Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

kadar khan चित्र-अतुल बेलोकर


आपला वाटणारा अभ्यासक गमावला

$
0
0

आपला वाटणारा अभ्यासक गमावला

- विनायक गोविलकर, अर्थतज्ज्ञ

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. यशवंत रारावीकर सरांचा अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास होता. अभ्यासातील सातत्य ही त्यांची विशेष ख्याती! त्यामुळेच त्यांना वित्त मंत्रालयाने केंद्रीय अर्थसंकल्प पुरस्कार देऊन गौरविले. त्यांनी लिहिलेल्या शोध निबंधांना ४ सुवर्ण, ३ रौप्य आणि दोन ब्राझ पदके मिळाली. अर्थशास्त्रासारखा विषय अतिशय सोप्या भाषेत समजावून देण्यात त्यांचा हातखंडा होता. म्हणूनच त्यांना 'आदर्श शिक्षक' पुरस्कार देण्यात आला. त्यांनी ५ पुस्तके, शेकडो विचार प्रवर्तक लेख आणि अनेक भाषणातून आर्थिक विषयांवर भाष्य केले. त्यांची मांडणी सामान्य माणसापासून अर्थतज्ज्ञांपर्यंत साऱ्यांना उपयुक्त आणि दिशादर्शक असे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने त्यांच्या कृषी विषयातील संशोधनासाठी पुरस्कार प्रदान केला. भारताच्या आर्थिक आणि वित्तीय धोरणावरील त्यांच्या शोध निबंधाला नवी दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन या संस्थेने पुरस्कार देऊन गौरविले. त्यांनी ४१ वर्षे महाविद्यालयात निष्ठेने आणि अत्यंत आवडीने ज्ञानदान केले. पुणे विद्यापीठात अर्थशास्त्राच्या अभ्यास मंडळात त्यांनी सहभाग घेतला. अर्थशास्त्रातील योगदानाची दाखल घेऊन मराठी अर्थशास्त्र परिषदेने त्यांना दोन वर्षांपूर्वी 'जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित केले होते. नाशिक महापालिका, अल्प बचत खाते, महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ या सारख्या संस्थांचे ते आर्थिक सल्लागार होते. अनेक संशोधकांना त्यांनी संशोधनासाठी उद्युक्त केले, मार्गदर्शन केले. नाशिकमधून प्रकाशित होणाऱ्या 'थिंक लाईन' या अर्थविषयक द्वै मासिकाच्या उभारणीत मोलाचा वाटा होता. आपला वाटणारा अभ्यासू थोर मार्गदर्शक हरपला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेंगळुरू, उटीचा अभ्यासदौरा

$
0
0

पात्र ट्रॅव्हल्स एजन्सीकडून मागवल्या निविदा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांसाठी बेंगळुरू, म्हैसूर व उटी या तीन ठिकाणी अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला असून, त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. समितीच्या सदस्यांना अभ्यास दौऱ्यावर जाण्याचा आंनद मिळणार असून प्रशासनाने त्यासाठी पाच लाखांची तरतूद केली आहे.

महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांसाठी अभ्यास दौरा आयोजित केला जातो. यंदाही प्रशासनाने या अभ्यास दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. समितीच्या सदस्यांसाठी प्रशासनाकडून पुन्हा बेंगळुरू, म्हैसूर आणि उटी या तीन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. समितीकडून भेटी देऊन तेथील स्थानिक स्वराज्य संस्थाकडून महिला व बालकल्याणांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा अभ्यास करण्यात येतो. तसेच या संस्थांकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांनाही भेटी देऊन त्यांचा अभ्यास करून त्या योजनांचा लाभ शहरातील महिला व बालकांना देता येईल काय, याची चाचपणी केली जाते. त्यासाठी महापालिकेने पात्र ट्रॅव्हल्स कंपनीकडून यंदाही निविदा मागविल्या आहेत. त्यासाठी पाच लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

गुरुवारपर्यंत निविदामुदत

अभ्यास दौऱ्यात सदस्यांचा विमानप्रवास, मोटारप्रवास, भोजन तसेच निवासाचा खर्च समाविष्ट आहे. पात्र ट्रॅव्हल्स कंपनीकडून गुरुवार, १० जानेवारीपर्यंत निविदा मागवण्यात आल्या आहेत. निविदा मंजूर झाल्यानंतर या दौऱ्याचे नियोजन महिला व बालकल्याण विभागाकडून केले जाणार आहे. महिला व बालकल्याण समितीकडून मंजूर योजनांना प्रशासनाकडून चालना दिली जात नसली तरी सदस्यांच्या अभ्यास दौऱ्याची हौस मात्र प्रशासनाकडून दरवर्षी पूर्ण केली जात असल्याचे चित्र आहे.

लोगो : चर्चा तर होणारच!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घडवा सिल्क थ्रेडचे दागिने

$
0
0

(कल्चर क्लब लोगो, क्यू आर कोड, फेसबुक लिंक वापरावी)

--

घडवा सिल्क थ्रेडचे दागिने

'कल्चर क्लब'तर्फे कार्यशाळेचे आयोजन

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

नववर्षाच्या स्वागतानंतर घराघरात वर्षातील पहिल्यावहिल्या सणाचे म्हणजेच, संक्रांतीचे वेध लागले आहेत. या सणाच्या दिवशी होणाऱ्या हळदीकुंकू समारंभासाठी महिलावर्गाला खास दागिने हवे असतात. आता संक्रांतीच्या उत्साहाच्या जोडीला कलात्मक दागिने तुम्हाला शिकता येणार आहेत. त्यासाठी सहभागी व्हा, 'मटा कल्चर क्लब' आयोजित सिल्क थ्रेड ज्वेलरी मेकिंग कार्यशाळेत.

महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लब तर्फे संक्रांत सणाच्यानिमित्ताने सिल्क थ्रेड ज्वेलरी मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. संक्रांतीला काळी वस्त्रे आणि साजशृंगार करून महिला सजतात. घरोघरी हळदीकुंकू समारंभ करण्यात येतो. यावेळी वैविध्यपूर्ण दागिने परिधान करण्याकडे महिलावर्गाचा कल असतो. जर हे दागिने तुम्ही स्वतः तयार केलेत, तर सणाचा उत्साह अधिक वाढेल. त्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ५ ते ७ जानेवारी या कालावधीत दुपारी ३ ते ५ या वेळेत कार्यशाळा होईल. महात्मानगर येथे असलेल्या सई संघई यांच्या द फिटनेस स्टुडिओत कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेत ज्वेलरी मेकिंग एक्सपर्ट सई बोराटे या मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत बिंदी, मुकुट, हार, कानातले, मंगळसूत्र, बांगडी यांसह इतर दागिने बनविण्याचे तंत्र शिकविले जाणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी कल्चर क्लब सभासदांना ३०० आणि इतरांना ३५० रुपये शुल्क असेल. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी दुपारी २ ते ४ या वेळेत ९४२२५१३५६९ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र टाइम्स, २ रा मजला, अल्फा स्केअर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड येथे संपर्क साधावा. कल्चर कल्बच्या ऑनलाईन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com येथे भेट द्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्पनांना आकार द्या

$
0
0

कल्पनांना आकार द्या

प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य यांचा सल्ला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजाचं आपण देणं लागतो, ही भावना प्रत्येकात रुजायला हवी. आपल्या ध्येयातून समाजाचेही कल्याण होईल, याकडे प्रत्येकाने लक्ष द्यावे. सध्याच्या पिढीत कल्पनाशक्तीला अधिक वाव आहे. आपल्या मनातील कल्पना अस्तित्वात आणून त्यांना आकार द्यायला शिकले पाहिजे. जेव्हा कल्पना सत्यात उतरात तेव्हा माणूस म्हणून जगण्याचा आनंद अधिक वाढतो. त्यासाठी कल्पना वास्तवात उतरविण्यासाठी कार्य करा, असा सल्ला प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांनी विद्यार्थिनींना दिला.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. बिंदू रामराव देशमुख आर्टस अँड कॉमर्स कॉलेजमध्ये भारतीय शिक्षण व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने 'युवा आयाम'ची स्थापना करण्यात आली. यावेळी एनबीटी लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य, देशमुख कॉलेजच्या प्राचार्या डॉ. लीना पांढरे व्यासपीठावर होत्या. यावेळी विद्यार्थिनींसोबत संवाद साधताना डॉ. वैद्य म्हणाल्या, की युवा आयामच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. शिक्षणासोबतच परिसरातील समस्यांचे निवारण करण्यासाठी उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन युवा आयामतर्फे व्हावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी प्राचार्या डॉ. पांढरे यांनी युवा आयामच्या कार्यासंदर्भात माहिती दिली. त्या म्हणाल्या, की प्रत्येक मंगळवारी युवा आयाम अंतर्गत कार्यक्रम घेण्यात येतील. कार्यक्रमात विविध विषयांवर विद्यार्थिनींना आपले विचार मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येईल. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विचारांचाही अभ्यास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मीनल बर्वे यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बस कंपनी संचालकांची नियुक्ती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सिटी बससाठी स्वतंत्र परिवहन कंपनीची स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महासभेच्या ठरावानुसार या कंपनीत पंधरा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. आयुक्त या कंपनीचे अध्यक्ष राहणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नपूर्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाची तोट्यातील बससेवा महापालिकेच्या माथी मारण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सत्ताधारी भाजपने सिटी बस सेवेला चालना देत, त्या संदर्भातील प्रस्ताव महासभेवर ठेवला होता. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून शहर बससेवा चालविण्याचा प्रस्ताव २० सप्टेंबर रोजीच्या महासभेत आयुक्त मुंढे यांनी मांडला होता. बस सेवेसाठी परिवहन समिती न करता कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून ही सेवा चालविण्याचा प्रस्ताव मुंढे यांनी सादर केला होता. विरोधी पक्षांसह सत्तारूढ भाजपच्या नगरसेवकांनी बससेवेसाठी कंपनी स्थापन करण्यास कडाडून विरोध दर्शविला होता. बस सेवेसाठी परिवहन समिती स्थापन करण्याची महापालिका कायद्यातच तरतूद असताना, आयुक्तांकडून कंपनी स्थापन करण्याचा हट्ट कशासाठी, असा सवाल करीत नगरसेवकांनी परिवहन समितीसाठी महासभेतील चर्चेदरम्यान आग्रह धरला होता. चर्चेअंती सत्ताधाऱ्यांनी 'ग्रॉस कॉस्ट कटिंग' तत्त्वावर खासगीकरणातून बससेवा चालविण्याचा, तसेच परिवहन समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर केला होता. परंतु, मुंढे यांनी पुन्हा सूत्रे फिरवत कंपनीच्या बाजूने मुख्यमंत्र्यांचे मन वळवले होते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी त्याला विरोध करीत मुंढे असेपर्यंत ठरावच दिला नव्हता. मुंढे यांच्या बदलीनंतर तब्बल तीन महिन्यानंतर सत्ताधाऱ्यांनी बससेवेचा ठराव देत, कंपनीच्या बाजूने कौल दिला होता. कंपनी कायदा, २०१३ नुसार स्वतंत्र परिवहन कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. प्रशासनाला हा ठराव प्राप्त झाल्यानंतर आता सिटी बस सेवा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अंतर्गत सर्वप्रथम नववर्षात सिटी बसच्या नियंत्रणासाठी एसपीव्हीच्या धर्तीवर कंपनी स्थापन करण्यासाठी महासभेच्या ठरावानुसार १४ संचालकांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. कंपनी स्थापन करण्यासाठी संचालकांकडून कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. ती प्राप्त झाल्यानंतर कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. कंपनीची स्थापना झाल्यानंतरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

हे असतील सदस्य...

