Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘स्मार्ट सिटी’ला होर्डिंग्जचे ग्रहण!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज उभारून विद्रुपीकरणाचे काम जोरात सुरू आहे. शहरातील सर्वच प्रमुख रस्ते मुख्यमंत्र्यांच्या स्वागतांच्या होर्डिंग्जने झाकोळले गेले असून, महापालिकेने याकडे कानाडोळा केल्याचे दिसते.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (दि.२६) शहर दौऱ्यावर असून, त्यांच्या स्वागताचे होर्डिंग्ज तसेच कमानी उभ्या करण्याचे काम सोमवारी दिवसभर सुरू होते. चौकाचौकांत आणि प्रमुख रस्ते होर्डिंग्जने अडविले गेले. गंगापूर नाका, एबीबी सर्कल, अशोकस्तंभ, मायको सर्कल यांसह शहरातील इतर रस्त्यांचे यामुळे विद्रूपीकरण झाले. शहरात कोणत्याही पक्षाचा नेता येणार असेल तेव्हा हेच चित्र पाहण्यास मिळते. मात्र, महापालिका प्रशासन कारवाई करण्यास चालढकल करते. कोणत्याही ठिकाणी परवानगी घेतल्याचे दिसून येत नाही. झेंडे, स्वागत कमानी आणि होर्डिंग्जच्या माऱ्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता असते. महापालिकेसह पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष पुरवून हायकोर्टाच्या निर्णयाचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात घ्यावे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहराचे असे विद्रूपीकरण थांबवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लक्ष द्यावे, अशी मागणी होते आहे.

शहर विद्रूपीकरण करणाऱ्या अवैध होर्डिंग्जची दखल हाय कोर्टानेही घेतली आहे. त्यामुळेच कोर्टाच्या आदेशान्वये महापालिकेने होर्डिंग्ज हटविले होते. मात्र, आता पुन्हा हे पेव फुटले असून, किरकोळ कारणांसाठीही होर्डिंग्ज लावण्याची प्रथा रूढ झाली आहे. महापालिकेने हेल्पलाइन क्रमांक जारी करून तक्रार करण्याचे आवाहन केले होते. मात्र, काही महिन्यांत महापालिका प्रशासन निद्रिस्त झाले आहे, की हेतूपुरस्सर शांतता पाळली जात आहे, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.

आयुक्तांनी कारवाई करावी

महापालिका आयुक्त पारदर्शी कारभारासाठी आग्रही असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आयुक्तांनी कुठलाही राजकीय किंवा अन्य स्वरुपाचा दबाव झुगारुन अवैध होर्डिंग्जवर धडक कारवाई करण्याची मोहीम राबवावी अशी मागणी नाशिककरांकडून होत आहे.

क्षुल्लक गोष्टींसाठी पेव

एखाद्या परिसरातील लहान-मोठा ‘भाई’, खान्देश महोत्सव, विमानसेवेचा शुभारंभ, वधू-वर मेळावा, मुख्यमंत्र्यांचा दौरा, भागवत कथा, व्याख्यानमाला, हरिनाम सप्ताह अशा कुठल्याही निमित्ताने शहरात विविध चौकांमध्ये आणि रस्त्यालगत अवैध होर्डिंग्ज लावण्याचे पेव फुटले आहे. महापालिका प्रशासन कारवाई करीत नसल्याने होर्डिंग्ज लावण्याचे प्रमाण वाढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कलाप्रेमींवर ‘मोह’ची मोहिनी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवोदित कलाकारांना आपल्या कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‘मोह- द युनिक क्रिएशन’तर्फे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. आकर्षक रंगसंगती, सर्व वयोगटांना भावतील अशा ५० पेंटिग्ज, वॉल आर्टचे केलेले सादरीकरण कलारसिकांसाठी आकर्षणाचे ठरले. इंदिरानगर येथे हे तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

उभरत्या कलाकारांना व्यासपीठ मिळणे, त्यांच्या कला समोर येणे, त्यांच्यातील कलेला, कलाकाराला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचे ठरते. ‘मोह’ च्या या प्रदर्शनातून हा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कला आणि कल्पकतेचा अनोखा मेळ साधत या प्रदर्शनात विविध विषयांवर आधारित पेंटिग्ज, चित्रशिल्प साकारण्यात आले होते. घर, ऑफिसेस किंवा इनडोअर, आऊटडोअर वॉल डेकोरेशनकडे वाढता कल लक्षात घेत विविध कलाकारांनी सादर केलेली फ्युजन पेंटिंग्ज यामध्ये प्रदर्शित करण्यात आली होती.

आर्टिस्ट शुभांगी बैरागी यांच्या संकल्पनेतून तर मोहच्या नेहा डांगे, कौमुदी देषक, मैथिली नाचणे यांच्या प्रयत्नातून हे प्रदर्शन साकारण्यात आले होते. आगळीवेगळी शैली आणि रचनेच्या माध्यमातून साकारलेल्या कलाकृतींनी कलारसिक खरोखर ‘मोह’च्या प्रेमात पडल्याचे चित्र प्रदर्शनात दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉक लागल्याने विवाहितेचा मृत्यू

0
0


म. टा. वृत्तसेवा, कळवण

वीज वितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिनीच्या तारांवर पाणी पडल्याने कळवण शहरातील २५ वर्षीय विवाहितेचा शॉक लागून मृत्यू झाला.

बुधवारी (दि. २०) वरवंडी येथील योगेश चव्हाण यांची पत्नी व कळवण येथील माहेरवाशीण कोमल चव्हाण (वय २५) या सकाळी गच्चीवरुन झाडांना पाणी टाकत असताना घराजवळून गेलेल्या १३२ के.व्ही. उच्च दाबाच्या तारावर पाणी पडले. याचा जबर शॉक बसला. तसेच ऑग लागल्याने त्या ७० टक्के भाजल्या गेल्या. त्यांना तत्काळ नाशिक येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

नाशिक येथे दवाखान्यात चार दिवस उपचार केल्यानंतर रविवारी कोमल चव्हाण यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्या शुध्द‌िवर आल्या. त्यामुळे त्यांच्या परिवाराला खूप आनंद झाला. मात्र आज, सोमवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कळवण शहरात शोककळा पसरली आहे. कोमल या कळवण येथील दिलीप पगार यांच्या ज्येष्ठ कन्या असून वरवंडी येथे सोमवारी दुपारी साडेचार वाजता शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात पती, आई, वडील, सासू, सासरे, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्याची झोळी रितीच

0
0

केंद्र अन् राज्यातील सत्तेवर नजर ठेवून शहर विकासासाठी भरीव काही पदरात पडेल, या हिशेबाने वर्षभरापूर्वी झालेल्या पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत येवला शहरवासियांनी भाजपच्या झोळीत भरभरून मतांचे दान टाकले. यातून भाजपाच्या बंडू क्षीरसागर यांच्या रूपाने १५९ वर्षांचा शतकोत्तर इतिहास लाभलेल्या येवला पालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपाचे ‘कमळ’ फुलले. मात्र, गेल्या वर्षभरातील शहरातील विकासकामांवर कटाक्ष टाकला, तर काही भागात पुढे सरकलेली रस्ता काँक्रिटीकरणाची काही कामे वगळता रखडलेली महत्त्वपूर्ण भुयारी गटार योजना असो, की इतर शहरवासीयांच्या नजरेत भरेल असे कुठलेही विकासकाम अद्याप समोर आले नाही. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असूनही येवल्याच्या झोळीत त्याची फळे अद्याप न पडल्याने येथील पालिकेच्या सत्तेचा गाडा हा अडखळतच चालला आहे. अशातच विरोधकांच्या मते नगराध्यक्षांना अजूनही न सापडलेला सूर हा शहरवासीयांकरिता चिंतेचा अन् सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने चिंतनाचा विषय म्हणावा लागेल. गेल्या वर्षभरातील लेखाजोखा घेतल्यास आजही शहरातील सोयीसुविधा आणि समस्यांची आव्हाने कायम आहेत.

