Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

तरतुदी, नियमांवर मंथन

0
0

राष्ट्रीय जीएसटी परिषदेचा समारोप

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सीएआय शाखा व औरंगाबाद सीएआय शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय जीएसटी राष्ट्रीय परिषदेचा शनिवारी समारोप झाला. जीएसटीसंबंधीच्या तरतुदी, नियमांवी यावेळी मंथन करण्यात आले.

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात सीए अविनाश पोद्दार यांनी इनपूट टॅक्स क्रेडिट या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध तरतुदी व त्याबद्दल काय काळजी घ्यायला हवी या संदर्भात टिप्स दिल्या. दुसऱ्या सत्रात सीए गुरजीत भुल्लार यांनी आउटवर्ड सप्लायमध्ये समाविष्ट होणारे सप्लाय आणि त्या संदर्भातील तरतुदी याबद्दल मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात सीए मंदार तेलंग यांनी जीएसटी अॅन्युल रिटर्नमध्ये असलेल्या नियमांबद्दल माहिती दिली.

आतापर्यंत व्यापाऱ्यांनी भरलेल्या जीएसटी रिटर्न संबंधीचा गोषवारा जीएसटी वार्षिक रिटर्न आणि जीएसटी ऑडिटमध्ये ३१ डिसेंबर २०१८ भरण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे जीएसटी वार्षिक रिटर्न आणि जीएसटी ऑडिट फॉर्ममध्ये द्यावयाचा तपशिलांचा सखोल अभ्यास करण्यासाठी आयोजित या परिषदेला दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या परिषदेचे संयोजन नाशिक शाखेचे व्हाइस चेअरपर्सन सीए रेखा पटवर्धन, सेक्रेटरी सीए रणधीर गुजराथी, हर्षल सुराणा, रोहन आंधळे, विकास हसे, रवी राठी, राजेंद्र शेटे व औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष सीए सचिन लाठी यांनी केले.

...

पहिल्या दिवशी या परिषदेत सीए शेफाली गिरिधारीवाल, जीएसटीचे अधिकारी दीपक गुप्ता, सीए आसीत शहा यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आल्यामुळे परिषदेचा उद्देश सफल झाला.

- मिलन लुणावत, अध्यक्ष, सीए संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षकच वाचवू शकतात युवकांना

0
0

प्रा. बालकृष्ण जोशी यांचे मनमाड येथे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

कुत्तागोली सारख्या भयानक नशिल्या पदार्थांचे थैमान सध्या घोंगावत आहे. युवा पिढी बरबाद होण्याची चिन्ह आहेत. अशा स्थितीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी निश्चित स्वरुपाचे प्रयत्न करावेत. शिक्षकच युवा वर्गाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकतात, असे प्रतिपादन प्रा. बालकृष्ण जोशी यांनी मनमाड येथे केले.

मनमाड सिटी ऑफ लायन्स प्राईड यांच्या वतीने शिक्षकांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. तरुणांना घडविण्याची ताकद शिक्षकांमध्ये असून शिक्षकांनी निष्ठापूर्वक प्रयत्नातून उद्याचे सुदृढ व सक्षम नागरिक घडवावे असे आवाहन जोशी यांनी केले. तीन दिवसीय या शिबिराचे उद्घाटन प्रगती बँकेचे संस्थापक अध्यक्ष पन्नालालजी शिंगी यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. सुनील बागरेचा, शिक्षण मंडळ समन्वयक सूर्यभान नाईकवाडे, मुख्याध्यापक सॅबी कोरिया, क्रांति कुंजरकर, फादर डायन लोगा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. लॉयन्सचे अध्यक्ष डॉ. अजय भन्साली यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय नवनिर्माण व युवा पिढी संवर्धन या साठी लॉयन्सने शिक्षकांसाठी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केल्याचे त्यानी सांगितले. यावेळी लॉयन्सचे पंकज ललवाणी, भूषण ललवाणी, कुणाल ओस्तवाल, डॉ. मोहीत लोढा, डॉ. कुशल लोढा, डॉ. शैलेश भंडारी, माजी विभागीय पदाधिकारी विवेक बरडिया, मुकेश गांधी, मंगलेश बाकलिवाल उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण करू नका

0
0

व्याख्याते प्रदीप सोळुंके यांचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, येवला

लहानग्या शिवबाला घेऊन स्वराज्य स्थापनेचा संकल्प करणे हे जगातील सर्वात मोठे धाडस आहे. हेच धाडस राजमाता जिजाऊ यांनी दाखविल्याने सर्वांना अभिमान वाटेल अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती होवू शकली. जिजाऊ यांनी शिवबांवर संस्कार करण्यास कोणतीही कसूर ठेवली नाही. लेकरांवर संस्कार करा. मुलांना हे करू नको, ते करू नको, असे आजकाल सांगितले जाते. मुलांनी मग नेमके काय करायचे ते कुणी सांगतच नाही. आपणच आपल्या मुलांना परावलंबी बनवतो, भ्याड बनवतो. मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण करू नका, त्यांना सक्षम बनविण्यासाठीचे प्रयत्न करा, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व्याख्याते प्राध्यापक प्रदिप सोळुंके (औरंगाबाद) यांनी येवल्यात बोलताना केले.

शहरातील सेनापती तात्या टोपे व्याख्यानमाला समितीच्या वतीने आयोजित तीन दिवशीय व्याख्यान मालेतील दुसऱ्या दिवशीचे 'राजमाता जिजाऊ' या विषयावरील दुसरे पुष्प गुंफताना प्रा. सोळुंके बोलत होते. महात्मा फुले नाट्यगृहात शहरातील मान्यवरांसह श्रोत्यांची उपस्थिती होती. इतिहासाचा चिकित्सकतेने अभ्यास केल्यास आपल्या असे लक्षात येते की, राजमाता जिजाऊ अन् छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुठल्याही कार्यासाठी कधीही मुहूर्त पाहिले नाही. चांगल्या कामासाठी उचललेलं पहिलं पाऊल हाच उत्तम मुहूर्त त्यांनी मानला याकडे लक्ष वेधत, जे प्रयत्नवादी असतात तेच यशस्वी होतात, असे प्रा. प्रदीप सोळुंके म्हणाले. व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी सहकारक्षेत्रात उल्लेखनिय काम करणारे वसंतराव आहेर व निवृत्त पोलिस सहाय्यक आयुक्त बाळासाहेब भांगे या येवला तालुक्यातील दोघा भूमिपुत्रांना व्याख्यानमाला समितीच्या वतीने 'जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. माणिकराव शिंदे होते. महेंद्र काले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. माजी आमदार मारोतराव पवार, रायभान काळे, अशोक कुळधर, अनिरुद्ध पटेल, अॅड. बाबासाहेब देशमुख, जयंत पेटकर, नगरसेवक प्रवीण बनकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उबदार कपडे कपाटांत!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नोव्हेंबरच्या प्रारंभीच थंडीला सुरुवात झाल्यानंतर गेल्या आठवड्यात राज्यात सर्वांत कमी तापमान नाशिक व जळगाव शहरांत नोंदविले गेले होते. त्यावेळी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मात्र, काही दिवसांतच नाशकातील थंडीचा जोर ओसरला असून, शुक्रवारी कमाल ३०.८, तर किमान १६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

