Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

डिसेंबरमध्ये पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरातील दिव्यांग खेळाडूंना चालना मिळावी यासाठी नाशिक महापालिकेने राज्य पॅरा ऑलिम्पिक संघटनेच्या सहकार्याने ५ व ६ डिसेंबर रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, जास्तीत जास्त शाळांनी या क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हावे यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. या स्पर्धेत शहरातील ३५० शाळा सहभागी होणार आहेत. त्यात १४ विशेष शाळांचा समावेश आहे. आतापर्यंत ९५२ खेळाडूंनी या स्पर्धेत नाव नोंदणी केली आहे. स्पर्धेसाठी ११ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. धावणे, गोळाफेक, भालाफेक, बुद्धिबळ, उंच उडी, पोहणे अशा १४ क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहा शाळा सुपर सिक्समध्ये

$
0
0

न्यू इरा, सेंट लॉरेन्स, किलबिल, होरायझन, सेंट फ्रान्सिस, अशोका युनिव्हर्स यांचे यश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रासबिहारी क्रिकेट करंडक २०१८-१९च्या चौथ्या दिवशी न्यू इरा इंग्लिश स्कूल, सेंट लॉरेन्स, किलबिल, होरायझन अॅकॅडमी, सेंट फ्रान्सिस आणि अशोका युनिव्हर्स, वडाळा या शाळांची सुपर सिक्स संघात गुणवत्तेनुसार निवड झाली. गोल्फ क्लब मैदान येथे हे सामने रंगले. सकाळ सत्रात अशोका यूनिव्हर्सल वडाळा आणि नवजीवन डे स्कूल या संघामध्ये सामना झाला. यात नवजीवन डे स्कूल संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशोका यूनिव्हर्सल वडाळा संघाचा १८५ धावांनी दणदणीत विजय झाला. मानव अल्थाक्कर यास या सामनावीर घोषित करण्यात आले.

सेंट लॉरेन्स हायस्कूल आणि न्यू इरा स्कूल यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात न्यू इराचा विजय झाला. न्यू इराच्या रमन गुप्ता यास सामनावीर तसेच सामन्याचा उत्तम फलंदाज म्हणून घोषित करण्यात आले. दुपार सत्रात अशोका यूनिव्हर्सल वडाळा आणि के के वाघ यांच्यात झालेल्या लढतीत वडाळा संघाने १८४ धावांनी विजय मिळविला. किलबिल स्कूल आणि होरायझन अकॅडमी यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात होरायझन अकॅडमीचा पराभव झाला

सुपर सिक्समधील आजचे सामने (३० नोव्हेंबर)

सेंट फ्रान्सिस आणि होरायझन अकॅडमी

अशोका यूनिव्हर्सल वडाळा आणि न्यू एरा इंग्लिश स्कूल

किलबिल स्कूल आणि सेंट फ़्रांसीस

अशोका यूनिव्हर्सल वडाळा आणि सेंट लॉरेन्स

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बापाची आत्महत्या, आई परागंदा आणि नऊ चिमुकली निराधार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नऊ मुलांची जबाबदारी असलेल्या कर्त्याधर्त्या पुरुषाने क्षुल्लक वादातून आत्महत्या केली. कालांतराने पत्नीनेही घर सोडले आणि एका रात्रीत नऊ चिमुकली मुले निराधार झाली. जवळ ना कोणी नातलग, ना कोणी या मुलांची जबाबदारी घेणारे! नाही म्हणायला मुंबईत एक आजी. तीही ७२ वर्षांची. म्हणजे तोही मिणमिणता सहाराच. या केविलवाण्या चिमुकल्यांना 'उद्या' माहिती नाही. मात्र, त्यांचा 'आज' पोरका करून गेला. अखेर पंचवटी पोलिसांनी पुढाकार घेत या निरागस भावंडांची वयानुरूप तीन बालगृहांत विभागणी केली आणि एका अर्थाने ती एकमेकांपासून कायमची तुटली... ही हृदय पिळ‌वटून टाकणारी कहाणी आहे हातावर पोट असणाऱ्या नाशिकमधील जडेजा कुटुंबाची.

मजल-दरमजल मोलमजुरी करणारं जडेजा कुटुंबात कमावणारा एक आणि खाणारी तोंडे दहा! हे कुटुंब पंचवटीच्या क्रांतीनगरातील झोपडपट्टीत स्थिरावलं. या कुटुंबाचा कर्ताधर्ता देवीदास दयाराम जडेजा (वय ३३) पत्नीसोबत नऊ मुलांचा संसारगाडा हाकत होता. मात्र, किरकोळ वादातून देवीदासने १७ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली आणि कुटुंबावर कुऱ्हाडच कोसळली. सर्व मुले १४ वर्षांच्या आतील. सर्वांत मोठी मुलगी १४ वर्षांची, तर सर्वांत लहान मुलगा अवघ्या नऊ महिन्यांचा. या चिमुकल्यांना सावरण्याची जबाबदारी देवीदासच्या पत्नीवर होती. मात्र, तीही घर सोडून परागंदा झाली आणि नऊ मुले रस्त्यावर आली. या कुटुंबाला जवळचे असे कोणी नाही. मुंबईतील ७२ वर्षांच्या शांताबाई रमेश चव्हाण यांचा थोडाफार सहारा. मात्र, त्यांनाही नऊ मुले सांभाळणे आवाक्याबाहेर. अखेर पंचवटी पोलिसांनी पुढाकार घेतला आणि या मुलांची रवानगी बालगृहांत झाली.

