Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वीज कृती समितीचा सात जानेवारीला संप

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

वीज कर्मचारी-अभियंते संघटना संयुक्त कृती समितीने विविध मागण्यांसाठी सोमवारी, सात जानेवारी रोजी लाक्षणिक संप करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

चारही विज कंपन्यांतील कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आणि ऊर्जा-उद्योग धोरणाबाबत कृती समिती व्यवस्थापनाकडे दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. वेळोवेळी बैठका झाल्या. मंत्री व व्यवस्थापन पातळीवर वाटाघाटीही झाल्या. मात्र, अंमलबजावणी झालेली नाही. कृती समितीची बैठक पुणे येथे डिसेंबरमध्ये झाली. त्यावेळी सरकारबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच सोमवारी लाक्षणिक संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. महावितरण कंपनीतील प्रस्तावित पूनर्रचना ही संघटनांनी सुचवलेल्या सूचनांचा अंतर्भाव करून अंमलात आणावी, महापारेषणमधील स्टाफ सेटअप लागू करताना आधीची एकूण मंजूर पदे कमी करू नयेत, सरकार व व्यवस्थापनाने खासगीकरण धोरण थांबवावे, मालेगाव, मुंब्रा, शिळ, कळवाचे विभाग फ्रेन्चाईजवर खासगी भांडवलदार कंपनींना देऊ नये, तिन्ही कंपन्यांतील रिक्त पदे भरावीत, बदली धोरणाच्या पुनर्विचार संघटनेबाबत चर्चा करून राबवावे, कंत्राटी व आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना कायम करावे, समान काम समान हा सुप्रिम कोर्टाचा निकाल लागू करावा, २१० मेगावाटचे संच बंद करण्याचे धोरण थांबवावे, सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, आदी मागण्या आहेत.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर, वीज कामगार महासंघाचे शंकर पहाडे, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे आर. टी. देवकांत, सबोर्डिनेट इंजिनिअर असोसिएशनचे सुनील जगताप, विज तांत्रिक कामगारचे सैय्यद जहिरोद्दिन, इंटकचे हिंदुराव पाटील आदींची नावे निवेदनावर आहेत. निवेदनेच्या प्रति मुख्यमंत्र्यांसह एमएसईबी होल्डिंग, महानिर्मिती, महावितरण, महापारेषण या चार कंपन्यांच्या मुख्यालयाला देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बजेट कोलमडणार!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

करवाढीच्या वादातून घरपट्टीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला लगाम लागला असतानाच, आता नगररचना विभागातून मिळणारे पालिकेचे विकासशुल्कही मोठ्या प्रमाणावर थकल्याचे समोर आले आहे. अपेक्षित २६३ कोटींपैकी अवघे ३४ कोटीच तिजोरीत जमा झाले आहेत. यामुळे पालिकेचे बजेट कोलमडणार आहे.

तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उत्पन्नवाढीसाठी नगररचना आणि घरपट्टी विभागावर लादलेल्या अवाजवी अपेक्षांचा फुगा फुटला आहे. नगररचना विभागाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असून, त्यातच ऑटो डीसीआर प्रणालीने विकासकांच्या नाकी नऊ आणले आहेत. गेल्या वर्षी प्रशासनाने विकासशुल्क, कम्पाउंडिंग पॉलिसी तसेच कपाट नियमितीकरणातून मिळणाऱ्या उत्पन्नासह नगररचना विभागाला २६३ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. सन २०१८-१९ च्या बजेटमध्ये या संदर्भातील तरतूद करण्यात आली होती. परंतु, डिसेंबरअखेर पालिकेच्या झोळीत अवघे ३४ कोटी रुपयेच जमा झाले आहेत. कम्पाउंडिंग पॉलिसीला मुदतवाढ दिल्याने यातून मिळणारे उत्पन्न लांबणीवर पडले आहे. विकास शुल्कातून १६० कोटी उत्पन्न अपेक्षित असताना ११ कोटी रुपये तिजोरीत जमा झाले आहेत. हार्डशीप प्रीमियममध्ये ३५ कोटी अपेक्षित असताना २ कोटी ५७ लाख रुपयेच जमा झाले आहेत. टीडीआर हस्तांतर शुल्कातून ३५ कोटी मिळणे अपेक्षित असताना २ कोटी ५६ लाख रुपये मिळाले आहेत. अनधिकृत बांधकाम, अवैध भोगवट्यातून ९ कोटी उत्पन्न गृहीत धरले असतांना यातून केवळ एक कोटी रुपयेच मिळाले आहेत. जीना पॅसेज प्रीमियमपोटी ६ कोटी अपेक्षित असताना १ कोटी ७ लाख रुपये मिळाले आहेत. दोन वर्षांपूर्वी तत्कालिन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी नगररचना विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. त्याअंतर्गत टीडीआर वापरावर ५ टक्के सेवासुविधा शुल्क लागू केले होते, तर नऊ मीटर रस्त्यावर प्रीमियम एफएसआय लागू केल्याने सन २०१७-१८ मध्ये ७७ कोटींचे उत्पन्न पालिकेला नगररचना विभागाकडून मिळाले होते. परंतु, यंदा नऊ महिन्यांत अवघे ३४ कोटी रुपयेच मिळाले आहेत. याचा थेट परिणाम आता बजेटवर होणार आहे.

