Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गणेशोत्सव सदरे...

0
0

वरील सदरांचा मजकूर mtnskganeshotsav@gmail.com या मेलवर अथवा महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी येथे पाठवावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'११० विमानांचे कंत्राट अदानींना देण्याचा घाट'

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले मित्र अनिल अंबानी आणि गौतम अदानी यांना आर्थिक फायदा पोहोचवण्यासाठी संरक्षण खात्याशीच खेळ सुरू केल्याचा आरोप माजी उपपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केला. राफेलपाठोपाठ आता संरक्षण मंत्रालयाने महिनाभरापूर्वी निविदा काढलेल्या ११० लढाऊ विमानांच्या खरेदीपूर्वीच उद्योगपती गौतम अदानी यांच्या 'अदानी डिफेन्स सिस्टीम्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड' कंपनीने स्वीडनच्या 'साब' कंपनीसोबत केलेल्या कराराकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले. राफेलच्या धर्तीवरच आता अदानी यांच्यासोबतच ऑफसेट पॉलिसीअंतर्गत या विमानांची खरेदी केली जाणार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून, प्रधानसेवक जनतेसाठी नव्हे, तर अंबानी आणि अदानी यांच्यासाठीच काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

फ्रेंड्स ऑफ डेमोक्रसीतर्फे राफेल खरेदी प्रकरणात मोदी दोषी आहेत काय, या विषयावर आयोजित चर्चासत्रात चव्हाण यांनी मोंदीवर गंभीर आरोप केले आहेत. राफेल विमान खरेदीप्रक्रियेचा प्रवास पॉवरपॉइंट प्रेंझेटेशनद्वारे त्यांनी मांडत, या खरेदी प्रकरणातील अनियमिततेवरही बोट ठेवले. राफेल विमान खरेदीचा पहिला करार रद्द केला नसतानाही, मोदींनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीला अंधारात ठेवून अचानक ३६ विमाने खरेदी करण्याची घोषणा केली. आतापर्यंत देशाच्या संरक्षण धोरणात संरक्षण विभागासाठी कोणतीही खरेदी करायची असेल तर संरक्षण मंत्रालयामार्फत प्रस्ताव सादर केला जातो. त्यासाठी सीसीएसची मान्यता आवश्यक असते. ऑफसेट पॉलिसीच्या करारावर संरक्षणमंत्र्यांची सही लागते; परंतु 'रिलायन्स'सोबत केलेल्या करारावर संरक्षणमंत्र्यांची सहीच नाही. कोणतीही खरेदी ही पाच मंत्र्यांच्या सीसीएस कमिटीच्या मंजुरीनंतरच केली जाते. मात्र, मोदींनी ही सर्व प्रक्रिया डावलत ५९ हजार कोटींत ३६ विमानांची खरेदी केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. यूपीएच्या काळात प्रत्येकी ५२६ कोटींत एक राफेल खरेदी करण्याचा करार असताना, एनडीए सरकारने अचानक १६८० कोटींची किंमत कशी दिली, असा सवाल करीत संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे संसदेत विमानाची किंमत ६७० कोटी रुपये सांगतात, तर रिलायन्सच्या अहवालात चक्क एका विमानाची किंमत १६८० कोटी दाखवण्यात येते. मात्र, मोदी, जेटली, निर्मला सीतारामन मात्र किंमत गुप्त असल्याचा दावा करतात. विशेष म्हणजे रिलायन्सच्या वार्षिक अहवालात या ५० वर्षांसाठीचे संरक्षण विभागाचे एक लाख कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याचाही दावा केला जातो. प्रत्येक विमानामागे अकराशे कोटी रुपये जास्तीचे दिले जात असून, ही वाढीव रक्कम कोणासाठी, असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला. संरक्षण क्षेत्राशी खरेदी ही सरकारी नियंत्रण असलेल्या कंपन्यांशी व्हावी, असे सांगत, सरकार संरक्षण क्षेत्राचे खासगीकरण करायला निघाल्याचा आरोपही त्यांनी केला.

न्यायालयाचा मार्गही उपलब्ध

राफेल विमान खरेदी घोटाळ्याची चौकशी न्यायालयामार्फत करावी का, या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण यांनी या घोटाळ्याची प्रथम चौकशी जेपीसीमार्फत केली जावी, अशी मागणी केली. जेपीसीने यापूर्वीही अनेक घोटाळ्यांची चौकशी केली आहे. मात्र, सरकार यासाठी तयार दिसत नाही. त्यामुळे न्यायालयासह अन्य पर्यायही या चौकशीसाठी उपलब्ध असून, त्यांचा वापर जरूर केला जाईल, असे त्यांनी या वेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरूणाईला दोष देऊ नका; विचारप्रणाली बदला

0
0

तरुणांना महापुरुषांच्या विचारांकडे वळवावे

स्वामी कल्याणात्मानंद यांचा संदेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आजच्या तरुण पिढीला आपल्या पिढीने महापुरूष, संत, महात्मे यांचे चरित्र सांगण्याचा प्रयत्न कधीही केलेला नाही. त्यामुळे एकविसाव्या शतकातील पिढी बदलली म्हणत तरुणाईला दोष देणे गैर आहे. आपणच पुढाकार घेत थोर महात्मे, संत आणि महापुरुषांचे विचार तरुणाईला सांगत त्यांची विचारप्रणाली बदलायला हवी, असा संदेश स्वामी कल्याणात्मानंद यांनी दिला.

स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे १८९३ मध्ये केलेल्या व्याख्यानाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधून 'स्वामी विवेकानंद यांचा संदेश' या व्याख्यानात कल्याणात्मानंद यांनी विचार व्यक्त केले. गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी एकनाथ रानडे यांच्या व्याख्यानावर आधारित 'स्पिरिच्युअलायझिंग लाईफ' या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद 'सेवा समर्पण' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सुनीता करकरे यांनी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. यावेळी मुंबईतील रामकृष्ण मठ-मिशनचे स्वामी कल्याणात्मानंद यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, की स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि संदेश थोडक्यात सांगण्याजोगे नाहीत. त्यांचे आचरण करण्यासाठी वाचन आणि शोध-अभ्यास हा एकमेव मार्ग आहे. स्वामी विवेकानंद यांच्या बालपणापासूनच त्यांना महापुरुषांच्या चरित्राची शिकवण मिळत गेली. त्यांचे चातुर्य त्यांना ध्येयसिद्धीकडे नेत गेले. लहानपणापासूनच चरित्र घडण्यास सुरूवात होते. प्रत्येक महापुरुषाच्या कर्तृत्वात आईचा मोठा वाटा आहे. महापुरुषांच्या मातांनी त्यांना संत आणि इतर महापुरुषांच्या कथा सांगत धैर्यवान, शक्तीवान आणि बुद्धिवान बनवले. सध्याच्या काळात महापुरुषांचे चरित्र वाचण्यात आपलीच पिढी कमी पडते आहे. त्यामुळे तरुण पिढीला सल्ला देण्यासाठी आपल्याकडे काहीही नाही. मोबाइल आणि टीव्हीसमोर बसलेल्या तरुणांना आपल्या पिढीने स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या महापुरुषांच्या विचारांकडे वळविले पाहिजे. स्वामी विवेकानंद केंद्रातर्फे शहरातील कॉलेजांमध्ये 'स्वामी विवेकानंद यांचे विचार' यावर आधारित घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेत तेजश्री जाधव प्रथम, मधुरा घोलप द्वितीय आणि मंदार घुले याने तृतीय क्रमांक पटकविला. व्याख्यानाचे आयोजन रामकृष्ण सारदा आश्रम, रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी आणि जिव्हाळा ग्रुप यांनी केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची धोरणे लोकशाहीमारक

