Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नगरसेविकांना दुय्यम वागणूक; महिला हक्क समितीसमोर तक्रारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेत महिलांना दुय्यम दर्जाचे स्थान दिले जात असून, पुरुष नगरसेवकांची कामे तातडीने केली जातात. महिला नगरसेवकांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. महिला नगरसेवक म्हणून निवडून आलो; परंतु, अधिकारी जुमानत नाहीत. पुरूष नगरसेवकांचेच ते ऐकतात. महिलांसाठी विश्रांती कक्ष नाही, अशा प्रकारच्या तक्रारींचा पाऊसच विधी मंडळाच्या महिला हक्क व कल्याण समितीसमोर पडला.

डॉ. भारती लव्हेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गुरुवारी महापालिकेस भेट दिली. यावेळी स्थायी समितीच्या दालनात झालेल्या बैठकीस केवळ महिला नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला होता. यावेळी महिला नगरसेवकांनी येणाऱ्या अनुभवांचे कथन केल्याचे समजते. नाशिक शहरात महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. जी आहेत, ती कधीही स्वच्छ केली जात नाहीत. त्याचप्रमाणे गेल्या तीन वर्षांत महिलांसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी खर्च करण्यात आलेला नाही. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात. ही बाबदेखील महिला नगरसेवकांनी विधी मंडळाच्या समितीच्या निदर्शनास आणून दिली. हा खर्च का करण्यात आला नाही, याबद्दल अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांना उत्तर देता आले नाही.

पुरूष नगरसेवक आणि महिला यांचा दर्जा समान असताना प्रत्यक्षात मात्र पुरुषांना अधिक महत्त्व दिले जाते. त्याची कामे वेगाने केली जातात, तर महिलांची कामे रखडवून ठेवली जातात. प्रशासनातील अधिकारी महिला नगरसेवकांना अत्यंत दुय्यम दर्जाची वागणूक देतात. पुरुष मंडळी अर्वाच्च भाषा वापरून कामे करून घेतात. अशी भाषा महिलांना वापरता येत नसल्याने त्यांची कामे रखडतात. महासभेच्या दिवशी बहुतांश सर्वच महिला उपस्थित असतात. परंतु, त्यांच्यासाठी वेगळा विश्रांती कक्ष नाही. त्यामुळे कुठेही एकत्र‌ित बसता येत नाही, अशा तक्रारी करण्यात आल्या. शहरात आणि महापालिकेत असलेली महिलांची स्वच्छता गृहे, तसेच अन्य समस्या मांडतानाच बचतगटांना कामे देण्यात दुजाभाव केला जात असल्याचा आरोपदेखील समितीसमोर करण्यात आला.

‘विशाखा’ बाबत प्रश्नचिन्ह

सरकारने प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत, आस्थापनांमध्ये विशाखा समिती स्थापन करावी, असे आदेश दिले असताना नाशिक महापालिकेने मात्र त्याबाबत उदासीनता दाखवल्याने समितीने नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

तीन महिन्यांनंतर आढावा

गुरुवारी झालेल्या बैठकीत ज्या त्रुटी आढळल्या आहेत, त्याबाबत महापालिकेने तीन महिन्यांत कार्यवाही करावी. त्याचा आढावा घेण्यासाठी विधी मंडळाची सम‌िती पुन्हा दौरा करणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारवाडा पोलिसांचे पथक पुन्हा जौनपूरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ठाणे येथील भोंदू बाबा उद्यराज रामआश्रम पांडे यास घेऊन सरकारवाडा पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे रवाना झाले. सात दिवसांच्या पोलिस कोठडीत असलेल्या पांडेने जौनपूर येथील दोन सराफांना सोने विकले असून, तेथील एका नातेवाईकाच्या बँक खात्यामध्ये पैसेही वर्ग केले होते. यापूर्वीच्या तपासादरम्यान पोलिसांनी २९ तोळे सोन्यासह एक स्कॉर्प‌िओ आणि बुलेटही जप्त केली आहे.

शहरातील एका १८ वर्षीय युवतीने दिलेल्या तक्रारीनंतर ठाणे येथील भोंदू बाबास सरकारवाडा पोलिसांनी १४ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. एका पूजेत विघ्न आल्याची भीती घालून या पांडेने फिर्यादी तरुणीकडून लाखो रुपये उकळले होते. एवढेच नव्हे तर त्या मुलीला दुसऱ्याच्या घरात चोरी करण्यास भाग पाडले होते. भोंदूबाबा पांडेने याच पद्धतीने अनेक जणांची फसवणूक केली असल्याची शक्यता आहे. कोर्टाने सुरुवातीला पांडेला सात दिवसांची कोठडी सुनावली होती. गत मंगळवारी त्याच्या कोठडीत पुन्हा सात दिवसांची वाढ केली. पांडेचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे असून, त्याने तेथे ५० ते ६० लाखांचा आलिशान बंगला उभा केला आहे. ठाण्यासह नाशिकमधून उकळलेले पैसे, दागिने तो जौनपूर येथेच पोहच करीत होता. या पार्श्वभूमीवर सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्यासह पथकाने जौनपूर येथे पोहचून एका सराफाकडील २९ तोळे हस्तगत केले. मात्र, परतीच्या प्रवासात पांडेने जौनपूर येथील आणखी दोन सराफांकडे दागिने दिले असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, त्याला कोर्टात हजर करणे आवश्यक असल्याने पोलिस त्याला घेऊन नाशिकला पोहचले. आता हे पथक तपासासाठी पुन्हा रवाना झाले असून, ऑनलाइन बँकिंगमार्फत ट्रान्सफर झालेल्या पैशांचा शोधदेखील घेतला जाणार आहे. संशयित आरोपी पांडेच्या मोबाइलमध्ये काही अश्लिल फोटो देखील पोलिसांना सापडले होते. हे फोटो त्याने महिला व युवतींना ब्लॅकमेल करून घेतले आहे की इंटरनेटवरून डाउनलोड केले आहेत, याचा उलगडा होणे अद्याप बाकी आहे. हे फोटो तसेच व्हिडीओ तांत्रिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून, त्याचा अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीओ’त समस्या निवारण

$
0
0

मटा इम्पॅक्ट


म. टा. वृत्तसेवा, आडगाव

पेठरोडवरील आरटीओ कार्यालयातील पार्किंगची असुविधा, स्वच्छतागृह, प्रवेशद्वारे बंद असणे आदी समस्यांचे आता निवारण झाले आहे. येथे येणाऱ्यांना या व अन्य समस्या भेडसावत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्याने सर्वसामान्य नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

आरटीओ कार्यालयात परवाना, वाहन फिटनेस, वाहनांच्या फायनान्सचा बोजा कमी करणे, कागदपत्रे ट्रान्स्फर करणे अशा विविध कामांसाठी हजारो सर्वसामान्य नागरिक कार्यालयात येत असतात. याशिवाय आरटीओ कर्मचारी, एजंटदेखील मोठ्या संख्येने असतात. मात्र, त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. कार्यालयात येणाऱ्यांना पार्किंगसाठी शिस्तीचे धडे देण्याचे काम केले जाते. पण, विविध कामांसाठी येथे येणाऱ्यांना योग्य वाहनतळच नसल्याची स्थिती होती. विशिष्ट ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी व सर्वसामन्यांच्या वाहनांसाठी जागा करण्यात आलेली आहे. ठरवून दिलेल्या ठिकाणी वाहन पार्क न केल्यास दंड आकारणीदेखील केली जात असे. पण, सकाळीच पार्किंगची जागा भरल्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने नागरिक रस्त्यात वाहने उभी करीत, त्यामुळे काही वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईदेखील केली जात असे. ‘मटा’तील वृत्तानंतर या कार्यालय आवारातील पार्किंगसाठी असलेल्या जागेवर सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय कार्यालयात येणारी तीनही प्रवेशद्वारे खुली करण्यात आली असून, पासधारकांना, मोटरसायकल व चारचाकी वाहनांची स्वतंत्र सुविधा केली आहे. शिवाय त्या ठिकाणी फलक लावले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय टळणार आहे.

