Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शहरातून १६ तलवारी हस्तगत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

पंजाबमधून तलवारी आणून त्या नाशिकमध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका पंजाबी तरुणासह स्थानिकास इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे १६ तलवारी आढळून आल्या असून, त्या शहरात कशासाठी आणल्या होत्या, याचा तपास पोलिस करीत आहेत. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी दोघांना अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्‍त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गोरे यांनी सांगितले, की वडाळा-पाथर्डी रोडवरील सराफ लॉन्सजवळ दोन जणांकडे तलवारी असल्याची माहिती गुन्हे शोधपथकाचे पोलिस उपनिरीक्षक आर. सी. शिंदे यांना मिळाली होती. त्यानी तातडीने कर्मचाऱ्यांसह जाऊन पाहणी केली. सराफ लॉन्सजवळ गुरूचरणसिंग बलकारसिंग (वय २६, रा. गुरुद्वारा थाडा साहिब, लोदिपूर, जि. रूपनगर, पंजाब) व महेंद्र सुदाम धबडगे (२८, रंगरेज मळा, इंदिरानगर) हे दोघे उभे असल्याचे आढळले. पोलिसांनी या दोघाची चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी त्यांच्याजवळील १६ तलवारी पोलिसांना दाखवल्या. या वेळी पोलीसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सर्व तलवारी जप्त केल्या आहेत. शहरात या तलवारी कोणाच्या सांगण्यावरून आणल्या किंवा यात त्यांचा नाशिकमध्ये आणखी कोण साथीदार आहे, याच तपास पोलिस करीत आहेत.

या दोघांना पकडण्यासाठी इंदिरानगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक आर. सी. शिंदे, आर. पी. निकम, रमेश टोपले, राजू राऊत, विनोंद खांडबाले, भगवान शिंदे यांच्यासह इंदिरानगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी सहभागी होते. इंदिरानगर परिसरात काही दिवसांपासून अशा पद्धतीने हत्यारे सापडण्याचे प्रमाण वाढले असून, यातील स्थानिक तरुण वडाळा पाथर्डी रोडवरीलच एका महाविद्यालयात कार्यरत असल्याचे समजते. महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांना त्याने यापूर्वी सिंग याच्याकडून आणलेले हातातील कडे किंवा अन्य काही वस्तू विक्रीही केल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाविद्यालयातीलच विद्यार्थ्यांना या तलवारी विक्री करण्याचा या दोघांचा प्रयत्न होता का, याची माहिती घेतली जात आहे. इंदिरानगर परिसरात आढळून आलेल्या या तलवारींमुळे मोठी घटना टळल्याची चर्चा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामपंचायती होणार मालामाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील सर्व अकृषक प्लॉटवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२४ व महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० नुसार करआकारणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील अकृषक प्लॉटवरील कर वाढणार असून, ग्रामपंचायतींचे उत्पन्न त्यातून वाढणार आहे. शेतसारा न भरणाऱ्या सर्वच अकृषक जमिनींवर रेडिरेकनर दरानुसार करआकारणी होणार असल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल होणार आहेत.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी या अकृषक बिनशेती करण्यात येत आहेत. मात्र, अशा बिनशेती झालेल्या प्लॉटवर ग्रामपंचायती कोणत्याही प्रकारचा कर आकारत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीस या अकृषक प्लॉटधारकांकडून नियमानुसार कराची रक्कम मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायतींचे आर्थिक नुकसान होत आहे. पर्यायाने ग्रामपंचायतीस करापासून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे यापुढे जिल्ह्यातील सर्व अकृषक प्लॉटवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२४ व महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० नुसार करआकारणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी दिले आहेत. ग्रामपंचायत हद्दीत

कारखान्यांवरही कराची संक्रात

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कारखान्यांना कलम १२५ नुसार ठोक अंशदानाऐवजी कलम १२४ नुसार कर लावून वसुलीची कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ. गिते यांनी दिले आहेत. ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील कारखान्यांना विविध सुविधांच्या वापरापोटी संबंधित ग्रामपंचायतींना कराऐवजी ठोक रकमेच्या स्वरूपात अंशदान देण्याबाबतची तरतूद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १२५ मध्ये होती. आता ती रद्द करण्यात आली आहे.

