Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पिंपळगाव परिसरात अपघात; दोन ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत परिसरात मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर दोन मुले जखमी झाली. मुंबई- आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाटा परिसरात एक्सयूव्ही महिंद्रा आणि मोटारसायकलदरम्यान हा अपघात झाला. बापूसाहेब काशिनाथ भोसले (वय ५०, सारोळे) व योगेश केदू काळे (३०) अशी अपघातात ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

शिरवाडे फाट्याजवळ बापूसाहेब भोसले मोटारसायकलने (एमएच१५/७२१६) जात असताना त्यांना मागून भरधाव येणाऱ्या महिंद्रा एक्सयूव्ही कारने (एमएच १२/एमएन ३१०४) जोरदार धडक दिली. यात भोसले जागीच ठार झाले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आणखी एका मोटारसायकलला (एमएच १५/जीजे १७५१) कारची धडक बसली. यात मोटारसायकलवरील योगेश काळे जागीच ठार झाले. यात दोन मुले जखमी झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. पिंपळगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून, पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वडाळागावात अपुरा पुरवठा

0
0

वडाळा गाव : इंदिरानगर व वडाळा गाव हे नाशिक महानगरपालिकेच्या पूर्व विभागात समाविष्ट असले, तरी येथील पाणीपुरवठ्याचे नियोजन सिडकोत आहे. त्यामुळे या भागात पाणीपुरवठ्यावरून कायमच वादंग होतो. मागील आठवड्यातच स्थानिक महिलांनी थेट अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रकार घडला होता. प्रत्येक वेळी सुरळीत पाणी पुरवठा होईल असे आश्वासन मिळते. प्रत्यक्षात ते पाळले जात नाही.

इंदिरानगर व वडाळा या परिसरातील समस्यांसाठी हा परिसर नाशिक पूर्व विभागाला जोडण्यात आलेला आहे. मात्र, या परिसराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी सिडको विभागावर आहे. त्यामुळे सिडकोतीलच अधिकारी येथील परिसरात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करीत असतात. सिडको आणि पूर्व विभागाच्या वादात या भागात पुरेसा पाणीपुरवठाच होत नसल्याच्या तक्रारी वारंवार हेात असतात. नगरसेवकही याप्रकरणी आवाज उठवून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी प्रशासनाकडूनच सकारात्मकता दिसत नाही.

महापौरांची बैठकही निष्फळ

इंदिरानगर आणि वडाळा येथील पाणीप्रश्नाबाबत थेट महापौरांनी बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, याकडे कोणाचेही लक्ष न गेल्याने आजही वडाळा व इंदिरानगर भागात पाण्याची समस्या कायम आहे. वडाळा गावात मागील महिन्यात अतिक्रमण काढल्यावर अनेक दिवस येथून पाइपलाइनमधून लाखो लिटर पाणी वाया गेले होते. त्यावरही नागरिक व नगरसेवकांनी आवाज उठविल्यानंतर हे काम करण्यात आले आहे. त्यामुळे मुळातच अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे या भागातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असते. इंदिरानगरचा परिसर दिवसेंदिवस विकसित होत असून, येथे देररोज नवनवीन इमारती उभ्या राहत आहेत. असे असताना सध्या असलेल्याच नागरिकांना पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही, तर नवीन येणाऱ्यांना कसे पाणी मिळणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. त्याचबरोबर महानगरपालिकेने इंदिरानगर व वडाळ्याचे पाणी पुरवठ्याचे नियेाजन पूर्व विभागाकडेच वर्ग करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

उन्हाळा सुरू होण्यापूर्वी पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, ही खेदाची गोष्ट आहे. महानगरपालिकेकडून पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने आमचे हाल होत आहेत. अनेकदा इंदिरानगर व वडाळा या भागात सर्वाधिक पाणी गळती होते. याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. इंदिरानगर व वडाळा परिसराचे नेतृत्व करणाऱ्या नगरसेवकांनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणविणार नाही या दृष्टीने नियेाजन करावे.

- आशा जाधव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या वसाहतीतील समस्यांचे आव्हान

0
0

मटा मालिका - सत्तेची वर्षपूर्ती
प्रभाग क्रमांक : ३

रामनाथ माळोदे, पंचवटी

जुनी लोकवस्ती आणि नव्याने झपाट्याने वाढणारे नागरीवस्ती असा प्रभाग तीनचा भाग आहे. जुन्या भागात विकासाच्या संधी जशा कमी आहेत. तशाच समस्याही कमी आहेत. मात्र, नव्याने विकसित होत असलेल्या लोकवस्तीच्या भागात रस्ते, पाणी, पथदीप आणि ड्रेनेज या समस्या प्रामुख्याने जाणवत आहेत.

नव्या वसाहतीच्या काही भागात पथदीप पोहचले असले तरी कच्च्या रस्त्यांमुळे तेथील समस्या गंभीर झाली आहे. पावसाळ्यात तर या भागातील रहिवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या समस्या सोडविण्याचे खरे आव्हान नगरसेवकांना पेलावे लागणार आहे. या प्रभागात भाजपचे तीन आणि शिवसेनेचा एक नगरसेवक आहेत.

आमदार पुत्र या प्रभागातील नगरसेवक असल्यामुळे आमदार निधीतील बहुतांश कामे याच प्रभाग होत असल्याचे दिसते. मुलभूत गरजांबरोबरच इतरही सुविधा पुरविणारी कामे मंजूर झाली असली तरीही अजूनही अनेक मुलभूत सुविधांचा अभाव आहे. नव्या वसाहती वेगाने वाढत आहेत. पूर्वी असलेल्या कमी व्यासाच्या जलवाहिनी कमी पडत आहेत. त्यामुळे अशा भागात कमी दाबाने पाणी येण्याच्या समस्या वाढलेल्या आहेत.

कचऱ्याचे ढीग कायम

हिरावाडीजवळून वाहणाऱ्या कालव्याच्या परिसरात कचऱ्याचे ढीग कायम पडलेले असतात. या भागात उघड्यावर शौचास बसण्याचे प्रकार अजूनही सुरू आहेत. कालव्याचा भाग जणू कचराकुंडीच झाला आहे. मोकाट जनावरे आणि कुत्री यांची या भागातील समस्या नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. उद्यानांची दुरवस्था झालेली आहे. त्यातील खेळणींची मोडतोड, खेळणी गायब असे प्रकार वाढलेले आहेत. तांबोळी नगरमधील रस्ते अर्धवट आहेत. घंटागाडी अनियमित असल्यामुळे कचऱ्याची समस्या वाढत आहे.

झोपड्यांचे अतिक्रमण त्रासदायक

नवीन सिंहस्थ मार्गालगत कचऱ्याचे ढिगारे कायमचे झाले आहेत. पूराच्या पाण्यात वाकून गेलेले पथदीपांचे खांब गंजून गेले. त्यातील काही चोरीस गेले आहेत. या भागात विविध ठिकाणाहून पर्यटक येत असतात. त्याच परिसरात डेब्रिज आणून टाकलेले असते. कृष्णनगर उद्यानात गेली कित्येक वर्षांपासून मीनी ट्रेन गंजत पडली आहे. ती अडचणीची ठरत आहे. तेथून काढून घेण्याची मागणी होऊनही ती अद्याप तशीच पडून आहे. तपोवनातील रामसृष्टी उद्यान आणि कपिला संगम या भागात पर्यटक आणि भाविकांची वर्दळ असते, या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने पाहिजे तसा विकास झालेला नाही. साधुग्रामच्या जागेवर होत असलेले झोपड्यांचे अतिक्रमण त्रासदायक ठरत आहे.

पूर्ण झालेली कामे

सावता नगर येथील पिण्याच्या पाण्याची जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. नारायणनगर ते मानेनगर पथदीप व एलईडी स्ट्रीट लाईटही बसविण्यात आलेत.

प्रभागातील मंजूर कामे

हिरावाडीत नाट्यगृहाचे काम, महिला उद्योग भवन, आधुनिक पद्धतीचा जॉगिंग ट्रॅक, उद्यान, पथदीप आदी कामांना मंजुरी मिळाल्या आहेत. तसेच या कामांच्या निविदाही निघाल्या आहेत. साईनगरमधील अंगणवाडी, शौचालय, अभ्यासिका, चक्रधरनगर, गजानन कॉलनी व कृष्णनगर येथे उद्यान, माणिकनगर येथील संरक्षक भिंत बांधणे, बनारस नगर पथदीप आदी कामे मंजूर आहेत.

लोकप्रतिनिधी म्हणतात......

प्रभागातील कामे करीत असताना नागरिक समस्या घेऊन येतात. त्या सोडविण्यासाठी जेव्हा अधिकाऱ्यांना सांगितले जाते. तेव्हा ते दुर्लक्ष करीत असल्याचे प्रकार वर्षभरात अनेकदा अनुभवायला मिळाले. अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीवच नसल्याचे वाईट अनुभव आले आहेत.

-प्रियंका माने, पंचवटी प्रभाग समिती सभापती

लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेत काम करताना महिलांना सन्मान मिळत नसल्याचे अनुभव आले. त्यात नव्याने निवडून आलेल्या महिलांना तर महापालिकेचा कारभार समजून घेणे कठीण काम आहे. प्रशासनाच्या कामाची गती अत्यंत धिमी असल्यामुळे विकासकामांना गती मिळत नाही.

