Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दुतर्फा पार्किंगने रस्ता ब्लॉक

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

उंटवाडी परिसरातील नावाजलेल्या मॉलसमोरील रस्त्याच्या दुतर्फा सर्रास वाहने उभी केली जात असल्याने हा रस्ताच ब्लॉक होत असल्याची स्थिती उद्भवत आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीत भर पडत असून, रविवारीही असेच चित्र दिसून आले.

येथील मॉलसमाेरचा रस्ता चक्क पार्किंगरोड बनला असून, त्यातील बहुतांश वाहने ही मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची असल्याने मॉलमध्ये येणाऱ्यांच्या वाहनांची जबाबदारी नेमकी कुणाची, असा सवालही उपस्थित होत आहे. मॉलतर्फे पार्किंगसाठी दुचाकी व चारचाकी चालकांकडून जादा शुल्क घेतले जात असल्यानेच रस्त्यावर पार्किंग करण्याची फॅशन सुरू झाल्याचा आरोप अन्य वाहनचालकांकडून केला जात आहे. याकडे महापालिका व वाहतूक पोलिसदेखील दुर्लक्ष करीत असल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोपही अनेकांनी केला आहे.

काही काळापूर्वी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यावर मॉलच्या पार्किंगमध्येच वाहने पार्क केली जात होती. परंतु, मॉल चालकाने दुचाकी व चारचाकी वाहने पार्क करण्यासाठी शुल्क वाढविल्याने पुन्हा ग्राहक रस्त्यावरच वाहने पार्क करत असल्याने त्याचा त्रास अन्य वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे सुटीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणावर वाहने उभी करण्यात येत असल्याने वारंवार खोळंबा होईनही कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

--

उंटवाडी भागातील मॉलसमोर नेहमीच रस्त्यावर वाहने पार्क केली जातात. पोलिसांकडून केवळ नावालाच कारवाई होत असल्याने इतरांना त्रास सहन करावा लागतो. याप्रश्नी ठोस कारवाई व्हावी.

-सुनीता दरेकर, त्रस्त वाहनचालक

--

समस्या भेडसावतेय?

तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्या, तुम्हाला ‘दिसणाऱ्या’ बातम्या, सार्वजनिक हिताची छायाचित्रे तुम्ही मांडू शकता ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या व्यासपीठावर… MT Citizen Reporter या अॅपवर. हे अॅप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. तुमच्या माहितीची शहानिशा करून त्यास ‘मटा’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कवितेच्या गाण्याचा उलगडणार प्रवास

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी येत्या शनिवारी (दि. ३० डिसेंबर) ‘कवितेचे गाणे होताना’ या खास मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सायंकाळी ५.३० वाजता ही मैफल रंगणार आहे.

संधिप्रकाशात, सांग सख्या रे, दमलेल्या बाबाची कहाणी यांसारखे पस्तीसपेक्षा अधिक अल्बम्स, नक्षत्रांचे देणे, मधली सुट्टी, ‘सारेगमप’सारख्या मालिका, तीसपेक्षा जास्त चित्रपटांचे संगीत, मैत्र जिवांचे यासारखे उत्कृष्ट कार्यक्रम सादर करणाऱ्या डॉ. सलिल कुलकर्णी यांची ‘कवितेचे गाणे होताना’ ही मैफल साऱ्यांनीच आवर्जून अनुभवावी अशीच आहे. सलिलजींची गाणी अन् मनसोक्त गप्पा, त्यासोबतच ‘चिंटू’ चित्रपटातील गाण्यांचा गायक शुभंकर सलील कुलकर्णी याला प्रथमच प्रत्यक्ष ऐकण्याचा योगदेखील या अनोख्या मैफलीच्या निमित्ताने नाशिककरांसाठी चालून आला आहे.

या कार्यक्रमाचा तिकीट दर २०० रुपये आहे. मात्र, मटा कल्चर क्लबच्या विद्यमान सदस्यांना सवलतीच्या दरात म्हणजे १०० रुपयांना एक तिकीट मिळेल. नव्याने सदस्य होणाऱ्यांना या कार्यक्रमाची दोन तिकिटे मोफत मिळतील. त्यामुळे या मैफलीचा आस्वाद घेण्यासाठी लवकरात लवकर ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

--

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा. पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड संपर्क ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन डझन वीजखांबांचे श्राद्ध!

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोड येथील इंगळेनगर ते पवारवाडी कॅनॉलरोडवर वाहतुकीस अडथळा ठरणारे धोकादायक वीजखांब प्रशासनाला कळवूनदेखील वर्षभरापासून हटविले जात नसल्याने नागरिकांनी येथील तब्बल दोन डझन खांबांचे वर्षश्राद्ध घालून निषेध नोंदवला. प्रशासनाचे डोळे उघडणारी पाटीच या वीजखांबांवर लावून तिला हार घालून श्रीफळही वाढविले. लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सोडविण्याकडे तातडीने हालचाली करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

परिसरातील या वर्दळीच्या रस्त्यावर दोन-चार नव्हे, तर तब्बल २४ धोकादायक वीजखांब वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. या रस्त्याचे रुंदीकरण होऊन एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटला, तरी हे धोकादायक खांब न हटविल्यामुळे दिवसा व रात्रीही अपघात होत आहेत. निधीअभावी हे खांब हटविले जात नाहीत, असे सांगितले जाते. त्यामुळे त्रस्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी अखेर या वीजखांबांचेच वर्षश्राद्ध घालून प्रशासनाचा निषेध नोंदवला. किमान आता ती हे खांब हटविले जातील, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली.

हे खांब हटविण्यासाठी परिसरातील नागरिक महापालिका व महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले. अनेकदा निवेदने दिली. परंतु, आश्वासनाशिवाय काहीच मिळालेले नाही. या खांबांवरून नाशिकरोडच्या आयएसपी, सीएनपीच्या फीडरची लाइन गेली आहे. हे खांब हटविण्यासाठी निधी महापालिकेने द्यायचा की महावितरणने यावरून वाद असल्याचे नागरिकांनी सांगितले. या खांबांबरोबरच शहरातील वीजतारा भूमिगत करणे व अन्य कामासाठी साडेतीन हजार कोटींचा निधी लागणार आहे. त्यामुळे हे जीवघेणे खांब कायम आहेत. जेलरोडच्या खांबाना आम्ही रेडियम लावले असून, केशरी रंग दिल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. मात्र, रात्री ते दिसतच नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. गणेश जाधव, विलास रामराजे, किरण आहिरे, भीमराव बाविस्कर, सुरशे धात्र, सुरेश हिंगमिरे, मंगशे पवार, अनिल समदूर, नलिनी कसोटे, संजय तायडे, मारुती लोंढे, मंगेश तपासे, माया खैरनार, शिवाजी पाटील, प्रमिला बाविस्कर, हेमलता अहिरे, गंगाधर चव्हाण, नारायण इंगळे, निखिल पवार आदी हे धोकादायक खांब हटविण्यासाठी वर्षभरापासून पाठपुरावा करीत आहेत. हे खांब त्वरित हटविले नाहीत, तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

--

काय आहे समस्या?

जेलरोडवरील इंगळेनगर चौक भागातून एक रस्ता जेलरोड-बिटकोकडे, तर दुसरा उपनगर-पवारवाडी कॅनॉलरोडकडे जातो. पवारवाडी रस्त्यावरील अतिक्रमित मांसविक्रेते व अन्य टपऱ्यांची संख्या मोठी होती. हा रस्ता अरुंद व उखडलेला होता. महापालिकेने वर्ष-दीड वर्षापूर्वी येथे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून टपऱ्या हटविल्या. त्यानंतर तातडीने रस्ता रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यात आले. मात्र, रुंदीकरणानंतर इंगळेनगर चौकापासून पवारवाडीपर्यंत दोन डझनपेक्षा जास्त वीजखांब रस्त्यात आले. ते आजही कायम आहेत. त्यामुळे वारंवार अपघात होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

--

अपघातांत अनेक जायबंदी

हा रस्ता चांगला झाल्याने दुचाकी व अन्य वाहने वेगात असतात. रात्री या रस्त्यावरील बहुसंख्य पथदीप बंद असतात. त्यामुळे रस्त्यात आलेले हे खांब दिसत नाहीत. रिक्षाचालक, कॉलेजचे दुचाकीस्वार युवक असे अनेक जण या खांबांवर धडकून जायबंदी झाले आहेत. या खांबांना चुकविण्याच्या प्रयत्नातही अपघात होत आहेत. या रस्त्यावर पूर्वेकडे तोंड करून उभे राहिल्यास भररस्त्यात खांबांचे जाळेच दिसते. मात्र, महापालिका व महावितरणला हे दिसत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

--

खांबांवरील फलकाचा आशय...

