Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

लसीकरणासाठी पालकांचीच शाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंजेक्शनच्या सुईपासून पळ काढू पाहणारे चिमुकले... सुई टोचल्याने सुरू असलेली रडारड... गाणी, गोष्टींच्या माध्यमातून त्यांचे मन रमवू पाहणारे शिक्षक.. अन् आपल्या पाल्याची काळजी घेण्यासाठी आलेले पालक.. असे चित्र जिल्ह्यातील शाळांमध्ये सध्या दिसत आहे. जिल्हाभरातील शाळांमध्ये गोवर, रुबेला लसीकरण मोहीम सध्या सुरू आहे. लस देतेवेळी पालकांनीही उपस्थित रहावे, असे आवाहन शाळा प्रशासनांकडून केले जात असल्याने शाळांमध्ये पालकांची गर्दी होत आहे.

भारतात दरवर्षी ५० हजार बालकांचा गोवरमुळे मृत्यू होतो व ४० हजार बालकांना व्यंगत्व येते. हे दोनही आजार २०२०पर्यंत नियंत्रित करण्याच्या दृष्टीने मिझल रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. गोवर उच्चाटन व रुबेला नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत नऊ महिन्याच्या बालकांपासून १५ वर्षांपर्यंतच्या मुलामुलींना गोवर, रुबेला लस दिली जात आहे. Ḥमात्र, लस घेतल्यानंतर रिअॅक्शन येत असल्याच्या चर्चा, उदाहरणे पुढे येत असल्याने लसीकरणावेळी पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शाळांकडून केले जात आहे. त्यामुळे ज्या दिवशी संबंधित शाळेत लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे, त्या दिवशी पालक शाळेत उपस्थित राहत आहे. शिशूवृंद, प्राथमिक विभागातील वर्गांमधील चिमुकल्यांमध्ये असलेल्या इंजेक्शनच्या भीतीमुळे गोंगाट, रडारडीचे वातावरण आहे. अशा विद्यार्थ्यांना चॉकलेट, गोळ्या देऊन, मनोरंजनात्मक कार्यक्रम, गाणी दाखवित शांत करण्याची कसरत पालक, शिक्षकांकडून केली जात आहे. लस दिल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याच्या आरोग्यावर काही परिणाम होत आहे का, रिअॅक्शन आली आहे का, हे तपासण्यासाठी साधारण अर्धा तास विद्यार्थ्यांना शांत बसवून ठेवले जात आहे. त्यांना इंजेक्शननी रिअॅक्शन आल्यास प्राथमिक उपचार केला जात आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांचे आई, वडील दोघे नोकरी करणारे असणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र लसीकरणावेळी पंचाईत होत आहे. अशा विद्यार्थ्यांना पालकांशी समन्वय साधून लस दिली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिक्षाचालकाची मुजोरी

0
0

वाहतूक पोलिसांला धक्काबुक्की, शिवीगाळ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षावर कारवाई केली म्हणून रिक्षाचालकासह त्याच्या अन्य साथीदारांनी वाहतूक पोलिसास शिवीगाळ व धक्काबुक्की केली. साथीदारांपैकी एका महिलेने वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळ गोंधळ घातला. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. सरकारवाडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

अक्षय कल्याण आहिरे (वय २४), ज्योती समाधान गायकर (वय ३१, दोघेही, रा. शिवाजीनगर, सातपूर) यांच्यासह योगेश मुरलीधर आहिरे (वय ३६, रा. समर्थ सोसायटी, दिघी रोड, भोसरी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करा, अशा सूचना मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वाहतूक पोलिसांना करण्यात आल्या होत्या. वाहतूक पोलिस हवालदार नामदेव कारभारी सोनवणे (वय ५१) हे कर्तव्य बजावत असताना त्यांना संशयित अक्षय आहिरे हा रिक्षाचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची रिक्षामधून वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. रिक्षावर (एमएच १५ एफक्यू ०८७८) कारवाई करीत त्यांनी ती जमा करवून घेतली. सायंकाळी सातच्या सुमारास संशयित शरणपूर रोडवरील वाहतूक शाखा कार्यालयात आले. सोनवणे तेथे नसल्याने त्यांना फोन केला. आम्हाला पावती फाडायची असून तुम्ही वाहतूक शाखेच्या कार्यालयात या असे त्यांना सांगू लागले. तुमच्या रिक्षावर कारवाई केल्याचा अहवाल कोर्टात पाठविला आहे. तुमची केस कोर्टात गेल्याने तेथेच दंड भरा. मला भेटून उपयोग नाही, असे सोनवणे यांनी त्यांना सांगितले. परंतु, तरीही ते विनंती करू लागल्याने सोनवणे वाहतूक शाखेच्या कार्यालयात आले. कारवाईचा अहवाल कोर्टात पाठविल्याचे त्यांनी अक्षय आणि त्यांच्या साथीदारांना सांगितले. मात्र, त्यावेळी संशयित ज्योती गायकर त्यांच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलू लागली. सोनवणे त्यांना कारवाईची पद्धती समजावून सांगत असताना आरडाओरडा व शिवीगाळ करू लागली. अन्य संशयित सोनवणे यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना धक्काबुक्की करू लागले. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी फोन करून निर्भया व्हॅन बोलावून घेतली. तिघांना सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जाऊन सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गमे आज घेणार पदभार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राधाकृष्ण गमे हे आज, गुरुवारी आयुक्तपदाचा चार्ज घेणार असून, प्रशासनाकडून याबाबतीतले सोपस्कार पूर्ण करण्यात आले आहेत. गमे हे पदभार घेतल्यानंतर तातडीने सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन लागलीच कामाला सुरुवात करणार आहेत. बुधवारी प्रशासनाकडून पालिकेच्या कामकाजाचा तसेच प्रशासकीय स्थितीचा लेखाजोखा सादर करण्यासाठी घाई सुरू होती. सर्व विभागांच्या कामांचा आढावा गमेंसमोर सादर केला जाणार आहे.

