Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रचना ट्रस्ट विद्यार्थिनींना लैंगिक विषयांवर मार्गदर्शन

$
0
0

लैंगिक विषयांवर विद्यार्थ्यांनींना मार्गदर्शन

स्पंदन सामाजिक संस्थेतर्फे कार्यशाळा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्पंदन सामजिक संस्थेतर्फे रचना ट्रस्टच्या आश्रमशाळेत दोन दिवसीय लैंगिकता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. अनुपमा मराठे, मंजुषा व्यवहारे, नीलिमा निकम, मेघा मनोहर, रवींद्र वरखेडे, विशाल लोणारी, रुपाली शिंदे, वैशाली डुंबरे यांनी विद्यार्थिनींना लैंगिकतेशी संबंधित विषयावर मार्गदर्शन केले. गंगापूररोड येथील रचना ट्रस्टच्या सभागृहात ही दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली.

कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाच्या सत्रात इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींना योग्य आणि सकस आहाराबद्दल प्रा. नीलिमा निकम यांनी सांगितले. तर, कोवळ्या वयात फुलणाऱ्या प्रेम, मैत्री, आकर्षण यांची माहिती डॉ. अनुपमा मराठे यांनी दिली. सामाजिक कार्यकर्ते विशाल लोणारी यांनी लहान मुलांनी प्रलोभनांपासून दूर राहून आपले जीवन शालेय अभ्यासावर कसे केंद्रित करावे याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी मुलींशी गट्टी जमवत विविध खेळही घेण्यात आले. तर, आठवी ते दहावीच्या सत्रात संस्थेच्या मेघा मनोहर यांनी वयाच्या कुमारवस्थेत शारीरिक, मानसिक बदलांबद्दल माहिती दिली. डॉ. मंजुषा व्यवहारे यांनी मुलींना स्त्री-पुरुष प्रजननसंस्था, मासिक पाळीच्या काळात करण्याच्या स्वच्छतेविषयी शास्त्रीय मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवसाच्या सत्रात इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुलींना विविध रोल प्ले करून दाखवण्यात आले. त्यातून समाजात वावरताना सुरक्षा कशी करावी यावर भाष्य केले गेले. तसेच यावेळी डॉ. अनुपमा मराठे यांनी मासिक पाळीच्या काळातील मानसिक व शारीरिक समस्यांवरील प्रश्नांचे निरसन केले. तसेच आठवी ते दहावीच्या मुलींनीही चांगल्या वाईट स्पर्शज्ञान मेघा मनोहर आणि रवींद्र वरखेडे यांच्यातर्फे देण्यात आले. दोनही दिवसांच्या कार्यशाळेत विद्यार्थिनींनी त्यांच्या मनातील प्रश्नांना वाचा फोडली. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रचना ट्रस्टच्या पुष्पा जोशी, स्पंदन संस्थेचे श्रीरंग जाधव, गणेश शिंदे यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वस्त्रहरणाचा भाजपप्रयोग!

$
0
0

लोगो

नाशिकनामा

शिस्तबद्धता, सचोटी, पक्षनिष्ठा आणि साधनशूचितेच्या गप्पा मारून काँग्रेस संस्कृतीला दळभद्री ठरवत 'पार्टी विथ डिफरन्स'चा नारा देणाऱ्या भाजपनेच आता दळभद्रीपणाचा कळस गाठला आहे. नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात भाजपचेच नेते आपल्या मंत्र्यांसह वरिष्ठ नेते कसे भ्रष्ट आहेत, याचा पाढाच जनतेसमोर वाचत आहेत. सत्तेच्या नादात भाजपमधील वस्त्रहरणाचा हा प्रकार डोळ्यांदेखत सुरू असताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह त्यांच्या मातृसंस्थेने धृतराष्ट्राची स्वीकारलेली भूमिका सचोटी आणि साधनशूचितेच्या नाऱ्याला लाजवणारी आहे. त्यामुळे भाजपच्या साधनशूचितेचा नारा आता गळून पडला असून, 'दाल में कुछ काला है' असे म्हणण्याची वेळ आली आहे.

विनोद पाटील

vinod.patil@timesgroup.com

काँग्रेसच्या दळभद्री कारभाराला कंटाळलेल्या जनतेला नरेंद्र मोदींच्या रूपाने विकासाची आस लागली होती. त्यामुळे जनतेने दिल्ली ते गल्ली भाजपच्याच हाती सत्ता देण्याचा मूड बनवला. लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता देऊन जनतेने विकासाची स्वप्नेही पाहण्यास सुरुवात केली. केंद्राप्रमाणेच राज्यातही भाजपचे कमळ फुलले. काँग्रेसमुक्त देशाचा नारा देऊन भाजपच्या नेत्यांनी दिल्ली ते गल्ली कमळमय करण्यासाठीचा विडाच उचलला. राज्यात भाजपच्या नेत्यांनी महापालिका ते ग्रामपंचायतमध्ये कमळ फुलवण्यासाठी ज्या पद्धतीने कारभार सुरू केला, तो पाहून मतदारांवर आता पश्चात्तापाचीच वेळ आली आहे. ज्या लोकांमुळे काँग्रेसला बुरे दिन आले, त्याच नेत्यांना हाताशी धरून भाजपने आपले अच्छे दिन सुरू केले. सगळा प्रदेश कमळमय करण्याच्या नादात भाजपचा 'विकास' जनतेला दिसेनासा झाला. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात तर भाजपने आपल्या मित्रपक्षाचे पानिपत करत एकापाठोपाठ एक संस्था गिळंकृत करण्याचा जो सपाटा लावला आहे, तोच आता भाजपच्या अंगलट आला आहे. सगळ्या संस्था भाजपच्या ताब्यात आणण्याच्या नादात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नकोसे झालेले नेते भाजपने पावन करून घेतले; परंतु आता हेच नेते भाजपच्या नाकात दम आणत असून, अवघ्या चार वर्षांत भाजपला चिकटवलेली बिरुदे स्वत:च्या हाताने काढून घेत आहेत. नाशिकमध्ये दिनकर पाटील, मालेगावात सुनील गायकवाड, धुळ्यात अनिल गोटे आणि जळगावमध्ये एकनाथ खडसेंनी आपल्या पक्षाच्या कारभारावर बोट ठेवून आपल्याच नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना वाचा फोडत भाजपला आरसाच दाखवला आहे.

