Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

संघर्ष समिती करणार उपोषण

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

नदीजोड प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित मांजरापाडा-२ चा प्रस्ताव त्वरित स्थगित करून नार-पार-अंबिका-औरंगा-तान-मान पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी प्रवाही वळण पद्धतीने वळविण्याच्या वांजुळ पाणी प्रकल्प राबविण्यात यावा या मागणीसाठी वाळुंज पाणी संघर्ष समिती १४ डिसेंबरपासून उपोषण करणार आहे.

बागलाण तालुक्यातील लखमापूर ग्रांमपंचायतीच्या राजगड सभागृहात वाळुंज पाणी संघर्ष समितीची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच १४ तारखेपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. विलास बच्छाव होते.

मांजरापाडा-२ चा प्रस्ताव स्थगित करून नार-पार-अंबिका-औरंगा-तान-मान पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी प्रवाही वळण पद्धतीने वळविण्याच्या वांजुळ पाणी प्रकल्प राबविण्यात यावा, या प्रकल्पाचे संपूर्ण पाणी चणकापूर धरणात आणून गिरणा नदीद्वारे गिरणा डॅममध्ये पोहचवावे. यामुळे गिरणा डावा व उजवा कालवा तसेच गिरणा नदी लाभ क्षेत्रातखालील शेती सिंचनास उपयोग होईल. या साठी एकत्रित लढा देण्याचे ठरविण्यात आले.

तृटीच्या गिरणा खोऱ्यासाठी मंजूर ६७० एम सेफ्टीची मांजरापाडा-१ योजना मागील काळात गोदावरी खोऱ्यात वळविण्यात आली, त्यावेळी यास ‘कसमादेना’ परिसरातील जनतेने आंदोलन करून विरोध केला असता तत्कालीन जलसंपदामंत्री यांनी मांजरापाडा-२ ही योजना मंजूर करून एकाच वेळी दोन्ही योजनांचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु मांजरापाडा-१ या योजनेचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. व मांजरापाडा २ ला तीन महिन्यांपूर्वी प्रशासकीय मान्यता राज्यपाल यांनी दिली आहे. परंतु मांजरापाडा २ बाबत जलतज्ज्ञांनी पाहणी करून लिफ्ट योजनेपेक्षा वळण योजनेद्वारे नैसर्गिक उताराने बोगदा करून पाणी वळविल्यास मोठा फायदा व खर्चात बचत होईल, असे मत नोंदविले आहे. या बैठकीत भाजपनेते अद्वय हिरे, अॅड शशी हिरे, अनिल निकम, डॉ. विलास बच्छाव, नीलेश कचवे यांनी मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघातात ३० टक्के पादचाऱ्यांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात मागील ११ महिन्यांत रस्ते अपघातांमध्ये १६० नागरिकांचा बळी गेला. यात ४७ म्हणजे तब्बल ३० टक्के पादचारी मृत्युमुखी पडले असून, रस्त्यांवर हकनाक जीव जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणे आवश्यक आहे.

शहर हद्दीत जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत जीवघेणे, गंभीर, तसेच किरकोळ स्वरूपाचे ५८८ अपघात झाले. १४७ जीवघेण्या अपघातांमध्ये १६० व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. गंभीर स्वरूपाच्या २४५ अपघातांमध्ये ३५४ व्यक्ती जायबंदी झाल्या. किरकोळ स्वरूपाच्या ७० अपघातांमध्ये ११३ व्यक्तींना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या. याशिवाय कोणतीही दुखापत न झालेल्या अपघातांची संख्या १२६ इतकी होती. मृत्युमुखी पडलेल्या १६० नागरिकांमध्ये ४७ पादचाऱ्यांचा समावेश आहे. जवळपास ३० टक्के व्यक्ती रस्त्याने चालताना अथवा रस्ता ओलांडताना भरधाव वाहनांचे बळी ठरले. यात ३९ पुरुष, तर आठ महिलांचा समावेश आहे. वाहनांची धडक बसून ८२ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. शहरातील बरेच रस्ते रुंद असून, रस्त्यांची परिस्थिती चांगली आहे. मात्र, पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करण्यात आलेला नाही. आडगाव परिसरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर तर रस्ता ओलांडणे जिकिरीचे ठरते. शहरातील रस्त्यांवर फूटपाथ शोधण्याची वेळ येते. दुसरीकडे वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगसारखे महत्त्वाचे नियम पाळत नाहीत. सर्वच पातळ्यांवर पादचाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढते आहे. महापालिकेसह शहर पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार करून पादचारी मार्ग, रस्ता ओलांडण्याचे सुलभ मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

बाइकचा वेग जीवघेणा

बाइकचा स्पीड, तसेच हेल्मेट वापराकडे होणारे दुर्लक्ष याचा थेट परिणाम अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर होतो आहे. या वर्षात मोटारसायकल, मोपेड अथवा स्कूटर्सचा अपघात होऊन ७२ जणांचा बळी गेला. हे प्रमाण एकूण संख्येच्या ४५ टक्के इतके आहे. मोटारसायकल अपघातात ५७ पुरुष चालकांचा, तर एका महिला चालकाचा मृत्यू झाला. मागे बसलेल्या एका पुरुषासह सहा महिलांना आपल्या प्राणास मुकावे लागले. दुसरीकडे स्कूटर्सच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मोपेड अपघातात चौघांचा प्राण गेला असून, त्यात एका पुरुषासह तीन महिलांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रण महोत्सवाप्रमाणेच आता सारंगखेडानगरी

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, नाशिक

सारंगखेडा आणि लगतचा परिसर अप्रतिम पर्यटन सर्किट ठरत असून यंदा कच्छ रण महोत्सवाच्या धर्तीवरच येथे सारंगखेडा नगरी थाटण्यात आली आहे. चेतक महोत्सवासाठी प्रचलित असलेल्या सारंगखेडामध्ये यावर्षीपासून बोटिंग, स्पा आणि हॉर्स रायडिंगसारख्या अॅडव्हेंचरल अॅक्टिव्हिटीही सुरू करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे दरवर्षी घोड्यांचा बाजार भरतो. या घोड्यांना देश-विदेशातून मोठी मागणी असते. येथील चेतक महोत्सव प्रचलित असून ३ डिसेंबरपासून या महोत्सवाला सुरुवात झाली. हा महोत्सव २ जानेवारी २०१८ पर्यंत सुरू राहणार असून देश-विदेशातील पर्यटकांचा प्रतिसाद वाढू लागला आहे.

गुजरातमधील कच्छ येथील रण महोत्सवाच्या धर्तीवर यंदा सारंगखेडा यात्रेसाठी येणाऱ्या पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि व्हाइट रन कम्पिंग अॅण्ड हॉस्प‌िटॅलिटी संस्थेतर्फे एसी आणि नॉन एसी अशा ६० तंबूंची सुविधा सारंगखेडा येथे उपलब्ध करून दिल्याची माहिती ‘एमटीडीसी’चे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुडावरे आणि व्हाईट रणच्या निरल पटेल यांनी दिली. पर्यटकांसाठी तापी नदी काठावर अॅडव्हेंचर स्पोर्टस, बोटिंग, हॉर्स रायडिंग, क्लब हाउस, सायकलिंगचे पर्यायही उपलब्ध आहे. यंदा जपान व तत्सम देशांमधील पर्यटकांनीही चेतक महोत्सवाचा आनंद लुटण्यास पसंती दिली असून चार ते पाच लाख पर्यटक यंदा भेट देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. ‘एमटीडीसी’ने नाशिक विभागाचे फेसबुक पेज बनविले असून त्याचा शुभारंभही मंगळवारी करण्यात आला.