लोकप्रतिनिधींशी सूत न जुळल्याने तुकाराम मुंढे यांची पालिकेच्या आयुक्तपदावरून अवघ्या नऊ महिने १३ दिवसांतच उचलबांगडी करण्यात आली होती. मुंढेंच्या बदलीनंतर राधाकृष्ण गमें आयुक्त होणार ही चर्चा असली तरी, त्यांचे बदलीचे आदेश निघाले नव्हते. त्यामुळे गेल्या चौदा दिवसांपासून पालिकेचे आयुक्तपद रिक्त होते. राज्य सरकारने मंगळवारी गमे यांची पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करीत, त्यांच्या बदलीचे आदेशही काढले. त्यामुळे पालिकेला अखेर पूर्णवेळ आयुक्त मिळाला असून, ते आज आयुक्तपदाचा भार स्वीकारणार आहेत. गमेंनी बुधवारी उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदाचा चार्ज सोडला. सध्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे आहे. गमे जिल्हाधिकाऱ्यांकडून पदभार स्वीकारणार आहेत.

प्रशासनाची धावपळ

गमे हे आज पदभार घेणार असल्याने त्यांच्यासमोर पालिकेच्या कामकाजाचा लेखाजोखा सादर करण्याची धावपळ पालिकेत बुधवारी सुरू होती. सर्व विभागांचे पीपीटी तयार करण्यात आले असून, त्यांचे सादरीकरण गमेंच्या समोर केले जाणार आहे. त्यामुळे विभागाचे कामकाज, विभागप्रमुख कोण यांच्यासह पालिकेचा मंजूर आकृतीबंध, सध्या रिक्त पदांची माहिती आदींची जमवाजमव सुरू होती. सोबतच महासभा तोंडावर असल्याने महत्त्वाचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यासंदर्भातील काही प्रस्तावांचीही माहिती सादर केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेने चोरला घरातून मोबाइल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आजीचा मोबाइल क्रमांक मागण्याच्या बहाण्याने घरात आलेल्या अनोळखी महिलेने घरातून १० हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. मंगळवारी (दि. ४) दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी प्रांजल सचिन पाटील (वय १९, रा. रेखाकृती सोसायटी, महात्मानगर) यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्या घरात एकट्या असताना एका अनोळखी महिलेने घराची बेल वाजविली. प्रांजल यांनी दरवाजा उघडल्यानंतर तुमच्या आजींचा मोबाइल क्रमांक हवा होता असे त्या महिलेने सांगितले. प्रांजल यांनी तिला घरात घेतले. आजीचा मोबाइल क्रमांक दिला. तिच्याकरीता पाणी आणण्यासाठी प्रांजल स्वयंपाकघरात गेली. पाणी पिऊन ती महिला निघून गेली. त्यानंतर सोफ्यावर ठेवलेला मोबाइल घरात नसल्याचे तिच्या लक्षात आले. शोधाशोध करूनही महिलेचा थांगपत्ता न लागल्याने अखेर त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

एसटीच्या बॅटऱ्यांची चोरी

नाशिक : पंचवटीतील राज्य मार्ग परिवहन आगारात उभ्या असलेल्या एसटीच्या बॅटऱ्या चोरीस गेल्याचा प्रकार मंगळवारी (दि. ४) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला. आगार व्यवस्थापक विक्रम सोमनाथ नागरे (वय ३०, रा. पिंपळगाव बहुला) यांनी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. चोरट्याने सोमवारी सायंकाळी सहा ते मंगळवारी सकाळी आठ या कालावधीत एसटी बसच्या (एमएच २० डी ९४०८) अॅडो कंपनीच्या बॅटऱ्या चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राम मंदिरासाठी नाशिकमध्ये संतसभा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी नाशिक जिल्हा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे येत्या शनिवारी (दि. ८) भद्रकालीतील साक्षी गणेश मंदिर परिसरात सायंकाळी सहा वाजता संत सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा यशस्वी करण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाचे आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी बुधवारी व्यक्त केला.

संत सभेच्या नियोजनासाठी संघ परिवारातर्फे वसंतस्मृती कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. राम हा सर्वांच्या श्रद्धेचा विषय असून, राम मंदिर व्हावे ही सर्वांची इच्छा असल्याचे विहिंपचे जिल्हामंत्री गणेश सपकाळ आणि रा. स्व. संघाचे विभागीय कार्यवाह संजय कुलकर्णी यांनी सांगितले. त्याच्या जनजागृतीसाठीच संतसभा असून, ती यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी करताच संतसभा विराट होईल, असा विश्वास उपस्थित सर्वांनी व्यक्त केला. संत सभेत विहिंपचे संघटन मंत्री विनायकराव देशपांडे, ह. भ. प. माधव महाराज घुले आदी आपले विचार मांडणार आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, महानगर अध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे आदिंनीही यावेळी मार्गदर्शन करून सभेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दुर्गा वहिनीच्या सहसंयोजिका मीनल भोसले यांचेही भाषण झाले. व्यासपीठावर प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, सभागृह नेते दिनकर पाटील, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, महिला आघाडीच्या महानगर अध्यक्ष रोहिणी नायडू आदी होते. बैठकीस नगरसेवक आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवन भगुरकर यांनी सूत्रसंचलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंधनदर कपातीने दिलासा

0
0

दहा दिवसांत पेट्रोल डिझेलच्या किमतीत सुमारे ३ रुपयांनी घट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या इंधन दरवाढीने पोळलेल्या वाहनचालकांना आता दिलासा मिळाला असून, गेल्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सुमारे ३ रुपयांनी घट झाली आहे. दहा दिवसांत पेट्रोल ३.२३ तर डिझेलचे दर ३.५० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे मागील महिन्यात इंधन दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांना डिसेंबरमहिन्याच्या प्रारंभी दिलासा मिळाला आहे. सध्या इंधनाच्या किमतीत घट होत असल्याने, वाहनचालक सुखावले असून, इंधनाच्या किमती कमीच राहाव्यात, अशी अपेक्षा वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.