नाशिकमध्ये तर भाजपमध्ये सुरू असलेला 'तमाशा' बघून खऱ्या भाजपेयींवरच आता पश्चात्तापाची वेळ आली आहे. महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने केलेल्या तडजोडीचा फटका आता पक्षाला सहन करावा लागत असून, अन्य पक्षातून भाजपमध्ये येऊन पावन झालेल्या नेत्यांनीच भाजप कलंकित करून सोडला आहे. महापालिकेतल्या सत्तेसाठी भाजपने मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची आयात केली. त्यामुळे प्रथमच रामनगरीत मोदीलाटेमुळे कमळ फुलले. महापालिकेत निवडून आलेले ६६ पैकी ४८ नगरसेवक हे दुसऱ्या पक्षांचे आहेत. त्यामुळे साहजिकच मूळ भाजप बाजूला पडत पक्षाबाहेरून आलेल्यांना सत्तेची पदे देणे भाजपला भाग पडले; परंतु या नगरसेवकांना पक्षनिष्ठा, शिस्तबद्धता आणि सचोटी शिकवण्याचा विसरच पडला. याउलट या आयारामांमुळे भाजपच्या नावासमोर असलेले हे गोंडस शब्द कधीच गळून पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक महापालिकेच्या कारभारात तर विरोधकांना आरोप करण्यासाठी भाजप नेत्यांनी जागाच ठेवलेली नाही. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनाही पदाधिकारी जुमानत नसल्याचे चित्र आहे. पदाधिकाऱ्यांमधील भांडणे मिटवण्यासाठी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनाच पालिकेत यावे लागले होते. कोणी किती पैसे खाल्ले याचा पाढा भाजपचेच पदाधिकारी जगजाहीर सांगू लागले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढेंच्या रूपाने हक्काचा एक्का वापरला. मात्र, स्थानिक भाजप नेत्यांनी हा एक्काच खोटा ठरवला. मुंढेंचा अडेलतट्टूपणा आणि पदाधिकाऱ्यांना कमी लेखण्याच्या त्यांच्या कारभारामुळे त्यांनाही अल्पावधीतच नाशिकमधून काढता पाय घ्यावा लागला. त्यानंतर राधाकृष्ण गमेंच्या रूपाने समन्वय साधणारा आयुक्त पालिकेत आला; परंतु त्यांच्या सलामीलाच २१ कोटींचे टीडीआर प्रकरण भाजपच्या नेत्यांनी उकरून काढत आपल्याच नेत्यांवर बेछूट आरोप सुरू केले आहेत. सभागृह नेता दिनकर पाटील आणि स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्यातील भ्रष्टाचाराच्या आरोप- प्रत्यारोपांची भांडणे पाहून पक्षही हतबल झाला आहे. दिनकर पाटील यांनी थेट सभापतींवरच भ्रष्टाचाराचा आरोप करीत, चौकशीची मागणी केली. विशेष म्हणजे आपल्याच पक्षाच्या सभापतींविरोधात स्थायीतल्या भाजपच्या आठ जणांसह पंधरा सदस्यांना आंदोलन करावे लागले. त्यामुळे भाजपची इभ्रतच चव्हाट्यावर आली. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप तर महापालिकेत नेमके कोणाच्या सोबत असतात, हेच कळत नाही. आमदार सीमा हिरे आणि देवयानी फरांदे यांनी कारभारात लक्ष घालायला सुरुवात केली तर त्यांचीच प्रकरणे बाहेर काढून त्रास देण्याचा उपक्रम सुरू केला जातो. त्यामुळे कोणाचेच कोणावर नियंत्रण नसल्याने पदाधिकारी आणि नगरसेवकच सैरभैर झाले आहेत. आपणच निवडून दिलेल्या भाजपमधील नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्या ऐकण्याशिवाय आता नाशिककरांसमोर पर्यायच शिल्लक राहिलेला नाही. स्वत:ची झोळी भरण्यासाठी भाजपमध्ये सुरू असलेल्या लक्ष्मीदर्शनाच्या स्पर्धेत भाजप नेत्यांनी पक्षाच्या सर्व तत्त्वांना तिलांजली दिली आहे. नाशिकमध्ये पक्षातच 'रामायण', 'महाभारत' घडत असताना वरिष्ठ नेत्यांनी तोंडावर बोट ठेवल्याने नागरिकांचाही संभ्रम आणि संशय वाढला आहे.

मालेगावमध्ये तर एका आयुक्ताच्या बदलीवरून भाजप महानगरप्रमुखाने आपल्याच पक्षाचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री असलेले डॉ. सुभाष भामरे यांच्यावर ठेकेदाराशी हातमिळवणी करीत, अधिकारी नियुक्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपचे महानगरप्रमुख सुनील गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत, खासदार आणि मंत्री असलेल्या ज्येष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप करून राळ उठवून दिली. त्यांच्या या आरोपाने भाजपला शहरात तोंड दाखवायलाही जागा ठेवली नाही. पक्षाचा स्थानिक प्रमुखच आपल्या नेत्यावर पुरावे नसतानाही बेछूट आरोप करीत असताना पक्षश्रेष्ठींना त्यांच्या आरोपाची दखलही घ्यावीशी वाटली नाही. पक्षाचा प्रमुख थेट केंद्रीय मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्याची हिंमत करीत असतानाही वरिष्ठ नेते धृतराष्ट्राच्या भूमिकेत असल्याने जनतेचा संभ्रम वाढला आहे. मालेगावप्रमाणेच धुळ्यातील भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी तर मुख्यमंत्र्यांपासून, प्रदेशाध्यक्ष आणि भाजप मंत्र्यांवर आरोप करण्याची फॅक्टरीच उघडली आहे. महापालिका निवडणुकीत भाजप नेत्यांच्या कृष्णलीलांवर प्रकाश टाकतानाच भाजपची लक्तरे वेशीवर टांगली. पक्षाचे दोन मंत्री व आमदारांमधील आरोप- प्रत्यारोप बघून जनताच कंटाळली आहे. धुळ्यात पोलिसांची बैठक घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांवरच त्यांनी निवडणुकीसाठी पैसे जमवण्यासाठी मुख्यमंत्री पोलिसांना टिप्स देत असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली. जळगावमध्ये एकनाथ खडसे यांनी पक्षाला जेरीस आणून सोडले आहे. जळगावमध्ये स्थानिक भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या क्लिप व्हायरल होऊनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. नंदुरबारमध्ये आमदार विजयकुमार गावित यांनीच पक्षाला घाम फोडला आहे.

भाजपच्या नेत्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आरोप केले असते तर जनतेने त्याकडे दुर्लक्ष केले असते; परंतु भाजपमधीलच नेते आपल्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत असल्याने संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. आरोपकर्त्यांवर पक्षाकडूनही कारवाई होत नसल्याने जनताही संभ्रमित झाली आहे. खडसेवगळता उर्वरित नेते पक्षाने आयात केले आहेत; परंतु या आयात नेत्यांमुळे पक्षाची वाढ तर सोडा, पक्षाच्या नेत्यांना गल्लीत फिरणेही मुश्कील झाले आहे. नाशिकमधील तापामुळे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वादापासून लांब राहणेच पसंत केले आहे, तर धुळ्यात मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची, असा प्रश्न पक्षासकट मुख्यमंत्र्यांसमोर आहे. केवळ सत्ता टिकविण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी डोळ्यांवर बांधलेली पट्टी पाच राज्यांतील निकालानंतर तरी उघडायला हवी होती. मात्र, भाजपमधील अंतर्कलह दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र असून, आहे ती परिस्थिती पाहण्याशिवाय भाजप कार्यकर्त्यांसह जनतेपुढे कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपअंतर्गत सुरू झालेली भ्रष्टाचाराच्या आरोपांची स्पर्धा भाजपला घरघर लावणारी आहे. त्यामुळे संघाच्या धुरिणांना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना धृतराष्ट्राची भूमिका सोडून निदान शिस्तबद्धता, सचोटी, पक्षनिष्ठा आणि साधनशूचिता या गोंडस चार शब्दांच्या रखवालीसाठी तरी भूमिका घ्यावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: शिक्षण समितीवर भाजपचा झेंडा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तब्बल पावणे दोन वर्षानी मुहूर्त लागलेल्या महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती-उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे बहुमताच्या जोरावर सत्तारूढ भाजपने आपला झेंडा रोवला आहे. शिक्षण समितीच्या सभापतीपदी प्रा. सरिता सोनवणे तर उपसभापतीपदी प्रतिभा पवार विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे सभापतीपदाचे उमेदवार सुदाम डेमसे व उपसभापतीपदाचे उमेदवार संतोष गायकवाड यांना संख्याबळाअभावी पराभव पत्करावा लागला. ही निवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपचे प्रयत्न फसले असून, शिवसेनेने नगरचा बदला नाशिकमध्ये घेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्णन् बी. यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील महिला बालकल्याण समितीच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. समितीत भाजपकडे ५, शिवसेनेकडे ३ तर काँग्रेसकडे एक सदस्य होते. त्यामुळे भाजप उमेदवारांची निवड होईल हे निश्चित होते. सर्वप्रथम सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी भाजपकडून प्रा. सोनवणे तर शिवसेनेकडून सुदाम डेमसे निवडणूक रिंगणात होते. उमेदवारी अर्ज माघारीसाठी देण्यात आलेल्या १५ मिनिटांच्या मुदतीत दोन्हीपैकी एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने हात उंचावून मतदान प्रक्रिया राबविली गेली. सर्वप्रथम शिवसेनेचे डेमसे यांच्यासाठी मतदान घेण्यात आले. डेमसे यांना स्वत:सह समितीतील शिवसेनेचे संतोष गायकवाड व चंद्रकांत खाडे यांनी मतदान केले. तर कॉँग्रेसचे राहुल दिवे मात्र मतदान प्रसंगी अनुपस्थित राहिले. यानंतर प्रा. सोनवणे यांच्यासाठी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत स्वत: सोनवणे यांच्यासह दिनकर आढाव, वर्षा भालेराव, प्रतिभा पवार व स्वाती भामरे यांनी हात उंचावून मतदान केले. प्रा. सोनवणे यांना पाच तर डेमसे यांनी अवघी तीन मत मिळाल्याने दोन मतांच्या फरकाने भाजपच्या प्रा. सोनवणे यांना विजयी घोषित करण्यात आले. यानंतर झालेल्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत मात्र कॉँग्रेसचे दिवे उपस्थित झाले. यावेळेस शिवसेनेचे संख्याबळ मात्र वाढले. यावेळीही गायकवाड यांनी माघार न घेतल्याने हात उचांवून मतदान घेण्यात आले. भाजपच्या प्रतिभा पवार यांनी पाच तर शिवसेनेच्या संतोष गायकवाड यांना चार मते मिळाली. त्यामुळे पिठासन अधिकाऱ्यांनी पवार यांच्या विजयाची घोषणा केली. या समितीती भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणूकही भाजपने जिंकली. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, भाजप गटनेते संभाजी मोरूस्कर यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती प्रा. सोनवणे व उपसभापती पवार यांचा सत्कार करण्यात आला.