-पूनम मोगरे, नगरसेविका

दुसऱ्यांदा नगरसेवक झाल्यामुळे प्रभागातील नागरिकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. नव्याने वाढणाऱ्या नागरीवस्तीच्या भागात कामांना खूप वाव आहे. मुलभूत गरजेच्या कामांना प्राधान्यक्रम देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

-रुची कुंभारकर, नगरसेवक

प्रभागाच्या अविकसित भागाकडे लक्ष केंद्रीत केले असून, आमदार बाळासाहेब सानप यांच्या निधीतून अनेक कामे केली आहेत. रस्ते, पथदीप, पाणी आणि ड्रेनेजची गरज असलेल्या नव्याने झालेल्या वसाहतीला पुरविण्याचे काम करण्यात येत आहे.

-मच्छिंद्र सानप, नगरसेवक

नागरिक म्हणतात....

जुन्या आडगाव नाक्याच्या चौकातील वाहतुकीची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. त्यांना नेहमी वाहतूक कोंडी होत आहे. अनेक वसाहतीत अजूनही पक्के रस्ते नाहीत. कालव्याच्या भागात कचरा आणि उघड्यावर शौचास बसले जात असल्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे.

-योगेश घोडे, नागरिक

तपोवन कॉर्नर परिसरात पथदीपाचे खांब उभे करण्यात आलेले आहेत. त्यावर दिवेच बसविण्यात आलेले नाहीत. कृष्णनगर, टकलेनगर आदी परिसरात रस्ते आणि पाणी यांची समस्या नाही. मात्र, कचऱ्याचे ढीग जमा झालेले असतात.

-सचिन दप्तरे, नागरिक

नाशिकमध्ये येणारे पर्यटक ज्या भागात येता त्याच नवीन सिंहस्थाच्या भागात कचऱ्याची समस्या वाढलेली आहे. अस्वच्छतेचे दर्शन पर्यटकांना होत आहे. या रस्त्यालगतच्या भागात डेब्रिज टाकले जाते. या भागात पाणी साचलेले असल्यामुळे डासांची समस्या वाढली आहे.

-अाप्पा शिंदे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हाडा लाभार्थींची ‘वणवण’

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महाराष्ट्र गृहनिर्माण संस्थेने सातपूरच्या त्र्यंबकरोडवर ८० सदनिका सोडत पद्धतीने वाटप केल्या होत्या. यानंतर ज्यांना सोडतीत म्हाडाची सदनिका मिळाली त्यांच्याकडून रितसर पैसैही घेण्यात आले. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून पूर्ण पैसै भरूनही लाभार्थींना सदनिकांसाठी 'वणवण' करावी लागत आहे.

म्हाडाच्या या सदनिका घेण्यासाठी अनेकांनी बँकांमधून गृहकर्ज घेतले आहे. मात्र, सदनिका ताब्यात मिळाली नसल्याने बँकांच्या हप्त्याचा बोजा ग्राहकांना सहन करण्याची वेळ आली आहे. म्हाडाने १ डिसेंबर २०१७ रोजी सदनिका लाभधारांच्या ताब्यात देण्यात येतील, असे जाहीर केले होते. परंतु, प्रत्यक्षात महापालिकेत अग्निशमनाच्या परवानगीत म्हाडाच्या सदनिका अडकल्याचे बोलले जात आहे. याबाबत म्हाडाचे अधिकारी रमेश मिसाळ यांना विचारले असता पुढील आठ दिवसांत सदनिकांचा ताबा देण्यात येईल, असे सांगितले. यात मात्र बँकांमध्ये व्याजासह हप्ते भरावे लागत असल्याने चार महिन्यांचे व्याज म्हाडा देईल का, असा सवाल लाभार्थींनी केला आहे. म्हाडाच्या दिरंगाईमुळेच लाभार्थी हे सदनिकांपासून वंचित राहिल्याचा आरोपही होत आहे.

लाभार्थींची नाराजी

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीच्या मध्यभागी असलेल्या सातपूर कॉलनीत म्हाडाने स्वतः घरकुले उपलब्ध करून दिली होती. जुन्या म्हाडाच्या स्किममध्ये ८ हजारांपासून ते ८५ हजारांपर्यंतच्या घरकुल कामगारांसाठी म्हाडाने बांधली आहेत. कालांतराने कामगारांच्या मागणीनुसार त्र्यंबकेश्वररोडलगत डुप्लेक्सचेही घरकुले म्हाडाने कामगारांना दिली. यानंतर पुन्हा मागणी आल्याने पडून असलेल्या जागेवर ८० सदनिका व व्यापारी गाळे म्हाडाने बांधली. या ८० सदनिकांचे वाटप म्हाडाने सोडत पद्धतीने केलेही होते. मात्र, ज्यांना सोडत जाहीर झाली अशा लाभार्थींनी पूर्ण पैसै भरले आहेत. काहींना म्हाडाकडून दंडदेखील आकारण्यात आला होता. यामुळे नाराजीचा सूरही लाभार्थींनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे

विशेष म्हणजे, म्हाडा कार्यालयात चौकशीसाठी जाणाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. सदनिका तयार होऊन अनेक महिने उलटले परंतु, म्हाडाच्याच चुकीमुळे संपूर्ण पैसै भरूनही सदनिकाधारकांना भाड्याच्या खोलीत दिवस काढण्याची वेळ आली आहे. बँकेतून कर्ज काढून ग्राहकांनी सदनिकांसाठी पैसै भरले. एकीकडे पूर्ण पैसै भरून सदनिका ताब्यात मिळाली नसल्याने बँकेच्या हप्त्यांचा बोजा लाभार्थींना सहन करावा लागत आहे. याबाबत म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देत लाभार्थींना सदनिकांचे वाटप करावे, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

ज्यावेळी सदनिकांची सोडत जाहीर केली होती. त्यात माझा नंबर लागल्याने बँकेतून कर्ज काढत मी, सदनिकेचे पूर्ण पैसै अदा केले होते. उशिराने काही पैसै भरले म्हणून मला तीस हजारांचा दंडही भरावा लागला. परंतु, चार महिन्यांपासून बँकेचे हप्ते भरत असून, सदनिका मात्र ताब्यात मिळालेली नाही.

-सुवर्णा सांगळे, सदनिकाधारक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेट्रीचंड उत्सवातून एकात्मतेचे दर्शन

0
0

देवळालीत सिंधीबांधवांचा सहभाग

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

'भगवान झुलेलाल यांच्यावर विश्वास ठेव, तुझे भाग्य उजळेल व मंदिरापर्यंत चालत ये तुझे सर्व बिघडलेले काम बनेल' हा भाव मनाशी धरत देवळालीच्या सिंधी समाजबांधवानी झुलेलाल मंदिरात झुलेलाल यांच्या जन्मदिवसानिमित्त चेट्रीचंड उत्सव साजरा केला.

देवळालीतील झुलेलाल मंदिरात झालेल्या उत्सवात भजन कीर्तनादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 'सिंध की शहनाई'सह मंदिरात सुरू असलेल्या भजनाच्या तालावर ठेका धरत नाचण्याचा आनंद लुटत उत्सवात रंगत आणली. देवळालीत ब्रिटिश कालापासून 'चेट्रीचंड' उत्सवाचे आयोजन करण्यात येते, यामध्ये ४३ वर्षांपूर्वी सिंधी बांधवांनी एकत्र येत गवळीवाडा भागात भगवान झुलेलाल यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.

भगवान झुलेलाल मंदिरात घनशाम महाराज शर्मा यांच्या हस्ते रविवारी (दि. १८) सकाळी बहेराणा (ज्योत) स्थापना करण्यात येऊन लालसाई खुहुंबा पूजन करण्यात आले. या वेळी मंदिर समितीचे अध्यक्ष देवनदास रोहेरा, झामनदास आहुजा, ठाकूरदास रोहेरा, जयराम नागदेव, मोहन मनवानी, भरत दर्यांनी, आनंद कुकरेजा, वासू बत्रा, रतन कुकरेजा, विजय हेमनानी, मोहन सचदेव उपस्थित होते. सोमवारी (दि. १९) बहराणा पूजन, बिटको हॉस्पिटलच्या रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिर तर दुपारी अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला. यानंतर सांयकाळी बहेराणा साहेब व भगवान झुलेलाल यांच्या उत्सवमूर्तीची शहरातून मिरवणूक काढली. या वेळी सिंधी बांधवांसह सर्वधर्मियांनी सहभागी होत नृत्य केले. यावेळी चण्याच्या हथप्रसादाचे वाटप करण्यात आले.