शहरात बुधवारी, ५ डिसेंबर रोजी पेट्रोल ७७.३६ रुपये आणि डिझेल ६८.४६ रुपये होते. मंगळवारी, ४ डिसेंबर रोजी पेट्रोलची ७७.९३, तर डिझेलची ६९.०१ रुपये किंमत होती. शहरात २५ नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्यास सुरुवात झाली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असल्याने भारतीय तेल कंपन्यांनी इंधन दरात कपात केली असल्याचे समजते. गेल्या महिन्यात ८० रुपयांच्या घरात असलेले इंधन दर कमी होऊ लागल्याने सध्या वाहनचालक सुखावले आहेत. ऑक्टोबरमध्ये इंधन दरवाढीमुळे वाहनचालकांना जादा पैसे मोजावे लागत होते. नोव्हेंबर महिन्यात इंधराचे दर कमी होण्यास सुरुवात झाली असून, डिसेंबर महिन्यात इंधनाचे दर कमीच राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ऑक्टोबरमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किमती नव्वदीपर्यंत पोहोचल्याने इंधन शंभरी गाठणार अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगली होती. मात्र, सध्या इंधन दर होऊ लागल्याचा आनंद आता वाहनचालक व्यक्त करीत आहेत. इंधन दरातील ही स्वस्ताईची कायम राहावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांनी व्यक्त केली आहे.

\Bदहा दिवसातील इंधनाचे दर

\Bदिनांक........... पेट्रोल.......... डिझेल

५ डिसेंबर........ ७७.३६ ....... ६८.४६

४ डिसेंबर........ ७७.९३ ....... ६९.०१

३ डिसेंबर........ ७८.२० ....... ६९.१४

२ डिसेंबर........ ७८.८९ ....... ६९.१४

१ डिसेंबर........ ७८.४६ ....... ६९.७५

३० नोव्हेंबर...... ७८.८० ....... ७०.१३

२९ नोव्हेंबर...... ७८.८० ....... ७०.८९

२८ नोव्हेंबर...... ७९.४५ ....... ७०.८९

२७ नोव्हेंबर...... ८०.६७ ....... ७१.०५

२६ नोव्हेंबर...... ८०.५९ ....... ७१.९६

पेट्रोलचे दर कमी झाल्याने आनंद आहे. दहा दिवसांत पेट्रोल बऱ्यापैकी स्वस्त झाले आहे. आता पुन्हा मोठ्या प्रमाणावर इंधन दरवाढ होऊ नये, ही अपेक्षा आहे.

- स्वप्नील नागरे, नागरिक

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत होणारी घट कायम असावी. इंधन ऐंशी किंवा नव्वदीच्या घरात गेल्यावर आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. सध्या डिझेल आणि पेट्रोलची किंमत कमी होत असल्याने दिलासा आहे.

- आकाश सोनवणे, नागरिक

फोटो देतो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वणवे पेटविणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा चारा टंचाईच्या समस्येला सामोरे जाण्याची शक्यता असून या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने आतापासूनच खबरदारी घेण्यास प्राधान्य दिले आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वरसह जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात वणवे पेटण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे यापुढील काळात वणवा पेटविणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी दिला आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारपुढे निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सध्या चाऱ्याची उपलब्धता बऱ्यापैकी असली तरी भविष्यात ही समस्या जटील रूप धारण करू शकते. म्हणूनच आहे तो चारा टिकविण्यासह नवीन चाऱ्याच्या निर्मितीसाठी धरणक्षेत्रातील उपलब्ध जमिनींवर चाऱ्याची लागवड करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. वणवे पेटविल्यास जनावरांसाठीचा खुराक असणारे गवत जळून जाते. यंदा असे प्रकार घडू नयेत यासाठी वणवा पेटविणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अनेकदा वन्यजीवांना पकडण्यासाठी वणवे पेटविले जातात. वणवा विझविल्यानंतरही होरपळलेल्या झाडांचा लिलाव होतो. यातून माफियांना बक्कळ पैसे मिळतात. वणव्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचे मोठे नुकसान होते. हे प्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी खास पथक तयार केले असून पोलिस प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत.

चारा छावण्यांबाबत आढावा

जिल्ह्यातील चाऱ्याची सद्यस्थिती जिल्हयातील जनावरांची एकूण संख्या, चाऱ्याची उपलब्धता याबाबतचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. पशुधनाची अधिक संख्या असलेल्या ठिकाणी चारा छावण्या सुरू कराव्या लागण्याची शक्यता असून त्याबाबतचा अंदाज या आढावा बैठकीत घेण्यात आला. याबाबतचा अहवाल दुष्काळ पाहणीसाठी येणाऱ्या केंद्रीय पथकाकडे दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री आज घेणार दुष्काळाचा आढावा

0
0

केंद्रीय पथकासोबत ओझरला बैठक

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आज, गुरुवारी रात्री ओझर विमानतळावर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दुष्काळाच्या पाहणीसाठी जिल्ह्यात आलेल्या केंद्रीय पथकाशी यावेळी मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मुख्यमंत्री फडणवीस आज (दि. ६) धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. तेथून परतताना ते ओझर विमानतळावर नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी राज्यात दाखल झालेले केंद्र सरकारचे पथक गुरुवारी मालेगाव तालुक्यातील मेहुणे, जळगाव (निं.) या गावांच्या दौऱ्यावर येत आहे. पाहणी करून हे पथक ओझर विमानतळावर पोहोचेल. तेथे मुख्यमंत्री जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर आढावा बैठक घेणार असून, या बैठकीला जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसह केंद्रीय पथकाचे अधिकारीदेखील उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दाभाडी क्लस्टरच्या कामांना प्राधान्य द्या

0
0

झेडपीच्यी सीईओंचे आढावा बैठकीत निर्देश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

दाभाडी क्‍लस्टरमध्ये समाविष्ट गावांचा विकास करताना भूमिगत गटार, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यावर विशेष भर देऊन सदरची कामे पूर्ण करावीत. तसेच यासाठी ग्राम विकास आराखड्यातील घेतलेल्या कामांना प्राधान्य द्यावे असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले.

