म. टा. प्रतिनिधी, नाशिक 'मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून कामगारांचे शोषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. नोकऱ्या कमी होत नसून, नोकऱ्यांची दरवाजे बंद होऊ लागली आहेत. सर्व उच्च शिक्षितांना नोकऱ्या देऊ म्हणणाऱ्या मोदी सरकारने फक्त मोठ्या उद्योगपतीच्या तिजोरीत वाढ केली आहे. या मुद्यांवर सरकारला कामगारांनी प्रश्न विचारल्यास त्यांची मोठ्या प्रमाणावर गळचेपी केली जात आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना अटक केली जात आहे. लोकशाहीत असलेला अभिव्यक्तिचा अधिकार मोदी सरकार हिरावून घेत आहे. मोदी सरकार, तुमच्या चुकीच्या धोरणांबाबत प्रश्न विचारल्यास त्या व्यक्तिला तुम्हा शत्रू का समजता?,' असा प्रश्न आयटक राष्ट्रीय महासचिव अमरजित कौर यांनी मोदी सरकारला केला. आयटकच्या राज्यस्तरीय अधिवेशनातील संविधान जागर सभेत त्या बोलत होत्या. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस 'आयटक'चे १८ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे नाशिक-पुणे महामार्गावारील श्रीकृष्ण लॉन्स येथे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. भालचंद्र कांगो यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. या अधिवेशनात कामगारांच्या रिक्त जागा, पेन्शन प्रश्न, शेतमजूरांना किमान वेतन यांसह शेतकरी आत्महत्या या विषयावर संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविधांगी चर्चा करण्यात आली. अधिवेशनात रविवारी दुपारी ३ वाजता आयटक राष्ट्रीय महासचिव अमरजित कौर (दिल्ली) यांनी संविधान जागर सभा घेतली. या सभेत अमरजित कौर यांनी मोदी सरकारावर टीका केली. कौर म्हणाल्या, 'केंद्र व राज्यात असलेल्या सरकारने कामगारांच्या हल्ला चढवला आहे. पे कमिशनमध्ये बदल केल्याने कामगारांचे अधिक शोषण होत आहे. ट्रेड युनियनवरही सरकार हल्ले करत आहे. आंदोलनापूर्वीच अटक करण्यात येत आहे. आंदोलन डावलण्याचा प्रयत्न करत कामगारांचे खच्चीकरण होत आहे. देशात मल्टिनॅशनल कंपन्यांची संख्या वाढत असून, कर्मचाऱ्यांची मात्र कमी होत आहे. हे सर्व कर्मचाऱ्यांवर हल्ले होणाऱ्या घटना आहेत. पुढच्या निवडणुकीत मोदी सरकारला कामगारांची ताकद दाखवून देण्याची गरज असल्याचे मत अमरजित कौर यांनी मांडले. \Bआम्ही देशभक्त आहोतच\B 'आयटकचे योगदान स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत आयटकच्या माध्यमातून कामगारांचा एल्गार आणि स्वातंत्र्य योगदानात कामगारांची संख्या सर्वाधिक होती. त्यामुळे कम्युनिस्ट देशभक्त नाहीत, असा दावा भाजपा किंवा आरएसएसने करु नये. आम्ही देशभक्त आहोतच, पण देशभक्तीच्या नावाखाली संविधानात दिलेले अधिकार वापरू न देण्याची तुमची वृत्ती गैर आहे', असे म्हणत अमरजित कौर यांनी मोदी सरकार व आरएसएसवर टीका केली. \B कितीही गुन्हे दाखल करा, आम्ही लढणारच... \B'किमान वेतनासाठी लढणाऱ्या आयटकच्या आंदोलनाकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जातात. अच्छे दिन येणार म्हणून अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी केली जाते. हक्कासाठी भांडणाऱ्यांवर कारवाई करत कायद्यात अडकवले जाते. पण भांडवलदारांवर कोणतीही कार्यवाही फडणवीस सरकार करत नाही. येत्या २०२० मध्ये आयटकला शंभर वर्षे पूर्ण होत असून, त्या पार्श्वभूमीवर कामगारांची संघटना अधिक मजबूत होणार आहे. नाशिकमध्ये ५० हजार कामगारांची एकजूट करायची असून, कामगारांच्या एल्गारासाठी आयटक झटणार आहे. मग कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही लढणारच...', असे मत अधिवेशनाच्या समारोप सत्राचे अध्यक्ष राजू देसले मांडले. \B लाल सलाम... \Bअधिवेशनात सहभागी झालेल्या हजारो कामगारांची रॅली द्वारका येथील खरबंदा पार्क ते अधिवेशनाच्या ठिकाणापर्यंत काढण्यात आली. दुपारी १.३० वाजता निघालेल्या या रॅलीतून 'लाल सलाम, लाल बावट्याचा विजय असो', अशा घोषणा देत कामगार-शेतकऱ्यांच्या एकजुटीचा एल्गार दाखविण्यात आला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट