विमानसेवा १५ डिसेंबरपासून सुरू होईल, असे पत्र मंत्रालयाने दिले आहे. यापूर्वीही घोषणा झाल्या आहेत. म्हणून प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होईपर्यंत पाठपुरावा करणारच आहे.

-हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images