अपरिहार्य ताटातूट

आईबाबाविना निराधार झालेल्या या नऊ चिमुकल्यांमध्ये सात मुली आणि दोन बालकांचा समावेश आहे. सात मुलींचे वय अनुक्रमे १४, १२, ११, ९, ७, ६, ४ वर्षे, मुलगा दोन वर्षांचा, तर सर्वांत लहान मुलगा अवघ्या नऊ महिन्यांचा आहे. सर्वच मुले अजाणते. अखेर या मुलांच्या भविष्याचा विचार करून वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी पुढाकार घेतला. झोपडपट्टी भागात आई-बापाविना ही मुले राहिली, तर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल, याची जाणीव कड यांना होती. त्यामुळे त्यांनी मुलांच्या आजीच्या संमतीने सर्व मुलांना बालगृहात पाठवण्याबाबत काय करता येईल, याविषयी चाचपणी केली. पोलिस स्टेशनने तसा अर्जही महिला व बालकल्याण विभागाच्या बालकल्याण समितीला सादर केला. समितीसमोर या प्रकरणाची आज, गुरुवारी सुनावणी झाली. त्यात मुलांच्या वयानुसार तीन गटांत विभागणी करून बालगृहांत दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन मुली उंटवाडीतील बालगृहात, तीन मुली त्र्यंबकेश्वर येथील बालगृहात, तर चार मुलांची रवानगी आधाराश्रमात झाली आहे. आईवडिलांच्या अविचाराने झालेली या भावंडांची ही अपरिहार्य ताटातूट हेलावणारी आहे. मात्र, या अनोळखी विश्वात त्यांना किमान आधार मिळाला हीच काय ती दिलासा देणारी बाब आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पारध’द्वारे अनिष्ट प्रथांच्या घुसमटीचे दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्याची सत्तरी उलटली तरीही समाजातील काही घटक अद्याप अनिष्ट चालीरिती, रुढी अन् परंपरांशी दोन हात करत आहेत. हे चित्र बदलू पाहणाऱ्या क्रांतिकारी विचारांच्या माणसाच्या वाट्यालाही येणारा संघर्ष कसा अटळ असतो अन् त्यातून त्याची कशी घुसमट होते याचे वास्तव दर्शन 'पारध' या दोन अंकी नाटकाद्वारे झाले. कालिदास सभागृहात आयोजित आंतर विद्युतनिर्मिती केंद्राच्या नाट्य स्पर्धेत हे सादरीकरण करण्यात आले.

स्वातंत्र्यानंतरही आजवर समाजातील जेवढे घटक हक्क, न्याय अन् विकासापासून वंचित राहीले त्यातील एक जमात म्हणजे पारधी. या समाजातील रुढ चालीरिती, परंपरा अन् अंधश्रद्धांमुळे या पल्याड जाऊन माणूस म्हणून जगू इच्छिणाऱ्या माणसाच्या वाट्याला कसा संघर्ष येतो याचे कथानक या नाटकात रंगविण्यात आले आहे. अशा अनिष्ट चालीरितींच्या विरोधात बंड पुकारून समाजाची सकारात्मक ओळख सांगू पाहणाऱ्या झुरक्या या सुधारणावादी नायकाच्या पायातच रुढ प्रथा बेडीसारख्या पडतात आणि प्रचलित व्यवस्थेविरोधात चालू पाहणारी पावले कशी जड पाडली जातात, असा आशय पारधद्वारे व्यक्त होतो. अखेरीला ज्या यंत्रणेने या माणसांना त्यांचा हक्क प्राप्त करून द्यावा, ज्यांच्यातील माणूसपणाचे रक्षण करावे ती यंत्रणाच अखेरीला या समाजघटकांचे शोषण करताना कशी मागेपुढे बघत नाही असे दाहकही दर्शकाला अंर्तमुख करणारे आहे.

नाटकाचे लेखन अरविंद लिमये यांनी तर दिग्दर्शन मोहन जोशी यांनी केले आहे. नाटकासाठी सहभाग असलेल्या भूमिका अशा : निर्माता - रवींद्र गोहणे, सहनिर्माता - मनोहर मसराम, संघ व्यवस्थापक - संदीप पळसपगार,दिग्दर्शक - मोहन जोशी, नेपथ्य - प्रशांत इंगळे, नागसेन वानखेडे, संगीत- डॉ. राजेश तायडे, सतीश शेळके, प्रकाश योजना - सुहास वारद, अनिल कोमटवार, रंगभूषा व वेषभूषा- आदिती धाराशिवकर, मीनाक्षी जोशी तर अभिनेते म्हणून सुरज खोके, प्रणाली गोळे, संतोष चर्तुभूज, योगिता वाघ, कैलास खेडकर, नीलिमा ठोंबरे, मंगेश निचत, अनिता गायकवाड, पवन सोनुने, मयूर चौधरी

लोगो : आंतरविद्युत नाट्य स्पर्धा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्ध्वस्त व्यसनी जीवनावर भाष्य

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

\Bव्यसनाधिनतेमुळे चांगल्या जीवनालाही कसा सुरूंग लागतो अन् संशयाच्या भोवरा व्यसनी माणसापेक्षाही वरकडी कशी करतो या आशयावर आधारलेल्या 'गेट वेल सून' नाटकाने व्यसनाधिनतेच्या नात्यांवर पडणाऱ्या दुष्परिणामांवर जागृती केली. कालिदास कलामंदिरात आंतरविद्युत निर्मिती केंद्राद्वारे आयोजित नाट्य स्पर्धेत गुरुवारी दुपारी हे दोन अंकी नाटक सादर झाले.

महाऔष्णिक वीज केंद्र,चंद्रपूर यांनी हे नाटक सादर केले. या नाटकाचा नायक व्यसनाच्या आहारी गेला असून नायिका त्याला व्यसनापासून परावृत्त करू पाहते. दुसरीकडे आपल्यावर उपचार करणाऱ्या महिला डॉक्टरलाच चुकीची माहिती देऊन व्यसनाधीन नायक डॉक्टरच्या कुटुंबात संशयाचे धुके निर्माण करतो अन् कुटूंबातील नाती संपुष्टात आणतो, असे वळण कथानक घेते. या नाटकात सहभागींच्या जबाबदाऱ्या अशा भूमिका : शशांक गाढवे, दिलीप मार्कंड, बद्रीनारायण कायंदे, मंजिरी कीर्तने, सायली देठे, साधना चव्हाण, अरविंद घोटकर. दिग्दर्शन - स्नेहल पाटील, प्रकाश योजना - यशवंत चव्हाण, नेपथ्य - दिगंबर इंगळे, नेपथ्य सहाय्य - सुरेश माळी, पुरुषोत्तम मसराम, संगीत - संकेत देवरे, संघ व्यवस्थापक - जयंत देठे, रंगभूषा व वेषभूषा - सुनंदा माळी, दीपाली इंगळे, त्रिवेणी कायंदे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बिघडलेली नाती’मधून वर्तमान मांडण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आंतरजातीय विवाहामधून एकाच कुटुंबात निर्माण झालेली दुफळी अन् कौटुंबिक परिघातील प्रत्येकाची होणारी घालमेल राज्यनाट्य स्पर्धेतील 'बिघडलेली नाती' या नाटकातून सादर करण्यात आली.

विलास कातौरे लिखित आणि भगवान देवकर दिग्दर्शित या नाटकात बदलत्या युगाचा सांधा टिपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पारंपरिक रुढींना चिकटून बसणारे रुढीवादी कुटुंबीय अन् बदलत्या काळासोबत स्वत:ला प्रवाहित ठेवणारा तरुण लग्नासारख्या वळणावर जेव्हा प्रवाहाविरोधात निर्णय घेतो त्यावेळी नात्यांमध्ये निर्माण होणाऱ्या तणावावर या नाटकातून भाष्य करण्यात आले आहे. अर्जून नवघरे, पार्थ देवकर, बाळ शेलार, मिलिंद चिखलीकर आदींनी यात भूमिका केल्या आहेत.

