Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

साडेतीन वर्षांनंतर लुटीचा गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बेदम मारहाण करीत एकास बळजबरीने लुटल्याची घटना पंचवटी परिसरात घडली. साडेतीन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेबाबत कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याने राजू तुकाराम मंजुळे या संशयिताविरोधात पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय मुरलीधर चव्हाण (रा. शनी मंदिरामागे, नवनाथनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. संशयित राजू मंजुळे याने २४ नोव्हेंबर २०१४ रोजी ठार मारण्याच्या उद्देशाने चव्हाण यांना बेदम मारहाण केली होती. यावेळी संशयिताने चव्हाणच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या आणि गळ्यातील सोन्याचे लॉकिट बळजबरीने काढून घेतले. याबाबत गुन्हा दाखल करण्यास पंचवटी पोलिसांनी टाळाटाळ केली. यामुळे चव्हाण यांनी कोर्टात धाव घेतली होती. तब्बल साडेतीन वर्षानंतर कोर्टाने पंचवटी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक के. डी. वाघ करीत आहेत.

हॉटेलमध्ये जुगार; सहा जण गजाआड

लॉजिंग व बोर्डिंग असलेल्या हॉटेलमध्ये सुरू असलेला जुगार अड्डा पोलिसांनी उद्धवस्त केला. या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली. संशयितांच्या ताब्यातील रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. वडाळा नाका येथील द स्क्वेअर हॉटेलमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसाना मिळाली होती. त्यानुसार मुंबई नाका पोलिसांनी सोमवारी छापा मारला. यावेळी गुलाम जिलानी मैनुद्दीन मलबारी हा रुम क्रमांक ४०१ मध्ये त्याच्या पाच साथिदारांसमवेत जुगार खेळतांना आढळून आला. हॉटेल मॅनेजर सचिन आव्हाड यांनी जुगारींना साहित्यासह रुम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी पोलिसांनी त्याचेही नाव आरोपींच्या यादीत टाकले आहे. पोलिस नाईक रामदास खुळात यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक काळे करीत आहेत.

बालकामगारांची बेकरीतून मुक्तता

कमी वेतन देऊन बालकामगारांचा आर्थिक, शारिरीक आणि मानसिक छळ करणाऱ्या द्वारका भागातील दोन बेकरीचालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. बालकामगारांची सुटका करण्यात या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जेकब धर्मराज नाडर (४८, रा. खोडेनगर, अशोकामार्ग) आणि मोईनुद्दीन अब्दुल खालिक खान (३२, रा. दयावान बेकरी, हरीनगरजवळ, द्वारका) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बेकरी चालकांची नावे आहेत. द्वारका परिसरातील रत्ना स्विटस बेकरी आणि दयावान बेकरीमध्ये बालकामगारांकडून काम करून घेतले जात असल्याची माहिती शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि. १३) रात्री छापा टाकला असता तेथे बालकामगार आढळून आले. संशयित स्वत:च्या फायद्यासाठी बालकामगारांची नियुक्ती करून त्यांना कमी वेतन देऊन वेळा निश्चित न करता त्यांच्याकडून जास्त श्रमाचे व जिवास धोका होईल, असे काम करून घेताना आढळून आले. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सावंत करीत आहेत.

पिस्तुल बाळगणारा अटकेत

बेकायदा गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या सिडकोतील युवकाला पोलिसांनी किशोर सूर्यवंशी मार्गावर अटक केली. संशयिताच्या ताब्यातून ३० हजार रुपयांचा गावठी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.

रोहित आनंदा उघाडे (२७, रा. उपेंद्रनगर, क्लासिक आर्केडसमोर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पेठरोड ते किशोर सूर्यवंशी मार्गावर तरुण गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सोमवारी (दि. २५) दुपारी येथे सापळा लावला. संशयित पवार लॉन्स पाठीमागील किशोर सूर्यवंशी मार्गाकडे जाणाऱ्या कच्चा रस्त्यावर आढळून आला. त्याच्या अंगझडतीत गावठी कट्टा मिळून आला. या प्रकरणी हवालदार महाले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास हवालदार पठाण करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालेभाज्या मातीमोल...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पावसाच्या दमदार सरींमुळे सोमवारी नाशिक जिल्हा चिंब झाला होता. दिवसभर पाऊस सुरू असल्यामुळे पालेभाज्यांची काढणी करणे अवघड झाले होते. अशा स्थितीत पालेभाज्यांची काढणी करून त्या बाजार समितीच्या आवारात लिलावासाठी आणण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. मात्र, या पालेभाज्या भिजलेल्या असल्यामुळे त्या खरेदी करण्यास व्यापाऱ्यांनी असमर्थता दर्शविल्याने त्या मातीमोल ठरल्या. कोथिंबिरीचा अक्षरशः कचरा झाला. शेवटी ही कोथिंबीर घंटागाडीत फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

जिल्ह्यातील सर्वच भागात सोमवारी पाऊस झाल्याने पालेभाज्या भिजलेल्या होत्या. पाऊस सुरू असताना मुश्किलीने काढणी करून बाजारात लिलावात नेण्यात आलेल्या पालेभाज्यांचा चांगले दर मिळतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. त्यामुळे मजूर उपलब्ध नसताना आख्ख कुटुंब पाण्यापावसात पालेभाज्यांची काढणी करतात. अशीच स्थिती सोमवारी बघायला मिळाली. पावसामुळे पालेभाज्यांची आवक मर्यादित असली, तरी ओल्या पालेभाज्या खरेदी करण्याची जोखीम व्यापाऱ्यांनी घेतली नाही. त्यामुळे अशा ओल्या झालेल्या पालेभाज्या शेतकऱ्यांना अक्षरश: फेकून द्याव्या लागल्या.

पावसाळ्यात भिजलेल्या पालेभाज्या पॅक करून मुंबई किंवा गुजरातच्या बाजारात पाठविताना ओल्या पालेभाज्या सडण्याची भीती असते. परिणामी बाजारपेठेत अशा पालेभाज्या मातीमोल ठरतात. त्यामुळे अशा पालेभाज्या व्यापारी खरेदी करीत नाहीत. अशा स्थिती पावसात न भिजलेल्या कोरड्या पालेभाज्यांना चांगली मागणी असते. मात्र, पावसाच्या संततधारेत पूर्णपणे कोरड्या पालेभाज्या मिळणे अवघड झाले होते. दरम्यान, मंगळवारी पावसाने उसंत दिली असली, तरी सोमवारी झालेल्या पावसामुळे फळभाज्या शेतातून काढणे अवघड झाले होते. त्यामुळे मंगळवारी फळभाज्यांची आवक कमी झाली होती.

