Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिकमध्ये लवकरच रेल्वे चाइल्ड लाइन

$
0
0

नांदगाव ते इगतपुरी स्टेशन कार्यक्षेत्रात होणार कार्यान्वित

....

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

...

नाशिक : कोणत्या ना कोणत्या कारणांनी भरकटणारी, कुटुंबीयांपासून मनाने दुरावलेली मुले रेल्वेचाच आधार घेत असल्याचे निरीक्षण चाइल्ड लाइनने नोंदविले आहे. अशा मुलांच्या समुपदेशनासह त्यांच्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करता यावे, याकरिता देशभर रेल्वे चाइल्ड लाइनचे जाळे निर्माण करण्यास चाइल्ड लाइन इंडिया फाउंडेशनने सुरुवात केली आहे. देशभरात आतापर्यंत ३० ठिकाणी कार्यान्वित असलेली रेल्वे चाइल्ड लाइन हायरिस्क झोनमध्ये असलेल्या नाशिकमध्येही लवकरच सुरू होणार आहे.

एक दिवसांच्या बाळापासून अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर पावले ठेऊ पहाणाऱ्या युवांच्या पुनर्वसनासाठी चाइल्ड लाइन इंडिया फाउंडेशन काम करीत आहे. देशभरात ४८० हून अधिक शहरांपर्यंत चाइल्ड लाइनचा विस्तार वाढला आहे. अनाथ, निराधार अवस्थेत सापडणारी, भीक मागणारी, गुन्हेगारीकडे ओढली गेलेली, बालकामगार म्हणून काम करणारी, कुटुंबीयांपासून दुरावलेली, अत्याचाराचा बळी ठरलेल्या बालकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समुपदेशनासह पुनर्वसनाचे काम चाइल्ड लाइन करीत आहे. काही मुले जाणीवपूर्वक घर सोडतात, काही हरवतात, तर काही व्यसनाधिनतेमुळे भरकटतात. रेल्वे स्टेशन परिसरात अशा अल्पवयीनांचे प्रमाण वाढू लागले आहे. चाइल्ड लाइनच्या १०९८ या हेल्पलाइन क्रमांकावर त्याबाबतची माहिती सातत्याने प्राप्त होत असते. विशेषत: रात्री नऊपासून पहाटेपर्यंत याबाबतचे कॉल्स येत असल्याने त्याचक्षणी संबंधित बालकांपर्यंत पोहोचून त्यांना मदत पोहोचविण्यात चाइल्ड लाइनला अनेक मर्यादा येत आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाच्या मदतीने चाइल्ड लाइन ऑफ इंडिया फाउंडेशनने रेल्वे चाइल्ड लाइन कार्यान्वित करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात नागपूर, लोकमान्य टिळक टर्मिनल्स या ठिकाणी चाइल्ड लाइन कार्यान्वित झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातही रेल्वे तसेच, रेल्वे स्थानकांवर बेवारस अवस्थेत बालके आढळण्याचे प्रमाण वाढते आहे. यामुळे नाशिक रेल्वेस्टेशन येथे रेल्वे चाइल्ड लाइन सुरू करण्यास फाउंडेशनने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यात नांदगाव ते इगतपुरी स्टेशन या कार्यक्षेत्रासाठी रेल्वे चाइल्ड लाइन सुरू होऊ शकणार आहे.

-

काय आहे रेल्वे चाइल्ड लाइन

चाइल्ड लाइनची जबाबदारी दिली जाईल, त्या स्वयंसेवी संस्थेचे रेल्वे स्थानकावर कार्यालय असेल. तेथे केंद्र समन्वयकांबरोबरच आठ ते दहा जणांचे पथक कार्यरत असेल. बालक असुरक्षित असल्याची किंवा ते भरकटत आल्याची माहिती मिळाली, तर त्यांच्यापर्यंत वेळीच पोहोचून मदत करण्यास, त्यांनी घर सोडले असल्यास त्यांचे समुपदेशन करून पुन्हा कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यास मदत करू शकेल.

...

रेल्वेत एखाद्या बालकाची सुटका करण्यासाठी आम्ही गेलो, तर लोक आमच्याकडेच संशयाने बघतात. त्यामुळे मदतकार्यात अडचणी येतात. रेल्वे पोलिसातील कर्मचारी अनोळखी असतील, तर त्यांची मदत मिळण्यातही आम्हाला मर्यादा येतात. रेल्वे चाइल्ड लाइन सुरू झाली, तर अशा अनेक अडचणी दूर होऊन बालकांना अपेक्षित मदत मिळू शकेल. सहा महिन्यांत ही चाइल्ड लाइन सुरू होणे अपेक्षित आहे.

- प्रवीण आहेर, समन्वयक, चाइल्ड लाइन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाच घेताना पोलिसाला पकडले

$
0
0

नाशिक : फसवणुकीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून नाव न घेण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागून त्यापैकी पाच हजार रुपये स्वीकारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. मंगळवारी मुंबईनाका पोलिस स्टेशन समोरील आवारात ही कारवाई करण्यात आली. योगेश शंकर लोंढे असे या पोलिस शिपायाचे नाव आहे. तक्रारदाराच्या मित्राविरोधात मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत्यूनंतरही बाबूजींची अवहेलनाच!

$
0
0

शासकीय इतमामात अंत्यसंस्कारापासून वंचित

...

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

आयुष्यभर तत्त्वांशी बांधिलकी सांगणारे व मूल्यांशी निगडित राहणारे राजकारण करीत आपले वेगळे अस्तित्व जपणारे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते कॉ. माधवराव गायकवाड हे मरणानंतरही सरकार दरबारी उपेक्षितच राहिले. जिल्हा प्रशासन व राज्य सरकारच्या अनास्थेमुळे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. यामुळे सरकार टीकेचे धनी बनले आहे.