अध्यक्ष- आयुक्त, संचालक -महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता, सत्ताधारी पक्षाचा गटनेता, विरोधी पक्षाचा गटनेता, शहर अभियंता, स्मार्ट सिटी सीईओ, मुख्य लेखा परीक्षक, मुख्य लेखापाल, आरटीओ, विभागीय नियंत्रक तर सचिव म्हणून परिवहन व्यवस्थापक काम करणार आहेत. कंपनीच्या संचालकांना त्यांचे नियुक्तीपत्र रवाना करण्यात आले असून, कंपनीची लवकरच बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपी रिक्षाचालकाची मुजोरी

$
0
0

मारहाणीनंतर सायकलही नेली पळवून

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मद्यपी रिक्षाचालकाने दोघा सायकलस्वारांना धडक दिल्यानंतर त्यांनाच मारहाण करून सायकल रिक्षात टाकून नेली. देवळालीगावातील भारत पेट्रोल पंपासमोर सोमवारी (दि.३१) मध्यरात्री हा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी जोगेश्‍वर रामचंद्र राजा (वय ४९, रा. विहितगाव) यांनी एमएच १५ बीएन ४८०४ क्रमांकाच्या रिक्षाचालकाविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जोगेश्‍वर राजा यांचा मुलगा वेदांत व त्याचा मित्र मध्यरात्री दीडच्या सुमारास सायकलवरून जात होते. त्यावेळी संशयित मद्यपी रिक्षाचालकाने वेदांतच्या सायकलला धडक दिली. सायकलवरून पडल्याने वेदांतच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी संशयित रिक्षाचालकाने वेदांत व त्याच्या मित्रास मारहाण करून त्यांची सायकल रिक्षात टाकून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सुंदरनगरला गांजा जप्त

देवळाली गावातील दोघांकडून पोलिसांनी अडीच किलो गांजा जप्त केला. याबाबत उपनगर पोलिसात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबलू रामधर यादव (वय २३) व इलियास गुलाब शेख (दोघे रा. सुंदरनगर, देवळालीगाव, नाशिकरोड) अशी संशयितांची नावे आहेत. बबलू यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. बबलू यादव याच्याकडून मंगळवारी (दि. २) पाच हजार १४० रुपयांचा अडीच किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात आला.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेख यांच्यासह तिघांविरोधात वॉरंट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलेला शिवीगाळ करून तिला मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सलीम शेख यांच्यासह तिघांविरोधात बुधवारी (दि. २) न्यायालयाने पकड वॉरंट बजावले आहे. शेख यांच्यासह संभाजी शंकरराव पवार आणि नंदा दौलत रकिबे यांच्याविरोधातही अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे.

वंदना निवृत्ती मोरे असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. शेख यांच्यासह चौघांनी २१ डिसेंबर २००८ रोजी अशोकनगर येथे या महिलेला शिवीगाळ करून तिला मारहाण करण्याची धमकी दिली होती. शेख यांच्या सांगण्यावरून इतर संशयितांनी वंदना व तिची बहीण पूजा हिस मारहाणही केली होती. सातपूर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. जिल्हा न्यायालयाने खटला तातडीने चालविण्याचा आदेश देऊनही संशयित गैरहजर राहिले. संशयितांचे जिल्हा न्यायालयातील रिव्हिजनही फेटाळण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रेमाची गोष्ट सांगणारे ‘लास्ट सीन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रेम ही प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी नाजुक गोष्ट. कुणी त्यास अत्यंत गंभीरपणे घेतात, कुणी अत्यंत नाजूकपणे हाताळतात, तर कुणी याला अगदी वरवरचे स्थान देतात. अशाच दोन मैत्रिणीच्या आयुष्यात प्रेम येते. दोघींही आपापल्या स्वभावाप्रमाणे प्रेमाला स्थान देतात. प्रेमावर भाष्य करणारे 'लास्ट सीन' हे नाटक कामगार कल्याण केंद्र गांधीनगर वसाहत यांच्या वतीने ६६ व्या कामगार कल्याण महोत्सवात सादर झाले. प. सा. नाट्यगृहात बुधवारी या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.

सध्या समाजात तरुण पिढीमध्ये प्रेमाचे मोठे फॅड आहे. प्रेम करणे ही फॅशन झाली आहे. अनिता आणि सुमन या दोघी मैत्रिणी असतात. सुमन ही अत्यंत स्वच्छंदी असते. सुमनच्या आयुष्यात अनेक बॉयफ्रेंड येऊन गेलेले असतात; मात्र अनिता यापासून दुर असते. असेच एकदा प्रसाद नावाचा एक तरुण अनिताच्या प्रेमात पडतो. अनेक वर्षे त्यांचे प्रेम सुरू असते. अशावेळी अनिताच्या शाळेतील एक मुलगा अजय हा देखील तिच्यावर शाळेपासून प्रेम करीत असतो. अजय शाळेपासून प्रेम करीत असल्याने अनिता प्रसादला सोडून अजयबरोबर राहू लागते. अनिताला एचआयव्ही असल्याचे कालांतराने उघड होते. अजय अनिताची तिच्या आजारपणात काळजी घेत नाही. तो तिला सोडून निघून जातो. या कालावधीत अनिताची प्रकृती जास्त खालावते व अनिताचा त्यात मृत्यू होतो. अनिताचा मृत्यू हा प्रसादच्या जिव्हारी लागतो. प्रसाद हा अनितावर खरोखर प्रेम करीत असल्याने अनिताने त्याला सोडल्यानंतर कुणाबरोबरही संबंध ठेवलेले नसतात. अखेर अनिताच्या चितेत उडी घेऊन प्रसाद आपले जीवन संपवतो, असे या नाटकाचा लास्ट सीन आहे. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसन्न काटे यांनी केले होते.