सुकविण्याची कसरतही वाया

शेतकऱ्यांनी शेतातून काढलेल्या पालेभाज्या पंख्याखाली सुकवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही पालेभाज्या पूर्णपणे कोरड्या झाल्या नव्हत्या. काही व्यापारी रात्रीच्या पालेभाज्यांच्या लिलावात पालेभाज्या खरेदी करून दुसऱ्या दिवशी किरकोळ विक्रीसाठी बाजार समितीच्याच सेल हॉलमध्ये ठेवतात. याच पालेभाज्या विशेषतः कोथिंबीर ओली असल्यामुळे मंगळवारी रोजी तिची विक्रीच झाली नाही. त्यामुळे ती फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीत दलदल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वेळच्या वेळी स्वच्छता होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे येथे ठिकठिकाणी भाजीपाल्याचे पडलेले अंश सडून त्यांची दुर्गंधी पसरत आहे. सडलेल्या कचऱ्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे या आवारात दलदल तयार झाली असून, येथील अस्वच्छता असह्य ठरत असल्याच्या तक्रारी त्रस्त शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील, तसेच जिल्ह्याबाहेरून येणारा भाजीपाला नाशिक बाजार समितीच्या आवारात विक्री केला जातो. दिवस-रात्र गजबजलेल्या या बाजार समितीतील साफसफाईच्या बाबतीत फारशी दखल घेतली जात नाही. त्यामुळे कचरा तसाच पडून राहतो. विशेष म्हणजे येथे होणारा कचरा हा घनकचऱ्यापेक्षा ओला आणि सडणारा कचरा असल्यामुळे तो त्वरित उचलला गेला पाहिजे. मात्र, तसे होत नसल्यामुळे या कचऱ्याची दुर्गंधी पसरत आहे. पावसाळ्यात या कचऱ्याचा त्रास जास्त प्रमाणात होतो.

बाजार समितीच्या आवारात स्वच्छतागृहांचा अभाव असल्यामुळे सेल हॉल आणि गाळ्यांच्या बाजूच्या भाग अस्वच्छ बनला आहे. त्याचीही दुर्गंधी पसरत असताना आता भाजीपाल्याच्या कचरा सडत असल्यामुळे त्या दुर्गंधीचीही भर पडली आहे. सेल हॉलमध्येही भाजीपाल्याचे अंश पडून त्याची दुर्गंधी वाढू लागली आहे. त्याच जागेवर किरकोळ स्वरुपात भाजीपाला विक्री करणारे विक्रेते बसलेले असतात. अशा अस्वच्छ भागातूनच भाजीपाल्याची विक्री होत आहे. या भागातील स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्याचा त्रास शेतकरी, व्यापारी, ग्राहक यांना सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी असून, हा परिसर त्वरित स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

--

चालणेही झालेय अवघड

बाजार समितीच्या आवारात काँक्रिटीकरण करण्यात आलेले असले, तरी अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांत पाणी साचते. बाजार समितीच्या आवारात वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या वर्दळीत पडलेला कचरा तुडविला जातो. या तुडविलेल्या कचऱ्याची या परिसरात दलदल तयार झाली आहे. त्यातून चालणेही अवघड होत आहे. दोन्ही सेल हॉलच्या मध्ये असलेल्या जागेत पाणी आणि कचरा साचलेला असल्यामुळे तेथेही दलदल निर्माण झाली आहे.

(लीड, २ फोटो आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामकाज मराठीत, अर्ज, अहवाल इंग्रजीत

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व कॉलेजांना व विभागांना कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्याची सूचना केली आहे. यानुसार कॉलेजांनी कार्यालयीन कामकाज मराठीत करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ऑनलाइन प्रवेश अर्ज, राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेस सादर करायचे अहवाल, विद्यापीठाचे परीक्षा अर्ज मात्र इंग्रजीत आहेत. या कागदपत्रांचा मराठी अनुवाद करायचा की इंग्रजीतच कागदपत्र ठेवायचे, याबाबतचा संभ्रम कॉलेज प्रशासनासमोर कायम आहे.

सध्या सर्व कॉलेजांची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. सर्व कॉलेजांचे तसेच अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखांचे प्रवेश अर्ज ऑनलाइन सादर करायचे आहेत. हे अर्ज इंग्रजीत आहेत. तसेच यूजीसीअंतर्गत येणारा अँटिरॅगिंग फॉर्मदेखील इंग्रजीत आहे. यासोबतच विद्यापीठाकडून पुनर्मूल्यांकनासाठीचा व परीक्षेचा अर्ज इंग्रजीतच उपलब्ध आहे. तसेच अनेक कॉलेजांचे राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून होणे बाकी आहे. नॅकसमोर अहवाल व कागदपत्रे सादर करताना इंग्रजीतच असणे बंधनकारक आहे. या कागदपत्रांमध्ये बदल होणार का? अथवा इंग्रजी व मराठी दोनही भाषेत कागदपत्रे तयार करावी लागणार, असा पेच प्रश्न कॉलेज प्रशासनांसमोर निर्माण झाला आहे.

सरकारच्या व विद्यापीठाच्या सूचनेनुसार कार्यालयीन कामकाज मराठी भाषेतूनच होत आहे. कॉलेजेस सर्व नियमांचे तंतोतंत पालन करताहेत. मात्र, नॅक समितीस अहवाल इंग्रजीतच सादर करावा लागतो. यामुळे इंग्रजी व मराठी या दोनही भाषेत सध्या कागदपत्रे तयार केली जात आहे.

- प्रा. व्ही. एन. सूर्यवंशी, प्राचार्य, एचपीटी-आरवायके कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेविकेच्या पतीची अधिकाऱ्यांना दमदाटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक महापालिकेत नगरसेवकांबरोबरच झेरॉक्स नगरसेवकांची अरेरावी अनेकदा अनुभवास येते. सिडको विभागीय कार्यालयातही शिवसेनेच्या एका झेरॉक्स नगरसेवकाने प्रभागात घंटागाडी येत नसल्याच्या कारणाने थेट कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी हा प्रयत्न उधळून लावला. त्यानंतर या व्यक्तीने अधिकाऱ्यांना दमदाटी केली. यापूर्वीही या झेरॉक्स नगरसेवकाने आरोग्याधिकाऱ्याच्या गाडीवर कचरा टाकण्याचा प्रयत्न केला हेाता.

सिडकोतील प्रभाग २७ मध्ये घंटागाडी येत नसल्याची तक्रार करीत प्रभागाच्या नगरसेविका किरण दराडे यांचे पती बाळा दराडे यांनी थेट विभागीय कार्यालयात धाव घेऊन आरोग्य विभागाच्या कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी हा प्रयत्न उधळून लावला. त्यामुळे संतप्त झालेल्या दराडे यांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून याप्रकरणी महासभेत आवाज उठविणार असल्याचा दम दिला. त्याचबरोबर सर्व प्रभागांमध्ये घंटागाडी येत असून, आमच्या प्रभागात का येत नाही, असा सवाल केला. यावेळी अधिकारी व दराडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या प्रकारामुळे महापालिका अधिकाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. सिडकोत मागील काही दिवसांपासून घंटागाडी अनियमित येण्याच्या तक्रारी कमी झाल्या असतानाही आजच ही तक्रार कशी करण्यात आली, याबाबत चर्चा सुरू होती.