‘मनपा आयुक्त कारभारी, महावितरण कंपनी। रहदारी मार्ग, उभे-आडवे खांब मालमत्ता तुमची। तिजोरी जनतेची, वाट वाकडी करू नका। दखल घ्यावी, दुर्घटना टाळावी। विनंती हात जोडुनी!

-प्रभाग क्रमांक १८, दसक पूर्व कॅनॉलरोडचे त्रस्त नागरिक व वाहनचालक

--

इंगळेनगर-पवारवाडी रस्त्यावरील हे दोन डझन खांब दीड वर्षापासून जैसे थे आहेत. महापालिकेने रस्ता रुंद केला ही चांगली गोष्ट आहे. मात्र, रुंदीकरणाआधीच हे खांब हटविण्याचे नियोजन केले पाहिजे होते. आताही वेळ गेलेली नाही. त्वरित कृती करावी.

-गणेश जाधव, स्थानिक रहिवासी

--

महापालिका आणि महावितरणच्या वादात रोज अपघात होत आहेत. मात्र, तरीही खांब हटविले जात नाहीत, ही खेदाची बाब आहे. गंभीर अपघात झाल्यानंतर हे खांब हटवून उपयोग नाही. तातडीने हे खांब हटविले नाहीत, तर तीव्र आंदोलन केले जाईल.

-किरण आहेर, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाईक संस्थेच्या सभेत खडाजंगी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील शिक्षण संस्थांपैकी एक महत्त्वाच्या असलेल्या क्रांतीवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या सभेत काही मुद्द्यांवरून निर्माण झालेला गोंधळ काही वेळ हमरी-तुमरीवर येऊन पोहचला होता. परिणामी, सभेत थोडा वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विरोधकांच्या गटातील ज्येष्ठ सभासदांचा सभेवर बहिष्कार असला तरीही उपस्थितांपैकी काही सभासदांनी संचालक मंडळाला धारेवर धरल्याचे चित्र संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बघायला मिळाले.

व्ही. एन. नाईक संस्थेच्या कॅनडा कॉर्नर येथील कॉलेजच्या मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेस संचालक मंडळासह जिल्हाभरातून सभासद उपस्थित होते. संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी प्रास्तविकात संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. इतर व्यवहारांचा तपशील मांडला. व्यासपीठावर धात्रक यांच्यासह अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सहचिटणीस तानाजी जायभावे, आमदार बाळासाहेब सानप आदी ज्येष्ठ संचालक उपस्थित होते.

यानंतर सभासदांच्या वतीने मनोज बुरकुले यांनी संस्थेच्या इमारतींच्या टेरेसचा गैरवापर होऊनही संचालक मंडळ हातावर हात धरून बसले असल्याचा आरोप करत संचालक मंडळास धारेवर धरले. या मुद्द्यावर संस्थेचे माजी सरचिटणीस पी. आर. गिते यांनीही परखड मत मांडत टेरेसचा विकसकाकडून बेकायदेशीर वापर सुरू असल्याचे सांगितले. हा प्रश्न जुना असताना संचालक मंडळाने विकसकावर कारवाई का केली नाही, असा सवाल यावेळी इतर सभासदांनी उपस्थित केल्यानंतर सभेत दोन गटांत हमरी-तुमरी झाली. यावेळी ज्येष्ठ सभासद लक्ष्मणराव सांगळे यांनी गोंधळ टाळून सभा खेळीमेळीत पार पाडण्याचे आवाहन सभासदांना केले.

या मुद्द्यासोबतच अनेक सभासदांना सभेच्या आदल्या दिवशी हाती मिळालेला वार्षिक अहवाल, अहवालातील त्रुटी, संस्था मालकीच्या इमारत टेरेसवरील अतिक्रमण, एनकेपीएलचे आयोजन आदी मुद्द्यांवरूनही गोंधळ झाला. सभेची सूचना सभासदांना वेळेत दिली जात नाही, अहवाल छपाईत त्रुटी राहतात कशा, बड्या देणगीदारांची विशेष दखल संस्था का घेत नाही, काही सभासदांना मुद्दाम का टाळले जाते, आदी मुद्दे यावेळी सभासदांनी उपस्थित केल्याने काही वेळ सभेचे वातावरण तापले होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि संस्थेचे ज्येष्ठ सभासद पंढरीनाथ थोरे यांनीही ताळेबंद आणि अहवालासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर गोंधळ उडाला होता.

कबड्डीच्या रेषेत गुरफटू नका!

नाईक शिक्षण संस्थेने नुकतेच एनकेपीएल या कबड्डी लीगचे आयोजन केले होते. या सोहळ्यासाठीच्या खर्चाचा एकूण तपशील अहवालात असला तरीही त्याचा बारिक-सारीक तपशील आणि प्रत्येक देणगीदारांची देणगी अहवालात का मांडली गेली नाही, असाही सवाल सभेत उपस्थित झाला. याशिवाय संस्थेचे माजी सरचिटणीस अॅड. गिते यांनी संचालक मंडळाचे कान टोचताना, कबड्डीच्या दीड मीटर रेषेवर अडकून बसू नका, तर ध्येय मोठे ठेवा असे सांगत संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासह संस्थेच्या दुरवस्था झालेल्या शाळांची स्थिती सुधारण्यावर भर द्या, असा सल्ला दिला.

माजी अध्यक्षांचा बहिष्कार

संस्थेच्या वतीने वार्षिक अहवालात मांडलेल्या जमा खर्चामधील तफावत, कब्बड्डी प्रिमियर लिगच्या खर्चाचा अपूर्ण तपशील यासह विविध अनियमित व्यवहार होत असल्याचा आरोप करीत नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तुकाराम दिघोळे यांसह प्रल्हाद कराड पाटील, अॅड. का. का. घुगे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला. संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यपध्दतीबाबत त्यांनी पत्रकाद्वारे नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषमतेमुळे विकास साध्य होत नाही!

0
0

साहित्यिक बाबूराव गुरव यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

आज बहुजन समाज शिक्षणापासून वंचित असून, अंधश्रद्धा, विषमतेमुळे विकास साध्य होत नाही. प्रतिगामी शक्ती हे वृक्ष तोडण्याचे काम करीत आहेत, या भूमीत श्रमवाद व ब्राह्मणवाद हजारो वर्षांपासून सुरू आहे, असे मत साहित्यिक बाबूराव गुरव यांनी व्यक्त केले.

शहादा येथील मीरा प्रताप लॉनमध्ये तेरावे विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलन सुरू आहे. रविवारी (दि. २४) दुसऱ्या दिवशी गटचर्चा व मांडणी या सत्राचे सत्राध्यक्ष साहित्यिक बाबूराव गुरव होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार मंचावर प्रा. श्रीरंजन आवटे (पुणे), के. डी. शिंदे, कॉ. अविनाश कदम (मुंबई), प्रमोद नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. महात्मा फुलेंनी बहुजनांचा शत्रू कोण याची मांडणी केली असल्याचेही गुरव यावेळी म्हणाले. यावेळी साहित्यिक कॉ. नजुबाई गावित, कविवर्य वाहरू सोनवणे, अरविंद कुवर, अनिल कुवर, सुरेंद्र कुवर, आरती पवार, प्रा. मनोज गायकवाड यांच्यासह अनेक साहित्यिक उपस्थित होते.

