Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

लोकन्यायालय प्रभावी संकल्पना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सद्यस्थितीत दहा लाख नागरिकांच्या मागे एकच न्यायाधीश असल्याने न्यायदानाला विलंब होतो. यासाठी लोकन्यायालय ही संकल्पना प्रभावी आहे. लोकन्यायालयाबाबत अधिक लोकजागृती होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी केले.

निफाड तालुका विधीसेवा समिती दिवानी व फौजदारी न्यायालय पिंपळगाव (ब) वकिल संघ व ग्रामपालिका ओझर यांच्यातर्फे आयोजित लोकन्यायालय जनजागृती शिबिरात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर पिपळगाव कोर्टाचे न्या. माणिकराव सातव, आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त महेश लोंढे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर बुके, न्या. मोहबे, आमदार अनिल कदम, अॅड. दत्तात्रय लोंढे, उपविभागीय अधिकारी अतुल झेंडे, पिंपळगाव वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. जनार्दन देवरे आदी उपस्थित होते.

आमदार कदम म्हणाले, की लोकन्यायलय ही संकल्पना महत्त्वाकांक्षी आहे. नागरिकांनी या संकल्पनेला प्रतिसाद द्यावा. यावेळी अॅड. शामराव पगार यांनी लोकन्यायालयाचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमास ओझर ग्रामपालिकेच्या सरपंच जान्हवी कदम, निफाडच्या दिवानी न्यायाधीश रेणुका सातव, न्या. संग्राम काळे, न्या. दिनेश एंडाईत, न्या. पांडुरंग घुले, न्या. श्रीधर ढेकळे, न्या. मृदुला कोचर, न्या. पवन तापडिया, न्या. डी. एस. जाधव, न्या. विक्रम आव्हाड, न्या. स्वरा पारखे, न्या. प्रेरणा दांडेकर, न्या. स्वाती फुलबांदे, सरकारी वकील आबिद तडवी, प्रा. मनीष सोनवणे, ओझर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार उपाशे, पिंपळगाव पोलिस स्टेशनचे निरीक्षक वासुदेव देसले, तालुका वैद्यकीय अधिकारी एन. के. चव्हाण, ओझरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैशाली भदाणे आदी उपस्थित होते. अॅड. भूषण जाजू आणि अॅड. सुभाष शेलार यांनी सूत्रसंचालन केले.

समाज कर्तृत्वाची जाणीव हवी

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना न्या. शिंदे म्हणाले, की लोकन्यायालय संकल्पनेला उभ्या महाराष्ट्रात मागील वेळेस नाशिकला सर्वाधिक मोठे यश मिळाले. पाश्चिमात्य देशात जलद गतीने न्याय मिळतो. मात्र, आपल्याकडे न्यायाधीशांची संख्या अतिशय कमी असल्याने न्यायप्रक्रियेस विलंब होतो. जन्माला येताच प्रत्येक नागरिकाला नैसर्गिकरीत्या हक्क मिळतात. जशी सहकार आणि शासकीय देणी प्रत्येकाला द्यावी लागतात तशीच समाजाची सुद्धा काही देणी असतात. समाजाच्या कर्तव्याचीही जाणीव प्रत्येकाने ठेवावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यू-ट्यूबवर घेतले एटीएम फोडण्याचे ‘मार्गदर्शन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापायी सर्वसाधारण कुटुंबातील दोघा उच्चशिक्षित तरुणांनी यू-ट्यूबवर एटीएम फोडण्याची माहिती घेत तसा प्रयत्न केला. मात्र, तरुणाचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडत दोघांना बेड्या ठोकल्या.

सटाणा येथील एटीएम फोडून २३ लाख रुपयांची लूट होण्याच्या घटनेत काही तास उलटत नाही, तोच शहरात ही घटना घडल्याने एटीएम सुरक्षेचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. किरण रघूनाथ मोरे (२२, रा. कृष्णा हाईटस, शिवगंगानगर, दिंडोरीरोड) आणि अमित साहेबराव गवई (२४, रा. श्याम अपा. पीएनटी कॉलनी) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. कोर्टाने त्यांना ४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोघांनी शुक्रवारी पहाटे पाऊणेपाच वाजेच्या सुमारास शहरातील कुलकर्णी गार्डनलगत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र फोडण्याचा प्रयत्न केला. सर्वसाधारण कुटूंबातील आणि उच्चशिक्षित असलेल्या संशयितांनी झटपट श्रीमंत होण्याच्या नादात यू-ट्यूबवर एटीएम कसे फोडतात, याची माहिती घेतली. त्यानुसार बाजारातून छन्नी, कटावणी, हातोडा असे साहित्य खरेदी केले. गुरूवारी (दि. ३०) रात्री रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्यानंतर दोघेही एका पल्सरवर बाहेर पडले. संशयितांनी त्यांच्या दुचाकीची नंबर प्लेटही झाकून टाकली होती. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हे दोघे एटीएम केंद्रावर गेले. पाहण्यासाठी कोणीही नाही, असे वाटून त्यांनी एटीएम फोडण्यास सुरुवात केली. पहाटेच्या शांततेत होणारा आवाज ऐकून जागरुक नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षास माहिती दिली. सरकारवाडा पोलिसांचे गस्ती पथक पाऊणेपाच वाजेच्या सुमारास घटनास्थळी पोहचले. एटीएम फोडण्याच्या कामात गर्क असलेल्या दोघांना पोलिस आल्याची चाहूल लागली. दोघांपैकी एकाने पंडित कॉलनीच्या दिशेने धूम ठोकली. दुसरा पोलिसांच्या हाती लागला. पळ काढलेल्या संशयितास पंधरा मिनिटात अटक करण्यात आली. संशयितांविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये कलम ३९३, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपींना कोर्टाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, अधिक तपास पीएसआय अनिल बागूल करीत आहे.