--

बंद शौचालय झाले खुले

आरटीओ कार्यालयाच्या आवारात असलेले शौचालय बाहेरून सुस्थितीत दिसत असले, तरी त्याला कायम कुलूप असायचे. त्यामुळे या कार्यालयात येणाऱ्यांना दुसऱ्या मजल्यावर जावे लागत असल्याने महिला, अपंग आणि वयोवृद्ध नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असे. त्यामुळे कार्यालयाच्या आवारात असलेले शौचालय खुले करण्याची मागणी होत होती. आता है शौचालय खुले करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोलर स्केटिंगची प्रेक्षकांना भुरळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार तालुक्यातील पथराई येथे राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेसह हॉकीच्या सामन्यांमधील कसरतींचा थरार गेल्या दोन दिवसांपासून प्रेक्षक अनुभवत आहेत. रोलर स्केटिंग, रोलर हॉकी स्पर्धेने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. या स्पर्धेचे उद््घाटन क्रीडा युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक जयप्रकाश दुबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा जिल्हा स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र गावित होते. तसेच नाशिक विभागाचे क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, घनश्याम राठोड, राज्य स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष पी. के. सिंग, सचिव ज्ञानेश्वर बुलंगे, बळवंत निकुम आदी उपस्थित होते.

शालेय रोलर स्केटिंग रोलर हॉकी स्पर्धेत पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, लातूर, अमरावती, औरंगाबाद नाशिक या आठ विभागांमधून ४८० स्पर्धकांसह त्यांचे पालक, मार्गदर्शक दाखल झाले आहेत. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ३० पंच नियुक्त केले असून, यावेळी क्रीडा उपसंचालक दुबळे यांनी स्पर्धकांना प्रोत्साहनात्मक मार्गदर्शन केले. तर जिल्हा स्केटिंग असोसिएशनचे अध्यक् षराजेंद्रकुमार गावित म्हणाले, शालेय विदयार्थी खेळातील कौशल्यांनी समृद्ध असूनही बहुतांश खेळांमध्ये मागे राहतात. याला केवळ क्रीडांगणाचा अभाव कारणीभूत ठरतो. पथराईत स्केटिंग ट्रॅक साकारण्यात आला असून, या ट्रॅक निर्मितीसाठी राज्य असोसिएशनने सहकार्य करीत प्रेरणा दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील गर्दीचे चौक आता पोलिसांना दत्तक

$
0
0

शुभवार्ता

--



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करणारे वाहतूक पोलिस पायाभूत सुविधा निर्माण करू शकत नाहीत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी एखाद्या ठिकाणी काही बदल करण्याबाबत वाहतूक पोलिस आग्रही असताना हतबल बनतात. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सतत त्रासदायक ठरणारे काही चौक पोलिस उपायुक्त आणि सहायक पोलिस आयुक्तांसह काही निरीक्षकांना दत्तक दिले आहेत. लोकप्रतिनिधी, खासगी कंपन्यांच्या माध्यमातून चौकात सुधारणा करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होणार आहेत.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल आणि गुन्हे शाखेचे उपआयुक्त विजयकुमार मगर यांच्या संकल्पनेतून ही योजना पुढे आली आहे. शहरात अनेक चौकांत सतत वाहतूक कोंडीसह अपघातांच्या घटना घडतात. अशा चौकांत वाहतुकीच्या दृष्टिकोनातून काही बदल होणे अपेक्षित आहे. मात्र, पायाभूत सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी महापालिकेकडे असते. त्यामुळे पोलिसांना प्रस्ताव पाठविणे एवढेच काम करावे लागते. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात एका बैठकीदरम्यान महत्त्वाचे चौक दत्तक घेण्याबाबत चर्चा झाली. यात पोलिस उपायुक्त आणि सहायक पोलिस आयुक्तांकडे काही प्रमुख चौकांचे पालकत्व देण्याबाबत निर्णय झाला आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह काही खासगी कंपन्यांच्या सीएसआरचा विचार होणार असून, या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच होणार आहे.

--

सर्वेक्षणानुसार उपाययोजना

यासंदर्भात सहायक आयुक्त अजय देवरे यांनी सांगितले, की वाहतूक कोंडी होणाऱ्या चौकांचे सर्वेक्षण होऊन तांत्रिकदृष्ट्या येथे काय बदल होणे अपेक्षित आहे, हे प्रथम ठरविले जाईल. त्यानंतर तेथे ब्यूटिफिकेशन करावे की सिग्नल बसवावा याबाबत निर्णय होईल. अगदी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्यापासून बॉटल नेक कमी करण्यासाठी यात पाठपुरावा केला जाणार आहे. वाहतूक पोलिस रस्त्यावर उभे राहून कारवाई करतात. रस्त्यावरील समस्यांची जाणीव पोलिसांनाच असून, या उपक्रमाचा निश्चितच फायदा होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी महिला काँग्रेसने वेधले अस्वच्छतेकडे लक्ष

$
0
0

वाट स्वच्छ आरोग्याची

--


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक विभागातील बसस्थानकांतील स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी वेंडिंग मशिन बसविणे व सुलभ शौचालयांतील अस्वच्छता दूर करण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली. राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांना याबाबतचे निवेदन देऊन कार्यवाही न झाल्यास कार्यवाही न केल्यास राष्ट्रवादी महिला काँग्रेस तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला.

शहरातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत जुने सीबीएस, नवीन सीबीएस, महामार्ग, मेळा, निमाणी, नाशिकरोड अादी बस स्थानके शहर परिसरात आहेत. प्रत्येक बस स्थानकांतून हजारो महिला प्रवास करीत असतात. त्यामुळे तेथे महिलांसाठी चेंजिंग रूम, तसेच स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी वेंडिंग मशिनची सुविधा आवश्यक आहे. मोफत स्वच्छतागृहाची किमान नागरी सुविधा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, प्रवासी महिलांसाठी या सुविधा देण्यात एसटी महामंडळ सपशेल अपयशी ठरत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी संगीता गांगुर्डे, पुष्पा राठोड, संगीता अहिरे, पूनम शाह, कामिनी वाघ, मीना गायकवाड, पंचशीला वाघ, कुसुम वाघ उपस्थित होत्या.

सुलभ शौचालयांच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत, तसेच उघड्यावर साचलेले पाणी, दुर्गंधी, ओलसर भिंती, तसेच जळमटे असे घाणेरडे वातावरण असते. त्यामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यातच लघुशंका विनामूल्य असताना व शौचालयास पाच रुपये दर असताना ठेकेदार अधिक प्रमाणात दर आकारणी करतात. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय महिलांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. यामुळे प्रत्येक सुलभ शौचालयात मोठ्या अक्षरात दरसूची लावण्यात यावी, असे आवाहन करून एक महिन्याच्या आत याबाबत कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली.

--

‘मशिनबाबत पत्रव्यवहार’

शिष्टमंडळास उत्तर देताना दि. १ डिसेंबरपासून खासगी कंपनीमार्फत सर्व बसस्थानकांमध्ये स्वच्छता केली जाईल, तसेच महिलांना आवश्यक असलेले सॅनिटरी वेंडिंग मशिन बसविण्यासंदर्भात सरकारशी पत्रव्यवहार करून हा प्रश्न मार्गी लावून सोडविला जाईल, असे आश्वासन विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिले. ----


-----


बिटको, आरंभ कॉलेजला इशारा


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड परिसरातील बिटको, तसेच आरंभ कॉलेजातील प्रसाधनगृहांच्या अस्वच्छतेबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले. प्रसाधनगृहांची संख्या न वाढविल्यास आणि ते नियमित स्वच्छ न ठेवल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

शहर सरचिटणीस सौरभ पवार, योगीराज ओबेराय, रुपेश थोरात, रुपेश कोरडे, निखिल आहेर, नकुल कश्मिरे, पवन गट्टे, रामेश्वर राठोड, शिवम भागवत, संकेत लभडे आदी उपस्थित होते. बिटकोचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, तर आरंभचे प्रभारी प्राचार्य डॉ. समीर लिंबारे यांनी निवेदन स्वीकारले.

