Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दिल्लीतील जनआक्रोश रॅलीस नाशिकमधून कार्यकर्ते जाणार

0
0

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या २९ एप्रिल रोजीच्या दिल्ली येथील जनआक्रोश रॅलीस नाशिक जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी दिली.

केंद्रात भाजप सरकारचे दलित विरोधी धोरण, महिलांवर होणारे अत्याचार व त्याला मिळणारा राजाश्रय, सामाजिक असंतोष, अल्पसंख्यांकाच्या मनात निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना, पेट्रोल व डिझेलच्या भावात सातत्याने होणारी वाढ, वेगाने ढासळणारी अर्थव्यवस्था, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, मागील चार वर्षात रोजगार निर्मितीत आलेले अपयश व शेतकऱ्यांच्या आत्महत्या यामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये प्रचंड असंतोष व आक्रोश निर्माण झाला आहे. या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली रविवार २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता रामलीला मैदान, नवी दिल्ली येथे जनआक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या जनआक्रोश रॅलीसाठी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व प्रमुख नेते, आजी, माजी आमदार व खासदार, प्रदेश व अखिल भारतीय प्रतिनिधी, ब्लॉक अध्यक्ष, युवक काँग्रेस, फ्रन्टल प्रमुख व सेल अध्यक्ष, सेवादल, एनएसयुआय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांचे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते यांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणांचे अपघात बनली चिंतेची बाब

0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

शहरात तरुणांच्या अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने पालकांसह सर्वांसाठीच ही चिंतेची बाब ठरली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये तरुणांच्या मृत्यू होत आहेत.

दिंडोरी रोडवरील म्हसरूळ ययेथील राणा गार्डन हॉटेलच्या बाजूला झालेल्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा लागला. दोन दिवसांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्गावर दोन मित्र चारचाकी वाहनाचे जात असताना दुभाजकला धडकले. त्यात एकाच जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्र्यंबक रोडवरील पिंपळगाव बहुलाच्या अलीकडे सातपूरला येत असताना दुचाकी बाभळीच्या वृक्षावर धडक दिल्याने घरातील एकुलता एक तरुणाला जीव गमवावा लागला. सातपूर एमआयडीसीतील महिंद्रा सर्कलच्या पुढे दुभाजकाला दुचाकी धडकल्याने तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घरातील सदस्यांसह पोलिस यंत्रणेकडून दुचाकी व चारचाकी चालविणाऱ्या तरुणांचे प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

मुख्य रस्त्यांवर गतिरोधक टाकण्याची सातत्याने मागणी नगरसेवक व स्थानिक नागरिकांकडून केली जाते. रस्त्यांवरून वाहने चालवितांना अल्पवयीन मुलांचाही सहभाग अधिक आहे. रस्त्यांचे नियम माहिती नसल्याने अपघातांवर नियंत्रण कसे येईल, याबाबत पोलिस यंत्रणेनेच तोडगा काढण्याची गरज आहे. पालकांनीही गरजेनुसार आपल्या पाल्यांना सुविधा दिल्या. अजाणत्या वयात दुचाकी अथवा चारचाकी वाहने मुलांना दिल्या जात असल्याने अपघातांसारख्या प्रसंगांना पालकांना सामोरे जावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम साहित्यांनी ड्रेनेजलाइन चोकअप

0
0

वाळू, दगड-गोटे काढण्याचे कामगारांपुढे आव्हान

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहर परिसरात गल्लीबोळात सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी लागणारे साहित्य रस्त्यांवरच टाकले जाते. परंतु, याचा अनेकांना त्रास सहन करावा लागतो. बांधकामांच्या याच वाळू, दगड-गोट्यांनी ड्रेनेजलाइन चोकअप होत आहेत. सातपूरला ड्रेनेजमधील हे साहित्य काढण्याचे मोठे दिव्य स्वच्छता विभागाच्या कामगारांना पार पाडावे लागत आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे घरांचे बांधकाम वाढले आहे. घरांचे वाढीव बांधकाम करताना लागणारे मटेरियल ठेवण्यासाठी पुरेशी जागाच उपलब्ध नसते. त्यामुळे असे साहित्य रस्त्यालगत ठेवले जाते. यामध्ये वाळू, दगड, विटा यांचाही समावेश असतो. बांधकामाचा पहिला टप्पा पार पडल्यावर सिमेंटच्या भींतीना पाणी मारतांना रस्त्यांवरून पाणी वाहत जाते. ते थेट ड्रेनेजच्या पाइपलाइनमध्ये वाहून जाते. महापालिकेने टाकलेल्या पावसाळी पाइपलाइनमध्ये त्यांचा शिरकाव होतो. याचा त्रास ड्रेनेज विभागाला सहन करण्याची वेळ येत आहे. बांधकामाचे साहित्य थेट ड्रेनेज लाइनमध्ये जात असल्याने वारंवार चोकअपची समस्या सातपूर भागात उद्भवत आहे. थेट ड्रेनेज व पावसाळी पाइपलाइनमध्ये उतरून काम करण्याची वेळ कामगारांवर येऊन ठेपली आहे.