जुन्या बस स्थानकात सिंधू सेवा मंडळाच्या वतीने उभारलेल्या व्यासपीठावर भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी बळवंत गोडसे, प्रीतमदास खत्री, विजय कुकरेजा यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. याप्रसंगी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दिनकर आढाव, नगरसेवक बाबुराव मोजाड, सचिन ठाकरे, तानाजी करंजकर, महिला व बालकल्याण सभापती सरोज आहेर, निसार खान आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक नगरसेवक भगवान कटारिया यांनी केले. यशस्वीतेसाठी आकाश धामेजा, उपाध्यक्षपदी सोनू रामवानी, कमल धामेजा आदींनी मोटारसायकल रॅली काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुलीचे टार्गेट ५५ कोटी

0
0

उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा प्रशासनाच्या हातात केवळ पाच दिवस

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा प्रशासनाने चालू आर्थिक वर्षात १४९ कोटी रुपयांची वसुली केली. शासकीय सुटीचे दिवस वगळून पुढील पाच दिवसांमध्ये तब्बल ५५ कोटी रुपये वसुली करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.

यंदा प्रामुख्याने १०५ कोटी रुपयांचा महसूल गौण खनिजच्या माध्यमातून तर १०० कोटी शेतसारा, नजराणा जमीन महसुलाच्या माध्यमातून प्रशासनाला प्राप्त होणे अपेक्षित होते. मात्र, वाळू लिलावास बंदी असल्याने त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी फेरले गेले आहे. गौण खनिजाच्या माध्यमातून ६७ कोटी ३० लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच जमीन महसूलातून ८१ कोटी ६९ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) फटका व्यापारी वर्गाबरोबरच महसूल विभागालाही बसला आहे. करमणूक कर तसेच रोजगार हमी योजना व शिक्षण कर वर्ग केला असून महसूलच्या वसुलीचे उद्दिष्ट मात्र कमी करण्यात आलेले नाही. जिल्हा प्रशासनाला या करातून दरवर्षी कोट्यवधींचा महसूल मिळत होता. तसेच गौण खनिज परवान्याच्याबाबतही कायदेशीर तिढा उभा राहिल्याने याचा परिणामही वसुलीवर दिसून येऊ लागला आहे. जिल्ह्याला २०५ कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट असून प्रत्येक तालुक्यातून गोळा करावयाच्या करांच्या रकमा वाटून देण्यात आल्या आहेत.

यंदा ६० कोटींचा फटका

कोणत्याही करमणूक कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनामार्फत परवानगी घेणे अनिवार्य होते. या माध्यमातून दरवर्षी जिल्हा प्रशासनाला सुमारे ३२ कोटींचा महसूल प्राप्त होत असे. परंतु, करमणूक कर 'जीएसटी'च्या कक्षेत आणल्याने हा महसूल वसुलीचा प्रश्न राहिलेला नाही. शिक्षण कराच्या माध्यमातून मिळणारा ३० कोटींचा महसूलही यंदा प्रशासनाला मिळणार नसल्याने असा एकूण ६० कोटींचा भार अन्य महसुलातून वसूल करताना प्रशासनाची दमछाक होऊ लागला आहे.

महसूल वसूलीचे उद्दिष्ट

महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. यामध्ये महापालिका, पाटबंधारे विभागाकडून भूसंपादनापोटी सुमारे ५ कोटी, भामधरणातून होणाऱ्या उत्खन्नातून रॉयल्टीपोटी साडेतीन कोटी, मोजणी व इतर फी ४० लाख, नजराणा रक्कम साडेपाच कोटी तसेच दंडात्मक कारवाया तसेच क्रशर परवान्याच्या माध्यमातून पुढील सहा महिन्यांची आगाऊ रक्कम भरून घेऊन या माध्यमातून वसुलीचे उदिदष्ट पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरा जणांना बडतर्फीच्या नोटिसा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सेवेत आरक्षित प्रवर्गाच्या जागेवर नोकरी मिळूनही वेळेत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करू न शकणाऱ्या अकरा कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाने बडतर्फीच्या नोटिसा बजावल्या आहेत. राज्य सरकारच्या अध्यादेशाप्रमाणे या सर्व ११ जणांना यापूर्वीही नोटिसा बजावल्या होत्या. परंतु, तरीही त्यांनी वेळेत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्याने प्रशासनाने अखेर बडतर्फीच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. या सर्व ११ जणांना खुलाशासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली असून, दहा दिवसांत खुलासा प्राप्त झाला नाही, तर थेट नोकरीतूनच बडतर्फ केले जाणार आहे.

शासकीय सेवेत आरक्षित प्रवर्गाच्या जागेवर नोकरी मिळवूनही जातपडताळणी प्रमाणपत्रे सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांसदर्भात राज्यसरकारने एक अध्यादेश जारी केला आहे. त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. बोगस आदिवासींसंदर्भात सुप्रीम कोर्टानेही सरकारला फटकारले आहे. त्यानुसार महापालिकेलाही राज्यसरकारने पत्र पाठवून अशा कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने अशा कर्मचाऱ्यांची माहिती जमा केली होती. त्यात आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या ११ कर्मचाऱ्यांनी सेवेत रुजू होऊन अद्याप जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नाही. या सर्व ११ जणांना यापूर्वीही नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. परंतु, त्यांनी याबाबत खुलासा केलेला नाही. त्यामुळे प्रशासन उपायुक्त महेश बच्छाव यांनी या सर्व ११ जणांना बडतर्फीच्या अंतिम नोटिसा बजावल्या आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांनी जातपडताळणी प्रमाणपत्रे सादर केले नसून दाखल्यासाठी कुठे अर्ज केल्याचा पुरावाही दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सर्वांना दहा दिवसांच्या नोटिसा बजावल्या असून, योग्य खुलासा प्राप्त झाला नाही तर थेट बडतर्फीची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, पालिकेच्या अन्य विभागामध्येही अशा प्रकारचे कर्मचारी शोधण्याचे आदेश देण्यात आल्याने जातपडताळणी वेळेत सादर न कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

यांना दिल्या नोटिसा

कर्मचाऱ्यांची नावे- नीरे दुर्गा वामन(शिपाई), सुमेश बिरदास दिवे (बिगारी), प्रवीण जगन्नाथ गांगुर्डे (बिगारी), अनिल कृष्णा पवार (बिगारी), मनोहर मोहन ढालवाले (बिगारी), राजू गंगाधर लोंढे (वॉर्डबॉय), देवजी धनाजी रेवर (स्वच्छता मुकादम), राजू नानासाहेब पगारे (वॉर्डबॉय), अनिल रामचंद्र सौदे (वर्कर), पारुबाई अरुण धुमाळ (आया), रमेश प्रभाकर नागपुरे(स्वच्छता मुकादम).

सहाय्यक अधीक्षक निलंबित

करवसुलीच्या कामात कुचराई केल्याप्रकरणी विविध कर विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयात कर विभागात कार्यरत असलेले सहाय्यक अधीक्षक बाळू रामभाऊ काळे यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रशासन विभागाने विविध कर उपायुक्तांच्या प्रस्तावानुसार ही कारवाई केली आहे. मार्चअखेर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयश आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेत आतापर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ही ९ वर पोहचली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारपुरस्कृत कंपनीवर फुली

0
0

vinod.patil@timesgroup.com

tweet-vinodpatilMT

नाशिक : महापालिका क्षेत्रात एलईडी दिवे बसविण्याचे कंत्राट केंद्रशासन पुरस्कृत एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल)या कंपनीला देण्याचा प्रस्ताव आता बारगळला आहे. आयुक्त तुकाराम मुंढें यांनी ईईएसएल कंपनीचे यापूर्वीच्या हैदराबादस्थित वादग्रस्त एमआयसी कंपनीबरोबरचे आर्थिक कनेक्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. संबंधित ईईएसएल कंपनीला काम दिल्यास आपली प्रतिमाही डागाळण्याची शक्यता गृहीत धरून मुख्यमंत्र्यांनीच नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या कंपनीला काम देण्याचा महासभेचा ठरावही आता गुंडाळला जाणार आहे. शहरात ९९ हजार एलईडी दिवे बसवण्यासाठी नव्याने स्पर्धात्मक पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून, त्यातून पालिकेचाही आर्थिक फायदा होणार आहे.

शहरात एलईडी दिवे बसविण्याचा २०२ कोटींचा वादग्रस्तठेका भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. तत्कालीन आयुक्त व सत्ताधाऱ्यांनी ४६ कोटींची योजना २०२ कोटींपर्यंत फुगवली होती. शिवाय, सर्व नियम धाब्यावर बसवून ७० हजार एलईडी दिवे बसविण्याचे कंत्राट हैद्राबादस्थित एमआयसी कंपनीला दिले होते. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होऊन विरोधक हायकोर्टापर्यंत गेले होते. तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांनी संबंधित कंपनीला वर्क ऑर्डरही देऊन टाकली. कंपनीने पुर‌वठा केलेले एलईडी दिवे निकृष्ट दर्जाचे तर होतेच, शिवाय त्यातील भ्रष्टाचाराचा संबंध हेरून नंतरचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या वादग्रस्त दिवे खरेदीला चाप लावला होता. तसेच संबंधीत कंपनीला दिलेली ८० कोटींची बँक गॅरंटीही रोखली होती. एमआयसी कंपनीने महापालिकेकडून मिळविलेली ८० कोटींची बँक गॅँटी ईईएसएल या कंपनीला परस्पर हस्तांतरीत केल्याने ईईएसएल ही कंपनीही संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती.