स्वातंत्र्य सैनिक, गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ लढा, हैदराबाद मुक्ती संग्राम अशा तिन्ही लढ्यात कॉ. गायकवाड यांचे योगदान होते. तसेच, ते विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते होते. असे असताना या लढवय्या नेत्याचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार तसेच, मानवंदना देण्यासंबंधी जिल्हा प्रशासन व मुख्यमंत्री कार्यालयाला माहिती दिली होती. मात्र, चोवीस तास उलटूनही त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार की नाहीत हे स्पष्ट होत नव्हते. राज्यमंत्री दादा भुसे यांनीदेखील याबाबत पाठपुरावा केला. अखेर अंत्यसंस्कार सुरू असताना प्रशासनाकडून याबाबतचा फॅक्स पाठवून काही काळ थांबण्याची विनंती करण्यात आली. पण, गायकवाड कुटुंबीय व बाबूजींच्या कॉम्रेड अनुयायांनी तो नाकारून साध्या पद्धतीने अंत्यसंस्कार करून नंतर राज्य सरकारला धारेवर धरले. गायकवाड कुटुंबीय देखील नाराज झाले. त्यामुळे शासनाच्या गौरवाची वाट न पाहता अंत्यविधी करण्यात आल्याचे साधना गायकवाड यांनी सांगितले.

...

मटा भूमिका

कष्टकऱ्यांसाठीच सारे आयुष्य वेचलेल्या कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या अंत्यविधीप्रसंगी शासन- प्रशासनाने घातलेला घोळ हा लज्जास्पद तर आहेच शिवाय संसदीय परंपरांचा भंग करणाराही आहे. स्वातंत्र्य संग्रामापासून हैदराबाद व गोवा मुक्ती लढ्यात सहभाग, विधान परिषदेत विरोधी पक्षनेते व विधानसभा सदस्य अशी सारी पात्रता असतांना बाबूजींचा अंत्यविधी शासकीय इतमामात न होणे हा शासनाने सद्सदविवेकबुध्दीला रजा दिल्याचे द्योतक आहे. डाव्या चळवळीतील तत्त्वनिष्ठ नेत्याला मृत्यूपश्चात मिळालेली ही वागणूक राज्याच्या पुरोगामी प्रतिमेला धक्का देणारी ठरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुकीची जीवनशैली, आजारांना आमंत्रण देई!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मधुमेह हा केवळ जीवनशैलीच्या अनियमिततेतून उद्भवाणारा आजार असल्याचा गैरसमज आहे. या आजारासाठी असणाऱ्या अनेक कारणांपैकी एक कारण चुकीची जीवनशैली असले तरीही हे सर्वव्यापी कारण नाही. तरीही एकसमान कार्यपध्दती आणि खानपान पध्दती असणाऱ्या विशिष्ट समूहांमध्ये मधुमेहासारखे आजार फोफावत असल्याची अलिकडील वैद्यकीय निरीक्षणे वास्तवावर बोट ठेवत असल्याची बाब 'मटा राऊंड टेबल' चर्चेत अधोरेखीत झाली.

नाशिक शहर आणि जिल्ह्यातही तज्ज्ञ डॉक्टरांची याबाबत सूक्ष्म निरीक्षणे आहेत. विशिष्ट प्रदेशातील विशिष्ट खानपान पध्दती, आहाराच्या विशिष्ट वेळा आणि अत्याधुनिक यंत्रांमुळे कमी झालेली श्रमपध्दती या कारणांमुळे विशिष्ट समूहच मधुमेहजन्य आजारांना मोठ्या संख्येने बळी पडत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. यासाठी डॉक्टरांना अशा समूहातील रुग्णांवरील उपचार पध्दतीने विशिष्ट औषधांची मात्र द्यावी लागते. या समूहातील रुग्णांशी संवाद साधून समुपदेशनाव्दारे त्यांच्या जीवनशैलीत आरोग्यास पूरक बदल घडविल्यास त्यांचे सकारात्मक परिणामही दिसून येत असल्याने तज्ज्ञांनी सांगितले.

...

आवश्यक उपाययोजनांची गरज

दिवसेंदिवस वेगाने वाढत जाणाऱ्या समूहजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा समावेश आरोग्यविषयक धोरणांमध्ये शासनाने केल्यास त्याचा जनतेच्या आरोग्यास लाभच होईल, असा आशावादही तज्ज्ञ डॉक्टरांनी या चर्चासत्राव्दारे व्यक्त केला.

- सविस्तर वृत्त...प्लस ४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ पोलिसाचे निलंबन

$
0
0

नाशिक : पेठ तालुक्यात कार्यरत पोलिस अधिकाऱ्याच्या वाहनावरील चालक विलास पाटील हा हॉटेल व्यावसायिकाकडून हप्ता वसूल करीत असल्याचा व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. पेठमध्ये कार्यरत पाटील आडनावाच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासाठी ही हप्ते वसुली सुरू असल्याचे या व्हिडीओमधून स्पष्ट होत होते. या प्रकाराची दखल घेऊन पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. याखेरीज कर्मचाऱ्याची खात्यांतर्गत चौकशी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार अनिल गोटेंचा भाजपविरुद्धच सामना

$
0
0

धुळे महापालिकेच्या रणात चुरस कायम

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरातील भाजपमध्ये पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आलेली असतानाच पक्षाचे आमदार अनिल गोटे यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष आता राज्यस्तरावर पोहचला आहे. याबाबत आमदार अनिल गोटे यांनी मंगळवारी एक सात पानी पत्र जाहीर करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता भाजप विरुद्ध स्वामिभानी भाजप असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

धुळे महापालिकेची निवडणूक लागण्याअगोदरपासूनच राजकीय फटाके फूटू लागले होते. त्यात आता भाजप आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या बंडाच्या बॉम्बचा समावेश झाला आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सभेत झालेल्या प्रकारानंतर धुळ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, दुसऱ्या दिवशी नाराज आमदार अनिल गोटे यांनी जाहीर सभा घेत मीच महापौरपदाचा उमेदवार असल्याचे जाहीर केले. तसेच प्रसंगी आमदरकीचा राजीनामा देणार, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे इतर राजकीय पक्षांसह धुळेकरांचेही लक्ष लागून आहे.

