Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी अॅड. कासलीवाल

0
0

मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी अॅड. कासलीवाल

चांदवड : चांदवड मर्चंटस बँकेच्या चेअरमनपदी अॅड. नरेंद्र कासलीवाल, तर व्हाईस चेअरमनपदी सचिन खैरनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन जगन्नाथ राऊत व व्हाईस चेअरमन सुनील डुंगरवाल यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने दोन्ही पदे रिक्त होती. मंगळवारी बँकेच्या सभागृहात चांदवडच्या सहाय्यक निबंधक सविता शेळके यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी सर्व संचालकांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत दोघांची बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शालार्थ कृतीदल बरखास्त करा

0
0

मुख्याध्यापक संघाचे शिक्षण आयुक्तांना साकडे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यामध्ये शालार्थ आयडी देण्याचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. शालार्थ आयडीची रखडलेली प्रकरणे लवकर मार्गी लागणे गरजेचे असताना खास या कामी नेमण्यात आलेले शालार्थ कृतीदल पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत हे कृतीदलच बरखास्त करावे, असे साकडे मुख्याध्यापक संघाने राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना घातले आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाचे मार्गदर्शन घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्त सोळंकी यांनी दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

शालार्थ आयडीच्या प्रलंबित प्रकरणांना निपटारा लवकर व्हावा यासाठी सरकारने २८ फेब्रुवारी २०१७ रोजी शीघ्र कृतीदल समिती स्थापन केली. या आदेशानुसार १५ मार्च २०१८ पूर्वी शालार्थ आयडी संदर्भातील फाईल्सचा निपटारा गरजेचे होते. पण कृतीदल समितीमार्फत कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नसल्याची तक्रार मुख्याध्यापक संघाने केली. कृतीदल समिती सदस्यांची आतापर्यंत केवळ दोनच वेळा बैठक घेतली. मात्र, त्यातून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे कृतीदल समितीकडून अपेक्षित कार्य झालेले नाही. शालार्थच्या सर्व फाईलचा निपटारा ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत करणार असल्याची माहिती यावेळी आयुक्तांनी संघटनेच्या प्रतिनिधींना दिली.

दरम्यान, या विषयासंदर्भात काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत यावेळी माहिती देण्यात आली. यामध्ये 'ना हरकत प्रमाणपत्र' रद्द करण्यात आले, अनुशेष बदलाबाबत फेरनिर्णय करण्यात आले, मंत्रालयातून मान्यता घेण्यात आलेल्या ११४ उमेदवारांच्या प्राप्त यादीनुसार सरसकट शालार्थ आय. डी. मिळावा या संदर्भात संघाने मागणी केली. वाढीव पायभूत पदांवरील मान्यता प्राप्त शिक्षकांना १४ सप्टेंबर२०१४ च्या शासन निर्णयनुसार पायाभूत शिक्षकंच्या पदास मान्यता देण्यात आलेल्या आहे. त्यांना त्वरित शालार्थ आयडी मिळाला पाहिजे.

अधिकार उपसंचालकांकडे

नवीन वर्ष अर्थात १ जानेवारी २०१९ पासून शालार्थ आयडीचे संपूर्ण अधिकार शिक्षण उपसंचालकांना देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सोळंकी यांनी मुख्याध्यापक संघाच्या शिष्टमंडळास दिली. ३० डिसेंबर २०१८ पर्यंत सर्वांना शालार्थ आयडी न मिळाल्यास ५ जानेवारी २०१९ रोजी महाराष्ट्रातील सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालय समोर सर्व संघटना व सर्व शालार्थ आय. डी. धारक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, सुरेश बडगुजर, संजय देसले, पी. एस. पानपाटील, व्ही. डी. पाटील, प्रमोद गरुड, कैलास पाटील यांनी दिला आहे. यावेळी नाशिक विभागातून नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातून २५० शालार्थ आयडी धारक शिक्षक व संघटनाचे पदाधिकारी हजर होते. आयुक्तांना या मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेवारस वाहनांची माहिती द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण भागातील रस्त्यांवर, आजूबाजूला कितीतरी वाहने बेवारस अवस्थेत दिसत असतात. अशा वाहनांची माहिती नागरिकांनी द्यावी, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे. त्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांकांसह इमेल आयडीदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

रस्त्यांवर अनधिकृतपणे सोडून दिलेली वाहने, बेवारस वाहने हटविण्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांची दखल पोलिसांकडून घेतली जाणार आहे. त्यासाठी नागरिक cronasikrural@gmail.com या ई मेल आयडीवर किंवा ९९२३२९८८५६, ८६०५५२८४८८, ८३९०८२१९५२ या मोबाइल क्रमांकावर तक्रारी करू शकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा जणांना खान्देश रत्न पुरस्कार

0
0

शनिवारी पुरस्कारांचे वितरण

...