स्थानिकांना रोजगारसंधी
नाशिक जिल्ह्यातील पर्यटक चोखंदळ असून ते देश-विदेशात पर्यटनाचा आनंद लुटतात. येथून केवळ दोन-तीनशे किलोमीटरवर असलेले सारंगखेडा नाशिककरांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास यावेळी विभागीय महसूल आयुक्त झगडे यांनी व्यक्त केला. सारंगखेडापासून जवळच प्रकाशा आणि तोरणमाळ या प्रचलित स्थळांव्यतिरिक्त अन्य स्थळे आहेत. ती स्थळे नागरिकांना भुरळ घालतील. त्यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छाननीअंती २८४ उमेदवार

$
0
0

आरोग्य विज्ञान विद्यापीठ निवडणुकीत नाशिक विभागातून ६ अर्ज


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत विविध जागांसाठी उमेदवारांच्या अर्जांची विद्यापीठ मुख्यालयात छाननी करण्यात आली. यात सर्व जागांसाठी एकूण २८४ उमेदवार पात्र झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना विद्यापीठ निवडणूक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले, विद्यापीठाच्या अधिसभेसाठी राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक या सहा महसूल विभागांमधून एकूण ५५ उमेदवार पात्र ठरले आहेत. विद्यापीठाच्या विद्यापरिषदेसाठी वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि तत्सम विद्याशाखेतील प्रत्येकी एक याप्रमाणे पाच प्राचार्यांची विद्याशाखानिहाय निवडणूक घेण्यात येईल. यामध्ये वैद्यकीय विद्याशाखा महिला तर दंत विद्याशाखा अनुसूचित जमाती प्रवर्गाकरीता सोडतीद्वारे आरक्षित आहे. यामध्ये वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व इतर विद्याशाखांचे एकूण १३ उमेदवार पात्र ठरले आहेत. यात वैद्यकीय विद्याशाखेसाठी एकही उमेदवार पात्र नसून, दंत १, आयुर्वेद व युनानी ८, होमिओपॅथी १ तर इतर विद्याशाखांसाठी ३ उमेदवार निवडणुकीसाठी पात्र आहेत.

विद्यापीठाच्या अभ्यासमंडळासाठी वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व इतर विद्याशाखांचे एकूण १८० उमेदवार पात्र ठरले आहेत. यामध्ये वैद्यकीय २९, दंत १८, आयुर्वेद ९५, होमिओपॅथी २९, नर्सिंग, ऑक्युपेशनल आणि फिजिओथेरपी विद्याशाखेसाठी ३ उमेदवार पात्र निवडणुकीसाठी पात्र आहेत. प्राध्यापक वगळता शिक्षक गटात निवडणुकीसाठी वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम विद्याशाखांचे एकूण ३६ उमेदवार पात्र आहेत. यात वैद्यकीय ५, दंत ९, आयुर्वेद व युनानी १२ , होमिओपॅथी १ तर तत्सम विद्याशाखेसाठी ९ उमेदवार निवडणुकीसाठी पात्र आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमधून गोवंशांची वाहतूक!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

मोकाट जनावरांना गुंगीचे औषध देऊन त्यांना कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या तीन संशयितांना देवळाली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले. अन्य दोन संशयित तरुण पळून जाण्यात यशस्वी झाले. विशेष म्हणजे चारही गोवंशांची वाहतूक तवेरा कारमधून केली जात असल्याचे आढळून आले आहे.

इस्माईल अब्बास गाडीवाला (२८, रा. कल्याण), इलियास कामील कुरेशी (३०, रा. कुर्ला) आणि कयास मुर्तझा डोन (२७, रा. कल्याण) अशी संशयितांची नावे आहेत. जनावरे कत्तलीसाठी नेली जात असताना संशयितांना आपण पकडले जाण्याची भीती वाटली. या भीतीपोटीच त्यांनी पोलिस व्हॅनला धडक देत पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. देवळालीच्या हाडोळा परिसरात ही घटना घडली. संशयितांकडून तवेरा कार, दोन इंजेक्शन व नायलॉन दोरी असे साहित्य पोलिसांना जप्त केले. संशयितांच्या ताब्यातून १ गाय, २ गोऱ्हे आणि १ कालवड यांची सुटका करण्यात आली आहे.

हाडोळा परिसरातील मस्जिद रोडवर बुधवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान तिघे संशयित हे मोकाट जनावरांना तवेरा कारमध्ये टाकून घेऊन जात होते. याच दरम्यान देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विठ्ठल पोटे, शिपाई सुनील वायकंडे, गणपत मुठाळ व यू. जे. जगदाळे आदी गस्त घालत होते. संशयित आरोपींनी पोलिसांना बघताच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या त्यांची तवेरा कारमधून (एमएच ०४ सीजे २६०९) बसून पळ काढला. मात्र, पुढे रस्ता न दिसल्याने गाडी पुन्हा मागे वळवली. त्यांचा सामना थेट समोरून येत असलेल्या पोलिसांशी झाला. त्यांनी पोलिसांच्या व्हॅनलाच धडक दिली. यात पोलिस शिपाई वायकंडे जखमी झाले आणि पोलिस वाहनाचेही नुकसान झाले. पोलिसांनी कार थांबविली आणि आतमध्ये बसलेल्या तिघा संशयितांना पकडले तर दोन तरुण पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी कारमध्ये कोंबलेली जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. जनवारांना गाडीत कोंबता यावे यासाठी कारमधील ड्रायव्हर आणि त्याच्या शेजारी सीट वगळता अन्य सर्व सीट काढून ठेवण्यात आलेले होते. दरम्यान, इंजक्शन दिल्याने बेशुद्ध झालेल्या गाय व अन्य गोवंशांना नाशिकमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केल्यानंतर शुद्धीवर आणण्यात यश आले आहे. तसेच पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, सहाय्यक आयुक्त सचिन गोरे यांनी पोलिस ठाण्याला भेट देत घटनेची माहिती घेतली.

संशयितांना १६ पर्यंत कोठडी
या प्रकरणी संशयितांविरुद्ध जनावरे प्रतिबंधक कायदा अधिनियम कलाम ११ यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना १६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक विठ्ठल पोटे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दृष्टिहिनांना सिग्नल ओलांडण्यासाठी सुविधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयटीआय सिग्नल परिसरात दृष्ट‌िबाधीत बांधवांना रस्ता ओलांडताना त्रास होतो. यावर नाशिक महापालिकेच्या वतीने या ठिकाणी अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा व स्पीड ब्रेकर टाकण्यात येणार असून, त्यामुळे अंध बांधवांना रस्ता ओलांडताना होणारा त्रास वाचणार आहे.

नाशिक फर्स्ट व नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या वतीने येथे सुधारणा करण्याबाबत नाशिक महापालिकेला सूचना करण्यात आल्या होत्या. त्यावर नाशिक महापालिका व पोलिस यांच्या वतीने संयुक्त कारवाई केली जाणार असून, या ठिकाणी वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वाहनधारकांना समजावे यासाठी बोर्ड लावण्यात येणार आहेत. अंध व्यक्ती जेव्हा येथून ये-जा करतील, त्या वेळी उपस्थित असलेले पोलिस सिग्नल ऑपरेट करतील, अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यात येणार आहेत. या परिसरात नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्र युनिट ही संस्था कार्यरत आहे. अंध व्यक्ती शैक्षणिक व इतर कार्यालयीन कामकाजासाठी संस्थेत येत असतात. तसेच संस्थेचे कार्यशाळेतील दृष्ट‌िबाध‌ित विद्यार्थी दररोज नाशिक शहरातून प्रशिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी बसने येतात.