नगरचा इशारा नाशिकमध्ये

या समितीत भाजपचे स्पष्ट बहुमत असले तरी, शिवसेनेने सभापती व उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केले होते. परंतु, भाजपने शिवसेनेची मनधरणी करत ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अहमदनगर पालिकेत भाजपने केलेल्या दगाफटक्याचा बदला म्हणून शिवसेनेने ही निवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपचे प्रयत्न हाणून पाडले. शिवसेनेने यासाठी काँग्रेसचीही मदत घेतली होती. शिवसेनेने सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक घेवून नगरचा इशारा दिल्याची चर्चा आहे.

खाडे अन् खोडेचा वाद

शिक्षण समितीच्या या निवडणुकीत शिवसेनेचे सदस्य चंद्रकांत खाडे यांच्या नावावरून बराच वाद रंगला. या निवडणूक उमेदवारांच्या नावापुढे नामफलक लावण्यात आला होता. परंतु, नगरसचिव विभागाच्या चुकीमुळे शिवसेनेचे खाडे यांच्या ऐवजी नामफलकावर भाजप नगरसेवक चंद्रकांत खाडे यांचे नाव टाकण्यात आले होते. त्यामुळे नगरसचिवांना निवडणूक होवून पावणे दोन वर्ष उलटले तरी, खाडे की, खोडे यात फरक समजला नसल्याबद्दल खाडे यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत थेट आयुक्तांकडे तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर नगरसचिवांना यासंदर्भात दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला.

दिवेंना पडला विसर!

या निवडणूकीत शिवसेना आणि काँग्रेस भाजप विरोधात एकत्र आले होते.त्यामुळे काँग्रेसच्या राहूल दिवेंना शिवसेना मतदान करावे लागणार होते.पक्षाच्या वतीने त्यांसदर्भात त्यांना सांगण्यातही आले होते.परंतु,सभापतीपदाच्या निवडणुकीत दिवेंनी दांडी मारली.मात्र सभापती वेळी अनुपस्थित असलेले दिवे उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी मात्र उशिराने हजर झाले. यावेळी शिक्षण सभापती-उपसभापतीपदाची आज निवडणूक असल्याचे आपल्याला माहितीच नव्हते, असा आश्चर्यकारक दावा त्यांनी केला. निवडणूकप्रक्रिया सुरू असल्याचे आपल्याला आताच कळली असा दावा त्यांनी केला.

शहरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्याबरोबरच खासगी शाळांच्या धर्तीवर सेमी इंग्रजी शाळा सुरू करणार आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासह त्यांना चांगले शिक्षण देण्याचा मानस आहे.

- प्रा. सरिता सोनवणे, सभापती

महापालिकेच्या शाळांमध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्याचा तसेच हसत खेळत शिक्षणाचा उपक्रम राबविण्यास प्राथमिकता राहणार आहे. मनपा शाळांचा दर्जा उचांवण्यासाठी प्रयत्न करणार असून, इंग्रजी शाळांचे विद्यार्थी पालिका शाळांमध्ये येतील यासाठी प्रयत्न करणार.

- प्रतिभा पवार, उपसभापती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उप वनसंरक्षकांच्या बदल्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वनविभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांना बढती मिळाली असून, त्यांच्याकडे आता नाशिक वन्यजीव विभागाच्या मुख्य वनसंरक्षक पदाची जबाबदारी असणार आहे.

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात मुख्य वनसंरक्षक आणि उप वनसंरक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे. नाशिक पूर्व वन विभागाचे उप वनसंरक्षक डॉ. शिवबाला यांची मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे बदली केली आहे. त्यांच्या जागी गडचिरोली येथील उप वनसंरक्षक एस. बी. फुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नाशिक पश्चिम वन विभागाच्या उप वनसंरक्षक टी. बेऊला यांची अकोट येथे वन्यजीव विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सिरोंचा येथील उप वनसंरक्षक तुषार चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वन मंत्रालयाच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या बदल्यांनुसार नववर्षापासून नियुक्तीचा पदभार अधिकारी स्वीकारणार आहेत.

\Bवनविकासाचा वाढणार वेग!

\Bनाशिक पश्चिम वन विभागाच्या उप वनसंरक्षक टी. बेऊला यांनी जिल्ह्यातील वन संरक्षणासाठी विविध योजना राबविल्या होत्या. त्याचप्रमाणे पूर्व वन विभागाचे उप वनसंरक्षक डॉ. शिवबाला यांनी वन संवर्धनासाठी अनेक प्रकल्प कार्यान्वित केले. त्यानुसार त्यांची बदली मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि टी. बेऊला यांची बदली अकोट येथे करण्यात आल्याचे बोलले जात आहे. नवनियुक्त अधिकाऱ्यांकडून राज्यातील वन विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार असून, त्या संदर्भात योजनांची आखणी लवकरच होणार असल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रेसचे स्नेहसंमेलन

$
0
0

\B

\Bनाशिक : न्यू ग्रेस अॅकॅडेमी इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमासाठी 'रेट्रो टू मेट्रो' ही संकल्पना घेऊन विद्यार्थ्यांनी जुन्या व नवीन मराठी, हिंदी चित्रपटामधील गीतांवर नृत्य सादर केले. या प्रसंगी टीव्ही व चित्रपट नायिका पूजा गोरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती वंदना या शास्त्रीय गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेच्या संस्थापिका रोहिणी नायडू, नागराजन नायडू, राजश्री सुरावकर, राजेंद्र वानखेडे, संदीप सुरावकर, मुख्याध्यापिका हिना शेख उपस्थित होते. यावेळी ग्रेस प्रिन्स हा पुरस्कार लक्ष पगारे याला, तर ग्रेस प्रिन्सेस हा पुरस्कार प्रतीक्षा गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कावेरी पवार, निकेता जोगळेकर व शालेय विद्यार्थी कुणाल गवळी व अभिजित गायकवाड यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवंतांच्या पंखात बळ!