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक शहरात मागील वर्षापासून आयोजित करण्यात येत असलेल्या खान्देश महोत्सवात दिल्या जाणाऱ्या खान्देश रत्न पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक शहरात अनेक जण हे खान्देशातून स्थायिक झालेले आहेत. या खान्देशमधील सर्वांना एकत्र करण्याबरोबरच खान्देशी संस्कृतीची माहिती सर्वांना व्हावी, या हेतूने मागील वर्षापासून खान्देश महोत्सव सुरू करण्यात आला आहे. यंदाही हा महोत्सव २० ते २३ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या महोत्सवात खान्देशातून नाशिकमध्ये स्थायिक होऊन विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्यांना खान्देश रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यंदा १५ खान्देशरत्न निवडण्यात आले असल्याची माहिती आमदार हिरे यांनी दिली.

शनिवारी (दि. २२) या पुरस्कारांचे विरतण पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू कृष्णा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या पत्रकार परिषदेप्रसंगी महेश हिरे व महोत्सवाच्या संयोजिका रश्मी हिरे-बेंडाळे आदी उपस्थित होते.

..

खान्देश रत्नचे मानकरी

यंदाचे खान्देश रत्न पुरस्कारचे मानकरी राजेंद्र कलाल, विलास पाटील, सतीश सोनवणे, रेखा महाजन, प्रशांत पाटील, बाळासाहेब पाटील, प्रशांत कुलकर्णी, डी. एल. देवरे, अनिल जाधव, नागराज देवरे, शामदत्त विभांडीक, नितीन ठाकरे, गंगाराम सावळे, कौतिक जाधव, विवेक पाटे यांची निवड करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समिती बरखास्त करा

0
0

मालेगाव मनसेची मागणी

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मुंगसे येथील कांदा व्यापारी शिवाजी सूर्यवंशी याने शेतकऱ्यांचे पैसे थकवले असताना येथील बाजार समितीचे संचालक मंडळ, व्यापारी व जिल्हा निबंधक शेतकऱ्यांचे शोषण करीत आहेत. व्यापाऱ्यांकडून वसूल करण्यात आलेले पैसे वाटप करताना शेतकऱ्यांवर निम्मेच पैसे घ्या आणि विषय संपवा, असा दबाव संचालक मंडळ आणत आहे. त्यामुळे मालेगाव कृउबाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक बसवावा, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष राकेश भामरे यांनी केली आहे.

सूर्यवंशी यांच्याकडे शेतकऱ्याचे सुमारे २ कोटी रुपये थकीत आहेत. याप्रकरणी गेल्या आठवड्याभरात शेतकऱ्यांनी बाजार समिती सचिवांना डांबणे, सहकार उपनिबंधक यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळला नाही. त्यामुळे याप्रकरणी मनसेने आवाज उठविला आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष भामरे यांनी थेट बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव एका हॉटेलमध्ये पैसे वाटप करीत असल्याचा व्हिडियो दाखवीत धक्कदायक प्रकार समोर आणला आहे. पत्रकार परिषदेत उपजिल्हा अध्यक्ष श्रीराम सोनवणे, मुकेश कावळे, उपशहर अध्यक्ष किशोर गवळी, गणेश पवार, मधुकर वडगे, प्रवीण सोनवणे, भरत सूर्यवंशी, सुनील मोरे , डॉ.रईस सिद्दीकी व मनविसेचे चेतेश आसेरी आदींसह मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

व्हिडियो क्लिपने खळबळ

भामरे यांनी बाजार समितीचे सभापती एका हॉटेलमध्ये शेतकऱ्यांना बोलावून पैसे वाटप करीत असल्याची व्हिडियो क्लिप दाखविली. शेतकऱ्यांना शिवारात अथवा एखाद्या हॉटेलवर बोलावून घेत तोडीपाणी केली जात आहे. लाख रुपये थकीत असतील तर ५० हजारातच विषय संपविण्याचा दबाव टाकला जात असल्याचे भामरे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीच्या कामांनासरकारी विभागांचाच नकार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आगामी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूकविषयक कामे करण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने सरकारी, निमसरकारी, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि बँकांकडून कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, राज्य सरकारच्या १६ विभागांनी कर्मचाऱ्यांची माहिती देण्यास नकार दिला आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संबंधित विभागांना 'कारणे दाखवा' नोटिसा बजाविल्या आहेत.

पुणे शहरातील आठ, पिंपरी-चिंचवडमधील तीन आणि जिल्ह्यातील दहा अशा २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीविषयक कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका कराव्या लागणार आहेत. त्यासाठी निवडणूक शाखेने विविध सरकारी, निमसरकारी कार्यालये, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, बँका आदी कार्यालयांना कर्मचाऱ्यांची माहिती देण्यास सांगितले आहे. त्यानुसार सुमारे पाचशे कार्यालयांकडून माहिती मिळाली आहे. अनुदानित ४१५ शाळांमधील तीन हजार २५० कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक शाखेकडे आली आहे. मात्र, राज्य सरकारच्या १६ सोळा विभागांनी या कामासाठी कर्मचाऱ्यांची माहिती देण्यास नकार दिला असल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले आहे.