अशी होती तरतूद

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कारखान्यांच्या ठोक अंशदान तरतुदीनुसार अंशदानाचा आकडा ठरविला जात असे. ही रक्कम दिल्यानंतर उद्योगांना ग्रामपंचायतीचे वेगळे कर द्यावे लागत नसे. पाच दशकांपासून ही तरतूद अस्तित्वात होती. मात्र, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १२५ मधील पंचायतीच्या क्षेत्रातील कारखान्यांनी संबंधित ग्रामपंचायतींना ठोक रकमेच्या स्वरूपात अंशदान देण्याबाबतची तरतूद वगळण्यासह कलम १७६ च्या पोटकलम (२)च्या खंड (२७) अन्वये कलम १२५ च्या संदर्भात नियम करण्याची असलेली तरतूद सरकारने वगळली आहे.

वाडिवऱ्हेचा प्रस्ताव फेटाळला

वाडिवऱ्हे (ता. इगतपुरी) व तेथील कारखानदार यांच्यात झालेल्या ठोक अंशदान करारनाम्याबाबत मंजुरीसाठी ग्रामपंचायत विभागाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, सरकारच्या अधिसूचनेनुसार कलम १२५ वगळण्यात आल्याने हा प्रस्ताव कलम १२४ प्रमाणे वसुली करण्यासाठी परत करण्यात आला आहे. याबाबत इगतपुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसह सर्व पंचायत समित्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२४ नुसार ग्रामपंचायतींनी आपल्या हद्दीतील कारखान्याकडील इमारतींवर कर आकारणी करून वसुलीची कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

रेडिरेकनरचे दर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात २१४ बालकेंद्र होणार सरू

$
0
0

कुपोषित बालकांसाठी 'झेडपी'चा उपक्रम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या धोरणानुसार ० ते ६ वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांसाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात आजपासून २१४ एवढे ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील ग्राम बालविकास केंद्र सात जूनपासून ग्राम बालविकास केंद्र सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. नरेश गिते यांनी दिली.

या केंद्रांमार्फत बालकांना अतिरिक्त आहार पुरवठा, वैद्यकीय देखरेख, पालकांचे पोषणविषयक समुपदेशन या पायाभूत गोष्टींवर भर देण्यात येणार आहे. या उपक्रमाची आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात तीन स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात बालकांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात आले सर्व बालकांची वजन, उंची, दंडघेर, पायावरील सूज या निकषावर पडताळणी करण्यात येऊन त्यामध्ये तीव्र कुपोषित आढळून येणाऱ्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील २६ प्रकल्पांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये ४४१३ एवढी बालक आतापर्यंत तीव्र कुपोषित आढळून आली तर ११२२६ बालक मध्यम कुपोषित आढळली आहेत. मात्र, काही ठिकाणी अपेक्षित संख्या न आढळल्याने पुन्हा सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच शासनाने निर्देशित केलेली औषध ७ जूनपर्यंत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सात जूनपासून ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महिला बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे यांनी दिली.

दररोज आठ प्रकारचा आहार

ग्राम बालविकास केंद्रात द्यावयाच्या आहार व औषधांबाबत शासनाकडून वेळापत्रक आखून देण्यात आले आहे. या अंतर्गत केंद्रामधील तीव्र कुपोषित बालकांना आठ प्रकारचा पोषण आहार दररोज द्यावयाचा आहे. यामध्ये बालकांना दररोज तीन वेळा घरचा आहार, अंगणवाडीतील आहार दोन वेळा, अंगणवाडीतील ग्राम बाल विकास केंद्रांतर्गत दिला जाणारा विशेष आहार तीन वेळा असा एकूण आठ वेळा आहार द्यावयाचा आहे. अमायलेजयुक्त आहार कसा तयार करावा, याच्या पद्धतीही देण्यात आल्या आहेत. तसेच औषधांचे डोस देण्याबाबतही द्यावयाचे आहेत. याबाबत सर्व संबंधिताना प्रशिक्षण देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

लोगो : शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सूनपूर्व सरींची नाशिकमध्ये हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसह राज्यात ठिकठिकाणी शुक्रवारी मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावली. पुणे व नगर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला.