गटार योजनेची कोंडी कायम

पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्वीच्या सत्ताकाळात तत्कालीन मंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली आणि गेल्या दोन वर्षांपासून निधीअभावी बंद पडलेली शहरातील भुयारी गटार योजनादेखील शहरवासीयांच्या दृष्टीने काळजीचा विषय म्हणावा लागेल. २०१४ मध्ये सुरू झालेल्या या ४७ कोटी ३० लाखांच्या योजनेतील १२ कोटी ७३ लाखांचे काम संबंधित ठेकेदाराने केले आहे. झालेल्या कामापोटी शासनाकडून आलेल्या दोन कोटींच्या एका वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातील १ कोटी १० लाख रुपये पालिकेतील पूर्वीच्या सत्ताकाळात या ठेकेदारास अदा केले गेले होते. झालेल्या कामांपोटी उर्वरित बिल न मिळाल्याने गेल्या वर्षी हा ठेकेदार मुंबई उच्च न्यायालयाची पायरी चढला आहे. येवल्यातील ही भुयारी गटार योजना तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात केंद्र शासनाच्या ८० टक्के, तर राज्य व पालिकेच्या प्रत्येकी दहा टक्के निधीतून हाती घेतली होती. मात्र, केंद्रात सत्ताबदल होताना केंद्राकडून निधी न आल्याने योजनेचे काम बंद पडले आहे. गेल्या वर्षभरात तरी या योजनेची कोंडी न फुटल्याने हा चिंतेचा विषय ठरला आहे.

अनेक रस्ते खड्ड्यातच

भुयारी गटार योजनेचे काम हाती घेताना येवला शहरातील जवळपास सर्वच रस्ते खोदण्यात आले. भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाल्यावर पालिकेने शहरातील विविध रस्त्यांची कामे करण्यासाठी ७० कोटींचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे सादर केला होता. याशिवाय महावितरणचे रस्त्याच्या कडेला भुयारी वायरिंगचे कामदेखील प्रस्तावित होते. भुयारी गटार योजनाच तांत्रिक बाबींसह निधीच्या कोंडीत अडकल्याने शहरातील रस्त्यांच्या नेटवर्कचा प्रश्नही कायम राहिला आहे. गेल्या वर्षभरात शासनपातळीवर या भुयारी योजनेच्या बाबतीत गांभीर्याने न पाहिले गेल्याने शहरवासीयांपुढील सगळीच संकटे कायम आहेत.

नववसाहतींची उपेक्षा

येवला शहरातील नववसाहतींची उपेक्षा आजही कायम आहे. शहराच्या चारही बाजूला अगदी दूरवर जाळे विणलेल्या या वसाहतींमध्ये काही ठिकाणी झालेल्या काही रस्त्यांचा अपवाद वगळता जवळपास अनेक ठिकाणी पक्के रस्ते नाहीत. भुयारी गटार योजनेचे काम अनेक नववसाहतीत पूर्ण झालेले असल्याने जेथे या योजनेंतर्गत काम झाले आहे तेथील रस्त्यांची कामे तरी किमानपक्षी पालिकेने हाती घेणे गरजेचे होते.मात्र, याबाबत देखील वर्षभरात दमदार पाऊल पडले नाही.

भुयारी मार्गाचा प्रस्ताव पडून

शहरातून जाणाऱ्या मनमाड-नगर आणि नाशिक-औरंगाबाद या दोन राज्य महामार्गावरील शहरातील विंचूर चौफुली, फत्तेबुरूज नाका व गंगादरवाजा या तीन ठिकाणी शहरवासीयांचे सुरक्षित मार्गक्रमण व्हावे, यासाठी नगरपालिकेने काही वर्षांपूर्वी तयार केलेला सुमारे २५ कोटींचा भुयारी मार्गाचा प्रस्ताव पालिकेची आर्थिक क्षमता नसल्याने व शासनाकडून कुठलाही निधी न मिळाल्याने तसाच पडून आहे.

सेनापती तात्या टोपे स्मारक

येवल्याचे सुपुत्र तथा १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील थोर सेनानी सेनापती तात्या टोपे यांचे येवला शहरात स्मारक उभारणीसाठी केंद्र सरकारने पाऊल टाकले आहे. सुमारे साडेदहा कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या स्मारकासाठी पालिकेस ३ कोटी ९४ लाखांचा निधीदेखील प्राप्त झाला आहे. या स्मारकात माहिती केंद्र व शिल्पकृती गॅलरी, प्रदर्शन हॉल, वाचनालय व ऑडिओ व्ह‌िज्युअल हॉल, प्रतिकात्मक शिल्प गार्डन, संगीतावर आधारित कारंजे, लेसर शो आदी विविध सुविधा उपलब्ध असणार आहेत. या स्मारकासाठी नेमकी कुठली जागा निवडली जावी, यासाठी पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांत मतमतांतरे असली तरी, पालिकेने गेल्याच महिन्यात बाभूळगाव शिवारातील साठवण तलावानज‌िकची स्वतःच्या मालकीची ३.३० हेक्टर आर जागा उपलब्ध करून दिली आहे. शासनाची यास मंजुरी मिळताच या भव्य स्मारकाचे काम हाती घेतले जाणार आहे.

हरितपट्टा व खुल्या जागांचा विकास

शहर विकास आराखड्यात आरक्षित हरितपट्टा विकसित करण्याच्या कामासाठी राज्य शासनाकडून ५० लक्ष रुपयांचा निधी पालिकेस प्राप्त झाला आहे. या कामाचे लवकरात लवकर नियोजन केले जाताना त्यातून हा निधी खर्च केला जाणार आहे. याशिवाय राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून पालिकेस शहरातील खुल्या जागा विकसित करण्यासाठी दीड कोटींचा निधी प्राप्त झाला असून पालिकेने याबाबत नकाशे व अंदाजपत्रक तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. ही कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत.

रस्ते काँक्रिटीकरण अन् पाणीपुरवठा

शासनाच्या जिल्हास्तर नगरोत्थान योजनेंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षात सुमारे २ कोटी ७१ लाख ३२ हजार रुपयांच्या प्रशासकीय मान्यता असलेल्या शहरातील सुमारे ३१ रस्त्यांचे काँक्रिटीकरण कामांपैकी जवळपास ३० रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, एक काम प्रगतीपथावर आहे. पाणीपुरवठ्याबाबत पालिका प्रशासनाने वर्षभरात शहरातील जलवाहिन्यांची होणारी पाणी गळती यासह इतर अनुषंगिक कामे ‘यूआयडीएसएसएमटी’ सुधारित पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण केल्याने पाणीगळतीचे प्रमाण कमी झाला आहे.

शहर हागणदारीमुक्त?

केंद्र व राज्य शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत पालिकेने हागणदारी मुक्त कार्यक्रमात झोकून देऊन काम करताना वैयक्तिक शौचालये नसलेल्या शहरातील ७८५ कुटुंबाना शौचालायासाठी निधी उपलब्ध करून दिला. यातून येवला शहर हागणदारी मुक्त झाल्याचे ‘क्यूसीआय’ समितीने जाहीर केले आहे.

मोबाइल अॅपद्वारे स्वच्छतेचे पाऊल

स्वच्छता अभियांनातर्गत स्वच्छतेच्या सप्तपदीचा पुढचा टप्पा म्हणून पालिकेने स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ या दुसऱ्या टप्प्याचे काम सध्या हाती घेतले आहे. या अंतर्गत शहरातील जवळपास एक हजार मोबाइलवर स्वच्छता अॅप डाउनलोड करून त्या माध्यमातून नागरिकांच्या स्वच्छतेसंदर्भात ऑनलाइन तक्रारी पालिकेकडून स्वीकारल्या जाणार आहेत. आलेल्या तक्रारींचे २४ तासात निराकरण केले जाणार आहे.

‘एलईडी’ पथदीप

यापूर्वी पालिकेच्या वतीने शहरात पथदिपांसाठी वापण्यात येणाऱ्या ट्यूब, सोडियम व्हेपर, मर्क्युरी आदी बल्बमुळे पालिकेला मोठ्या प्रमाणात वीजबिलाचा भार पडत होता. यासाठी पालिकेने गेल्या काही दिवसांत शहरातील माधवराव पाटील संकुल ते पोल‌िस स्टेशन, पोलिस स्टेशन ते गंगादरवाजा, मेनरोड ते गावठाण भाग, तसेच नगर-मनमाड रोड या तीन परिसरांत सुमारे १६८ ‘एलईडी’ बल्ब बसविल्याने हा परिसर उजळला गेला आहे.

‘पेटीशॉप’ गाळ्यांचे लिलाव मार्गी

शहरातील विंचूर चौफुली परिसरात उभ्या राहत असलेल्या दोन संकुलापैकी पेटीशॉप संकुलातील २५ गाळ्यांचे बऱ्याच दिवसांपासून रखडलेले लिलाव गेल्या महिन्यात पार पडल्याने ‘ना परतावा प्रिमियम’च्या रुपाने पालिकेच्या तिजोरीत सुमारे सव्वादोन कोटींची रक्कम पडली. त्यातून नेहमीच खडखडाट असलेल्या पालिकेला मोठा हातभार लाभला. या गाळ्यांच्या लिलावातून मिळालेल्या रकमेतून पालिकेने गेल्या महिन्यात पालिकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांसह संवर्ग कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन,गेल्या कित्येक वर्षांपासून देणे बाकी असलेली सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तसेच सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम,संवर्ग कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन व रजा अंशदान, कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थांची थकीत रक्कम अशी एकूण १ कोटींच्या वर रक्कम दिली. पालिकेच्या विशेषतः पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांच्या या निर्णयामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उतारवयात या पुंजीमुळे मोठा दिलासा मिळाला, हे वास्तव नाकारून चालणार नाही.

नगराध्यक्ष म्हणतात...

विकासासाठी कट‌िबद्ध

शहरातील विविध विकास कामांसाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून आमच्याकडून शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. येवला शहरातील विविध विकासकामांसाठी १५ कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शहरातील रखडलेल्या भुयारी गटार योजनेबाबत काही तांत्रिक अडचणी असल्याने मुख्यमंत्र्यांनी नव्याने प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे. गेल्या वर्षभरात शहरातील रस्ते काँक्र‌िट‌िकरणाची अनेक कामे मार्गी लावली असून, शहरवासीयांना मुलभूत सोयीसुविधा देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेंतर्गत शहरातील खुल्या जागा व उदयाने विकसित करण्यासाठी पालिकेस जवळपास दीड कोटी रुपये, तर याच योजनेच्या वैशिष्टयपूर्ण अनुदानातून शहरातील रस्ते कामांसाठी नुकतेच सुमारे दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या सर्व कामांचे एस्ट‌िमेट तयार करण्यात आले असून, त्यास तांत्रिक मान्यता मिळताच विविध भागातील रस्ते काम हाती घेण्यात येईल.

- बंडू क्षिरसागर, नगराध्यक्ष

अधिकारी म्हणतात...

गरजेची कामे मार्गी

एक वर्षांच्या कालावधीत नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे नव्याने रस्ते, पाणीपुरवठा समस्या तसेच सांडपाणी व्यवस्था आदी मुलभूत गरजेची व्यवस्था होणे पालिकास्तरावरून अपेक्षित होते. मात्र, पालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ही कामे हाती घेता येत नव्हती. पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या सहा सात महिन्यांच्या कालावधीत पालिकेचा आर्थिक परिस्थितीचा गाडा काहिसा रुळावर आणून रखडलेली व प्राधान्यक्रमाने गरजेची असलेली कामे मार्गी लावण्यात आलेली आहेत.

- डॉ. दिलीप मेनकर, मुख्याधिकारी

विरोधक म्हणतात...

दिलासा देणारी कामे नाहीत

पालिकेच्या निवडणुकीनंतर शहरातील विधायक व विकासकामांच्या दृष्टीने आम्ही नगराध्यक्षांना पाठिंबा दिला. मात्र, गेल्या वर्षभरात नगराध्यक्षांनी शहरवासीयांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल असे कुठलेही विधायक काम केले नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल. त्यांच्याकडून शहरात जे एक ‘एलईडी’ पथदीपांचे काम झाले, त्यातही मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. या कामात भ्रष्टाचार झाला असल्यामुळेच आम्ही याबाबत शासनाकडे तक्रार केली आहे. नगराध्यक्षांनी या कामात खोटे बिल करून घोटाळा केल्याचे आम्ही पुराव्यानिशी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्याची जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने देखील नुकतीच चौकशी केली आहे. पालिकेतील विरोधक म्हणून येवलेकरांच्या दृष्ट‌िकोनातून पालिकेच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची भूमिका आम्ही निभावत असून यापुढील काळात देखील शहराचा विकास हेच आमचे एकमेव धोरण असणार आहे. याशिवाय येवला शहरात शासनाने बांधलेल्या नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळे आणि त्याबाबत पालिकेने ठरविलेले भाडे तसेच डिपॉझिट हे अन्यायकारक व खूपच अवास्तव आहे. यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागून पालिकेने ठरविलेले हे भाडे व डिपॉझिट कमी करण्यास येत्या काळात पालिकेला भाग पाडू.

- डॉ. संकेत शिंदे, पालिका गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस


पालकत्व निभावण्याची गरज

शहरातील अनेक कॉलनी भागातील रहिवाशी हे साधारण नोकरदार वर्ग आहेत. आर्थिक वर्ष संपण्याच्या अगोदरच सर्वच नागरिक इमाने इतबारे पालिकेला घरपट्टी, पाणीपट्टी व इतर सर्वच कर अदा करतात. मात्र, असे असतानाही रस्ते, ड्रेनेज, पथदीप व्यवस्था आदी मुलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत वर्षानुवर्षे कॉलनी भागातील नागरिकांची उपेक्षाच झाली आहे. शहरात पालिकेकडून विविध करांची वार्षिक आकारणी होताना याच कॉलनी भागातून पालिकेला मालमत्ता करासह इतर कररूपाने सर्वाधिक उत्पन्नाचा स्त्रोत मिळतो. मात्र, केवळ गावठाण भाग म्हणून शासन नियमावली व विकासकांकडे बोट दाखवत पालिका प्रशासन नववसाहतींकडे कायमच डोळेझाक करते, ही बाब अन्यायकारक आहे. शहरातील दूरवर विस्तारलेल्या अनेक वसाहतीमध्ये डांबरीकरण, सिमेंट काँक्रिट‌िकरणाच्या माध्यमातून पक्क्या रस्त्यांचे जाळे विणून पालिकेने खऱ्या अर्थाने पालकत्व निभावण्याची नितांत गरज आहे.

- विकास जाधव, नागरिक
(संकलन- संजय लोणारी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीच्या धडकेत विद्यार्थिनी ठार

0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

शैक्षणिक सहलीवरून परतलेल्या विद्यार्थिनीचा घरी पोहोचण्यापूर्वीच दापूर-सिन्नर रस्त्यावर दुचाकीच्या धडकेने अपघाती मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. अश्विनी सोपान आव्हाड (वय १७, रा. दापूर) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे.

येथील आदिती महाविद्यालयात विज्ञान शाखेत बारावीच्या वर्गात अश्विनी शिक्षण घेत होती. महाविद्यालयाची तीन दिवसांपूर्वी आळंदी आणि अन्य ठिकाणी शैक्षणिक सहल गेली होती. शनिवारी रात्री बाराच्या सुमारास सहलीसाठी गेलेल्या बसेस गावात परतल्या. पालक आपल्या मुलांना घेण्यासाठी गावात पोहोचले होते. अश्विनीचे वडील सोपान आव्हाड हेही दुचाकीवरुन तिला घेण्यासाठी गावात पोहोचले. दरम्यान वडिलांच्या दुचाकीवर बसण्यापूर्वीच रात्री दापूरकडून सिन्नरकडे भरधाव वेगात आलेल्या संदीप पालवे (वय २६) यांच्या दुचाकीने अश्विनीला जोराची धडक दिली. अश्विनीला उपचारासाठी तातडीने नाशिक येथे हलविण्यात आले. उपचार सुरू असताना त‌िची प्राणज्योत मालविली. पालवे यांच्या विरोधात वावी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेठजवळ भूकंपाचे सौम्य धक्के

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरापासून ४० किलोमीटरवर भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये काही वेळ घबराट पसरली. या भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सकाळी पावणेदहाच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे जम‌िनीला हादरे बसल्याचे, तसेच भिंती, दरवाजे, खिडक्यांची तावदाने हलल्याचे सांगितले जात आहे.

सुरुवातीला साधारणत: तीन मिनिटांच्या कालावधीत जमीन हादरली. त्यानंतर पुन्हा दोन धक्के बसले. त्याची तीव्रता अनुक्रमे १.३ व १.६ रिश्टर स्केल इतकी होती. अलीकडेच कळवण तालुक्यातील दळवटसह काही गावांनाही भूकंपाचे धक्के जाणवले होते. आता पेठजवळ धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भूकंपाचे निश्‍चित केंद्र माहीत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नागरिकांनी घाबरू नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी सांगितले.

