Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शेततळी ठरताहेत बळीराजासाठी फायद्याची

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य शासनाने २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. तालुक्यात गेल्या वर्षभरात ९८४ शेतकरी यासाठी पात्र ठरले असून, २६० हून अधिक शेतकऱ्यांचे शेततळे पूर्ण झाले आहे. यामुळे शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

शेततळे करण्यासाठी रोजगार हमीद्वारे शेततळे, एनएचएम योजनेद्वारे शेततळे व मागेल त्याला शेततळे अशा योजना आहेत. यातील मागेल त्याला शेततळे योजनेचा तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ होत आहे. तालुक्यातील १ हजार ४०१ शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत आपले सरकार पोर्टलद्वारे शेततळ्यांसाठी नोंदणी केली होती. यानंतर कृषी विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. मागेल त्याला शेततळे योजनेमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासोबत रब्बी व उन्हाळी पिके घेणे देखील शक्य झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहे.

सातमानेत ३६ शेततळे

मागेल त्याला शेततळे योजनेचा सर्वाधिक लाभ सातमाने गावातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. या गावात एकूण ३६ शेतकऱ्यांना शेततळ्यांचा लाभ झाला असून, यामुळे गावातील शेतकरी समाधानी आहेत. सातमाने गावात झालेल्या ३६ शेततळ्यांमुळे भविष्यात शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत होणार असून, शेतीसाठी पाण्याचा प्रश्न यामुळे बऱ्याच प्रमाणात मार्गी लागला आहे. त्यामुळे उत्पन्नातही वाढ झाली आहे.

अनुदान पडतेय कमी

मागेल त्याला शेततळे ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी लाभदायक असली, तरी एका शेततळ्यासाठी दोन ते अडीच लाख इतका खर्च येत असताना शासनाकडून केवळ ५० हजार रुपये इतके अनुदान मिळते. त्यामुळे पदराचे काही पैसे यात ओतावे लागतात. प्रसंगी कर्जही काढावे लागते. हे अनुदान वाढून मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
शेतीसाठी संरक्षित पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी शेततळे करावे. पावसाची अनिश्च‌ितता दिवसेंदिवस वाढत असल्याने शाश्वत सिंचनाचा पर्याय म्हणून मागेल त्याला शेततळे या योजनेचा लाभ घ्यावा. पाण्याची उपलब्धता झाल्याने रब्बी, उन्हाळी पिकास मदत होईल.

- गोकुळ आहिरे,

तालुका कृषी अधिकारी, मालेगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘गिरणा गौरव’तर्फे आज नारी सन्मान

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कळवण

सामाजिक, शैक्षणिक, उद्योग अशा विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या आदर्श महिलांचा गिरणा गौरव प्रतिष्ठानतफै ‘प्रेरणा नारी सन्मान २०१७’ या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. व्याख्यात्त्या व साहित्यिक प्रा. डॉ. प्रतिभा जाधव, नगराध्यक्ष सुनीता पगार, विभागीय आयुक्त दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा कळवण येथे शुक्रवारी, १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. नाशिकच्या महापौर रंजना भानसी, डॉ. उषाताई शिंदे, वैशाली आहेर, छाया बैरागी, सुनीता पगार, प्रतिभा चावडे, सोनाली बोरसे, कलाताई पवार, मिना देवरे, सुनीता लोखंडे, प्रतिभा संगमनेरे, आशाताई पवार यांचा सन्मान केला जाणार आहे.

कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांच्या ‘जखमी पावलांचे ठसे’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या प्रसंगी वाचन प्रेरणा दिनही साजरा होणार असल्याची माहिती गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, अॅड. परशुराम पगार, प्रा. के. के. शिंदे यांनी दिली. तालुक्यासह जिल्ह्यातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थ‌ित रहावे, असे आवाहन गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात एटीएम फोडले

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरातील मालेगाव रोडवरील बाजार समिती समोरील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल २३ लाख ११ हजार रुपयांची रोकड लुटून नेली. तसेच शहरातीलच बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम देखील गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरात प्रथमच बँकेचे एटीएम फोडून रोकड पळविण्याच्या घटनेने घबराट निर्माण झाली आहे.

सटाणा शहरात स्टेट बँकेचे चार एटीएम आहेत. त्यापैकी मालेगाव रोड येथील बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर एक एटीएम आहे. आज सकाळी हे एटीएम बंद असल्याची ऑनलाइन माहिती ब्रिंक इंडिया प्रा. लि. च्या मुंबई कार्यालयाला प्राप्त झाल्याने त्यांनी एजन्सीचे ऑपरेटर योगेश वैद्य व एटीएम ऑपरेटर सतीश रौंदळ यांना एटीएमवर भेट देण्याचा आदेश दिला.

सकाळी ७ वाजता या कर्मऱ्यांनी एटीएमला भेट दिली असता एटीएम समोरील व्हॉल्ट दरवाजा गॅस कटरने कापलेले दिसला. या कर्मचाऱ्यांनी सटाणा स्टेट बँकेचे कॅश ऑफिसर लक्ष्मण करावडे यांना याबाबत कळवून सटाणा पोलिसांनाही माहिती दिली. एटीएममधून २३ लाख ११ हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद करावडे यांनी सटाणा पोलिसांत दिली आहे.