राज्यसरकारने डिसेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यापुढे एलईडी दिवे बसवण्याचे कंत्राट या ईईएसएल कंपनीलाच देण्याचे आदेश काढले होते. पूर्वीचे २०२ कोटींचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच मनपाने पुन्हा एकदा एलईडी दिवे खरेदीची तयारी जानेवारीत केली. जानेवारीच्या महासभेत संपूर्ण शहरात ९९ हजार ५८२ पथदिव्यांवर शासनपुरस्कृत ईईएसएल कंपनीमार्फत वीज बचतीच्या निधीतून एलईडी दिवे बसविण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. परंतु, याच वेळी एमआयसी आणि ईईएसएल यांचे आर्थिक लागेबांधे विरोधकांनी महासभेत उघड केले होते. परंतु, तत्कालीन आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे भाजपसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

मुंढे यांनी काढली फाइल

सत्ताधाऱ्यांनी एलईडी दिवे बसवण्याचे काम ईईएसएलमार्फत करण्याचा प्रस्तावही दिला होता. परंतु, फेब्रुवारीत आलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही फाइल नव्याने उघडत त्यातील त्रुटींचा अभ्यास केला आहे. संबंधित कंपनीचा आर्थिक संबंध हे यापूर्वी महापालिकेत वादग्रस्त ठरलेल्या एमआयसीशी असल्याची बाब मुंढे यांच्या लक्षात आली. या कंपनीकडून खरेदी केल्यास ही खरेदीही वादात सापडण्याची शक्यता होती. शिवाय, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेलाही तडा जाण्याची शक्यता होती. सदरील बाब मुंढे यांनी महापौर रंजना भानसी यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून आणून दिल्यानंतर एकाच कंपनीला काम न देता, जाहीर निविदेद्वारे काम करण्याचे आदेश दिले. त्यासाठी महापालिकेने नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याची तयारी सुरू केली आहे.

आर्थिक फायदा होणार

ईईएसएल कंपनीलाच काम दिल्यास त्यातून महापालिकेचाही आर्थिक तोटा होणार होता. संबंधित कंपनीच एलईडी दिव्यांची रक्कम निश्चित करणार होती. ऊर्जाबचतीतून जरी बिल भरले जाणार असले तरी त्यातून पालिकेचे आर्थिक नुकसानच अधिक होणार होते. परंतु, निविदांद्वारे एलईडी दिव्यांची खरेदी केली असती, तर स्पर्धात्मक पद्धतीमुळे महापालिकेचा आर्थिक फायदा होणार होता. आता पुन्हा नव्याने निविदा निघणार असल्याने अन्य कंपन्याही यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे किमान किमतीत एलईडी दिवे महापालिकेच्या पदरात पडणार असून, आर्थिक बचतही होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकचा ‘फुगेवाला’ वॉशिंग्टनमध्ये!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकला असलेली चित्रपटनिर्मितीची परंपरा दिवसेंदिवस बहरत असून नाशिकच्या कलाकारांनी तयार केलेली 'फुगेवाला' ही फिल्म १६ मार्च रोजी वॉशिंग्टन मध्ये प्रदर्शित झाली आहे.

शहरातील चार तरुणांनी एकत्र येऊन या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कोणतीही वस्तू घेताना ग्राहकाने तडजोड करून खरेदी करावी. हा त्या ग्राहकाचा हक्क असतो. परंतु, छोट्या विक्रेत्यांशी तडजोड करू नये, हे या चित्रपटातून दाखवले आहे. या चित्रपटाची निर्मिती अरमान फिल्मची असून ताहीर भाई शेख हे निर्माते आहेत. संजय निकुम यांचे दिग्दर्शन आहे. तर या चित्रपटाचा कार्यकारी निर्माता म्हणून पार्थसारथी चव्हाण यांनी काम पाहिले आहे. अनेक चित्रपट व नाटकांमधून भूमिका केलेले सचिन जाधव यांनी फुगेवाल्याची भूमीका साकारली असून चिराग गंगाणी यांनी कॅमेऱ्याची बाजू सांभाळली आहे. त्यांना गणेश चांदवडकर यांनी सहाय्य केले आहे. या चित्रपटात गजश्री नागपुरे, मनोज नागपुरे, विक्रम क्षत्रिय, भावना कुलकर्णी, सुधीर गुजराथी, श्रीराम गोरे, फैज शेख, ताहिर शेख यांनी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला महाराष्ट्रातील अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये पारितोषिके मिळाली असून, नाशिकमध्ये झालेल्या अंकुर फेस्टिव्हलमध्येही प्रेक्षकांनी वाहवा केली होती. यू ट्यूबवर हा चित्रपट सध्या गाजतो आहे.

अशी आहे कथा...

अरमान फिल्मच्या या चित्रपटात फुगेवाला फुग्यांची विक्री करून आपल्या कुटुंबाचा निर्वाह करीत असतो. या विक्रीतून त्याला घरातील दोन मुलांचे शिक्षण आणि दोन वेळचे जेवण कसेबसे मिळत असते. त्याच्या व्यवसायाला हातभार लागावा म्हणून त्याची पत्नीही फुगे विक्रीला मदत करते. एकदिवस फुगे फुगवत असताना अचानाक त्याला खोकला येतो. साधा खोकला असेल म्हणून तो त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र कालांतराने हा आजार जास्तच वाढत जातो. एकदिवस डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला मोठा आजार झाल्याचे समजते. मुलांची हेळसांड होऊ नये त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून तो आजाराकडे दुर्लक्ष करून पुन्हा आपल्या व्यवसायाला जुंपतो. नेहमीप्रमाणे त्याची पत्नी त्याला झोपेतून उठवायला जाते त्यावेळी त्याचे निधन झालेले असते. घरावर अचानक आलेल्या संकटामुळे त्याच्या मुलाला शिक्षण अर्धवट सोडून आपल्या वडीलांच्या व्यवसायाला जुंपावे लागते. हे चित्रपटातून दाखवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे महापालिकेचे २५४ कोटींचे अंदाजपत्रक सादर

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे महापालिकेचा मागील तीन वर्षांचा आढावा घेत यंदाचा अर्थसंकल्प महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत बुधवारी (दि. २१) आयुक्तांतर्फे सादर करण्यात आला. या अंदाजपत्रकात शहर विकासासह ई-गव्हर्नन्स तसेच आर्थिक दुर्बल घटकांवर विशेष तरतूद केल्याचे आयुक्तांनी सांगितले. हा २५४.६४ कोटींचा अर्थसंकल्प महापालिकेत आयुक्तांनी स्थायी समिती सभापती वालीबेन मंडोरे यांच्याकडे सादर केला.

महापालिकेच्या सभागृहात बुधवारी (दि. २१) स्थायी समितीच्या सभेप्रसंगी सभापती वालीबेन मंडोरे, आयुक्त सुधाकर देशमुख, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ, माजी सभापती कैलास चौधरी, कमलेश देवरे, गंगाधर माळी, संजय बोरसे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सभेच्या सुरुवातीस शहरात सद्यस्थितीत करण्यात येत असलेल्या दूषित पाण्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर आयुक्तांसह अभियंता कैलास शिंदे यांनी स्पष्टीकरण सादर केले. त्यावर येत्या आठ दिवसांत स्वच्छ पाणी नागरिकांना पिण्यास मिळाले नाही तर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कैलास चौधरींसह इतर सदस्यांनी दिला. सदस्य कमलेश देवरे यांनी त्यांच्या प्रभाग २६ मधील केंद्राकडून करण्यात येत असलेल्या १३६ कोटींच्या जलवाहिनीमुळे डांबरीकरण केलेले रस्ते पुन्हा खराब झाल्याची तक्रार मांडली. त्यावर अभियंता ओगले यांनी ते रस्ते पुन्हा दुरूस्त केले जाणार असल्याचे सांगितले. यानंतर लगेचच आयुक्तांनी २०१७-१८चे सुधारीत व २०१८-१९ चे मूळ अंदाजपत्रक सभागृहात सादर केले.