थंड हवेचे ठिकाण म्हणून राज्याच्या विविध भागातून पर्यटक नाशिक शहरात येत असतात. नोव्हेंबरच्या अखेरीस थंडीने शहरात चांगला जोर धरलेला असतो. मात्र, सध्या थंडीने पोबारा केल्याचे चित्र आहे. त्यामुळे थंडी सुरू झाल्यानंतर नाशिककरांनी कपाटांतून बाहेर काढलेले उबदार कपडे थंडीचा जोर कमी होताच पुन्हा कपाटांत गेले आहेत. उबदार कपडे खरेदी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या तिबेटियन मार्केटमधील व्यवहारही थंडावले आहेत. आठवड्यापूर्वीच राज्यात सर्वांत कमी तापमान नोंदविणाऱ्या नाशिकमध्ये काही दिवसांतच उन्हाळ्याप्रमाणे कमाल तापमान नोंदविले गेले. पहाटे गारवा, दुपारी उष्मा आणि रात्री काहीशी थंडी, असे वातावरण सध्या शहरात अनुभवास येत आहे. शनिवारी सकाळी काही भागात ढगाळ हवामान होते. गज वादळाचा हा परिणाम असल्याचे वेधशाळेचे म्हणणे असून, राज्यात अनेक ठिकाणी मंगळवार (दि. २७)पर्यंत अशीच स्थिती राहण्याचे संकेत आहेत. गोव्यासह संपूर्ण राज्यात कोरडे हवामान राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

--

गत सहा दिवसांतील तापमान

--

दिनांक...कमाल....किमान

--

१८ नोव्हेंबर..३३.८..१३.६

१९ नोव्हेंबर..३३.५...१६

२० नोव्हेंबर..३३.७...१७.१

२१ नोव्हेंबर...३१.८....१७.४

२२ नोव्हेंबर...३२.२....१८.९

२३ नोव्हेंबर...३०.८....१६.८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महत्त्वाकांक्षेचे ‘अश्वमेध’

0
0

..

राज्य नाट्य स्पर्धा

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महत्त्वाकांक्षा ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. परंतु, अतिमहत्त्वाकांक्षा मात्र वाईटच हे निषाद राज्याची महाराणी नीलाक्षी हिच्या वर्तनातून सिध्द करणारी कथा नाटकातून मांडण्यात आली. राज्य नाट्य स्पर्धेत शनिवारी अश्वमेध हे नाटक सादर करण्यात आले. ओम साई श्री सच्चिदानंद सामाजिक संस्था प्रस्तूत हे नाटक होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहामध्ये ही स्पर्धा सुरू आहे.

अश्वमेध हे एक काल्पनिक ऐतिहासिक नाटक असून, निषाद राज्याची महाराणी नीलाक्षी अत्यंत महत्त्वाकांक्षी असते. निपुत्रिक असल्यामुळे राजा तिच्यावर नाराज असतो आणि दुसरा विवाह करण्याचा विचार करीत असतो. नीलाक्षी आपल्या बालपणीची मैत्रीण, अवस्थीपूर साम्राज्याची महाराणी रत्नप्रभाला भेटायला जाते. तेथील वैद्य तिला तपासून तिचा गर्भ अपत्य प्राप्तीसाठी योग्य असल्याचे सांगतात. त्यानंतर ती अधिकच महत्त्वाकांक्षी बनते. अश्वसहाय्यक अश्विनचा वापर करून ती मातृत्व प्राप्त करून घेते आणि त्याच्याचकडून महाराज कृतसेन यांचा विष देऊन खून करते. खुनाच्या आरोपाखाली अश्विनचाही बळी देते आणि निषाद साम्राज्याची महापराक्रमी साम्राज्ञी बनण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करते. अशा आशयाची ही कथा होती.

नाटकाचे निर्मितीप्रमुख रवींद्र ढवळे होते. सूत्रधार नंदकुमार देशपांडे, दिग्दर्शन अरुण भावसार यांचे होते. प्रकाशयोजना विनोद राठोड, नेपथ्य अविनाश देशपांडे, संगीत अमोल काबरा, रंगभूषा माणिक कानडे यांची होती. नाटकात डॉ. सोनाली कुलकर्णी, आदित्य भोंबे, श्रुती कापसे, हरिकृष्ण डिडवाणी, राहुल काकड, मधुरा सोनवणे, सचिन दलाल, हरिश परदेशी, राजेश टाकेकर यांनी भूमिका केल्या.

---

आजचे नाटक

सूर्याची पिल्ले

दीपक मंडळ सांस्कृतिक विभाग

वेळ : सकाळी ११

---

एक होता बांबू काका

आर. एम. ग्रुप

स्थळ : पसा नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐंशी नगरसेवक नापास!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील १२७ पैकी तब्बल ८० नगरसेवकांना 'आयुक्त मुंढे' यांच्या कार्यकाळात आपापल्या प्रभागांत एक रुपयाचेही विकासकाम न करता न आल्याची स्थिती उघड झाली आहे.

भाजपचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या २५७ कोटींच्या रस्तेयोजनेवर तुकाराम मुंढेंनी मारलेली फुली आणि पाठोपाठ विकासकामांसाठी लागू केलेल्या त्रिसूत्रीचा फटका महापालिकेतील या ८० नगरसेवकांना बसला आहे. महापालिकेतील पदाधिकारी, अनुभवी व बाहुबली अशा ४७ नगरसेवकांनी 'मुंढे इफेक्ट'मध्येही किरकोळ कामे मार्गी लावली असली, तरी तब्बल ८० नगरसेवकांना वर्षभरापासून आपल्या प्रभागात साधे नारळही फोडता आलेले नाही. विशेष म्हणजे मुंढेंनी मंजूर केलेला १२ लाखांच्या स्वेच्छानिधीकडेही बहुसंख्य नगरसेवकांनी नियमांच्या कात्रीमुळे पाठ फिरविली. परंतु, आता मुंढेंचीच एक्झिट झाल्याने सोमवारपासून महापालिका नगरसेवकांनी गजबजणार असल्याचे चित्र आहे.

महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळाली असली, तरी आपल्या मर्जीप्रमाणे काम करण्यास पदाधिकारी आणि नगरसेवकांना अपयश आल्याचे चित्र आहे. सिंहस्थ आणि मनसेच्या सत्ताकाळात शहरातील मुख्य रस्त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी मिटला होता. परंतु, तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी नगरसेवकांच्या मागणीनुसार प्रभागनिहाय दौरे करीत प्रभागातील कामे सुचविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नगरसेवकांनी पाणीपुरवठा, मलनिस्सारणासोबतच मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुचविली होती. प्रशासनाकडून तब्बल २५७ कोटींच्या रस्तेकामांचे प्रस्ताव मागच्या दाराने महासभेवर ठेवण्यात आले. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मागणीनुसार प्रत्येक प्रभागात साडेसात कोटींची कामेही प्रस्तावित करण्यात आली होती. त्यासाठीचे आर्थिक नियोजनही पूर्ण केले होते. महासभेने मान्यता दिल्यानंतर या प्रस्तांवाच्या निविदाही मागविण्यात आल्या होत्या. परंतु, अचानक फेब्रुवारी महिन्यात कृष्णांची बदली होऊन आयुक्तपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती झाली. मुंढेंनी आल्या आल्या सत्ताधाऱ्यांच्या या ड्रीम प्रोजेक्टलाच हात घालत त्यावर फुली मारली. पूर्वीच्या आयुक्तांचे सर्व निर्णय रद्द करीत त्यांनी बजेटची पुनर्रचना करीत अनावश्यक कामांवर काट मारली. रस्ते विकासकामांना त्यांनी कात्री लावत कामाची गरज, तांत्रिक व्यवहार्यता आणि निधीची उपलब्धता अशी त्रिसूत्री लावून कामे करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला.

मुंढेंच्या शिस्तीमुळे एकीकडे २५७ कोटींवर काट मारली जात असताना नगरसेवकांच्या ७५ लाखांच्या नगरसेवक निधीवरही पाणी फेरले गेले. त्यामुळे नगरसेवकांना निधी मिळविण्यासाठी पहिले पाढे पंचावन्न करावे लागले. मुंढेंनी अनावश्यक कामे करण्यासह नगरसेवक महापालिकेत फिरणार नाहीत, अशी व्यवस्थाच उभी केली होती. त्यामुळे नगरसेवकांची कोंडी झाली होती. निधी मिळत नाही म्हणून नगरसेवकांनी स्वेच्छानिधीचा जीआर काढला. प्रत्येकी १२ लाख मिळणार असले, तरी मुंढेंनी या निधीतही २ लाख रुपये कामांचीच पाचर मारल्याने प्रस्तावच दाखल होऊ शकले नाहीत. त्यामुळे १२७ नगरसेवकांमधून ८० नगरसेवकांच्या प्रभागात वर्षभरापासून कवडीचेही काम झाले नाही. निधीच मिळाला नसल्याने या नगरसेवकांना वर्षभरापासून आपल्या प्रभागात एकही नारळ फोडता आला नसल्याचे चित्र आहे. एकीकडे निधी नाही, तर दुसरीकडे नागरिकांचा कामांसाठी होत असलेल्या रेट्यामुळे नगरसेवकांनी वर्षभरात महापालिकेसह प्रभागांमध्येही फिरणे बंद केल्याचे चित्र आहे. यातील अनेक नगरसेवकांनी तर राजकारणापेक्षा स्वत:च्या व्यवसायात लक्ष घातल्याचे चित्र आहे.

--

४७ नगरसेवकांना मात्र यश

जवळपास ८० नगरसेवकांना निधी मिळाला नसला, तरी महापालिकेतील बाहुबली पदाधिकारी, अनुभवी नगरसेवकांनी मात्र मुंढेंच्या कडक शिस्तीतही निधी ओढून आणला. महापालिकेच्या निधीसह आमदार निधीतून काही कामे करीत त्यांनी निधीच्या दुष्काळावरही मात केल्याचे दिसून आले. आयुक्तांनी पाणीपुरवठा व मलनिस्सारण यंत्रणांसाठी सुरू केलेली कामे आपणच केल्याचा देखावाही या नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे या नगरसेवकांच्या प्रभागात प्रशासनाने कामे केली असली, तरी ती या नगरसेवकांच्या नावावर गेल्याने त्यांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

-------

उद्यापासून पुन्हा गजबज

'मुंढे इफेक्ट'मुळे गेल्या वर्षभरातील कामावर पाणी फिरले असले, तरी आता मुंढेंच्या बदलीमुळे रद्द झालेली व रेंगाळलेली कामे पुन्हा मार्गी लावण्यासाठी नगरसेवक सरसावले आहेत. महापालिकेत सोमवारपासून पुन्हा नगरसेवक, ठेकेदार, पदाधिकारी यांची गजबज वाढण्याची चिन्हे असून, मुंढेंनी बंद केलेल्या फायली उघडण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. विशेष म्हणजे नऊ महिन्यांपासून महापालिकेची पायरीही न चढलेले नगरसेवक पुन्हा महापालिकेत येऊन आता तरी विकासकामांचा वनवास संपवा, असा आग्रह पदाधिकाऱ्यांकडे धरणार आहेत. त्यामुळे सोमवारपासून महापालिका मुख्यालय पुन्हा गजबजणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मैत्रेय’च्या ठेवीदारांची गर्दी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मैत्रेय फसवणूक प्रकरणाला आता गती मिळत असून, कोणताही मोबादला न मिळालेल्या ठेवीदारांची माहिती संकलित करण्याचे काम पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेत जोरात सुरू आहे. शनिवारी दिवसभरात जवळपास दोनशे ते अडीचशे ठेवीदारांची माहिती संकलित करण्यात आली.

मैत्रेय समूहाकडून ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी राज्यात ३० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांच्या तपासामध्ये 'मैत्रेय'च्या वित्तीय आस्थापनाच्या नोंदींद्वारे ठेवीदारांची माहिती उपलब्ध झाली असून, पुढील तपास पोलिस यंत्रणेमार्फत सुरू आहे. त्यामुळे अद्याप आपल्या ठेवींच्या रकमेची मागणी दाखल न केलेल्या ठेवीदारांनी ठेवींच्या मागणीबाबत विहित नमुन्यात अर्ज करून पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेत किंवा आडगाव येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या फसवणूक प्रकरणात दाखल गुन्ह्यांचा तपास, तसेच कार्यवाहीमध्ये समन्वयाच्या दृष्टीने पोलिस महासंचालक कार्यालयात सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ नुसार आतापर्यंत ३०८ मालमत्ता जप्त करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. या ३०८ मालमत्तांसंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून कायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता, तसेच सक्षम प्राधिकारी नेमण्यात आले आहेत.