संशयित आरोपींनी यू-ट्यूबवर एटीएम मशिन कसे फोडायचे याची माहिती मिळावल्याचे पुढे येते आहे. दोघेही सुशिक्षित असून, खासगी ठिकाणी कामही करतात. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे काय, याचा शोध घेतला जाईल. झटपट पैसा मिळवण्याच्या नादात हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी दिसते.
- राजू भुजबळ, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात नऊ गोवंशांची सुटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरालगतच्या कंधाणे फाट्याजवळून पिक अप वाहनात कोंबून मालेगाव येथे कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या आठ गायी आणि एका गोऱ्ह्याची सटाणा शहरात सुटका करण्यात आली. या प्रकरणी ‌तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

इस्तीयाद अहमद मुस्ताकी (रा. मुस्लिमनगर, मालेगाव), वसीम अहमद तडवी (रा. मालेगाव) आणि सलीम शेख (रा. आझादनगर, मालेगास) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघा संशयितांची नावे आहे. त्याच्याविरोधात सटाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कळवणहून सटाणा मार्गे मालेगाव येथे कत्तलीसाठी गायींनी भरलेली पिकअप गाडी जात असल्याची माहिती शहरातील काही तरुणांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी आठ-दहा युवक कंधाणे फाट्याजवळ दबा धरून बसले. त्यांनी येणारी एक पिकअप (एमएच १६ जी ८९२४) थांबविली. पिकअपमधील तिघांपैकी दोघांनी अंधाराचा फायदा घेत पळून गेले. मात्र, चालक तरुणांच्या हाती लागला. त्याने गाडीत गायी असल्याची कबुली देताच संतप्त जमावाने त्याला बेदम मारहाण करी पिकअपमधील आठ गायी आणि गोऱ्ह्याची सुटका केली. या घटनेची माहिती शहरात पसरताच शेकडोंचा जमाव घटनास्थळी दाखल झाला. पिकअपची तोडफोड करून आग लावण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील याच्यासह १५ ते २० पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

‘एसआरपी’ची तुकडी दाखल

गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या गाडीचालकाला बेदम चोप देण्यासह पिकअपची तोडफोड आणि आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सटाणा पोलिसांनी वेळीच जमावाला पांगविल्याने पुढील अनर्थ टळला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी राज्य राखीव दलाची (एसआरपी) तुकडी सटाण्यात मागविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्सर रोखण्यासाठी मुख तपासणी मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या काळात मुख स्वास्थ तपासणी मोहीम म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान राज्यातील ३० वर्षांवरील सुमारे सव्वा कोटी लोकांच्या मौखिक आरोग्यासाठी तपासणीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली असून, शनिवारी (दि. २) मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

मुख स्वास्थ्य जीवनाचे गमक आहे. भारतात मुख कर्करोग हा प्राधान्याने आढळून येतो. पूर्वावस्थेत मुख कर्करोग ओळखला गेला तर त्यापासून वाचता येते. तंबाखूसह गुटखा, मशेरी सेवन हे कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. मुख कर्करोगाला आळा घालण्यासाठी जनजागृतीबरोबरच ३० वर्षांवरील व्यक्तींची मुख स्वास्थ तपासणी महत्त्वाची आहे. या अनुषंगाने संपूर्ण डिसेंबर महिन्यात तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली.

जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, इतर खासगी संस्था, इंडियन मेडिकल असोसिएशन, वैद्यकीय व्यावसायिक यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. तालुकास्तरावर तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ २ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून जनजागृतीसाठी विविध सरकारी कार्यालये, आशा सेविका यांचीही मदत घेतली जाते आहे.

याबाबत सिव्हिल हॉस्पिटलचे दंतचिकित्सक तसेच कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. दिनेश अशोक ढोले यांनी सांगितले, की ग्रामीणसह शहरी भागात गुटखा, तंबाखू खाणाऱ्यांचे वय अगदी १४ वर्षांपासून सुरू होते. त्यामुळे या मोहिमेत अशा तरुणांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. आशा सेविकांना जनजागृतीसह तपासणी कार्यात सहभागी करून घेतले जाणार असल्याने त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील अधिकाधिक लोकसंख्या समावून घेता येईल यासाठी प्रयत्न असून, कॅन्सरची कोणतीही लक्षणे दिसून आल्यास त्या पेशंटवर उपचार सुरू करण्यात येतील, असे डॉ. ढोले यांनी स्पष्ट केले. संशयित पेशंट्सवर संदर्भासह टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्येही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायखेडा परिसरात जुगार अड्ड्यावर छापा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सायखेडा (ता. निफाड) येथे अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या तीन व्यक्तींवर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली. मटकाचालक फरार झाला असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सायखेडा येथील श्रीकृष्ण हॉस्पिटलच्या मागे एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती विशेष ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली. त्यानुसार, या विशेष पथकाने धाड टाकली. जुगार खेळणारे भाऊलाल नारायण मर्कड (रा. सायखेडा), राजू रियाज शेख (रा. चाटोरी) आणि चंद्रकांत रामभाऊ निकम (रा. ओढा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८ हजार ७० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. यावेळी मटकाचालक मतीन पटेल (रा. चाटोरी) हा पोलिस येण्यापूर्वीच पळून जाण्यात यशस्वी झाला.

सायखेडा येथेच गंगानगर भागातही जुन्या मंदिराच्या बाजूला धाड टाकून येथे मटका खेळणारे युनूस गफूर शेख (रा. सायखेडा), रवींद्र शिवाजी सोनवणे (रा. लासलगाव), पोपट लहानु मर्कड (रा. सायखेडा) यांना ६ हजार ३६० रुपये व जुगाराच्या साहित्यासह ताब्यात घेण्यात आले. अर्जुन आढाव (रा. सायखेडा) याचा हा जुगार अड्डा असल्याचे समजते.

