Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पाणीचोरी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सक्रिय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक/ निफाड

पालखेड डाव्या कालव्यातून येवला, मनमाडसह ३५ गावे पाणीपुरवठा योजनेसाठी येत्या दोन ते तीन दिवसात आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी डाव्या कालव्याची पाहणी केली. पाणीचोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात १२०० डोंगळे काढले. दोन दिवस ही कारवाई अशीच सुरू राहणार असून त्यानंतर पाणी सोडले जाणार आहे. यावेळी कटेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

पालखेड धरणातून कालव्याद्वारे हे पाणी सोडल्यानंतर मनमाडच्या साठवणूक तलावात जाण्यासाठी ७४ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. तर येवला येथे जाण्यासाठी या पाण्याला पुढचा ५ ते ६ किलोमीटर अधिक लागते. पण, या दरम्यान या कालव्यातून मोठ्या प्रमाणात डोंगळे लावून शेतीसाठी पाण्याची चोरी केली जाते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी अगोदरच काळजी घेतली आहे.

पालखेडहून ७५० दशलक्ष घनफुटाचे हे रोटेशन असणार असून त्यासाठी दहा दिवस पाणी सोडले जाणार आहे. येवला, मनमाड नगरपरिषद, मनमाड रेल्वे, लासलगाव, निफाडमधील काही प्रासंगिक गावांना पालखेड कालव्यात पाणी आरक्षित असते. त्यातून हे पाणी सोडले जाणार आहे. विशेष म्हणजे खास पिण्यासाठीच हे आवर्तन असले तरी शेतीसाठी पाणी चोरी जाऊ नये याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कालिदास कलामंदिराची नूतनीकरणानंतर भाडेवाढ?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीअंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या नूतनीकरणात मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याने महापालिकेने आता कालिदास कलामंदिराचे भाडे वाढविण्याचा विचार सुरू केला आहे. महापालिकेने सध्याच्या भाडेदराचा अभ्यास सुरू केला असून, सध्याच्या भाड्यात जवळपास २५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

शहरातील करवाढीच्या मुद्द्यावरून वाद सुरू असतानाच महापालिका आता कलाप्रेमींनाही झटका देण्याच्या तयारीत आहे. महापालिकेने शहरात लागू केलेल्या नव्या करवाढीवरून रामायण सुरू असतानाच आता कलाप्रेमींनाही अंगावर घेण्याची तयारी सुरू केली आहे. भरमसाठ करवाढीवरून शहरात वाद निर्माण झाला असतानाच महापालिकेने नूतनीकरण केले जात असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराचे दर वाढविण्याची तयारी सुरू केली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत दहा कोटी रुपये खर्चून महापालिकेने कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण सुरू केले आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात असून, गेल्याच आठवड्यात आयुक्तांनी या कलामंदिराच्या कामाचा आढावा घेतला आहे. कलामंदिराचे रुपडे पूर्णत: पालटले असून, नाट्य, तसेच कलाप्रेमींसाठी अनेक सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने भाडेवाढीचाही विचार सुरू केला आहे.

बुकिंगही करणार ऑनलाइन

सध्याच्या भाडेदरात मोठे बदल केले जाणार असून, 'कालिदास'चे बुकिंगही आता ऑनलाइन केले जाणार आहे. त्यामुळे बल्क बुकिंग करून पैसे कमावणाऱ्यांनाही चाप बसणार आहे. सध्याच्या भाड्याच्या दराचा आणि सुविधाचा अभ्यास केला जात असून, त्यात साधारण २५ ते ५० टक्के भाडेवाढ करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. सध्या महापालिकेकडून तीन सत्रांत वेगवेगळे दर आकारले जातात. त्यात शनिवार आणि रविवारच्या दिवशी अधिक वाढ केली जाते. परंतु, आता त्यात सरसकट वाढ करण्याचा विचार सुरू असून, त्यासंदर्भात निर्णय झाल्यास कलाप्रेमींकडून त्याला विरोध होण्याची शक्यता आहे.

---

(अँकरशेजारी २ कॉलम) महापालिका इमारत वापरता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता दिल्लीसाठी ‘उडान’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांसाठी बहुप्रतीक्षित असलेली राजधानी नवी दिल्लीसाठीची विमानसेवा येत्या १५ जूनपासून सुरू होणार आहे. जेट एअरवेज या आघाडीच्या विमान कंपनीकडून त्यासाठीचे बुकिंगदेखील सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही हॉपिंग सेवा नसून थेट सेवा असल्याने आता अवघ्या दोन तासांत दिल्ली गाठणे किंवा दिल्लीहून नाशिकला येणे शक्य होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांची मागणी असलेली नाशिक ते दिल्ली ही विमानसेवा केंद्र सरकारच्या उडान या योजनेंतर्गत सुरू होणार आहे. उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकहून नवी दिल्लीकरिता विमानसेवा देण्यासाठी जेट एअरवेज कंपनीने इच्छा प्रदर्शित केली होती. त्यास केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने मार्च महिन्यात मंजुरी दिली. त्यानुसार सहा महिन्यांत सेवा सुरू करणे कंपनीला बंधनकारक होते. गेल्या काही दिवसांपासून कंपनीने त्यासंदर्भात जोरदार हालचाली केल्या. ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)च्या अधिकाऱ्यांशीही कंपनीने गाठीभेटी घेतल्या. त्याच्याच आधारे येत्या जूनमध्ये कंपनीची सेवा सुरू होईल, असे वृत्त 'मटा'ने दिले होते. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. कंपनीने सोमवार (दि. १४ मे)पासूनच दिल्ली विमानसेवेसाठीचे बुकिंग सुरू केले आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी ही बाब सुखद ठरली आहे. या सेवेसाठी खासदार हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा केला, तसेच दिल्लीत आंदोलनही केले. 'उडान'च्या दुसऱ्या टप्प्यातून वगळण्यात आले असल्याची बाबही खासदार गोडसे यांनी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती.

थेट सेवेचा लाभ

नाशिककरांना हॉपिंग फ्लाइटद्वारे सेवा मिळेल असे सांगितले जात होते. त्यामुळे विमानसेवेचा वेळ अधिक राहिला असता. पण, आघाडीच्या विमानसेवा कंपनीने थेट नाशिक व दिल्ली अशीच सेवा सुरू करण्याचे जाहीर केल्याने हा एकप्रकारे नाशिककरांवर दाखविलेला विश्वासच आहे. त्यामुळे अवघ्या दोन तासांत नाशिककरांना दिल्ली गाठता येणार आहे, ही बाब खूपच महत्त्वाची ठरणार आहे. जेट एअरवेजने विविध पाहण्या केल्या, तसेच अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. त्या जोरावर कंपनीने हा निर्णय घेतल्याने अन्य विमान कंपन्यांच्या नियोजनातही आता नाशिक राहणार आहे.

