Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

तरुण दुचाकीस्वार ठार

$
0
0

दुभाजकावर आदळून पळसे गावाजवळ अपघात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव दुचाकी रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन धडकल्याने २८ वर्षांचा तरुण ठार झाला. ही घटना पुणे-नाशिक रोडवरील पळसे गावाजवळ घडली.

अनिल प्रभाकर मोरे (रा. सिन्नर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघाताची घटना बुधवारी (दि. २१) रात्री १० वाजता झाली. मोरे हा आपल्या (एमएच १५-६३२४) दुचाकीने नाशिकहून सिन्नरच्या दिशेने जात होता. पळसे गावाजवळ असलेल्या राजयोग मंगल कार्यालयाजवळून जात असताना भरधाव वेगातील दुचाकी रस्त्यावरील दुभाजकाला जाऊन आदळली. यात डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मजगर अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल हिसकावला

रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाचा दहा हजार रुपयांचा मोबाइल पल्सरवरून आलेल्या दोघांनी बळजबरीने खेचून नेला. ही घटना गुरुवारी (दि. २२) रात्री उंटवाडीरोडवर घडली.

या प्रकरणी रोशन शिवानंद कासार (रा. बजरंग चौक, सिडको) याने तक्रार दाखल केली. रोशन गुरुवारी रात्री पावणेआठ वाजता उंटवाडी रोडने कालिका पार्ककडे रस्त्याने पायी जात होता. सागर डेअरीसमोर काळ्या रंगाच्या पल्सरवरून दोघे अज्ञात संशयित आले. त्यांनी रोशनच्या हातातील दहा हजार रुपयांचा जीओनी कंपनीचा मोबाइल बळजबरीने हिसकावून पळवून नेला. या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन अल्पवयीन मुले बेपत्ता

शहर परिसरातून अल्पवयीन दोन मुलींसह एक मुलगा बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी पंचवटी, म्हसरूळ व उपनगर या पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले.

नाशिकरोडच्या देवळाली गावातील अल्पवयीन मुलगा शुक्रवारपासून (दि. १६) बेपत्ता आहे. दुकानात रेशन घेण्यासाठी जा, असे सांगून मी मागून येतो, असे त्याने आईला सांगितले. मात्र, अनेक तास उलटूनही तो परतला नाही. याबाबत उपनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बाकले करीत आहेत.

पंचवटीतील फुलेनगर परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. तिचे आईसोबत बुधवारी (दि. २१) रात्री साडेनऊ वाजता किरकोळ भांडण झाले होते. या रागाच्या भरात ती घरातून बाहेर गेली. यानंतर कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला; मात्र ती आढळून आली नाही. याबाबत पंचवटी पोलिसात बेपत्ता मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक ए. व्ही. मोरे करीत आहेत. दरम्यान, म्हसरूळ येथील भाजी बाजारासमोर राहणारी एक अल्पवयीन मुलगी गुरुवारी (दि.२२) घरातून बेपत्ता झाली आहे. याबाबत तिच्या वडिलांनी म्हसरूळ पोलिसात फिर्याद दिली असून, अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदिवासी विद्यार्थ्यांचे सुधारणार आरोग्य!

$
0
0

नाशिक विभागासाठी २६ रुग्णवाहिका सेवेत दाखल

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी आदिवासी विकास विभागाने नाशिक विभागातील आदिवासी मुलांसाठी २६ रुग्णवाहिका दिल्या आहेत.

या रुग्णवाहिकांमध्ये २४ तास तातडीची वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे. बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस) सह सज्ज असणाऱ्या या रुग्णवाहिकांमध्ये दोन डॉक्टर्स व एक आरोग्य सहाय्यक उपलब्ध असतील.

संपूर्ण राज्यात ४८ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. यामध्ये नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांसाठी २६ अद्ययावत रुग्णवाहिकांचा समावेश आहे. या सर्व रुग्णवाहिका गुरुवारी सेवेत दाखल करण्यात आल्या. दुर्गम भागात असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावेत याचीही व्यवस्था केली आहे. प्रत्येकी चार ते सहा आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळांचा एक समूह असे ४८ क्लस्टर तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक क्लस्टरसाठी एक याप्रमाणे राज्यात ४८ सुसज्ज रुग्णवाहिका २४ तास मैदानात असतील.

या योजनेंतर्गत आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाणार आहे. साथीच्या

रोगाची लक्षण आढळल्यास तातडीने उपचार करणे आवश्यक असते. त्यासाठी आवश्यक औषधे व इंजेक्शन यांचा पुरेसा साठा उपलब्ध असेल. प्रत्येक विद्यार्थ्यांचे डिजिटल हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार आहे. नियमित डॉक्टरांबरोबरच डोळे, त्चचारोग, कान, नाक, घसा या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या भागात तैनात करण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांमध्ये ईसीजी, ऑक्सिजन सिलिंडर, तसेच अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असतील. आश्रमशाळा दुर्गम भागात असल्याने सर्प, विंचू दंश यावरील उपचारासाठी लागणाऱ्या अँटी व्हेनम इंजेक्शनचा पुरेसा साठा असेल. आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत एक आरोग्य समिती नेमण्यात येणार आहे. या समितीत विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा समावेश असेल.

...

या सुविधा मिळणार

- रुग्णवाहिकांच्या समन्वयासाठी इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर

- प्रतिदिन क्लस्टर शाळांमधील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी

- हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिमच्या माध्यमातून प्रकल्प स्थितीचा आढावा

- मोबाइल ॲपच्या माध्यमातून डिजिटल हेल्थ कार्ड

- वैद्यकीय विशेषज्ञांकडून उपचार सल्ला

- सोयींयुक्त डिस्पेंसरीजची स्थापना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरी बेघरांनाही मिळणार दिलासा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

ग्रामीण भागातील गावठाण व शासकीय जमिनीवरील घरांचे अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय शासनाने फेब्रुवारी २०१८ मध्ये घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत शहरी भागातील अतिक्रमण नियमित करण्यासंदर्भात राज्य शासनाने महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. आता शहरी भागातील नागरीकांनाही सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत या निर्णयाचा लाभ मिळणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

ना. भुसे यांनी ग्रामिण भागातील गावठाण व शासकीय जमिनीवरील घरांचे अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय व्हावा यासाठी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री यांनीदेखील यासाठी भुसेंच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून याचे धोरण तयार करण्यास सांगितले होते. अखेर भुसेंच्या पाठपुराव्याने शासनाने फेब्रुवारी २०१८ ला हा निर्णय घेतला होता. ग्रामीण भागप्रमाणे शहरालगत वास्तव्य करीत असलेल्या शासकीय सरकारी जागेवरील अतिक्रमणही नियमित करावे अशी मागणी भुसेंनी केली होती.