बांधकाम करतांना लागेल तेवढेच साहित्य संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर टाकावे. अतिरिक्त साहित्य ठेवल्यास सहाजिकच बांधकामास पाणी मारताना वाळू अथवा इतर साहित्य ड्रेनेज अथवा पावसाळी पाइपलाइनमध्ये जाते. याबाबत नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे.

- संदीप पवार, बांधकाम व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणे हटविण्याचा धडाका सुरूच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेने शहरात अतिक्रमण मोहीम सुरू केली असून, बुधवारी शहराचा मुख्य भाग असलेल्या रविवार कारंजा भागात मोहीम राबविण्यात आली.

रविवार कारंजा परिसरात येथील विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. येथील व्यावसायिकांनी दुकानातील माल बाहेर माल लावल्याने रविवार कारंजा, बोहरपट्टी, मेनरोड परिसरात नागरिकांना रस्त्याने पायी चालणे मुश्किल झाले होते. याबाबत अनेक नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. काही दिवसांपूर्वी बोहरपट्टी परिसरात अतिक्रमण काढले होते. मात्र, येथील विक्रेत्यांनी पथकाची पाठ वळताच पुन्हा बस्तान बसवले होते. महापालिकेने बुधवारी मोहीम आयोजित केली, त्यावेळी अनेक फळविक्रेत्यांचा माल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे दुकानाबाहेर लावलेले सामान जप्त करण्यात आले. यावेळी काही विक्रेत्यांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुरूच ठेवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

(फोटो आहे)

0
0

थोडक्यात

पंचवटीत जनजागृती रॅली

पंचवटी : पंचवटी  महापालिकेच्या आरोग्य विभाग व मलेरिया विभागातील यांच्यातर्फे बुधवारी जागतिक हिवताप दिनानिमित्त पंचवटी परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली. पंचवटी विभागीय कार्यालयात नागरिकांसाठी एका प्रदर्शनीद्वारे जनजागृती करण्यात आली. ही रॅली मालेगाव स्टँड, सरदार चौक, काळाराम मंदिर, ढिकले नगर, कृष्ण नगर, काट्या मारुती पोलिस चौकी, निमाणी बस स्टँड, दिंडोरी नाका मार्गे विभागीय कार्यालयात या रॅलीचा समारोप करण्यात आला. डॉ. राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानूर घाटावर अस्वच्छता

0
0

दारणा पुलावरील

पथदीप अद्याप बंदच

जेलरोड : नाशिकरोड येथील दारणा नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. तथापी, या पुलावरील पथदीप अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे अपघाताची भीती आहे. या पुलावर पथदीप उभारण्यात आलेले आहेत. परंतु, अद्याप वीज पुरवठा झालेला नसल्याने ते सुरु झालेले नाहीत. शिंदे गावाला जाताना हा पूल संपतो तेथूनच जुन्या पुलावरील वाहतूक वळण घेते. येथे पथदीप बंद असल्याने वाहनांची टक्कर होऊ शकते. त्यामुळे पथदीप लवकर सुरू करणे गरजेचे आहे.

मानूर घाटावर अस्वच्छता

पंचवटी : सिहस्थ कुंभमेळ्याच्या घाटांच्या कामात मानूर येथे बांधण्यात आलेल्या घाटाची स्वच्छता होत नाही. या घाटावर नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा कचरा, माती, दगड साचलेले आहेत. झाडांचा पालापाचोळा, काचांचे तुकडे पडून आहेत. घाट बांधण्याचा घाट घातला गेला, मात्र, स्वछतेची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी यांच्यासाठी आलेल्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. 

खड्डा दुरुस्ती करावी

सातपूर : कामगारवस्ती असलेल्या सातपूर कॉलनीतील आनंद छायाच्या वळणावर अनेक दिवसांपासून खड्डा पडला आहे. खड्डा वाचवताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी महापालिकेने रस्त्यात पडलेला खड्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

मैदानावर सापाचे पिलू

सातपूर : एमआयडीसी परिसरातील एकमेव असलेल्या मैदानावर जॉगिंग करण्यासाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी असते. मात्र, तेथे सापाचे पिलू आढळल्याने खेळाडूंची धावपळ उडाली. यानंतर काही जणांनी सोशल मीडियावरून संबधित सापाचा फोटो सर्पमित्राला पाठवित विचारणा केली. सर्पमित्राने संबंधित पिलू बिनविषारी सापाचे असल्याचे सांगत त्याला काही करू नका, असा सल्ला दिला. त्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला. त्यांनी सापाच्या पिलाला जाण्यासाठी मार्ग करून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीवरून गोमांस वाहतूक; दोघे ताब्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बंदी असतानाही गोमांसाची दुचाकीवरून वाहतूक करणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेल भागात ही कारवाई करण्यात आली.