नांदगाव तालुक्यात पळाशी व नागापूर परिसरात शुक्रवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. मनमाडसह नांदगाव परिसरात काही काळ जोरदार वादळाचे आगमन झाले. त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी आल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. मालेगाव तालुक्यात दाभाडी पिंपळगाव परिसरात पावसाचा शिडकावा झाला. नगर जिल्ह्यात राहुरी, अकोले, राजूर, भंडारदरा, रंधा, वाकी, रतनवाडी, शेलद, जामगाव, पाडाळणे या परिसरात वादळी वाऱ्यासह प्रचंड पाऊस झाला. दरम्यान, महाराष्ट्रात सहा जूननंतर दमदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतीकामांची लगबग वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार जूनपासून निरूपण

$
0
0

नाशिक : रविवार कारंजा येथील चित्तपावन मंगल कार्यालयात ४ ते १० जूनदरम्यान श्रीकृष्णलीला रहस्य श्रीमद् भागवत दशम स्कंधवर निरूपण होणार आहे. या निमित्ताने सकाळी साडेआठ वाजता श्रीमद् भागवत ग्रंथयात्रा, पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. श्री साक्षी गणेश, कानडे मारुती लेन, दहीपूल, श्री मुरलीधर मंदिर, गायधनी गल्ली ते चितपावन मंगल कार्यालय असा हा पालखी मार्ग आहे. पुरुषोत्तम मासाची पर्वणी साधून हा प्रवचन होणार आहे. श्रीमद् सद्गुरू यती माधवानंद तीर्थ स्वामी महाराज प्रवचन देणार आहेत. या श्री सदगुरू समाधी मंदिर, त्र्यंबकेश्वर भक्त परिवार व श्री कृष्णलीला केंद्र भक्त परिवार नियोजन करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वा लाखाचे दागिने लंपास

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंदिरानगर परिसरातील बापू बंगला येथील बंद दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृत्विज रत्नाकर कासोदकर (रा. यशोधन अपार्ट., बापू बंगल्याजवळ) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. कासोदकर यांचे त्यांच्या राहत्या इमारतीतच दुकान आहे. चोरट्यांनी बुधवारी रात्री शटरच्या पट्ट्या व कुलूप तोडून दुकानातील सुमारे एक लाख १५ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. सहाय्यक निरीक्षक जगताप तपास करीत आहेत.

भाजल्याने महिलेचा मृत्यू

स्वयंपाक करीत असताना स्टोव्हचा भडका उडाल्याने शहनाज इस्माईल शाह (रा. सादिकनगर, वडाळा गाव) या ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना वडाळा गावातील सादिकनगर भागात घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहनाज शाह या गुरुवारी (दि. ३१) सकाळी घरात स्वयंपाक करीत असताना ही घटना घडली. हवालदार राणे तपास करीत आहेत.

सातपूर आयटीआयमध्ये चोरी

औद्योगिक प्रशिक्षण कार्यशाळेच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी विविध अभ्यासक्रमांची सुमारे २८ हजारांची उपकरणे लंपास केली. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयटीआयचे कर्मचारी संजय मेतकर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चोरट्यांनी मंगळवारी रात्री कार्यशाळेच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आणि मागील शटर वाकवून ही चोरी केली. हवालदार पवार तपास करीत आहेत.

दुचाकीसह रिक्षाची चोरी

एका मोटारसायकलसह चोरट्यांनी ऑटो रिक्षा व स्प्लेंडर लंपास केल्या प्रकरणी मुंबई नाका आणि पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्वारका भागातील छोटूभाई पीरमहंमद शेख मंगळवारी दुपारी गोल्फ क्लब परिसरात गेले होते. त्र्यंबक रोडवरील प्रवेशद्वारावर त्यांनी स्प्लेंडर (एमएच १५/सीए ६१२७) उभी केली असता चोरट्यांनी ती लंपास केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, जमादार आवारे तपास करीत आहेत. दुसरी घटना गोदा पार्क परिसरात घडली. सातपूर राजवाड्यात राहणारे रिझवान काबीर शेख गुरुवारी दुपारी रामवाडी भागातील गोदा पार्क येथे गेले होते. सार्वजनिक शौचालय भागात पार्क केलेली त्यांची ऑटो रिक्षा (एमएच १५/ईएच ३३६१) चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार थेटे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक - शेतकरी आंदोलन

$
0
0

शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य किसान सभेने संप पुकारत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव, चांदवड, इगतपुरी, दिंडोरी, सिन्नर या तालुक्यांकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणारी जिल्हा बँक अडचणीत आल्यामुळे कर्ज मिळणे अवघड झाले आहे. गावपातळीवरील विविध कार्यकारी सोसायटी कर्जमुक्तीच्या धोरणामुळे अडचणीत आल्या आहेत. या सर्वप्रकाराला सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या आंदोलनात राजू देसले, भास्कर शिंदे, देवीदास भोपळे, विजय दराडे, सुकदेव केदारे, नामदेव राक्षे सहभागी झाले होते.