आयुक्तांची कसोटी

कम्पाउंडिंग पॉलिसीअंतर्गत दाखल केलेले प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी अजून सहा महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यातच नगररचना विभागाकडून या तीन हजार प्रकरणांच्या छाननीसाठी सरकारकडे कर्मचारी मागितले आहेत. परंतु, अद्याप त्याला प्रतिसाद मिळाला नाही. ऑटो डीसीआरला गती दिली असली तरी तीन महिन्यांत उत्पन्न २६३ कोटींपर्यंत जाईल, याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी आयुक्तांची कसोटी लागणार आहे.

नगररचनात 'संगीत खुर्ची'

नगररचना विभागात सध्या अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांची वानवा आहे. या विभागात काम मिळ‌विण्यासाठी पूर्वी मोठी स्पर्धा होती. परंतु, मुंढे यांनी लावलेल्या शिस्तीमुळे या विभागात काम करायला कोणीच तयार होत नव्हते. त्यातच २१ कोटींच्या वादामुळे नगररचना सहाय्यक संचालक सुरेश निकुंभे दीड महिन्यापासून रजेवर गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत तीन जणांकडे पदभार हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. एकीकडे पालिकेचे उत्पन्न घटत असताना नगरररचनात मात्र संगीत खुर्चीचा खेळ रंगला आहे.

वर्ष उद्दिष्ट मिळालेले उत्पन्न

२०१५-१६ - १०५ कोटी ४४ लाख ४६ कोटी १५ लाख

२०१६-१७ - ९० कोटी ६७ लाख ९९ कोटी ५८ लाख

२०१७-१८ - ९१ कोटी ७५ लाख १६८ कोटी

२०१८- १९ - २६३ कोटी ३४ कोटी (डिसेंबर १८)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅलरीतून पडल्याने बालकाचा मृत्यू

0
0

नाशिक : अंबड एमआयडीसी भागातील दत्तनगर येथील अंशुमन अजय शर्मा (रा. पाण्याची टाकी, अंबड) या साडेतीन वर्षाच्या बालकाचा गॅलरीतून तोल जाऊन मृत्यू झाला. अंशुमन मंगळवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास गॅलरीत खेळत असताना ही घटना घडली. घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने वडील अजय शर्मा यांनी सिव्हिलमध्ये दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी अंशुमनचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांना सोसवेना गारठा, पारा ६ अंशांवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम असून मंगळवारी ६.२ अंश सेल्सियस ऐवढे किमान तापमान नोंदविले गेले. आठवडाभर थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

थंडीच्या कडाक्यामुळे जिल्ह्यातील निफाड तालुका देशभरात प्रसिद्ध झाला आहे. गत आठवड्यात निफाडमध्ये १.७ अंश सेल्सियस एवढ्या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. मंगळवारी निफाडचे किमान तापमान ३.८ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले, तर जिल्ह्याचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे ६.२ आणि ३० अंश सेल्सियस ऐवढे नोंदविण्यात आले. थंडीचा कडाका कायम असून जिल्ह्यात आठवडाभर किमान तापमान ६ ते ७ अंश सेल्सियस दरम्यान राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान-३साठी

0
0

सोमेश्वरही

गजबजले!

नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिकमधील पर्यटन आणि धार्मिकस्थळे गर्दीने गजबजली आहेत. नाशिककरांचे फेवरीट असलेल्या सोमेश्वर येथे दर्शनाबरोबरच बोटिंगचाही आनंद भाविक घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहस्त्रदीप प्रज्ज्वलनाने नववर्षाचे स्वागत

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

जुन्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना अभंग, भजन गात आणि प्रवचनांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. रामकुंड परिसरात सहस्त्रदीप प्रज्ज्वलीत करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. स्वामी सखा मित्र मेळा चॅरिटेबल ट्रस्ट व शिवनेरी मित्रमंडळ यांच्यातर्फे हा कार्यक्रम सालाबादाप्रमाणे घेण्यात आला.

नवीन वर्षाचे स्वागत करताना आयोजित स्वरधारा या कार्यक्रमात गणेशवंदना, सरस्वती वंदना, शिववंदना अशी विविध भक्तीमय गीत आणि भजनांच्या सूरांनी गोदाकाठाचे वातावरण भक्तीमय होऊ गेले. सारेगम लिटील चॅम्प विजेत्या अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड आणि नाशिकच्या मीना परुळेकर-निकम यांनी भजन व अभंगाचे गायन केले. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करण्याकडे वाढलेल्या युवापिढीला भारतीय संस्कृतीचे संस्कार देण्याचा प्रयत्न गेली. स्वामी सखा मित्रमेळातर्फे १७ वर्षांपासून करण्यात येत आहे. यंदाही पंचम पीठाधीश्वर स्वामी सखा सुमंत सरस्वती यांच्या उपस्थितीत सहस्त्रदीप प्रज्ज्वलीत करण्यात आले. याप्रसंगी प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधन केले. कडाक्याच्या थंडीतही या सोहळ्यात सहभाग घेण्यासाठी आणि सोहळा बघण्यासाठी नागरिकांची गर्दी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशोधन जागरुतेसाठी झोकून द्या!

0
0

जपानच्या विद्यापीठातील डॉ. पंकज कोईनकर यांचे मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जपानमध्ये प्राध्यापक संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करतात. दिवसातील तब्बल १२ ते १४ तासांपर्यंत ते अविरत परिश्रम घेतात. सामाजिक जाणिवेतून घेतलेल्या या जबाबदारीस न्यायसुद्धा देतात, असे प्रतिपादन जपानच्या तोकुशिमा विद्यापीठातील डॉ. पंकज कोईनकर यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले.