सायखेडा येथे पोलिस स्टेशन आहे तरीही जुगार अड्डे राजरोसपणे सुरू असल्याने कारवाई करण्यात आल्याचे मानले जात आहे. स्थानिक पोलिस यंत्रणेला हे माहीत नव्हते याचा ‘अर्थ’ काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण पोलिसांच्या विशेष पोलिस पथकाला ही कारवाई करायची वेळ येते. शिवाय या पोलिसांनाही मटका खेळणारे सापडतात आणि अड्डा चालवणारे पळून जातात हा प्रकारही कारवाईच्या बाबतीत संशयास्पद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर पोलिसांसाठी उद्यापासून शेल्टर प्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक परिक्षेत्रातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना हक्काचे घर घेता यावे यासाठी शहर पोलिस आणि क्रेडाई यांच्यातर्फे शेल्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्‍घाटन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या रविवारी (दि. ३) हस्ते होणार आहे.

पोलिस दलात होणाऱ्या बदल्या आणि कमी आर्थिक स्त्रोतांमुळे बहुतांश कर्मचाऱ्यांना सेवाकाळात आपल्या घराचे स्वप्न साकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. सिंगल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पोलिस मुख्यालयातील बॅरक क्रमांक १७ मध्ये ३ आणि ४ डिसेंबर रोजी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. उद्‍घाटन सोहळा रविवारी सकाळी साडे दहा वाजता होणार आहे. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल, सचिव उमेश वानखेडे, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनात शहरातील १५ नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी साकारलेल्या ५० गृहप्रकल्पांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी प्रत्यक्ष बांधकाम पाहण्याचीही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गृहकर्ज तसेच इतर सर्व माहिती प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात आली असून, परिक्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शहर पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेगण शिवारात संशयास्पद वाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील आंबेगण शिवारातील पाझर तलावात सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यातच गरूवारी (दि. ३० नोव्हेंबर) मध्यरात्री एक संशयास्पद चार चाकी वाहन या ठिकाणी आल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली असून, लवकरच मृतदेहाची ओळख पटवण्यात यश येईल, असे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.

आंबेगण शिवारातच २७ नोव्हेंबर रोजी एका १६ ते १८ वयोगटातील मुलीचा मृतदेह आढळून आला होता. आरोपीने अत्यंत थंड डोक्याने मुलीची निर्घुण हत्या केली. चेहऱ्याची ओळख पटू नये याची काळजी आरोपीने घेतली. यानंतर सदर मृतदेहाचे हातपाय बांधून तो एका गोणीत टाकला. या गोणीत दगड भरून तो आंबेगण शिवारातील पाझर तलावत टाकून दिला. साधारणतः तीन ते चार दिवसांनी मृतदेहाची गोणी तरंगतवर आली. त्यानंतर खूनाच्या घटनेला वाचा फुटली. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू झाले आहे. घटनेच्या चार दिवसांनंतरही मृतदेहाची ओळख पटली नसून, मारेकरी मोकाट आहेत. दरम्यान, मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास एक संशयित वाहन सदर परिसरात येऊन गेल्याची माहिती समोर आली असून, स्थानिक नागरिकांनी ही माहिती पोलिसांना कळवली आहे. एवढ्या रात्री सदर चारचाकी वाहन या ठिकाणी का होते, याचे उलगडा पोलिसांना झालेला नाही. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक कर्पे यांनी सांगितले, की एका चारचाकी वाहनाची मध्यरात्री संशयास्पद हालचाल झाल्याची बाब समजली आहे. मात्र, वाहनाचे वर्णन स्पष्ट नसून, या परिसरात सदर वाहनाचे व्हिडीओ फुटेज मिळण्याची शक्यता धूसर आहे. सदर मुलीची ओळख पटणे महत्त्वाचे असून, त्यादृष्टीने चौकशी सुरू असल्याचे पीआय कर्पे यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील पोलिस पाटलांना संपर्क करण्यात आला असून, त्यांना मुलीचे वर्णन असलेले हॅण्ड बील देण्याचे काम सुरू झाले आहे. गावांमध्ये बेपत्ता असलेल्या मुलींची माहिती संकलित केली जात आहे.

मृतदेहावर ‘मविप्र’चा बेल्ट
मुलीच्या अंगावर ‘मविप्र’ संस्थेच्या शाळेचा लोगो असलेला बेल्ट मिळाला होता. त्यामुळे ही माहिती व्यापक अर्थाने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये देण्याची विनंती संस्था चालकांना करण्यात येणार आहे. परिसरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकानाही संपर्क साधण्यात येत असल्याचे कर्पे यांनी सांगितले. दरम्यान, सदर मुलगी परजिल्ह्यातील असण्याचीही शक्यता आहे. आजुबाजूच्या जिल्ह्यातील पोलिसांकडूनही माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

मुलीची ओळख पटवण्याचे सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहे. मुलीची ओळख पटली की पुढील तपासास वेग मिळेल. ग्रामीणसह शहर आणि आजुबाजूच्या जिल्ह्यातही चौकशी सुरू आहे. काही तरी धागे‌दोरे मिळण्याची अपेक्षा आहे.
- संजय दराडे, जिल्हा पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या आमिषाने फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत नांदगाव येथील बेरोजगार तरुणास पाच जणांनी मिळून तब्बल तीन लाख रुपयांना गंडा घातला. पोलिसांनी यापैकी चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, एका फरार संशयिताचा शोध सुरू आहे. कोर्टाने सर्व संशयितांना ५ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