...अशी असेल सेवा

दिल्लीहून दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी विमान निघेल आणि ते ओझरला दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल. नाशिकहून दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी विमान निघेल आणि दिल्लीला दुपारी ४ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस ही सेवा मिळेल. कंपनीने उडान योजनेत आठवड्यातून तीन दिवसच सेवा मिळेल, असे जाहीर केले होते, त्यानुसार ही सेवा सुरू होणार आहे.

१६८ आसनक्षमता

ओझर विमानतळावरून पहिल्यांदाच बोइंग विमानाद्वारे सेवा मिळणार आहे. जेट एअरवेजच्या बोइंग ७३७ या विमानाद्वारे दिल्लीसाठी सेवा मिळणार आहे. या विमानाची आसनक्षमता १६८ आहे. यातील ४० आसने ही उडान योजनेंतर्गत राखीव राहतील. त्यामुळे या ४० आसनांचे तिकीट अल्प दरात उपलब्ध राहील. २८०० ते ३१०० रुपयांपर्यंतचे तिकीट दर बुकिंगदरम्यान दिसून आले आहेत. त्यामुळे माफक दरात नाशिककरांना दिल्लीसाठीची विमानसेवा मिळणार आहे.

नाशिक अखेर ट्रॅव्हल पोर्टलवर

आतापर्यंत नाशिक विमानतळ हे विविध ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टलवर नव्हते. एअर डेक्कन कंपनी केवळ त्यांच्या पोर्टलवरच तिकीट बुकिंग घेत आहे. आता जेट एअरवेजने बुकिंग सुरू केल्याने ते सर्व ट्रॅव्हल पोर्टलवरही उपलब्ध झाले आहे. त्यामुळे यानिमित्ताने नाशिक हे सर्व ट्रॅव्हल पोर्टलवर आले आहे. दरम्यान, जेट एअरवेजने तिकीट बुकिंगची घोषणा करताच नाशिकच्या उद्योग, वैद्यकीय आणि सर्वच वर्तुळात समाधानाचे वातावरण आहे. या सेवेमुळे नाशिकच्या विकासाला चालना मिळेल आणि अल्पावधीतच राजधानी दिल्ली गाठता येईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

या सेवाही लवकरच

'उडान'च्या दुसऱ्या टप्प्यात अलायन्स एअरकडून अहमदाबाद आणि हैदराबाद, ट्रू जेटकडून अहमदाबाद, इंडिगोच्या वतीने बेंगळुरू, भोपाळ, हिंडण (गाझियाबाद), स्पाइस जेटकडून गोवा आणि हैदराबाद, तर जेट एअरवेजकडून हैदराबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. दिल्लीसाठी सेवा सुरू होत असल्याने या अन्य सेवाही नजीकच्या काळातच सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत.

--

मटा भूमिका

विमानसेवा अन् नाशिक हे समीकरण काही जमत नाही, याचा अनुभवही आता जुना झाला असतानाच नव्याने जेट एअरवेज या आणखी एका आघाडीच्या विमान कंपनीने नाशिकला स्वप्न दाखविले आहे. जूनपासून जेट ही कंपनी दिल्लीसाठी सेवा सुरू करीत असल्याने नाशिककरही लागलीच हुरळून गेले आहेत. वारंवार धक्के बसूनही नाशिककरांची उड्डाणाची आस काही जाता जात नाही. अर्थात, हा आशावादच एक दिवस या सेवेला नियमित होण्यास कारणीभूत ठरू शकतो. किमान ही सेवा तरी सुरळीत होऊ दे, अशी प्रार्थना करण्यापलीकडे लोकांच्याच हातात तरी दुसरे काय आहे?

--

लोगो : शुभवार्ता

स्नॅपशॉट आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते’ उपोषणकर्ते पोलिसांच्या ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील उपोषणकर्त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत सोमवारी पोलिसांनी कारवाई केली. पूर्वनियोजनानुसार सोमवारी पोलिस आयुक्त, कामगारी उपायुक्त, विद्यापीठ प्रशासन आणि उपोषकर्ते कर्मचारी यांच्यात बैठक होऊन तोडगा निघण्याच्या आशेवर असणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. कामगार संघटनेचे कर्मचारी काही कामानिमित्त मुंबईत असल्याने या बैठकीला सोमवारी मुहूर्त लागला नाही.

आंदोलनाचा सोमवारी चौदावा दिवस होता. सोमवारी दुपारच्या सुमाराला या साखळी उपोषणात एकूण पाच कर्मचारी सहभागी होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणस्थळी या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातील चौघांना पोलिसांच्या उपस्थितीत तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. एक कर्मचारी मात्र सायंकाळी उशिरापर्यंत उपोषणस्थळी होता. त्याला साथ देण्यासाठी इतर कर्मचारी सायंकाळनंतर दाखल होऊ लागले. त्यानंतर सरकारवाडा पोलिस आणि जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने उपस्थिती लावत या कर्मचाऱ्यालाही दवाखान्यात दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत कारवाई सुरू केली. त्याला इतर कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत सरकारवाडा पोलिस ठाण्यात हजर केले. उपोषणवस्थळीचा मंडप आणि इतर साहित्यही यंत्रणेने ताब्यात घेतले. या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर सायंकाळी उशिरा सरकारवाडा पोलिस ठाण्यात गर्दी झाली होती. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांची आमदार बाळासाहेब सानप यांनी भेट घेतली. मात्र, सोमवारी अपेक्षेप्रमाणे तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

--

(पेज फोटोखाली घेणे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवरायांचे विचार जगण्याची गरज

$
0
0

शिवरायांचे विचार

जगण्याची गरज

प्रा. सोपान वाटपाडे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जातीपातीवरील राजकारण आणि दंगे यावर मूळ शोधण्यासाठी समाजाला शिवछत्रपतींचे चरित्र समजून घ्यावे लागणार आहे. त्यांचे विचार डोक्यावर घेऊन नाचण्याची नव्हे तर शिवरायांचे विचार डोक्यात घालून तसे वागण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन शिवचरित्र व्याख्याते प्रा. सोपान वाटपाडे यांनी केले.