माहिती न देणाऱ्या विभागांमध्ये महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय सचिव कार्यालय, सहकारी संस्थांचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग एक, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प क्रमांक एक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, बी. जे. मेडिकल कॉलेज अधिष्ठाता कार्यालय, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पणन संचालक, भारत पेट्रोलियम, महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, यशदा, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था आणि अप्पर कामगार आयुक्त आदी विभागांचा समावेश आहे.

निवडणूकविषयक कामांसाठी कर्मचाऱ्यांची माहिती देणे बंधनकारक आहे. ही माहिती न देणाऱ्या कार्यालयांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या असल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कथार्सिस’ देणार वाचन चळवळीला बळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरच्या पोस्ट वाचण्याचा ट्रेंड तरुणाईत कमालीचा हिट आहे. या तरुणाईला आता साहित्याकडे वळविण्यासाठी शहरात चळवळ उभी केली जात आहे. नाशिकच्या तरुणांची संख्या साहित्यक्षेत्रात अधिक वाढावी, यासाठी 'कथार्सिस' या ग्रुपने पुढाकार घेतला आहे. त्यांच्याकडून शहरात पुस्तक अभिवाचनाचे उपक्रम घेतले जाणार आहेत.

साहित्याची आवड असलेल्या पाच तरुणांनी 'कथार्सिस' ग्रुप तयार केला असून, शहरातील इतरही तरुणांना साहित्य क्षेत्रास जोडण्यासाठी 'पुस्तक अभिवाचन' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. इंग्रजी साहित्य विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या नीरज करंजीकरच्या संकल्पनेतून हा ग्रुप सुरू झाला असून, अभिनेत्री नूपुर सावजी, संगीतशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेणारी आस्था मांदळे, आर्किटेक्ट अद्वैत मोरे आणि शेफ अक्षय भुवनेश्वर हे तरुण नीरजला जोडले आहेत. मुंबईत होत असलेल्या स्टोरी टेलिंग या उपक्रमापासून प्रेरित होत, नाशिकमध्ये पुस्तक अभिवाचन सुरू करण्याचा उपक्रम ही तरुण मंडळी राबविणार आहेत. त्यासाठी त्यांची बैठक नुकतीच झाली असून, डिसेंबरच्या अखेरीस या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. सध्या या उपक्रमाची माहिती इन्स्टाग्रामद्वारे पसरवली जात असून, अवघ्या काही दिवसांत या ग्रुपला ३८३ फॉलोअर्स मिळाले आहेत. तरुणांमध्ये या नव्या उपक्रमाची जोरदार चर्चा रंगत असून, अनेकांनी उपक्रमाशी जोडले जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

\Bकाय आहे 'कथार्सिस'?\B

ग्रीक तत्त्वज्ञ अॅरिस्टॉटल यांच्या पोएटिक्स नावाच्या ग्रंथात 'कथार्सिस' या शब्दाचा वापर झाला असून, हा मूळ ग्रीक भाषेतील शब्द आहे. या शब्दाचा अर्थ असा की, कलेच्या माध्यमातून भावना व्यक्त करणे. पुस्तकांच्या अभिवाचनातून पुस्तकाच्या आणि वाचकाच्या भावना व्यक्त करणे, या आशयाने ग्रुपचे नाव 'कथार्सिस' ठेवण्यात आले आहे.

\Bअसा असेल उपक्रम

\Bपुस्तक अभिवाचनाचे उपक्रम कॉलेजरोडवरील 'द हॅपी फिस्ट' या रेस्टॉरंटमध्ये होणार असून, याअंतर्गत तरुणांना पुस्तके देण्यात येणार आहेत. एक महिन्यानंतर देण्यात आलेल्या पुस्तकातील कथेचा अर्थ सांगत, ते पुस्तक वाचण्यासाठी इतरांना प्रेरित करायचे आहे. या माध्यमातून तरुणांना पुस्तक वाचनासाठी प्रोत्साहीत करण्यात येणार असून, वाचक आणि लेखकाच्या भावना व्यक्त केल्या जाणार आहेत. दर महिन्यातील एका शनिवारी किंवा रविवारी हा उपक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव घरपट्टीबाबत दिलासा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने बजावलेल्या घरपट्टीच्या नोटिसांबाबत नागरिकांमध्ये अनेक तक्रारी असून येत्या दोन महिन्यात सर्व तक्रारी निकाली काढल्या जातील अशी ग्वाही नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