सिडकोच्या आरोग्य विभागाच्या यापूर्वीही असलेल्या अनेक अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीने झेरॉक्स नगरसेवकांनी दमदाटी केल्याचे प्रकार घडले आहेत. महानगर पालिकेच्या कामात झेरॉक्स नगरसेवकांचा अनेकदा हस्तक्षेप होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. सिडकोतही अनेक झेरॉक्स नगरसेवक आपणच नगरसेवक असल्याच्या अविर्भावात अधिकाऱ्यांना दमदाटी करीत असल्याच्या घटना घडल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

$
0
0

येवला तालुक्यातील घटना

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला-नांदगाव राज्य मार्गावर मातूलठाण (ता. येवला) शिवारात मंगळवारी (दि.२६) दुपारी साडेतीनच्या सुमारास टाटा मॅजिक व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. भरधाव वेगात समोरासमोर जोरदार धडक होताना अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रवाशी वाहतूक करणारी खासगी टाटा मॅजिक (एमएच १५, सीडी ६५१८) मंगळवारी येवल्याकडून नगरसूलच्या दिशेने जात असतानाच समोरून येणारी होंडा मोटारसायकल (एमएच १७, एल ७१६०) यांच्यात जोरदार धडक झाली. येवला-नांदगाव राज्य मार्गावर येवला तालुक्यातील वडगाव बल्हेच्या पुढे मातूलठाण शिवारात हा अपघात झाला. टाटा मॅजिचा चालक तारिक अहमद मोहम्मद हसन (वय २८, रा. मुल्तानपुरा, येवला) व मोटारसायकल चालक बाळू पंढरीनाथ माळी (वय ३२, रा. वडगाव बल्हे, ता. वला) हे दोघे जागीच ठार झाले. दोन वाहनांमधील धडक इतकी जोरदार होती, की त्यात दोनही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ दोघांना येवला ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत झाल्याचे घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी सुरक्षेवर ‘स्मार्ट’ उपाय

$
0
0

शाळेने घटविल्या तासिका; रस्त्यासाठी कामाने केले शैक्षणिक नुकसान

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

स्मार्ट शहरांच्या यादीत लवकरात लवकर ठाण मांडण्याचे स्वप्न बघताना नाशिक महापालिका प्रशासनाच्या आडमुठ्या कारभारामुळे एका शाळेला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तासिका घटवाव्या लागल्या आहेत. एकीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर दुसरीकडे विद्यार्थ्यांची सुरक्षा, असा पेच उभा राहिल्यानंतर शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत नाईलाजास्तव हा निर्णय घेतला आहे.

स्मार्ट सिटी संकल्पनेंतर्गत शहरातील अशोक स्तंभ ते त्र्यंबकरोड या मार्गावरील रस्त्याच्या कामास ऐन पावसाळ्यात सुरुवात करण्यात आली आहे. या मार्गावर काम सुरू करताना या परिसरात येणाऱ्या शासकीय कन्या विद्यालय, डी. डी. बिटको बॉइज हायस्कूल आणि डी. डी. बिटको गर्ल्स हायस्कूल या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या गैरसोयीचा विचार प्रशासनाने केला नाही. विकासाच्या कामास कुणाचाही विरोध नसला तरीही नियोजनपूर्वक काम झाले असते तर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गाची पर्यायी व्यवस्था करता आली असती. याबाबत शाळा सुरू झाल्यानंतर पालक वर्गातून ओरड झाल्यानंतर प्रशासनाने शाळेच्या मागील बाजूच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमनजिकच्या एका पायवाटेद्वारे विद्यार्थ्यांना मार्ग उपलब्ध करून दिला. मात्र, शहरात सोमवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळल्याने मंगळवारी या पायवाटेची अवस्था बिकट झाली व विद्यार्थ्यांना येथून ये-जा करणे अशक्य बनले. शाळेच्या समोर ऐन पावसाळ्यात खणून ठेवलेला रस्ता तर पर्यायी पायवाटेवर चिखलाचे राज्य. या स्थितीमुळे अखेर दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या डी. डी. बिटको बॉईज आणि गर्ल्स हायस्कूलमधील दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या अखेरच्या एक ते दोन तासिका कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे सुरक्षित प्रवास करता येणार आहे.

शाळेचा परिसर तसा बाराही महिने गजबजलेला आहे. शाळेसमोर जुने सीबीएस, कोर्ट, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्य चौकांमध्ये जाणारे रस्ते असल्याने या मध्यवर्ती परिसरात वाहन थांबविणे तसे रस्ते चांगले असतानाही शक्य होत नाही. यातच ऐन पावसाळ्यात आता रोडचे 'स्मार्ट' काम महापालिकेने उकरून काढल्याने शाळेत ये-जा करणे विद्यार्थ्यांसाठी जिकीरीच बनले आहेत.

तासभर अगोदर सुटी!

शाळेत विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी येणारे पालक व शालेय वाहनांना जवळपास थांबणे शक्य होत नाही. परिणामी, येथून प्रवास करताना धोका निर्माण होतो, हे लक्षात घेऊन दुपारच्या सत्रातील नियमित वेळेप्रमाणे सायंकाळी ५.१० वाजता सुटणारी शाळा आता तासभर अगोदरच सोडण्याची तयारी सुरू होते. अखेरच्या टप्प्यातील शक्य त्या तासिका रद्द करून विद्यार्थ्यांना पालक आणि शालेय वाहनांपर्यंत पोहचवून विद्यार्थी सुरक्षेस प्राधान्य दिले जाते.

शाळेलगतच्या रस्त्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरू असल्याने येथून विद्यार्थ्यांना शाळेत येणे-जाणे कठीण बनले आहे. पर्यायी पायवाटेचीही अवस्था पावसाने बिकट झाली आहे. विद्यार्थी सुरक्षेच्या मुद्द्याला प्राधान्य देत दुपारच्या सत्रातील शेवटच्या टप्प्यात शक्य त्या तासिका कमी करण्यात आला आहे. शालेय वाहने किंवा पालकांपर्यत विद्यार्थ्यांना सुरक्षित पोहचविण्यासाठी हा निर्णय शालेय प्रशासनास घ्यावा लागला आहे.

- रेखा काळे, मुख्याध्यापिका, डी. डी. बिटको बॉईज हायस्कूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू जयंती

$
0
0

महापालिका कार्यालय (फोटो)

नाशिक महापालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवन येथील स्वागत कक्षात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. उपायुक्त हरिभाऊ फडोळ, आर. एम. बहिरम, महेशकुमार डोईफोडे, मुख्य लेखापरीक्षक महेश बच्छाव, मुख्य लेखाधिकारी डॉ. सुहास शिंदे, सहाय्यक संचालक नगररचना सुरेश निकुंभे, आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कोठारी, अधीक्षक अभियंता एस. एम. चव्हाणके, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, प्रशांत मगर, बाजीराव माळी, पर्यावरण अधिकारी नितीन वंजारी, विलास खेडलेकर आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महावितरण कार्यालय

महावितरणच्या परिमंडळ कार्यालयात मानव संसाधन विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थय्क प्रवीण बागुल यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. कार्यकारी अभियंता धनंजय आहेर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक सुरेश रोकडे, मंगेश गाडे, वित्त व लेखा विभागाच्या उपव्यवस्थापक माधुरी कुलकर्णी, विशाल मरकड, सहाय्यक विधी अधिकारी प्रशांत लहाने आदी उपस्थित होते. लहाने यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची महती विशद केली.