गोदाघाटावर आयोजित वसंत व्याख्यानमालेतील १४ वे पुष्प सोमवारी त्यांनी गुंफले. 'शिवचरित्र : आधुनिक समस्यांवर शिवचरित्रात उपाय' या विषयावर ते बोलत होते. वाटपाडे म्हणाले, की आजच्या संगणकीय व आधुनिकतेच्या युगात छत्रपती शिवरायांचे महत्त्व तीळमात्रही कमी झालेले नाही. त्यांचे स्वराज्य कोणत्याही जाती, धर्म व पंथाच्या विरोधात कधीही नव्हते हे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. शिवचरित्रामधून छत्रपतींचे उत्कृष्ट कुशल प्रशासन, व्यवस्थापन, कृषीधोरण, जलनीती, न्यायदान अशा विविध बाबी शिकता येतात.

आजचे व्याख्यान

वक्ते : अॅड. असीम सरोदे

विषय : माध्यमाचे स्वातंत्र्य व लोकशाहीचा जिवंतपणा

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगूर उपनगराध्यक्षपदी प्रतिभा घुमरे यांची वर्णी

$
0
0

देवळाली कॅम्प :  भगूर  नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी प्रतिभा घुमरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी घुमरे समर्थक व शिवसैनिकांनी शिवाजी चौकात फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल उधळत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. 

  रोटेशन पद्धत असल्याने मनीषा कस्तुरे यांनी उपनगराध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा दिला होता. तो मंजूर करत या पदासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन पालिका सभागृहात करण्यात होते. यावेळी प्रतिभा घुमरे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आहिरराव यांनी घुमरे यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांनी काम पाहिले. सभेस शिवसेना जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, वनश्री तानाजी भोर, उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, चंद्रकांत गोडसे, नाना ताजनपुरे, शहरप्रमुख अंबादास कस्तुरे, नगराध्यक्षा अनिता करंजकर, मुख्य लिपिक रमेश राठोड आदिसंह सर्व नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिमांशू रॉय यांच्या अस्थींचे विसर्जन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी 

राज्याचे दिवंगत एटीएस प्रमुख व अतिरिक्त पोलिस महासंचालक, १९८८ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले हिमांशू रॉय (५४) यांच्या अस्थी सोमवारी सकाळी रामकुंड येथे आणण्यात आले. शोकाकुल वातावरणात धार्मिक विधीनंतर त्या रामकुंडात विसर्जित करण्यात आल्या. 

हिमांशू रॉय यांनी शुक्रवारी (दि. ११) आत्महत्या केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. रॉय यांनी नाशिकचे आयुक्तपद भूषविले असल्याने ते नाशिककरांना चांगले परिचित होते. त्यांच्या निधनाची वार्ता नाशिककरांना चटका लावणारी ठरली. रॉय यांच्या पत्नीसह त्यांची आई,  मुले, बहीण, मेहुणे, आप्तेष्ट व गुजरातमधील त्यांच्या मूळ गावचे नातेवाईक रामकुंड येथे सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पोहचले. पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांनी यावेळी पौरोहित्य करीत धार्मिक विधी पार पाडले. सुमारे दीड तास चाललेल्या या धार्मिक विधीनंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात रॉय यांच्या अस्थी रामकुंडात विसर्जित करण्यात आल्या. 

 पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, माजी महापौर अशोक मुर्तडक, डॉ. प्रदीप पवार, अतुल चांडक, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्यासह सेवानिवृत्त अधिकारी व त्यांचे निकटवर्तीय उपस्थित होते. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा भूमिका - विमान सेवा- वापरली...

$
0
0

विमानसेवा अन् नाशिक हे समीकरण काही जमत नाही याचा अनुभवही आता जुना झाला असतानाच नव्याने जेट एअरवेज या आणखी एका आघाडीच्या विमान कंपनीने नाशिकला स्वप्न दाखविले आहे. जूनपासून जेट ही कंपनी दिल्लीसाठी सेवा सुरू करीत असल्याने नाशिककरही लागलीच हुरळून गेले आहेत. वारंवार धक्के बसूनही नाशिककरांची उड्डाणाची आस काही जाता जात नाही. अर्थात हा आशावादच एक दिवस या सेवेला नियमित होण्यास कारणीभूत ठरू शकतो. किमान ही सेवा तरी सुरळीत होऊ दे, अशी प्रार्थना करण्यापलीकडे लोकांच्याच हातात तरी दुसरे काय आहे?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साडेतीन हजार जणांची अकरावीसाठी नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावीच्या निकालाचा कालावधी नजिक असल्याने आता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात झाली आहे. शिक्षण विभागाने प्राथमिक माहिती असलेला भाग १ मधील माहिती भरण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. ही प्रक्रिया चार दिवसांपासून सुरू झाली आहे. या काळात सोमवारी सायंकाळपर्यंत ३ हजार ६६० विद्यार्थ्यांनी भाग १ मधील माहिती भरून नावनोंदणी केली. यातील १०३४ विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण विभागाने तपासले असून अद्याप १ हजार ५८९ अर्ज हे तपासणी प्रक्रियेत आहेत.

एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या अर्जाच्या दुसऱ्या भागातील माहिती विद्यार्थ्यांना अद्ययावत करता येणार आहे. तोपर्यंत अकरावी प्रवेशासाठी माहितीपुस्तिका घेतल्या नसतील अशा विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रावरून त्या मिळवून घ्याव्यात. माहिती पुस्तिका बारकाईने वाचून नंतरच त्यातील लॉग इन आयडी आणि पासवर्डच्या आधारे पहिल्या भागातील माहिती पूर्ण भरावी. हे अर्ज भरण्यासाठी शाळा आणि अधिकृत मार्गदर्शन केंद्रांशिवाय इतरत्र ठिकाणाहून अर्ज भरू नये, असे आवाहन विद्यार्थी व पालकांना शिक्षण विभागाने केले आहे.

आयसीएसईसाठी माहितीपुस्तिका १५ पासून

सोमवारी दुपारी आयसीएसई बोर्डाचा बारावी सोबतच दहावीचाही निकाल जाहीर करण्यात आला. या विद्यार्थ्यांसाठी अद्याप अकरावी प्रवेश माहिती पुस्तिकेचे वितरण सुरू झालेले नाही. १५ मेपासून या विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिका घेता येतील. या विद्यार्थ्यांनी नाशिकरोड, बिटको महाविद्यालयात हे प्रवेश अर्ज तपासून घ्यावेत, असेही आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैन युवा महासभा कार्याध्यक्षपदी लोहाडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतवर्षीय दिगंबर जैन युवा महासभेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नाशिकचे पारस लोहाडे यांची निवड झाली आहे. नाशिक शहराला पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे. नांदगाव येथील आनंद काला यांचीही राष्ट्रीय सहसचिवपदी निवड झाली आहे.