शहरातील ६२ हजार मिळकतींना नव्याने घरपट्टी लागू करण्याबाबतची प्रक्रिया खासगी कंत्राटदाराकडून केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे राबविण्यात आली. हे सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीचे झाल्याने अनेक मिळकतदारांना घरे घेण्याच्या आधीपासून घरपट्टी आकारली गेली. त्याचप्रमाणे अनेक फ्लॅटधारकांच्या मिळकतीवर चुकीची नावे लावली गेली असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. ६२ हजारपैकी ४२ हजार नागरिकांना याबाबत विशेष नोटिसा देण्यात आल्या. त्यापैकी १० हजार नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत. या हरकतींची शहनिशा करून त्यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल. त्याचप्रमाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ज्या घरपट्टीबाबत शंका येईल, अशा मिळकतधारकांच्या घरपट्ट्यांबाबत महापालिकेचे अधिकारी 'सुमोटो' निर्णय घेऊन निकालात काढतील. अनेक जुन्या वाड्यांना नोटिसा गेल्या आहेत. त्याचप्रमाणे लाकडी खांब असलेल्या घरांना आरसीसी काम केल्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ज्या फ्लॅटधारकांनी २०१६ मध्ये घरे घेतली, अशांना २०१२ पासून घरपट्टी आकारली गेली आहे. काही मिळकतधारकांना फ्लॅटच्या किमतीपेक्षा निम्म्या किमतीच्या घरपट्ट्या प्राप्त झाल्या आहेत. नाशिक महापालिकेने आकारलेल्या घरपट्ट्या भरण्यासाठी पुन्हा कर्ज काढावे लागेल अशी चर्चा मिळकत धारकांमध्ये आहे. ज्या नागरिकांना अवाजवी घरपट्ट्या आकारल्या आहेत, त्या पुराव्याच्या आधारे तातडीने कमी केल्या जातील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीवर कारवाई

नाशिक महापालिकेमध्ये चुकीचे सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीवर काही कारवाई करता येईल का, याबाबतदेखील विचार केला जात आहे. या कंपनीचा करार तपासून कारवाई करणार असल्याचे सूतोवाच आयुक्त गमे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चारा लागवडीला अल्प प्रतिसाद

0
0

गाळपेरा क्षेत्र : ३७५० एकर

चारा लागवडीसाठी अपेक्षित लाभार्थी : १२००

आतापर्यंत लाभार्थींचे आलेले अर्ज : १२०

एका लाभार्थ्याला मिळणारे क्षेत्र : तीन एकर

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धरणातील पाणीसाठा संपुष्टात येताना उपलब्ध होणाऱ्या क्षेत्रावर चारा लागवड करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले असले तरी जिल्ह्यात अद्याप त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. जिल्ह्यातील अशा ३ हजार ७५० एकर गाळपेरा क्षेत्रावर १२०० हून अधिक लाभार्थी चारा लागवड करू शकणार असले तरी जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत १२० इच्छुक लाभार्थींचेच अर्ज प्राप्त झाले आहेत. चारा लागवड करू इच्छिणाऱ्यांनी २० डिसेंबरपर्यंत तालुका पाळवरील पंचायत समिती कार्यालये तसेच, पशुधन विकास कार्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याची टंचाई भासू नये, याकरिता धरणांच्या गाळपेरा क्षेत्रावर चारा लागवड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जिल्ह्यात अशा १५०० हेक्टरवर म्हणजेच ३ हजार ७५० एकरवर चारा लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बाजरी, मका आणि घास या प्रकारच्या चाऱ्याची लागवड करण्यासाठी प्रशासनाकडून मोफत बियाणे पुरविण्यात येणार आहे. एका शेतकऱ्याला तीन एकरपर्यंतचे क्षेत्र चारा लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २० डिसेंबरपासून चारा लागवडीला सुरुवात करावयाची असली तरी जिल्ह्यात प्रशासनाच्या या आवाहनाला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. आतापर्यंत १२० लाभार्थींनी चारा लागवडीची तयारी दर्शविल्याची बाब मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावलेल्या आढावा बैठकीतून स्पष्ट झाली. जिल्ह्यात किमान १२०० लाभार्थींना चारा लागवड करणे जिल्हा प्रशासनाला अभिप्रेत आहे. गाळपेरा क्षेत्रावर पिकविलेल्या चाऱ्याची संबंधित लाभार्थीं विक्री करू शकणार आहेत. त्याचा दर ठरविण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असणार आहे.

...

चारा लागवड बंधनकारक

गाळपेऱ्याचे क्षेत्र सरकारच्या मालकीचे असले तरी अनेक शेतकरी वर्षानुवर्षे अशा गाळपेरा क्षेत्रावर भाजीपाला पिकवितात. आताही जिल्ह्यातील अनेक जलाशयांच्या कोरड्या क्षेत्रावर भाजीपाल्याची लागवड करण्यात आल्याचे पहावयास मिळते. हा भाजीपाला निघाल्यानंतर या क्षेत्रावरही संबंधित शेतकऱ्यांना चारा लागवडच करावी लागेल, असे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारा घसरला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या पाच दिवसांपासून पूर्वेकडून उत्तरेकडे वाहणारे वारे ताशी ६ नॉट्सने वाहत असून, त्याचा परिणाम शहरातील वातावरणावर कायम आहे. शहरातील थंडीचा पारा १ अंश सेल्सिअसने घरसला असून, मंगळवारी किमान ९.०५, तर कमाल २५.०८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे शहरात दिवसभर गारठा जाणवला. मंगळवारी शहरात आर्द्रतेचे प्रमाण पहाटे ६५, तर सायंकाळी फक्त ३५ टक्के इतके होते. शुक्रवारपासून शहरातील तापमानाचा पारा घसरत असून, शुक्रवारी किमान तापमान १०.०४ अंश सेल्सिअस इतके होते. हे तापमान सोमवरपर्यंत कायम राहिले, तर मंगळवारी १ अंशाने पारा घसरला. समुद्रातील वादळी वाऱ्यांमध्ये झालेल्या बदलांमुळे, वाऱ्यांचा वेग वाढला असून, येत्या काही दिवसांत थंडीचा पारा आणखी घसरणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेसमध्ये वारसभरतीचा मार्ग मोकळा