या गुन्ह्यांचा तपास सुरू असून, निष्पन्न झालेल्या उर्वरित मालमत्ता जप्त करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत करण्यात येईल. त्यामुळे ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळण्यासंदर्भात अन्य व्यक्ती किंवा यंत्रणेकडे संपर्क न साधता पोलिसांकडे अर्ज सादर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत बोलताना तपासाधिकारी डॉ. सीताराम कोल्हे यांनी सांगितले, की या कामासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हा गुन्हा उघडकीस आल्यानंतर कोर्टाच्या आदेशाने ११ हजार गुंतवणूकदारांना जवळपास नऊ कोटी रुपये परत करण्यात आले होते. नाशिक शहर आणि जिल्ह्यात जवळपास सव्वादोन लाख गुंतवणूकदार असून, उर्वरित गुंतवणूकदारांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यात ठेवीदारांकडून गुंतवणूक केलेली रक्कम, त्याचा पुरावा, पॅनकार्ड, आधारकार्ड, बँकेची माहिती अशी माहिती संकलित करण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक कोल्हे यांनी सांगितले. आगामी दोन महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

--

या ठिकाणी द्यावेत अर्ज

मैत्रेय गुन्ह्यातील मैत्रेय सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, मैत्रेय प्लॅटर्सस अँड स्ट्रक्चर्स प्रा. लि., मैत्री रियल्टर्स अँड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या तीन कंपन्यांचे अर्ज स्वीकारण्याठी पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखा येथे पोलिस कॉन्स्टेबल विकी झाडे, तसेच रुपेश बनसोड यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रा. लि. या कंपनीचे अर्ज ग्रामीण पोलिस दलाच्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखा येथे द्यावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवेकानंद केंद्राच्या व्यक्तिमत्व शिबिराला प्रतिसाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या नाशिक शाखेतर्फे तीन दिवसीय निवासी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन पिंपळद, त्र्यंबकेश्वर येथील विवेकानंद केंद्र प्रशिक्षण व सेवा प्रकल्प येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार व केंद्राचे सहसंचालक विश्वास देवकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. 'विवेकानंद : एक प्रेरणास्त्रोत' या विषयावर त्यांनी विचार मांडले.

विविध सत्रांमध्ये पवनेश कोठावदे यांनी 'वैदिक गणित' या विषयावर, माधवी संत यांनी 'प्रार्थनेचा अर्थ' या विषयावर, गणेश गायकवाड यांनी 'युवकांपुढील आव्हाने व त्यावरील प्रतिसाद' या विषयावर, शोभा श्रोत्रीय यांनी 'एकनाथजी रानडे' या विषयावर, प्रा. अमोल अहिरे यांनी 'व्यक्तिमत्व विकास' या विषयावर विचार मांडले. समारोपाच्या सत्रात रघुवीर अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय मुलांमध्ये कुतूहल, कलाकौशल्य साहसीवृत्ती, संवेदनशीलता, आत्मविश्वास, निर्णयात्मक क्षमता, आत्मनिर्भरता आदी गुणांचा विकास होण्यासाठी खेळ, घोषणा, आज्ञाअभ्यास, अभिनय गीत, गटचर्चा, योगासने, सूर्यनमस्कार, भोजनमंत्र, आकाशकंदील बनविणे कार्यशाळा, परिसर स्वच्छता, श्रमसंस्कार आदी उपक्रम आयोजित करण्यात आले. या शिबिरात शिबिर अधिकारी म्हणून नगरप्रमुख प्रा. अमोल अहिरे, शिबिरप्रमुख अंकुश आहेर, शोभा श्रोत्रीय, नयना देशमुख यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. या शिबिरात मेघालयातील सात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. शहर आणि जिल्ह्यातून युवकांचा या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्पर्धेपूर्वीच थरार...

0
0

\Bस्पर्धेपूर्वीच थरार...\B

देशातली सर्वांत मोठी ऑफरोड कॉम्पिटिशन असलेली नॅशनल मोटोग्रिप सुपरक्रॉस चॅम्पियनशिप आज, रविवारी (दि. २५) सकाळी १० वाजता पेठेनगर येथे रंगणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून बायकर्सकडून शनिवारी येथे सराव करण्यात आला. त्यामुळे नाशिककरांनी स्पर्धेपूर्वीच बाइक्सचा थरार अनुभवला. या स्पर्धेसाठी आर्टिफिशियल ट्रॅक तयार करण्यात आला असून, १२ डबल जम्प आणि कट टेबलटॉप अशा थराराक स्टंट्सने बाइकप्रेमींना धडकी भरवली. ऑस्ट्रेलियातील शॉन वेब आणि जॉर्डन स्प्राग या आंतरराष्ट्रीय रायडर्सचे स्टंट चर्चेचा विषय ठरले. या चॅम्पियनशिपमध्ये देश-विदेशांतील रायडर सहभागी होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार

0
0

लग्नाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी रोडवरील प्रभातनगर भागात राहणाऱ्या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी फुलेनगर येथील २४ वर्षांच्या संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मुकेश दादाभाऊ बकुरे (रा. देवी गल्ली, फुलेनगर) असे संशयिताचे नाव आहे. पीडित युवतीने म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित मुकेश बकुरे याने बळजबरी तिच्या घरात प्रवेश करून शरीरसंबंधाची मागणी केली; मात्र लग्न केल्याशिवाय शरीरसंबंध करू देणार नाही, असे युवतीने स्पष्ट केले. मात्र संशयिताने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यानंतर, पीडितेने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने नकार दिला. दरम्यान, तिला मारहाण करून धमकी देत तिचे दागिने काढून नेले. याबाबत म्हसरूळ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भडीकर पुढील तपास करीत आहेत.

--

भिंतीवरून पडल्याने चिमुकला गतप्राण

गंजमाळ येथील सहकारनगर भागात राहणारा सहा वर्षीय चिमुकला भिंतीवरून खाली पडल्याने जबर जखमी होऊन गतप्राण झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. २२) सायंकाळी ५ वाजता भीमवाडीजवळील सहकारनगर येथे घडली.

अथर्व मुकुंद खाडे (६, रा. सहकारनगर) असे या बालकाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी अर्थव घराजवळ खेळत असताना येथील भिंतीवरून खाली पडला. त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचे वडील मुकुंद खाडे यांनी शुक्रवारी (दि.२३) दुपारी त्याला आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना रात्री डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हवालदार काळोगे करीत आहेत.

