Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

चार आदिवासी तरुणअपघातात जागीच ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा-ताहाराबाद रस्त्यावरील औंदाणे गावाजवळ गुरुवारी दुपारी भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला समोरासमोर दिलेल्या धडकेत दुचाकीवरील चार आदिवासी तरुण जागीच ठार झाले. नववर्षातील पहिलाच मोठा अपघात असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. समाधान दादाजी पटाईत (वय १८), अरुण देवरे (१९), अनिल दगडू माळी (१८), शरद तानाजी सोनवणे (२२, सर्व रा. तळवाडे) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. हे सर्व तरुण एकाच दुचाकीवर होते. अंतापूर येथील कंदोरीच्या कार्यक्रमावरून परतताना हा अपघात झाला.

अंतापूर येथे दावल मलिकबाबा मंदिरातील कंदोरीचा कार्यक्रम आटोपून चारही तरुण गुरुवारी दुपारी एकाच मोटारसायकलवरून सटाणा- मालेगावमार्गे तळवाडे गावाकडे परतत होते. मात्र, दुपारी तीनच्या सुमारास औंदाणे येथील शेताजवळ समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाची (एमएच १८/डीबी २९०३) मोटारसायकलला समोरासमोर धडक झाली. त्यात चारही तरुण जागीच ठार झाले. हे तरुण मोलमजुरी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. धडकेनंतर पिकअप वाहनाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, औंदाणे येथील ग्रामस्थांनी पाठलाग करून पिकअप वाहन पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्रीडासंकुलाचे आज लोकार्पण

$
0
0

जेलरोड : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ११) सकाळी साडेदहाला प्रभाग १७, आढावनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे लोकार्पण केले जाणार आहे. यावेळी राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, बाळासाहेब सानप, अनिल कदम, बापू वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आदींची प्रमुख उपस्थिती राहील. महापौर रंजना भानसी अध्यक्षस्थानी असतील. क्रीडांगणासाठी २४ हजार चौरस मीटर जागा आरक्षित आहे. महापालिका, केंद्र सरकार आणि नाशिक क्रीडा विभाग यांच्या माध्यमातून हे इनडोअर स्टेडियम उभारण्यात आले आहे. २०१६ मध्ये भूमीपूजन झालेल्या या स्टेडियमच्या निधीसाठी खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्लीत पाठपुरावा केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्गाला सुवर्ण

$
0
0

पुणे : खेलो इंडियात महाराष्ट्राच्या दुर्गा देवरेने २१ वर्षांखालील १५०० मीटर शर्यतीत सुवर्ण जिंकले. नाशिकच्याच ताई बामणेला १७ वर्षांखालील गटात ब्राँझवर समाधान मानावे लागले.

सविस्तर वृत्त...११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विद्युत सुरक्षा’चे गुरुवारी उद्घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुख्य विद्युत निरीक्षक यांच्या वतीने आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन गुरुवारी (दि. १७) करण्यात येणार आहे. सप्ताहाच्या अनुषंगाने विद्युत सुरक्षा जनजागृती करीता विद्युत निरीक्षक, महावितरण, महापारेषण, महाजनको, मनपा, विद्युत ठेकेदार संघटना नाशिक व तसेच जिल्ह्यातील विविध कंपन्याचे सहभागाने कार्यक्रम होणार आहेत. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्युत सुरक्षेवर प्रबोधन, विद्युत सुरक्षेवर चित्रकला, निबंध व कविता स्पर्धा होतील.

अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन, आयटीआय इत्यादी ठिकाणी विद्युत सुरक्षा, विजेचा वापरासंबंधी विविध औद्योगिक व व्यापारी संस्थामध्ये तसेच सोशल मीडियाद्वारे विद्युत सुरक्षेविषयी जनजागृती केली जाणार आहे. विद्युत सुरक्षाविषयक पोस्टर्स लावण्यासह जनजागृती रॅली काढली जाणार आहे. महापालिका विद्युत कर्मचारी, महावितरण कर्मचारी, अग्निशमन विभाग मनपा नाशिक यांच्यासाठी विद्युत कार्यशाळाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे विद्युत निरीक्षक एच. एन. गांगुर्डे यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा रुग्णालयांत सोनोग्राफीची सुविधा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिडकोतील घटनेची गंभीर दखल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतली असून, आता महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये चार सोनोग्राफी यंत्रांच्या खरेदीसाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने ७७ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला आहे.

महापालिकेच्या माध्यममातून नाशिकरोड येथे बिटको रुग्णालय, पंचवटीत इंदिरा गांधी रुग्णालय, जुन्या नाशकात डॉ. झाकीर हुसेन (कथडा) रुग्णालय, जिजामाता प्रसूतीगृह, सातपूर येथे मायको रुग्णालय, तसेच नवीन नाशिक विभागात स्वामी समर्थ रुग्णालय चालविले जाते. यात प्रामुख्याने गरोदर महिलांच्या नियमित तपासण्यांसाठी सोनोग्राफी करण्यास सांगितले जाते. खासगी रुग्णालयांमधील सोनोग्राफीचा खर्च गोरगरिबांना न परवडणारा असल्यामुळे ते महापालिकेच्या रुग्णालयांचाच आधार घेतात. सद्य:स्थितीत नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय आणि पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयातच सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध आहे. परंतु, सातपूर, नवीन नाशिक, जुने नाशिक या भागातील रुग्णांना, तसेच गरोदर महिलांना सोनोग्राफीसाइी नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात, तसेच पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे रुग्णांचे तसेच गरोदर महिलांचे हाल होतात. बिटको व इंदिरा गांधी रुग्णालयापाठोपाठ आता जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, जिजामाता प्रसूतीगृह, मायको रुग्णालय व स्वामी समर्थ रुग्णालयासाठी चार सोनोग्राफी यंत्रे खरेदी केली जाणार आहेत. त्यासाठी ७७ लाखांचा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर या सर्व रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या महिलांचा त्रास वाचणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोतवाल फोटो