लोगो : राज्य नाट्य स्पर्धा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रपती सेनेतर्फे स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधानसभेत गुरुवारी एकमताने मंजूर झालेल्या मराठा आरक्षण विधेयकाचे स्वागत छत्रपती सेनेतर्फे ११ किलो पेढ्यांचे वाटप करून करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती सेनेच्या मुस्लिम आघाडी व छत्रपती सेना ओबीसी सेलतर्फे अस्लम लालू, मुश्ताक लालू, मुज्जू शेख, युनूस शेख, निहाल सय्यद आदींनी आनंद उत्सव साजरा केला. याप्रसंगी छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, मार्गदर्शक नीलेश शेलार, कोर टीम अध्यक्ष तुषार गवळी, सदस्य संदीप निगळ, सागर पवार, मनीष बोरस्ते, राजेश पवार अश्विन पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरार कैद्यास बेड्या

$
0
0

फरार कैद्यास बेड्या

नाशिक : जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना संचित रजा घेऊन कारागृहार पडलेल्या व तब्बल साडेतीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कैद्यास ग्रामीण पोलिसांनी औरंगाबाद शहरातून अटक केली. अमोल एकनाथ गंगावणे (२८ रा. मुसळगाव, ता.सिन्नर) असे या बंदिवानाचे नाव आहे. फरार झाल्यानंतर त्याने एका कंपनीत नोकरी सुरू केली होती. स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल तीन दिवस पाळत ठेवून त्यास अटक केली.

--

तीन नगरसेवक अपात्र

नाशिक : गटनेत्यांनी व्हीप बजावूनही पक्षादेशाचा भंग करणाऱ्या सुरगाणा नगरपालिकेतील भाजपच्या तीन नगरसेवकांना आपले पद गमवावे लागले आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी याबाबतच्या प्रस्तावावर बुधवारी स्वाक्षरी केली. त्यामुळे नगरसेवक सुरेश गवळी, योगिता पवार आणि रेश्मा चौधरी हे अपात्र ठरले आहेत.

--

लाखभर रुग्णांची तपासणी (फोटो)

नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरी येथे रविवारी (दि. २) होणाऱ्या अटल ग्रामीण आरोग्य शिबिरासाठी आतपर्यंत एक लाखापेक्षा अधिक रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून, ३६ हजार रुग्णांना शिबिरासाठी संदर्भित करण्यात आले आहे. गरजू रुग्णांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता कोर्टातही लढा द्यावा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यमान सरकारने किमान विधेयकापर्यंत पोहचण्याचे धैर्य दाखविले ही बाबही कमी नसून यापुढच्या महत्त्वाच्या न्यायालयीन टप्प्यात मात्र आणखी ताकदीने सरकारने लढा द्यायला हवा. कोर्टातही विधेयकाच्या या मांडणीस मंजुरी मिळाली तर सरकारची पारदर्शकता दिसून येईल, अशा आशयाच्या प्रतिक्रिया विविध नेत्यांनी व्यक्त केल्या. मराठा समाजास नोकरी व शिक्षणात १६ टक्के आरक्षण देण्याबाबत विधानसभेत विधेयक एकमताने मंजूर करण्यात आल्यानंतर मराठा समाजबांधवांनी या विधेयकाचे स्वागत केले आहे.

उशिराने सुचलेले शहाणपण

मराठा आरक्षण विधेयकास मिळालेली मंजूरी म्हणजे सरकारला उशिराने सुचलेले शहाणपण आहे. आता हे आरक्षण कोर्टात टिकावे यासाठी सरकारने काळजी घ्यायला हवी. अंतिम टप्प्यांमध्ये हा निर्णय यशस्वी ठरल्यास समाजातील गरजू लाभार्थ्यांना फायदा होऊन ते विकासाच्या प्रवाहात येतील.

- शैलेश कुटे, काँग्रेस नेते

सरकारने दाखवावी पारदर्शकता

मराठा आरक्षण विधेयकाचे स्वागतच आहे. पण हा उशिराने झालेला निर्णय आहे. अद्यापही वरिष्ठ सभागृह आणि कोर्टासमोर विधेयक जायचे आहे. तेथेही ते टिकाव धरायला पाहिजे. त्यावरच सरकारची पारदर्शी पारदर्शकता अवलंबून आहे. या निमित्ताने ही बाबही निदर्शनास येईल. \B

- अजय बोरस्ते , शिवसेना गटनेते

खऱ्या गरजूंना लाभ मिळावा

विधेयकाचे स्वागत आहे. पुढील कसोट्यांवरही हे विधेयक टिकायला हवे, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू ठेवावेत. मराठा समाजात अद्यापही मोठा गट हा आर्थिक मागास वर्गात मोडत असल्याने बिकट परिस्थितीला सामोरा जातो. या निर्णयाने किमान त्यांना दिलासा मिळेल. पण भविष्यात या आरक्षणाचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी सरकारने अखंड प्रयत्न करावेत. जेणेकरून समाजाचा विकास साधला जाईल. \B

- निलीमा पवार, सरचिटणीस, मविप्र

अन्य मागण्याही पूर्ण करा

आजवर कुठल्याही सरकारने जे धारिष्ट्य दाखविले नाही ते फडणवीस सरकारने दाखविले. त्याबद्दल त्यांचे, आयोगाचे आणि समितीचे अभिनंदन. पण कोर्टातही हेच आरक्षण कायम झाल्यास खरा आनंद होईल. पण अद्याप इतर मागण्याही मागे पडल्या आहेत. त्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. कोपर्डी प्रकरणातील नराधमांना निवडणुकीपूर्वी फाशी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुविधांनी सज्ज व मध्यवर्ती परिसरात मराठा वसतिगृहांची स्थापना आणि मराठा आंदोलनातील युवकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी या मुद्दयांकडे सरकारने आता लक्ष पुरवावे. \B

- दिनकर पाटील, सभागृह नेते, भाजप

सरकारने लांबविला निर्णय

मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचेच होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने यापूर्वीच मराठा समाजाला आरक्षण दिले होते. परंतु, सध्या सत्तारूढ असलेल्या सरकारने न्यायालयात योग्य तो लढा न दिल्याने आरक्षण लांबणीवर पडले होते. राष्ट्रवादीने सातत्याने मराठा समाजाला आरक्षण द्यावी अशी मागणी विधिमंडळात व विधिमंडळाच्या बाहेर केली होती. मराठा समाजाने खऱ्या अर्थाने लढून आरक्षण मिळविले आहे. मराठा आरक्षणाच्या लढाईत शहीद झालेल्या ४० तरुणांना भावपूर्ण श्रद्धांजली.