नुकत्याच झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत शहरी भागातील अतिक्रमण नियमित करण्यासंदर्भात राज्य शासनाने महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. सर्वांसाठी घरे या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यातील ३८२ शहरे व त्या लगतच्या क्षेत्रामध्ये या योजनेचा लाभ मिळणार आहे. महापालिका क्षेत्रातील जमिनी विभागीय आयुक्तांच्या तर नगरपालिका-नगरपरिषदांच्या जमिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व मान्यतेने भाडेतत्वाने देणे शक्य होणार आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील जमिनीही उपलब्ध व्हाव्यात यासाठीही निर्णय घेण्यात आला आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे मालेगाव महानगरपालिकेत हद्दावढीत समावेश झालेल्या सोयगाव, द्याने, सायने, भायगाव, दरेगाव व म्हाळदे या गावांतील अतिक्रमण धारक बेघर लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. या गावांमध्ये असणाऱ्या बेघर पात्र लाभार्थ्यांना शासन मालकीच्या जमिनीवर राहत असलेल्या जागेवर स्वत:ची आवास योजनेअंतर्गत घरे बांधता येणार आहेत.

- दादा भुसे, ग्रामविकास राज्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कालिका’ भक्त निवास ठरतोय वरदान

$
0
0

परगावाहून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना साथ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात नातेवाइक असले तरी त्यांच्या घरी पाहुणे म्हणून जाणे चांगले वाटते. सोबत पेशंट असताना राहण्याची सोय स्वतःलाच करावी लागते. पेशंटच्या मोठ्या आजारावरील उपचारांचा खर्च करताना हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च परवडत नाही. आम्हा नातेवाइकांना हे भक्त निवास अगदी कमी किंमतीत उपलब्ध झाल्याने संकटाच्या काळातले हे वरदानच ठरत आहे, अशा भावना कालिका देवी मंदिराच्या भक्त निवासात राहत असलेल्या पेशंटच्या नातेवाइकांनी व्यक्त केल्या आहेत.

मुंबई नाका येथील कालिका देवी मंदिराच्या परिसरात कालिका देवी ट्रस्ट आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्यातर्फे भक्त निवास उभारण्यात आले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लोकार्पण झालेला हा भक्त निवास शहरात येणाऱ्या पेशंटच्या नातेवाइकांसाठी वरदान ठरत आहे. भक्त निवासात १० ते १२ खोल्या असून यामध्ये सर्व सोयी पेशंटच्या नातेवाइकांना उपलब्ध आहेत. पेशंटवर उपचार सुरू असलेल्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पत्रानुसार नातेवाइकांना भक्त निवासात खोली उपलब्ध करून दिली जाते. वर्षभरात शंभरहून अधिक पेशंटच्या नातेवाइकांनी या निवासाचा लाभ घेतला आहे.

कॅन्सर तसेच इतर मोठ्या आजरांवर उपचार घेण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण नाशिकमध्ये येतात. मुंबई नाका परिसरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार केले जातात. उपचाराच्या काळात रुग्णाच्या नातेवाइकांना हॉस्पिटलमध्ये रात्री झोपण्याची किंबहुना दिवसभर थांबण्याची सोय नसते. त्यामुळे जवळपास कुठेतरी आरामासाठी सोय पावी लागते. जेमतेम आर्थिक परिस्थितीत हॉस्पिटलचा खर्च भागवतांना हॉटेल किंवा गेस्ट हाउसची रक्कम देणे रुग्णाच्या नातेवाइकांना शक्य नसते. अशा परिस्थिती फक्त प्रत्येकी शंभर रुपये प्रतिदिवस भाड्याने कालिका देवी भक्त निवास येथे नातेवाइकांना राहण्याची सोय उपलब्ध होत आहे. या सोयीचा फायदा नंदुरबार, धुळे, चंद्रपूर यांसह राज्यभरातून येणाऱ्या पेशंटच्या नातेवाइकांना होत आहे.

नंदुरबार येथून कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी नाशिकमध्ये आलो आहोत. भक्त निवासामुळे राहण्याची चिंता मिटली आहे. हॉस्पिटलपासून भक्त निवास जवळ असल्याने रुग्णाची काळजी घेणे सोपे होत आहे.

- कल्पना शिंत्रे, रुग्णाचे नातेवाइक

धुळे येथून नाशिकमध्ये उपचारासाठी आलो आहोत. हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ थांबता येत नाही. कॅन्सरसारख्या आजारावरील उपचार अधिक खर्चिक आहे. त्यात राहण्याचा खर्च अधिक होईल का, याचे टेंशन होते. मात्र, कालिका देवी भक्त निवास अगदी कमी किंमती सर्व सोयींयुक्त स्वरुपात उपलब्ध आहे.

- संगीता पाटील, पेशंटची नातेवाइक

\Bशुभवार्ता \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारोदारी निधी संकलन

$
0
0

काँग्रेसचा उपक्रम; अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत शुभारंभ

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने तब्बल ३५ हजार कोटींची तजवीज केल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. भाजपच्या या इलेक्शन मनी मॅनेजमेंटला तोंड देण्यासाठी काँग्रेस पक्षही सरसावला असून, निधी संकलनासाठी थेट जनतेच्या दरबारारात उतरला आहे.

काँग्रेसने जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून भाजपची पोलखोल करण्यासह निधी संकलनाचे काम सुरू केले आहे. नाशिकमध्ये अभियानाच्या पहिल्याच दिवशी पक्षाच्या तिजोरीत १६ हजारांची भर पडली आहे.

भाजप एकीकडे मनी मॅनेजमेंटमुळे जनभावना विरोधात असतानाही निवडणुकांचे फड जिंकत चालला आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. सत्तेत असल्याने देणगीदारांचा जोर भाजपकडे अधिक असून, काँग्रेसच्या देणगीदारांची संख्या घटत चालली आहे. आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी व पक्षाची मॅनेजेमेंट सांभाळण्यासाठी सुद्धा पुरेसा निधी पक्षाकडे नाही. काँग्रेसकडे २७ कोटीच शिल्लक आहेत. त्यामुळे एवढ्या कमी निधीवर लोकसभा निवडणूक लढविणे शक्य नसल्याने काँग्रेस नेत्यांनी भाजपच्या मनी मॅनेजमेंटचा सामना करण्यासाठी निधी संकलनाचे काम हाती घेतले आहे.

या जनसंपर्क अभियानाची सुरुवात नांदेडपासून करण्यात आली आहे. नांदेडनंतर नाशिकची निवड करण्यात येऊन गुरुवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या प्रवक्त्या व नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्या प्रभाग क्रमांक १२ मध्ये जनसपंर्क अभियनाचा शुभारंभ करण्यात आला. चव्हाण यांनी टिळकवाडीतील भुपेंद्र शहा यांच्या घरी जाऊन पत्रकाचे वाटप केले. तसेच, त्यांच्याकडून ११ हजार रुपयांची पक्षनिधी घेतला. याशिवाय सुधाकर मुळाणे यांनी पाच हजार रुपये पक्षनिधी चव्हाण यांच्याकडे जमा केला. पहिल्या दिवशी काँग्रेसने तब्बल १६ हजाराचा निधी संकलित केला. राज्यभर हा उपक्रम राबवला जाणार आहे.

