Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आता सरसकट १८ टक्के करवाढ

$
0
0

आयुक्तांचा भरमसाट करवाढीचा प्रस्ताव फेटाळला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेवर ठेवलेला ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंतच्या मालमत्ता करात भाडेमूल्याच्या आधारे भरमसाट करवाढीच्या प्रस्तावाला सर्वच स्थरावरून विरोध झाल्यानंतर सत्ताधारी भाजपने करवाढीसंदर्भात नमते घेतले आहे. मुंढेंनी ठेवलेला करवाढीचा तीन टप्प्यातील ठराव महापौरांनी फेटाळून लावला असून, स्थायी समितीच्या सरसकट १८ टक्के भाडेमूल्यावर आधारीत करवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी, आयुक्त मुंढेंना मात्र जोरदार झटका बसला आहे.

नव्या करवाढीच्या प्रस्तावामुळे महापालिकेच्या तिजोरीत १२ कोटी ६० लाखांची भर पडणार आहे. परंतु, या ठरावावरून महापालिकेत पुन्हा मुंढे विरुद्ध भाजप असा संघर्ष उभा राहणार आहे. नूतन आयुक्त तुकाराम मुंढेंनी सूत्रे हाती घेताच तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या काळातील प्रस्तावात सुधारणा करीत त्यात भरघोस वाढ केली होती. निवासी मालमत्ता करात ३३ टक्के, अनिवासी मालमत्ता करात ६४ तर औद्योगिक मालमत्ता करात तब्बल ८२ टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्यााच प्रस्ताव ठेवला होता. तसेच, भांडवली मूल्यावर आधारित करवाढीचा आग्रह प्रस्तावात धराला होता. मात्र, सत्ताधारी भाजपने हा प्रस्ताव फेटाळून लावत सरसकट १८ टक्के करवाढीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नाशिककरांना थोडा दिलासा मिळाला आहे. विरोधी पक्षांनीही महापौरांचे या निर्णयाचे स्वागत केले आहे.

प्रशासनाने प्रथम ठेवलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. करवाढीसंदर्भात सर्वंकष विचार करूनच निर्णय घेण्यात आला असून, सर्वसामान्य नागरिक ते उद्योजकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. उत्पन्न वाढविण्याचेही प्रयत्न केले आहेत.

- रंजना भानसी, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ठाकूर समाजबांधवांसाठी आज कायदेविषयक कार्यशाळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

गेल्या १५ ते १८ वर्षांपासून वैधता प्रमाणपत्रासाठी ठाकूर समाजाचा प्रचंड संघर्ष सुरू आहे. त्यामुळे चिंताग्रस्त असलेल्या समाजबांधवांना कायदेविषयक अडचणी आणि सरकारच्या वतीने अल्पसंख्यांक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना यांची माहिती होण्यासाठी कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक जिल्हा ठाकूर समाज मंडळाच्या वतीने आज ( दि. ४) सकाळी १०:३० वाजता गंगापूर रोड येथील विश्वास लॉन्स येथे हे आयोजन केले आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, त्या अनुषंगाने येणारे आदेश व समाजाच्या विविध विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी जेष्ठ विधीत्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. त्यात अॅड. रामचंद्र मेंदाळकर, अॅड. महेश देशमुख, अॅड. अनिल गोळेगावकर, अॅड. आनंदसिंग बायस, अॅड. सुशांत ऐरमवार आदी मार्गदर्शन करतील. या वेळी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात आपल्या अडचणींवर ते मार्गदर्शन करणार असून, त्यासाठी लिखित स्वरूपात आपले प्रश्न कार्यशाळा सुरू होण्याआधी द्यायचे आहेत.

तांत्रिक अडचणींचे शंका निरसन होणार

ठाकूर समाजबांधव जमातीच्या सवलतीचा शासकीय नोकरी, शालेय शिक्षण, व्यवसायासाठी लाभ घेत असून, त्यामध्ये येणाऱ्या कार्यान्वित केल्या जात असून त्यासाठी जातीचे वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. बऱ्याच समाजबांधवांकडे १९५० पूर्वीचे दाखले आहे त्या आधारे सवलतींचा मिळविण्यासाठी ते वैधता प्रमाणपत्रात तांत्रिक अडचणींचे शंका निरसन करण्यासाठी या कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, अधिकाधिक समाजबांधवांनी यावेळी उपस्थित राहत आपल्या शंकाचे निरसन करून घ्यावे. या कायदेविषयक कार्यशाळेचा लाभ सर्व समाजबांधवानी घेण्याचे आवाहन ठाकूर समाज मंडळाचे राज्य सरचिटणीस रणजीत शिंदे, राज्य अध्यक्ष डॉ. जितेंद्र ठाकूर, कायदे सल्लागार दीपक चव्हाण, जिल्हा सरचिटणीस नीलेश ठाकूर आदींनी केले आहे.


‘समाज कल्याण’कडून सामाजिक कायद्यांवर मंगळवारी कार्यशाळा

जेलरोड : समाज कल्याण विभाग व समाजकार्य महाविद्यालय यांच्यातर्फे मंगळवारी (दि. ६) सकाळी साडेदहा वाजता ‘नागरी हक्क संरक्षण, विविध सामाजिक कायदे व धोरणा’ यावर गंगापूर रस्त्यावरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात एक दिवसीय विभागीय कार्यशाळा होणार आहे. राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी. एल. थूल, प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल, प्राचार्य विलास देशमुख, सहाय्यक आयुक्त प्राची वाजे यांची प्रमुख उपस्थिती राहील. पहिल्या सत्रात बारापर्यंत सी. एल. थूल यांचे ‘नागरी हक्क संरक्षण अधिनियम-१९५५ व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम-१९८९’ या विषयावर व्याख्यान होईल. बारा वाजता जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे हे ‘सामाजिक कायदे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका’ यावर तर दुपारी दोन वाजता अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष महेंद्र दातरंगे ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या’वर मार्गदर्शन करतील, असे आयोजकांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाघाटचा श्वास मोकळा

$
0
0

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मनपाकडून स्वच्छता

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदाघाटाच्या पार्किंगच्या जागेत वाहने थांबविण्याबरोबरच नदीपात्रातील पाणी घेऊन वाहने धुण्याचे प्रकार सुरू होते. या भागाला सर्व्हिस सेंटरचे स्वरूप आले होते. गोदावरी प्रदुषणमुक्त करण्यासाठी सामाजिक संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने महापालिकेला आदेश काढल्यानंतर गोदापात्रात धुणी धुणे, भांडी घासणे, जनावरे धुणे, वाहने धुणे हे प्रकार बंद करण्यात आले. गोदाघाटाच्या परिसरात वाहने धुणे बंद झाल्यामुळे येथील प्रदूषण होण्यास आळा बसला आहे.

गोदाघाटाचा गाडगे महाराज पूलाच्या दक्षिणेचा भागात शहर परिसरात येणाऱ्या भाविकांच्या आणि पर्यटकांच्या वाहनांची पार्किंग केले जाते. या पार्किंगच्या जागेतच वाहने थांबल्यानंतर ती वाहने धुतली जात असत. तसेच रिक्षा, दुचाकीस्वार वाहने थांबवून येथे वाहने धुत होते. काही मुलांनी तर येथे पैसे घेऊन वाहने धुण्याचे कामे सुरू केली होती.

या भागातून अवैधरित्या वाळू काढण्यात येत होती. ही काढलेली वाळू याच पाण्याच्या उपयोग करून धुतली जात होती. हे प्रकारही आता बंद करण्यात आलेले आहेत. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या गोदाघाट पाहणीच्या दौऱ्यानंतर येथील वाळूचे ढिगारे ठेऊन त्याची विक्री करणाऱ्यांवर हाकलण्यात आल्यानंतर येथील सर्व परिसर मोकळा झाला आहे. आता खऱ्या अर्थाने गोदाघाट मोकळा श्वास घेत असल्याचे दिसते.