समानता, मानवता, बंधुत्व मानणारा श्रमवाद आहे, तर वेदांती सुप्त पुरुषामधून आलेले वेद ग्रंथ हा ब्राह्मणवाद आहे, असे सांगत त्यांनी आपले विचार मांडले. कॉ. शरद पाटील यांना तीन वेळेस मारण्याचा प्रयत्न असून, त्यांना व त्यांचे साहित्य यांना समजून घेतले तर श्रमसंस्कृतीचे जतन करू शकतो, असे मत गुरव यांनी व्यक्त केले. भगवान महावीर व गौतम बुद्धांच्या मांडणीत श्रवण संस्कृती आध्यात्मिक मांडणीच्या रूपात असून, या दोघांनी अहिंसेची संस्कृती दिली आहे, असे ते म्हणाले. मूलभूत हक्कासाठी वीर खाज्या नाईक, कै. अंबरसिंग महाराज यांनी चळवळ केली आहे. भारतातील अनेक राज्यांपैकी केरळ राज्य सोडल्यास शिक्षणावर सहा ते आठ टक्के खर्च केला जातो. शिक्षणावर खर्चाची तफावत असल्याने बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते, असेही गुरव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मशानभूमी, उद्यानाच्या विकासावरून सुंदोपसुंदी

0
0

राजन जोशी, सिडको

सिडकोतील उंटवाडी येथे असलेल्या स्मशानभूमीच्या विकासावरून भाजपा व शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली होती. त्यानंतर याच प्रभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या मुद्द्यावरून याच नगरसेवकांमध्ये वाद-विवाद सुरू झाल्याचे दिसत आहे. नगरसेवकांमध्ये विकासकामांवरून वाद होत असताना प्रभागात नवीन प्रकल्प आणण्यासाठी हे नगरसेवक का भांडत नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सिडकोतील प्रभाग २५ मध्ये असलेल्या उंटवाडी येथील स्मशानभूमीचा विकास करणे ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. मागील सुमारे तीस वर्षांपासून असलेल्या या स्मशानभूमीत कोणत्याही सुविधा नसल्याने नागरिकांचे हाल होत असतात. त्यामुळे या स्मशानभूमीचा विकास करण्याचा प्रस्ताव नगरसेवक सुधाकर बडगुजर व नगरसेविका हर्षा बडगुजर यांनी मांडला व त्यास मंजुरीही मिळाली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी या स्मशानभूमीला विरोध केल्यानंतर भाजपच्या नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनीही आम्ही नागरिकांच्या बाजूने असल्याचे सांगून या स्मशानभूमीच्या विकासाला विरोध केला. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले होते. अखेरीस पोल‌िसांच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण सध्या थंड झाले असले, तरी स्मशानभूमीच्या विकासाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे विकासकामे सुरू होण्यापूर्वीच विरोध झाल्याने या स्मशानभूमीच्या कामात काही अडचण येणार नाही ना, याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

स्मशानभूमीचा मुद्दा थंड झाल्यानंतर आता याच प्रभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या विकासावरून राजकारण सुरू झाल्याचे दिसत आहे. या उद्यानाचा विकास करावा अशी मागणी करणारे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंड‌ियाच्या वतीने नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना देण्यात आले. यावेळी नगरसेवक बडगुजर यांनी या उद्यानाची पाहणी करून येत्या दोन महिन्यांत या उद्यानाचा विकास करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर तातडीने नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनी आपणच मागील काही महिन्यांपूर्वी या उद्यानाच्या विकासासाठी निधीची तरतूद केली असून नागरिकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम सुरू असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता उद्यानाचा विकासही नक्की कोणामुळे होणार, हा प्रश्‍नही नागरिकांसमोर उभा राहिला आहे. विकास कोणाच्याही निधीतून झाला तरी चालेल. परंतु, नागरिक तर महानगरपालिकेकडे पैसे देत असतात. त्यामुळे नागरिकांना सुविधा मिळणे हाच सर्वात महत्त्वाचा भाग असतो.


आमदारकीचे वेध

आमदारकीची निवडणूक जवळ येऊ लागली असल्याने व सिडको व सातपूर हा स्वतंत्र मतदार संघ असल्याने याठिकाणाहून आमदारकीसाठी श्रेय घेण्यावरून भाजपा व शिवसेनेत वाद सुरू झाल्याचे दिसत आहे. एकाच प्रभागात चार नगरसेवक असल्याने या चारही नगरसेवकांनी एकत्रितरित्या काम केले, तर प्रभागाचा विकास चांगला होऊ शकतो. मात्र, केवळ श्रेयवादावरून मंजूर विकासकामांना सुरुवात करण्यात अडचणी येत असल्याचे चित्र सिडकोत दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसरी शाळा नको; आमचे पाय दुखतील ना!

0
0

नवनाथ वाघचौरे, वावी (सिन्नर)

‘‘आमच्या शाळेत अभ्यासाबरोबरच गाणी, खेळ घेतले जातात. आमची शाळा खूप चांगली आहे. आमची शाळा आम्हाला खूप आवडते. आमचे सर आम्हाला कधी कधी त्यांच्या गाडीवरून शाळेत आणतात. आम्ही आमच्या शाळेपुढे छान फुलांची झाडे लावली आहेत. आम्हाला दुसऱ्या शाळेत पाठवू नका. आमच्याच शाळेत राहू द्या. दुसऱ्या शाळेत जाताना आमचे पाय दुखतील ना!’’ अशा शब्दांत वावी (ता. सिन्नर)मधील निमोणीचा मळा येथील प्राथमिक शाळेतील बालकांनी आपल्या शाळेविषयीच्या भावना व्यक्त केल्या. पटसंख्येअभावी ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर या शाळेतील विद्यार्थी ‘मटा’शी बोलताना भावूक झाले होते.

पटसंख्या घटल्याचा फटका सिन्नर तालुक्यातील वावी येथील निमोणी मळा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला बसला असून या शाळेचा तब्बल २२ वर्षांचा प्रवास आता इतिहासजमा होणार आहे. पुरेशा पटसंख्येअभावी शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला असून त्यात निमोणी मळ्यातील शाळेचा समावेश आहे. सर्व सुविधांनी युक्त असलेली ही शाळा आता बंद होणार असल्याची पुसटशी कल्पनाही या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या ११ चिमुकल्यांना नसल्याची माहिती ‘मटा’ने या शाळेला दिलेल्या भेटीतून उघड झाली.

वावी येथील निमोणीच्या मळ्यात १९९५ मध्ये जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुरू झाली होती. या शाळेला स्थानिक दानशूर नागरिक मारुती नामदेव ताजणे यांनी आपल्या शेतातील दोन गुंठे जागा दिली होती. तेव्हापासून या शाळेला निमोणीचा मळा हे नाव पडले. वावी गावापासून साडेतीन किलोमीटरवर शेतवस्तीवरील मुलांसाठी ही शाळा सोयीची होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात या शाळेतील विद्यार्थिसंख्या घटत गेली. सध्या या शाळेतील पटसंख्या खूपच रोडावल्याने ही शाळा बंद करून वावी येथील प्राथमिक शाळेत समायोजित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

अकरा विद्यार्थ्यांची शाळा

वावी येथील निमोणीचा मळा येथील पहिली ते चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळेत सध्या ११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात पहिलीच्या वर्गात ६, तिसरीत १ आणि चौथीत ४ असे एकूण ११ विद्यार्थी आहेत. दुसरीच्या वर्गात एकही विद्यार्थी नाही. या शाळेत वर्गखोल्यांसह स्वच्छतागृह, स्वयंपाकगृह, विजेची व्यवस्था, संरक्षक कुंपण या भौतिक सुविधा आहेत. दोन शिक्षक या शाळेत नेमणुकीस आहेत.

वावीच्या शाळेत कसे जाणार?
शाळेपासून वावी येथील प्राथमिक शाळा साडेतीन किलोमीटरवर आहे. इतक्या दूरवर या शाळेतील ११ विद्यार्थी कसे पाठवायचे, असा प्रश्न आता येथील पालकांपुढे उभा राहिला आहे. याशिवाय या विद्यार्थ्यांना राज्य महामार्ग क्रमांक ३९ ओलांडून जावे लागणार आहे. वावी ते निमोणीचा मळादरम्यान प्रवासासाठी दुसऱ्या वाहनांची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने येथील विद्यार्थी वावीच्या शाळेत कसे जाणार, या प्रश्नाचे उत्तर या विद्यार्थ्यांना व पालकांना देता आले नाही.

या शाळेतील पटसंख्या कशामुळे कमी झाली याचा सरकारने विचार केलेला नाही. या शाळेनंतर याच परिसरात सरकारने तब्बल सात नवीन शाळांना परवानगी दिली. हा दोष कुणाचा आहे?

- गणेश गलांडे, अध्यक्ष, शालेय समिती

पटसंख्येच्या कारणावरून शाळा बंद करू नये. पालकांच्या समस्या वाढून मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येऊ शकते. गावातील शाळा दूर असल्याने या शाळेची गरज आहे.

- मोनिका वेलजाळी, पालक

आम्हाला आमच्या शाळेत सर्व विषय शिकायला मिळतात. आमची शाळा चांगली आहे. आम्हाला आमची शाळा खूप आवडते. खेळ, सहल आयोजित केली जाते.

- आदित्य ताजणे, विद्यार्थी

परिसरातील जन्मदर काही वर्षांपासून घटला आहे. गेल्या वर्षी या शाळेत पहिलीच्या वर्गासाठी प्रवेश झाले नव्हते. त्यामुळे गेल्या वर्षीचा पट सात झाला होता. चालू वर्षी या शाळेचा पट वाढला आहे. शाळा बंदबाबत अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.