0
0

डॉ. भालचंद्र कांगो यांचा हल्लाबोल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाजप सरकार कॉपोर्रेट कंपन्यांना मदत करीत आहे. संरक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात शिरकाव करण्याची संधी अशा कंपन्यांना देणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याची टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य डॉ. भालचंद्र कांगो यांनी नाशिकमध्ये केली. 'इंटक'च्या कार्यालयात त्यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

संरक्षण क्षेत्राचे खासगीकरण करण्याचा घाट मोदी सरकारकडून घातला जातो आहे. देशातील काही बड्या उद्योगपतींचा या सरकारवर प्रभाव असून त्यांना संरक्षण क्षेत्रामधील २०० मिलियनच्या बाजारपेठेत वाटा हवा आहे. त्यांच्यासाठीच सरकारने मेड इन इंडियाचे गाजर पुढे केले. परंतु, सरकारच्या नीतीमध्ये बदल होत असून तो लोकशाहीला मारक आहे. उद्योजकांच्या दबावाला हे सरकार बळी पडत असून, म्हणूनच १० दिवसांत तयार झालेल्या कंपनीला ४० हजार कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट हे सरकार देते अशी टीकाही कांगो यांनी यावेळी केली.

संरक्षण क्षेत्रातील उत्पादने निर्मिती उद्योगपतींच्या हाती गेली तर ते अधिकाधिक उत्पादन करतील. ते परदेशात विकले गेले नाही तर भारत सरकारने खरेदी करावे असा दबाव आणतील. यातून सरकारची भूमिका युद्धखोरीची होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशीही आशंका कांगो यांनी वर्तविली. भाजप विरोधात आठ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार असून त्यामध्ये भाजपच्या धोरणांची पोलखोल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संविधान बचाव, देश बचाव, मोदी हटावचा नाराही कांगो यांनी दिला.

मग राजन यांना का हटविले?

भाजपच्या काळात बँकांचा एनपीए २६ टक्क्यांवर पोहोचला असून यूपीए काळात तो १६ टक्के होता. बँकांच्या नफ्यामधील दोन लाख ६२ हजार कोटी रुपये उद्योजकांच्या खिशामध्ये घालण्याचा उद्योग भाजप सरकार करीत आहे. रघुराम राजन यांच्या वक्तव्यातील सोयीची माहिती सांगून हे सरकार विरोधी पक्षांवर टीका करीत आहे. राजन यांच्या विधानांना गांभिर्याने घेणाऱ्या राजन यांना गर्व्हनर पदावरून का हटविले, असा प्रश्न कांगो यांनी उपस्थित केला. समृद्धी महामार्गात लॅण्ड पुलिंग पद्धती आम्ही हाणून पाडली. आंदोलन उभे केल्यामुळेच शेतकऱ्यांना तब्बल १० ते १२ हजार कोटींचा फायदा झाल्याचा दावा त्यांनी केला.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागपूरचा देवय, मुंबईची निरुपमा अजिंक्य

0
0

…स्क्वॉश रॅकेट स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आणि जिल्हा रॅकेट असोसिएशन यांच्या सहकार्याने विभागीय क्रीडा संकुलात आयोजित महाराष्ट्र राज्य शालेय स्क्वॉश रॅकेट स्पर्धेत १४ वर्ष मुलामध्ये नागपूरचा देवय मेहता तर मुलीमध्ये मुंबईची निरुपमा दुबे अजिंक्य ठरली.

या स्पर्धेत १४ वर्षे मुले-मुली, १७ वर्षे मुले-मुली आणि १९ वर्षे मुले-मुली अशा तीन वयोगटात स्पर्धा सुरू आहेत. महाराष्ट्राच्या आठ विभागाचे २४० खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १४ वर्ष मुलांचा आणि मुलींच्या स्पर्धा झाल्या. मुलांच्या गटात अंतिम लढतीत नागपूरच्या देवय मेहताने मुंबईच्या नील पासवानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. तर मुलीच्या गटात मुंबईच्या निरुपमा दुबेने अंतिम लढतीत मुंबईच्याच खुशी जसपालचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

१४ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या झालेल्या उपउपांत्य लढतीत अनुक्रमे देवेश मेहेता, आर्य बजलवार, सारंग हर्णे आणि नील पासवान यांनी उपउपांत्य सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीची पहिली लढत देवेश मेहेता आणि आर्य बजलवार यांच्यात झाली. देवेशने ही लढत २-० अशी जिंकून अंतिम फेरीत गाठली. सारंग हर्णे आणि नील पासवान यांच्यात झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात नील पासवानने २-० ने विजय मिळविला. देवेश मेहेता आणि नील पासवान यांच्यात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात देवयने सरळ दोन सेटमध्ये सामना जिंकून १४ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले. १४ वर्षे मुलीमध्ये औरंगाबादच्या रेखा नागरे आणि मुंबईच्या निरुपम दुबे यांच्यात झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत निरुपमाने वर्चस्व राखून हा सामना २-० असा जिंकला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबईच्या खुशी जसपालने औरंगाबादच्या प्रभगुल कौरला सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून अंतिम फेरी गाठली. अंतिम लढतीत निरुपम आणि खुशी या दोनही मुंबईच्याच खेळाडूंमध्ये चुरस दिसून आली. तिसऱ्या निर्णायक सेटमध्येही निरुपमाने सुरवातीपासून आघाडी प्रस्थापित करून २-३ गुणांची आघाडी राखली. आणि शेवटी निरुपमाने हा सेटही जिंकून मुलींच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.