स्पीडब्रेकर बसवणार

नाशिक-सातपूर रोडवर भरधाव वेगाने वाहनांची ये-जा सुरू असते. दृष्ट‌िहीन विद्यार्थ्यांना वाहनाने धडक दिल्याच्या घटना येथे घडल्या आहेत. या ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत अशी मागणी करण्यात आली आहे. वाहनधारकांना समजावे यासाठी महापालिका या ठिकाणी तातडीने बोर्ड लावणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रिमूर्ती चौकाचे रुपडे पालटणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक शहरातील मुख्य चौकाचे सुशोभीकरणाबरोबरच वाहतुकीचे नियोजन योग्य पद्धतीने होण्यासाठी विविध चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यातील सिडकोतील पहिला चौक हा त्रिमूर्ती चौक निवडण्यात आला असून, या चौकाच्या सुशोभीकरणासाठी बुधवारी (दि. १३) नगरसेवकांसह पोलिस निरीक्षक व विविध विभागांच्या अधिकार्‍यांनी या चौकाची पाहणी केली.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून शहरातील सर्वच चौक हे सुशोभीकरण करून त्याठिकाणी वाहतुकीच्या दृष्टीने नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोतील अनेक चौक अशाप्रकारे सुशोभित करण्यात येणार असून, सुरुवातीला त्रिमूर्ती चौकाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सुशोभीकरणाद्वारे चौकातील वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्रिमूर्ती चौक हा अत्यंत वर्दळीचा चौक असून, या चौकातील वाहतुकीचे नियोजन करण्याबरोबरच या चौकाचे सुशोभीकरण केले पाहिजे, असे मत व्यक्‍त केले जात आहे.

वाहतूक व्यवस्थेला फायदा

प्रभागाचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यासह अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी बुधवारी, या चौकाची पाहणी केली. या चौकात वाहतुकीच्या नियमांसाठी आवश्यक असणारे पांढरे पट्टे मारणे, पथदिपांची व्यवस्था सुधारित करणे यांसारख्या विविध गोष्टी करण्यात येणार असल्याचे बडगुजर यांनी सांगितले. या वेळी े उपअभियंता ए. जे. काझी, कनिष्ठ अभियंता नाना जगताप, महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता एस. एस. घोटेकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदापात्र पुन्हा शेवाळले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदावरी नदी पात्रात सध्या पाण्याचा प्रवाह सुरू नसल्यामुळे पाणी स्थिर झाले आहे. काँक्रिटीकरणाच्या भागात साचत असलेल्या पाण्यावर शेवाळाचे थर तयार होऊ लागले आहेत. पाणी स्थिर असल्यामुळे या शेवाळाची वाढण्याची गती प्रचंड वाढलेली आहे. अशा पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करणारे नागरिक या शेवाळलेल्या दगडांवरून पडण्याचे प्रकारही घडत आहेत.

गेल्या महिनाभरापूर्वी रामकुंड परिसरातही अशीच स्थिती निर्माण झाली होती. तेथे भाविक घसरून पडल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली त्यानंतर येथील दगडांवरील शेवाळ काढून टाकण्यात आले. मात्र आता पुन्हा गोदापात्रात गाडगे महाराज पुलाच्या खालच्या बाजूला अशा प्रकारचे शेवाळ तयार होऊ लागले आहे. हे शेवाळ काढणे गरजेचे आहे. नाहीतर येत्या काळात नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

मासे पकडणाऱ्यांची झुंबड

गोदावरीच्या पात्रात कचरा आणि घाण टाकण्याचे प्रमाण सध्या काही अंशी कमी झालेले आहे. मात्र, येथील पाणी स्थिर असल्यामुळे त्याची दुर्गंधी सुटलेली आहे, तसेच या पाण्यात शेवाळाचे प्रमाणही वाढले आहे. स्थिर पाण्यात मासे पकडण्याचे काम सोपे होत असल्यामुळे मासे पकडणाऱ्यांची झुंबड या भागात उडत असल्याचे चित्रही दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ख्रिसमस’साठी बनवा स्पेशल केक

$
0
0

मटा कल्चर क्लबकडून रविवारी आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब तर्फे ख्रिसमस निमित्त सिझलिंग ब्राउनी आणि ख्रिसमस स्पेशल फ्रुट केक कसा तयार करावयाचा यासंदर्भात वर्कशॉप घेतले जाणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच १७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता ऑलिव्ह गार्डन रेस्टोरंट, प्रमोद महाजन गार्डनच्या मागे, गंगापूर रोड या ठिकाणी हे वर्कशॉप होणार आहे.

ख्रिसमस हा सर्वांचाच आवडता सण. वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या केकचा आस्वाद घेण्यासाठी अनेक जण यावेळी उत्सुक असतात. मात्र ख्रिसमस स्पेशल केक नेमका बनवायचा कसा हे माहित नसते. या वर्कशॉपमधून याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे घरच्या घरीच ख्रिसमस स्पेशल केक बनवता येणार आहे. ख्रिसमस स्पेशल फ्रुट केक मध्ये ड्रायफ्रुट पासून ते मसाले कसे वापरावेत, हेदेखील शिकविले जाणार आहे. तसेच मोका हेजलनट सिझलिंग ब्राउनी, बेक न करीता सिझलिंग ब्राउनी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिझलिंग ब्राउनी विवेक सोहनी डेमो वर्कशॉप च्या माध्यमातून दाखवणार आहेत. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० तर इतरांसाठी ३०० रुपये नोंदणी फी आहे. तर लवकरात लवकर नोंदणी करा आणि वर्कशॉपमधून केक बनविणे शिका. अधिक माहितीसाठी (०२५३) ६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कल्चर क्लबचे ऑनलाइन सभासदत्व मिळवण्यासाठी www.mtcultureclub.com या वेबसाइटला व्हीजिट करा.

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub

टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub

टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजी विक्रेत्यांना स्वतंत्र जागा

$
0
0

पाथर्डी फाटा ते वडनेर गेटदरम्यान शनिवारपासून भाजीबाजार सुरू

म. टा. वृत्तसेवा, सिडको

पाथर्डी फाटा ते वडनेर गेट पर्यंतच्या रस्त्यावर वाढत्या अपघातांबाबत बुधवारी (दि. १३) नगरसेवक व प्रशासनाने एकत्रितरित्या भाजी विक्रेते व शेतकरी यांच्याशी चर्चा केली. यात भाजी विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येत्या शनिवारपासून या नवीन जागेत भाजीबाजार सुरू होणार असल्याचे सभापती तथा प्रभागाचे नगरसेवक सुदाम डेमसे यांनी सांगितले.

येथील अतिक्रमणाने या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांसंदर्भात 'मटा'मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तानंतर जागे झालेल्या प्रशासनाने तातडीने पहिल्या टप्प्यात भाजी विक्रेत्यांना जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या रस्त्याच्या दुभाजकाचा प्रश्न अजूनही प्रलंबित असून, त्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत परिसरातील नागरिकांकडून व्यक्‍त केले जात आहे.

पाथर्डी ते वडनेर या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून अपघातांची शृंखलाच सुरू झाली होती. या रस्त्यावरील वाहतुकीचा विचार करता याठिकाणी दुभाजक बसविणे गरजेचे आहे. तसेच याच रस्त्याच्या कडेला अनेक भाजी विक्रेते व काही शेतकरी भाजी विक्रीसाठी येऊन अतिक्रमण करीत होते. पूर्वी हा भाजीबाजार पाथर्डी फाट्यावर बसविला जात होता, आता तो एका कॉलनीतील रस्त्यावर स्थलांतरित झाला होता. त्यामुळे अतिक्रमण वाढण्याबरोबरच अपघातही वाढले होते. त्यावर चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि. १३) नगरसेवक सुदाम डेमसे व भगवान दोंदे यांनी भाजी विक्रेत्यांची बैठक महापालिका कार्यालयात आयोजित केली होती.