१० दिवस असणार संप

शेतकरी संपाचा दूध संकलनावर मोठा परिणाम झाला. शुक्रवारी संपामुळे जिल्ह्यातून दररोज होणारे १ लाख ३४ हजार लीटर दुधाचे संकलन झाले नाही.

हमीभावासह, दूधाला भाव द्यावा यासह विविध मागण्यांसाठी किसान महासंघाने १ ते १० जून पर्यंत हा संप असणार आहे. त्यामुळे शहराकडे जाणारे दुधाचे टँकर आणि भाजीपाल्याचे ट्रक रोखून शहरात होणारा दूध, भाजीपाला पुरवठा रोखण्याचा इशारा किसान महासंघाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१९,५३८ जणांची अकरावीसाठी नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य मंडळाच्या बारावीच्या निकालासह इतर मंडळांचेही दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. आता पालक, विद्यार्थ्यांचे लक्ष राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालावर लागून आहे. निकालापूर्वीच अकरावी प्रवेशासाठी अर्ज नोंदणी सुरू असून १ जून सायंकाळपर्यंत नाशिक महापालिका क्षेत्रातील १९ हजार ५३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन माध्यमातून करण्यात येते. यंदा या प्रक्रियेतून देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड वगळण्यात आले असून केवळ नाशिक महापालिका क्षेत्रातील २७ हजार जागांसाठी ही प्रक्रिया होत आहे. दहावीचा निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करता येणार आहे. १९ हजार ५३८ पैकी ११ हजार ५४१ विद्यार्थ्यांचे अर्जांची शाळांमार्फत पडताळणी झाली असून २ हजार ६८१ अर्ज व्हेरिफाय तर उर्वरित ५ हजार ३१६ विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी व्हायची आहे. राज्यभरात अकरावीचे १ लाख ८८ हजार ६१७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहनाच्या धडकेने युवकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भरधाव एसयूव्ही कारने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात वेळूंजे (ता. त्र्यंबकेश्वर) येथील १६ वर्षांचा युवक जागीच ठार झाला. या अपघातात आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी असून, त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते.

सोमेश्वर काळू शिंदे (१६) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन धोंडिराम काशिद (२४) आणि सोमेश्वर (दोघे रा. वेळुंजे, ता. त्र्यंबकेश्वर) हे दोघे मित्र नाशिककडून त्र्यंबककडे आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. ब्रह्मा व्हॅली कॉलेज परिसरात पाठीमागून भरधाव आलेल्या स्कॉर्पिओने यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला सोमेश्वर शिंदे जागीच ठार झाला, तर दुचाकी चालवित असलेला सचिनही गंभीररित्या जखमी झाला. दोघांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले असता, डॉक्टरांनी सोमेश्वरला मृत घोषित केले. तर, सचिनची प्रकृती गंभीर असल्याने त्यास खासगी हॉस्पिटल हलविण्यात आले. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी स्कॉर्पिओ वाहन ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वॉटर्स एज’ने जिंकली २७ सुवर्णपदके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुण्यातील आरसीबीसी बोट क्लब येथे झालेल्या राज्यस्तरीय नौकानयन स्पर्धेत नाशिकच्या वॉटर्स एज बोट क्लबच्या खेळाडूंनी २७ सुवर्णपदक व ३ रौप्यपदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. या स्पर्धेतून वॉटर्स एज क्लबच्या २४ खेळाडूंची ४ १० जूनदरम्यान चेनई येथे होणाऱ्या राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

निवड झालेल्या खेळाडूंचे सराव शिबिर वॉटर्स ऍज बोट क्लबचे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक अंबादास तांबे, अविनाश देशमुख, पूजा जाधव, मनीष बोरस्ते, स्मिता माळी यांच्या मार्गदर्शनखाली वॉटर्स एज बोट क्लब येथे होत आहे. नाशिकचे माजी महापौर प्रकाश मते, रमेश मते, माजी नगरसेवक विक्रांत मते, अविनाश देशमुख, पूजा जाधव, मनीष बोरस्ते, स्मिता माळी, अनिल काकड, प्रताप देशमुख, शशिकांत टलें, मिलिंद कदम, बापू मानकर, तुषार ठाकरे आदींनी खेळाडूंचा गौरव केला.