दरम्यान, प्रभारी म्हणून नेमलेले मंत्री गिरीश महाजन हे भाजपची आता रणनीती तयार करीत आहेत. तर स्वाभिमानी भारतीय जनता पार्टी नावाने आमदार अनिल गोटे हे एक गट निवडणूक मैदानात उतरविणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे धुळे महापालिकेत भाजप विरुद्ध स्वाभिमानी भाजप यांच्यात सामना होण्याची चिन्हे आहेत. धुळे मनपाच्या आगामी निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, तीन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

इतर पक्षांचे ‘आस्ते कदम’
धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले असून, भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि स्वाभिमानी भाजपा यांच्यात चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. यामध्ये शिवसेनेने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. मात्र, खासदार संजय राऊत आणि के. पी. नाईक यांच्यावर या निवडणुकीची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतरच शिवसेनेचे चित्र स्पष्ट होईल. समाजवादी पक्षाचे अबू आझमी धुळ्यात येऊन पक्षाचे काम निश्चित करून गेले आहेत. तर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांची गोपनीय चर्चादेखील झालेली आहे. राहिला विषय बहुजन महासंघ, रिपाईचे नेमकं काय चित्र जाणार अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे इतर पक्षांनी भाजपमधील बंडाचे नाट्य पाहून सध्यातरी ‘आस्ते कदम’ हीच भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्र व केंद्रनिहाय मतदार यादी आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख यांनी जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी सुमारे ४५० मतदान केंद्रे असून, प्रत्येक केंद्रावर ६ तसेच १० टक्के राखीव म्हणून एकूण २ हजार ७४५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

धुळे महापालिकेचा आकड्यांचा खेळ...
१९ प्रभागांसाठी .............दि. ९ डिसेंबरला मतदान
६ नोव्हेंबरला.................अंतिम मतदार यादी जाहीर
३ लाख २९ हजार ५६९ मतदार.......मतदानासाठी पात्र
१ लाख ७४ हजार ६९६..........पुरुष मतदार
१ लाख ५४ हजार ८६०..........महिला मतदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘परिवर्तन महोत्सव’ शुक्रवारपासून धुळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव मधील प्रसिद्ध नाट्यसंस्था परिवर्तन यांच्याकडून धुळे येथे दि. १६, १७ व १८ नोव्हेंबर या कालावधीत ‘यादव खैरनार स्मृति परिवर्तन महोत्सव २०१८’ साजरा केला जाणार आहे. या महोत्सवाने धुळेकरांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. या महोत्सवाचे आयोजन व्यंकटेश लॉन गरुड बाग, धुळे येथे रोज सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित केला जाणार आहे. शहरातील कलावंत, लेखक, रसिक या महोत्सवात एकत्र येऊन महोत्सवाच्या नियोजनात मदत करीत आहेत.

या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘नली’ या एकलनाट्याचा प्रयोग सादर होईल. श्रीकांत देशमुख लिखित नलिनी देवराव हे व्यक्तिचित्रण ज्याचे नाट्यरूपांतर ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी केलेले आहे. योगेश पाटील यांचे दिग्दर्शन तर हर्षल पाटील अभिनित एकल नाट्य प्रयोगाने या कला महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दि. १७ नोव्हेंबरला बहिणाबाईंच्या कविता व गाण्यांवर आधारित संगीतमय कार्यक्रम ‘अरे संसार संसार’ सादर होणार आहे. याची संकल्पना विजय जैन यांची तर दिग्दर्शक पुरुषोत्तम चौधरी यांचे आहे. तिसऱ्या दिवशी महाश्वेता देवी लिखित ‘कुरुक्षेत्रा नंतर’ हे मंजुषा भिडे दिग्दर्शित अभिवाचन व उदय प्रकाश लिखित ‘वारेन हेस्टिंग्सचा सांड’ हे नारायण बाविस्कर दिग्दर्शित अभिवाचन सादर होईल. नाट्य संगीत व साहित्य यांचा अनोखा मिलाफ या महोत्सवात सादर करण्यात आलेला आहे.

धुळ्यामधील सांस्कृतिक क्षेत्रात या महोत्सवामुळे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. महोत्सवामध्ये डॉ. रेखा महाजन, सुदीप्ता सरकार, होरिलसिंग राजपूत, सोनाली पाटील, मंगेश कुलकर्णी, श्रद्धा पुराणीक, उदय सपकाळे, भूषण गुरव, जयश्री पाटील, अक्षय गजभिये, अंजली हांडे, अभिषेक पाटील, हर्षदा कोल्हटकर, मनीष गुरव, अनुषा महाजन, हर्षदा पाटील, मोना तडवी, निखिल क्षीरसागर, सुनील बारी आदी कलावंत सहभागी होणार आहेत. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी वसंत गायकवाड, राजू बाविस्कर, ज्ञानेश्वर शेंडे, विकास मल्हारा, नितिन सोनवणे, विशाल कुळकर्णी, राहुल निंबाळकर, रश्मी कुरंमभट्टी, मानसी जोशी, सुनीता दप्तरी, मनोज पाटील, डॉ. किशोर पवार, प्रीती झारे, योगेश चौधरी, शशीकांत महानोर, प्रतीक्षा कल्पराज, मिलिंद जंगम, अक्षय नेहे, उदय ऐशे, मुकेश पवार, संदीप केदार आदी कलावंत प्रयत्नशील आहेत .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा यंदाही रडवणार

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सरासरीइतका पाऊस न झाल्याने राज्यासह उत्तर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पाणीबाणीचा फटका कांदालागवडीला बसला असून, कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाखालील क्षेत्र पाण्याअभावी वाया गेले आहे. परिणामी कांदाउत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांसह ग्राहक आणि सत्ताधारी सरकारलाही यंदा कांदा रडवण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत गेल्या मोसमात पावसाने सरासरी न गाठल्याने यंदा कधी नव्हे इतक्या लवकर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. विभागातील तब्बल ३९ तालुक्यांत भूजलपातळी खालावली असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील १२ तालुक्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा कांदा पिकाखालील क्षेत्रात काही अंशी वाढ झाली आहे; मात्र पाण्याअभावी कांदा पीक संकटात सापडले आहे.