--

विवाहितेची आत्महत्या

देवळाली कॅम्प येथील नवी स्टेशनवाडी येथे राहणाऱ्या २७ वर्षांच्या विवाहितेने विषारी औषध सेवन करीत आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण कळले नसून, देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कल्याणी दिनेश बस्ते (रा. नवी स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प, नाशिक) असे विवाहितेचे नाव आहे. कल्याणी हिने शुक्रवारी (दि. २३) घरी असताना रात्री काही तरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले. ही घटना लक्षात आल्यावर तिचे वडील रामू पगारे यांनी तिला तत्काळ देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले; मात्र येथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. याबाबत पोलिस नाईक एस. पी. शेवाळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवसानेत रोखलाभुजबळांचा ताफा

0
0

लघुपाटबंधारे विभागावर व्यक्त केला संताप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सात महिन्यांपूर्वी लघुपाटबंधारे विभागाने मांजरपाडा प्रकल्पात स्थानिक शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने न पाळल्याने देवसाने येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांना चार तास मंदिरात कोंडून ठेवले होते. शनिवारी याच शेतकऱ्यांनी प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा ताफा रोखला. यावेळी त्यांनी रस्त्यावर झाडाचे लाकूड टाकून रस्ताही बंद केला. अर्ध्या तासानंतर भुजबळांनी त्यांच्यासाठी विधानसभेत संघर्ष करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी रस्ता मोकळा केला.

येवला व चांदवड तालुक्यासाठी मांजरपाडा प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आले असून, त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा विरोधही वाढला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी भुजबळ येणार असल्याचे समजताच आंदोलनाची तयारी केली. भुजबळांनी प्रकल्पाचे काम बघितल्यानंतर या ग्रामस्थांनी भुजबळांसह त्यांच्या ताफ्यातील गाड्या अडवल्या. यावेळी स्थानिकांचा वाढता विरोध बघून भुजबळांनी गाडीतून उतरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. स्थानिकांना आधी पाणी मिळायला हवे ही माझी सुरुवातीपासून भूमिका आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी मी प्रयत्न करेल, असे अश्वान भुजबळ यांनी दिले. त्यानंतर ग्रामस्थांचे समाधान झाले.

मी सत्तेत नाही..

देवसाने ग्रामस्थांनी गाड्या अडवल्यानंतर छगन भुजबळ ग्रामस्थांना सामोरे केले. यावेळी त्यांनी 'आता मी सत्तेत नाही. त्यामुळे तुमचे प्रश्न सत्ताधाऱ्यांनी सोडायला हवे होते. तरीदेखील मी त्यासाठी विधानसभेत संघर्ष करून हे प्रश्न सोडवेल असेही भुजबळ म्हणााले. गेली तीन वर्षे मी तुरुंगात होतो. त्यामुळे तुमचे प्रश्न सुटले नसले तरी आता ते सोडवू असेही त्यांनी सांगितले.

दोन लघुपाटबंधारे हवे

देवसाने ग्रामस्थांनी दोन लघुपाटबंधारे हवे अशी यावेळी केली. त्यावेळी दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी एक मंजूर झाला असल्याचे सांगितले. मात्र ग्रामस्थांनी त्यांना फार बोलू दिले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरातील मुख्य ठिकाणी व संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची व पोलिस गस्त वाढविण्याची मागणी नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पोलिसांकडे करण्यात आली आहे.

सरकारवाडा पोलिस स्टेशनचे निरीक्षक व्ही. ए. शेळके यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाजीराव मते, जिल्हाध्यक्ष अरुण दातीर, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष सौरभ सोनवणे, योगेश भोसले, संदीप पैठणपगार, किरण बेलेकर, सुयश मंत्री, रोहन जगताप, पंकज बच्छाव, वैभव रौंदळ, सागर चौघुले, विजय धनवटे, अनिकेत कोठुळे आदी उपस्थित होते. एम. जी.रोड येथे वर्दळीच्या वेळी झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन सादर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुजरातला जाणारे पाणी थांबवा

0
0

नितीन भोसलेंचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना साकडे

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये झालेल्या पाणीकरारावर लक्ष देण्यासह पाणीप्रश्नावरून मराठवाडा विरुद्ध नाशिक-अहमदनगरमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला कायमस्वरुपी पूर्णविराम देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी गळ मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांनी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना घातली आहे. महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण लक्ष घालू, असे आश्वासन देत चव्हाण यांनी गुजरात आणि महाराष्ट्रातील पाणीकरारात तरतुदी बाजूला ठेवून निर्णय घेतला जात असल्याचा आरोप केला.

महाराष्ट्राचे हक्काचे पाणी राज्यात वळवले तर मराठवाडा, नगर-नाशिकचा पाणीप्रश्न सुटणार असल्याचा दावा भोसले यांनी केला आहे. त्या संदर्भात भोसले यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. आघाडीच्या काळात महाराष्ट्र, गुजरात आणि केंद्र सरकारमध्ये त्रिपक्षीय पाणीवाटप करार झाला होता. या कराराच्या कलम ५ मध्ये राज्याचा जलआराखडा केल्यानंतरच दोन्ही राज्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा उल्लेख आहे. परंतु, हा जलआराखडा राज्य सरकारऐवजी गुजरातच्या कंपनीकडून करून घेण्यात आल्याने राज्यावर अन्याय झाला आहे. या कंपनीच्या चुकीच्या आकडेवारीवरून महाराष्ट्राचे पाणी गुजरातकडे वळवण्यात आले आहे. केंद्राच्या मदतीने महाराष्ट्राचा जल आराखडा तयार होण्यापूर्वीच पाणी पळविण्यात आले, अशी माहिती भोसलेंनी चव्हाण यांना दिली.

...