दीडशे विक्रेत्यांची नोंदणी

या वेळी विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत उपस्थित होत्या. पाथर्डी परिसरातील साईबाबा मंदिरालगत सुमारे दोन हजार वारांचा एक भूखंड असून, या भूखंडावरून उच्चदाबाची विद्युत वाहिनी गेलेली आहे. त्यामुळे याठिकाणी भाजीबाजाराच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच भूखंडातील सुमारे तीनशे वाराची जागा ही शेतकरी भाजी विक्रेत्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी हा भाजीबाजार उपलब्ध होणार असून, यातील सुमारे दीडशे विक्रेत्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यात एका घरातील एकाच व्यक्‍तीला जागा देण्यात आली आहे. भाजी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र ओटेही बांधण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. या निर्णयाने भाजी विक्रेत्यांनी स्वागत केले असले तरी या रस्त्यावर दुभाजकही बसविण्यात यावा ही मागणी करण्यात आली आहे. या बैठकीच्यावेळी अंकुश भोर, संदीप दोंदे, रवी गामणे, संदीप भोर, समाधान जाधव, भाऊसाहेब लोणे, बाळू बोराडे, पुष्पा लोखंडे, अंकुश शिंदे, तकदीर कडवे, सचिन भोर आदींनी चर्चेत भाग घेतला. शनिवारपासून हा भाजीबाजार सुरळीत करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

अनेक दिवसांपासून भाजी विक्रेत्यांचा हा प्रश्न प्रलंबित होता. याठिकाणी भाजी विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे अपघातांची संख्या वाढल्याने या प्रश्नासाठी वारंवार पाठपुरावा सुरू होता. आता शनिवारपासून हा प्रश्न निकाली निघणार असून, येत्या काही दिवसांतच दुभाजक टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येईल. भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण करू नये अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे.

- सुदाम डेमसे, सभापती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस अपंग शिक्षक रडारवर!

$
0
0

जिल्ह्यातील दहा जणांवर कारवाई; राज्यातही प्रमाणपत्रांची पडताळणी

नाशिक : बोगस अपंग प्रमाणपत्र दाखवून सरकारी योजनांचा फायदा लाटणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद प्रशासनाने रडारवर घेतले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील दहा बोगस अपंग शिक्षकांवर कारवाई करण्यात आली असून, निलंबनासह फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी दिल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील बोगस अपंग शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.

अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सरकारच्या योजनांचा लाभ, जसे; बदली प्रक्रियेच्या भानगडीतून मुक्तता, इन्कम टॅक्समध्ये सूट, शाळेत अर्धा तास उशिरा येण्याची व लवकर जाण्याची मुभा, शिवाय दर महिन्याला दोन हजार रुपयांचा अतिरिक्त अपंग भत्ता मिळत असल्याने राज्यभर बोगस अपंग शिक्षकांचे पेव फुटले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेकडून माहितीच्या अधिकाराखाली संशयित शिक्षकांच्या प्रमाणपत्रांचा पडताळा करणे सुरू असून, दहा शिक्षकांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे यातून समोर आले आहे. प्रमाणपत्रांची मुदत संपलेली असताना योजनांचा लाभ घेणे, अपंग प्रमाणपत्राच्या मूळ प्रती यांच्यात तफावत, फेरफार केल्याच्या गंभीर बाबींची शहानिशा करीत जिल्हा परिषदेचे सीईओ दीपककुमार मीना यांनी या शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असतानाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने या शिक्षकांना आता कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.

इतर जिल्ह्यांतून प्रमाणपत्र

अपंगांचे प्रमाणपत्र हे अधिवास असलेल्या जिल्ह्यातील शल्य चिकित्सकांचेच घेणे बंधनकारक असताना जिल्ह्यातील बोगस अपंग शिक्षकांनी इतर जिल्ह्यांचे बोगस प्रमाणपत्र मिळवल्याचे या तपासणीत समोर आले आहे. राज्यभर असे प्रमाणपत्र देणाऱ्या आरोग्य विभागातील काही कर्मचारी व अधिकारी यांनी एक-एका प्रमाणपत्रासाठी तीस ते चाळीस हजार रुपये लाटल्याचे सांगितले जात आहे.

यांच्यावर कारवाई

बागलाण तालुक्यातील शिक्षक राजाराम केवबा खैरनार, देवीदास गोविंदराव भामरे, दिलीप दिनकर वाघ, जयंत ओंकार महाले, नाशिक तालुक्यातील शिक्षिका वैशाली सुधाकर सोनवणे यांच्या विरोधात संबंधित गटशिक्षण अधिकाऱ्यांनी फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करावा व राहुल निंबा सोनवणे, लिला काळू रौंदळ, सतीश अहिरे, अनिल भामरे, दिलीप रोहिदास पवार या शिक्षकांवर फौजदारी गुन्ह्यांसह निलंबित करून विभागीय चौकशीसाठी परिशिष्ट १ ते ४ भरून पाठवावेत, असे आदेश दिले आहेत.

कार्यवाही झालेले शिक्षक हे प्रातिनिधिक स्वरुपात असून, शेकडो शिक्षकांनी बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र धारण करीत सरकारी फायदे लाटणे सुरू ठेवले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद येत्या काळात सर्व बोगस अपंग शिक्षकांचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

- संजय पगार, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद

अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेऊन कार्यरत शिक्षकांचे आणि त्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी सहकार्य करणाऱ्या व्यवस्थेचे धिंडवडे काढले पाहिजे. अशा लोकांमुळे खऱ्या अपंगांना त्यांच्या लाभांपासून दूर राहावे लागत आहे. त्यामुळे बोगस अपंगांवर कठोर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.

- दत्तू बोडके, उत्तर महाराष्ट्र प्रहार जनशक्ती संपर्कप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार यंत्रणा ढेपाळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड सक्तीचे केले जात असताना ते मिळविण्यासाठी किंवा त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांवर अक्षरश: दारोदार भटकण्याची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार सेंटर यंत्रणाही बुधवारी ढेपाळल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. आधार मिळविण्यासाठी आटाप‌िटा करीत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचणाऱ्या नागरिकांना निराधार झाल्यासारखे वाटू लागले आहे.

आधार कार्ड ही भारतीयत्वाची मुख्य ओळख बनू पाहात आहे. यापुढील काळात अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्र म्हणून आधारची प्रत्येक ठिकाणी गरज भासणार आहे. म्हणून ते अपडेट असावे असा आग्रह सरकारने आणि विविध सरकारी यंत्रणांनी धरला आहे. बहुतांश लोकांनी आधारकार्ड काढले असले, तरी ते अपडेट नाही. अशा आधार कार्डवर पूर्ण जन्म तारीख, मोबाइल क्रमांक, अचूक पत्ता नोंदविणे ही आता अत्यावश्यक बाब बनली आहे. केवळ अपडेटेड आधार कार्ड नसल्याने नागरिकांची कामे खोळंबत असून, आधारकार्डमध्ये दुरुस्ती करून घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडू लागली आहे. ठिकठिकाणची आधार सेंटर्स बंद असल्यामुळे नागरिकांना हे काम मार्गी लावण्यासाठी दारोदार भटकावे लागते आहे. त्या प्रत्येक ठिकाणी निराशाच पदरी पडत असल्याने नागरिक अखेर जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार सेंटर्सवर गर्दी करू लागले आहेत. येथे आधारचे काम मार्गी लागेल असा ठाम विश्वास नागरिकांना असला तरी या विश्वासालाही बुधवारी तडा गेला. सकाळपासूनच आधार सेंटरवरील यंत्रणा कोलमडून पडल्याने नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले.