- अॅड. रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

विकासात स्थान मिळेल

विधेयकाचे स्वागतच आहे. पुढील टप्प्यांमध्ये मांडणीसाठी सरकारने सकारात्मकतेने लढा द्यावा. आरक्षणासाठीच्या लढ्यात मराठा समाजातील जे युवक शहीद झाले त्यांचेही योगदान विसरता येणार नाही. समाजातील गरजवंतांना या आरक्षणाचा लाभ होऊन त्यांनाही विकास प्रक्रियेत स्थान मिळेल.

- राजाभाऊ वाजे, आमदार, शिवसेना

प्रगतीची कवाडे खुली

मराठा समाजाला जे १६ टक्के आरक्षण विधानसभेत मंजूर झाले त्याचे मन:पूर्वक स्वागत करतो. मराठा क्रांती मोर्चा ,सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. नोकरी व शिक्षण यांच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेपणा असल्यामुळे मागे पडलेला मराठा समाज या निर्णयामुळे भविष्यात प्रगती करेल, असा मला विश्वास वाटतो.

- सचिन पिंगळे संचालक, मविप्र समाज

शब्दाला जागले सरकार

शब्दाला जागून सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली. त्याबाबतचे विधेयक दोन्ही सभागृहात चर्चेविना एकमताने मंजूर केले. सर्व समाजाचे हीत जोपासणारे आणि सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार असल्याचे या घोषणेने सिद्ध झाले आहे. न्यायालयातही हे आरक्षण निश्चितच टिकेल.

- उद्धव निमसे, भाजप नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणाचा जिल्ह्यात जल्लोष

$
0
0

भाजप-शिवसेनेकडून आतषबाजी; क्रांती मोर्चाकडून कोर्टात टिकल्यास आनंद होणार असल्याची भूमिका

टीम मटा

बहुचर्चित मराठा समाज आरक्षणाच्या विधेयकाला गुरुवारी (दि. २९) मंजुरी मिळाल्यानंतर जळगाव शहरासह जिल्ह्यात चाळीसगाव, अमळनेरला क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह राजकीय पक्षांकडून स्वागत करण्यात आले.

जळगाव : शहरात भाजप व शिवसेनेने गुरुवारी आतषबाजी करीत ढोलताशे वाजवून शासनाच्या या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले. मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील याबाबत समाधान व्यक्त केले. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आरक्षण कोर्टात टिकवा मग आनंद साजरा करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याचा परिणाम म्हणून गुरुवारी मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले. विधेयक मंजूर झाल्याची माहिती मिळताच शहरात भाजप, शिवसेना व मराठा समाजबांधवांकडून जल्लोष करण्यात आला.

भाजप कार्यालयासमोर आतषबाजी
विधेयक मंजुरीचे वृत्त येताच जळगाव जिल्हा भाजप कार्यालय वसंतस्मृतीसमोर भाजप पदाधिकारी व कायकर्त्यांनी आतषबाजी केली. या वेळी महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे, गटनेते भगत बालाणी, धीरज सोनवणे, दीपक सूर्यवंशी, सुनील माळी, सुनील खडके, चेतन सनकत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनेकडून स्वागत
शिवसेना जळगाव महानगरतर्फे फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शिवसेना नेहमी अग्रेसर होती दोन दिवसांपूर्वी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंब्यासाठी विनंती केली होती. त्यावेळी ठाकरे यांनी लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावे असे सांगीतले होते. त्या अनुषंगाने विधानसभेत एकमताने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर करण्यात आल्याची प्रतिक्रिया शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या वेळी बोलताना दिली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, युवा सेना विस्तारक किशोर भोसले, महानगर संघटक दिनेश जगताप, जि. प. सदस्य प्रताप पाटील, रवी देशमुख, माजी महापौर विष्णू भंगाळे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, अमर जैन, प्रशांत नाईक, अजय पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मराठा समाजबांधवांकडून जल्लोष
जळगांव येथिल मराठा समाजाच्या बांधवांनी महाराष्ट्राचे आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ फटाके फोडून आरक्षणाबाबत जल्लोष साजरा केला. मराठा समाजाच्या युवकांच्या आहुती व समाजाची एकजुट याचे फलित म्हणजेच सरकारने विधीमंडळात मांडलेले विधेयक होय. विधीमंडळात १६ टक्के मराठा समाजातील युवक-युवतींना नोकरी व शैक्षणिक आरक्षण देण्याचे जाहीर केलेले आहे. त्याचा खरा हा आनंदोत्सव मराठा समाजातील बांधवांनी साजरा केला. या आनंदोत्सवात प्रा. डी. डी. बच्छाव, प्रा. गोपाल दर्जी, चेतन पाटील, मधुकर पाटील, जयश्रीताई पाटील, प्रमोद पाटील, अॅड. कल्याण पाटील, अॅड. सचिन चव्हाण, अॅड. सुरेश महाजन, अॅड. यज्ञेश पाटील, अॅड. योगेश गावंडे, अॅड. अजय पाटील आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

चाळीसगावात भाजपतर्फे जल्लोष

चाळीसगाव : कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायदेशीररित्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारचे आभार मानण्यासाठी भाजपच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, तहसील कचेरी व पंचायत समिती कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पंचायत समिती कार्यालय येथे माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसे, सरचिटणीस प्रा. सुनील निकम, रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार, समाधान पाटील यांनी आपल्या मनोगातून मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले. या वेळी शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, जि. प. सदस्य भाऊसाहेब जाधव, अनिल नागरे, धनंजय मांडोळे, ॲड. प्रशांत पालवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

अमळनेरात भाजप, क्रांती मोर्चाकडून स्वागत
अमळनेर : शहरात तालुका मराठा समाजच्या वतीने गुरुवारी सायंकाळी ६ वाजता शासकीय विश्रामगृहाजवळ फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. या वेळी मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत काटे, प्रा. पी. के. पाटील, माजी जिल्हा उपाध्यक्ष हरीष मराठे,अमळनेर तालुका मराठा समाज संचालक श्रावण उत्तम पाटील, जानकीराम पवार, विनोद कदम,विक्रांत पाटील, शिवाजीराव पाटील, सचिन पाटील, योगेश पाटील, डॉ. संजय पवार, गोकुळ पाटील, गौरव पाटील, नीलकंठ पाटील, डॉ. दत्ता ठाकरे, प्रल्हाद पाटील, चेतन पाटील उपस्थित होते. शहर भाजपकडूनही या वेळी जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समिती सभापती वजाबाई भील, श्याम अहिरे, नाटेश्वर पाटील, शहराध्यक्ष शितल देशमुख, जिजाबराव पाटील, हिरालाल पाटील, योगिराज चव्हाण, प्रल्हाद पाटील, उमेश वाल्हे, चंद्रकांत कंखरे, शरद सोनवणे, रोहन मुंदडा आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