पुढच्या लढती चुरशीच्या

या स्पर्धेत अंतर्भाव असलेल्या १७ वर्षे आणि १९ वर्षे मुलांच्या आणि मुलींच्या प्राथमिक स्पर्धांना सायंकाळी सुरुवात झाली. मुलांच्या १७ वर्षे वयोगटात औरंगाबादचा अथर्व पाटील आणि मुंबईची अंजली सोमवाल या राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. तर १९ वर्षे मुलामध्ये दीपक मंडल, अविनाश यादव तर मुलींमध्ये सुनीता पटेल या मुंबईच्या राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे या दोनही गटात चुरशीच्या लढती बघायला मिळणार आहेत, अशी माहिती या स्पर्धेचे संयोजन सचिव संजय होळकर आणि प्रकाश पवार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा ‘यश’जयपुरात चमकला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जयपूर (राजस्थान) येथे पार पडलेल्या एमआरएफ सुपरक्रॉस नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिकच्या यश पवारने चौथ्या फेरीत उत्कृष्ठ कामगिरी करीत दोन गटांत तिसरे स्थान मिळविले. जयपूर मधील मानसरोवर परिसरात ही स्पर्धा पार पडली. स्पर्धात्मक असलेल्या ट्रॅकवर आधी पाऊस पडल्याने स्पर्धकांसाठी आव्हानात्मक चुरस निर्माण झाली होती. स्पर्धेत नाशिकच्या यश पवारने फॉरेन ओपन गटात तिसरे स्थान तसेच प्राइवेट फॉरेन गटात तिसरे स्थान मिळवले. प्राइव्हेट फॉरेन गटात दुसऱ्या एका अवघड वळणावरती छोटा अपघात होऊन सुद्धा यशने अंतिम फेरीत तिसरे स्थान पक्के केले. तो वयाच्या १२ वर्षांपासून राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवत आहे. त्याला वडील मोहन पवार, सुरज कुटे, गणेश लोखंडे, बाळू बेंडाळे, श्रीकांत चव्हाण (पुणे) यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाटक हा जगण्याचा अविभाज्य भाग

0
0

नाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असतात. अशाच घटना-घडामोडींना प्रतिनिधित्व म्हणून संवाद-संगीत, प्रसंग-व्यक्ती व त्यांचा अभिनय यांची जोड देऊन रंगमंचावर नाटक आकारास येते. त्यामुळे नाटक व प्रत्येकाचे जगणे याचा अगदी जवळून संबंध आहे, असे प्रतिपादन येथील प्रसिद्ध सिने-नाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी येथे केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील लायब्ररीत 'नाटक व आपण' या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. एकूण ६४ पैकी नाट्य ही एक कला आहे. कुठल्याही कलेची आपण जेवढी साधना करू तेवढे आपले आयुष्य व व्यक्तिमत्व हे समृद्ध होते. आपल्या आयुष्यात एकही कलासाधन नसेल तर मग आपले आयुष्य तुलनेने अधिक निरस व उदास होते. त्यामुळे व्यावहारिक जगतात जगतांना शिक्षण-नोकरी वा व्यवसाय यासोबत जगण्याला आधार म्हणून तरी कला अंगी बाळगायला हवी, असे शिंदे यांनी सांगितले. आपण आपली आवड जोपासली नाही तर मग समाज आपल्यावर त्याची आवड-निवड लादतो. त्यातून व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच व मुस्कटदाबी होते. नाटक हे जिवंत कलांपैकी एक आहे. शब्दांमध्ये हालचाल व चढउतार आणि मनुष्याच्या वागण्यात विविधता निर्माण झाल्यावर नाट्य निर्माण होते, असे ते म्हणाले.

उत्तम नाट्य प्रस्तुतीसाठी आवश्यक संवादफेकीवर शिंदे यांनी भर दिला. त्यासाठी प्रत्येक अक्षराचा स्वर व शब्दोच्चार कसा स्पष्ट असावा आणि त्यासाठी काय करावे याचे त्यांनी उपस्थित विद्यार्थी व श्रोत्यांकडून प्रात्यक्षिक करवून घेतले. विद्यापीठाच्या संगणक विभागाचे प्रा. माधव पळशीकर यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद पंडित यांनी सूत्रसंचालन केले तर ओंकार तिसगे यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाच्या संगणक विभागाचे प्रा. माधव पळशीकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

नाट्य संपुष्टात येणार नाही

प्रसिद्ध नाटककार स्लावास्की व ब्रेखत यांच्या नाट्याविषयीच्या विचारसरणीचा भेदही त्यांनी स्पष्ट करून दाखविला. नाटक हे जसे समाजातून येते तसेच सामाजावरदेखील त्याचा परिणाम होत असतो. सध्या मोबाइल व सोशल मीडिया, विविध दूरचित्रवाहिन्या यामुळे नाट्यचळवळ कमी झाली असे वाटत असले तरी नाटक हे त्यातील प्रत्यक्ष जिवंत अभिनय आणि जगण्याची थेट अनुभूती यामुळे कधीही संपुष्टात येणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आग्रा हायवेवर वाहतुकीचा फज्जा

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

के. के. वाघ महाविद्यालयासमोरील मुंबई-आग्रा महामार्गाच्या भागापासून आडगाव शिवारापर्यंत नव्याने होणाऱ्या उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या कामासाठी लागणाऱ्या मशिनरी महामार्गावरच्या भागात लावण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई ते धुळे या मार्गाने जाणाऱ्या वाहनांसाठी या मार्गाचा उत्तरेकडील भाग बंद करावा लागणार आहे. वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवावी लागणार आहे. त्यासाठी मंगळवारी (दि. ११) या कामासाठी ट्रॅफिक नियोजनाची चाचणी घेण्यात आली. दोन तास घेण्यात आलेल्या या चाचणीच्या वेळी वाहतुकीची कोंडी झाली.

मुंबई-आग्रा महामार्गावर के. के. वाघ महाविद्यालयाची चौफुली, अमृतधाम चौफुली, हनुमाननगर (बळीमंदिर) चौफुली आणि जत्रा चौफुली अशा चार वर्दळीच्या चौकांवरील वाहतुकीची कोंडी सुटावी, येथील अपघात टळावेत यासाठी उड्डाणपुलाची मागणी करण्यात आली होती. ती मजूर झाली असून, कामाला सुरुवात झाली आहे. या कामासाठी महामार्गावरील एका बाजूची ट्रॅफिक पूर्णपणे बंद ठेवावी लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूने तसेच सर्व्हिस रोडने ट्रॅफिक वळवावी लागणार आहे. ही ट्रॅफिक वळविण्यासाठी मंगळवारी युनिट १ ने सकाळी प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नला यश आले नाही. ट्रॅफिक जाम झाल्यामुळे दोन तासांतच त्यांना हा प्रयोग थांबवावा लागला.