...

पंधरा लाख नागरिकांचे उद्दिष्ट

नाशिक जिल्ह्यातील शहर व ग्रामीण अशा पंधरा लाख प्रचार पत्रकांच्या माध्यमातून काँग्रेसने नागरिकांपर्यंत जनसंपर्क अभियानांमार्फत पोहण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक लाख पत्रके वाटण्यात येणार आहेत. प्रत्येक नागरिकाकडून पक्षासाठी ऐपतीप्रमाणे निधी द्यावा, अशी गळ घातली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातून दोन ते तीन कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

..

असे आहे अभियान

अभियानांतर्गत केंद्र व राज्यातील सरकारने जनहित विरोधी घेतलेल्या निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याबरोबरच कॉँग्रेस पक्षाच्या राजवटीत आजवर घेतलेल्या जनहित निर्णयाची माहिती पक्ष कार्यकर्ते घरोघरी जाऊन देणार आहेत. त्यासाठी प्रचारपत्रके प्रसिध्द केली आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील किमान एक लाख कुटुंबांपर्यंत हे पत्रक पोहोचविण्याचे उद्दिष्ट जिल्हा कमिट्यांना दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राग पत्नीचा, बदडले तरुणाला

$
0
0

जळगावातील पोलिसांचे कृत्य, गुन्हा दाखल

म. टा.प्रतिनिधी, जळगाव

भररस्त्यावर पत्नीशी वाद घालत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीच्या संतापात एका पादचारी तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी बसस्थानक परिसरात घडली. संबंधित तरुणाने याबाबत जिल्हापेठ पोलिसात तक्रार केली. मयुर संजय वाघ (वय २३, रा.चिंचोली) असे तरुणाचे नाव आहे.

तुषार वाघ या पोलिस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप मयुरने केला आहे. मुयर हा नुतन मराठा महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. महाविद्यालयातून बसने घरी जाण्यासाठी तो बसस्थानक परिसरात आला होता. याचवेळी पोलिस कर्मचारी तुषार हा भररस्त्यावर पत्नीशी वाद घालत होता. मयुर हा शेजारीच उभा असल्यामुळे क्षणार्धात तुषारने मयुरला मारहाण करण्यास सुरूवात केली. काहीही कारण नसताना त्याने मयुरला बेदम मारहाण केली. परिसरातील नागरिक, मयुरच्या मित्रांनी हा वाद मिटवून जखमी मयुरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर मयुरने मित्रांसह जिल्हापेठ पोलिस ठाण्यात येऊन पोलिस कर्मचारी तुषारच्या विरुद्ध तक्रार दिली. तुषार हा दारुच्या नशेत असल्याचा आरोप मयुरने केला आहे.

कचरा टाकण्यावरुन शेजाऱ्यांस मारहाण

श्रद्धा सोसायटीत प्रदीप रामचंद्र कुळकर्णी यांच्या घराशेजारी जयवंत भास्कर जगताप यांचे घर आहे. घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून कुळकर्णी व जगताप कुटुंबियांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी जयवंत जगताप यांनी प्रदीप व त्यांचे भाऊ दीपक यांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती. या मारहाणीत प्रदीप कुळकर्णी यांच्या डोक्याला, कपाळावर व पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी प्रदीप कुळकर्णी यांच्या फिर्यादीवरून जयवंत जगताप व त्यांचा मुलगा दिनेश जगताप या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाख्ल करण्यात आला आहे

अवैध दारुच्या अड्ड्यावर छापा

हनुमाननगर परिसरात ताडपत्रीचे शेड तयार करून अवैध गुत्ता चालवला जात असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी रात्री मिळाली. त्यानुसार पथकाने धाड टाकली. यावेळी गुत्ताचालक रवींद्र विश्वनाथ वाघ, मोहन पाटील (वय ३३, रा.अयोध्यानगर), राजू सपकाळे (वय ४०, रा. हनुमाननगर), प्रकाश पाटील (वय ३९, रा. यमुनानगर), अजय इंगळे (वय २८, रा. रायसोनी शाळेमागे, अयोध्यानगर), हरिश्चंद्र लक्ष्मण ढाके (वय ३७, रा. अयोध्यानगर), सुनील खुडू काकुळदे (वय ३९, रा. हनुमाननगर), राजू गाढगे (वय ३०, रा.कौतीननगर) व विजय सपकाळे (वय ३९, रा. हनुमाननगर) यां नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

वृद्धाची आत्महत्त्या

शहरातील प्रबोधननगर परिसरात राहणारे ६७ वर्षीय वृद्ध आठ दिवसापासून बेपत्ता होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी निमखेडी शिवारातील पटेल फॅक्टरीलगतच्या पडीत खोल्यांमध्ये गळफास घेवून आत्महत्त्या केल्याचे निष्पन्न झाले. जळगावातील प्रबोधनगरातील रहिवासी गुलाब गोविंदा लोहार (वय ६७) यांना दारू पिण्याचे व्यसन होते. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी कुणालाही न सांगता घरातून बेपत्ता झाले होते. याप्रकरणी त्यांचा मुलगा विलास लोहार याने तालुका पोलिसात तक्रार दाखल केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राग पत्नीचा, बदडले तरुणाला

$
0
0

जळगावातील पोलिसांचे कृत्य, गुन्हा दाखल

म. टा.प्रतिनिधी, जळगाव

भररस्त्यावर पत्नीशी वाद घालत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीच्या संतापात एका पादचारी तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी बसस्थानक परिसरात घडली. संबंधित तरुणाने याबाबत जिल्हापेठ पोलिसात तक्रार केली. मयुर संजय वाघ (वय २३, रा.चिंचोली) असे तरुणाचे नाव आहे.

तुषार वाघ या पोलिस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप मयुरने केला आहे. मुयर हा नुतन मराठा महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. महाविद्यालयातून बसने घरी जाण्यासाठी तो बसस्थानक परिसरात आला होता. याचवेळी पोलिस कर्मचारी तुषार हा भररस्त्यावर पत्नीशी वाद घालत होता. मयुर हा शेजारीच उभा असल्यामुळे क्षणार्धात तुषारने मयुरला मारहाण करण्यास सुरूवात केली. काहीही कारण नसताना त्याने मयुरला बेदम मारहाण केली. परिसरातील नागरिक, मयुरच्या मित्रांनी हा वाद मिटवून जखमी मयुरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर मयुरने मित्रांसह जिल्हापेठ पोलिस ठाण्यात येऊन पोलिस कर्मचारी तुषारच्या विरुद्ध तक्रार दिली. तुषार हा दारुच्या नशेत असल्याचा आरोप मयुरने केला आहे.