नेपथ्य - नीलेश जोशी, संगीत - प्रा. नीलेश जाधव, प्रकाशयोजना - दिनेश चौधरी, रंगभूषा - माणिक कानडे यांची होती. नाटकात अनिताची भूमिका सायली पाबळकर, सुमन - भाग्यश्री कुवर, प्रसाद - शुभम शिंदे, दादा - सतीश वाणी, सुमनचा नवरा - गिरीष देशपांडे, अजय - नारायण माळी यांनी भूमिका केल्या. नाटकाची निर्मिती बहुरंगी कलावंत यांची होती. निर्मितीप्रमुख पंकज देशमुख व सायली हे होते. नाटकाला सौरभ मोरे, संकेत मोरे, विश्वास, नंदू ह्याळीज, माधव सुराळकर, विनम्र, प्रकाश सोनवणे यांनी सहाय्य केले.

\Bलोगो : कामगार कल्याण नाट्य महोत्सव

फोटो : सतीश काळे \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशीसाठी अखेर समिती स्थापन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आरक्षित भूखंडाच्या २१ कोटींच्या मोबदल्याप्रकरणी स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी द्विसदस्यी समिती स्थापन केली आहे. समितीत समाजकल्याण उपायुक्त हरिभाऊ फडोळ आणि नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक किशोर पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.

क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या या भूखंडाच्या संपादनापोटी उर्वरित २१ कोटींचा निधी स्थायी समितीची मान्यता न घेता प्रशासनाने परस्पर अदा केल्यावरून भाजपमध्येच वाद सुरू झाला आहे. तुकाराम मुंढे यांची बदली होताच प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी परस्पर हा मोबदला दिला होता. आयुक्त गमे पदभार स्वीकारण्याच्या पूर्वसंध्येला राधाकृष्णन् यांनी रात्री ८ वाजता उपअभियंत्यांकडे नगररचना सहायक संचालकाचा पदभार असताना धनादेश काढण्याची घाई केल्याचा पाटील यांचा आरोप आहे. या प्रकरणात सभागृहनेते पाटील व स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्यात रंगलेला सामना व स्थायी समितीत सभापतींविरोधात झालेल्या आंदोलनाचा वाद रंगला होता. प्रदेश पदाधिकाऱ्यांनी समेट घडविल्यानंतर सभापती आहेर-आडके यांनी चौकशीसाठी उपसमिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांनाही चौकशीबाबत आदेश देण्यात आला होता. महासभेने याबाबत ठराव केला असून, उपअभियंता अग्रवाल यांनी आणलेली टिप्पणी बदलून धनादेश काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप कसा केला, उत्कर्ष वाघ नावाच्या दलालाने या प्रकरणात कशी मध्यस्थी केली, या प्रकरणाची चौकशी करून महापालिकेच्या आर्थिक नुकसानीची अधिकाऱ्यांकडून वसुली करावी व त्यांचे अधिकारही गोठवावेत, अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात आली आहे. ठराव महापौरांकडून प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांनी त्यावर तत्काळ अंमलबजावणी केली असून, चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी परिसरात उद्या निर्जळी

$
0
0

नाशिक : पंचवटी जलशुद्धिकरण केंद्राच्या आवारात मुख्य वितरण वाहिनीच्या क्रॉस कनेक्शनचे काम हाती घेण्यात येणार असल्याने पंचवटी विभागातील दुपार व सायंकाळचा पाणीपुरवठा शुक्रवारी (दि. ४) बंद राहणार आहे. शनिवारी (दि. ५) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. प्रभाग क्रमांक ४ मधील आरटीओ मेरी परिसर, तारवाला नगर, स्वस्तिक नगर, लामखेडे मळा ते हिरावाडी दिंडोरी रोडवरील अवधूतवाडी, फुलेनगर, पंचवटी पोलिस स्टेशन परिसर, श्रीरामनगर, लोकसहकार नगर, निमाणी परिसर ते पंचवटी कारंजा परिसर, तसेच प्रभाग क्रमांक ५ मधील पंचवटी भाजी मार्केट, दिंडोरीनाका, पेठनाका, इंद्रकुंड, एरंडवाडी, मेघराज बेकरी ते पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्डपासून रामकुंडापर्यंत, पंचवटी गावठाण भागातील मालवीय चौक, शनिचौक व रामकुंड परिसर आदी भागात शुक्रवारी दुपारचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रारीशिवाय ‘लोकसंवाद’

$
0
0

घरकुलासाठी खेटा घालणारा मजूर प्रवेशापासून वंचित

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साहेब, २०१५ पासून सरकारी कार्यालयांना खेटा घालतोय. घरकुलासाठी अर्ज करून तीन वर्षे झाली. पण अजून घर मिळाले नाही. पाठपुरावा करूनही कुणी दाद लागू देत नाही. घरकुलांबाबत मुख्यमंत्री साहेब लोकांशी थेट बोलणार असल्याचे समजले. मलाही त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडू द्याल असे आर्जव करून सिन्नर तालुक्यातील मजूर घायकुतीला आला. परंतु, छान चाललेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उगीच रडगाणे नको, म्हणून त्याला प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स जिल्हा प्रशासनाला हवी होती अगदी तशीच पार पडली. हताश मजूर हात हलवित माघारी परतला असला तरी ही व्हिडीओ कॉन्फरन्स व्यवस्थित पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.

प्रत्येकाला हक्काचा निवारा मिळावा, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आग्रही आहे. आतापर्यंत हजारो लाभार्थींना घर दिल्याचा दावा केला जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यभरातील निवडक लाभार्थींशी संवाद साधला. सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील रहिवाशी असलेला रमेश भगत मोलमजुरी करतात. राहण्यासाठी घरकुल मिळावे यासाठी त्यांनी २०१५ मध्ये अर्ज केला आहे. मात्र, अजूनही त्यांना घर मिळू शकलेले नाही. जिल्हा स्तरावरील सरकारी कार्यालयांमध्ये पाठपुरावा करूनही दाद दिली जात नसल्याने मंगळवारी त्यांनी थेट मंत्रालय गाठले. तेथील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून व्यथा मांडली. मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घरकुल योजनांच्या लाभार्थींशी बुधवारी (दि.२) संवाद साधणार आहेत. तुम्ही तुमच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या कॉन्फरन्समध्ये व्यथा मांडा, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे भगत हे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी दाखल झाले. या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये निवडक लाभार्थींनाच प्रवेश असल्याने त्यांना मज्जाव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांकडे थेट व्यथा मांडण्याची संधी आहे, मला माझे गाऱ्हाणे मांडू द्या, अशी वारंवार विनंती त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना केली. परंतु, या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याने त्यांना आल्या पाऊली माघारी परतावे लागले.