एटीएम ‘मास्टर्स’ जेरबंद!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यासह देशभरात फक्त एटीएम फोडून त्यातील लाखो रुपये चोरी करणाऱ्या करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीस क्राईम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने गुजरातमध्ये शिताफीने अटक केली. अगदीच सराईत असलेल्या टोळीतील सदस्यांवर हरियाणा पोलिसांनी बक्षीससुद्धा जाहीर केलेले आहे. या टोळीच्या अटकेमुळे उपनगर येथील एटीएम फोडल्याचा गुन्हा उघडकीस आला.
साहून अली मोहम्मद खान (रा. हरियाणा), जुबेर जुम्मा खान (गुजरात) आणि शौकिन जानु खान (हरियाणा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या तिघांसह त्यांच्या आणखी पाच साथीदारांनी मिळून ११ ऑक्टोबर २०१८ रोजी पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास फेम सिनेमा परिसरातील शिवाजीनगर येथील स्टेट बँकेचे एटीएम फोडले होते. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून २८ लाख २२ हजार ५०० रुपयांची रक्कम घेऊन संशयित पसार झाले होते. या गुन्ह्याचा तपास युनिट एकच्या पथकाकडे होता. या गुन्ह्यात हरियाणा राज्यातील टोळीचा समावेश असल्याची माहिती तपासादरम्यान युनिटला मिळाली होती. या टोळीतील काही सदस्यांच्या हालचालींवर पोलिसानी लक्ष केंद्रित केले होते. टोळीतील वरील संशयित अहमदाबाद येथे येत असल्याचे पोलिसांना समजताच सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, हवालदार रवींद्र बागुल, येवाजी महाले, कॉन्टेबल विशाल देवरे, स्वप्निल जुंद्रे, राहुल पालखेडे, प्रवीण चव्हाण यांचे पथक अहमदाबादकडे रवाना झाले. अहमदाबादमध्ये संशयितांचा माग काढून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पालकर, सहायक उपनिरीक्षक पोपट कारवाळ, बाळू दोंदे, हवालदार रवींद्र बागुल, वसंत पांडव, विजय गवांदे, संजय मुळक, अनिल दिघोळे, पोलिस नाईक आसिफ तांबोळी, संतोष कोरडे, मोहन देशमुख, शांताराम महाले, पोलिस शिपाई नीलेश भोईर, गणेश वडजे, विशाल देवरे, प्रतिभा पोखरकर आदींनी केली.
--
राज्यात चार ठिकाणी डल्ला
या टोळीतील आणखी पाच सदस्य फरारी असून, पोलिस त्यांचा माग काढीत आहेत. पोलिसांनी अटक केलेल्यांकडे चौकशी केली असता त्यांनी उपनगरसह देवगाव रंगारी (जि. औरंगाबाद), कराड, सातारा, इस्लामपूर, सांगली आदी ठिकाणी एटीएम फोडल्याची कबुली दिली. युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ यांनी सांगितले, की या टोळीला कोर्टात हजर करून पोलिस कोठडी घेतल्यानंतर आणखी चौकशी करण्यात येईल. यापूर्वी दिल्ली येथील एका टोळीस याच पद्धतीने अटक करण्यात आली होती. ही टोळी दिवसा घरफोडी करून परत दिल्लीला पोहोचायची. त्याच धर्तीवर हरियाणा येथील टोळीचे काम असून, ही टोळी फक्त एटीएमलाच लक्ष्य करीत असल्याचे वाघ यांनी स्पष्ट केले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुष्पोत्सव नव्हे खुली तिजोरीच जणू!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तब्बल दहा वर्षांनंतर महापालिकेत होत असलेल्या पुष्पोत्सवाला आता उद्यान विभागाने मेगा इव्हेन्टचे स्वरूप देण्याची तयारी चालवली आहे. महापालिकेकडे सुरक्षा रक्षक आणि खासगी गनधारी सुरक्षारक्षकांची फळी उपलब्ध असताना फुलांच्या संरक्षणासाठी आता चक्क बाउन्सर नियुक्तीचा हट्ट ठेकेदाराकडे धरला जात आहे. त्यामुळे आता सुरक्षारक्षक, गनधारी खासगी सुरक्षा रक्षकांपाठोपाठ पुष्पोत्सवाला बाउन्सरच्या रुपाने तिहेरी संरक्षण प्राप्त होणार असले तरी, या कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे पाना-फुलांसह पुष्पप्रेमी कोमेजणार तर नाहीत, ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.