कचरा टाकण्यावरुन शेजाऱ्यांस मारहाण

श्रद्धा सोसायटीत प्रदीप रामचंद्र कुळकर्णी यांच्या घराशेजारी जयवंत भास्कर जगताप यांचे घर आहे. घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून कुळकर्णी व जगताप कुटुंबियांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी जयवंत जगताप यांनी प्रदीप व त्यांचे भाऊ दीपक यांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती. या मारहाणीत प्रदीप कुळकर्णी यांच्या डोक्याला, कपाळावर व पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी प्रदीप कुळकर्णी यांच्या फिर्यादीवरून जयवंत जगताप व त्यांचा मुलगा दिनेश जगताप या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाख्ल करण्यात आला आहे

अवैध दारुच्या अड्ड्यावर छापा

हनुमाननगर परिसरात ताडपत्रीचे शेड तयार करून अवैध गुत्ता चालवला जात असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी रात्री मिळाली. त्यानुसार पथकाने धाड टाकली. यावेळी गुत्ताचालक रवींद्र विश्वनाथ वाघ, मोहन पाटील (वय ३३, रा.अयोध्यानगर), राजू सपकाळे (वय ४०, रा. हनुमाननगर), प्रकाश पाटील (वय ३९, रा. यमुनानगर), अजय इंगळे (वय २८, रा. रायसोनी शाळेमागे, अयोध्यानगर), हरिश्चंद्र लक्ष्मण ढाके (वय ३७, रा. अयोध्यानगर), सुनील खुडू काकुळदे (वय ३९, रा. हनुमाननगर), राजू गाढगे (वय ३०, रा.कौतीननगर) व विजय सपकाळे (वय ३९, रा. हनुमाननगर) यां नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

वृद्धाची आत्महत्त्या

शहरातील प्रबोधननगर परिसरात राहणारे ६७ वर्षीय वृद्ध आठ दिवसापासून बेपत्ता होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी निमखेडी शिवारातील पटेल फॅक्टरीलगतच्या पडीत खोल्यांमध्ये गळफास घेवून आत्महत्त्या केल्याचे निष्पन्न झाले. जळगावातील प्रबोधनगरातील रहिवासी गुलाब गोविंदा लोहार (वय ६७) यांना दारू पिण्याचे व्यसन होते. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी कुणालाही न सांगता घरातून बेपत्ता झाले होते. याप्रकरणी त्यांचा मुलगा विलास लोहार याने तालुका पोलिसात तक्रार दाखल केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिघांना फाशी

$
0
0

बाखराबाद हत्याकांड;

तिघांना फाशी

म. टा. वृत्तसेवा, अकोला

जमीन खरेदी-विक्री व्यवहारातून घडलेल्या बहुचर्चित बाखराबाद हत्याकांडातील तिघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा ठोठावली. आरोपींमध्ये गजानन वासुदेव माळी आणि त्यांच्या नंदेश व दीपक या दोन मुलांचाही समावेश आहे.

अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बाखराबाद येथील भगवंतराव माळी यांनी आरोपी गजानन माळी याच्याकडून दोन एकर शेती खरेदी केली होती. नंतर गजाननने व्यवहार योग्य नसल्याचे सांगून विक्रीस नकार दिला होता. त्यामुळे भगवंतराव माळी यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर शेतीचा ताबा घेण्यावरून या दोन्ही कुटुंबीयांत वाद होत होते. त्याच वादातून १४ एप्रिल २०१४ रोजी सायंकाळी विश्वनाथ माळी, वनमाला माळी, योगेश माळी व राजेश माळी चौघांचीही हत्या केली गेली. यातील योगेश व वनमाला यांची हत्या आरोपींनी शेतात जावून केली तर राजेश व विश्वनाथ माळी यांना त्यांच्या घरी जावून ठार मारण्यात आले. कुऱ्हाड व कडबा कटरचे पाते आरोपींनी हत्येसाठी वापरले होते. अतिशय क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तिघांवर भादंवि कलम ३०२, ४५२, १२० (ब) नुसार गुन्हे दाखल करू दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. आरोपींचे कृत्य भयंकर असल्याने जिल्हा व सत्र न्यायधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. सोबतच त्यांना दंडही भरावयाचा आहे. या सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. गिरीश देशपांडे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुस्लिम आरक्षणासाठी धरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'मुस्लिम आरक्षण माँग नहीं, हमारा हक है...', 'अब एक ही मिशन... मुस्लिम आरक्षण', अशी घोषणाबाजी करीत मुस्लिम बांधवांनी आरक्षणासाठी शुक्रवारी शहरात धरणे आंदोलन केले.

मुस्लिम आरक्षणासंदर्भात सरकार गांभीर्याने भूमिका घेत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आरक्षणाअभावी शैक्षणिक क्षेत्रात मुस्लिम विद्यार्थी मागे पडत आहेत. त्यामुळे आरक्षणासंदर्भात सरकारने तातडीने निर्णय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जमियत उल्मा संघटनेच्या नाशिक शाखेतर्फे दुपारी ३ ते ६ या वेळेत गोल्फ क्लब मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले. सरकारी आणि निमसरकारी सेवांमध्ये, तसेच शैक्षणिक क्षेत्रात मुस्लिम समाजातील ५० प्रवर्गांना विशेष मागास प्रवर्गांतर्गत ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय २०१४ मध्ये घेण्यात आला. परंतु, आजपर्यंत राज्य सरकारने मुस्लिम समाजाला हे आरक्षण देऊ केलेले नाही. आरक्षणाअभावी समाजबांधवांच्या प्रगतीस अडथळा निर्माण होत आहे. नोकरी व शिक्षणाच्या सोयींमध्ये ते मागे पडू लागले आहेत. त्यामुळे मुस्लिम आरक्षणासंदर्भात सरकारने त्वरित निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी जमियत उल्मा नाशिकचे अब्दुल महमूद सिद्दिकी यांनी मांडले. मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नकोच आहे. समाजातील बांधवांना नोकरी व शिक्षणात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे समाजाला मान्य करण्यात आलेले ५ टक्के आरक्षण लागू करावे, अशी मागणी करण्यात आली. राज्यभरात जमियत उल्मातर्फे अनेक जिल्ह्यांत शुक्रवारी मुस्लिम आरक्षणासंदर्भात आंदोलन करण्यात आले. यावेळी मुफ्ती इकरहउद्दिन, हाफिज अहमद असलम, मुफ्ती अब्दुल्ला, मौलाना सलीम, हाफिज मुहम्मद तय्यब यांसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवटच्या दोन दिवशी उमेदवारांची होणार गर्दी

$
0
0

नामको बँक निवडणुकीसाठी २२७ सभासदांनी नेले अर्ज

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेच्या २१ संचालकपदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३५ उमेदवारांनी अर्ज गुरुवारपर्यंत दाखल केले. त्यानंतर शुक्रवार ते रविवार या कालावधीत सुटी असल्याने आता नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी सोमवारी मोठी गर्दी होणार आहे. आतापर्यंत २२७ सभासदांनी उमेदवारीसाठी ५५८ अर्ज बँकेतून नेले आहेत.