जीआयएस मॅपिंगद्वारे कर आकारणी

महापालिकेला जीएसटी, मालमत्ता कर, पाणीपट्टी, आरोग्य, गाळेभाडे अशा विविध घटकांमधून उत्पन्न मिळत असते. ते पहाता शहर विकासावर त्यापेक्षा अधिक खर्च हा नेहमीच करावा लागतो. त्यामुळे महापालिकेकडे शहर विकासाच्या बाबतीत अनेक तक्रारीही येत असतात. यंदाचा अर्थसंकल्प हा या सगळ्या बाबी विचारात घेवून तयार करण्यात आला असल्याने हा अर्थसंकल्प वास्तवादी असा आहे, असे यावेळी सांगण्यात आले. २०१८-१९ या चालू वर्षात जीआयएस मॅपिंगद्वारे कर आकारणी करण्याचा प्रशासनाचा मानस असून, त्यासाठी भरीव तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

दूषित पाण्यावरून महिलांचा महापौरांना घेराव

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने दूषित पाणीपुरवठा होत असून, आजवर अनेकांनी मनपात येवून तक्रारही केल्या आहेत. मात्र या तक्रारींची कुठलीही दखल घेतली जात नाही. परिणामी शहरात दूषित पाणी पुरवठा सुरू आहे. सततच्या दूषित पाणीपुरवठ्याने वैतागलेल्या मोगलाईतील महिलांनी बुधवारी (दि. २१) मनपात येऊन थेट महापौरांनाच घेराव घातला. यावेळी दूषित पाण्याच्या बाटल्या महापौरांना दाखवून त्याचा जाब विचारण्यात आला. तर नेहमीप्रमाणे महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडे बोट दाखवून जाब विचारणार असल्याचे आश्‍वासन दिले. यानंतर महिलांनी समाधान न झाल्यामुळे आवारात निदर्शने करीत स्वच्छ पाणीपुरवठ्याची मागणी केली. या संदर्भात आयुक्तांच्या नावेही एक निवेदन देण्यात आले. या महिलांमध्ये जयश्री चहाकर, ज्योती खरात, कल्पना जाधव, सीमा वाघ, सुशीला कुटे, बायमा सय्यद, कल्याणी कोळी, सोनाली आगलावे, कमल आगलावे, विमल पवार, उषा शितोळे आदींसह शहरातील विविध भागांतील महिलांचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत खड्ड्यांतून भरावे लागते पाणी

0
0

राजन जोशी, सिडको

सिडको आणि पाणी समस्या हे एक सूत्रच तयार झाले आहे. सिडकोतील पाण्यासंदर्भात नागरिकांप्रमाणेच नगरसेवकांनीही अनेकदा आवाज उठवून, वेळप्रसंगी आंदोलनाची भूमिका घेतली होती. मात्र, आजही सिडकोत पाण्याची समस्या प्रलंबितच आहे. सिडकोत चाळीस टक्‍के घरांमधील महिलांना खड्ड्यांतून पाणी भरावे लागत असल्याने यावर कायमस्वरुपी पर्याय निघणे आवश्यक आहे.

सिडकोच्या सहा योजनांमध्ये सर्वाधिक घरे बैठ्या पद्धतीची आहेत. सिडकोत अनेक वर्षांपासून घरात पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांना घराबाहेरील पाण्याच्या लाइनद्वारे खड्ड्यांतून पाणी भरावे लागते. काळानुरूप महानगर पालिकेने व नगरसेवकांनी घेतलेल्या काही प्रयत्नांमुळे हा प्रश्न काहीअंशी सुटला असला तरीही आजही अनेक महिलांना खड्ड्यांतूनच पाणी भरावे लागत आहे. सिडकोत पहिल्या मजल्यावरसुद्धा पाणी पोहचणे अवघड आहे. त्याचबरोबर सिडकोत आजही एकाच वेळेस अर्धा तास पाणीपुरवठा होत असल्याने सिडकोतील पाण्याची समस्या सर्वश्रुत आहे. सध्या तरी सिडकोत पाण्याची समस्या अशी जाणवत नसली तरी बऱ्याचशा भागात महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

जलकुंभ मुबलक तरी समस्या

सिडकोत सध्या पाथर्डी फाटा येथे दोन टाक्या, पवननगर येथे दोन टाक्या, सावतानगर येथे एक, बडदेनगर येथे दोन, उपेंद्रनगर येथे एक अशा अनेक पाण्याच्या टाक्या आहेत. मात्र, तरी पाण्याचे नियोजनच होत नसल्याने पाणीपुरवठा हा कोठे जास्त, तर कोठे कमी प्रमाणात होताना दिसतो. अनेकदा सिडकोचे पाणी अन्यत्र पळविले जात असल्याचा आरोपही होत असला तरी त्यावर ठोस कारवाई अद्यापही झालेली दिसत नाही. गंगापूर धरण ते सिडको थेट पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली असली तरी अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याने येथील पाण्याची समस्या सुटलेली नाही. सिडकोतील सहाव्या योजनेतही पाण्याची गंभीर समस्या असून, येथे पुरेसा पाणीपुरवठाच होत नसल्याच्या तक्रारी महिलांकडून होत असतात. सिडकोत मागील काही महिन्यांपूर्वीच सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेनेच पाण्यासाठी मोर्चा काढला होता, त्यामुळे सिडकोतील पाण्याची समस्या ही संपूर्ण शहराला माहिती असली तरी त्यावर उपाय मात्र अद्याप निघालेला नाही. शहरात दोन वेळा तर सिडकोत एकच वेळा पाणीपुरवठा केला जातो. याबाबतही नगरसेवकांनी आवाज उठविला होता. मागील वर्षी पाऊस चांगला झाल्याने सिडकोत सध्या तरी पाण्याची समस्या जाणवत नाही. मात्र, येत्या महिनाभरात सिडकोतील पाण्यावरून वादंग सुरू होणार हे मात्र निश्चित. सिडकोतील पाणी समस्या कायमस्वरुपी सुटण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुरेसा प्रयत्न करायला हवा असे मत नागरिकांनी व्यक्‍त केले आहे.

सिडकोत सुरुवातीपासूनच आम्ही खड्ड्यांतून पाणी भरत आहोत. आता कधी कधी घरात पाणी येत असले तरी पाण्याचा दाब कमी असल्यास खड्ड्यातूनच पाणी भरावे लागते. शहरातील प्रत्येक नागरिकांप्रमाणे आम्हीही तेवढीच पाणीपट्टी देतो. मात्र तरीही पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. सिडकोतील पाणी समस्या कायमस्वरुपी सोडविणे आवश्यक आहे.

-दर्शना देशमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळाली कॅम्प, एक शहर हिरवाईने नटलेले!

0
0

(हवामान दिन विशेष)

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

आपले आणि आपल्या भोवतालच्या हवामानाचे नाते अतिशय गुंतागुंतीचे असते. आपल्या भोवतीच्या हवामानामुळेच आपल्या अस्तित्वाला अर्थ असतो. त्यामुळे एकीकडे हवामान आपल्यासाठी जगण्याची आवश्यक अट असते. हवामानाचे नाना अविष्कार आपले सर्वार्थाने भरण-पोषण करीत असतात. पाऊस पडतो आणि धनधान्याची समृद्धी घेऊन येतो. अनेक प्रकारच्या रंग-गंधांनी आणि फळा-फुलांनी सृष्टी मोहरून जाते. आपल्या खाण्या-पिण्याच्या आणि वागण्याच्या सवयी, पेहराव, आपल्या बोली भाषेतले शब्द आणि वाक्यप्रचार, आपली घरे, अवयव, शरीराची ठेवण, आपले सणवार किंबहुना आपली सारी संस्कृतीच भोवतालच्या हवामानावर बेतलेली असते.

' वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' या संत तुकारामांच्या अभंगाचा साक्षात अनुभव देणारे देवळाली कॅम्प हे शहर. शहरात प्रवेश करताना लामरोडपासूनच ही हिरवाई आपली साथसंगत करते. हिरवाई टिकून असल्याने येथील वातावरण आल्हाददायक असते. त्यामुळे पर्यटकांना भर उन्हाळ्यात ग्रीन देवळालीकडे खेचून आणतो.

स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनादेखील या परिसरातील हिरवळी व शुद्ध हवामान पाहून आपल्या सैन्यदलाच्या प्रशिक्षणासाठी दूरदृष्टीचा वापर करीत येथे छावणीची स्थापना केली. लष्कराच्या दृष्टीने सोयीची व समुद्रसपाटीपासून उंचीवर असलेल्या या जागेचे महत्त्व ओळखून वसाहती स्थापन केल्या. ब्रिटिशांपाठोपाठ मुंबईस्थित पारशी, जैन, गुजराथी, सिंधी समाजही व्यापाराच्या निमित्ताने येथे आला आणि येथे कायमस्वरुपी स्थायिक झाला. त्यांनी देवळालीच्या विविध भागात बंगले बांधले. समाजबांधवांमध्ये सण उत्सव साजरे करता यावेत यासाठी लामरोडपासून थेट भगूरपर्यंत तर संसरी लेनपासून शिगवे बहुलापर्यंत विविध आरोग्यधामांची निर्मिती सुमारे शंभर वर्षांपूर्वीच केली आहे. त्यात कॅन्टोन्मेंट बोर्डाने येथे बांधकाम करताना रचना निर्देशांक (एफएसआय) ०.५ एवढाच ठेवल्याने आजही येथील नागरिक मोकळ्या जागेवर सहज विविध प्रकारच्या औषधी व फळ झाडांसह पर्यावरणाला पूरक ठरतील अशा झाडांची लागवड करीत असतात. शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या लामरोडपासून थेट भगूरपर्यंत अनेक प्राचीन व प्राणवायूपूरक असे वड, पिंपळ, कडुनिंब, आंबा, बाभूळ, चिं­च असे वृक्ष तर शहराच्या सौंदर्यात भर घालणारे गुलमोहर व बदाम असे नानाविध प्रकारची शेकडो झाडे रस्त्याच्या दुतर्फा उभी आहेत. देवळालीची ही हिरवाईची ओळख पुसली जाऊ नये म्हणून गेल्या काही वर्षांपासून लष्करी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्ड, इनरव्हील, रोटरी, सिंधी पंचायत, बोहरी समाज, राजकीय नेते, वनश्री पुरस्कार विजेते तानाजी भोर, वृक्षमित्र चंद्रकांत गोडसे आदी सातत्याने विविध कार्यक्रमांचे औचित्य साधत शहराच्या विविध भागांत वृक्षलागवड करीत असतात. त्यामुळे येथील पर्यावरणाचा समतोल राखला जाऊन हवामान आपोआप नियंत्रित राहते. मुंबईसह अन्य शहरांमधून पर्यटक या शहरात उन्हाळ्याची सुटी घालविण्यासाठी येतात. या परिसराचे महत्त्व ओळखून अनेक सेवानिवृत्त लष्करी अधिकारी व जवान आपले गाव सोडून येथे कायस्वरुपी वास्तव्यास आहेत.