अफवांवर विश्वास नको

भुकंपाचे धक्के जाणवले असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. या धक्क्यांची तीव्रता अतिशय कमी होती. त्यामुळे जीवीत वा वित्तहानी झालेली नाही. या भुकपांचे केंद्र शोधण्याचे काम सुरू आहे. वारंवार असे धक्के जाणवल्यास नागरिकांनी मोकळ्या जागी स्थलांतरीत होऊन तात्काळ तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवकांना संपर्क करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्या मुलीनंतर सावत्रभावाचीही आत्महत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथील १४ वर्षीय अल्पवयीन गर्भवती मुलीच्या आत्महत्येनंतर सहाव्याच दिवशी सोमवारी तिच्या सावत्रभावानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुदाम रामभाऊ निकम असे त्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आत्महत्यामागचे कारण शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरगाव येथील २३ वर्षीय शेतमजूर तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी सावरगाव येथील स्मशानभूमीनजीकच्या लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सुदाम रामभाऊ निकम असे या तरुणाचे नाव असून, त्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सुदाम हा दुसऱ्याच्या शेतात मजुरी करीत असून, बहिणीच्या आत्महत्येनंतर त्यानेही आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

सुदामची चौदा वर्षीय बहीण सावरगाव येथे आठवीत शिकत होती. तिने १३ डिसेंबर रोजी विष प्राशन केल्यानंतर तिला चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. तिने १६ डिसेंबर रोजी बाळाला जन्म दिल्यानंतर बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर २० डिसेंबर रोजी या मुलीचाही दवाखान्यात मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली होती. दोन दिवसांनी मुलीच्या वडिलांनी नांदगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मुलीवर अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याचे व तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आल्याने नांदगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र, बहिणीच्या आत्महत्येनंतर सहाव्याच दिवशी सोमवारी तिच्या सावत्रभावानेही आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुलीवर बलात्कार कोणी केला?

सुदाम अविवाहित होता. त्याच्या आत्महत्येसह आठवीतील मुलगी, तिचे बाळ अशा तिघांचा १६ ते २५ डिसेंबर या दहा दिवसांच्या काळात मृत्यू झाला. आठवीतल्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करणारा कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्याचा तपास लावणे आणि मुलीच्या सावत्रभावाने आत्महत्या का केली, याचे कारण शोधणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉर्निअर विमानाची ऑफर

0
0

एअर डेक्कनला विमान देण्याचा एचएएलकडून प्रस्ताव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)ने तयार केलेल्या १९ आसनी डॉर्निअर विमानासाठी एअर डेक्कन कंपनीला ऑफर दिली आहे. कंपनीने हे विमान भाड्याने घ्यावे आणि प्रवासी विमानसेवा द्यावी, असा प्रस्ताव एचएएलने एअर डेक्कनला दिला आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची चिन्हे आहेत.

एअर डेक्कन कंपनीने उडान योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यांतर्गत विमानसेवा देण्यासाठी प्रस्ताव दिला. तो मंजूर झाला. त्यानुसार भारतातील ३६ हून अधिक ठिकाणांसाठी एअर डेक्कनच्यावतीने सेवा दिली जाणार आहे. यासाठीच कंपनीने १९ आसनी विमानाची खरेदी केली आहे. दक्षिण आफ्रिकेहून कंपनीने दोन विमाने आणून सेवा सुरू केल्याचे सांगितले जात आहे. जळगाव, पुणे, मुंबई आणि नाशिक या शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेचा शुभारंभ शनिवारी नाशिक व जळगावमध्ये झाला. याप्रसंगी एअर डेक्कनचे चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कॅप्टन गोपीनाथ आणि एचएएलचे चेअरमन टी सुवर्ण राजू हे उपस्थित होते. याच सोहळ्याची दखल घेत एचएएलने डॉर्निअर हे विमान ओझर एचएएलच्या विमानतळावर आणले होते. या विमानाची निर्मिती कानपूर येथे झाली आहे. अशा प्रकारच्या डॉर्निअर विमान एचएएलने नौदल आणि हवाई दलाला दिले आहेत. आता हेच विमान प्रवासी वाहतूकीसाठी निर्माण करण्यात आले आहे. एचएएलकडे सध्या दोन डॉर्निअर विमाने आहेत. यातील एक विमान एअर डेक्कनने भाड्याने घ्यावे, असा प्रस्ताव एचएएलने एअर डेक्कनचे सीईओ गोपीनाथ यांना दिली आहे. डॉर्निअर हे विमान गोपीनाथ यांना ओझर येथे दाखविण्यात आले आहे.

सारे काही एचएएल करणार

डॉर्निअरसारख्या छोट्या विमानाची निर्मिती करून देशातील प्रवासी विमान वाहतुकीसाठी योग्य ती सुविधा निर्माण करण्याचा एचएएलचा प्रयत्न आहे. छोट्या विमानांद्वारे छोट्या शहरांना आणि वापराविना पडून असलेल्या विमानतळांना फायदा होणार आहे. त्याअनुषंगानेच एचएएलने डॉर्निअर विमानाचे मार्केटिंग सुरू केले आहे. भारतात निर्मिती झालेले हे अशा प्रकारचे पहिलेच प्रवासी विमान आहे. हे विमान भाड्याने दिले तरी त्याची देखभाल, दुरुस्ती एचएएलच करणार आहे.

डॉर्निअर विमान विक्री करण्यासह ते भाड्याने देण्याचाही आमचा विचार आहे. साधारण ५० कोटी रुपये किमतीचे हे विमान आहे. इच्छुकांनी आमच्याशी संपर्क करावा. जर कुणी ग्राहक मिळाला नाही तर एचएएल स्वतः प्रवासी विमानसेवा देईल. त्यासाठी योग्य त्या परवानग्या घेण्याचे कामही आम्ही करीत आहोत.

-टी सुवर्ण राजू, चेअरमन, एचएएल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रीमियम दरवाढीसाठी आमदारांना साकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

संभाव्य प्रीमियम दरवाढीमुळे शेतकऱ्यांसह विकसकांनाही फायदा होणार असल्याने महापालिकेच्या या सूचनेचा लोकप्रतिनिधी या नात्याने सकारात्मक विचार करावा , असे साकडे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी सोमवारी भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांना घातले.

मनपा प्रशासनाने सुचविलेली प्रीमियम दरवाढ लागू करण्यात यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी सानप यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. या संभाव्य प्रीमियम दरवाढीमुळे आरक्षित जमिनी असलेल्या शेतकऱ्यांचे, नाशिक मनपाचे ७० टक्के प्रीमियम दर करूनही पूर्वीच्या तुलनेत ३० टक्के दराने स्वस्त टीडीआर उपलब्ध होणार आहेत. रोखीने मोबदला दिल्यास महापालिकेला आरक्षित जागा ताब्यात घेताना मोठ्या प्रमाणात खर्च होतो, तर टीडीआमुळे महापालिकेच्या खर्चाची मोठ्या प्रमाणावर बचतच होते. गेल्या सतरा वर्षांच्या कालावधीत २१ कोटी ८८ लाख ३१६ चौरस मीटर इतके क्षेत्र महापालिकेने काहीही रक्कम खर्च करता ताब्यात घेतले. त्याची किंमत सुमारे २१८८ कोट रूपये इतकी होती. परिणामी महापालिकेची प्रतिवर्षी १२९ कोटी रूपयांची बचत होऊ शकली असाही तपशील या निवेदनात मांडण्यात आला आहे. याउलट प्रीमियम एफएसआय ४० टक्कयांवरून ७० टक्के केल्यास टीडीआरला भाव मिळू शकेल आणि शेतकरी आरक्षित जागेचा टीडीआर घेतील. परिणामी महापालिकेस मोबदल्याची आर्थिक झळही सोसावी लागणार नाही व ३० टक्के अधिक निधी मनपाच्या तिजोरीत जमा होणे शक्य होईल. याचा उपयोग स्मार्ट सिटीच्या संकल्पनेसाठीही होऊ शकतो, असे म्हटले आहे. या निवेदनावर कुंदन मौले , बाबासाहेब विधाते, वैभव विधाते आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम संस्थेस भागीदाराकडून चुना

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

भागीदारी तत्त्वावर सुरू केलेल्या बांधकाम व्यवसाय संस्थेस भागीदारानेच चुना लावल्याचे समोर आले आहे. अधिकार नसताना सदनिका विकून पैशांचा अपहार करत संस्थेची व खरेदीदाराची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण जगन्नाथ शिलेदार असे या फसवणूक करणाऱ्या भागीदाराचे नाव आहे.