महापालिकेच्या वतीने तब्बल दहा वर्षांनंतर प्रथमच येत्या २२ ते २४ फेब्रुवारी दरम्यान पुष्पोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सन १९९३ पासूनची परंपरा २००८ मध्ये खंडित झाली होती. परंतु, नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या पुष्पोत्सवाला चालना दिली आहे. वृक्ष प्राधिकरण समितीच्या प्रस्तावाला आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर उद्यान विभागाने उत्सवासाठी लगीनघाई सुरू केली आहे. यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली होती. परंतु, आयुक्तांनी हा खर्च जास्त असल्याचे सांगत, त्याला २० लाखांची कात्री लावली. त्यामुळे ३० लाखांत हा पुष्पोत्सव साजरा केला जाणार असून, त्याला नामांकित कंपन्या, उद्योजक, सहकारी बँका, हॉटेल्स, व्यापारी समूह यांच्याकडूनही फंडिंग होणार आहे. या सोहळ्याची जबाबदारी उद्यान विभागाने खासगी ठेकेदारावर सोपवण्याची तयारी केली आहे. त्यासाठी इच्छुकांची नुकतीच प्री-बिड बैठक पार पडली. या बैठकीत सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. जरबेरा, शेवंती, गुलाब, कमळ, मोगरा, जास्वंदी यांचे पुष्पप्रदर्शन, तसेच गीतगायनाचेही कार्यक्रम होणार आहेत. त्यात व्हीआयपींचाही समावेश असणार आहे.

पाना-फुलांचे संरक्षण?

गर्दीला हाताळण्याासठी बाउन्सर असावेत, असा हट्ट उद्यान विभागाने चालवला आहे. अगोदरच पालिकेकडे दुहेरी सुरक्षा व्यवस्था असताना खासगी बाउन्सर्सचा आग्रह का, याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. आतापर्यंत गर्दीचे नियंत्रण करणारे बाउन्सर पाना-फुलांचे संरक्षण कसे करणार, हा मोठा प्रश्न ठेकेदारांनाही पडला आहे. उद्यान विभागाच्या या अटीमुळे आता ठेकेदारांसमोर यक्षप्रश्न पडला असून, पाना-फुलांच्या संरक्षणासाठी कोणते बाउन्सर द्यायचे, याचा विचार सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ब्राह्मण समाजाच्या जणगणनेस प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जगदगुरू श्री शंकराचार्य यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या विश्व ब्राह्मण महापरिषदेतर्फे महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाच्या जनगणनेच्या शुभारंभ आणि महापरिषदेच्या नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती सोहळा शनिवारी (दि. १२) सकाळी साडेनऊ वाजता कॅनडा कॉर्नर येथील वसंत मार्केट मधील समर्थ मंगल कार्यालय येथे होणार आाहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. लक्ष्मण उगावकर उपस्थित राहणार आहेत.

सर्व शाखीय बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्या एकत्रीकरणासाठी दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या महापरिषदेचा विस्तार देश व विदेशात झाला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सागर पांडे व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शुभा मिश्रा या काम पाहत आहेत. जनगणनेच्या प्रारंभासोबतच ब्राह्मण समाजातील किमान १० वी पास १८ ते ३५ वयोगटातील मुला-मुलींसाठी रोजगार संधी मिळवून देणाऱ्या पूर्णपणे मोफत असलेल्या सरकारच्या २ वर्षीय पदविका उपक्रमाचाही शुभारंभ या कार्यक्रमात होणार आहे. विश्व ब्राह्मण महापरिषदेतर्फे युवा, व्यापार, महिला, विवाह यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याचीही माहिती यावेळी दिली जाईल. समाजबांधवांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रीय कार्याध्यक्ष हेमंत दीक्षित यांनी केले आहे.

लोगो : सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुसुमाग्रज स्मारकात रविवारी ‘चित्रांजली’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्या स्मृतींना समर्पित वारली चित्रकृतींचे 'चित्रांजली' प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ग्रीन केअर संस्था आणि वारली आर्ट फाउंडेशन यांच्यातर्फे हा उपक्रम गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकातील कलादालनात होणार आहे. शंकराचार्य न्यास संचलित गोशाळेचे प्रमुख राजेंद्र जोशी यांच्या हस्ते रविवारी (दि. १३) सकाळी १० वाजता उद्घाटन होईल. यावेळी विशेष निमंत्रित म्हणून पुण्याचे अरुण गाडगीळ आणि स्वाती गाडगीळ उपस्थित राहणार आहेत.

चित्रांजली प्रदर्शनात ग्रीन केअर संस्थेच्या अध्यक्षा व ज्येष्ठ कलाशिक्षक पूर्णिमा आठवले यांच्या वारली चित्रशैलीतील कलाकृती मांडण्यात येणार आहेत. वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर, आठवले यांच्या विद्यार्थिनी शर्वरी देशपांडे, श्रावणी शिंदे, सिमरन संधू यांची चित्रे रसिकांना बघता येतील. जव्हारच्या दिव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तू, सिन्नरचे रवींद्र वैष्णव यांचे सुंदर पॉटस यावेळी उपलब्ध असतील. 'चित्रांजली' प्रदर्शन रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहील. नाशिककर कला रसिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईच्या व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोराला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मुंबई येथील व्यापाऱ्यास चार मोबाईल चोरट्यांनी शुक्रवारी (दि.११) मारहाण करून त्यांच्याजवळील मोबाइल आणि त्याच्या खिशातील ५ हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतल्याची घटना घडली. जवळ असलेल्या व्यापाऱ्यांनी एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईमधील कळवा येथील सूर्याकुमार शिवकुमार मौर्य हे भाजीपाला खरेदी करण्यासाठी नियमित नाशिक बाजार समितीत येतात. ते शुक्रवारी (दि.११) पहाटे इतर व्यापाऱ्यांसोबत नाशिक बाजार समितीत आले. दीपक अनिल नामेकर (२१, रा. रविवार कारंजा, लवंगे वाडा, तेली गल्ली), प्रीतम बेलेकर (१९, रा. भद्रकाली, दुधबाजार), सागर शेलार व सागर अहिरे असे चौघेजण मौर्य यांच्याजवळ आले. तोंडओळख असलेल्या मानेकर याने मौर्य यांना, 'भाजी खरेदी करोगे क्या' असे विचारले. त्यावर होकारार्थी मान हलवत मौर्य यांना नामेकर याच्यासोबत असलेल्या एकाने 'बैंगन खरेदी करना हो तो गाले पर आओ' असे सांगितले. मौर्य यांनी त्यास मी नाही येणार असे सांगितले. यावर एकाने मौर्य यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तर दुसऱ्याने त्यांच्या खिशातील ७ हजार रुपये किमतीचा आयटेल कंपनीचा मोबाइल हिसकावून घेत खिशातील ५ हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. यावेळी मौर्य यांनी आरडाओरड केल्याने त्यांच्यासोबत असलेल्या सहकारी व्यापाऱ्यांनी पळून जाणाऱ्या दीपक मानेकर यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला. फरार असलेल्या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रजासत्ताकदिनी राजधानी धावणार?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिककरांना प्रतीक्षा असलेली राजधानी एक्स्प्रेस मध्य रेल्वेच्या मार्गाने २६ जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनापासून धावण्याची शक्यता आहे. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकादरम्यान धावणारी ही गाडी नाशिकरोडला थांबणार असल्याने कमी वेळेत व कमी खर्चात राजधानी दिल्लीला जाण्याचे नाशिककरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे या गाडीला घाटामध्ये पुश-पुल तंत्र वापरले जाणार आहे.

मुंबई विभागातील कसारा आणि इगतपुरीदरम्यानच्या घाटांच्या प्रदेशात राजधानी एक्स्प्रेसची चाचणी घेण्यात आली आहे. त्यासाठी पुश-पुल तंत्र वापरण्यात आले आहे. समाधानकारक चाचण्या झाल्यानंतर २६ जानेवारी रोजी या गाडीला मुंबईहून हिरवा झेंडा दाखविण्यात येईल, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पुढील आठवड्यात राजधानी एक्स्प्रेसच्या चाचण्या पूर्ण क्षमतेने घेतल्या जाणार आहेत. शक्यतो, सोमवारी किंवा बुधवारी या चाचण्या होतील. या दोन्ही दिवसांपैकी एका दिवशी राजधानी एक्स्प्रेस मुंबई ते दिल्लीदरम्यान चाचणी तत्त्वावर धावेल. नाशिकरोडसह ठरलेल्या स्थानकांमध्ये चाचणीदरम्यान ही गाडी थांबा घेईल. त्यानंतर एक आठवड्याने पुन्हा एक चाचणी होईल. त्याचा अहवाल आल्यानंतर २६ जानेवारीला गाडीला मुंबईहून हिरवा झेंडा दाखवला जाईल.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या प्रकरणी लक्ष घातले आहे. पुश-पुल ट्रायल्स लवकरात लवकर पूर्ण करून गाडी नियमितपणे सोडण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. मार्चमध्ये लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. ते लक्षात घेऊन या गाडीच्या चाचण्या पूर्ण करून गाडी मध्य रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनही जोमाने कामाला लागले आहे.

पुश-पुल तंत्र

एक्स्प्रेस ट्रेनसाठी पुश-पुल तंत्रावर आधारित चाचण्या सुरू आहेत. भविष्यात सर्व राजधानी एक्स्प्रेससाठी हे तंत्र वापरण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मध्य रेल्वे त्या दृष्टीने तयारी करीत आहे. पुश-पुल तंत्रात रेल्वेगाडीच्या दोन्ही टोकांना रेल्वे इंजिन असते. दोन्ही इंजिन रेल्वेला एकाच दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करतात. घाटात पुढील इंजिन गाडीला ओढते, तर मागील इंजिन गाडीला पुढे ढकलते. कसारासारख्या अवघड घाटात पुश-पुल तंत्र वापरणे आवश्यक आहे. सध्या अतिरिक्त इंजिन (बॅंकर) संबंधित रेल्वेस्थानकांमध्ये गाडीला जोडले जाते. त्यामुळे गाडी घाट जोमाने चढते मात्र, इंजिन जोडण्यासाठी कसारा आणि इगतपुतरीत गाडीला वीस मिनिटे जास्त लागतात. राजधानी एक्स्प्रेसला मुंबईपासूनच मागेही इंजिन (बँकर) जोडले जाणार असल्याने गाडीला इगतपुरी, कसाऱ्यात थांबावे लागणार नाही. तो वेळ वाचेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहगलांच्या भाषणाची सभा उधळली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अभिव्यक्ती स्वातंत्र्य रक्षण निर्धार मंचातर्फे आयोजित साहित्यिका नयनतारा सहगल यांच्या भाषणाच्या अभिवाचन सभेत गोंधळ घालत काही कार्यकर्त्यांनी ती उधळून लावली. यावेळी 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' अशी घोषणाबाजी, माईकची हिसकाहिसकी, आरडाओरड असे तणावपूर्ण वातावरण झाले होते.