सर्व्हरने टाकली मान

जिल्हाधिकारी कार्यालयातील सेंटरवर तीन क‌िटच्या माध्यमातून आधारशी संबंधित कामे केली जातात. गर्दीचे व्यवस्थापन करताना येथील सेंटरचालकांनी नागरिकांना तारखांनुसार अपॉइंटमेंट देऊन ठेवल्या आहेत. त्यामुळे आजची अपॉइंटमेंट असलेले नागरिक सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दाखल झाले. नेहमीप्रमाणे आधार सेंटरचालकही कामावर हजर झाले. परंतु, नेटवर्कच्या अडचणींमुळे किट सुरूच होत नव्हते. तर महा-ऑनलाइनचा सर्व्हर डाऊन झाल्याने ते किटही सुरूच होऊ शकले नाही. त्यामुळे दुपारी चारपर्यंत आधारबाबतचे एकही काम होऊ शकले नाही. तांत्रिक बिघाडामुळे आधार सेंटर बंद असल्याचा फलक लावण्यात आला. परंतु, त्यामुळे नागरिकांना गैरसोयीबरोबरच मनस्तापाचाही सामना करावा लागला.

प्रशासन हतबल

केंद्र व राज्य सरकारने सर्वच सरकारी योजनांच्या लाभाकरीता अद्यावत आधार कार्ड सक्तीचे केले आहे. जन्मापासून मृत्यूच्या दाखल्यापर्यंत आधार कार्ड सादर करणे अनिवार्य आहे. बँक अकाऊंट, इन्कम टॅक्स रिटर्न, पॅन क्रमांक, प्रॉव्हिडंट फंड, मोबाइल सीम कार्ड, पासपोर्ट, गॅस सबसिडी, पेन्शन, शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेशापासून शिष्यवृत्तीपर्यंत सर्वच ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ६१ लाख ७ हजार १८७ लोकांची आधार नोंदणी झाली आहे. परंतु, त्यांनाही आधारमध्ये दुरुस्ती करवून घेणे गरजेचे असल्याने दिवसेंदिवस गर्दी वाढतेच आहे. खासगी आधार सेंटर्स बंद झाल्यामुळे ‘आधार’ यंत्रणेवरील ताण वाढला असून तांत्रिक बिघाडांपुढे प्रशासनही हतबल झाले आहे.


गेल्या दीड महिन्यापासून मी आधारकार्ड काढण्यासाठी भटकतो आहे. सिडको कार्यालय, कार्वी सेंटर, महापालिकेचे सिडको कार्यालय अशा सर्व ठिकाणी निराशा झाल्याने मी जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार सेंटरवर आलो होतो. परंतु, येथेही काम न झाल्यामुळे माझे बँकेशी संबंधित काम रखडले आहे. माझे वय ७४ वर्ष असून मला ही फरफट असह्य होत आहे.

- दुरू वाधवा, गोविंदनगर

मी २०१३ मध्ये आधार कार्ड काढले. त्यावेळी पूर्ण जन्मतारीख नोंदवूनही कार्डवर केवळ जन्मवर्षच नोंद झाले. पूर्ण जन्मतारीख नसल्यामुळे माझा पगार होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. पूर्ण तारीख नोंदविणे हे केवळ पाच दहा मिनिटांचे काम आहे. परंतु, त्यासाठी प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

- प्रशांत वाघ

नेटवर्कमधील अडचणी आणि सर्व्हर डाऊन सारख्या तांत्रिक अडचणींमुळे आज दुपारी आधारशी संबंधित कामे होऊ शकली नाहीत. परंतु, सायंकाळपर्यंत ही कामे सुरळीत होतील. यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील.

- शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्त संवादातून करा गैरसमज दूर!

$
0
0

सध्याच्या व्हर्च्युअल काळातील अपडेटेड लाइफ जगताना नात्यांमध्ये कळत नकळत होणारे गैरसमज आणि या गैसमजातून येणारा तणाव अनेकदा मानसिक खच्चीकरणापर्यंत तरुणांना घेऊन जातो. नात्यांमधील बळावत चाललेल्या गैरसमजांतून येणारे नैराश्य अनेकदा जीवनरेषा संपविण्याच्या विचारापर्यंत तरुणांना घेऊन जाते. तसेच नात्यांचा विस्फोट होत नात्यांमधील भावभावना विसरत त्यातून होणारे क्रूर कृत्यांचाही शिकार गैरसमजातून तरुण होऊ शकतात. या ताणतणावावर उपाय म्हणून मुक्त संवाद हेच औषध असल्याचे परखड मत मेंटल वेलनेसअंतर्गत आयोजित ‘मटा डिबेट’मध्ये तरुणाईने व्यक्त केले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आर्टस अॅण्ड आरवायके सायन्स कॉलेजमध्ये पार पडलेल्या या उपक्रमास तरुणाईचा प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र टाइम्सने ‘मेंटल वेलनेस’ या संकल्पनेनुसार ‘मना सज्जना’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत डिबेट स्पर्धांतून तरुणांच्या भावविश्वातील मानसिक समस्यांवर मुक्त चर्चा घडवून आणण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

- चर्चेतील लक्षवेधी मुद्दे

पालकांचा आणि पाल्यांचा रोज मुक्त संवाद व्हावा.

मोबाइलमधील व्हर्च्युअल जगाशी जोडले जाताना वास्तविक आयुष्यातील घटनांचा विचार तरुणांनी करायला हवा.

सोशल मीडियावर मोकळेपणाने व्यक्त होतात, त्याचप्रमाणे मित्र, मैत्रिण व पालकांशी मोकळीकतेने संवाद साधायला हवा.

मानसिक दडपण आल्यास किंवा मानसिक ताण वाढत असल्यास स्वतःहून घरी प्रॉब्लेम शेअर करायला हवा.

सध्याच्या मानसिक ताणांतून घडणाऱ्या घटना बघता, डिप्रेशन काळात मोकळीकतेने मानसोपचारतज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

मानसोपचारतज्ञ ही मूळ संकल्पना तरुणांना समजावी, याकरीता उपक्रम राबविण्याची गरज आहे.

नात्यांमधील आत्मविश्वास तसेच समोरच्यावरील विश्वास ठोस असल्यास गैरसमज बळावत नाहीत.

तरुण समोरच्यांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात म्हणून गैरसमज बळावतो.

नात्यांच्या गैरसमजातून बाहेर येण्यासाठी मुक्त संवाद साधत उपाय योजने हाच एक मार्ग आहे.

गैरसमज झाल्यास त्याचा राग करण्यापेक्षा त्याचे मूळ कारण शोधायला हवे. येथेच अर्धा तणाव हलका होतो.


वैचारिक मतभेद हा गैरसमजांचा उगम असतो. प्रत्येक नात्यात वैचारिक मतभेद असतात. मात्र, त्यांचा लागलीच गैर अर्थ काढल्यास मानसिक ताण येतो. गैरसमजातून चुकीचे पाऊल उचलणे गैर आहे. मानसिक ताण आल्यास त्याला योग्य वैचारिक पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न केल्यास नैराश्य हमखास कमी होते.

- आशिष कुलकर्णी, एम ए राज्यशास्त्र

सध्याच्या अपडेटेड लाइफमध्ये आई-वडिल हे नातेदेखील दुरावत चालले आहे. पाल्यांसमवेत मुक्त संवादास पालकांना पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे पाल्यांना त्यांच्या मनातील भावना व्यक्त करता येत नाही. पालकांनी आपल्या पाल्याच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे. वेळात वेळ काढून मुक्त संवाद साधायला हवा.