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोडच्या आयएसपी आणि नोट प्रेसमधील मृत कामगारांच्या वारसांचा मेळावा आयएसपी मजदूर संघ कार्यालयात झाला. भरती प्रक्रियेला विलंब होत असल्याने व्हॅकेन्सी बेसवर वारसांना कामावर घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार नोटप्रेसमध्ये २० ते २५ आणि आयएसपीमध्ये ५० ते ६० वारस लवकरच कामावर येणार आहेत. याआधीच २१ वारस कामावर रुजू झाल्याची माहिती संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली.

गोडसे म्हणाले की, दोन्ही प्रेसमधील मृतांच्या नातेवाईकांना भरती करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. मृत कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्यासाठी पाच टक्के प्रमाण दिलेले असून, ते २५ टक्के करण्याचा प्रस्ताव आम्ही प्रशासनासमोर मांडला आहे. दोन्ही प्रेसमधील सेवानिवृत्त ६३ कामगारांना पुन्हा सेवेत घेतल्याने मृत कामगारांच्या नातेवाईकांनी आम्हाला का डावलले म्हणून प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला होता. मात्र, पासपोर्ट तपासणीसाठी सुमारे पंचवीस वर्षांचा अनुभव असणारे कामगार हवे आहेत. या मुद्द्यावर प्रेस प्रशासनाने कुठलीही जाहिरात न काढता सोयीने सेवानिवृत्त कर्मचारी सेवेत सामावून घेतले आहेत.

जुंद्रे यांनी सांगितले की, वारसांना सेवेत घेण्याची संधी नव्हती. मजदूर संघाने केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करून पाच टक्के भरतीमध्ये मृतांच्या वारसांना संधी देण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने ती मान्य केल्याने भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

भरतीप्रक्रियाही राबविणार

प्रेसमध्ये किती मनुष्यबळ कमी आहे, याबाबत महामंडळाचे अधिकारी प्रेसला भेट देऊन व्यवस्थापनाशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर भरती प्रक्रिया सुरू करण्याचे ठरले आहे. आयडीए पे स्केल महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रेसच्या आधुनिकीकरणाची मागणी व्यवस्थापनाने मान्य केली असून, लवकरच नवीन मशिन आणि जादा इंटॅग्लिओ मशीनही बसविण्यात येईल. जुन्या मशिनचे ओव्हरहॉलिंग केले जाणार आहे. पीबीएस मशीनदेखील आणले जाईल. भारतातील नामवंत रुग्णालयांत प्रेस कामगार व कुटुंबाला उपचार करून घेण्यासाठी सरकारी विमा कंपन्यांकडून विमा पालिसी घेण्यात येणार आहे. यावेळी मृत कामगारांच्या १७५ वारसांची नोंद करण्यात आली. मेळाव्याला उपाध्यक्ष सुनील आहिरे, दिनकर खर्जुल आदींसह कामगार प्रमुख उपस्थित होते.

मजदूर संघाच्या प्रयत्नामुळे या आधी २१ वारसांना कामावर घेण्यात आले आहे. आता सुमारे ८० वारसदारांना कामावर घेतले जाणार आहे. हा जीवनातील सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे. खासदार हेमंत गोडसे यांचे सहकार्य लाभले. कामगारांच्यावतीने त्यांचे आभार.

- जगदीश गोडसे, सरचिटणीस, प्रेस मजदूर संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार रुग्णालये असुरक्षितच!

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको/सातपूर

मुंबईमध्ये कामगार रुग्णालयात आग लागल्याने दहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने शहरातील कामगार रुग्णालयांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुढे आला आहे. सातपूर आणि अंबड येथे कामगार रुग्णालये आहेत. या दोन्ही ठिकाणी अग्निसुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना नसल्याची बाब उघडकीस आली आहे. मुंबईच्या घटनेनंतर तरी या रुग्णालयांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना केली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिकमध्ये सातपूर आणि अंबड येथे औद्योगिक वसाहत आहे. तर, सिन्नर येथे माळेगाव, मुसळगाव येथे औद्योगिक वसाहत आहे. नाशिक शहरालगत गोंदे, वाडीवऱ्हे येथेही खासगी उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. दिंडोरी तालुक्यातही औद्योगिक वसाहत आहे. या सर्व औद्योगिक वसाहतींत काम करणाऱ्या लाखो कामगारांसाठी अवघी दोनच रुग्णालये नाशिकमध्ये आहेत. त्यात सातपूर आणि अंबड येथील रुग्णालयाचा समावेश आहे. सातपूर येथे १०० बेडचे रुग्णालय आहे. मात्र या ठिकाणी अग्नी सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना नाहीत. यासंदर्भात प्रशासनाला विचारले असता निधी उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. तर, अंबड येथील रुग्णालयात साधे सिलेंडरही उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. मुंबईमध्ये भीषण घटना घडल्यानंतर तरी या दोन्ही रुग्णालयात अग्नी सुरक्षा उपाययोजना व्हाव्यात, अशी कामगारांची मागणी आहे.

मटा भूमिका

कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांप्रमाणेच त्यांच्यासाठी असलेली रुग्णालयेही दशकानुदशके सलाइनवर आहेत. डॉक्टर, कर्मचाऱ्यांबरोबरच आवश्यक सामग्रीची टंचाई त्यांच्या पाचवीलाच पूजलेली असते. अस्वच्छतेसह इतर मूलभूत सुविधांचीही या रुग्णालयांत नेहमीच बोंब असते. आता मुंबईतील कामगार रुग्णालयातील अग्नितांडवामुळे अग्निसुरक्षेचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. कुठेतरी काही अनुचित प्रकार घडले की मग सरकारी यंत्रणेसह साऱ्यांनाच या रुग्णालयांची आठवण होते. मग तात्पुरते उपाय वा मलमपट्टीचा खेळ दाखवून रुग्णालये पुन्हा वाऱ्यावर सोडली जातात. खरेतर कामगारांच्या आरोग्याचा गांभीर्याने विचार करुन या रुग्णालयांना आवश्यक ती मदत पुरवत सुसज्ज करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर महाराष्ट्र काँग्रेसची उद्यापासून बैठक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नुकत्याच हाती आलेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर काँग्रेसचा उत्साह वाढला असून, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी उद्यापासून शहरात उत्तर महाराष्ट्र काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक होत आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आ. चेल्ला वामसी चांद रेड्डी यांची या बैठकीसाठी प्रमुख उपस्थित राहणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे व शहराध्यक्ष शरद आहेर यांनी दिली.

या दोन (२० आणि २१ डिसेंबर) दिवशी होणाऱ्या बैठकीस प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी आ. के. सी. पाडवी, सहप्रभारी डी. जी. पाटील, आ. निर्मला गावित, आ. सुधीर तांबे, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, माजी मंत्री शोभा बच्छाव, प्रताप वाघ, शिरीषकुमार कोतवाल, अनिल आहेर, नानासाहेब बोरस्ते, काशिनाथ बहिरम, शंकर अहिरे, डॉ. तुषार शेवाळे तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्व आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रांतिक सदस्य, तालुकाध्यक्ष, फ्रंटल प्रमुख, लोकप्रतिनिधी, सेल अध्यक्ष व नेते उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत जिल्हानिहाय आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात येणार आहे. बूथ कमिट्या, जनसंपर्क अभियान, पक्षाच्या वतीने आयोजित प्रशिक्षण शिबिरे व वेगवेगळे कार्यक्रम याबाबत आढावा घेण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाची रणनीती या बैठकीत आखण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी दिली. दि. २१ रोजी युवक काँग्रेस व महिला काँग्रेसची बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारची भूमिका पूर्वग्रहदूषित

0
0

काकाणी ग्रंथालय सप्ताहात दिप्ती राऊत यांचे मत

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शेतकरी आत्महत्याबद्दल गैरसमज असल्यामुळे समाज आणि सरकारची या प्रश्नांकडे पाहण्याची भूमिका पूर्वग्रहदूषित आहे. सरकारची भूमिका वास्तववादी व संवेदनशील असल्यास निश्चितच शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सकारात्मक बदल घडू शकेल असे, प्रतिपादन पत्रकार लेखिका दीप्ती राऊत यांनी केले.

येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमालेत 'कोरडी शेतं, ओले डोळे; व्यथा शेतकरी विधवांच्या' या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी त्या बोलत होत्या. राऊत यांनी व्याख्यानात महाराष्ट्रातील विविध भागांतील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना प्रत्यक्ष भेटून पाहिलेली विदारक वस्तुस्थिती श्रोत्यांसमोर मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथमित्र अजय शाह होते.

राऊत म्हणाल्या, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांकरिता शासनाने निश्चित धोरण आखले पाहिजे. या विधवांना सरकार व समाजाकडून पाठबळ मिळाल्यास त्या हिमतीने समस्यांचा सामना करीत कुटुंबाचा उद्धार करतील. बहुसंख्य शेतकरी महिलांना नवऱ्याच्या आर्थिक व्यवहारांची अजिबात माहिती नसते. किती कर्ज आहे, कुणाकडून घेतले आहे, काय तारण ठेवले आहे, सातबारावर कुणाचे नाव आहे या बाबतीत त्या अनभिज्ञ असतात. कुटुंबांमध्ये परस्पर संवाद असला आणि महिलांना आर्थिक व्यवहाराची जाण असली तर अनेक शेतकरी आत्महत्या टळू शकतील असे मत त्यांनी व्यक्त केले.

