Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वाचनसंस्कृतीचे दुवे- क्रांती वाचनालय

$
0
0


देवळाली कॅम्प : देवळालीच्या लामरोड भागात असलेल्या धार्मिक वातावरणाला मराठा विद्या प्रसारक समाजाच्या महाविद्यलयाच्या माध्यमातून शिक्षणाची जोड मिळाली होती. या वातावरणाला अनुसरून येथील नागरिक व युवकांवर वाचनाचे संस्कार व्हावेत, या उद्देशाने १९८४ साली स्थापन झालेल्या क्रांती मित्र मंडळाने १५ ऑगस्ट १९९३ मध्ये 'क्रांती सार्वजनिक वाचनालय' स्थापन केले.

अवघी शंभर पुस्तके, दोन वर्तमानपत्रे, एक टेबल-खुर्ची एवढ्या सामग्रीवर सुरू झालेल्या या वाचनालयाची दिवसेंदिवस प्रगती होऊन आज १५ हजार ५०० हून अधिक ग्रंथसंपदा झाली आहे. अनेक देणगीदारांनी पुस्तक व वस्तूरुपाने या वाचनालयास मदत केली आहे. सातत्याने वाढता वाचकवर्ग लाभत गेल्याने वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचे कै. ग्रंथभूषण यशवंतराव शिंदे गुरुजी व कै. खासदार उत्तमराव ढिकले यांच्याकडून प्रेरणा घेऊन क्रांती वाचनालयाच्या उभारणीस प्रारंभ झाला.

क्रांती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बळवंतराव गोडसे, रमेश धुर्जड, श्रीधर धुर्जड, रामचंद्र गोडसे, मधुकर हारक, बापू धोपावकर, काशिनाथ धुर्जड, मोहन धुर्जड, बाळासाहेब खातळे आदि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली येथील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. नाशिकचे प्रथम महापौर कै. शांताराम बापू वावरे, तत्कालीन पालकमंत्री पुष्पाताई हिरे यांच्या हस्ते वाचनालयाचा शुभारंभ करण्यात आला. माजी आमदार तुकाराम दिघोळे यांनी या वाचनालयासाठी एक हजार रुपये सर्वप्रथम प्रथम देणगी दिली.

वाचनालयाच्या कार्यपद्धतीमुळे सन १९९७ -९८ चा राज्य शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार,देवळाली रोटरी क्लबचा आदर्श संस्था पुरस्कार,पत्रकार संघाचा दारणा गौरव पुरस्कार, नाशिकरोडच्या संघवी प्रतिष्ठानचा नाशिकरोड गौरव पुरस्कार, देवळाली रोटरी क्लबचा आदर्श संस्था पुरस्कार असे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

स्पर्धा परीक्षांची पुस्तके

या वाचनालयात येणाऱ्या विद्यार्थी व युवा वर्गाला त्याचा खऱ्या अर्थाने लाभ व्हावा, येथील ग्रंथसंपदेमध्ये स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा समावेश असावा या उद्देशाने गेल्या १० वर्षांत माजी मंत्री माजी आमदार बबनराव घोलप यांच्यासह आमदार योगेश घोलप यांनी स्थानिक स्वराज्य विकासनिधीअंतर्गत लाखो रुपयांची पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. येथील स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांच्या उपलब्धतेमुळे सध्याचे नाशिकचे विक्री कर निरीक्षक गणेश गाढवे यांसह अनेक सरकारी अधिकारी झालेल्या युवकांनी आपले स्वप्न साकार केले आहे. याच परंपरेत आज महाविद्यालयीन विद्यार्थी येथील पुस्तकांचा वापर करीत शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील विशेषतः शेवगे दारणा, संसरी, नानेगाव, राहुरी, दोनवाडे, लहवित आदी गावांसह सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील विद्यार्थी या वाचनालयाचा लाभ घेत आहे. वाचनालयाच्या माध्यमातून येथे राष्ट्रीय सण, उत्सव, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, वाचक दिन, मराठी दिन साजरे करण्याबरोबर ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी गुणगौरव, महिला गौरव, रक्तदान असे उपक्रम वेळोवेळी राबविले जातात.

रोज ५० वाचक

सर्व सभासद वर्षातून वेळोवेळा येथे होणाऱ्याविविध उपक्रमांना हजेरी लावत असतात. किमान २० वाचक सभासद नियमित पुस्तकांची देवाण घेवाण करतात. ज्येष्ठ नागरिकांसह ५० वाचक दररोज येथील दैनिक व साप्ताहिक वाचन करण्यासाठी येथे हजेरी लावतात. वाचनालयात येणाऱ्या प्रत्येकास त्याला हवे असलेले ( उपलब्ध असल्यास ) उपलब्ध करून दिले जाते. दर्जेदार व वाचनीय पुस्तके व ग्रंथांच्या अनेक प्रती असल्याने शक्यतो वाचकांना ते मिळतेच. मासिक फी कमी असल्याने वाचक वाढत आहेत. त्यात महिन्यातून कितीही वेळा पुस्तके बदलून दिली जातात. सर्व वाचक नियमित पुस्तकांची देवाण-घेवाण करीत असल्याने वेळेवर परत करण्याचा प्रश्न उदभवत नाही. गेल्या काही वर्षांत वाचकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याप्रमाणे पुस्तकेही वाढविण्यात आली, यामध्ये प्रामुख्याने वाचक वर्गाचा कल लक्षात घेऊन पुस्तके खरेदी केली जात असतात. सध्या १ संगणकाच्या आधारे कामकाज चालते.

आकडे बोलतात

१३० सभासद, ३५ नियमित वाचक, ११० मासिक वाचक,

१५ दैनिक, ५ साप्ताहिके, २ पाक्षिक, १३ मासिके, ४ वेद, १८ पुराणे, ५ विश्वशब्दकोश

याशिवाय धार्मिक पुस्तकांमध्ये दासबोध, भागवत, गीता, सुलभ ज्ञानेश्वरी, कुराण यांसह १२०० हून अधिक बालसाहित्य, ७०० हून अधिक धार्मिक ग्रंथ, ५ हजार पेक्षा जास्त कांदबरी व कथासंग्रह, ५०० हून अधिक ऐतिहासिक पुस्तके व संदर्भग्रंथ, ८०० हून अधिक स्पर्धा परीक्षा तर ३०० हून अधिक व्यक्तिमत्व विकास पुस्तके. याशिवाय पत्रकारिता, शेती, खेळ, चरित्र व वैज्ञानिक पुस्तके इतर भाषांमध्ये गुजराती व इंग्रजी तसेच काहिशा प्रमाणात हिंदी पुस्तके वाचनासाठी उपलब्ध आहेत.

वाचनाच्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी निर्माण होते स्पर्धेच्या युगात वाचनसंस्कृतीला महत्व देणे गरजेचे आहे. देवळालीत एकही शासकीय वाचनालय उपलब्ध नसल्याने लामरोडसारख्या गजबजलेल्या परिसरात पुढील पिढीवर बौद्धिक व धार्मिक संस्कार या वाचनालयाच्या माध्यमातून घडत आहे. याशिवाय परिसरातील सेवानिवृत्त नागरिकांसह ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी असा वाचक वर्ग आहे. त्यामुळे वाचनालयाच्या वेळेत सतत येथे माणसांचा राबता असतो.

- सुधाकर गोडसे, अध्यक्ष

देवळाली कॅम्प परिसरात वाचन संस्कृती रुजविण्यामध्ये क्रांती वाचनालयाचे बहुमूल्य योगदान आहे. आपण स्वतः शाळेत असल्यापासून आजपर्यंत या वाचनालयातील पुस्तकांचा वापर करीत आहोत. आज मी जे काही आहे त्यात या वाचनालयाचा सिंहाचा वाटा आहे हे सांगतांना मला अभिमान वाटतो. वाचनालायाची वाटचाल वृद्धिंगत होत राहो.

- गणेश गाढवे पाटील, राज्य कर निरीक्षक, वाचक

वयोवृद्ध नागरिकांना या वाचनालयामुळे आपला वेळ सार्थकी लावण्यासाठी संधी उपलब्ध आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक या ग्रंथालयात येत कांदबरी, चरित्र व धार्मिक ग्रंथाचे वाचन करतात. याशिवाय सकाळच्यावेळी वर्तमानपत्रे व टीव्हीवरील बातमीपत्र पाहण्याचा लाभ घघेत विचारंची देवाणघेवाण करत असतात.