महावीरजी तीर्थक्षेत्र राजस्थान येथे १२ मे राजी झालेल्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत पारस लोहाडे यांची युवा महासभेच्या कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली. नाशिक शहरातून आजपर्यंत कोणीही या संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नव्हते. संस्थेचे मुख्य अध्यक्ष म्हणून लखनौ येथील निर्मलकुमार सेठी यांची निवड झाली आहे. भारतवर्षीय दिगंबर जैन महासभा देशभरातील दिगंबर जैन समाजातील सर्वांत मोठी संस्था असून, या संस्थेद्वारे जैन संस्कृतीचे रक्षण, संवर्धन, जतन करण्यास प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यासह वेगवेगळ्या तीर्थांचे रक्षण, युवकांच्या समस्या, साधू-संतांची सेवा अशा अनेक उपक्रमांतही ही संस्था अग्रेसर आहे. पारस लोहाडे नाशिकमधील अनेक संस्थांमध्ये कार्यरत असून, त्यांच्या नावावर वेगवेगळे १३ विश्वविक्रमही आहेत. असे करणारे ते राज्यातील एकमेव आहेत. त्यांच्या निवडीचे सर्व समाजबांधवांनी स्वागत केले आहे.

(फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅसविना कूकिंगच्या टिप्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे बच्चेकंपनीसाठी आयोजित करण्यात आलेल्या किड्स कार्निवलमध्ये बच्चेकंपनी भलतीच खूश आहे. हँडीक्राफ्ट वर्कशॉप, त्यानंतर बालनाट्याची मेजवानी आणि आता नॉनफायर कूकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या गुरुवारी (दि. १७ मे) नॉनफायर कूकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. फिटनेस स्टुडिओ बाय सई संघई, महात्मानगर या ठिकाणी सकाळी १० वाजता हे वर्कशॉप होणार आहे.

अनेकदा बच्चेकंपनीला स्वतः काही बनवायचे असते. पण, आई गॅसजवळ येऊ देत नाही. मग बच्चेकंपनी पदार्थ बनविण्याची हौस पूर्ण करणार कधी? गॅस न वापरता सॅण्डविच पिनव्हील्स, पिझ्जा टार्ट्स, ओरिओ शॉट्स, बिस्किट कॅनापाइज्, चायनिज् भेल आदी पदार्थ कसे बनवायचे याचे मार्गदर्शन विवेक सोहनी करणार आहेत. त्यासाठी १०० रुपये नोंदणी फी आहे. हे वर्कशॉप ६ ते १६ या वयोगटातील मुलांसाठी असून, मुलांनी येताना वही आणि पेन घेऊन येणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच कल्चर क्लबच्या ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com या वेबसाइटला भेट द्यावी.

- - -

कल्चर क्लब, किड्स कार्निव्हल लोगो, फेसबुक, ट्विटर लिंक, क्यूआर कोड वापरावा.

बातमी पहिल्या पानावर घ्यावी.

- - -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षतोड रोखण्यासाठी मोबाइल स्कॉड

$
0
0

'आम्ही मालेगावकर'च्या उपोषणानंतर वनविभागाचे आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव उपविभागीय वनक्षेत्रात होत असलेल्या अवैध वृक्षतोडीबाबत उपाययोजना कराव्यात या प्रमुख मागणीसाठी येथील आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी येथील वनविभाग कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. दरम्यान समितीच्या मागण्यांबाबत उपविभागीय वन अधिकारी जगदीश येडलावर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लेखी आश्वसन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

मालेगाव उपविभागीय वनक्षेत्रातील जंगलात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असून शहरातील विविध सायाजिंगमध्ये सर्रासपणे हे लाकूड वापरले जात असल्याची तक्रार समितीने वारंवार वनविभागाकडे केली आहे. मात्र याबाबत कारवाई होत नसल्याने अखेर सोमवारी उपोषण सुरू केले. निखील पवार यांनी आपल्या मागण्या पुढे ठेवल्या. यात अवैध वृक्षतोडीतील लाकडू सॉ मिलमध्ये आढळल्यास त्या एक वर्षासाठी सील कराव्यात, त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करून पुन्हा परवाने देऊ नये, अवैध वृक्षतोड करून लाकूड वाहतूक करणारी वाहन जप्त कारवाई व रोख दंड तसेच सश्रम कारावास शिक्षेची तरतूद करावी, तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या सर्व वनकर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, अवैध वृक्षतोड थांविण्यासाठी पथक नेमण्यात यावे, दास्ता डेपो परवाने सक्तीचे करावेत, चराई व कुऱ्हाडबंदी करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या होत्या.

उपविभागीय वनअधिकारी येडलावर यांनी समितीला लेखी आश्वसन दिले. त्यात अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी फिरते पथक नेमण्याचे आश्वासन आहे. या पथकात एक वन परिक्षेत्र अधिकारी, ५ ते ६ शस्त्रधारी वनरक्षक (मोबाईल स्कॉर्ड) नियुक्तीला तत्वतः मान्यता दिली आहे. तसेच शहरातील सहा सॉ मिल एक महिन्यासाठी सील करण्यात आल्या आहेत. पाच सायजिंगवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सश्रम कारावास व रोख दंड शिक्षेचा प्रस्ताव शासनास पाठीवण्यात येतील, दास्तान डेपो परवाना न घेणाऱ्यांवर कायदेशीर करावाई करण्याचे लेखी आश्वसन देण्यात आले आहे. या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी पवार यांच्यासह समितीचे रवीराज सोनार, देवा पाटील, राहुल देवरे सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवत्यातील अतिक्रमण मुख्याधिकाऱ्यांचा रडारवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून विविध धडक कारवाईतून आपली आक्रमकता दाखविणाऱ्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर-शहाणे यांनी आता अतिक्रमणाकडे मोर्चा वळविला आहे. याआधी त्यांनी रुवातीला राज्य महामार्गासह शहरातील विविध रस्त्यांवरील फेरीवाल्यांसह छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करून रस्त्यांचा श्वास मोकळा केला आहे.