'साहेब आमच्या गावी या!'

मुख्यमंत्र्यांशी संवाद साधता येणार असल्याने लाभार्थींमध्ये कमालीची उत्सुकता होती. नाशिकमधील सात-आठ लाभार्थींशी फडणवीस यांनी संवाद साधला. डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या स्मृती जपण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी आमच्या गावात स्तुप बांधला आहे. मात्र, या स्तुपाला वंदन करण्यासाठी एकही मंत्री गावी आलेला नाही. आपण आमच्या गावात अवश्य या, अशी विनंती सैय्यद पिंप्री येथील रहिवाशी दशरथ लोखंडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांना केली. तर सिन्नर तालुका नेहमीच दुष्काळाच्या झळा सोसत असल्याने 'साहेब आमचा पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढा' असे आर्जव दातली येथील रहिवाशी रज्जाक सय्यद यांनी मुख्यमंत्र्यांना केले. या कॉन्फरन्सला जिल्हाभरातून ३० लाभार्थी उपस्थित होते. सरकारने हक्काचा निवारा दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करीत धन्यवादही दिले.

'घर सुंदर बांधलं तुम्ही!'

महिरवणी येथे आपल्या घरासमोरून संवादात सहभागी झालेले लक्ष्मण आणि नंदा पाडेकर यांना फडणवीस यांनी घराबद्दल विचारले. 'नमस्कार' असे म्हणत संवादाची सुरुवात करून 'फार सुंदर घर बांधलं तुम्ही, रंग वगैरे छान दिला' असे मुख्यमंत्री म्हणाले. 'रंग वगैरे तुम्ही ठरविला की साहेबांनी ठरविला' असे गमतीने विचारताच ती आमची पसंत असल्याचे नंदा पाडेकर म्हणाल्या. घर सुंदर झाल्याचे पुन्हा नमूद करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले. मातीचे घर असल्याने पावसाळ्यात खूप त्रास होत असे. प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळाल्याने मुलांना विशेष आनंद झाल्याचे सांगत पाडेकर दाम्पत्याने सरकारबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

२०१५ मध्ये अर्ज करूनही मला घरकुल मिळू शकलेले नाही. ते लवकर मिळावे यासाठी मी मंत्रालयापर्यंत जाऊन आलो. मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधता यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलो. परंतु, मला आत जाऊ दिले नाही. लोकसंवादात माझी व्यथाही ऐकून घ्यायला हवी होती.

- रमेश भगत, मजूर

सामाजिक आणि आर्थिक सर्व्हेक्षण २०११ च्या यादीनुसार पात्र ठरू शकणाऱ्या लाभार्थींची यादी बनविण्यात आली आहे. रमेश भगत यांच्या नावाचा समावेश प्रपत्र डमध्ये असून त्यांच्यासारखे ३० हजार लोक घरकुलाच्या प्रतिक्षेत आहेत. घरकुलाच्या लाभापासून कुणालाही डावलले जाणार नाही.

- राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी

लोगो : निष्पक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नावा’ चषक स्पर्धा रविवारी रंगणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ६ जानेवारी रोजी क्रिकेट स्पर्धा रंगणार असून, या 'नावा चषका'च्या सामन्यांमुळे मीडिया क्रिकेट संघात उत्साहाचे वातावरण आहे.

नाशिक अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन(नावा)तर्फे टी-१० इंटर मीडिया क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (६ जानेवारी) रोजी सकाळी ८ वाजेपासून फ्रावशी इंटरनॅशनल स्कुलच्या मैदानावर स्पर्धेचे सामने होणार आहेत. या सामन्यांचे लॉट्स जाहीर झाले आहेत. त्यानुसार स्पर्धेत महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, लोकमत, माय.एफ.एम, दिव्य मराठी, पुण्यनगरी, सकाळ, देशदूत या माध्यमांच्या क्रिकेट संघांनी सहभाग घेतला आहे. नावा संघटनेचाही क्रिकेट संघ स्पर्धेत सहभागी होणार असून, नावा विरुद्ध पहिल्या सामन्यातील विजेत्या संघासोबत स्पर्धा होईल. त्यानंतर क्वॉटर फायनल, सेमी फायनल आणि फायनल स्पर्धा होतील. या स्पर्धेत विजेत्या संघाला 'नावा चषक' मिळणार असून, उत्कृष्ट बॅटसमॅन, बॉलर, मॅन ऑफ द मॅन आणि मॅन ऑफ द सिरिज, हे पुरस्कार देण्यात येणार आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी 'नावा'चे अध्यक्ष विठ्ठल देशपांडे, क्रिकेट समिती प्रमुख सचिन गिते व रवी पवार यांसह 'नावा'चे सर्व सदस्य आणि माध्यमांचे प्रतिनिधी संयोजन करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खबरदार! मुलांना वाहन दिले तर...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अल्पवयीन वाहनचालक आढळून आल्यास त्यांच्याकडून दंड वसूल करण्याऐवजी त्यांना आता थेट कोर्टात धाडण्याचे काम नाशिक पोलिसांनी सुरू केले आहे. याप्रकरणी अल्पवयिनाचे पालक किंवा वाहन मालकाला जबाबदार धरण्याची मोहीम पोलिसांकडून राबविली जात आहे. त्यामुळे तीन जणांना थेट कोर्टात पाठविण्यात आले आहे. शहरातील ही पहिलीच कारवाई आहे.