नीलेश जयंतीलाल चंदन (वय ३७, मुलुंड पश्चिम, मुंबई) या बांधकाम व्यावसायिकाने नाशिकरोड पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. यानुसार नाशिकमधील किरण जगन्नाथ शिलेदार, तेजस शिवाजी खांदवे आणि ऋतुजा तेजस खांदवे या तिघा बांधकाम व्यावसायिकांसोबत भागीदारी तत्त्वावर डिसेंबर २०१२ मध्ये बांधकाम व्यवसाय करण्यासाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक करून मे. साई आकृती इस्टेट या बांधकाम संस्थेची सुरुवात केली होती. त्यानंतर या बांधकाम संस्थेने देवळालीगाव शिवारातील आनंदनगर येथे सर्व्हे नं. २९ मधील फ्लॉट नंबर एक विकत घेऊन त्यावर साई रेस‌िडेन्सी या इमारतीची उभारणी केली होती. या इमारतीतील सदनिकांची विक्री व हिशेबाचे अधिकार सर्वानुमते संस्थेतील भागीदार किरण शिलेदार यास दिलेले होते. या अधिकारांचा किरण शिलेदार याने गैरवापर करून सदनिका विक्री करताना रोख स्वरुपात पैसे स्वीकारले. या व्यवहारातील पैसे किरण शिलेदार याने संस्थेच्या बँक खात्यावर भरले नसल्याचे उघड झाल्याने मे २०१५ मध्ये किरण शिलेदारचे अधिकार संस्थेने काढून घेतल्याचे त्याला लेखी कळविले होते. असे असतानाही शिलेदार याने साई रेसिडेन्सी या इमारतीतील ७०२ क्रमांकाची सदनिका सप्टेंबर २०१५मध्ये प्रसाद मोरेश्वर अडमाने या ग्राहकास ५५ लाख रुपयांना परस्पर विक्री केली. शिवाय मे २०१७ मध्येही किरण शिलेदार याने सुधीर जगन्नाथ सिंग, रा. बख्तवली, ता. जि. सिवान (बिहार) या ग्राहकास साई रेसिडेन्सी या इमारतीतील फ्लॅट क्रं. ४०३ हा १९ लाख रुपयांना विक्री केला. या रकमेपैकी किरण शिलेदार याने पाच लाख रुपये चेकद्वारे, तर १४ लाख रुपये रोखीने स्वीकारत रकमेचा अपहार केला. याशिवाय भागिदारीत सुरु केलेल्या बांधकाम संस्थेच्या घटनेतील तरतुदींचेही उल्लंघन करून तेजस खांदवे, ऋतुजा खांदवे आणि सदनिका विक्री केलेल्या ग्राहकांची फसवणूक केली असल्याची फिर्याद नीलेश चंदन यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन नाशिकरोड पोलिसांनी किरण शिलेदार या बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच पक्षाच्या नगरसेवकांचा कामांवर दावा

0
0

राजन जोशी, सिडको

सिडकोत सध्या विकासकामांच्या श्रेयावरून नगरसेवकांमध्ये चांगलेच राजकारण सुरू झाल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांबरोबरच सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांमध्येही वादविवाद सुरू झाल्याने प्रत्येक पक्षात गटातटाचे राजकारण आजही सुरु असल्याचे वारंवार नागरिकांच्या लक्षात येत आहे.

सोशल मीड‌ियाच्या माध्यमातून आपण केलेल्या कामाची जाहिरात करण्याबरोबर हे काम आपणच केल्याचा दावा नगरसेवक करू लागले आहेत. सध्या केवळ श्रेयवादावरून लढाई सुरू झाली असली, तरी भविष्यात एकाच कामाचे दोनदा उद्घाटन झाले तर नागरिकांना आश्‍चर्य वाटणार नाही.

सिडकोतील सर्वच प्रभागांमध्ये रस्त्यांची परिस्थितीही ही गंभीर झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यांचे काँक्रिटीकरण तर काही ठिकाणी डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यांच्या विकासावरूनही राजकारण तापण्यास सुरुवात झाल्याचे दिसत आहे. येथील प्रभाग २४ मध्ये मागील काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर याच प्रभागातील अन्य एका नगरसेवकाने हे काम आपण मंजूर केल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर या प्रभागात तीन नगरसेवक एकाच पक्षाचे असूनही त्यांच्यात समन्वय होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे नक्की तक्रार कोणाकडे करावी यावरून नागरिकांचा संभ्रम होतो. या प्रभागात असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यानाची दुरवस्था झालेली असून, येथे अनेकदा नागरिक किंवा काही स्वयंसेवी संस्था स्वच्छता मोहीम राबवितात. मात्र, या प्रभागाचे तीनही नगरसेवक या उद्यानाच्या देखभालीकडे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर याठिकाणी कायमस्वरुपी सुरक्षारक्षकाची गरज निर्माण झाली आहे. या उद्यानात अनेकदा मद्याच्या बाटल्यासुद्धा आढळून आल्या होत्या. विकासाची संधी असलेल्या या प्रभागात तीनही नगरसेवकांनी एकत्रित काम केल्यास प्रभागातील सर्वच समस्या दूर होतील. याच प्रभागातील भाजी मार्केटमध्ये होणाऱ्या अतिक्रमणाचा प्रश्‍न प्रलंबित असून, केवळ एकच नगरसेवक यासाठी आवाज उठवित आहे. याच मार्केटजवळ असलेल्या एका अर्धवट बांधकामाच्या इमारतीमुळे दुर्गंधीयुक्त पाणी या इमारतीत साचून राहते. त्यामुळे या इमारतीबाबात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या ठिकाणी साचणाऱ्या पाण्यामुळे साथीचे रोगसुद्धा परिसरात वाढले आहेत.

नगरसेवकांमध्ये विसंवाद

नगरसेवकांनी या प्रभागात दोनदा आयुक्तांचा दौरा घडवून आणला होता. मात्र, त्यात तीनही नगरसेवक एकत्रित नसल्याने एकही मुद्दा अद्याप मार्गी लागला नसल्याचे दिसत आहे. सिडकोतील केंद्रबिंदू असलेल्या या प्रभागातच मागील महिन्यांत सर्वाधिक डेंग्यूंचे रुग्ण आढळून आले होते. यावेळीसुद्धा प्रत्येक नगरसेवकाने स्वतंत्र पाहणी केल्याने ठोस कारवाई होण्यास वेळ गेला. सुरुवातीला एका नगरसेविकेने याबाबत आवाज उठविला, तर दुसऱ्या वेळी आरोग्य सभापती आल्यानंतर दुसरेच नगरसेवक याठिकाणी उपस्थित राहिल्याने प्रभागातील नगरसेवकांची एकी दिसून आली नसल्याची चर्चा जोर धरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्यांमुळे बहरली धार्मिक पर्यटनस्थळे

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

महिन्यातील चौथा शनिवार, रविवार आणि नाताळ अशा सलग तीन सुट्या आल्यामुळे नाशिक शहर परिसरातील धार्मिक पर्यटनस्थळांवर गर्दी झाली होती. पंचवटीतील रामकुंड, कपालेश्वर महादेव मंदिर, काळाराम मंदिर, सीतागुंफा आणि तपोवन येथील मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. महाराष्ट्रासह गुजरात, राज्यस्थान आदी राज्यातून आलेल्या पर्यटकांनी धार्मिक पर्यटनाचा आनंद घेतला.

विविध धार्मिक विधींसाठी रामकुंडावर रोजच गर्दी होत असते. या गर्दीत सुट्ट्यांमुळे वाढ झाली. रामकुंडावर स्नान आणि त्यानंतर परिसरातील मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी गंगाघाट परिसरात लगबग होती. कपालेश्वर मंदिरातील पायऱ्यांवर रांगा लागल्या होत्या. अशाच रांगा सीतागुंफा आणि काळाराम मंदिरातही लागलेल्या होत्या. भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता.

बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांची मोठी वाहने गंगाघाट परिसरातील पार्किंगमध्ये पार्क करून धार्मिक पर्यटन स्थळावर हे भाविक आणि पर्यटक रिक्षांने जाणे पसंत करीत होते. या गर्दीमुळे रिक्षावाल्यांची दिवाळीच असल्याचे जाणवत होते. पर्यटकांच्या गर्दीबरोबरच मंदिराच्या आवारात रिक्षांचीही गर्दी झालेली होती. सीतागुंफा आणि काळाराम मंदिरातील दर्शनानंतर तपोवनातील कपिला संगमावरील श्रीरामपर्णकुटी आणि शूर्पनखा मंदिरातील दर्शनासाठी भाविक जात होते. सध्या गोदावरीला पाणी सोडण्यात नसल्यामुळे कोरड्या पडलेल्या गोदावरीचे दर्शन घेण्याचे वेळ भाविकांना आणि पर्यटकांना आली. त्यामुळे काही भाविकांनी नाराजी व्यक्त केले.

रेल्वेला गर्दी
सलग तीन दिवस शासकीय सुट्या जोडून आल्यामुळे नाशिकरोड रेल्वेस्थानकात गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. रेल्वेला चांगला महसूल मिळाला. रिक्षा, एसटी तसेच नाशिकरोड स्थानकासह परिसरातील व्यावसायिकांना अच्छे दिन आले.