केबीटी इंजिनीअरिंग कॉलेजच्या इन्स्ट्रुमेंटेशन अॅण्ड कंट्रोल या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. नानासाहेब पाटील, प्राचार्य एन. बी. देसले, डॉ. एन. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. कोईनकर हे तोकुशिमा विद्यापीठाच्या ऑप्टिकल सायन्स विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. जपानमधील विद्यार्थी हे अधिकाधिक वेळ प्रयोगशाळेत प्रकल्प किंवा प्रबंधांसाठी देतात. आपल्याला पडलेले प्रश्न, शिक्षकांना सतत विचारात रहा. एखादा विषय नवीन असला तरीही त्यावर स्वयं-अध्ययनाची सवय लावून घ्या. आव्हाने स्वीकारून स्वत:कडून नेहमी मोठ्या ध्येयाची अपेक्षा करा, असे ते यावेळी म्हणाले.

डॉ. कोईनकर म्हणाले, की जपानमधील शिक्षक हे उत्तम करिअरसाठी अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करतात. संशोधनासाठी जागरुकता वाढविण्याचे काम करतात. जपानी शिक्षक दिवसातून १२ ते १४ तास काम करतात. ते विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहित करतात आणि त्यांच्या संशोधनात सहभागी देखील होतात. समाजासाठी आपले योगदान संशोधनातून कसे देता येईल, यासाठी प्रयत्न करतात. चांगल्या कामासाठी विद्यार्थ्याच्या पाठीशी सतत उभे राहतात. सर्वसाधारण व मेहनती विद्यार्थ्यांवरही विशेष लक्ष केंद्रीत करतात. नाविन्याची व संशोधनाची कास धरतात, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२०१९ मेणबत्यांनी नववर्षाचे स्वागत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगापूररोड येथील नवश्या गणपती मंदिरात २०१९ मेणबत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरातील प्रांगणात मेणबत्त्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. त्यामुळे मंदिराचा परिसर उजळून निघाला होता.

श्री नवश्या गणपती मंदिर ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्षाचे स्वागत दीपोत्सवाने करण्यात आले. मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता दीपोत्सवास श्रींच्या आरतीने प्रारंभ झाला. यावेळी महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सपत्नीक श्रींची आरती केली. मंदिर परिसरात काढण्यात आलेल्या सुबक रांगोळ्यांवर २०१९ मेणबत्या लावण्यात आल्या. दीपोत्सवाच्यानिमित्ताने मंदिरात करण्यात आलेली रोषणाई आणि हजारो मेणबत्यांच्या प्रकाशाने मंदिराचा परिसर उजळून निघाला. यावेळी गणरायाच्या दर्शनासाठी आणि मेणबत्या प्रज्वलित करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली. नववर्ष सुखा-समाधानाचे आणि समृद्धीचे जावो, सर्व मनोकामना पूर्ण होवोत, अशी प्रार्थना भक्तांनी केली. रात्री उशिरापर्यंत दीपोत्सव पाहण्यासाठी आणि बाप्पांच्या दर्शनासाठी भक्तांचा ओघ होता. दीपोत्सावाचे संयोजन ट्रस्टचे अध्यक्ष राजू जाधव, उपाध्यक्ष रामचंद्र जाधव आणि सचिव अरुण गलांडे यांसह पदाधिकाऱ्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पी.एचडी.धारकांचाउद्या सन्मान

0
0

\B

\Bनाशिक : ईश्वर नागरी सहकारी पतसंस्था आणि मिरद्या सोशल अँड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पी.एचडी.प्राप्त महिलांचा बुधवारी (ता. ३) सन्मान करण्यात येणार आहे. शरणपूर रोड येथील वैराज कलादालन येथे सायंकाळी ५ वाजता हा सोहळा होईल. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हा गुणगौरव सोहळा होईल. सोहळ्यात प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य उपस्थित राहतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्ष स्वागताला अपघातांचे गालबोट

0
0

सहा वर्षांच्या चिमुरडीसह तरुणाचा मृत्यू

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू शहरात वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका सहा वर्षांच्या बालिकेसह तरुण ठार झाला. या अपघातांमध्ये तीन जण जखमी झाले असून, रस्ते अपघातांना मद्यप्राशन कारणीभूत ठरल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

अपघाताची घटना सोमवारी, ३१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता गंगापूररोडकडून सुला वाईनकडे जाणाऱ्या रस्त्यावर कानेटकर गार्डनजवळील विटभट्टीसमोर झाली. भरधाव वेगात जाणाऱ्या रिक्षाचालकाचे (एमएच १५ एफक्यू १६०४) नियंत्रण सुटले. वेगात असलेली रिक्षाने दोन ते तीन पलट्या घेत समोरून येणाऱ्या कारला जाऊन धडक मारली. यामुळे रिक्षात बसलेल्या राशी राजेश चौधरी (६, सावता माळी बस स्टॉपसमोर, श्रमिकनगर) या चिमुरडीच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन तिचा दुर्दैवी अंत झाला. या अपघातात रिक्षातील राजेश चौधरी (४५), रिया राजेश चौधरी (४२) ऋतिक चौधरी (अडीच वर्ष) हे जखमी झाले. जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणी कारचालक सारिका आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गंगापूररोड पोलिसांनी रिक्षाचालक विठ्ठल साहेबराव पाटील (रा. सद्गुरूनगर, दसकरोड) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. नववर्ष स्वागतास जाणाऱ्या चौधरी कुटुंबाने ही रिक्षा बुक केली होती.