शहरातील गटारींवर पायऱ्या, भिंती आदी बांधकाम केलेल्या दुकानदार व रहिवाशांना त्यांनी 'हे अतिक्रमण काढून घ्या, अन्यथा कडक कारवाई करू', असा इशारा दिला आहे. त्यामुळे गेल्या तीनचार दिवसात शहरातील विविध भागातील व्यापारी, नागरिकांनी स्वतः हाता टिकाव पावडे हाती घेत हे वाढीव बांधकाम काढून घेतले आहे.

संगीता नांदुरकर-शहाणे या गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाल्या आहेत. शहरातून जाणाऱ्या मनमाड-नगर आणि नाशिक-औरंगाबाद या दोन मुख्य महामार्गासह शहरातील विविध रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी प्रारंभी त्यांनी महामार्गालगतच्या असंख्य फेरीवाल्यांबरोबरच छोट्या विक्रेत्यांची उचलबांगडी केली. पुढे महामार्गावरील अनेक दुकानदारांना त्यांच्या दुकानासमोरील शेड, छत काढायला लावले. आणि आता शहरातील गटारींवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई हातात घेतली आहे. या मोहिमेंतर्गत पालिका अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसह स्वतः नांदुरकर रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यामुळे शहराच्या विविध भागातील गटारींवरील पायऱ्या, भिंती आदींचे वाढीव बांधकाम नागरिक काढून घेत आहेत. नांदुरकर यांनी सोमवारी (दि.१४) देखील ही मोहीम पुन्हा सुरू ठेवल्याचे दिसून आले. या मोहिमेंतर्गत त्यांनी शहरातील अनेक कॉलनी भागाकडे आपला मोर्चा वळवल्याने नागरिकांना आपल्या घरासमोरील पोर्च, कंपाउंड देखील काढून घेण्याची वेळ आली. मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांनी नाले व गटारी मोकळया वाहण्यासाठी मोहीम हाती घेतल्याने अनेकांना आपल्या घरांच्या पायऱ्या व ओटे काढावे लागत आहे.

नांदुरकर यांच्या पवित्र्याने शहराचा गावगाडा हाकणाऱ्या येवला नगरपालिकेच्या जवळपास सर्वपक्षीय नगरसेवकांची मोठी 'कोंडी' झाली आहे. या मोहिमेदरम्यान प्रत्येक वार्डातील नागरिक आपआपल्या नगरसेवकांकडे धाव घेत असले तरी, सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता सुरू असल्याने मुख्याधिकाऱ्यांशी कसे बोलावे? असा यक्षप्रश्न येथील पालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वच नगरसेवकांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहितेच्या बडग्याने विकासकामांबाबत संभ्रम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने महापालिकेच्या करवाढीच्या प्रश्नावरून वाढलेला संभ्रम विधान परिषदेच्या निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर दूर होईल, असे चित्र निर्माण झाले आहे.

नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने विधान परिषदेसाठी लागू असलेली निवडणूक आचारसंहिता १२ जूनपर्यंत लाबंली होती. त्यामुळे करवाढीच्या निर्णय १२ जूनपर्यंत लांबेल असा संभ्रम होता. दरम्यान, विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला असून, नवी कामे जवळपास ठप्प झाली आहेत. स्मार्ट सिटीच्या कामांनाही या आचारसंहितेचा फटका बसला असून, पदाधिकारी आणि नगरसेवक फिरकत नसल्याने धोरणात्मक निर्णयही लटकले आहेत.

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक येत्या २१ मे रोजी होणार असून, २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने २९ मेपर्यंत आचारसंहिता लागू केली आहे. विधान परिषदेच्या एका जागेवरील निवडणुकीमुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला असून, धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याने कामकाज ठप्प झाले आहे. त्यातच शहरात पेटलेल्या करवाढीच्या मुद्द्यावरून रान उठले असून, करवाढीचा प्रश्न आचारसंहितेनंतर सुटेल असे चित्र होते. त्यामुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ३१ मार्च रोजी काढलेल्या करवाढीच्या अधिसूचनेला स्थगिती देणारा ठराव आचारसंहिता संपताच पाठविला जाईल, असे चित्र होते. परंतु, ही आचारसंहिता संपण्याआधीच नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचाही कार्यक्रम घोषित झाला आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ८ जून रोजी निवडणूक होणार असून, १२ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीचीही आचारसंहिता नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांसाठी लागू झाली होती. त्यामुळे करवाढीचा संभ्रमही अधिकच वाढला होता. परंतु, निवडणूक आयोगाने आता शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली आहे. त्यामुळे महापालिकेला काहीसा दिलासा मिळाला असून, २९ मेनंतर धोरणात्मक निर्णयासह करवाढीच्या निर्णयाचा संभ्रम दूर होणार आहे.

करवाढीचा तिढा

करवाढीसंदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काढलेली अधिसूचना ही प्रभाग क्रमांक १३ च्या आचारसंहितेदरम्यान काढल्याचे आदेश देत करवाढीला महासभेने स्थगिती दिली होती. परंतु, जिल्हा प्रशासनाने या निर्णयावर आक्षेप घेत थेट आचारसंहिता भंगाच्या कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे महापौरांनी दोन पावले मागे येत कारवाईच्या भीतीने अद्यापही ठराव दिलेला नाही. आचारसंहिता संपताच हा ठराव जाईल, असे चित्र होते. परंतु, महापौरांनी अद्यापही ठराव दिला नसल्याने करवाढीचा संभ्रम कायम राहिला आहे.

पदाधिकारी गायब

महापालिकेत आचारसंहिता लागू असल्याने व धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याने महापालिकेतील महापौर, उपमहापौर, गटनेते, विरोधी पक्षनेत्यांसह स्थायी समिती सभापतींनी महापालिकेपासून अंतर राखले आहे. पदाधिकारी महापालिकेत फिरकत नसल्याने महापालिकेत शुकशुकाट पसरला असून, महापालिकेत तक्रारी व अडचणी घेऊन येणाऱ्या नागरिकांची कैफियत ऐकण्यास कोणीही उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे तक्रारी आणि कामे होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे.

महासभाही साप़ली कात्रीत

महापालिकेत दरमहा महासभा बोलावली जाते. परंतु, सध्या आचारसंहितेच्या कात्रीत महासभाही अडकली आहे. गेल्या वेळच्या महासभेत करवाढीच्या मुद्द्यावरून बराच खल झाला होता. परंतु, प्रत्यक्षात आचारसंहितेमुळे अद्यापही करवाढीच्या स्थगितीचा ठराव आलेला नाही. त्यातच आता पुन्हा महापौरांनी येत्या शनिवारी (दि. १९ मे) महासभा बोलावली आहे. या महासभेतही आचारसंहितेमुळे धोरणात्मक निर्णयांवर चर्चा करता येणार नाही. त्यामुळे केवळ इतिवृत्त मंजुरीवरच भागवावे लागणार आहे.