--

भुजबळ फार्म (फोटो- समता परिषद)

राजर्षी शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते, असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी केले. भुजबळ फार्म येथील अभिवादनपर कार्यक्रमात ते बोलत होते. समता परिषदेचे शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक सेलचे प्रदेश पदाधिकारी मुख्तार शेख, मकरंद सोमंवशी, महेश भामरे, भालचंद्र भुजबळ, संदीप सोनवणे, मोहम्मद आरिफ खान, चेतन बागुल आदी उपस्थित होते.

--

राष्ट्रवादी काँग्रेस (फोटो)

शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शहराध्यक्ष रंजन ठाकरे व बाळासाहेब कर्डक यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. शहराध्यक्ष ठाकरे, बाळासाहेब कर्डक, योगेश निसाळ यांनी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य विशद केले. संजय खैरनार, अर्जुन टिळे, मुख्तार शेख, पुरुषोत्तम कडलग, गौरव गोवर्धने, धनंजय निकाळे, मकरंद सोमवंशी, अरविंद सोनवणे, किरण मानके, अनिता भामरे, अल्ताफ पठाण, सुरेखा निमसे, सुषमा पगारे, रवींद्र गायधनी, प्रफुल्ल पाटील, दिलीपराव सावळे पाटील, राजाभाऊ जाधव आदी उपस्थित होते.

--

फुले विद्यामंदिर (फोटो)

पखालरोडवरील मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यामंदिरात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. मुख्याध्यापक सुनील शेवाळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपशिक्षक मोहन माळी यांनी राजर्षींचे कार्य विशद केले. विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या जीवनातील गोष्टी कथन केल्या. प्रकाश खैरनार यांनी प्रास्ताविक केले. संगीता महाजन यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती महाले यांनी आभार मानले. विद्या महाजन, जयश्री पवार, नीलिमा पडोळ यांचे सहकार्य लाभले. सांस्कृतिक प्रमुख वैशाली राजभोज यांनी संयोजन केले.

--

मराठा हायस्कूल (फोटो)

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या गंगापूररोडवरील मराठा हायस्कूलमध्ये सामाजिक न्यायदिनाचा कार्यक्रम झाला. मुख्याध्यापक अरुण पिंगळे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक रमेश वडजे, नानाजी देसले, दत्तात्रय पवार, सुनील बस्ते, नितीन शिंदे, सोपान वाटपाडे उपस्थित होते.या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारल्या होत्या. शाळेतर्फे प्रभातफेरी काढण्यात आली. मुख्याध्यापक पिंगळे यांनी शाहू महाराजांच्या कार्याची महती विद्यार्थ्यांना सांगितली. के. डी. दरेकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सीडीओ मेरी शाळा

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ मेरी शाळेत मुख्याध्यापिका आशा डावरे, शिक्षक प्रतिनिधी व शिक्षक मंडळ उपाध्यक्ष दिलीप अहिरे, पर्यवेक्षिका कृष्णा राऊत, मुग्धा काळकर यांनी प्रतिमापूजन करून अभिवादन केले. विद्यार्थिनी चैतन्या तुपसाखरे, गौरी मोरे, अर्पिता ह्याळीज यांनी मनोगत व्यक्त केले, वेदश्री पवार हिने सूत्रसंचालन केले. वर्गशिक्षिका शोभा भदाणे यांनी संयोजन केले. यावेळी भित्तिचित्रांचे प्रकाशन करण्यात आले

--

खेडगाव महाविद्यालय

मविप्र संस्थेच्या खेडगाव (ता. दिंडोरी) महाविद्यालयात प्राचार्य डॉ. डी. एन. कारे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. एनएसएस अधिकारी प्रा. विकास शिंदे, विठ्ठल जाधव, डॉ मनीषा आहेर, ज्योती भोर, माधुरी जाधव, अनिल बचाटे, किरण भामरे, संभाजी खरात, दीपक भरसाठ, पंकज सूर्यवंशी उपस्थित होते. कारे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा दिला.

--

सटाणा नगरपालिका (फोटो)

सटाणा : सटाणा नगरपालिकेत नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्षा संगीता देवरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. आरोग्य सभापती दीपक पाकळे, नगरसेविका पुष्पा सूर्यवंशी, सुरेखा बच्छाव, निर्मला भदाणे, सामाजिक कार्यकर्ते संदीप देवरे, के. यू. सोनवणे, आरोग्य विभागप्रमुख एस. पी. कोर, जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडणीस, संजय सोनवणे, मनोहर बोरसे, अनिल कायस्थ, ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

--

सिन्नर सार्वजनिक वाचनालय (फोटो)

सिन्नर : सिन्नर सार्वजनिक वाचनालयात वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. छत्रपती शाहू महाराजांच्या कर्तृत्वाची माहिती भगत यांनी आपल्या मनोगतातून सांगितली. यावेळी उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे , संचालक पी . एल . देशपांडे, मनीष गुजराथी, जितेंद्र जगताप, कर्मचारी आणि वाचकवर्ग उपस्थित होता.

--

कथले विद्यालय, मिठसागरे

सिन्नर : मविप्र समाजाचे पी. बी. कथले माध्यमिक विद्यालय मिठसागरे (ता. सिन्नर) येथील अभिवादनपर कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. येवले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांच्या विविध क्षेत्रांतील योगदानाची माहिती दिली.

--

नूतन जवाहर विद्यालय

सिन्नर : मविप्रच्या नूतन जवाहर विद्यालय, मनेगाव येथे सामाजिक न्यायदिन साजरा झाला. किशोर जाधव अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेणूनाथ गायकवाड यांनी केले. संजय नागरे यांनी शिक्षकांतर्फे मनोगत व्यक्त केले. त्यांनी शाहू महाराजांच्या कर्तृत्वाची ओळख विद्यार्थ्यांना करवून दिली. किशोर जाधव यांनी सामाजिक न्यायदिन साजरा करण्याचा हेतू विद्यार्थ्यांना सांगितला. सूत्रसंचालन रामदास ढोली यांनी केल. आभार सुदाम वाजे यांनी मानले. प्रवीण पानपाटील, अंबादास जाधव, अशोक हिंगे, मोहन सोनवने, जनाबाई सुडके, शरद सोनवणे, अनंत पानसरे, रावसाहेब तांबे यांनी संयोजन केले.

--

वाजे विद्यालयात (फोटो)

सिन्नर : लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात सामाजिक न्यायदिन साजरा झाला. मुख्याद्यापक बी. आर. कहांडळ अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक एस. एन. लोहकरे, भागवत आरोटे, एस. टी. पांगारकर, बी. एस. देशमुख, व्ही. एन. शिंदे, के. एस. शिंदे, एस. बी. चांदोरे, मनीषा बनकर, आर. व्ही. वाजे, वैशाली वाजे, पी. आर. फटांगळे आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. संस्थेचे संचालक हेमंत वाजे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांतर्फे ओमकार शेळके, स्नेहा जाधव यांनी शाहू महाराज यांच्या जीवन व कार्याविषयी माहिती दिली. मनोहर कासार यांनी सूत्रसंचालन केले. आभार सोमनाथ गिरी यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

--

गणूर परिसर

मनमाड : अन्याय अत्याचार निर्मूलन समितीतर्फे गणूर (ता. चांदवड) परिसरात रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांद्वारे राजर्षी शाहू महाराजांना वंदन करण्यात आले. गणूर येथे प्रतिमापूजन झाले. परविन बागवान, संदीप जाधव, माजी सरपंच पंढरीनाथ ठाकरे, माजी सरपंच रौफ पटेल, एकलाख पटेल, मीनाताई शिरसाठ, रामा जगताप, नितीन ठाकरे, आकाश गांगुर्डे, श्रीधर गोधडे, आप्पा ढाकणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक तालुक्यात १४३ टक्के पाऊस

$
0
0

शुभवार्ता

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेले दोन दिवस जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जून महिन्यातील सरासरी गाठण्यास मोठा हातभार लागला आहे. जिल्ह्यातील जवळपास निम्म्या तालुक्यांमध्ये पावसाने जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे. विशेष म्हणजे एक दिवसाच्या संततधारेमुळे ही सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक तालुक्यात सर्वाधिक १४३ टक्के पाऊस झाला असून, बागलाण तालुक्यात १४० टक्के पावसाची नोंद झाली आहे.