सोमवारी संकष्ट चतुर्थी असल्यामुळे अनेकांनी हा मुहूर्त साधण्यासाठी अर्ज दाखल केले नसल्याची चर्चा आहे. मंगळवारपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. सोमवारी सत्ताधारी माजी संचालकांचे प्रगती पॅनल आपल्या समर्थकांसह पुन्हा एकत्रित सर्व अर्ज दाखल करणार आहे. विरोधी गटाचे सहकार पॅनलही सोमवारी अर्ज दाखल करणार आहे. या निवडणुकीत नम्रता पॅनलचे उमेदवार मात्र मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत.

.

बँकेला फायदा

नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवारांकडे त्याचप्रमाणे सूचक व अनुमोदकाकडे थकबाकी नसल्याचा दाखला घ्यावा लागतो. थकबाकी भरण्यासाठी गेले दोन दिवस गर्दी होती. यामुळे बँकेची थकबाकी वसूल होऊन बँकेला मोठा फायदा झाला.

..

तडजोडीसाठी प्रयत्न

नामकोच्या निवडणुकीत तीन पॅनल होणार असल्याचे निश्चित आहे. प्रगती व सहकार पॅनलचे तडजोडीसाठी अजून प्रयत्न सुरू आहेत. नम्रता पॅनलच्या प्रमुखांबरोबरही सहकारच्या नेत्यांनी चर्चा केल्याचे समजते. माघारीच्या अखेरपर्यंत हे तडजोडीचे प्रयत्न सुरूच राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटी ऑडिटवर सखोल मार्गदर्शन

$
0
0

जीएसटी राष्ट्रीय परिषदेत ५०० सीएंची उपस्थिती

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दोन दिवसीय जीएसटी राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी अशोका मार्गावरील सीए शाखेच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थित झाले. यावेळी औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यातील ५०० हून अधिक सीए उपस्थित होते. पहिल्या दिवशी जीएसटी ऑडिट, आकारणी आणि जीएसटी फॉर्ममध्ये असलेल्या विविध कलमांवर मार्गदर्शन करण्यात आले.

नाशिक सीएआय शाखा व औरंगाबाद सीए शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन दिवसीय जीएसटी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय जीएसटी आयुक्त श्रीकांत पाटील व राज्याच्या जीएसटीचे उपायुक्त संजय पोखरकर हे यावेळी उपस्थित होते. उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी तीन सत्रात मान्यवरांनी जीएसटीबद्दल माहिती दिली.

या परिषदेच्या पहिल्य सत्रात सीए शेफाली गिरिधारीवाल यांनी जीएसटी ऑडिट कसे करायचे, त्या संबंधात असलेली ऑडिटरची जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात औरंगाबाद येथील जीएसटीचे अधिकारी दीपक गुप्ता यांनी प्लेस ऑफ सप्लाय आणि त्यानुसार असलेली जीएसटी आकारणी या विषयावर मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात जीएसटी ऑडिट फॉर्ममध्ये असलेल्या विविध कलमांचा तपशीलवार अभ्यास आणि त्याचे सखोल मार्गदर्शन सीए आसीत शहा यांनी केले.

या परिषदेचे संयोजन नाशिक शाखेचे अध्यक्ष सीए मिलन लुणावत, व्हाईस चेअरपर्सन रेखा पटवर्धन, सेक्रेटरी रणधीर गुजराथी, हर्षल सुराणा, रोहन आंधळे, विकास हसे, रवी राठी, राजेंद्र शेटे व औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष सीए सचिन लाठी यांनी केले.

..

जीएसटीच्या गोषवारासाठी परिषदेचे आयोजन

जीएसटी येऊन दीड वर्ष पूर्ण झाले असून, वेगवेगळे जीएसटी रिटर्न व्यापाऱ्यांनी भरले आहेत. आता या सर्वांचा गोषवारा जीएसटी वार्षिक रिटर्न आणि जीएसटी ऑडिटमध्ये द्यायचा आहे. ज्याची मुदत ३१ डिसेंबर २०१८ आहे. त्यामुळे जीएसटी वार्षिक रिटर्न आणि जीएसटी ऑडिट फॉर्ममध्ये द्यावयाचा तपशिलांचा सखोल अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केल्याची माहिती सीए शाखेचे अध्यक्ष मिलन लुणावत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक रुपयात एक लिटर पाणी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जुन्या सीबीएस परिसरातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या ठिकाणी शुद्ध पाणी मिळत नसल्याने अनेक प्रवाशांचे हाल होतात. उन्हाळ्यात तर ही समस्या प्रकर्षाने जाणवते. नेमकी हीच गरज ओळखून लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटतर्फे नाशिकच्या जुने सीबीएस स्थानकाच्या एक नंबर प्लॅटफॉर्मजवळ शुद्ध पाणी मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

एक रुपयाचे नाणे टाकल्यानंतर एक लिटर पाणी मिळणार असल्याने सीबीएस स्थानकावरून बाहेरगावी प्रवास करणाऱ्यांची सोय झाली आहे. लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २३) या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. २ हजार लिटर पिण्याचे पाणी उपलब्ध राहण्याची या प्रकल्पाची क्षमता असून, यातील ५०० लिटर पाणी थंड राहणार आहे. त्यामुळे एक रुपया टाकून मिळणारे पाणी हे थंड असेल. हा एक कायमस्वरूपी प्रकल्प असून याची रोजची निगा लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटतर्फे राखण्यात येणार आहे. लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटतर्फे येणाऱ्या काळात शहरात विविध ठिकाणी अशाच पद्धतीचे पाण्याचे एटीएम्स बसविण्यात येणार आहेत. जुने बस स्थानक परिसरात पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने त्र्यंबकेश्वर, सिन्नर, कळवण, सटाणा, नंदुरबार आदी ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुविधा झाली आहे.

जुने बसस्थानकावर राज्य परिवहन मंडळाचे आगार व्यवस्थापकांनी लायन्स क्लबचे आभार मानले असूनस प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पाण्याची सुविधा आहे अशी उद्घोषणा करण्यात येऊन प्रवाशांमध्ये या सुविधेचा जागृती करण्यात करण्यात येणार आहे. स्थानकावर विविध ठिकाणी पाण्याच्या एटीएमकडे येण्यासाठी दिशादर्शक लावण्यात येतील, असे आश्वासन राज्य परिवहन मंडळ नाशिक आगाराचे सहायक वाहतूक अधीक्षक केशव सांगळे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगरसेवकांसह चौघांना कारावास

$
0
0

आपत्याच्या जन्मनोंदीमधील खाडाखोड भोवली

१४ वर्षांनी येवला न्यायालयाचा निकाल

म. टा. वृत्तसेवा, येवला

तीन अपत्य असल्याने नगरसेवकपद वाचविण्यासाठी स्वतःच्या मुलाच्या शासकीय अभिलेखातील जन्मनोंदीत खाडाखोड करण्याचा प्रकार येवला नगरपालिकेच्या शहरातील एका माजी नगरसेवकासह त्याच्या कुटुंबियांना चांगलाच भोवला आहे.