स्टेट बँकेचे एटीएम फोडल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएमकडे वळविला. हे एटीएम देखील गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. दरम्यान सटाणा पोलिसांनी घटनास्थळावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. भरवस्तीत असलेल्या एटीएममध्ये चोरट्यांनी हात साफ केल्यामुळे पोलिसांसमोर त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळ्यात राष्ट्रवादीचा ‘हल्लाबोल’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण


केंद्र व राज्य शासनाच्या अनागोंदी, जनविरोधी कारभाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देवळा तहसीलदार कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन छेडण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नायब तहसीलदार अनिल चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

गेल्या तीन वर्षांत केंद्र व राज्य शासन सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. राज्य सरकारने अनेक पोकळ आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, लहान -मोठे व्यावसायिक, शिक्षक, डॉक्टर अशा सर्वच स्थरांमध्ये शासनाविषयी असंतोष पसरला आहे. केंद्र शासनाच्या नोटबंदी, जीएसटीच्या आततायी निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. राज्य शासनाच्या फसव्या शेतकरी कर्जमाफीमुळे कुणालाही त्याचा

फायदा झाला नाही, असे निवेदनात म्हंटले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, प्रांतिक सदस्य योगेश आहेर, मविप्रचे संचालक डॉ. विश्राम निकम, जिल्हा परिषद सदस्या नूतन आहेर, जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार, पंचायत समिती सभापती केसरबाई अहिरे, खुंटेवाडीचे सरपंच भाऊसाहेब पगार, देवळा नगरपंचायतीचे गटनेते जितेंद्र आहेर, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत आहेर यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हजर होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातशे ‘बीएलओं’ना नोटिसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ७०० हून अधिक केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) तहसीलदारांनी नोटिसा बजावल्या आहे.

निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी १५ ते ३० नोव्हेंबर असा कार्यक्रम दिला होता. यात जिल्हा पिछाडीवर पडला. त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी बुधवारी दहा तहसीलदारांना कारणे द्या नोटीस बजावली. त्यानंतर तहसीलदारांनी ‘बीएलओं’वर कारवाईचा बडगा उचलला आहे. यानंतरही कामे केल्याचे आढळून न आल्यास ‘बीएलओं’वर गुन्हा दाखल करण्याची तयारी तहसीलदारांनी केली आहे. यापूर्वी जळगाव येथे असे गुन्हे दाखल झाले आहेत. या पडताळणीला आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील तब्बल ४२ लाख मतदारांच्या ७ लाख कुटुंबापैकी फक्त ९ हजार २०० कुटुंबांचे ऑनलाइन पुनरिक्षण झाले असून त्यात मालेगाव व नाशिक शहरातील कामे अल्प प्रमाणात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मालेगावचे दोन विधानसभा मतदार संघ व नाशिकचे चार मतदारसंघ याकडे निवडणूक अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमात २२ हजार ऑफलाइन पुनरिक्षण झाले आहे. निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी १५ ते ३० नोव्हेंबर असा कार्यक्रम दिला. यात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी भेटी देण्याच्या सूचना केल्या. आता त्याला पुन्हा १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यात ४ हजार ‘बीएलओं’ची नियुक्ती करण्यात आली असून यात ऑनलाईन काम करण्यासाठी ३९१ ‘बीएलओं’ने सुरुवात केली आहे. काही ठिकाणी ऑफलाइन काम सुरू असले तरी त्यांची संख्या अद्याप पुढे आलेली नाही.

दुरुस्त्यांसाठी घाईगर्दी

मतदार पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ‘बीएलओ’ या भेटीत स्थलांतरित आणि मृत्यू झालेल्या मतदारांची नावे वगळणे, मतदारांचे नाव, वय, लिंग, पत्ता, फोटो यामध्येही आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याची जबाबदारी दिली आहे. तसेच मतदारांची, कुटुंबाची माहिती व संपर्कासाठी मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी भरण्याचे आदेश देण्यात आल्याने १५ दिवसात हे काम आता पूर्ण करावे लागणार आहे.

जिल्ह्यातील ७०० हून अधिक ‘बीएलओं’ला तहसीलदारांनी नोटीसा बजावल्या आहे. मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांला १५ दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे त्यात हे काम करणे आवश्यक आहे. नाशिक व मालेगाव शहरात सर्वाधिक कमी काम असून त्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
- गणेश राठोड, तहसीलदार, जिल्हा निवडणूक शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकअदालतीमध्ये ८० हजार खटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत ९ डिसेंबर रोजी आयोजित महालोकअदालत खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. या लोकअदालतीमध्ये सुमारे ८० हजार खटले सादर होणार असून, त्यापैकी सुमारे ४० हजारांपेक्षा अधिक खटल्याचा निपटारा होण्याची शक्यता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी व्यक्त केली. दावापूर्व आणि प्रलंबित खटल्यांतील दोघापैकी एका पार्टीने आताही संपर्क साधल्यास त्यांचा खटला सुनावणीसाठी घेणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी, ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकअदालतीमुळे २६ हजार ३७९ प्रकरणांमध्ये तडजोड करून आपसातील वाद मिटविला गेला. यामध्ये दावा दाखलपूर्व २२ हजार ६७८ प्रकरणे तर कोर्टातील तीन हजार ७०१ प्रलंबित प्रकरणांचा समावेश होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर खटले लोक अदालतीत येणे आणि त्यावर तडजोड होणे, ही बाब राज्यपातळीवरील विक्रम ठरली होती. आता ९ डिसेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन होणार असून, याबाबत पत्रकार परिषदेत शिंदे यांनी सांगितले, की यावेळी लोकअदालतीत प्रलंबित आणि दावा पूर्व असे ८० हजार खटले सुनावणीसाठी यावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. वर्षानुवर्षे सुनावणीसाठी कोर्टात चकारा मारणे, यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करणे हे नागरिकांनीच थांबवयला हवे. महापालिका अथवा अन्य एखाद्या संस्थेचा कर कधीही माफ होत नाही. त्यात तडजोडच करावी लागते. हीच बाब मोटार वाहन अपघातात मिळणाऱ्या भरपाईबाबतही लागू पडते. आज मिळणारी भरपाईची रक्कम सात ते आठ वर्षांनी पदरात पाडून घेण्यात कोणताही मतलब नसतो, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या लोकअदालतीचा अनुभव लक्षात घेता, कमकुवत दुव्यांमध्ये सुधारणा केल्या जातील. पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात असणार असून, लोक अदालतीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विभागाच्या बैठका घेण्यात आल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एम. बुक्के यांनी सांगितले. जिल्हाभरात यासाठी जनजागृती केली जात आहे.