समाज आणि सरकारकडून थोडेसे जरी पाठबळ मिळाले तरी शेतकरी विधवा आपल्या कुटुंबाला समस्यांच्या गर्तेतून बाहेर काढू शकतात असे अनेक शेतकरी विधवांची उदाहरणे देऊन त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात शाह यांनी समाजातील संवेदनशीलता कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून शेतकरी विधवांच्या समस्यांवर व्याख्यान आयोजित करण्यामागची भूमिका विशद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ जवानाचीआत्महत्याच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डांगसौदाणे येथील जवान विजय बापू सोनवणे याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन विद्या रत्नपारखी यांनी त्यास दुजोरा दिला आहे. ड्युटीवर असताना आत्महत्या केल्याने संरक्षण विभागाकडूनही त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. म्हणूनच या संदर्भात अधिक माहिती देण्यात येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

आता कोर्ट ऑफ इनक्वायरी होणार... २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाच घेताना एकास अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मंदिरासमोरील दगड, मातीचे ढिग हटवून तेथे स्वच्छता करून देण्याकरिता ६०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महापालिका विभागीय कार्यालयातील शेड मास्तर (मिस्तरी) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. धनंजय लक्ष्मण थोरभिसे असे त्याचे नाव आहे.

नाशिकरोड येथील स्वामी लक्ष्मीनंद महाराज मंदिरासमोर गेल्या काही दिवसांपासून दगड आणि मातीचे ढिग साचले होते. हे ढिग हटवून येथे स्वच्छता केली जावी, यासाठी तक्रारदाराने महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयामध्ये अर्ज केला होता. धनंजय यांनी स्वच्छता करून देण्याच्या मोबदल्यात ७०० रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली. तडजोडीअंती ६०० रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत माहिती दिली. मंगळवारी (दि.१८) सायंकाळी महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शेड कार्यालयात तक्रारदाराकडून ६०० रुपयांची लाच घेताना धनंजय यास पकडण्यात आले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी जोड

0
0

गीत कार्यक्रम: गाजलेल्या हिंदी मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सादरकर्ते मुकुंद फणसळकर

स्थळ : कालिदास कलामंदिर, शालीमार

वेळ : रात्री ९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानात रंगली प्रश्नमंजूषा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रंथालय सप्ताहात मंगळवारी प्रश्नमंजुषा कार्यक्रम रंगला. विभावरी शिरूरकरांचे खरे नाव काय? पहिल्या मराठी वर्तमानपत्राचे नाव काय? २०१७ चे साहित्याचे नोबेल पारितोषिक कुणाला मिळाले? यासह जनरल नॉलेजची अनेक प्रश्न विचारण्यात आली. देवदत्त जोशी, गिरीश नातू व हेमंत देवरे यांनी प्रश्न विचारले. तसेच जे योग्य उत्तर देतील त्यांना पेन बक्षिस देण्यात येत होते. विनोद राठोड, हेमंत चोपडे, प्रा. कृष्णा शहाणे, अशोक घैसास यांसह अनेकांनी उत्तरे दिली.

प्रश्नमंजुषा कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण बघावयास मिळाले. मध्येच उठून कुणीही उत्तर देत होते. प्रत्येकाला पेन मिळविण्याची घाई झालेली असल्याने कुणीही उत्तर सांगून मोकळे होत होते. मध्येच पेन संपल्याने ते आणण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू झाले. काही प्रश्न चुकीचे तर काही प्रश्नांना ऑप्शनमध्ये चुकीची उत्तरे देण्यात आली होती. एकूणच अत्यंत गोंधळाच्या वातावरणात प्रश्नमंजुषा कार्यक्रम पार पडला.

---

आजचा कार्यक्रम

वक्ते : डॉ. महेश करंदीकर

विषय : सुखाचा शोध : मानवी मेंदूत दडलंय काय?

स्थळ : मु. शं. औरंगाबादकर सभागृह, टिळकपथ

वेळ : सायंकाळी ६.३० वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंधश्रद्धा मांडणारे ‘बळी’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जगभरात आधुनिकता आणि तंत्रज्ञानाच्या गोष्टी सुरू असताना महाराष्ट्रातील काही खेड्यांमध्ये मात्र अंधश्रद्धेची पाळेमुळे आजही खोलवर गेलेली आढळतात. त्यामुळे कित्येक पिढ्यांचे नुकसान झालेले आहे, यापुढेही होणार आहे. परंतु, या अंधश्रद्धेचा निकाल लावायला कुणी तयार नाही, असा आशय असलेले नाटक सादर करण्यात आले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने आयोजित ६६ व्या नाट्यमहोत्सवातील प्राथमिक स्पर्धेत मंगळवारी ललित कला भवन, जळगाव, मेहरूण वसाहतच्या वतीने 'बळी' हे नाटक सादर करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात या स्पर्धा सुरू आहे. बळीची संहिता सत्य घटनेवर आधारित होती. यात अंधश्रद्धेविषयी जागरूकता आणि योगायोग या विषयाला केंद्रबिंदू धरून ही कथा मांडण्यात आली. पारंपरिक विचारसरणी आणि त्याचा आजच्या पिढीवर होणारा परिणाम आणि शिक्षणाची कमतरता यातून एका सामान्य कुटुंबाची होणारी ससेहोलपट या नाटकात दाखविण्यात आली.