$
0
0

स्पर्धा परीक्षा इच्छुकांसाठी मोफत अभ्यासिका

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

यूपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे अभ्यास साहित्य उपलब्ध व्हावे, त्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभावे, या हेतूने येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात प्रातांधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या संकल्पनेतून मोफत अभ्यासिका सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार भादेकर यांनी दिली.

प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात अनेक विद्यार्थी कूच करतात; मात्र महागडे अभ्यास साहित्य, क्लासेस यामुळे अगोदरच दुष्काळी परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या तालुक्यातील पालकांचा आर्थिक कणा पुरता मोडून जातो आणि परिस्थिती अभावी उमेदीच्या काळात तरुणांना माघरी फिरावे लागू शकते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी वाढलेल्या स्पर्धेत अगदी थोड्या गुणांवरून यशाला हुलकावणी मिळू शकते. आर्थिक परिस्थती नसल्याने अनेकांना ही लढाई अर्ध्यावर सोडून माघारी यावे लागते. नेमकी हीच गोष्ट हेरून प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी प्रशासकीय कार्यालयात अभ्यासिका सुरू केली आहे.

अशी झाली निवड

अभ्यासिकेत प्रवेशासाठी १०० गुणांची बहुपर्यायी स्वरूपाची पात्रता परीक्षा शहरातील होळकर विद्यालयात घेण्यात आली. इच्छूक उमेदवार चांदवड तालुक्याचा रहिवाशी आणि तो किमान बारावी उत्तीर्ण असावा अशी एकमेव अट ठेवण्यात आली. परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे निकाल प्रांताधिकारी कार्यलयात नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आले. यातील पात्र ठरलेल्या ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. तसेच यातील ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूकांसाठी एका नियमांचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये सुसूत्रता असावी, त्यात एकवाक्यता असावी यासाठी एकच कायदा व नियम असावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सरकारकडे राज्य निवडणूक आयोगाने प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एच. सहारिया यांनी दिली.

नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या सहारिया यांनी निवडणुकीसंबंधी धावता आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुका या राज्य निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात. पण, यात सर्व निवडणुकीसाठी कायदे व नियम वेगळे आहेत. त्यामुळे ते एक असावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे मॉडेल कोड ऑफ कंडक्टची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र अधिकारी काम करतात. त्यासारखी यंत्रणा या निवडणुकीत असावी असे वाटत नाही का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्याबाबतही विचार सुरू असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे व्हीव्हीपॅट ईव्हीएम प्रणाली राज्याच्या निवडणुकीत वापरली जाणार का? या प्रश्नावर त्यांनी आता तसा काही विचार नाही. नुकत्याच जवळपास सर्व निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे भविष्यात यावर विचार केला जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत त्याचा वापर होणार आहे. त्यामुळे त्याबाबत अनुभवही कसा आहे. या सर्व गोष्टीचा विचार केला जाऊ शकतो.

राज्यात १९९४ साली राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली. पण, त्यांची स्वतंत्र यंत्रणा नाही. महसूल अधिकाऱ्यांमार्फतच या आयोगाच्या निवडणुका घेतल्या जातात. पण, त्यासाठी कायम स्वरुपी स्वतंत्र अधिकारी जिल्ह्यात नसतो. या आयोगातर्फे मतदार यादी तयार करणे, निवडणुकीचे नियोजन व नियंत्रण करण्याची जबाबदारी असते. त्यामुळे त्याचे स्वतंत्र अस्तित्व असणे असणेही गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट

$
0
0

विनामूल्य संस्कृत

संभाषण शिबिर

नाशिक : 'संस्कृतभारती'तर्फे १ ते १० जानेवारी दरम्यान मोहिनीदेवी रुंगठा विद्यालय, अशोकस्तंभ, नाशिक येथे सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत विनामूल्य संस्कृत संभाषण शिबिराचे आयोजन केले आहे. या वर्गात सोप्या भाषेत संस्कृत संभाषण शिकविले जाणार आहे. शिबिरासाठी वय, शिक्षण याची कोणतीही अट नाही. अधिक माहितीसाठी संगीता आंभोरे ९४२३२२३७५० यांच्याशी संपर्क करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकरी-शेतमजुरांचा इगतपुरीमध्ये मेळावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

घोटी : इगतपुरी तालुक्यातील शेतकरी आणि शेतमजूर यांचा तालुका मेळावा शुक्लतीर्थ येथे झाला. अध्यक्षस्थानी शाहीर एकनाथ गोरे होते. यात भाकप राज्य सचिव मंडळचे राजू देसले, किसान सभा जिल्हाध्यक्ष भास्कर शिंदे, भाकप नाशिक शहर सेक्रेटरी महादेव खुडे, भारतीय महिला फेडरेशन विमल पोरजे यांनी मार्गदर्शन केले.

तालुक्यातील भाताला योग्य भाव मिळावा, वनजमिनी कसत असलेल्याच्या नावावर झाल्या पाहिजे, शेतमजूर, शेतकऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे आदी प्रश्नावर संघटन करून तीव्र आंदोलन उभारू, यासाठी शेतकरी, शेतमजूर यांचे संघटन बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राजू देसले यांनी याप्रसंगी केले. शिवाजी पगारे यांनी प्रास्ताविक केले. तसेच ८, ९ जानेवारी रोजी कामगार कर्मचारी संघटनांनी देशभर संप पुकारला आहे. देशात कामगार व शेतकरी विरोधी धोरणाविरोधात पुकारलेल्या संपाला किसान सभा रस्त्यावर उतरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

किसान सभा अध्यक्षपदी बैरागी

मेळाव्यात किसान सभेची कार्यकरिणी निवडण्यात आली. यात संजय बैरागी (अध्यक्ष) लक्ष्मण शेणे, बाळू वाघ (उपाध्यक्ष), ज्ञानेश्वर वाघ (सचिव), हिरामण खतेले (सहसचिव) धनराज बऱ्हे (कोषाध्यक्ष) गोपीनाथ वाघ (उपकोषाध्यक्ष), नामदेव राक्षे, शिवाजी पगारे (संघटक) यांचा समावेश आहे. तसेच महिला फेडरेशनच्या अध्यक्षपदी अनुसया बऱ्हे, उपाध्यक्षपदी कमळ रण, संगीता वाघ, सचिवपदी अश्विनी पगारे, सहसचिवपदी अलका रण, कोषाध्यक्षपदी पार्वती आघाण आणि शेतमजूर संघटनेचे अध्यक्षपदी विष्णू रण, उपाध्यक्षपदी सखाराम रण, रतन कोरडे, सचिवपदी शिवाजी पगारे कोषाध्यक्षपदी धनराज बऱ्हे, संघटकपदी नामदेव राक्षे यांची एकमताने निवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामकोला ५० हजारांचा दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेच्या अभोणा येथील खातेदाराच्या खात्यातून एटीएमद्वारे परस्पर पैसे काढल्याच्या तक्रारीनंतर बँकेने कोणतीही कारवाई न केल्यामुळे ग्राहक न्यायमंचाने बँकेला दणका देत आठ हजारांचा दंड ठोठावला. त्याचप्रमाणे ५० हजार रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत.