गेल्या वर्षीच्या खरीपात नाशिक विभागात २९ हजार ४६६ हेक्टर, तर लेटखरीपात ५६ हजार १९८ हेक्टर अशी एकूण ८५ हजार ६६४ हेक्टर क्षेत्रावर लाल कांद्याची लागवड झाली होती. नाशिक विभागात यंदा खरीपातील लाल कांद्याची ७५ हजार ७१२ हेक्टर इतक्या मोठ्या क्षेत्रावर लागवड झाली आहे. मात्र ऑगस्टमध्ये दोन मोठे ड्राय स्पेट आल्याने व परतीच्या पावसानेही हजेरी न लावल्याने खरीपातील कांदा पीक पाण्याअभावी वाया गेले आहे. परतीच्या पावसानेही अपेक्षाभंग केल्याने लेटखरीपातील लाल कांद्याच्या लागवडीत घट आली आहे. खरीपात लाल कांद्याच्या लागवडीत वाढ होऊनही पाण्याअभावी हे पीक वाया गेल्याने आणि लेटखरीपातील कांदालागवडीत मोठी घट आल्याने यंदा कांदाउत्पादनात घट निश्चित आहे. नाशिक व नगर जिल्ह्यात लेटखरीप तर नंदुरबार जिल्ह्यात खरीप कांदालागवडीत मोठी घट आली आहे.

66613303

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेन्शनच्या पैशातून आदिवासींना मदत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

अशोका मार्गावरील समता ज्येष्ठ नागरिकांतर्फे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्षवाडी, जांभुळपाडातील आदिवासी पाड्यांवर चारशे आदिवासींना फराळ, कपडे वाटप करुन दिवाळी साजरी करण्यात आली. या उपक्रमाचे हे दहावे वर्ष होते. ज्येष्ठ सदस्यांनी आपल्या पेन्शनची काही रक्कम या उपक्रमासाठी दिली.

संघाचे अध्यक्ष डॉ. श्रीराम ठाकूर, उपाध्यक्ष डी. एफ. मोरे, सचिव दिनानाथ पाटील, बळवंत शिर्के, आर. आर. गरुड, रा. शि. दोंदे, चिंतामण आहेर, राजेंद्र सावंत एस. एस. मोरे, आनंद कांबळे, सरपंच हर्षदा बुरुंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. संघाने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन हर्षवाडी गावाचा सर्वांगीण विकासाचा संकल्प सोडला आहे. येथील आदिवासींच्या आरोग्याला प्राधान्य देऊन संघ व अशोक मेडिकव्हर हास्पिटलतर्फे आरोग्य शिबिर घेण्यात आले. डॉक्टरांनी रुग्ण तपासणी करून औषधोपचार केले. हर्षवाडी हे गाव दत्तक घेतल्याचे ठाकूर यांनी सांगितले. ते म्हणाले की आदिवासी हे समाजाचा महत्वाचा घटक असून आपल्याबरोबर त्यांचाही विकास झाला पाहिजे. संघातर्फे वेळोवेळी येथे भेट देऊन शेती नियोजन, जलसिंचन व्यवस्था, आरोग्य याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या गावाजवळ हरिहर गड आहे. तो पाहण्यासाठी पर्यटक येतात. त्यामुळे युवकांना रोजगारही मिळतो. हर्षवाडी पर्यटनस्थळ होण्यासाठी प्रयत्न केले जातील. सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आगीत महिलेचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंजमाळ परिसरातील पंचशीलनगर झोपडपट्टीमध्ये पाच झोपड्यांना लागलेल्या आगीत एक विवाहिता जळून ठार झाली. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक रहिवाशांसह अग्निशमन विभागाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. परंतु, या आगीमुळे संबंधित रहिवाशांचे संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही, असे पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले.

भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता योगेश लाहोटी (वय ३०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला भगूर येथील रहिवाशी असून मंगळवारी सायंकाळी पंचशीलनगर येथे राहणाऱ्या भागूबाई आव्हाड या तिच्या आत्याला भेटण्यासाठी आली होती. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आव्हाड भाजी आणण्याकरीता घराबाहेर पडल्या. त्यावेळी सुनीता घरात एकट्याच होत्या. काही वेळातच घरातून धूर निघू लागल्याचे या परिसरातील छोटू भालेराव, सोनू पठाण, शाहरूख शेख, इम्रान शेख, जावेद शेख, कुणाल पवार, अल्ताफ शेख आदी रहिवाशांनी पाहिले. त्यांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. आव्हाड यांच्या आसपासच्या घरांपर्यंत आग पसरली होती. काही रहिवाशांनी लगेचच पोलिस आणि अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. काही धडपड्या तरुणांनी आपल्या घरांमधून पाण्याच्या बादल्या भरून आणत आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. आव्हाड यांच्या घरातून ओरडण्याचा आवाज येऊ लागल्याने काही तरुणांनी त्यांच्या घराच्या दरवाजाकडे धाव घेतली. परंतु, दरवाजाला आतून कडी असल्याने तो उघडत नव्हता. बाजूलाच राहणाऱ्या रत्ना मोरे कामावर गेल्याने त्यांचेही घर बंद होते. या दोन्ही घरांमध्ये आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने रहिवाशांनी त्यांचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. शर्थीचे प्रयत्न करून दरवाजे उघडण्यात आले. परंतु, तोपर्यंत सुनीता यांचा मृत्यू झाला होता. घरांमधील सर्व संसारोपयोगी सामानही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. या आगीच्या घटनेत आव्हाड आणि मोरे यांच्यासह प्रकाश जाधव, रेणुका नेमाने, सुनील पालवे, सुनील गवांदे यांच्याही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या भद्रकाली पोलिसांनी सुनीता यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी एकच आक्रोश झाला. पोलिसांनी हा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविला. घरात स्टोव्हचा भडका झाला असावा, त्यामुळे लाकडी फळ्यांच्या भिंतीने पेट घेऊन आग पसरली असावी असा प्राथमिक अंदाज रहिवाशी व्यक्त करीत होते.