कारवाईनंतर वाहने धुणे बंद
वाहने धुतली जात असल्यामुळे वाहनांवरची धूळ, चिखल, ग्रीस, ऑईल हे गोदापात्रात मिसळले जात होते. दिवसभरात शेकडो वाहने धुतले जात असल्यामुळे गोदावरीचे प्रदूषण वाढत होते. या विषयाकडे महापालिका दुर्लक्ष करीत होती. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेने गोदावरी संवर्धन कक्षाची स्थापना केली. या कक्षाच्या स्थापनेनंतर गोदावरीचे प्रदूषण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊ लागली. या कारवाईमुळे येथे वाहने धुण्याचे प्रकार बंद झाले. त्यामुळे गोदावरीत ऑईल, धूळ आदींचे होणारे प्रदूषण रोखले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडमध्ये बिबट्या आल्याची अफवा!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड येथे सिद्धिविनायक नगर परिसरात बिबट्या आल्याच्या चर्चेने शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी नागरिकांत अस्वस्थता पसरली. पोलिसांनाही कोणीतरी दोन बिबटे परिसरात आल्याबाबातचा निनावी फोन केल्याने पोलिसांनी रात्री या भागात गस्त घातली नागरिकांत घबराहट पसरली. दरम्यान परिसरात एका शेळीला हिंस्त्र श्वापदाने जखमी केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी येवला येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. वनविभागाने परिसरात शोध घेवूनही कोणताही हिंस्त्र प्राणी आढळून आला नाही.

मनमाड येथील सिद्धिविनायक नगर परिसरात शुक्रवारी रात्री बिबट्या आल्याच्या वृत्ताने नागरिकांत खळबळ उडाली. काही नागरिकांनी पोलिस स्टेशनमध्ये फोन करून बिबट्या आल्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पण काहीही आढळून आले नाही. येवला येथील वन अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले. त्यांनही परिसर पिंजून काढले. कोठेही बिबट्या अथवा त्याच्या पायाचे ठसे दिसले नाही. दरम्यान परिसरातील एका शेळीवर हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे नागरिकांचा संशय बळावला. हा हिंस्त्र प्राणी बिबट्या नसून तरस असावा, असा वनविभागाचा अंदाज आहे. दरम्यान सिद्धिविनायक नगरात नागरिकांनी शुक्रवारची रात्र जागून काढली. अद्यापही नागरिकामध्ये घबराहट पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अविस्मरणीय बाइक रॅलीचे व्हा साक्षीदार!

$
0
0

लोगो व फोटो

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरातील विविध महिला मंडळे, ऑफिस ग्रुप, किटी पार्टी ग्रुप्स, तसेच कॉलेजियन्सचे ग्रुप्स या सर्वांनी 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'ऑल इंडिया वुमेन्स बाइक रॅली'मध्ये सहभागासाठी रजिस्ट्रेशन केले आहे. महिलांची एकजूट अन् जल्लोष असणाऱ्या रॅलीत सहभागी होण्यासाठी बाइकर्णींची उत्सुकता वाढली आहे. खास बाब म्हणजे, ११ मार्च रोजी होणाऱ्या अविस्मरणीय आणि हक्काच्या ऑल इंडिया वुमेन्स बाइक रॅलीत सहभागी होण्यास आतुर झाल्याची मते बाइकर्णींनी व्यक्त केली आहेत.

महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने 'ऑल वुमेन्स बाइक रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकसह ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये ही रॅली मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सध्या सर्वच क्षेत्रांत महिलांची कामगिरी उल्लेखनीय आहे. यासोबतच विविध प्रकारच्या बाइक्स चालवण्यातदेखील महिला वर्ग माहीर झालेला दिसतो. महिलांची एकजूट आणि रोजच्या धकाधकीच्या व्यापातून वेळ काढत धम्माल अनुभवण्यासाठी या रॅलीचे खास आयोजन करण्यात आले आहे. नाशिकमध्ये ११ मार्च रोजी ही रॅली होणार आहे. रॅलीत सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे, तसेच मोपेड बाइकपासून तर बुलेट, स्पोर्ट्स बाइक आणि व्हिंटेज बाइकसह महिला सहभागी होणार आहेत. यासाठीची तयारी आतापासूनच महिलांनी सुरू केली आहे. आपली बाइक सजवण्यापासून ते खास ड्रेसअपची तयारी या खास बाइक रॅलीनिमित्ताने केली जात आहे. ऑल इंडिया वुमेन्स बाइक रॅलीसाठी महिला वर्ग ग्रुप्सने आपले रजिस्ट्रेशन करीत आहेत. तुम्हीदेखील लवकरात लवकर ऑनलाइन किंवा एसएमएसद्वारे रजिस्ट्रेशन करीत या अविस्मरणीय बाइक रॅलीचे साक्षीदार व्हा.

वुमेन्स बाइक रॅलीत सहभागी झाल्यावर नारी शक्तीचा सन्मान होतोच. सोबतच अतिशय उत्साहवर्धक आणि जल्लोषपूर्ण वातावरणामुळे महिलादिन यादगार ठरतो. गेल्या तीन वर्षांपासून आमचा ग्रुप वुमेन्स बाइक रॅलीत सहभागी होत आहे.

- संध्या पवार-ठाकूर

असे करा रजिस्ट्रेशन

ऑल इंडिया वुमेन्स बाइक रॅलीत सहभागी होण्यासाठी www.allwomenpowerrally.com या वेबसाइटला भेट द्या. तेथे रजिस्ट्रेशन या सेक्शनला भेट दिल्यानंतर नावनोंदणी करता येईल. मोबाइल एसएमएसद्वारेसुद्धा नावनोंदणी करता येणार आहे. त्यासाठी PowerrallyNSK हा मेसेज टाइप करून तो ५८८८८ या क्रमांकावर पाठवायचा आहे.

तयारी फॅशनेबल ड्रेसअपची...

ऑल वुमेन्स बाइक रॅली केवळ बाइक चालवण्यापुरतीच मर्यादित नाही, तर या निमित्ताने खास ड्रेसअपदेखील सहभाग घेणाऱ्या महिलांना करता येणार आहे. नऊवारी साडी, फेटे यांपासून वेस्टर्न आउटफिटपर्यंत ड्रेसअप करीत महिला बाइक रॅलीत सहभागी होऊ शकतात. विशेष म्हणजे, यासाठीची खास खरेदी महिलांनी सुरू केली आहे. आपला पेहराव सगळ्यात हटके असावा, यासाठी प्रत्येक बाइकर्णी नियोजन करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्कर भरती घोटाळा विशाखापट्टणमपर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय सैन्यदलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नाशिकसह जळगाव आणि इतर ठिकाणी शेकडो युवकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या संशयित आरोपीने देशभरातील विविध राज्यांमध्ये हातपाय मारल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या विशाखापट्टणम येथील आठ मुलांनी तशी कैफीयत पाचोरा (जळगाव) पोलिसांकडे मांडली आहे. या मुलांची जवळपास साडे एकोणतीस लाखांची फसवणूक झाली आहे.

लष्करी सेवेत असलेला सुभेदार हुसनोद्दीन चांदभाई शेख हा मागील वर्षी सुटीवर आल्यानंतर पुन्हा सेवेत हजरच झाला नाही. तेव्हापासून लष्काराने त्यास भगोडा घोषित केले होते. हुसनोद्दीन लष्करी सेवेत असल्यापासून तरुणांकडून पैसे घेऊन बेकायदा भरती प्रक्रिया राबवित असावा, असा पोलिसांना अंदास आहे. मात्र, लष्कारातून पळून आल्यानंतर हुसनोद्दीनने आपले बेकायदा काम वाढविले. अहमदनगर जिल्ह्यात दोन घरे असलेल्या हुसनोद्दीनने लष्करात नोकरी देण्याचे आमिष दाखवून शेकडो मुलांकडून कोट्यवधी रुपये उकळले आहेत. या प्रकरणी संशियतासह त्याची पत्नी रेश्मा आणि मुलगा वजीर याच्याविरोधात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव, जामनेर तसेच अन्य एका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. याबाबत माहिती देताना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी सांगितले की, संशयिताविरोधात जवळपास ४५० तक्रारी आल्या असून, फसवणुकीचा आकडा सात कोटी रुपयांच्या पुढे सरकाला आहे. संशयित आरोपीने देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी याच पद्धतीने बेरोजगारांची फसवणूक केल्याचा पोलिस कयास असून, फसवणूक झालेल्या विशाखापट्टणम येथील आठ तक्रारदारांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. नोकरी लावून देण्याच्या बदल्यात संशयित आरोपीने या तरुणांकडून साडे एकोणतीस लाख रुपये घेतले होते. मात्र, नोकरीचे काम होत नसल्याने मुलांनी पैशांसाठी तगादा सुरू केला. यातील साडेचार लाख रुपये परत केल्यानंतर संशयित हुसनोद्दीनने हात वर केले. जळगाव पोलिसांनी हुसनोद्दीनसह त्याच्या पत्नी व मुलास अटक केली होती. हे दोघे त्याची बँक खाते सांभाळण्याचे काम करीत होते. सध्या या दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. हुसनोद्दीनच्या बँक खात्यांमध्ये फारसे काही मिळून आले नाही. एका ठिकाणाहून पैशांची मागणी वाढली की संशयित आरोपी दुसऱ्या ठिकाणी बैठक घेऊन बेरोजगारांकडून पैसे उकळत होता. दरम्यान, हुसनोद्दीन सर्वात शेवटी पुणे येथे कार्यरत असल्याची माहिती पोलिसांकडे असून, याबाबत एक पथक प्रत्यक्ष पुणे येथे पोहचून तपास करीत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. नाशिक तसेच जळगाव जिल्ह्यातच फसवणुकीचा आकडा १० कोटी रुपयांच्या पुढे सरकाला आहे.

--

नाशिकच्या तपासाला वेळ

हुसनोद्दीनसह त्याच्या कुटूंबियांनी मिळून नाशिकमधील बेरोजगारांना तब्बल अडीच कोटी रुपयांपर्यंत गंडा घातला आहे. तक्रारदार वाढत असून, फसवणुकीचा आकडाही वाढू शकतो. या प्रकरणी गुन्हा दाखल असला तरी हुसनोद्दीन सध्या पाचोरा पोलिसांच्या कोठडीत आहे. यानंतर उर्वरित तीन पोलिस स्टेशनचा तपास संपल्यानंतरच त्याचा ताबा नाशिक पोलिसांना मिळू शकतो. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होणार असून, तक्रारदारांनी इंदिरानगर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवरायांना मानाचा मुजरा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

'राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या', 'शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला', 'आम्ही शिवाचे सैनिक वेडे, करू जिवाचे रान' यासारख्या गीतांसह छत्रपतींच्या पराक्रमी अलौकिक कीर्तीचे गुणगान गाणारी अनेक उत्साहवर्धक गीते...अश्वारूढ शिवराय अन् मावळे, जागोजागी मर्दानी कसरतींचे प्रदर्शन आणि शिवरायांचा जयघोष करत शिवप्रेमी उत्साहात रविवारी (दि. ४) मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तरुणाईसह मान्यवर,जागोजागी डौलाने फडकणारे भगवे ध्वज...अशा उत्साहपूर्ण भगवेमय वातावरणात शानदार मिरवणुकीने येवलेकरांनी रविवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा केला. शिवसेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रविवारी (दि. ४) अगदी मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. येवला शहरातून दिमाखदार मिरवणूक सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन झाले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख नीलेश चव्हाण, वाल्मिक गोरे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे, संचालक किशोर दराडे, संभाजी पवार, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर,उ पनगराध्यक्ष सुरज पटणी, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी आदी उपस्थित होते. शनी पटांगणाजवळील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून सकाळी साडेअकराच्या सुमारास मिरवणुकीस प्रारंभ झाला. शिवसेनेच्या वतीने पहाटे सहा वाजेच्या सुमारास टिळक मैदानातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास तालुकाप्रमुख झुंजारराव देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक करण्यात आला.

अन् आजीबाईंनी धरला ठेका

शिवजयंती निमित्त रविवारी येवल्यात निघालेली मिरवणूक अनेकांना आकर्षून जातानाच या मिरवणुकीने एका वयोवृद्ध आजीबाईंनादेखील भुरळ घातली. शिवरायांचे गुणगान गाणारे हे गीत ऐकून जवळून जाणाऱ्या वयाची पंच्याऐंशी ओलांडलेल्या आजीबाईंनी ठेका धरला. आजीबाईंचा हा मूड मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतानाच दाददेखील मिळवून गेला.

निफाडलाही शिवजयंती

निफाड : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रविवारी (दि. ४) निफाड येथे शिवसेनेच्या वतीने तिथीनुसार साजरी करण्यात आली. शांतीनगर चौफुली येथे शिवाजी महारांजाची प्रतिमा व भव्य डिजिटल बोर्ड लावण्यात आला होता. या निमित्ताने दिंडोरी लोकसभेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पूजन करून पुष्पहार घातला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, तालुकाप्रमुख सुधीर कराड, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, सोमनाथ पानगव्हाणे, इरफानभाई सैयद, संजय कुंदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये ‘बिगेस्ट होली फेस्टिवल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रंगांचा उत्सव अर्थात रंगपंचमीचा सण उद्यावर येऊन ठेपला असून, महाराष्ट्र टाइम्सनेही यानिमित्त यंदा विशेष फेस्टिवलचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि रुद्र इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने हा 'नाशिक्स बिगेस्ट होली फेस्टिवल' उद्या (दि. ६ मार्च) होत असून, प्रसिद्ध मॉडेल आणि हिंदी अभिनेता प्रियंक शर्मासमवेत रंगपंचमी खेळता येणार आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध डीजे शेरीलची साथ आणि 'रोडीझ एक्स ५'ची स्पर्धक अंकिता मेहरा यांचीदेखील या फेस्टिवलला उपस्थिती असल्याने सेलिब्रेशनचा आनंद द्विगुणीत होणार आहे.

रंगपंचमी म्हणजे विविध रंगांमध्ये रंगून जाण्याचा उत्सव. रंगाची मनसोक्त उधळण करीत प्रेम आणि स्नेहाचे नाते अधिक दृढ करण्याचा हा उत्सव. मंगळवारी (दि. ६) रंगपंचमी साजरी होत असून अबालवृद्ध त्यासाठी आतुर झाले आहेत. या उत्साहाला उधाण आणण्यासाठी यंदा महाराष्ट्र टाइम्सही सरसावले आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि रुद्र इव्हेंटने यंदा 'रंगपंचमी विथ सेलिब्रेटी' ही अनोखी संकल्पना नाशिकमध्ये पहिल्यांदाच आयोजिली आहे. एबीबी सर्कलजवळील ठक्कर डोम येथे उद्या मंगळवार (दि. ६ मार्च) रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत होली फेस्टिवल होणार आहे. त्यामध्ये विविध कोरड्या रंगांची मनसोक्त उधळण करावयास मिळणार असून हा फेस्टिवल म्हणजे धम्माल मस्तीची पर्वणी ठरणार आहे.

सवलतीत मिळणार तिकिटे

कल्चर क्लबच्या सदस्यांना या फेस्टिवलमध्ये सहभागी होता यावे यासाठी सवलतीच्या दरात तिकिटे दिली जात आहेत. ७०० रुपये किमतीची दोन तिकिटे सदस्यांना ३०० रुपयांत मिळणार आहेत. विशेष म्हणजे नव्याने सदस्य होणाऱ्यांना दोन तिकिटे मोफत मिळणार आहेत. या फेस्टिवलमध्ये नोंदणीसाठी प्रतिसाद वाढत असून, सवलतीच्या दरातील ही तिकिटे मिळावीत यासाठी आजच महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्केअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या कार्यालयात तर अधिक माहितीसाठी ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुणवत्ता टिकली, पण संख्या घटली!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांत गेल्या चौदा वर्षांच्या कालावधीत मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण कमीच राहिलेले असल्याचे उपलब्ध आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. असे असले तरी मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी गेल्या मुलांपेक्षा सातत्याने अधिक राहिली आहे. गुणवत्तेत मुली मुलांपेक्षा सरस असल्या तरी संख्येच्या बाबतीत मुली गेल्या दीड दशकात मुलांच्या संख्येची बरोबरी करू शकलेल्या नाहीत. यावरून स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तरात कमालीची तफावत असल्याचेही स्पष्ट होत आहे.

मार्च २००४ ते मार्च २०१७ या चौदा वर्षांच्या कालावधीत बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांत मुलांची संख्या मुलींपेक्षा दरवर्षी झपाट्याने वाढत आहे. तुलनेने मुलींच्या संख्येत वाढ होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परीक्षेला मुलांपेक्षा मुलींची संख्या तब्बल २० ते २५ हजारांनी कमी राहिली आहे. असे असले तरी गुणवत्तेत मुली सरस ठरल्या असून, मार्च २०१७ चा अपवाद वगळता त्यानंतरची सलग तेरा वर्षे गुणवत्तेत मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत. परिणामी, उच्च शिक्षणात मुलींचा टक्काही वाढला आहे. नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत गेल्या चौदा वर्षांत एकदाही मुला-मुलींच्या संख्येतील तफावत कमी झालेली नाही. उलट वर्षानुवर्षे दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या मुला- मुलींच्या संख्येतील तफावत वाढतच आहे. लिंग गुणोत्तराचे प्रमाण डळमळीत झाल्याचेच यातून स्पष्ट होत आहे.

लिंग गुणोत्तर चिंताजनक

विभागात मुलींचा जन्मदर घटत असल्याचेच या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. परिणामी, शाळांतील मुला-मुलींचे प्रमाणही असंतुलित झाले आहे. याचा परिणाम दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या मुलींच्या संख्येवरही होत आहे. 'बेटी बचाव'साठी शासन स्तरावर आणि सेवाभावी संस्थांकडून जनजागृती सुरू असली तरी त्याचे अपेक्षित परिणाम दिसत नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. प्रसूतिपूर्व लिंग गुणोत्तर चाचणीला सरकारने बंदी आणलेली असली तरी विभागात अद्याप या प्रकारांना शंभर टक्के आळा बसलेला नसल्याने मुला-मुलींच्या संख्येच्या प्रमाणातील तफावत कायम आहे.

विभागातील दहावी परीक्षेतील प्रविष्ट विद्यार्थिसंख्या

वर्ष-प्रविष्ठ मुले-प्रविष्ठ मुली- उत्तीर्ण मुले- उत्तीर्ण मुली

२००४-८१२७३- ५९१०८- ५८५२४- ४५५१२

२००५- ८४५१७- ६३६६३- ४९९६९- ४१५२४

२००६- ८८३००- ६७८५२- ६३२५६- ५१५४२

२००७- १०९९२२- ७५३३६- ७५९८९- ५७७६५

२००८- ९०७४८- ७००८९- ७८७२९- ६२९२६

२००९- ९४८२४- ७३७७१- ८२४१७- ६५८२७

२०१०- १०५२५१- ७९५८९- ८६९२१- ७००१५

२०११- १०७३७४- ८२००४- ८२५२१- ६७६५८

२०१२- ११२४७४- ८४७८९- ७८७९८- ६५५४५

२०१३- ११७५३५- ८८३९८- ८९२६८- ७३३५१

२०१४- १०४६६०- ८१८५०- ९१३११- ७४९५८

२०१५- १०६९७५- ८५०८८- ९७०२१- ७९९७७

२०१६- १०८४९९- ९०१०५- ८८७६१- ८९२१७

२०१७- ११७४४०- ९५५८९- १०७१५०- ८२९६६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दरोडेखोरांना अटक

$
0
0

दोन दरोडेखोरांना अटक

चांदवड दरोड्यातील संशयित; एलसीबीची कामगिरी

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड येथील डावखर नगर परिसरात प्रा. सुयोग गवारे यांना लाकडी बांबूने मारहाण करून त्यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला होता. यामध्ये पावणे दोन लाख लुटून नेले होते. याप्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी दोन दरोडेखोरांना शिताफीने अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रविवारी (दि. ४) या दोघा सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून मुंबई, पुणे, नगर या जिल्ह्यातील आणखी काही दरोड्यांच्या गुन्ह्यांचा तपास लागण्याची शक्यता आहे. चांदवड येथील प्रा. सुयोग गवारे यांच्या बंगल्यात दि. २४ फेब्रुवारीला दरोडेखोरांनी १ लाख ७३ हजारांचा ऐवज लुटून नेला होता. यानंतर पोलिस निरीक्षक अशोक करपे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिस अधीक्षक संजय दराडे, अप्पर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे फिरवत नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातून कमालपुरा येथून मुकेश गायकवाड (वय २९, रा. नेवरगाव, जि. औरंगाबाद) व गोरख पिंपळे (वय २९ रा. उरळीकांचन, जि. पुणे) यांना अटक केली. या दोघांनीही चांदवड येथे दरोडा टाकल्याची कबूली दिली असून, त्यांचे अन्य साथीदार सागर चव्हाण ,योगेश काळे, व बबलू यांचा पोलिस आता शोध घेत आहे. पकडलेल्या संशयितांकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार, ३७०० रुपये रोख व दरोड्यात वापरलेले साहित्य जप्त केले आहे. चांदवड येथील या दरोड्याचा सहा ते सात दिवसांत तपास लावून दरोडेखोरांना अटक करणाऱ्या पोलिसांचे अभिनंदन होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोवीस बॅटऱ्या लांबविल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिडकोतील दत्तचौकात इमारतीवर असलेल्या मोबाइल टॉवरच्या ३६ हजार रुपये किमतीच्या २४ बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. प्रदीप सदाशिव कोळी (रा. भानोसे वाडा, जुने नाशिक) यांनी याप्रकरणी अंबड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

सिडकोतील दत्त चौकात आर. जे. बागुल यांच्या घरावर मोबाइलचे टॉवर बसविण्यात आले असून, या टॉवरसाठी २४ बॅटऱ्या बसवण्यात आल्या होत्या. चोरट्यांनी २६ हजार रुपये किमतीच्या या बॅटऱ्या गुरुवारी (दि. १) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास चोरून नेल्या.

नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक

भारतीय रेल्वेमध्ये उच्च पदावर नोकरीला असल्याचे भासवून एकाने रेल्वेसाठी काम करण्याची संधी आमिष दाखवत युवकास तब्बल दीड लाख रुपयांना गंडा घातला. ई-मेलच्या माध्यमातून भामट्याने युवकाचा संपादन केला होता. धीरज कुमार सिंह (रा. ओम साईनाथ रो-हाऊस, अंबड) या युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित साईकेत मुखर्जी (पूर्ण माहिती नाही) या संशयिताबरोबर धीरजची ओळख झाली होती. संशयित आरोपीने आपण भारतीय रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजन येथे उच्च पदावर नोकरीला असल्याचे सांगून धीरजचा विश्वास संपादन केला. यादरम्यान धीरज कुमार याच्या ई-मेलचा वापर करून त्याने रेल्वेसाठी रुफ वेंटिलेटरची मागणी केली. याकामासाठी आगाऊ रक्कम म्हणून एक लाख ६१ हजार १९० रुपये संशयिताने उकळले. मात्र, कामही मिळाले नाही आणि पैसेही देण्यास संशयित टाळाटाळ करीत असल्याने फिर्यादीने पोलिस स्टेशन गाठले. फसवणुकीचा प्रकार २६ ऑक्टोबर २०१७ ते ३ मार्च २०१८ दरम्यान घडला असून, या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन दुचाकींची चोरी

शहरातून तीन दुचाकींची चोरी झाल्याची नोंद संबंधीत पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. दुचाकी चोरीची एक घटना पंचवटीतील कालिकानगर येथील अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये झाली. याठिकाणी प्रवीण देविदास काळे (रा. गिरणारे, ता. नाशिक) यांनी उभी केलेली दुचाकी (एमएच १५ सीएल ८५०९) ३० जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने हातोहात लंपास केली. याप्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी दुचाकी डॉन बॉस्को शाळेसमोरील पार्किंगमधून चोरीला गेली. संजय सुकदेव घोडके यांच्या फिर्यादीनुसार, २८ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत डॉन बॉस्को शाळेसमोरील पार्किंगमध्ये त्यांनी आपली मोपेड पार्क केली होती. चोरट्याने या कालावधीत कधीतरी दुचाकी लंपास केली. या प्रकरणी घोडके यांच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान हेमंत छबुलाल सोनारे (रा. पवनननगर सिडको) यांची दुचाकी (एमएच १५ टीए १४४७) चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरच्या विकासाला चालना

$
0
0

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी साडेसहा कोटी मंजुरी; आमदार वाजे यांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी साडेसहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याबाबत आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे यांनी रविवारी (दि. ४) आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

राज्यातील ३७ शहरांचे नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांच्या सविस्तर प्रकल्प अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता देऊन 'निरी' या संस्थेने प्रकल्पाचे मुल्यांकन केले. ते प्रस्ताव सरकारच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली असून, त्या ३७ शहरांच्या १८३ कोटी रुपयांच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता देण्यात आली. यामध्ये सिन्नर नगरपालिकेचा समावेश असून, ६ कोटी ५६ लाख ११ हजार रुपये किमतीच्या नागरी घनकचरा प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.

केंद्राकडून दोन कोटींचे अनुदान

या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या मंजूर वित्तीय आकृतीबंधानुसार केंद्र सरकारमार्फत प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के म्हणजेच २ कोटी २९ लाख ६३ हजार एवढे अनुदान मिळणार आहे. तर ६०:४० च्या प्रमाणात राज्य सरकारमार्फत १ कोटी ५३ लाख ९ हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येईल. या अनुदानाव्यतिरिक्त नगरपालिकेचा सहभाग म्हणून २ कोटी ७३ लाख ३९ हजार रुपये याप्रमाणे हिस्सा असेल, असेही यावेळी सांगण्यात आले. मात्र पालिकेचा हिस्सा चौदाव्या वित्त आयोगातून भागविण्याची तरतूद करण्यात आल्याने यापूर्वी नगरपालिका फंडातून घनकचरा व्यवस्थापनासाठी होणाऱ्या खर्चापासून पालिकेला दिलासा मिळणार असल्याचे नगराध्यक्ष डगळे यांनी सांगितले.

शहर स्वच्छता, घंटागाडीसाठीही तरतूद

केंद्र सरकार पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र व राज्य सरकारच्या हिश्श्याचा निधी दोन टप्प्यात प्रत्येकी ५० टक्केप्रमाणे पालिकेला वितरित केला जाणार आहे. प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही उपकरणे, मशीन खरेदी करण्याची तरतूददेखील प्रकल्प अहवालात करण्यात आलेली आहे. त्यात नगरपालिकेला १२ घंटागाड्यांसाठी ७५ लाख रुपये खर्च करता येणार आहेत. नागरिकांकडून स्वच्छतेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी ५९ लाख ६४ हजार ६५८ रुपयांची तरतूदही करण्यात आलेली आहे. या वेळी उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, नगरसेवक विजय जाधव, गोविंद लोखंडे, शैलेंद्र नाईक, पाणीपुरवठा समितीचे सभापती पंकज मोरे, सोमनाथ पावसे, रुपेश मुठे, मंगलाताई शिंदे, ज्योती वामने, प्रणाली गोळेसर, सुजाता तेलंग, विजया बर्डे, गौरव घरटे, रामचंद्र नरोटे आदी उपस्थित होते.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नो हॉकिंगची आज स्पर्धा

$
0
0

'नो हॉकिंग'ची आज स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरी भागात वाढणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा परिणाम थेट मानवी जीवनावर होत आहे. यात वाहनांचे हॉर्न भार घालीत असून, ध्वनी प्रदूषणबाबत जनजागृतीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने सोमवारी (दि. ५) सकाळी 'नो हॉकिंग' स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात २०० दुचाकी आणि चारचाकी वाहनचालक सहभागी होणार आहेत.

नाशिक पोलिस आयुक्तालयाने मागील वर्षापासून 'नो हॉकिंग डे' सुरू केला. दर सोमवारी याबाबत जनजागृती करण्यात येते. शहर पोलिसांच्या या कार्यक्रमाची दखल राज्य सरकारने घेत, असा प्रयोग राज्यभर राबवण्याचे आदेश दिले. याच पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन विभागाने स्पर्धेची कल्पना पुढे आणली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयापासून सकाळी नऊ वाजता स्पर्धेस सुरुवात होईल. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते तर प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेस प्रारंभ होईल.

स्पर्धेबाबत कळसकर यांनी सांगितले, की प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विभागाच्या अटी, नियमांची पूर्तता करणाऱ्या जवळपास २०० वाहनधारकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नसून तिची सुरुवात आणि समारोप प्रादेशिक परिवहन कार्यालयात होईल. स्पर्धेसाठी हेल्मेट, सीटबेल्टचा वापर बंधनकारक राहणार आहे. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी शहरात प्रथमच या स्वरूपाची स्पर्धा होत आहे.

वर्दळीच्या रस्त्यांचे आव्हान

आरटीओ कार्यालयातून बाहेर पडलेल्या स्पर्धकांना १५ किलोमीटरचे अंतर पार करायचे आहे. पेठफाटा (भक्तीधाम) येथून डाव्याकडे वळून निमाणी, पंचवटी कारंजा, रेड क्रॉस सिग्नल, शालिमार, सीबीएस, शरणपूररोड, गंगापूररोड (डोंगरे वसतिगृह), अशोकस्तंभ, रामवाडी पूल, मखमलाबाद नाका, पेठा फाटा आणि पुन्हा आरटीओ कार्यालय असा स्पर्धेचा मार्ग असेल. वाहतुकीचे सर्व नियम पाळीत स्पर्धकांना हे अंतर कापावे लागणार आहे.

प्रत्येक गटातून तीन विजेते

स्पर्धेत परिवहन अधिकारी, कर्मचारी तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी नियंत्रक म्हणून काम पाहतील. स्पर्धेदरम्यान किती वेळा हॉर्न वाजविला, नियम मोडले याची नोंद ठेवली जाईल. त्याआधारे दुचाकी, चारचाकी गटातून प्रथम तीन क्रमांक निवडले जाणार आहेत. विजेत्यांना रोख पारितोषिक तर सहभागी स्पर्धकांना 'नो हॉर्न'चे चिन्ह असलेली टोपी आणि स्टिकर भेट देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेच्या संघटकासह दोघांचा अपघातात मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

नाशिक- पुणे रस्त्यावर मंचर शिवारात झालेल्या कार अपघातात खेडगाव येथील शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा संघटक रमेश नामदेव सोनवणे (वय ५८) यांच्यासह पोलिस कर्मचारी बबन तिडके ठार झाले, तर दोन जण जखमी झाले आहेत.