अतिशय ऐतिहासिक निर्णय असून, अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्षाला अखेर यश आले. मात्र, अनेक मराठा समाजबांधवांनी यासाठी बलिदान दिले. त्यांना विनम्र अभिवादन करतो. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जो शब्द मराठा समाजाला दिला होता तो आज खरा ठरला आहे.
- डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री

सरकारने घोषणा केल्याप्रमाणे मागासवर्गीय आयोगाच्या अहवालासह मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाचे विधेयक विधिमंडळात सादर करून त्याला मंजुरी मिळाली आहे. आता याची अंमलबजावणी करावी म्हणजेच क्रांती मोर्चाच्या लाखोच्या समुदायाला न्याय मिळेल. यासोबतच इतर मागण्यादेखील लवकरच मान्य कराव्यात.
- डी. डी. बच्छाव, जिल्हाप्रमुख, मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले असले तरी १६ टक्के आरक्षण कोर्टात टिकेल का, हा प्रश्न आहे. आरक्षणासाठी अनेकांनी प्राणाहुती दिली आहे. त्यामुळे ही जल्लोषाची वेळ नसून आरक्षण कोर्टात टिकवून दाखविल्यास सरकार अभिनंदनास पात्र राहील. हा २०१९ चा स्टंट ठरू नये.
- सुरेंद्र पाटील, मराठा सेवा संघ

आरक्षणाचे विधेयक मंजूर होणे ही जल्लोषाची बाब नाही. हे आरक्षण कोर्टात टिकले पाहीजे तो क्षण जल्लोषाचा असेल. त्यामुळे जल्लोषाची घाई करता कामा नये.
- विनोद देशमुख, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले. त्याचा आनंद असून, आधीच केले असते तर बळी गेले नसते. शासनाने विधेयक मंजूर केले. मात्र, आता ते कोर्टापर्यंत पोहचवावे हीच अपेक्षा.
- डॉ. राजेश पाटील, मराठा क्रांती मोर्चा

मंजूर केलेल्या विधेयकात जर आरक्षण दिले नाही तर सध्याचे सुसंवादी सार्वजनिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. सरकारची इच्छा आहे म्हणून नव्हे तर आंदोलनांना घाबरून आरक्षण दिल्याचे नमूद करणे हे घातक आहे. त्यामुळे न्यायालयात आरक्षण टिकणे अवघड दिसते.
- एस. बी. पाटील, शेतकरी कृती समिती, समन्वयक

मराठा समजाच्या आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा शहिदांना प्रथम अभिवादन. ज्या आमदारांनी आरक्षणासाठी पाठिंबा दिला त्यांचेदेखील मनापासून आभारी आहोत. ठिकठिकाणी जेलभरो आंदोलन उपोषण करणाऱ्या सर्व बांधवांच्या प्रयत्नामुळे हे यश मिळाले आहे.
- मनोज मोरे, जिल्हाप्रमुख, मराठा क्रांती मोर्चा, धुळे

मराठा आरक्षणासाठी अतिशय संयमाच्या मार्गाने आंदोलन सुरू होते त्याला अखेर यश मिळाले. मराठा आरक्षणाची शासनाने नोंद घेतली आणि सर्व पाठिंबा दिला. आरक्षण टिकण्यासाठी केंद्रामधून तरतूद झाली पाहिजे. ते टिकण्यासाठी केंद्राने हे विधेयक मंजूर केले पाहिजे.
- डॉ. संजय पाटील, विभागीय अध्यक्ष सेवा संघ

मराठा आरक्षण हा मोठा संघर्ष असून, या मंजुरीने आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. अनेक मराठा समाजबांधवांना यासाठी जीव गमवावा लागला. एवढ्या मोठ्या संघर्षानंतर शासनाने मराठा समाजाला दिलासा देण्याचे काम केले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मात्र, आरक्षण टिकणे महत्त्वाचे आहे.
- वैशाली शिरसाठ, कार्यकर्त्या, मराठा क्रांती मोर्चा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगरसेविकेच्या पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील महिलेचे आक्षेपार्ह फोटो काढून तसे तिच्या वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून सदर महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी नगरसेविका सारिका अग्रवाल यांच्या पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. आठ वर्षापासून पीडित महिलेवर बलात्कार करण्यात येत असल्याचे पोलिसात दिलेल्या फिर्यात नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेलया माहितीनुसार शहरातील सहजीवन नगरात राहणाऱ्या पीडित महिलेने मोहाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी प्रवीण महावीरप्रसाद अग्रवाल (रा.भाईजीनगर, धुळे) याने सन २००८ मध्ये माझ्याशी ओळख केली. महिलांना प्रचारासाठी जमिविण्याच्या बहाण्याने त्याने एमआयडीसी परिसरात माझे आक्षेपार्ह फोटो काढले. हे फोटो लोकांना दाखवून तुझी बदनामी करेन, तसेच तुझ्या वडिलांना ठार मारेल अशी धमकी देवून वेळोवेळी बलात्कार केला. तसेच शहरालगत असलेल्या मोहाडी परिसरातील तलावाजवळ, मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल कुणाल लॉजवर, शिर्डी, वणी गडावरील खोलीत बलात्कार केला. हा प्रकार २००८ ते २०१५ या कालावधीत केला, असे पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार मोहाडी पोलिस ठाण्यात प्रवीण अग्रवाल यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अग्रवाल यांच्या पत्नी महापालिकेच्या निवडणुकीत मोहाडी भागातून उमेदवारी करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोरास धुळ्यात अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

वन खात्याच्या माध्यमातून दुष्काळ निवारणासाठी खोदलेल्या विहिरीचे अनुदान देण्यासाठी लाच मागणाऱ्या सर्व्हेअरला शुक्रवारी दुपारी वनविभागाच्या कार्यालयातच रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

साक्री तालुक्यातील खुडाणे गावातील शेतकऱ्यांचे दुष्काळ निवारण कार्यक्रमांतर्गत वनखात्यामार्फत विहीर खोदली होती. या विहिरीसाठी मंजूर झालेले अनुदान मिळावे म्हणून त्याने उपवनसंरक्षक कार्यालयात संपर्क केला असता सर्व्हेअर मनोहर दौलत जाधव याने त्याच्याकडे पंधरा हजारांची लाच मागितली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित शेतकऱ्याने तक्रार केली असता शुक्रवारी सकाळी उपअधीक्षक सुनील कुऱ्हाडे यांच्या मार्गदशनाखाली पोलिस निरीक्षक पवन देसले, महेश भोरटेकर यांच्यासह पथकातील संदीप सरग, प्रशांत चौधरी, सतीष जावरे, कृष्णकांत वाडीले, संतोष मोरे आदींनी पंधरा हजारांची लाच घेताना कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करा

$
0
0

जिल्हा परिषदेची ३ डिसेंबरला विशेष सर्वसाधारण सभा

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करा, या मागणीसाठी जिल्हा परिषदेने ३ डिसेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या या सभेत प्रमुख नऊ विषयांचा समावेश असून, त्यात दुष्काळाशी संबंधित सात विषय आहेत.