चौथा शनिवार, रविवारची साप्ताहिक सुटी आणि सोमवारी नाताळ अशा तीन सुट्यांमुळे नाशिककरांनी मुंबई व अन्य पर्यटनस्थळी जाण्याला पसंती दिली. मुंबईला जाणाऱ्या राज्यराणी, गोदावरी आणि पंचवटी या गाड्यांना विशेष गर्दी झाली होती. अनेकांनी उभे राहून प्रवास केला. नाशिकरोड रेल्वे स्थानकातून दररोज शंभरावर रेल्वेगाड्यांची ये-जा असते. त्यामध्ये मध्यम बरोबरच लांब पल्ल्यांच्या गाड्यांचाही समावेश आहे. दररोज सरासरी पंधरा हजार प्रवासी नाशिकरोड स्थानकातून प्रवास करतात असे सूत्रांनी सांगितले.

गेले तीन दिवस शासकीय सुटी असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांची चंगळ झाली. रेल्वे हा देखील शासकीय उपक्रम आहे. मात्र, रेल्वे अत्यावश्यक सेवा प्रकारात मोडत असल्याने हे कर्मचारी ड्युटीवर हजर होते. तिकीट तपासणीस, बुकिंग, पार्सल, रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिस आदी विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. सुट्यांमुळे गर्दी वाढल्याने त्यांच्यावरील ताण वाढला होता. गर्दीच्या काळात पाकीटमार, गुंड प्रवृत्तीचे लोक उचल खातात. त्यामुळे त्यांच्या बंदोबस्तासाठी रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिस दक्ष होते. दरम्यान, रेल्वेस्थानकातील रिक्षा व टॅक्सी चालकांना गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मीदर्शन होत नव्हते. सलग तीन दिवस सुट्या आल्यामुळे त्यांचीही आर्थिक चणचण दूर झाली. स्थानकातच चहा, खाद्यपदार्थ विक्रेते, फळ विक्रेते, फेरीवाले यांचाही चांगला व्यवसाय झाला. स्थानकातील कुलींनाही चांगली कमाई झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णांनी सुविधांचा लाभ घ्यावा

0
0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धुळ्यात आवाहन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्यातील कॅन्सरचा गरिबातला गरीब रुग्ण आर्थिक परिस्थितीअभावी वंचित राहता कामा नये. त्यासाठी सरकारच्या विविध योजना अंमलात आहेत. कुठलाही आजार असेल त्यासाठी मोफत उपचारांच्या सुविधा सरकारने उपलब्ध केल्या असून, त्या सुविधांचा लाभ जनतेने घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते सोमवारी (दि. २५) धुळ्यात खासगी हॉस्पिटलच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते.

देशासह राज्यभरात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यात तरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. पण कॅन्सरग्रस्त रुग्ण योग्य उपचाराने बरा झाल्यानंतर त्याच्या कुटुंबांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आशीर्वाद ही खरी डॉक्टरांची संपत्ती असते, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सुरत-नागपूर महामार्गालगत शहराजवळील चक्करबर्डी परिसरात खान्देश कॅन्सर सेंटरचा भूमिपूजन सोहळादेखील झाला. कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल. पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, डॉ. बीना भामरे, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, पोलिस अधीक्षक एम. रामकुमार उपस्थित होते.

'बडबड करणाऱ्यांचे नुकसान होते'

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी भाषण करताना, कॅन्सरतज्ज्ञ हा आकाशाकडे न पाहता खाली मान घालून शस्त्रक्रिया करतो. यातून त्या डॉक्टरांची नम्रता सिद्ध होते. जे अशारितीने काम करतात त्यांना यश निश्चित मिळते. मात्र जे अनावश्यक बडबड करतात त्यांचे नेहमीच नुकसान होते, असा टोला त्यांनी लगावला.

श्रेयाचा मुद्दा पुन्हा गाजला

सिंचन प्रकल्पाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील सिंचन प्रकल्पांना केंद्राची मान्यता मिळावी म्हणून मी व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेला होतो. त्यावेळी पंतप्रधानांच्या सचिवांनी स्वत: विचारले की, मंत्री डॉ. भामरे यांचीही सिंचन प्रकल्पांची मागणी आहे. त्यावर मी सुलवाडे-जामफळ प्रकल्पाबाबत माहिती दिली. त्यांनी तत्काळ प्रकल्पाला मंजुरीची तयारी दर्शविली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलेल्या खुलाशामुळे मंत्री डॉ. भामरे यांनीच 'सुलवाडे-जामफळ'साठी निधी आणला असल्याचे स्पष्ट झाले. तर मुख्यमंत्र्यांच्या या प्रकल्पाच्या माहितीवरून आमदार अनिल गोटे यांचा फज्जा झाला आहे. कारण गेल्या काही महिन्यांपूर्वी आमदार गोटेंनी पत्रकार परिषदेत या सिंचन प्रकल्पाबाबत श्रेयाचा मुद्दा उपस्थित केला होता.

शहरातील गजानन कॉलनीत २१ डिसेंबर रोजी रात्री दोन गटात दंगल झाली होती. या दंगलीची पोलिसांत नोंद होऊन पोलिसांनी निरपराधांवर भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना केवळ दगडफेकीची असून, यासंदर्भात कलम ३०७ अन्यायकारक असल्याने ते वगळण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेचे महानगरप्रमुख सतीश महाले यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सही-शिक्क्याचा गैरवापर

0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक विभाग अपर आयुक्तांच्या बनावट सही शिक्क्याचा वापर करून खोटी नोटीस पाठविल्याचा प्रकार नाशिक विभागीय अप्पर आयुक्त कार्यालयातील ग्रामपंचायत अपिल शाखेत उघडकीस आला आहे. विभागस्तरावरील अत्यंत संवेदनशिल अशा या कार्यालयाच्या सही शिक्क्यांचा बनावट नोट‌ीससाठी वापर करुन चक्क पोस्टाद्वारे नोटीस पाठविण्यात आल्याचा प्रकार अपर आयुक्तांच्या प्रसंगावधानाने उघडकीस आला. परंतु यामुळे बनावट नोट‌िसा पाठविणारे रॅकेट नाशिक विभागात कार्यरत असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिकरोड येथे विभागीय अपर आयुक्त कार्यालय आहे. या कार्यालयात नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातील महसूल, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, राष्ट्रीय महामार्ग या अपिलीय शाखांशिवाय इतर काही महत्त्वाच्या कायद्यांशी संबंधित अपील दाखल होतात. विशेष म्हणजे सध्याचे अपर आयुक्त ज्योतिबा पाटील यांनी गेल्या दहा वर्षांपासून रेंगाळलेली शेकडो अप‌िल अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत निकाली काढून शासनाच्या इ-डीसनिक प्रणालीवर नोंदविण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे अप‌िल निकाली काढण्यात नाशिक विभाग राज्यात अव्वल स्थानी पोहचण्यास मदत झाली. मात्र याच कार्यालयाचा बनावट शिक्का वापरुन चक्क अपर आयुक्तांच्या सहीचा वापर करुन बनावट नोटीस पाठविल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. या प्रकारामुळे अपर आयुक्त कार्यालय दक्ष झाले असून सरकारतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास आस्थापना शाखेतील कक्ष अधिकारी शरद शिवदास पवार यांनी अशा प्रकारची बनावट नोटीस तयार करणाऱ्या अज्ञाताविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

अशी असते खरी नोटीस

नाशिक विभागीय अपर आयुक्त कार्यालयात दाखल नाशिक महसूल विभागातील अपिलांसंदर्भात पक्षकारांना विकास आस्थापना शाखेतील सहाय्यक गटविकास अधिकारी (प्रशासन) आपल्या सहीनिशी नोट‌िसा काढतात. नोट‌िसांवर विभागीय अपर आयुक्तांची नावानिशी सही नसते. मात्र जळगाव जिल्ह्यातील सावखेडेसीम येथील प्रकरणातील बनावट नोट‌िसीवर अपर आयुक्तांची सही व शिक्का असल्याने हा प्रकार उघड झाला.

जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य अपात्रतेच्या प्रकरणात बनावट नोटीस प्राप्त झाली आहे. कुणीतरी परस्पर अशा प्रकारची नोटीस पाठविली आहे. अशा प्रकारचे गैरकाम करणारी शक्ती भविष्यात बळावू नये यासाठी या बनावट नोटीस प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
- ज्योतिबा पाटील
(विभागीय अप्पर आयुक्त, नाशिक विभाग)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तो’ बनलाय अबोलांचे शब्द

0
0

नाशिक : मानवाच्या विकासात आधुनिक संसाधनांची कितीही रेलचेल असली तरीही त्याचा खरा विकास हा भाषेशिवाय शक्य नाही. मात्र, काहींच्या तोंडी निसर्गत:च भाषा प्रकटत नाही. दुर्दैवाचा कळस म्हणजे त्यांची श्रवणेंद्रियेही शब्दांना साद देण्यास समर्थ नसतात. अशाच अभागी माणसांच्या दुनियेत २७ वर्षांचा एक तरुण वावरतो, तो केवळ मूकबधिरांच्या दुनियेतील शब्द बनून. सचिन पाटील असे या तरुणाचे नाव. मूकबधिरांच्या जीवनात दुभाषीच्या भूमिकेत वावरत आशावाद फुलविण्याचा प्रयत्न सचिन करतो आहे. प्रथमदर्शनी कोणालाही ही व्यक्ती बोलते असे वाटणार नाही, इतका सहजपणा मूकबधिरांच्या खाणाखुणांच्या भाषेत त्याने अवगत केला आहे. त्यामुळेच दिव्यांग मेळाव्यांमध्ये तो प्रत्येकाच्या कौतुकाचा विषय तो ठरतो आहे.