अपघाताची दुसरी घटना विहितगाव येथील विटभट्टी रस्त्यावर झाली. भरधाव जाणारी दुचाकी चारीत जाऊन विक्की राजू राजपूत (३०, रा. मालवाडी लहवित) या तरुणाचा मृत्यू झाला. विक्की रात्री साडेआठच्या सुमारास आपल्या दुचाकीवर घराबाहेर पडला. रोकडोबा वाडीलगतच्या वीटभट्टी परिसरात भरधाव जात असताना नियंत्रण सुटून त्याची दुचाकी चारीत गेली. सकाळी ही घटना स्थानिकांच्या लक्षात आली. राजपूतचा मित्र संदीप घोष याने धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. भरधाव गाडी चालवून स्वत:च्या मरणास स्वत: कारणीभूत ठरल्या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

कारची दुचाकीस धडक

कॉलेज रोडवर भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने भूषण वैशंपायन (३६) ही व्यक्ती गंभीर जखमी झाली. अपघातानंतर कारचालकाने पळ काढला. अपघातात वैशंपायन यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. या प्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनांमध्ये ड्रंक अॅण्ड ड्राइव्हचा प्रकार असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिरावणीकरांचा आज मुख्यमंत्र्यांशी संवाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारी योजनांच्या माध्यमातून घरकुल मिळालेल्या लाभार्थींशी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस बुधवारी (दि. २) सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पहिल्यांदाच लोकसंवाद या उपक्रमाद्वारे संवाद साधणार आहेत. नाशिकसह चार जिल्ह्यांत लाइव्ह टेलेकास्टद्वारे हा संवाद साधण्यात येणार असून, त्यासाठी नाशिकमधील महिरावणी गावाची निवड करण्यात आली आहे.

पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, सर्वांसाठी घर यासारख्या योजनांच्या माध्यमातून सरकारने अनेक बेघरांना घरे दिली आहेत. राज्यभरातील अशा लाभार्थींशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी लोकसंवाद हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी पहिल्यांदाच हा उपक्रम राबविण्यात येत असून, लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू शकणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेचे ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येकी १५ लाभार्थींशी संवाद साधण्यात येणार आहे. तर त्याचवेळी दुसरीकडे रमाई आवास योजनेच्या चार लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचून टॅबद्वारे मुख्यमंत्री त्यांच्याशी लाइव्ह संवाद साधणार आहेत. लाइव्ह संवादासाठी नाशिक, नागपूर, ठाणे, सांगली आणि लातूर या पाच जिल्ह्यांमधील प्रत्येकी एका गावाची निवड करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी महिरावणी या गावाची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राइम न्यूज

0
0

महिलेची पर्स लंपास

नाशिक : खिमजी भगवानदास आरोग्यभवन येथून चोरट्यांनी सुरेखा विजय रसाळ (रा. दत्तनगर, बोरगड) यांची रविवारी सकाळी पर्स लंपास केली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्समध्ये साडेतीन हजारांची रोकड, महत्त्वाची कागदपत्रे आणि मोबाइल असा सुमारे साडेचार हजारांचा मुद्देमाल होता.

पर्समधून रोकड लंपास

नाशिक : बसमध्ये चढत असताना सीमा रमेश गायकवाड (रा. परेल मुंबई) यांच्या पर्सची चेन उघडून चोरट्यांनी साडेचौदा हजार रुपये लंपास केले. ही घटना नाशिकरोड बसस्थानकावर घडली. हवालदार गायकवाड तपास करीत आहेत.

वाहनाच्या धडकेत

पादचारी ठार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात चार महिन्यांपूर्वी झाला होता. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली. सीताराम श्यामराव डावरे (रा. प्रबुद्धनगर, सातपूर) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. डावरे यांचे सातपूर येथे दुकान असून, ५ सप्टेंबर रोजी ते दुकानातून घराकडे पायी जात असताना हा अपघात झाला होता. बसस्थानक परिसरातून औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावर जात असताना डावरे यांना अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या

लेखानगर येथील इंदिरा गांधी वसाहतीत भारत दिलीप दांडेकर या २७ वर्षीय तरुणाने सोमवारी (ता. २४) सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विवाहितेची आत्महत्या