सोमनाथ विठ्ठल डाबल (३७, रा. शांतीनगर, मखमलाबादरोड), राजेश राम रोहिडा (४२ रा. दत्तनगर, पेठरोड), राजेंद्र सहदेव मोरे (४५ रा.लक्ष्मीनगर, नांदगाव) आणि हेमचंद्र विष्णू आहिरे (६२, रा. क्रांतीनगर, मखमलाबाद) अशी अटक झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या टोळीतील साहेबराव रामभाऊ शेवाळे (रा. सौंदाणे, ता. नांदगाव) हा त्यांच्या साथीदार अद्याप फारार आहे. या प्रकरणी संदीप बाळू सानप (रा. कासारी, ता. नांदगाव) या तरुणाने तक्रार दिली आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या संदीपची राजेंद्र मोरे या शिक्षकाशी ओळख झाली. आदिवासी विकास विभागात काही उच्च पदस्थ अधिकारी ओळखीचे असून, नोकरी मिळेल असे चित्र मोरेने उभे केले. त्याबदल्यात त्याने संदीपकडे साडेसात लाख रुपयांची मागणी केली. सुरुवातीस दीड लाख अन नोकरी मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले. संशयित आरोपींनी बनावट सही शिक्के तयार करून संदीपच्या नोकरीची ऑर्डर पोस्टाद्वारे पाठवून दिली. यामुळे संदीपचा संशयितांवरील विश्वास वाढला. त्यामुळे त्याने पुन्हा दीड लाख रुपये आरोपींच्या स्वाधीन केले.

अन् फुटले बिंग

आदिवासी विकास विभागाच्या दुसऱ्या मजल्यावर अधिकारी असल्याचे भासवून संशयितांनी मुलाखत घेत रजिस्टरवर स्वाक्षरी घेतली. यानंतर वैद्यकीय चाचणीचे बनावट पत्र दिले. दरम्यान, आदिवासी विकास विभागाचा सुरक्षारक्षक राजेश रोहिडा यास अधिकारी असल्याचे भासविण्यात आल्याने या घटनेचे बिंग फुटले. नोकरी पक्की झाल्याच्या आविर्भावात तरुणाने आदिवासी विकास विभाग गाठले असता रोहिडा हा अधिकारी नसून सुरक्षारक्षक असल्याचे समोर आले. यानंतर संदीपने पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांची भेट घेऊन कैफियत मांडली. चौकशीत संदीप देण्यात आलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करीत पोलिसांनी संशयितांना जेरबंद केले. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मनीषा घोडके करीत आहेत.

नेहमीच होतात प्रकार

आदिवासी विकास विभागाच्या नावाखाली बनावट नियुक्तपत्र देऊन आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार सातत्याने समोर येतात. विशेष म्हणजे संशयित आरोपी सतत या विभागात चकरा मारत असतात. विभागाच्या नावाखाली बनावट स्टॅम्प, कागदपत्रे तयार केली जातात. तेथील काही कर्मचारी यात सहभागी असतात. त्यामुळे विभागाच्या प्रमुखांनीही सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेणे गरजेचे झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार दुचाकी लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर परिसरातील विविध ठिकाणाहून चार दुचाकी चोरट्यांनी हातोहात लांबवल्या. या प्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

देवळा येथील सागर दिलीप सोनगिरे ११ ऑगस्ट रोजी नातेवाइकांना भेटण्यासाठी शहरात आले होते. शरणपूररोडवरील राज अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांकडे ते मुक्कामी थांबले होते. चोरट्यांनी पार्किंगमध्ये लावलेली त्यांची दुचाकी (एमएच ४१ एएफ ९५५५) चोरून नेली. सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार निकम करीत आहेत. सिन्नर येथील पोपट आनंदा कातकाडे यांची दुचाकी चोरट्यांनी हातोहात लांबवली. एका विवाहासाठी ते शुक्रवारी सांयकाळी गुरूदत्त लॉन्स येथे आले होते. लॉन्सच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची स्प्लेंडर (एमएच १५ सीए २९४५) चोरट्यांनी चोरी केली. आडगाव पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार वनवे करीत आहेत. दरम्यान, मखमलाबादरोड परिसरातील सुनील बाबुराव धात्रक (रा. रामसृष्टी सोसा. स्वामी विवेकानंदनगर) यांची यामाहा (एमएच १५ एफसी २८३५) गुरूवारी (दि. २९) रात्री चोरी झाली. चोरट्यांनी धात्रक यांच्याच सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरून नेली. घटनेचा अधिक तपास म्हसरूळ पोलिस स्टेशनचे हवालदार शेळके करीत आहेत. तसेच जेलरोड येथील त्रिमूर्तीनगर भागातील विनोद शिवराम गरूड यांची स्प्लेंडर (एमएच १५ डीडब्ल्यू ६६६८) रविवारी रात्री त्यांच्या घराच्या पार्किंगमधून चोरट्यांनी हातोहात लंपास केली. नाशिकरोड पोलिसस्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक शेळके अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंड न भरताच दाम्पत्याची धूम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नो-एन्ट्रीमध्ये दुचाकीवर जाणाऱ्या दाम्पत्यास पोलिसांनी अडवले. मात्र, आम्हालाच त्रास का देता? असे म्हणत पती पत्नीने पोलिसांनाच कायदा शिकवला. तसेच गर्दी जमवत धूम ठोकली. या दाम्पत्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक एस. पी. गेंगजे, एस. पी. सावळे आणि शिपाई असे एम. जी. रोड परिसरातील वकीलवाडी चौकात कर्तव्य बजावत होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास राँगसाईड जाणारी एक दुचाकी पोलिसांनी अडवली. वाहतूक नियमाचा भंग केला म्हणून पोलिसांनी दंडाची रक्कम मागितली. मात्र, दुचाकीवरील (एमएच १५, एडब्लू ३३०८) दाम्पत्याने पोलिसांशी वाद घालला. ‘नो-एन्ट्री’चा बोर्ड कोठे आहे? आम्हालाच का पकडता? असे म्हणत त्यांनी पोलिसांशी वाद घातला. पाहणाऱ्यांची गर्दी जमू लागल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनशी संपर्क साधून मदत मागितली. आपल्यावर कारवाई होण्याची शक्यता दिसताच संबंधित दाम्पत्याने पैसे भरण्यास सहमती दर्शवली. मात्र, ‘नो-एन्ट्री’चा फलक इतका मधे का लावला? असा प्रश्न करीत पुन्हा वाद घातला. पैसे देण्यासही नकार दिला. पोलिसांनी सदर दाम्पत्यास पोलिस स्टेशनला चला म्हणून सांगितले. मात्र, आम्ही काय चोर आहोत काय? असे म्हणत दाम्पत्याने आम्ही स्वतः पोलिस स्टेशनला हजर होतो, असे सांगितले. मात्र, सदर दाम्पत्य गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले. ते पोलिस स्टेशनला पोहचलेच नाही. या प्रकरणात सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल करावा, असा निर्णय पोलिसांनी घेतला होता. मात्र, दाम्पत्याने दंडाची पावती तयार केल्यानंतर पलायन केले. यामुळे या प्रकरणी शहर वाहतूक शाखेतील पोलिस नाईक के. व्ही. कासार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक खात्यातून परस्पर खरेदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बँक खाते व आधार कार्डची माहिती मिळवित चोरट्यांनी लागलीच ५० हजार रुपयांची परस्पर ऑनलाइन खरेदी केली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेशकुमार रामचंद्र सिंग (रा. मीडियम बॅटरी स्कूल, देवळाली कॅम्प) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुरेश सिंग यांना ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ८६७७९३५०९८ या क्रमांकावरून फोन आला होता. संबंधिताने एसबीआयच्या मुंबई येथील मुख्य शाखेतून बोलत असल्याचे सांगत सिंग यांच्या बँक खात्याची माहिती काढून घेतली. तसेच एटीएमकार्डाचा क्रमांक आणि आधारकार्डची माहिती घेण्यात चोरटा यशस्वी ठरला. यानतंर चोरट्याने लागलीच बँक खाते हॅक करून त्याआधारे अॅमेझॉन या ऑनलाइन खरेदी साईटवरून ५० हजार रुपयांची खरेदी केली. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच सिंग यांनी प्रथम बँकेत आणि तेथून थेट देवळाली कॅम्प पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक डौले करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निमसे मळ्यात गॅस चोरीचा गोरखधंदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरगुती वापरासाठी असलेल्या सिलिंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या संशयितांना पोलिसांनी छडा लावला. नांदूरनाका भागात पत्र्यांच्या शेडमध्ये हा उद्योग सुरू होता. या प्रकरणी दोघांविरुध्द आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, या कारवाईत ३२ सिलिंडर, चार चाकी टेम्पोसह लोखंडी पाइप आणि वजनकाटा जप्त करण्यात आला आहे.