इब्राहिम रज्जाक शेख व अशपाक इब्राहिम शेख (रा. दोघे नानावली, भद्रकाली) अशी संशयितांची नावे आहेत. युनिट एकचे सहाय्यक निरीक्षक दीपक गिरमे व जमादार चंद्रकांत पळशिकर यांनी मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई केली. महामार्गावरून दोन तरुण गोवंश मासांची वाहतूक करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी (दि. २४) सकाळी युनिट १ च्या पथकाने ठिकठिकाणी सापळा लावला. जत्रा हॉटेल समोरून भरधाव जाणाऱ्या लाल रंगाच्या अ‍ॅक्सेस (एमएच १५ एफएस ६६८२) या दुचाकीस्वारास अडवून पोलिसांनी तपासणी केली असता गोमांस पोलिसांच्या हाती लागले. संशयितांच्या ताब्यातील खाकी रंगाच्या बारदानात हे गोमांस मिळून आले. पळशीकर यांच्या तक्रारीवरून आडगाव पोलिस स्टेशनमध्ये प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. युनिट १ चे निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जाकीर शेख, हवालदार वसंत पांडव, रवींद्र बागूल, अनिल दिघोळे, बाळासाहेब दोंदे, आसिफ तांबोळी, मोहन देशमुख, शांताराम महाले, दिलीप मोंढे आदींनी कारवाई केली. अधिक तपास हवालदार वाघ करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण जीवन जगण्यासाठी नव्हे तर चांगल्या चारित्र्यासाठी घ्यावे - प्रा. गिरासे

0
0

शिक्षणातून घडते चारित्र्य

प्रा. प्रवीणसिंग गिरासे यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शिक्षण हे जीवन जगण्यासाठी नव्हे तर चांगले चारित्र्य घडविण्यासाठी घेतले पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या जीवनशैलीतून समाजात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांच्या क्रांतीकारी विचारांनीच समाजाला चांगले ज्ञान व प्रेरणा मिळाली असल्याचे प्रतिपादन प्रा. प्रवीणसिंग गिरासे यांनी केले. 

माय मराठी मोफत ग्रंथघर, सूर्योदय परिवार आणि नवीन नाशिक जेष्ठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमालाचे  स्वामी विवेकानंदाचे विचार या विषयावरील तिसरे पुष्प गुंफताना गिरासे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद राजगुरे आणि कवी रवींद्र मालुंजकर उपस्थित होते. यावेळी प्रा. गिरासे यांनी सांगितले की, राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या चारित्र्यवान तरुणांची देशाला गरज असून स्वामी विवेकानंदांचे विचारच देशाला विकासच्या वाटेवर आणू शकतात. राष्ट्रमाता जिजाऊनी छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक करत रयतेला स्वराज्य निर्माण करून दिले. स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून समाजातील सर्वांनाच विरोध पत्करून सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुले यांच्या चळवळीत स्त्रिया आणि दलितांना  शिक्षण देण्याचे काम केले. स्वामी विवेकानंदानी पारतंत्र्यात असलेल्या भारतीय अज्ञान आणि अत्याचार पीडित समाजात आत्मविश्वास निर्माण करून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी समाजात आत्मविश्वास आपल्या क्रांतिकारक विचारांनी प्रेरणा दिली.

यावेळी सजगुरे यांनी सांगितले की, नाशिक शहरात अशा वसंत व्याख्यानमालांची खऱ्या अर्थाने गरज असून धार्मिकतेकडून यंत्रभूमीकडे जाणाऱ्या या नगरीला विचारांची ओळखही देणे आवश्यक आहे. या व्याख्यानमालांमुळेच पुढील पिढीला खऱ्या अर्थाने विचारांची देवणाघेवाण करण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी कवी रवींद्र मालुंजकर यांनी कविता सादर केल्या. 

सूत्रसंचालन किरण सोनार यांनी केले. उपस्थितांचा परिचय प्रकाश काळे यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार देवराम सैंदाणे यांनी मानले. यावेळी जनार्धन माळी, अनिल देवरे, रामदास शिंपी, नंदकुमार दुसानीस, अरविंद वडिले, कृष्णराव बेधडे, विनय  गुंजाळ, रमेश सोनावणे, श्रीकांत सोनार, शालिग्राम चौधरी, विजय गोसावी आणि मधुकर पाटील यांचेसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. 

------

आजचे व्याख्यान - सुजोग थेरपी निसर्गउपचार

वक्ते - डॉ . श्यामकांत दुसाने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगाव @ ४३

0
0

नाशिक : उष्णतेची लाट एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काहीशी ओसरली असताना आता पुन्हा एकदा राज्यातील बहुतांशी शहरे तापली आहेत. मालेगावचे तापमान ४३ अंशांवर गेले असून, आतापर्यंतचे हे उच्चांकी तापमान आहे. नाशिक शहराचे तापमानही ३८.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. या वाढलेल्या तापमानामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून, दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पसरत आहे. रविवारपासून मालेगावचा तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे पुढे सरकत आहे. बुधवारी तापमानाचा पारा ४३ अंशांवर स्थिरावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंध भक्तीचे प्रदर्शन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या आसारामला जोधपूरच्या विशेष न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्याने भक्तांनी मोठा आक्रोश केला. न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर गंगापूररोड येथील आश्रमामध्ये गेल्या आठवड्यापासून आसाराम भक्त भजन आणि जप करीत होते. बुधवारी न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही बापू निर्दोष असून, वरचे न्यायालय त्यांना मुक्त करेल असा विश्वास भक्तांनी व्यक्त केला. बुधवारी दिवसभर हा आश्रम परिसर गजबजला होता.