पुणे येथील कामे उरकून आय-२० कारमधून (एमएच १५/५१५१) खेडगाव येथील रमेश नामदेव सोनवणे (वय ५८) त्यांचे नातेवाईक पोलिस कर्मचारी बबन निवृत्ती तिडके (५२, रा. कसबे सुकेणे, ता. निफाड), निवृत्ती बाबूराव काश्मिरे (५४, रा. सातपूर), ज्ञानेश्वर कुंडलिक वाघ (५२, रा. आंबेदिंडोरी) नाशिककडे येत होते. पुणे-नाशिक रस्त्यावर पहाटे सव्वापाचच्या सुमारास तांबडेमळा-भोरवाडी येथे कार आली असता, रस्त्यावर कुत्रे आडवे आले. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनचालक रमेश सोनवणे यांचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्यालगतचा डिव्हायडर आणि लोखंडी बोर्ड तोडून खड्ड्यात कोसळली. ही कार एका झाडाला अडकली.

अपघाताच्या वेळी मोठा आवाज झाल्याने स्थानिक ग्रामस्थ, तसेच शिवनेरी येथून शिवज्योत घेऊन जाणारे शिवप्रेमी मदतीला धावले. यांनी मोबाइलच्या प्रकाशात कारमध्ये अडकलेल्या चौघांना कसेबसे बाहेर काढले. जखमींना मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच रमेश सोनवणे, बबन तिडके यांचे निधन झाले. निवृत्ती काश्मिरे आणि ज्ञानेश्वर वाघ गंभीर जखमी झाले.

खेडगावात शोककळा

रमेश सोनवणे यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. पोलिस कर्मचारी बबन तिडके यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. रमेश आणि बबन यांच्या मृतदेहाचे मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर दुपारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. सोनवणे यांच्या पार्थिवावर सायंकाळी खेडगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी सर्वपक्षीय नेत्यांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. जखमींवर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रगतिशील द्राक्ष बागायतदार, दिंडोरी तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सोनवणे परिचित होते. दिंडोरी खरेदी-विक्री संघाचे संचालक, खेडगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, काशी माळी समाज संघटनेचे ते कार्यकर्ते होते.

ट्रेलरच्या धडकेत पादचारी ठार

सिन्नर : येथील गावठा भागात घोटीकडे जाणाऱ्या ट्रेलरने धडक दिल्याने पादचारी ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत मृत पादचाऱ्याची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. औरंगाबाद येथून मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रेलर (एमएच ०४/डीएस ०६३६) सिन्नरमार्गे घोटी रस्त्याने मुंबईकडे जात होता. या ट्रेलरने गावठा भागात शेळके गल्लीजवळील वळणावर पादचाऱ्याला धडक दिली. ट्रेलरच्या मागच्या चाकाखाली सापडून पादचारी जागीच ठार झाला. ट्रेलरचालक इजहार अहमद हुसेन याने सिन्नर पोलिसांना अपघाताची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक आर. एम. धुमाळ, योगेश माळवे, हवालदार राहुल निरगुडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी नगरपालिका रुग्णालयात पाठविला.

बारा वर्षीय मुलाचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर : हरसूललगतच्या सारस्ते येथे घरात लहान बाळासाठी नायलॉन दोरीने बांधलेला झोका खेळत असताना फास बसल्याने उमेश मनोहर कुवर या बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. उमेश दुपारी अडीचच्या सुमारास घरातील झोक्यावर खेळत असताना अचानक नायलॉन दोराचा फास बसल्याने गंभीर जखमी झाला. ही घटना लक्षात आल्यानंतर उमेशला त्याचा चुलतभाऊ दीपक रमेश कुवर याने रुग्णालयात पावणेचारच्या सुमारास दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी हरसूल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोंडाईचा प्रकरणातील मुख्य संशयित अटकेत

$
0
0

'एसआयटी'च्या पथकाचे यश

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे गेल्या महिन्यात पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात रविवारी (दि. ४) या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या विशेष तपास पथक (एसआयटी) ला मुख्य संशयितास अटक करण्यात यश आले. रविवारी (दि. ४) दुपारी दोन वाजता आयोजित पत्रकार परिषदेत नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी ही माहिती दिली.

या प्रकरणासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीने रविवारी (दि. ४) सकाळी ६ वाजेच्या सुमारास मुख्य संशयित रेवनाथ रामसिंग भगत (भिल, वय ३५, रा. म्हाळसानगर, दोंडाईचा) याला दोंडाईच्यातून अटक केली. एसआयटीने जेव्हा महिलांच्या छेडखानीसह तत्सम स्वरूपाच्या गुन्ह्यातील किंवा प्रकारातील व्यक्तींची माहिती संकलित केली जेव्हा या नराधमाचा सुगावा लागला, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या संशयिताने पीडितेवर अत्याचार केल्याचे मान्य केले. तो अविवाहित असून, त्याने एकदा मुलीचा हात धरल्याने त्याला जमावाने मारहाण केल्याचीही घटना घडलेली आहे.

दोंडाईचा येथे झालेल्या या प्रकारानंतर जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातही विविध सामाजिक संघटनांकडून तसेच तेली समाजाकडून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. या घटनेतील दोषींना अटक करा, त्यांना शिक्षा देण्याचीही मागणी या संघटनांनी केली होती. यानंतर गेल्या आठवड्यात नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी दोंडाईचा येथे भेट दिली होती. त्यात त्यांनी या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करणार असल्याचे सांगितले होते. या प्रकरणातील एका संशयितास शनिवारी (दि. ३) न्यायालयात हजर केले असता, त्यास पुन्हा न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात पीडित कुटुंबाला धमकी देऊन शैक्षणिक संस्थेची बदनामी टाळण्याचा दबाव टाकल्याप्रकरणी शिक्षक व पालिकेचा माजी बांधकाम सभापती महेंद्र पाटील यांच्या जामीन अर्जावर शनिवारी कामकाज झाले. या वेळी जिल्हा न्यायालयात शिक्षक पाटील यांनी जामीन अर्ज सादर केला होता मात्र तो फेटाळण्यात आला. दरम्यान, नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी दोंडाईचा येथे गेल्या आठवड्यात भेट देऊन बालिकेवर झालेल्या अत्याचाराची चौकशीसाठी नेमलेल्या पथकांमध्ये अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे हे प्रमुख आहेत. तर शिरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील हे सहायक तपासाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. उर्वरित पाच अधिकारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक येथील आहेत. पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नारीशक्तीचा ‘प्रवाहो’

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

नऊवारी साडीवर घातलेला भरजरी फेटा, ट्रॅकसूट टी-शर्ट घातलेले, तर काहींनी विविध पारंपरिक पोशाखांत सामाजिक संदेशांचे फलक लावलेले...अशा विविध वेशभूषांमधून विविध संदेश देत शेकडो महिला रविवारी एकत्र आल्या. निमित्त होते 'वुमेन्स वॉकेथॉन २०१८'चे. आरोग्य, नारी शक्तीचे संघटन, वृक्षसंवर्धन, बेटी बचाओ, ट्रॅफिक सेफ्टी या विषयांवर प्रबोधनपर फलक उंचावत मोठ्या उत्साहात महिलांनी वॉकेथॉनमध्ये सहभाग घेतला.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वुमेन्स वॉकेथॉनचे आयोजन रविवार (४ मार्च) रोजी करण्यात आले होते. नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, महिला बाल कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे, अभिनेत्री सायली देवधर आणि नक्षत्रा मेढेकर तसेच छत्रपती पुरस्कार विजेत्या नाशिकच्या खेळाडू श्रद्धा नालमवार, शरयू पाटील, अस्मिता दुधारे यांनी झेंडा दाखवून वॉकेथॉनचे उद्घाटन केले. सकाळी ७ वाजता वेस्टविंड मिडोजपासून या वॉकेथॉनला सुरुवात झाली. तीन किलोमीटरच्या या वॉकेथॉनचे काही बाइकर्णी बुलेट चालवत नेतृत्व करत होत्या. यापाठोपाठ हजारो महिला वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषेत समाज प्रबोधन करणारे फलक घेऊन 'वॉक' करीत होत्या. खास बाब म्हणजे, या वॉकेथॉनमध्ये महिलांचे स्वस्थ आरोग्य, स्वच्छता आणि वुमन्स सेफ्टी या विषयांवर भर देण्यात आला. यावेळी एकवटलेली नारी शक्ती अन् त्यांचा उत्साह उल्लेखनीय होता.