न्या. शिंदेंची कार्यतत्त्परता!
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या मातोश्री सत्यभामा सोपानराव शिंदे यांचे सोमवारी (दि. २७) निधन झाले. मात्र, लोकअदालतीच्या कामांच्या नियोजनासाठी सोलापूर येथे गेलेले शिंदे एका दिवसात लागेच परत आले. आईसाठी जेव्हा गरज होती, त्यावेळी केले. घरात बसून राहणे पटत नव्हते. लोकअदालतीच्या पार्श्वभूमीवर हजारो खटल्यांचा निपटारा होणे महत्त्वाचे असून, यासाठी उपस्थित राहावे असे मन सांगत होते. घरात बसून रडणे हे आईलाही पटले नसते, म्हणून कामाला महत्त्व दिल्याचे भावनिक मत शिंदे यांनी व्यक्त केले.

वर्षांनुवर्षे सुरू राहणाऱ्या न्यायालयीन खटल्यांचा त्या कुटुंबावर परिणाम होतो. आर्थिक, मानसिक तसेच शारिरीकदृष्ट्या कुटुंबातील सदस्य खचून जातात. या केसेस कोणत्याही असो, दीर्घकाळाचा परिणाम होतोच. संबंधितांनी याची दखल घेत लोकअदालतीचा फायदा घ्यावा.
- सूर्यकांत शिंदे,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फांद्या छाटणी अधिकार विभागीय स्तरावर द्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वीज तारा तसेच पथदीपाभोवताली असणाऱ्या वृक्षांच्या फांद्या छाटण्यासाठी वृक्ष प्राधिकरणची परवानगी लागते. यामुळे छाटणीला विलंब होतो. हा कालापव्यय टाळण्यासाठी वृक्ष छाटणीचे अधिकार विभागीय अधिकाऱ्यांनाच देण्याचा ठराव पश्चिम प्रभाग समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तसेच विभागातील खासगी भूखंडावर अस्वच्छतेचे साम्राज्य पसरत असल्याने संबंधित जागामालकांना अस्वच्छतेप्रश्‍नी नोटिसा बजावण्यासह स्वच्छताकर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक पश्चिम प्रभाग समितीची बैठक सभापती डॉ. हेमलता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी झाली. यात नगरसेवकांनी उद्यानांची दुरवस्था, दुभाजकांमधील कचरा, वृक्षछाटणी प्रक्रियेतील विलंब आदी तक्रारींचा पाढा वाचला. वीज तारांना अडचणीच्या ठरणाऱ्या झाडांच्या फांद्याची वेळोवेळी छाटणी करणे आवश्यक आहे. परंतु, वृक्ष छाटणीच्या प्रस्तावांना वृक्षप्राधिकरण समितीची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. मात्र, वृक्षप्राधिकरण समितीची बैठक नियमित होत नसल्याने वृक्ष छाटणीला अडचणी येतात. परिणामी छाटणी अभावामुळे झाडांचे प्रश्न बिकट होतात. तसेच पथदीपांवरही काम करता येत नाही. दुभाजक देखभाल दुरुस्तीचे कंत्राट देऊनही दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे चर्चेअंती वृक्षछाटणीचे अधिकार विभागीय अधिकाऱ्यांना देण्याचा ठराव संमत करण्यात आला. दररोज सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत विद्युत विभागाने त्यांच्याकडील हॅट्रोलिक प्लॅटफॉर्म असलेली वाहने वृक्षछाटणीसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश सभापती डॉ. पाटील यांनी दिले. पावसाळी गटारींना ड्रेनेज जोडल्याने नदीपात्रात सांडपाणी मिसळत असल्याने पावसाळी गटार योजनेचा नकाशा उपलब्ध करून पावसाळ्यापूर्वी पावसाळी गटारींची स्वच्छता करण्याचे निर्देश सभापती डॉ. पाटील यांनी दिले.

उद्यान विभाग रामभरोसे
महापालिकेच्या उद्यान विभागासंदर्भातील तक्रारींचा पाढाच नगरसेवकांनी यावेळी वाचला. या विभागाकडेच उद्यान निरीक्षकांची वानवा असल्याचे समोर आले. महापालिकेकडे सहा विभागांसाठी केवळ दोनच उद्यान निरीक्षक उपलब्ध असून उद्यान निरिक्षक पांडे यांच्याकडे सहापैकी पाच विभागाच्या उद्यान निरीक्षकपदाची जबाबदारी असल्याचे समोर आले. पांडे हे देखील सहा महिन्यांच्या रजेवर जात असल्याचे सभेत सांगण्यात आल्याने उद्यान विभाग रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. वींरेंद्रसिंहांची त्र्यंबकला भेट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

मोखाडा तालुक्यातील (जि. पालघर) कुपोषणाबाबत केंद्रीय महिला व बालकल्याण राज्यमंत्री वींरेंद्रसिंह यांनी पालघर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि मोखाडा भागात अंगणवाड्यांच्या कामकाजाबाबत माहिती घेतली.

त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी वींरेंद्रसिंह आले होते. येथे येत असताना नाशिक-त्र्यंबक मार्गावरील खंबाळा अंगणवाडीस त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुंढे तसेच महिला व बालकल्याण सभापती खोसकर आदी उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वर येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला तेव्हा मोखाडा तालुक्यातील कुपोषणाचे प्रश्न विधीमंडळात उपस्थित होत असतात आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना टार्गेट करण्यात येते. याबाबत संबंधित विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात दोन महिला व बाल विकास प्रकल्प आहेत. तालुक्यातील दोन्ही प्रकल्पांबाबत अचूक माहिती मिळत नसल्याचे याप्रसंगी मंत्र्यांसह जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या कानावर घालण्यात आले आहे. दोन्ही प्रकल्पांचे अंतर्गत कुपोषणग्रस्त बालकांची संख्या अधिक आहे. मात्र, प्रत्यक्षात ही संख्या कमी असल्याचे भासविण्यात येते, असा आरोप तालुक्यातील ग्रामस्थ करतात. याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनारोग्याला वाढला धोका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात थंडीचा जोर वाढला असला तरी अस्वच्छतेमुळे डेंग्यूचा प्रकोप कमी होत नसल्याचे चित्र आहे. ऑक्टोबर पाठोपाठ नोव्हेंबर महिन्यातही डेंग्यूचा उच्चांक गाठला गेला आहे. नोव्हेंबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २७६ पर्यंत गेली आहे. तर संशयितांचा आकडा हा ७८० पर्यंत पोहचला आहे. नाशिककरांच्या आरोग्याला धोका वाढला आहे. दरम्यान, ६२ पथकाद्वारे डेंग्यूच्या अळीचे निर्मूलन केले जात असल्याचा दावा मलेरिया विभागाने केला आहे.