साधारण दहा वर्षांपूर्वी सचिनमधील सामाजिक भावना जागी करण्यास त्याच्या घराशेजारील एक मूकबधिर मुलगा कारणीभूत ठरला. कोणाशीही बोलताना या मुलाला कागद पेनचेच साह्य घ्यावे लागत होते. या अडचणीमुळे अनेकदा त्याने आपल्या भावना व्यक्त करणेही कमी केले. सचिनला या मुलाची परिस्थिती पाहवली नाही आणि त्याने त्याच्या खाणाखुणांची भाषा शिकण्याचा निर्णय घेतला. अवघ्या चार महिन्यांत ही भाषा अवगत करून जेथे जेथे मूकबधिरांना गरज पडेल, तेथे धाव घेत त्याने मदत करणे सुरू केले. या संवेदनेच्या जोरावर मूकबधिरांच्या दुनियेतील विवाहेच्छू उमेदवारांच्या गाठीही या शब्दकळांच्या जोरावर बांधून अनोखे पुण्यही पदरात पाडले आहे. राज्यभरात दिव्यांगांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या वधू-वर परिचय मेळाव्यात मूकबधिर वर-वधूंच्या भावना पोहोचवण्यासाठी तो कोणत्याही अपेक्षेविना दाखल होतो. नाशिकमध्ये सोमवारी झालेल्या दिव्यांग मेळाव्यातही त्याने अशीच अचानक हजेरी लावली अन् मूकबधिर व्यक्तींच्या भावनांना शब्द दिले.

‘त्यांच्या’ रोजगारासाठीही काम

मूकबधिर व्यक्तींपुढे रोजगार मिळत नसल्याची समस्या जाणून घेत सचिन यांनी स्वतःच्या कपड्यांच्या दुकानात तीन मूकबधिर तरुणांना नोकरी दिली आहे. याशिवाय विविध ठिकाणी कपड्यांचे स्टॉल्स लावून त्याचे कामही अशाच व्यक्तींकडे त्याने दिले आहे. एकूण २५ मूकबधिर व्यक्तींना यातून त्यानी रोजगाराची संधी दिली आहे. मूकबधिरांसाठी सुरू असलेल्या या समाजकार्यामुळेच राज्यातील सुमारे दोन हजार मूकबधिरांशी सचिन पाटील जोडले गेले आहेत.

मूकबधिर मुलांच्या भावना जाणून घेत मी हे काम करतो आहे. यासाठी मी कधीही कोणाची आर्थिक, भावनिक मदत मागितलेली नाही. या मुलांसाठी काम करून मिळत असलेला आनंद कोणत्याही इतर गोष्टींपेक्षा मोठी आहे.

- सचिन पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सात सायकलिस्ट्सची ‘सायकलिंग ब्रेव्हे’ पूर्ण

0
0

एक हजार किमीचे अंतर केले पार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये प्रथमच आयोजित केली गेलेली एक हजार किमी सायक्लिंग ब्रेव्हे सात सायकलिस्टसने निश्चित वेळेत यशस्वीपणे पूर्ण केली. एकूण १२ सायकलिस्टसने या ब्रेव्हेसाठी नोंदणी करून सुरुवात केली होती. यापैकी नाशिकचे आनंद गांगुर्डे यांनी ६२ तासांत नाशिक - रतलाम (मध्य प्रदेश) - नाशिक हे एक हजार किमीचे अंतर पूर्ण केले. तर अनिल कहार, किशोर काळे, विजय काळे, अॅड. दत्तात्रेय चकोर, पुण्याचे अमोल कानवडे यांनी ७४ तासांत, तर मुंबईचे सचिन भोसले यांनी ७४.५ तासांत ब्रेव्हे पूर्ण केली. शुक्रवारी (दि. २२) ही एक हजार किमीची ब्रेव्हे मुंबई नाका, नाशिक येथून सकाळी ६ वाजता सुरू करण्यात आली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरून सरळ मध्य प्रदेशातील मानपूर- रतलाम आणि पुढे नामली या नाशिकपासून ५०३ किमी अंतरावर असलेल्या गावातून यू टर्न घेत त्याच मार्गाने सायकलिस्टस नाशिककडे परतले. एकूण १००६ किमीचे अंतर पूर्ण करण्यासाठी ७५ तासांची वेळ दिलेली होती. यात झोप, पोषण आणि नैसर्गिक विधींना लागणाऱ्या वेळेचा समावेश आहे. आपत्कालीन व्यवस्थेसाठी ब्रेव्हेच्या मार्गावर एक वाहन उपलब्ध होते. यात निखिल भावसार आणि संदीप परब यांनी पूर्ण ७५ तास सायकलिस्टसची देखरेख पाहिली.

रिटर्न लूप

नाशिक सायकलिस्ट्स फाऊंडेशनच्या सहकार्याने डॉ. महेंद्र महाजन गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून सायकलिंग ब्रेव्हे सुरू केली आहे. हे ब्रेव्हे ऑडेक्स इंडिया रँडेनॉर आणि ऑडेक्स क्लब पॅरिसन, फ्रान्स यांच्याश संलग्न असून पहिली २०० किमीची ब्रेव्हे एप्रिल २०१४ मध्ये करण्यात आली होती. यानंतर डॉ. महाजन यांनी नाशिक परिसरातील विविध मार्गांवर २००, ३००, ४०० आणि ६०० किमी ब्रेव्हे यशस्वीरित्या आयोजित केल्या आहेत. या सर्व ब्रेव्हेचे मार्ग नाशिक शहरातून सुरू होत शहरातच समाप्त होणारे (रिटर्न लूप) आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी सैनिकांच्या आरक्षणावर पाल्यांचा डल्ला

0
0

नाशिक : सरकारी नोकरीत जातीनिहाय, तसेच प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक पाल्य, आर्थिकदृष्ट्या मागास आदी घटकांसाठी आरक्षणाचा कोटा ठरवून दिलेला असतो. त्याचा गैरफायदा नोकरीसाठी झालेल्या तीव्र स्पर्धेच्या वातावरणात घेतला जात असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

विशेषतः प्रकल्पग्रस्त आणि माजी सैनिकांच्या आरक्षणासंदर्भात नियमांची मोडतोड केली जात असल्याचे उघड होत असून, गेल्या काही दिवसांत आरोग्य खात्यात झालेल्या भरतीप्रक्रियांमध्ये आरक्षणाची संशयास्पद कागदपत्रे सादर झाली आहेत. मात्र, त्याची चौकशी करण्याची तसदी घेतली जात नाही. कामगार विमा योजनेंतर्गत ईएसआयएसी हॉस्पिटलमध्ये परिचारक पदासाठी दोन महिन्यांपूर्वी भरतीप्रक्रिया पार पडली. लेखी परीक्षेनंतर निवड झालेल्या परीक्षार्थींच्या यादीत जवळपास ३९ जणांना माजी सैनिकांसाठी असलेल्या आरक्षणाचा फायदा झाला.