येवला नगरपालिकेच्या सन २००१ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तिसरे आपत्य असून देखील प्रशासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी या माजी नगरसेवकासह त्याची पत्नी व इतर दोघे अशा एकूण चार जणांना येवला न्यायालयाने दोन वर्ष सश्रम कारावासाची, तसेच २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. बिलाल बाबुभाई शेख असे या माजी नगरसेवकाचे नाव असून येवला न्यायालयात सुमारे १४ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या एका खटल्यात न्यायालयाने नुकताच हा निकाल दिला आहे.

येवला नगरपालिकेच्या २००१ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरातील प्रभाग क्रमांक-१ मधून नगरसेवकपदी निवडून आलेले बिलाल बाबुभाई शेख यांनी तिसरे आपत्य असून देखील निवडणूक लढविली होती. मात्र, निवडणूक निकालानंतर पुढे शहरातील तक्रारदार नागरिक योगेश जग्गनाथ सोनावणे यांनी याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी महेश झगडे यांच्याकडे चौकशीकामी अर्ज दाखल केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीअंती बिलाल शेख यांना नगरसेवकपदी राहण्यास अपात्र ठरवले होते. या निकालाविरोधात बिलाल शेख यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील करताना तिथे त्यांचे अपील फेटाळले गेले होते. पुढे हे प्रकरण येवला न्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यापूर्वी शासकीय अभिलेखामध्ये खाडाखोड केल्याप्रकरणी येवला नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी जुगनसिंह ढाकरे यांनी १ मार्च २००४ रोजी येवला शहर पोलिसांत तक्रार दिली होती. येवला शहर पोलिसांनी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शेख बिलाल बाबुभाई, यांच्यासह शेख नसरीन बिलाल,तसेच नसीम शेख मुजीब,मुमताज शेख समसु,येवला नगरपालिका रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. एल. एल. जाधव, कर्मचारी दिलीप नानासाहेब आमले आणि परिचारिका सरस्वती हिरामण तुंबारे, अशा एकूण ७ संशयित आरोपींविरोधात तेंव्हा गुन्हा नोंदवला होता. मात्र, पुढे डॉ. एल. एल. जाधव यांच्याबाबत कार्यवाही करताना पोलिसांनी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नसल्याकडे लक्ष वेधत डॉ. जाधव यांना 'दोषमुक्त' करण्यात आले होते.तर, इतर ६ आरोपींविरोधात येवला न्यायालयात खटला उभा राहिला होता.

येवला न्यायालयात जवळपास गेल्या तब्बल १४ वर्षांपासून सुरु असलेल्या खटल्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. एकूण सहा आरोपींपैकी मुख्य आरोपी शेख बिलाल बाबुभाई, शेख नसरीन बिलाल,शेख नसीम मुजीब,मुमताज शेख समसू या चौघांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने निकाल देताना या चौघांना २ वर्ष सश्रम कारावासाच्या शिक्षेसह २० हजारांचा दंड देखील ठोठावला आहे. संशियत आरोपी असलेले तत्कालीन पालिका रुग्णालयातील कर्मचारी दिलीप आमले व परिचारिका सरस्वती तुंबारे यांची मात्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा पुन्हा घरसला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

दोन दिवसांच्या सुटीनंतर शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमाल भाव ७५२ रु प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने मंगळवारच्या तुलनेत २५० रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याच्या बाजार भावातील उतरती कळा अद्याप थांबलेली नाही. लासलगाव बाजार समितीत गेल्या एक महिन्यांपासून कांद्याचे बाजारभावात घसरण होत आहे. बाजारभावात वाढ होईल या अपेक्षेने उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा साठवून ठेवला आहे. कांद्याची आवक कमी तर बाजारभाव जास्त हे समीकरण ओळखले जात असले तरी आवक कमी असतानाही बाजारभाव कमी झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यातील उन्हाळ कांद्याची साठवणूक क्षमता संपली असून, कांद्याला आता कोंब येत असल्याने कांद्याची प्रत खराब होत आहे. इतर राज्यातून सुद्धा कांदा मोठ्या प्रमाणावर येत आहे. शुक्रवारी उन्हाळ कांद्याला कमीत कमी दीडशे , जास्तीत जास्त ७७२ तर सरासरी ४०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. तसेच लाल कांद्याला कमीत कमी ५००, जास्तीत जास्त १३३१ तर सरासरी एक हजार रुपये भाव मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुंदरनारायण’च्या कामास पुनश्च: हरिओम

$
0
0

दिवाळीनिमित्त कारागीर होते सुटीवर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना असलेल्या सुंदरनारायण मंदिराचे काम रविवार, २५ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरळीत होणार आहे. दिवाळीच्या सुट्यांमुळे मजूर आपल्या गावी गेल्याने हे काम महिनाभरापासून बंदच होते. मंदिराचे काम सुरू होऊन जवळपास वर्षभराचा कालावधी उलटून गेला; मात्र कामात अद्याप गती दिसत नसल्याने नाशिककरांचे कुतूहल वाढले आहे.

देवी लक्ष्मी आणि तुलसी यांच्यासमवेत असलेले भगवान विष्णू यांचे एकमेव सुंदर नारायण मंदिर रविवार कारंजा येथे गोदावरी नदी किनाऱ्याजवळ आहे. ऐतिहासिक कलाकुसर, रेखीव आणि आखिव अप्रतिम काम, दगडी बांधकाम आणि लाकडाचा केलेला खुबीने वापर अशी ओळख असलेल्या या मंदिराचे सौंदर्य काही औरच आहे. मुघल काळात या मंदिराचे नुकसान झाले. त्यानंतर गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पण, गेल्या काही वर्षांपासून मंदिराच्या सौंदर्याला आणि कलाकुसरीला नजर लागल्यासारखे झाले. या मंदिराच्या कळस आणि दगडी भिंतींचे मोठे नुकसान होत असतानाही राज्य सरकारने याकडे लक्ष दिलेले नाही. यासंदर्भात पुरातत्व विभागाशी अभ्यासकांचा पाठपुरावा सुरू होता. सुंदरनारायण मंदिराची पाहणी करून त्याच्या नूतनीकरणाचा अहवाल पुरातत्व विभागाने तयार केला. त्यानुसार निधी मंजूर करण्यास राज्य सरकारने तयारी दर्शविली आणि एकदाचे त्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. मंदिरावरील सर्व दगड उतरवण्यात आले असून महिनाभरापासून मजूर नसल्याने कामबंद आहे. हे सर्व मजूर दक्षिणेतील असून दिवाळीच्या सुट्यांसाठी ते गावी गेल्याने काम बंद असल्याचे पुरातत्त्व विभागाचे म्हणणे आहे. रविवार, २५ नोव्हेंबरपासून पुन्हा काम सुरू करण्यात येणार आहे.