मालेगाव येथील पंचायत समिती कार्यालयात रुरबन मिशन अंतर्गत दाभाडी क्‍लस्टरमधील विकासकामांबाबत आढावा बैठक झाली. त्यात, दाभाडी क्‍लस्टर अंतर्गतच्या आठ गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, पथदीप, जनसुविधा अंतर्गत प्रस्तावित कामे, जलयुक्त शिवार, आरोग्य, शिक्षण कृषीविकासाच्या योजना, कौशल्य विकास, घरकुल योजनाचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील गावांच्या समुहाचा आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास करणे आणि शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरवणे हा श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियानाचा मुख्य उद्देश आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील दाभाडी क्लस्टरमधील आठ गावांचा समावेश आहे. या अभियानातून दाभाडी, पिंपळगाव, रावळगाव, जळगाव, बेळगाव, तळवाडे, पांढरून, धवळेश्वर या आठ गावांचा विकास करण्यात येत आहे.

आढावा बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अरविंद मोरे, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्या संगिता निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी इशाधीन शेळ्कंदे, दत्तात्रय मुंडे, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी नितीन बच्छाव, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांच्यासह खातेप्रमुख, सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक संत’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतात प्रत्येक प्रांतात संत होऊन गेले आहेत. परंतु, सर्वाधिक संत हे महाराष्ट्रात होऊन गेले. महाराष्ट्रात सर्व जाती, धर्मांमधील संतांचे कार्य मोठे आहे. म्हणून महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार हभप श्रीकृष्ण सिन्नरकर महाराज यांनी केले.

कॉलेजरोडवरील प्रौढ नागरिक मित्रमंडळतर्फे श्रीसंत ज्ञानेश्वर समाधी सोहळानिमित्त बुधवारी सायंकाळी कीर्तन झाले. यावेळी सिन्नरकर महाराज 'श्री संत ज्ञानेश्वर यांचा संजीवन समाधी सोहळा' या विषयावर ते बोलत होते. ज्ञानेश्वरांनी समाज परिवर्तनाचे काम केले. समाजात वाद होऊ नये, या दृष्टीने त्यांनी समाजवाद दूर केला. संतांना समजून घ्यायचे असेल तर अधिकाधिक सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन चंद्रकांत जामदार यांनी केले. यावेळी प्रौढ नागरिक मित्र मंडळाचे बाजीराव येवले, आप्पा मुळे, रमेश देशमुख, नंदकुमार कोळपकर, आशा चौधरी, विजया पंडित आदी उपस्थित होते.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडे गुरूजींना दिलासा नाहीच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टाने खटला दाखल करताना कोणतीही चौकशी केली नसल्याबाबत शिव प्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी यांनी दाखल केलेली हरकत न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. भिडे गुरुजी यांनी मुदतीत आव्हान दिले नसल्याचे सांगत हा दावा फेटाळण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांच्या कोर्टात बुधवारी सुनावणी झाली. 'माझ्या शेतातील आंबे खाल्यानंतर ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होतो' असे वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याविरूध्द महापालिकेने कोर्टात खटला दाखल केला आहे. तत्पूर्वी आरोग्य विभागाच्या आदेशानुसार महापालिकेने एका तज्ज्ञ कमिटीद्वारे सर्व प्रकरणांची एकतर्फी चौकशी केली. चौकशीअंती भिडेंवर दोष ठेऊन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात खटला दाखल करण्यात आला. या खटल्याची सुनावणी सुरू होताच भिडे गुरूजींना हजर राहण्याबाबत कोर्टाने समन्स बजावले. कोर्टाच्या या निर्णयाविरूध्द भिडे यांच्यावतीने अॅड. अविनाश भिडे यांनी जिल्हा कोर्टात दाद मागितली. या प्रकरणात कोर्टाने कोणतीही प्राथमिक चौकशी केली नसल्याचा दावा करताना सुप्रीम कोर्टाच्या वेगवेगळ्या आदेशांचा दाखला देण्यात आला. खटला सुरू करण्यापूर्वी देखील पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली नसल्याचा मुद्दाही मांडण्यात आला होता. सोमवारी याबाबतचा युक्तीवाद पूर्ण झाला असला तरी बुधवारी होणाऱ्या निर्णयाकडे लक्ष लागले होते. भिडे गुरुजी यांनी मुदतीमध्ये आव्हान दिलेले नाही असे सांगत भिडे गुरुजी यांना बजाविण्यात आलेल्या नोटिशीविरोधातील दावा न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे भिडे गुरुजी आता याबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्‍यता आहे. कनिष्ठ न्यायालयात शुक्रवारी (दि.७) होणाऱ्या सुनावणीला भिडे गुरुजी उपस्थित राहतात का, याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डॉ. पाटलांमुळे मनमाड साहित्याचे जंक्शन’

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

डॉ. म. सु. पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याने मनमाड शहरात आनंद व्यक्त होत असून, मनमाड शहराचा देखील मोठा गौरव झाल्याचे सूर उमटत आहे. डॉ. पाटील यांचे मनमाड कनेक्शन हे आजही मनमाडसाठी भूषणावह आहे. तब्बल २० वर्षे 'मसु' मनमाड शहराशी निगडित होते. मनमाडमध्ये काही काळ नोकरीस असणारे देवळा येथील डॉ. एकनाथ पगार यांच्या शब्दात सांगायचे तर 'म. सु. पाटील यांच्यामुळे मनमाड शहर हे रेल्वे बरोबरच साहित्याचे व वाङमयीन जंक्शन बनले होते.'