अजस्त्र यंत्रे दाखल

उड्डाणपुलाच्या कामाची सुरुवात हनुमाननगर (बळीमंदिर) चौफुली ते अमृतधाम चौफुली या भागात करण्यात आली आहे. त्यासाठी मोठ-मोठी यंत्रे आणण्यात आली आहेत. हे काम सुरू करण्याअगोदर या मार्गाने जाणारी वाहने दुसऱ्या मार्गाने वळवावी लागणार आहेत. या महामार्गावरील वाहनांची संख्या लक्षात घेता हे काम अवघड ठरणार आहे. त्याचे प्रत्यंतर मंगळवारी वाहतूक शाखेच्या पोलिसांना आले. बळीमंदिर ते अमृतधाम हा मार्ग बंद करण्यात आला. ही ट्रॅफिक दुसऱ्या बाजूने वळविण्यात आली. त्यावेळी वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली. लांबवर रांगा लागल्या. वाहतुकीचे नियोजन करणे अवघड झाले. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरू करावी लागली.

उड्डाणपुलाच्या कामासाठी महामार्गाचा हा भाग वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागणार आहे. त्यासाठी आणखी प्रयोग करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गणेशोत्सव असल्यामुळे दोन दिवस हा प्रयोग थांबविण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा वाहतुकीची चाचणी घेण्यात येणार आहे.

- सदानंद इनामदार, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, युनिट-१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सीआयएसएफ’च्या जवानांची सोमश्वरला स्वच्छता मोहीम

0
0

'सीआयएसएफ'च्या जवानांची सोमश्वरला स्वच्छता मोहीम (फोटो)

जेलरोड : नोट प्रेस येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) जवानांतर्फे नोट प्रेस ते सोमेश्वर अशी सायकल रॅली काढण्यात आली. या जवानांतर्फे सोमेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कमांडंट के. के. भारद्वाज, डेप्युटी कमांडंट रितेश कुमार, असिस्टंट कमांडंट परमजीत सिंग, तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

--

स्वयंसेवकांची नोंदणी

नाशिक : गणेशोत्सवाच्या काळात नाशिक पोलिस प्रशासनाला बंदोबस्तात सहकार्य करण्यासाठी स्वयंसेवकांची नोंदणी सुरू झाली आहे. नाशिक पोलिस आयुक्तलयातर्फे मंडळांनी नावे दिलेल्या स्वयंसेवकांना जबाबदारीचे वाटप करून देण्यात येणार आहे. स्वयंसेवकासाठी इच्छुक असणाऱ्यांनी गोदाप्रेमी सेवा समितीच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन गोदाप्रेमी देवांग जानी यांनी केले आहे.

--

आयुक्तांचा सत्कार (फोटो)

नाशिक : आयर्न मॅन-२०१८ या ट्रायथलॉन स्पर्धेत बाजी मारणारे नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांचा यंग सहेली ग्रुप या सामाजिक संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. पोलिस आयुक्तांच्या विशेष प्रावीण्यातून क्रीडा क्षेत्रात कामगिरी करण्याची प्रेरणा नाशिककरांना मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कल्पना पांडे, ममता सारडा, नेहा तिवारी, प्रीती कांकरिया, नमिनी गिरी, रिना दुबे यांनी आयुक्तांचा सत्कार केला.

--

विद्यार्थी गुणगौरव

नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी समाजप्रबोधन संघातर्फे अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. विविध परीक्षांत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. साकूर येथील उपसरपंच शंकर खेमनर यांना अहिल्यादेवी समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्योजक भास्कर जाधव, नगरसेविका प्रतिभा पवार यांच्यासह अन्य मान्यवर समारंभास उपस्थित होते. समारंभाचे संयोजन चिमाजी भांड, नीलेश हुल्लुळे, तन्मय खाटेकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केले.

--

उमाजी नाईकांना वंदन

जेलरोड : नाशिकरोड येथील चांडक-बिटको महाविद्यालयात क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ. धनेश कलाल यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून वंदन करण्यात आले. प्रा. संतोष बोडके, प्रा. प्रमोद धुमाळ, प्रा. महेश औटी, सूरज घोरपडे, तृप्ती कळमकर, सरिता बोरस्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य कलाल म्हणाले, की १८५७ च्या पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे आणि सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे उमाजी नाईक हे जेजुरीतील खंडेरायाचे निस्सीम भक्त होते. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मोलाचे आहे. प्रा. महेश औटी यांनी प्रास्ताविक केले. सूरज घोरपडे या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले. कविता बोरस्करने आभार मानले.

(थोडक्यात)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदीपात्रात आढळला तरुणाचा मृतदेह

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

येथील उगाव रोडलगत विनिता नदीपात्रात मंगळवार २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. परिसरातील नागरिकांनी याबाबत निफाड पोलिसांना माहिती दिली. संबंधित मृतदेह याच परिसरातील बरड वस्तीवरील तरुणाचा असल्याचे तपासात आढळून आले आहे.

अमोल नामदेव सोनवणे (२७, रा. बरड वस्ती, उगाव रोड, निफाड) असे या तरुणाचे नाव आहे. अमोल हा घरातील व्यक्तींना बाहेर जातो, असे दोन दिवसापूर्वी सांगून निघून गेला होता. मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. हा प्रकार आत्महत्या की घातपात याबाबत निफाड पोलिस स्टेशनचे हवालदार पाटील अधिक तपास करीत आहेत. पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

हातभट्टीवर छापा;

चार लाखांची दारु जप्त

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे नांदगाव पोलिसांनी बेकायदा गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्टी वर छापा टाकून चार लाखांची दारु आणि 72 हजार रुपयांच्या साहित्यासह दोघांना अटक केली. तर अन्य तिघे फरार झाले.

उपविभागीय पोलिस अधिकारी आर. रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलिसांनी मंगळवारी पिंपरखेड येथील इंदिरानगर परिसरात गावठी हातभट्टीवर छापा टाकला. दारु तयार करण्याची समुारे ७२ हजार रुपयांची साधनसामुग्री जप्त केली. याप्रकरणी राजू गांगुर्डे, किरण माळी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे तर तिघे फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक निरीक्षक पगारे पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसही मैदानात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'गली गली मे शोर है, चौकीदारही चोर है', 'गॅस भाव कमी करा', 'मोदी हाय हाय' यांसारख्या घोषणा देत काँग्रेसने मंगळवारी भाजप सरकारचा निषेध नोंदविला. शहरातून रॅली काढून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या सरकारला आताच जाब विचारला नाही, तर मोदी देश विकून खातील अशी टीका मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

राफेल खरेदीबाबतची अनियमितता, पेट्रोल-डिझेलचे भरमसाठ वाढत चाललेले दर, शेतीमालाला भाव नाही, तरुणांना रोजगार नाही, केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकरी विरोधी भूमिका घेतली जात असल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. एमजी रोडवरील काँग्रेस कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, शालिमारमार्गे आंबेडकर पुतळ्याजवळ या मोर्चाचा समारोप करण्यात आला. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. तेथे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना विविध मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, आमदार सुधीर तांबे, आमदार निर्मला गावीत, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, अनिल आहेर, जयप्रकाश छाजेड, नानासाहेब बोरस्ते, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, हेमलता पाटील, डॉ. तुषार शेवाळे, शाहू खैरे, अश्विनी बोरस्ते, ज्ञानेश्वर काळे, ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश कहांडळे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. दुपारी पावणेदोनच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. 'वाह रे मोदी तेरा खेल, डेटा सस्ता महेंगा तेल', 'मोदी हाय हाय', 'गली गली मे शोर है, चौकीदारही चोर है' यांसारख्या घोषणा देत आंदोलक शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पोहोचले. गळ्यात तिरंगी पट्टा, हातात पंजाचे चिन्हे असलेले झेंडे, इतकेच नव्हे तर काही कार्यकर्ते रिकामे सिलेंडर खांद्यावर घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झाले. शालिमार येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चाची सांगता झाली. तेथे चव्हाण यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढविला.