बिटको कॉलेजमध्ये परिसरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकतात. विद्यार्थी, विद्यार्थिनींना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. कॉलेजातील प्रसाधनगृहांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून, येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथील स्वच्छतागृहांची संख्याही अपुरी पडत आहे. स्वच्छतागृहे व प्रसाधनगृहांत पाण्याची कमतरता भासत आहे. मुलींच्या आरोग्याचे हित बघता प्रसाधनगृहांत सॅनिटरी वेंडिंग मशिन बसवावे. स्वच्छतागृहांची संख्या वाढवून ते स्वच्छ ठेवावी अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी करणार मतदानप्रक्रियेचा जागर

$
0
0

नाशिक : लोकशाही व्यवस्थेला अधिक सशक्त बनविणारी निवडणूकप्रक्रिया नेमकी काय आहे हे शालेय वयात समजावे यासाठी शाळा व ज्युनिअर कॉलेजांमधून मतदार साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार आहेत. आठवी ते बारावीपर्यंतच्या किशोरवयीन विद्यार्थ्यांना निवडणूकप्रक्रियेबाबत सज्ञान करण्यात येणार असून, जिल्ह्यात पुढील आठवड्यात या उपक्रमास सुरुवात होणार आहे.

किशोरवयीन अवस्था हा तारुण्याचा उंबरठा समजला जातो. या वयामध्ये विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी समज आलेली असते. हाच वर्ग उद्याचा भावी मतदार असल्याने त्यांना निवडणूकप्रक्रियेबाबत साक्षर करणे काळाची गरज बनली आहे. भारताला महासत्ता बनविण्याची भिस्त अशा नवीन पिढीवर असून, त्यासाठी लोकशाहीव्यवस्था बळकट असणेही आवश्यक आहे. म्हणूनच या वयोगटावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणूकप्रक्रिया हा लोकशाहीचा अविभाज्य भाग असून, त्याची माहिती किशोरवयीन मुले आणि मुलींपर्यंत प्रभावीपणे पोचविण्याचे प्रयत्न निवडणूक आयोगाने सुरू केले आहेत. त्यासाठी माध्यमिक शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांमधून मतदार साक्षरता क्लब स्थापन करण्याचे निर्देश आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्याच्या निवडणूक विभागाने या उपक्रमाच्या यशस्वितेची जबाबदारी त्या त्या तालुक्यांच्या तहसीलदारांवर सोपविली आहे.

शहरात आणि ग्रामीण भागातही शाळा-कॉलेजांमध्ये प्रामुख्याने हे मतदार साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार आहेत. या क्लबच्या माध्यमातून निवडणूकप्रक्रियेच्या जनजागृतीबाबतचे विविध उपक्रम राबविणे निवडणूक विभागाला अपेक्षित आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयीची जिज्ञासा निर्माण व्हावी आणि त्यांनी अशा उपक्रमांमध्ये समरस होऊन इतरांचीही जनजागृती करावी हा उपक्रम राबविण्यामागील उद्देश आहे.

सुरुवातीला मोठ्या शाळा-ज्युनिअर कॉलेजांमध्ये प्राधान्याने हा क्लब स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळा, कॉलेजांमध्ये क्लब स्थापन करावा, अशी सक्ती नसली तरी अधिकाधिक ठिकाणी तो स्थापन करावा, असा जिल्हा प्रशासनातील निवडणूक शाखा आणि तहसीलदारांचा आग्रह आहे.

प्रशासन-मतदारांमधील दुवा

निवडणूकप्रक्रियेशी संबंधित जनजागृतीचे सर्वाधिकार या क्लबला असणार आहेत. क्लब सदस्यांनी केवळ विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे अपेक्षित नाही. ते आसपासच्या खेड्यापाड्यांतही जनजागृतीचे उपक्रम घेऊ शकतात. वादविवाद, तसेच वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर, ड्रॉइंग स्पर्धा, स्लोगन, तसेच निबंध स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती करता येणार आहे. याशिवाय स्नेहसंमेलने, कॅम्पसमध्ये पथनाट्यांद्वारेही या क्लबकडून जनजागृती केली जाणार आहे. मुख्याध्यापक, शिक्षकांचे या उपक्रमांसाठी क्लबमधील सदस्यांना मार्गदर्शन मिळणार असून, प्रशासनाकडून काही मदत हवी असेल तर ती तहसीलदारांच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे हे विद्यार्थी प्रशासन आणि नागरिकांमधील दुवा म्हणून काम करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वरई, नागलीला अच्छे दिन?

$
0
0


नाशिक : सुदृढ आहारासाठी उपयोगी असलेल्या तृणधान्याचा प्रसार व प्रचार जगभर व्हावा यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने संयुक्त राष्ट्र संघाला (युनो) २०१८ हे वर्षे इंटरनॅशनल इअर ऑफ मिलेट म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे. त्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी नुकतेच युनोला पत्र पाठवले आहे. युनोने जर हे वर्षे घोषित केले तर त्याचा सर्वाधिक फायदा नाशिक जिल्ह्यात पिकवल्या जाणार वरई व नागलीला होणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही पिक नाशिकच्या आदिवासी भागात घेतले जाते.

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष जर घोषित झाले तर आदिवासी बरोबरच वरई पासून बनवल्या जाणाऱ्या भगर म‌लिलाही यामुळे बुस्ट मिळणार आहे. नाशिकमध्ये वरई पासून बनवण्यात येणाऱ्या भगरच्या जिल्ह्यात ३५ हून अधिक म‌लि आहे. त्यामुळे भगर हब म्हणूनही नाशिक आळेखले जाते. त्याचप्रमाणे नागली पण नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात होत असून, तिचा दर्जा चांगला आहे. आरोग्याच्या वाढत्या तक्रारीमुळे याअगोदरही केंद्र सरकारने मिशन तृणधान्य (मिलेट) हाती घेतले होते. बाजरी, ज्वारी, नागली, भगर बरोबरच नव्याने आलले टेफ व व्युईनो हे तृणधान्य जगभर आहे. यातील टेफ व व्युईनो हे पिक परदेशात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. देशात आता टेफची लागवड होत असून, अद्याप त्याचे प्रमाण मात्र कमी आहे.

मधुमेह, कॅन्सर, रक्तदाब, हृदयविकार यासाठी तृणधान्य उपयोगी असून, त्यात फायबरचे प्रमाणही मोठे आहे. त्याचप्रणाणे प्रोटीनची मात्राही त्यात जास्त असते. जगभर गहू व तांदूळ याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण तृणधान्याचा वापराचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे तृणधान्याचा प्रचार व प्रचार व्हावा यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने पुढाकार घेतला असून, यावर आता युनो काय निर्णय घेते हे महत्त्वाचे आहे. राज्यात या तृणधान्यात ज्वारी व बाजरी ही मोठ्या प्रमाणात विविध भागात पिकवली जाते. त्यामुळे या निर्णयाचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही फायदा होणाऱ आहे. विशेष म्हणजे या तृणधान्याची किंमतही जास्त असून, याला पिकवण्यासाठी नैसर्गिक शेतीचा वापर केला जातो. अवघ्या ९० दिवसात येणाऱ्या या पिकाला पाण्याशिवाय दुसरे काहीच लागत नाही, ही सुद्धा जमेची बाजू आहे.
जगभर तृणधान्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री यांनी घेतलेले हे मोठे पाऊल आहे. युनोने त्यास मान्यता दिली तर राज्यासह नाशिक जिल्ह्याला त्याचा मोठा फायदा होणार आहे. जिल्ह्यात वरई व नागली मोठ्या प्रमाणात पिकवली जाते. त्याचप्रमाणे ३५ भगर मिलही नाशिकमध्येच आहेत. सुदृढ आरोग्यासाठी तृणधान्य हे महत्त्वाचे आहे.