अग्निशमन विभागाला अडचणी

आगीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे चार बंब पंचशीलनगर परिसरात दाखल झाले. परंतु, अरुंद रस्ते आणि गल्लीबोळांमुळे या वाहनांना घटनास्थळापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी मुख्य रस्त्यांवर वाहने उभे करून तेथून पाण्याचे पाइप घटनास्थळांपर्यंत आणले. पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्यात आली. परंतु, तोपर्यंत रहिवाशांच्या घरांमधील टीव्ही, सीडी प्लेअर, कपडे, भांडी यांसह जीवनावश्यक सर्व साहित्य जळून खाक झाले.

सिलेंडर गेले चोरीस

आगीची घटना घडल्यानंतर परिसरातील जागरूक नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून घरातील सर्व सिलेंडर्स घटनास्थळापासून काही अंतरावर नेऊन ठेवले. त्यानंतर अधिक जोमाने आग विझविण्याचे काम सुरू झाले. परंतु, या दरम्यान काही रहिवाशांचे गॅस सिलेंडर चारीस गेल्याचे प्रकार घडले. एकीकडे काही नागरिकांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मदत कार्यात स्वत:ला झोकून दिल्याचे चित्र पहावयास मिळत होते तर दुसरीकडे काही नागरिकांनी या दुर्घटनेकडे संधी म्हणून पहात जीवनावश्यक वस्तू लांबविण्यात धन्यता मानली. त्यामुळे घटनास्थळी आलेल्या पोलिसांना चोरीस गेलेले सिलेंडर मिळवून देण्याची जबाबदारी देखील पार पाडावी लागली. आग लागलेल्या एका घरात सुमारे १० हजार रुपयांची रोकड आढळून आली. संबंधितांना ती रक्कम परत करता यावी यासाठी काही रहिवाशांनी ती जपून ठेवल्याचेही सांगितले जात होते.

लाहोटी कुटुंबावर पुन्हा दु:खाचा डोंगर

सुनीता यांच्या मृत्यूमूळे लाहोटी कुटुंबावर गेल्या दहा दिवसांत दुसऱ्यांदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुनीता यांच्या सासूबाईंचे १० दिवसांपूर्वी निधन झाले आहे. गुरूवारी होणाऱ्या उत्तरकार्याची तयारी सुरू असतानाच सुनीता यांचाही असा अकाली मृत्यू झाल्याने सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात हळहळ व्यक्त होत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संपूर्ण नाशिक जिल्ह्यालाच दुष्काळी जाहीर करून माणसांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे, वनराई बंधारे घालून उपलब्ध पाणी अडवावे आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेने बुधवारी शहरातून लक्षवेधी मोर्चा काढला. दुष्काळी उपाययोजनांबरोबरच शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात, अशी मागणीही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य किसान सभेने भव्य मोर्चाची साद दिली असल्याने जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शेतकरी तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले होते. मोर्चाची वेळ दुपारी १२ वाजताची होती. परंतू तालुक्यांच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांना शहरात पोहोचण्यास विलंब झाला. त्यामुळे दुपारी दोनच्या सुमारास मोर्चाला सुरूवात झाली. डोक्यात लाल टोप्या घालून हजारो शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्यात महिलांचे प्रमाणही लक्षणीय होते. राज्य किसान सभेचे अध्यक्ष सावळीराम पवार, आमदार जीवा गावीत, इरफान खान, सुनील मालुसरे, किसन गुजर, इंद्रजित गावित, सुभाष चौधरी, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मार्चात सहभाग घेतला.

गोल्फ क्लब मैदान येथून मोर्चाला सुरूवात झाली. त्र्यंबकनाका सिग्नल, जिल्हा परिषद, खडकाळी सिग्नल, शालिमार मार्गे हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पोहोचला. मोर्चेकऱ्यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे जोरदार घोषणाबाजी करीत सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये झाले. सीबीएस आणि शालीमारकडील दोन्ही रस्त्यांवर मोर्चेकऱ्यांनी बैठक मारली. मोर्चाचा अंदाज घेऊन पोलिसांनी सीबीएस ते शालीमार हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. सुमारे दोन ते तीन तास हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. त्यामुळे अन्य मार्गांनी वाहतूक वळविण्यात आली.

सभेनंतर मोर्चेकऱ्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. तेथे जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यंदा सरासरीहूनही खूपच कमी पाऊस झाल्याने खरीपातील पिके जळाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, भरपाईपोटी प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टर ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज माफ करावे, नदीजोड प्रकल्प रद्द करून नार-पार दमण गंगा व त्यांच्या उपनद्यांचे पाणी अडवून ते बोगद्यापर्यंत वळवून मराठवाडा, खानदेश, नगरसारख्या दुष्काळी विभागात वळवा, वनाधिकाराचे अपात्र दावे पात्र ठरवून सात बारा उतारा तयार करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, नवीन रेशन कार्ड द्या, ज्येष्ठ नागरिकांना दरमहा पाच हजार रूपये पेन्शन लागू करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणतर्फे नेहरूंना अभिवादन

$
0
0

नाशिकरोड : महावितरणच्या नाशिक परिमंडळ कार्यालयात देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी झाली.

मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या हस्ते पं. नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक प्रवीण बागुल, व्यवस्थापक सुरेश रोकडे, कार्यकारी अभियंता धनंजय आहेर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, वित्त व लेखा विभागाचे प्रभारी सहायक महाव्यवस्थापक ललित खाडे, सहायक विधी अधिकारी प्रशांत लहाने, उपकार्यकारी अभियंता भूषण आचार्य, प्रशांत चव्हाण, सहायक अभियंता सतीश मेहेर, भूषण पाटील, यांच्यासह परिमंडळ कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉर्नर मीटिंगला पोलिसांना प्रतिसाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

सहाय्यक पोलिस आयुक्त ईश्वर वसावे आणि उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते यांनी सहकाऱ्यांसह देवळालीगावात नागरिकांची कॉर्नर मीटिंग घेतली. कायदा व सुव्यवस्थेबाबत जनजागृती करण्यात आली.