- अपूर्व इंगळे, एसवाय बीए, राज्यशास्त्र

समोरच्या व्यक्तिला गृहित धरल्याने गैरसमज अधिक बळावले जातात. जेव्हा नात्यांमध्ये गैरसमज होतात तेव्हा त्यावर शांतपणे चर्चा करायला हवी. प्रत्येकाची मानसिकता फॅमिलीतील घटकांशी जोडली असते. त्यामुळे नात्यामधील तणाव चर्चेतून निवळता येतो. मात्र, तरी देखील नात्यांमधील फूट कमी होत नसेल तर मानसोपचारतज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

- मृण्मयी मुळे, टीवाय बीए मानसशास्त्र

चौकोनी कुटुंब व्यवस्थेत प्रत्येकाची स्वतंत्र मते असतात. यावेळी कोणत्यातरी कारणांवरुन मतभेद होत गैरसमज बळावले जाऊ शकतात. तसेच पालकांच्या पाल्यांकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर त्यातूनही नैराश्य वाढते. मात्र, अशा वेळी डिप्रेशनचे शिकार होण्यापेक्षा संगनमताने चर्चा करणे किंवा मानसोपचारांची मदत घेणे गरजेचे आहे.

- प्रतीक्षा एकबोटे, टीवाय बीए मानसशास्त्र

तरुणांच्या इच्छेविरुध्द एखादी घटना घडल्यास ते लागलीच नैराश्यात जातात. भविष्यातील निर्णय, नोकरी, शिक्षण तसेच आजूबाजूची परिस्थिती यातूनही नैराश्य वाढीस लागते. मात्र, अशा वेळी सर्व गोष्टींचा शांततेने विचार करत एकाग्र होऊन निर्णय घेणे गरजेचे असते.

- अमोल पाटील, लायब्ररी सायन्स

रिलेशनशिपमध्ये किंवा कोणत्याही नात्यात ‘इगो’ हा गैरसमजाला कारण ठरतो. प्रत्येकाला आपणच श्रेष्ठ आहोत असा भाव समोरच्याच्या मनावर बिंबवायचा असतो. यातून कलहास सुरुवात होते आणि अनेकदा गैरसमज बळावले जातात. याच गैरसमजातून पुढे हळूहळू नैराश्य ओढावले जाते. म्हणून कोणत्याही नात्यात सेल्फ इगो असू नये.

- क्षमा देशपांडे, एफवाय बीए

प्रत्येकाचा स्वभाव हा समोच्याला मिळता जुळता असायला हवा. एकमेकांसोबत जुळवून घेण्याची वृत्ती आत्मसात असेल तर फारसे गैरसमज होत नाही. जर नात्यांमध्ये गैरसमज झाले आणि त्यातून मानसिक ताण वाढत असेल तर एकमेकांशी खुली चर्चा करुन तो तेढ सोडवायला हवा.

- महिमा ठोंबरे, एफवाय बीए

नात्यांमध्ये वैचारिक पातळी एक नसेल तर हमखास गैरसमज वाढतात. यासाठी कोणत्याही नात्यात वैचारिक पातळी समान असावी. मित्र, मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये अनेकदा वैचारिक कलह होतात. यावेळी योग्य सकारात्मक भूमिका घेत शांततेने कलह सोडविणे फायदेशीर असते. नात्यांच्या गैरसमजातून टोकाची भूमिका घेणे गैर आहे. संवादरुपी औषध या कलहांवर ठोस उपाय आहे.

- आर्या शिंगणे.

बहुतांश कुटुंबातील आईवडिल दोघेही नोकरी करत असल्याने पाल्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. यामुळे पालक व पाल्य यांतील संवाद कमी कमी होत आहे. तसेच मित्रमैत्रिणींच्या ग्रुप्समध्येदेखील सेल्फ इगो बळावत असल्याने तिथेही कलह निर्माण होतो. मात्र, अशा गैरसमजुतींवर योग्य संवाद हाच उपाय आहे.

- प्राजक्ता गोडशे, एफवाय बीए

नातं म्हटल की त्यात राग, प्रेम, भांडण या गोष्टी आपसूक येतातच. आईवडिलदेखील आपल्या पाल्यांचे काही चुकत असेल तर रागावतातच. पण, हा राग क्षणिक असतो हे तरुणांनी विचारात घ्यायला हवं. पाल्यांनी पालकांनी व्यक्त केलेला राग सकारात्मकतेने करायला हवा, जेणेकरुन या नात्यांतील ताण वाढणार नाही.

- ऋतुजा अहिरे, अकरावी आर्टस

प्रत्येक नात्यात गर्व, अहंकार यांचा संबंध येतोच. म्हणून नात्यांमध्ये सहकार्याची, आपुलकीची भावना असणे गरजेचे असते. नात्यांतील काही गैरसमजांतून वाद निर्माण झालेच तर दोघांनीही स्वतःहून एकमेकांशी संवाद साधला पाहिजे.

- राधिका भार्गवे, बारावी कला

नातं हे कोणतही असले तरी त्यात अनेकदा गैरसमज हे होतातच. नात्यांतील माणसांकडून अपेक्षा वाढल्या आणि त्यांची पूर्तता न झाल्यास त्यातून गैरसमज निर्माण होतात. अपुरा संवाद आणि समजून न घेण्याची वृत्ती हीच मानसिक ताणासाठी कारणीभूत ठरते.

- अश्विनी भालेराव, बारावी कला

(संकलन – सौरभ बेंडाळे, यश कुलकर्णी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाख शेतकऱ्यांना ४७४ कोटींची कर्जमाफी

$
0
0

जळगाव जिल्हा बँक निधी वाटपात राज्यात प्रथम

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार शेतकऱ्यांना ४७४ कोटी रुपये रक्कमेच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी दिली आहे.

या योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यात २ लाख ४३ हजार ५७७ शेतकरी कुटुंबांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरलेले आहेत. या ऑनलाइन अर्ज भरण्याच्या बाबतीतही जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री महोदयांनी याचा स्पष्ट उल्लेख करून जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांचे त्यावेळी कौतुकही केले होते.

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी व दीड लाख रुपयांवरील शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजना लागू केली. सरकारच्या निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांच्या जळगाव जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांनी राज्य सरकारने पुरविलेल्या नमुन्याप्रमाणे ऑनलाइन माहिती भरून दिली होती. त्यानुसार जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जळगाव जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार शेतकऱ्यांना ४७४ कोटी रुपयांची कर्जमाफी आतापर्यंत मिळालेली आहे. याबाबत आजपर्यंत सुमारे ३ हजार शेतकऱ्यांना, या योजनेचा लाभ मिळाला असल्याचे एसएमएस त्यांच्या मोबाईलवर पाठवून कळविण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांच्या अंदाजे १ लाख लाभार्थ्यांना १०० कोटी रुपयांचा लाभ देण्यात येणार असल्याचेही जाधवर यांनी म्हटले आहे.

३१ मार्च २०१८ पर्यंत वाढीव मुदत

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेस प्राप्त झालेल्या निधीचे १०० टक्के वाटप करणारी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक ही पहिली बँक ठरली आहे. जिल्हा बँकेस प्राप्त असलेला निधी जळगाव जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व दीड लाख रुपयांवरील लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी एकवेळ समझोता योजनेंतर्गत दीड लाख रुपयांवरील रक्कम संबंधित जिल्हा बँकेच्या शाखेकडे ३१ मार्च, २०१८ च्या आत जमा करण्याबाबतही कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हा व इतर बँकेकडून एकाच शेतकरी कुटुंबाने दीड लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेतली असेल, अशा शेतकरी कुटुंबांनी राज्य सरकारने दिलेल्या वाढीव मुदतीत म्हणजेच दिनांक ३१ मार्च २०१८ पर्यंत संबंधित बँकेत रकमेचा भरणा करून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे.


धुळे जिल्ह्यात २० हजार शेतकऱ्यांना लाभ

धुळे ः राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील धुळे जिल्ह्यातील पात्र २०,५५२ शेतकऱ्यांना १०० कोटी ६७ लक्ष रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांनी दिली आहे. २०१२ पासून सलग चार वर्षांत धुळे जिल्ह्यात अपुरा पाऊस झाल्यामुळे खरीप, रब्बी हंगामात बहुसंख्य गावातील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी होती. जिल्ह्यातील काही भागात अवेळी गारपीट, पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे बरेच शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. परिणामी हे शेतकरी थकबाकीदार राहिल्यामुळे असे शेतकरी बँकेकडून नव्याने पीक कर्ज घेण्यास पात्र होवू शकले नाहीत. त्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत शासन निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांच्या धुळे जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांनी ऑनलाइन माहिती भरून दिली. त्यानुसार धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील १३,३६१ शेतकऱ्यांना ५० कोटी ४५ लक्ष ८४ हजार ९२३ रुपयांची कर्जमाफी मिळाली असून, राष्ट्रीयीकृत बँकांच्या ७,१९१ शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ५० कोटी २२ लक्ष रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. नाशिक विभागात धुळे जिल्हा बँक ही प्राप्त झालेल्या निधीचे १०० टक्के वाटप करणारी पहिली जिल्हा बँक ठरली आहे. प्राप्त निधी धुळे जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखाती जमा करण्यात आलेली आहे. अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, सचिव, बँकेचे तपासणीस, व्यवस्थापक प्रदीप गिलाणकर आदींचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

$
0
0

शिंदखेडा नगरपंचायतीसाठी ७२ टक्के मतदान

धुळे : जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायतीसाठी बुधवारी (दि. १३) मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यासाठी शहरातील २७ मतदान केंद्रांवर मतदान झाले. यात नगराध्यक्षपदासाठी राजकीय पक्षांसह अपक्ष असे एकूण ६९ उमेदवार रिंगणात आहेत. तर नगरपंचायतीच्या १७ प्रभागांत बुधवारी, सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मतदान प्रक्रियेला शांततेत सुरुवात झाली. दुपारी बारा वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले होते. तर मतदानाच्या शेवटच्या घटकांपर्यंत अर्थात सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत जवळपास ७२ टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या निवडणुकीत मॉडेल मतदान केंद्र म्हणून १७ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक १० हे मॉडेल मतदान केंद्र म्हणून प्रशासनाने विकसित केले. या मतदान केंद्रातील वातावरण आल्हाददायक व प्रसन्न ठेवण्यासाठी प्रथम येणाऱ्या दहा मतदारांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मतदारांना रोप भेट देण्यात आले, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी अजित निकम यांनी दिली. शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंखे, माजीमंत्री हेमंत देशमुख, काँग्रेसचे शामकांत सनेर आणि समाजवादीचे विजयसिंग राजपूत या दिग्गजांनी आपली राजकीय शक्ती वापरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मर्यादित गरजा आदिवासींचे बलस्थान

$
0
0


नाशिक ः अत्यंत मर्यादित गरजा आणि कुठल्याही सोयी सुविधांचा सोस नसल्याने जिल्ह्यातील एकच तालुका शेतकरी आत्महत्येच्या घटनांपासून दूर राहिला आहे, तो म्हणजे पेठ. या आदिवासीबहुल तालुक्यात गेल्या सात वर्षांत एकाही शेतकऱ्याने स्वत:ला संपविलेले नाही. अन्य आदिवासीबहुल तालुक्यांमध्येही शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे.

नाशिक जिल्ह्यात १५ तालुके आहेत. त्यापैकी पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, दिंडोरी, बागलाण आणि नाशिक ही आदिवासी बहुल तालुके म्हणून ओळखली जातात. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. परंतु, पेठ या एकमेव तालुक्यात गेल्या सात वर्षांत एकाही शेतकरी आत्महत्येची घटना घडलेली नाही. त्यामुळे सरकार आणि जिल्हा प्रशासनालाही येथे आर्थिक मदत देण्याची आवश्यकता भासलेली नाही. आदिवासी भागातील रहिवाशांच्या गरजा खूपच मर्यादित आहेत. कोणत्याही विपरित परिस्थ‌ितीमध्ये जीवन जगण्याची कला या रहिवाशांना अवगत आहे. याशिवाय अत्यंत कमी संसाधनांमध्ये जीवन जगण्याची सवय येथील शेतकऱ्यांना असून, त्यापैकी बहुतांश जण पावसाळ्यानंतर मोल-मजुरीसाठी स्थलांत‌रित होतात. पारंपरिक पद्धतीनेच जमीन कसण्याची पूर्वापार परंपरा असल्याने येथील शेतकरी बँका, पतसंस्थांकडून शेती किंवा अन्य कारणांसाठी फारसे कर्ज घेत नाहीत. त्यामुळे कर्जबाजारीपणा हे आत्महत्यांचे सहसा कारण ठरत नाही.

सुरगाणा तालुक्यातही यापूर्वी शेतकरी आत्महत्येची घटना घडली नव्हती. परंतु, यंदा मे महिन्यात तालुक्यातील हनुमंत पाडा येथे भगवान नानू गावित (वय ४५) या शेतकऱ्याने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. गावित यांच्या नावावर शेती असून त्यांच्यासह कुटुंबातील काही सदस्यांच्या नावावर पंजाब नॅशनल बँक, एनडीसीसी बँक, विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज असल्याची माहिती पुढे आली. परंतु, गेल्या अनेक वर्षांतील ही शेतकरी आत्महत्येची एकमेव घटना ठरली आहे. जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये गेल्या सात वर्षांत शेतकरी आत्महत्येच्या ५८ घडना घडल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक १३ आत्महत्या बागलाण तालुक्यामध्ये झाल्या आहेत.

आदिवासी तालुके शेतकरी आत्महत्या

बागलाण १३

नाशिक १२

दिंडोरी १०

त्र्यंबकेश्वर ९

कळवण ७

इगतपुरी ६

सुरगाणा १

पेठ ०

एकूण ५८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदुरबार नगरपालिकेसाठी ७०.९३ टक्के मतदान

$
0
0

१८ डिसेंबरला मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व नवापूर नगरपालिकेसाठी बुधवारी (दि. १३) मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये नंदुरबारला नगराध्यक्षपदासाठी सहा तर नवापूरला दहा उमेदवार रिंगणात आहेत. तसेच नगरसेवक पदासाठी दोन्ही नगरपालिकेतून २०६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.

नंदुरबार नगरपालिकेसाठी बुधवारी (दि. १३) ७०.९३ टक्के तर नवापूर नगरपालिकेसाठी ६६.३४ टक्के मतदान झाले. राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार मतमोजणी दि. १८ डिसेंबर रोजी होणार आहे. नंदुरबार पालिकेच्या निवडणुकीसाठी ५७ इमारतीत १२६ बूथ तयार करण्यात आले होते. शहरातील १९ प्रभागात ३९ जागांसाठी १११ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, १ लाख २०० मतदारांपैकी ७१,११८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ही निवडणूक प्रक्रिया सहाय्यक निवडणूक अधिकारी गोविंद शिंदे, मुख्याधिकारी गणेश गिरी आदींच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. नंदुरबार आणि नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, एमआयएम यासह अपक्षांमध्ये लढत होत आहे. सर्वात जास्त चुरस भाजपाचे आमदार डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ हिना गावित, आणि काँग्रेसचे विधानपरिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यात आहे. मतदार आता कोणाच्या हाती सत्ता देतील यासाठी चार दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटो स्टुडिओला चांदोरीमध्ये आग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील चांदोरी येथील नाठे कॉम्लेक्समध्ये असलेल्या शरद जाधव यांच्या सनी फोटो स्टुडिओला बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. या आगीत फोटो स्टुडिओतील किमती साहित्य जळून खाक झाले. यात सुमारे १४ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

चांदोरीतील मुख्य रस्त्यावरील सनी फोटो स्टुडिओमधून पहाटे धूर येतांना वरच्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना दिसला. त्यांनी याबाबत स्टुडिओमालक शरद जाधव यांना फोन करून घटनेची माहिती दिली. जाधव यांनी दुकानाच धाव घेतली. दुकानातून मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. त्यांनी दुकानाचे शटर उघडून बघितले असता इन्व्हर्टरजवळ स्पार्किंग होतांना दिसले. आतमध्ये पाऊल ठेवताच आगीचा भडका उडाला आणि काही क्षणातच स्टुडिओतील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. आगीत व्हिडिओ शुटिंगचे दोन कॅमेरे, तीन फोटो कॅमेरे, झेरॉक्स मशिन, दोन कॉम्प्युटर, दोन प्रिंटर, लॅमिनेशन मशिन, फर्निचर व महत्त्वाची कागदपत्रे जळाली. नाठे इमारतीमध्ये इंडियन बँक, पतसंस्था तसेच कापड दुकान हॉटेल आहेत. ग्रामस्थांनी पुढाकार घेत वेळीच आग विझवल्याने संभाव्य अनर्थ टळला. चांदोरीचे तलाठी पंडित यांनी पंचनामा केला. या प्रकरणी सायखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्युटी पार्लरमधून ५२ हजारांची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ब्युटी पार्लरमधून महिलेच्या पर्समधील ५२ हजाराची रोकड चोरट्यांनी लांबविली. भाभानगर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी वंदना नितीन गायकवाड (रा. भाभानगर) यांनी फ‌िर्याद दिली आहे. आकाशगंगा अपार्टमेंटमध्ये त्यांचे मनिनी नावाचे ब्युटी पार्लर आहे. त्या कामात व्यस्त असताना बुधवारी (दि. १३) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अज्ञात महिलेने काउंटरवर ठेवलेल्या त्यांच्या पर्समधील ५२ हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

दोन लाखांची घरफोडी
सिडकोतील अश्विननगर भागात घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे दोन लाखाचा ऐवज चोरून नेला. अंबड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
मलेश मरीअप्पा गाळी (रा. जगदंबा निवास, अश्विननगर) यांनी फिर्याद दिली आहे. गाळी कुटुंबीय २८ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर यादरम्यान बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटातील रोकडसह सोने-चांदीचे दागिने असा सुमारे एक लाख ८३ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायती मालामाल

$
0
0


तुषार देसले, मालेगाव

नुकत्याच पार पडलेल्या महालोकअदालतीत तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींच्या तिजोरीत लाखो रुपयांचा भरणा झाला आहे. याऊलट महापालिका क्षेत्रातील वसुलीला मात्र पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याने ‌तिजोरीत खडखडाट आहे.

तालुक्यातील १२४ ग्रामपंचायत व महापालिका क्षेत्रातील घरपट्टी, पाणीपट्टी तसेच व्यापारी गाळेमालकांनी वेळेत थकबाकी न भरल्याने पालिका व ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. अखेर पालिका व पंचायत समिती प्रशासनाकडून लोकअदालतीद्वारे ही थकबाकी वसूल करण्याचा पर्याय निवडण्यात आला. येथे शनिवारी पार पडलेल्या लोकअदालतीत तालुक्यातील १२४ ग्रा.प.चीकडे विविध थकीत करापोटी १ कोटी ९३ लाख ८ हजार ६८७ रुपयांची वसुली झाली. तर महापालिकेची एकूण ७३ लाख ९९ हजार ६३ रुपयांची वसुली झाली. वसुलीची आकडेवारी पाहता लोकअदालतीने ग्रामपंचायती मालामाल झाल्या असल्या तरी पालिकेच्या तिजोरीत खळखळाट आहे.

तालुक्यातील एकूण १२४ ग्रा.पं.च्या विविध करांची थकबाकी असलेल्या ५७ हजार थकबाकीधारकांना नोट‌िसा बजावण्यात आल्या होत्या. महालोकअदालतीत एकूण ५७ हजार प्रकरणे ठेवण्यात आली होती. यातील तब्बल ३५ हजार प्रकरणे निकाली काढण्यात यश आले. त्यापोटी ग्रापची एक कोटी ९३ लाख ८ हजार ६८७ रुपयांची वसुली झाली. यात ८२ लाख ४४ हजार ७३२ रुपयांची पाणीपट्टी तर १ कोटी १० लाख ६३ हजार ९५५ रुपयांची घरपट्टी वसूल झाली आहे. तालुक्यातील ग्रा. पं. ची वसुलीची आकडेवारी पाहता तुलनेने महापालिकेची वसुली जेमतेम झाली असल्याचे म्हणता येईल. पालिकेकडून एकूण १ हजार ७६१ प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यात आली होती. यातील २९० प्रकरणे निकाली निघाली असून, केवळ ७३ लाख ९९ हजार ६३ रु ची वसुली झाली आहे. त्यातही प्रभागनिहाय विचार करता प्रभाग १ मधील सर्वाधिक १३३ प्रकरणे निकाली निघाली असून, ३८ लाख २९ हजार १७५ रु इतकी वसुली झाली आहे. त्यामुळे प्रभाग १ मधेच लोकअदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. वसूल झालेल्या रकमेपैकी १३ लाख ५० हजार रुपयांचे धनादेश आहेत.

पालिकेची थकबाकी कोटीच्या घरात

येथील महापालिकेची महसुली उत्पन्न अत्यल्प असल्याने आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. महापालिकेचे १ लाख ११ हजार मालमत्ताधारक असून सुमारे ५६ हजार नळधारक आहेत. मात्र पालिकेची चालू वर्षात १४ कोटीहून अधिक वसुली होणे बाकी आहे. एकूण ३७ कोटी २५ लाख रुपये इतकी वसुली होणे बाकी आहे. यावर्षात एक एप्रिलपासून आजपर्यंत केवळ तीन कोटी ४२ लाख रुपये वसुली झाली आहे. त्यामुळे लोकअदालतीद्वारे पालिकेची वसुली वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र थकबाकीदारांनी लोक अदालतीस फार प्रतिसाद न दिल्याचेच स्पष्ट झाले आहे.

झोडगे वसुलीत आघाडीवर

शनिवारी झालेल्या लोकअदालातीत ग्रामीण भागातील थकबाकीदारांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे ग्रामपंचायतींची मोठी थकबाकी वसूल झाली. तालुक्यातील १२४ ग्रा.पं.पैकी झोडगेत घरपट्टी व पाणीपट्टी सर्वाधिक वसूल झाली आहे. घरपट्टी सुमारे ८ लाख तर पाणी पट्टी सुमारे १९ लाख रुपये वसूल झाली आहे. त्या खालोखाल दाभाडी, सौंदाणे, रावळगाव, कळवाडी येथे वसुली झाली आहे.



ग्राप महापालिका

प्रकरणे - ५७ हजार १ हजार ७६१

निकाली - ३५ हजार २९०

वसूल रक्कम - १ कोटी ९३ लाख ७३ लाख ९९ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images