साहित्य अकादमीच्या पुरस्कारावर आपल्या नावाची मोहोर उमटवीणारे डॉ. पाटील हे महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित मनमाड कला आणि वाणिज्य तसेच विज्ञान महाविद्यालयात स्थापनेपासून प्राचार्य होते. मराठीवर जीवापाड प्रेम करणारे डॉ. पाटील यांची मनमाड महाविद्यालयात शिस्तबद्ध अशी कारकीर्द होती. सन १९६९ ते १९८९ या काळात मनमाड महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करताना त्यांनी अनेकांना घडविले. कला शाखेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, मराठी हा विषय विशेष विषय म्हणून निवडावा, असा त्यांचा आग्रह असे.

महाविद्यालयासमोरील बंगल्यात ते राहत. त्यांचा बंगला म्हणजे नामवंत साहित्यिक व साहित्याची आवड असणारे रसिक यांच्यासाठी एक चालतेबोलते सांस्कृतिक केंद्रच असायचे. डॉ. पाटील यांच्याबद्दल विद्यार्थ्यांत आदरयुक्त भीती असे २४ तास महाविद्यालयीन आवारात असल्याने त्यांचे तासनतास

महाविद्यालयीन व साहित्यिक कामकाज तेथे सुरू असे. डॉ पाटील यांनी अनेक विद्यार्थ्यांत साहित्याविषयी आवड पेरली, त्यांना लिहिते केले. त्यांना इतरांचं लिखाण वाचण्याची गोडी लावली, त्यांच्यामुळे बा. भ. बोरकर, कवी कुसुमाग्रज, व्यंकटेश माडगूळकर, डॉ नरहर कुरुंदकर, करंदीकर, पाडगावकर असे अनेक साहित्यातील दिग्गज मनमाडला येऊन गेले. अनुष्टुभ या साहित्य क्षेत्राच्या प्रांतातील दर्जेदार द्वई मासिकाची सुरुवात मनमाड येथून डॉ. पाटील यांच्यामुळे झाल्याचे सांगितले जाते. डॉ रमेश वरखेडे, डॉ. प्रभाकर बागले, प्रा. विजय काचरे, डॉ. एकनाथ पगार, डॉ. गो. तू. पाटील यांच्यासह त्यांनी अनुष्टुभचे काम नेटाने पुढे नेले. 'मसु' हे मनमाड येथे बाबा म्हणून परिचित होते.

00000000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रेस्ट कॅन्सरशी लढा होणार सुकर

0
0

\Bशुभवार्ता

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॅन्सरग्रस्त नागरिकांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालायच्यावतीने नाशिक जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीयस्तरावरील जपाइगो ही स्वयंसेवी संस्था ब्रेस्ट कॅन्सरसंदर्भातील पायलट प्रोजेक्ट जिल्ह्यात राबविणार आहे. पुढील आठवड्यापासून या पायलट प्रोजेक्टला सुरुवात होणार असून, जिल्ह्यातील ४० लाख नागरिकांची स्क्रीनिंग टेस्ट या प्रोजेक्ट अंतर्गत करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जपाइगो ही स्वयंसेवी संस्था अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाशी संलग्नित असून, गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारसोबत या संस्थेने देशभरात विविध सेवाभावी उपक्रम राबविले आहेत. देशातील विविध राज्यात कुटूंब नियोजन आणि महिला प्रसूती यांसह सुरक्षा सेवेच्या संदर्भात या संस्थेने उपक्रम राबविले आहेत. आता राज्य सरकारबरोबर ही संस्था नाशिकमध्ये ब्रेस्ट कॅन्सरसंदर्भात पायलट प्रोजेक्ट राबविणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील नागरिकांची मोफत स्क्रीनिंग टेस्ट करण्यात येणार असून, ब्रेस्ट कॅन्सरचे निदान होणाऱ्यांना मोफत कॅन्सर उपचार या संस्थेतर्फे पुरविण्यात येणार आहेत. या उपक्रमाला पुढील आठवड्यात प्रारंभ होणार असून, उपक्रमाच्या उद्घाटनासाठी आरोग्य मंत्रालयाचे आणि संस्थेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमांतर्गत खास करून ग्रामीण भागातील नागरिकांची स्क्रीनिंग टेस्ट करण्यावर भर देण्यात येणार असून, ब्रेस्ट कॅन्सरच्या जनजागृतीसह उपचारपद्धती उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

\Bआदिवासी भागातही तपासणी

\Bनाशिक जिल्ह्यात असणाऱ्या १५ तालुक्यांपैकी ८ तालुके आदिवासी आहेत. या तालुक्यांमध्ये आरोग्याच्या समस्या अधिक असल्याने या ठिकाणीदेखील संस्थेतर्फे ब्रेस्ट कॅन्सर संदर्भात जनजागृती आणि मोफत स्क्रीनिंग टेस्ट केली जाणार आहे. या प्रोजेक्टसाठी उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा आणि उपचार पद्धतीचा वापर केला जाणार असल्याने, ग्रामीण भागात असलेल्या कॅन्सर रुग्णांवर उपचार करणे सोपे होणार आहे.

ब्रेस्ट कॅन्सरवर आधारित पायलट प्रोजेक्ट जपाइगो संस्था आणि राज्य सरकारतर्फे जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. यामाध्यमातून कॅन्सरचे निदान करणे सोपे जाणार आहे. पुढील आठवड्यात या प्रकल्पास सुरुवात होणार आहे. या उपक्रमातून कॅन्सर उपचाराची अपडेटेड तंत्रज्ञान जिल्ह्यात उपलब्ध होईल.