भावले मळा परिसरातील तिरडशेत भागात नीलिमा उमेश भावले या २६ वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येपूर्वी विवाहितेने आपल्या पतीस 'मला माफ करा' असा एसएमएस पाठविला होता. हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव घरपट्टीतून दिलासा?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने घरपट्टीचे २५३ कोटींचे उद्दिष्ट १०० कोटींनी घटविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. याचा थेट परिणाम विकासकामांवर होणार आहे. मात्र, नागरिकांना वाढीव करजाचातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करयोग्य मूल्यात पाच ते सहा पटींनी वाढ करीत, नवीन मिळकतींना वाढीव दर लागू केला होता. महासभेने जुन्या मिळकतींना १८ टक्के करवाढीला मंजुरी दिली असतानाही, छुप्या दराने ही वाढ ३६ टक्क्यांपर्यंत नेली होती. मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या ५९ हजार मिळकतींना नवीन करयोग्य मूल्यदराने घरपट्टी लागू केल्याने महापालिकेचे २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे घरपट्टीचे उद्दिष्ट २५३ कोटींपर्यंत नेले होते. २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे घरपट्टीचे उद्दिष्ट ११५ कोटींपर्यंत होते. परंतु, चालू वर्षात ते थेट २५३ कोटींपर्यंत गेल्याने लोकप्रतिनिधींनाही धक्का बसला होता. नव्या मिळकतींना दंडासह आकारलेले शुल्क, महापालिकेच्या ९०३ मिळकतींना रेडी रेकनरचा दर लावल्याने हा आकडा वाढला होता. परंतु, वाढीव करावरूनच भाजप आणि मुंढे यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. मुंढे यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत, नवीन मिळकतींना सरासरी एक ते दीड लाखांच्या नोटिसा पाठविण्यास सुरुवात झाली होती. जवळपास ४२ हजार मिळकतींना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. अखेर या वादातूनच मुंढेंना पालिकेतून जावे लागले.

मुंढेंची बदली झाल्यानंतर गेल्या महासभेत ५९ हजार मिळकतींना नवीन करयोग्य मूल्यासह व दंडासह आकारण्यात येत असलेल्या नोटिसांना स्थगिती देण्यात आली. तसेच वाढीव कराबाबतही फेरविचार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाची अडचण झाली असून, विविध कर विभागासमोरचे संकट अधिकच वाढले आहे. नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही या करवाढीबाबत दिलासा देण्याचे आश्वासन दिले असून, त्याचा अभ्यास सुरू केला आहे. २५३ कोटींचे उद्दिष्ट कसे पूर्ण करायचे, याबाबत विविध कर विभाग पेचात पडला आहे. २५३ कोटींचे उद्दिष्ट साध्य करायचे तर, लोकप्रतिनिधींशी संघर्ष करावा लागेल. तो टाळण्यासाठी विविध कर विभागाने चालू वर्षाचे घरपट्टीचे उद्दिष्ट थेट १०० कोटींनी कमी केले आहे. महासभेच्या १८ टक्के करवाढीसह मनपा मिळकतींना रेडिरेकनर दराने आकारणी करून १५३ कोटींचेच उद्दिष्ट सुधारित बजेटमध्ये ठेवण्याच्या निर्णयाप्रत विविध कर संकलन विभाग पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महापालिकेने आतापर्यंत ९२ कोटींची विक्रमी घरपट्टी वसूल केली आहे. त्यामुळे उर्वरित तीन महिन्यांत केवळ ६० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विविध कर संकलन विभागाने घरपट्टीचे उद्दिष्ट घटविल्याने नागरिकांना आता वाढीव घरपट्टीतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

बजेटचाही आकडा घटणार

प्रशासन, स्थायी आणि महासभेच्या प्रवासानंतर पालिकेचे २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे बजेट हे २१८९ कोटींपर्यंत गेले होते. या बजेटमध्ये २५३ कोटींच्या उत्पन्नाचा वाटाही गृहीत धरण्यात आला होता. परंतु, आता थेट घरपट्टीचे उद्दिष्ट हे १०० कोटींनी घटणार असल्याने प्रशासनाचे बजेटही शंभर कोटींनी कमी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आयुक्तांनी मांडलेले १७८५ कोटींचे बजेट १६८५ कोटींपर्यंत खाली येणार आहे. त्याचा थेट परिणाम भांडवली आणि विकासकामांवर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळीरामांची ‘उतरवली’!

0
0

वाहनचालक पोलिसांची हाती दीडशे मद्यपी; थेट कोर्टात रवानगी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नववर्षाचे स्वागत करताना मद्यप्राशन करून वाहने हाकणाऱ्या तब्बल १५० वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करीत कोर्टात पाठवले. सायंकाळपासून सुरू झालेल्या कारवाई दरम्यान सापडलेल्या तळीरामांना नव वर्षाचे सेलिब्रेशन चांगलेच महागात पडले. याबरोबर पोलिस आणि वाहतूक विभागांनी केलेल्या कारवाईतही काही वाहनचालकांना दंडात्मक कारवाईला समोरे जावे लागले.

कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी शहर पोलिसांनी मागील दोन ते तीन दिवसांपासून तयारी केली. यासाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर २६ नाकाबंदी आणि ३९ फिक्स पॉईंट तैनात होते. मोकळे रस्ते मिळल्यानंतर रॅश ड्रायव्हिंग होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरकेडिंग केली. यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला पण अपघात झाले नाहीत. ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यप्राशन करणारे वाहनचालक रडारवर घेण्याचे नियोजन पोलिसांनी केले होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आपल्याकडील १५ ब्रेथ अॅनालायझरचा वापर करीत मद्यपी वाहनचालकांचा शोध घेतला. रात्री १० ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत तब्बल १५० मद्यपी वाहनचालक पोलिसांच्या हाती लागले. गत वर्षी याच दिवशी अवघे २८ मद्यपीचालकांवर कारवाई झाली होती.

प्रत्येकाला दंडाचा दणका

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ब्रेथ अॅनालायझरच्या मदतीने अल्कोहोलची तपासणी केल्यानंतर वाहनचालकांना लागलीच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले. ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणात मद्यपी वाहनचालकांना कोर्टात पाठवले जाते. वाहतूक पोलिस जागेवर पावती फाडत नाही. संबंधित १५० वाहनचालकांनाही कोर्टात पाठवण्यात आले असून, त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड होऊ शकतो. दरम्यान, नाकाबंदी व्यतिरिक्त शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या मोठ्या कार्यक्रमाजवळ पोलिसांची गस्तही सुरू होती. महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक तैनात करण्यात आले होते.