डॉ. वसंत पवार यांच्या स्मृती

नाशिकचे १९९१ ते ९६ दरम्यान खासदार राहिलेले दिवंगत डॉ. वसंत पवार यांची एक वृक्षप्रेमी म्हणून देवळालीकरांना ओळख आहे. त्यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात देवळाली स्थित लष्कराला सोबत घेऊन या विभागात सुमारे एक लाख वृक्षांची रोपे लावण्याचा उपक्रम राबविला. त्यातील अनेक रोपट्यांचे आज वृक्षात झालेले रुपांतर देवळालीच्या विविध भागात दिसून येते. त्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचादेखील खारीचा वाटा येथील हवामान टिकून राहण्यामागे आहे.

एका झाडाच्या बदल्यात १० झाडे लावणे हा नियम लागू आहे. हा नियम लष्कराचे प्रशासनदेखील पाळत असून देवळालीच्या लष्करी हद्दीतील वनराई पाहता अवघ्या नाशिक जिल्ह्यात एवढे मोठी वृक्षराजी खचितच कोठे असेल.

- विलास पवार, सीईओ, कॅन्टोन्मेंट बोर्ड

आजपर्यंत केवळ देवळालीतच नव्हे तर आजूबाजूच्या पंचक्रोशीत असलेल्या शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, नगरपालिका व कॅन्टोन्मेंट बोर्ड यांना आजपर्यंत हजारोंच्या संख्येने झाडांचे रोपटे मोफत वाटप करीत देवळालीसह परिसरातील अन्य गावांचेदेखील हवामान अबाधित राहावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.

- वृक्षमित्र तानाजी भोर (महाराष्ट्र शासन वनश्री पुरस्कार विजेते)



गेली अनेक वर्ष आम्ही हवामानाच्या दृष्टीने विचार करून सातत्याने शहरात वृक्षलागवड करीत संवर्धन करीत आहोत. लागवड केलेल्या झाडांचे पालनपोषण करणे हे जबाबदारीचे काम असून, ते पार पाडताना हवामान बदलातील समस्यांना तोंड देत ग्रीन देवळाली हे ब्रीद जोपासण्यासाठी सातत्याने धडपडत आहोत.

- चंद्रकांत गोडसे, वृक्षमित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांसाठी अडथळामुक्तीचा संकल्प

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकला दोन वर्षांत 'अडथळामुक्त शहर' (बॅरिअरफ्री सिटी) करण्याचा संकल्प सोडत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यंदाच्या आर्थिक वर्षाचे बजेट गुरुवारी स्थायी समितीला सादर केले. पायाभूत सुविधांवर भर देतानाच नाशिककरांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचा संकल्पही बजेटमध्ये सोडण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या बजेटमध्ये ३३१ कोटींची वाढ झाली असून, एक कोटी ९१ लाख रुपये शिलकीच्या एकूण १७८५ कोटी १५ लाख खर्चाच्या बजेटला स्थायी समितीने गुरुवारी दुरुस्तीसह मंजुरी दिली. यंदाच्या बजेटचे वैशिष्ट्य म्हणजे कोटीच्या कोटी अवास्तव उड्डाणांना ब्रेक लावला आहे. कोणत्याही मोठ्या प्रकल्पांऐवजी शहराच्या गरजा ओळखून व नागरिकांची प्राथमिकता बघून दोन वर्षांत नवे शहर घडवण्याचा संकल्प आयुक्त मुंढेंनी व्यक्त केला आहे.

कसे असेल अडथळामुक्त शहर?

शहरातील उपनगरांत प्रवास करताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यावर उपाय म्हणून 'अडथळामुक्त शहर' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील उपनगरांत पायी प्रवास करण्यासाठी फूटपाथ, तसेच सायकलने सुरक्षित प्रवासासाठी सायकल ट्रॅकची तयार करण्यात येणार असून, यामुळे नाशिककरांना सुरक्षित प्रवास करणे शक्य होणार आहे. याशिवाय सार्वजनिक वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच पार्किंगचा प्रश्नही सोडविण्यात येणार आहे.

पायाभुत सुविधांवर भर

नागरिकांचे जीवनमान उंचावेल याचा बजेटमध्ये प्राधान्याने विचार केला आहे. रस्ते, पथदीप, शुद्ध पिण्याचे पाणी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सायकल ट्रॅक, स्वच्छता या पायाभूत सुविधा दोन वर्षांत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय आरोग्य, वैद्यकीय, शिक्षण या तीन महत्वाच्या गरजांसह पार्किंग, नागरी सुविधांना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. प्रशासनात ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर वाढवून नागरिकांना अधिकाधिक सुविधा घरबसल्या देण्याचा मानस व्यक्त केला आहे. सर्वांना समान निधीचे तत्त्व बदलून आवश्यक तेथे निधी देऊन समतोल विकासावर भर देण्यात आला आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये टळला गॅसगळतीचा धोका

0
0

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

मुंबईहून सिन्नर एमआयडीसीतील गॅस प्लान्ट येथे गॅस घेऊन जाणारा टँकर नाशिक-पुणे महामार्गावर उलटला. नाशिकरोड येथील बिटको कॉलेजसमोरील स्पीड ब्रेकरवर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने गॅस गळतीसारखा गंभीर प्रकार न घडल्याने शहर जीवघेण्या धोक्यातून बालंबाल वाचले. या अपघातानंतर खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक-पुणे महामार्ग तीन तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार स्पीड ब्रेकर्समुळे, तर कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मते चालकाच्या झोपेमुळे अपघात घडल्याचे सांगण्यात आले.

मुंबई येथून सिन्नर एमआयडीसीतील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस प्लान्टडे गॅस वाहून नेत असलेला टँकर (एनएल ०१, एए ४०४८) शुक्रवारी पहाटे नाशिक-पुणे महामार्गाने सिन्नरच्या दिशेने जात होता. महामार्गावरील बिटको कॉलेजच्या समोरील स्पीड ब्रेकरजवळ पुढे चालणाऱ्या वाहनाचा वेग अचानक कमी झाल्याने टँकरची पुढील वाहनाला धडक बसली. याचवेळी टँकरही स्पीड ब्रेकरवर आदळल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. महामार्गावरील दुभाजक व पथदीपाच्या खांबाला टँकरची धडक बसली. वेगात असल्याने गॅस टँकर महामार्गावरच उलटला. टँकरमधून साडेसतरा टन गॅस वाहून नेला जात होता. या अपघातात गॅस टँकरचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने गॅस गळती झाली नाही. त्यामुळे जीवघेण्या संकटातून शहर बालंबाल वाचले. कंपनीचे अधिकारी एन. के. शुक्ला यांनी उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुरक्षेच्या तत्काळ उपाययोजना

पहाटे गॅस टँकर उलटल्याची माहिती मिळ्ताच शहर वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी, उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते, नाशिकरोडचे एस. वाय. बिजली यांच्यासह पालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब व अधिकारी कर्मचारी तातडीने अपघातस्थळी हजर झाले. उपनगर आणि दत्तमंदिर चौकातून पुढे जाणारी वाहतूक पोलिसांनी तत्काळ थांबवली. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही अपघातस्थळाच्या भागातील वीजपुरवठा खंडित केला. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे वरिष्ठ प्लान्ट मॅनेजर एन. के. शुक्ला हेदेखील अपघातस्थळी आपत्कालीन व्यवस्थेच्या पथकासह आठ वाजेच्या दरम्यान हजर झाले. दोन मोठ्या क्रेनच्या सहाय्याने महामार्गावर उलटलेला गॅस टँकर सुरळीत करण्यात आला.

महामार्ग ठप्प, वाहतूकही वळवली

गॅस टँकर उलटल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला. सिन्नरकडून येणारी वाहतूक दत्तमंदिरलाच रोखण्यात आली. काही वाहतूक बिटको चौकातून जेलरोडमार्गे औरंगाबाद महामार्गाकडे वळवली. शिंदे येथूनही लाखलगाव रिंगरोडमार्गे वाहतूक वळवली. सिन्नरकडून येणारी व मुंबई-गुजरातच्या दिशेने जाणारी वाहने चेहेडी येथून विहितगावमार्गे पाथर्डीफाटा अशी वळवली. मात्र, यातील शेकडो वाहने महामार्गावरच थांबल्याने दत्तमंदिर ते पळसेपर्यंत वाहतूक ठप्प झाली. नाशिककडून सिन्नरच्या दिशेने जाणारी वाहतूक उपनगर व द्वारका येथूनच जेलरोडमार्गे वळविण्यात आली. ऑफिसला जाणारे नोकरदार आणि शाळांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेळेतच महामार्ग बंद ठेवावा लागल्याने नोकरदार आणि शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली.