मुकेश रामभाऊ पाथरे (रा. कमलवाडी, निमसेमळा) आणि राकेश सुभाष सोनवणे (रा. विद्यानगर, मखमलाबाद रोड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. गॅसचोरीचा उद्योग कमलवाडी येथील काशिनाथ निमसे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होता. घरगुती सिलिंडरमधून गॅस चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखा आणि आडगाव पोलिस संयुक्तरित्या तपास करीत ही कारवाई केली. पोलिसांनी बुधवारी (दि. २९) दुपारी छापा मारला. यावेळी अगदी सराईतपणे गॅस चोरी होत असल्याचे आढळून आले. पोलिसांची चाहूल लागल्याने संशयित पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध करीत आहेत. शेडमध्ये एमएच १५ बीजे ३८२१ या वाहनासह सुमारे दोन लाख ९७ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास हवालदार लोहकरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौघांविरूद्ध खंडणीचा गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड येथील सेंट्रल जेलमध्ये असलेल्या मित्राला सोडविण्यासाठी एका महिलेकडे दहा हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी चार जणांच्या टोळीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. ही घटना बुधवारी (दि. २९) रात्री घडली.

पंचवटी पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून, एकजण फरार आहे. शारदा संजय लिंगायत (४०, रा. स्वामी समर्थ मंदिरासमोर, राधानगर, मखमलाबाद रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी ऋषीकेश बापू पगारे (१९), विजय राजेश आमले (२२), आकाश रामपाल चव्हाण (२४, सर्व रा. शितळादेवी मंदिरामागे, काजीगढी, जुने नाशिक) आणि नरेश पाटील (रा. मनपा शाळा क्र. ५६ जवळ, फुलेनगर) यांनी लिंगायत यांच्या घरी येऊन दहा हजार रुपयांची मागणी केली. आमचा मित्र सागर कुमावत सेंट्रल जेलमध्ये आहे. त्याला सोडवण्यासाठी पैशांची गरज आहे. पैसे दिले नाही तर मुलगा विशाल यास ठार मारू, अशी धमकी संशयितांनी दिली. गुन्हा दाखल करीत पोलिसांनी लागलीच तिघा संशयितांना ताब्यात घेतले. संशयित नरेश पाटील फरार झाला असून, अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत आज जुलूस-ए-मोहम्मदी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

​मुस्लिम धर्माचे संस्थापक असणाऱ्या हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणजेच ईद-ए-मिलाद इस्लामी कालगणनेप्रमाणे शनिवारी (दि. २) साजरी करण्यात येणार आहे. या निमित्त शहरात हिरव्या पताकांसह हिरवे-लाल-पिवळे व नारंगी झेंडे ठिकठिकाणी उभारण्यात आले आहेत.