यंदा वर्षी रस्ते अपघातांची संख्या कमी व्हावी, यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून वाहतूक सुरक्षेवर भर देण्यात येत आहे. त्याअंतर्गत अल्पवयिनांना वाहन देणाऱ्या पालकांवर, तसेच वाहन मालकांवर थेट कोर्टात केस केली जात आहे. २८ डिसेंबर रोजी वाहतूक पोलिसांनी तीन अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई केली. या वाहनांच्या मालकावर बाल न्याय मंडळात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार कोर्टाने दोन मालकांना दंडात्मक कारवाईची शिक्षा सुनावली. तिसऱ्या वाहनमालकावरील तक्रारीवर लवकरच सुनावणी होणार असल्याचे वाहतूक शाखेने सांगितले. शहरात वय वर्षे १५ ते १८ दरम्यानची अनेक मुले मुली विनापरवाना वाहन चालविताना वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्यास ते पुन्हा वाहने चालवितात. पण, अल्पवयीन वाहनचालकांना वाहने देणाऱ्यांनाही शिस्त लागावी, यासाठी मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन वाहनचालकांना वाहन चालविण्यास देणाऱ्यांवर कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारण्यास सुरुवात केली आहे. ही मोहीम कायमस्वरुपी सुरू राहणार असून, अल्पवयीन वाहनचालकास पडकल्यावर त्याचे वाहन जप्त करण्यात येणार आहे. ते वाहन कोर्टात हजर करून मालकाविरोधात बाल न्याय मंडळात तक्रार दाखल केली जाईल. त्यानंतर कोर्टाच्या सुनावणीनंतरच वाहन मिळेल. तसेच कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेस वाहन मालक जबाबदार असेल, असे वाहतूक शाखेने सांगितले आहे. तसेच या वाहन मालकांवर होणाऱ्या तक्रारींचा स्वतंत्र अहवाल तयार करण्यात येईल. ज्या वाहन मालकावर तीनपेक्षा अधिक वेळा तक्रार नोंदवली जाईल, त्याचा वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवण्यात येईल, असे वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले.

पालकांनी १८ वर्षांखालील मुलामुलींना वाहने चालविण्यास देऊ नये. अनेकदा पालकांच्या नकळत आणि परवनागीशिवाय मुले वाहने चालवितात. त्यामुळे अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांवर किंवा ज्याचे वाहन असेल, त्या मालकाविरोधात तक्रार नोंदविण्यात येईल.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, आयुक्त

\Bशिक्षण संस्थांना पत्र

\Bवय वर्षे १८ खालील कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी रॅश ड्रायव्हिंग करतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. त्यामुळे १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांनी वाहने कॉलेजमध्ये आणू नयेत, अशी सूचना कॉलेजांनी विद्यार्थ्यांना द्यावी, तसेच वाहतुकीच्या नियमांसंदर्भात माहिती व प्रबोधन करावे, असे पत्र वाहतूक शाखेने शहरातील शिक्षण संस्थांना पाठविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डझनभर वाहने पेटवली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोडच्या आयएसपी-सीएनपी प्रेसच्या नेहरूनगर कर्मचारी वसाहतीमध्ये माथेफिरूने काल मध्यरात्री तब्बल तीन ठिकाणी दहा दुचाकी व दोन कारसह एकूण बारा वाहने पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे उपनगर पोलिस ठाण्यापासून जवळच हा प्रकार घडला. या वाहनांमध्ये चार सरकारी दुचाकी आहेत.

सीआयएफचे जवान संजयकुमार नरहरी बनसोडे यांच्या तक्रारीनुसार उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञात समाज कंटकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहने पेटविण्याची उपनगर परिसरातील सहा महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. सहा महिन्यांपूर्वी नेहरूनगरमध्ये सीआयएसएफचे समाजकंटकाने शासकीय वाहन पेटवले होते. त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेस कामगारांसाठी नेहरूनगर वसाहत स्थापन करण्यात आली आहे. या वसाहतीमध्येच उपनगर पोलिस ठाणे आहे. या वसाहतीत प्रेस कामगारांबरोबरच प्रेसची सुरक्षा सांभाळणारे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे (सीआयएसएफ) कर्मचारी राहतात. बुधवारी उत्तररात्री दोन ते चारच्या सुमारास नेहरूनगर वसाहतीमधील क्वार्टर नंबर २, १६ आणि अन्य एका क्वार्टरजवळ वाहने पेटवून दिल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. ज्वलनशील पदार्थ टाकून आणि शार्ट सर्किट करून ही वाहने पेटवून दिल्याचा अंदाज आहे. आगीत स्प्लेंडर कंपनीची एमएच १५, ८०१२, एमएच १५-८०१४, एमएच १५-८०१६, एमएच १५-७४३९, तसेच डिस्कव्हर कंपनीची एमएच ०५-९८४७, बजाज प्लॅटिना एमएच १५-८००६, हीरो सीबीझेड कंपनीची ०५८६, स्कूटर एपी ३१- २४०५, टीव्हीएस कंपनीची दुचाकी तसेच दोन चारचाकी वाहने खाक झाली. काही वाहनांचे नंबर नाहीसे झालेले आहेत. चार दुचाकी या सरकारी म्हणजेच सीआयफच्या मालकीच्या आहेत. घटना घडलेली ठिकाणे उपनगर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहेत. जळालेली वाहने उपनगर पोलिस ठाण्याच्या आवारात आणण्यात आली असून, झाकून ठेवण्यात आली आहेत. नाशिकच्या फॉरेन्सिक लॅब तज्ज्ञांनी या ठिकाणी भेट देऊन नमुने घेतले आहेत. त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर घटनेवर अधिक प्रकाश पडेल.

माथेफिरुचे कृत्य?

उपनगरचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी सांगितले की, एखाद्या माथेफिरुने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अंतर्गत कलहातून ही वाहने पेटवली का, याचाही शोध पोलिस घेत आहे. संशयिताने ज्वलनशील पदार्थ टाकून, तसेच शार्ट सर्किटच्या सहाय्याने वाहने पेटवली. दोन शासकीय निवासस्थानांच्या जिन्यातील सार्वजनिक मीटर सर्किट होऊन जळालेली आहेत. सुरुवातीला या मीटरवर ज्वलनशील पदार्थ फेकला असावा, असा अंदाज आहे. नाशिकरोड आणि उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठराविक कालावधीने वाहने जळीताचे प्रकार घडत आहेत. सिन्नरफाटा, उपनगर, लोखंडे मळा, नारायण बापूचौक, देवळालीगाव आदी ठिकाणी वाहने पेटवल्याचे प्रकार घडले आहेत. या समाजकंटकांवर कठोर कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा २९, ३० रोजी संप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवृत्त होणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यास सरकारी सेवेत घ्यावे, यासह विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने बुधवारी निदर्शने केली. प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास २९ आणि ३० जानेवारीला लाक्षणिक संप करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाला याबाबतचे निवेदन दिले आहे. चतुर्थश्रेणीमधून तृतीयश्रेणी अशी ५० टक्क्यांऐवजी २५ टक्केच पदोन्नती दिली तरी हरकत नाही. परंतु, रिक्त होणारी २५ टक्के पदे भरली जावीत, अशी संघटनेची मागणी आहे. अनुकंपावरील सेवाभरती विनाअट करावी, वैद्यकीय दृष्ट्या अपात्र कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास सरकारी सेवेत सामावून घ्यावे, राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे सरळ सेवेन भरली जावीत यासारख्या मागण्यांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही त्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. सरकारी नोकरीतील ठेकेदारी पद्धत बंद करावी, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना गणवेशाऐवजी त्यासाठी २५०० रुपये रोख स्वरूपात द्यावेत, २००५ नंतर सरकारी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची अंशदायी पेन्शन योजना रद्द करून पूर्वीप्रमाणे निवृत्तीवेतन योजना लागू करावी, महसूल विभागात कोतवाल पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना कोणतीही टक्केवारी न लावता थेट सरकारी सेवेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन सरकारी सेवेत सामावून घ्यावे, यासारख्या मागण्यांसाठी ७ ते ९ ऑगस्ट या कालावधीत संप पुकारण्यात आला होता.

सरकार उदासीन

सरकारने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची अजूनही गांभीर्याने दखल घेतली नसल्याबाबत संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कासार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या मागण्यांचे निवेदन सरकारपर्यंत पोहोचवावे अशी विनंती यावेळी करण्यात आली. प्रलंबित मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संप अटळ असल्याचा इशाराही कासार यांच्यासह राजेंद्र अहिरे, बाबा जाधवर, सुरेश घाडगे, अरुण तांबे, संजय शिंदे, किसन सानप आदींनी दिला आहे.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमधून लॅपटॉप, डेबिट कार्ड लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नववर्षाचे स्वागत निर्विघ्नपणे व्हावे यासाठी पूर्वसंध्येपासूनच पोलिसांनी शहरात रंगीत तालीम करूनही चोरट्यांनी वर्दळीच्या परिसरात चार वाहनांच्या काचा फोडून किंमती मुद्देमाल लांबविला. यात लॅपटॉप, डेबिट कार्डसह महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश आहे.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ३१ डिसेंबरला अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलिसांनी सायंकाळपासून पहाटेपर्यंत ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. परंतु, याच कालावधीत रात्री आठच्या सुमारास चोरट्यांनी तिबेटियन मार्केट ते चोपडा लॉन्सपर्यंतच्या परिसरात काही वाहनांच्या काचा फोडून लॅपटॉप, डेबिटकार्ड यासारखा महत्त्वाचा मुद्देमाल चोरून नेला. चोपडा लॉन्ससमोर उभ्या असलेल्या कारच्या (एमएच १५ डीएस ८२२० आणि एमएच १५ जीएल ६०००) काचा फोडून चोरट्याने बँकेची महत्त्वाची कागदपत्रे, डेबिट कार्ड असा ऐवज चोरला.

गंगापूर रोडवरील खतीब डेअरीसमोर उभ्या कारची (एमएच १५ डीएस ६५०३) काच फोडून चोरट्यांनी २० हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून नेला. विशेष म्हणजे हा प्रकार घडला तेथून हाकेच्या अंतरावर गंगापूर नाका सिग्नल चौकात पोलिसांचा चोख पोलिस बंदाबेस्त होता. कॉलेजरोड परिसरात कारची (एमएच ४६ एयू ३०७१) काच फोडून चोरट्याने महत्त्वाची कागदपत्रे लांबविली तर तिबेटीयन मार्केट परिसरात उभ्या कारची (एमएच १५ डीएस ६५०३) काच फोडून चोरट्याने लॅपटॉप लांबविली. या प्रकरणी डॉ. राजेश श्रीधर भावसार (वय ४८, रा. जिल्हा रायगड) यांनी सरकारवाडा पोलिसात फिर्याद दिली आहे.

बंदोबस्त दंडवसुलीसाठी!

पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी असतानाही वर्दळीच्या ठिकाणी वाहनांमधून चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बंदोबस्त मद्यपी आणि बेशिस्त चालकांकडून दंड वसुलीसाठी होता की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी असा सवाल त्यामुळे उपस्थित होऊ लागला आहे. सरकारवाडा पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहिता आत्महत्या; सात जणांविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेती उपयोगी औषधांचे दुकान सुरू करण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणावेत यासाठी सासरकडील मंडळींकडून छळ होत असल्याने एका विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी तिरडशेत येथील भावले कुटुंबीयांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीलिमा उर्फ आदिका उमेश भावले (वय २६) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. तिने सोमवारी (दि. ३१) घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नीलिमाचा भाऊ गणेश पोपटराव खर्जुल (वय ३०, रा. नाशिकरोड) याने सातपूर पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी पती, सासरे, दीर, जाऊ यांसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 'आता मला सहन होत नाही, सॉरी!' असा मजकूर सोमवारी सकाळी नीलिमाने पती उमेश सुकदेव भावले यांना व्हॉट्सअॅपवर पाठविला. त्यानंतर उमेश घाईघाईने घरी पोहोचले असता नीलिमा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी उमेश याच्यासह नीलिमाचे सासरे सुकदेव दादा भावले, दीर संदीप आणि किरण भावले, जाऊ गायत्री आणि सोनाली भावले आणि जावांचे वडील बाळासाहेब बंदावणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी उमेश, संदीप आणि किरण या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. नीलिमाचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.