महापालिकेच्या वतीने केल्या जात असलेल्या उपाययोजना कागदावर असल्याने डेंग्यूच्या वाढत्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. पावसाळा संपल्यानतर डेंग्यू कमी होईल असे चित्र होते. परंतु, डेंग्यू डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर झाल्याने रुग्णांची संख्याही वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ९७ वर गेली. सप्टेंबर महिन्यात ती आणखी वाढून १०५ वर पोहोचली. तर ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक २४८ जणांना डेंग्यूची लागण झाली. ऑक्टोबरमध्ये संशयितांचा आकडा पावणेचारशेपर्यंत तर डेंग्यू बाधितांचा आकडा हा १४३ पर्यंत गेला होता. नोव्हेंबरमध्ये सुद्धा डेंग्यूचा कहर सुरूच आहे. ऑक्टेबरपेक्षा नोव्हेंबरमध्ये डेंग्यू बाधितांचा आकडा शंभरने वाढला आहे. त्यामुळे नाशिककरांच्या आरोग्याला धोका वाढला असून महापालिकेच्या उपाययोजना तोकड्या पळत असल्याचे चित्र आहे.

आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

नाशिकमध्ये सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण सिडको आणि सातपूर या दोन विभागात सापडले असून आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. दरम्यान, महापालिकेने या डेंग्यूवर उपाययोजनांसाठी अळी निर्मूलनाकरिता ६२ पथकांची स्थापना केली आहे. या पथकाद्वारे घरोघरी जावून जनजागृती करण्यासह डासांची उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट केली जात आहेत.

डेंग्यूचा प्रकोप
- जानेवारीत............४
- फेब्रुवारी............५
- मार्च............४
- एप्रिल............२
- मे............६
- जून............१९
- जुलै............१४
- ऑगस्ट............९७
- सप्टेंबर............१०५
- ऑक्टोबर............२४८
- नोव्हेंबर............२७६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीबाजारावरून सायट्रिकला वाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोडच्या सायट्रिक येथील भाजीबाजाराबाहेरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी भाजीविक्रेते आणि शेतकरी यांना महापालिकेच्या शाळा क्रमांक चौदासमोर स्थलांतरीत करण्याचा प्रयत्न झाल्याने वाद झाला. विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक पोलिसांसह दाखल झाले. नगरसेवक शरद मोरे यांनी मध्यस्थी केली.

जेलरोडला सायट्रिक येथे महापालिकेचा हाकर्स झोन आहे. तेथे काही वर्षांपासून भाजीबाजार भरतो. बाजाराबाहेरही अन्य काही भाजीविक्रेते व शेतकरी बसू लागल्याने मंडईतील भाजीविक्रेत्यांचा व्यवसाय कमी झाला. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना बाहेर भाजीविक्री करण्यास विरोध केला. तर शेतकऱ्यांची तक्रार आहे, की काही भाजीविक्रेत्यांनी बाजारात जागा मिळवली असूनही बाहेरही जागा बळकावली आहे. एकाच कुटुंबाचे तीन सदस्य वेगवेगळ्या तीन ठिकाणी भाजी विकतात. आम्हाला हुसकावून लावले जात आहे. आम्ही शाळेसमोरील नव्या बाजारात बसलो; मात्र तेथे ग्राहक फिरकत नाही. त्यामुळे आम्हालाही येथेच जागा द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर आणि नगरसेवक शरद मोरे यांनी सांगितले, की बाजारातबाहेर गर्दी होत असल्याने वाहतुकीला अडथळा होतो. याबाबत स्थानिक रहिवाशांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. बाजाराबाहेरील गर्दी कमी करावी व सदर जागा रिकामी करावी अशी त्यांची मागणी केली आहे. त्यामुळे आता या बाजारात कटलरी आणि फळविक्रेते यांना जागा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. शेतकरी व भाजीविक्रेत्यांना महापालिका शाळेसमोर जागा दिली आहे. तेथे मार्किंग करून सुविधा देण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाच्या सहा शाळा ‘व्हर्च्युअल’च्या वाटेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी नाशिक महापालिकेच्या सहा शाळा व्हर्च्युअल होण्याच्या मार्गावर आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून महापालिकेच्या सहा शाळा व्हर्च्युअल करण्यात येणार आहेत.

तंत्रज्ञानात्मक शिक्षणाची वाढती गरज पाहता शालेय वयापासून विद्यार्थ्यांना या प्रवाहात सामावून घेणे महत्त्वाचे ठरत आहे. खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना या सुविधा चुटकीसरशी उपलब्ध होत असल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक शाळांमधील विद्यार्थी मात्र अद्याप या ज्ञानापासून दूर असल्याचे वास्तव आहे. मात्र, आता या चित्रात बदल होणार आहे. सहा विभागातील प्रत्येक विभागात एक याप्रमाणे शाळेची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक शाळेला कॉम्प्युटर, एचडी वेबकॅम, मायक्रोफोन आदी तांत्रिक साहित्य देण्यात येणार आहे. तर शाळा क्रमांक १६ मध्ये डिजिटल क्लासरुमचा स्टुडियो असणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांमधील अभ्यासक्रमाबरोबरच विविध विषयांवरील चर्चासत्र, मान्यवरांची व्याख्याने आदी आवश्यक गोष्टींबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या नवीन वर्षात या शाळांची ‘व्हर्च्युअल’ कडे वाटचाल सुरू होणार असल्याचे महापालिकेचे प्रशासनाधिकारी नितीन उपासणी यांनी सांगितले.