शहरातील मुख्य जामा मशिदीपासून मिलाद पार्टीच्या गायन-वादनात जुलूस-ए मोहम्मदी मिरवणुकीला सायंकाळी चार वाजता सुरुवात होणार आहे. या प्रसंगी शहरातील राजकीय मान्यवरांसह मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक सहभागी होणार आहेत. जुन्या बस स्थानक परिसरात भव्य स्टेज उभारण्यात आला आहे. या ठिकाणी आकर्षक देखावा सादर करण्यात येणार आहे. ईदनिमित्त शहर रोषणाईने उजळून निघाले आहे. मुस्लिम ​समाजामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रस्त्यांच्या दुतर्फा सजावटीसह चौकाचौकांमध्ये स्वागतकमानी उभारण्यात आल्या आहेत. सुन्नी इस्लामिक फाउंडेशन, चिश्तिया ग्रुप, शहंशाह-ए-सरकार ग्रुप, शेख फ्रेंड्स सर्कल, बज-मे-नमाज ग्रुप, फैजानी सोशल ग्रुप, गुलाम-ए-हुसेन आदी मंडळांच्या वतीने चौकाचौकात आकर्षक देखावे सादर करण्यात येणार आहे.

जामा मशिदीचा देखावा

शेख फ्रेंड सर्कलच्या वतीने फत्तेपूर लखनऊ येथील ऐतिहासिक जामा मशिदीचा देखावा सादर करण्यात आला आहे. दिवसभर मुस्लिम युवकांकडून शहराच्या विविध भागात दुचाकीवरून रॅली काढण्यात येणार आहे. तसेच ठिकठिकाणी मिठाई व सरबत वाटपाचा कार्यक्रम होईल. केजीएन ग्रुपच्या वतीने नियाज-ए-मोहम्मदी (महाप्रसाद) वाटप होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईदची आज रौनक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मानवता आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या हजरत मोहम्मद पैगंबरांची जयंती अर्थात ईद-ए-मिलादचा सण शनिवारी (दि. २) साजरा होणार आहे. जुने नाशिक, वडाळागाव आणि शहरातील अनेक भागांमधील मशिदी रोषणाईने उजळून निघाल्या आहेत. दिवसभर सामूहिक कुराण पठण, जुलूस, विविध धार्मिक कार्यक्रम आणि अन्नदानासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

ईदन‌िमित्त सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेजेसला शुक्रवारी सुटी असली तरी चंद्रदर्शन न झाल्याने हा सण शनिवारी साजरा होणार आहे. दरवर्षी इस्लामी कालगणनेतील रबीऊल अव्वल या उर्दू महिन्याच्या १२ तारखेला पैगंबर जयंती साजरी केली जाते. यंदाही यानिमित्त शहरात विविध ठिकाणी प्रवचन आणि स्तुतीपर काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या सणानिमित्त मुस्ल‌िमांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. घरे, मशिदी, व्यावसायिक आस्थापनांवर विद्युत रोषणाई करण्यात आली असून घरोघरी बच्चेमंडळींनी सजावटी पूर्ण केली आहे.

जुने नाशिकमध्ये दुपारी मिरवणूक
पैगंबर जयंतीनिमित्त जुन्या नाश‌िक परिसरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. खतीब यांनी जाहीर केलेल्या मिरवणुकीच्या नियमावलीचे पालन करून शांततामय वातावरणात पैगंबर जयंती साजरी करण्याचे आवाहन धर्मगुरूंनी केले आहे.

नाशिकरोडला वाहतूक मार्गात बदल
नाशिकरोड परिसरातह‌ी मिरवणूक काढण्यात येणार असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. गोसावीवाडी, सुभाष रोडने आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळा, बिटको चौक, महात्मा गांधी रोड, सत्कार पॉईंट, देवळाली गाव पोलिस चौकी समोरून विहितगाव येथून पुन्हा देवळालीगाव गांधी पुतळा, साने गुरूजी रोडने गाडेकर मळ्यात या मिरवणुकीचा समारोप होणार आहे. त्यामुळे अनुराधा चौक ते आर्टिलरी सेंटर आणि पुढे रोकडोबावाडी पुलावरून विहितगाव बागूलनगर या मार्गाचा वाहनचालकांनी अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. देवळाली कॅम्पकडे नाशिकरोड जाणारी वाहतूक ही बागूल नगर, विहीतगाव रोकडोबावाडी पूल ते आर्टिलरी सेंटर रोडने दत्त मंदिरला जाऊन वाहने इतरत्र जाऊ शकणार आहेत. शनिवारी सकाळी सात ते दुपारी चार यावेळेत हे निर्बंध राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वे पॅसेंजरमध्ये आढळला मृतदेह

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील नगरसूल रेल्वे स्टेशनमध्ये उभ्या असलेल्या मनमाड-नांदेड पॅसेंजरमध्ये शुक्रवारी (दि. १) पहाटेच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

मनमाड रेल्वे जंक्शनहून मध्यरात्री नांदेडकडे निघालेली पॅसेंजर (गाडी क्रमांक ५७५९०) दक्षिण-मध्य रेल्वेच्या नगरसूल स्टेशनवर पहाटे अडीच वाजेच्या सुमारास आली. तिच्या एका बोगीत सफाई कामगाराला सुमारे ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत सफाई कामगाराने स्टेशन मास्तर हरीभाऊ महाले यांना तात्काळ माहिती दिली. महाले यांनी मनमाड रेल्वे पोलिसांना सदर घटनेची माहिती दिी. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून रेल्वे स्टेशनवर आणण्यात आला. रंगाने सावळा व सडपातळ बांधा, लांबट चेहरा असलेल्या या व्यक्तीच्या डोक्याचे केस व मिशी बारीक आहे. त्याच्या उजव्या हातात लाल दोरा व गळ्यात मण्याची माळ आहे. त्याने अंगात निळा, पांढरा चौकटीचा शर्ट व भुरकट रंगाची फुलपॅन्ट परिधान केलेली आहे. मनमाड रेल्वे पोलिस स्टेशनचे सहाय्यक उपनिरिक्षक पी. टी. सुरनार यांनी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह येवला येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. अधिक तपास सुरनार हे करीत आहे. संबंधित व्यक्तीविषयी कुणाला माहिती असल्यास त्यांनी ८००७३४८६०४ या मोबाइलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्चर क्लबचे आज गेट टुगेदर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लब सदस्यांसाठी सरत्या वर्षाचा डिसेंबर महिना मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहे. म्युझिक, डान्स, स्नॅक्स अशी धम्माल कल्चर क्लब सदस्यांना आज, रविवारी (दि. ३) आयोजित केलेल्या गेट टुगेदरमधून करण्यास मिळणार आहे. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था येथे दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या माध्यमातून मनोरंजनात्मक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. विविध पाककृतींबाबत मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, जादूचे शो अशा अनेक कार्यक्रमांचा यात समावेश असतो. यातील गेट टुगेदर सर्वच सदस्यांसाठी आकर्षणाचा भाग असतो. दर वर्षी वर्षअखेरीस या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