- महेंद्र छोरिया, अध्यक्ष,
भगर मिल असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रकच्या धडकेने एकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

अवजड वाहतुकीस मनाई असलेल्या जेलरोडवरील सैलानी बाबा चौकात गुरुवारी दुपारी एका अवजड ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले. माणिकराव विश्वनाथ धानोरकर (वय ५५ वर्षे, रा. नारायणबापू सोसायटी, जेलरोड) असे मयताचे नाव आहे. गुरुवारी साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

माणिकराव धानोरकर दुचाकीने (एमएच १५ बीटी १५५०) दसककडून जेलरोडच्या दिशेने येत असताना सैलानीबाबा दर्ग्याजवळ पाठीमागून आलेल्या ट्र्कने (एमएच १५ एफक्यू ७७३९) त्यांना धडक दिली. या धडकेने धानोरकर यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातानंतर ट्रकचालक जलील रज्जाक कुरेशी (वय ४२, रा. चांदवड) यास स्थानिकांनी नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात दिले. ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काही तासांचा अपवाद वगळता जेलरोडवरुन अवजड वाहतुकीस मनाई आहे. तसा फलकही बिटको चौकात लावण्यात आलेला आहे. मात्र या नियमाचे सर्रास उल्लंघन करुन दिवसभर या मार्गावरुन अवजड वाहतुक सुरू असते. बिटको चौकात दिवसभर वाहतूक पोलिस असतात, मात्र या अवजड वाहतुकीकडे कानाडोळा केला जातो.

मोबाइलसाठी

युवकावर हल्ला

नाशिक : मोबाइल न दिल्याने युवकावर चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना सिडकोतील डीजीपीनगर रोडवर घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये विनोद मगर आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्र्यंबकरोडवरील उत्कर्षनगर भागात राहणाऱ्या जीतू शिवाजी जाधव या युवकाच्या तक्रारीनुसार, शनिवारी जाधव आणि त्याचा मित्र विशाल मरीमाता मंदिराजवळ उभे राहून गप्पा मारत होते. संशयित विनोद मगर व त्याच्या समवेत आलेल्या अज्ञात युवकांच्या टोळक्यातील एकाने जाधवकडे मोबाइल मागितला. मोबाइल देण्यास त्याने विरोध दर्शविताच संशयित आरोपींनी शिवीगाळ केली. तसेच संशयित मगर यांने धारदार चाकूने जाधवच्या डाव्या हातावर वार केला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक घाडगे करीत आहेत.

घरमालकाविरुद्ध गुन्हा

नाशिक : भाडेकरूंबाबत पोलिसांना माहिती देणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणखी एका घरमालकावर आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारावर अंकुश असावा यासाठी भाडेकरूंची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनला देण्याचे आवाहन पोलिसांनी वारंवार केले आहे. प्रकाश निंबा महाजन (रा. कसगाव, जि. जळगाव) असे या घरमालकाचे नाव आहे. महाजन यांची हॉटेल जत्रा परिसरातील जयश्री ड्रीम पार्क येथे घर असून, त्यात त्यांनी भाडेकरू ठेवला आहे. मात्र, या भाडेकरूंची माहितीच त्यांनी पोलिसांना दिलेली नाही. घटनेचा अधिक तपास हवालदार माळी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् उचलला कचरा

$
0
0


तुषार देसले, मालेगाव

येथील पालिका प्रशासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ची तयारी सुरू करण्यात आली आहे. देशभरातील ५०० शहरांच्या स्पर्धेत मालेगाव शहराला जास्तीत जास्त वरचा क्रमांक मिळण्यासाठी नागरिकांचा देखील सहभाग यात असावा यासाठी स्वच्छता मोबाइल अॅपबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. एरवी येथील पालिका प्रशासनाचा कामकाज अनुभव इतर सरकारी कार्यालयांसारखा दफ्तर दिरंगाईचा असला, तरी स्वच्छता अॅप वरील कचऱ्याच्या तक्रारींचा जलद निपटारा होत असल्याचा सुखद अनुभव मालेगावकरांना येत आहे.

पालिकेकडून स्वच्छतेबाबत नागरिकांनी तक्रारी कळवाव्यात यासाठी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ‘स्वच्छता’ हे अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सोशल मीड‌ियावरून त्याची लिंक व्हायरल झाल्याने अनेकांनी उत्सुकता म्हणून ते अॅप डाऊनलोड केले आहे. अशाच प्रकारे तरुआई परिवाराचे सदस्य असलेल्या विशाल पाटील यांनी देखील हे अॅप डाऊनलोड केले. शहरातील मसगा महाविद्यालयाच्या भिंतीलगत वृक्षारोपण करून जागवण्यात आलेल्या झाडांना कचऱ्याचा विळखा पडला आहे. तो हटवण्यात यावा यासाठी स्वच्छता अॅपद्वारे तक्रार करण्यात आली. या आधीच्या अनेक समस्या आणि अडचणीबाबत पाटील यांचा पालिका प्रशासनाबाबतचा अनुभव फारसा चांगला नसल्याने या कचऱ्याच्या समस्येचा निपटारा होईल अशी कल्पना त्यांनी केली नव्हती.

मालेगाव आघाडीवर ...

स्वच्छता अॅप डाउनलोड करण्यात नाशिक, धुळे महापालिकेच्या तुलनेत मालेगाव आघाडीवर असून, गेल्या १५ दिवसात ६०० वरून हा आकडा १७०० वर गेला आहे. तसेच या अॅपवरील तक्रारी २४ तासाच्या आत निपटारा करणे बंधनकारक असल्याने दिवसाला ६० ते ७० टक्के तक्रारींचे निवारण केल्या जात आहेत.

नागरिकांना सुखद अनुभव

अॅपवरील तक्रारीनंतर अवघ्या काही तासात येथील कचरा उचलण्यात येवून कचऱ्याच्या विळख्यात अडकलेली झाडे मोकळी करण्यात आली. स्वच्छता अॅपद्वारे तक्रार निवारण झाल्याचा फोटो अपलोड करण्यात आल्यानंतर त्यांना हा सुखद अनुभव लक्षात आला. त्यामुळे हे अॅप डाऊनलोड करून शहरातील कचऱ्याचे फोटो अपलोड करणाऱ्यांची संख्या वाढली असून, पालिकेकडून त्याचा वेळीच निपटारा झाल्यास प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयाने स्वच्छ मालेगावच्या दिशेने सकारात्मक पाउल ठरेल.

अशी करा तक्रार

शहरातील कचऱ्या संबंध‌िच्या तक्रारी नागरिक या अॅपद्वारे करू शकतात. यासाठी गुगल प्ले स्टोअरवर Swachhata-MoHUA या नावाचे अॅप डाऊनलोड करून त्यावर आपल्या परिसरातील कचऱ्याचा फोटो अपलोड करायचा. आपली तक्रार निवारण झाली की नाही तसेच त्याबद्दल आपले मत देखील येथे नोंदवता येते. या सोबतच पालिकेचा १८०८३३१५०० हा टोल फ्री क्रमांक असून, त्यावरही तक्रार करता येते.