राज्य शाससाने जिल्ह्यातील ८ तालुके व १७ मंडळ दुष्काळी जाहीर केले आहेत. पण, उर्वरित तालुक्यातही फारशी चांगली स्थिती नाही. त्यामुळे हे तालुके दुष्काळी जाहीर करावेत, यासाठी या जिल्हा परिषदेच्या सभेत राज्य शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रोजगारा हमी योजनेच्या कामात वाढ करणे, चारा टंचाईबाबत उपाययोजना, वीज मंडळाच्या अडचणी, जुन्या-नवीन पाणीपुरवठा योजनांचा आढावा, कृषी विभागातर्फे योजनांचा आढावा या सभेत घेतला जाणार आहे.

जिल्हा परिषदेने या अगोदर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कक्ष स्थापन करून उपायोजनेला सुरुवात केली आहे. पण, दुष्काळाच्या झळा सर्वत्र आतापासून बसत असल्यामुळे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पाणीटंचाईचाही अनेक ठिकाणी सामना नोव्हेंबरमध्येच करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी सात महिने पाणीटंचाईला सामोरे जाण्याची चिंताही वाढली आहे. त्यामुळे या सभेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रश्नही समोर येणार आहेत.

..

स्थायी समितीची आज सभा

विशेष सर्वसाधारण सभेअगोदर जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा दुपारी २.३० वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात होणार आहे. यावेळी दुष्काळासंबंधी प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१८ जागांसाठी १६७ उमेदवार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह हबँकेच्या निवडणुकीसाठी वैध उमेदवारी अर्जांची यादी शुक्रवारी बँकेच्या सातपूर येथील मध्यवर्ती बँकेत प्रसिद्ध करण्यात आली. त्यात सर्वसाधारण गटातील १८ जागांसाठी तब्बल १६७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. माघारीनंतर अंतिम यादी दि. ५ डिसेबर रोजी जाहीर होणार असल्याने आता त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या यादीत महिला राखीव गटातील दोन जागांसाठी २२ अर्ज आणि अनुसूचित जाती-जमाती गटाच्या एका जागेसाठी ११ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. 'नामको'च्या सर्वधारण गट, महिला राखीव गट व अनुसूचित जाती-जमातील गटातील सर्व २१ जागांसाठी उमेदवारांची संख्या आता २०० झाली आहे. या निवडणुकीसाठी ३२८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यात अनेकांनी दोन, तर काहींनी तीन अर्ज दाखल केले होते. त्यातील दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले, त्यामुळे त्याची संख्या ३२६ झाली होती. त्यातूनही ज्यांनी जास्त अर्ज भरले त्यांचा एकच अर्ज वैधत्रून इतर अर्ज निकाली काढण्यात आले. त्यामुळे ही संख्या २०० झाली. नव्या यादीतील ज्या उमेदवारांना माघार घ्यायची असेल त्यांच्यासाठी १ ते ४ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दि. ५ डिसेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून, त्यावेळीच चिन्हवाटप केले जाणार आहे.

--

माजी संचालकांची गर्दी

सर्वसाधारण गटाच्या १८ जागांसाठी अनेक माजी संचालकाचे अर्ज वैध ठरल्यामुळे त्यांची गर्दी झाली आहे. यात भास्करराव कोठावदे, कांतिलाल जैन, सुभाष नहार यांसारखे अनेक वेळा संचालक असलेले उमेदवार आहेत, तर दोन ते चार वेळा संचालकपद भूषविणारे अनेक उमेदवारही आहेत. त्यात सोहनलाल भंडारी, शिवलाल डागा, गजनान शेलार, वसंत गिते, हेमंत धात्रक, विजय साने, प्रफुल्ल संचेती, ललित मोदी, हरिभाऊ लासुरे, अरुणकुमार मुनोत, प्रकाश दायमा आदींचा समावेश आहे. नंदलाल पारख व महेंद्र छोरिया हे माजी तज्ज्ञ संचालकही रिंगणात आहेत. चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनीही या गटात अर्ज दाखल केला आहे.

--

दोन माजी संचालिकांचा समावेश

महिला गटात २२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यात शोभा छाजेड आणि रजनी जातेगावकर या दोन माजी संचालिकांचा समावेश आहे. इतर उमेदवार नवीन आहे, तर काहींना या निवडणुकीचा अनुभव आहे.

राखीव गटात नवखे

अनुसूचित जाती-जमातीच्या राखीव गटाच्या एका जागेसाठी हरिभाऊ लासुरे सोडल्यास सर्व उमेदवार नवखे आहेत. त्यात सहकार खात्यात विविध पदांवरून निवृत्त झालेले मनोहर त्रिभुवन अनुभवी आणि सहकारातील तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबरच शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत दिवे यांचीही उमेदवारी या गटात आहे. एकूण ११ उमेदवार रिंगणात असले, तरी माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रेय ठेवीदारांचा कुंभमेळा

$
0
0

अर्ज देण्यासाठी तुफान गर्दी; मुख्यालयात स्वीकृती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मैत्रेय फसवणूक प्रकरणी माहिती देण्यासाठी ठेवीदारांची दररोज गर्दी वाढतच आहे. यामुळे पोलिस आयुक्तालयात सुरू असलेले काम आता पोलिस मुख्यालयाच्या बॅरेक क्रमांक १७ समोरील मोकळ्या मैदानात सुरू करण्यात आले आहे. फॉर्म तसेच कागदपत्रांचा तपशील ऑनलाइन देण्याबाबत पोलिसांनी चाचपणी केली. दरम्यान, मोठ्या संख्येने ठेवीदार येत असल्याने ठेवीदारांना गैरसोयीचा सामाना करावा लागत आहे.