या कार्यक्रमाची सुरुवात रागिणी कामतीकर यांच्या म्युझिकल प्रोग्रामने होणार आहे. यात मराठी भावगीते, हिंदी चित्रपटांतील गाणी, तसेच सोबत स्नॅक्स अशी मेजवानी मिळणार आहे. त्यामुळे आजच कल्चर क्लबचे सदस्य व्हा आणि वेगवेळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्या. कार्यक्रमाच्या ठिकाणी २९९ रुपये भरून कल्चर क्लब सदस्य होता होणार आहे. नोंदणीसाठी ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क करता येणार असून, कल्चर क्लबचे ऑनलाइन सभासदत्व www.mtcultureclub.com या वेबसाइटवरही मिळविता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीट नंबर नवा, विषय मात्र जुनाच!

$
0
0

लखन सावंत, कॉलेज क्लब रिपोर्टर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. या परीक्षेत उत्तरपत्रिकेवर लावण्यात येणाऱ्या पांढऱ्या बारकोड स्टिकरवर विद्यार्थ्यांचा सीट नंबर, विषयाचे नाव व स्टिकर नंबर दिलेला असतो. मात्र, या बारकोड स्टिकरवर नवा सीट नंबर येताना जुनेच विषय येत असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत आहे.

तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून काही नवीन विषयांचा समावेश करून जुने विषय वगळण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात नवीन विषयाचा पेपर आणि त्यावर जुन्याच विषयाचे बारकोड स्टिकर लावण्यात येत आहे. विशेष म्हणजे जे विषय बदलले आहेत, त्या सर्वच विषयांच्या बाबतीत असा प्रकार घडत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे.

--

प्रश्नपत्रिका-वेळापत्रकात विसंगती

विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेत अजून एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागते आहे. परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाकडून आधीच विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आले होते. त्यात परीक्षेसाठीची वेळ २००८ कोर्ससाठी तीन तासांची, तर २०१२ कोर्ससाठी अडीच तासांची नमूद करण्यात आली आहे. परंतु, २०१२ कोर्सच्या काही प्रश्नपत्रिकांत परीक्षेची वेळ तीन तास दिलेली आहे. त्यामुळे पेपर नेमका अडीच तासांचा की तीन तासांचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. मात्र, कॉलेज प्रशासन वेळापत्रकातील वेळेनुसारच पेपर घेत असल्याने पेपरवरची वेळ नेमकी कुणासाठी हादेखील प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थी मात्र, प्रश्नपत्रिकेवर दिलेल्या वेळेनुसारच पेपर घ्यावा, असा आग्रह धरत आहेत. हा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून सतत घडत आहे. मात्र, विद्यापीठाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्याच-त्याच चुका दर वर्षी घडत असल्याने पुणे विद्यापीठाच्या अशा भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.

--

विद्यापीठाकडून याबाबतीत कॉलेजला सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याचीदेखील काळजी कॉलेजमार्फत घेतली जात आहे.

-डॉ. एम. व्ही. भटकर, प्राचार्य

--

या चुकांमुळे गोंधळ उडत असून, विद्यापीठाने याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. सीट नंबर बरोबर असला, तरी विषय मात्र जुनाच येत आहे. त्यामुळे पेपरव्यतिरिक्त दुसऱ्याच विषयाला तोंड द्यावे लागत आहे.

-यश खटोड, विद्यार्थी

--

वेळापत्रकातील वेळ आणि प्रश्नपत्रिकेतील वेळेत फरक असल्याने पेपर नेमका किती तासांचा असा प्रश्न पडत आहे. प्रश्नपत्रिकेतील वेळेनुसार पेपर घ्यायला हवा. पण, तसे होताना दिसत नाही.

-शिवकांत मिश्रा, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी विनंती, नंतर सात दिवसांची मुदत!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबईत मराठी पाट्यांसाठी टोकाची भूमिका घेणाऱ्या मनसेने नाशिकमध्ये मात्र दुकानदार व आस्थापनांना हात जोडून मराठी पाट्या लावण्याची विनंती केल्यामुळे व्यापाऱ्यांना हायसे वाटले. कॉलेजरोड परिसरातील दुकानदार व आस्थापनांना हे कार्यकर्ते हात जोडून मराठी पाट्या लावण्याची विनंती करीत असल्यामुळे मनसेची नवीन स्टाइल बघून अनेकांना आश्चर्य वाटले. पण, दुसऱ्याच क्षणी सात दिवसांत या पाट्या न लावल्यास परिणामाचा दमही भरला गेल्याने प्रसंगी खळ्ळखट्याक होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मराठी राज्यभाषेचा सन्मान करण्यासाठी सर्व दुकानांत मराठीत फलक लावले पाहिजेत, यासाठी मनसेने अनेक वेळा आंदोलन केले. त्यानंतर अनेकांनी आपल्या पाट्या मराठीत केल्या. पण, काही ठिकाणी या पाट्या मराठीत नसल्यामुळे मनसेने हात जोडून ही गांधीगिरी केली. पण, यावेळी त्यांनी या दुकानदारांना दमही भरला. सात दिवसांच्या आत संचालक व व्यावसायिकांनी आपली दुकाने, संस्थांचे फलक मराठीत लावले नाहीत, तर पुढे जे काही होईल त्याला संबंधित व्यवस्थापकच जबाबदार राहतील याची नोंद घेण्यात इशाराही दिला. मनसेने हे आंदोलन शहरात विविध भागात सुरू केले असून, त्यात मनसेचे पदाधिकारी अक्षय भोसले, आदित्य पगारे, कुणाल भंडारे, अतिश काळे, तेजस नेरकर, रुपेश दूरढोळे, अक्षय व्यवहारे यांनी सहभाग घेतला आहे.