या शाळांचा समावेश
- शाळा क्र. ८९ म्हसरुळ, पंचवटी
- शाळा क्र. ३६, पंचक, नाशिकरोड
- शाळा क्र. ४७, टाकळी, पूर्व नाशिक
- शाळा क्र. ७१, आनंदवल्ली, गंगापूर रोड.
- शाळा क्र. २२, विश्वासनगर, सातपूर
- शाळा क्र. ७२, अंबड सिडको
तसेच सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक या तालुक्यांमधील चार शाळा अशा दहा शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

खासदार निधीतून व्हर्च्युअल स्कूल बनविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रांद्वारे शिक्षण मिळणार असल्याने त्यांचाही उत्साह दुणाणणार आहे.
- नितीन उपासणी,
प्रशासनाधिकारी, मनपा शिक्षण समिती

येत्या महिनाभरात महापालिकेसह तालुक्यातील चार अशा एकूण दहा शाळांमध्ये या अभ्यासक्रमाचा डेमो होईल. तेथे व्हर्च्युअल क्लासरुम बनविण्यात येणार आहे. यातून चांगले परिणाम समोर आल्यास प्रत्येक तालुक्यातील शाळांमध्ये अशा प्रकारचे क्लासरुम बनविण्याचा प्रयत्न आहे. गुणवत्तावाढीसाठी मदत व्हावी, हा त्यामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांना सर्व तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.
- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अबब ! पोटातून काढली ७२ नाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लहान मुलाने चुकून एखादं नाणं गिळल्याच्या चर्चा अनेकदा कानावर पडतात. ते नाणं काढण्यासाठी त्याच्या कुटुंबियांची मोठी धावपळ उडते. परंतु, एखाद्या ५० वर्षांच्या व्यक्तीने अशी नाणी व धातूच्या वस्तू गिळल्याचे समोर आले तर निश्चितच ते सर्वांसाठी धक्कादायक ठरेल. अशीच एक घटना नुकतीच समोर आली असून, एका व्यक्तीने तब्बल ७२ नाणी व धातूच्या विविध वस्तू गिळल्याचे उघड झाले. शुक्रवारी या व्यक्तीवर डॉ. अमित केले यांनी शस्त्रक्रिया करून नाण्यांचा हा खजिना बाहेर काढला.

मूळचा पालघर जिल्ह्यातील असलेल्या मानसिक आजाराने ग्रस्त एका व्यक्तीने गेल्या पंधरा ते वीस वर्षांत विविध नाण्यांसह धातूच्या अनेक वस्तू गिळल्या. काही कॉइन शौचाद्वारे पडली, तर काही जठरामध्ये अडकली होती. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून पोट फुगणे, अन्नपचनास अडथळा, काहीही खाल्ल्यानंतर उलटीद्वारे अन्न पडून जाणे यांसारख्या त्रासाला त्यांना सामोरे जावे लागत होते. तीन वर्षांपासून ही व्यक्ती केवळ पाणी व द्रव्यावर जगत होती. अनेकदा तपासणी करुनदेखील रिपोर्ट नॉर्मल आल्याने त्यावर उपचार झाले नाहीत. गुरुवारी कॅनडा कॉर्नरवरील कृष्णा हॉस्पिटल व क्रिट‌िकल केअर सेंटरमधील डॉ. अमित केले यांनी एक्स-रे व दुर्बिणीद्वारे तपासणी केली असता पोटात धातू असल्याचे निष्पन्न झाले. त्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊन शुक्रवारी ही नाणी बाहेर काढण्यात आली. ही व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त असल्याने त्याने हा प्रकार केल्याचे सांगितले जात आहे. भूलतज्ज्ञ डॉ. सपना कासलीवाल, डॉ. शिल्पा सोनवणे व डॉ. विजय सोनवणे डॉ. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

दुर्बिणीद्वारे, एक्सरेद्वारे पाहिल्यानंतर मेटलचा पार्ट अडकल्याचे दिसून आले. त्यानंतर पेशंटला भूल देऊन पूर्णतः दुर्बिणीद्वारे ७२ नाणी बाहेर काढण्यात आली. तीन-साडेतीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ही नाणी काढण्यात आली. पेशंट आता पूर्णपणे बरा असून, लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. ही शस्त्रक्रिया करणे संयमाचे तसेच आव्हानात्मक होते.

- डॉ. अमित केले, एण्‍डोस्कोपिस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याला मारण्यासाठी सव्वाशे जण वरखेड्यात

$
0
0

नाशिकः चाळीसगाव तालुक्यातील वरखेडा येथे धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यासाठी वनविभागाने आता मिशन बिबट्या हाती घेतले आहे. या बिबट्याला जिवंत किंवा मृत पकडण्यासाठी वनविभागाचे तब्बल सव्वाशे अधिकारी, कर्मचारी वरखेड्यात दाखल झाले आहेत. रात्रंदिन पहारा देऊन बिबट्याचा निकाल लावण्याचे वनविभागाने निश्चित केले आहे.