- वंदना माळी, ग्रंथपाल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साल्हेरला आदर्श ग्राम करणार

$
0
0

संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

साल्हेर गावाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला आहे. साल्हेरसह परिसरातील ५० आदिवासी खेड्यांचा विकास करण्यासाठी आपण साल्हेरला एक आदर्श ग्राम निर्माण करण्याचे आपले स्वप्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

बागलाण तालुक्यातील साल्हेर गावांची संसद ग्राम दत्तक योजनेसाठी निवड करण्यात आल्यानंतर प्रथमच याठिकाणी बीएसएनएलच्या टॉवरचे उद्घाटन डॉ. भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. रविवारी (दि. ११) झालेल्या कार्यक्रमानंतरच्या आढावा बैठकीत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन होते. याप्रसंगी आपल्या भाषणात केंद्रींय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे म्हणाले, संसद ग्राम दत्तक योजनेसाठी साल्हेर गावाची निवड करण्याने आपणास आनंद होत आहे. यामुळे परिसरातील ५० गावांचा विकास करणे शक्य होणार आहे. बागलाण विधानसभा मतदार संघातील सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले आहेत, असेही डॉ. भामरे म्हणाले. त्यामुळे परिसरातील हरणबारी डावा कालवा, तळवाडे-भामेर पोहच कालवा या कामांना आपण निधी दिला आहे. तर केळझर चारी क्र. आठकरिता सुमारे ४ कोटी ५० लाख रुपये इतका निधी अंतिम मंजुरीसाठी प्रतहक्षेत असल्याची माहिती डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. याप्रसंगी व्यासपिठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, बिंदूशेठ शर्मा, रमेश देवरे, डॉ. शेषराव पाटील, पोपटराव अहिरे, पोपटराव गवळी, गणेश अहिरे, शंकरराव सावंत, श्रीधर कोठावदे, संजय वाघ शिरसमणीकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रोव्हिजनल गुणवत्ता यादी लांबणीवर

$
0
0

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशार्थींचे डोमेसाइलबाबतच्या सुनावणीकडे लक्ष

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्राच्या डोमेसाइलधारक विद्यार्थ्यांनाच वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशांसाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळावा, यासाठी आता राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. ही याचिका दाखल झाल्याने आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल गुणवत्ता यादी जाहीर करण्याची प्रक्रिया पुढे ढकलली आहे.

महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमडी, एमएस, एमडीएस यासारख्या अभ्यासक्रमात राज्याच्या ५० टक्के प्रवेश कोट्यात परप्रांतातील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला होता. यावर राज्यातील विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग अधिक आव्हानात्मक होणार असल्याने शासनाकडून विद्यार्थ्यांना अपेक्षा होत्या. विद्यार्थ्यांच्या भावना विचारात घेत आता या प्रकरणी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात या मुद्द्यावर याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी पुढील आठवड्यापर्यंत सुनावणी होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत प्रोव्हिजनल गुणवत्ता यादी आणखी काही दिवसांनी जाहीर करण्यात येणार असल्याचे डीएमईआरच्या सूत्रांनी सांगितले.

अशी आहे विद्यार्थ्यांची नाराजी …

वैद्यकीय शिक्षणात पदव्युत्तर पदवीसाठी देशभरातील सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहेत. इतर अनेक राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांची स्थिती चांगली आहे. परिणामी, स्थानिक विद्यार्थ्यांचे स्थानिक ठिकाणी शिक्षणास प्राधान्य आहे. परराज्यातील विद्यार्थी येथे शिक्षण घेऊन पुन्हा सेवेसाठी मूळ राज्यात परत जातात. महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या व्यस्त प्रमाणात आहे. हे गुणोत्तर वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. या स्थितीत राज्याच्या कोट्यातून परराज्यातील विद्यार्थ्यांच्या वाट्याला जागा गेल्यास महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची प्रवेशाची स्थिती बिकट होईल, अशी भीती विद्यार्थ्यांच्या मनात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांसाठी मॉडेल प्रसाधनगृहे बसविणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाणीबचतीसाठी नवे तंत्रज्ञान वापरून तीन कोटी लिटर पाणी वाचविणे व महिलांसाठी मॉडेल सार्वजनिक प्रसाधनगृहे उभारण्याचा तसेच रेनवॉटर हार्वेस्टिंग लॅब स्थापन करण्याचा मानस इंडियन प्लंबिंग असोसिएशने व्यक्त केला. जागतिक प्लंबिंग दिनानिमित्त आयोजित 'सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे आधुनिक शहरांसाठीचे महत्त्व' या विषयावर आयोजित चर्चासत्रात ही योजना इंडियन प्लंबिंग असोसिएशनने व्यक्त केली.

पाणी हे खूप मूल्यवान असून, मानवाने नैसर्गिक संसाधनांचा मोठ्या प्रमाणात वापर व गैरवापर केल्याने आता त्या संसाधनांना जपण्याची व बऱ्याच गोष्टींवर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याची आवश्यकता आहे. सांडपाणी प्रक्रिया हा त्यातीलच एक महत्त्वाचा भाग आहे. सर्वांनी या सांडपाणी प्रक्रियेतून शुद्ध झालेल्या पाण्याच्या वापराबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचा सूर या चर्चासत्रात निघाला.

चर्चासत्रात नाशिक महापालिकेचे कार्यकारी अभियंता (पर्यावरण) नितीन वंजारी, महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्डाचे प्रभारी आर. यू. पाटील, बिल्डर्स असोसिएशन ऑफ नाशिकचे अध्यक्ष गोपाल अटल, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष सुनील कोतवाल, ग्रीन अॅक्ट एनव्हायर्न इंजिनीअरिंग प्रा. लि. चे संचालक विजय घोलप व इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष मिलिंद शेटे सहभागी झाले होते.

लोकसंख्या वाढीमुळे जुन्या काळातील सेफ्टी टँक कालबाह्य झाले असून, मोठी गृह संकुले, उद्योग, हॉस्पिटल्स यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे नियमानेही बंधनकारक आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी मोठी रक्कम व नंतर त्याच्या देखाभालीसाठीही बराच खर्च आहे. परंतु, मोठ्या गृहप्रकल्पात बांधकाम व्यावसायिकांकडून बिल्डिंग पूर्णत्वानंतर याच्या देखभालीची जबाबदारी तेथे राहणाऱ्ंयावर येते. त्यामुळे काही प्रमाणात अशा प्रकल्पांना घरपट्टीमध्ये सवलत द्यावी अशी अपेक्षाही चर्चेदरम्यान व्यक्त केली गेली. आपला देश प्रगतीकडे जात असून, एका प्रगत देशामध्ये नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर व अधिकाधिक प्रक्रिया करून वापराबाबत सामुदायिक प्रयत्नांच्या गरजेवरही चर्चासत्रात मंथन केले गेले. इंडियन प्लंबिंग असोसिएशन ही संस्था २५ हून अधिक वर्षांपासून पाणी बचत, सांडपाण्याचे नियोजन, आदर्श प्लंबिंग प्रणाली यासाठी प्लंबर, अभियांत्रिकी विद्यार्थी, गृहिणी व प्लंबिंग ठेकेदार यांच्यात जनजागृती व प्रशिक्षणाचे काम करीत आहे.

प्रास्ताविक इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक चॅप्टरचे उपाध्यक्ष प्रदीप आबड यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात अध्यक्ष मिलिंद शेटे यांनी या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, जनजागृती व नव्या पिढीला प्रशिक्षण देणे ही आमची प्राथमिकता असून भारतातील प्लंबिंग स्तर जागतिक स्तरावर नेणे हे आमचे उद्दिष्ट आहे. पाणी बचतीसाठी तीन वर्षांपासून गृहिणींना मोफत प्लंबिंग मेंटेनन्स प्रशिक्षणही देण्यात येत आहे.

पारितोषिक वितरण

जागतिक प्लंबिंग दिनानिमित्त आयोजित चित्र रंगवा स्पर्धा, पोस्टर स्पर्धा व महिला प्लंबर स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. हे विजेते असे- शिल्पा कुट्टी, रिया परदेशी, मानव यादव, अथर्व कमान, तनिषा तातेड, सोनाली चौधरी, नीलेश क्षीरसागर, गौरव जाधव, प्रगती काळे, निशा सोनाईकर, रेणुका काकड, विद्या घाटे यांसह राष्ट्रीय विजेते प्रगती काळे, प्राची कुलकर्णी, वरिष्ठ प्लंबर गुलाब वाडकर यांनीही गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा लाखांचे दागिने चोरीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कपाटाला विसरलेल्या चावीची संधी साधून अज्ञात चोरट्याने कपाटात ठेवलेल्या १० लांखांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार कॉलेजरोड परिसरात घडला. या प्रकरणी रवींद्र सुदाम पाटील (वय ५२, रा. श्री. जी. पार्क, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे.

पाटील हे गुरुवारी (ता.८) काही कामानिमित्ताने मुंबईला गेले होते. मात्र, जाताना घरातील कपाटाची चावी कपाटाला विसरून गेले. त्यावेळी घरात त्यांची मुलगी आणि मोलकरीण अशा दोघीच होत्या. दोन दिवसांनी गावावरून परतले असता कपाटातील सुमारे ९ लाख ९० हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांच्या कपाटातील १ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, १ लाख १० हजार रुपयांचा सोन्याचा नेकलेस, ८० हजार रुपयांचा पेशवाई नेकलेस, १ लाख ६० हजार रुपयांचा सोन्याचे गोटप्लेन, १ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे भरीव तोडे, १ लाख रुपयांचे पेशवाई पाटल्या, १ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याच्या बांगड्या, १ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे पाटल्या असा ९ लाख ९० हजार रुपयांचा सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. या प्रकरणी त्यांनी गंगापूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एस. एस. वाघ करीत आहेत.