---

(निष्पक्षचा लोगो वापरणे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटारी होणार बंदिस्त

$
0
0

स्वतंत्र मलवाहिका; १९ नैसर्गिक नाल्यांमध्ये सांडपाणी सोडण्यास बंदी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी नदीला जोडलेल्या नैसर्गिक नाल्यांमध्ये थेट गटारीचे पाणी सोडले जात असल्याने गोदा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे गोदेला मिळणाऱ्या १९नैसर्गिक नाल्यांमध्ये गटारीचे पाणी सोडले जाऊ नये, अशी मागणी निरी आणि महापालिके दरम्यान झालेल्या संयुक्त बैठकीत पर्यायवरणप्रेमींनी केली. त्यानुसार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नैसर्गिक नाल्यांमध्ये जोडलेल्या गटारी बंद करून या गटारींचे पाणी मलवाहिकांना जोडण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील काम महापालिकेने सुरू केल्याचा दावाही आयुक्तांनी केला आहे.

गोदावरी प्रदूषणाच्या समस्येवर सोमवारी महापालिका आयुक्तांच्या दालनात निरी आणि पर्यायवरण प्रेमींच्या उपस्थितीत उपाययोजनांसदर्भात बैठक झाली. यावेळी 'निरी'चे राकेशकुमार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र पाटील, प्राचार्य प्राजक्ता बस्ते, पर्यावरण प्रेमी राजेश पंडित, निशिकांत पगारे उपस्थित होते. या बैठकीत गोदावरीच्या प्रदूषण आणि त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी पर्यावरण प्रेमींनी गोदावरी नदीला मिळणाऱ्या नैसर्गिक नाल्यांमध्ये थेट गटारीचे पाणी सोडले जाते. त्यामुळे गटारीचे पाणी हे नाल्यांद्वारे थेट नदीपात्रात मिसळून नदीचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे नैसर्गिक नाल्यांना मिळणारे गटारीचे पाणी तातडीने बंद करण्याची मागणी केली. त्यावर आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही पर्यावरण प्रेमींच्या मागणीला दुजोरा देत यावर काम सुरू असल्याचे सांगितले. महापालिकेमार्फत शहरातील गटारींचे पाणी स्वतंत्र मलवाहिकाद्वारे एसटीबी प्लान्टपर्यंत आणण्याचे नियोजन असून त्यासाठीचे कामही सुरू झाले आहे. त्यासाठी जवळपास ८० कोटींची तरतूद केली आहे. यात नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडण्यात येणारे गटारीचे पाणी हे स्वतंत्रपणे मलवाहिकाद्वारे वाहिले जाणार आहे. त्यामुळे गटारींचे हे पाणी नैसर्गिक नाल्यांमध्ये जाणार नसल्याने गोदावरीच्या प्रदूषणाला आळा बसणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

गोदापात्रातील काँक्रिट काढणार

गोदावरी नदीत गोदाप्रकल्पासह रामकुंड परिसरात मोठ्या प्रमाणावर क्रॉक्रिटीकरण झाल्याने नदीतले नैसर्गित स्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे नदीपात्रातील सर्व काँक्रिटीकरण काढून टाकण्याची मागणी बैठकीत पर्यायवरण प्रेमींनी केली. त्यावर स्मार्ट सिटी अंतर्गत नदीपात्रातील सर्व काँक्रिटीकरण काढून टाकले जाणार असल्याची माहिती आयुक्त मुंढेंनी दिली. स्मार्ट सिटी अंतर्गत स्वतंत्र गोदाप्रकल्प राबविला जाणार असून त्यात गोदापात्र सुशोभिकरणा अंतर्गत नदीपात्रातील काँक्रिटीकरण काढले जाणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.

असे आहेत शहरातील नैसर्गिक नाले

मल्हारखाना नाला, चोपडा नाला, जोशीवाडा नाला, निर्मला कॉन्व्हेंट नाला, आसाराम बापू आश्रमातील नाला, आंनदवल्ली नाला, चिखली नाला, सोमेश्वार नाला, बारदान फाटा जवळील नाला, गंगापूरगाव नाला, गांधारवाडी नाला, कुसुमाग्रज उद्यानालगतचा नाला, रामवाडी लेंडी नाला, सरस्वती नाला, नागझरी नाला, नासर्डी नदी, कपिला नाला, वाघाडी नाला, अरुणा नाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उर्दू पत्रकारावर मालेगावात हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील एका उर्दू पत्रकारावर व वृत्तपत्र कार्यालयावर हल्ला करून आरोपी फरार झाल्याची घटना समोर आली आहे. या बाबतीत मालेगाव शहर पोलिस ठाण्यात सदर आरोपींविरुद्ध फिर्याद नोंदविली आहे. येथील स्थानिक उर्दू वृत्तपत्र दिवाने-ए-आयच्या बादशहा खान नगर येथील कार्यालयामध्ये शनिवारी, १२ मे रोजी रात्रीच्या सुमारास नदीम अहमद या आरोपीने पत्रकार मोमीन वहेदुद जाहिद अख्तर (वय २१) यांना मारहाण केली. आरोपीला अडविण्याचे प्रयत्न केले असता आरोपी नदीम अहमदने धारदार कटरने मोमीन यांच्या डाव्या कानावर वार केले. तसेच कार्यालयातील सामानाची नासधूस करून तेथून पळ काढला. पत्रकार मोमीन यांनी याबाबत फिर्याद मालेगाव शहर पोलिस ठाण्यात नोंदविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुटुंब संस्थेला घटस्फोटाची वाळवी

$
0
0

तीन वर्षांमध्ये अडीच हजार कुटुंबे दुभंगली

नवनाथ वाघचौरे, नाशिकरोड

शहर कौटुंबिक न्यायालयात गेल्या तीन वर्षांमध्ये दाखल ३ हजार ३०० पैकी तब्बल २ हजार ५२९ दाव्यांमध्ये जोडप्यांचे घटस्फोट झाले. घटस्फोटांच्या या वाढत्या आलेखातून कुटुंब संस्थेला घरघर लागल्याची बाब उघड झाली. निकाली निघालेल्या दाव्यात अवघ्या ३२४ जोडप्यांची मने पुन्हा जुळली असून त्यांचे संसार सुरळीत सुरू झाले.