निवड झालेले खेळाडू :

पुरुष गट :

डबल सकल : रौप्य- प्रसाद जाधव, आकाश चव्हाण

कॉल्सस पेयर : सुवर्ण- निखिल कानडे, नवनाथ संत

कॉल्सस फोर : सुवर्ण- अनिकेत तांबे, मयूर म्हसाळ, मुकेश राजगुरू, चंद्रकांत काकड

महिला गट

सिंगल स्कल : सुवर्ण- जागृती शहारे

डबल स्कल : रौप्य- वृषाली राऊत, शुभांगी जगझाप (मंडलिक)

कॉल्सस पेयर : सुवर्ण- प्रणाली तांबे, पूनम तांबे

सबजुनिअर मुले :

कॉल्सस पेयर : सुवर्ण- रोशन तांबे, अक्षय कानमहाले

कॉल्सस फोर : सुवर्ण- रोशन तांबे, अक्षय कानमहाले, नीलेश राऊत, अनिकेत कानमहाले

मुली :

कॉल्सस पेयर : सुवर्ण- गायत्री गलांडे, निधी भोसले

कॉल्सस फोर : सुवर्ण- गायत्री गलांडे, निधी भोसले, सिद्धी खैरे, साक्षी राऊत

डबल स्कल : सुवर्ण- सानिका तांबे, आर्या भोसले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिल्ह्यात ‘वादळी’ हजेरी

$
0
0

- सात जनावरे मृत्युमुखी

- येवल्यात भिंत पडल्याने एक जण जखमी

- सटाणा, येवल्यात झाडे उन्मळून पडली

- घर, शाळा, कांदाचाळींचे पत्रे उडाले

- पॉलिहाऊस, शेडनेटचेही नुकसान

टीम मटा

नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात शुक्रवारी मान्सूनपूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. येवला तालुक्यात वादळामुळे झाडे उन्मळून पडली, तर अनेक गावांमध्ये घरांचे पत्रे उडाले. सवंदगाव (ता. मालेगाव) येथे विजेचा खांब कोसळून पाच बकऱ्या व म्हैस, तर येवल्यात डोंगरगाव येथे एका बैलाचा मृत्यू झाला. तसेच शेडनेट, पॉलिहाऊसचेही नुकसान झाले.

यंदा मान्सून केरळमध्ये तीन दिवस आधीच दाखल झाला. महाराष्ट्रात ६ ते ७ जून रोजी मान्सून दाखल होणार आहे. मात्र, मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील येवला, नांदगाव, मालेगाव तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह हजेरी लावत दाणादाण उडवली. सर्वाधिक नुकसान येवला तालुक्यात झाले. येवल्यातील अनेक गावांत घरांचे पत्रे उडाले. तसेच झाडे उन्मळून पडली. डोंगरगाव येथे वादळामुळे एका बैलाचा मृत्यू झाला. दुगलगाव येथे शाळेचे पत्रे उडाले. बोकटे येथे शेडनेटचे नुकसान झाले. देवळाणेत पॉलिहाऊसचे नुकसान झाले. ममदापूर, कोळंब येथे हलकी गारपीट झाली. बागलाण तालुक्यातही एक दोन ठिकाणी वादळामुळे झाडे उन्मळून पडली.

मालेगाव तालुक्यात सवंदगाव येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने विजेचा खांब कोसळून धर्मा शेवाळे यांच्या पाच शेळ्या व एक म्हैस मृत्युमुखी पडल्या आहेत. तसेच, नांदगाव तालुक्याही अर्धा तास जोरदार पाऊस झाला. तहसीलदार ज्योती देवरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. निफाड, त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा शिडकावा झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉइंटर्स

$
0
0

अॅक्टिव्ह महिला मंडळ

आम्ही साऱ्याजणी -२

बांधकामांना अभय! ३

पार्किंगच्या जाचातून सुटका? -४

होऊया त्यांचा आधारस्तंभ -५

उसळणाऱ्या लाटांचे दडपण -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संकष्टी चतुर्थीनिमित्त गणेश मंदिरांत गर्दी