गॅसगळती झाली असती तर?

महामार्गावरील स्पीडब्रेकर सदोष असल्याने वारंवार जीवघेणे अपघात घडत आहेत. गॅस टँकरच्या अपघाताला बिटको कॉलेजजवळील स्पीडब्रेकरच कारणीभूत ठरल्याचे पोलिसांनी सांगितले. उलटलेल्या टँकरमधून गॅस गळती झाली असती तर मोठा अनर्थ झाला असता. शेजारीच शाळा, बँक, कॉलेज, गुरुद्वारा, दुकाने आणि राहिवाशी परिसर असल्याने मोठा अनर्थ टळला.

जत्रा चौकात दोन टँकरचा अपघात

जत्रा हॉटेल चौकात गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास गॅस टँकर आणि दुसऱ्या एका टँकरची धडक झाली. गॅस टँकरचा टायर फुटला. तथापि, गॅस टँकरचा स्फोट थोडक्यात टळल्याने मोठी जीवितहानी टळली.

ओझरहून नाशिकच्या दिशेने निघालेला गॅस टँकर गुरुवारी सकाळी सव्वासातला जत्रा हॉटेल चौकात आला. तेथील गतिरोधक ओलांडून त्याने चौकात प्रवेश केला. त्याच्याआधी नाशिकहून आलेला दुसरा टँकर जेलरोडकडे वळाला. गॅस टँकरचालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता न आल्याने तो समोरील टँकरला धडकला. गॅस टँकर चालकाच्या केबिनला ओढत दुसरा टँकर पुढे गेला. तीव्र घर्षण झाल्यामुळे गॅस टँकरचे पुढील टायर फुटून मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील नागरिक घाबरले. सुदैवाने गॅस टँकरच्या केबिनचेच नुकसान झाले. मागील गॅसचा टँकर सही सलामत राहिला. त्याचा स्फोट झाला असता तर मोठी हानी झाली असती.

गतिरोधकामुळे हानी टळली

जत्रा हॉटेल चौकात सकाळी दोन्ही बाजूला विद्यार्थी, कर्मचारी बसची वाट पाहत उभे होते. मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालक वाहनांवरून चालले होते. त्याचवेळी ही जोरदार धडक झाली. गॅस टँकरचा स्फोट झाला असता तर परिसरातील वाहने, दुकानांची मोठी हानी झाली असती. तसेच सकाळच्या गर्दीमुळे जीवितहानीही झाली असती. गतिरोधकामुळे गॅस टँकरची गती कमी झाली आणि मोठी धडक टळली.

सिग्नल सुरू करा

जत्रा हाटेल चौकात दोन्ही बाजूला गतिरोधक आहेत. परंतु, सकाळी एसटी, बस व कार त्यांना न जुमानता वेगाने जातात. येथे तीन महिन्यांपूर्वी पिवळा सिग्नल बसविण्यात आला आहे. मात्र, त्याचा काडीचाही उपयोग होत नाही. तो बंदच असतो. चालू असला तरी त्याची दखल वाहनचालक घेत नाहीत. वाहतूक पोलिस चौकात कधीच नसतात. या चौकात अवजड वाहने धावत असतात. या चौकातून औरंगाबाद व पुणे मार्गाला लवकर जाता येते. तसेच बिटको चौकातून जेलरोडमार्गे वाहने जत्रा चौकात येतात. त्यामुळे येथील अपघाताचा धोका वाढला आहे. सिग्नल सुरू करावा, वाहतूक पोलिस नियुक्त करावा आणि वेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदिनी नदीपात्रात २१२ जिवंत काडतुसे!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/म. टा वृत्तसेवा, सातपूर

सातपूर विभागातील वासाळी गावाजवळील नंदिनी नदीच्या पुलाखाली गंजलेल्या स्थितीतील रायफल, तसेच २१२ जिवंत काडतुसे आणि ५६ काडतुसांची आवरणे आढळून आल्याने खळबळ उडाली आहेत. हा प्रकार बुधवारी (दि. २१) रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आला. पोलिसांनी ही काडतुसे जप्त केली असून, सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. साधारणत: सात- आठ वर्षांपूर्वीची ही काडतुसे असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

वासाळी गावाजवळील नंदिनीच्या पात्रात गंजलेली शेकडो काडतुसे आढळल्याची माहिती वासाळीच्या सरपंचांनी सातपूर पोलिस स्टेशनला दिली़ पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल होत, ११३ जिवंत राउंड व ४१ आवरणे संकलित केली. याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी, दहशतवादविरोधी पथक, बीडीडीएस यांना देण्यात आली़ पुन्हा शोधमोहीम घेतली असता नदीपात्रात पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या कॅरिबॅगमध्ये गंजलेली ९९ काडतुसे व १५ आवरणे आढळली. या मोहिमेत पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन गोरे, सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश आखाडे, विशेष शाखा, दहशतवादविरोधी पथक व बॉम्बशोधक-नाशक पथकातील अधिकारी सहभागी झाले होते़

तपासाचे आव्हान

पोलिसांनी जप्त केलेली काडतुसे गंजलेल्या अवस्थेत आहेत. साधारणत: कोणतेही काडतूस तयार करताना संबंधित कंपनी त्यावर माहिती नमूद करते. मात्र, काडतुसे गंजलेली असल्याने तशी माहिती समोर येईल की नाही, अशी शंका व्यक्त होत आहे. शहर पोलिसांनी राज्यभरात वायरलेस यंत्रणेद्वारे माहिती दिली आहे. काडतुसे गहाळ वा चोरी गेल्याबाबत गुन्हा दाखल असल्यास त्याची माहिती देण्याची विनंती पोलिसांनी केली आहे़

आढळलेली काडतुसे

०.३०३ बंदुकीची ८३ काडतुसे

एके-४७ ची ३५ काडतुसे

९ एमएमची ४७ काडतुसे

४१० मस्केटची ४७ जिवंत काडतुसे

९ एमएमच्या १८ पुंगळ्या

०.२२ एमएमच्या २३ पुंगळ्या

०.३०३ च्या १५ पुंगळ्या

कोट

सापडलेली काडतुसे गंजलेली असून, बऱ्याच वर्षांपूर्वी ती नदीपात्रात फेकून देण्यात आली असावी. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू आहे.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडले

0
0

साडेतीन लाख लंपास; लोणखेड्याची घटना

म. टा. वृत्तसेवा, धुळे

लोणखेडा (ता. शहादा) येथे सिद्धिविनायक मंदिरासमोर असलेल्या युनियन बँकेचे एटीएमला गॅस कटरच्या साहाय्याने कापून सुमारे तीन लाख बारा हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ही घटना गुरुवारी (दि. २२) पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी व्यवस्थापक श्रीधर राऊत यांना घटनेची माहिती सकाळी एका व्यक्तीने मोबाइलद्वारे दिली. या एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षकाची नेमणूक केली नसल्याने ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे.

लोणखेडा चौफुलीलगत वर्दळीच्या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिरासमोर युनियन बँकेचे एटीएम आहे. गुरुवारी (दि. २२) पहाटे चोरट्यांनी गॅस कटरचा साहाय्याने या एटीएमचा दरवाजा कापून त्यातून तीन लाख बारा हजार रुपये चोरून नेले. बँक व्यवस्थापकाने दिलेल्या माहितीनुसार एटीएमचे शेवटचे ट्रांझेक्शन बुधवारी (दि. २१) रात्री ९.१८ वाजता झाले असून, सहा हजार रुपये काढण्यात आले. या ठिकाणापासून सुतगिरणी व सातपुडा साखर कारखाना जवळ असल्याने नेहमीच कामगारांची वर्दळ असते. तसेच एटीएम शेजारीच हॉटेल असल्याने तेही रात्री उशीरापर्यत सुरू असते. त्यामुळे ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी एम. बी. पाटील, प्रभारी पोलिस निरीक्षक सुभाष जाधव सहाय्यक पोलिस निरीक्षक बडगुजर, एस. बी. शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहादा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेम प्रकरणातून विद्यार्थिनीची आत्महत्या

0
0

शासकीय वसतीगृहातील प्रकार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शासकीय वसतीगृहात वास्तव्यास असलेल्या २१ वर्षीय विद्यार्थीनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब शुक्रवारी (दि.२३) दुपारी उघडकीस आली. मृत्यूपूर्वी युवतीने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये, असा उल्लेख केला आहे. प्रेमप्रकरणातील नैराश्यातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यामुळे वसतीगृहातील विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