नाशिकमध्ये आसारामभक्तांची संख्या मोठी आहे. आसाराम सातत्याने नाशिकमध्ये येत असे. त्याचे मोठे प्रवचन कार्यक्रम नाशकात होत असत. गंगापूररोडवरील सावरकरनगर परिसरात त्याचा मोठा आश्रम आहे. याठिकाणी आसाराम साधक येऊन साधना करतात. गेल्या काही वर्षांपासून आसाराम जेलमध्ये असतानाही त्याच्या भक्तांची श्रद्धा ढळली नाही. त्यामुळेच बुधवारी जोधपूर न्यायालयात सुनावणी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आसाराम भक्तांनी गेल्या आठवड्यापासून आश्रमामध्ये भजन आणि जप सुरू केला होता. न्यायालय त्यांची निर्दोष म्हणून सुटका करेल, असा विश्वास त्यांना होता. बुधवारी सकाळपासूनच आश्रमामध्ये अतिशय धीरगंभीर असे वातावरण होते. तेथे महिला साधकांची संख्या मोठी होती. या महिला साधक आसाराम यांच्यासाठी आक्रोश करीत होत्या. तसेच भगवंताकडे आराधना करीत होत्या. आसाराम हे निर्दोष आहेत, असे वारंवार हे साधक सर्वांना सांगत होते. सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही, अशा प्रतिक्रिया साधक व्यक्त करीत होते.

हिंदू जनजागृती समितीचा पाठिंबा

आसाराम हे निर्दोष असल्याचे हिंदू जनजागृती समितीने म्हटले आहे. आसाराम यांनी गेले काही दशके समाजहितासाठी चांगले कार्य केलेले आहे. मग ते वनवासी क्षेत्रातील कार्य असो वा शिक्षणक्षेत्रातील. अन्य पंथांत गेलेल्या हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे. लोकांना धर्ममार्गावर आणण्याचे कार्यही त्यांनी केले आहे. आजचा जोधपूर न्यायालयाचा निकाल हा मोठा धक्काच आहे. तरीही बापूंच्या भक्तांनी संयम ठेवून समंजसपणा दाखवला आहे. न्यायालयाचा हा निर्णय दुर्दैवी आहे. अर्थात त्यामुळे पुढच्या न्यायालयात न्याय मागण्याचा त्यांचा अधिकार काही संपलेला नाही. भारताच्या इतिहासात असे अनेक खटले आहेत की, ज्या प्रकरणांत खालच्या न्यायालयाचा निकाल वरिष्ठ न्यायालयाने पालटला आहे. त्यामुळे शेवटपर्यंत न्यायिक आणि संविधानिक मार्गाने लढणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यातर्गंत आसाराम बापू यांच्यासाठी केलेल्या प्रयत्नांना सहकार्य करू, असे हिंदू जनजागृती समितीने प्रसिद्धी पत्रकान्वये स्पष्ट केले आहे.

--

बस स्टॉपचे नाव बदला

गंगापूररोड परिसरातील आसाराम आश्रम हा बसचा स्टॉप आहे. त्यामुळेच एसटी महामंडळाची नाशिक शहर बससेवा तेथे आहे. निमाणी ते आसाराम आश्रम अशी सेवा महामंडळाकडून दिली जाते. आता न्यायालयाने आसारामला दोषी ठरवून शिक्षा ठोठवल्याने एसटी महामंडळाने बसवरील आश्रमाच्या नावाची पाटी काढून टाकावी, अशी मागणी काही नाशिककरांकडून होत आहे. त्यासंबंधीचे निवेदन महापौर, मनपा आयुक्त आणि एसटी महामंडळाला देण्यात आले आहे. तसेच, यापुढे आसाराम आश्रमाऐवजी सावरकर नगर असा बोर्ड लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

बापू निर्दोष आहेत. वरचे न्यायालय त्यांना न्याय देईल. आम्हाला परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे.

- रामभाई, साधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवयवदानाची चळवळ रुजवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'अवयवदानाविषयी चर्चा खूप होत असली तरी प्रत्यक्षात काम त्या तुलनेत कमी होते. सामान्य माणसांनी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असून, नागरिक म्हणून आपली जबाबदारी जाणून घेतली पाहिजे. अवयवदानाची गरज ओळखत ही चळवळ म्हणून रुजवली गेली पाहिजे,' असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांनी केले.

नाशिकमध्ये पुण्यातील रि-बर्थ या संस्थेच्या शाखेचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. कुसुमाग्रज स्मारक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. आयुक्त सिंघल म्हणाले, 'समाजात डोळे, किडनी अशा काही अवयवांच्या दानाविषयीच जनजागृती झाली आहे. इतर अवयवांबाबतही जागरुकता व्हावी, यासाठी आपल्याला कार्य करायचे आहे. अवयवदानाबाबत आपल्या मनात खूप संभ्रम असतो. परंपरा, रुढी यांचे कारण त्यामागे आहे. परंतु, आजच्या काळानुसार विचारांमध्ये बदल करत अवयवदानासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी सोशल मिडियासारख्या व्यासपीठांचादेखील लाभ आपल्याला करुन घेता येईल.'