सुशिक्षितांची संख्या अधिक

सापडलेल्या तळीरामांमध्ये दुचाकीस्वारांची आणि सुशिक्षितांची संख्या लक्षणीय होती. ३१ डिसेंबरच्या बंदोबस्तासाठी सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, मुख्यालयातील ३०० कर्मचारी, १३ स्ट्रायकींग फोर्स, दोन आरसीपी प्लाटून, दोन जलद गती पथक आणि पोलिस स्टेशनचा मिळून जवळपास तीन हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर होता. या बंदोबस्तासाठी सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्याही रद्द करण्यात आल्या होत्या.

अपघात मुक्त सेलिब्रेशन व्हावे यासाठी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले. मागील दोन दिवसांपासून याची तयारी सुरू होती. ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह सारख्या गंभीर प्रकारात १५० वाहनचालक सापडले.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

..

अशी राबविली यंत्रणा

२६ प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी

३९ फिक्स पॉईंट

१५ ब्रेथ अॅनालायझरचा वापर

मुख्यालयातील ३०० कर्मचारी

१३ स्ट्रायकींग फोर्स

दोन आरसीपी प्लाटून

दोन जलद गती पथक

एकूण तीन हजार पोलिस तैनात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगार अड्ड्यांसह मद्यविक्रेत्यांना दणका

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण पोलिस दलाने ३१ डिसेंबर रोजी रात्रभर तपासणी मोहीम राबवित नाकाबंदी आणि तपासणी नाक्यांवर मद्यप्राशन करून वाहने हाकणाऱ्या ८८ वाहनचालकांवर कारवाई केली. तसेच जुगार अड्ड्यांसह अवैध मद्य विक्रेत्यांना दणका दिला.

नववर्षाचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये; तसेच जीवघेणे अपघात थांबावे यासाठी पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ४० पोलिस स्टेशननिहाय बंदोबस्त तैनात करण्यात आला. सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील महामार्ग, वर्दळीची ठिकाणे, चेक पोस्ट अशा ठिकाणांवर बॅरिकेटस् टाकून नाकाबंदी करण्यात आली. मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांना रोखण्यासाठी ब्रेथ अॅनालायझरच्या मदतीने ठिकठिकाणी वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. हॉटेल्स, ढाबे, रिसॉर्ट या ठिकाणांवर फिक्स पॉईंट लावण्यात आले. याशिवाय महामार्ग व रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क पॅट्रोलिंग ठेवण्यात आली होती.

महिला व मुलींची छेडछाड रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिस व दामिनी पथक तैनात करण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे, रिसॉर्ट, हॉटेल्स, ढाबे, मॉल्स अशा वर्दळीच्या ठिकाणी नजर ठेवण्यात आली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या कारवाईत जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा वाहतूक शाखा व मालेगावच्या शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये ८८ मद्यपी वाहनचालकांकडून १७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पाऊण लाखाचा मद्यसाठ जप्त

अवैधरित्या मद्याची विक्री व वाहतूक करणाऱ्या १५ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध दारुबंदी कायद्यानुसार तब्बल १३ गुन्हे दाखल झाले. यात ७४ हजार ४४८ रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. दरम्यान, ८ जुगाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याविरुद्ध मुंबई जुगारबंदी कायद्यान्वये चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रायच्या निर्णयाविरोधात लढणार सुप्रीम कोर्टात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केबल व्यावसायिकांनी ग्राहकांना दिलेल्या सेवेमुळे दूरचित्रवाहिन्या मोठ्या झाल्या. परंतु केबल व्यावसायिकांचे योगदान विसरून त्यांच्याच मुळावर घाला घालण्याचा कुटील डाव वाहिन्या आणि ट्रायकडून खेळला जातो आहे. म्हणूनच ट्रायच्या या निर्णयाविरोधात संघटीतपणे सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देण्याचा निर्धार नाशिक जिल्हा केबल व्यावसायिक संघटनेने मंगळवारी केला.

टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) लागू केलेल्या नव्या नियमांमुळे केबल सेवा आता पॅकेज स्वरूपात प्राप्त होणार आहे. १३० रुपये एवढ्या किमान मासिक खर्चात ग्राहकांना बेसिक फ्री चॅनल्सचे पॅकेज उपलब्ध होणार आहे. त्या व्यतिरिक्त कोणतेही चॅनल घेण्यासाठी ग्राहकांना दरमहा अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. कुठल्याही अतिरिक्त चॅनलची सेवा घेण्यासाठी ग्राहकांना विशिष्ठ रक्कम मोजावी लागणार आहे. त्याहून अधिक शुल्क आकारल्यास संबंधित केबल व्यावसायिकांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ट्रायच्या या धोरणाला देशभरातील केबल व्यावसायिकांकडून विरोध होत असून, या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा केबल व्यावसायिक संघटनेने मंगळवारी बैठक बोलावली होती.

मुंबई नाका येथील कालिकामाता मंदिराच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हाभरातून शेकडो केबल व्यावसायिक उपस्थित होते. बहुतांश केबल व्यावसायिकांनी ट्रायच्या या धोरणाला विरोध दर्शविला.