कुसुमाग्रज स्मारकातील स्वगत हॉलमध्ये शुक्रवारी अभिव्यक्ती स्वातंत्र्य रक्षण निर्धार मंचातर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक ख्यातनाम साहित्यिका नयनतारा सहगल यांच्या भाषणाच्या अभिवाचनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दीपा पळशीकर यांनी अभिवाचनास सुरुवात केली. त्याआधी प्रास्ताविकात अरुण ठाकूर यांनी ही निषेधाची सभा आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याने तसेच लोकशाहीच्या मुळावर हा घाव असल्याने स्वातंत्र्य जपावे लागणार आहे, असे सांगत अभिवाचनानंतर येथे काही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येणार आहेत अशी माहिती दिली. सहगल यांचे भाषण सर्वांनी अतिशय शांतपणाने ऐकून घेतले. मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या प्रतिक्रियांनी वातावरण काहीसे तापले. प्रत्येकाने स्टेजवर येत निषेध व्यक्त केला. यात किशोर पाठक, विश्वास ठाकूर, नागार्जुन वाडेकर, चंद्रकांत महामिने यांचा समावेश होता. महामिनेंचे भाषण संपल्यावर लोकेश शेवडे यांनी स्टेजवर जाऊन सभेचा ठराव मांडायचा आणि सभा संपणार असे ठरलेले असताना काही कार्यकर्ते 'आम्हाला बोलायचे आहे' असे सांगत माईककडे गेले. त्यापैकी समीर देव यांनी नयनतारा सहगल यांना भाषण न करू देण्याबाबत निषेध व्यक्त केला आणि लगेचच 'भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात दोन चार कुटुंबाचाच अधिक उल्लेख केला जातो, तसे नसून सत्य सर्वांसमोर यावे' वगैरे बोलण्यास सुरुवात केली. त्याचवेळी लोकेश शेवडे ठराव वाचण्यासाठी उठलेले असल्याने त्यांनी 'हे बोलण्यासाठी हे योग्य व्यासपीठ नाही, हे योग्य नाही' असे सांगत माईक मागितला. याचवेळी मिलिंद कुलकर्णी हेदेखील पुढे आले. शेवडे यांनी माईक हातात घेताच विपूल आपटे नावाच्या तरुणाने जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम', 'ही आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी' अशा घोषणा देत काही कार्यकर्ते पुढे गेले. गोंधळाच्या वातावरणात लोकेश शेवडे यांनी निषेधाचा ठराव सांगितला. पुढेही बराच वेळ हा गोंधळ सुरूच होता.

पाठकांच्या शुभेच्छांनी उंचावल्या भुवया

नयनतारा सहगल यांना भाषण नाकारल्याच्या कारणाने घेण्यात आलेल्या या सभेत ज्यांना प्रतिक्रिया व्यक्त करावयाच्या आहेत, त्यांना स्टेजवर बोलाविण्यात आले. यावेळी किशोर पाठक यांनी निषेधाच्या सभेत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बऱ्याच वर्षांनी स्त्री गेल्याने अरुणा ढेरे यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या कारण ही निषेधाची सभा होती. परंतु, पाठक यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, निमंत्रण नाकारली गेलेली एक स्त्री व अध्यक्षपदीही एक स्त्रीच. एकाच व्यासपीठावर या दोन वेगवेगळ्या स्त्रियांची रूपे पहायला मिळाल्याचे ते म्हणाले.

मी बोलत असताना माझ्या हातातून लोकेश शेवडे यांनी माईक हिसकावून घेतला. याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी नाही म्हणत का? आमचेही म्हणणे ऐकून घेणे गरजेचे होते.

-समीर देव

मी माईक मागितला, त्याने माईक दिला. मी कधीही कुणाच्या स्वातंत्र्यावर गदा आणलेली नाही. मला ते मान्यच नाही. परंतु, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विषयात भारताच्या स्वातंत्र्याचा विषय कशाला आणला इतकेच मी विचारले.

-लोकेश शेवडे,

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक राज्यातील सहावे प्रदूषित शहर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभरात झपाट्याने प्रदूषित होणाऱ्या १०२ शहरांची यादी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यालयाने जाहीर केली असून, त्यात महाराष्ट्रातील १७ प्रदूषित शहरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे राज्यातील १७ शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक सहावा लागला आहे. त्यामुळे 'स्वच्छ व सुंदर शहर' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या नाशिक महापालिकेला हा मोठा झटकाच आहे.

केंद्रसरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने शुक्रवारी देशातील घातक हवा असलेल्या प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली आहे. नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण हवेत वाढत असल्याचे केंद्राने जाहीर केले आहे. त्यात देशभरातील १०२ शहरांचा समावेश करण्यात आला असून, महाराष्ट्रातील १७ शहरांचा त्यात समावेश आहे. या सतरा शहरांध्ये नाशिकचा सहावा क्रमांक लागला आहे. आल्हाददायक, आरोग्यदायी, पोषक व जीवनमानासाठी उत्तम असे नाशिकचे हवामान समजले जाते. परंतु, या प्रतिमेला धक्का लागला आहे. नाशिकमध्ये उद्योगांची संख्या फारशी नसली तरी नाशिकमधील हवा प्रदूषित असल्याचे समोर आले आहे. नायट्रोजन डायऑक्साइडचे वार्षिक सरासरी प्रमाण हे ४० टक्क्यांपेक्षा अधिक आढळून आलेल्या शहरांची यादीत नाशिकचाही समावेश झाला आहे. महाराष्ट्रातील प्रदूषित शहरांमध्ये मुंबईचा प्रथम क्रमांक असून, दुसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई, तिसऱ्या क्रमांकावर बदलापूर, चौथ्या क्रमांकावर उल्हासनगर, पाचव्या क्रमांकावर पुणे, तर नाशिक सहाव्या क्रमांकावर आले आहे. नाशिकनंतर जळगाव आणि औरगांबादचा क्रमांक लागतो. केंद्र सरकारच्या या अहवालामुळे पालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

अॅक्शन प्लॅन द्या

केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने देशभरातील प्रदूषित १०२ शहरांना तातडीने अॅक्शन प्लॅन देण्याचे आदेश दिले आहेत. त्यात प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासह नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण कसे कमी करणार, याबाबतचा आराखडा सादर करावा लागणार आहे. त्यासाठी अधिकाधिक वृक्षलागवडीचे प्रयत्न केले जाणार असल्याची माहीती उद्यान विभागाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याच्या अनुदानापासून१६०२ शेतकरी वंचित