गणेश बाकले यांनी अवयवदानाविषयी प्रेझेंटेशन सादर केले. रि-बर्थ संस्थेची माहिती, अवयवदानासाठी होत असलेले कार्य, ग्रीन कॉरिडॉर आदी बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. डॉ. भाऊसाहेब मोरे यांनी अवयवदान ही चळवळ होण्याची गरज व्यक्त करत घराघरात या विषयावर बोलले गेले पाहिजे, असे मत मांडले.

सूत्रसंचालन सुनंदा जरांडे यांनी केले. यावेळी गुरु गोबिंदसिंग संस्थेचे सीईओ परमिंदर सिंग, अमरजित सिंग, संजय पठाडे, सुनील देशपांडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्कशीट न मिळाल्याने गमावली नोकरीची संधी

0
0

विद्यार्थ्यांचा विद्यापीठावर आरोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नोकरीसाठी दिलेली मुलाखत यशस्वीपणे पार पडल्यानंतर केवळ विद्यापीठाने वेळेत मार्कशीटच न दिल्याने नोकरीची संधी गमवावी लागल्याचा आरोप संबंधित विद्यार्थ्याने नाशिकमधील विद्यापीठावर केला आहे. विद्यार्थ्याला मार्कशीट उपलब्ध करून द्यायला विद्यापीठ तयार असतानाही विद्यार्थीच पुन्हा न फिरकल्याने त्यात विद्यापीठाचा दोष नसल्याची भूमिका विद्यापीठ प्रशासनाने मांडली आहे.

त्र्यंबकेश्वर रोडवरील संदीप युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी श्रेयांश सराफ याने नाशिकमधील खासगी कंपनीतील रिक्त असलेल्या व्यवस्थापक पदासाठी मुलाखत दिली होती. मुलाखतीच्या वेळी कंपनीने विद्यार्थ्याकडे गुणपत्रिकेची मागणी केली. परंतु, विद्यापीठाकडूनच गुणपत्रिका न मिळाल्याने श्रेयांश याने संदीप युनिव्हर्सिटीकडे गुणपत्रकाची मागणी केली. पण युनिर्व्हसिटीने गुणपत्रिका न दिल्याने होतकरू विद्यार्थी नोकरीपासून वंचित राहिला असल्याच्या तक्रारीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष आकाश कदम यांनी उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या सहसंचालकांना दिले.

तो विद्यार्थी आलाच नाही

याबाबत संदीप युनिर्व्हसिटीच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता याबाबत विद्यार्थ्याची तक्रार चुकीची असल्याने व्यवस्थापनाने म्हटले आहे. संबंधित विद्यार्थ्याने युनिर्व्हसिटीकडे २३ एप्रिल रोजी अर्ज केला होता. अर्ज मिळाल्यानंतर पुढील २४ तासात आम्ही गुणपत्रिका उपलब्ध करून देतो. त्यानुसार त्या विद्यार्थ्यांला सूचना देण्यात आली. पण अर्ज दाखल केल्यापासून २४ तास उलटून गेले तरीही संबंधित विद्यार्थी गुणपत्रिका घेण्यास पुन्हा आलाच नसल्याने यामध्ये युनिर्व्हसिटीचा दोष नसल्याचे व्यवस्थापनातील वरिष्ठ सूत्रांनी म्हटले आहे. याशिवाय विद्यार्थ्याने केलेल्या इतर आरोपांमध्येही तथ्य नसून सर्व अभ्यासक्रमांसाठी पूरक इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध असल्याने व्यवस्थापनाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रासायनिक घटकांचा वापर कमी करा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काळाशी सुसंगत शेती करण्याच्या स्पर्धेत मानवी आरोग्यास घातक अशा रसायनांचा मारा शेतीवर आज होतो आहे. मात्र, सेंद्रीय शेतीचे दीर्घकालीन फायदे ओळखून सेंद्रीय शेतीला प्राधान्य मिळावे आणि शेतकऱ्यांनी शेतीत रासायनिक घटकांचा वापर कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ सेवा मार्गाचे मार्गदर्शक अण्णासाहेब मोरे यांनी केले.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू झालेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर चंद्रकांत मोरे, आमदार सीमा हिरे, सेंद्रीय शेती अभ्यासक सुभाष शर्मा, आकाश चौरसिया, द्राक्ष शेती अभ्यासक वासुदेव काठे, जिल्हा परिषद सभापती मनीषा पवार, व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, 'आत्मा'चे प्रकल्प संचालक अशोक कांबळे, पर्यटन महामंडळाचे आशुतोष राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अण्णासाहेब मोरे म्हणाले, की प्राचीन काळापासून ऋषी-मुनींनी शेतीच्या तंत्राबाबत अतिशय सखोल अभ्यास केला. त्यातून मानवी जीवनासाठी अतिशय उपकारक संशोधने त्यांनी मांडली. कृषी या शब्दाची उत्पत्ती ऋषीशी समान वाटते. या दोन शब्दांचे एकमेकांशी प्राचीन काळापासूनचे नाते आहे. या देशात ऋषींच्या कालखंडानंतर प्राचीन काळापासून असंख्य आक्रमणे झाली. अलिकडील काळात इंग्रजांनीही संस्कृती आणि देशाला लक्ष्य केले होते. आजमितीस कॉन्व्हेंट संस्कृतीस आवश्यकतेपेक्षा जास्त प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे पारंपरिक संस्कृती धोक्यात येणार नाही ना, याचा विचार व्हायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेती ही व्यवस्था या देशाच्या समृद्धीचा कणा आहे. शेतकरी वर्गाच्या हाती हा देशाचा कणा असल्याने शेतकऱ्यांनी स्वत:स कमी लेखू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