नाटकाचे लेखन रूपाली गुंगे यांनी, तर दिग्दर्शन बापुराव गुंगे यांनी केले. रंगभूषा-वेशभूषा वंदना नेवे, पद्मजा घैसास यांची होती. नेपथ्य विजय सोनार, तर प्रकाशयोजना किशोर शिंदे यांची होती. संगीत हाफीज खान यांचे होते. नाटकात निशा पाटील, जगदीश नेवे, मानसी नेवे, निखिल शिंदे, रेषा गुंगे, रत्ना ठाकरे, नीलेश रायपूरकर, योगेश हिवरकर, भूषण निकम, आनंद जोशी यांसह कलाकारांनी भूमिका केल्या.

...

आजचे नाटक

डार्लिंग

कामगार कल्याण केंद्र, सिन्नर

स्थळ : प. सा. नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ६ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार दिवस माहितीपटांची मेजवानी

0
0

\Bअंकुर फिल्म फेस्टिव्हल उद्यापासून\B

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सामाजिक विषयांवर भाष्य करणारे आणि तळागाळातील समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या माहितीपटांनी परिपूर्ण असा अंकुर फिल्म फेस्टिव्हल उद्या (२०) पासून सुरू होत आहे. कुसुमाग्रज स्मारक, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड येथे चार दिवस रोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.

अभिव्यक्ति मीडिया फॉर डेव्हलपमेंट, नाशिक यांच्या वतीने या सातव्या अंकुर फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. फेस्टिव्हलचे औपचारिक उद्घाटन २० रोजी प्रसिद्ध माहितीपट निर्माते अंजली मोंटेरो आणि मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे के. पी. जयशंकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी त्यांचा प्रसिद्ध माहितीपट 'अ डेलिकेट विव' दाखवला जाणार आहे.

फेस्टिव्हलमध्ये दुसऱ्या दिवशी, २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते १.३० वाजेपर्यंत टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील प्राध्यापक फैझ उल्लाह हे 'चॅलेंजेस ऑफ फेक न्यूज' यावर मार्गदर्शन करणार असून, सोबत चर्चासत्र होणार आहे. याच दिवशी दुसऱ्या सत्रात संध्याकाळी ७ ते ९ यावेळेत प्रसिद्ध दिग्दर्शक कमल स्वरूप यांची 'पुष्कर पुराण' ही फिल्म दाखवली जाणार आहे. तसेच, त्यांच्याशी चर्चा करण्याची संधीही उपस्थितांना मिळणार आहे.

फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी, २२ डिसेंबर रोजी गोल्डन लोटस अॅवॉर्ड विजेते फिल्ममेकर कमल स्वरूप सकाळी १०.३० ते १.३० वाजेपर्यंत 'दिग्दर्शन' या विषयावर कार्यशाळा घेणार आहेत. याच दिवशी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत विक्रांत बदरखे यांच्या 'द ड्रेनेज' या फिल्मचे स्क्रीनिंग असून, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधीसुद्धा मिळणार आहे. याच दिवशी दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत पाणी फाउंडेशनमधील वैभव हिवासा हे तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी माध्यमांचा कसा प्रभावी वापर करता येईल या विषयावर संवाद साधणार आहेत.

फेस्टिव्हलच्या चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात १०.३० ते १ या वेळेत राष्ट्रीय पारितोषिक विजेते चित्रपट निर्माते प्रशांत नाईक हे 'फिल्म संकलन' अर्थात 'एडिटिंग' या विषयावर कार्यशाळा घेणार आहेत. संध्याकाळी ६ वाजेनंतर समारोपाच्या वेळी रांची (झारखंड) येथील राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते मेघनाथ कुमार यांची प्रसिद्ध फिल्म 'लोहा गरम है' दाखवली जाणार आहे. पत्रकार परिषदेस रणजीत गाडगीळ, रघुनाथ फडणीस, महेश जगताप आणि जितेंद्र पगारे यांची उपस्थिती होती.

...

विनामूल्य प्रवेश

फेस्टिव्हलमध्ये प्रत्येक दिवशी फिल्म्स डिव्हिजन मुंबई यांच्या सह्योगाने, तर आयोजक अभिव्यक्ति, नाशिक यांच्या सहकार्याने पुरस्कार विजेत्या फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत. हा फेस्टिव्हल सर्वांसाठी खुला असून, यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images