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये मालेगावचा भारतातील पहिल्या ५० शहरांमध्ये क्रमांक यावा यासाठी नागरिकांची सहभाग महत्त्वाचा आहे. स्वच्छता अॅप डाउनलोड केल्याने व त्यावर तक्रारी दाखल केल्यास स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये शहराचे गुण वाढतील. क्रमांकात सुधारणा होईल.
- संगीता धायगुडे,
आयुक्त, मालेगाव मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४२ गावांना सापत्न वागणूक!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

येवला विधानसभा मतदार संघाचे आमदार छगन भुजबळ तुरुंगात असल्याने मतदार संघातील विकासकामांवर परिणाम झाला आहे. याचा सर्वाधिक फटका लासलगाव विंचुरसह ४२ गावांना बसला आहे. त्यामुळे या सर्व गावातील सरपंचांनी एकत्र येत जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी योगेश चौधरी यांना निवेदनाद्वारे जिल्हा नियोजन कार्यालयात उपोषण करणार, असा इशारा दिला आहे.

येवला विधानसभा मतदार संघाचे आमदार छगन भुजबळ तुरुंगात असल्याने मतदार संघातील विकासकामांवर परिणाम झाला आहे. याचा सर्वाधिक फटका लासलगाव विंचुरसह ४२ गावांना बसला आहे. ही ४२ गावे प्रशासकीयदृष्ट्या निफाड तालुक्यात आणि मतदार संघीयदृष्ट्या येवला मतदार संघात असल्याने ना घरका ना घाटका अशी अवस्था या गावांची झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, दिंडोरी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनाही निवेदन दिले आहे. या निवेदनातून सरपंचांनी जिल्हा नियोजन समितीचे या ४२ गावांकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

या ४२ गावांनी जिल्हा नियोजन समितीकडे अनेकदा विविध विकासकामाबाबत आणि निधी वाटपाबाबत पाठपुरावा करूनही निधी वाटप करताना अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली. ४२ गावांपैकी काही गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी, दशक्रियाविधी शेड व इतर अन्य सुविधा नाहीत. याबाबत पाठपुरावा करुनही जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळत नाही अशी तक्रार या निवेदनात केली आहे.

मंजूर झालेल्या यादिच्या पुरवणी यादीत या गावांचा समावेश न झाल्यास ४२ गावातील सरपंच व सदस्य जिल्हा नियोजन कार्यालया समोर उपोषण करतील असा लेखी इशारा दिला आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य शिवा सुराशे, कोटमगावचे सरपंच तुकाराम गांगुर्डे, पाचोऱ्याचे गणेश डोमाडे, वेळापूरचे विशाल पालवे, शोभा भंडांगे, शांताराम कांगणे, मंगेश गवळी, तेजल रायते, रामकृष्ण मवाळ, भिवा शोधक, ललीता गांगुर्डे, उत्तम वाघ यांच्या सह विविध गावचे सरपंच उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखर्चित निधीवरून अधिकाऱ्यांना कानपिचक्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेत महिलांसाठी असलेला दहा टक्के राखीव निधी वेळोवेळी खर्च केला जात नसल्याने विधी मंडळाच्या महिलांचे हक्क व कल्याण समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

बैठकीत तीन अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. यात एका निवृत्त अधिकाऱ्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्याबद्दलही समितीने नाराजी व्यक्त केली. कोट्यवधी रुपयाचा निधी असून तो अखर्चित पडत असल्याने त्यांनी याबद्दल विचारणा केली. जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत आरक्षण, पदोन्नती, अनुशेष भरती, महिलांसाठी कल्याणकारी योजना यासह विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी या समितीने महिलांसाठी स्वतंत्र कक्ष (चेजिंग रुम) तत्काळ उभारण्यात यावा, अशा सूचनाही केल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तुम्ही महिला सदस्यांचे फोन उचलत नाही, त्यांना चांगली वागणूक देत नसल्याचे सांगितले. तसेच तुमचा नंबर सर्वांना द्या अशा सूचनाही केल्या. ही समिती महापलिकेत गुरुवारी जाणार आहे. जिल्हा रुग्णालय व त्र्यंबकेश्वर येथील शाळेत या समितीने भेट दिली. या समितीच्या प्रमुख आमदार भारती लव्हेकर, आमदार सीमा हिरे, प्रा. मेधा कुलकर्णी, अमिता चव्हाण, विद्या चव्हाण, अॅड. हुस्नबानू खलिपे या आढावा बैठकीत उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहक न्यायालयाचा मर्चंट बँकेला दणका

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेने ३० लाखाचे कर्ज मंजूर केल्यानंतर कमिटमेंट चार्जेसच्या नावाखाली १ लाख ४ हजार ३६१ रुपये बेकायदेशीररित्या वसूल केल्याच्या तक्रारीवरुन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने ही रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारास शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार व अर्जाचा खर्च ५ हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.

नाशिक येथील सुनीलकुमार मुंदडा यांनी नाशिक मर्चंट बँकेचे प्रशासक व लासलगावचे व्यवस्थापक यांच्या विरुध्द तक्रार दाखल केल्यानंतर हा निकाल देण्यात आला. मुंदडा यांनी २०१२ मध्ये अर्ज केला. त्यांचे ३० लाखांचे कर्ज मंजूर झाले. त्यानंतर २०१५ च्या सुरुवातीला बँकने कमिटमेंट चार्जेसच्या नावाखाली २०१४ पासून १ लाख ४ हजार ३६१ रुपये बेकायदेशीररित्या वसूल केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र याबाबत कोणतीही सूचना दिलेली नाही. बँकेतर्फे सांगण्यात आले की, १ ऑक्टोंबर २०१४ पासून जे कर्जदार कर्ज रक्कमेच्या ७५ टक्के रक्कम वापरत नसतील त्यांना दर तिमाहीस उचल न केलेल्या रक्कमेच्या ३ टक्के कमिटमेंट चार्जेस आकारण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार घेण्यात आला. तसे परिपत्रक बँकेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आले व कर्जदारांना देखील पाठविण्यात आले. न्यायमंचाने निकालात बँकेला ही रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ दिरंगाईबाबत चौकशीचे आदेश

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मालेगाव तालुक्यातील चौकटपाडे येथील शेतकऱ्याच्या आत्महत्येची तीन महिन्यांनी दखल घेण्यात आल्याने विलंबास कारणीभूत असलेल्यांवर जबाबदारी निश्चित करून तत्काळ कारवाई करा, असे आदेश प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी तहसीलदारांना दिले आहेत.

दयावान सरोदे (वय ४५) या शेतकऱ्याने २५ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. या घटनेची नोंद २४ तासात होणे आवश्यक असताना जिल्हा प्रशासनाकडे तब्बल तीन महिन्यांनी ही माहिती देण्यात आली. सरकारी यंत्रणा शेतकरी आत्महत्यांबाबत किती गंभीर आहे याचा प्रत्यय या घटनेमुळे आला असून असंवेदनशीलतेचही दर्शन घडले आहे.

या घटनेचा पंचनामा करून अहवाल त्वरित सादर करणे आवश्यक होते. परंतु तलाठ्याने २० नोव्हेंबर २०१७ रोजी हा अहवाल टंचाई शाखेला सादर केला. विलंबाच्या कारणाबाबत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे विचारणा केली आहे. या गलथानपणाची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करावी असे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारचे मंत्रीच खरे ‘लाभार्थी’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली म्हणून सत्ताधारी आमदारांनी मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला, असे एकही उदाहरण राज्यात पहावयास मिळालेले नाही. एकेका आधारकार्डवर पाचशे ते हजार शेतकऱ्यांची नावे असल्याची प्रकरणे पुढे येत असून हा मोठा घोटाळाच आहे. सरकारमधील मंत्रीच खरे लाभार्थी असून ‌त्यांचे फोटो छापणे शिल्लक असल्याची जळजळीत टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरूवारी नाशिकमध्ये केली.