कृषी दिंडीचे आकर्षण

कृषी प्रदर्शनाच्या मुख्य उद्घाटन सोहळ्याअगोदर रामकुंड ते डोंगरे वसतिगृह मैदान या मार्गावर कृषी दिंडी झाली. सकाळी श्री स्वामी समर्थांचे प्रतिमापूजन आणि कृषी ग्रंथांच्या पूजनाने दिंडीस प्रारंभा झाला. शेतकरी नृत्य, कृषी परंपरांचे दर्शन आणि कृषी संस्कृतीतील प्रतिकांच्या मांडणीमुळे दिंडीला शोभा आली. नागरिकांनीही रांगोळी रेखाटन आणि पुष्प वर्षावाने दिंडीचे स्वागत केले. प्रमुख सोहळ्याचे उद्घाटन कृषी दाम्पत्य संपत आणि शोभा तिडके यांच्या हस्ते झाले.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार प्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नांदूर नाका परिसरात अल्पवयीन मुलीला शौचालयात नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधिश सुचित्रा घोडके यांनी १० वर्षे सक्तमजुरी व २२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ही घटना १४ सप्टेंबर २०१६ रोजी घडली होती. सचिन हिरामण पाटील (रा. औरंगाबादरोड, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी आडगाव पोलिसात बलात्कार व पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल होता. औरंगाबाद रोडवरील नांदूर नाका येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पीडितेच्या घरी कोणी नसल्याचे पाहून आरोपी सचिन पाटील याने अल्पवयीन मुलीला शौचालयात नेले. तिच्यावर अत्याचार केला. घरी कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक धनश्री पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास केला तर सरकारी पक्षातर्फे व्ही. डी. जाधव यांनी कामकाज पाहिले. बलात्कारप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांचा साधा कारावास, पोस्को अंतर्गत १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्याचा साधा कारावास यासह धमकावणे व खोटे बोलून पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रत्येकी तीन वर्षे व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलेनगर परिसरात बालबिरादरी प्रकल्प

0
0

चर्चा तर होणारच!

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी 

 शिक्षणापासून वंचित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या वसाहतीतील मुलांना चांगले संस्कार मिळावे, यासाठी आजवर अनेक उपाय राबविण्यात येत आहेत. याच उद्देशाने नाशिक पोलिस आयुक्त व एनजीओ फोरम यांनी एकत्रितरित्या शाळाबाह्य मुलांसाठी बालबिरादरी या अभिनव प्रकल्पाची सुरुवात फुलेनगर येथे केली आहे. या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यशाळेस मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

पेठरोडवरील फुलेनगर परिसरातील समाज मंदिरात कार्यशाळा घेण्यात येत आहे. या कार्यशाळेत विविध विषयांवर मार्गदर्शन दिले जात आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून 'बाल बिरादरी' उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शाळाबाह्य मुलांना मूळ शैक्षणाच्या प्रवाहात सामील करणे व वाईट वृत्तीपासून परावृत्त करणे हा मुख्य उद्देश या उपक्रमाचा आहे. या कार्यशाळेत मुला-मुलींसाठी गायन, नृत्य, क्राफ्ट, हस्तकला, व्यक्तिमत्व विकास, कराटे, खेळ, वैद्यकीय व आरोग्य विषयक मार्गदर्शन आदींचा समावेश करण्यात आला आहे. 

कार्यशाळेतील सहभागी मुलांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्तरावर मंच मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे एनजीओ फोरमचे अध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेट्टीवर यांनी सांगितले. शोभा पवार, राजू शिरसाठ, मुकुंद गांगुर्डे, आसावरी देशपांडे, प्रतिक शुक्ल, अमित पंडित आदींनी आयोजन केले आहे. 

शेकडो मुलांचा सहभाग

कार्यशाळेत १२ ते १८ वयोगटातील शेकडो मुलामुलींनी सहभाग नोंदविला आहे. कार्यशाळेत पोलिस आयुक्त डॉ. सिंघल, पोलिस कल्याण विभागाच्या महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता निकम, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. जविद्रसिंग चिक्की, सोमनाथ राठी, शुभांगी बैरागी, सचिन पवार आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नदी संरक्षण धोरणाची व्हावी परिणामकारक अंमलबजावणी

0
0

राज्यातील नद्यांमधील प्रदूषण लक्षात घेता न्यायालयाने नद्यांच्या संरक्षणासाठी काय केले, असा प्रश्न सरकारला विचारला आहे. नद्यांच्या दुरवस्थेस राज्य सरकारचे धोरण जबाबदार असून, नद्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी नागरिकांनीदेखील पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे. विविध शहरांतील नद्यांच्या पात्रात येणारा कचरा व घाणीचे व्यवस्थापन होणेदेखील गरजेचे असून, नदी संरक्षणासाठीचे नवे धोरण लवकरात लवकर आणि परिणामकारकतेने लागू करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात सरकारी यंत्रणांची स्थानिक पातळीवरील उदासीनता दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मतदेखील नागरिकांनी व्यक्त केले आहे.