नाशिक शहराचे कौटुंबिक न्यायालय नाशिकरोड येथे कार्यरत आहे. या न्यायालयात २०१५-ते २०१७ या तीन वर्षांमध्ये तब्बल ३ हजार ३०० दावे दाखल झाले. त्यापैकी २ हजार ८५३ दावे या न्यायालयात निकाली निघाली. या निकाली निघालेल्या दाव्यांतील तब्बल ८८.६४ टक्के म्हणजेच २ हजार ५२९ दाव्यांतील जोडप्यांचे घटस्फोट झाले. निकाली निघालेल्या दाव्यांपैकी तडजोड घडवून आणून ११.३५ टक्के म्हणजेच ३२४ दाव्यांतील जोडप्यांचे संसार पुन्हा उभे राहिले. या तीन वर्षांमध्ये दाखल झालेल्यापैकी अजूनही ४०० पेक्षा जास्त दावे प्रलंबित आहेत. जानेवारी ते एप्रिल २०१८ या चार महिन्यांमध्ये दाखल दाव्यांमुळे प्रलंबित दाव्यांची संख्या आणखी वाढली आहे. कौटुंबिक वादात तडजोड होण्याचे प्रमाण घटस्फोटांच्या तुलनेत अगदी नगण्य असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते. एकंदरीत कुटुंब व्यवस्थेलाच घरघर लागल्याचे या वास्तवातून सिद्ध झाले आहे. गेल्या काही वर्षांत घटस्फोटांचे वाढते प्रमाण हे कुटूंबातील नात्याची वीण सैल होत असल्याचे प्रतीक मानले जात आहे.

यामुळे नात्यात दुरावा

सोशल मीडियाचा अतिरेकी वापर, मोबाइल फोनद्वारे वेळी अवेळी जास्त प्रमाणात बोलणे, त्यातून निर्माण होणारे संशय, सिनेमातील लाइफ स्टाइलचे अनुकरण, उच्च शिक्षणामुळे वाढलेल्या अवास्तव अपेक्षा आणि अहंकार, इतर नातेवाइकांची ढवळाढवळ, नोकरी, अवेळी व कुटुंबीयांच्या विरोधात केलेले लग्न यासारख्या कारणांमुळे कौटुंबिक नात्यात दुरावा निर्माण होत असल्याचे या दाव्यांतून निदर्शनास आले आहे. न्याय व्यवस्थेकडून या दाव्यांमधील पती-पत्नी व त्यांच्या नातेवाइकांचे समुपदेशनही केले जाते.

नाशिक कौटुंबिक न्यायालयातील दाव्यांची स्थिती

वर्ष....दाखल दावे....निकाली दावे....प्रलंबित दावे....घटस्फोट....तडजोड

२०१५....९०१............७७५............१२६................६८८........८७

२०१६....१,१९३........१,०५७..........१३६................९३५........१२२

२०१७....१,२०६........१,०२१..........१८५................९०६........११५

एकूण....३,३००.........२,८५३...........४४७..............२,५२९........३२४

लोगो : जागतिक कुटुंब दिन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच छताखाली मायेचा ओलावा

$
0
0

मनमाडच्या आंधळे परिवाराचा 'हम साथ साथ चा नारा'

संदीप देशपांडे, मनमाड

'हम दो हमारे दो'च्या जमान्यात मनमाड शहरात आंधळे परिवारात तब्बल २७ जण एका कुटुंबात, एकाच छताखाली गुण्यागोविंदाने राहत आहेत. एकमेकांची सुख-दुःखे वाटून घेत एकमेकांच्या आनंदात सामील होत आहेत. संकटकाळी परस्परांच्या मदतीला धावून जात आहेत. आंधळे परिवाराचा हा डोळस आदर्श आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या जमान्यात 'मिले सूर मेरा तुम्हारा'चे सूर पेरणारा आहे.

मनमाड येथे रेल्वे स्थानकावर एकेकाळी हमाली करणाऱ्या काशिनाथ आंधळे यांचा हा बुधलवाडीतील हा परिवार आजच्या काळात इतरांना आदर्शवत ठरणारा आहे. काशिनाथ आंधळे व त्यांच्या पत्नी सुमनबाई यांनी बुधलवाडी परिसरात आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही सुखी समाधानाने राहत एकत्र कुटुंब पद्धतीचे बीज रोवले. आज त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. काशिनाथ आंधळे यांचा मोठा मुलगा वाल्मिक आंधळे यांनी आपल्या वडिलांचा वसा पुढे नेला आहे. आज वाल्मिक आंधळे आपल्या ५ भावांसह २७ जणांचे कुटुंब मोठ्या निष्ठेने चालवत आहेत. त्यांच्या आई सुमनबाई यांच्या निधनानंतर वाल्मिक यांच्या पत्नी व मोठ्या सूनबाई कमलबाई या सासूबाईंच्या पावलावर पाऊल ठेऊन घरातील सर्वांना भक्कम आधार देत आहेत. रिक्षा चालवणारे वाल्मिक आंधळे आज आपल्या सुरेश, बाळू, छबू, शरद या भावंडांसह वेल्डिंगच्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहे. एकत्र कुटुंब हा आमचा श्वास आहे, आम्हाला नात्यांचा ध्यास आहे, आमच्या घरातील मुलगी देखील आम्ही एकत्र कुटुंबात दिली आहे. कारण एकत्र कुटुंबात दुःख फार काळ टिकत नाही. सोसायला बळ येते. अडचणीत माणसे धावून येतात. आमच्या मुलांवरही तेच संस्कार आहेत. त्यामुळे आमचे घर २७ जणांचे गोकुळ आहे. या गोकुळाचा आधारवड असलेली आई आज हयात नाही, याचे वाईट वाटते असे वाल्मिक आंधळे सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तो’ वाहनचोर अखेर गजाआड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दुचाकी चोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. शहराच्या विविध भागात त्याने दुचाकी लंपास केल्या आहेत. त्याचा कसून तपास करताना शहर परिसरातील दुचाकी चोरीच्या अनेक घटना समोर येण्याची शक्यता आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २च्या पथकाने या चोरट्याला बेड्या घातल्या.