मैत्रेय समूहाकडून ठेवीदारांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी राज्यात ३० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांच्या तपासामध्ये मैत्रेयच्या वित्तीय आस्थापनाच्या नोंदीद्वारे ठेवीदारांची माहिती उपलब्ध झाली असून, पुढील तपास पोलिस यंत्रणेमार्फत सुरू आहे. मैत्रेय कंपनीकडील यादी पोलिसांकडे असली तरी मूळ ठेवीदारांकडील माहिती पोलिसांकडे संकलित नव्हती. या पार्श्वभूमीवर नाशिकसह राज्यभरातील ठेवीदारांकडून त्यांनी जमा केलेल्या पैशांची माहिती पुराव्यांसह संकलित करण्यात येत आहे. जिल्हा आणि कंपनीनिहाय हे काम सुरू आहे. नाशिक शहरासह जिल्ह्याभरात सव्वादोन लाख ठेवीदार असून, त्यापैकी आतापर्यंत ११ हजार गुंतवणूकदारांना नऊ कोटी रुपये परत करण्यात आले आहे. उर्वरित ठेवीदारांची माहिती संकलित करण्याचे काम सध्या सुरू आहे. जवळपास एक हजार ठेवीदारांची माहिती शुक्रवारी संकलित करण्यात आली. गुरूवारी हा आकडा सहाशेच्या घरात पोहचला होता.

ऑनलाईनची सुविधा

ठेवीदारांकडून माहिती संकलित करून घेण्यासाठी चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, ठेवीदारांची मोठी संख्या अडचण ठरते आहे. या पार्श्वभूमीवर विहीत अर्ज आणि कागदपत्रांची माहिती पोलिस आपल्या वेबसाइटवर टाकण्याची शक्यता आहे. यामुळे ठेवीदार घरूनच सर्व तयारी करून येऊ शकतो. यामुळे ठेवीदाराचा वेळ वाचू शकतो. तसेच पोलिसांचे कामही सोपे होऊ शकते.

येथे द्यावेत अर्ज

मैत्रेय गुन्ह्यातील मैत्रेय सर्विसेस प्रा. लि., मैत्रेय प्लॅटर्सस अॅण्ड स्ट्रक्चर्स प्रा. लि., मैत्री रियल्टर्स अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या तीन कंपन्यांचे अर्ज स्वीकारण्याठी गंगापूररोडवरील पोलिस मुख्यालयाच्या बॅरेक क्रमांक १७ येथे द्यावेत. दरम्यान, मैत्रेय सुवर्ण सिद्धी प्रा. लि. या कंपनीचे अर्ज ग्रामीण पोलिस दलाच्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखा येथे द्यावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ठेवीदारांची वाढती संख्या लक्षात घेता पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या दोनवरून चार करण्यात आली आहे. ठेवीदारांनी येण्यापूर्वीच अर्ज भरून आधारकार्ड, असल्यास पॅनकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स तसेच मैत्रेयचे प्रमाणपत्र व झेरॉक्स घेऊन यावे. यामुळे ठेवीदारांचा वेळ वाया जाणार नाही. माहिती संकलनासाठी दोन महिन्यांचा कालावधी आहे. त्यात वाढ होऊ शकते.

- डॉ. सिताराम कोल्हे, तपासाधिकारी

\Bफोटो : पंकज चांडोले\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसटीची दिवाळी गोड; साडेसात कोटींची कमाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसबद्दल प्रवाशांच्या अनेक तक्रारी असतांना या बसमुळे दिवाळीत एसटीच्या उत्पन्नात गेल्या वर्षापेक्षा तब्बल ७ कोटी ७२ लाखाचे उत्पन्न वाढ झाली. गेल्या वर्षी दिवाळीत एसटीला २२ कोटी ६६ लाखाचे उत्पन्न मिळाले होते. पण, यावेळेस एसटीला ३० कोटी ३८ लाखाचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे एसटीची दिवाळी गोड झाली.

एसटी महामंडळाने दिवाळीत १ ते २० नोव्हेंबरपर्यंत १० टक्के सरसकट भाडेवाढ केली तरीही एसटीतून प्रवाशांच्या संख्या कमी झाली नाही. १ ते २७ नोव्हेंबरपर्यंत ८ लाख ५ हजार किलोमीटर एसटी धावली. त्यातून हे उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे एसटीने दिवाळीत नाशिक, मालेगाव, मनमाड, येवला, नांदगाव, सिन्नर, कळवण, पिंपळगाव बसवंत, सटाणासह जिल्ह्यातील सर्व आगारातून जादा बसची व्यवस्था केली होती. त्यात शिवशाही बसची संख्याही मोठी होती.

दिवाळीची सुटीत नोकरीनिमित्त नाशिकमध्ये आलेले आपल्या घरी जाण्यासाठी एसटीला प्राथमिकता देतात. तर सणातही एसटी फुल्ल असते. तसेच महामंडळाने सुटीत अनेक धार्मिक स्थळांसाठी थेट बस ठेवल्या त्याचाही फायदा एसटीला झाला. एसटीने प्रवाशांना सुविधा मिळावी यासाठी आरक्षण सुरू केले आहे. त्यामुळे प्रवाशांना जागा निश्चिती करणे सोपे झाले.

पुणे, धुळे जादा बस

एसटीने दिवाळीत सर्वाधिक बस या पुणे व धुळे मार्गावर धावल्या. थोड्या-थोड्या वेळात या बस सोडण्यात आल्या. यात शिवशाही बसेस जास्त होत्या. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.

खासगी वाहतुकीवर परिणाम

एसटीची दिवाळी गोड झाली असली तरी यावर्षी खासगी वाहतुकीवर मात्र परिणाम झाला. एसटीने मोठ्या प्रमाणात सर्व ठिकाणी शिवशाही बस सुरू केल्या आहे. त्यामुळे प्रवाशांनी यावर्षी दिवाळीत पाठ फिरवली. त्यामुळे खासगी बस वाहतूकदारांच्या जादा बस फारशा धावल्या नाही.

दिवाळीत गेल्या वर्षापेक्षा उत्पन्न ७ कोटी ७२ लाखाने वाढले आहे. महामंडळाने यावर्षी सरासरी भाडेवाढ गेल्या वेळेपेक्षा कमी केली. तसेच अनेक सुविधा सुरू केल्याने प्रवाशांचा विश्वास वाढत आहे. त्याचा एसटीला फायदा होत आहे.

- अरुण सिया,

जिल्हा वाहतूक नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडे गुरूजींच्या हरकतींवर आज सुनावणी

$
0
0

नियमित प्रकरण ७ डिसेंबरला कोर्टासमोर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'माझ्या शेतातील आंबे खाल्ल्यानंतर ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होतो' असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याविरुद्ध महापालिकेने दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी ७ डिसेंबर रोजी होणार आहे. सांगली येथे असलेल्या भिडे यांच्या तब्येतेची कारण वकिलांनी दिल्याने कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. दरम्यान, याच प्रकरणात भिडे यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या हरकतींबाबत शनिवारी सुनावणी होणार आहे.