सरकारला येईल जाग!

राज्यातील ४९ नद्यांची स्थिती प्रदूषणामुळे वाईट असल्याचे अहवालात स्पष्ट होऊनदेखील नद्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना झालेल्या नाहीत, हे अत्यंत गंभीर आहे. राज्यातील बहुतांश नद्यांचे आज नाले झाले आहेत. त्याला राज्य सरकारचा हलगर्जीपणाच जबाबदार आहे. त्यावरच न्यायालायाने ताशेरे ओढले आहेत. आता तरी सरकारला जाग येईल ही अपेक्षा.

-निखिल पवार

धोरणाला उशीर नको

न्यायालयाने सरकारला नदी संरक्षणाबाबत जाब विचारल्याने नद्यांचा प्रश्न किमान चर्चेत तरी आला आहे. राज्यातील कोणत्याही नदीचे चित्र पाहिले, तर परिस्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट होते. सरकारने नदीक्षेत्र नियमनाचे धोरण नव्याने आणायला उशीर केल्यानेच आज नद्यांची असी अवस्था अशी झाली आहे. या धोरणाला उसीर व्हायला नको.

-सुनील बागुल

कचरा व्यवस्थापन गरजेचे

नद्यांचे प्रदूषण रोखायाचे असेल, तर शहरातून निघणाऱ्या कचऱ्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केले जाणे गरजेचे बनले आहे. घनकचरा, रसायन, मलमूत्र आदी सारेच घटक नद्यांत मिसळले जात असतील, तर नद्यांचे अस्तित्व धोक्यात येईलच. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने तातडीने कठोर उपाययोजना राबविल्या पाहिजेत.

-प्रशांत सोनवणे

नागरिकांनीही घ्यावा पुढाकार

नद्यांना भारतीय संस्कृतीत देवतांचे स्थान दिले गेलेले आहे. मात्र, प्रत्यक्षात या नद्या आज प्रदूषणाचे आगार झाल्या आहेत. यास सरकारी धोरण जितके जबाबदार आहे, तितकीच नागरिकांची उदासीनतादेखील कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे यापुढे प्रशासनासह नागरिकांनीदेखील नद्यांचे संरक्षण व्हावे यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

-केशव खैरनार

नदीपात्रांतील अतिक्रमणे रोखावीत

न्यायालयाने केलेल्या टिप्पणीतून राज्य सरकार खरोखरच नद्यांच्या बाबतीत गंभीर आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आधीच्या धोरणामुळे नदीपात्रालगत अतिक्रमणे करण्यास मोकळीक मिळाली आणि नंतर केवळ नवे धोरण आणू असे म्हणून वेळकाढूपणा सरकारने केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे न्यायालयानेच आता याबाबत आदेश द्यावा.

-देवा पाटील

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकल शिबिरास उत्साहात प्रारंभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा सायकलिंग संघटनेच्या वतीने जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित केलेल्या उन्हाळी सायकलिंग शिबिराचे उद्घाटन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक योगेश हिरे, दीपक भोसले, डॉ. श्वेता भिडे, मनीषा भामरे, प्रशांत परदेशी, राज लूथरा हे उपस्थित होते. एशियन ट्रायथलॉनसाठी जाणाऱ्या अनुजा उगले हिचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी पोलिस आयुक्त सिंगल यांनी मुलांना मार्गदर्शन करून नाशिकचे नाव उज्ज्वल करू शकता, असा आत्मविश्वास दिला. या शिबिरात अजूनही ज्यांना सहभागी व्हायचे आहे अशा इच्छुकांनी शरद जोशी, नितीन नागरे यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळते यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी सभागृहातून साऊंड सिस्टीमची चोरी

0
0

गोदावरी सभागृहातून

साऊंड सिस्टीमची चोरी

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मध्य रेल्वेच्या एकलहरे रोडवरील रेल्वे ट्रॅक्शन येथील गोदावरी सभागृहातून ९५ हजार ५०० रुपये किंमतीची साऊंड सिस्टीम चोरीस गेल्याची तक्रार सिक्युरिटी सर्व्हिसेस मॅनेजर परमेश्वर कुचबिहारी दुबे (रा. ओझर) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. १४ एप्रिलच्या रात्री या सभागृहाच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीची काच फोडून सभागृहातील ४० हजार रुपयांचे ६ स्पीकर, ४१ हजार रुपयांचे २ एंप्लीफायर, १० हजार ५०० रुपयांचे १ लाईव्ह मिक्सिंग कन्सोल अणि ४ हजार रुपयांचे ४ एलईडी बल्ब, असा एकूण ९५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागीय आयुक्त समितीने केली गोदेची पाहणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शहर परिरातील कारखाने आणि मलजलयुक्त पाणी गोदापात्रात सोडण्यात येते. गोदापात्रात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलचर प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने, याप्रकरणी गोदावरी गटारीकरण विरोधी मंचच्या वतीने न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये नाशिक विभागीय आयुक्त समितीने गुरुवारी (दि. २६) गोदावरी पाहणी दौरा केला. या दौऱ्यात गोदापात्रात अनेक ठिकाणी दूषित पाणी मिसळले जात असल्याचे आढळून आले. याबाबत न्यायालयास रिपोर्ट सादर करण्यात येणार आहे.