वाहतुकीचा फज्जा

दुपारी साडेबारा वाजता मोर्चा निघणार होता. त्यामुळे एमजी रोडवरील काँग्रेस कार्यालयाजवळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमले. जागा मिळेल तेथे वाहने उभी करण्यात आल्याने हा वर्दळीचा रस्ता वाहतुकीसाठी अरूंद ठरू लागला. त्यामुळे तब्बल दोन ते अडीच तास या परिसरात वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाला. या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने शालिमार ते रेडक्रॉस सिग्नल, रविवार कारंजा ते रेडक्रॉस सिग्नल, मेनरोड, अशोकस्तंभ आणि शालिमारपर्यंतच्या वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. ही वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

तिरंगी कमानींनी वेधले लक्ष

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बाळासाहेब थोरात नाशिकमध्ये येणार असल्याने ठिकठिकाणी स्वागतकमानी उभारण्यात आल्या. एमजी रोडवर दुतर्फा उभारलेल्या या तिरंगी कमानींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. शालिमार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ व्यासपीठ उभारण्यात आले होते. तिरंगी रंगात सजविलेले हे व्यासपीठही नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती

गेल्या दोन दिवसांपासून विविध पक्षांकडून आंदोलने सुरू झाल्याने शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. सोमवारी काँग्रेसने भारत बंदची हाक दिली होती. त्यामध्ये शिवसेना वगळता अनेक पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. पाठोपाठ आज पुन्हा राफेलसह अनेक धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरल्याने निवडणुकीच्या वातावरण निर्मितीला सुरुवात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीएसकें’वरील धडा वगळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी अटकेत असणारे विख्यात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील अभ्यासक्रमात असणारा धडा अखेरीस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून वगळण्यात आला आहे.

डीएसके यांची व्यवसायाची सुरुवात अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून झाली होती. अतिशय लहान स्वरूपाच्या सेवांपासून सुरुवात करीत त्यांनी बांधकाम क्षेत्रात यशस्वी कारकीर्द केली होती. त्यांचा हा व्यवसायातील प्रवास विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाच्या 'यशोगाथा' या पुस्तकात 'वास्तू उद्योगाचे अग्रणी : डी. एस. कुलकर्णी' या मथळ्याखाली एक धडा समाविष्ट करण्यात आलेला होता. हा धडा अभ्यासक्रमात येण्याच्या काळात डीएसके समूहाने यशाची उंची गाठलेली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी ठेवीदारांनी त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारींनंतर गुन्हे शाखेने त्यांच्यावर कारवाई केली. त्यामुळे या उद्योजकाची नंतरची काराकीर्द किंवा त्यावर आलेले आक्षेप विचारात घेता त्यांच्यावरील धडा अभ्यासक्रमातून वगळण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड आदींच्या वतीने विद्यापीठाकडे करण्यात आली होती. त्यावर विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार आता बी. कॉम. अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षातील मराठी विषयासाठीच्या 'यशोगाथा' या पुस्तकातील डॉ. प्र. चिं. शेजवलकर लिखित हा धडा चालू शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमातून वगळण्यात आला आहे.

--

प्राध्यापकांची संकटातून सुटका!

बी. कॉम. विद्याशाखेत तृतीय वर्षातील बिझनेस आंत्रप्रिन्युअरशीप स्पेशल पेपर ३ मधील द स्टडी ऑफ ऑटोबायोग्राफी ऑफ फॉलोइंग आंत्रप्रिन्युअर्समधील डीएसके यांच्यावरील भागही वगळण्यात आला आहे. डीएसके यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे हा धडा शिकविताना विद्यार्थ्यांनी त्यांच्यावरील सद्यस्थितीतल्या आक्षेपांबाबत प्रश्न उपस्थित केल्यास त्यांना काय उत्तर द्यावे, असा प्रश्न विद्यापीठातील काही प्राध्यापकांसह काही संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाकडे उपस्थित केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लवासा प्रकल्प पुन्हा सुरू करा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लवासा प्रकल्प बंद झाल्यामुळे अनेक कुटुंबांचा रोजगार बुडला असून, गावातील मुलांसाठी असलेल्या शाळेतील सुविधा बंद झाल्याने गावकरी समस्येने ग्रासले आहेत. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा आग्रह ग्रामस्थांनी धरला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बारामती लोकसभा मतदार संघातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे दिले. या वेळी आडमाळचे सरपंच हेमंत पासलकर, दासवेचे सरपंच शशिकांत मोरे, धामण ओव्हळचे सरपंच शंकर शेडगे, भोयणीचे सरपंच बाळू मरगळे, मुळशी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, वसंत वाटाणे, बाबू मरगळे, बाळासाहेब धोने, प्रकाश मोरे, विष्णू मोरे, लक्ष्मण पासलकर आदी उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी १८ गावांमध्ये भूसंपादन करण्यात आले. या गावांतील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला रोजगार देण्यात आला आहे; तसेच या परिसरात पायाभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीअंतर्गत (सीएसआर) या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली आहे. मात्र, प्रकल्प बंद झाल्यामुळे या शाळेतील मुलांना सुविधा देणे बंद झाले आहे. या ठिकाणी नोकरी करणाऱ्यांना वेतन मिळत नाही. केंद्र आणि राज्य सरकारने या गावांचा समावेश गिरीस्थान विकसित पर्यटनामध्ये केला आहे. त्यामुळे लावण्यात आलेले निर्बंध उठवावेत, असा ठराव करून ग्रामपंचायतींनी राज्य सरकारकडे पाठविला आहे, असे ग्रामस्थांनी बैठकीत सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रफाल जोड

0
0

व्यापाऱ्यांच्या हाती

देशाची संरक्षण सिद्धता

नाशिक : राफेलसाठी रिलायन्स कंपनीसोबत केंद्र सरकारने केलेला करार हा एचएएलला संपवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डाव असल्याचा आरोप माजी आमदार जयंत जा‌धव यांनी केला आहे. संरक्षण क्षेत्रासाठी अत्याधुनिक सामग्री तयार करण्याची भारतीय कंपन्याची क्षमता असताना, अनिल अंबानी यांच्या सारख्यांना या क्षेत्रात सहभागी करून घेत, व्यापाऱ्यांच्या हातात संरक्षण सिद्धता सोपवण्याचा प्रयत्न मोंदीचा प्रयत्न असल्याचाही आरोप त्यांनी केला.