- डॉ. सुरेश जगदाळे, सिव्हिल सर्जन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा विकासनामा जाहीर

0
0

मंत्री महाजनांकडून अनेक आश्वासने

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महानगरपालिकेची सत्ता भाजपाच्याच ताब्यात येणार असून, फिप्टी प्लसने उमेदवार निवडून येतील. सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम दररोज नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी (दि. ५) महापालिका निवडणूकीचा भाजपचा विकासनामा जाहीर केला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, डॉ. माधुरी बाफना, विनोद मोराणकर आदी उपस्थित होते. या वेळी मंत्री महाजन म्हणाले की, शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून, भाजपच्या हातात मनपाची सत्ता दिल्यास सुरुवातील पाणीप्रश्न निकाली काढण्यात येईल. त्यानंतर नाशिक, जळगाव, औरंगाबादच्या बरोबरीने शहराचा विकास करण्याचा प्रयत्न राहील. शहरात गेल्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस, काँगेसच्या हातात महापालिकेची सत्ता होती. मात्र, शहरात कोणताही बदल झालेला दिसत नाही. शहराचा विकास मागे पडला असून, तो आता भाजप पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. नाशिक व जळगावच्या लोकांनी आमच्यावर विश्वास दाखविला तो विश्वास धुळेकरही दाखवतील. मात्र एकदा महापालिकेत भाजपाला संधी द्यावी लागेल आणि शहराचा कायापालट त्याशिवाय होणार नाही, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

जळगावकर धुळ्यात दाखल
महापालिका निवडणुकीला आता फक्त दोन दिवस शिल्लक असताना जळगावातील काही दिग्गज लोकप्रतिनधी आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर शहरात ‘MH 19’ पार्सिंगच्या चारचाकी बुधवार सायंकाळपासून मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. यामुळे आता मंत्री महाजन यांच्यावर भाजपने महापालिका निवडणुकीसाठी टाकलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी जळगावहून फौजफाटा हळूहळू दाखल होत असून, ते नेमकी कोणती जादू सत्ता काबीज करण्यासाठी वापरतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांची आज सभा
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज (दि. ६) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळ्यात येत असून महापालिका निवडणूकीत भाजपकडून रिंगणात असलेल्या ६२ उमेदवारांची शहरातील पांझरा नदीकिनारी महाकाली मंदिराजवळ प्रचार सभा होणार आहे. यात मुख्यमंत्री फडणवीस नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच याचवेळेत सायंकाळी ७ वाजता आमदार अनिल गोटे यांचीही शिवतीर्थ चौक येथे सभा होणार आहे. यामुळे भाजपचे मुख्यमंत्री व भाजपचे शहरातील आमदार गोटे यांच्या पक्षवादामुळे एकाच वेळी दोन जणांच्या सभा होणार आहेत. भाजपविरुध्द स्वाभिमानी भाजपा लोकसंग्राम यांच्यातील प्रचाराची अखेरचा सामना आज होणार आहे. यातून मतदार नेमके कोणाच्या हाती सत्ता देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार हजारांवर जणांना व्हायरल फिव्हर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात एकीकडे डेंग्यू व स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव कमी झाला असला तरी तापसदृश्य आजाराच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. सोबतच चिकनगुणिया सदृश आजाराच्या रुग्णांचीही संख्या वाढली आहे. तापसदृश आजाराचे नोव्हेंबरमध्ये तब्बल तीन हजार ८५४ रुग्ण पालिकेच्या दप्तरी नोंद झाले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. त्यामुळे नाशिककरांचे आरोग्य अद्याप बिघडलेलेच असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

तीन महिन्यांपासून शहरात स्वाइन फ्लू, डेंग्यू व व्हायरल फिवरने थैमान घातले होते. परंतु, वातावरणात बदल होऊन अचाकन थंडी वाढल्याने शहरात स्वाइन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या घटली आहे. नोव्हेंबरमध्ये स्वाइन फ्लूचे अवघे चार रुग्ण आढळून आले आहेत. नोव्हेंबर २०१८ मध्ये मात्र डेंग्यूबाधितांची संख्या ९२ पर्यंत सीमित राहिली आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूपाठोपाठ डेंग्यूचाही जोर ओसरल्याचा दावा आरोग्य-वैद्यकीय विभागातर्फे केला जात आहे. नोव्हेंबर महिन्यात काविळीचे सहा, स्वाइन फ्लूचे तीन, तर अतिसाराचे १८७ रुग्ण आढळले. या आजारांचा प्रादूर्भाव कमी झाल्याचे दिसत असले तरी तापसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या मात्र धडकी भरवणारी आहे. नोव्हेंबरमध्ये तब्बल ३८५४ जणांना तापसदृश आजार झाल्याचे महापालिकेच्या रुग्णालयांतील रुग्णसंख्येवरून समोर आले आहे. या रुग्णांमध्ये चिकुनगुनियासदृश आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. विशेषत वडाळागाव, जेलरोड, पंचवटीतील फुलेनगर, सातपूर, नवीन नाशिक या भागात या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे वैद्यकीय विभागाने या भागांमध्ये तपासणी मोहीम सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदिवासींचा एल्गार!

0
0

धनगर विरोधासाठी नाशिकमध्ये काढणार उत्तर महाराष्ट्राचा मोर्चा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) धनगर समाजाचा समावेश करण्याची मागणीविरोधात तसेच आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार एकवटले असून थेट सरकारचे निर्णय आणि होणाऱ्या अन्यायाविरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. धनगर समाजाला आदिवासींच्या सात टक्के आरक्षणात समाविष्ट करू नये, यासाठी आदिवासी समाजातर्फे नाशिकमध्ये राज्यस्तरीय मोर्चा काढला जाणार आहे.

राज्यातील आदिवासींच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहावर उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झाली. बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ, आमदार वैभव पिचड यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. भारती पवार, भास्कर गावित, अशोक टोंगारे, हिरामण खोसकर, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक देवीदास पाटील, अनुसूचित जमाती केंद्रीय समितीचे माजी सदस्य सुनील भुसारे, प्रदीप वाघ, राजेंद्र वागळे, राम चौरे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर खासदार चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर धनगर समाजाचे ठिकठिकाणी मोर्चे-मेळावे काढले जात आहे. त्यामुळे धनगर समाजाचा आदिवासींच्या आरक्षणात समावेश होतो की काय अशी भीती आदिवासी समाजाला वाटत आहे. त्यामुळेच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतल्याचे खासदार चव्हाण यांनी यावेळी सांगितले. प्रत्येकाला त्याच्या मागण्यांचा अधिकार आहे. परंतु, आदिवासींना कायद्याने सात टक्के आरक्षण मिळाले आहे. यात कोणत्याही समाजाचा समावेश करू नये, सर्वोच्च न्यायालयाने बोगस आदिवासींवर कारवाई करून त्यांच्या जागेवर मूळ आदिवासींच्या नियुक्तीचे आदेश दिले आहे. त्यानुसार कारवाईच्या मागणीसाठी आदिवासी एकत्रित येत असून, नाशिकमध्ये आदिवासींच्या मागण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या दोन-दिवसात या मोर्चाची तारीख निश्चित होईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.