समितीवर दबाब

डॉ. माधवराव चितळे समितीच्या अहवालानुसार दमनगंगा, पिंजाळ व नारपार या नद्यांचे समुद्राला मिळणारे १५७ टीएमसी पाणी अडवून गोदावरी व गिरणा खोऱ्यात टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. हे पाणी या दोन खोऱ्यात आले, तर पाण्याचा प्रश्न मिटेल. परंतु, केंद्र व गुजरात सरकारने सत्ताबदलचा फायदा घेत यातील अवघे २० टीएमसी पाणीच महाराष्ट्राला देण्याचा घाट घातला जात आहे. या संदर्भात आपण सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असली या संदर्भातील समितीवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे आपण यात लक्ष घालून सदरचे पाणी महाराष्टाकडे वळवा, अशी विनती भोसले यांनी चव्हाण यांच्याकडे केली. चव्हाण यांनीही यात लक्ष घालून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवू, असे आश्वासन भोसले यांना दिले आहे. यावेळी मनसेच्या नगरसेविका वैशाली भोसले उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा धडाका

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा ग्रामीण पोलिस दलाने जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविली. यामध्ये आतापर्यंत १४५ जणांवर कारवाई करण्यात आली असून, ३६ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यात सुमारे १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या मोहिमेसाठी ग्रामीण पोलिस प्रशासानाने उपविभागीय स्तर, तसेच पोलिस स्टेशननिहाय पथके तयार केली आहेत. जिल्हास्तरावर स्थानिक गुन्हे शाखा आणि या विषेश पथकांद्वारे कारवाई करण्यात येत आहेत. गेल्या आठवडाभरापासुन जिल्ह्यातील पोलिस स्टेशननिहाय अवैध धंद्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत अवैध मद्यविक्री व वाहतूक करणारे, तसेच हातभट्टीची गावठी दारू तयार करणाऱ्यांविरोधात १४० गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण १४५ संशयितांवर दारुबंदी कायदयान्वये कारवाई करण्यात आली. त्यात सुमारे १५ लाख ९ हजार ६८८ रूपयांचा अवैध मद्यासाठा, हातभट्टीची गावठी दारू व साहित्य साधने जप्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग घोटी, इगतपुरी, वाडीवऱ्हे, त्र्यंबकेश्वर, कळवण, अभोणा, हरसूल, देवळा व मालेगाव तालुक्यासह इतर ठिकाणी गावठी दारू, हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. मुंबई जुगारबंदी कायद्यानुसार २० गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात ३६ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. या कारवाईत जुगाराचे साहित्य साधने व रोख रक्कम असा एकूण दोन लाख ४९ हजार ५८५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिस अधीक्षक संजय दराडे, मालेगावचे अपर अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे, सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यात सहभागी झाले आहेत.

--

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे आढळून आल्यास जिल्हा पोलिस दलाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर अथवा ९१६८५५११००, नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२५३-२३०९७१५ यावर किंवा स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयाच्या ०२५३-२३०९७१० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामीण जिल्हा पोलिस दलाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोजापूरचे २८ ला सुटणार आवर्तन

0
0

१२० दलघफू पाणी मिळणार

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

भोजापूर धरणातून सिन्नर व संगमनेर तालुक्याच्या लाभक्षेत्रातील गावांना पिण्याच्या पाण्यासह रब्बी पिकांसाठी २८ नोव्हेंबरला उजवा व डावा अशा दोन्ही कालव्यांद्वारे आवर्तन सोडण्यात येणार आहे. कडवा विश्रामगृह येथे शुक्रवारी (दि. २३) कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून एकूण १२० दलघफू पाणी सोडले जाणार आहे.

आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, उपअभियंता सोमनाथ गोंदकर, शाखा अभियंता बी. डब्ल्यू. बोडके, बी. के. अचाट, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, नांदूरशिंगोटेचे सरपंच गोपाळ शेळके, उपसरपंच शरद शेळके, दीपक बर्के, संगमनेर तालुक्याचे प्रतिनिधी हरिश चकोर, बी. आर. चकोर, 'पाणी वापर'चे प्रतिनिधी श्याम उगले, भागवत घुगे उपस्थित होते.

आमदार वाजे यांनी आवर्तनाची पूर्वतयारी म्हणून कालवा व पोटचाऱ्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या असून त्यानंतरच रब्बीचे आवर्तन सोडावे, असेही अधिकाऱ्याना सांगितले. आवर्तन सुरळीत चालावे यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, अडथळे आणू नये आणि गुन्हे दाखल करण्यासारखे प्रसंग उभे करून नये, असे आवाहनही त्यांनी केले. यापूर्वीच्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. दुरुस्तीचे कामे लांबल्यास आवर्तनदेखील एखाद-दोन दिवस लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. कोणी शेतकऱ्यांनी आवर्तन सुटल्यानंतर पाणी मागणी केल्यास त्यांनादेखील पाणी देण्याची मागणी बैठकीत मान्य करण्यात आली.

तथापि, पिण्याचे व शेतीचे असे दोन्ही पाणी एकत्रित सोडण्यात येणार असून, कालव्याद्वारे शेतीला पाणी जाऊ द्यायचे किंवा गाव शिवारातील बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवायचे याबाबतचा निर्णय शेतकऱ्यांवर सोडण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘काम की बात’ कधी?

0
0

डॉ. भालचंद्र कांगो यांचा पंतप्रधानांना टोला; आयटकच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला प्रारंभ

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमात विविध योजनांची माहिती देतात. मात्र सरकारने लागू केलेल्या योजना तळागाळात अजून पोहोचलेल्या नाहीत. अंगणवाडी आणि आशा सेविकांना अद्याप वेळेत मानधन मिळत नाही. उद्योगधंद्यांची भरभराट आहे पण तरुणवर्ग बेरोजगार आहे, यावर पंतप्रधान मोदी कधी बोलणार? आश्वासक गप्पांची 'मन की बात' करण्यापेक्षा नोकरदारांच्या प्रश्नांवर तोडगा आणि नोकरीच्या संधी या संदर्भातील 'काम की बात' पंतप्रधान मोदी केव्हा घेणार, असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. भालचंद्र कांगो यांनी उपस्थित केला.

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) या कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे १८ वे राज्य अधिवेशन नाशिक-पुणे महामार्गावारील श्रीकृष्ण लॉन्स येथे होत आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी कांगो बोलत होते. यावेळी आयटक दिल्लीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहन शर्मा, 'एआयबीईए'चे राष्ट्रीय सहसचिव देवीदास तुळजापूरकर आणि आयटक महाराष्ट्रचे सरचिटणीस श्याम काळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आयटक नाशिक जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे आणि सत्रप्रमुख आयटक महाराष्ट्र राज्याध्यक्ष सुकुमार दामले स्वागताध्यक्ष होते.

डॉ. कांगो यांनी उपस्थित कामगारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पैशांच्या मागणीसाठी एल्गार करणारी संघटना म्हणून आयटककडे बघितले जाते. हा समज आपण सर्वांनी मिळून पुसला पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आयटकने कामगारांच्या विविध हक्कांसाठी काम केले आहे. सध्याच्या सरकारने कामगार संघटनांना कमकुवत केल्या आहेत. कंपन्यांच्या मालकांच्या विरोधात स्थानिक कामगार संघटना एल्गार करीत नसल्याचा हा परिणाम आहे. आयटकच्या माध्यमातून कामगार चळवळ अधिक सशक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. या अधिवेशनात रिक्त जागा, पेन्शन प्रश्न, शेतमजुरांना किमान वेतन यांसह शेतकरी आत्महत्या या विषयावर संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.