कृषिथॉनच्या उद्‍घाटनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की सरकारने जी ऐतिहास‌िक कर्जमाफी दिली ती शेतकऱ्यांची ऐतिहासिक फसवणूक आहे. शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांचा किती अवमान करावा हे या योजनेतून आपण पहात आहोत. या योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का दिले हा देखील संशोधनाचा विषय आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा अवमान करेपर्यंत या सरकारची मजल गेली असून शेती व शेतकऱ्याला उद्‍ध्वस्त करण्याचे काम सरकार करीत असल्याची टीका यावेळी विखे यांनी केली.

सरकारकडे ‌बँकांच्या याद्या आहेत. त्यावर आरटीजचेएस करून ताबडतोब शेतकऱ्यांच्या रकमा वर्ग करायला हव्यात असे सभागृहात आम्ही सरकारला सांगितले. परंतु, कर्जमाफीच्या पत्रावर स्वत:चे फोटो मुख्यमंत्र्यांना छापायचे होते अशी टीकाही यावेळी करण्यात आली. ऑनलाइन हा फार्स असून सरकारला ऑफलाइन करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. कृषी विद्यापीठाच्या कारभारावरही विखे यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यात सातत्याने शेतकरी आत्महत्या होत असताना शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी कृषी विद्यापीठांकडून ठोस काही होताना दिसत नाही. कृषी उत्पादनांच्या विपणन व्यवस्थेसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठे काय करतात, हवामानाचे कृषी उत्पादनांवर काय परिणाम होतात आणि त्या माध्यमांतून उभ्या राहणाऱ्या आव्हानांना शेतकऱ्यांनी कसे सामोरे जायला हवे हे सांगण्यात विद्यापीठे कमी पडत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. राज्य सरकारच्या पुढे शेतकरी प्राधान्य क्रमावर नाही त्यामुळे कृषी मंत्र्यांचा शेतकऱ्यांशी संवादाचा विषयच रहात नाही, असे ते म्हणाले.

एक थेंब पाणीही गुजरातला देणार नाही
दमणगंगा, नारपार, पिंजाळ संदर्भात आमची भूम‌िका स्पष्ट आहे. राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ देणार नाही. राज्य सरकार केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करीत असेल तर सरकारला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी राज्यातच राहायला हवे. यासाठी कितीही मोठा लढा द्यावा लागला तरी सर्वांना सोबत घेऊन तो उभारण्यात येईल. राज्य सरकार गुजरात सरकारच्या दारात जाऊन पाणी भरत असेल किंवा प्रधानमंत्र्यांच्या दबावाखाली काम करीत असेल तर शेतकरी ते कदापि सहन करणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. या प्रकल्पा संदर्भातील पहिले अहवाल आमच्याकडे आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना हाताशी धरून सरकार अहवालच बदलायला लागले तर आम्ही ते होऊ देणार नाही, असेही विखे यांनी स्पष्ट केले.

‘मातोश्री’ प्रॉडक्शनचे चला, सत्ता सोडू या!
महसूलमंत्री चंद्रकात पाटील गुरुवारी मातोश्रीवर गेले. त्या पार्श्वभूमीवर विखे म्हणाले, की सत्तेत राहणारी शिवसेना भाजपवर टीका करून लोकांना निव्वळ मुर्खात काढण्याचे काम करीत आहे. राज्यात सध्या दोन विनोदी कार्यक्रम सुरू आहेत. त्यामध्ये एका मराठी वाहिनीवरील ‘चला, हवा येऊ द्या’ आणि मातोश्री प्रॉडक्शनचे ‘चला, सत्ता सोडू या’ हे दोन कार्यक्रम असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. विखे यांच्या या कोटीनंतर उपस्थित खळखळून हसले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुजरातचे वऱ्हाड पोहचले मालेगाव आरटीओत!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील एका लग्न समारंभासाठी सुरतहून आलेले वऱ्हाड लग्नमंडपात पोहचण्याआधी थेट आरटीओ कार्यालयात पोहोचले. विनापरवाना व चेक नाका चुकवून येणाऱ्या वऱ्हाडाच्या वाहनावर आरटीओने कारवाई केली. या कारवाईमुळे लग्नासाठी उत्सुक असलेल्या वऱ्हाडींचे चेहरे पडले होते.

गुजरातमधील सुरत येथून एका खासगी बसने (जीजे ०५ एझेड ४५७७) हे वऱ्हाड मालेगावी येण्यास निघाले होते. तालुक्यातील दाभाडी गावाजवळ आरटीओच्या पथकाचे मोटार वाहन निरीक्षक साहेबराव मंडलिक यांनी या वाहनाला अडविले. परराज्यात प्रवाशी वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेला परवाना व राज्यात प्रवेश करताना भरावयाची कर पावती देखील या वाहनचालकाकडे नसल्याने अधिकाऱ्यांनी दंड भरण्यास सांगितले. मात्र त्यासाठी वऱ्हाड असलेले वाहन थेट येथील आरटीओच्या आवारात आणले. त्यामुळे अनेकांना लग्नाचे वऱ्हाड आरटीओ ऑफिसमध्ये आल्याचे पाहून आश्चर्याचा धक्का बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा शेतकऱ्यांच्या उद्यमशीलतेला सलाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कृषी क्षेत्राला आणि पर्यायाने शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या उद्यमशील युवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत कृषीथॉन या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृषी प्रदर्शनाचा नाशिकमध्ये शुभारंभ करण्यात आला.

सिटी सेंटर मॉल आणि एबीबी सर्कल लगतच्या ठक्कर ठोम येथे कृषीथॉन प्रदर्शनाचा उद्‍घाटन सोहळा थाटामाटात पार पडला. ह्युमन सर्व्ह‌िस फाउंडेशन व मीडिया एक्झ‌िबिटर्स यांच्यातर्फे भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या उद्‍घाटनाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह ‘मविप्र’च्या सरचिटणीस नीलिमा पवार, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, ‘नाडा’चे विजूनाना पाटील, कृषी सहसचिव दिलीप झेंडे, कृषीथॉनचे आयोजक संजय न्याहारकर, साहिल न्याहारकर आणि अश्विनी न्याहारकर आदी मान्यवर उपस्थ‌ित होते.

यावेळी ठाकरे म्हणाले, की यवतमाळमध्ये काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला म्हणून किटकनाशकांची दुकानेच बंद करणे योग्य नाही. या किटकनाशकांमध्ये मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या ज्या घटकांचे प्रमाण अधिक आहेत ते नियंत्रणात आणायला हवे. कंपन्यांवर निर्बंध आणावेत व त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत, अशी आमची मागणी आहे. सरकारने या गोष्टींमध्ये बारकाईने जायला हवे.

कपाशीला अधिक तर द्राक्षासारख्या पिकांना कमी प्रमाणात औषधे लागतात. दोन्ही प्रकारचे औषधे एकत्रितरित्या विकू नये असे म्हटले तर दोन लायसन देणे सरकारला शक्य आहे का असे चुकीच्या पद्धतीने सरकार निर्णय घेत असेल तर ते योग्य होणार नाही. दुकानदारांवर बंदी आणण्यापेक्षा कंपन्यांवर कारवाई करा. दरम्यान, यवतमाळमध्येही असे कृषीथॉन घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नवनवीन तंत्रज्ञान, बदलती शेती पद्धती याविषयी या प्रदर्शनात माहिती मिळेल. सरकारने हवामानाधारीत प्रदेशावर कृषी धोरणाची रचना करायला हवी, अशी अपेक्षा विखे यांनी व्यक्त केली. राजकारण्यांनी सर्व व्यवस्था बिघडवली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचेही राजकारण झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे गणित शेतकऱ्यांनी ठरवायला हवे. अनुदानासाठी सरकारकडे भीक कशाला मागायला हवी, असा सवाल त्यांनी उपस्थ‌ित केला. पद्मावती चित्रपट हा काय राष्ट्रीय प्रश्न आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थ‌ित केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्या रोखण्यासाठी काम करा, असा सल्ला त्यांनी दिला. अन्य मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रदर्शन सोमवारपर्यंत (दि. २७) सुरू राहणार आहे. संजय न्याहारकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. साहिल न्याहारकर यांनी प्रास्ताविक केले.