$
0
0

नाशिक : संकष्टी चतुर्थीनिमित्त शनिवारी शहरातील सर्व गणपती मंदिरांत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. भाविकांनी पहाटे पाचपासून मंदिरांत दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. ढोल्या गणपती मंदिरात पहाटे अभिषेक व पूजेनंतर मंगलमूर्तीची पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सोमेश्वरजवळील नवश्या गणपती, अशोकस्तंभावरील ढोल्या गणपती, साक्षी गणपती, रविवार कारंजावरील सिद्धिविनायक, उपनगरचा इच्छामणी गणपती आदींसह उपनगरांमधील सर्व मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईतांविरोधात गुन्हा

$
0
0

नाशिक : कोर्टाच्या आवारात ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सराईत आरोपींविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. विकी सानप, कैलास दराडे, विजय कांदळकर, रमेश चांगले, शेखर पवार अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. याबाबत दशरथ पांडुरंग पाटील यांनी फिर्याद दिली आहे. एक जून रोजी दुपारच्या सुमारास पाटील कोर्टात गेले होते. कोर्टातील काम आटोपून ते दुचाकी पार्किंगच्या ठिकाणी गेले असता हे संशयित तेथे आले. तिथे त्यांनी पाटील यांना ठार मारण्याची धमकी दिली. सुनील चांगले सुटला, की तुझा गेमच करणार अशी धमकी देत संशयितांनी शिवीगाळ केली. पीएसआय डी. वाय. पवार तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरवठादारास अटक

$
0
0

नाशिक : मेफेड्रोन अर्थात एमडी या ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्याचा पोलिसांचा पाठपुरावा सुरूच असून, एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारी क्रुड पावडर तयार करणाऱ्या संशयितास क्राइम ब्रँचच्या युनिट एकने अटक केली. गुजरातमधील अंकलेश्वर येथील जीआयडीसीतील एका कंपनीत हा काळा उद्योग सुरू होता. एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणात आतापर्यंत आठ संशयितांना अटक झाली असून, तब्बल तीन कोटी २९ लाख २७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजीवकुमार बद्रीनारायण झा (प्लॉट क्रमांक ए ४०२, पंचशील रेसिडन्सी, जीआयडीसी, अंकलेश्वर, गुजरात) असे संशयिताचे नाव आहे. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार अरविंदकुमार प्रकाशचंद्र लोहरे (रा. मूळ, मुझ्झफरनगर, उत्तर प्रदेश, हल्ली मुंबई) या संशोधकाला क्रुड पावडर पुरविण्यात झा याचा मोठा हात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. संशयित झा यास कोर्टाने ४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अभ्यासिकांसाठी संयुक्त प्रकल्प

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने बेकायदा वापर केल्या जाणाऱ्या समाजमंदिर, व्यायामशाळा, वाचनालये, अभ्यासिका आदी मिळकती ताब्यात घेण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली असून, आतापर्यंत ९०३ पैकी ३० मिळकती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. एकीकडे बेकायदा वापर बंद करण्यासोबतच समाजोपयोगी कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या या मिळकतींना दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून, या मिळकती आता 'संयुक्त प्रकल्प' म्हणून समाजसेवी संस्था, संघटनांना वाटप केल्या जाणार आहेत. या मिळकतींचा व्यावसायिक वापर टाळण्यासाठी 'ना नफा ना तोटा' तत्त्वावरच त्या दिल्या जाणार असल्या तरी त्यांचे भाडे ठरवण्याचा अधिकार महापालिकेला असेल. त्यामुळे व्यावसायिक वापराला चाप बसणार आहे.

महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या अभ्यासिका समाजमंदिर, व्यायामशाळा व वाचनालये अशा जवळपास ९०३ मिळकती वर्षानुवर्षे नाममात्र भाडेदराने सामाजिक संस्था बळकावून बसल्या आहेत. राजकीय नेत्यांच्याच संस्थांना या मिळकती बहाल करण्यात आल्या असून, त्यांचा वापर सामाजिक कार्याऐवजी व्यावसायिक वापरासाठी केला जात असल्याचे समोर आले होते. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. मात्र, डॉ. गेडाम यांची बदली झाल्याने सर्वेक्षणाची फाइलही बंद झाली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मात्र धूळ खात पडलेली फाइल बाहेर काढत, मिळकती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या सर्व मिळकतधारकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश मिळकतींचे करारनामे संपले आहेत, तरीही त्यांचा बेकायदा वापर सुरू आहे. त्यामुळे महापालिकेने त्या ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली असून, आतापर्यंत ३० मिळकती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्यात सातपूर विभागातील सर्वाधिक १७ मिळकतींचा समावेश आहे, तर सिडकोतील आठ अभ्यासिकांचा समावेश आहे.