- सुरेखा कन्नोर, इन्चार्ज, मुख्याध्यापिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेसोळाशेवर विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे अर्ज प्रलंबितच

0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

वारंवार सूचना देऊनसुद्धा शहर आणि जिल्ह्यातील अनेक कॉलेजेस त्यांच्याकडे आलेले विद्यार्थ्यांचे फ्रिशीप आणि स्कॉलरशिपचे अर्ज जमा करण्यास तयार नाहीत. अशा कॉलेजांची संख्या शहर व जिल्ह्यात ३७ आहे. कॉलेजेसच्या ढिसाळ प्रशासकीय कामकाजामुळे जिल्ह्यात १६९१ फ्रिशीप आणि स्कॉलरशिपचे अर्ज प्रलंबित असल्याची माहिती समाजकल्याणने दिली आहे. विशेष म्हणजे नामांकित शिक्षण संस्थांचा समावेश हे अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्यांमध्ये आहे.

हे अर्ज पाठविण्याची दिरंगाई कॉलेजकडून होत असल्याने प्रक्रिया लांबत असल्याचे समाजकल्याण सातत्याने सांगते तर समाजकल्याणकडूनच ही दिरंगाई होत असल्याचे प्रतिआरोप कॉलेजकडून करण्यात येतात. यंदा मात्र समाजकल्याणने एक पाऊल पुढे टाकत कोणत्या कॉलेजने कुठल्या प्रवर्गातील शिष्यवृत्तीचे किती अर्ज प्रलंबित ठेवले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ओझर होणार आंतरराष्ट्रीय विमानतळ

0
0

नाशिक ः उडान योजनेअंतर्गत नुकतेच कार्यान्वित झालेल्या ओझर विमानतळाच्या भाळी लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन लाभण्याची चिन्हे आहेत. मुंबई विमानतळावरील वाहतूक कोंडी लक्षात घेता मुंबईला पर्याय म्हणून ओझरचा विचार गांभीर्याने होत आहे. त्यास केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर. एन. दुबे आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)चे चेअरमन टी. सुवर्ण राजू यांनी ‘मटा’ला दिलेल्या मुलाखतीत दुजोरा दिला आहे.

शिर्डी विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर ओझर विमानतळाचे काय होणार हा प्रश्न उपस्थित केला गेला. मात्र, ओझर विमानतळाचे भौगोलिक स्थान आणि तेथील पायाभूत सोयी-सुविधा लक्षात घेता, आता या ठिकाणाहून पुणे आणि मुंबई या दोन शहरांसाठीची विमानसेवा सुरू झाली आहे. उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नामांकित कंपन्यांची परराज्यातील शहरांना जोडणारी सेवा दृष्टिपथात आहे. त्यातच मुंबई विमानतळावर असलेली वाहतूक कोंडी उडान योजनेमुळे वाढणारच आहे. सद्यःस्थितीत मुंबई विमानतळावरून रोज तब्बल ९०० विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग होते. गेल्या महिन्यात मुंबईहून एका दिवसात तब्बल ९६९ विमानांचे रेकॉर्ड टेकऑफ आणि लँडिंग झाले आहे. हा सारा व्याप आणि होऊ घातलेल्या नवी मुंबई विमानतळाचे काम या दोन्ही बाबी लक्षात घेऊन मुंबईला पर्यायी विमानतळाच्या संदर्भात गांभीर्याने विचार सुरू झाला आहे. नवी दिल्ली येथील विमानतळावरील भार कमी करण्यासाठी आम्ही ग्रेटर नोएडा येथे नव्या विमानतळाचे काम सुरू केल्याचे दुबे यांनी ‘मटाशी बोलताना सांगितले आहे.

ओझर विमानतळाची मालकी एचएएलकडे आहे. नवरत्नांपैकी एक असलेली एचएएल ही सरकारचीच व्यावसायिक कंपनी आहे. आता एचएएलने खासगी प्रवासी विमान वाहतूक क्षेत्राची आगामी वाटचाल लक्षात घेता, ओझर विमानतळाचे महत्त्व एन्कॅश करण्याचे निश्चित केले आहे. त्यास चेअरमन राजू यांनी दुजोरा दिला आहे. मुंबईसाठी ओझर हे पर्यायी विमानतळ होऊ शकते. म्हणूनच एचएएलने त्यासाठी आवश्यक ती उपाययोजना आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. हवाई वाहतूक मंत्रालयाने एचएएलच्या या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देण्याचे निश्चित केले आहे. कारण यामुळे केवळ मुंबई नाही, तर देशाच्या हवाई वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे. मुंबई हे उडान योजनेंतर्गत इतर शहरांशी जोडल्याने अन्य विमानतळांचा आणि शहरांचाही विकास होणार आहे.

म्हणून ओझरचा पर्याय प्रभावी

ओझर विमानतळाची लांबी तीन हजार मीटर, तर रुंदी ६० मीटर आहे. ही लांबी चार हजार मीटर, तर रुंदी ७५ मीटर करणे प्रस्तावित आहे. जगातील सर्वांत मोठे विमान या धावपट्टीवर आताही उतरू शकते. येथे नाइट लँडिंगची सुविधा उपलब्ध आहे. मुंबईनंतर दुसरे विमानतळ १५० किलोमीटरच्या परिघात नाही. सध्या अहमदाबाद विमानतळ हे मुंबईला पर्याय म्हणून वापरले जाते. मुंबर्इपासून नाशिकचे हवाई अंतर ९७.८ नॉटिकल मैल आहे, तर अहमदाबादचे २४० नॉटिकल मैल एवढे आहे. त्यामुळेच मुंबईहून ओझर येथे येण्यासाठी लागणारा हवार्इ वेळ ०.३० मिनिटे, तर ७५० लिटर इंधन लागते. याच तुलनेत अहमदाबादला ०.४६ मिनिटे कालावधी आणि २००० लिटर इंधन लागते. त्यामुळे मुंबईहून विमाने ओझरला येणे फायदेशीर आहे. त्यातच मुंबईत सध्या विमानांच्या पार्किंगच्या जागेची आणि तेथील चार्जेसही महाग आहेत. मुंबईला इंधन भरण्यासाठी २५ टक्के टॅक्स लागतो. ओझर येथे मात्र अवघ्या चार टक्क्यांमध्येच हे काम होऊ शकते. त्यामुळे नाइट पार्किंगसह अल्प करात इंधन भरण्याचाही पर्याय निर्माण होईल. ओझरला येताना आणि जाताना प्रवाशांना सुविधा देण्यातून विमान कंपन्यांना भाडेही मिळू शकणार आहे.

ओझर विमानतळाचे महत्त्व आणि क्षमता आम्हाला लक्षात आल्या आहेत. मुंबईसाठी पर्याय म्हणून ओझर नावारूपाला यावे यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू. हे विमानतळ कार्यान्वित झाल्याचा एचएएललाही मोठा लाभ होणार आहे.

- टी. सुवर्ण राजू, चेअरमन, एचएएल

मुंबई विमानतळावरील हवाई वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमचे मंत्रालय प्रयत्नशील आहे. नवी मुंबईचे विमानतळही अल्पावधीत साकार होईल, अशी चिन्हे नाहीत. त्यामुळे मुंबईला पर्यायी विमानतळाचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत. एचएएलच्या पुढाकारास आम्ही सकारात्मक आहोत.

- आर. एन. दुबे, सचिव, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय

मुंबईला पर्यायी विमानतळ म्हणून ओझर व्हावे, यासाठी आग्रह धरणार आहे. सर्व बाबींचा विचार करता ओझर अतिशय योग्य आहे. देशाच्या विकासाला चालना देणारे हे विमानतळ आहे.

- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्नाची ‘धग’ कायम

0
0

मटा फोकस

मनमाड नगरपालिका

--

संकलन ः संदीप देशपांडे

--

पाणीप्रश्नाची ‘धग’ कायम

--

मनमाड शहराच्या प्रत्येक निवडणुकीत पाणीप्रश्न हा कळीचा मुद्दा असतो. नगरपालिका निवडणुकीत मनमाडच्या गंभीर पाणीप्रश्नाचे पडसाद कायम उमटत असतात. ही निवडणूकही त्याला अपवाद ठरली नाही. पाणीप्रश्नाचे गाजर दाखवून निवडणुका लढल्या जातात व दरवेळी हा प्रश्न जाहीरनाम्यात असतोच. पद्मावती धात्रक यांना तिकीट देणाऱ्या शिवसेनेने पाणीप्रश्न हाच मुख्य मुद्दा समोर ठेवून निवडणूक लढवली व बाजी मारली आहे. याशिवाय रस्ते, वीज हे प्रश्नही महत्त्वाचे असल्याने त्याबाबतही आश्वासने दिली गेली. मात्र, मनमाडचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात कोणालाही यश आलेले नाही.