नाशिकमध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये धुवाधार पाऊस होतो. तुलनेने जूनमध्ये कमी पाऊस असतो. या महिन्यात जिल्ह्यात २३२४.५० मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित आहे. सोमवारी सकाळी साडेआठपर्यंत जिल्ह्यात १३८३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र, २५ ला सायंकाळनंतर आणि २६ जून रोजी दिवसभर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात २१२७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच या एक-दोन दिवसांत ७४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, जूनच्या सरासरीच्या ९१.५४ टक्के पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यात १५ तालुक्यांमध्ये जूनमध्ये साधारणत: १५४.९७ मिलिमीटर पाऊस होतो. चालू हंगामात १ ते २६ जूनदरम्यान आतापर्यंत १४१.८५ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. मान्सूनमध्ये होणाऱ्या एकूण पावसाच्या तुलनेत हा पाऊस १४ टक्के आहे.

नाशिकमध्ये १५ पैकी तीन तालुक्यांनी दोन दिवसांपूर्वीच जून महिन्याची सरासरी ओलांडली होती. मात्र, सोमवारच्या पावसानंतर अशी सरासरी ओलांडणाऱ्या तालुक्यांची संख्या सात झाली आहे. यामध्ये बागलाण, मालेगाव आणि येवलापाठोपाठ आता नाशिक, चांदवड, देवळा आणि सिन्नर या चार तालुक्यांची भर पडली आहे. या तालुक्यांमध्येही १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. नाशिक तालुक्यात सर्वाधिक १४३ टक्के पाऊस झाला असून, त्या खालोखाल बागलाण तालुक्यात १४० टक्के पाऊस झाला आहे.

तालुका- सरासरी पाऊस (मिमी)- झालेला पाऊस(मिमी)- टक्केवारी

नाशिक -९३.५०- १३३.८- १४३.१

मालेगाव-१०२.३०-११४.०-१११.४

चांदवड-११५.७०-१४२.३-१२३

बागलाण-९९.८०-१४०-१४०.३

देवळा- ११५.४०-१२१.२-१०५

सिन्नर-८९.३०--१०२.८-११५.१

येवला-१२०.४०-१५६.६-१३०.१-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गंगापूर’च्या पातळीत चार टक्क्यांनी वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातत्याने खालावत चाललेल्या जिल्ह्यातील काही धरणांमधील पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गंगापूर धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. याखेरीज जिल्ह्यातील आठ धरणांच्या पातळीत वाढ होण्यास या पावसामुळे मदत झाली आहे.

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने जिल्ह्यात जोरदार कमबॅक केले आहे. पावसाने रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील ९२ पैकी अनेक मंडळांमध्ये पावसाने जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे नद्यांसह धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आह. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे गंगापूर धरणातील पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. धरणामध्ये २४ जून रोजी २४ टक्के पाणीसाठा होता. तो २९ टक्क्यांवर पोहोचला आहे. याच धरणसमूहातील आळंदी धरणातील साठाही ११ वरून १५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गंगापूर धरणसमूहातील पाणीसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली असून, तो १९ वरून २१ टक्क्यांवर पोहोचला आहे. पालखेड धरणसमूहातील पुणेगाव आणि वालदेवी या धरणांमधील पाणीसाठा प्रत्येकी एक टक्क्याने, तर नांदूरमध्यमेश्वर धरणातील पाणीसाठा तीन टक्क्यांनी वाढला आहे. भावली धरणातील पाणीसाठाही शून्यावरून १० टक्क्यांवर गेला आहे. गिरणा खोऱ्यातील हरणबारी आणि पुनद या दोन धरणांमधील पातळीतही दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. पालखेड धरणसमूहामधील पाणीसाठा एक टक्क्याने, तर गिरणा धरणसमूहामधील पाणीसाठा दोन टक्क्यांनी वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण धरणांमध्ये दोन दिवसांपूर्वी ७,११८ दशलक्ष घनफूट पाणी होते. मात्र, आता हा पाणीसाठा ४०१ दशलक्ष घनफुटांनी वाढून ७,५१९ दशलक्ष घनफुटांवर पोहोचला आहे.

धरण- पाणीसाठा (२४ जून)- पाणीसाठा (२६ जून)

गंगापूर- १४१२ दलघफू-१६०६ दलघफू

आळंदी- १०५ दलघफू -१४५ दलघफू

पुणेगाव- ३०९ दलघफू -३२९ दलघफू

भावली- ० दलघफू --१४५ दलघफू

वालदेवी- ० दलघफू --१४ दलघफू

नांदूरमध्यमेश्वर- २४३ दलघफू -२५३ दलघफू

हरणबारी- ५१ दलघफू --७२ दलघफू

पुनद- ४०१ दलघफू- ४२६ दलघफू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापडी पिशव्यांनी दिले हाताला काम!

$
0
0

शहरातील ४५० महिलांना रोजगार

म. टा. प्रतनिधी, नाशिक

राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर कापडी पिशव्यांना मागणी वाढली आहे. शहरातील स्त्री शक्ती बचतगटाने कापडी पिशव्या तयार करण्यासाठी ४५० महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

राज्य सरकारने २३ जूनपासून प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली. ज्या व्यक्तीच्या हातात प्लास्टिकची पिशवी दिसेल त्याला पाच हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे. तसेच प्लास्टिकच्या पिशव्यांचा साठा बाळगणाऱ्या दुकानदारांवरही कारवाई केली जात आहे. या कारवाईचा धसका घेऊन नागरिकांनी अडगळीत ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या बाहेर काढल्या आहे. तसेच नागरिकांकडून कापडी पिशव्यांची खरेदी केली जात आहे.

शहरातही कापडी पिशव्यांची मागणी अचानक वाढल्याने बचत गटाच्या सभासद महिलांच्या हाताला मोठे काम मिळाले आहे. त्यांना एका पिशवीमागे अडीच रुपये मजुरी मिळत आहे. एक महिला दररोज साधारणत: शंभर पिशव्या तयार करीत असून त्या महिलेला कमीत कमी २५० रुपये रोजगार मिळणे शक्य झाले आहे. २३ जूनपूर्वीही महिला पिशव्या तयार करून विकत होत्या; परंतु त्या विकत घेण्यासाठी नागरिकांना समजावून सांगावे लागायचे. आता मात्र या पिशव्या हातोहात खपत असून सातत्याने मागणी वाढते आहे. या बचतगटाकडे अनेक बँकांनी, मोठ्या स्टोअरने मागणी नोंदवली असून कमी वेळात जास्त उत्पादन घेणे शक्य नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे. या पिशव्या तयार करण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात येत असून कच्चा मालही पुरविला जात आहे.