आदिवासी समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचे सांगत आमदार वैभव पिचड यांनी गेल्या साडेचार वर्षांत आदिवासी आमदारांच्या समितीची बैठक झालेली नसल्याचे सांगितले. धनगर समाजालाही त्यांच्या मागण्यांप्रमाणे आरक्षण देण्याचे आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे आदिवासींवर अन्याय केला जात आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांचा प्रश्न आणि अन्य प्रश्नांवरही शासन व प्रशासनाची उदासिनता दिसून येत असल्याने समाजाने एकत्रित येण्याचा निर्धार केला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

धनगर समाज व आदिवासींमध्ये धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रचंड तफावत आहे. त्यामुळे मूळ आदिवासींमध्ये इतर कोणत्याही समाजाचा समावेश करण्यास आदिवासींचा विरोध असल्याचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. आदिवासींचे सर्वेक्षण रद्द करणे, आदिवासी वसतिगृहांमधील डीबीटी योजना रद्द करणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे शासकीय सेवेतील बोगस आदिवासींवर कारवाई करून त्यांच्या जागेवर मूळ आदिवासींना नोकरी देण्याच्या मागणीसाठी संघर्ष करण्याचा निर्णय बैठकीत झाला.

बैठकीचा बार फुसका

आदिवासींच्या हक्कप्रश्नी बोलावलेली बैठक राज्यस्तरीय असून त्यात राज्यभरातील आदिवासी आमदार व खासदार येणार असल्याचा दावा चव्हाण यांनी केला होता. मात्र, चव्हाण यांचा दावा फुसका निघाला. बैठकीला जिल्ह्यातील चारपैकी एकच आदिवासी आमदार हजर होता. बैठकीकडे आमदारांनीच पाठ फिरवल्याचे दिसून आले.

स्वपक्षावरच दबावाचा प्रयत्न

भाजपकडून २०१९ मध्ये चव्हाण यांना उमेदवारी धोक्यात असल्याची चचा आहे. त्यामुळे चव्हाण आदिवासींचे नेते होऊन स्वपक्षावरच दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा भाजपसह अन्य पक्षांमध्ये सुरू आहे. त्यामुळे चव्हाण यांना अचानक साडेचार वर्षात आदिवासींची आठवण कशी आली, असा प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार लगावत आहेत. त्यामुळे चव्हाणांचे नियोजित शक्तीप्रदर्शन अपयशी ठरल्याची चर्चा असून आता मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेतवननगरला दुचाकी चोर अटकेत

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

उपनगर पोलिसांनी दुचाकी चोरास अटक करून त्याच्याकडून चोरीची अॅक्टिव्हा ही दुचाकी जप्त केली आहे. कैलास कृष्णा आहिरे (१९, रा. जेतवननगर, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे.

वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते यांना या चोराबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकाचे प्रदीप ठाकूर यांना कळविले. त्यानंतर उपनिरीक्षक सतीश जगदाळे, महेंद्र जाधव, अमोल टिळेकर, धोंगडे आदींनी नेहरूनगरसमोरील जेतवननगर येथे कारवाई केली. तेथे एक संशयित चोरीची गाडी घेऊन फिरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेऊन चौकशी केली. कैलासने अॅक्टिव्हा गाडी (एमएच १५ एफडी ३११६) चोरल्याचे कबूल केले. आहिरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास काकड, डावले हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्रीपणाची व्यथा मांडणारे ‘डोंगरार्त’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रुदालीचे आयुष्य हे एक विस्तीर्ण पट असतो. राजस्थानात काही ठिकाणी आजही ही प्रथा सुरू आहे. माणूस मेल्यावर भाड्याने रडण्यासाठी रुदालीला बोलावले जाते. ती उर बडवून बडवून रडते, जणू काही तिच्याच कुणा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या रुदालीचे आयुष्य कसे असते, याची कहाणी म्हणजे डोंगरार्त नाटक होय.

राज्य नाट्य स्पर्धेत गुरुवारी झेप सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळातर्फे 'डोंगरार्त' हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाच्या सादरीकरणाबरोबरच राज्य नाट्य स्पर्धेचा समारोपही झाला. प. सा. नाट्यगृहात हा स्पर्धा सुरू होत्या.

रुदालीचे आयुष्य जगणाऱ्या चार बायकांची ही कथा आहे. मा, जलपा, सावित्री, मोरणी या चौघी एकाच घरात राहून स्वतंत्र आयुष्य जगत आहेत. एकमेकींशी केवळ बाईपणाच्या धाग्यात बांधल्या गेलेल्या या बायका आहेत. या घरातील तरुण मोरणीला या तिघींपैकी तिची आई कोण हे माहीत नसते. लग्नाचे फेरे संपण्याच्या आत विधवा झालेल्या मोरणीला घेऊन सावित्री घरी येते आणि या बायकांच्या नात्यात सुरुंगाचे स्फोट व्हायला सुरुवात होते. घरातील कर्त्या स्त्रीचे स्थान असलेल्या जलपाच्या अस्तित्त्वालाच आव्हान देऊ बघणाऱ्या मोरणीला सांभाळत असताना पूर्ण घराला बाईपणाची उब देणाऱ्या सावित्रीची दमछाक होत आहे. परिस्थितीच्या तडाख्यामुळे मौन झालेली मा, मोरणीची शिक्षणाची आस, जलपाच्या राठ वागण्यात दडलेली स्त्री या सगळ्यांना सांभाळत भूतकाळातील घटनांना उरात दाबत जगणारी सावित्री या कुटुंबातील खऱ्या अर्थाने वर्तमानात जगणारी स्त्री आहे. या सगळ्यांनाच ज्याच्या त्याचा डोंगर पार करून सुखाचा शोध घ्यायचा आहे. पण प्रत्येकीचा रस्ता वेगळा आहे. अशा आशयाचे नाटकाचे कथानक होते.