युवा शेतकरी, संशोधकांचा सन्मान
कृषी क्षेत्रामध्ये प्रयोगशील कार्य करणारे राज्यातील युवा शेतकरी, महिला शेतकरी, युवा संशोधक, युवा कृषी उद्योजक अशा ३४ जणांचा या प्रदर्शनामध्ये सत्कार करण्यात आला. यामध्ये रुपाली पाटील, कल्पना दामोदर, रेखा वहाटूळ, विभावरी जाधव, ज्योत्सना सुरवाडे, राहुल सुपारे, राहुल रौंदळ, विष्णू मुसळे, योगेश पवार, आप्पा करमरकर, ब्रह्मानंद पांगुळे, उद्धव नेरकर, अभिजीत वाडेकर, रोहन उरसळ, समृद्धी परांजपे, सरोजिनी फडतरे, डॉ. दीपक क्षीरसागर, डॉ. मिलिंद जोशी, डॉ. अंकुश चोरमुले, आकाश चौरसिया (मध्य प्रदेश), डॉ. अमित शर्मा (हरियाणा), अनिरुद्ध उमरकर, भागवत बलक, रोकडेश्वर फार्मस कंपनी यांचा सन्मान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणच्या ‘इन्फ्रा’ला सरकारकडून मुदतवाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

महावितरण कंपनीच्या पायाभूत आराखडा-२ (इन्फ्रा) योजना राबविण्यात येत आहे. मार्च २०१७ मध्ये संपलेल्या या योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

पायाभूत आरखडा (इन्फ्रा-१) ही योजना २००८-०९ मध्ये पाच वर्षांसाठी तयार केली होती. त्यानंतर इन्फ्रा-२ ही योजना २०१३-१४ पासून राबविण्यात येत आहे. मार्च २०१७ पर्यंत ही योजना यशस्वीपणे राबविण्यात आली. त्यासाठी वर्षनिहाय नियतव्यय व अर्थसंकल्पित तरतुदीसही मान्यता दिली. काही ठिकाणी वीज उपकेंद्रासाठी जागा वेळेत न मिळाल्याने इन्फ्रा-२ ची कामे नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. सध्या या योजनेची ८७ टक्के कामे झाली असून उर्वरित कामे पूर्ण करण्यास मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्याची बाब सरकार दरबारी विचाराधीन होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने या योजनेला मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली.

इन्फ्रा-२ योजनेचा एकूण खर्च ८३०४.३२ कोटी असून महावितरणने ८० टक्के भांडवल म्हणजे ६६४३.४६ कोटी उभारून २० टक्के भांडवल १६६०.८६ कोटी रुपये सरकारने समभाग स्वरूपात देऊन हा प्रकल्प राबविला जात आहे. सद्यस्थितीत वीजप्रणाली सक्षम करणे, भविष्यात येणाऱ्या भार मागणीची उपलब्धतता करणे, सुयोग्य दाबाचा व खात्रीशीर वीजपुरवठा करणे, वितरण रोहित्रांचे नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी करणे, तांत्रिक व वाणिज्यिक हानी कमी करणे ही कामे करण्यात येतात. इन्फ्रा-२ या योजनेची गुणवत्ता तपासणीसाठी महावितरणने तीन श्रेणी गुणवत्ता यंत्रणा स्वीकारली. महावितरण आणि कंत्राटदार यांनी संयुक्तपणे माइलस्टोन चार्ट तयार करून ही कामे करण्यात येत आहेत.

इन्फ्रा-२ या योजनेअंतर्गत ५०३ विद्युत उपकेंद्रांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ३५८ उपकेंद्रे पूर्ण झाली आहेत. १२२ कामे प्रगतीपथावर आहेत. रोहित्र क्षमतावाढ करण्याची २१० कामांचे उद्दिष्ट असताना २०२ कामे पूर्ण झाली आहेत. अतिरिक्त विद्युत उपकेंद्र रोहित्र ३२६ करावयाची होती. यापैकी २८१ पूर्ण झाली आहेत. वितरण रोहित्रे ३८४१४ करावयाची होती. यापैकी ३३५८५ पूर्ण झाली आहेत.

३६५ कोटींची गरज
वीज वितरण रोहित्र क्षमतावाढ १४६३० चे उद्दिष्ट असताना १४०१९ कामे पूर्ण झाली आहेत. उच्चदाब वाहिनीचे २८१५९ किलोमीटरचे उद्दिष्ट असताना १९९०० किलोमीटर वाहिनी पूर्ण केली आहे. लघुदाब वाहिनीची २४१९८ किलोमीटरच्या कामाचे उद्दिष्ट असताना १८४५९ किलोमीटरची कामे पूर्ण झाली आहेत. मूळ योजनेनुसार इन्फ्रा-२ या योजनेस २० टक्के प्रमाणे शासनाकडून शिल्लक भागभांडवल देण्यासाठी २०१७-१८ साठी ५६० कोटी एवढी तरतूद केली आहे. २०१८-१९ साठी ३६५.५५ कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हसून-हसून मुरकुंड्या वळवणारं ‘गाढवाचं लग्न’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राजा असो वा रंक, नियतीचे जे लिखित आहे ते कुणालाच टळत नाही. एकदा सटवी टाक टाकून गेली की त्यानुसारच होणार हे निश्चित असते. देवदिकसुद्धा त्यातून सुटलेले नाहीत, हे दाखवणारे नाटक म्हणजे ‘गाढवाचं लग्न’. सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत हरिभाऊ वडगावकर लिखित ‘गाढवाचं लग्न’ हे नाटक गुरुवारी सादर करण्यात आले.

सावळा कुंभार नावाच्या एका अतिशय हुशार कुंभाराची ही कथा आहे. त्याची बायको गंगी आणि तो सुखात संसार करीत आहेत. परंतु, रानात गाढवे चरायला नेल्यावर एक गाढव आपणहून त्यांच्यात येते. सावळा कुंभारही ते गाढव ठेऊन घेतो. परंतु मध्यरात्री गोठ्यातून माणसासारखा आवाज येऊ लागतो. सावळा कुंभार भीतभीत तेथे जातो; तर गाढवच मनुष्यवाणीने बोलत असते. त्याला यात भुताटकी वगैरे वाटते. परंतु, तो त्याच्यावर फारसा विश्वास ठेवत नाही. ते गाढव सावळा कुंभाराला सांगते की राजाने त्याच्या कन्येच्या विवाहासाठी जो पैंजेचा विडा ठेवलाय तो उचलून घेऊन ये. सावळा त्याच्यावर विश्वास ठेऊन पैजेचा विडा उचलायला जातो तेथे प्रधान व राजा त्याची बरीच खेचतात. मात्र, सावळा कुंभार हुशार असतो तो राजाकडून एक कागद लिहून आणतो आणि पैजेचा विडा उचलून घेऊन येतो. एका रात्रीत सात तळाची तांब्या पितळाची माडी जो कुणी बांधेल त्याच्याशीच राजकन्या लग्न करेल इतरी सर्व पुरूष तिला वडिलांसमान आहेत अशी ही पैज असते. सावळा गाढवाला ही गोष्ट सांगतो. त्याप्रमाणे गाढव गावाबाहेर माडी उभी करून देते. आता विवाहाचा प्रसंग येतो. राजाला गाढव जावई मान्य नसतो मात्र सावळाने कागद लिहून घेतलेला असतो त्यामुळे त्याला लग्न लावून देणे भाग पडते. राजकन्येने विवाहाची माळ गळ्यात टाकताच गाढवाचे रूपांतर एका सुंदर राजकुमारात होते. ते गाढव म्हणजे पूर्वी सुरोचन नावाचा गंधर्व असते, इंद्राच्या दरबारात काही उपमर्द केल्याने त्याला गाढवाचा जन्म व उशा:प मिळालेला असतो. त्यानुसार त्याचे राजकुमारात रुपांतर होते व दोघे सुखी राहतात. अशा आशयाची ही कथा होती.