गिरणाकाठ परिसरातील वरखेडा येथे बिबट्या धुमाकूळ घालत आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून परिसरातील नागरिक बिबट्याच्या त्रासामुळे हैराण झाले आहेत. याठिकाणी दुर्देवी दोन घटना घडल्यानंतर वनविभागाने पिंजरा लावला आणि त्यात एक बिबट्या जेरबंद झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण, यास ३८ दिवस उलटत नाही तोच बिबट्याचा धुमाकूळ समोर आला. गेल्या काही दिवसात याठिकाणी चार दुर्घटना घडल्याची वनविभागाकडे नोंद आहे. बागायती शेती, मुबलक पाणी, मेंढ्या आणि मेंढपाळांचा वावर असे पोषक वातावरण असल्या बिबट्या या परिसरात वास्तव्य करून आहे. मात्र, हा बिबट्या नरभक्षक बनल्याने परिसरात अतिशय भीतीचे वातावरण आहे. सातत्याने घडणाऱ्या दुर्घटना आणि मंत्र्यांसह अनेक मान्यवरांची येथे लागणारी हजेरी लक्षात घेता वनविभागाने आता मिशन बिबट्या हाती घेतले आहे.

नाशिकच्या दोन रेस्क्यू टीमसह एकूण १० पथके वनविभागाने बिबट्याला शोधण्यासाठी तैनात केल्या आहेत. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यास त्याला बेशुद्ध करण्यासाठी बंदूकधारी आणि बिबट्या दिसताक्षणी त्यास ठार मारण्यासाठी बंदूकधारी अशा दोन्ही प्रकारच्या बंदूकधारींचा पथकात समावेश आहे. वरखेडा येथील उदयसिंग पवार आश्रमशाळेत वनविभागाने डेरा टाकला आहे. तब्बल सव्वाशे कर्मचारी दिवस-रात्र याठिकाणी पहारा देत आहेत. काही बंदूकधारी कर्मचारी तर पिंजऱ्यात २४ तास तैनात आहेत. पशुवैद्यकीय डॉक्टरांचे एक पथकही याठिकाणी रुजू करण्यात आले आहे. जळगावचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या नेतृत्वामध्ये हे संपूर्ण कर्मचारी कार्यरत आहेत. या पथकाने येथील परिसर पिंजून काढला आहे. आश्रमशाळेच्या ठिकाणी अक्षरशः वॉररूम स्थापन करुनच वनविभागाचे मिशन बिबट्या सुरू आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

स्थानिक ग्रामस्थांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. त्यांच्याकडे जी काही माहिती आहे, ती त्यांनी थेट वनविभागाला द्यावी. आश्रमशाळेच्या ठिकाणी आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यात संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.


बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत. आम्ही कसोशीने बिबट्याच्या शोधात आहोत. बिबट्याला जिवंत किंवा मृत पकडण्याचे आदेश आम्हाला देण्यात आले आहेत.

- सुनील वाडेकर, वनकर्मचारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत स्वच्छतागृहांची वानवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरात अनेक दिवसांपासून स्वच्छतागृहांची कमतरता असतानाच त्रिमूर्ती चौक व सावतानगर येथील स्वच्छतागृहे तोडण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना विशेषतः महिलांना गैरसोय सहन करावी लागत आहे. स्मार्ट सिटीकडे जाणाऱ्या नाशिकचाच एक भाग असलेल्या सिडकोत किमान ही सुविधा तरी महापालिकेने तातडीने द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

सिडको परिसरात सध्या शिवाजी चौक येथील भाजी मार्केटमध्ये महापालिकेने सुलभ शौचालय उभारले आहे. त्याव्यतिरिक्‍त उत्तमनगर येथे एक स्वच्छतागृह असून, पवननगर येथे एक सुलभ शौचालय आहे. पवननगर ते उंटवाडीपर्यंत म्हणजे जवळपास संपूर्ण सिडकोत एकही स्वच्छतागृह नसल्याचे दिसून येते. यापूर्वी सावतानगर येथे खासगी जागेत एक स्वच्छतागृह होते. परंतु, या जागेवर नव्याने इमारत उभी राहत असल्याने हे स्वच्छतागृह पाडण्यात आले. त्याचप्रमाणे त्रिमूर्ती चौकातील भाजी मार्केटजवळसुद्धा स्वच्छतागृह होते. परंतु, तेदेखील काही दिवसांपूर्वी पाडण्यात आले. त्यामुळे आता या भागात स्वच्छतागृहच राहिले नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, अनेकांना अक्षरशः खुल्या जागेचा वापर करावा लागत आहे. सिडको प्रशासनाने सिडकोच्या कोणत्याही जागेवर स्वच्छतागृह उभारलेले दिसत नसल्याने सिडकोत स्वच्छतागृहांची समस्या भेडसावत आहे. येथे पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याने बाहेरगावाहून येणाऱ्यांचीदेखील कुचंबणा होत अाहे. त्यामुळे महापालिका व सिडकोने तातडीने या भागात पुरेशा स्वच्छतागृहांची उभारणी करावी, अशी मागणी हेात आहे.

--

राखीव भूखंडच नाही

नाशिक शहराची स्मार्ट सिटीत गणना झालेली असताना सिडकोतील साधी स्वच्छतागृहांची समस्या अद्याप सुटलेली दिसत नाही. त्यामुळे हे शहर स्मार्ट सिटीत कसे जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सिडको प्रशासनाने महापालिकेकडे सर्व योजना हस्तांतर केल्या असल्या, तरी एकही भूखंड स्वच्छतागृहासाठी राखीव नसल्याचे समजते. सिडकोत दाट वस्ती झालेली असल्याने आता कोणत्‍याही ठिकाणी स्वच्छतागृह उभारताना नागरिकांचा विरोध होण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे.