सातपूरला महिलेचा विनयभंग

सातपूर येथील रेशन दुकानावर धान्य खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा एका युवकाने विनयभंग केल्याप्रकरणी संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सातपूर येथील स्वारबाबानगरमध्ये घडला. विनायक उर्फ नाना अर्जुन गांगुर्डे (रा. स्वारबाबानगर, सातपूर) असे विनयभंग करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता.१०) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पीडित महिला रेशन दुकानावर धान्य घेण्यासाठी गेली असता संशयित गांगुर्डे हा पाठीमागून आला आणि त्याने अश्लिल चाळे करीत त्या महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी सातपूर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौभाग्यनगरला चोरी

बेकरी व फूड प्रॉडक्ट विक्री करणाऱ्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कमेसह सुमारे २५ हजार रुपयांचे मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार वडनेर रोडवर घडला. या प्रकरणी जसवंत चव्हाण (रा. सौभाग्यनगर, लॅमरोड, नाशिकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. जसवंत चव्हाण यांचे वडनेर रोडवर श्री बालाजी वेफर्स अॅण्ड फूड प्रॉडक्ट या नावाचे दुकान आहे. गेल्या शुक्रवारी रात्री १० वाजता चव्हाण हे दुकान बंद करून घरी गेल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने दुकानातून १० हजार २०० रुपयांची रोकड, ५ हजार रुपयांचा टीव्ही, १० हजार रुपयांचा डिव्हिआर आणि जमिनीचे कागदपत्रे, बँकेचे चेकबुक, पासबुक असा २५ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी उपनगर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल लांबवला

शहरात मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, नाशिकरोड येथील उड्डाणपुलाखाली असलेल्या भाजीमार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या युवकाच्या खिशातून १४ हजार रुपयांचा मोबाइल चोरट्याने लंपास केला. या प्रकरणी प्रसाद उत्तमराव जाधव (रा. जाधव हाऊस, टाकळी विंचूर, ता. निफाड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, जाधव हा १ मार्च रोजी नाशिकरोडच्या उड्डाणपुलाखाली भाजीबाजारात गेला असता, त्याच्या पॅण्टच्या खिशातून अज्ञात चोरट्याने १४ हजार रुपयांचा विवो कंपनीचा मोबाइल चोरून नेला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीईसाठी साडेदहा हजार अर्ज

$
0
0

चारशे अर्जांची वाढ ; पहिली सोडत मंगळवारी

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांकरिता ऑनलाइन अर्ज करण्याच्या मुदतअखेर रविवारी सायंकाळपर्यंत १० हजार ४०३ अर्जांची नोंद शिक्षण विभागाकडे करण्यात आली. या प्रक्रियेत सर्वांना सहभागी होता यावे, यासाठी चार दिवसांची मुदत वाढविण्यात आली होती. ही वाढीव मुदत रविवारी सायंकाळी संपली.

वाढीव मुदतीमध्ये सुमारे ४०३ अर्जदारांची भर पडली आहे. दरम्यान, उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्ज जास्त असल्याने मंगळवारी (१२ मार्च) पहिली सोडत शिक्षण विभागाच्या वतीने जाहीर केली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये ४६६ शाळांमधून आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ६५८९ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी मुदतीअखेर १० हजार ४०३ अर्ज दाखल झाले आहेत. सुमारे साडेतीन हजार अर्ज जास्त आहेत. अगोदर हे अर्ज दाखल करण्यासाठी ७ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. नंतर या मुदतीत वाढ करण्यात आली.

आरटीई अंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळांमध्ये स्वयं अर्थसहाय्यित, कायम विनाअनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळून), नर्सरी, प्राथमिक शाळा (इयत्ता पहिलीसाठी) ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

कागदपत्रे ठेवा सोबत

आरटीई अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे त्यांना काही कागदपत्रेही गरजेचे असणार आहेत. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उत्पन्नाची अट नसली तरीही जातीचे प्रमाणपत्र गरजेचे असणार आहे. इतर प्रवर्गातील पालकांसाठी सन २०१६-२०१७ या वर्षाचा एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला बंधनकारक आहे.

महत्त्वाच्या तारखा :

- पहिली सोडत : १३ मार्च

- प्रत्यक्ष प्रवेशाची मुदत : १४ ते २४ मार्च

- जागांची अद्ययावत माहिती जाहीर करणे : २४ ते २७ मार्च

- दुसरी सोडत : २८ ते ३१ मार्च

- प्रत्यक्ष प्रवेशाची मुदत : २ ते १२ एप्रिल

- जागांची अद्ययावत माहिती : १३ ते १६ एप्रिल

- तिसरी यादी : १७ व १८ एप्रिल

- प्रत्यक्ष प्रवेशाची मुदत : १९ एप्रिल ते ३ मे

प्रतिपूर्तीच्या रकमेहून लढा

वाढलेल्या मुदतीचा लाभ नगर जिल्ह्याव्यतिरिक्त उर्वरित सर्व जिल्ह्यांना झाला आहे. परिणामी रविवारी संध्याकाळपर्यंत वाढीव मुदतीचा फायदा घेत नवीन अर्ज दाखल झाले आहेत. ज्या शाळांना कोर्टाने आरटीई प्रवेशासाठी स्थगिती दिली आहे, त्या शाळा वगळून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या शाळांना २०१२ पासून देण्यात येणारी शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम थकण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे इंडिपेंडंट स्कूल असोसिएशन (इसा) या संघटनेने कोर्टात दावा दाखल केला होता. यावर औरंगाबाद हायकोर्ट खंडपीठाने सकारात्मक निर्णय देत या प्रवेशांना १४ मार्चपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विम्याचे सव्वाआठ लाख देण्याचे आदेश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अपघात झालेल्या वाहनावर शिकाऊ ड्रायव्हर असल्याचे कारण देत विमा नाकारणाऱ्या न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीला ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दणका देत वाहनधारकाला विम्याचे ८ लाख २० हजार रुपये व्याजासह देण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे कंपनीला १५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. यात शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार व अर्जाचा खर्च पाच हजाराचा समावेश आहे.

दिंडोरी तालुक्यातील वणी येथे राहणाऱ्या अजय बाळू सावंत यांनी केलेल्या तक्रारीनंतर न्यायमंचाने हा निकाल दिला आहे. या तक्रारीत सावंत यांनी म्हटले आहे की, आपणाकडे व्हेर्ना कार आहे. त्याचा विमा काढलेला होता. सदर वाहन भाचा साहिल जावरे याला दिले होते. तो वणी येथे मित्रांसोबत जाताना कारचा खांडे मळ्याजवळ अपघात झाला. कार झाडाला आदळून पलटी झाली. त्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर रीतसर विम्यासाठी दावा दाखल केला. पण, अॅश्युरन्स कंपनीने भाचा साहिल याच्याकडे योग्य व वैध वाहन चालविण्याचा परवाना नाही म्हणून दावा नाकारला.

या तक्रारीवर न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीने दावा नाकारण्याचे कारण सांगताना म्हटले की, साहील जावरे यांच्याकडे कार चालविण्याचा कोणताही वैध परवाना नसताना त्याच्याकडे कार सुपूर्द केली. त्यामुळे अटी व शर्तींचा भंग झाला आहे. जावरे यांच्याकडे एलएमव्ही ट्रॅक्टर चालविण्याचा शिकाऊ परवाना होता. अपघात झाला त्यावेळी त्याने वाहनावर एल हे अक्षर लावले नव्हते. तोदेखील अटी व शर्तीचा भंग असल्याचे म्हटले.

सेवेतील कमतरतेचा ठपका

या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमंचाने निर्णय दिला. त्यात साहील जावरे याच्याकडे एलएमव्ही ट्रॅक्टर व कारचे दोन्हीही शिकाऊ परवाने होते. त्याच्याशेजारी त्याचा मित्र इम्रान शेख सलीम हा पर्मनंट लायसन्स असलेला चालक बसला होता. एल अक्षरांचे स्टिकर लावले नाही असे कंपनीने सांगितले असले तरी त्यामुळे अपघात झाला, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे कोणतेही योग्य कारण नसताना दावा नाकारलेला आहे. ही बाब सेवेतील कमतरता आहे. त्यामुळे न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीने वाहन मालक अजय बाळु सावंत यांना व्याजासह विमा दाव्याची रक्कम ८ लाख २० हजार द्यावी. त्याचप्रमाणे १५ हजाराचा दंडही द्यावा. हा निर्णय न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे व सदस्या प्रेरणा काळुंखे - कुलकर्णी यांनी दिला. सावंत यांच्याकडून अॅड. एच. आर. पाटील यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय विद्यार्थ्याची रेल्वेखाली आत्महत्या

$
0
0

देवळाली कॅम्प : येथील महालक्ष्मी मंदिर परिसरातील शालेय विद्यार्थी सचिन मधुकर पाळदे (वय १४) याने रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सेवाग्राम एक्स्प्रेसखाली आत्महत्या केली. सचिन हा देवळाली हायस्कूलचा विद्यार्थी आहे. घरात शिकवणीसाठी जातो असे सांगून तो घराबाहेर पडला होता. लालपूल परिसरात त्याने मुंबईकडे जाणाऱ्या सेवाग्राम एक्स्प्रेसखाली आत्महत्या केली. यावेळी येथून जाणाऱ्या एक नागरिकाने देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनला याबाबत माहिती दिली. त्याच्या पश्च्यात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावकरांनी दिला एकतेचा संदेश

$
0
0

नाशिक ग्रामीण पोलिस दलातर्फे आयोजित 'रन फॉर युनिटी' ला प्रतिसाद

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

'आओ सब दौड ले, दिल को दिलसे जोड ले' असा नारा देत रविवारी (दि. ११) हजारो मालेगावकर 'रन फॉर युनिटी मालेगाव मॅरेथॉन २०१८' मध्ये धावले.

नाशिक ग्रामीण पोलिस दल व शांतता समितीच्या वतीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. याला मालेगावकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. भल्या पहाटे शहरातील अबालवृद्धांनी मॅरेथॉनमध्ये धावत एकतेचा संदेश दिला. शहरात प्रथमच अशा भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी येथील पोलिस दल तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली होती. शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने ५ हजारांहून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली होती. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी शनिवारी (दि. १०) सायंकाळी 'आओ और गावो' हा गीतगायन कार्यक्रमदेखील घेण्यात आला.

तीन, पाच व दहा किमी. अशा तीन गटांत ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. शहरातील एकात्मता चौक पोलिस परेड मैदानपासून मॅरेथॉनला प्रारंभ झाला. प्रारंभी दहानंतर पाच व तीन किमीची मॅरेथॉनला फ्लॅग दाखवण्यात आला. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे, अप्पर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे, आर्यन मॅन सुमेध वाव्हळ आदी मान्यवरांनी मॅरेथॉनला फ्लॅग दाखवत शुभारंभ केला.

मान्यवरांनी धरला ठेका

शहरातील एकात्मता चौकापासून मोसमपूल, शिवाजी पुतळा, नवीन बसस्थानक, फरान हॉस्पिटल ते परत एकात्मता चौक अशा मार्गाने स्पर्धक उत्साहाने धावले. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी जागोगाजी ढोलताशा पथक, देशभक्तीपर गीते वाजविण्यात येत होती. तसेच विविध सामाजिक संस्थाकडून पाणी, ज्यूस, चॉकलेट आदींचे स्टॉल लावण्यात आले होते. विविध गटांत धावण्यासाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. अनेकांनी पहिल्यांदाच मॅरेथॉनमध्ये धावण्याचा अनुभव घेतल्याने थकले तरीदेखील एकतेसाठी धावायचे आहे, असा उत्साह स्पर्धकामध्ये दिसून येत होता. या वेळी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णनदेखील उपस्थित राहिले. नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने शहराच्या एकात्मतेसाठी आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्तुत्य उपक्रम असून, शहरवासियांनी दिलाला प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी गाण्यांवर ठेका धरला तर विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

'आय एम फिनिशर!'साठी गर्दी

मॅरेथॉनच्या समारोपप्रसंगी पोलिस परेड मैदानावर शहरातील विविध कलावंतानी आपले नृत्य , गायन सादर करून सहभागी झालेल्यांना प्रोत्साहित केले. आपण धावलो...आणि शर्यत पूर्ण केली याचा आनंद अनेकांच्या चेहऱ्यावर ओसंडत होता. सहभागी झालेल्या प्रत्येकाला मेडल देण्यात आल्याने 'आय एम फिनिशर' या पॉडेमवर सेल्फी घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. भल्या पहाटे 'रन फॉर युनिटी'साठी शहरातील विविध मान्यवरदेखील धावले. यात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह पोलिस उपअधीक्षक राजमाने, अजित हगवणे, प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभागी होत उत्साह दाखवला.

ज्येष्ठ नागरिकांनी वेधले लक्ष

या मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिक गटात ८२ वर्षीय बी. के. देवरे हे सर्वाधिक वयस्कर धावपटू होते. तसेच अण्णा कापडणीस (वय ७०) यांनी ज्येष्ठ नागरिक गटात १० किमी मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. यासह वैशाली शेलार, डॉ. असिफा शेख, अफरोज शेख, मालेगावचा आंतरराष्ट्रीय धावपटू भिकू खैरनार यांनी लक्ष वेधून घेतले. मुस्लिम महिलांचादेखील सहभाग लक्षणीय ठरला.

मॅरेथॉनचा निकाल पुढीलप्रमाणे...

..दहा किलोमीटर..

(३६ ते ४५ वयोगट, पुरुष) - भिक्कू खैरनार (प्रथम), डॉ. विनीत देवरे (द्वितीय), पंकज पहाडे ( तृतीय)

(३६ ते ४५ वयोगट, महिला) - वैशाली शेलार (प्रथम), निरुपमा कासलीवाल (द्वितीय), स्वाती वाघ (तृतीय)

...........................................

(४६ ते ५५ वयोगट, पुरुष) - राजेश दुग्गड(प्रथम), रवी शेलार(द्वितीय), संजय पवार(तृतीय)

(४६ ते ५५ वयोगट, महिला) - डॉ. गिता तेलरांधे (प्रथम), अर्चना डावरे (द्वितीय)

...........................................

(१८ ते २५ वयोगट, पुरुष) - हिमांशू बोरसे (प्रथम), देव पठारे (द्वितीय), अमोल महाले (तृतीय)

(१८ ते २५ वयोगट, महिला) - योगिता वाघ (प्रथम), श्रद्धा पवार(द्वितीय), सरवद्या पवार(तृतीय)

...........................................

(२६ ते ३५ वयोगट, पुरुष) - विनोद पगारे (प्रथम), शफीक शेख (द्वितीय)

(२६ ते ३५ वयोगट, महिला) - वैष्णवी राऊत (प्रथम)

...........................................

खुला गट - काशिनाथ कापडणीस (प्रथम), डॉ. विलास बागडे (द्वितीय), दादाजी भारती (तृतीय)

...........................................

पाच किलोमीटर (खुला गट, पुरुष) - मोहन शिंदे(प्रथम), द्वारकादास तापडिया (द्वितीय), शिरीष कलंत्री (तृतीय)

पाच किलोमीटर (खुला गट, महिला) - साक्षी जोहरे (प्रथम), हिराबाई आहिरे (द्वितीय), दीप्ती चिंधडे (तृतीय)

...........................................

(४६ ते ५५ वयोगट, पुरुष) - मुकेश भोये - (प्रथम), सुधाकर महाजन(द्वितीय), नरेंद्र परदेशी(तृतीय)

(४६ ते ५५ वयोगट, महिला) - दीपाली मगर (प्रथम), अंजू लोढा (द्वितीय), माधवी ओस्तवाल(तृतीय)

...........................................

(३६ ते ४५ वयोगट, पुरुष) - हरिभाऊ खैरनार (प्रथम), उत्तम मानकर (द्वितीय), बाळासाहेब जगताप(तृतीय)

(३६ ते ४५ वयोगट, महिला) - डॉ. रोहिणी पाटील(प्रथम), वैशाली खैरनार(द्वितीय)

...........................................

(२६ ते ३५ वयोगट, पुरुष) - सचिन हिरे (प्रथम), पंकज चित्ते (द्वितीय), सोमेश महाजन (तृतीय)

(२६ ते ३५ वयोगट, महिला) - परेना बाहेती (प्रथम), मधू ओस्तवाल(द्वितीय)

...........................................