आता संयुक्त प्रकल्प

मिळकतींचा सामाजिक कार्यासाठी योग्य पद्धतीने वापर व्हावा यासाठी आता या मिळकती 'संयुक्त प्रकल्प' म्हणून समाजसेवी संस्था, संघटनांना वापरण्यास दिल्या जाणार आहेत. आचारसंहितेचा कालावधी संपल्यानंतर या मिळकतींविषयी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून, इच्छुक संस्था, संघटनांकडून अर्ज मागविले जाणार आहेत. अर्थात, सध्या ज्या संस्था, संघटनांच्या ताब्यात या मिळकती आहेत, त्यांनादेखील या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. या प्रकल्पांतर्गत भाडेवाढीचा अधिकार महापालिकेलाच असून, रेडिरेकनरच्या जाचातून त्यांची मात्र मुक्तता होणार आहे. या संदर्भातील भाडेनिश्चितीचा प्रस्ताव आचारसंहिता संपल्यानंतर स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संकष्टी चतुर्थीनिमित्त गणेश मंदिरांत गर्दी

$
0
0

नाशिक : संकष्टी चतुर्थीनिमित्त शनिवारी शहरातील सर्व गणपती मंदिरांत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. भाविकांनी पहाटे पाचपासून मंदिरांत दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. ढोल्या गणपती मंदिरात पहाटे अभिषेक व पूजेनंतर मंगलमूर्तीची पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सोमेश्वरजवळील नवश्या गणपती, अशोकस्तंभावरील ढोल्या गणपती, साक्षी गणपती, रविवार कारंजावरील सिद्धिविनायक, उपनगरचा इच्छामणी गणपती आदींसह उपनगरांमधील सर्व मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडित वीजपुरवठ्याने नाशिककर त्रस्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महावितरण कंपनीने मान्सूनपूर्व तयारी केली असली तरी मुसळधार पाऊस येण्यापूर्वीच शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा शनिवारी खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. अनेक ठिकाणी वादळवाऱ्यामुळे हा पुरवठा खंडित झाल्याचे बोलले जात आहे. महानगरांबरोबरच जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी विजेचे खांबही कोसळल्याच्या घटना घडल्या असल्याचे महावितरण कंपनीतर्फे सांगण्यात आले.

जिल्ह्यात वादळामुळे चांदवड, वडनेर, दुगाव, म्हैसाणे, शिवरे या गावांत विजेचे खाब कोसळले. लासलगावजवळ खेडलेझुंगे, कोळगावातही अशा घटना घडल्या. पावसाला अद्याप सुरुवात झाली नसली तरी सुरुवातीलाच हा झटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होत असतो; पण जिल्ह्यात कोठेही मुसळधार पाऊस झाला नाही. केवळ वादळवाऱ्यामुळे वितरण कंपनीला फटका बसला. नाशिकमध्ये दिवसभर काही ठिकाणी सातत्याने वीजपुरवठा खंडित होत होता, तर काही ठिकाणी हा पुरवठा बराच काळ खंडित होता.

शहरात परीक्षा

शहराच्या विविध भागांत दुपारी साडेचारच्या सुमारास सोसाट्याचा वारा वाहत होता. याच वेळी तुरळक पावसाने हजेरी लावली. याच दरम्यान शहराच्या जवळपास सर्वच भागांत वीज खंडित झाली. शहरात सध्या उन्हाची तीव्रता अधिक आहे. नाशिकचे शनिवारी कमाल तापमान ३८.१, तर किमान तापमान २४.८ एवढे नोंदले गेले. वीजपुरवठा गायब झाल्याने नाशिककरांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. कॉलेज रोड, गंगापूर रोड परिसरात तर दुपारीच वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. सायंकाळी तर तो अनेक तासांसाठी खंडित झाला. त्यामुळे नाशिककर घामाघूम झाले होते. वीजपुरवठा नसल्याने सोसायट्यांमधील लिफ्टही बंद पडल्या होत्या. मुंबई नाका, अशोकस्तंभ, सीबीएस परिसर, शरणपूर रोड, कामटवाडे, डिसुझा कॉलनी, महात्मानगर, त्र्यंबकरोड आदी परिसरात विजेसाठी रहिवाशांना मोठी प्रतीक्षा करावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