ट्रायने ग्राहकांना वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र दिले असले तरी या नियमावलीत केबल ऑपरेटर्सचा कुठेही विचार केला नसल्याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली. ट्रायचे हे धोरण केबल व्यावसायिकांच्या आणि ग्राहकांच्याही हिताचे नसल्याचा दावा करीत या नियमावलीविरोधात सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देण्याचा निर्धार या बैठकीत केबल व्यावसायिकांनी व्यक्त केला. न्यायालयीन लढ्यासाठी आर्थिक पाठबळ आवश्यक असल्याने ते उभे करण्याची तयारी दर्शविण्यात आली. ज्या ग्राहकांनी केबल व्यावसायिकांकडे अथवा दूरचित्रवाणी वाहिन्यांची सेवा पुरविणाऱ्या खासगी कंपन्यांकडे पैसे भरले आहेत त्यांनी नव्या नियमानुसार कोणत्या वाहिनीसाठी किती रक्कम भरायची याबाबत ग्राहकांसह केबल व्यावसायिकांमध्येही संभ्रम आहे. नियमावलीत सुस्पष्टता नसल्याने त्यास विरोध दर्शविण्यात आला.

ट्रायच्या नव्या नियमावलीनुसार प्रसारण कंपन्यांना महिन्याकाठी ८० टक्के तर उर्वरित २० टक्क्यांमधील केवळ १० टक्केच रक्कम केबल व्यावसायिकांच्या हातात पडणार असल्याचा दावा बैठकीत काही केबल व्यावसायिकांनी केला. ट्रायच्या या नियमावलीद्वारे अप्रत्यक्षरित्या ग्राहकांच्या खिशातून अधिक पैसे काढण्याचे काम वाहिन्या करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. ब्रॉडकास्टर, एमएसओ आणि ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून केबल व्यावसायिक काम करतात. परंतु त्यांनाच वाऱ्यावर सोडण्यात येत असल्याने न्यायालयीन लढाईचा निर्धार करण्यात आला. बैठकीला संघटनेचे अध्यक्ष नुरभाई शेख, विनय टांकसाळे, संजय गुजरानी, नितीन आव्हाड, मुकुंद बागुल आदींसह पदाधिकारी व केबल व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुतांची अंतरे

0
0

शेतकऱ्यांना वाळीत टाका

कांदा ज्याप्रमाणे डोळ्यांत अश्रू आणतो, त्याप्रमाणे कांदा पिकवणारे शेतकरी सरकारची अडवणूक करतात. कांद्याचे भाव वाढून शेतकरी खूश झाले तर अतिरिक्त पैसे मोजावे लागल्याने ग्राहकांना फटका बसतो. खरेतर शेतकऱ्यांवर सरकारचा अंकुश नाही. तो मनात येईल ते पेरतो. त्यांच्यावर कुणाचेही बंधन नाही. तो कुणाचेही नियंत्रण मानत नसतो. शेतकऱ्याला भोळा समजू नये. शेतकऱ्यासारखा हुशार-बुद्धिमान कुणीही नसावा. शेतकरी शिक्षणापासून वंचित आहे. कमी शिकला असला तरी त्याची बुद्धी चौफेर असते. तो केवळ अज्ञानाचे डोंग घेतो आणि सर्व शहाणे-विद्वानांना खरेतर वेड्यात काढत असतो. शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कर लागत नाही. दुसरीकडे सामान्य नागरिक, नोकरदार वर्गाकडून मात्र कर वसुली केली जाते. जो शेतकरी हजारो टन कांदा रस्त्यावर ओततो तो गरीब कसा? सामान्य लोकांनी अशा शेतकऱ्यांची ढोंगबाजी उघड करावी. त्यांना वाळीत टाकावे.

कृष्णा सूर्यवंशी, नाशिक

'त्या' शिक्षकाचे अभिनंदन

किरण बाबासाहेब खैरनार या संगमनेर येथील जिल्हा परिषदेतील शेतकऱ्याने सातव्या वेतन आयोगाचा लाभ घेण्याचे नाकारल्याचे वाचनात आले. खरे तर हा शिक्षक अभिनंदनास पात्र आहे. शेतकऱ्यांचे दु:ख, वेदना शासनाला व समाजाला समजाव्यात यासाठी वेतन आयोगाचा लाभ नाकारत असल्याचे या शिक्षकाने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. आपण शेतकऱ्याचा मुलगा असल्याचेही त्याने आवर्जून नमूद केले आहे. खरेतर महाराष्ट्रातील वर्ग-१ व वर्ग-२ यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रात्रपत्रित अधिकारी महासंघाने वेतन आयोगासाठी संप पुकारला होता. या मंडळींनी या अवलिया शिक्षकाकडून धडे घेण्याची गरज आहे. अशा संघटनांनी शेतकऱ्यांचे दु:ख जाणले व ते दूर करण्यासाठी प्रयत्न केले तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यास मदत होईल.