बेलापूर, ठाणे, पनवेल येथील एटीएममधून टप्प्याटप्प्याने ही रक्कम काढण्यात आली होती. कळवण तालुक्यातील अभोणा येथील खातेदार दिलीप वसंत मुसळे यांनी नाशिक मर्चंट बँकेविरुद्ध तक्रार केली. पण, बँकेने कोणतीच कारवाई न केल्यामुळे त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतली. या तक्रारीनंतर न्यायमंचाने हा निकाल दिला. या निकालात आठ हजारांच्या दंडाच्या रकमेत पाच हजार रुपये मानसिक त्रासापोटी, तर तीन हजार रुपये अर्जाचा खर्च आहे. तक्रारीत मुसळे यांनी म्हटले आहे की, आपण २०१४ पासून बँकेचे खातेदार व सभासद आहोत. बचत खात्यावर एटीएम कार्ड देण्यात आले होते. त्यात आपण वेळोवेळी ७१ हजारांची रक्कम भरली. पण, पासबूक भरायला गेलो असता २१ हजार रुपयेच रक्कम शिल्लक असल्याचे दाखवण्यात आले. त्याबाबत बँकेत चौकशी केल्यानंतर त्यांनी बँक खात्यातून सलग दोन दिवसांत २५ हजारांची दोनदा रक्कम काढल्याचे सांगितले. त्यामुळे आपले खाते कोणीतरी हॅक केल्याचे लक्षात आले. त्यानंतर सदर रकमा टप्प्याटप्प्याने बेलापूर, ठाणे येथून युनियन बँकेच्या एटीएममधून, तर पनवेल येथून कर्नाटक बँकेच्या एटीएममधून काढल्याचे लक्षात आले. याबाबत बँकेला कळवूनही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर पोलिस स्टेशनला तक्रार अर्ज दिला. बँकेचे सॉफ्टवेअर चांगले नसल्यामुळे अज्ञात व्यक्तीने अकाउंट हॅक केल्याचेही त्यांनी सांगितले.

या तक्रारीवर बँकेने आपली बाजू मांडताना विरोध केला. तक्रारदाराच्या खात्यावरुन पैसे काढल्याची बँकेने माहिती दिली आहे. ज्या बँकांमधून पैसे गेलेले आहेत, त्या बँकांकडून सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे. तांत्रिकदृष्ट्या एटीएमच्या पिनबाबत माहितीची वाच्यता अथवा देवाण-घेवाण केल्याशिवाय खात्यातून पैसे जाऊ शकत नाही. तक्रारदाराच्या खात्यातून ज्या दिवशी पैसे गेले, त्याबाबत एसएमएसद्वारे कळविले असून, त्यांनी दोन ते तीन दिवसांनी बँकेस कळविले. या घटनेस तक्रारदार जबाबदार आहे. बँकेचे सॉफ्टवेअर हे उत्तम दर्जाचे आहे.

जबाबदारी बँकेचीही

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमंचाने एटीएम कार्डचा पासवर्ड सुरक्षित ठेवण्याबाबत जेवढी जबाबदारी तक्रारदाराची आहे, तेवढीच बँकेची असल्याचे म्हटले. बँकेचे सॉफ्टवेअर योग्य दर्जाचे नसल्यामुळे तक्रारदाराचे खाते हॅक होऊन खात्यातून पैसे काढले गेले. बँकिंग कोड अँड स्टँडर्ड बोर्ड ऑफ इंडिया यांच्या नियमावलीनुसार बँकिंग क्षेत्रात होणाऱ्या ऑनलाइन अपहारासंबधी बँक जबाबदार असते. त्यामुळे रक्कम देण्यास बँकेने नकार देऊन सेवा देण्यास कमतरता केली आहे, असे सांगत न्यायमंचाने निकाल दिला. हा निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, सचिन शिंपी यांनी दिला. तक्रारदाराच्या बाजूने अॅड. के. एस. शेळके यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बससेवेला नववर्षाचा मुहूर्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या माध्यमातून सिटी बस चालविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या इच्छेला अखेर नववर्षाचा मुहूर्त लाभला आहे. महासभेचा सिटी बसचा ठराव प्रशासनाला प्राप्त झाला असून, बससाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बससेवेसाठी निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे.

महामंडळाला डोईजड झालेली सिटी बससेवा पालिकेच्या माथी मारण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने सिटी बससेवेसाठी प्रक्रिया सुरू करीत, सप्टेंबरमध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेवर 'ग्रॉस कॉस्ट कटिंग' तत्त्वावर सिटी बससेवा चालविण्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवला होता. महापालिकेच्या कायद्यात परिवहन समितीची तरतूद असली तरी सिटी बस संचालनासाठी कंपनी स्थापन करण्याचा निर्धार मुंढे यांनी केला होता. त्यामुळे हा वाद पुन्हा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचला होता. त्यानुसार ठरावही मंजूर केला होता. परंतु, मुंढे यांनी पुन्हा सूत्रे फिरवत कंपनीसाठी मुख्यमंत्र्यांमार्फत दबाव टाकला. त्यामुळे संतप्त भाजपने हा ठरावच लटकवत ठेवला. तब्बल तीन महिन्यांनी म्हणजे मुंढे यांची बदली झाल्यानंतर या ठरावाला आता मुहूर्त मिळाला आहे. मुंढे यांच्या बदलीनंतर आलेल्या राधाकृष्ण गमे यांच्याशी चर्चा केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी कंपनीचाच ठराव प्रशासनाला सादर केला आहे. प्रशासनाने या ठरावाची अंमलबजावणी आता सुरू केली आहे. बससेवा चालवण्यासाठी सर्वप्रथम कंपनी स्थापन केली जाणार आहे. महासभेच्या ठरावानुसार कंपनीच्या संचालक मंडळाची माहिती आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव महापालिकेच्या वाहतूक कक्षामार्फत केली जात असून, कंपनी गठणाची प्रक्रिया सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या कचाट्यात सिटीबसची अंमलबजावणी अडकू नये यासाठी कंपनी स्थापन करून मक्तेदारासाठी निविदा प्रक्रिया काढली जाणार आहे. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सिटी बससाठी निविदा प्रसिद्ध केली जाणार असून, मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

चारशे सीएनजी बस धावणार

प्रशासनाने महासभेत ठेवलेल्या मूळ प्रस्तावात २०० इलेक्ट्रीक बस तर २०० डिझेल बस शहरात चालविण्याचे नमूद केले होते. परंतु, सत्ताधाऱ्यांनी यात बदल केला असून, आता सर्व ४०० बस सीएनजी असाव्यात, असे नमूद केले आहे. त्यामुळे ठेकेदाराला आता सीएनजी बसची खरेदी करावी लागणार असून, त्या दृष्टीने माहिती घेऊन निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी सर्वच्या सर्व बस सीएनजीवर धावणाऱ्या असणार आहेत.

शहरात ६०० शेल्टर्स

शहर बससेवा चालविण्यासाठी बस खरेदी मक्तेदारामार्फत केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक बस डेपो, टर्मिनल व शेल्टर्स अर्थात बस थांब्यांची जागा महापालिकेला उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. चार ठिकाणी बसडेपो उभारताना तब्बल दहा ठिकाणी बस टर्मिनल उभारले जाणार आहेत. त्याचप्रमाणे ६०० ठिकाणी शेल्टर्स उभारले जाणार आहेत. पीपीपी तत्त्वावर शेल्टर उभारणीसाठी स्वतंत्र निविदा काढली जाणार आहे. यासाठीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. अत्यावश्यक खर्चासाठी पालिकेने बजेटमध्ये आर्थिक तरतूदही केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांगलादेशात मतदानादरम्यान हिंसाचार; १३ जण ठार

$
0
0

ढाका : बांगलादेशामध्ये रविवारी सार्वत्रिक निवडणुकांसाठी झालेल्या मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले असून, विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात १३ जण ठार झाले. या प्रकरणी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष आवामी लीग आणि विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी (बीएनपी) यांनी परस्परांचे उमेदवार आणि समर्थकांवर हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप केला आहे.