नागरिकांनी कापडी पिशव्यांचा अधिकाधिक वापर करावा यासाठी स्त्रीशक्ती बचतगटाने सिंहस्थ काळात शहरात आलेल्या भाविकांचे प्रबोधन केले होते. तसेच काही पिशव्या मोफत वाटल्या होत्या. सप्तश्रुंगी वणीच्या गडावर या बचतगटाच्या प्रतिनिधींनी दुकानदारांचे प्रबोधन केल्याने अनेकांनी स्वयंस्फूर्तीने कापडी पिशव्यांच्या वापर सुरू केला आहे.

कापडी पिशव्या घरात शिवणे शक्य होते. त्यासाठी बाहेर कुठेही जावे लागत नाही. दिवसातील चार तास जरी काम केले तरी शंभर पिशव्या शिवता येतात. शंभरपेक्षा अधिक पिशव्या शिवल्यास जादा मोबदला मिळतो.

- सुजाता घोटेकर, महिला

कापडी पिशव्या विकत घ्या, असे नागरिक-व्यापाऱ्यांना पूर्वी समजावून सांगावे लागत होते. मात्र, आता ग्राहकच आमच्याकडे येत आहेत. पिशव्यांची मागणी वाढल्याने महिलांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

- दीपाली कुलथे,

सचिव, स्त्री शक्ती महिला बचत गट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ दुकानातून बांगड्यांची चोरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोडच्या दत्त मंदिररोडवरील बाफना ज्वेलर्समधून सोन्याच्या बांगड्या पाहण्याच्या बहाण्याने आलेल्या तीन महिलांनी अडीच लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगडया हातोहात लंपास केल्या. उपनगर पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.

दुकानातील कर्मचारी प्रदीप जावरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दुकानात रविवारी (दि. २४) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तीन महिला आल्या. बांगड्या पाहण्याच्या बहाण्याने ८२ ग्रॅम वजनाच्या सहा बांगड्या घेऊन त्यांनी पोबारा केला. काही वेळानंतर ही घटना जावरे यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ उपनगर पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दिली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर किलो प्लास्टिक जप्त

$
0
0

सहकार कॉलनीत महापालिकेची कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेकडून सलग चौथ्या दिवशी प्लास्टिक बंदीच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. गंजमाळस्थित सहकार कॉलनीतील एका खासगी बंगल्यात महापालिकेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात तब्बल १०० किलो प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान २३ मार्चपासून आतापर्यंत महापालिकेने २३१ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून १२ लाख २४ हजाराचा दंड वसूल केला आहे.

राज्य सरकारने लागू केलेल्या प्लास्टिक बंदीअंतर्गत प्लास्टिक पिशव्या व साहित्याचा वापर करणाऱ्यांविरोधात महाालिकेने कारवाई सुरू केली आहे. महापालिकेने सर्वसामान्यांऐवजी प्लास्टिकचा स्टॉक असणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. जयेश गोसलिया नावाच्या व्यापाऱ्याने आपल्या सहकार कॉलनीस्थित बंगल्यात बंदी असलेल्या प्लास्टिकच्या वस्तू दडवून ठेवल्याची माहिती नाशिक पश्चिम विभागीय पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने बंगल्यावर अचानक छापा मारला. तेथे त्यांना प्लास्टिकचे पाणीग्लास, चहा कप, कंटेनर व इतर वस्तूंचा मोठा साठा आढळून आला. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. संबंधित व्यापाऱ्याकडून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा संचालक डॉ. सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी नितीन नेर, विभागीय स्वच्छता निरीक्षक दिलीप चव्हाण, स्वच्छता निरीक्षक अशोक साळवे, यांनी या कारवाईत सहभाग घेतला. आतापर्यंतच्या कारवाईत महापालिकेने शहरातून सुमारे ४०० किलो प्लास्टिक जप्त केले आहे.

२३१ जणांवर कारवाई

महापालिका क्षेत्रात २३ मार्चपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत महाापलिकेने आतापर्यंत प्लास्टिकचा वापर व विक्री करणाऱ्या २३१ जणांविर कारवाई केली असून १२ लाख २४ हजाराचा दंड वसूल केला आहे. यामध्ये पंचवटी विभागात ३८ जणांकडून २ लाख, नाशिकरोड विभागात ५० जणांकडून २ लाख ६३ हजार, नाशिक पश्चिम विभागात ५७ जणशंकडून २ लाख ७७ हजार, नाशिक पूर्व विभागात ४० जणांकडून एक लाख ९२ लाख, नवीन नाशिक विभागात २४ जणशंकडून एक लाख ८२ हजार तर सातपूर विभागात २२ जणांकडून एक लाख १० लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांच्या मते नाशिक अस्वच्छच!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक महापालिकेने १५१ क्रमांकावरून ६३ व्या क्रमांकांवर यंदा झेप घेतली असली तरी, पहिल्या दहामध्ये येण्याची संधी नागरिकांनीच हुकवली आहे. स्वच्छतेच्या बाबतीत महापालिकेची कामगिरी चांगली असली तरी, नाशिककरांचा स्वच्छतेबाबत फिडबॅक चांगला नसल्याचे दिसून आले आहे. केंद्राच्या पाहणी पथकाने नाशिकच्या स्वच्छतेला भरघोस मार्क दिले. मात्र, नाशिककरांनी स्वच्छतेला मार्क देताना हात आखडते घेतले आहेत. त्यामुळे नाशिककर महापालिकेच्या कामावर समाधानी नसल्याचे चित्र आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत जानेवारी महिन्यात देशभरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. जानेवारी २०१७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात देशातील ४७३ शहरे सहभागी झाली होती. त्यात नाशिकची क्रमवारी १५१ व्या स्थानावर घसरली होती. महापालिकेच्या सेवांविषयक नागरिकांच्या प्रतिसादाच्या पातळीवर कमी गुण मिळाल्याने पालिकेची क्रमवारी घसरल्याचे त्यावेळी दिसून आले होते. परंतु, घसरलेला क्रमांक मुख्यमंत्र्यांना पसंत पडला नाही. त्यांनी थेट महापालिकेत येऊन बैठक घेत, पहिल्या दहा शहरांमध्ये नाशिकचा समावेश व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळे महापालिकेतील पदाधिकारी आणि प्रशासन कामाला लागले होते. महापालिकेतील अधिकारी व आरोग्य विभागाने स्वच्छतेत चांगली कामगिरी केली. परंतु, तरीही यंदा नाशिकचा क्रमांक हा ६३ पर्यंतच येऊ शकला. १५१ क्रमांकावरून तो बऱ्यापैकी वर आला असला तरी पालिकेचा नंबर ६३ आला असला तरी,नाशिकची स्वच्छतेतील कामगिरी ही पहिल्या दहा शहरांसारखी आहे.परंतु नाशिककरांनी महापालिकेच्या स्वच्छतेच्या कामगिरीला फिडबॅक देतांना हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. स्चव्छ सर्वेक्षणात आवश्यक असलेल्या ४ हजार गुणांपैकी महापालिकेला अवघे २७८६ गुण मिळाले आहेत. यात महापालिकेच्या सेवांबद्दल १४०० गुणांपैकी महापालिकेच्या पदरी जेमतेम ६६७ गुण पडले. केंद्राच्या पथकाने केलेल्या तपासणीत १२०० पैकी १११० गुण मिळाले; परंतु महापालिकेच्या सेवांविषयी नागरिक समाधानी नसल्यामुळे या मुद्द्यासाठी असलेल्या १४०० गुणांपैकी महापालिकेला जेमतेम १००९ गुण मिळू शकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएलओच अनुत्सुक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी नाशिक/ म. टा. वृत्तसेवा, सिडको