रोहित मोहन जाधव (वय २१, रा. दसकगाव, जेलरोड) असे अटक केलेल्या दुचाकी चोराचे नाव आहे. नाशिकरोडसह उपनगर हद्दीतून त्याने पाच दुचाकी चोरी केल्याची पोलिसांकडे नोंद आहे. दोन-तीन वर्षांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. मात्र, जेलरोड भागात त्यास बेड्या ठोकण्यात आल्या. रोहित हा अट्टल चोर असल्याचे समजते. उपगनर पोलिस ठाणे हद्दीत तीन व नाशिकरोड हद्दीतील दोन वाहन चोरीच्या गुह्यात पोलिस त्याचा शोध घेत होते. रविवारी तो जेलरोड भागात येणार असल्याची माहिती युनिट २ चे हवालदार श्रीराम सपकाळ यांना मिळाल्याने तो पोलिसांच्या हाती लागला. संशयित रोहित जेलरोड परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्याने दिली. पोलिसांनी उपनगर हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यात त्यास अटक झाली. ही कारवाई गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली व निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार श्रीराम सपकाळ, पोलिस नाईक परमेश्वर वराडे व कॉन्स्टेबल बाळा नांद्रे यांच्या पथकाने केली आहे. अधिक तपास हवालदार राजाराम वाघ करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन जुगार अड्ड्यांवर छापे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या नऊ जुगारींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई कांबळेवाडी व द्वारका परिसरात करण्यात आली. संशयितांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी सातपूर आणि भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

कांबळेवाडी (भीमवाडी) परिसरातील नासर्डी नदी शेजारील एका घरापाठीमागे काही तरुण जुगार खेळत असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती युनिटच्या पथकास मिळाली. त्यानुसार रविवारी (दि. १३) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. विठ्ठल आहेर व त्याचे चार साथीदार जुगार खेळतांना आढळून आले. संशयितांच्या ताब्यातून २ हजार ९८० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. दुसरी घटना द्वारका परिसरात घडली. तिगराणिया कंपनी पाठीमागील मोकळ्या जागी काही जण जुगार खेळत असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली. त्यानुसार, रविवारी (दि. १३) सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला. रामराव नरवाडे व त्याचे चार साथीदार जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून २ हजार १०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

प्रवासात ५० हजारांची चोरी

नाशिकहून मुंबई प्रवासादरम्यान एका व्यक्तीचे ५० हजार रुपये अज्ञात चोरट्याने लांबविले. मुंबईतील गोरेगाव पूर्व येथे असलेल्या एनएनपी नागरी निवारा, उत्तरा सोसायटीजवळ ४० वर्षीय अण्णासाहेब कृष्णाजी चकोर राहतात. नाशिकहून मुंबईतील गोरेगाव येथे जाण्यासाठी ते रविवारी (१३ मे) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आग्रा महामार्गावरील गरवारे पॉईंट येथून सफारी कारमध्ये बसले. त्यांच्यासोबत आणखी संशयित सहप्रवासी होते. प्रवासादरम्यान गाडीतील एका संशयित प्रवाशाने चकोर यांच्या बॅगेतून ५० हजार रुपये काढून घेतले. काही वेळाने ही घटना चकोर यांच्या लक्षात आली. त्यांनी अंबड पोलिस ठाणे गाठत घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार गाडीतील अज्ञात संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जाधव पुढील तपास करीत आहेत.

दुचाकी लंपास

पार्क केलेली अपघातग्रस्त अ‍ॅक्टिव्हा चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना मधुबन कॉलनीत घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शोभा हेमंतकुमार गायकर (रा. जाणता राजा कॉलनी, पंचवटी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. मधुबन कॉलनीतून दुचाकीवर प्रवास करीत असताना हेमंत गायकर यांचा शुक्रवारी (दि. ११) दुपारी कुणाल अपार्टंमेंट परिसरात अपघात झाला. यावेळी गंभीर दुखापत झाल्याने गायकर दाम्पत्याने त्यांची अॅक्टिव्हा (एमएच १५ एफआर ६९१९) कुणाल सोसायटीत पार्क करून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेले. दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्यांनी सोसायटी आवारात पार्क केलेली दुचाकी पळवून नेली.

मोबाइल लांबवला

उघड्या खिडकीत हात घालून चोरट्यांनी मोबाइल पळवून नेल्याची घटना एकलहरा रोडवरील अरिंगळे मळा भागात घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आसिफ आलिम शेख (रा. मजिंद जवळ, अरिंगळे मळा) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शेख यांनी शनिवारी रात्री आपल्या घरातील बेडरुममध्ये मोबाइल चार्जिंगला लावलेला होता. चोरट्यांनी घराची खिडकी उघडी असल्याची संधी साधत टेबलावर ठेवलेला मोबाइल चोरून नेला.

दुचाकीसह तरुण पाटात कोसळला

पंचवटीतील मखमलाबाद रोडजवळील पाण्याच्या पाटात भरधाव दुचाकी कोसळल्याने झालेल्या अपघातात तरुण ठार झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. कृष्णा संजय तांदळे (वय २४, रा. धोडांबे, ता. चांदवड) असे मृत तरुणाचे नाव आहे. पंचवटी पोलिस ठाण्याचे हवालदार अरुण गायकवाड यांनी फिर्याद दिली. कृष्णा याने (दि. १९ एप्रिल) रात्री नऊ वाजता त्याच्याकडील दुचाकी (एमएच १५ जीएफ ५८२३) ही आसाराम बापू आश्रमाजवळील पुलाकडून पाटालगतच्या मखमलाबादकडे जाणाऱ्या मार्गाकडून भरधाव वेगात चालविली. मखमलाबाद रोडजवळील पाटाजवळ आला असता त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. तो दुचाकीसह पाटात कोसळला. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तसेच अपघातात दुचाकीचे नुकसान झाले. या अपघाताप्रकरणी अखेर तपासाअंती गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार ए. बी. गायकवाड करीत आहेत.

मद्यपी चालकाला अटक

शहरातील ठक्कर बाजार बस स्टॅण्डजवळ मद्याच्या नशेत सफारी कार चालविणाऱ्या पवननगर येथील एकाला अटक केली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्याचे विलास शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित सुदर्शन राजाराम पवार (वय २६, रा. एन-४२/३/७, लोकमान्यनगर, पवननगर, सिडको, नाशिक) हा रविवारी (दि. १३) दुपारी ठक्कर बाजार बस स्टॅण्डजवळून आपल्या ताब्यातील टाटा सफारी कार (एमएच २० बीएल ८१५५) मद्याच्या नशेत चालविताना आढळून आला.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images