बांगलादेशमध्ये स्थानिक वेळेनुसार रविवारी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान झाले. पुढील २४ तासांत मतमोजणी होऊन, त्यानंतर निकाल घोषित करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेश संसदेच्या ३०० जागांपैकी २९९ जागांसाठी ४० हजार १८३ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. उमेदवाराच्या मृत्यूमुळे एका जागेसाठी मतदान घेण्यात आले नाही. देशभरातून १८४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

मतदानाला प्रारंभ झाल्यानंतर ढाका येथील मतदान केंद्रांत सर्वांत आधी पंतप्रधान शेख हसीना यांनी मतदान केले. त्यांचे नातेवाइक आणि पक्षाचे सदस्य फजले नूर तपोश हे ढाक्यातून निवडणूक लढवित आहेत. या वेळी 'उज्ज्वल भविष्यासाठी नागरिक आम्हालाच विजयी करतील,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हसीना चौथ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या इच्छेने निवडणूक लढवित आहे, तर त्यांचे विरोधक आणि बीएनपीच्या प्रमुख खलिदा झिया ढाका कारागृहात असून, त्यांना पक्षाघात झाला असल्याचे सूत्रांकडून समजते.

मतदानादरम्यान आठ जिल्ह्यांत विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात तेरा जण ठार झाले. मृतांमध्ये आवामी लीगच्या पाच कार्यकर्त्यांचा समावेश असून, उर्वरितांमध्ये बीएनपी आणि अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. सुमारे बारा जण जखमी झाले आहेत. देशभरातून हिंसाचार आणि मारहाणीसंदर्भात सुमारे १०० हून अधिक तक्रारी उमेदवारांनी दाखल केल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

-----

निवडणुकीत आमचा विजय होईल, या बद्दल मला विश्वास वाटतो. उज्ज्वल भविष्यासाठी नागरिक आम्हालाच निवडून देतील.

- शेख हसीना, पंतप्रधान, बांगलादेश

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैनिकाची व्यथा मांडणारे ‘आधारशिला’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सैनिकाचे जगणे मोठे अवघड असते, त्याला राष्ट्रासाठी लढावे लागते. मनात बायको पोरांचा कितीही विचार असला, घराची कितीही आठवण येत असली तरी लढणे हेच त्याचे भागध्येय असते. परंतु आपल्याच राष्ट्राचे लोक युध्दाच्या वेळी आपल्याच सैनिकांच्या घरातील लोकांवर अत्याचार करीत असतील, तर अशावेळी ज्याचे ते घर आहे, त्या सैनिकाने काय करावे? तो सैन्यातूनच पळ काढतो अशा आशयाचे कथानक असलेले 'आधारशिला' नाटक रविवारी सादर करण्यात आले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने आयोजित ६६ व्या नाट्यमहोत्सवातील प्राथमिक स्पर्धेत 'आधारशीला' हे नाटक कामगार कल्याण भवन, सातपूर यांच्या वतीने रविवारी सादर करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. मुकंद कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन बाळ मुजुमदार यांनी केले होते.

जगातील एका छोट्याशा खेड्यात ही घटना घडते. हे गाव जगाच्या नकाशावर शोधायचे झाले, तर भिंग लावून शोधावे लागेल, अशी त्याची अवस्था परंतु तेथे सुख-शांतता नांदत असते. वर्षभरातून एखादाजण मरण पावत असे त्यामुळे तितकेच काय ते दु:ख असे. परंतु, या गावाकडे शेजारील देशाच्या सैनिकांची वक्रदृष्टी पडते आणि गावातील बायका, पोरे, म्हातारी माणसे यांना नाडले जाते. बायकांवर अत्याचार केले जातात. सगळीकडे प्रेतांचा खच पडतो. अशावेळी गावात विध्वंस झालेला असताना, त्याच शत्रुराष्ट्राचा एक सैनिक या गावात येतो. आपल्याच सैनिकांकडून तो पोळलेला आहे. जीव वाचविण्यासाठी तो गावात येतो आणि गावचाच होऊन जातो. त्यांचाही त्याच्यावर विश्वास बसतो तो गावाचा आधार बनतो. परंतु, एक दिवस त्याचे सैनिक त्याला शोधत येतात आणि कोर्ट मार्शलसाठी त्याला घेऊन जातात. गाव पुन्हा एकदा निराधार बनते, अशी या नाटकाची कथा होती.

नाटकाचे नेपथ्य आदित्य समेळ यांचे होते, प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित, संगीत अमोल काबरा, वेशभूषा अपूर्वा देशपांडे, रंगभूषा समीक्षा कानडे यांची होती. नाटकात चैतन्य गोखले, अनिल कडवे, कौमुदी गदगे, विजय सहाणे, किरण समेळ, कविता आहेर, स्नेहा ओक यांनी भूमिका केल्या.

...

आजचे नाटक

एक होता बांबू काका

कामगार कल्याण केंद्र, बुधवार पेठ

स्थळ: प. सा. नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ६ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंबाखू सोडल्याने ब्रँड अॅम्बेसेडरचा बहुमान!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

२७ वर्षांपासून असलेले तंबाखूचे व्यसन सोडल्यामुळे, पोलिस कॉन्स्टेबल संदीप गांगुर्डेंना ब्रॅँड अॅम्बेसेडर करण्यात आले आहे. त्यांच्या तंबाखू सोडण्याच्या भूमिकेचा आदर करीत, त्यांचा फोटो खाकीच्या कर्तृत्वाच्या भिंतीवर लावण्यात आला आहे. पोलिस आयुक्तालयाने हाती घेतलेल्या 'जॉइन द चेंज' या तंबाखूमुक्त नाशिक उपक्रमाचे ते ब्रँड अॅम्बेसेडर असणार आहेत.

काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत 'जॉइन द चेंज' या तंबाखूमुक्त नाशिक उपक्रमाची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यावेळी आयुक्त डॉ. सिंगल यांनी 'आपल्यापैकी कोण-कोण तंबाखू खातात?', असा प्रश्न कर्मचाऱ्यांना केला. उपस्थित कर्मचाऱ्यांमधून संदीप गांगुर्डे यांनी तंबाखू खात असल्याचे मान्य केले. तंबाखूचे दुष्परिणाम आणि त्यातून मृत्यू ओढावल्यास कुटुंबीयांना होणारा त्रास, याची जाणीव पोलिस आयुक्तांनी गांगुर्डे यांना करून दिली. त्यावेळी सर्व पोलिस कर्मचाऱ्यांसमोर गांगुर्डे यांनी तंबाखू सोडत असल्याचे सांगितले. गांगुर्डे २००५ मध्ये मुंबई शहर पोलिस विभागात दाखल झाले होते, २०१५ मध्ये नाशिक पोलिस आयुक्तालयात त्यांची बदली करण्यात आली. गेल्या २७ वर्षांपासून त्यांना तंबाखूचे व्यसन होते. तंबाखू खात असल्याचे त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांसमोर मान्य करीत, व्यसन सोडल्याचा संकल्प केला. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी त्यांचा सन्मान केला. तसेच त्यांना तंबाखूमुक्त मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर केले. रविवारी रात्री शहरात घेण्यात आलेल्या 'जॉइन द चेंज' नाइट रनमध्ये गांगुर्डे यांचा सत्कार करण्यात आला.

तंबाखू मुक्त मोहिमेचा ब्रँड अॅम्बेसेडर झाल्यामुळे जबाबदारी वाढली आहे. तंबाखूचे व्यसन सोडल्यामुळे कोणताही त्रास होत नाही, तर शरीर व्यायामाला साथ देऊ लागले आहे. जे पोलिस कर्मचारी व अधिकारी तंबाखू खातात, त्यांना या व्यसनापासून दूर करण्यासाठी प्रबोधन करणार आहे.