असे करतांना मोदींना लाज कशी वाटत नाही? हा सरळ-सरळ तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी आणि अमित शाह हे सर्वसामान्य मानसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, एचएएल देशाच्या संरक्षण सामग्री तयार करण्यासाठी सक्षम असल्याचा दावाही जाधव यांनी केला.

'या तर चोराच्या

उलट्या बोंबा!'

नाशिक : देशातील बँकांच्या थकीत कर्जाला तत्कालीन यूपीए सरकार जबाबदार असल्याचे आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या पत्राचा भाजपने विपर्यास केला असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगत, 'एनपीए'विषयी भाजपची भूमिका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

'यूपीए'ची धोरण चुकीची होती तर, साडेचार वर्षात ती बदलण्यात का आली नाही असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. 'यूपीए'च्या काळात केवळ चार लाख कोटी रुपयांचा एनपीए होता. तो एनडीए सराकारच्या काळात ११ लाख कोटी रुपयांर्पयत गेला. असे असतानाही केंद्रीय मंत्री स्मृती इराणी वाढत्या 'एनपीए'ला 'यूपीए' सरकारचे धोरण जबाबदार असल्याचे सांगतात. तो 'यूपीए'च्या काळतला होता तर मग विजय मल्या, नीरव मोदी हे काय प्रकरण आहे, असा सवाल त्यांनी केला. नोटाबंदीच्या माध्यमातून तीन ते चार लाख कोटी रुपयांचा काळा पैसा सरकारकडे येईल, अशी आशा होती. सरकारने त्याच जोरावर बुलेट ट्रेनसारखे अनावश्यक मोठे प्रकल्प हाती घेतले गेले. मात्र, नोटाबंदीचा निर्णय फसल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इडियांच्या माहितीतून समोर आले. 'जीएसटी'च्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे करातून मिळणाऱ्या उत्पनातही अपेक्षित वाढ झाली नाही. त्यामुळे सरकारची आर्थिक कोंडी झाली असून, उत्पन्न व खर्चाचा तालमेल बिघडला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील कराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांवर कराचा बोजा टाकत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राहुल, पंतची झुंजार शतके

0
0

इंग्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या ७ बाद धावा

वृत्तसंस्था, लंडन

लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांच्या झुंजार शतकांच्या जोरावर भारतीय संघाने मालिकेतील पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडला अखेरच्या दिवशी चांगली टक्कर दिली. इंग्लंडने दिलेल्या ४६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने... धावा केल्या होत्या.

इंग्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर भारताची ३ बाद ५८ अशी स्थिती झाली होती. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांचा कितपत निभाव लागतो, याबाबत उत्सुकता होती. लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेने डावाला सुरुवात केली. सकाळच्या सत्रातील पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर अँडरसनला चौकार मारून लोकेश राहुलने अर्धशतक पूर्ण केले. या मालिकेत भारताच्या सलामीवीरने केलेले हे पहिलेच अर्धशतक ठरले. यानंतर लोकेश राहुल-रहाणेने सावध खेळ केला. राहुल ६२ धावांवर असताना मोइन अलीने पायचीतसाठी जोरदार अपील केले. मैदानावरील पंचांनी ते फेटाळून लावले. रूटने लगेच रिव्ह्यू घेतला. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. यानंतर राहुलने अलीला पुढच्या षटकात दोन चौकार मारून धावांचा वेग वाढविला. यानंतर रहाणेने करनला सलग दोन चौकार लगावले. अखेर अलीने रहाणेला बाद करून ही जोडी फोडली. रहाणेने १०६ चेंडूंत ५ चौकारांसह ३७ धावा केल्या. रहाणे-लोकेश राहुल जोडीने चौथ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. यानंतर पुढच्याच षटकात बेन स्टोक्सने हनुमा विहारीला माघारी पाठविले. विहारीला खातेही उघडता आले नाही. विहारीची ही पदार्पणाची कसोटी होती. त्याने पहिल्या डावात अर्धशतक ठोकले होते. या वेळी मात्र त्याला राहुलला साथ देता आली नाही. भारताची ५ बाद १२१ अशी अवस्था झाली होती. मात्र, याचे दडपण न घेता राहुललने आक्रमक पवित्रा घेतला. त्याने अलीला सलग दोन चौकार लगावले, तर पुढच्या षटकात स्टोक्सला षटकार व चौकार खेचला. यानंतर अखेरच्या चेंडूवर पुन्हा चौकार ठोकून शतक पूर्ण केले. हे त्याचे पाचवे कसोटी अर्धशतक ठरले. उपाहारापर्यंत भारताने ५ बाद १६७ धावा केल्या होत्या.

उपाहारानंतर राहुल-पंत जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांची कसोटी बघितली. या जोडीने अतिशय हुशारीने खेळ केला. कमकुवत चेंडूंचा समाचार घेत त्यांना सीमापार पाठविले. पंतने आदिल रशीदला खणखणीत षटकार खेचून शतक पूर्ण केले. त्याने अगदी बिनधास्तपणे खेळून प्रेक्षकांची मने जिंकली. पंतला लोकेश राहुलकडून चांगले प्रोत्साहन मिळत होते. पंत आक्रमक खेळत असल्याचे बघून लोकेश राहुलने काहीशी सावध फलंदाजी केली. या दोघांची फलंदाजी बघून भारतावर विजय टप्प्यात दिसू लागला. ही जोडी इंग्लंडला विजय मिळू देत नाही, असे स्पष्ट जाणवत होते. मात्र, रशीदच्या एका चेंडूवर लोकेश राहुल चकला आणि त्याचा त्रिफळा उडला. लोकेश राहुलने २२४ चेंडूंत २० चौकार व १ षटकारसह १४९ धावांची संस्मरणीय खेळी केली. लोकेश राहुलला या मालिकेतील मागील आठ डावांत ४, १३, ८, १०, २३, ३६, १९, ०, ३७ अशाच खेळी करता आल्या होत्या. लोकेश राहुल-पंत जोडीने सहाव्या विकेटसाठी २०४ धावांची भागीदारी केली. रशीदने आपल्या पुढच्या षटकात पंतलाही माघारी पाठवून इंग्लंडला आणखी एक मोठे यश मिळवून दिले. डावखुऱ्या पंतने १४६ चेंडूंत १५ चौकार व ४ षटकारांसह ११४ धावा केल्या. यष्टिरक्षण करताना पंतकडून काही चुका झाल्या. त्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती. मात्र, त्याने आपल्या बॅटने टीकाकारांची तोंडं बंद केली. त्याने काही अप्रतिम फटके लगावले. काही ड्राइव्ह तर डोळ्याचे पारणे फेडणारे होते. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी निवड समितीला त्याच्या नावाचा विचार करावा लागणार आहे.