बलात्कार प्रकरणी

तरुणावर गुन्हा

नाशिक : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करीत गर्भवती ठेवल्याचा प्रकार काझीगढी परिसरात उघडकीस आला. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी आकाश राजू खाडे (वय १९, रा. काझीगढी) या संशयितास अटक केली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे. संशयित आकाशने जानेवारी २०१८ पासून अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवले. तिला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. ती गर्भवती राहिल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडितेच्या आईने भद्रकाली पोलिसात फिर्याद दिली असून आकाश याच्यावर पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक व्ही. के. शिंदे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात नवीन मलवाहिका

$
0
0

नेटवर्क सुधारले जाणार

..

\B-\B १६० कि. मी.च्या मलवाहिका टाकणार

- दोन वर्षात ९० कोटींचा खर्च होणार

- शहरात सद्यस्थितीत १५४५ कि. मी. लांबीच्या मलवाहिका

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या वतीने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासह मलनिस्सारण व्यवस्थेच्या सक्षमीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे शहरात महापालिकेच्या माध्यमातून तब्बल १६० किलोमीटर लांबीच्या नव्या मलवाहिका टाकण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल ९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, चालू वर्षात ५० कोटींचा खर्च केला जाणार आहे. पुढील बजेटमध्ये यावर ४० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे मलवाहिकांचे नेटवर्क सुधारणार आहे.

शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण व काही प्रमाणात दारणा धरणातून दररोज ४३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. या पाण्याचा पुरवठा केल्यानंतर ७० टक्के पाणी हे सांडपाण्याच्या रुपाने मलवाहिकांमध्ये सोडले जाते. मलवाहिकांच्या माध्यमातून हे पाणी नदीपात्रात सोडण्यात येते. शहरात सद्य:स्थितीत १५४५ कि. मी. लांबीच्या मलवाहिका असून, मलवाहिकांच्या माध्यमातून सांडपाणी मलनिस्सारण केंद्रांपर्यंत आणले जाते. तेथे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीपात्रात सोडण्यात येते. सद्य:स्थितीत शहरात ९० टक्के मलवाहिकांचे जाळे आहे. नव्याने निर्माण झालेल्या वसाहतींमध्ये आता महापालिकेच्या माध्यमातून १६० कि.मी. लांबीच्या नव्या मलवाहिका टाकण्यात येणार आहेत. यासाठी ९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, या कामांच्या निविदा प्रक्रियादेखील पूर्ण झाल्या आहेत.

...

आरेखन व मोजमाप सुरू

सद्या मलवाहिका टाकण्याच्या कामांचे आरेखन व मोजमाप सुरू आहे. या कामांसाठी चालू आर्थिक वर्षात सुमारे ५० कोटींची तरतूद उपलब्ध आहे. उर्वरित ४० कोटींची तरतूद आगामी बजेटमधून उपलब्ध केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’चा गणनिहाय दौरा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेस गुरुवार, ३ जानेवारीपासून नाशिक लोकसभा मतदारसंघात गणनिहाय दौरा करणार आहे. यात पदाधिकारी गावनिहाय बुथप्रमुखांची नेमणूक आणि पक्षबांधणीचा आढावा घेणार आहे. दौऱ्यात माजी खासदार समीर भुजबळ, तालुकाध्यक्ष तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे नाशिक लोकसभा जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड व कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांनी दिली.

दौऱ्यात शुकवारी (दि. ३) सकाळी ९ वाजता गिरणारे गण-मातोरी, १० वाजता देवरगाव गण-धोंडेगाव, ११ वाजता गोवर्धन गण, दुपारी १२ वाजता विल्होळी गण, १ वाजता पिंप्री सय्यद गण, २ वाजता एकलहरे गण, ३ वाजता पळसे गण व सायंकाळी ४ वाजता लहवित गणाचा आढावा घेणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्याचा गणनिहाय दौरा शुक्रवारी (दि. ४) करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता मुलवड गण, साडेदहा वाजता ठाणापाडा गण, दुपारी १२ वाजता हरसूल गण, दीड वाजता वाघेरा गण, ३ वाजता अंजनेरी गण व सायंकाळी साडेचार वाजता देवगाव गण येथे आढावा घेणार आहे. तसेच, शनिवारी (दि. ५) सिन्नर तालुका गणनिहाय दौरा करण्यात येणार असून सकाळी ९ वाजता शिवडे गण पांढुर्ली, १०.३० वाजता ठाणगाव गण, दुपारी १२ वाजता डूबेर गण पाटोळे, दीड वाजता चास गण, ३ वाजता नांदूरशिंगोटे गण- दोडी बु, सायंकाळी चार वाजता पांगरी बु गण-वावी व ५ वाजता भरतपूर गण-शहा येथे आढावा बैठक घेणार आहे.

तसेच रविवारी, ६ जानेवारी रोजी इगतपुरी तालुक्याचा दौरा करणार असून सकाळी ९ वाजता वाडीवऱ्हे गण, साडेदहा वाजता नांदगाव बु. गण, दुपारी १२ वाजता मुंढेगाव गण, १ वाजता घोटी बु. गण, २ वाजता खंबाळे गण, ३ वाजता शिरसाटे गण- कावनाई, सायंकाळी साडेचार वाजता काळूस्ते गण व सायंकाळी ६ वाजता नांदगाव सदो गण येथे आढावा बैठका घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images