- संदीप गांगुर्डे, पोलिस कॉन्स्टेबल, मुख्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेलांची सज्जता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

२०१८ च्या अखेरच्या दिवसाला निरोप देत, २०१९ या नववर्षाचे जल्लोषपूर्ण स्वागत करण्यासाठी नाशिक सज्ज झाले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था चोख ठेवली असून, हटके सेलिब्रेशन करण्यासाठी अनेकांची तयारी सुरू आहे.

२०१९ चे स्वागत उत्साहात करण्यासाठी शहरातील हॉटेल्स, कॅफे, रेस्टॉरंटसह रिसॉर्टमध्येही झगमगती रोषणाई करण्यात आली आहे. हॉटेल्स आणि कॅफेमध्ये न्यू इयर पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हॉटेल्समध्ये खवय्यांची होणारी गर्दी लक्षात घेता, अनेक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. हॉटेल्समध्ये कॅम्प फायरसह गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ३१ डिसेंबर सोमवारी असल्याने, रविवारीच नवीन वर्षाच्या स्वागताचा जोर दिसून आला. रविवारी संध्याकाळनंतर कॉलेजरोड, गंगापूररोड, नाशिकरोड, पंचवटी परिसरातील अनेक हॉटेलांमध्ये नाशिककरांची गर्दी झाली. रात्री उशिरापर्यंत नाशिककरांमध्ये सेलिब्रेशनचा उत्साह होता. तरुणाईकडून आज नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांनी रविवारी संध्याकाळपासूनच सर्वत्र पेट्रोलिंग करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील तळीरामांवर करडी नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी कडेकोट सुरक्षा तैनात केली आहे. २०१९ चे स्वागत करण्यासाठी अनेकांकडून केक आणि स्काय लँटर्नची खरेदी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सभासद नोंदणीवरून गोंधळ

$
0
0

नाईक शिक्षण संस्थेत धक्काबुक्की; गोंधळातच विषय मंजूर

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन सभासद नोंदणीच्या प्रश्नांवर चर्चा होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या परंतु, इतरच विषय हाताळले जात असल्याने संतप्त सभासद, इच्छुक तरुणांमुळे व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ निर्माण झाला. सन १९९९ सालापासून सभासद नोंदणी बंद असल्याने त्याच त्या व्यक्ती संस्थेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. ही संस्था खासगी मालमत्ता नसून समाजाची आहे. त्यामुळे नवीन सभासदांची नोंदणी करण्यात यावी, ही मागणी सभासद इच्छुक तरुणांनी लावून धरली होती. यामुळे झालेल्या गोंधळातच सर्व विषयांना मंजुरी देऊन सभा आटोपती घेण्यात आली.

क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (३० डिसेंबर) संस्थेच्या आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीलाच संस्थेचे ज्येष्ठ सभासद पंढरीनाथ थोरे यांनी दापूर, राजापूर येथील नवीन कॉलेजांच्या प्रस्तावांचे काय झाले, त्याला मान्यता मिळाली आहे का, याविषयी सभासदांना माहिती का मिळाली नाही, असे प्रश्न उपस्थित केले. मानोरी येथील उर्वरित तीन एकर जागेसाठी धर्मदाय आयुक्तांची परवानगी मिळाली का, वर्षानुवर्षे हे प्रश्न सुटत नसतील तर संचालक मंडळाचा पाठपुरावा कमी पडत आहे, अशी टीका त्यांनी केली. याबरोबरच, अॅड. पी. आर. गिते, मनोज बुरकुले, अ‍ॅड. अशोक अव्हाड यांनीही डोंगरे मैदानावरील दोन मीटर जागेचा प्रश्न, वक्फ बोर्डाचा निकाल, वसंत मार्केट टेरेसच्या जागेवर वसतिगृहाचा प्रश्न, सिन्नर येथील शाळांचे प्रलंबित असलेले काम असे अनेक प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांवर विद्यमान संचालक मंडळाकडून समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. परंतु, सभासद नोंदणीच्या प्रश्नांवर चर्चा होण्याच्या अपेक्षेने आलेल्या तरुणांच्या प्रश्न सभा सुरू होऊन बराच कालावधी लोटला तरी घेतला जात नसल्याने तरुणवर्गामध्ये नाराजी निर्माण झाली होती. परिणामी, संतापलेल्या तरुणांनी व्यासपीठाकडे धाव घेतली व यातूनच गोंधळ, धक्काबुक्की झाली.

दरम्यान, २०१७-१८ चा अहवाल वाचून मंजूर, संस्थेचे सन २०१७-१८च्या आर्थिक पत्रकांना मंजुरी, सन २०१८-१९ साठी तयार केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. तसेच संस्थेसाठी अंतर्गत लेखापरीक्षकांची नियुक्ती करणे, नवीन शैक्षणिक उपक्रम सुरू करणे, संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची तारीख ठरवून विचारविनिमय करणे हे विषय गोंधळातच मंजूर करण्यात आले. राष्ट्रगीताने सभेचा समारोप करण्यात आला.

सभेचे प्रास्ताविक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी केले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, माजी अध्यक्ष तुकाराम दिघोळे, उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, दामोदर मानकर, ॲड. व्ही. एन. हाडपे, सहचिटणीस अॅड. तानाजी जायभावे, किशोर दराडे यांच्यासह संचालक मंडळ व विश्वस्त उपस्थित होते.

...

सभासद नोंदणीसाठी मर्यादा असून, ही नोंदणी पूर्वीच बंद करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्था या राजकारण्यांचा अड्डा होऊ नये, म्हणून ही मर्यादा घालून दिली आहे.

\B- \Bकोंडाजी आव्हाड, अध्यक्ष, व्ही. एन. नाईक शिक्षणसंस्था\B

\B...

ही संस्था विशिष्ट घरांना पिढ्यानपिढ्या चालविण्यासाठी नसून, ती सर्व समाजाची आहे. नवीन सभासदांची नोंदणी करून त्यांनाही संस्थेचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी, ही आमची मागणी आहे. परंतु, नवीन सभासद झाले तर सत्ताधाऱ्यांना ही संस्था आपल्या हातातून जाईल, अशी भीती वाटत असल्याने सभासद नोंदणीसाठी सकारात्मकता दिसत नाही.

\B- \Bजगदिश बोडके, इच्छुक सभासद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हिडिओ व्हायरल केल्याने खंडेराव नगरात दगडफेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

भावना दुखावणारा व्हिडिओ व्हायरल केल्यावरून खंडेराव नगरातील दोन गट भिडल्याने तणाव निर्माण झाला. यात एका गटाने तुफान दगडफेक केल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली.

खंडेराव नगरात राहणाऱ्या एका तरुणाने स्वत:च्या मोबाइलवरुन एक व्हिडीओ व्हायरल केला. या व्हिडीओमुळे एका गटाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. यातून खंडेराव नगरातील दोन गटांत वाद झाला. याचा राग आल्यामुळे तरुणांमध्ये बाचाबाचीदेखील झाली. यानंतर काही वेळातच एका गटाकडून दगडफेक झाली. भारतनगर, खंडेरावनगरात दगडफेक झाल्यामुळे नागरीकांची पळापळ झाली. रामानंदनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले होते. प्रमुख रस्त्यावर दगड, वीटा व काचेच्या बाटल्यांचा खच पडला होता. पोलिसांनी घटनेची माहिती घेतल्यानंतर सर्वात आधी गोकुळ पाटील याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले होते. यांनतर दगडफेक करणाऱ्या काही तरुणांना रात्री उशिरापर्यंत ताब्यात घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेलांवर ‘एफडीए’चा वॉच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी हॉटेल व खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर होणाऱ्या गर्दीत दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने महिनाभरापासून हॉटेलांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली. त्यानंतर ८० हॉटेलांना सुधारणा नोटीस देऊन दोन हॉटेलांचा एक दिवसाचा परवानासुद्धा रद्द केला. ३१ डिसेंबरलाही हॉटेलांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष राहणार असून, त्यासाठी नऊ पथके सर्वत्र फिरणार आहेत. त्यामुळे हॉटेलवाल्यांचे धाबे दणाणले आहे.