--

भाजीविक्रेत्यांकडून साकडे

सिडकोतील त्रिमूर्ती चौक भागात असलेल्या भाजीविक्रेत्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारावे, अशी मागणी परिसरातील भाजीविक्रेत्यांनी केली आहे. सिडकोने भाजीविक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून गाळे बांधून दिले असले, तरी त्या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने ते उभारून द्यावे, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना भाजीविक्रेत्यांनी दिले. यावेळी शीतल जाधव, अलका जाधव, कुसुम चव्हाण, मालती भावसार, कविता मोंढे, सुनीता गायकवाड, अनिता आहेर, प्रतिभा पाटील यांच्यासह अनेक भाजीविक्रेते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नार-पार’च्या आराखड्यात बदल

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नार-पार प्रकल्पाचा २०११ मधील आराखडा आणि नव्याने तयार केलेला आराखडा यात बदल आहेत. बदललेल्या आराखड्यात चणकापूर धरणापासून निघणारा प्रस्तावित डावा कालवा व उजवा कालव्याचे विस्तारीकरण रद्द करण्यात आले. यामुळे मालेगावसह कळवण, सटाणा या भागावर अन्याय होत आहे. या भागाला त्याच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत नागपूर अधिवेशनादरम्यान बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

नार-पार प्रकल्पासंदर्भात येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी भुसे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. बैठकीत काँग्रेस आमदार असिफ शेख, महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, राष्ट्रवादीचे विनोद चव्हाण, शांताराम लाठर, बाळासाहेब शिरसाठ, रिपाइंचे दिलीप आहेर, दीपक निकम, बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, मनोहर बच्छाव, रामा मिस्तरी, संजय दुसाने आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी भुसे यांनी नार-पार प्रकल्पाचा पूर्वीचा आराखडा व बदलेला आराखडा याबाबत नकाशाद्वारे प्रेझेन्टेशन दिले. बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी बैठकीस उपस्थित राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या शंका, प्रश्नांचे निरसन करण्यात आले. राष्ट्रवादीचे विनोद चव्हाण, काँग्रेस आमदार असिफ शेख, महापौर रशीद शेख, शांताराम लाठर यांनी देखील गिरणा खोऱ्यास हक्काचे पाणी मिळावे यासाठी लढ्यात सहभागी असल्याची ग्वाही दिली.

भाजपची अनुपस्थिती?

गेल्या काही दिवसांपासून नार-पार प्रकल्पावरून भाजप व शिवसेनेत श्रेयवाद रंगला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दादा भुसे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीस भाजपच्या वतीने एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. या बैठकीबाबत भाजपला देखील आमंत्रित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे नार-पारच्या प्रश्नी भुसे यांनी सर्वपक्षीय मोट बांधण्याचा प्रयत्न केला असला, तरी मालेगावी पार पडलेल्या बैठकीत भाजपची अनुपस्थीतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हल्लाबोल मोर्चातून सरकारचा निषेध

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-शिवसेना युती सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सिन्नर तहसील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेच्या समस्या, महागाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, रस्त्यांच्या समस्या, उद्योग, रोजगारात झालेली घसरण, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न, ढासळलेली शिक्षण व्यवस्था, आरोग्याच्या समस्या, कुपोषण यांसारख्या विविध समस्यांवर भाजप-शिवसेना युती सरकारने तातडीने लक्ष घालावे अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार नितीन गवळी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रवींद्र काकड, माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, युवकचे तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, डॉक्टर्स सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. विष्णू अत्रे, डी. डी. गोर्डे, मेघा दराडे, आफरीन सैय्यद, निलीमा थोरात उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावातील मोबाइल टॉवर पालिकेच्या रडारवर

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील बेकायदेशीर मोबाइल टॉवरची चौकशी करून नोटिसा बाजावण्याचे आदेश येथील स्थायी समिती सभापती सलीम अन्वर यांनी दिले. महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक बैठक सभापती सलीम अन्वर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस डॉ. खालिद परवेज शेख, सुवर्णा शेलार, राजाराम जाधव, पुष्पा गंगावणे आदी स्थायी सदस्य उपस्थित होते.

शहरात विविध मोबाइल कंपन्यांच्या ८० टॉवरपैकी फक्त १४ टॉवरसाठी संबंधित कंपण्यांनी महापालिकेची परवानगी घेतली आहे. तर ६६ टॉवर बेकायदेशीर आहेत. ज्या जागांवर टॉवर उभे आहेत, त्या मिळकत धारकांना वाणिज्य घरपट्टी अकारली जाते का? असा सवाल अन्वर यांनी केला.अनेक मिळकत धारकांची घरपट्टी थकीत असल्याचेही समोर आले. सर्व मिळकत धारकांसह टॉवरची चौकशी करून सविस्तर अहवाल पुढील स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात यावा. बेकायदा टॉवर उभारणाऱ्या कंपन्यांना नोटिसा बजवाव्यात, असे आदेश स्था अन्वर यांनी दिले. शहराची स्वच्छता व आरोग्याचा प्रश्न विचारात घेता कंत्राटी पद्धतीने मजूर घेण्याच्या प्रस्ताव तहकूब करण्यात आला. ज्या ठेकेदारांच्या अनामत रकमा जप्त आहेत, त्या ठेकेदारांना रक्कम परत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या ठेकेदारांची नावे यादीतून कमी करण्याच्या प्रस्ताव तहकूब करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना त्याच दिवशी मिळणार मोबदल्याचा चेक

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कळवण

नोटबंदीची तीव्रता आता कमी झाली असून, शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतमालाचा मोबदला देताना व्यापाऱ्यांनी त्याच दिवसाचा धनादेश द्यावा, अन्यथा व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश नाशिकचे जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी दिले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोबदल्यासाठी फारवेळ वाट पहावी लागणार नाही.

उमराणा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी प्रतिनिधी, संचालक मंडळ व व्यापाऱ्यांची ३० नोव्हेंबर रोजी बाजार समितीच्या कार्यालयात बैठक दि. आयोजित करण्यात आली होती. यावेळी करे बोलत होते. उमराणा बाजार समितीमधल्या काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे देणे थकवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अचानक जिल्हा उपनिबंधक करे यांनी उमराणा बाजार समितीला भेट दिली. ज्या शेतकऱ्यांचे शेतमाल विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे व्यापाऱ्यांकडे थकले आहेत त्या व्यापाऱ्यांनी १५ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांची सर्व देणी चुकती करावीत, असेही निर्देश करे यांनी दिले. उमराणा बाजार समितीची नव्याने स्थापन झालेली असल्याने प्रशासन व्यवस्थेबाबत करे यांनी मार्गदर्शन केले. उमराणा बाजार समितीमध्ये शासनाने मका खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी पं. स. सदस्य धर्मा अण्णा देवरे यांनी केली. यावेळी सभापती राजेंद्र देवरे, सहाय्यक निबंधक संजय गीते, संचालक विलास देवरे, महेंद्र आहेर, संचालक मिलिंद शेवाळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१८५ झोपडपट्टीधारकांना मिळणार हक्काचे घरकुल

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील झोपडपट्टी धारकांना हक्काचे घर मिळावे यासाठी म्हाळदे शिवारातील प्रकल्पातून १८५ लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात येणार असल्याची महिती मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली.