धावफलक

इंग्लंड : पहिला डाव - ३३२

भारत : पहिला डाव - २९२

इंग्लंड : दुसरा डाव - ८ बाद ४२३ (घोषित)

भारत : पहिला डाव - (३ बाद ५८ वरून पुढे)

...

१ - इंग्लंडमध्ये भारताच्या यष्टिरक्षकाने केलेले हे पहिलेच कसोटी शतक ठरले. यापूर्वी महेंद्रसिंह धोनी केलेली ९२ धावांची खेळी सर्वोत्तम होती.

५ - लोकेश राहुलचे हे कसोटीतील पाचवे शतक ठरले. त्याचबरोबर इंग्लंडमधील पहिले, तर इंग्लंडविरुद्धचे दुसरे शतक ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जेपीसी’मार्फत चौकशी करा

0
0

राफेल खरेदी प्रकरणी कांगो यांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान एकीकडे प्रधानसेवक म्हणवून घेतात. संसदेच्या पायऱ्यांवर माथा टेकतात आणि दुसरीकडे राफेल खरेदी घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नियुक्तीलाही नकार देतात, असा आरोप भाकपचे भालचंद्र कांगो यांनी यावेळी केला.

फ्रेंड्स ऑफ डेमोक्रसीतर्फे राफेल खरेदी प्रकरणात मोदी दोषी आहेत काय, या विषयावर आयोजित चर्चासत्रात कांगो यांनी मंगळवारी मोंदीवर आरोप केले. 'मेक इन इंडिया'च्या नावाने सर्वसामान्यांचे रोजगारच हिरावले जात आहेत. नव्या रोजगाराची निर्मिती होत नाही. संरक्षण क्षेत्राचे खासगीकरण करण्याचे प्रयत्न सुरू असून, देशासाठी हा मोठा धोका आहे. उद्योगपती मित्रांचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी धोरणांनाही तिलांजली दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

आता अदानींचा नंबर

माजी उपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की राफेल विमान खेरदीत अंबानीना आर्थिक लाभ पोहोचवल्यानंतर केंद्र सरकारने आता गौतम अदानींना लाभ पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्र सरकारने ३६ राफेल विमानांसोबतच नव्याने ११० लढाऊ विमाने खेरदी करण्याची निविदा काढली आहे. या निविदेतही राफेलमधीलच सहा कंपन्यांनी निविदा दाखल केल्या असून, त्यात एका स्वीडनच्या कंपनीचाही समावेश आहे. रिलायन्सप्रमाणेच अदानी ग्रुपतर्फे अदानी डिफेन्स सिस्टीम्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. या कंपनीने स्वीडनच्या 'साब' कंपनीसोबत करार केला असून, ही ११० विमाने या कंपनीकडून खरेदी करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. रिलायन्सच्या कंपनीप्रमाणेच ही कंपनीही आताच स्थापन झाली असून, मोदींकडून अंबानी आणि अदानी यांना आर्थिक फायदा पोहोचवण्याचा, तसेच संरक्षण क्षेत्राशी खेळ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

चोर नहीं डाकू है : मेनन

पंतप्रधान नरेद्र मोदी हे अंबानी, मित्तल आणि अदानींसाठीच काम करीत असून, राफेल विमान खरेदी ही क्रोनी कॅपिटलचे उत्तम उदाहरण असल्याचा दावा 'आप'च्या प्रीती शर्मा मेनन यांनी केला आहे. रिलायन्स कम्युनिकेशन ही कंपनी ४५ हजार कोटींच्या तोट्यात आहे. मात्र, त्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रधानसेवक धडपड करीत आहेत. राफेल विमानातील भ्रष्टाचारासह अन्य भ्रष्टाचारावरही मोदी बोलायला तयार नाहीत. देशाला धोका देण्याचे काम ते करीत असून, हे लोक चोर नसून डाकू आहेत, असा आरोप त्यांनी या वेळी केला.

.........................

घटनाक्रम

८ एप्रिल २०१५ : परराष्ट्र सचिव जयशंकर यांनी राफेल विमाने घेण्याचा विचार नाही असे स्पष्ट केले.

१० एप्रिल २०१५ : नरेंद्र मोदींकडून फ्रान्समध्ये विमाने खरेदीची घोषणा

१३ एप्रिल २०१५ : संरक्षणमंत्र्यांनी १२६ विमाने खरेदी करणे परडवणारे नाही असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंत तपासणी शिबिर

0
0

दंत तपासणी शिबिर (फोटो)

नाशिकरोड : जेसीआय नाशिकरोड शाखेतर्फे सुरू असलेल्या जेसीआय गोल्डन वीक या उपक्रमांतर्गत मोटवाणीरोडवरील श्री गजानन महाराज मंदिरात नागरिकांसाठी नुकतेच दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात २५३ नागरिकांची डॉ. जयेश पाटील, डॉ. ऐश्वर्या आहेर, डॉ. रीतिमा पाटील या डॉक्टरांच्या पथकाकडून दंत तपासणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक संभाजी मोरुस्कर, जेसीआय नाशिकरोड शाखेचे अध्यक्ष भरत निमसे, सचिव आनंद भागवत, सौरभ मंडलेचा यांच्यासह श्रीकांत कटाळे, अंकुश सोमाणी, मुकेश चांडक, नितीन कुलकर्णी, तुषार लाहोटी आदी उपस्थित होते.

--

धरणे आंदोलन

जेलरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकातील कंत्राटी सफाई कामगारांना १३ हजार ८६० ऐवजी सहाच हजार वेतन दिले जात आहे. हा अन्याय थांबवून त्यांना पूर्ण वेतन मिळावे या मागणीसाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियन शुक्रवारी (दि. १४) सकाळी नऊला नाशिकरोड रेल्वेस्थानकात धरणे आंदोलन करणार आहे. युनियनचे सचिव भारत पाटील, आनंद गांगुर्डे यांनी ही माहिती दिली. स्टेशन मास्तरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कायद्यानुसार कंत्राटी कामगारांना प्रतिदिन ४६२ रुपये वेतन देणे आवश्यक आहे. परंतु, नाशिकरोड रेल्वेस्थानकातील कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांपासून प्रतिदिन फक्त दोनशे रुपये वेतन दिले जात आहे. भविष्यनिर्वाह निधी जमा केला जात नाही. भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविणाऱ्यांना कामावरून काढले जात आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करावी. कामगारांना पूर्ण वेतन द्यावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महात्मानगरला मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबीर

0
0

बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिर

नाशिक : मोरफी चेस अकॅडमीतर्फे १३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता श्रद्धा हाईट्स, महात्मानगर येथे विनामूल्य बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षातील हा अकरावा विनामूल्य बुद्धिबळ शिबिराचा उपक्रम असून आत्तापर्यंत तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी या उपक्रमांचा लाभ घेतला आहे. शिबिरासाठी आवश्यक असलेले बुद्धिबळ संच व इतर आवश्यक साहित्य अकडमीतर्फे खेळाडूंना पुरविण्यात येणार आहे. तसेच शिबिरात कौशल्य दाखवणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहनपर बक्षिसे देवून गौरविण्यात येणार आहे. शिबिरात जास्तीत जास्त ३० खेळाडूंना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य याप्रमाणे प्रवेश देण्यात येणार आहे. १३ वर्षाखालील मुलांना या शिबिरात प्रवेश देण्यात येणार आहे. शिबिर विनामूल्य असले तरी खेळाडूंनी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ९८५०३१२८०० किंवा morphychessacademy333@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा. या शिबिराचा सर्व खेळाडूंनी फायदा घ्यावा असे आवाहन मोरफी चेस अकॅडेमीचे संचालक महेश शिंदे यांनी केले आहे.

00

वेटलिफ्टिंगमध्ये छत्रे विद्यालयाला चार सुवर्ण

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय १२ व १४ वर्ष वयोगटांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत छत्रे विद्यालय, जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत घवघवीत यश संपादन केले. चार सुवर्णपदकांसह दोन रौप्य व एक कांस्यपदक मिळवीत १४ वर्षे मुलींचे सांघिक उपविजेतेपद पटकाविले. सांगली येथे झालेल्या स्पर्धत ३२० खेळाडूंनी सहभागी घेतला. आकांक्षा किशोर व्यवहारे हिने १२ व १४ वर्ष या दोन्ही वयोगटात ३२ किलो वजनी गटात २ सुवर्णपदक प्राप्त करीत लक्षवेधी कामगिरी केली. कृष्णा संजय व्यवहारे याने १२ वर्ष आतील गटात ३० किलो वजनी गटात रौप्यपदक, साइराज राजेश परदेशी याने ४० किलो वजनी गटात सुवर्णपदक तर वैष्णवी वाल्मिक इप्पर हिने ५४ किलो वजनी गटात सुवर्णपदक, सिद्धी सुनील नागरे हिने ५० किलो वजनी गटात रौप्यपदक, जयराज राजेश परदेशी याने ५६ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकाविले. मानसी लाड, धनश्री बेदाडे, संध्या सरोदे, वैष्णवी उगले, स्नेहल माळी, आदित्य देवगिर, सलोनी कुडाळ, पुजा वैष्णव यांनी पहिल्यांदाच राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होत चांगली कामगिरी करीत सांघिक विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. छत्रे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रवीण व्यवहारे व प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिघे बडतर्फे, एकाचे निलंबन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेशिस्त व भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर बडतर्फीच्या कारवाईचा प्रस्ताव ठेवला आहे. डिझेल घोटाळ्याप्रकरणी विभागीय चौकशीत दोषी आढळलेल्या अग्निशमन विभागातील वाहनचालकावरदेखील बडतर्फीची कारवाई प्रस्तावित केल्याने खळबळ उडाली आहे. सोबतच एसीबीच्या उपअधीक्षकाची फसवणूक केल्याप्रकरणी महिला कर्मचारी संत्रा बोध यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राखीव जागांवर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. बारा कर्मचाऱ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्याची माहिती तपासणीत समोर आल्यानंतर प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वाढीव मुदत दिली होती. या मुदतीनंतरही जात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या वाहनचालक अशोक दिनकर दळवी व बिगारी यशोदा गंगाधर जाधव या दोघा कर्मचाऱ्यांवर आयुक्त मुंढे यांनी बडतर्फीची कारवाई अंतिम केली आहे. त्याचप्रमाणे डिझेलचा अपहार केल्याप्रकरणी अग्निशमन विभागातील वाहनचालक रवींद्र भोळे विभागीय चौकशीत दोषी आढळल्यामुळे त्याच्यावरदेखील बडतर्फीची कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचे मनपा प्रशासनातील सूत्रांकडून सांगण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील उपअधीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या मालकीच्या सदनिकेवर परस्पर गृहकर्ज काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या महापालिका कर्मचारी संत्रा बोध या महिलेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची विभागीय चौकशी केली जाणार असून, दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय पक्षांचा यंत्र चाचणीला ठेंगा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मतदान यंत्रे मॅनेज केली जात असल्याचा शंखनाद राजकीय पक्षांकडून केला जातो. मात्र, निवडणूक आयोगाने पाठविलेले अद्ययावत बॅलेट आणि कंट्रोल युनिट नेमके कसे काम करते हे जाणून घेण्यात स्वारस्य नसल्याचे शहरातील राजकीय पक्षांनी मंगळवारी दाखवून दिले. निवडणूक शाखेने या यंत्रांची प्राथमिक चाचणी पहाण्यास निमंत्रित करूनही शिवसेना वगळता एकाही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी फिरकला नाही. सत्तेसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या राजकीय पक्षांची ही उदासिनता चर्चेचा विषय ठरली आहे.

मोदी सरकारच्या विरोधात अनेक राजकीय पक्ष एकवटण्यास सुरुवात झाली आहे. मतदान यंत्रांमध्ये घोळ असल्यानेच भाजपचा विजयाचा वारू चौखुर उधळत असल्याची टीका यापूर्वी काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी सातत्याने केली आहे. २०१९ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगही अधिक सक्रीय झाला आहे. मतदानासाठी वापरण्यात येणारे बॅलेट आणि कंट्रोल युनिट त्या-त्या जिल्ह्यांमध्ये दाखल होऊ लागले आहेत. नाशिकमध्येही निवडूक आयोगाची अद्ययावत यंत्रे दाखल झाली असून त्यांची प्राथमिक चाचणी मंगळवारी अंबड येथील वेअर हाउसमध्ये घेण्यात येणार होती. त्यासाठी निवडणूक आयोगाचे २० इंजिनीयर आले आहेत. हे यंत्र नेमके कसे काम करते, त्यामध्ये काय करता येऊ शकते व काय करता येऊ शकत नाही याबाबतची माहिती दिली जाणार होती. इतकेच नव्हे तर ही यंत्र हाताळण्याची व शंकांचे निरसन करवून घेण्याची संधीही राजकीय पक्षांना मिळणार होती. सकाळी ११ वाजता घेण्यात येणार असलेल्या या चाचणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली. परंतु, शिवसेनेचा एक कार्यकर्ता वगळता अन्य कोणत्याच पक्षाचा पदाधिकारी या चाचणीकडे फिरकला नाही. राजकीय पक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून दाखविण्यात आलेल्या या अनास्थेबद्दल प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे.

लोगो : चर्चा तर होणारच!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images