---

वीसएेवजी आठ दिवसांआड पाणी

नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक नोव्हेंबर २०१६ मध्ये जाहीर झाल्यानंतर आणि यंदा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मनमाडमध्ये मोठे राजकीय घमासान पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील मनमाडच्या रणसंग्रामात उतरून प्रचार करावा लागला. थेट नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेच्या पद्मावती धात्रक यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली व शिवसेना-रिपाइं युतीने सत्ताधारी पक्ष म्हणून बाजी मारली. निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनानुसार येथील पाणीप्रश्नाची तीव्रता कमी करण्यासाठी नगराध्यक्षा धात्रक, उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे व त्यांच्या सत्तारूढ आघाडीने प्रयत्न केल्याचे दिसून येते. वीस-वीस दिवसांआड पाणी येत असणाऱ्या गावात गेल्या वर्षभरापासून सात ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे, ही बाब नाकारता येणार नाही.

--

कामाला मिळावी गती

मनमाडचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सरकारदरबारी चकरा मारल्याचे, कोट्यवधी रुपयांचा निधी मिळावा यासाठी प्रयत्न केल्याचे सत्ताधारी आघाडीकडून सांगितले जाते. जुनी पाइपलाइन काढून नवीन पाइपलाइन टाकून लिकेजेस थांबविल्याने पाणीप्रश्नाची तीव्रता कमी करण्यात आल्याचे दिसते. याशिवाय ज्या लोकवस्तीत पाणीपुरवठा होत नाही तिथे नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, ते काम युद्धपातळीवर पूर्णत्वास जावे, अशी अपेक्षा आहे.

---

‘सौर पॅनल’ची प्रतीक्षा

मनमाड शहरात सौर पॅनलची योजना राबवावी यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रस्ताव देण्यात आला असून, त्यांनी मंजुरी दिल्याचे आणि या योजनेसाठी नगरपालिका पाच एकर जागा देणार असल्याचे गटनेते गणेश धात्रक यांनी सांगितले. या योजनेमुळे पाणीपुरवठा करण्यासाठी लागणारी वीज व त्यापोटी येणारे दीड कोटीचे बिल यांची बचत होईल अन् पालिकेवरचे आर्थिक संकटही दूर होईल, असे प्रशासनाला वाटते. मात्र, प्रयत्न होऊनही योजना अद्याप साकार झालेली नसल्याचे दिसून येते. मनमाड शहरात नवी पालिका इमारत आयुडीपीमध्ये बांधण्याच्या हालचाली सुरू आहेत. मनमाड कॅम्प भागात जलकुंभाची योजना आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू अाहे.

--

घंटागाड्या, रस्त्यांप्रश्नी पुढाकार

मनमाड शहरात वर्षभरात कचरा व्यवस्थापन करण्यासाठी घंटागाड्या असाव्यात याकरिता आघाडी प्रयत्नशील होती. मात्र, वर्ष संपता संपता दहा घंटागाड्यांसाठी निविदा मागविण्याची प्रक्रिया पूर्णत्वास गेल्याचे सांगितले जाते. ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी या घंटागाड्या घरोघरी जाणार असल्याने त्या लवकर आल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या वर्षभरात मनमाडच्या क्रीडाप्रेमी व खेळाडूंसाठी असलेल्या आयुडीपी स्टेडियमच्या नूतनीकरणाचा प्रकल्प हाती घेऊन त्याच्या विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. मनमाडमधील रस्ते सुधारण्याचे कामही सुरू असून, चंद्रभागा लॉन्स येथील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक स्वच्छतेसाठी रोजच साफसफाई मोहीम राबविण्यात येत असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.

--

अस्वच्छता, जनावरे मोकाट

मनमाड शहरात स्वच्छतेची वाट लागल्याचा व साथीच्या रोगांनी डोके वर काढल्याचा आरोप होतो किंवा पालिका सभेत याविषयी विरोधी पक्षाकडून वारंवार ओरड होते ही वस्तुस्थिती आहे. शहरात गेल्या काही महिन्यांत मलेरिया डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले. स्वाइन फ्लूने तीन जणांचा बळी घेतला. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न अपेक्षित आहेत. शहरात रोज स्वच्छता केली जाते, असा दावा प्रशासन करते. मात्र, शहरातील काही भागात स्वच्छतेचा उडालेला बोजवारा, तसेच भरून वाहणाऱ्या कचराकुंड्या, रस्त्यांवर मोकाट जनावरे, कुत्र्यांचा सुळसुळाट या गोष्टी नजरेआड करून चालणार नाहीत. शहरातील कोंडवाडा बंद झाल्याने मोठी समस्या उद्भवली आहे, याकडे आगामी काळात लक्ष देणे गरजेचे आहे. शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी सुरू होणार आहेत. मात्र, आज शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. ट्रॅफिक, अतिक्रमणे हे प्रश्नही दिसून येत असल्याने वर्षभरानंतर आता हे प्रश्न कायमचे कसे सुटतील या दिशेने प्रयत्न होण्याची गरज व्यक्त होत आहे.

--

निधी देण्यात दुजाभाव?

शिवसेनेची पालिकेवर सत्ता असल्याने भाजप सरकार निधी देताना दुजाभाव करते की काय असा प्रश्न पडतो, असे सत्तारूढ आघाडीला वाटते. ब वर्ग नगरपालिका असताना मनमाड पालिकेसाठी ५० लाखांचा नागरी उत्थान निधी दिला गेला, तर हाच निधी भाजपची सत्ता असलेल्या चांदवड व येवला नगरपालिकांना दीड कोटी रुपयांपर्यंत देण्यात आल्याचा आरोप करीत निधी देताना दुजाभाव होतोय का, असा सवाल मनमाड पालिकेतील सत्ताधारी नेते करताना दिसत आहेत.

--

नगराध्यक्षा म्हणतात...

--

नियोजनबद्ध कामांना प्राधान्य

थेट जनतेने आपल्याला निवडून दिले याची जाणीव असल्याने मनमाडच्या सतत भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नावर गांभीर्याने पावले उचलून त्याची तीव्रता कमी केली आहे. निवडणुकीपूर्वी सोळा, अठरा, तर कधी बावीस दिवसांआड शहराला पाणीपुरवठा होत असे. वर्षभरात लिकेज काढणे, अनधिकृत कनेक्शन तोडणे, अनावश्यक स्टँड पोस्ट काढून टाकणे, तसेच दोन कोटींची नवीन पाइपलाइन टाकणे असे उपाय केल्याने सात ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा करणे शक्य झाले आहे. रस्ते, पथदीप, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता याबाबत पुढील काळात नियोजनबद्ध विकासकामे करण्यात येणार अाहेत.

-पद्मावती धात्रक, नगराध्यक्षा

--

विरोधक म्हणतात...

जुन्या कामांचेच श्रेय

आज जी कामे होत असल्याचा दावा सत्तारूढ आघाडी करीत आहे, ती कामे मागच्या नगराध्यक्षांच्या कारकीर्दीत मंजूर झालेली आहेत. वर्षभरात प्रत्यक्षात कोणतीही कामे झालेली नाहीत. शहरात सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. डेंग्यू, मलेरियाची साथ पसरत असून, नागरिकांचे हाल होत आहेत. याप्रश्नी सत्ताधारी आघाडीला अपयश आले आहे. मनमाडचे बहुसंख्य रस्ते खड्डेयुक्त आहेत. रस्त्यांवर मोकाट जनावरांचा कायम धुडगूस सुरू असतो. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न रोजचाच आहे. याबाबत पालिकेने कारवाई केलेली नाही. आश्वासने सोडून नागरिकांना काही मिळाले नाही, असे वाटते.

-कैलास पाटील, विरोधी गटनेते

--

गटनेते म्हणतात...

शासनदरबारी पाठपुरावा

पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सहा कोटी २९ लाखांची पाणी योजना यशस्वीपणे राबवून पाणीप्रश्न सोडविण्याच्या दिशेने आश्वासक पाऊल टाकले आहे. वर्षभरात शासनदरबारी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. शहरात चंद्रभागा लॉन्स परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित रस्त्यांचा व स्टेडियमचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपड करीत कामांचा श्रीगणेशा केला आहे. सव्वासहा कोटी रुपयांची नवी पालिका इमारत आयुडीपी भागात प्रस्तावित अाहे.