या प्रकल्पाअंतर्गत लाभार्थ्यांचे स्थलांतरण करण्याबाबत आयुक्त धायगुडे यांच्यासह, आमदार आसिफ शेख, महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, शहर अभियंता सचिन मालवळ, कैलास बच्छाव, प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार, मक्तेदार आदींची बैठक घेण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष घरकुल योजनेच्या प्रकल्पास भेट देण्यात आली.

लाभार्थींना घरकुल देण्यापूर्वी शाळा, दवाखाना, भाजी बाजार, वाहतूक व्यवस्था यांसारख्या अत्यावश्यक सोई सुविधा कशाप्रकारे देता येतील, याबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी पहिल्या टप्प्यातील १८५ लाभार्थ्यांना घरकुल देण्याबाबत सोमवारी होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

चार टप्प्यांत होणार वाटप

म्हाळदे शिवारात सुरू असलेल्या योजनेतून शहरातील १९९५ पूर्वीच्या विविध १७ झोपडपट्टीधारकांना ११ हजार घरकुल मिळणार आहेत. यातील ७ हजार घरांची निर्मिती जवळपास पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत घरकुलचा लाभ मिळण्यासाठी ९०९ लाभार्थ्यांनी शुल्क भरले आहे. पहिल्या टप्प्यात १८५ लाभार्थींना आपल्या हक्काचे घर लवकरच मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रब्बीच्या पेरण्या मंदावल्या

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, येवला

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या पावसाळयात घसरलेले पर्जन्यमान, परतीच्या पावसाने दिलेला दगा अन् त्यातून शेतशिवारातील विहिरींमधील खालावलेला जलस्त्रोत यामुळे येवला तालुक्यात रब्बी हंगामातील पांभरीची गती मंदावली आहे. गत व यंदाच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत तालुक्यात झालेल्या रब्बीच्या पेरण्यांवर नजर टाकली असता यंदा रब्बीच्या पेरणीचा आलेख हा ११ टक्क्यांनी घसरल्याचे दिसत आहे.

आजवरच्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे ‘अवर्षणप्रवणग्रस्त’ अर्थातच दुष्काळी तालुका अशी ओळख निर्माण झालेल्या येवला तालुक्याची खरीप तसेच त्यानंतर येणाऱ्या रब्बी हंगामातील कथा अन् शेतकऱ्यांची व्यथा न विचारता येण्यासारखीच. तीन वर्षांच्या भीषण टंचाईची दाहकता सोसताना गेल्या वर्षी तालुक्याच्या झोळीत पावसाचे बऱ्यापैकी दान पडल्याने खरीप अन् रब्बीचा रान फुलण्यास मदत झाली होती. गेल्या वर्षी तालुक्यात २८ नोव्हेंबरपर्यंत जवळपास ५५ टक्क्यांपेक्षा अधिक रब्बीच्या पेरण्या झाल्या होत्या. यंदाच्या पावसाळ्यात मात्र गतवर्षीच्या तुलनेत तालुक्यात पावसाचा आलेख खाली आला. रब्बीसाठी आवश्यक असलेले पाणी म्हणावे तसे हाताशी नसल्यानेच तालुक्यातील अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी अदयापही पेरणीची पांभर आपल्या खळ्यातून बाहेर काढली नाही. यावर्षी २८ नोव्हेंबरपर्यंत तालुक्यात केवळ ४४ टक्केच रब्बीच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत.

पालखेडच्या आवर्तनाकडे नजरा

येवला तालुक्याचा पश्चिम-दक्षिण पट्ट्यातील पालखेड डावा कालव्याचा किरकोळ अपवाद वगळता तालुक्याचा उर्वरित उत्तर व पूर्व भाग अन् त्यातील असंख्य गावे म्हणजे पाटपाण्याचा कुठलाही स्त्रोत नसलेला भाग. पावसाचे दान व त्यावर अवलंबून असलेला विहिरींचा जलस्त्रोत यातूनच या भागाचे शेतीचक्र फिरणारे. याच उत्तरपूर्व भागात यंदा म्हणावी तशी वरुणकृपा न झाल्याने विहिरींना जेमतेम पाणी आहे. उपलब्ध पाण्यावरच या भागातील शेतकऱ्यांनी रब्बीचा जुगार खेळला आहे. त्यामुळे पालखेड लाभक्षेत्रातील गावांच्या नजरा पालखेडच्या पाण्याकडे लागल्या आहेत. पालकमंत्र्यांनी येवला तालुक्यासाठी पालखेडची दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पहिले आवर्तन कधी मिळते व मिळणाऱ्या या आवर्तनातून नेमके किती प्रमाणात पाणी शेतशिवारातील वाफ्यांमध्ये फिरते, यावरच या भागातील रब्बी हंगाम अवलंबून आहे.




अशी झाली पेरणी

रब्बीचे एकूण क्षेत्र- १३ हजार ४८६ हेक्टर.

त्यापैकी ५ हजार ८७२ क्षेत्रावर पेरण्या पूर्ण

तालुक्यात आतापर्यंत रब्बीची ४४ टक्के पेरणी पूर्ण.

गतवर्षीच्या तुलनेत ११ टक्के पेरण्या कमी

३३० हेक्टरवर रब्बी ज्वारी

२३३७ हेक्टरवर गहू

३२०२ हेक्टरवर हरभरा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images