मतदार याद्यांमधील घोळ मिटावा आणि निर्दोष यादीच्या आधारे प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाने बीएलओंची (बूथ लेव्हल ऑफिसर) फौज कामाला लावली आहे. परंतु, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात तांत्रिक व तत्सम अडचणींची ढाल पुढे करून ही फौज स्वत:ची मान सोडवून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. सिडकोसारख्या दाट लोकवस्तीत अवघ्या ३० टक्के लोकांपर्यंत बीएलओ पोहोचले असून, अवघे आठ टक्के काम ऑनलाइन होऊ शकले आहे. जिल्हा प्रशासनाचेही या कामकाजाकडे दुर्लक्ष होत असून सिडकोवासियांची अचूक आणि अद्ययावत मतदार यादी बनणार का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

२०१९ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोग झपाटून कामाला लागला आहे. त्यामुळेच अचूक आणि अद्ययावत मतदार यादीचा आग्रह निवडणूक आयोगाने धरला आहे. जिल्ह्यात बीएलओ म्हणून बहुतांश शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्यावर मतदार नोंदणीची जबाबदारी सोपविली आहे. २० जूनपर्यंत त्यांनी ही यादी अद्ययावत करणे अपेक्षित होते. परंतु, जिल्ह्यात अद्याप निम्मे कामही होऊ शकलेले नाही. विशेष म्हणजे सिडको, सातपूरसारख्या दाट लोकवस्तीच्या मतदारसंघात ही माहिती ऑनलाइन अपलोड करण्याचे काम आठ टक्केच झाले आहे. अर्ज भरून घेण्याचे काम ३० टक्केच होऊ शकले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांतही येथील मतदार यादी सदोष राहण्याची शक्यता वाढली आहे. शहरासह जिल्ह्याच्या अन्य भागांत तुलनेने चांगले काम होत असताना सिडको, सातपूरमध्ये तांत्रिक अडचणी व तत्सम कारणे सांगून या कामातून आपली मान सोडवून घेण्याचा प्रयत्न बीएलओ करीत आहेत.

त्यांनी प्रत्येक घरात जाऊन मतदाराची माहिती घेणे बंधनकारक आहे. मतदार हयात नसेल, मतदार यादीमध्ये त्याचे नाव नसेल किंवा नाव, पत्ता, जन्मतारीख चुकीची नमूद झाली असेल तर या चुका दुरूस्त करणे आवश्यक आहे. ही माहिती आयोगाच्या विशिष्ट अ‍ॅपवर अपलोड करणे बंधनकारक आहे. परंतु, अजूनही अनेक बीएलओ सिडकोतील बहुतांश घरांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत, हे मटाने घेतलेल्या माहितीत पुढे आले आहे. काही बीएलओंनी तर मतदारांबाबत माहिती असल्याने त्यांच्या घरापर्यंत जाण्याची गरज काय असा अजब सवाल केला आहे.

या मतदारसंघात ९१ हजार घरे असून तीन लाख ६९ हजार मतदार संख्या आहे. अनेक बीएलओंना हे कामच नको आहे. याकरीता त्यांनी विविध संघटनांच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर काहींनी थेट कोर्टामध्ये धाव घेतली आहे. मतदान नोंदणीचे कामासाठी कुणी आमच्यापर्यंत आलेले नाही, असे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा निवडणूक विभाग काय भूमिका घेतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कर्मचाऱ्यांची उणीव

मतदार संघात ३० ते ३५ हजार अर्ज भरून झाले आहेत. ते अपलोड करण्यासाठी पाच संगणक व तेवढ्याच ऑपरेटरची आवश्यकता आहे. परंतु, केवळ दोन ऑपरेटर व तेवढेच संगणक देण्यात आले आहेत. त्यामुळे अर्ज ऑनलाइन अपलोड करण्याचे काम धीम्या गतीने सुरू आहे. अनेक बीएलओ संपर्कात राहत नाहीत व फोनही स्वीकारत नसल्याची खंत एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. या परिसरात अंगणवाडी सेविकाही बीएलओ म्हणून काम करीत आहेत. काहींकडे माहिती अपलोड करण्यासाठी अँड्रॉइड मोबाइल नाहीत. तर काहींकडे असूनही त्यांना अपलोड करण्याचे ज्ञान नसल्याने कामावर परिणाम होतो आहे.

हा भार नकोच!

शहरातील सर्व मतदार संघाच्या तुलनेत हा मतदारसंघ दाट लोकवस्तीचा आहे. या भागात सरकारी कार्यालयांची वानवा आहे. त्यामुळे या मतदारसंघात बीएलओ म्हणून फारसे सरकारी कर्मचारी मिळू शकलेले नाहीत. परिणामी दैनंदिन कामाव्यतिरिक्त निवडणुकीच्या या कामाचा अतिरिक्त भार शिक्षकांवर टाकण्यात आला आहे. हा आमच्यावर अन्याय असल्याची भावना शिक्षकांकडून व्यक्त होते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘व्यापारी-उद्योजकांच्या अडचणींवर विचार करू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्लास्टिक बंदीच्या निर्णयामुळे उद्योजक व व्यापाऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. याप्रश्नी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या मुंबई कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर व्यापारी व उद्योजकांनी राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची भेट घेत अडचणी मांडल्या. याप्रश्नी येत्या ३० जून रोजी होणाऱ्या शक्तीप्रदत्त समितीच्या बैठकीत विचार करून निर्णय घेऊ, असे आश्वासन कदम यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळास दिले.

महाराष्ट्र चेंबरच्या मुंबईत याप्रश्नी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कदम यांची भेट घेण्यात आली. प्लास्टिक बंदीच्या निर्णयामुळे व्यापारी व उद्योजकांना जाणवणाऱ्या अडचणींवर यावेळी प्रकाश शिष्टमंडळाने प्रकाश टाकला. मंत्रालयामध्ये ३० जून रोजी शक्तीप्रदत्त समितीची बैठक होणार असून यामध्ये प्लास्टिक बंदी निर्णयावर विचारमंथन करण्यात येणार आहे. या बैठकीत उद्योजक व व्यापाऱ्यांच्या समस्या मांडण्यात येईल, असे आश्वासन कदम यांनी दिले.