-गणेश धात्रक, गटनेते

--

अधिकारी म्हणतात...

धोरणांना मूर्त रूप

शिवसेना व रिपाइं या सत्तारूढ आघाडीने ठरविलेल्या ध्येय-धोरणांना मूर्त रूप देण्याचे काम पालिका प्रशासन करीत आहे. मनमाडच्या पाणीप्रश्नाबाबत जाणीवपूर्वक व निष्ठेने हालचाली करून नागरिकांना पाणीप्रश्नी दिलासा दिला आहे. सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी मोहीम राबविली असून, स्वच्छता अॅपद्वारे नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न होत आहे. ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी दहा घंटागाड्या लवकरच दाखल होत आहेत. शुद्ध पाण्यासाठी नवे फिल्टर बसविले आहेत.

-डॉ. दिलीप मेनकर, मुख्याधिकारी

--

नागरिक म्हणतात...

अद्याप आश्वासनपूर्ती नाही

मनमाड शहरातील बहुतांश रस्त्यांची वाट लागली आहे. शहरात ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तताच झालेली दिसत नाही. शहरात स्वच्छता व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनमाडचे प्रश्न यापुढील काळात सुटले पाहिजेत.

-सचिन शिरुडे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाळकांद्यावर पाणीटंचाईचे सावट

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तालुक्यात बहुतांश ठिकाणी विहिरीची पातळी घटल्याने शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या उन्हाळ कांद्यावर पाणीटंचाईचे संकट आहे. पश्चिम आदिवासी भागात विहिरींना थोडेफार पाणी असले, तरी लोडशेडिंगमुळे आठवड्यातून चार दिवस पाणी देता येत नसल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत.

बागलाण तालुक्यात उन्हाळी लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. मध्यंतरीच्या अवकाळी पावसाने या कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कांद्यावर करपा रोग आल्यानेही शेतकरी अडचणीत सापडले होते. अशाही स्थितीत शेतकऱ्यांनी हार न पत्करता निसर्गाशी दोन हात करीत कांदा वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. निसर्गाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांना लोडशेडिंगने सळो की पळो केले आहे.

तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील किकवारी खुर्द, किकवारी बुद्रुक, पठावे दिगर, जोरण, दहदुले, निकवेल, कंधाणे, चाफापाडा या परिसरात उन्हाळी कांदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केलेला आहे. पावसाने देखील या भागात चांगली कृपा केलेली असल्याने विहिरींना पीकांना जीवदान देण्याइतपत पाणी आहे. मात्र, आठवड्यातून अवघ्या तीन दिवस म्हणजेच सोमवार, मंगळवार, बुधवार या काळात वीजपुरवठा असतो. उर्वरित काळात दिवसभर वीज नसते. यामुळे शेतीपिकांना पाणी देणे शक्य होत नाही. यामुळे शेतकऱ्यांना वीज असलेल्या तीन दिवसांत शेतीची कामे पार पाडावी लागत आहेत. रात्रीदेखील सिंगल फेज वीजपुरवठा होतो. यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे.

महावितरणकडून दखल नाही

महावितरणकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. यामुळे कांदा उत्पादकांची मोठी अडचण झाली आहे. लोकप्रतिनिधीदेखील या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने दाद कुणाकडे मागावी, असा सवाल उपस्थित होत आहे.


पश्चिम पट्ट्यात कांदा उत्पादकांना पाणी आहे, तर वीज नाही या दृष्टचक्रात अडकविले आहे. एकीकडे कर्जमाफीचा कोणताही आधार मिळालेला नसताना शासन वीजपुरवठा देखील अखंडपणे देत नाही. यामुळे शेतकरी वर्ग भरडला जात आहे.

- प्रल्हाद म्हसदे, कांदा उत्पादक शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वक्तृत्वासाठी सूक्ष्म निरीक्षणाची गरज

0
0

डॉ. किरण मोघे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रभावी वक्तृत्वासाठी स्पष्ट उच्चार, साधे वाक्य, सहजता व आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. जिथे समर्पण व चांगल्या कलेचा मेळ घातला जातो तेथे चांगले वक्तृत्व खुलते. ‘जे जे सूक्ष्म नाम घ्यावे, ते ते बिंबवून द्यावे’ या रामदासांच्या उक्तीचा संदर्भ देऊन चांगल्या वक्तृत्वासाठी समाजाच्या सूक्ष्म निरीक्षणाची गरज आज आहे, असे मत नाशिक विभागाचे प्रभारी जनसंपर्क अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी व्यक्त केले.

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेजमध्ये ‘वसंत करंडक’ आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. किरण मोघे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शब्दांच्या शक्तीला ओळखून त्याचा समाजाला कसा उपयोग करता येईल या जाणिवेने वक्तृत्व स्पर्धेला सामोरे जाणे आवश्यक आहे. तसेच वक्तृत्वातील शब्द कानावर न आदळता हृदयाला स्पर्श करणारे असावेत. तसेच तरुणाईला अभिप्रेत असणारे व हृदयाला स्पर्श करणारे वक्तृत्व असणे हा व्यासपीठाचा सन्मान असल्याचेही मतही व्यक्त केले.

या स्पर्धेसाठी राज्यातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, धुळे, जळगाव, रायगड, ठाणे आदी जिल्ह्यातून २६ कॉलेजांचे एकूण ४० स्पर्धक सहभागी झाले होते. या सहभागी स्पर्धकांनी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक, उत्तर कोरियाचा दहशतवाद, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व सद्यस्थिती, शैक्षणिक ध्येय धोरणे व आजचे वास्तव आणि जीएसटी फायद्याची की अडचणीची या विषयांवर आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त विठ्ठलराव पालवे, डॉ. धर्माजी बोडके, संचालक शरद बोडके, कचरू पाटील आव्हाड, माजी प्राचार्य डॉ. विश्वनाथ खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. तर स्पर्धेच्या समारोपप्रसंगी बी. जी. वाघ, संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सरचिटणीस हेमंत धात्रक, सहचिटणीस तानाजी जायभावे, संचालक माणिकराव सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली लिमये यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभाध्यक्ष बागडे उद्या धुळ्यात

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्याचे विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हे मंगळवारी (दि. २६) धुळे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत.

विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा दौरा कार्यक्रमात मंगळवारी (दि. २६) सायंकाळी ५ वाजता शासकीय विश्रामगृह, धुळे येथे आगमन होऊन सायंकाळी ५.३० वाजता धुळे शहरातील पांझरा नदीकाठावर रस्त्यांच्या कामाची पाहणी करण्यात येणार आहे. यानंतर, सायंकाळी ६ वाजता पांझरा नदीकिनारी स्व. नानासाहेब उत्तमराव पाटील यांच्या स्मारकास अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आटोपून आमदार हरिभाऊ बागडे हे सायंकाळी ६.१५ वाजता जिल्हा ग्रंथालय इमारतीच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती देतील. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौऱ्यात, दुपारी ३.१५ वाजता धुळे येथे आगमन होऊन सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार-धुळे जिल्ह्यातील अभियंत्यांसमवेत आढावा बैठक होणार आहे. तर सायंकाळी ५ वाजता भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या स्मारकास भेट व हॉलचे उद््घाटनाचा कार्यक्रम सर विश्वेश्वरय्या स्मारक संग्रहालय, साक्री रोड येथे होईल. यानंतर सायंकाळी ५.३० वाजता पांझरा नदीकाठावर रस्त्यांच्या कामांची पाहणी करतील, असे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर कॉलेज जबाबदार

0
0

स्कॉलरशिप प्रकरणी समाज कल्याण विभागाची स्पष्ट सूचना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजकल्याण विभागाच्या वतीने दिली जाणारी स्कॉलरशीप आणि फ्रीशिप ही विद्यार्थ्यांनी अर्ज भरूनही कॉलेजेसच्या घोळामुळे वितरित करण्यात अडसर येत आहे. जिल्ह्यातील तब्बल ३७ कॉलेजेसने समाजकल्याण विभागाला कॉलेजस्तरावर आलेले अर्ज पाठविलेले नाहीत. तर दुसरीकडे प्रलंबित शिष्यवृत्ती देण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी खास पुनरुज्जीवित करण्यात आलेली वेबसाइटही आता बंद होण्याच्या बेतात आहे. या स्कॉलरशिप वितरणात येणाऱ्या अडसर यापुढे कॉलेज प्रशासनच पूर्णत: जबाबदार राहील, अशी स्पष्ट सूचना समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी जाहीर केली आहे.