गौरी एकनाथ जाधव (२१, रा़ औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. गौरी नर्सिंगच्या द्वितीय वर्गात शिक्षण घेत होती. नाशिक- पुणे हायवेवरील नासर्डी पुलाजवळ समाजकल्याण विभागाचे विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयाजवळच मुलींचे वसतीगृह आहे. या ठिकाणी गौरी राहत होती. नाशिक शहरातील गणपतराव आडके नर्सिंग महाविद्यालयात द्वितीय वर्गात शिक्षण घेत असलेल्या गौरीने दुपारच्या सुमारास वसतीगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरील आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास इतर विद्यार्थिनींनी खिडकीतून रूममध्ये डोकावून बघितले असता हा प्रकार समोर आला. घटनेची माहिती लागलीच मुंबई नाका पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यात गौरीने लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली. त्यात कुणासही जबाबदार धरू नये, असा उल्लेख करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा प्रकार एकतर्फी प्रेमप्रकरणातून झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेततळे’ योजनेत शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मागेल त्याला शेततळे या योजनेचे उद्दीष्ट गाठण्यात कृषी विभाग अपयशी ठरला आहे. विभागात अवघे ६३.९४ टक्के उद्दिष्ट साध्य झालेले आहे. कृषी विभागाच्या कासवगती कारभारामुळे शेततळ्यांसाठी ऑनलाइन अर्जफाटे करूनही विभागातील हजारो शेतकऱ्यांवर 'मागेल त्याला शेततळे' योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ऑनलाइन अर्ज भरलेल्या ३६ हजार ५२ शेतकऱ्यांपैकी तब्बल २७ हजार ७३९ शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

२०१६-१७ आणी २०१७-१८ या दोन्ही आर्थिक वर्षांत नाशिक विभागासाठी १३ हजार शेततळी करण्याचे लक्ष्य होते. मात्र, त्यापैकी ८ हजार ३१३ इतकीच शेततळी पूर्ण झाली आहेत. याशिवाय ५८० शेततळ्यांची कामे सध्या सुरू आहेत. पूर्ण झालेल्या शेततळ्यांवर आतापर्यंत ३५ कोटी ४८ लाख ३८ हजार रुपयांचे अनुदान खर्च झालेले आहे. आतापर्यंत एकूण लक्ष्यांकाच्या अवघे ६३.९३ टक्के उद्दिष्ट साध्य झालेले आहे. या योजनेतून शेततळ्यांच्या कामासाठी आर्थिक अनुदानाच्या अपेक्षेने विभागातील हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरलेले होते. परंतु, प्रत्यक्षात या योजनेचा लाभ मात्र मोजक्याच शेतकऱ्यांना मिळाला आहे. त्यामुळे हजारो शेतकरी या योजनेच्या लाभापासुन वंचित राहिले आहेत.

योजना फसवी?

'मागेल त्याला शेततळे' ही योजना फसवी असल्याची प्रचिती आता शेतकऱ्यांना येऊ लागली आहे. कृषी विभागाकडे ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या व या योजनेच्या अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचे अर्ज अद्याप कृषी विभागाकडे कार्यारंभ मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. उद्दिष्ट मोठे असूनही कृषी विभागाचे स्थानिक अधिकारी शेतकऱ्यांना वेठीस धरीत असल्याने शेतकऱ्यांची फसगत होत आहे. या योजनेच्या लाभासाठी हजारो शेतकऱ्यांना कृषी विभागाचे सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे या योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या विभागातील हजारो शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

विभागातील योजनेची प्रगती

जिल्हा- उद्दिष्ट - प्राप्त अर्ज- पूर्ण झालेली शेततळी - खर्च झालेले अनुदान (रुपये लाखांत) - कामे सुरू

नाशिक- ९,०००- २६,६२३- ५,४९४- २,४६०.०६- ३४९

धुळे- ५००- ६३१- ७७- २८.९७- २७

नंदुरबार - १५००- २७६०- ९९०- २५९.३८- १४५

जळगाव - २००० -६०३८- १७५२- ७९९.९७- ५९

एकूण- १३,०००- ३६,०५२- ८,३१३- ३,५४८.३८- ५८०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्त विद्यापीठात आता ‘ऑन डिमांड एक्झाम’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील लष्कर, पोलिस यासह दहा विशेष अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षा देता येणार असून 'ऑन डिमांड एक्झाम' पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा पॅटर्न लागू होणार असून, त्यामुळे नोकरीत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येणार आहे. मुक्त विद्यापीठाने परीक्षा पद्धतीतच बदल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठातर्फे 'ऑन डिमांड एक्झाम' ही नवीन परीक्षा पद्धती विकसित करण्यात आली असून, पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याद्वारे परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यात सुरुवातीला विशेष अभ्यासक्रमांसाठीच या पद्धतीद्वारे परीक्षा घेतल्या जातील. त्यात आर्मी, पोलिस यांसह विद्यापीठातर्फे चालविल्या जाणाऱ्या विशेष अभ्यासक्रमांचा समावेश असेल.

काय आहे 'ऑन डिमांड एक्झाम'

विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन स्लॉट बुक करावी लागेल. त्यात परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक असेल. त्यानुसार विद्यार्थ्यांना आपल्या सोयीनुसार परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्र निवडावे लागेल. त्यानंतर विद्यापीठातर्फे परीक्षांचे नियोजन केले जाईल. त्यानुसार संबंधित परीक्षा केंद्रांवर विद्यापीठातर्फे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका पुरविल्या जातील. त्यानुसार परीक्षा घेतली जाणार आहे.

२५० केंद्रे सुरू होणार

प्रारंभी विशेष अभ्यासक्रमांसाठीच या पद्धतीद्वारे परीक्षा घेतल्या जातील. त्यात आर्मी, पोलिस यांसह विद्यापीठातर्फे चालविल्या जाणाऱ्या विशेष अभ्यासक्रमांचा समावेश असेल. मुक्त विद्यापीठातर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून २०० ते २५० नवीन अभ्यासक्रम केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. निकष पूर्ण करणाऱ्या केंद्रांना मान्यता दिली जाणार असून, त्याची पाहणीही लवकरच केली जाईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी दिली. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाशी करार करून अभ्यासक्रमांबाबत आदानप्रदान केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खबरदार, सार्वजनिक ठिकाणी झुरका माराल तर!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक ठिकाणांवर सिगारेटचा झुरका मारणाऱ्यांवर आता पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. संबंध हेल्थ फाउंडेशन आणि शहर पोलिसांनी सलग दुसऱ्या धुम्रपान करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. राज्याच्या पोलिस महासंचालकांनी याप्रकरणी आदेश दिले असून, यापुढे सतत कारवाई होणार असल्याने सार्वजनिक जागी सिगारेट फुंकणाऱ्यांची गय होणार नाही.

सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा परिसरात सिगारेट फुंकणाऱ्यावर 'सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा अधिनियमश, २००३' (कोटपा) अंतर्गत ही कारवाई केली जात आहे. गुरुवारी (दि. २२) नाशिक शहर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा सातपूर परिसरात संबंध हेल्थ फाउंडेशनचे प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर श्रीकांत जाधव आणि सातपूर पोलिसांनी धुम्रपान करणाऱ्यांचा शोध घेतला. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा अधिनियम, २००३ कायद्याचे खास प्रशिक्षण शहर पोलिस आयुक्तालयाने संबंध हेल्थ फाऊंडेशनच्या माध्यमातून नाशिक पोलिसांना देण्यात आले आहे. त्यानंतर गुरुवारपासून या कारवाईची प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली. सरकारवाडा पोलिसांनी गुरूवारी के. टी. एच. एम.कॉलेज, पंडित कॉलनी, कुलकर्णी गार्डन, कॅनडा कॉलनी, तिबेटियन मार्केट, कॉलेजरोड परिसर पिंजून काढला. काही तासांतच पोलिसांनी १३ जणांवर कारवाई केली. शुक्रवारी दिवसभरात १० पेक्षा अधिक व्यक्तींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती जाधव यांनी दिली. शाळा परिसरात सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. तरीदेखील नाशिक शहरातील एस. टी. डेपो, बस स्थानके, शाळा- महाविद्यालये, बाजार, तीर्थस्थळ परिसरात खुलेआम सिगारेट ओढणे, सुट्या सिगारेटची विक्री करणे, अवैध गुटखाविक्री होते. त्यावर आळा घालण्यासाठी 'कोटपा'अंतर्गत पोलिस स्टेशननिहाय कारवाई मोहीम हाती घेण्यात येणार आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर जिल्ह्यांमध्येदेखील या मोहिमेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी सिगारेट सेवन करण्यावर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

मुलांच्या व्यसनांचे प्रमाण वाढले

जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षण, २०१७ नुसार महाराष्ट्रात गेल्या सात वर्षांच्या तुलनेत यंदा तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरात घट दिसून आली आहे. मात्र, १५ ते १७ वयोगटांतील तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराची टक्केवारीत २०१०च्या तुलनेत दोन टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर गेली आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरामुळे ४५ हजार वापरकर्ते अकाली मृत पावतात. देशात दररोज ५५ हजार तंबाखू सेवन करणारी मुले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात दररोज ५२९ मुले पहिल्यांदा तंबाखूचे सेवन करतात.

शहरात २३ जणांवर कारवाई

प्रशिक्षणानंतर गुरुवारपासून या कारवाईची प्रत्यक्ष अंमलबजावणीला नाशिक पोलिसांनी सुरुवात केली. सरकारवाडा पोलिसांनी १३ जणांवर ही कारवाई करीत दोन हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. तर शुक्रवारी सातपूर पोलिसांनी कोटपाअंतर्गत कारवाई करीत संध्याकाळपर्यंत १० जणांवर कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images