रविजा सिंगल 'प्राइड ऑफ नाशिक'

नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांची कन्या रविजा सिंगल हिला वॉकेथॉनच्या निमित्ताने 'प्राइड ऑफ नाशिक' पुरस्कार आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. विविध खेळांत विशेष प्राविण्य मिळवत शंभरहून अधिक पदके रविजाने पटकावली आहेत. नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या हाफ आयर्नमॅन स्पर्धेत यंगेस्ट आयर्न लेडीचा पुरस्कार रविजाने पटकावला. यामुळे तिला हा विशेष पुरस्कार यावेळी देण्यात आला. यासोबतच छत्रपती पुरस्कार विजेत्या नाशिकच्या खेळाडू श्रद्धा नालमवार, शरयू पाटील, अस्मिता दुधारे यांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले.

प्रबोधन 'आरोग्यापासून वसुंधरेपर्यंत'

मासिक पाळीबाबत जनजागृती करण्यासाठी नाशिकच्या महिला डॉक्टर्सनी 'रेड डॉट करून सादर करू स्त्री शक्तीचा आदर', 'झाला अनियंत्रित रक्तस्त्राव फॅमिली डॉक्टरकडे घ्या धाव' असे फलक हाती घेत वॉकेथॉनमध्ये समाजप्रबोधन केले. तसेच 'वंशाच्या दिव्यासोबत पणतीचा प्रकाश पसरू द्या, स्त्री-जन्माचे स्वागत करा', 'संघर्ष करा मनापासून अंधश्रद्धा घालवा मुळापासून', 'जरी आहेत भिन्न संस्कृती अन् भाषा पण मानवता हीच खरी परिभाषा', 'हेल्मेट वापरा जीवन सावरा', 'वसुंधरेला चढवू हिरवा साज', 'व्यायामाशी मैत्री आरोग्याची खात्री' असे फलक हाती घेत महिलांनी वॉकेथॉनमध्ये आरोग्यापासून तर वसुंधरा संवर्धनापर्यंत अनेक विषयांवर प्रबोधन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइनचा ‘उद्योग’ जाचकच!

$
0
0


bhavesh.brahmankar@timesgroup.com

Tweet - @BhaveshBMT

नाशिक : 'मेक इन महाराष्ट्र', 'मॅग्नेटिक महाराष्ट्र', 'डिजिटल महाराष्ट्र' यांसारख्या संकल्पना राज्यात राबविल्या जात असल्या, तरी उद्योगांसाठी सर्व सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात सरकार आणि विविध यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्या आहेत. साधे पाणी बील भरण्यासाठी उद्योगांना कार्यालयाच्या खेटा घालाव्या लागतात. तर उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्यांची 'सिंगल विंडो' कधी उघडणार, असा प्रश्न उद्योजकांना सतावत आहे. उद्योगांशी संबंधित सर्व विभागांमध्ये एजंटांचा सुळसुळाट असल्याने आर्थिक लुटीसह मानसिक त्रासानेही उद्योजक वैतागले आहेत.

देशात आणि राज्यात उद्योगस्नेही वातावरण असून, उद्योजकांनी मोठी गुंतवणूक करावी, त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविल्या जातील, असे केंद्र व राज्य सरकारकडून छातीठोकपणे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळे असल्याचे दिसून येत आहे. 'डिजिटल' आणि 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'चा डांगोरा पिटणाऱ्या महाराष्ट्रात उद्योजकांना ऑनलाइन सेवेचा जाच आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, औद्योगिक सुरक्षा संचलनालय अशा विविध विभागांशी उद्योगांचा संबंध येतो. पण, या सर्व विभागांकडून उद्योजकांची निराशाच केली जात आहे.

उद्योगाचे पाण्याचे बील भरणे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे शुल्क, नवीन उद्योग स्थापण्यासाठीचा अर्ज अशा कुठल्याही प्रकारची सेवा पूर्णत: ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे उद्योजकांना त्या-त्या विभागात जावेच लागते. याठिकाणी एजंटांचाही सुळसुळाट आहेच. सरकारी विभागांनी त्यांचे कामकाज ऑनलाइन आणि कम्प्युटराइज्ड केले असले तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ उद्योजकांना मिळत नाही. त्यामुळेच ठराविक शुल्क भरण्यासाठी त्या विभागात जाणे आवश्यकच ठरते. विहित वेळेतही संबंधित परवाने आणि कामे होत नसल्यानेही उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या सेवा ऑनलाइन देण्याची मागणी उद्योजकांकडून अद्यापही होत आहे.

जिल्हा उद्योग केंद्राचा कारभार अतिशय ढिसाळ आहे. सिंगल विंडो सिस्टिम आणली जाईल, असे अनेक वर्षांपासून सांगितले जात आहे. उद्योग सुरक्षेचा परवाना आणि अन्य सुविधाही ऑनलाइन नाहीत. याचा मोठा परिणाम उद्योग विकासावर होत आहे.

- सुरेश माळी, माजी अध्यक्ष आयमा

प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि अन्यही सरकारी विभागांचे कामकाज अद्यापही ऑनलाइन झालेले नाही. अगदी थोड्या प्रमाणात सेवा ऑनलाइन आहेत. पण, उद्योग विस्तारण्यासाठी ते पुरेसे नाही.

- धनंजय बेळे, माजी अध्यक्ष, निमा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐंशी वर्षांची चपळ जलपरी!

$
0
0

jitendra.tarte@timesgroup.com

Tweet : jitendratarte@MT

नाशिक : आयुष्याच्या ज्या वळणावर वार्धक्यामुळे अनेकांची उमेद खच्ची होऊ लागते, त्या वळणालाच प्रेरणादायी कसं बनवावं, याचा वस्तूपाठच नाशिकच्या ऐंशी वर्षांच्या निर्मला भिडे यांनी जलतरणावरील प्रेमातून समाजाला घालून दिला आहे. वयाच्या ऐंशीव्या वर्षातही त्या २५ मीटरच्या २० लेंग्थ सहजपणे पोहू शकतात. निर्मला भिडे या जन्माने डहाणूकर. डहाणूमधील केळकर हे त्यांचे माहेरचे नाव. लहानपणापासून त्यांना घरात जे वातावरण लाभले ते निसर्गाच्या सान्निध्यातले. आपल्या बरोबरीच्या किंवा वयाने जरा मोठ्या असणाऱ्या मैत्रिणींसोबत अवघ्या चार ते पाच वर्षे वयापासून त्यांना जलतरणाची गोडी लागत गेली. पोहण्याची गोडी कशी लागली याची आठवण सांगताना त्या म्हणतात, 'विहिरीच्या काठावरून आम्हाला पोहणे शिकण्यासाठी विहिरीत लोटून दिले जायचे. मग पाण्यावर तरंगण्यासाठी ताकदीने धडपड सुरू व्हायची. अशा खेळात आम्ही पोहणे कसे शिकलो हे समजलेच नाही. यानंतर कॉलेजला आल्यानंतर मुंबईमध्ये काकांकडे आल्यानंतर या पोहण्यातली गोडी वाढतच गेली. दरम्यान, मुंबईतल्या रूईया कॉलेजमध्ये शिक्षण घेताना मी नॅशनल कबड्डी चॅम्पियन झाले. टेबल टेनिस, टेनी क्विट आदी क्रीडाप्रकारांमध्येही मी निपुण होते.