--

कामगार उपायुक्तांचाही इशारा

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम १९४८ अंतर्गत महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नियम १९६१ च्या नियम २०-ए नुसार प्रत्येक आस्थापनेच्या नावाची पाटी मराठीत देवनागरी लिपीत असली पाहिजे आणि ही अक्षरे सुरुवातीलाच असली पाहिजेत. देवनागरी लिपीतल्या मराठी नावाखेरीज इतर भाषेतली आणि लिपीतली नावाची पाटी लावताना मराठीतील आणि देवनागरी लिपीतली नावाची पाटी कमी उठावदार असणार नाही याची दक्षता घ्यावी. अधिनियमात वरीलप्रमाणे तरतूद असतानादेखील दुकाने व आस्थापनेच्या नावाची पाटी मराठीत नसल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. दुकाने, आस्थापनेच्या नावाची पाटी मराठीत लावण्यासंदर्भात संबंधित मालकांनी त्वरित कार्यवाही करावी. जे आस्थापनाधारक या नियमाची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा कामगार उपायुक्त कार्यालने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुल्या जागांवर वाहनतळ

$
0
0

धार्मिक स्थळे काढल्यानंतर अतिक्रमणांचा त्रास; कारवाईची मागणी

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

नाशिक महापालिकेने मागील महिन्यांत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविले. तरी या धार्मिक स्थळांच्या मोकळ्या झालेल्या जागांवर आता हळूहळू अतिक्रमण होण्यास सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. आता महापालिकेने तातडीने या जागांचा योग्य वापर सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केल्यानंतर महापालिकेने शहरातील ठिकठिकाणी असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळे मागील महिन्यांतच हटविली आहेत. यामधील काही ठिकाणी तुरळक विरोध वगळता ही मोहीम शांततेत पार पडली होती. मात्र आता धार्मिक स्थळे हटविल्यानंतर त्या जागेवर करायचे काय, याचा निर्णय महापालिकेने तातडीने घेणे आवश्यक बनले आहे. कारण त्याठिकाणी चारचाकी वाहनांचे वाहनतळ झाल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.


बांधकाम साहित्य पडूनच

इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅकलगत असलेले धार्मिक स्थळ महापालिकेने हटविले. यावेळी स्थानिक नागरिकांनी याचा विरोध केला होता. नंतर याठिकाणी काळ्या फिती लावून प्रशासनाचा विरोध करणारे आंदोलनही केले. हे धार्मिक स्थळ हटविल्यानंतर येथील रस्ता मोठा करण्यात येईल, असे काही नागरिकांना वाटले होते. परंतु, या मोकळ्या जागेवर वाहनतळ बनले आहे. या मंदिरालगत काही व्यावसायिक असून, त्यांच्याकडे येणाऱ्या गाड्या या धार्मिक स्थळाच्या खुल्या जागेत उभ्या करण्यात येत आहेत. त्याचबरोबर याठिकाणी महापालिकेने कोणत्याही प्रकारची स्वच्छतासुद्धा केलेली नाही. आजही पाडलेले बांधकाम साहित्य तसेच पडून असून, काही दिवसांनी याठिकाणी वाहनतळ किंवा कचरा टाकण्याचे ठिकाण होणार तर नाही ना, अशी भीती नागरिकांना वाटू लागली आहे.


धार्मिक स्थळ हटविल्यानंतर येथील बोगदा व रस्ता मोठा करण्यात येणार असल्याचे आश्वासन नागरिकांना देण्यात आले होते. मात्र आता याठिकाणी वाहनतळ होऊ लागल्याने तातडीने बोगदा व रस्ता मोठा करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

- हर्षद गोखले, शिवसेना ग्राहक कक्ष

जॉगिंग ट्रॅकजवळील धार्मिक स्थळ हटविले ही दुःखद घटना असून, न्यायव्यवस्थेचा मान ठेवून आम्ही विरोध केला नाही. मात्र आता तातडीने या रस्त्यावरील वाहतुकीचा विचार करून येथील दोन्ही रस्ते रुंदीकरण केले पाहिजे. त्यासाठी मनपा प्रशासनाने लवकर कारवाई केली पाहिजे.

-चंद्रकांत खोडे, नगरसेवक

तातडीने उपाय योजण्याची गरज

वडाळा पाथर्डी रोडवरील धार्मिक स्थळ हटविण्यात आल्यानंतर याठिकाणची वाहतूक सुरळीत होईल, असे वाटले होते. मात्र याठिकाणी असलेले वृक्ष अडथळा ठरत आहे. त्यामुळे महापालिकेने हटविलेल्या धार्मिक स्थळांच्या जागांचा तातडीने योग्य तो वापर करणे गरजेचे आहे. नाहीतर पुन्हा अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवावी लागणार हे मात्र निश्चित असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने शहरातील सर्वच भागात ही मोहीम राबविली असली तरी आता या खुल्या झालेल्या जागांचा योग्य पद्धतीने वापर किंवा रस्ता रुंदीकरण करणे या गोष्टीही तातडीने करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्‍त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images