विशेष बाब म्हणजे समाज कल्याणने वारंवार संपर्क साधूनही या कॉलेजेसचे ढिम्म प्रशासन स्कॉलरशीपचे अर्ज पाठविण्यास तयार नाहीत. वारंवार सूचना देऊनही ज्या कॉलेजेसने त्यांच्याकडे जमा झालेले स्कॉलरशीप किंवा फ्री शिपचे अर्ज समाज कल्याणला दिलेले नाहीत, अशा कॉलेजांची यादीच समाजकल्याण विभागाने जाहीर केली आहे. या जाहीर केलेल्या यादीमध्ये शहर आणि जिल्ह्यातील नामवंत कॉलेजेसचा समावेश आहे.

सन २०१५-१६ ते २०१६-१७ या कालावधीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी कॉलेजेसकडे ऑनलाइन सादर केलेले प्रलंबित अर्ज आणि नूतनीकरणाचे प्रस्ताव लवकरात लवकर समाज कल्याण विभागाकडे सादर करावेत. अन्यथा मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी कॉलेजेसचीच राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

वंचित विद्यार्थ्यांसाठी कार्यवाही करणार

सन २०१७-१८ या वर्षापासून राज्य सरकारच्या सर्व विभागाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती या ‘महाडिबीटी पोर्टल’ मार्फत देण्यात येत आहेत. मात्र काही विद्यार्थ्यांचे सन २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षाची शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, विद्यावेतन, निर्वाह भत्ता इत्यादी लाभ देण्याचे प्रलंबित आहेत. तो अदा करण्यासाठी आता ‘ई-स्कॉलरशीप’ची http://mahaeschol.maharashtra.gov.in ही वेबसाइट २१ नोव्हेंबरपासून मर्यादित कालावधीसाठी सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. पहिल्या टप्प्यात ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी सन २०१५-१६ साठी दिनांक ३१ मार्च २०१६ पर्यंत सन २०१६-१७ साठी दिनांक ३१ मार्च २०१७ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरलेले आहेत. परंतु, ज्यांना अद्याप शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा इत्यादीचा लाभ मिळालेला नाही अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या अर्जांवर कार्यवाही करण्याचे समाजकल्याण विभागाचे आदेश आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे एमआयडीसीत १० लाखांचा दरोडा

0
0

धुळे ः शहरातील मुंबई-आग्रा महामार्गाजवळील अवधान येथील एमआयडीसीतील भवानी ट्रेडर्स कंपनीत तीन जणांनी गावठी कट्ट्याचा धाक दाखवून सशस्त्र दरोडा टाकला. व्यवस्थापकासह दोन जणांना मारहाण करून शनिवारी (दि. २३) मध्यरात्री दहा लाखांची रोकड लुटून नेली. याप्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे. अवधान येथील अवधान औद्योगिक वसाहतीतील भवानी ट्रेडर्स कंपनीत सुजानसिंग वगताजी राजपुरोहित (वय ४२, रा. मुठली, ता. शिवाना, जि. बाडमेर, राजस्थान, ह. मु. एमआयडीसी अवधान) व्यवस्थापक म्हणून नोकरीस आहेत. कंपनीत भुईमुग खरेदी करून शेंगदाणे विक्री करण्यात येतात. कंपनीचे मालक कानसिंग प्रेमसिंग राजपुरोहित (रा. गुडानाल, ता. शिवाना, जि. बाडमेर) यांचे कुटुंबीयांसह कंपनीत वास्तव्य आहे. कंपनी सकाळी आठला सुरू होऊन रात्री आठ ते नऊला बंद होते. कंपनीच्या कार्यालयातच लोखंडी कपाट असून, तेथे रोकड ठेवण्यात येते. कपाटासह अन्य चाव्या मालकाकडे असून, कंपनीत सुरक्षा रक्षक नाहीत. शनिवारी (दि. २३) भुईमुग नसल्याने कंपनी बंद होती. कंपनी बंद असल्याने रात्री नऊ ते दहाच्या सुमारास व्यवस्थापक सुजानसिंग यांच्यासह अन्य सहकारी अशोक राजपुरोहित, कानाराम भिल, दानाराम भिल कंपनीत तर मालक कानसिंग त्यांच्या रुमवर झोपले. मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास कंपनीच्या कार्यालयाचा दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. सुजानसिंग यांनी खिडकी उघडली. त्यावेळी बाहेरून असलेल्यांपैकी एकाने खिडकीतून गावठी कट्ट्याचा धाक दाखविला. चावी नसल्याने त्यांनी कपाट तोडले. कपाटातील दहा लाखांची रोकड काढून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाकिटमारांनी लांबविले मोबाइल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराची मुख्यबाजार पेठ असलेल्या मेनरोड परिसरात पाकिटमारांनी गर्दीचा फायदा घेऊन दोन तरुणांच्या पाकिटासह मोबाइलवर डल्ला मारला. रविवारी हा प्रकार घडला असून, याचा फटका पुणे येथील एका तरुणास बसला. तसेच चोरट्यांनी धात्रक फाटा परिसरातील एकाचा मोबाइल शालिमार चौकात हातोहात लांबविला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
संदीप भगवान माळी (रा. दिघीरोड भोसरी, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी एका कामानिमित्त माळी शहरात आले होते. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास खरेदीसह फेरफटका मारण्यासाठी ते मेनरोडवर गेले. सतत गर्दी असलेल्या नेपाळी कॉर्नर येथून ते मेनरोडकडे पायी जात असतांना गर्दीची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या खिशातील मोबाइल आणि पाकीट असा सुमारे नऊ हजार रुपयांचा ऐवज हातोहात लांबविला. दुसरी घटना शालिमार भागात घडली. रमेश मनोहर भाकरे (रा. धात्रक फाटा) हे रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हॉटेल हॉली डे प्लाझा परिसरात खरेदीसाठी गेले होते. तेथे अज्ञात चोरट्यांनी त्यांचा सात हजार रुपयांचा मोबाइल पळवून नेला. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

दुचाकीची चोरी

सिटी सेंटर पाठीमागील उंटवाडी रोडवर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरी केली. ही घटना शनिवारी (दि. २३) सकाळी घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश बाबुराव हजारे (रा. कामगारनगर, सातपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कामानिमित्त हजारे हे शनिवारी सकाळी सिटी सेंटर मॉलच्या पाठीमागे गेले होते. उंटवाडी रोडवरील देवी मंदिरासमोरील नदी किनारी त्यांनी आपली दुचाकी (एमएच २५ एसी ६२९७) पार्क केली. काम आटोपून परत येईपर्यंत चोरट्यांनी दुचाकीवर हात साफ केला. घटनेचा अधिक तपास हवालदार बोळे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृहस्वप्नांना ऑफर्सचे पंख

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागरिकांना गृह स्वप्न साकार करता यावे आणि थंडावलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रालाही बुस्ट मिळावा यासाठी ग्राहकांवर ऑफर्सची खैरात करण्यावर बांधकाम व्यावसायिकांनी भर दिला आहे. शेल्टर प्रदर्शनाची नामी संधी साधत ऑफर्सचे अनेक पर्याय ग्राहकांच्या पुढे ठेवण्यात आले असून अधिकाधिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी ग्राहकही सरसावल्याचे पहावयास मिळत आहे.