$
0
0

अडीच वर्षांपासून शेतकऱ्यांचे ५५ लाख थकीत

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात १ जून २०१६ ते ३१ ऑगस्ट २०१६ या कालावधीत कांद्याचे भाव घसरल्याने बाजार समित्यांमध्ये आवक झालेल्या कांद्याचे कमाल व किमान दर, कांदा उत्पादकांची संख्या व त्यांना द्याव्या लागणाऱ्या अनुदानाची रक्कम याबाबतचा सविस्तर अहवाल पणन संचालनालयाने जिल्हा उपनिबंधकांकडे मागविला होता. त्यानुसार प्रतिक्विंटल १०० रुपये अनुदान देण्यात येणार होते. मात्र, यंत्रणेने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेला उशिराने अहवाल पाठविल्याचा फटका संबंधित शेतकऱ्यांना बसत असून, गेल्या अडीच वर्षांपासून चांदवड, नाशिक, येवला आणि देवळा या चार तालुक्यांमधील १६०२ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

अनुदान पदरात पडावे याकरिता चांदवड तालुक्यातील ७९ वर्षीय एक शेतकरी गेल्या दोन-अडीच वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र, जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकारी, पणन महासंचालक, स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री इतकेच नव्हे तर मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करूनही नाचणारे कागदी घोडे दाखविण्यापलीकडे सरकारी यंत्रणेने काही केले नसल्याची खंत या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. धर्माजी पाटील यांच्याप्रमाणेच आपणही आत्महत्या करू, असा इशारा त्यांनी पणन संचालनालयातील अधिकाऱ्यांना दिल्यानंतर काही प्रमाणात यंत्रणा हलली. लोकशाही दिनातही त्यांनी तीन वेळा आपली व्यथा मांडली; परंतु तुमचे अनुदान बँक खात्यावर जमा होईल, एवढेच उत्तर त्यांना दिले जात आहे. सतरा हजार रुपयांचे अनुदान मिळविण्यासाठी माझे त्याहून अधिक पैसे खर्च झाले आहेत; परंतु माझ्या वंचित शेतकरी बांधवांना अनुदान मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ न बसण्याचा निर्धार या शेतकऱ्याने केला आहे.

...

अनुदान जमा करा; अन्यथा...

अनुदानाच्या प्रक्रियेस दिरंगाई करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी करावी, त्याच्यावर जबाबदारी निश्चित करून १५ टक्के व्याजदरासह हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करावे, असा निर्वाणीचा इशारा या शेतकऱ्याने दिला आहे. आठ दिवसांत अनुदान जमा झाले नाही, तर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सर्वस्वी सरकार आणि जिल्हा प्रशासनाची असेल, असा इशाराही या शेतकऱ्याने दिला आहे.

....

जिल्ह्यातील १६०२ शेतकरी वंचित

दोनशे क्विंटलपेक्षा कमी कांदा विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील चांदवड, नाशिक, येवला आणि देवळा या चार तालुक्यांमधील १६०२ शेतकऱ्यांचे सुमारे ५५ लाख रुपयांचे अनुदान थकले आहे. येवला-८९८, चांदवड-५३३, नाशिक-१११, देवळा- ६० इतके शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.

--

थकीत अनुदानाची आकडेवारी

बाजार समिती....पात्र लाभार्थी....पात्र आवक (क्विंटल)...पात्र अनुदान रक्कम (रुपये)

चांदवड....५३३३.....१५०९८.४५...१५०९८४५

नाशिक....१११.....५०८२.०२...५०८२०२

येवला.....८९८....३२९९०.८९....३२९९०८९

देवळा.....६०.....१६१६.८५.....१६१६८५

एकूण.....१६०२.....५४७८८.२१....५४७८८२१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झिजल्या वहाणा तरीकांद्याचे अनुदान मिळेना!

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

नाशिक : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान प्रत्यक्षात पदरात पडावे याकरिता ७९ वर्षांचा एक ज्येष्ठ शेतकरी गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा निबंधकांपासून मंत्रालयापर्यंतच्या सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजवत गेले. पायातील वहाणा झिजल्या, अनुदान मिळविण्यासाठी पदरचे ५० हजार रुपये खर्च झाले तरी निगरगट्ट यंत्रणेला पाझर फुटलेला नाही. वंचित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान मिळवून देण्याचा संकल्प चांदवड तालुक्यातील या शेतकऱ्याने केला असून, नाशिकमध्ये धर्मा पाटील निर्माण करू नका, असा निर्वाणीचा इशाराही दिला आहे.

राज्यात १ जून २०१६ ते ३१ ऑगस्ट २०१६ या कालावधीत कांद्याचे भाव घसरल्याने बाजार समित्यांमध्ये आवक झालेल्या कांद्याचे कमाल व किमान दर, कांदा उत्पादकांची संख्या व त्यांना द्याव्या लागणाऱ्या अनुदानाची रक्कम याबाबतचा सविस्तर अहवाल पणन संचालनालयाने जिल्हा उपनिबंधकांकडे मागविला होता. अशा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. प्रतिशेतकरी जास्तीत जास्त २०० क्विंटलकरिता अनुदान देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. त्याअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ३२ हजार ८७७ पात्र लाभार्थ्यांना १२ कोटी ८६ लाख ५८ हजार १४८ रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. मात्र, चांदवड, नाशिक, येवला आणि देवळा या चार तालुक्यांमधील १६०२ लाभार्थी ५४ लाख ७८ हजार ८२१ रुपयांच्या अनुदानापासून अद्याप वंचित आहेत.