नाशिकमधील एका कार्यक्रमादरम्यान संततीप्राप्तीबाबत बोलताना, माझ्या शेतातील आंबे खाल्ल्यानंतर ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होतो, असे वक्तव्य भिडे यांनी केले होते. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी झाली होती. भिडेंच्या या वक्तव्यावर गणेश बोऱ्हाडे यांनी कुटुंब कल्याण विभागाच्या 'लेक लाडकी' या वेबसाइटवर लेखी तक्रार केली होती. त्यानुसार पुण्याच्या आरोग्य उपसंचालकांनी नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला या वक्तव्यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नऊ सदस्यीय पीसीएनडीटी समितीने भिडे यांना दोषी ठरवत थेट कोर्टात फिर्याद दिली. ऑगस्टमध्ये या घडामोडी झाल्यानंतर कोर्टाने भिडे यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले. याविरुद्ध भिडे जिल्हा कोर्टातील वरिष्ठ स्तर कोर्टाकडे हरकत नोंदवली.

याबाबत भिडे यांचे वकील अॅड. अविनाश भिडे यांनी सांगितले, की काही तांत्रिक मुद्यावरून आम्ही दाद मागितली आहे. याबाबत शनिवारी (दि. १ डिसेंबर) सुनावनी पार पडेल. तर, महापालिकेने दाखल केलेल्या खटल्याबाबत आज नियमित सुनावणी झाली. भिडे गुरूजी सांगली येथे असून, त्यांची तब्बेत ठीक नसल्याने त्यांना हजर राहण्याबाबत सूट मिळावी, अशी विनंती कोर्टाकडे केली. दोन्ही बाजुचा युक्तीवाद झाल्यानंतर कोर्टाने पुढील सुनावणी ७ डिसेंबर रोजी घेण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपासनी यांची चौकशी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेचे माजी शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी आपल्या कार्यकाळात अनेक अनियमीत कामे केली असून, या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक महापालिके प्रशासनांतर्गत १२३ शाळा येतात. या शाळांमध्ये अनेक गरीब कष्टकऱ्यांची मुले शिक्षण घेत आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत असून, शाळांची संख्या कमी झाली आहे. या घटत्या संख्येला नितीन उपासनी यांचा कारभार कारणीभूत होता. २०१२ नंतर त्यांनी खासगी शाळांतील किती शिक्षकांना मान्यता दिली व दिलेल्या मान्यतेच्या जाहिरातीसाठी सरकारची मान्यता होती का, याची चौकशी करणे गरजेचे आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. उपासनी यांनी सुरक्षारक्षकांचे अनेक महिन्यांचे वेतन काढलेले नाही. ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन काढले आहे, त्यात अर्थिक तडजोड झाली का, याचीही चौकशी करावी. नितीन उपासनी यांची पत्नी खासगी अनुदानीत शाळेत शिक्षक असताना त्यांचे मेडिकल बिल महापालिकेत का दाखल करण्यात आले, अनेक सामान्य शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मेडिकल बिल अनेक वर्षांपासून प्रलंबीत ठेवून स्वत:च्या पत्नीचे बिल महापालिकेत का टाकण्यात आले, याचीही चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी यात करण्यात आली आहे. उपासनी यांनी आपल्या अधिकार पदाचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतला असून, या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्यांचे बिल पास करू नये, असेही यात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्रविहार, यशवंत, वीरेंद्र उपांत्य फेरीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन व राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक मध्य यांच्या वतीने गंगापूर रोड येथील आकाशवाणीजवळील मैदानावर झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत मित्रविहार 'अ' आणि 'ब' , यशवंत, वीरेंद्र संघांनी उपांत्य फेरी गाठली.

स्पर्धेत २२ पुरुष संघ, तर महिलांच्या आठ संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासून दिवसभर महिलांचे आणि पुरुषांचे साखळी सामने खेळविले गेले, तर दुपारच्या सत्रात उपउपांत्य फेरीचे सामने झाले. महिलांच्या गटात नाशिकच्या वीरेंद्र क्रीडा मंडळाने आपले चारही सामने जिंकून आघाडी घेतली आहे. नाशिकरोडच्या रेणुका क्रीडा मंडळानेही सुंदर खेळ करून तीन सामने जिंकून आव्हान राखले, तर मित्रविहारच्या महिला संघाने दोन सामने जिंकले. पुरुषांच्या सामन्यात चुरस असून, पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात मित्रविहार 'अ' संघाने युनायटेड संघाचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. यशवंत व्यायामशाळेने घोटीच्या सह्याद्री संघाचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. तिसऱ्या उपांत्य सामन्यात चुरशीच्या लढतीत वीरेंद्र क्रीडा मंडळाला युनिवर्सल संघाने चांगलेच झुंजवले. पहिला सेट जिंकल्यानंतर वीरेंद्र संघाला दुसरा सेट गमवावा लागला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये वीरेंद्र संघाच्या खेळाडूंनी यशस्वी कमबॅक करीत विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. चौथ्या सामन्यात मित्रविहार 'ब' संघाने एचएएल संघाचा पराभव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ आपत्तीग्रस्तांना ११ लाखांची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जुन्या नाशकातील तांबट लेनमध्ये चारमजली वाडा कोसळून ढिगाऱ्याखाली सापडलेल्या पाच जणांच्या कुटुंबीयांसाठी सरकारने मदत पाठविली आहे. विशेष बाब म्हणून सरकारने पाठविलेली ११ लाखांची मदत प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख याप्रमाणे ८ लाख रुपये, तर तिघा जखमींना प्रत्येकी एक लाख याप्रमाणे तीन लाख रुपये, अशी एकूण ११ लाखांची मदत दिली जाणार आहे.

तांबट लेन येथे संजय शांताराम काळे यांचा चार मजली वाडा होता. तो धोकादायक अवस्थेत असल्याने काळे कुटुंबीय घरातील सामान अन्यत्र हलवित होते. परंतु, त्याचवेळी ५ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास हा वाडा कोसळला. संजय काळे, चेतन पवार, काजल काळे, करण घोडके, समर्थ काळे हे माती-विटांच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सर्वांना बाहेर काढले. परंतु, करण घोडके आणि समर्थ काळे यांचा मृत्यू झाला. अन्य तिघे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी धाव घेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मदतकार्य करीत मदतीचे आश्वासन दिले. त्यानुसार शुक्रवारी ११ लाख रुपयांचा मदतनिधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images