आम्रपाली झोपडपट्टी, जेतवननगर, लोखंडे मळा, हनुमाननगर, रोकडोबावाडी, फर्नांडिसवाडी, आनंदनगर येथेही अशा मीटिंग घेण्यात आल्या. मुक्तिधाम येथे वाहतूक समस्येबाबत बैठक घेऊन प्रबोधन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्थित राखण्यासाठी पोलिसांना मदत करावी, असे आवाहन वसावे यांनी केले. चेन स्नॅचिंग व दुचाकी चोरीला प्रतिबंध कसा करावा, थंडीत घरफोड्यांचे प्रमाण वाढते, त्याला आळा कसा घालावा, याबाबत वसावे आणि रायते यांनी प्रबोधन केले. सामाजिक संस्थांनी महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन करण्यात आले. एटीएम सुरक्षेबाबतही बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. एटीएममध्ये अलार्म सिस्टीम, ई सव्हेलन्स सिस्टीम, डिटेक्टिंग सिस्टीम तसेच प्रभावी सीसीटीव्ही बसविण्याची सूचना पोलिसांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओपन टेनिस स्पर्धा आजपासून

$
0
0

ओपन टेनिस स्पर्धा आजपासून

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील एसएसके वर्ल्ड क्लबच्यावतीने १५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान पाथर्डी गावाजवळ असलेल्या टेनिस कोर्टवर एसएसके ओपन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा जिल्हास्तरीय असून, यात नाशिक जिल्ह्यातील दोनशेच्यावर खेळाडू सहभागी होणार आहेत.

पाथर्डी फाटा येथील द एसएसके वर्ल्ड क्लबमध्ये स्विमींग, टेनीस, बास्केटबॉल, बॉक्स क्रिकेट, स्केटिंग अॅडव्हेंचर स्पोर्ट यासारखे अनेक खेळ सुरू केले जाणार आहेत. या क्लबच्या पहिल्या टप्प्यात टेनिसच्या सिंथेटीक ट्रॅकचे काम पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा १२, १४ आणि १६ या वयोगटासाठी आयोजित करण्यात आल्या असून १२ वर्षांखालील मुले मुली-सिंगल, १६ वर्षाखालील मुले, मुली- सिंगल, पुरुष एकेरी ओपन, महिला एकेरी ओपन, पुरुष दुहेरी ओपन, वेटरर्न डबल, मिक्स डबल अशा वयोगटात या स्पर्धा होणार आहेत. माजी पोलिस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल, मनपाचे माजी आयुक्त संजय खंदारे यांच्यासह मान्यवर खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील अशी माहीती क्लबचे डायरेक्टर शैलेश कुटे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावर झाले सारेच लहान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लहानपणीच्या आठवणी म्हातारपणातही सुखावतात. वयाने कितीही मोठे झालो, कितीही जबाबदाऱ्या वाढल्या तरी बालपणीच्या आठवणी मात्र कायम मनात घर करुन असतात. आपण लहानपणी कसे होते, हे इतरांना सांगावेसे वाटते, हे शेअर करण्याचा हक्काचा दिवस बालदिनातून नेटिझन्सला मिळाला. जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करीत या आठवणींना उजाळा देण्यात आला.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून १४ नोव्हेंबर रोजी देशभर साजरा केला जातो. हल्ली दिनविशेषांसंबंधित फोटो शेअर करण्याचा ट्रेण्ड सोशल मीडियावर चांगलाच रुळला असल्याने बालदिनही त्यास अपवाद ठरला नाही. बुधवारी सकाळपासूनच फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्स अॅप स्टेटसवर बालपणीचे फोटो शेअर करण्यात येत होते. या फोटोंबरोबर लहानपणीच्या आठवणीही शेअर करण्यात आल्या. एरवी सद्यस्थितीतील, चांगल्या कॅमेऱ्यांमधून फोटो शेअर करण्यावर भर दिला जात असला तरी नव्वदीपूर्वीच्या या जुन्या फोटोंनी सोशल मीडियाच्या भिंती रंगल्या होत्या. फोटो पाहून मित्र परिवाराकडून मिळणारी दाद, कमेंटद्वारे केले जाणारे कौतुक, चिडवणे अनेकांसाठी आनंद देणारे ठरत होते. शहरातील सामाजिक संस्थांकडून, शाळांकडून बालकांसाठी विविध उपक्रम बालदिनानिमित्त राबविण्यात येतात. यावेळी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येच बालदिन आल्याने लहानग्यांचा हा विशेष दिवस आनंदात गेला. अनेक पालकांनीही आपल्या चिमुकल्यांचे फोटो शेअर करत बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. चॉकलेट, केकचे सरप्राइज देत त्यांना फिरायला नेत हा दिवस पालकांनी खास राखीव ठेवला होता.

\Bसेलिब्रिटींकडूनही शेअरिंग

\Bसामान्य व्यक्तींला सेलिब्रिटींच्या प्रत्येक गोष्टीबद्दल अप्रूप असते. आपल्याला आवडणारे हिरो, हिरॉइन किंवा आपली आदर्श व्यक्ती त्याच्या लहानपणी कशी असेल, याविषयीही सामान्यांना आकर्षण असते. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या सेलिब्रिटींनी बालदिनाचा आनंद लुटला. इन्स्टाग्रामवर फोटो शेअरिंगसाठी मोठे प्राधान्य दिले जात असल्याने बालदिनाचे फोटोही यावर सर्वाधिक प्रमाणात होते. बॉलिवूडच्या मोठमोठ्या स्टार्सपासून नाशिकमधील व सध्या मराठी चित्रपटसृष्टी गाजवत असलेल्यांनीही बालपणीचे फोटो शेअर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षण दर्जा उन्नतीसाठी प्राचार्यांचे चिंतन

$
0
0

यूजीसीच्या निर्देशांनुसार आयोजित सहविचार सभेस प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वरिष्ठ महाविद्यालयांचे व्यवस्थापन सांभाळताना शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि दुसरीकडे संस्था व्यवस्थापनासोबत राखावा लागणारा समन्वय या कसोट्यांवर प्राचार्यांना शैक्षणिक वर्षात कसरत करावी लागते. उच्च शिक्षणातील व्यवस्थापन विषयक आव्हाने कशी स्वीकारावीत, या विषयावर राज्यभरातील विविध महाविद्यालयांमधून उपस्थित प्राचार्यांचे चिंतन केटीएचएम कॉलेजात आयोजित सहविचार सभेत झाले. 'मविप्र'च्या केटीएचएम कॉलेजमधील व्हीएलसीसी सभागृहात ही प्राचार्यांची सहविचार सभा पार पडली.

मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते सहविचार सभेचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी प्राचार्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की गेल्या काही वर्षांच्या कालावधीत संशोधन या विषयाची जागृती वाढण्यास मदत होत आहे. पण अद्यापही संशोधनाच्या क्षेत्रात समाजाभिमुख संशोधनाची कमतरता जाणवते. या प्रकारचे संशोधन वाढविण्यासाठी उच्च शिक्षणाच्या प्रवाहातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राचार्यांनी सहभाग घ्यायला हवा. प्राचार्यांनी व्यवस्थापनाची भूमिका समजावून घेतल्यास त्यांच्या दैनंदिन कामकाजातील अनेक आव्हान सहजगत्या कमी होतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मंचावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, आयटी सेलचे प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र तलवारे, कुलसचिव प्रफुल्ल पवार, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड उपस्थित होते. यानंतर पुणे विद्यापीठाच्या मानव संसाधन विकास केंद्राचे प्रमुख डॉ. संजीव सोनवणे यांनी 'अध्यापन पद्धती' या विषयावर मार्गदर्शन केले. एमकेसीएलचे समन्वयक अमित रानडे यांनी एमकेसीएलचे अध्ययनासाठी वापरण्यात येणारी 'कॅम्पस सक्सेस' या अॅपचा डेमो सादर केला. अँड्रॉईड मोबाइलवर ऑफलाईन पद्धतीनेही चालणारे हे अॅप प्रभावी अध्ययनासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतरच्या सत्रात नाशिक इस्कॉनचे प्रमुख कृष्णा धनदास यांनी प्राचार्यांशी संवाद साधताना भारतीय वैदिक पद्धतीवर आधारित शिक्षण व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले.

चर्चासत्राद्वारे थेट संवाद

सहविचार सभेच्या अखेरच्या सत्रात प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, 'बीसीयूडी'चे माजी संचालक व प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड आदी मान्यवरांनी प्राचार्यांच्या समस्यांबाबत खुले चर्चासत्र घेत थेट संवाद साधला. यावेळी प्राचार्यांच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या शंकांवरही या पॅनलने उत्तरे दिली.

\Bफोटो : सतीश काळे \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर भारतीयांकडून गोदाकाठी स्वच्छता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

उत्तर भारतीय बांधवांच्या छठपूजेच्या उत्सवानंतर गोदाकाठ परिसरात साचलेले निर्माल्य, कचरा बुधवारी उचलून हा भाग चकाचक करण्यात आला. महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना अनेक सेवाभावी संस्थांचे या कामाला सहकार्य मिळाले. एका दिवसात संपूर्ण गोदाकाठ स्वच्छ झाल्याचे चित्र पहिल्यांदाच बघायला मिळाले.

गोदाकाठावर होणाऱ्या सण आणि उत्सवांच्या काळात परिसर अस्वच्छ होत असल्याचा अनुभव दरवर्षी येतो. छठपूजेसाठी विविध वस्तू, पदार्थ, फळे आणले जातात. पूजा झाल्यानंतर यातील अनेक वस्तू येथेच टाकून दिल्या जात असल्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. मंगळवारी सायंकाळी सूर्यास्ताला सुरू झालेली छठपूजेची सांगता बुधवारी सकाळी सूर्योदयावेळी संपली. रात्री काही भाविक रामकुंड परिसरात पूजा करण्यासाठी थांबून होते. काही भाविक रात्री घरी जाऊन पुन्हा सकाळी सूर्योदयाच्यावेळी पूजेसाठी आले होते. त्यांची पूजा झाल्यानंतर विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोदाकाठावर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

विविध संस्थांचे सहकार्य

या मोहिमेत महापालिकेच्या घनकचरा विभागाचे ५८ स्वच्छता कर्मचारी, श्री संत गाडगे महाराज कानोजिया धोबी समाज संस्थेचे ३५ सेवक, विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्टचे ३० सेवक आणि महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक सुनीता मोडक व त्यांचे ५० सेवक सहभागी झाले होते. स्वच्छता निरीक्षक दीपक चव्हाण, किरण मारू, दीपक गायकवाड, मंगेश बागूल, राकेश साबळे, किरण काळे यांनी या स्वच्छता मोहिमेचे नियोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होते नव्हते गेले, जीव मात्र वाचला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पै पै जमवून थाटलेला संसार डोळ्यांसमोर भस्मसात होताना पाहून पंचशीलनगरमधील रहिवाशांच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला. कपड्यांपासून भांड्यांपर्यंत आणि देव्हाऱ्यापासून टीव्हीपर्यंत सर्वच जळून खाक झाल्याने हे रहिवाशी सुन्न झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. शेजारधर्म पाळत आजूबाजूच्या रहिवाशांनी त्यांच्या चहापानासह जेवणाची आणि निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था करीत माणुसकीचे दर्शन घडविले. होते नव्हते ते सर्व खाक झाले असले तरी लाखमोलाचा जीव वाचला आहे. पुन्हा नेटाने संसार उभा करण्यासाठी या रहिवाशांनी कंबर कसली आहे.

पंचशीलनगरमध्ये हिंदू आणि मुस्लीम बांधव गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येकाच्या सुख-दु:खामध्ये केवळ सहभागीच होत नाहीत तर समरस होतात. ही आगीची दुर्घटना घडली तेव्हा याच भाईचाऱ्याचा परिचय परिसरातील रहिवाशांनी दिला. एका मुस्लिम बांधवाच्या कुटुंबात लग्नसोहळा असल्याने दुपारी अनेक रहिवाशी कथडा परिसरात या लग्नाला जाण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी आगीची घटना घडली. लग्नसोहळ्याला जाण्याचा विचार बाजूला ठेऊन तत्काळ सारेच मदतीसाठी सरसावले. अग्निशमन विभागाच्या वाहनांची प्रतीक्षा न करता महिला, तरुणांनी घराघरांत भरलेले पाण्याचे ड्रम आग विझविण्यासाठी रिते केले. आग दोन गल्ल्यांमधील सहा घरांना लागली असली तरी ती विझविण्यासाठी पूर्ण पंचशीलनगरनेच सर्व कामे बाजूला ठेऊन मदतकार्यात झोकून दिल्याचे पहावयास मिळाले.

आगीमुळे माझ्या घरातील टीव्ही, सीडी प्लेअरसह संसारोपयोगी सर्वच साहीत्य जळून खाक झाले आहे. घराचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत. घराच्या डागडूजीसह संसार उभा करण्यासाठी पुन्हा नव्याने तयारी करावी लागणार आहे.

-प्रकाश जाधव, रहिवाशी

आव्हाड आणि मोरे यांची घरे बंद होती. घरांमधून खूपच धूर निघत असल्याने दरवाजा उघडणे आवश्यक होते. एका बाजूने पाण्याचा मारा सुरू असतानाच आम्ही दरवाजा उघडून शक्य तेवढे नुकसान टाळण्याचा कसोशीने प्रयत्न करीत होतो.

-जावेद शेख, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिटको-मनसे

$
0
0

बिटको रुग्णालयासाठी

सरसावली मनसे

डॉक्टर्स नेमण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात मागील काही महिन्यांपासून डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. रुग्णांची हेळसांड टाळण्यासाठी बिटको रुग्णालयात पुरेशा प्रमाणात डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी उपलब्ध करण्याची मागणी मनसेच्या वतीने मनपा गटनेते सलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्याकडे करण्यात आली.

नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबातील रुग्णांचा एकमेव आधार आहे. मात्र, या रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांपासून फिजिशयन उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. जनरल फिजिशियनअभावी रुग्णांना वैद्यकिय उपचारांपासून वंचित रहावे लागत आहे. परिणामी रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविले जाते. परंतु सिव्हिल हॉस्पिटल दूर असल्याने सामान्य कुटुंबातील रुग्णांना नाइलाजाने खाजगी रुग्णालयात खर्च करून वैद्यकीय उपचार घ्यावे लागत असल्याची वस्तुस्थिती मनसेचे मनपा गटनेते सलिम शेख यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्यापुढे मांडली. बिटको रुग्णालयात फिजिशियनची नेमणूक तत्काळ करण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी किशोर बोर्डे यांच्याकडे केली. याशिवाय, २०० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात परिचारीकांसह इतर कर्मचाऱ्यांचीही पुरेशी संख्या नाही. त्याचाही परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याचे त्यांनी किशोर बोर्डे यांच्या निदर्शनास आणून देत परिचारीकांसह इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली. याप्रसंगी मनसे जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले, प्रवक्ते किशोर जाचक, नाशिकरोड विभाग अध्यक्ष साहेबराव खर्जुल, माजी नगरसेवक अस्लम मणियार, सुनील पाटोळे, प्रवीण बागूल, भूषण बछवाल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तालयातील झाडांवर चालणार कुऱ्हाड

$
0
0

न्यायालयाची परवानगी; सभागृहाचा मार्ग मोकळा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महसूल आयुक्तालयाच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या भव्य सभागृहाच्या कामात अडथळा ठरणारी झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्याने या सभागृहाच्या कामातील अडथळा दूर झाला आहे. विशेष म्हणजे याचिका दाखल करतेवेळी हिरवी असलेली काही झाडे आजमितीस पूर्णपणे वाळून गेलेली आहेत.

नाशिकरोड येथील महसूल आयुक्तालयाच्या आवारात भव्य व सुसज्ज ५०० आसनक्षमतेचे सभागृह उभारण्याचे काम २०१४ साली सुरू करण्यात आले होते. या सभागृहाच्या उभारणीत अडथळा ठरणारी एकूण २७ झाडे तोडावी लागणार होती. परंतु, सार्वजनिक बांधकाम खात्याला पालिका प्रशासनाने ही झाडे तोडण्यास तेव्हा परवानगी दिली नव्हती. गेल्या तीन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने पालिकेच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर न्यायालयाने अंतिम निर्णय दिला असून, सर्व २७ झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे या सभागृहाच्या उर्वरित कामापुढील विघ्न दूर झाले आहे. या सभागृहाचे काम रामजीदास कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड या कंपनीतर्फे केले जात आहे.

आसनक्षमता घटविली

सभागृहाच्या कामात अडथळा ठरणारी झाडे तोडण्यासाठी पालिका प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ही झाडे तोडण्यासाठी उच्च न्यायालयात परवानगीसाठी याचिका दाखल केली होती. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून या याचिकेच्या अंतिम निकालाची प्रतीक्षा होती. त्यामुळे कामालाही विलंब झाला होता. परिणामी प्रशासनाने यापूर्वीच या सभागृहाची आसनक्षमता १२० ने घटविलेली आहे.

झाडे तोडण्यापूर्वीच वाळली!

तीन वर्षांपासून या सभागृहाच्या कामात अडथळा ठरणारी झाडे तोडण्याचा मुद्दा रखडलेला होता. झाडे तोडण्यास हिरवा कंदील मिळाला असला तरी काही झाडे मात्र यापूर्वीच वाळून गेली आहेत. त्यामुळे झाडांचे केवळ वाळलेले खोड सध्या जागेवर उभे आहे. या ठिकाणची झाडे तोडावी लागणार असल्याने ठेकेदाराने तीन वर्षांपूर्वीच परिसरात ६० झाडांची लागवडही केली होती. २७ झाडांपैकी प्रत्यक्ष ११ झाडे या सभागृहाच्या बांधकामात येत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images