हॉटेलमध्ये दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन वेळोवेळी कारवाई करत असली तरी ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या गर्दीमुळे त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. ३१ डिसेंबर हॉटेल, ढाबे व बारमध्ये मोठी गर्दी असते. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी विशेष पार्ट्याही केल्या जातात. पण, येथे अन्न पदार्थांची गुणवत्ता राहत नाही. त्यामुळे अनेकांची लूटही होते. जास्त पैसे घेऊनही दर्जेदार अन्न मिळत नाही. त्यामुळे एफडीएची टीम अन्न सुरक्षित आहे का, अन्न वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली आहे का, यांसारख्या तपासण्या करणार आहे. शहरातील हजारो हॉटेलांमधून शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते.

ऑनलाइन अन्न खरेदीवरही लक्ष

वेगवेगळ्या कंपन्यांच्या अॅपवरुन ऑनलाइन अन्न पदार्थांची ऑर्डर देण्याचे फॅड सर्वत्र सुरू झाले आहे. पण, हे अन्नपदार्थ अधिकृत हॉटेलांतून घेतले जातात का, याची तपासणीसुद्धा एफडीए करणार आहे. त्यात चुकीचे काही आढळल्यास कंपनीबरोबरच हॉटेलवरही कारवाई करण्यात येणार आहे. ग्राहकांना खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेविषयी तक्रार असल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या सातपूरच्या उद्योग भवन येथील कार्यालयात तक्रार करावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ललिता बाबर मुख्य आकर्षण

$
0
0

१७ गटांमध्ये होणार स्पर्धा

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने होणारी सहावी राष्ट्रीय व अकरावी राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॅान स्पर्धा ६ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर असणार आहे.

ही स्पर्धा एकूण १७ गटांमध्ये घेतली जाणार असून, सर्वात कमी अंतराची स्पर्धा ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थिनींसाठी ३ कि.मी. अंतराची, तर सर्वाधिक ४२.१९५ कि. मी. अंतराची फुल मॅरेथॅान होणार आहे. धावपटूंसाठी ही स्पर्धा खुली आहे. फुल मॅरेथॅान स्पर्धेला सकाळी ठीक ५.४५ वाजता प्रमुख अतिथींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात होईल.

या स्पर्धेत एकूण १७ गटांचा समावेश आहे. खुल्या राष्ट्रीय पुरुष गटासाठी ४२.१९५ व २१.०९७ कि.मी अंतराची स्पर्धा घेण्यात येणार आहे. खुल्या गटातील महिलांसाठी १० कि. मी. अंतराची स्पर्धा घेण्यात येणार आहे. ४५ वर्षांवरील पुरुष गटासाठी १० कि. मी. व ३५ वर्षांवरील महिला गटासाठी ५ कि. मी. अंतराची स्पर्धा असेल, तसेच ज्येष्ठ नागरिक पुरुषांसाठी ६० वर्षांवरील ०४ कि. मी. अंतराचा स्वतंत्र गट तयार करण्यात आला आहे. ७५ वर्षांवरील पुरुषांसाठी ३ कि. मी. अंतराची स्पर्धा तसेच १८ वर्षांआतील मुले व मुली यांच्यासाठी ६ कि. मी. अंतराची खुल्या गटाची स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धेसाठी एकूण ७ लाख २३ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी भारतीय अॅथलेटिक्स संघटना तसेच, महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटना व नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स संघटना यांची मान्यता मिळालेली आहे. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समिती अध्यक्षा नीलिमा पवार यांनी केले आहे. स्पर्धेसाठी अखिल भारतीय अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने राष्ट्रीय निरीक्षक जी. कृष्णन व महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेचे आर. जोशी हे निरीक्षक म्हणून काम पाहतील.

...

नव्या विक्रमाकडे लक्ष

स्व. डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या नाशिक मविप्र मॅरेथॅान स्पर्धेचा विक्रम हरियाणाचा सेनादलाचा खेळाडू करणसिंग याचे नावे असून, त्याने २०१८ मध्ये ४२.१९५ कि.मी. अंतर ०२ तास २२ मिनिटे व ३९ सेकंदात पूर्ण करीत विक्रम प्रस्तापित केला होता. महिलांच्या १० कि. मी. अंतराच्या स्पर्धेचा विक्रम आरती पाटील हिने गतवर्षी ३९ मिनिटे १० सेकंद वेळ नोंदवून प्रस्थापित केला आहे. हा विक्रम यावेळी मोडला जाईल का, याकडे लक्ष लागले आहे.

..

नावनोंदणी गरजेची

या स्पर्धेसाठी ऑनलाइन नावनोंदणी करता येईल. www.nashikmvpmarathon.org या वेबसाइटवर खेळाडूंनी नावनोदणी करावी. नोंदणीसाठी अंतिम तारीख १ जानेवारी २०१९ पर्यंत राहिल. २ ते ५ जानेवारी २०१९ या कालावधीत नोंदणीकृत धावपटूंनी आपले बीब क्रमांक व टी शर्ट इ. बाबी आय. एम.आर.टी महाविद्यालय गंगापूर रोड येथून घ्याव्यात. अधिक माहितीसाठी एन. के. निकम (९६५७५५८२१५) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा, द्राक्ष उत्पादकांचे प्रश्न सोडविण्यास प्रयत्नशील

$
0
0

कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचे आश्वासन

..

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कांदा आणि द्राक्ष या नगदी पीक घेणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून निसर्ग, व्यापार, भावातील चढ-उतार यामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी आपण केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे जिल्ह्यातील कांदा व द्राक्ष उत्पादकांच्या समस्या मांडून ठोस उपायांसाठी प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले.

पाशा पटेल हे औरंगाबादकडे जात असताना निफाड येथे भाजप नेते आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे संचालक सुरेशबाबा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला थांबले होते. त्यावेळी त्यांनी परिसरातील द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेऊन आश्वासन दिले. येत्या लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा भाजपवरील रोष कमी करण्यासाठी ग्रामीण भागात जाऊन शेतकरी समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय सुचवण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून दिल्याने पाशा पटेल हे शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.

कांद्याचे उतरलेले भाव सावरण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात अनुदान ५ टक्क्यांवरून १० टक्के करण्याचा निर्णय घेत दिलासा दिला आहे. आता कांदा निर्यातीसाठी बाजारपेठ आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या रेल्वे रॅक उपलब्ध्द करून देण्यासाठी केंद्रस्तरावर चर्चा करण्यात येइल, असे ते म्हणाले.

नाशिक येथे कांदा उत्पादक सोहनलाल भंडारी यांनी कांदा व्यापाऱ्यांसह पाशा पटेल यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेतली आणि कांदा वाहतुकीसाठी रेल्वे वॅगन मिळत नसल्याची अडचण आणि इतर समस्या मांडल्या होत्या. पटेल यांनी भंडारी यांच्याशी चर्चा करीत कांद्याची परिस्थिती समजून घेतली.

...

शंभर कोटी मिळण्याची आशा

सन २०१० मध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यात केले होते. यावेळी अपेडा केंद्रीय प्राधिकरणाच्या चुकीमुळे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. यावर पाशा पटेल म्हणाले की, या नुकसान भरपाईसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा करणार आहे. यावेळी द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगणदादा खापरे, द्राक्ष बागायतदार संघाचे अशोक भोसले उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images