तीन किलोमीटर - (पुरुष) - मोहिर मौलिक (प्रथम), गोविंद शर्मा (द्वितीय), दीपक वाघ (तृतीय), वेदांत शिरसाठ (चतुर्थ), मानव सोनवणे (पाचवा)

तीन किलोमीटर - (महिला) - नंदिनी पवार (प्रथम), ऋतविका मंडाले (तृतीय), जयश्री देवकर (चतुर्थ)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडच्या रस्त्यांचा मेकओव्हर

$
0
0

शंभर कोटींच्या तरतुदीची आमदार अनिल कदम यांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, निफाड

राज्याच्या अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. या अर्थसंकल्पात निफाड तालुक्यातील दळणवळणासाठी महत्त्वाच्या रस्त्यांच्या मेकओव्हरसाठी तसेच इतर विकासकामांसाठी एकूण ९७ कोटी ६० लाख रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार अनिल कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्लास्टिकचा वापर करून मालवाहतुकीस योग्य असा चौपदरीकरण रस्ता तयार करण्यासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील असा एकमेव रस्ता करण्यात येणार असून, इतरांसाठी हा पायलट प्रोजेक्ट ठरेल, असेही आमदार कदम यांनी सांगितले. निफाडजवळील रसलपूर शिवारात नागरिकांच्या प्रशासकीय कामकाजासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारणीकरिता १४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पिंपळगाव बसवंत-चिंचखेड चौफुली ते निफाड रस्ता, शिरवाडे-वणी, पालखेड, दावचवाडी रस्ता, कसबे सुकेणे अशा साडेबारा किलोमीटर रस्त्यांचा रुंदीकरण, डांबरीकरणासाठी ६ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती नुकतीच आमदार अनिल कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निफाड तालुक्यातील सायखेडा, शिंगवे फाटा, करंजगाव, मांजरगाव ते राज्य महामार्ग क्र. २७ या सात किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरणासाठी २ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. निफाड रेल्वे स्टेशन, नांदूर्डी रानवड, सावरगाव, खडकजांब रस्त्यासाठीही पाच कोटींची तरतूद केली असून, यासह विविध रस्ते, पूल तसेच इतर विकासकामांसाठीही भरीव निधी दिल्याचे आमदार कदम म्हणाले. पत्रकार परिषदेप्रसंगी निफाडचे नगराध्यक्ष मुकुंदराजे होळकर, संजय कुंदे, मोतीराम मोगल, कोठुरेचे सरपंच आशिष मोगल, सुधीर शिंदे, अतुल शिंदे, बाजीराव मोगल उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीमुळे २३ संचालकांचे पद रद्द

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा तालुक्यातील २० विकास सोसायट्यांच्या ६८ थकबाकीदार संचालकांपैकी ४५ थकबाकीदार संचालकांची ५५ लाख ५७ हजार ७१६ रुपयांच्या थकबाकीची वसुली जिल्हा बँकेला प्राप्त झाली आहे. मात्र, उर्वरित विकास सोसायट्यांच्या २३ थकबाकीदार संचालकांचे संचालकपद रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती देवळा येथील सहाय्यक निबंधक संजय गिते यांनी दिली.

देवळा तालुक्यातील २० विकास सोसायट्यांचे ६८ विद्यमान संचालक मार्च २०१७ ला थकबाकीदार होते. त्यांना थकबाकीची रक्कम भरण्यासाठी सहकार कायद्याच्या नियमानुसार तीन नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यांची सुनावणी होऊन त्यातील ४५ संचालकांनी थकबाकीची रक्कम ५५ लाख ५७ हजार ७१६ रुपये जिल्हा बँकेत भरणा केली असून, उर्वरित २३ संचालकांना थकबाकीची रक्कम भरण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला असतानाही त्यांनी थकबाकी न भरल्याने त्यांचे संचालकपद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सहाय्यक निबंधक संजय गिते यांनी यावेळी सांगितले.

संचालकपद रद्द झालेल्या विकास सोसायट्या व संचालक

गुंजाळनगर (२), विठेवाडी (१), देवळा आदिवासी (२), देवपूरपाडे (१), लोहोणेर (१), शेरी (२), खामखेडा (१), सरस्वतीवाडी (१), भिलवाड (३), वाजगाव (२), कुंभार्डे (१), तिसगाव (१), न्यू वासोळ (१), सांगवी (१), डॉ. जे. डी. पवार भऊर (१), महात्मा फुलेनगर (२) आदी सोसायट्यांच्या संचालकांचे संचालकपद रद्द करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरभरतीही वादात!

$
0
0

त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टच्या भरतीवर विश्वस्तांचा आक्षेप

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टची नोकरभरती वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता असून, मुलाखती घेताना विश्वस्त मंडळाला डावलल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मुलाखती घेण्यास विश्वस्त मंडळाच्या सदस्यांना बोलावणार नसाल, तर शासन नियुक्त अध्यक्ष आणि सचिव यांनीच कारभार चालवायला पाहिजे. अन्यथा, विश्वस्तांना केवळ नामधारी करण्याचा हा प्रयत्न बंद करावा, अशी मागणी विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल केली आहे.

देवस्थान ट्रस्टने काही दिवसांपूर्वी नेटवर्क ऑपरेटर आणि स्वॉफ्टवेअर इंजिनीअर अशा दोन जागा भरण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. तसा ठराव विश्वस्तांच्या बैठकीत करण्यात आला होता. अर्ज केलेल्या उमेदवारांच्या रविवारी मुलाखती घेण्यात आल्या. मात्र त्याची कल्पना चेअरमन, सचिव आणि एक विश्वस्त या व्यतिरिक्त उर्वरित पाच विश्वस्तांना देण्यात आली नाही. याबाबत काही विश्वस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन जागांसाठी उमेदवारी अर्ज किती आले व मुलाखतीसाठी त्यांची छाननी कशा प्रकारे करण्यात आली. प्रत्यक्ष मुलाखती घेताना सर्व विश्वस्तांना का सामावून घेण्यात आले नाही. याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारात गैरव्यवहार घडला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल यांनी रविवारी झालेल्या मुलाखतींबाबत हरकत घेऊन नियुक्तीपत्र देण्यात येणार नाहीत अशी भूमिका घेतली आहे. मुलाखती घेण्यास विश्वस्त मंडळाच्या सदस्यांना बोलावणार नसाल, तर शासन नियुक्त अध्यक्ष आणि सचिव यांनीच कारभार चालवायला पाहिजे. अन्यथा, विश्वस्तांना केवळ नामधारी करण्याचा हा प्रयत्न बंद करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नागरिकांमध्येही नाराजी

रविवारी शहरातील नागरिकांमध्ये देखील याबाबत नोकरभरतीबाबत नाराजी होती. नोकरी देताना स्थानिकांना प्राधान्य देण्याची अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे. तीर्थक्षेत्र म्हणून येथे नागरिकांना काही बाबतीत नेहमीच गैरसोय सहन करावी लागते. येथे व्यवसायासाठी अन्य साधने नाहीत. किमान सुशिक्षित बेरोजगार तरुणांना येथे नोकरी मिळाली पाहिजे अशी रास्त अपेक्षा येथे व्यक्त होत असते.

मुलाखती घेण्यासाठी निवड करताना सहा विश्वस्तांना विचारात घेतलेले नाही. याबाबत काही समिती तयार करण्यात आली नाही आणि असेल तर आम्हाला त्याबाबत कल्पना देण्यात आली नाही. विश्वस्त मंडळातील सदस्यांना डावलून निर्णय घेतले जातात. त्यामुळे या नोकरभरतीत गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. याबाबत संपूर्ण माहिती मागविण्यात आली आहे.

- सत्यप्रिय शुक्ल, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट

अध्यक्षांनी समितीची निवड केलेली होती. अध्यक्ष, सचिव आणि एक विश्वस्त यांनी मुलाखत घेऊन कागदपत्र पाहणी केली आहे. सर्व कामकाज नियमाप्रमाणे झालेले आहे.

- डॉ चेतना केरूरे, सचिव, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोक्याचा गळफास; बालिकेचा मृत्यू

$
0
0

सिडको : चुंचाळे शिवारातील जाधव टाऊनशिप येथे घरात झोका खेळताना गळफास बसल्याने तितिक्षा किरण राऊळ या दहा वर्षीय बालिकेचा रविवारी मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. झोका खेळताना तोल गेल्याने तितिक्षाला झोक्याचा गळफास बसला. हा प्रकार वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तितिक्षाला मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारकीचे ‘ऑनलाइन’ डोहाळे!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

विधानसभा निवडणुका वर्षावर येऊन ठेपलेल्या असताना सिडकोतील विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी 'नाशिक पश्चिमचा आमदार कोण?' या मथळ्याखाली ऑनलाइन सर्वेक्षण सुरू केले आहे. सध्या तरी यात तीनच इच्छुकांची नावे टाकण्यात आली असली, तरी वर्षभर आधीच हे सर्वेक्षण सुरू झाल्याने आमदारकीची लगीनघाई सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक इच्छुकांनी आपापल्या परीने एकप्रकारे प्रचारालाच सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

नाशिक शहरातील नाशिक पश्चिम हा मतदार संघ सिडको, सातपूर व इंदिरानगरचा काही भाग मिळून तयार झालेला आहे. विधानसभेची निवडणूक पुढच्या वर्षी होणार आहे. त्यामुळे आतापासूनच काहीजणांनी तिकिटासाठी फिल्डिंग लावण्याबरोबरच सोशल मीडियाचा वापर करून सर्वेक्षण व प्रचारालाही सुरुवात केल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर 'नाशिक पश्चिमचा आमदार कोण?' या शीर्षकाखाली एक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यात विद्यमान आमदारांसह अन्य दोन इच्छुकांची नावे टाकण्यात आली असून, यापैकी नाशिक पश्चिमचा आमदार कोण यावर ऑनलाइन मते नोंदविण्यात येत आहेत. या सर्वेक्षणाची चर्चा आता संपूर्ण सिडको परिसरात सुरू झाली आहे. निवडणुकांना अजून बराच अवधी असताना अशा प्रकारचे सर्वेक्षण सुरू झाल्याने चर्चा रंगू लागल्या आहेत. अशा प्रकारचे सर्वेक्षण करूनच अनेकजण उमेदवारीसाठी दावा करणार असल्याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.