नाशिकमध्ये उद्योग वाढल्यानंतर अनेक मोठ्या कंपन्यांनी आपले कारखाने येथे उभारले आहेत. या कंपन्यांमधील प्रदूषित पाणी थेट गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. शहरातील मलजलदेखील गोदापात्रात सोडले जाते. या सर्व पार्श्वभूमीवर गोदावरी गटारीकरण मंचच्या वतीने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये सद्य:स्थितीत गोदावरी नदीची काय अवस्था आहे, याचा अहवाल नाशिक विभागीय महसूल आयुक्तांना सादर करावयास सांगितले आहे.

त्यानुसार विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीने गुरुवारी (दि.२६) दुपारी गंगापूर गावापासून गोदापात्र पाहणी दौऱ्यास सुरुवात केली. सोमेश्वर, रामकुंड परिसर, तपोवन आदी भागात गोदापात्रात दूषित पाणी मिसळले जात असल्याचे या दौऱ्यात आढळून आले. या पाहणी दौऱ्यात पोलिस उपायुक्त (गुन्हे) विजय मगर, विभागीय कार्यालयीन उपायुक्त रघुनाथ गावडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र पाटील, मनपा उपायुक्त घुगे, याचिकाकर्ते निशिकांत पगारे, राजेश पंडित, पंचवटी विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्यासह आदी सहभागी झाले होते.

फेसयुक्त पाणी पात्रात

टाळकुटेश्वर पुलाजवळ एका मोठा व्हॉल्व्ह असून, तो कोणीही कसाही फिरवत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे वाघाडीचे दूषित पाणी गोदावरीत मिसळले जाते. तर तपोवन येथील मलजल शुद्धीकरण केंद्राच्या पाण्यातून मोठ्या प्रमाणावर फेसयुक्त पाणी नदीत मिसळले जात आहे. या फेसमुळे या भागातील माती काळी पडली आहे, फेस उडालेल्या झाडांची पाने वाळली आहे. त्यामुळे हा फेस किती घातक आहे, हे लक्षात येते. हे फेसयुक्त पाणी नदीत मिसळायला नको असे मत महसूल आयुक्त माने यांनी नोंदविले. यानंतर टाकळी येथील मलजल शुद्धीकरण केंद्र व नासर्डी नदी पात्रातील भिंत बांधकामाचे पाहणी या समितीने केली.

नाशिकला गोदावरी नदीच्या पात्रात वेगवेगळ्या माध्यमातून प्रदूषण होत आहे. ते कमी व्हावे, गोदावरी प्रदूषणाच्या विरोधात गेली ५-६ वर्षांपासून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या कामासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्यावतीने गोदावरीच्या सद्य:स्थितीची पाहणी करण्यात येत आहे.

- राजाराम माने, विभागीय महसूल आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आसारामला दिलेली जमीन परत मिळावी’

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

अजंग वडेल (ता. मालेगाव) येथे आसाराम बापू याच्या आश्रमाला दिलेली नऊ एकर जमीन परत मिळावी, यासाठी पित्यासह मुलाने कोर्टात दावा दाखल केला आहे.

लैगिंक अत्याचार प्रकरणी जन्मठेप सुनावण्यात आलेल्या आसाराम याच्या आश्रमासाठी अजंग वडेल येथील संजय जाधव यांनी स्वत:ची नऊ एकर जमीन दिली होती. मात्र, आश्रमाला दिलेली जमीन परत मिळावी असा दावा जाधव यांचे पुत्र दर्शन जाधव यांनी कोर्टात दाखल केला आहे. वडेल शिवारात गट नंबर ३४७ मधील नऊ एकर क्षेत्र आश्रमाला दिले आहे. या विरोधात दर्शन जाधव यांनी जानेवारी २०१८ मध्ये कार्टात दावा दाखल केला आहे. दर्शन यांच्या म्हणण्यानुसार, त्याचे वडील संजय जाधव हे आसाराम बापू याच्या आहारी गेले होते. कुटुंबाच्या हिताविरुद्ध विचार करून कुटुंबाचे मत जाणून न घेता आश्रमाला नऊ एकर जमीन परस्पर बहाल केली. ही जमीन आश्रमाच्या एका विश्वस्ताच्या नावे करून दिली; मात्र या जमिनीचा कुठलाही मोबदला घेतला नाही. सर्व नऊ एकर जमीन आसाराम बापू ट्रस्टला बक्षिस दिली. सदर जमीन अंधश्रद्धेपोटी दिली गेल्याची तक्रार दाव्यात केली आहे. याप्रकरणी ८ जून रोजी सुनावणी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images