..

\Bराष्ट्रव्यापी संप काळाजी गरज\B

नवीन आर्थिक धोरण आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर कामगारांची संख्या कमी केली जात आहे. त्यामुळे कामगार संघटना खिळखिळी होऊ लागली आहे. पुढील काळात कामगारांची संख्या अधिक खालावत जाईल म्हणून राष्ट्रव्यापी संप करण्यात येणार आहे. कामगारांच्या हक्कासाठी हा संप काळाजी गरज आहे, असे सांगत ८ व ९ जानेवारी २०१९ रोजी पुकारण्यात येणाऱ्या राष्ट्रव्यापी संपात सहभागी होण्याचे आवाहन केले.

..

\Bजॉब लेस ते जॉब कट

\Bतंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्व काही शक्य होत असल्याचे सांगत कामगार कमी केले जात आहेत. जे कामगार आहेत त्यांना कमी पैशात अधिक कामाची जबाबदारी दिली जात आहे. हे वास्तव जॉब लेस ते जॉब कटपर्यंत येऊन पोहोचले आहे. भविष्यात ही परिस्थिती अधिक बिकट होईल, अशी चिंता डॉ. कांगो यांनी व्यक्त केली. \B

..

शेतकरी व कामगारांनी एकत्र यावे

\Bशेतकरी व कामगारांच्या समस्या सारख्या आहेत. दोघांच्या हक्कांवर घाला घालण्यात येत असून, शेतकरी व कामगारांनी एकत्र येत एल्गार करण्याची गरज असल्याचे मत कृषी अभ्यासक प्रा. अशोक सोनवणे यांनी मांडले. अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात 'शेतकरी-कामगारांच्या चळवळीची एकजूट काळाजी गरज' या विषयावर आयोजित चर्चासत्रात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्ष किसान सभेचे राज्य सरचिटणीस नामदेव गावडे हे होते.

\B...

कविवर्य सुर्वेंच्या आठवणींना उजाळा

\Bअधिवेशनात संध्याकाळी ८ वाजता कविवर्य नारायण सुर्वे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. कवी भीमराव कोते यांच्या संकल्पनेतून कविवर्य सुर्वे यांच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले. कोते यांना कार्यक्रमात मानसी देशमुख, रविकांत शार्दूल, आरती बोराडे यांची साथ लाभली.

...\B

आज रॅली अन् सभा

\Bआज (दि. २५) दुपारी १ वाजता द्वारका येथील खरबंदा पार्क ते अधिवेशनाच्या ठिकाणापर्यंत आयटकतर्फे रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी १.३० वाजता आयटक राष्ट्रीय महासचिव अमकजित कौर यांची जाहीर सभा होणार असून, या सत्राचे अध्यक्ष आयटक महाराष्ट्राचे राज्य सचिव राजू देसले असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढेंच्या योजनांना ‘ब्रेक’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्तपदावरून तुकाराम मुंढेंच्या बदलीमुळे त्यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांना आता 'ब्रेक' लागणार असून, करयोग्य मूल्यापाठोपाठ पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण यंत्रणांच्या देखभाल-दुरुस्ती व व्यवस्थापनाचे खासगीकरण करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रस्तावही बारगळण्याची चिन्हे आहेत.

महासभेने खासगीकरणाचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर मुंढेंनी सदरचा ठराव विखंडनासाठी पाठविला होता. सरकारनेही हा ठराव निलंबित केल्यानंतर सध्या अपिलाची मुदत सुरू आहे. परंतु, आता मुंढेंचीच बदली झाल्याने सत्ताधाऱ्यांकडून पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण यंत्रणेचे खासगीकरण हाणून पाडले जाणार आहे. मुंढेंची बदली होताच त्यांनी लोकप्रतिनिधींना डावलून घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला आहे. करवाढीप्रमाणेच मुंढेंनी पाणीपुरवठा व मलनिस्सारण यंत्रणांची देखभाल-दुरुस्ती आणि व्यवस्थापन खासगीकरणातून करण्याचा प्रस्ताव जुलै महिन्यात झालेल्या महासभेच्या मान्यतेस सादर केला होता. शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण व काही प्रमाणात दारणा नदीपात्रावरील चेहेडी बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणावरील, तसेच बंधाऱ्यांतील पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून दररोज सुमारे ४३० दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जातो. हे कच्चे पाणी थेट जलवाहिन्यांद्वारे सहा जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये आणून त्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. त्यानंतर विविध ठिकाणी असलेल्या १०५ जलकुंभांच्या माध्यमातून ते सुमारे अठराशे किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांद्वारे नागरिकांच्या घरोघरी पोहोचविले जाते. या पाणीपुरवठा यंत्रणेतील कच्च्या पाण्याची मुख्य वाहिका सोडून अन्य कच्चे पाणी वाहिनी, जलशुद्धीकरण केंद्र, शुद्ध पाणी पंपिंग स्टेशन, बूस्टर पंपिंग स्टेशन, तसेच प्युअर वॉटर मेन्स, उंच व भूस्तर जलकुंभ, सर्व मुख्य वितरण वाहिन्यांसह सर्व वितरण व्यवस्था, तसेच पाणीबिलासाठी मीटर रीडिंग घेण्यापासून बिल वितरणापर्यंतची कामे खासगी ठेकेदाराकडे सोपविण्याचा हा प्रस्ताव ठेवला होता. पाणीपुरवठ्याबरोबरच मलनिस्सारण यंत्रणेचेही खासगीकरण प्रस्तावित करण्यात आले होते.

--

प्रस्तावास सर्वपक्षीय विरोध

मलनिस्सारण यंत्रणेच्या व्यवस्थापनाचे काम यापूर्वी विभाग वा प्रभागनिहाय निविदा प्रक्रिया राबवून होत होते. या खासगीकरणासाठी वित्त विभागाच्या दि. २७ सप्टेंबर २०१० व १ फेब्रुवारी २०१३ रोजीच्या निर्णयानुसार पदनिर्मिती न करता, बाह्य यंत्रणेद्वारे संबंधित कामे करण्याबाबत तरतूद करून सांडपाणी वितरणाशी संबंधित कामे खासगीकरणातून करून घेण्याचा प्रस्ताव मुंढे यांनी महासभेच्या मान्यतेस सादर केला होता. मात्र, या प्रस्तावाला महासभेत सर्वपक्षीय विरोध होऊन प्रशासनाचा खासगीकरणाचा प्रस्ताव फेटाळला गेला होता.