निवडणुकीची तारीख, त्यात होणाऱ्या आघाड्या, युत्या याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसताना अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. या सर्वेक्षणात नागरिक ऑनलाइन मतदान करून व्हर्च्युअली आपला आमदार निवडणार आहेत. याला कुठलाही कायदेशीर आधार, सरकारी मान्यता नसली तरी यामुळे प्रभागातील दिग्गजांचे बळ दिसणार आहे. यात भविष्यात उमेदवारांची संख्या वाढण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. सध्या तरी सोशल मीडियावर एकाच व्यक्तीकडून हे सर्वेक्षण सुरू झाले आहे.

कामांच्या माहितीचा प्रसार

सध्या सोशल मीडियाचा वापर राजकीय व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. विविध प्रकारचे ग्रुप तयार करून त्यावर आपली किंवा आपण केलेल्या व करणार असलेल्या कामांची माहिती पाठविण्यात येते. याचाच आधार घेऊन जनतेचा कौल घेण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर आपण कोणत्या पक्षाचे कोणते पदाधिकारी होणार, आपले राजकीय भवितव्य काय, आपल्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व कोण करणार अशा पद्धतीच्या जाहिरातीही सुरू झाल्या आहेत. अनेक राजकीय नेते यात आपला सहभाग नोंदवून आपण कोण होणार, याची छबी नागरिकांसमोर उभी करताना दिसत आहेत. याचीही चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धूरफवारणीचेही आता वेळापत्रक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घंटागाडी आणि पेस्ट कंट्रोलला ऑनलाइन ट्रॅकवर आणल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिक व नगरसेवकांच्या तक्रारींची दखल घेत, पेस्ट कंट्रोलबाबत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरात सर्वाधिक तक्रारी पेस्ट कंट्रोलबाबत असल्याने आयुक्तांनी आरोग्य विभागाला शहरातील धूर व औषध फवारणीचे मासिक वेळापत्रकच तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने पेस्ट कंट्रोलचे मासिक वेळापत्रक तयार केले असून, ते पालिकेच्या वेबसाइटवरही टाकण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना आता आपल्या प्रभागात पेस्ट कंट्रोलचे कर्मचारी कधी येणार, याची माहिती मिळणार आहे. शिवाय नागरिकांच्या मोबाइलवरही अलर्ट येणार आहे.

महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा असलेल्या घंटागाडी आणि पेस्ट कंट्रोलबाबत शहरात सर्वाधिक तक्रारी आहेत. नगरसेवक आणि नागरिकांकडून या दोन विभागांच्याच तक्रारी अधिक केल्या जातात. प्रभाग सभा, आरोग्य सभा, स्थायी समिती आणि महासभेत हा विषय वारंवार गाजतो. स्थायी समितीला डावलून पेस्ट कंट्रोलचा ठेका न्यायालयाने दिग्विजय एंटरप्रायजेसला दिला आहे. तीन वर्षांसाठी १९ कोटींना हा ठेका देण्यात आला असला तरी, ठेकेदाराच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. डेंग्यू व साथीचे आजार वाढण्यास पेस्ट कंट्रोल विभागास जबाबदार धरण्यात येते. स्थायी समितीच्या सभांमध्ये सदर ठेका रद्द करण्याची मागणी वारंवार नगरसेवकांकडून केली जाते. परंतु, आरोग्य विभागाकडून ठेकेदाराला वारंवार पाठिशी घातले जात होते. मुंढे यांनी पेस्ट कंट्रोलचाही आढावा घेत तक्रारी कमी करण्यासाठी पेस्ट कंट्रोल विभागही ऑनलाइन ट्रॅकवर आणला आहे. आरोग्य विभागाला शहरातील पेस्ट कंट्रोलचे वेळापत्रक तयार करून ते दरमहा सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ठेकेदार आणि आरोग्य विभागाने हे वेळापत्रक तयार केले असून, मार्च महिन्याचे पेस्ट कंट्रोलचे नियोजन हे वेबसाइटवर टाकण्यात आले आहे. दररोज सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत प्रत्येक प्रभागात धूर फवारणी केली जाणार आहे.

अलर्टही मिळणार

धूर फवारणीचे वेळापत्रक वेबसाइटवर असल्याने नागरिकांना व नगरसेवकांना आपल्या प्रभागात कधी धूरफवारणी होणार याची माहिती मिळणार आहे. पेस्ट कंट्रोल विभाग मनपाच्या ई-कनेक्ट अॅपशी जोडण्यात आला आहे. घंटागाडीप्रमाणेच पेस्ट कंट्रोलवर रजिस्टर केल्यास नागरिकांना आपल्या प्रभागात पेस्ट कंट्रोलचा कर्मचारी कधी येणार याचा अलर्ट मिळणार आहे. दिलेल्या वेळेत पेस्ट कंट्रोलचा कर्मचारी आला नाही तर त्याला अॅपवर तक्रार करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्यानांना ‘अच्छे दिन’

$
0
0

आयुक्तांच्या धसक्याने नाशिकरोड परिसरात नियमित देखभाल

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

महापालिका आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी स्वीकाल्यापासून नाशिकरोड तसेच द्वारका भागातील उद्यानांना अच्छे दिन आले आहेत. या सर्व उद्यानांना संबंधितांनी चकाचक करीत त्यांची नियमित देखभालही केली जात आहे.

नूतन आयुक्तांनी प्रत्येक ठिकाणी धडकभेटीचा धडाका लावल्याने नाशिकरोड परिसरातील उद्यानांनाही संबंधित विभागाने चकाचक केले आहे. आयुक्तांच्या धसक्याने उद्यानांत औषध फवारणी, झाडांचे कटिंग, झाडांना पाणी देणे याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे.

उन्हाच्या झळा तीव्र झाल्यामुळे नागरिकांचा उद्यानांकडे ओढा वाढला आहे. यामध्ये द्वारकेचे काठेगल्लीतील सावतामाळी उद्यान, भाभा नगरमधील भाभानगर तसेच कानडे उद्यान, उपनगरमधील अयोध्या उद्यान, टागोर नगरमधील उद्यान, डीजीपी नगरमधील गणेश मंदिरातील उद्यान ही सर्व उद्याने पूर्ण चकाचक झाल्याने नागरिकांनाही याठिकाणी प्रसन्न वाटत आहे. काठेगल्लीतील बनकर चौकातील जीजामाता उद्यान तसेच शीतल सोसायटी उद्यानातील हिरवळीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

याठिकाणी सुशोभीकरण

नाशिकरोड येथील सोमानी उद्यान, आडकेनगर दोन व तीन, आनंदनगर उद्यान, जेलरोडचे महालक्ष्मी उद्यान, लोखंडेमळ्यातील चैतन्यनगर येथील उद्यानही सुशोभित करण्यात आले आहे. विहितगाव येथील महादेव मंदिर, मीनाताई ठाकरे उद्यान, शिखरेवाडीतील जॉगिंग ट्रॅक, गंधर्वनगरीतील गजानन महाराज उद्यान, आशानगरमधील उद्यानांकडेही लक्ष देण्यात आले आहे. जयभवानीरोडचे महेशनगर,जीवनछाया, प्रधाननगर एक व दोन, लवटे मळा सूमन हॉस्पिटलमागील उद्यान तसेच चेहेडीगावीतील उद्यानची कळी खुलली आहे.