माजी सैनिकांच्या आरक्षणाची व्याख्या

या प्रकरणी तक्रार करणाऱ्या संदीप मोरे यांनी सांगितले, की माजी सैनिकांना देण्यात येणाऱ्या आरक्षणाची व्याख्या स्पष्ट आहे. माजी सैनिकांसाठी असलेल्या आरक्षणाचा वापर फक्त संबंधित सैनिकांसाठीच करणे आवश्यक असते. जर एखादा सैनिक शहीद झाला किंवा अपंग झाल्यास त्याची पत्नी किंवा त्यावर अवलंबून असलेली एक व्यक्ती या आरक्षणास पात्र ठरते. कायद्यानेच ही व्याख्या ठरवून दिली आहे. मात्र, सध्या या आरक्षणाचा फायदा कोणत्याही युद्धात जखमी न झालेल्या माजी सैनिकांचे पाल्य घेत आहेत. माजी सैनिकांच्या पाल्यांचा आरक्षणाशी संबंध येत नाही. मात्र, या नियमाकडे सर्रास दुर्लक्ष होते. यामुळे इतर उमेदवारांवर अन्याय होतो. या आरक्षण पद्धतीचा फायदा घेऊन नोकरी पदरात पाडून घेण्याचा प्रकार गंभीर असून, या विरोधात आपण थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. ​ (क्रमशः)

सरकारच्या ३० एप्रिल २०१३ आणि २ सप्टेंबर १९८३ नुसार माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या १५ टक्के आरक्षणाचा फायदा घेऊन ईएसआयएसी हॉस्पिटलमध्ये माजी सैनिकांच्या पाल्यांनीच नोकऱ्या मिळवल्या. वास्तविक, त्यांचे पालक शहीद अथवा अपंग नाही. कोणत्याही कागदपत्रांची चौकशी न करता ही भरतीप्रक्रिया झाल्याचे दिसते. याची चौकशी व्हावी.

- संदीप मोरे, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजी भाषेची घुसखोरी रोखणे गरजेचे

0
0


म. टा. वृत्तसेवा, येवला

प्रचलित असलेल्या मराठी भाषेत इंग्रजीचे होत असलेली घुसखोरी हा मराठी मनाच्या दृष्टीने मोठा चिंतेचा विषय आहे. ही घुसखोरी थांबविण्यासाठी आपण सर्वांनीच आपल्या मराठी भाषेचा वापर सर्व क्षेत्रात करण्याची नितांत गरज आहे. असे केले गेले तरच मराठी भाषा टिकेल, असे प्रतिपादन साहित्यिक व विचारवंत नंदन रहाणे यांनी केले.

येवला शहरात सुरु असलेल्या तीन दिवसीय ‘सेनापती तात्या टोपे’ व्याख्यानमालेतील रविवारच्या दुसऱ्या दिवसाचे ‘मराठी भाषा व आपण’ या विषयावरील दुसरे पुष्प गुंफताना नंदन रहाणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त अभियंता तथा येवला बाजार समितीचे तज्ञ संचालक साहेबराव सैद हे होते. यावेळी बोलतांना नंदन रहाणे यांनी मराठी भाषेचा जन्म व त्यानंतर काळानुरूप मराठी भाषेचा झालेला विकास आणि बदल यावर अत्यंत सखोल माहिती दिली. येवला व्यापारी बँकेचे चेअरमन पंकज पारख, नगरसेविका शितल शिंदे, कृषी उद्योजक अनिरुद्ध पटेल यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. माजी आमदार मारोतराव पवार, नगरसेवक प्रविण बनकर, रश्मी पालवे, भास्कर पालवे, तात्या लहरे, उत्तमराव शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन व्याख्यानमालेचे कार्याध्यक्ष किशोर सोनवणे यांनी केले.

देशात महापुरुष जन्माला आल्यामुळेच जगाच्या पाठीवर आज आपला देश अग्रेसर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशावर अनेक आक्रमणे झाली. अनेक विद्रोही आणि विघातक कारवाया इतिहासात झाल्या. आजच्या वर्तमानात देखील त्या होत आहेत. तरी देखील आजही या देशातील संस्कृती टिकून आहे. याचे कारण म्हणजे या देशाला आजवर लाभलेले महान संत.देशाच्या संस्कृती रक्षणात वारकरी संप्रदायाचे महत्वपूर्ण योगदान, असे प्रतिपादन नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलचे कार्याध्यक्ष डॉ. प्रकाश पाठक यांनी केले. सेनापती तात्या टोपे व्याख्यानमालेचा शनिवारी श्रीगणेशा झाला. व्याख्यानमालेतील पहिल्या दिवसाचे ‘वारकरी संप्रदायाचे सामाजिक योगदान’ या विषयावरील पुष्प गुंफताना डॉ. पाठक बोलत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपासना, कॅरल्सने ख्रिसमस साजरा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाउपासना, प्रवचन, वॉच नाईट सर्व्हिस, केकवाटप, कॅरल्सचे गायन असा सर्वसमावेशक ख्रिसमस सोमवारी शहरातील सर्व चर्चमध्ये आनंदात साजरा करण्यात आला. बेल्स, चांदण्या, फुले, ख्रिसमस ट्री, रोषणाईने सजलेले चर्च, प्रत्येक चर्चमध्ये उभारलेला बाळ येशूचा जन्मदेखावा शहरवासियांसाठी आकर्षण ठरले.

ख्रिश्चन धर्म‌ियांसाठी ख्रिसमस हा सण पवित्र व आनंदाचा असतो. नाशिकमध्येही ख्रिश्चन ध‌र्मियांची संख्या मोठी असल्याने चर्चमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यांमध्ये ख्रिसमसच्या आदल्या दिवशी रात्री वॉच नाईट सर्व्हिस, सहभागिता चर्चतर्फे केक वाटप करण्यात आले. तर ख्रिसमसच्या दिवशी सकाळी ६.३० वाजता सकाळची भक्ती, सहभागिता, महाभक्ती, केकवाटप करण्यात आले. शरणपूर रोडवरील संत आंद्रिया चर्चमचे प्रीस्ट इन चार्ज रेव्ह. अनंत आपटे यांनी ख्रिसमस साजरा करण्यामागील उद्देश, ख्रिसमस कसा साजरा करावा हे सांगितले. ख्रिसमस म्हणजे केवळ सान्ता क्लॉज नसून तो केवळ त्यातील एक भाग असल्याचे त्यांनी संदेश देताना सांगितले. तसेच बायबलमधील संदेशही सांगितले. त्र्यंबकनाका येथील होली क्रॉस चर्च, संत आंद्रिया चर्चबरोबरच शहरातील इतर चर्चमध्येही प्रार्थनेसाठी मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी धार्मिक गीतांचे, कॅरल्सच्या गायनाचा आनंद ख्रिश्चन बांधवांनी घेतला.

आठवडाभर कार्यक्रमांची रेलचेल

आज (२६ डिसेंबर) संडे स्कूलच्या मुलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर २७ डिसेंबर रोजी संडे स्कूलच्या मुलांना चर्चतर्फे बक्षीसवाटप, विभागवार कार्यक्रम २८ डिसेंबर रोजी बेथलेहेम रॅली, २९ डिसेंबर रोजी साधू सुंदर सिंह यांच्या जीवनावरील चित्रपट व मुख्य कलाकरांची साक्ष कार्यक्रम होणार आहे. तर ३० डिसेंबर रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, ३१ डिसेंबर रोजी वॉटनाइट सर्व्हिस, १ जानेवारी रोजी भक्ती करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीसॅट’चे गुण ग्राह्य धरा

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत पेपरक्रमांक दोन ‘सीसॅट’चे गुण केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरण्यात यावेत. हा निकाल पेपर क्रमांक एक ‘जीएस’च्या गुणांवर लावण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

राज्याच्या विविध भागांमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातून तयारी करतात. या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे पारंपरिक विद्याशाखांमधून पदवी धारण करणारे आहेत. मात्र इंज‌नििअरिंगसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची पदवी धारण करणारे बहुसंख्य विद्यार्थी हे शहरी भागातील आहेत. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या ‘सिसॅट’ या पेपरची तयारी करणे अवघड जाते. या तुलनेत व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील विद्यार्थी या पेपरची

तयारी अधिक क्षमतेने करू शकतात, असे संघटनेचे म्हणणे आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) परीक्षा पद्धतीत चार वर्षांपूर्वी बदल केले होते. त्या परीक्षेत पेपर क्रमांक दोन ‘सीसॅट’चे गुण हे केवळ परीक्षेच्या निकालासाठी पात्र होण्यासाठी ग्राह्य धरले जातात. परीक्षेचा निकाल हा पेपर क्रमांक एक ‘जीएस’च्या गुणांवर लावण्यात येतो. देशातील विद्यार्थ्यांनी सीसॅटचे गुण केवळ पात्रतेपुरते करण्यासाठी यूपीएससीकडे तक्रारी केल्या होत्या.

एमपीएससीचे दुर्लक्ष

यूपीएससीने विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून सीसॅट पेपरचे गुण केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला होता, असे संघटनेचे म्हणणे आहे. एमपीएससीच्या बाबतीतही विद्यार्थ्यांनी त‌चि मागणी केली असताना त्याकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.



सीसॅटचे गुण ग्राह्य धरण्यात यावेत. त्या पेपरची काठिण्यपातळी पाहता जनरल नॉलेजच्या पेपरच्या बरोबरीने या पेपरचा अभ्यास करावा लागतो. त्यात आमचा खूप वेळ जातो.

-शुभांगी पाटील, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images