--

ही आहेत विरोधाची कारणे

पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण यंत्रणांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दर वर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समिती आणि महासभेवर सादर केले जातात. त्यामुळे लोकप्रतिनिधींसाठी हे प्रस्ताव फायदेशीर ठरतात. या दोन्ही यंत्रणांचे खासगीकरण झाले असते, तर आर्थिक बाबींचे प्रस्ताव स्थायीवर येण्यास प्रतिबंध लागला असता. सदरच्या खर्चाचे प्रस्ताव स्थायी व महासभेवर येणे बंद झाले असते. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा या दोन्ही यंत्रणांच्या देखभाल व दुरुस्तीच्या खासगीकरणाला विरोध होता.

--

सरकारच्या प्रतिसादाकडे लक्ष

महासभेचा प्रस्ताव फेटाळल्याचा ठराव प्रशासनाला प्राप्त होताच प्रशासनाने हा ठराव विखंडनासाठी सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठविला होता. सरकारनेही या ठरावाच्या विखंडनाची कार्यवाही सुरू करीत प्रथम तो निलंबित केला होता. त्यानुसार प्रशासनाने या प्रस्तावासाठी अपिल सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली असून, हा प्रस्ताव सध्या निलंबित अवस्थेत आहे. सत्ताधाऱ्यांनी या प्रस्तावावर अपिल केले नसले, तरी आता या प्रस्तावाचे कर्तेधर्ते मुंढेंचीच बदली झाली आहे. त्यामुळे अपिल दाखल करण्याऐवजी हा प्रस्तावच हाणून पाडण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण यंत्रणेचे खासगीकरणही आता बारगळल्यातच जमा असून, पुन्हा ही कामे महापालिकेच्या यंत्रणांकडूनच केली जावीत, असा हट्ट सत्ताधाऱ्यांकडून धरला जाणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या या प्रयत्नांबाबत राज्य सरकार कसा प्रतिसाद देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेकडून गोदावरीची महाआरती

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

अयोध्येत राम मंदिर लवकरात लवकर बांधण्यात यावे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी शरयू नदीची महाआरती करून प्रभू श्री रामाचे दर्शन घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा शिवसेना, महिला आघाडी, युवासेना आणि विद्यार्थी सेनेतर्फे शनिवारी रामकुंड येथे श्री गोदावरी नदीची महाआरती करण्यात आली.

उद्धव ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर गेले असून, त्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिक शिवसेनेच्या वतीने या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. येथे जमलेल्या शिवसैनिकांनी 'पहले राम मंदिर फिर सरकार', 'प्रभू रामचंद्र की जय', 'शिवसेना जिंदाबाद' अशा घोषणा दिल्या. यावेळी शिवसैनिकांनी 'श्रीराम' आणि 'शिवसेना' लिहिलेल्या गांधी टोप्या परिधान केल्या होत्या. अनेकांनी 'चलो अयोध्या'चे टी शर्ट परिधान केले होते. महिला पदाधिकाऱ्यांनी भगव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. हातात झेंडे आणि गळ्यात स्कार्फ परिधान केला होता. रामकुंडावर शेकडो दिवे लावण्यात आले होते. सायंकाळी साडेसहा वाजता श्री गोदावरी नदीची विधिवत पूजा करून महाआरती करण्यात आली. या महाआरतीत मुंबई येथून महिला आघाडी संपर्कप्रमुख रंजना शेवाळकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगला भास्कर, शहराध्यक्षा अॅड. श्यामला दीक्षित, माजी जिल्हाप्रमुख विनायक पांडे, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश बेलदार, बाळासाहेब कोकणे, नगरसेविका पूनम मोगरे, शशिकांत कोठुळे, योगिता आहेर, शोभा गटकळ, मंदा दातीर आदींनी सहभाग नोंदवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरड्या विहिरीतपडून बिबट्याचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

अन्न-पाण्याच्या शोधार्थ भटकंती करीत आलेल्या बिबट्याचा कोरड्या विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना येथून जवळच असलेल्या रामनगर येथे शनिवारी (दि. २४) सकाळी उघडकीस आली.

रामनगर येथे गावालगत खंडोबा महाराज मंदिराजवळ बाजीराव मनाजी मंडले यांची शेतजमीन आहे. मंडले यांची चार परस खोल विहीर खोदली आहे. दुष्काळामुळे या विहिरीत थेंबभरही पाणी नसल्याने विहीर कोरडी आहे. रामनगर परिसरात डोंगर तसेच झाडेझुडपे असल्याने या परिसरात नेहमीच बिबट्यांचा वावर असतो. डोंगर परिसरात दुष्काळामुळे अन्नपाण्याची वाणवा भासू लागल्याने बिबटे मानवी वस्त्यांवर धाव घेत आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वीच विंचूरीदळवी येथे शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला होता. तसेच ठाणगाव, पांढुर्ली, बेलू, रामनगर, मेंढी, वडांगळी, नांदूरशिंगोटे, चास खोरे आदी गावांच्या परिसरातही बिबट्यांचा वावर वाढला आहे. रामनगर येथील मंडले यांच्या कठडे नसलेल्या विहिरीत हा बिबट्या पडला. विहीर पूर्ण कोरडी असल्याने बिबट्याचा मार लागून मृत्यू झाला. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मंडले यांचा मुलगा शेतावर गेला असता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत वनविभागाला यासंदर्भात कळविण्यात आल्यानंतर वनक्षेत्रपाल प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी रामनगर येथे पोहचले. ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आल्यानंतर जागेवरच शवविच्छेदन करुन मृतदेह वनविभागाच्या मोहदरी वनउद्यानात पुरण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साकुरी येथेशेतकरी आत्महत्या

0
0

साकुरी येथे

शेतकरी आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

साकुरी (नि.) येथील रवींद्र शिवाजी धोंडगे (वय ३०) या शेतकऱ्याने शनिवारी, १७ नोव्हेंबर रोजी विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. २३) त्याचा मृत्यू झाला. रवींद्रचे वडील शिवाजी धोंडगे यांच्यावर देना बँकेचे सात लाख रुपयांचे कर्ज आहे. याशिवाय खासगी कर्जदेखील आहे. या वर्षी दुष्काळामुळे उत्पन्न आले नाही. त्यामुळे रवींद्र काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अहवाल तहसील कार्यालयाने पाठविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images