दुर्लक्षित उद्यानांसाठी आयुक्तांना साकडे

नाशिकरोड परिसरातील काही उद्यानांची अवकळा मात्र कायम आहे. जेलरोडच्या सावरकरनगरमधील दोन्ही गार्डन्सची दयनीय अवस्था झालेली आहे. येथील खेळणी गायब झाली आहेत तसेच उद्यानातील फुलझाडे कोरडी होऊन चार वर्षे झाली आहेत. आता तेथे गवत व काटेरी झुडपे उगवली आहेत. जेलरोडचे भीमनगर, देवळालीगावातील भागवत गल्लीतील गार्डनही आजारी आहे. ही सर्व दुर्लक्षित उद्याने दुरुस्त व सुशोभित करण्यासाठी तसेच खेळणी, पिण्याचे पाणी, स्वच्छता, सुरक्षा आदींबाबत नागरिक लवकरच आयुक्तांना साकडे घालणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाकडून ऑडिटमध्ये तांत्रिक चूक

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या तांत्रिक ऑडिटमध्ये 'कमवा व शिका' योजनेच्या तपशीलात तांत्रिक चूक असल्याचे समोर आले आहे. या योजनेचा तपशील ऑनलाइन नमूद करताना त्यात ओबीसी वगळता सर्व जातींच्या प्रवर्गांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, यात ओबीसीचा उल्लेख वगळल्याने ऑडिटमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. खास बाब म्हणजे, पुणे विद्यापीठाचे पदाधिकारी याबाबत अनभिज्ञ असल्याचेही निदर्शनास आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चे ऑडिट २० मार्चपासून सुरू होत आहे. यापूर्वी विद्यापीठाच्या संलग्नित सर्व कॉलेजांना वर्षभर राबविलेल्या विविध उपक्रम व योजनांची माहिती ऑनलाइन स्वरुपात अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या वेबसाइटवर कॉलेज लॉगिन केल्यानंतर हे सर्व तपशील भरण्याचे काम सुरू झाले आहे. यात विद्यार्थी विकास मंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या 'कमवा व शिका' योजनेच्या तपशीलात तांत्रिक चूक असल्याचे समोर आले आहे. यात वर्षभर सदर योजनेत सहभागी विद्यार्थ्यांची संख्या, आर्थिक ताळेबंद व इतर तपशील भरायचा आहे. यासोबतच विविध जात प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांची संख्या नमूद करायची आहे. मात्र, विद्यापीठाकडून झालेल्या तांत्रिक चुकीत ओबीसी प्रवर्गाचा उल्लेख राहिला आहे. इतर सर्व प्रवर्ग नमूद असून ओबीसी वगळल्याने विद्यार्थी विकास अधिकारी संभ्रमित झाले आहेत. विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, 'कमवा व शिका योजनेत ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, यात ओबीसीचा उल्लेख नाही. यामुळे या विद्यार्थ्यांची संख्या नमूद करण्यात संभ्रम आहे. सध्या खुल्या प्रवर्गात विद्यार्थी नमूद केले आहेत. पण अशी चूक होणे अपेक्षित नव्हते' असे मत त्यांनी व्यक्त केले. यापूर्वी कधीच ओबीसी प्रवर्गाचा उल्लेख राहिला नसल्याने यंदा असे का झाले याबाबत विचारणा करण्यासाठी विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता 'ओबीसी प्रवर्गाचा उल्लेख राहिल्याची बाब आताच समजते आहे. याबाबत तपासणी करून पुढील माहिती कळवतो' असे उत्तर देण्यात आले. पुणे विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेतून आर्थिक गरजा भागविणारे इतर प्रवर्गांसोबतच ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी अधिक आहेत. मात्र, विद्यापीठाकडून झालेली तांत्रिक चूक त्यांच्याही निदर्शनास न आल्याने चर्चेचा मुद्दा बनली आहे. विद्यापीठ पदाधिकारी यावर काय निर्णय घेतात याकडे सर्व कॉलेजेस व विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाचकांचे माहेरघर- अभिनव सार्वजनिक वाचनालय

$
0
0


वाचकांचे माहेरघर - अभिनव नागरिक वाचनालय

१८६० साली नाशिकला रेल्वे स्थानक झाले. त्यानंतरच खऱ्या अर्थाने नाशिकरोड वसाहत उदयास आली. पुढे चालून १९२४ मध्ये आयएसपी आणि १९२८ साली सीएनपी प्रेस सुरू झाल्याने कामगारवर्ग या वसाहतीचा आत्माच ठरला. हळूहळू लोकसंख्या वाढत गेली. त्यामुळे या वसाहतीतील नागरी सुविधांची उणीव ठळक होत गेली. या वसाहतीत वाचनालयाची सुविधा नसल्याने डायालाल झवेरी, धरमदास कोठारी, एस. खन्ना, रामबगस करवा, तुळशीराम मंत्री, मणिरमाल पाठक, मूळशंकर जोशी, सखाराम गोसावी, पुरुषोत्तम पाटणकर, व्यंकटेश करकरे, मदारभाई कच्छी, कादरभाई हैदरअली, शिवनारायण लोया, लक्ष्मणराव नवले आणि राजाराम बाजपेयी या समाजधुरिणांनी १५ ऑगस्ट १९४१ रोजी देवी चौकातील वाड बिल्डिंगमधील एका छोट्याशा खोलीत अभिनव नागरिक वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली. इंग्रज राजवटीत सुरू झालेल्या या वाचनालयाने गेल्या ७५-७६ वर्षांत अनेक चढउतार अनुभवले. परंतु, नाशिकरोडमध्ये वाचनामृताचा झरा वाहता ठेवण्यासाठी नाशिकरोडमधील या पहिल्या वाचनालयाने आपली जबाबदारी इमानेइतबारे सांभाळली आहे. नागरिक अभिनव वाचनालय गेल्या सात दशकांपासून वाचकांसाठी माहेरघरच ठरले आहे.

पालिकेने २३ ऑक्टोबर १९८७ साली जवाहर मार्केटजवळ ६८७ चौरस फुटांची जागा असलेली इमारत दिली. पुढे ही जागाही कमी पडू लागली. त्यामुळे नवीन जागेचा शोध सुरू झाला. १९९१ साली मधुकर जोशी यांनी रामकिसन करवा, संभाजी मोरुस्कर, गजानन तितरे या कार्यकर्त्यांना वाचनालयाच्या कामात सहभागी करून घेतले. संभाजी मोरुस्कर यांच्या पुढाकारातून या वाचनालयाला १९९७ साली मनपा शाळा क्र. १२५ जवळील सध्याची वास्तू पालिकेकडुन प्राप्त झाल्याने या वाचनालयाच्या जागेची अडचण मिटली. सध्या या वाचनालयाची एक शाखा जवाहर मार्केटजवळील जुन्या जागेवरही सुरू आहे. वाचनालयात उपलब्ध असलेल्या सुविधा बघता शासनाने 'अ'वर्गाचा दर्जा द्यायला हवा होता. परंतु, जागा स्वमालकीची नसल्याने या वाचनालयाला 'ब' वर्ग प्राप्त झालेला आहे. परिणामी अत्यल्प शासकीय अनुदानावरच या वाचनालयाचा गाडा ओढावा लागत आहे. पालिकेसह आमदार बाळासाहेब सानप, खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून या वाचनालयाला पुस्तके मिळालेली आहेत.

ग्रंथांसह वाचक संख्येचीही समृद्धी

या वाचनालयात सध्या २७ हजार ३६३ ग्रंथसंख्या असून, १५०० वाचक सभासद आहेत. त्यात ४८७ महिला, ७८६ पुरुष आणि १८७ बालवाचक आहेत. दररोजचे वाचक ३५० असून सुमारे तेवढेच वाचक पुस्तकांची नियमितपणे साप्ताहिक देवघेव करतात. ५५ आजीवन सभासद आहेत. ग्रंथसंख्या आणि वाचक संख्येची समृद्धी या वाचनालयाने टिकवून ठेवली आहे. विशेष म्हणजे महिला वाचकांची संख्या लक्षणीय आहे. तीन कर्मचारी कार्यरत असून, त्यात एक ग्रंथपाल, एक सहाय्यक ग्रंथपाल आणि एका शिपायाचा समावेश आहे. १७ वर्तमानपत्रे, ६० मासिके, ८ साप्ताहिके आणि ९ पाक्षिके नियमितपणे घेतली जातात. सर्व ग्रंथांची मांडणी अत्यंत आकर्षकपणे केलेली असून, त्यांची काळजी घेतली जाते.

विविध उपक्रमांचे आयोजन

अभिनव नागरिक वाचनालयात वर्षभर उपक्रमांची रेलचेल असते. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन, महाराष्ट्र दिन यांसारखे सर्व राष्ट्रीय उत्सव वाचकांसोबत साजरे केले जातात. याशिवाय थोर देशभक्त, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी यांची जयंती-पुण्यतिथी साजरी करून देशप्रेमाचे धडे दिले जातात. वाचकांसाठी दिवाळी अंक योजना चालविली जाते. अभिरूची योजनेद्वारे समाजातील दानशूर नागरिकांकडील जुनी पुस्तके स्वीकारली जातात. दरवर्षी या योजनेद्वारे सुमारे २०० पुस्तके या वाचनालयाला प्राप्त होतात.

अभिनव नागरिक वाचनालयात वाचकांसाठी पुरेशा सुविधा आहेत. जुनी पुस्तके सहज उपलब्ध होतात. मोठ्या वाचनालयांच्या तोडीस तोड सुविधा आहेत. सर्व वर्तमानपत्रे व मासिकेही उपलब्ध असल्याने खर्चही वाचतो.

-पुरुषोत्तम स्वान, वाचक

हवी असलेली सर्व पुस्तके येथे मिळत गेल्याने वाचनाचा छंद वृद्धिंगत होत गेला. या वाचनालयाची कवाडे सदैव खुली असल्याने वाचन संस्कृती जोपासली गेली आहे. युवा वर्गात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाचनालयांनी पुढाकार घेतला पाहिजे.