मुंबईत मफतलाल क्लबच्या तरण तलावात बहिणींसोबत पहिल्यांदाच पोहल्यानंतर थेट पोहणे आणि प्रशिक्षण घेऊन पोहणे यातील अंतर समजले आणि केवळ निरीक्षणातून माझे पोहणे सुधारत गेले. लग्नानंतरही पोहण्याचा छंद कायम राहिला. पुढे-पुढे मुलालाही पोहण्यास शिकवून रोज त्याला सोबत घेऊन शिवाजी पार्कला जायची. त्याला वेळेवर जेऊ घालून पोहणे कधीही चुकवायचे नाही, असाही शिरस्ता मी गृहिणी म्हणून जबाबदारी सांभाळताना जपला. पती विनायक भिडे हे टाटा कंपनीत अभियंते होते. तेव्हा अनेकदा त्यांची बदली देशाच्या विविध भागात झाली. एकदा ही बदली इराकमध्येही झाली पण या बदल्यांच्या कालावधीतही पोहण्याच्या नियमात खंड पडू दिला नाही. पोहण्यावरच्या या प्रेमाने निर्मलाताईंना आजही तंदुरूस्त ठेवले आहे. सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी त्या गुजरातेत सोमनाथ येथे पर्यटनासाठी गेल्या होत्या. तिथे एका ठिकाणी मागाहून आलेल्या गायीने त्यांना जोरदार धडक दिली. परिणामी, शरिराला मुका मारही बराच लागला होता. दैनंदिन हालचाली करणेही कठीण बनले होते. विशेष तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून उपचार घेण्याशिवाय इतर पर्याय नाही, असे घरातील मंडळींना वाटू लागले, पण पोहण्यावर विश्वास असणाऱ्या निर्मलाताईंनी इच्छाशक्तीच्या बळावर पाण्यात प्रवेश केला अन् कुठल्याही विशेष उपचारांशिवाय पूर्वीइतक्याच त्या तंदुरुस्त झाल्या. आजही कडाक्याची थंडी वगळता त्यांचा पोहण्याचा नित्यक्रम सुरू आहे.

नव्या पिढीसाठी प्रयत्न

आपल्या नातवंडांच्या वयाच्या पोहण्यासाठी इच्छुक लहानग्यांनाही त्या पाण्याची गोडी निर्माण करतात. कुठेही अधिकृत प्रशिक्षक म्हणून राहण्याऐवजी आपल्याकडून पोहणे शिकणाऱ्या नातवाएवढ्या शिष्यासोबत गोड जेवण इतकीच त्यांची गुरुदक्षिणा! नवीन पिढीत पोहण्याची आवड रुजावी यासाठी वयाच्या आठव्या दशकातही निर्मलाताई प्रेरणा देत उभ्या आहेत. प्रपंचापासून तर करिअरपर्यंत अनेक आघाड्यांवर कसरत करताना आज महिलांसाठी आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. ती जपण्यासाठी तुम्ही तुम्हाला रूचेल तो व्यायाम नक्की करा, एवढा कानमंत्रही निर्मलाताई नव्या पिढीतील महिलांना महिला दिनानिमित्त द्यायला विसरत नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनी लुटला रंगपंचमीचा आनंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बंदोबस्त, गस्त, शिस्त, तपास यात सतत गुंतून पडलेल्या पोलिसांनी रविवारी रंगपंचमी उत्साहात साजरी केली. पोलिस आयुक्तांसह उपस्थित सर्वांनी विविध गाण्यांवर ठेका धरला आणि एकमेकांना रंग लावत आंनद लुटला.

सण, उत्सवादरम्यान बंदोबस्तात आयुष्य खर्ची घालणाऱ्या पोलिसांना निवांतपणा मिळतच नाही. कुटुंबासह एखादा कार्यक्रम साजरा करणे दुरापास्त होणे हे पोलिसांसाठी नवीन नाही. जीवनातील छोट्या-छोट्या आनंदाला मुकलेला माणूस शेवटी दडपणाखाली येतो. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. नाटक-सिनेमे पाहणे, ट्रेकिंग, वाढदिवस साजरे करणे हा त्यातीलच भाग! प्रत्येक कार्यक्रमादरम्यान पोलिसांचे कुटुंब हजर असावे, याकडेही लक्ष पुरविले जाते. मंगळवारी रंगपंचमी सर्वत्र साजरी केली जाईल. पण, खाकीवर्दीतील पोलिसांना बंदोबस्ताच्या कामातच न्हाऊन जावे लागेल. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी रविवारी पोलिस व त्यांच्या कुटुंबीयासाठी रंगपंचमीचा कार्यक्रम ठेवला. हा कार्यक्रम पोलिस मुख्यालयात झाला. पाण्याने भरलेले पिंप, बादल्या, रंगाने भरलेली ताटे, पोलिस बँड, साउंड सिस्टीम असा माहोल जमून आला. पोलिस आयुक्तांसह सर्वांनीच विविध गाण्यांवर ठेका धरला. पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, सर्व वरिष्ठ अधिकारी, पोलिस निरीक्षक यावेळी हजर होते. अगदी छोट्या आनंदातून आपल्याला उर्मी मिळते. सतत काम करणाऱ्या पोलिसांना अशी उर्मी मिळावी, त्यातून समाजाप्रती त्यांचे काम आणखी उजवे ठरावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. सिंगल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा संकुलात सॅनिटरी नॅपकिन मशिन

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

नाशिक : मासिक पाळी काळात महिला खेळाडूंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासंदर्भातील समस्यांवर 'मटा'ने प्रकाश टाकताच त्याची दखल घेण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या पुढाकाराने आणि विविध संस्थांच्या सहभागातून राज्यात आदर्श ठरावे, असे कार्य घडत आहे. मुंबई-आग्रा हायवेवरील विभागीय क्रीडा संकुलात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन बसवले जात असून, राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आज, सोमवारी होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्सने 'वाट स्वच्छ आरोग्याची' हा उपक्रम हाती घेतला असून, त्या अंर्तगत या विषयावर विविध क्षेत्रात जनजागृती केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर खेळाडूंना मासिक पाळीच्या कालावधीत येणाऱ्या अडचणी, 'अडचणींचा सामना' या फोकसमध्ये मांडण्यात आल्या होत्या. या समस्या नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या निर्दशनास आल्यानंतर आपणही या उपक्रमात सहभागी होऊन महिलांच्या अडचणी सोडवाव्यात, असा त्यांनी निर्धार केला. या उपक्रमासाठी सरकारी पातळीवर कोणत्याही स्वरुपाची आर्थिक तरतूद नसताना त्यांनी लोकसहभागातून हे मशिन विभागीय क्रीडा संकुलात बसवले आहे. या सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिनचे उद्घाटन आज (सोमवार) विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या हस्ते होणार आहे. याचवेळी विभागीय आयुक्त कार्यालयाने आयोजित केलेल्या 'चला खेळूया' या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटनदेखील करण्यात येणार आहे.

शिवाजी स्टेडियममध्येही लवकरच सुविधा

हा उपक्रम सर्व जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून, विभागीय क्रीडा संकुलानंतर दुसऱ्या टप्प्यात हे मशिन छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे बसविण्यात येणार आहे. या मशिनसाठी नाशिक जिल्हा फुटबॉल असोसिएशनने आर्थिक सहकार्य केले आहे. या ठिकाणी अनेक महिला खेळाडू सरावासाठी येत असतात. त्यांना हे फायद्याचे ठरणार आहे.

अनेक महिला खेळाडूंना स्पर्धेच्यावेळी मासिक पाळी आली, तर त्याबाबत वाच्यता होत नव्हती. परंतु, त्याबाबत आता चांगली जनजागृती झाली आहे. महिला खेळाडू बोलू लागल्या आहेत. 'मटा'ने या विषयाला वाचा फोडली. महिलांच्या सामन्यावेळी सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठीच हे मशिन उपलब्ध होत आहे.

- रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images