प्रा. बी. बी. घुगे, नाशिक

राखीव निधीचा तिढा

रिझर्व्ह बँकेकडे तीन लाख साठ हजार कोटी रुपयांचा राखीव निधी असूनही तो सरकारला दिला जात नाही, यावरून दिसून येते की सरकार किती हतबल झाले आहे. माजी गवर्नर ऊर्जित पटेल यांनी शेवटी राजीनामा दिला. पण ते नमले नाही. विद्यमान गवर्नरही सावधपणे पावले उचलत आहेत. सरकारवर विरोधी पक्ष आरोप करतात, की सरकारला या रकमेची गरज वित्तीय तूट भरून काढण्यासाठी हवी आहे. दुसरीकडे अर्थमंत्री जेटली लोकसभेत सांगतात, की सरकारला या निधीचा वापर गरिबी निर्मुलनासाठी व बँकांना फेर भांडवलीकरणासाठी करायचा आहे. पुढील लोकसभा निवडणुकांसाठी जेमतेम चार महिने शिल्लक आहेत. फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प संसदेकडून मंजूर करायचा आहे. बँकांचे बुडित कर्ज मोठ्या प्रमाणात वाढल्याने रिझर्व बँकेने काही सरकारी बँकांवर निर्बंध आणले आहेत. त्यांना नवीन कर्जे देण्यास रोखण्यात आल्याने सरकारची कोंडी झाली आहे. रिझर्व्ह बँकेने पैसा दिला तरी पुढील दोन महिन्यांत सरकार दारिद्र्य निर्मूलन करू शकत नाही. त्याचप्रमाणे बँका दोन महिन्यांत कर्जवाटप करून ही रक्कम मार्गी लावू शकत नाही.

विकास जोग, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्र नवीन

अर्थसंकल्पाचा अचूक भाष्यकर्ता हरपला

0
0

\Bज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंत रारावीकर यांचे निधन

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्रीय अर्थसंकल्पाचा अचूक अंदाज बांधणारे, अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. यशवंत रारावीकर यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून डॉ. रारावीकर आजारी होते. दिल्लीतील घरी उपचार सुरू असताना, मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर यांचे ते वडिल होत.

प्रा. डॉ. रारावीकर यांचा जन्म १९३६ मध्ये झाला. अर्थशास्त्रात बी.ए, एम.ए आणि पी.एचडीचे शिक्षण त्यांनी घेतले. त्यांनी ४० वर्षांहून अधिक वर्षे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. नाशिकमधील कॉलेजरोड परिसरात त्यांचे घर होते. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड बिटको कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दिल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी प्रा. डॉ. अरुणा रारावीकर या संस्कृतच्या प्राध्यापक होत्या.

डॉ. रारावीकरांचा अर्थसंकल्प हा विशेष व्यासंगाचा विषय होता. त्यामुळे अर्थसंकल्प तज्ज्ञ म्हणून त्यांच्या नावलौकीक आहे. डॉ. रारावीकर यांचा केंद्रीय अर्थसंकल्पाचा अंदाज कायम अचूक असायचा. अर्थमंत्र्यांच्या आवाहनानुसार डॉ. रारावीकरांनी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प तयार करून अर्थमंत्र्यांना एकादा पाठविला. तो अर्थसंकल्प आणि केंद्र सरकारचा अर्थसंकल्प तंतोतंत सारखा असल्याचे दिसले. त्यावेळी डॉ. रारावीकरांना बजेट अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात केलेल्या संशोधनपर लिखाणांना राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक मिळाले. डॉ. रारावीकरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केलेल्या अनेक शोधनिबंधानाही पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या जाण्याने बुध्दीवान अर्थशास्त्रतज्ज्ञ हरपल्याची भावना अर्थशास्त्र अभ्यासकांनी व्यक्त केली.

अर्थविषयक विपुल लेखन

डॉ. रारावीकरांनी अनेक आर्थिक विषयांवर विपुल लिखाण केले. प्रत्येक वर्षी केंद्रीय अर्थसंकल्पावर कॉलेज आणि विविध समूहांत त्यांची व्याख्याने होत असत. डॉ. रारावीकरांचे 'असा आहे केंद्रीय अर्थसंकल्प' हे पुस्तक दरवर्षी प्रकाशित व्हायचे. यासह 'नोबेल अर्थशास्त्रज्ञ' आणि 'डायमंड अर्थशास्त्रकोश' ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. त्यांनी अर्थसंकल्पांवर वर्तमानपत्रांमध्ये केलेले लेखन विशेष लोकप्रिय ठरले. नाशिक महापालिकेच्या समितीत आर्थिक सल्लागार म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

डॉ. रारावीकर हे अर्थतज्ज्ञ होते. त्यांचे निरीक्षण अतिशय अचूक होते. त्यामुळेच त्यांच्याकडून अर्थसंकल्प समजून घेणे ही एक मोठी संधीच असायची. अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत अर्थसंकल्प समजावून सांगणारा तज्ज्ञ आपल्यातून निघून गेला आहे. ही मोठी हानी आहे.

- डॉ. अनिता गोगटे, अर्थशास्त्र प्राध्यापिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहस्त्रदीपांनी उजळला गोदाकाठ

0
0

रामकुंड परिसरात सहस्त्रदीप प्रज्वलित करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. स्वामी सखा मित्र मेळा चॅरिटेबल ट्रस्ट व शिवनेरी मित्रमंडळातर्फे हा कार्यक्रम झाला. या वेळी स्वरधारा कार्यक्रम झाला. गणेशवंदना, सरस्वती वंदना, शिववंदनेच्या सुरांनी गोदाकाठ भक्तिमय झाला. सारेगामा लिट्ल चॅम्प्स विजेती अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड आणि नाशिकच्या पार्श्वगायिका मीना परुळेकर-निकम यांनी भजन व अभंग गायन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images