नोटाबंदी, जीएसटी आणि महारेरा यामुळे रिअल इस्टेट इंडस्ट्रीला मोठा फटका बसला असून त्यामुळे गृहखरेदी मंदावल्याचेही चर्चा होती. परंतु, या इंडस्ट्रीला अलीकडच्या काळात उर्जितावस्था प्राप्त होऊ लागली आहे. ग्राहकांचा गृह खरेदीकडे कल वाढावा आणि रिअल इस्टेटवरील मरगळ झटकली जावी यासाठी शहरातील बिल्डर्स सरसावले आहेत. ‘अभी नही तो कभी नही’ अशी साद घालत त्यांनी ग्राहकांसाठी विव‌िध ऑफर्स खुल्या केल्या आहेत. त्यासाठी गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर क्रेडाईच्या वतीने भरविण्यात आलेल्या शेल्टर प्रदर्शनाचे निमित्त साधण्यात आले आहे. लहान-मोठ्या अनेक बिल्डर्सने काही ना काही ऑफर देऊन ग्राहकांना आपल्या प्रकल्पांकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये नो जीएसटी ही ऑफर बहुतांश बिल्डर्सने देऊ केल्याचे पहावयास मिळते आहे. तर काही बिल्डर्सने त्याही पुढे जाऊन जीएसटी बरोबरच स्टॅम्प ड्युटी आणि रजिर्स्टेशनचा खर्चदेखील माफ करीत ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. शेल्टर प्रदर्शनात फ्लॅट बुक करणाऱ्या ग्राहकांना किचन ट्रॉली आणि क्रॉकरी युनिट गिफ्ट देण्याची नामी शक्कल एका बिल्डरने लढविली आहे. तर अनेकांनी स्टॉलला भेट देणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून आकर्षक भेटवस्तू देण्याची योजना आखली आहे. स्टॉलला भेट देणाऱ्या प्रत्येक ग्राहकालाही येथे भेटवस्तू देण्याचा फंडा एका बिल्डरने अवलंबला आहे. तर एका बिल्डरने ग्राहकांना फ्लॅटची पाच वर्षांची वॉरंटीही देऊ केली आहे. काही बिल्डर्सने कर्जाचे हप्ते सुरू झाले तरी ताबा मिळेपर्यंतचे कर्जावरील व्याज स्वत: भरण्याची तयारी दर्शविली आहे. तर काहींनी कुठल्याही मजल्यावरील फ्लॅटला एकच दर ठेवला आहे. अशा एक ना अनेक ऑफर्सचे पर्याय ग्राहकांना भूरळ घालत असून नववर्षात गृहखरेदीला प्रतिसाद वाढेल असा विश्वास बिल्डर्स व्यक्त करू लागले आहेत. गृहकर्ज देणाऱ्या बँकांचे स्टॉल्स शेल्टरमध्ये ग्राहकांचे लक्ष वेधत आहेत. कमीत कमी व्याजदर आणि कमीत कमी कागदपत्रांत कोणती बँक कर्ज देते यावरही ग्राहकांचे लक्ष असून बजेटचे गणित जमविण्यास त्यामुळे सुरूवात होऊ शकली आहे.

३०० फ्लॅटच्या बुकिंगचा दावा
शेल्टर प्रदर्शनाच्या ठिकाणी आतापर्यंत ३०० हून अधिक फ्लॅटसचे बुकिंग झाल्याचा दावा क्रेडाईच्या वतीने करण्यात आला आहे. शेल्टरमध्ये बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ऑफर्सबरोबरच विशेष सवलतींचा लाभ काही बिल्डर्स देत असल्याने ३०० हून अधिक ग्राहकांनी येथेच फ्लॅट बुक करण्यास पसंती दिली आहे. अनेकांनी साईट व्हिझिट करून गृहखरेदीची पहिली पायरी गाठली आहे. नागरिकांनी सोमवारी देखील मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट दिली. शेल्टर प्रदर्शनाचा मंगळवारी (दि. २६) हा शेवटचा दिवस असून गर्दी वाढण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापड गोडावूनला दीपालीनगरला आग

0
0



म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

दीपालीनगर येथे असलेल्या विविध शेडमधील अब्बास अशरफ अली यांच्या कापड पुनरप्रक्रिया करण्याच्या दुकानाला सोमवारी दुपारी आग लागली. अग्निशामक दलाच्या सहा बंबांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी ही आग कशामुळे लागली, याचे स्पष्टीकरण मिळू शकलेले नाही.

दीपालीनगर परिसरात काही दिवसांपासून अनेक गोडावून किंवा शेड व्यापारीदृष्टीने उभ्या रहात आहेत. यातील एका दुकानात कपड्यांचे रिसायकलिंग केले जाते. गोडावून व कारखाना एकाच ठिकाणी असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. दुपारी दोन वाजेच्या सुमारास या गोडावूनला आग लागली. कपड्याचे गोडावून असल्याने आगीने काही वेळात रौद्र रुप धारण केले. याबाबतचे अग्निशामक दलाला कळविण्यात आल्यानंतर मुख्यालयासह सिडको, सातपूर व के. के. वाघ येथील केंद्रावरील सुमारे सहा बंबांनी येऊन आग आटोक्यात आणली. परिसरात नागरिक वस्ती कमी असल्याने आग विझविण्यास अग्निशामक दलाच्या जवानांना त्रास झाला नाही. मात्र, या आगीची बातमी इंदिरानगर परिसरात पसरताच बघ्यांची गर्दी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्त्र लुटीतील संशयितांना मोक्का

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शस्त्र लूट आणि तस्करीच्या गुन्ह्यात नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या बद्रीनुजमान अकबर बादशाह उर्फ सुमीत उर्फ सुका पाचासह इतर संशयितांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याच्या हालचाली युद्धपातळीवर सुरू आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या पाचही संशयित आरोपींची पोलिस कोठडी २८ नोव्हेंबर रोजी संपणार असून, त्यापूर्वीच ही कार्यवाही पूर्ण होणार आहे.

मुंबईत गँग सुरू करून त्याद्वारे दहशत निर्माण करण्याचा उद्देश असलेल्या बादशहाने आपल्या साथिदारासमवेत १३ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील शस्त्रांची विक्री करणाऱ्या दुकानावर दरोडा घातला होता. या टोळीने रिवॉल्व्हर आणि वेगवेगळ्या रायफल्स मिळून ४१ शस्त्रे आणि जवळपास तीन हजारच्या वर जिवंत काडतुसे चोरी केली होती. एवढा मोठा शस्त्रसाठा घेऊन संशयित आरोपी मुंबईच्या दिशेने प्रवास करीत असताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्यांना चांदवड टोलनाक्याजवळ अटक केली. बादशहा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात मुंबईत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या शस्त्रांच्या मदतीने तो मुंबईत सराईत गुन्हेगारांना एकत्र करून एक नवीन टोळी तयार करण्याच्या प्रयत्नात होता. दुसरीकडे मुंबईत तो घातपात करण्याची देखील शक्यता होती. पोलिसांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणातील तथ्य बाहेर पडू नयेत, म्हणून खबरदारी घेतली. पोलिसांनी १४ डिसेंबर रोजी बादशहासह नागेश राजेंद्र बनसोडे (२३) आणि सलमान अमानुल्ला खान (१९, रा. शिवडी मुंबई) यांना अटक केली होती. पोलिसांनी तपास करून याच गुन्ह्यात मुंबईसह अन्य एका ठिकाणाहून दोघांना जेरबंद केले. एकीकडे नाशिक पोलिस तपास करीत असताना दुसरीकडे मुंबईत देखील पोलिसांनी तपास करून दोघांना जेरबंद केले. आतापर्यंत सात संशयित आरोपी जेरबंद झाले असून, नाशिक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या पाच संशयितांना २८ डिसेंबरपर्यंत कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

पथकाची दिवसरात्र मेहनत
दरम्यान, संशयितांचा पूर्वइतिहास पाहता त्यांच्याविरोधात मोक्का कलमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी विविध पथकांमार्फत दिवसरात्र काम सुरू असून, संशयित गुन्हेगार जामीनावर सुटणार नाहीत, यावर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांचा नाशिक, त्र्यंबक दौरा

0
0

शेल्टरचा समारोप; मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संत श्री निवृत्त‌निाथ महाराज मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस मंगळवार (दि.२६) रोजी त्र्यंबकेश्वर येथे येणार आहेत. नाशिकमध्ये सुरू असलेल्या शेल्टर २०१७ प्रदर्शनाचा समारोपही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थ‌तिीत होणार आहे.

मंगळवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास फडणवीस यांचे ओझर विमानतळ येथे आगमन होणार आहे. त्यानंतर ते वाहनाने त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होतील. दुपारी अडीचच्या सुमारास संतश्रेष्ठ श्री निवृत्त‌निाथ महाराज समाधी संस्थान येथे निवृत्त‌निाथ महाराज मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन आणि नवीन भक्तनिवासाचे उद‌्घाटन फडणवीसयांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी सव्वा चारच्या सुमारास त्यांचे गंगापूर रोडवरील डोंगरे वसतीगृह मैदानावर आगमन होणार आहे. तेथे क्रेडाई नाशिकतर्फे आयोजित शेल्टर-२०१७ प्रदर्शनाचा समारोप त्यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये होणार आहे.

सायंकाळी सव्वा पाचला ते ओझर विमानतळाकडे मार्गस्थ होतील. तेथून विमानाने ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. समृद्धी महामार्गाविरोधात आंदोलन करणारे शेतकरीच दलाल बनल्याचे वादग्रस्त वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी अलीकडेच केले होते. मुख्यमंत्री जेथे जातील तेथे त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचे समृद्धीबाधितांनी जाहीर केले आहे.

मुख्यमंत्री मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर असून, त्यांचा निषेध नोंदविला जाण्याची शक्यता त्यामुळे बळावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images