सुंदर नारायण, देवी लक्ष्मी आणि देवी तुलसी यांच्या मूर्ती तात्पुरत्या स्वरूपात मंदिराशेजारील एका खोलीत ठेवण्यात आल्या असून तेथील पूजाअर्चना अमेय पुजारी पहात आहेत. येथेही दर्शनासाठी भाविकांची उपस्थिती असते.

सुंदर नारायण मंदिरासाठी साडे बारा कोटी रुपये निधी मंजूर झाला असून त्याचा पहिला टप्पा ४ कोटी ६० लाख रुपये मिळाले आहेत. यातून कामास सुरुवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम व्हावे, अशा सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत.

- जया वाहणे, प्रादेशिक वस्तुसंग्रह अभिरक्षक

मंदिरातील मूर्ती शेजारील खोलीत ठेवण्यात आल्या असून तेथे रोजच त्यांची पूजाअर्चा होते. येथे भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. मंदिराचे काम पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागणार असे प्रथमदर्शनी वाटते.

- अमेय पुजारी, सुंदर नारायण मंदिराचे पुजारी

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनीष रेवर हत्या फोटो

पूर्ववैमनस्यातून मनीष रेवरची हत्या

$
0
0

तिघांचा सहभाग निष्पन्न; एकास अटक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मद्य प्राशन करताना झालेल्या भांडणानंतर तिघांनी मिळून मनीष प्रेमजी रेवर (२८, रा. आदर्शनगर, रामवाडी) या तरुणाची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. या गुन्ह्यात तिघा संशयिताचा समावेश असून, त्यापैकी एकास भद्रकाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हत्येची घटना गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास महात्मा गांधी रोडवर घडली होती.

चेतन पोपट लेवे असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याचाच नातेवाईक असलेला आणखी एक युवकास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. हा युवक अल्पवयीन आहे की नाही, याचा तपास पोलिस करीत आहे. हत्येनंतर सिद्धार्थ इस्ते हा तिसरा संशयित आरोपी फरार असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत. यातील लेवे विरुद्ध भद्रकाली, गंगापूर आणि पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. हत्या झालेला मनीष रेवरविरुद्ध सुद्धा हत्या आणि आणखी काही गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुरुवारी रात्री चौघे आरोपी एम. जी. रोड परिसरात मद्यप्राशन करीत असताना त्यांच्यात वाद झाले. यानंतर तिघांनी मनीषवर चॉपरने वार केले असता त्याने तेथून पळ काढला. मात्र, संशयितांनी त्याचा डेअरी डॉनपर्यंत पाठलाग केला. या ठिकाणी अत्यंत निघुर्ण पद्धतीने रेवरच्या चेहऱ्यावर, मानेवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मनीषला सुरुवातीला खासगी आणि नंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, भद्रकालीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, सरकारवाडाचे सहायक पोलिस निरीक्षक विलास शेळके आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लागलीच तपास सुरू करीत फरार होण्याच्या तयारीत असलेल्या लेवेला अटक केली. घटनेचा आधिक तपास भद्रकाली पोलिस करीत आहेत.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या एका भांडणातून हत्येची घटना झाल्याचे संशयित आरोपीने सांगितले. मात्र, सर्व आरोपींना अटक केल्यानंतर पूर्ण प्रकार समोर येईल. या गुन्ह्यातील संशयित आणि हत्या झालेला युवक यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

- मंगलसिंग सूर्यवंशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भद्रकाली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीच्या मालाची पळविलेल्या वाहनातून वाहतूक

$
0
0

दोघांना अटक; अन्य तिघांचा शोध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर एमआयडीसीतून चोरी केलेल्या पिकअपच्या मदतीने अहमदनगरसह औरंगाबाद जिल्ह्यात घरफोडी, चोऱ्या करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. चोरी केलेल्या पिकअपमध्ये इतर गुन्ह्यातील मुद्देमाल सुद्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाला. या गुन्ह्यातील आणखी तिघे फरार असून, पोलिस त्यांचा माग काढत आहेत.

आनंदा अनिल काळे (२३), गणेश भिकनाथ तेलोरे (१९, दोन्ही रा. गणेशनगर, ता. राहता, जि. अहमदनगर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील अन्य संशयित राहुल काळे, शुभम काळे, भरत काळे (रा. राजंणगाव, ता. राहता) हे मात्र अद्याप फरार आहेत. संशयित आरोपींनी काही दिवसांपूर्वी सिन्नर एमआयडीसीतून एक पिकअप व्हॅन (एमएच ४३, एफ ५४३२) चोरी केली होती. हे वाहन राहता तालुक्यातील गणेशनगर येथे असल्याची माहिती 'एलसीबी'च्या पथकास मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे, एपीआय अरुण पगारे, हवालदार संजय गोसावी, कॉन्स्टेबल मंगेश गोसावी, सुशांत मरकड, कुणाल मोरे, विशाल आव्हाड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांचे पथक तिथे पोहचले. यावेळी 'एलसीबी'चे पोलिस निरीक्षक अशोक करपे यांना संशयित आनंदा काळेची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती तपास पथकास दिल्यानंतर हे पथक लागलीच गणेशनगर सहकारी कारखाना येथे पोहचले. तिथे काळेला ताब्यत घेण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी झाली. आनंदाच्या माहितीनुसार लागलीच गणेश तेलोरेला अटक करण्यात आली.

अटक आणि फरार संशयितांनी चोरी केलेल्या वाहनाच्या मदतीने औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील ईसारवाडी फाटा येथील एक रेडिमेड कपड्याचे दुकान फोडले होते. श्रीरामपूर येथे किरणा दुकान सुद्धा फोडले. पोलिसांनी या दोन्ही घटनांमधील मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलिस निरीक्षक अशोक करपे यांनी सांगितले, की ही टोळी सराईत असून, त्यांच्यावर अहमदनगर, नाशिकसह आजुबाजुच्या जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. चोरी केलेल्या वाहनाचा वापर चोरीचा मुद्देमाल वाहण्यासाठी करण्यात आला. टोळीतील फरार आरोपींचा शोध सुरू असून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना अटक करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचारांशी प्रामाणिक राहणारे ‘देहासक्त’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य नाट्य स्पर्धेत शुक्रवारी देवेन कापडणीस लिखित 'देहासक्त' हे नाटक सादर करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ही स्पर्धा सुरू आहे.