या शिष्टमंडळात खाद्यतेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शंकर ठक्कर, मुंबई ग्रेन डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष रमणी कलाल छेडा, जयंती छेडा, फेडरेशन ऑफ महाराष्ट्र स्टेशनरी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर केनिया, प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय शहा, ऑल इंडिया बेकरी असोसिएशनचे अध्यक्ष के. पी. इरानी, सुरेंद्रपाल सिंग, कर्मवीर सिंग, क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मोहन साधवानी, सायरस बिरानी, श्रेयस गुडका, योगेश शहा, हितेन शहा, इजहार, शाम पोकळे, रवी नाईक, संजय साटम, आशिष शहा, श्रीपाद उपासनी, परेश मेहेता, बाबुभाई अय्यर यांच्यासह व्यापारी-उद्योजकांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत पडून दोन महिलांचा मृत्यूमनमाड :

$
0
0

विहिरीत पडून

दोन महिलांचा मृत्यू

मनमाड : नांदगाव तालुक्यातील मूळडोंगरी परिसरात पांढरवस्ती येथे विहिरीत पडून दोन महिला मरण पावल्या. सुंदरबाई तानाजी मोरे आणि सुमनबाई महादू मोरे अशी त्यांची नावे आहेत. कपडे धुण्यासाठी त्या विहिरीवर गेल्या होत्या. या दोघी एकाच कुटुंबातील असून, त्या एकमेकींच्या जावा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, या दोघी महिला एकाचवेळी विहिरीत कशा पडल्या, हा घात आहे की अपघात असे प्रश्न उपस्थित होत आहेत. नांदगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून घटनेची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जळगावात पावसाची झडी

$
0
0

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा आगमन

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव शहरात मंगळवारी (दि. २६) सकाळपासूनच पावसाची झडी सुरू झाल्याचे चित्र होते. त्यामुळे शहरासह तालुक्यात वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. सकाळी सुरू झालेल्या या पावसाने नंतर तीन ते चार तासांची विश्रांती घेतली. त्यानंतर पुन्हा दुपारी पावसाला सुरुवात झाल्याने चाकरमान्यांची त्रेधातिरपीट उडाली होती.

जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, सोमवारी रात्री शहरात पावसाचा शिडकावा झाला होता. हा पाऊस थोड्याच वेळात थांबला होता. मंगळवारी सकाळी मात्र, पावसाने संततधार सुरू ठेवल्याने शेतीकामांना वेग आला आहे. सकाळी साडेसात वाजेपासून शहरात पावसाची रिपरिप सुरू झाली होती. पावसाचा जोर दुपारी साडेबारा वाजेपर्यंतही कायम होता. त्यामुळे तालुक्यातील शेततकरी चांगलाच सुखावला असूल, आता पेरण्यांच्या कामांना वेग आला आहे. दुपारी तीन ते चार तास पाऊस थांबल्याने नागरिकांनी आपापले कामे लवकर आवरली. मात्र, सायंकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. त्यामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांना धावपळ करावी लागली. दुपारी पाच वाजेपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. या झडीमुळे चाकरमान्यांना मिळेल तेथे आसरा घ्यावा लागला होता. पावासाची ही रिपरिप सांयकाळपर्यंत सुरूच होती.

धुळ्यातही पावसाची हजेरी

म. टा. वृत्तसेवा, धुळे
मंगळवारी (दि. २६) दिवसीार धुळे शहरात रिमझिम पाऊस सुरूच होता. शेतकरी शेतीकामाला लागले असून, बि-बियाण्यांच्या दुकानांवरही गर्दी होत आहे.
साक्री, शिंदखेडा तालुक्यात अजूनही पावसाने दडी मारली आहे. धुळे शहर आणि तालुक्यातील काही परिसरात गेल्या दोन पावसाने हजेरी लावली असून, शेती पिकांना जीवदान मिळाले आहे. कापसाला या पावसाने मोठा फायदा झाल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र, अजुनही नागरिक आणि शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असून, आभाळाकडे नजरा लावून आहेत. शहर परिसरात अजुनही उकाडा जाणवत आहे. वीजपुरवठाही पावसामुळे खंडीत होत असल्यरने नागरिकांना नाहक त्रास होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाळे ठोकण्यासाठी गेले; अन् आश्वासनावर परतले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विभागीय संदर्भ रुग्णालयाच्या सेवेचा बोजवारा उडाल्याच्या वाढत्या तक्रारीनंतर टाळे ठोकण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आश्वासन मिळाल्यानंतर परतल्या. यावेळी त्यांनी सर्व रुग्णालयाची पाहणी करून चांगल्या सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच लिफ्ट व मशिनरी सुरू करण्याची मागणी केली.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्या बुधवारी रुग्णालयात गेल्या. येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश कोशिरे यांनी चांगल्या सेवेचे आश्वासन दिले. राज्य सरकारने २००८ मध्ये उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना आधुनिक सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून शहरातील शालिमार येथे विभागीय संदर्भ रुग्णालयाची उभारणी केली. परंतु, गेल्या काही वर्षांपासून संदर्भ रुग्णालयात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या रुग्णालयात लिफ्ट, अतिदक्षता विभागात एसी बंद आहे. तर लिप्टही सुरू नाही. दोन आठवड्यांपूर्वी बायपास करण्यासाठी लागणारे यंत्रही बंद पडलेल्या अवस्थेत होते. पण, या भेटीनंतर डॉक्टरांनी रुग्णांना वरील मजल्यावर जाण्यासाठी लागणारी लिफ्ट सुरू केली. त्यानंतर अतिदक्षता विभागाचे एसीचे काम चालू केले. बायपाससाठी लागणारे यंत्र उद्यापर्यंत सुरू होईल, असे आश्वासन डॉ. कोशिरे यांनी दिले.

महिलांनी चांगली सेवा दिली नाही तर टाळे ठोकले जाईल, यावेळी इशाराही दिला. यावेळी वैद्यकीय अधिक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे, कार्याध्यक्ष सुषमा पगारे, नगरसेविका शमिना मेमन, हीना शेख, रंजना गांगुर्डे, प्रतिभा भुजबळ, विभागीय अध्यक्ष आशा भंदुरे, सलमा शेख, शाकिरा शेख, सुरेखा निमसे, सुजाता कोल्हे, मीनाक्षी गायकवाड, सुरेखा पठाडे, सईदा शेख यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाड पडले तरी मारल्या फेऱ्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अशोकनगर भागात महिला वडाची पूजा करीत असताना शेजारील वडाच्या वृक्षाची फांदी कोसळली. सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही. मात्र, झाड पडले तरी महिलांनी त्या झाडाखालून वाकून जात वडाला फेऱ्या मारल्या. सावकरनगर येथील वडाच्या वृक्षाला फेऱ्या मारताना महिलांना दगडांचा त्रास सहन करावा लागला. याबाबत महिलांनी

महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे तक्रार केल्यानंतर केवळ काही दगड बाजूला केले. मात्र, नेहमी रस्त्यालगत पडून असलेले दगड महापालिका का हटवत नाही असा सवाल महिलांनी केला. सातपूर भागात महिलांनी मनोभावे वडाची पूजा करीत वटपौर्णिमा साजरी केली. पुरोहितांनी मंत्रोच्चारात पूजा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images