$
0
0

नाशिक : शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात शनिवारी झालेल्या पावसाने घरांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले. निफाड तालुक्यातील सोनगावमध्ये वीज पडून शिवनाथ गावले या शेतकऱ्याची गाय ठार झाली. शिरवाडे वाकद येथे वादळ वाऱ्यामुळे दोन पोल्ट्री शेडचे नुकसान झाले. येवला तालुक्यातही काही घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली आहे.

नाशिक शहरात पाऊस

यंदाच्या हंगामातील मान्सूनपूर्व पावसाचे शहरातही आगमन झाले. शनिवारी दुपारी पावणेपाचच्या सुमारास मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. शहराच्या बहुतांश भागात वादळवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अर्धा तास पाऊस सुरू होता. त्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले. फेरीवाले आणि अन्य व्यावसायिकांची या पावसाने धांदल उडवली.

क्षणचित्रे

सोनगावात वीज पडून गाय ठार

शिरवाडे वाकद येथे दोन पोल्ट्री शेडचेही नुकसान

वाकद शिरवाडे येथे दोन पोल्ट्री फार्मचे नुकसान

दुंध्ये गावात विजेचे चार खांब कोसळले

शुक्रवारी दिवसभरात येवला तालुक्यात २२ मिमी पावसाची नोंद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेरूची स्टोरीपेरूमध्ये रंगला कैद्यांचा वर्ल्ड

$
0
0

पेरूची स्टोरी

पेरूमध्ये रंगला कैद्यांचा वर्ल्ड कप

वृत्तसंस्था, लिमा

तब्बल ३६ वर्षांनंतर फिफा फुटबॉल वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलेल्या पेरू देशामध्ये या वर्ल्ड कपच्या निमित्ताने एक अनोखी स्पर्धा घेण्यात आली. पेरू देशातील तुरुंगांतील कैद्यांमध्ये वर्ल्ड कपच्या धर्तीवर फुटबॉल स्पर्धा खेळवण्यात आली. यातील प्रत्येक संघास वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या देशांची नावे देण्यात आली होती.

सुमारे महिनाभर रंगलेल्या या स्पर्धेचा मागील आठवड्यात समारोप झाला. पेरू संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लुरिगँको तुरुंगाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी रशियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चाइमबोट तुरुंगाला पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत केले. विजेत्यांना चषक, सुवर्णपदके आणि क्रीडा गणवेश बक्षीस म्हणून देण्यात आला. देशातील सोळा महत्त्वाच्या तुरुंगांमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात आली होती. या संघांना विविध देशांच्या नावाबरोबरच त्यांचे गणवेशही देण्यात आले. त्याचप्रमाणे, सामन्याच्या सुरुवातीस संबंधित देशाचे राष्ट्रगीतही वाजवण्यात आले. वर्ल्ड कपप्रमाणेच अँकन, चाइमबोट, इका आणि लिमा या चार गटांमध्ये संघांचे विभाजन करण्यात आले होते. स्पर्धेतील सामन्यांसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लिमा स्टेडियम या ६०,००० आसनक्षमतेच्या मैदानावरही स्पर्धेतील सामने खेळवण्यात आले. तथापि, सुरक्षेच्या कारणास्तव या सामन्यांसाठी मोजक्याच प्रेक्षकांना उपस्थित राहता आले. तरीही उपस्थित प्रेक्षकांमध्ये प्रत्यक्ष वर्ल्ड कपचाच सामना पाहात असल्याप्रमाणे उत्साह होता. या कैद्यांच्या नावावर विविध गुन्हे आहेत. मात्र, फुटबॉल सर्व देशवासीयांना एकत्र आणतो आणि या स्पर्धेच्या निमित्ताने कैद्यांमध्येही त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळाल्याचे पेरूच्या राष्ट्रीय सुधारगृह संस्थेचे प्रमुख कार्लोस वॅस्क्वेझ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images