१६०२ शेतकरी वंचित...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेचा खेळ, आता वायरमन पूर्णवेळ!

$
0
0

कालिदास कलांमदिरासाठी निर्णय

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या महाकवी कालिदास कलामंदिरावर साडेनऊ कोटी खर्च करूनही समस्या सुटत नसल्याचे चित्र आहे. आजही मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी भेडसावत असून, गेल्या महिन्यात एका शोदरम्यान सातवेळा वीजप्रवाह खंडित झाला होता. कलाकारांना अंधारातच जेवण करावे लागत आहे. त्यामुळे कलाक्षेत्रातून टीका झाल्यानंतर विद्युत विभागाने अखेर कालिदाससाठी आऊटसोर्सिंगने वायरमनची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराला नवी झळाळी मिळाली. कलामंदिराचे आतील स्ट्रक्चर पूर्णपणे बदलून आसनव्यवस्था, विद्युत व्यवस्था, रंगरंगोटी, ध्वनी योजना, वातानुकूलित यंत्रणा आदींमध्ये बदल करण्यात आले आहेत. ऑगस्टमध्ये कालिदास कलामंदिराचे लोकार्पण करून त्याच्या दरातही मोठी वाढ करण्यात आली. परंतु, साडेनऊ कोटींचा खर्च होऊनही त्रुटी दूर झाल्या नसल्याचे वास्तव आहे. कलामंदिरात तांत्रिक अडचणी असून, ध्वनी योजनेत तसेच प्रकाशयोजनेत त्रुटी आहेत. त्यासंदर्भात कलावंतांनी पालिकेकडे तक्रारही केली आहे. परंतु, त्याबाबत दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. डिसेंबर महिन्यात एका नाटकादरम्यान सातवेळा वीजप्रवाह खंडित झाला. त्यामुळे कलाकारांसह प्रेक्षाकांनाही मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही. एवढेच नव्हे कलाकारांसह नाटक कंपनीबरोबर आलेल्या कर्मचाऱ्यांना अंधारात जेवण करण्याची वेळ आल्याने कलाक्षेत्रात पालिकेच्या कामकाजावर जोरदार टीका होऊ लागली. या प्रकारानंतर पालिकेला जाग आली असून, मनुष्यबळाची कमतरता असल्याचे सांगण्यात येत आहे. वीजप्रवाह खंडित झाल्यानंतर जनरेटर सुरू करणे तसेच, दुरुस्तीसाठी कर्मचारी नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने आता कालिदासमधील विद्युत विभागाचे आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. कालिदासमध्ये कायमस्वरुपी वायरमन उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव असून, तो मार्गी लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक स्थळांवर मार्चमध्ये हातोडा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या फेरसर्वेक्षणाची प्रक्रिया महापालिकेने पूर्ण केली आहे. याबाबतचा अहवाल निष्कासन समितीने मान्य केल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ५७५ अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावरील हरकत व सूचनांवर सुनावणीनंतर पात्र धार्मिक स्थळे सोडून उर्वरित स्थळांवर मार्चमध्ये हातोडा पडणार आहे.

उच्च न्यायालयाने सन २००९ पूर्वीची व नंतरची अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे निर्देश दिले असून, त्यानुसार महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. महापालिका क्षेत्रात २००९ पूर्वीची एकूण ९०८ धार्मिक स्थळे होती. त्यापैकी २४९ धार्मिक स्थळे कागदोपत्री पुराव्याअंती नियमित करण्यात आली असून, उर्वरित ६५९ अनधिकृत धार्मिक स्थळांपैकी १५६ धार्मिक स्थळे हटविण्यात आली आहेत. ५०३ धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच २००९ नंतरची १७६ धार्मिक स्थळे असून त्यापैकी १०५ धार्मिक स्थळांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित ७१ धार्मिक स्थळांवर कारवाई प्रस्तावित आहे. जवळपास ५७५ अनधिकृत धार्मिक स्थळांचा वाद पुन्हा उच्च न्यायालयात गेला. न्यायालयाने पुरेशी संधी दिली नसल्याचे कारण देत फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून धार्मिक स्थळांची फेरपडताळणी केली जात असून, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नवीन नाशिक, पंचवटी, सातपूर व नाशिकरोड या सहाही विभागांमधील फेरपडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, यासंदर्भातील अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. हा अहवाल धार्मिक स्थळ निष्कासन समितीच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. समितीच्या मान्यतेने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर हरकती व सूचना मागवून सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. अंतिमत: अनधिकृत आढळणाऱ्या धार्मिक स्थळांवर मार्चअखेर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून हातोडा मारण्याची कारवाई सुरू केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक असहकाराच्या तयारीत

$
0
0

मागण्या पूर्ण होत नसल्याने \Bकनिष्ठ महाविद्यालयीन महासंघ \Bनाराज

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दीर्घकाळापासून प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याची प्रशासनाला आठवण करून देत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या काळात असहकार आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असून त्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अनेक आंदोलने केली आहेत. त्याची दखल केवळ आश्वासने देण्यापुरतीच घेण्यात आल्याने महासंघ पुन्हा असहकाराच्या तयारीत आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणे, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांची यादी घोषित करून त्यांना अनुदान देणे, माहिती तंत्रज्ञान विषय अनिवार्य करून अनुदानित करावा, २४ वर्ष सेवा झालेल्या सर्व शिक्षकांना विनाअट वेतनश्रेणी द्यावी, नियुक्ती मान्यता मिळाल्यानंतर तातडीने वेतन सुरू करावे यांसह सुमारे ३३ मागण्या प्रलंबित आहेत. गेल्या १० महिन्यांपासून शिक्षक या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करत आहे. परंतु, नवीन तारखा देण्यापलीकडे शिक्षण विभागाने काहीही केले नसल्याने सर्व आश्वासने हवेत विरले असल्याचे संघटनेकडून सांगण्यात येत आहे.