नाटकाची संकल्पना पल्लवी-अपर्णा यांची होती. लेखन अपर्णा क्षेमकल्याणी, दिग्दर्शन पल्लवी पटवर्धन, संगीत शुभम जोशी, संगीत संचलन अमोल काबरा, नेपथ्य श्याम लोंढे, प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित, वेशभूषा स्नेहल एकबोटे, रंगभूषा माणिक कानडे, रंगमंच सहाय्य विनय कुलकर्णी, संतोष इटनारे, मीनल भालेराव, नृत्य सादरीकरण सुप्रिया देवघरे, मुग्धा काळकर, नृत्य दिग्दर्शन सचिन शिंदे यांचे होते. या नाटकात हेमा जोशी, योगेश वाघ, प्राज्ञी मोराणकर, रेखा केतकर, नीलेश जोशी यांच्यासह कलाकारांनी भूमिका केल्या.

\Bराज्य नाट्य स्पर्धा \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निमामध्ये आज ‘जीएसटी आउटरिच’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे (निमा) शुक्रवारी (दि. ७) दुपारी ४ वाजता 'जीएसटी आउटरिच प्रोग्रॅम'चे आयोजन करण्यात आले आहे. सातपूर येथील निमा सेमिनार हॉल येथे हा कार्यक्रम होईल. यात जीएसटी विभागाचे अधिकारी उद्योजकांशी संवाद साधणार आहे.

जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, उपायुक्त यांची उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमातून उद्योजकांना जुना व्हॅट कायदा, व्हॅट स्पेसिफिक जे १ आणि जे २ मॅटर्स, व्हॅटडिपॉसिट्स रिफंड्स तसेच जीएसटी संबंधातील अडचणी असल्यास त्या अगोदर कळवल्यास परिणामकारक रितीने त्या सोडवण्यास मदत होईल, असेही निमातर्फे सांगण्यात आले.

उद्योजक, व्यावसायिक व व्यापाऱ्यांना आपल्या अडचणी, सूचना जीएसटी अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. जीएसटी अधिकारी उद्योगांकडून असलेल्या अपेक्षा मांडतील. उद्योजक, व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहून जीएसटी संदर्भातील आपल्या अडचणी, प्रश्न व शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष नितीन वागस्कर व शशिकांत जाधव, मानद सचिव किरण पाटील वसुधाकर देशमुख, खजिनदार कैलास आहेर, निमा कर व वित्त समितीचे अध्यक्ष उल्हास बोरसे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदविवेक बुद्धी ही जीवनाचा सारथी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माणूस हा बुद्धीने कमी तर भावनांनी जास्त काम करतो. कोणतेही काम करीत असताना सदविवेक बुद्धी जागृत असेल तर माणसाकडून चांगले कर्म होते. बुद्धी ठिकाणावर ठेवून काम केले तर माणसाची प्रगतीकडे वाटचाल होते, ती जर जागेवर नसेल तर आपोआप अधोगतीकडे वाटचाल होते. त्यामुळे बुद्धी ही जीवनाची सारथी असल्याचे प्रतिपादन श्रृतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले.

शंकराचार्य न्यास व शिवशक्ती ज्ञानपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. गंगापूररोडवरील शंकराचार्य न्यास संकुलात ही व्याख्यानमाला सुरू आहे. 'मृत्यू आणि पुनर्जन्माचे रहस्य' हा व्याख्यानमालेचा विषय असून ९ डिसेंबरपर्यंत ही व्याख्यानमाला सुरू रहाणार आहे. गुरुवारी व्याख्यानाचे चौथे पुष्प गुंफतांना स्वामीजी म्हणाले, की बुद्धी चांगली असेल तर तुमचे मन चांगले राहील आणि मन चांगले असेल तर इंद्रियांवर ताबा मिळवता येईल. तुम्ही इंद्रियांवर ताबा मिळवाल त्यावेळी हे जगण समृद्ध होईल, बुद्धी ही कुशल सारथी आहे. ती चांगली असेल तर तुम्ही निश्चित एक उच्च स्थानावर पोहचाल. प्रत्येकाची बुद्धी सारखी नसते; मात्र तिच्यावर संस्कार करणे आपल्या हातात असते. बुद्धीचा दुरुपयोग केला तर तुम्हाला क्षमा नाही. बुद्धी चांगली नसेल तर मानवाची वाटचाल अध:पतनाकडे होईल. माणूस कुकर्माकडे वळेल यालाच मृत्यू असे देखील म्हणता येईल. व्याख्यानमालेची सुरुवात न्यासाचे ट्रस्टी नरेंद्र जांभोटकर यांच्या हस्ते स्वामीजींच्या सत्काराने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ मोगल यांनी केले.

मनाला लगाम हवाच!

बुद्धीचा वापर कसे करतो यावर माणुष्याचे जीवन अवलंबून आहे. शरीर हा रथ तर इंद्रिय घोडे आहेत. त्याचे नियमन करण्यासाठी मनाचा लगाम पाहिजे. खाणे-पिणे याला जीवन म्हणत नाही. जंगली श्वापद सुद्धा आपल्या पिलावळांना जगवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यात विशेष काही नाही. काळाच्या ओघात हे घडत असते. मानवाला बुद्धी दिली आहे त्याचा वापर मानवाने चांगल्या पद्धतीने केला पाहिजे, असेही स्वामीजींनी सांगितले.

\Bलोगो : स्वामी स्वरुपानंद व्याख्यानमाला \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images