मधुरा एक सिनेनटी, कामाक्षी एक बँकिंग क्षेत्रातील मोठ्या हुद्द्यावरची अधिकारी. या दोघी खरे तर एकाच नाण्याच्या दोन बाजू. मधुरा मुक्त जीवन जगणारी तर कामाक्षी खोटे जीवन जगणारी. दोघी बालपणीच्या मैत्रिणी पण पुढे दोघींचे मार्ग भिन्न होतात. मधुरा मनमोकळे, स्वतःला हवे तसे जीवन जगत असते. ध्येय गाठण्यासाठी तिची वाट्टेल ते करण्याची तयारी असते. ब्रेक मिळण्यासाठी ती दिग्दर्शकाला शरीर देते, ते ती नाकारतही नाही. व्यवसायात या गोष्टी कराव्याच लागतात त्याशिवाय उच्च स्थानावर तुम्हाला पोहचताच येत नाही या सर्व विचारांशी ती प्रामाणिक आहे आणि ते कबुल करण्यात तिला संकोच वाटत नाही. हे वास्तव आहे मग ते का नाकारावे, असे तिचे मत असते. तर कामाक्षी सभ्यपणाचा बुरखा पांघरून खोटे जगत असते. दोघींना त्यांच्या क्षेत्रातील बहुमान एकाचवेळी मिळतो आणि त्याच दिवशी मधुरा कामाक्षीला भेटण्यासाठी तिच्या घरी येते. १७ वर्षांनी दोघी भेटत असतात. मग त्या मद्यप्राशन करतात व मधुरा कामाक्षीला डिवचते, तिला बोलते करते आणि दोघींच्या बोलण्यातून एक पट उलगडत जातो. पुढे मधुरावर सिनेमात नग्न दृश्य दिल्यामुळे संस्कृतीरक्षक हल्ला करतात व तिच्यावर अत्याचार करतात. मग मधुरा बदलते पण आता कामाक्षीही बदलली आहे. ती संस्कृती रक्षकांचा बदला घ्यायचा ठरवते; पण मधुरा तयार होत नाही. कामाक्षी आता ईरेला पेटते. पुढारी दोघींवर दबाव टाकू पहातो, पण त्या आपले स्त्री पण सोडत नाहीत आणि अखेर पुढारी कच खातो.

नाटकाचे दिग्दर्शन धनंजय वाबळे यांनी केले. निर्मिती प्रमुख रवींद्र ढवळे, सूत्रधार नंदकुमार देशपांडे, प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित, नेपथ्य अविनाश देशपांडे, संगीत तेजस बिल्दिकर, रंगभूषा माणिक कानडे यांची होती. नाटकात पुनम देशमुख, श्रुती चांदोरकर, डॉ. मोहन अमेसर, केदार रत्नपारखी, आशिष दळवी यांनी भूमिका केली.

आजचे नाटक

अश्वमेध

ओम साई श्री सच्चिदानंद सामाजिक संस्था

स्थळ : पसा नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ७ वाजता

\Bलोगो : राज्य नाट्य स्पर्धा \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेकासह मातेने कवटाळले मृत्यूला

$
0
0

सप्तशृंगगडावरील शीतकड्यावरून घेतली दरीत उडी

म.\R टा.\R वृत्तसेवा, कळवण

कळवण\R तालुक्यातील\R सप्तशृंगी\R गडावर\R शिवालय\R तलाव\R लगतच्या शीतकड्यावरून उडी\R मारून\R आईसह\R मुलाने\R आत्महत्या\R केली.\R अर्चना\R शरद\R आहेर (वय ३५) आणि जय (वय १५, दोघे रा. उगाव, ता. निफाड) असे आत्महत्या करणाऱ्या मायलेकाचे नाव आहे.

दर्शनासाठी\R आलेले\R काही\R भाविक\R सायंकाळी\R सहा\R वाजेच्या सुमारास शीतकडा\R बघण्यासाठी\R गेले\R असता\R त्यांना सुमारे दोनशे फूट\R खोल\R दरीत\R महिला आणि मुलगा\R पडल्याचे\R दिसले. त्यांनी याबाबत तेथील\R ग्रामस्थांना\R शितकड्यात\R कोणीतरी\R पडल्याचे\R त्वरित\R सांगितल्याने. ग्रामस्थांनी\R शीतकड्याकडे धाव\R घेऊन\R बघितले. गडावरील\R सामाजिक\R कार्यकर्ते\R संदीप\R बेनके\R यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी\R घटनास्थळी\R त्वरित\R धाव\R घेत पाहणी\R केली. येथील\R तरुण\R ग्रामस्थ, पोलिस\R व\R पोलिस\R मित्राच्या मदतीने शुक्रवारी सकाळी\R सुमारे २०० फूट\R खोल\R दरीत\R उतरून\R दोरखंडाच्या\R सहाय्याने\R दोघांचे\R मृतदेह बाहेर काढण्यात\R आले.

दरी\R खोल\R असल्याने मदतकायार्साठी पुढे आलेल्या तरुणांसह पोलिसांचे\R खूप\R हाल\R झाले. जय\R आहेर या मुलाच्या खिशात मोबाइल सापडला. त्यावरून त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. दोघांचे मृतदेह\R रुग्णवाहिकेतून\R कळवण\R उपजिल्हा\R रुग्णालय\R येथे\R पाठवण्यात\R आले. दरम्यान, पुढील\R तपास\R कळवण\R पोलिस\R स्टेशनचे\R निरीक्षक\R सुधाकर\R मांडवकर, उपविभागीय पोलिस अधिकारी\R सदाशिव\R वाघमारे, सहाय्यक\R पोलिस\R निरीक्षक\R एस. आय. खाडे, पोलिस कॉन्स्टेबल योगेश\R गवळी, पी. सी. शिंदे, ए. सी. आहिरे, पी. सी. घरटे\R हे\R करीत आहेत.

उगावमध्ये अंत्यसंस्कार

आत्महत्या\R केलेल्या आई अर्चना व मुलगा\R जय\R शरद\R आहेर\R हे दोघेही उगाव\R येथील रहिवाशी आहेत. अर्चना यांचे पती शरद\R आहेर\R गावातीलच\R एका\R ट्रान्सपोर्ट\R कंपनीत\R कामाला आहेत. अर्चना\R या\R मुलासह\R दिवाळीपूर्वीच\R मनमाड\R येथे\R आपल्या\R माहेरी\R गेल्या\R होत्या. त्यांच्या आत्महत्याच्या घटनेची माहिती मिळात उगावमध्ये हळहळ\R व्यक्त\R करण्यात आली. अर्चना\R व\R मुलगा\R जय\R यांच्यावर\R रात्री\R उशिरा\R उगावमध्ये अंत्यसंस्कार\R करण्यात\R आले.

तरुणाची आत्महत्या

देवळाली गावातील घोलपवाडा येथे २९ वर्षांच्या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.२१) घडली. विनोद संपत घोलप (रा. घोलप वाडा, देवळाली गाव) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. विनोद हा गुरुवारी साडेसहा वाजता घरी असताना त्याने व्हरांड्यातील पत्र्याच्या शेडला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, या प्रकरणी उपनगर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विवाहितेचा गळफास

देवळाली कॅम्प : येथील विजयनगर भागातील रहिवासी असलेल्या आरती नितीन पाटील (वय ३२) या विवाहितेने गुरुवारी (दि. २१) मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या नातेवाईकांनी तिला १ वाजेच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले असता डॉ. स्वाती शुक्ला यांनी तिला तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी ६५/२०१८ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images