आंदोलनाची रुपरेषा

महासंघाने पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला असून त्याची सुरुवात शुक्रवारपासून करण्यात आली. मागण्यांसंदर्भात राज्यभरातील तालुका तहसीलदार, आमदारांना निवेदन निवेदन देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात, शुक्रवारी (दि. १८) सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलने करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात ३० जानेवारी रोजी मूकमोर्चे काढण्यात येणार आहे. सरकारने तरीही दुर्लक्ष केल्यास चौथ्या टप्प्यात बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या काळात असहकार आंदोलन करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ नाशिकचे अध्यक्ष प्रा. संजय शिदे यांनी सांगितले आहे.

\Bया मागण्यांचाही समावेश

\B- कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करावे.

- सेवा नियुक्तीचे वय ६० वर्ष करण्यात यावे.

- संचमान्यतेतील त्रुटी दूर करुन व विद्यार्थी संख्येची अट शिथिल करावी.

- प्रचलित पद्धतीने संचमान्यता करे, संचमान्यतेतील चुका सुधारणे.

- शिक्षकांच्या पाल्यांना सर्व स्तरांवरील शिक्षण मोफत द्यावे.

- स्वयंअर्थसहाय्य तत्वावर कनिष्ठ महाविद्यालयांना बृहद आराखडा तयार करावा.

- आराखड्यास परवानगी द्यावी व त्यासाठी कायद्यात सुधारणा करावी.

- नीट, जेईई साठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा केंद्र असावे.

- वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाबाबतचा २१ डिसेंबर २०१८चा शासन आदेश रद्द करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंदून सोडा नाशिकरोड!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एरवी रोजचे टेन्शन, तीच वाहतूक कोंडी आणि तोच तो भीतीने गाळण उडवणारा बेफाम रॅश ड्रायव्हिंगचा जाच... नको नकोसे होते ना? मग नाशिकरोडवासीयांनो, तुमच्यासाठी काही वेळापुरती का होईना, 'महाराष्ट्र टाइम्स' रविवारी एक हॅप्पी सकाळ घेऊन येणार आहे. नाशिकरोड येथील बिटको चौक ते कोठारी कन्याशाळा या रस्त्यावर रविवारी सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत मनसोक्त बागडण्याची, कल्ला करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे काय, तर तुमच्यासाठी 'फन डे'चा सुपरसंडेच! हॅप्पी स्ट्री या उत्साही उपक्रमाच्या आनंदोत्सवासाठी मग रविवारी सकाळी तयार राहा. या आनंदपर्वणीत तुम्हाला झुम्बा डान्ससह विविध कलाविष्कार पाहता येईल आणि मनसोक्त खेळताही येईल.

कायम वाहतुकीने गजबजलेले रस्ते नाशिककरांसाठी खुले होणे, हा विचारच नाशिककरांना सुखावणारा ठरतो. या रस्त्यावर नृत्याविकाष्काराच्या जोडीला, विविध खेळ आणि आकर्षक कला पाहण्यात नाशिककर दंग होऊन जातात. हा अनुभव 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'हॅप्पी स्ट्रीट' या उपक्रमातून रविवारी (१३ जानेवारी) रोजी नाशिकरोडवासीयांना घेता येणार आहे. कॉलेजरोड आणि व्हॅरेडियन व्हॅली या रस्त्यावर झालेल्या हॅप्पी स्ट्रीट उपक्रमाला नाशिकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हीच आनंदोत्सवाची पर्वणी आता नाशिकरोड येथे होणार असून, हिंदी मराठी गाण्यांच्या तालावर नाशिककरांना झुम्बा डान्सवर ठेका धरता येणार आहे, तसेच हॅप्पी स्ट्रीटवर सुबक रांगोळी रेखाटण्याची, स्केटिंग आणि बॅडमिंटन खेळण्याची, लाइव्ह बॅण्डद्वारे गाणी ऐकण्याची, जादूचे प्रयोग पाहण्याची अन् विविध छंद जोपासण्याची संधी मिळणार आहे. यासह हॅप्पी स्ट्रीटवर नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉपिंग बॅग मेकिंग, ज्वेलरी, स्केच आर्ट, क्विलिंग आर्ट, कॅलिग्राफी, पोट्रेट या कलाविष्कारांची मेजवानीही अनुभवता येईल. सायकल राइडची मज्जा लुटत, आकाश निरीक्षण करण्याची संधीही नाशिकरांना घेता येईल. पोलिस बँडचा सूरही हॅप्पी स्ट्रीटवर ऐकायला मिळेल.

बक्षिसेही जिंकण्याची संधी

सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे मोफत रक्तदाब आणि शुगरचेकअपही करता येईल. एकाहून एक बहारदार कलाविष्कारांनी भरगच्च अशा हॅप्पी स्ट्रीट उपक्रमात बक्षिसे जिंकण्याची संधीही नाशिकरोडवासीयांना मिळणार आहे. या निमित्ताने नाशिकरोडवासीयांची रविवारची सकाळ आनंदोत्सवाच्या पर्वणीने अविस्मरणीय ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images