-तुळशीराम बोराडे, वाचक

या वाचनालयात सर्व साहित्यप्रकारातील पुस्तके उपलब्ध आहेत. मासिके, पाक्षिके, वर्तमानपत्रे, साप्ताहिकेही आहेत. वाचनालयाच्या वर्गवारीसाठी शासनाच्या काही अटींची पूर्तता होणे शक्य नसते. त्यामुळे वाचनालयाला आर्थिक नियोजनाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. डिजिटलायजेशनचा प्रयोग करून पाहिला. परंतु, वाढणाऱ्या खर्चामुळे हा प्रयोग यशस्वी झाला नाही.

-गजान तितरे, सचिव

आकडे बोलतात...

ग्रंथसंख्या - २७,३६३

सभासद- १५००

नियमित वाचक - ३५०

आजीवन सभासद- ५५

वर्तमानपत्रे - १७

मासिके-६०

साप्ताहिके- ८

पाक्षिके- ९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गतिरोधकास ‘ब्रेक’

$
0
0

उंटवाडीजवळ मनपा अधिकाऱ्यांकडून कार्यवाही; नागरिकांची नाराजी

म. टा. वृत्तसेवा, सिडको

उंटवाडीजवळील त्रिफुलीवर परिसरातील नागरिक गत एक वर्षांपासून गतिरोधकाची मागणी करीत आहेत. मात्र महापालिकेने येथे गतिरोधक टाकले नाही. यावर रविवारी रात्री नागरिकांनी याठिकाणी गतिरोधक उभारले. यावरून सोमवारी (दि. १२) सकाळी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून हे गतिरोधक काढण्यात आले. या गतिरोधकावरून नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये काहीवेळ वाद झाला. मात्र, अधिकाऱ्यांनी या गतिरोधकास 'ब्रेक' लावला आहे. त्याला नागरिकांनी तीव्र विरोध केला.

उंटवाडी गावाजवळील रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतूक वाढत असून, याठिकाणी वारंवार अपघात होत असतात. उंटवाडी गावाजवळ त्रिमूर्ती, कालिका पार्क आणि शहरातून येणारी वाहने एकत्र होत असतात. या त्रिफुलीवर मागील काही दिवसांपासून सर्वाधिक अपघात झाले असून, यावर कोणाचेही लक्षच नसल्याचे दिसून येते. त्यातच याठिकाणी पांढरे पट्टे मारलेले नाहीत किंवा काही सूचनाफलकही नसल्याने रात्री कायमच अपघात होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

या त्रिफुलीवरील अपघात रोखण्यासाठी किमान याठिकाणी गतिरोधक उभारले तर वाहने हळू तरी चालतील या हेतूने नागरिकांनी या ठिकाणी गतिरोधकांची मागणी केली होती. त्यानुसार नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनी वाहतूक विभाग आणि महापालिका यांना एक वर्षापूर्वीच गतिरोधक टाकण्याचे पत्रही दिले आहे. मात्र महापालिका किंवा पोलिसांकडून कोणतीही हालाचाल झाली नाही. त्यामुळे रविवारी (दि. ११) रात्री उंटवाडीत नागरिकांनीच याठिकाणी गतिरोधक टाकले. अचानक गतिरोधक टाकण्यात आल्याने काहींनी पालिकेत ऑनलाइन तक्रार दाखल केली. यानंतर याची माहिती बांधकाम विभाग आणि विभागीय अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार तातडीने विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी पाहणी करून हे गतिरोधक काढून टाकण्याची सूचना केली. त्यानुसार हे गतिरोधक काढण्याचे काम सुरू करण्यात आले, मात्र नागरिकांनी यावेळी विरोध करीत गतिरोधक काढू देणार नाही, असा पवित्रा घेतला हेाता.

अवजड वाहनांना बंदी करा

उंटवाडीगावाजवळील रस्ता लहान असल्याने येथे गतिरोधक बसवून अवजड वाहनांना प्रवेश बंदी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, या वेळी महापालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून लवकर गतिरोधक बसविण्यासाठी आवश्यक तो पत्रव्यवहार केला जाईल, असे आश्वासन दिले. उंटवाडीतील घराजवळून जाणाऱ्या रस्त्यावरून मागील अनेक दिवसांपासून अवजड वाहनेसुद्धा जात आहेत.

मटा भूमिका

वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी गेली काही वर्षे रस्त्यांवर गतिरोधक टाकणे हा एकमेव पर्याय वापरला जात आहे. वास्तविक गतिरोधकांमुळेच अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याची उदाहरणे आहेत. नॅशनल रोड काँग्रेस या संस्थेने तर रस्त्यांवर गतिरोधक टाकण्यावरच मर्यादा आणली आहे. या संस्थेच्या परवानगीशिवाय गतिरोधक टाकताही येत नाहीत. वास्तविक वेगावर नियंत्रण ठेवणे, पादचाऱ्यांनी पदपथावरुनच चालणे, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे या उपायांवर भर दिला तर गतिरोधकांची गरजही राहणार नाही. त्यासाठी लोकजागराची गरज आहे.

वर्ष उलटूनही गतिरोधक न झाल्याने स्थानिक नागरिकांनी हे गतिरोधक टाकले. महापालिकेने ते आज काढून टाकले असले तरी ते पुन्हा टाकून द्यावे. पालिका कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का?

- विजय मुंजे, रहिवासी

या रस्त्यावर गतिरोधकाची मागणी नागरिकांनी केल्यानंतर आम्ही रितसर पत्रही दिले आहे. मात्र तरीही हा प्रश्न परवानगी मिळत नसल्याने प्रलंबित आहे. या प्रकारानंतर नागरिकांशी बोलून आश्वासन दिले असून, लवकरच याबाबतचा पाठपुरावा करून येथे गतिरोधक उभारू.

- भाग्यश्री ढोमसे, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा विलगीकरणासाठी अल्टिमेटम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले असून, सफाई कर्मचाऱ्यांना वठणीवर आणल्यानंतर आता कचरा विलगीकरणावर भर दिला आहे. शहरातील घंटागाडी ठेकेदारांची आयुक्तांनी बैठक घेतली असून, कचरा विलगीकरणासाठी मार्चचा अल्टिमेमट देण्यात आला आहे. नागरिकांकडून ओला व सुका असा कचरा घेण्याची सक्ती करण्यात येणार असून, ज्यांच्याकडून कचऱ्याचे वर्गीकरण होणार नाही, त्यांचा कचरा स्वीकारला जाणार नसल्याचाही इशारा देण्यात आला आहे. शहर पुन्हा झिरो गार्बेज करून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश आयुक्त मुंढे यांनी आरोग्य विभागाला दिला आहे.

स्वच्छ महाराष्ट्र मिशनअंतर्गत राज्य सरकारने महापालिका क्षेत्रात ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी एप्रिलची डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे. एप्रिलपर्यंत ओल्या व सुक्या कचऱ्याचे विलगीकरण केले नाही तर त्या महापालिकांचे अनुदान थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या संदर्भातील आदेश महापालिकांना सरकारतर्फे पाठविण्यात आला आहे. सध्या शहरात केवळ २० टक्के कचऱ्याचे विलगीकरण केले जात आहे. अजूनही ८० टक्के कचरा विलगीकरणापासून दूर आहे.

मुंढे यांनी आरोग्य विभागाचा स्वतंत्र आढावा घेत यापूर्वीच कचरा विलगीकरणासंदर्भात इशारा दिला आहे. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली घंटागाडी ठेकेदारांची सोमवारी बैठक झाली. घंटागाडीच्या ठेक्यातच कचरा विलगीकरणाची अट असतानाही, वर्षभरापासून कचरा विलगीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा संकलनाची स्वतंत्र तरतूद करावी. शहरातील जवळपास साडेचार लाख मालमत्तांना भेटी देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आदेश दिले. नागरिकांनी घरातच स्वतंत्रपणे दोन डस्टबिनमध्ये ओला व सुका कचरा टाकावा. सोसायट्यांनाही इमारतीत स्वतंत्रपणे ओला व सुका कचरा गोळा करण्याची पद्धत अवलंबणे बंधनकारक असेल. मार्चनंतर नागरिकांकडून ओला व सुका कचरा एकत्रित आला तर स्वीकारू नये, असे आदेश त्यांनी ठेकेदारांना दिले आहेत.

नागरिकांना शिस्त

शहरात सद्य:स्थितीत २० टक्केच कचऱ्याचे विलगीकरण केले जाते. ही आकडेवारी चिंताजनक आहे. राज्य सरकारने एप्रिलअखेरपर्यंत ८० टक्के कचरा विलगीकरण झाले नाही, तर अनुदानच रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनाच शिस्त लावली जाणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरात स्वतंत्र दोन डस्टबिनची व्यवस्था करावी, तसेच सोसायटी व इमारतींमध्येही दोन डस्टबिनमधूनच घंटागाडीपर्यंत कचरा यावा, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. असा कचरा आला नाही तर स्वीकारू नका, असा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images