नाटकाचे लेखन हरिभाऊ वडगावकर यांनी केले होते. दिग्दर्शन सुरेखा लहामगे-शर्मा यांचे होते. निर्मिती सूत्रधार शुभम शर्मा होते. नेपथ्य राजेश भालेराव यांचे तर प्रकाशयोजना कृतार्थ कंसारा यांची होती. पार्श्वसंगीत दिनकर दांडेकर यांचे रंगभुषा माणिक कानडे यांची होती. ढोलकी शुभम लांडगे यांची होती. नाटकात मयूर चोपडे, जयप्र्रकाश पुरोहित, कीर्ती नागरे, श्रीम काटवे, खुशी पवार, भूषण बागूल, अतुल देशमुख, योगेश थोरात, डॉ. शैलेंद्र गायकवाड, कविता आहेर, विशाल पांडव यांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक : एक्झिट
वेळ : सकाळी ११.३० वाजता
आजचे नाटक : मून विदाऊट स्काय
वेळ : सायंकाळी ७ वाजता
स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७२ अर्ज अवैध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येथील नगरपालिका निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज भरल्यानंतर गुरुवारी छाननी प्रक्रीया पूर्ण झाली. नगराध्यक्ष आणि प्रभागातील १७ जागांसाठी एकूण २११ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ७२ अर्ज अवैध आणि १३२ अर्ज वैध ठरले. एका पेक्षा अधिक अर्ज दाखल करणे, एकाच उमेदवाराने दोन किंवा अधिक पक्षांचे चिन्ह लिहून सूचक केवळ एकच देत एबी फार्म व्यतीरिक्त असलेले अर्ज अवैध ठरविण्यात आले. यामुळे निवडणूक रंगात येण्याआधीच अनेकांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी दीपमाला चौरे आणि सहायक अधिकारी तथा मुख्याधिकारी चेतना केरूरे यांनी ही प्रक्रिया पार पाडली. माध्यमांच्या प्रतिनिधींसह सर्वांना कार्यालयात प्रवेश दिला नाही. उमेदवार आणि त्यांच्या सूचकांनाच प्रवेश होता. प्रभागाप्रमाणे नाव पुकारत अर्जदारांना आत प्रवेश देण्यात आला.

नगराध्यक्ष पदासाठी अजय अडसरे आणि दिलीप पवार यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. अजय अडसरे यांचे वडील नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी करीत आहेत तर दिलीप पवार हे प्रभाग पाच मधून उमेदवारी करीत आहेत. पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी करायची होती. मात्र त्यांची ही संधी हिरावली गेल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान सन २०१२ च्या निवडणुकीतही त्यांचे नाव मतदार यादीत आले नव्हते. त्यामुळे तेव्हाही त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले होते. तर यावेळी छाननी दरम्यान उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला.

माघारीनंतर चित्र स्पष्ट

अर्ज छाननी प्रक्रिया आज गुरुवारी पूर्ण झाली. तथापि लढतीचे चित्र २८ नोव्हेंबरच्या माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे. सकाळी ११ वाजेपासून सुरू झालेल्या या प्रकियेस पूर्ण होण्यास दुपारचे तीन वाजले होते. उमेदवार आणि त्यांचे समर्थक तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची पालिका कार्यालयाबाहेर गर्दी केली होती.

ऑनलाइन केंद्रांची कमाई

पालिकेला केवळ ना हरकत दाखल्यांची फिसाठी दोन लाखांपेक्षा अधिक मिळाली असावी, असा अंदाज आहे. तसेच एका उमेदवाराने पक्षाचे आणि अपक्ष असे एका पेक्षा अधिक अर्ज दाखल केले होते. असे एकूण २०१ अर्ज

आले होते. संगणक केंद्रावर सरासरी एक हजार रुपये खर्च धरल्यास दोन लाख रुपयांची कमाई ऑनलाइन सेवा पुरविणाऱ्यांनी केली आहे. दाखले जमा करणे आणि अर्ज दाखल करणे यामधे वेळ गेल्याने शेवटच्या दिवशी गर्दी झाली. अनेकांनी अर्ज दाखल करण्याचा विचार अर्धवट सोडला.

सुविधा अपूर्ण

उमेदवार आणि त्यांचे समर्थक पालिका कार्यालयासमोर उपस्थित होते. निवडणुकीसाठी अर्जदारांमध्ये महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पालिकेबाहेर काही महिला उमेदवार लहान मुलांसह उभ्या होत्या. पालिका प्रशासनाने सावलीसाठी मंडप तसेच पिण्यासाठी पाणी सुविधा न केल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

नागरिक जाणार कोर्टात

३१ मार्च हे आर्थिक वर्ष विचारात घेता घरपट्टी आणि पाणीपट्टी आगाऊ घेतली जाते. नागरिक बहुदा ३१ मार्चपूर्वी आपल्याला देय असलेले कर जमा करतात. निवडणूक असल्याने थकबाकी नको म्हणून १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ चे करबील उमेदवारी करणारे आणि त्यांचे सूचक यांना भरावे लागले आहे. त्यामुळे घरपट्टी, पाणीपट्टीबाबत आधीच पैसे मोजावे लागत असल्याने काही नागरिकांनी यावर आक्षेप घेत न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.

दोघांनी नाकारली शिवसेनेची उमेदवारी

शिवसेनने प्रभाग २ ब मधून रोह‌िणी गुंड यांना आणि प्रभाग ७ अ मधून अनुराधा मिल‌िंद पाटील यांना एबी फार्म दिले होते. छाननी दरम्यान या दोन्ही उमेदवारांनी आपणास पक्षाची उमेदवारी नको असल्याचे लेखी अर्ज दिले. त्यानंतर प्रभाग २ ब मधून मंजुषा नार्वेकर यांना आणि प्रभाग ७ अ मधून रूपाली सोनवणे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली.

मार्गदर्शनाअभावी हुकली संधी

ऑनलाइन अर्ज आणि सुचकांसह थकबाकीदार नसल्याची सक्ती तशात अपुरे मार्गदर्शनामुळे अनेकांची उमेदवारीची संधी हुकली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर १६ ते २२ नोव्हेंबर दरम्यान रविवारची सुटी वगळता अत्यंत कमी कालावधी उपलब्ध होता. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पालिका प्रशासनाने कोणतीही अद्यावत सुविधा न दिल्याने उमेदवारांचे हाल झाले. मागर्दशक सूचना प्रवेशद्वाराचे बाहेर असलेल्या पोल‌िस बॅरेकेडिंगवर लावण्यात आल्या होत्या. त्या सहजासहजी नजरेस पडत नव्हत्या. त्यामुळे उमेदवारांचा गोंधळ झाला.

१७ अर्ज इगतपुरीत ठरले अवैध

इगतपुरी : इगतपुरी नगर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी व ९ प्रभागातील १८ नगरसेवकपदासाठी दाखल झालेल्या अर्जाची गुरुवारी छाननी झाली. यात नगराध्यक्षपदाचे दोन व नगरसेवक पदाचे १५ अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय बागडे व मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे यांनी दिली. नगरसेवक पदासाठी ९३ तर नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवार रिंगणात असून, यापैकी कोण निवडणूक लढवणार हे २८ नोव्हेंबरला माघारी नंतर स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images